जळगाव :बारावीचा निकाल जाहीर झाला असून पुढील आठवड्यात दहावी चा निकाल लागण्याची शक्यता आहे. दहावीनंतर महत्वाची पायरी असलेल्या अकरावीच्या वर्गासाठी प्रवेश घेणे आवश्यक असते. ही अकरावी प्रवेशप्रक्रिया लवकरच सुरू होईल. यासाठी दहावी पास झालेल्या आणि अकरावीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी विशेष तयारी करावी लागते. त्यामध्ये अकरावी प्रवेशासाठी कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य असते. त्यामुळे कागदपत्रांची यादी किंवा तयार आधीच करावी लागते, या प्रवेशासाठी काय काय नियोजन करावे हे पाहुयात... राज्य मंडळाशी संलग्न सर्व उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयात ऑनलाइन पद्धतीनेच प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अन्य कोणत्याही मार्गाने प्रवेश दिले जाणार नाहीत, असे स्पष्ट सांगण्यात आले. अशी राहणार प्रवेशप्रक्रियाऑनलाइन पोर्टलवर नोंदणी, वैयक्तिक माहिती गुण भरा, पसंतीच्या कनिष्ठ महाविद्यालयांची निवड करावी लागणार आहे. प्रवेशासाठी कॅप आणि विविध कोटा (आरक्षण) अशा दोनच पद्धती आहेत. यात मागासवर्गीय, अल्पसंख्याक, व्यवस्थापन कोटा असेल ही संपूर्ण प्रक्रिया संगणकीकृत आहे. ही कागदपत्रे तयार ठेवादहावीची गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (लागू असल्यास) उत्पन्नाचा दाखला, प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, विशेष आरक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे. गुणवत्तेनुसार प्रवेशअकरावी प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होणार असून, गुणवत्तेनुसार व निर्धारित निकषाच्या आधारावर राबविली जाणार आहे. शेवटच्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळेपर्यंत प्रक्रिया राबविली जाणार आहे. विहिरीत सापडली चौदाव्या शतकातील गधेगळ, गधेगळ म्हणजे काय, त्याच इतिहासात काय महत्व?
जळगावमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया लवकरच सुरू
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.