Achira News Logo
Achira News
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 06:02 AM
विक्रेत्यांची निराशा-संघर्ष आणि बलिदानाचा उन्हाळा

विक्रेत्यांची निराशा-संघर्ष आणि बलिदानाचा उन्हाळा

उन्हा-पावसात आमच्यासोबत राबली. आज त्यांची किंमत ऐकून काळीज तुटतंय. पण परिस्थितीपुढे हतबल झालो.” बाजारात खरेदीदार भाव पाडून बोलणी करत होते. विक्रेते नाईलाजाने तेच दर स्वीकारत होते. काहींनी जनावरे परत नेली. काहींनी कर्ज फेडण्यासाठी, घरखर्च भागवण्यासाठी मन मारून विक्री केली. जनावरांच्या गळ्यात हात घालून उभे असलेले पशुपालक पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले.
55 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 4, 2026, 06:00 AM
'प्राजक्ता कोली'च्या ग्लॅमरस लूकने'मिसमॅच्ड सीझन 4'च्या घोषणेतील कार्यक्रम लपवला

'प्राजक्ता कोली'च्या ग्लॅमरस लूकने'मिसमॅच्ड सीझन 4'च्या घोषणेतील कार्यक्रम लपवला

सोशल मीडियावरून अभिनयाच्या जगात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी प्राजक्ता कोळी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. यावेळी कारण आहे तिचा अभिनय नव्हे, तर तिचा जबरदस्त स्टायलिश लुक. Mismatched Season 4 च्या अधिकृत घोषणा कार्यक्रमात प्राजक्ता कोळीने कॅरी केलेला फ्लोरोसेंट ग्रीन शर्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिचा हा लुक इतका आकर्षक होता की चाहत्यांसह फॅशन तिच्या स्टाइलची विशेष दखल घेतली.चाहत्यांची फेव्हरेट लव्हस्टोरी Mismatched आता पु्न्हा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.या खास इव्हेंटमध्ये प्राजक्ता कोळीने तिच्या ग्लॅमरस लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जाणून घेऊयात या खास प्रसंगी प्राजक्ताचा लुक कसा होता. (फोटो सौजन्य :- योगेन शाह)फ्लोरोसेंट ग्रीन शर्ट आणि ब्लॅक कॉम्बिनेशनया खास प्रसंगी प्राजक्ताने फ्लोरोसेंट ग्रीन शर्ट रंगाचा शर्ट कॅरी केला होता. पण हा भडक रंग तिने ब्लॅक जॅकेटसह कॅरी करून हा लुक परफेक्ट बॅलन्स केला. शर्टच्या ब्राइटनेसमुळे लगेचच लक्ष वेधले जात होते, तर ब्लॅक जॅकेटमुळे लुकला सॉफ्ट, स्टायलिश आणि एलिगंट टच मिळाला. तिने मॅन्युअली मिनिमल मेकअप निवडला, ज्यात नैसर्गिक ग्लो आणि सॉफ्ट लिपशेड हायलाइट होता, ज्यामुळे संपूर्ण लुक अधिक फ्रेश आणि अॅवरेटेबल दिसत होता.सिंपल मेकपअप्राजक्ता कोळीचा लुक अधिकच ताजेतवाने आणि नैसर्गिक दिसण्यासाठी तिने सिंपल मेकअप केला होता. हलकी फाउंडेशन, नैसर्गिक ग्लो, सॉफ्ट लिपशेड आणि सूक्ष्म आई मेकअपने तिचा लुक हलका, परंतु आकर्षक बनवला. प्राजक्ता, जी ‘MostlySane’ म्हणून तिच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे, नियमितपणे तिच्या मेकअप टिप्स आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या हेअरस्टाइलपासून मेकअपपर्यंत प्रत्येक गोष्ट तिने सहज पद्धतीने सादर केली आहे.डिंपलची आठवणप्राजक्ता कोळीचा हा ग्लॅमरस लुक पाहून लगेच तिच्या Mismatched मधील डिंपल या पात्राची आठवण झाली. फ्लोरोसेंट ग्रीन शर्ट आणि ब्लॅक जॅकेटमधील स्टाइल तिच्या ऑन-स्क्रीन डिंपलसारखीच जिवंत, उत्साही आणि आत्मविश्वासपूर्ण दिसत होती. नैसर्गिक सिंपल मेकअप आणि सॉफ्ट वेव्ह्ड हेअरस्टाइलमुळे डिंपलची तोच हलका, परंतु आकर्षक व्यक्तिमत्त्व दिसत होते, जे चाहत्यांच्या मनात घर करून गेले आहे.गोल्डन इयररिंगने पूर्ण केला लुकप्राजक्ता कोळीचा हा ग्लॅमरस लुक फक्त शर्ट आणि जॅकेटपुरता मर्यादित राहिला नाही, तर तिने गोल्डन इयररिंग्स घालून हा लुक परिपूर्ण केला. साध्या, पण स्टायलिश इयररिंग्समुळे तिच्या फेस आणि मेकअपवर अधिक लक्ष वेधले गेले आणि लुकला एक एलिगंट टच मिळाला. कमीत कमी दागिने कॅरी करून तिने हा लुक पूर्ण केला.गोल्डन वॉचने पूर्ण केला लुकप्राजक्ता कोळीचा ग्लॅमरस लुक फक्त फ्लोरोसेंट ग्रीन शर्ट आणि ब्लॅक जॅकेटपुरता मर्यादित राहिला नाही. तिने गोल्डन इयररिंग्ससहच नव्हे तर स्टायलिश गोल्डन वॉच घालून हा लुक पूर्ण केला.सोनेरी अॅक्सेसरीजमुळे तिच्या फेसवर आणि हातावर अतिरिक्त एलिगंट टच आला, ज्यामुळे संपूर्ण लुक अधिक बॅलन्स्ड आणि रिफाइंड दिसत होता.
68 shares
😊
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 4, 2026, 05:41 AM
क्रिकेटचे थेट प्रक्षेपण भारतात सुरू करण्यासाठी'विलो बाय क्रिकबझ'सज्ज

क्रिकेटचे थेट प्रक्षेपण भारतात सुरू करण्यासाठी'विलो बाय क्रिकबझ'सज्ज

भारतातील क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. हॉटस्टार आणि सोनी लिव्हनंतर आता लाईव्ह क्रिकेट स्ट्रीमिंगसाठी आणखी एक नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. ‘ Willow by Cricbuzz ’ हा लाईव्ह स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म भारतात लवकरच सुरू होणार असून, फेब्रुवारी महिन्यात त्याची अधिकृत सुरुवात अपेक्षित आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये लोकप्रिय असलेला ‘ Willow ’ आता भारतीय प्रेक्षकांसाठीही उपलब्ध होणार आहे.विलोने यूट्यूबसोबत भागीदारी केली असून, ICC T20 World Cup मध्ये यूएसए संघाचे सर्व चार सामने यूट्यूबवर मोफत पाहता येणार आहेत. यूएस आणि कॅनडानंतर पहिल्यांदाच भारतात काही विश्वचषक सामने विनामूल्य पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. याव्यतिरिक्त, विलोने Jomboy Media सोबत भागीदारी करत ‘क्रिएटर-नेतृत्वाखालील’ पर्यायी प्रक्षेपणाची सुविधा सुरू केली आहे. हे प्रक्षेपण Jomboy Media च्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध असेल. पारंपरिक समालोचनासोबत थेट प्रतिक्रिया, कथाकथन आणि तज्ज्ञ दृष्टिकोन यांचा मिलाफ असलेला अधिक संवादात्मक आणि व्यक्तिमत्त्व-केंद्रित अनुभव या माध्यमातून प्रेक्षकांना मिळणार आहे.यूएसएच्या चार सामन्यांव्यतिरिक्त, ICC T20 विश्वचषकातील सर्व सामने यूट्यूब टीव्हीच्या “NFL RedZone with Sports Plus” पॅकेजमधील विलोच्या लिनिअर चॅनलवर, तसेच विलोच्या यूट्यूबवरील ‘Willow Primetime Channels’ सेवेद्वारे पाहता येणार आहेत.‘Willow by Cricbuzz’ आपल्या वेबसाइट, मोबाईल ॲप्स आणि कनेक्टेड टीव्ही ॲप्सवर एक नवीन अनुभव देणार आहे. उच्च-गुणवत्तेचा व्हिडिओ, जलद स्ट्रीमिंग, थेट सामने, रिप्ले आणि हायलाइट्स सहजपणे पाहता येतील, अशी सुविधा या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. Jomboy Media सोबतच्या भागीदारीतून तयार केलेले हे पर्यायी प्रक्षेपण विशेषतः यूएसए विरुद्ध भारत आणि यूएसए विरुद्ध पाकिस्तान या सामन्यांसाठी उपलब्ध असेल, ज्यामुळे प्रेक्षकांना अधिक सखोल, मनोरंजक आणि वेगळा पाहण्याचा अनुभव मिळणार आहे."कोविडच्या काळात मी क्रिकेटच्या प्रेमात पडलो," असे जॉमबॉय मीडियाचे संस्थापक जिमी "जॉमबॉय" ओ'ब्रायन म्हणाले. "बेसबॉलच्या या मोठ्या भावासाठी (क्रिकेटसाठी) अमेरिकेत नवीन चाहते निर्माण करण्यास आम्ही उत्सुक आहोत."
5 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 05:39 AM
दुःखद अपघातानंतर पवार कुटुंबाच्या दुःखाने जनसेवेचा मार्ग मोकळा

दुःखद अपघातानंतर पवार कुटुंबाच्या दुःखाने जनसेवेचा मार्ग मोकळा

सात दिवसांपूर्वी झालेल्या त्या भीषण अपघातानंतर पवार कुटुंबीयांनी दु:ख बाजूला ठेवून सार्वजनिक जबाबदाऱ्या स्वीकारल्या. मात्र, या पोस्टमधून स्पष्ट होते की, त्या जबाबदाऱ्यांच्या आडही अजित पवार यांच्या जाण्याची वेदना
41 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 4, 2026, 05:36 AM
लोणावळ्यात एकट्याने प्रवास करताना कायद्याच्या विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला

लोणावळ्यात एकट्याने प्रवास करताना कायद्याच्या विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा:लोणावळा परिसरात सोलो ट्रेक करण्यासाठी आलेल्या विधी शाखेच्या विद्यार्थिनीचा रविवारी (एक फेब्रुवारी) लोणावळ्याजवळीलटायगर पॉइंटयेथील खोल दरीत मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, हा प्रकार आत्महत्या की घातपात याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. श्रेया नरेंद्र पती (वय २०, रा. सीबीडी बेलापूर, मुंबई) असे मृतदेह आढळलेल्या तरुणीचे नाव आहे.श्रेयाचे वडील सनदी लेखापाल (सीए) असून, आई गृहिणी आहे. तिच्या भावाचे परदेशातून शिक्षण पूर्ण झाले आहे. श्रेयाला फिरण्याची आवड होती. शनिवारी लोणावळ्यातील काही पर्यटनस्थळांना तिने भेट दिली. टायगर पॉइंट येथे एका टपरीजवळ काही जणांना श्रेयाची पिशवी (सॅक) मिळून आली. पिशवीमध्ये ओळखपत्र, मोबाइल, लॅपटॉप मिळून आला. त्यावरून पोलिसांनी तिच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. माहिती मिळताच श्रेयाच्या नातेवाइकांनीलोणावळा ग्रामीण पोलिसांकडेधाव घेतली आणि ती बेपत्ता झाल्याची नोंद केली.Ajit Pawar Phone Call: अजित पवारांचा शेवटचा फोन कॉल समोर; अपघाताच्या 6 मिनिटांपूर्वी कार्यकर्त्याशी बोलले, म्हणाले, आम्ही पण सर्व...श्रेयाचा शोध घेण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रच्या आपत्कालीन पथकाला पाचारण केले. अखेर पोलिसांनी श्वानपथक व ड्रोनच्या साहाय्याने शोध सुरू केला. दुर्गा नावाच्या श्वानाला श्रेयाच्या बॅगमधील रुमालाचा वास देताच दुर्गाने माग काढून खोल दरीत ज्या ठिकाणी मृतदेह होता त्या ठिकाणी गेली; तसेच ड्रोनच्या कॅमेरातही येथीलदरीत मृतदेहदिसून आला.Pune Crime : बॉयफ्रेंडचा सतत त्रास, आईने पोटचा मुलगा अन् त्याच्या मित्राच्या मदतीने प्रियकराला संपवलं; पुण्यातील घटनेचा सिग्रेट अन् दारुच्या बॉटलने उलगडामोबाइल, लॅपटॉपमधून माहिती मिळू शकतेश्रेयाला फिरण्याची आवड होती. मात्र, तिच्या सततच्या फिरण्याला घरच्यांचा विरोध होता. त्याचा श्रेयाला राग होता. त्यातूनच तिने आत्महत्या केली असावी का, किंवा इतर काही कारणांमुळे तिचा मृत्यू झाला किंवा काही घातपात आहे का; ती लोणावळ्यात फिरण्यासाठी एकटीच आली होती की आणखी कोणी तिच्यासोबत होते, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. श्रेयाच्या पिशवीतसुसाइड नोटमिळून आलेली नाही. तिच्या मोबाइल आणि लॅपटॉपला पासवर्ड असून, मोबाइल, लॅपटॉपमधूनही काही माहिती मिळू शकते, असे पोलिसांनी सांगितले आहे.
94 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 4, 2026, 05:31 AM
जागतिक विक्री बंदमुळे भारतीय शेअर बाजारात घसरण

जागतिक विक्री बंदमुळे भारतीय शेअर बाजारात घसरण

Stock Market Today:बुधवारची सकाळ भारतीय शेअर मार्केटसाठी धक्कादायक ठरली आहे. आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्रीचा इतका जोरदार दबाव पाहायला मिळाला आणि अख्खा आयटी निर्देशांक धडाम झाला. सुरुवातीला 37,165.35 वर ओपनिंग केल्यावर निफ्टी आयटी निर्देशांक 5.63% लक्षणीय घसरणीसह 36,436.85 वर झरझर खाली उतरला.त्याचवेळी, सोमवारी विक्रमी उच्चांकावर बंद झाल्यानंतर, मंगळवारी अमेरिकन शेअर बाजाराने सगळी तेजी गमावली. गुंतवणूकदारांनी कमावलेला अख्खा नफा साफ झाला आणितीव्र घसरणीसह रेड झोनमध्येबंद झाले. विशेषतः टेक स्टॉक्स उद्ध्वस्त झाले, अनेक आयटी स्टॉक्स 10 ते 25% घसरले. एनएसई आकडेवारीनुसार, पर्सिस्टंट सिस्टम्सचा शेअर सर्वात जास्त 6.82% घसरला तर, एलटीआयएमचे शेअर्सही 6.57% आणि कॉफोर्जचे शेअर्स 6.09 टक्क्यांनी खाली आले. तसेच आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसचे शेअर्सही 5.97 टक्क्यांनी घसरले.Gold Silver Rates Today 4 Feb: थरकाप उडवणाऱ्या घसरणीत गुंतवणूकीची संधी हुकली? आता भोगा... सोन्या-चांदीचा यूटर्न! आधी गडगडले अन् आता पुन्हा कडाडलेअमेरिकेमुळे IT स्टॉक्सला घसरणीचे ग्रहणअलिकडेच, एआय कंपनी Anthropic ने एक मोठी घोषणा केली, ज्यामुळे जगभरातील टेक आणि आयटी स्टॉकमध्ये विक्रीचा सपाटा लागला. कंपनीने क्लाउड कोवर्क एजंटसाठी 11 नवीन प्लगइन्स लाँच केले, ज्यामध्ये एक नो-कोड एआय असिस्टंट आहे जो कायदेशीर, विक्री, विपणन आणि डेटा विश्लेषणामध्ये कार्ये स्वयंचलित करू शकतो विशेषतः, त्यांचा कायदेशीर एजंट लोकप्रिय होत आहे कारण यामुळे दस्तऐवज पुनरावलोकन, अनुपालन तपासणी आणि कायदेशीर मसुदा तयार करणे यासारखी कामे सहजपणे हाताळणे शक्य होते.आधी या कामांसाठी सेल्सफोर्स किंवा सर्व्हिसनाऊ सारख्या प्लॅटफॉर्मची गरज पडायची, पण आता क्लाउड त्या सिस्टीमशी थेट एकात्मिक होऊ शकते. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण झाली की एआय आता या कंपन्यांच्या मुख्य व्यवसायांवर थेट परिणाम करेल.RBI ने बँकाना दिले आदेश, सरकारी सुट्टीच्या दिवशीही बँक कर्मचाऱ्यांना करावं लागणार काम, अचानक असा निर्णय का?आयटी शेअर्सना घसरणीचे ग्रहणयामुळे अमेरिका आणि युरोपमधील टेक शेअर्समध्ये विक्रीचा लाल रंग पाहायला मिळाला. लीगलझूमचा शेअर जवळपास 20% घसरला तर, थॉमसन रॉयटर्स 15.5 टक्के, आरईएलएक्स 14%, सेल्सफोर्स 6.8% आणि सर्व्हिस नाऊ 7% खाली आला. याशिवाय, पेपल जवळपास 20%, गार्टनर 21 टक्के, फॅक्टसेट 10.5 टक्के आणि मॉर्निंगस्टार 9% घसरला. अशाप्रकारे, जागतिक बाजारात आयटी स्टॉक्समधील विक्रीचा परिणाम भारतीय बाजारावरही झाला. इन्फोसिसचा एडीआर जवळपास 5.5 टक्के, विप्रो 4.8 टक्के, अ‍ॅक्सेंचर 9.5 टक्के आणि कॉग्निझंट 10% आपटला.सॉफ्टवेअर कंपन्यांवर टांगती तलवारबाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेच, पण एआय वेगाने प्रगती करत आहे आणि जुन्या सॉफ्टवेअर कंपन्यांना अडचणी येऊ शकतात अशी गुंतवणूकदारांमध्ये भीती पसरली आहे. अमेरिका आणि युरोपमधून मोठ्या प्रमाणात काम मिळवणाऱ्या भारतीय आयटी क्षेत्राला या भीतीचा फटका बसला.India-US Trade Deal : भारत-अमेरिका ट्रेड डील; ट्रम्प सरकारकडून देण्यात आली Wish List, कोणत्या वस्तूंची आयात होणार?एआय कमी खर्चात कॉन्ट्रॅक्ट रिव्ह्यू आणि डेटा प्रोसेसिंग करू शकत असेल, तर आउटसोर्सिंग आणि सॉफ्टवेअर सेवा कंपन्यांवरील कामाचा भार कमी करू शकतात. ब्रोकरेज फर्म जेफरीजने याला ‘सास्पोकॅलिप्स’ म्हणजे सॉफ्टवेअरसाठी मोठा धोका म्हटले आहे.कायदेशीर आणि डेटा सेवा क्षेत्रासाठी मोठा धक्काएआय या कंपन्यांना मदत असेल असे वाटत होते, पण आता अशी भीती आहे की एआय स्वतःच त्यांचे काम काढून घेईल.अँथ्रोपिकचे नवीन एआय टूल कायदेशीर आणि डेटा सेवा क्षेत्रांसाठी एक मोठा धक्का ठरू शकते, त्यामुळे बाजारातील गुंतवणूकदार याबाबत सावध पवित्रा घेत आहेत.एआय अशी कामे स्वस्त आणि जलद करू लागला तर, अनेक कंपन्यांचे व्यवसाय मॉडेल बदलू शकते. टेक स्टॉकच्या बाबतीत भारतीय गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगावी अशी ही एक चेतावणी असून, बाजार चढ-उतार राहतात, पण एआयचा प्रभाव जगभर वेगाने वाढत आहे.
84 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 4, 2026, 05:30 AM
2026 चे पहिले सूर्यग्रहणः नियम, दृश्यमानता आणि ज्योतिषीय परिणाम

2026 चे पहिले सूर्यग्रहणः नियम, दृश्यमानता आणि ज्योतिषीय परिणाम

या वर्षातील २०२६ सालातील पहिले सूर्यग्रहण हे फेब्रुवारी महिन्यात लागणार असून हे ग्रहण अमावस्येच्या तिथीला लागणार आहे. सूर्यग्रहणाचा सुतककाळ हा १२ तास आधीपासून लागणार आहे. यावेळी काही नियम पाळण्याचे शास्त्रात सांगितले आहे. उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहू नये. ग्रहणातील अन्न खाऊ नये,ग्रहणकाळात देवांना पाण्यात ठेवावे व गर्भवती महिलांनी ग्रहण पाळावे असे काही नियम आहेत. मात्र हे सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे की नाही याबाबत चर्चा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण हे राहू आणि केतुमुळे लागते. त्यामुळे ग्रहणानंतर काही उपाय दानधर्म करण्याचा सल्ला दिला जातो. पाहुयात हे ग्रहण भारतात दिसणार का? व ग्रहणाची नेमकी तारीख व सुतककाळ काय असेल.सूर्यग्रहण कोणत्या राशीत लागणारया वर्षातील पहिलेसूर्यग्रहणहे कुंभ राशीत लागणार आहे. यावेळी सूर्य हा कुंभ राशीत भ्रमण करत असणार आहे आणि राहू देखील त्याच राशीत असल्याने हे ग्रहण लागेल. त्यामुळे या सूर्यग्रहणाचा काही राशींवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.सूर्यग्रहण वेळ आणि तारीखफाल्गुन अमावस्येला लागणारे हे पहिले सूर्यग्रहण १६ फेब्रुवारी मंगळवारी लागणार असून हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल. पंचांगानुसार सूर्यग्रहण दुपारी ३ वाजून २६ मिनिटांनी सुरु होईल आणि संध्याकाळी ७ वाजून ५७ मिनिटांनी संपेल. ग्रहणाचा सुतककाळ १२ तास आधी सुरु होत असल्याने भारतीय वेळेनुसार ग्रहणाचे सुतक मध्यरात्री ३ वाजून २६ मिनिटांनी सुरु होईल.सूर्यग्रहण कुठे दिसणार?हे कंकणाकृती सूर्यग्रहण हे दक्षिण आफ्रिकेतील दक्षिण भागांमध्ये जसे की साऊथ आफ्रिका,झिम्बावे,टांझानिया,नामिबिया,मॉरिशस,बोत्स्वाना,मोझाम्बिक या ठिकाणी दिसेल. तसेच अंटार्टिक आणि दक्षिण अमेरिकेतील दक्षिण भागांमध्ये म्हणजेच दक्षिण अर्जेंटिना,चिली याठिकाणी दिसेल. मात्र भारतात हे ग्रहण दिसणार नसल्याने याचा सुतककाळ भारतात पाळला जाणार नाही.
90 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 4, 2026, 05:29 AM
वडापावच्या मुलीने चंद्रिका दीक्षितने पतीवर केला फसवणुकीचा आरोप

वडापावच्या मुलीने चंद्रिका दीक्षितने पतीवर केला फसवणुकीचा आरोप

दिल्लीत रस्त्यांवर मुंबईचा स्पेशल वडा पाव विकून फेमस झालेली तसेच "बिग बॉस ओटीटी" सारख्या प्लॅटफॉर्मवर पोहोचलेली चंद्रिका दीक्षित जगभरात "वडा पाव गर्ल" म्हणून ओळखली जाते. तिच्या वडापावच्या गाडीचे व्हिडिओ खूप व्हायरल होतात. तिने बनवलेले वडापाव महाग असूनही लोक ते खाण्यासाठी नेहमीच गर्दी करतात.मात्र सध्या चंद्रिका तिच्या वैयक्तिक आयुष्यात एका कठीण टप्प्यातून जात आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेल्या चंद्रिकाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. चंद्रिकाने तिचा पती युगम गेरा यांच्यावरविवाहबाह्य संबंध आणि फसवणूकीचे गंभीर आरोपकेले आहेत. व्हिडिओमध्ये तिने तिच्या पतीसोबतचे फोटो आणि चॅट देखील शेअर केले आहेत.बॉलिवूडवर राज्य करायची ही मराठी अभिनेत्री, पण दिग्दर्शकाच्या प्रेमाच्या जाळ्यात फसली! पत्नीचा खाल्ला मार अन् करियरही पाण्यातइंस्टाग्रामवर शेअर केलेल्या दीड मिनिटांच्या व्हिडिओमध्ये चंद्रिका खूप रडत आहे. नवऱ्याबद्दलची तक्रार सांगताना ती म्हणाली की, गेल्या दोन महिन्यांपासून तिच्या घरातील वातावरण खूप कलूशीत झालं आहे. व्हिडिओमध्ये चंद्रिका म्हणते, " जगाला काय दाखवायचे आहे? आपले भांडण? मी दोन महिने गप्प बसले होते, काहीही बोलत नव्हते. मी काम करत आहे, घराची आणि मुलाची काळजी घेत आहे आणि तुम्ही हे सर्व करताय? ती मुलगी जी दिवसरात्र तुमच्या मागे पुढे करते तिचं काय? माझ्या प्रेमाचे काय? माझ्या मेंदूतील नसा फुटत आहेत."View this post on InstagramA post shared by Chandrika Gera (@chandrika.dixit)पुराव्यांनिशी आरोपचंद्रिकाने व्हिडिओमध्ये रडून आपले दुःख व्यक्त केले आणि आपल्या पतीला खुले आव्हानही दिले. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, "माझ्याकडे पुरावे देखील आहेत." या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. चंद्रिकाकडे तिच्या पतीविरुद्ध कोणते ठोस पुरावे आहेत याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. ते पुरावे ती योग्य वेळ आल्यावर सादर करेल असे देखील म्हणाली आहे.'तू बोल अजून बोल ,अजून टीका कर...' राधा पाटीलच्या टोमण्यांवर Gautami Patil चं सडेतोड उत्तर, कुठून सुरू झालेला वाद?नवऱ्याचे मौनसोशल मीडियावर लोक चंद्रिकाने दाकवलेल्या बहादूरपणाचे कौतुक करत आहेत आणि तिला प्रोत्साहन देत असताना. पण तिचा पती युगम गेराने वडापाव गर्लच्या आरोपांवर अद्याप कोणतेही स्पष्टीकरण किंवा विधान केलेले नाही. चाहते युगमकडून सतत उत्तरे मागत आहेत. सुखासुखी चाललेल्या संसारात अचानक मिठाचा खडा कसा पडला हे सर्वांना जाणून घ्यायचे आहे.बिग बॉस मराठी ६चं नवं घर प्रेक्षकांसमोर अखेर आलंचसंघर्ष ते स्टारडम पर्यंतचा प्रवासचंद्रिका दीक्षित दिल्लीच्या रस्त्यांवर स्टायलिश पद्धतीने वडा पाव विकताना दिसलेली. तिचे काही व्हिडिओ व्हायरल झाले. त्यानंतंर तिच्या वडापावच्या गाडीवर खवय्यांची तसेच तिला पाहणाऱ्यांची गर्दी वाढू लागली. तिच्या लोकप्रियतेमुळे ती सलमान खानच्या "बिग बॉस ओटीटी" शोमध्ये गेली. कठिण परिस्थितीतून वर आलेल्या चंद्रिकाच्या संसारात वादळ आलेले पाहून चाहत्यांना तिच्याबद्दल सहानभूती वाटत आहे.
83 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 4, 2026, 05:27 AM
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टँकर उलटून वाहतूक 15 तास ठप्प

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टँकर उलटून वाहतूक 15 तास ठप्प

अमुलकुमार जैन, पुणे (लोणावळा): मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर काल मंगळवारी सायंकाळी आडोशी बोगद्याजवळ घडलेल्या गंभीर अपघाताने एकच खळबळ उडवून दिली. अत्यंत ज्वलनशील प्रोपलीन गॅस वाहतूक करणारा टँकर बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ उलटल्याने मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला. अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्काळ थांबविण्यात आली. परिणामी द्रुतगती मार्गावर भीतीचं वातावरण पसरले असून महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता. वाहतूक 15 तासांपासून ठप्प असल्याची माहिती समोर आली आहे.टँकर थेट बोगद्याच्या तोंडाशी पलटीपोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर टँकर पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत होता. आडोशी बोगद्याजवळील अवघड वळणावरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकर थेट बोगद्याच्या तोंडाशी पलटीझाला. अपघातानंतर काही वेळातच टँकरमधून प्रोपलीन गॅसची गळती सुरू झाली. हा गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने कोणताही अपघात किंवा ठिणगी मोठ्या स्फोटाला कारणीभूत ठरू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली.Pune Crime : बॉयफ्रेंडचा सतत त्रास, आईने पोटचा मुलगा अन् त्याच्या मित्राच्या मदतीने प्रियकराला संपवलं; पुण्यातील घटनेचा सिग्रेट अन् दारुच्या बॉटलने उलगडाया घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, आयआरबी, देवदूत यंत्रणा, हेल्प फाउंडेशनची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. खोपोली येथील अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली, तर पुणे मार्गिकेवरील एका लेनवरून रात्री बारानंतर मर्यादित स्वरूपात वाहतूक वळवण्यात आली. त्यामुळे अनेक तास अडकून पडलेल्या वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला.टँकर हटविणे धोकादायकमात्र, अपघातानंतर अनेक तास उलटूनहीगॅस गळती रोखण्यात प्रशासनाला यश आलेलं नाही. तज्ञ पथक गळती थांबविण्याचे प्रयत्न करत असून परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात येईपर्यंत अपघातग्रस्त टँकर हटविणे धोकादायक मानले जात आहे. त्यामुळे आडोशी बोगदा परिसरातील मुंबई मार्गिका अद्याप बंद ठेवण्यात आली आहे. बोरघाट परिसरात वाहतूक अत्यंत संथगतीने सुरू असून दोन्ही बाजूंनी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, द्रुतगती महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांनी जुन्या महामार्गाचा वापर करावा, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे. संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासन सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.Sharad Pawar: शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांवर संतापले, त्यांना माझा उल्लेख करण्याचा...; विलीनीकरणावरही भूमिका जाहीरमुंबई-पुणे एक्सप्रेसवे वाहतूक बदल करण्यात आलेले आहेत. आडोशी बोगद्याजवळील गॅस गळतीच्या घटनेमुळे एक्सप्रेसवे आणि जुना हायवे दोन्ही ठप्प आहेत. प्रवाशांनी कृपया खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.१. ताम्हिणी घाट मार्ग: पुणे → पौड → ताम्हिणी घाट → माणगाव → मुंबई. (दक्षिण मुंबईसाठी उपयुक्त)२. माळशेज घाट मार्ग: पुणे → चाकण → नारायणगाव → माळशेज घाट → कल्याण/ठाणे. (उपनगरांसाठी उपयुक्त)कृपया लोणावळा-खंडाळा मार्ग पूर्णपणे टाळावा. प्रवासाचा वेळ ३-५ तासांनी वाढू शकतो, त्यामुळे पुरेसे इंधन आणि पाणी सोबत ठेवावे.
92 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 05:26 AM
विमान अपघाताचा तपासः तीन टप्प्यांची प्रक्रिया

विमान अपघाताचा तपासः तीन टप्प्यांची प्रक्रिया

४. विमान अपघाताची चौकशी नेमकी कशी चालते? ही एक अत्यंत शास्त्रीय प्रक्रिया आहे. यात मुख्यत्वे ३ टप्पे असतात: पहिला टप्पाअसतो तो ब्लॅक बॉक्स आणि साइट इन्व्हेस्टिगेशन अपघात स्थळावरून सर्वात आधी 'ब्लॅक बॉक्स' शोधला जातो. यात एफडीआर आणि सीव्हीआर अशी दोन मुख्य उपकरणे असतात. विमानाचा वेग, उंची, इंजिनचे तापमान, हवेचा दाब, पंखांची हालचाल अशी शेकडो तांत्रिक माहिती एफडीआरमध्ये सेकंदा-सेकंदाला रेकॉर्ड होते. तर शेवटच्या क्षणी कॉकपिटमध्ये वैमानिक एकमेकांशी काय बोलले? ATC शी काय संवाद झाला? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे - धोक्याचे अलार्म किंवा स्फोटाचा आवाज काॅल व्हाॅईस रेकाॅर्डरमध्ये रेकॉर्ड होतो.AAIB, CID चौकशी आणि अपघात तपासाचा संपूर्ण प्रोटोकॉल
7 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 05:25 AM
'द 50'मध्ये आर्य जाधव आणि निक्की तांबोळी यांच्यात पुन्हा टक्कर

'द 50'मध्ये आर्य जाधव आणि निक्की तांबोळी यांच्यात पुन्हा टक्कर

कलर्सटीव्ही आणि जिओ हॉटस्टारवर १ फेब्रुवारी रोजी सुरु झालेला 'द 50' शो सध्या चर्चेत आहे. शोमध्ये स्पर्धक एकाच घरात राहत असून सर्वांना टीममध्ये विभागलं गेलं आहे. त्यांच्यात अनेक खेळ खेळले जात आहेत. या हिंदी शोमध्ये काही मराठी चेहरेही आहेत. बिग बॉस मराठी मध्ये सहभागी झालेली आर्या जाधव, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल आणि शिव ठाकरे हे द ५० गाजवत आहेत. दरम्यान या शोमध्येही आर्या आणि निक्की बिग बॉसमधल्याच विषयावरुन इथेही भांडत आहेत. 'बिग बॉस मराठी ५'मध्ये आर्या जाधवने निक्की तांबोळीच्या कानाखाली मारली होती. यानंतर आर्याला घरातून बाहेर काढण्यात आलं. बिग बॉस संपल्यानंतर या दोघी पुन्हा कधीच भेटल्या नाहीत. आता 'द ५०' या हिंदी रिएलिटी शोमध्ये दोघी आमनेसामने आल्या आहेत. निक्की आणि आर्या यांच्यात पुन्हा बिग बॉसमधलंच भांडण सुरु झालं आहे. तर नेहमीप्रमाणे जान्हवी किल्लेकर निक्कीच्या बाजूने उभी आहे. निक्की आर्याला उकसवत आहे. तर आर्याही तिला सडेतोड उत्तरं देत आहे. दोघी एकमेकींवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. एका हिंदी शोमध्ये या दोन मराठी मुलींनी भांडणातून अख्खा शोच डोक्यावर घेतला आहे. याआधीही प्रोमोमध्ये निक्की तांबोळी रडताना दिसत होती. तर आर्या आक्रमत होती. नेटकऱ्यांनी कमेंट्स करत आर्या जाधवचीच बाजू घेतली आहे. 'आर्या रॉक', 'जान्हवी पुन्हा तेच करत आहे निक्कीची बाजू घेत आहे आणि स्वत:चा काहीच स्टॅण्ड घेत नाही' अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
95 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 05:24 AM
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टँकरच्या अपघातामुळे वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टँकरच्या अपघातामुळे वाहतूक कोंडी

Mumbai Pune Expressway Traffic Update:रसायन वाहून नेणाऱ्या टँकरला काल संध्याकाळी झालेल्याअपघातानंतरमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रचंडवाहतूक कोंडीझाली असून, महामार्गावर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत.अपघातग्रस्तटँकरमधून ज्वालाग्राही वायूची गळती होत असल्याने यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून, सुरक्षिततेसाठी मुंबईकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मार्गावर दोन्ही बाजूंनीवाहतूक कोंडीझाली असून, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तसेच हजारो वाहनचालक अडकून पडले आहेत. मंगळवारी संध्याकाळी खंडाळा घाटामधील आडोशी बोगद्याजवळ रयासन वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात झाला होता. तेव्हापासून मुंबई-पुणे महामार्गावर ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. याबात अधिक माहिती देताना महामार्ग सुरक्षा पथकाने सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास खंडाळा घाटामध्ये मुंबई कॉरिडॉर ( मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ) आडोशी बोगदा या ठिकाणी एक केमिकल टँकर पलटी झाला आहे. त्यामधून ज्वालाग्रही गॅस लिकेज होत असून, सर्व यंत्रणा युद्धपातळीवर काम करीत आहेत. वाहनांच्या सुरक्षिततेकरिता मुंबईकडील मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई व पुणे या दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी झाली असून आज, एक्सप्रेस वे चा प्रवास शक्यतो टाळावा, असं आवाहनही महामार्ग सुरक्षा पथकाने केलं आहे. VIDEO | Traffic was paralysed overnight on the Mumbai-Pune Expressway after a gas tanker overturned in the Khandala Ghat section, leaving hundreds of vehicles stranded and causing massive congestion on both carriageways. Visuals from the spot.#Pune#PuneMumbaiExpressway(Full…pic.twitter.com/kbhHIalmcG या अपघाताला आता १६ तास उलटून गेले तरी वाहतूक सुरळीत होऊ शकलेली नाही. सुरक्षेच्या कारणास्तव महामार्हावरील एक लेन पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. तसेच टप्प्याटप्प्याने ब्लॉक घेत रस्त्या मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या वाहतूक कोंडीमुळे कोणी पहाटे चार वाजल्यापासून, तर कोणी रात्री तीन किंवा पाच वाजल्यापासून या ठिकाणी अडकले असून अनेकांची फ्लाइट चुकली आहे. काही कॅन्सरग्रस्त रुग्णही वाहतुकीत अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. पाणी, अन्न व शौचालयांची सुविधाही अपुरी असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान, “टोल वसूल केला जातो, पण आपत्कालीन परिस्थितीत महामार्ग इतका वेळ बंद का राहतो?” असा सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून महामार्ग मोकळा करावा, अशी जोरदार मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
24 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 05:24 AM
मांद्रेचे पाणीटंचाईचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार पावले उचलत आहे

मांद्रेचे पाणीटंचाईचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार पावले उचलत आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे :मांद्रे मतदारसंघातील दीर्घकाळ प्रलंबित असलेलीपाणीसमस्याकायमची दूर क करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले जात आहे. तुये आयटीआय परिसरातील ३० एमएलडी क्षमतेचापाणीप्रकल्प मांद्रेवासीयांसाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या प्रकल्पाचे लवकरात लवकर लोकार्पण करून जनतेची तृष्णा भागवली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतयांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री डॉ. सावंत तुये हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असताना त्यांनी आमदार जीत आरोलकर यांच्यासोबत ३० एमएलडी पाणी प्रकल्पाच्या कामाची पाहणी करत धावता आढावा घेतला. यावेळी त्यांनी सांगितले की, पाण्याची समस्या पूर्णपणे सुटण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, या प्रकल्पावर युद्धपातळीवर काम सुरू आहे. लवकरच समस्या मार्गी लागणार असल्याचे ते म्हणाले. येथील हजारो सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही आमदार जीत आरोलकर यांनी व्यक्त केला. आरोग्य सुविधांत सुधारणा मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतयांचे शंभर टक्के सहकार्य मिळत असल्यामुळे मांद्रे मतदारसंघाचा झपाट्याने विकास शक्य होत आहे. तुये हॉस्पिटल गोमेकॉ हॉस्पिटलला लिंक झाल्याने आरोग्य सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे. तसेच येणाऱ्या काळात रवींद्र भवनाची पायाभरणी, एक्वेरियम प्रकल्प, क्रीडा मैदान, तसेच तुये येथील नियोजित इलेक्ट्रॉनिक सिटीला जोडणारा लिंक रस्ता पूर्ण केला जाणार आहे. किमान १२ तास होणार नियमित पाणीपुरवठा आमदार जीत आरोलकर म्हणाले, आपण आमदार झाल्यानंतर मांद्रे मतदारसंघातील पाण्याची समस्या टप्याटप्प्याने सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. तुये आयटीआय परिसरात हा महत्त्वाकांक्षी ३० एमएलडी पाणी प्रकल्प साकार होत आहे. मार्च महिन्यात हा प्रकल्प कार्यान्वित होईल, त्यानंतर मांद्रेवासीयांना किमान १२ तास नियमित पाणीपुरवठा मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.
8 shares
😊
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 05:18 AM
सेलिना जेटलीने लग्नाच्या 15व्या वर्धापनदिनानिमित्त पतीकडून घटस्फोटाची धक्कादायक सूचना उघड केली

सेलिना जेटलीने लग्नाच्या 15व्या वर्धापनदिनानिमित्त पतीकडून घटस्फोटाची धक्कादायक सूचना उघड केली

'नो एन्ट्री' आणि 'गोलमाल रिटर्न्स' फेम अभिनेत्रीसेलिना जेटलीसध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर एक अत्यंत भावुक पोस्ट शेअर करत आपल्या १५ वर्षांच्या सुखी वाटणाऱ्या संसारामागचे धक्कादायक वास्तव समोर आणले आहे. लग्नाच्या १५ व्या वाढदिवशीच मिळालेली घटस्फोटाची नोटीस सेलिनाने उघड केले की, ज्या दिवशी त्यांच्या लग्नाचा १५ वा वाढदिवस होता, त्याच दिवशी तिच्या पतीने तिला आश्चर्याचा धक्का देण्याच्या बहाण्याने एका स्थानिक पोस्ट ऑफिसमध्ये नेले. तिथे तिला 'भेटवस्तू' ऐवजी घटस्फोटाची नोटीस हातात देण्यात आली. तिने सांगितले की, "सप्टेंबरच्या सुरुवातीला मला ही नोटीस मिळाली आणि त्या एका क्षणात माझे संपूर्ण जग उद्ध्वस्त झाले." सेलिनाने तिचा ऑस्ट्रियन पती पीटर हाग याच्यावर घरगुती हिंसाचार, मानसिक आणि शारीरिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. तिने सांगितले की, ती अनेक वर्षांपासून हे सर्व सहन करत होती. केवळ आपल्या मुलांसाठी आणि संसारासाठी तिने गप्प राहणे पसंत केले होते. तिने मुंबईच्या अंधेरी न्यायालयात ५० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, पीटरने तिला कामापासून रोखले आणि तिला आर्थिकदृष्ट्या परावलंबी बनवले. घटस्फोटाच्या या प्रक्रियेत सेलिनाला सर्वात जास्त दुःख तिच्या तीन मुलांपासून (विन्स्टन, विराज आणि आर्थर) दूर राहावे लागत असल्यामुळे होत आहे. तिने असा दावा केला आहे की, ऑस्ट्रियन कोर्टाचे आदेश असूनही तिला तिच्या मुलांशी संवाद साधू दिला जात नाहीये. मुलांचे 'ब्रेनवॉशिंग' केले जात असून त्यांना आईच्या विरोधात भडकवले जात असल्याचा आरोपही तिने केला आहे. सेलिना म्हणाली, "मी या काळात शिकले की तुम्ही एखाद्यावर कितीही जास्त प्रेम केले तरी तुम्ही त्याला बदलू शकत नाही. जे आधीच तुटले आहे, त्या नात्याला प्रेमाच्या माध्यमातून पुन्हा जोडू शकत नाही." तिने पुढे असेही सांगितले की, ती जेव्हा काही बोलू शकत नव्हती, तेव्हा ती लिहिण्याचा आधार घ्यायची. तिची ही पत्रे तिच्यावरील अत्याचाराचा आणि संघर्षाचा पुरावा आहेत. सध्या सेलिना भारतात असून आपल्या हक्कांसाठी आणि मुलांच्या ताब्यासाठी कायदेशीर लढा देत आहे.
65 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 05:16 AM
प्रफुल्ल पटेलांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार नाकारला, सुनेत्रा पवारांना पर्याय सुचवला

प्रफुल्ल पटेलांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार नाकारला, सुनेत्रा पवारांना पर्याय सुचवला

Today's Breaking Marathi News Live Updates in Marathi:राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं असून सुनेत्रा पवार यांच्या निवडीचे संकेत दिले आहेत. तसंच, विविध नेत्यांच्या दाव्यांमुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चाही पुन्हा रंगण्याची शक्यता आहे.अजित पवारयांनी अपघाती मृत्यूपूर्वी एक फोन केल्याचं चौकशीत समोर आलंय. तिकडे, राजधानी दिल्लीत लोकसभेत वातावरण तापल्याचं चित्र आहे. सत्ताधारी विरुद्ध विरोधकांमुळे जोरदार वाक्-युद्ध पाहायला मिळतंय. सभापतींच्या दिशेनं कागद भिरकावल्यानं सहा खासदारांना काल निलंबित करण्यात आलंय. त्यावरून आता हा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. ट्रम्प टॅरिफ आणि अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावरूनही बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. क्रिकेट वर्तुळात टी-२० वर्ल्ड कपचे वारे वाहू लागलेत. या आणि अशा महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... LIVE अजित पवारांनी भाजपसोबत जाताना आपले विचार खुंटीला टांगले नाहीत. अजित पवार राष्ट्रवादी चालवत होते. पटेल हे मोदी - शाह यांचे भक्त आहेत. पटेलांना पवार कुटुंबाचा मुखिया केलं आहे का? यांनी चिडचिड करू नये: शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचा टोला येत्या ११ फेब्रुवारीला होणाऱ्या मुंबई महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी येत्या शनिवारी, ७ फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज सादर झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी १५ मिनिटे आधी अर्ज मागे घेण्याची संधी उमेदवाराला दिली जाणार आहे. ही निवडणूक आवाजी पद्धतीने हात उंचावून घेतली जाणार आहे. पीठासीन अधिकारी म्हणून पालिका आयुक्त भूषण गगराणी हे कामकाज सांभाळणार आहेत. "अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत फार सुरुवातीला मी बोललोय. जोवर माझ्यापर्यंत कुठलीही अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत मी अपघाताबाबत उगीच शंका घेणार नाही" - शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपघातापूर्वी कार्यकर्त्याला केलेला अखेरचा कॉल रेकॉर्ड समोर आला आहे. अपघाताच्या दिवशी सकाळी ८ वाजून ३७ मिनिटांनी दादांचा हा अखेरचा कॉल कार्यकर्त्याला आला होता. हा कॉल रेकॉर्ड बारामतीत पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ऐकवला. अखेरच्या कॉलवर अजितदादांनी, 'सर्व जातीधर्माला मी सोबत घेऊन जातोय आणि आपण सगळे एकत्र राहतोय. सगळ्यांना न्याय देण्याचं आपण नक्की काम करू. तू निवांत राहा असं म्हटलं होतं. (वाचा संपूर्ण बातमी) मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गॅस टँकर उलटल्यानं काल संध्याकाळपासून मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. अद्यापही ती पूर्वपदावर आलेली नाही. ती सुरळीत करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अजूनही एक्स्प्रेस वेवर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत, प्रचंड वाहतूक कोंडीत शेकडो वाहनं अडकून पडली आहेत. पुण्याकडून मुंबईकडे जाणारा प्रोपिलिन गॅसचा टँकर आडोशी बोगद्याजवळ उलटला. त्यातून काही काळ गॅसगळती झाल्यानं परिसरात घबराट पसरली होती. त्यामुळेच सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे येणारी सर्व वाहतूक तातडीने थांबवण्यात आली होती.
3 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 05:15 AM
औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी रेल्वे प्रकल्पाला गती देण्याचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे आवाहन

औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी रेल्वे प्रकल्पाला गती देण्याचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे आवाहन

विशाल सोनटक्केलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ:यवतमाळजिल्ह्यात जोपर्यंत तातडीने वर्धा-यवतमाळ-नांदेडरेल्वेचेकाम पूर्ण होत नाही, तोपर्यंत जिल्ह्यात नवे उद्योग येणार नाहीत, येथील तरुणांना कामासाठी वणवण फिरावे लागणार आहे. त्यामुळे यारेल्वेकामाला गती देण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात मोठे उद्योग यावेत यासाठी अनंत अंबानीसह इतर उद्योजकांशी बोलून यवतमाळकरांना मदत करावी, अशी विनंती लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन तथा माजी राज्यसभा सदस्य डॉ.विजय दर्डायांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असता रिलायन्सच्या माध्यमातून जपानची कंपनी यवतमाळमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. रेल्वे मार्गाला गती देण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. दर्डा यांनी वर्षा बंगल्यावर सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. या प्रसंगी लोकमतचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा उपस्थित होते. दावोस येथील परिषदेत महाराष्ट्राने मोठी गुंतवणूक मिळविली. याबद्दल डॉ. दर्डा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन केले. या गुंतवणुकीमुळे संबंधित जिल्ह्यांच्या विकासाला गती मिळेलच. सोबत हजारो तरुणांच्या हाताला काम उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्रात औद्योगिकरणाला गती मिळत आहे. छत्रपतीसंभाजीनगर येथील ऑरिक सिटीत सज्जन जिंदल यांच्या जेएसडब्ल्यू समूहाच्या वतीने इलेक्ट्रीक वाहन निर्मितीचा प्रकल्प सुरू होत आहे. यासाठी २७ हजार २०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. कॉटन सिटी यवतमाळमध्ये बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. काटोल (नागपूर) येथे जसे कृषी आधारित उद्योग येत आहेत. त्यातून स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होईल त्याचप्रमाणे यवतमाळ येथे कापूस उत्पादनाला चालना देण्यासाठी गारमेंट उद्योग उभारण्याची गरज डॉ. दर्डा यांनी व्यक्त केली. दुर्गम गडचिरोलीच्या विकासाला चालना मिळते आहे. स्टीलवर आधारित उद्योगापाठोपाठ विविध पूरक उद्योगही येत आहेत. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत होणारे विमानतळही नागपूरसारखेच उभारू, असे मुख्यमंत्री म्हणाले. यवतमाळसह राज्यातील सर्व विमानतळे आधुनिक करावी, विमान वाहतुकीचा राज्याचा रोड मॅप तयार करून आवश्यक तिथे धावपट्टी वाढवावी अनेक ठिकाणी रात्रीच्या लँडिंगच्या अडचणीत आहेत. रनवेची लांबी, मजबुती आणि ड्रेनेज सिस्टीम सुधारून इन्ट्रूमेंट लँडिंग सिस्टीम बसवायला हवी. आधुनिक एटीसी रडार व कम्युनिकेशन सिस्टीमसह उपग्रह आधारित नेव्हीगेशनचा (जीएनएसएस) वापर वाढविण्याची गरज दर्डा यांनी व्यक्त केली. आज आम्ही राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विमान अपघातात गमावले आहे. त्यामुळे विमानतळ सुरक्षेच्या दृष्टिने आवश्यक ते सर्व निर्णय तातडीने घेत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वर्धा-यवतमाळ-नांदेड या २८४ किमी रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. मात्र २००९ मध्ये भूमिपूजन झालेला हा मार्ग कळंबपर्यंत (५० किमी) पूर्ण होण्यास २०२४ उजाडले. त्यापुढील कामेही अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. विशेषत: नांदेडकडील कामे अनेक ठिकाणी अद्यापही सुरू झालेली नाहीत. अशा स्थितीत रेल्वेच्या नियोजनानुसार पुढील दोन वर्षांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता कमी वाटते. त्यामुळे या कामाला गती देण्याची मागणी डॉ. विजय दर्डा यांनी केली असता या अनुषंगाने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. डॉ. दर्डा यांनी यावेळी यवतमाळ जिल्हा बँकेतील गैरप्रकार थांबले पाहिजेत, यासाठी सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्यासोबत चर्चा करून बँकेच्या सर्व व्यवहारांची चौकशी लावावी, अशी मागणी केली. बँकेचा वाढलेला एनपीए चिंताजनक आहे. शेतकऱ्यांची बँक वाचली पाहिजे, अशी भूमिका मांडली. यवतमाळमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुधारण्याची आवश्यकता आहे. हे काम अधिक सक्तीने व्हावे. यवतमाळ नगरपरिषदेतील साफसफाईचे टेंडर केवळ कागदोपत्री मोठ्या एजन्सीकडे जाते. मात्र, पोट कंत्राटदारांकडूनच कामे केली जात असल्याने दरवर्षी मोठी रक्कम खर्चूनही नागरिकांना स्वच्छतेच्या अनुषंगाने फारसा उपयोग होत नसल्याकडे लक्ष वेधले असता या सर्व प्रश्नांवर ठोस कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी डॉ. दर्डा यांनी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, चंद्रपूरचे पालकमंत्री प्रा.डॉ. अशोक उईके, आमदार बाळासाहेब मांगूळकर यांच्यासह इतर आमदारांसोबत चर्चेसाठी वेळ देण्याची विनंती केली असता लवकरच आपण एकत्रित बैठक घेवू असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी दिला.
49 shares
😊
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 05:15 AM
ऑनलाइन खेळाशी संबंधित रहस्यमय मृत्यूः गेमिंगच्या मानसिक दबावाची एक दुःखद आठवण

ऑनलाइन खेळाशी संबंधित रहस्यमय मृत्यूः गेमिंगच्या मानसिक दबावाची एक दुःखद आठवण

मध्यरात्रीच्या शांत वातावरणात अचानक किंचाळ्यांनी अख्खी सोसायटी जागी झाली. तीन बहिणींचा एकाचवेळी मृत्यू झाल्यानं सर्वांनाच धक्का बसला. पोलिसांना एका पानावर लिहिलेली नोट मिळाली आहे. त्यात फक्त मम्मी पापा सॉरी असं लिहिलं होतं. हे सोपे शब्द त्यांच्यावरील मानसिक दबावाकडे इशारा करतात. गेममधील टास्कमुळे हा मानसिक दबाव तयार झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.
77 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 05:08 AM
ऊस स्पर्धा वाढलीः श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यास शेजारच्या गिरण्यांच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे

ऊस स्पर्धा वाढलीः श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यास शेजारच्या गिरण्यांच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे

सोमेश्वरनगर :बारामतीतालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे गाळपासाठी स्वतःचा पुरेसाऊसउपलब्ध असतानाही, इतर साखर कारखान्यांकडून सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात थेट घुसखोरी सुरू झाल्याने साखर उद्योगात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सख्खा शेजारी असलेल्या माळेगाव साखर कारखान्याने अलीकडच्या अनेक वर्षात प्रथमच सर्व अलिखित संकेत धुडकावून सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात दहा ते बाराऊसतोडटोळ्या पाठवल्याचा आरोप होत आहे. यामुळे आतापर्यंत जपली गेलेली निकोप स्पर्धा धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या वाढली असून, काही कारखान्यांनी क्षमतेचे मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण केले आहे. परिणामीपुणेजिल्ह्यासह सातारा व अहिल्यानगर जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये उसासाठी चढाओढ वाढली आहे. या स्पर्धेत अनेक कारखाने थेटपुणेजिल्ह्यातील ऊस पळवत असल्याचे चित्र आहे. सोमेश्वर साखर कारखान्याने गेल्या काही वर्षात अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिमा राबवत सिंचन योजनांच्या माध्यमातून ऊस क्षेत्रात लक्षणीय वाढ केली. उपलब्ध ऊस क्षेत्राचा अभ्यास करून कारखान्याने योग्य ते विस्तारीकरण केले आहे. सध्याच्या हंगामात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गाळप चालेल आणि १४ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सोमेश्वरची पहिली उचल टनाला ३३०० रुपये असून, अंतिम दर उच्चांकी राहण्याचे संकेत देण्यात आले आहेत. मात्र, जिराईत भागातील काही शेतकरी ऊसतोडीची घाई करत माळेगाव कारखान्याकडे ऊस देऊ लागल्याचे चित्र आहे. मोरगाव, सुपे, जेजुरी या पट्ट्यात माळेगाव कारखान्याने परवानगीशिवाय टोळ्या व वाहने उतरवल्याचा आरोप सोमेश्वर व्यवस्थापनाने केला आहे. त्यामुळे कारखाना प्रशासनात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले, सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती हे कारखाने अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली गेली तीन दशके परस्पर समन्वयाने काम करत आहेत. आमच्यात काही अलिखित करार व संकेत आहेत. त्यानुसार परवानगी किंवा कराराशिवाय एकमेकांच्या कार्यक्षेत्रातील ऊस न नेण्याचे समान धोरण आहे. स्पर्धा दराची, उताऱ्याची व गाळपाची असावी. मात्र, ती निकोप असली पाहिजे. दुर्दैवाने माळेगावच्या काही टोळ्या सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडत आहेत. ऊस पळवण्याचे प्रकार होणे दुर्दैवी◼️ सोमेश्वर साखर कारखाना १ फेब्रुवारीपासून पहिली उचल टनाला ३४०० रुपये, तर १ मार्चपासून ३५०० रुपये प्रतिटन देणार आहे.◼️ शिवाय अंतिम दर दिवाळीत उच्चांकी दिला जाणार असल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. दरम्यान, कराराशिवाय असे प्रकार घडने हे दुर्दैवी आहे. अधिक वाचा:शासनाने बिगरशेती एनए परवानगी देण्याचे कलेक्टरचे अधिकार काढले; आता कोण देणार परवानगी?
46 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 4, 2026, 05:01 AM
आत्महत्या आणि हत्याः भारतातील दोन अस्वस्थ करणाऱ्या घटना

आत्महत्या आणि हत्याः भारतातील दोन अस्वस्थ करणाऱ्या घटना

निलेश पाटील, जळगाव: जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीला आणि प्रियकर एकमेकांशी बाहेर बोलताना पतीने पाहिले. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि पत्नी अन् प्रियकराने पतीला अपशब्द वापरल्यामुळे संतापलेल्या तथा खचलेल्या पतीने रेल्वेखाली उडी टाकून आपलं जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.भावाने तक्रार दिली अन्...अमळनेरशहरातील सुनील श्रावण भोई (वय 34, रा.रुबजी नगर, अमळनेर) असं मयत झालेल्या व्यक्तीचं नाव असून पत्नी व प्रियकराने पतीला अपशब्द वापरल्याने दुखावलेल्या पतीने थेट रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना 29 जानेवारी रोजी पहाटे अमळनेर येथे घडली. याप्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकरासह तीन जणांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियकर अजय भोई याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.Pune Crime : बॉयफ्रेंडचा सतत त्रास, आईने पोटचा मुलगा अन् त्याच्या मित्राच्या मदतीने प्रियकराला संपवलं; पुण्यातील घटनेचा सिग्रेट अन् दारुच्या बॉटलने उलगडासुनील सावंत भोईयाची पत्नी दिपाली भोई (वय 30) व तिचा प्रियकर अजय छोटू भोई (वय 32) आणि त्याची आई सुरेखा छोटू भोई अशा तीन जणांवर दाखल करण्यात आलेला आहे. आत्महत्येच्या घटनेच्या सुरुवातीला पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सुनील याचा भाऊ सागर श्रावण भोई याने अमळनेर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनंतर या घटनेचा उलगडा झाला.Nandurbar Crime: नंदुरबारमध्ये बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश; पालिका कर्मचाऱ्यासह 5 जण अटकेतपत्नीनेच दिले टोमणे29 जानेवारी रोजी रात्री सुनील भोई याने पत्नी व तिच्या प्रियकराला बोलताना पाहिलं. त्यानंतर झालेल्या वादात सुनीलच्याच पत्नीने आणि तिचा प्रियकर अजय याने सुनील यास अपशब्द बोलून टोमणे मारले. यावेळी अजयची आई सुरेखा भोई हिनेही अपमानास्पद वागणूक दिल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलेलं आहे. पत्नी व प्रियकराने आपल्याला वाईट वागणूक आणि अपशब्द वापरल्यानं सुनील भोई याने रेल्वेखाली आत्महत्या केली. या घटनेनंतर सुनीलचा भाऊ यानी दुचाकीने टाकरखेडा मार्गावरील रेल्वे स्टेशन गाठून रेल्वेखाली आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. या घटनेत आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी वरील तिघांविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम 108, 333, 351(2)352व 3(5) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
70 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 04:59 AM
बाजारातील घडामोडी आणि डॉलरच्या कमकुवतपणामुळे जागतिक स्तरावर सोने आणि चांदीच्या दरात वाढ

बाजारातील घडामोडी आणि डॉलरच्या कमकुवतपणामुळे जागतिक स्तरावर सोने आणि चांदीच्या दरात वाढ

Gold Silver Rate :जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि डॉलरच्या कमकुवतपणामुळे देशांतर्गत सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्यादरांचा अक्षरशः उद्रेक झाला आहे. बुधवारी, ४ फेब्रुवारी रोजी सोन्याने १ लाख ६० हजार रुपयांचा ऐतिहासिक टप्पा पार केला, तरचांदीच्यादरात ६ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली. लग्नसराईच्या काळात दागिन्यांचे दर गगनाला भिडल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे. MCX वर ऐतिहासिक उच्चांकमल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्या-चांदीच्या व्यवहारात मोठी तेजी पाहायला मिळाली. सोने एप्रिल वायदा सोने ४ टक्क्यांहून अधिक वधारून १,६०,७५५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. तर मार्च वायदा चांदी ६ टक्क्यांच्या जोरदार उसळीसह २,८४,०९४ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. जागतिक बाजारपेठेचा प्रभावआंतरराष्ट्रीय स्तरावर स्पॉट गोल्डचे दर २.२ टक्क्यांनी वधारून ५,०४४.७४ डॉलर प्रति औंस या विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचा नरम कल आणि येन वगळता इतर चलनांच्या तुलनेत डॉलर कमकुवत झाल्यानेगुंतवणूकदारांनीसुरक्षितगुंतवणूकम्हणून सोन्याला पसंती दिली आहे. महाराष्ट्रासह प्रमुख शहरांतील दर (प्रति १० ग्रॅम)गुड रिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, आजचे दर खालीलप्रमाणे आहेत,| शहर | २४ कॅरेट सोने (₹) | २२ कॅरेट सोने (₹) || मुंबई/पुणे | १,६०,५३० | १,४७,१५० || चेन्नई | १,६२,५६० | १,४९,००० || दिल्ली | १,६०,६८० | १,४७,३०० || कोलकाता | १,६०,५३० | १,४७,१५० || बंगळुरू | १,६०,५३० | १,४७,१५० || अहमदाबाद | १,६०,५८० | १,४७,२०० | तेजीची प्रमुख कारणे वाचा -वेदांताचे अनिल अग्रवाल ७५% संपत्ती 'या' क्षेत्रासाठी करणार दान; मुलाच्या स्मरणार्थ घेतला निर्णय (टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही.शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
42 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 4, 2026, 04:59 AM
न्याय मागणेः एका वडिलांची न्यायालयात याचिका

न्याय मागणेः एका वडिलांची न्यायालयात याचिका

ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या 4 February 2026 च्या भागात नागराज विरोधात कोर्टात केस चालू असते. सुमन त्याच्या विरोधात साक्षात असताना नागराजचे वकील तर्क लावतात की ती मानसिक दृष्ट्या सक्षम नाही त्यामुळे तिची साक्ष ग्राह्य धरले जाऊ नये. न्यायाधीशांना सुद्धा त्यांचं म्हणणं पटतं. त्यानंतर रविराज कोर्टात म्हणतो की या माणसाने गेली 22 वर्ष माझ्या कुटुंबा विरोधात कटकारस्थान रचला आहे. माझी पत्नी व माझ्या मुलीला त्याने माझ्यापासून दूर ठेवले आहे. तेव्हा नागराजचे वकील म्हणतात की ही केस नक्की कसली आहे. अपघाताची की सुमन किल्लेदार यांच्या किडनॅपिंगची. जर अपघाताचे म्हणायचे असेल तर त्यामध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही. सगळी माणसं सुखरूप आहेत. तसंच सुमन यांची मानसिक स्थिती ठीक नाही त्यामुळे त्यांच्यावरही आपण विश्वास ठेवू शकत नाही.रविराज म्हणतो की या नागराज मुळे माझ्या मुलीला गरीबीत दिवस काढावे लागले, ती अनाथाश्रमात वाढली ही फक्त एका दिवसाची केस नसून गेल्या 22 वर्षांपासूनचा अन्याय आहे. आज मी तुमच्याकडे एक बाप म्हणून, एक पती म्हणून न्याय मागत आहे. सुभेदारांच्या घरात प्रिया मात्रनागराज आणि महिपतयांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी सतत प्रार्थना करत असते. ती देवाला म्हणते की मी आजपर्यंत तुझ्याकडे काहीही मागितले नाही आणि जे मागितलं ते तू कधी पूर्णही केलं नाहीस त्यामुळे हे तरी माझं ऐक. त्या दोघांना जेलमध्ये सडक म्हणजे मी इथे मोकळा श्वास घेऊ शकते.बॉलिवूडवर राज्य करायची ही मराठी अभिनेत्री, पण दिग्दर्शकाच्या प्रेमाच्या जाळ्यात फसली! पत्नीचा खाल्ला मार अन् करियरही पाण्यातरविराजने काढला 22 वर्षांपासूनचा रागकोर्टात अर्जुन रविराजला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलवतो. आणि त्याला प्रश्न विचारू लागतो. तो विचारतो की तुमचा जो अपघात झाला त्याबद्दल तुमच्यात आणि नागराज किल्लेदार यांच्यामध्ये कधी बोलणं झालेलं का? यावर रविराज म्हणतो- गेल्या 22 वर्षात आमच्यात या विषयावर बराच संवाद झाला पण त्यांनी शिताफिने माझ्यापासून बऱ्याच गोष्टी लपवल्या. मी अनेक गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यात मला यश आलं नाही. पण गेल्या काही दिवसात मी ते पुरावे पुन्हा नीट पडताळून पाहिले तेव्हा मला नागराज विरोधात बरेच पुरावे सापडले आहेत.Tharala Tar Mag : सायली अर्जुनला छूपी मदत करणार प्रिया, रविराजने शोधला नागराजच्या खोटेपणाचा आणखी एक पुरावा, महिपतचे हात साक्षीमुळे दगडाखालीमहिपतने मारली पलटीत्यानंतर अर्जुन महिपत शिखरेला कोर्टात बोलावतो. तो त्याला विचारतो की 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताची सुपारी तुझ्याकडेच होती याचा आमच्याकडे पुरावा आहे. आता ती सुपारी तुला कोणी दिली याबद्दल तू सांग. पण महिपत आपल्या साक्षीला काहीतरी होईल या भीतीने काहीच सांगायला तयार नसतो. अर्जुन आरडा ओरड करून त्याच्याकडून खरं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करतो पण त्यावेळी नागराजचे वकील भालेराव त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतात. न्यायाधीश जेव्हा महिपतला तुला काही सांगायचं आहे का असं विचारतात तेव्हा तो नकार देत तिथून निघून जातो. महिपतच्या या अशा वागण्यामुळे नागराजचं पारडं जड ठरतं. नंतर अर्जुन पुरावा म्हणून कोर्टात सुमनने काढलेला व्हिडिओ दाखवतो पण यावरही भालेराव हा व्हिडिओ मॉर्फ केलेला असू शकतो असा तर्क काढतात. त्यामुळे तो सुद्धा पुरावा ग्राह्य धरला जात नाही.जुई गडकरीच्या वैयक्तिक गोष्टी ऐकून तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेलनागराजला मिळणार बेल?नागराज विरोधात ठोस कोणतेच पुरावे नाहीत यासाठी भालेराव न्यायाधीशांना विनंती करतो की तुम्ही त्यांना बेल मिळवून द्यावेत. न्यायाधीश सुद्धा थोडासा कल नागराज कडे निकाल उद्यावर ढकलतात. कोर्टाची वेळ संपल्यावर सुमन खूप घाबरलेली असते आता पुन्हा एकदा नागराज मोकाट फिरणार आणि आपल्याला त्रास देणार अशी भीती ती व्यक्त करते. तेव्हा सगळे तिला धीर देतात आणि आम्ही तुझ्यासोबत आहोत असं म्हणतात.Tharala Tar Mag मध्ये नागराज पुन्हा एकदा जेलमध्ये येतो. तेव्हा महिपत त्याला विचारतो की मोठ्या बाता मारत गेलास की माझी बेल लगेच होणार मग आता इथे का आलास. तेव्हा नागराज सुद्धा त्याला फुशारक्या मारत म्हणतो की माझी बेल झाल्यातच जमा आहे. न्यायाधीशांनी माझ्या विरोधातले पुरावे फारसे ग्राह्य धरलेले नाही त्यामुळे निकाल उद्या वर ढकलला आहे. तू बस इथे सडत.
54 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 04:56 AM
मराठी अभिनेत्री अपूर्वा गोरे आणि अभिनेता अंशुमन जोशी यांचे नाते जुळले

मराठी अभिनेत्री अपूर्वा गोरे आणि अभिनेता अंशुमन जोशी यांचे नाते जुळले

मराठी कलाविश्वात सध्या सनई चौघडे वाजत आहेत. साक्षी महाजन, ज्ञानदा रामतीर्थकर, रेवती लेले यांच्याबरोबरच आणखी एका अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. 'आई कुठे काय करते' मालिकेत ईशा ही भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री अपूर्वा गोरेनेही चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. अपूर्वा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटो शेअर करत अपूर्वा लग्न ठरल्याची बातमी चाहत्यांना दिली. मात्र तिने नाव आणि चेहरा गुलदस्त्यात ठेवला होता. त्यामागचं गुपित आता उलगडलं आहे. अपूर्वाचा होणारा नवरा कोण? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. राजश्री मराठीने दिलेल्या वृत्तानुसार अपूर्वाच्या होणाऱ्या नवऱ्याचं मराठी सिनेसृष्टीशी कनेक्शन आहे. अपूर्वाचा होणारा नवरा हा लोकप्रिय अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आहे. अभिनेता अंशुमन जोशी याच्यासोबत अपूर्वा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अंशुमनला तुम्ही शाळा या सिनेमात पाहिलं असेल. त्याची शाळा सिनेमातील भूमिका प्रचंड गाजली होती. अपूर्वाने फोटो शेअर करत "आमचं ठरलंय" असं कॅप्शन देत चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. तिच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हापासून अपूर्वाच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. आता अपूर्वा आणि अंशुमन लग्न कधी करणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे.
86 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 04:53 AM
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे डहाणू येथे बोगद्याचे काम पूर्ण

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे डहाणू येथे बोगद्याचे काम पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/पालघर/डहाणू: मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल (बुलेट ट्रेन) प्रकल्पाच्या डहाणू इथल्या डोंगरामध्ये भुयारीकरण पूर्ण करून यशस्वी ब्रेक-थ्रू करण्यात आले. मंगळवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणिपालघरचेखासदार हेमंत सावरा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. पालघर जिल्ह्यातीलबुलेट ट्रेनप्रकल्पामध्ये एकूण ७ बोगदे असून, मंगळवारी पूर्ण झालेला एमटी-६ हा दुसरा बोगदा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा बोगदा ४५६ मीटर लांबीचा असून रुंदी १४.४ मीटर आहे. बोगद्याच्या भुयारीकरणासाठी न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या पद्धतीत ड्रिलिंग आणि नियंत्रित स्फोटांद्वारे खोदकाम केले जाते, जे जटिल भूगर्भीय परिस्थितीसाठी उपयुक्त मानले जाते. हे काम अवघ्या १२ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आले असून, उर्वरित बोगद्यांचे काम देखील लवकरच पूर्ण होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, कार्यक्रमात खासदार हेमंत सवरा यांनी पालघरमधील रेल्वे प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. पालघर हा देशातील वेगाने विकसित होणारा जिल्हा ठरत आहे. जिल्ह्यातून हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन), डीएफसीसी (डेसिकेटेड फ्रेट कॉरिडॉर) आणि देशातील सर्वात मोठे ‘वाढवण बंदर’ असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभे राहत आहेत, असे खा. सवरा म्हणाले. २७.४ किमीचे बोगदे प्रकल्पाच्या संपूर्ण ५०८ किमीच्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये २७.४ किलोमीटरचे बोगदे आहेत, यात २१ किलोमीटर भूमिगत आणि ६.४ किमी पृष्ठभागावरील बोगद्यांचा समावेश आहे. प्रकल्पात आठ डोंगरी बोगदे बांधले जात आहेत. सात बोगदे महाराष्ट्रात असून एकत्रित लांबी अंदाजे ६.०५ किमी आहे, तर एक ३५० मीटर लांबीचा बोगदा गुजरातमध्ये आहे. ठाणे ते बीकेसी ५ किमी भूमिगत बोगदा सप्टेंबर २०२५ मध्ये पूर्ण झाला होता. रेल्वे प्रकल्पांचा धडाका बोरिवली ते विरार ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेचे काम प्रगतिपथावर आहे. विरार ते डहाणू ३ ऱ्या आणि ४ थ्या मार्गिकेचे काम वेगाने सुरू आहे. पालघर रेल्वेस्थानकाचा ‘अमृत भारत’ योजनेंतर्गत पुनर्विकास होत आहे. वसई येथे नवीन मेगा टर्मिनल उभारले जाणार आहे., २०१४ नंतर महाराष्ट्राला वर्षाला सरासरी २३,००० कोटी रुपयांचा निधी मिळत आहे. यावर्षी महाराष्ट्रात १ लाख ७० हजार कोटींहून अधिक रकमेची कामे सुरू असल्याचे खासदार डॉ. सवरा यांनी सांगितले. महाराष्ट्रात एका महिन्यात दुसऱ्यांदा डोंगरी बोगद्याचे काम पूर्ण होणे ही एक मोठी उपलब्धी आहे. पुढील वर्षी बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा बिलीमोरा ते सुरतदरम्यान सुरू करणार असून महाराष्ट्रातील टप्पा देखील लवकर पूर्ण करण्यात येणार आहे.अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री पालघर हा सर्वांत वेगाने प्रगती करणारा जिल्हा बनत आहे. गेल्या काही वर्षांपासून बरीच विकासकामे सुरू आहेत आणि बुलेट ट्रेनच्या डोंगरी बोगद्याच्या प्रगतीने त्याच्या वैभवात भर घातली आहे.- हेमंत सावरा, खासदार, पालघर
50 shares
😊
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 04:53 AM
राजमाता जीजाऊ उद्यान परिसरातील वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्या सोडवण्यासाठी कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

राजमाता जीजाऊ उद्यान परिसरातील वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्या सोडवण्यासाठी कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

नागरिकांनी सुचविलेल्या उपाययोजना राजमाता जिजाऊ उद्यान परिसरातील पदपथांवरील अतिक्रमण तात्काळ हटवावे. शनिवार व रविवारची वाढती गर्दी लक्षात घेता तात्पुरती अथवा कायमस्वरूपी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. मुख्य चौकात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची नियमित नेमणूक करावी. नो पार्किंग झोनची काटेकोर अंमलबजावणी करून बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होत नसेल तर सामान्य नागरिकांनी नियम का पाळावेत, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. राजमाता जिजाऊ उद्यान परिसरातील वाढती गर्दी पार्किंगचा अभाव आणि पदपथांवरील अतिक्रमण यासाठी नेमकी जबाबदारी कोणाची हे प्रशासनाने स्पष्ट करावे.
23 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 4, 2026, 04:51 AM
किशोर कुमारच्या गाण्यावरून भारतीय सेलिब्रिटी कायदेशीर वादात अडकले

किशोर कुमारच्या गाण्यावरून भारतीय सेलिब्रिटी कायदेशीर वादात अडकले

मुंबई: बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. अभिनेते गोविंदा , शक्ती कपूर , चंकी पांडे आणि भाजप खासदार तथा प्रसिद्ध गायक मनोज तिवारी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. गाझियाबाद येथील एका कंपनीच्या कथित गुंतवणूक फसवणूक प्रकरणात या चारही कलाकारांविरुद्ध झारखंडमधील जमशेदपूर इथं FIR नोंदवण्यात आला आहे.नेमकं प्रकरण आहे तरी काय?मिळालेल्या माहितीनुसार, हा गुन्हा 'मॅक्सिझोन टच प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीशी संबंधित आहे. या कंपनीनं गुंतवणूकदारांना दरमहा १५ टक्के परतावा देण्याचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपये गोळा केले होते. मात्र, आश्वासन दिल्याप्रमाणे गुंतवणूकदारांना ना परतावा मिळाला, ना त्यांची मूळ रक्कम परत मिळाली.जमशेदपूर इथल्या रहिवासी जसपाल सिंग यांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती. सिंग यांनी आरोप केला की, या चित्रपट कलाकारांनी कंपनीच्या जाहिरातींमध्ये काम केल्यामुळं आणि त्यांच्या लोकप्रियतेवर विश्वास ठेवून त्यांनी या योजनेत लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती.न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाईजसपाल सिंग यांच्या तक्रारीची दखल घेत जमशेदपूरच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयानं पोलिसांना या प्रकरणात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले . त्यानुसार, पोलीस ठाण्यात कंपनीचे संचालक चंद्रभूषण सिंग आणि त्यांची पत्नी प्रियंका सिंग यांच्यासह या सेलिब्रिटींविरुद्ध फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.Apurva Gore च्या आयुष्यातला 'मिस्ट्री मॅन' नेटकऱ्यांनी शोधलाच; या अभिनेत्याच्या प्रेमात आहे अभिनेत्री; बालकलाकार म्हणून केलंय गाजलेल्या सिनेमात कामखरं तर कलाकारांच्या जाहिराती पाहून आमचा विश्वास बसला. मोठ्या नावांचा वापर करून सर्वसामान्यांना लुटण्याचं काम या कंपनीनं केलं आहे, असं तक्रारदारांनी म्हटलं आहे.नाव घोषित होताच अश्रू अनावर; अक्षय केळकर ठरला 'बिग बॉस मराठी चार'चा महाविजेताया प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कंपनीचे संचालक सध्या तुरुंगात आहेत. अंमलबजावणी संचालनालयानं देखील यापूर्वी या कंपनीवर छापेमारी केली असून, हा घोटाळा सुमारे ३००० कोटी रुपयांचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.'तू बोल अजून बोल ,अजून टीका कर...' राधा पाटीलच्या टोमण्यांवर Gautami Patil चं सडेतोड उत्तर, कुठून सुरू झालेला वाद?या कलाकारांनी केवळ कंपनीचे ब्रँड अँम्बेसेडर म्हणून काम केलं होतं की त्यांची यात अधिक गुंतवणूक होती, याचा तपास आता पोलीस करत आहेत. अद्याप या प्रकरणावर संबंधित कलाकारांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
50 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 04:46 AM
उत्तर प्रदेशात जातीच्या पलायनावरून झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी एका व्यक्तीने शेजाऱ्यांची हत्या केली

उत्तर प्रदेशात जातीच्या पलायनावरून झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी एका व्यक्तीने शेजाऱ्यांची हत्या केली

शेजारी राहणाऱ्या पती-पत्नीकडून मारल्या जाणाऱ्या टोमण्यांना वैतागलेल्या एका तरुणाने मित्राच्या मदतीने या दोघांचीही हत्या केल्याची धक्कादायक घटनाउत्तर प्रदेशमधीलमैनपुरी जिल्ह्यात घडली आहे. आरोपीची बहीण परजातीमधील तरुणासोबत पळून गेल्यावरून हे दाम्पत्य सारखे टोमणे मारायचे. त्याला वैतागून शेजारी राहणाऱ्या या तरुणाने एका नातेवाईकासोबत मिळून या दाम्पत्याची हत्या केली. तसेच त्यांच्या घरातील ऐवजाची लूट केली. या घटनेचा तातडीने तपास करत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी आरोपींकडून चोरलेले दागदागिने आणि दोन कट्टे जप्त केले आहेत. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फुलापूर गावातील महेश चंद्र आणि त्यांची पत्नी अनिता देवी या दाम्पत्याची २६ जानेवारी रोजी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तसेच आरोपींनी घरात लुटालूट केल्याचंही दिसून आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना पकडण्याचे आश्वासन दिलं होतं. तसेच आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी ५ पथके तयार केली आणि आनंद आणि अर्जुन नावाच्या २ आरोपींना अटक केली. यापैकी आनंद हा मृत दाम्पत्याचा शेजारी तर अर्जुन हा त्यांचा चुलत जावई होता. पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान, पुढे आलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी आनंद याची बहीण परजातीमधील एका तरुणासोबत पळून गेली होती. त्यावरून शेजारी राहणारं हे दाम्पत्य ‘तुझी बहीण तर पळून गेली’, असे म्हणून सारखे टोमणे मारायचे. त्यामुळे आनंद हा वैतागलेला होता. त्याच रागातूनन आनंद याने मृत दाम्पत्याचा चुलत जावई असलेल्या अर्जुन याच्या मदतीने या दोघांचीही हत्या केली. मृत दाम्पत्याच्या घरी १८ फेब्रुवारीला मुलाचा लग्नसोहळा होता. त्यामुळे घरात दागदागिने असतील, याचा अंदाज बांधून आरोपींनी घरात लुटालूटही केली. खरंतर आरोपींना केवळ महेश चंद्र यांचीच हत्या करायची होती. मात्र गोळी झाडत असतानाच त्यांची पत्नी तिथे आल्याने आरोपींनी तिचीही हत्या केली. त्यानंतर आरोपी घरातील दागदागिने घेऊन पसार झाले. मात्र यादरम्यान, आरोपींची टॉर्च घटनास्थळी राहिली. या टॉर्चवरूनच पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या.
93 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 4, 2026, 04:46 AM
अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्रात विलीनीकरणाची चर्चा, राजकीय दावे

अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्रात विलीनीकरणाची चर्चा, राजकीय दावे

बारामती:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा चर्चेत आला असून यावरून राजकीय दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अजित पवार यांच्याशी आमची सर्व चर्चा झाली होती आणि लवकरच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची अधिकृत घोषणा केली जाणार होती, असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विविध नेत्यांकडून सांगितलं जात आहे. मात्र अशी कोणतीही चर्चा अजित पवार यांनी आमच्याशी केली नव्हती, असं राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर आज बारामती इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे."तुम्ही विलीनीकरणाबद्दल भाष्य केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात उडी घेतली आणि राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा झाली असती तर अजितदादांनी मला त्याबाबत कल्पना दिली असती. तसंच विलीनीकरणाचा मुद्दा होता तर पवारसाहेब एनडीएसोबत येणार होते का? असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय?" असा प्रश्न आज बारामती येथील पत्रकार परिषदेदरम्यान शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना पवारांनी म्हटलं की, "त्यांना माझ्याबाबतचा उल्लेख करण्याचा काय अधिकार आहे, हे समजलं नाही. कारण या विलीनीकरणाच्या चर्चेत ते कुठेच नव्हते. त्यामुळे त्यावर भाष्य करण्याचा त्यांना काय अधिकार आहे, हे मला माहीत नाही," अशा शब्दांत पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना सुनावलं आहे."अजित पवारांच्याअकाली निधनामुळे आम्हा लोकांसमोर जे संकट आहे, त्यातून परस्परांना धीर देणं आणि पुढे कसं जायचं, यावर आमचं लक्ष आहे. राजकीय निर्णयाशी संबंधित आम्ही कोणाशी चर्चा करत नाही," असंही विलीनीकरणाबाबत बोलताना शरद पवारांनी म्हटलं आहे. तसंच सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाला याचा आम्हाला आनंद आहे. त्यांना संधी दिली, याचा आम्हाला आनंद असल्याचंही ते म्हणाले.दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर दोन दिवसांतच सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात असल्याबाबतही शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र मला त्यावर भाष्य करायचं नाही, असं म्हणत पवार यांनी बोलणं टाळलं.
100 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 04:38 AM
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत माजी मंत्र्याने जाहीर संघर्षाची धमकी दिल्याने तणाव वाढला

धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत माजी मंत्र्याने जाहीर संघर्षाची धमकी दिल्याने तणाव वाढला

Dharashiv ZP Election 2026:राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराचा धुराळा उडाला आहे. दिग्गज नेत्यांच्या सभांमुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले असतानाच,धाराशिवमध्येएका वक्तव्याची चर्चा रंगली आहे. राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि आमदारतानाजी सावंतयांनी आपल्याच एका जुन्या कार्यकर्त्याला जाहीर सभेत थेट चौकशी लावण्याची धमकी दिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा कार्यकर्ता आता बंडखोर उमेदवार म्हणून रिंगणात आहे. बंडखोरीमुळे माजी मंत्र्‍यांचा पारा चढला धाराशिवजिल्ह्यातील पारा जिल्हा परिषद गटात महायुतीच्या उमेदवारासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेततानाजी सावंतबोलत होते. यावेळी बोलताना त्यांच्याच तालमीत तयार झालेला एक जुना कार्यकर्ता पक्ष आदेश डावलून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने सावंत यांचा संताप अनावर झाला. भाषणादरम्यान त्यांनी या बंडखोर उमेदवाराचा उल्लेख करत, थांब, तुझ्यावर एन्क्वायरी लावतो, असा जाहीर दम भरला. तानाजी सावंत यांनी प्रशासकीय चौकशीचा इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेवरून संताप केवळ बंडखोरीच नाही, तर स्थानिक नागरी समस्यांवरूनही तानाजी सावंत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. "आता मी या रस्त्याने आलो. या ठिकाणचा एक उमेदवार स्क्रिनवर दाखवतोय की हा रस्ता त्याने केला. तुझ्या बापाने केला का? हा महाराष्ट्र शासनाचा निधी तानाजी सावंतने आणला. रस्त्याची अवस्था काय झाली बघितली मी येताना. त्याची एन्क्वायरी लावतो तू बघ आता. तुमच्याकडे जे आहे त्याच्या दहा पट माझ्याकडे आहे. तुमच्या मनगटात दम असेल तर त्याच्या १०० पट दम माझ्यात आहे. माझा नाद करायचा नाही. मी मी करणाऱ्यांची मी जिरवली आहे हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र फिरलेला हा तानाजी सावंत आहे," असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला.
53 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 04:34 AM
रणवीर सिंगचा'धुरंधर 2': गौतम'कॅमिओ'भूमिकेसह कास्टमध्ये सामील झाला

रणवीर सिंगचा'धुरंधर 2': गौतम'कॅमिओ'भूमिकेसह कास्टमध्ये सामील झाला

बॉलिवूडअभिनेतारणवीर सिंगचाबहुप्रतिक्षित चित्रपट 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar 2) सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, आता या चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटातबॉलिवूडची लोकप्रियअभिनेत्री दिसणार आहे. ही अभिनेत्री सिनेमात झळकणार असल्याने चाहत्यांना चांगलाच आनंद झाला आहे. कोण आहे ती? जाणून घ्या'धुरंधर २' सिनेमात अभिनेत्रीयामी गौतमएका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.यामी गौतम'धुरंधर २' मध्ये 'कॅमिओ' (छोटा पण महत्त्वाचा रोल) भूमिकेत दिसणार आहे. यासाठी तिने ५ दिवसांचे शूटिंग शेड्यूल पूर्ण केल्याचेही सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाचे दिग्दर्शन तिचे पती आदित्य धर करत आहेत. पहिल्या भागात यामीची काम करण्याची इच्छा अपूर्ण राहिली होती, जी आता या दुसऱ्या भागात पूर्ण होताना दिसत आहे. मात्र, अद्याप याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 'धुरंधर २' हा एक मल्टी-स्टारर चित्रपट आहे. यात रणवीर सिंहसोबत संजय दत्त, आर. माधवन, सारा अर्जुन आणि अर्जुन रामपाल मुख्य भूमिकेत आहेत. तसेच, अक्षय खन्नाच्या 'रहमान डकैत' या पात्राची फ्लॅशबॅक स्टोरीही यात पाहायला मिळणार आहे. याशिवाय, अभिनेता विकी कौशल देखील या चित्रपटात कॅमिओ भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. 'धुरंधर'च्या पहिल्या भागाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ८९५ कोटींहून अधिक आणि जगभरात जवळपास १३५० कोटींची कमाई केली होती. आता आदित्य धर दिग्दर्शित हा दुसरा भाग १९ मार्च २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. अशातच यामीची वर्णी लागल्याने 'धुरंधर पार्ट २' नक्कीच हिट होईल, यात शंका नाही.
29 shares
😊
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 04:34 AM
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर भाष्य करण्यास फडणवीसांचा नकार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर भाष्य करण्यास फडणवीसांचा नकार

बारामती - राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून होणाऱ्या चर्चेवर मुख्यमंत्री फडणवीसांनी जर अशी काही चर्चा सुरू असती तरअजित पवारांनीभाजपाशी चर्चा केली असती असं विधान केले होते. आज बारामतीत झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांच्या या विधानावरशरद पवारांनीपलटवार केला. विलीनीकरणाच्या चर्चेत ते कुठेही नव्हते असा उल्लेख करत त्यांना बोलण्याचा काय अधिकार असाही प्रश्नशरद पवारांनीउपस्थित केला. शरद पवारांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, राष्ट्रवादी विलीनीकरणावर मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीसांनाबोलण्याचा काय अधिकार आहे हे मला समजले नाही. या सगळ्या चर्चेत ते कुठेच नव्हते. त्यामुळे त्यावर भाष्य करण्याचा त्यांना काय अधिकार आहे मला माहिती नाही. आमचे सहकारी जयंत पाटील आणिअजित पवारहे विलीनीकरणावर चर्चा करत होते. सध्या विलीनीकरणावर राजकीय चर्चा नाही असंही त्यांनी स्पष्ट केले. तर सुनेत्रा पवारांचा शपथविधी झाला, त्यांना संधी दिली हा आनंद आहे. शपथविधीबाबत मला भाष्य करायचे नाही. अजितदादांच्या स्मारकाबाबत मला माहिती नाही. मी ते पेपरमध्ये वाचले. परंतु मला काही कल्पना नाही. ज्या संस्थेच्या जागेची चर्चा लोकांनी केली आहे. त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे. त्यामुळे मला ठाऊक असले पाहिजे. अद्याप त्याबाबत आम्ही चर्चाही केली नाही. आम्ही संस्थेचे सर्व एकत्रित बसून त्यावर चर्चा करू. त्यामुळे आज अजित पवारांच्या स्मारकावर भाष्य करणे योग्य नाही असं शरद पवारांनी सांगितले. दरम्यान, अजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी केली होती. त्याशिवाय संजय राऊत आणि इतर काही नेत्यांनी अजित पवारांच्या अपघातावर शंका उपस्थित केली. त्यावरही शरद पवारांनी खुलासा केला. अजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत फार सुरुवातीला मी बोललोय. जोपर्यंत माझ्यापर्यंत कुठलीही अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत मी अपघाताबाबत उगीच शंका घेणार नाही असं शरद पवारांनी सांगितले.
32 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 04:32 AM
भारतीय शेअर बाजारात जोरदार सुरुवात, सुरुवातीच्या घसरणीनंतर पुन्हा उसळी

भारतीय शेअर बाजारात जोरदार सुरुवात, सुरुवातीच्या घसरणीनंतर पुन्हा उसळी

Share Market Today: कालच्या जबरदस्त तेजीनंतर, बुधवारी (४ फेब्रुवारी) देशांतर्गतशेअर बाजाराचीसुरुवात मोठ्या नफावसुलीनं झाली. बाजार उघडताच सेन्सेक्स ५०० अंकांनी आणि निफ्टी १२० अंकांनी घसरला होता. मात्र, त्यानंतर खालच्या स्तरावरून थोडी सुधारणा दिसून आली. सकाळी ९:३० वाजता सेन्सेक्स ८० अंकांच्या वाढीसह ८३,८०० च्या आसपास होता, तर निफ्टी ३२ अंकांच्या तेजीसह २५,७६५ वर व्यवहार करत होता. बँक निफ्टी २०९ अंकांच्या वाढीसह ६०,२४८ वर पोहोचला. आज आयटी (IT) इंडेक्समध्ये सुरुवातीलाच ५.७ टक्क्यांहून अधिक मोठी घसरण झाली. मीडिया, रियल्टी आणि मिड-स्मॉल हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्रीचा दबाव होता. दुसरीकडे ऑटो, मेटल, ऑइल अँड गॅस, कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि एफएमसीजी इंडेक्समध्ये खरेदी दिसून आली. निफ्टीवरील टॉप लूजर्स : HCL Tech, Infosys, TCS, Tech Mahindra, Wipro, Bajaj Finance, Bajaj Finserv आणि Kotak Mahindra Bank. निफ्टीवरील टॉप गेनर्स : ONGC, Coal India, M&M, Power Grid, Grasim, ITC आणि Tata Steel. आजच्या व्यवहारासाठी 'गिफ्ट निफ्टी'मधून (Gift Nifty) घसरणीचे संकेत मिळाले होते. काल अमेरिकन बाजारात आयटी क्षेत्रातील विक्रीमुळे घसरण पाहायला मिळाली. भारत-अमेरिका व्यापार कराराबाबतचे अपडेट, परकीयगुंतवणूकदारांचंपुनरागमन, अमेरिकन बाजारातील कमकुवतपणा, कमोडिटी बाजारातील तेजी आणि आरबीआयची धोरणात्मक बैठक हे सर्व घटक आज बाजाराची दिशा ठरवू शकतात.
63 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 4, 2026, 04:30 AM
मेटाची माहिती सामायिकरणः ऑनलाइन खरेदीच्या सवयी वैयक्तिकृत जाहिरातींना कशी चालना देतात

मेटाची माहिती सामायिकरणः ऑनलाइन खरेदीच्या सवयी वैयक्तिकृत जाहिरातींना कशी चालना देतात

तुम्ही फेसबुक किंवा इन्स्टाग्राम अ‍ॅप वापरत असाल तर स्क्रोल करताना तुम्ही ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटची जाहिरात पाहिली असेल. अनेकदा या जाहिराती तुम्ही अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा इतर ई-कॉमर्स वेबसाइट्सवर सर्च करता. अशा परिस्थितीत, प्रश्न उद्भवतो की आपला ऑनलाइन शॉपिंग डेटा फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर कसा येतो. यामुळे गोपनीयतेबद्दलची चिंताही वाढते. येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मेटा कोणत्या वेबसाइट्सवरून डेटा शेअर करते आणि ते कसे बंद केले जाऊ शकते.Your Activity Off Meta Technologies काय आहे?मेटाने Your Activity Off Meta Technologies नावाचे एक फीचर्स प्रदान केले आहे, जे फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या बाहेर युजर्सच्या क्रियाकलाप दर्शविते. जेव्हा आपण ई-कॉमर्स साइटवर एखादे उत्पादन पाहता किंवा अ‍ॅप वापरता, तेव्हा बरेच व्यवसाय हा डेटा मेटासह शेअर करतात.हे मेटाला आपली प्राधान्येआणि आवडी समजण्यास मदत करते. त्या आधारे, आपण जाहिराती आणि शिफारसी पाहता. कंपनीचे म्हणणे आहे की, ही प्रणाली जाहिरात पर्सनलायझेशन आणि अनुभव सुधारण्यासाठी आहे, परंतु युजर्सना यावर पूर्ण नियंत्रणही देण्यात आले आहे.कोणत्या वेबसाईट्स डेटा शेअर करीत आहेत हे कसे तपासावे?फेसबुक युजर्स प्रोफाइल आयकॉनवर जा आणि Settings & Privacy वर जा, नंतर सेटिंग्ज उघडा. तेथे आपल्याला अकाउंट्स सेंटरमध्ये आपली माहिती आणि परवानग्या विभाग सापडेल. याच्या आत मेटा टेक्नॉलॉजीजच्या बाहेर युवर अ‍ॅक्टिव्हिटीचा पर्याय दिसेल.इंस्टाग्राम युजर्स सेटिंग्जआणि नंतर प्रोफाइल आयकॉनमधून अकाउंट्स सेंटरवर जाऊन देखील हाच विभाग उघडू शकतात. येथे अलीकडील डेटा-शेअरिंग अ‍ॅप्स आणि वेबसाइट्सची यादी दिसून येते. हे स्पष्टपणे दर्शविते की कोणते प्लॅटफॉर्म आपला अ‍ॅक्टिव्हिटी मेटावर पाठवत आहेत.डेटा शेअर डिस्कनेक्ट आणि हिस्ट्री क्रिअर करावाऑफ मेटा अ‍ॅक्टिव्हिटी सेक्शनमध्ये युजर्सला डेटा कंट्रोलसाठी अनेक ऑप्शन मिळतात. आपण इच्छित असल्यास, आपण एक व्यवसाय किंवा अ‍ॅप स्वतंत्रपणे डिस्कनेक्ट करू शकता, जेणेकरून ते पुढे डेटा शेअर करू शकत नाही. एकाच वेळी एकाधिक स्त्रोत देखील काढले जाऊ शकतात. मेटा सर्व जुन्या अ‍ॅक्टिव्हिटी साफ करण्याचा पर्याय देखील देते. हे खात्यातून पूर्वी संबंधित डेटा काढून टाकते. तथापि, मेटाने असे नमूद केले आहे की काही माहिती कराराच्या किंवा अज्ञात स्वरूपात सिस्टममध्ये राहू शकते.डेटाचा मागोवा घेणे आणि डाउनलोड करणे कसे थांबवावे?मेटा युजर्सना भविष्यातील ट्रॅकिंग पूर्णपणे बंद करण्याचा पर्याय देखील देते. जेव्हा आपण सेटिंग्ज चालू करता तेव्हा बाह्य वेबसाइट्स आणि अ‍ॅप्स मेटासह स्वयंचलितपणे नवीन अ‍ॅक्टिव्हिटी शेअर करू शकणार नाहीत. यामुळे जाहिराती कमी वैयक्तिकृत होऊ शकतात, परंतु गोपनीयता नियंत्रण वाढवते. युजर्स आपला माहिती निर्यात फीचर्सवरून त्यांचा ऑफ मेटा डेटा देखील डाउनलोड करू शकतात. ही फाईल स्थानिक सिस्टमवर किंवा गुगल ड्राइव्ह आणि Dropbox सारख्या क्लाऊड सेवांवर जतन केली जाऊ शकते. डाउनलोड फोल्डर सर्व डेटा व्यवस्थापित मार्गाने प्रदान करते, ज्यामुळे वेळोवेळी कोणती माहिती शेअर केली गेली आहे हे समजणे सोपे होते.
44 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 4, 2026, 04:27 AM
नंदुरबार बनावट टपाल तिकिट रॅकेटचा पर्दाफाशः बनावट सरकारी टपाल तिकिटांचा गैरवापर केल्याप्रकरणी पाच जणांना अटक

नंदुरबार बनावट टपाल तिकिट रॅकेटचा पर्दाफाशः बनावट सरकारी टपाल तिकिटांचा गैरवापर केल्याप्रकरणी पाच जणांना अटक

म. टा. वृत्तसेवा, नंदुरबार:नंदुरबार शहरात गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेलाबनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांचामोठा गैरप्रकार उघडकीस आला असून, सायबर कॅफेमधून बनावट सरकारी शिक्क्यांचा वापर करून बोगस दाखले तयार केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.या प्रकरणी सायबर कॅफेचालक, नगरपरिषदेचा ऑपरेटर, पालिकेचा शिपाई, वकील व आणखी एक व्यक्ती अशा एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पालिकेचा कर्मचारी सहभागी असल्याचे समोर आले आहे. यात मोठे रॅकेट सहभागी असल्याची शक्यता आहे.नंदुरबार शहरातील शास्त्री मार्केट परिसरात असलेल्या आर. के. ऑनलाइन सायबर कॅफे येथून हा गैरप्रकार चालत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिस निरीक्षक नीलेश देसले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, २९ जानेवारी रोजी पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत बनावट सरकारी शिक्के,जन्म-मृत्यूचे बनावट दाखले, लॅपटॉप, प्रिंटर, संगणक व पाच मोबाइल असामुद्देमाल जप्तकरण्यात आला.Beed Crime: मैत्रीचा धक्कादायक शेवट! रायमोहा परिसरातील खुनाचा 12 तासांत छडा, आरोपीला अटक; कारण आलं समोर...अनिल यशवंत कोळी (न. प. ऑपरेटर), रिजवान सुभान खान (सायबर कॅफेचालक), इमरान याकूब पिंजारी (वकील), लाला ऊर्फ मोहम्मद अली मोहम्मद युसूफ पटेल (नगरपरिषद शिपाई) आणि शेख शफिक शेख इसाक कुरेशी ( सायबर कॅफेशी संबंधित ) अशी आरोपींची नावे आहेत.नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक तथा जन्म-मृत्यू नोंद विभागाचा अतिरिक्त कार्यभार असलेले युवराज श्रीपत चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने ९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे .Latur Crime: लातूरच्या आंबेडकर चौकात आमदार अमित देशमुखांसमोर हत्येचा थरार, गाडी थांबवली, पण पुढे....या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी सरकारी प्रमाणपत्रांसाठी केवळ अधिकृत कार्यालये व सरकारमान्य केंद्रांशीच संपर्क साधावा. कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.- श्रवण दत्त. एस, जिल्हा पोलिस अधीक्षक
68 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 4, 2026, 04:20 AM
तुमच्या चहाच्या फिल्टरचे पुनरुज्जीवन कराः साचलेली घाण काढून टाकण्याची एक सोपी युक्ती

तुमच्या चहाच्या फिल्टरचे पुनरुज्जीवन कराः साचलेली घाण काढून टाकण्याची एक सोपी युक्ती

घरात चहा करणे ही बहुतेकांची रोजची सवय असते. सकाळची सुरुवात असो किंवा दमलेल्या संध्याकाळी थोडा विरंगुळा हवा असो, चहाचा कप नेहमीच सोबत असतो. पण रोजच्या वापरामुळे चहाच्या गाळणीवर हळूहळू काळसर थर आणि मळ साचू लागतो. सुरुवातीला हा मळ फारसा जाणवत नाही; मात्र वेळ जसजसा जातो तसतशी गाळणीतील बारीक छिद्रे अडकतात.त्यामुळे चहा नीट गाळला जात नाही आणि कधी कधी चहाची पाने थेट कपात जातात.या त्रासाला कंटाळून अनेक जण नवीन गाळणी आणतात, पण प्रत्यक्षात जुनी गाळणी स्वच्छ करणे खूपच सोपे असते. योग्य उपाय वापरल्यास साचलेली घाण काही मिनिटांत सहज निघून जाते. या गोष्टीसाठी फार गोष्टी लागत नाही. तर काही सोप्या गोष्टींचा वापर करून तुम्ही या समस्येवर मात मिळवू शकता. (फोटो सौजन्य :- @masterchefpankajbhadouria)चहाच्या गाळणीवर घाण का जमा होते?चहाच्या गाळणीवर मळ साचण्यामागे चहाच्या पानांतील नैसर्गिक रंगद्रव्ये आणि तेले कारणीभूत असतात. चहा गाळताना ही द्रव्ये हळूहळू गाळणीला चिकटतात. केवळ पाण्याने वारंवार धुतल्याने हे डाग पूर्णपणे निघत नाहीत आणि जसजसा काळ जातो तसतशी गाळणीतील छिद्रे अडकू लागतात. परिणामी गाळणी जुनी, काळसर आणि अस्वच्छ दिसू लागते.हे मिश्रण कसे तयार करायचेएका भांड्यात तीन ग्लास पाणी घ्या आणि ते गॅसवर गरम ठेवा. पाणी उकळायला लागल्यावर त्यात दोन चमचे व्हिनेगर, एक चमचा बेकिंग सोडा आणि थोडंसं डिशवॉश लिक्विड मिसळा. आता या उकळत्या पाण्यात चहाच्या गाळणीचा भाग टाका आणि साधारण दहा मिनिटे तसेच ठेवू द्या. त्यानंतर गाळणी बाहेर काढून जुन्या टूथब्रशने हलक्या हाताने घासा. पाहताच तुम्हाला जाणवेल की साचलेला मळ सहज निघून जातो आणि बंद झालेली छिद्रे पुन्हा मोकळी होतात. ही पद्धत स्टील तसेच प्लास्टिकच्या गाळणीसाठीही प्रभावी ठरते.गॅसवर हलके गरम करून स्वच्छ करा.ही पद्धत विशेषतः स्टील स्ट्रेनर्ससाठी प्रभावी आहे. स्ट्रेनर गॅसवर हलके गरम करा, जाळीची बाजू वरच्या दिशेने ठेवा. काही क्षणातच, चहाची पाने आणि घाण जळू लागेल आणि सैल होईल. गॅस बंद करा, स्ट्रेनर थंड होऊ द्या आणि स्क्रबरने हळूवारपणे स्वच्छ करा. नंतर, ते पाण्याने स्वच्छ धुवा. ही पद्धत कोणत्याही अडकलेल्या पाने आणि अडथळ्यांना सहजपणे काढून टाकते.लिंबू आणि मीठचा वापर कराजर तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल तर लिंबू आणि मीठ हा एक चांगला पर्याय आहे. गाळणीवर थोडे मीठ शिंपडा आणि त्यावर अर्धा लिंबू चोळा. काही मिनिटांनी पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे डाग हलके होतील आणि गाळणी स्वच्छ दिसेल.साफसफाई केल्यानंतर या गोष्टी लक्षात ठेवावापर झाल्यावर लगेचच गाळणी स्वच्छ पाण्याने धुवा, त्यामुळे चहाचा रंग आणि तेल साचत नाही.आठवड्यातून किमान एकदा बेकिंग सोडा किंवा व्हिनेगर वापरून खोलवर स्वच्छता करा.गाळणी धुतल्यानंतर ती पूर्णपणे कोरडी करा आणि मगच साठवून ठेवा.ओलसर गाळणी बंद डब्यात ठेवल्यास दुर्गंधी आणि बुरशी तयार होऊ शकते, त्यामुळे टाळा.गाळणीसाठी वेगळी मऊ ब्रश किंवा टूथब्रश वापरा, त्यामुळे छिद्रे खराब होत नाहीत.फार कडक स्क्रबर किंवा धारदार वस्तू वापरणे टाळा, यामुळे गाळणीला ओरखडे पडू शकतात.
80 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 04:16 AM
महाराष्ट्र राज्य सरकारने कृषी मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकार रद्द केला

महाराष्ट्र राज्य सरकारने कृषी मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकार रद्द केला

पुणे: राज्यसरकारनेबिगरशेतीपरवानगी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार काढून घेतले आहेत. आता हे अधिकार स्थानिक नियोजन प्राधिकरणाकडे दिले आहेत. त्यासाठी राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. मात्र, यातील अनेक मुद्द्यांवर स्पष्टता नसून बिगरशेतीचीपरवानगी देताना शासकीय नजराणा, थकबाकी वसुली, सातबारा उताऱ्याची तपासणी तसेच अधिकार अभिलेखांमधील नोंद महसूल विभाग अर्थात जिल्हा प्रशासन करणार की स्थानिक प्राधिकरणाचे अधिकारी करणार? याबाबत अद्याप शासकीय पातळीवर संभ्रम आहे. त्यामुळे अधिकच गोंधळ उडून न्यायालयीन वाद उद्भवू शकतात, अशी भीती अधिकारी व्यक्त करत आहेत. राज्यसरकारनेशहरांभोवतीच्या गावांमधील विकासकामांना चालना देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आता बिगरशेती परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही. त्यासाठी महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ मधील ४१ ते ४७ आणि १०८ ते १२० ही कलमेच रद्द करण्यात आली आहेत. त्यासंदर्भातराज्य सरकारनेराजपत्र प्रसिद्ध केले आहे. मात्र, यातील ४२ व्या कलमात दुरुस्ती करण्यात आली आहे. आता ही परवानगी स्थानिक नियोजन प्राधिकरणाकडे देण्यात आली आहे. यातून स्थानिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत. मात्र, हे बदल करताना अनेक बाबींमध्येराज्य सरकारकडूनस्पष्टता नसल्याने प्रशासकीय पातळीवर गोंधळ उडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही परवानगी देताना भोगवटा वर्ग १ जमिनींबाबत कोणतीही अडचण नसेल. मात्र, परवानगी देताना त्याची बिगर शेतीत नोंद करताना गाव नमुना २ मध्ये करायची की नाही, ती कोण करणार, नोंद होणार नसल्यास हा गाव नमुना बंद करायचा का? अशी कोणतीही स्पष्टता जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेली नाही. तसेच इतर हक्कांमधील दावेदारांना विश्वासात न घेता परस्पर परवानगी देऊन त्यावर बांधकाम केल्यास त्यानंतर उ‌द्भवणाऱ्या न्यायालयीन वादांबाबत नेमकी कोणती कार्यवाही करावी, याचेही निर्देश देण्यात आलेले नाहीत. स्पष्टता नाही◼️ भोगवटा वर्ग २ च्या जमिनींबाबत परवानगी दिल्यास सातबारा उताऱ्यावरील इनाम, कुळ, वतन प्रकाराची तपासणी करण्याचे अधिकार महसूल विभागाला आहेत. ही तपासणी करण्याचीही स्पष्टता नाही.◼️ ही तपासणी परवानगी पूर्वी करावी की त्यानंतर करावी, हेही सांगण्यात आलेले नाही.◼️ यासाठी शासकीय नजराणा भरावा लागतो. तो स्थानिक प्राधिकरण घेईल की माफ करेल, हेही स्पष्ट नाही. हेलपाटे वाचणार◼️ आता बिगरशेती अधिमूल्य एकदाच भरावा लागेल. त्यामुळे दरवर्षी अधिमूल्य भरण्यासाठीचे हेलपाटे वाचणार आहेत.◼️ मात्र, हे अधिमूल्य रहिवास, व्यापारी तसेच औद्योगिक वापरासाठी एकच ठेवले आहे.◼️ यापूर्वी तिन्ही प्रयोजनांसाठी वेगवेगळे अधिमूल्य लावले जात होते. त्यामुळे सरकारचा महसूल बुडणार आहे.◼️ एका वापरासाठीची परवानगी दिल्यानंतर गैरवापर झाल्यास दंड आकारून नियमित होणार नाही. क्लिष्टता होऊ शकते◼️ बिगर शेतीची नोंद झाल्यानंतर महसूल अभिलेख अद्ययावत करण्याचे काम जिल्हा प्रशासन करते.◼️ मात्र, त्यापूर्वीच महसूल विभागाचा अभिप्राय न घेता परवानगी दिल्यास कायदेशीर क्लिष्टता निर्माण होऊ शकते, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.◼️ राज्य सरकारच्या या राजपत्राच्या प्रसिद्धीनंतर १ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अधिक वाचा:भूसंपादन मोबदल्यासाठी शेतकऱ्यांची पायपीट आता थांबणार; राज्य सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय
20 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 4, 2026, 04:15 AM
ऐतिहासिक विक्रीनंतर सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ

ऐतिहासिक विक्रीनंतर सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ

Gold Silver Price Today:सलग तीन दिवस ऐतिहासिक विक्री झाल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत आता पुन्हा एकदा दरवाढीचे तुफान आले आहे. अमेरिकेसोबत सर्वात मोठी ट्रेड डीलची घोषणा झाल्यावर भारतीय बाजारातही सोने आणि चांदीच्या किमती सुस्साट वाढल्या. गेल्या आठवड्यात, गुरुवारी, सुरुवातीला दोन्ही धातूंच्या किमती सर्वकालीन उच्चांकावर पोहोचल्या होत्या, पण नंतर सलग तीन दिवस विक्रीचा सपाटा लागला, ज्यामुळे गुंतवणूकदार करणाऱ्यांचे टेन्शन वाढले.सोने-चांदीचा दर वाढता वाढेचमागील तीन दिवसांच्या सततच्या घसरणीनंतर देश-विदेशातील सराफा बाजारातपुन्हा एकदा खरेदीचा जोरवाढताना दिसत आहे. या दरम्यान, मागणी मजबूत आणि डॉलर कमकुवतच्या पार्श्वभूमीवर बुधवार, 4 फेब्रुवारी रोजी एमसीएक्सवर सकाळच्या व्यवहारात सोने आणि चांदीच्या दरात चांगली वाढ झाली. अशा स्थितीत, अलीकडच्या घसरणीत जर एखाद्याने गुंतवणूक केली नसेल तर आता नक्कीच त्यांच्यावर पश्चाताप करायची वेळ आली असेल कारण सोने-चांदीच्या दरांमधील तेजी पुढेही सुरु राहण्याचा अंदाज आहे.India-US Trade Agreement: अमेरिकेसोबत डील क्रॅक, भारताचा मास्टरस्ट्रोक; 10 अब्जोंची उत्पादने अमेरिकेत थेट फ्री... कसं समजून घ्यासलग दुसऱ्या दिवशी देशांतर्गत फ्युचर्स बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली. एमसीएक्सवर व्यवहार सुरू होताच सोने 5000 रुपये आणि चांदीची किंमत किलोमागे 15000 रुपयांनी वाढली. याआधी एप्रिल सोन्याचा वायदा दर मागील सत्रात 1,53,809 रुपये प्रति 10 ग्रॅमवर क्लोज झालेला तर, आज सकाळी पाच हजारांनी वाढून 1,58,420 रुपयांवर पोहोचला आहे.Gold Investment: आनंदी आनंद गडे...ETF गुंतवणूकदार खुश, ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे फायदाच फायदात्याचवेळी, मार्च चांदीचे फ्युचर्स मागील सत्रातील 2,68,015 रुपयांवरून बुधवारी सकाळी किलोभर चांदीचा दर 2,78,015 रुपये झाला आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या किंमतीत घट झाल्यामुळे बुधवारी सोन्याच्या किमतीत 2% पेक्षा जास्त वाढ झाली. या दरम्यान, मजबूत अमेरिकन मॅक्रो डेटा आणि यूएस फेडने व्याजदरांमध्ये कोणताही बदल न केल्यामुळे झालेल्या अलीकडील वाढीनंतर नफावसुलीमुळे डॉलर निर्देशांक घसरला ज्यामुळे सोने-चांदी खरेदीचा ओघ वाढला.RBI ने बँकाना दिले आदेश, सरकारी सुट्टीच्या दिवशीही बँक कर्मचाऱ्यांना करावं लागणार काम, अचानक असा निर्णय का?येन वगळता बहुतेक प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलर घसरला. अशाप्रकारे, डॉलर कमजोर झाल्यावर इतर चलनांसाठी डॉलर-बेस्ड मौल्यवान धातू अधिक स्वस्त होतात. गेल्या काही दिवसांत मौल्यवान धातूंमध्ये झालेल्या ताज्या घसरणीनंतरही सोने आणि चांदीचा दर एका महिन्यात प्रत्येकी जवळपास 15% वाढला असून या दरम्यान, एका वर्षात स्पॉट गोल्डची किंमत 77% वाढली आणि चांदीने तब्बल 172% परतावा दिला.
81 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 4, 2026, 04:13 AM
सावित्रीबाई जोतिराव फुले यांच्या लग्नाचा ऐतिहासिक प्रसंगः परंपरा आणि संस्कृतीला श्रद्धांजली

सावित्रीबाई जोतिराव फुले यांच्या लग्नाचा ऐतिहासिक प्रसंगः परंपरा आणि संस्कृतीला श्रद्धांजली

स्टार प्रवाहवर सुरु असलेली लोकप्रिय मालिका ‘ मी सावित्रीबाई जोतीराव फुले ’ प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे. या मालिकेतील प्रत्येक टप्पा प्रेक्षकांना आवडत असून, आता मालिकेत सावित्री आणि जोतीराव विवाहबंधनात अडकतानाचा अत्यंत खास आणि ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार आहे. हा विवाहसोहळा केवळ मालिकेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राकरिता एक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे.View this post on InstagramA post shared by Star Pravah (@star_pravah)या अद्भूत विवाहसोहळ्याची मांडणी अत्यंत देखणी आणि काळाच्या पार्श्वभूमीला साजेशी करण्यात आली आहे.सावित्री आणि जोतीरावयांच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण भावपूर्ण पद्धतीने सादर करताना परंपरा, विधी आणि संस्कृतीचा सन्मान राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाणार आहे. खंडोबाला लगीनचिठ्ठी अर्पण करण्याच्या मंगल परंपरेपासून ते मुहूर्तमेढ रोवण्यापर्यंत प्रत्येक विधी मोठ्या श्रद्धेने साजरे केले जाणार आहे. चुडा भरण्याचा हळुवार सोहळा, हळदीचा मंगल समारंभ, दागिने आणि साडीमागचं सांस्कृतिक व भावनिक महत्त्व या सगळ्या पारंपरिक रितीरिवाजांचं सुंदर दर्शन प्रेक्षकांना या मालिकेत अनुभवता येणार आहे.'तू बोल अजून बोल ,अजून टीका कर...' राधा पाटीलच्या टोमण्यांवर Gautami Patil चं सडेतोड उत्तर, कुठून सुरू झालेला वाद?परंपरा, संस्कार आणि भावनांनी नटलेला हा विवाहसोहळा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचं दर्शन घडवणारा ठरणार आहे. हा विवाहसोहळा प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करून जाईल यात शंका नाही. पण तत्पूर्वी मालिकेत क्रांतीकारी तात्या टोपे यांची एण्ट्री झाली आहे.बॉलिवूडवर राज्य करायची ही मराठी अभिनेत्री, पण दिग्दर्शकाच्या प्रेमाच्या जाळ्यात फसली! पत्नीचा खाल्ला मार अन् करियरही पाण्यातगावात हेरगिरी करताना ते छोट्या जोतीला हेरतात. आणि त्याची गावातल्या लोकांप्रति दक्षता पाहून त्याला आपल्या पुढील कार्यासाठी नेमतात. नायगाव शिरवाळच्या पाटलांच्या मुलीचे लग्न आहे त्याच्या आदल्या रात्रीच आपण सरकारी खजिना पळवायचा असे ते ठरवतात. पण त्या पाटलाच्या पोरीचं जोतीसोबतच लग्न ठरलेलं असतं यापासून ते अनभिज्ञ असतात. शिवाय शिरवाळ मध्ये सरकार खजिन्याची रखवाली करण्याची जबाबदारी साविच्या वडिलांवर येऊन पडते. त्यामुळे सासरे विरुद्ध जावई अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा विवाहसोहळा निर्विघ्न पार पडणार का की काही अडचणी येणार हे येत्या एपिसोडमध्येच पाहायला मिळणार. दररोज सायंकाळी 7.30 वाजता ही मालिका स्टार प्रवाहवर पाहता येईल.
78 shares
😊
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 04:09 AM
भारतीय शेअर बाजारात घसरण; एस. टी. टी. वाढल्याने शेअर बाजारात घसरण

भारतीय शेअर बाजारात घसरण; एस. टी. टी. वाढल्याने शेअर बाजारात घसरण

Nirmala Sitharaman On STT: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारच्या अर्थसंकल्पात फ्युचर्स आणि ऑप्शन्सवर (F&O) सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) वाढवण्याची घोषणा केली. या निर्णयामुळेशेअर बाजारातमोठी पडझड होऊन सेन्सेक्स ३,००० अंकांपर्यंत घसरला होता. परंतु, हा निर्णय महसूल वाढवण्यासाठी नसून लहानगुंतवणूकदारांनामोठ्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी घेण्यात आला असल्याचं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं. एका अभ्यासाचा दाखला देत अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, वायदा बाजारात व्यवहार करणाऱ्या ९० टक्क्यांहून अधिक लोकांना मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. म्हणूनच जनहित लक्षात घेऊन वायदा करारांवरील STT ०.०२ टक्क्यांवरून ०.०५ टक्के करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तसंच, ऑप्शन्स प्रीमियमवर ०.१ टक्क्यावरून ०.१५ टक्के आणि ऑप्शन्स एक्सरसाइजवर ०.१२५ टक्क्यावरून ०.१५ टक्के कर वाढवण्याचा प्रस्ताव आहे. भारत-अमेरिका व्यापार करार: रशियन तेलाच्या खरेदीवर निर्बंध; बदल्यात निर्यात शुल्कात मोठी कपात? जाणून घ्या गुंतवणूकदारांना होणाऱ्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी सरकारकडे शेकडो फोन आणि विनंत्या येत होत्या. हा कर वाढवणं म्हणजे गुंतवणूकदारांसाठी एक प्रकारचा निर्बंध म्हणून काम करेल. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये वैयक्तिक गुंतवणूकदारांना १,०५,६०३ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता. परिणामी, गुंतवणूकदारांची संख्या १.०६ कोटींवरून ७५.४३ लाखांपर्यंत खाली आली आहे. सेबीनं (SEBI) देखील साप्ताहिक डेरिव्हेटिव्ह रॅशनलायझेशन आणि कॉन्ट्रॅक्ट साईजमध्ये वाढ यांसारखे उपाय केले आहेत. अमेरिकेनं भारतीय निर्यातीवरील शुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतल्याचं अर्थमंत्र्यांनी 'शुभ संकेत' असल्याचं म्हटलं आहे. यामुळे भारतीय निर्यातीला मोठी गती मिळणार आहे. यापूर्वी भारतानं रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्यामुळे अमेरिकेनं अतिरिक्त २५ टक्के शुल्क लादलं होतं, ज्यामुळे एकूण शुल्क ५० टक्क्यांवर पोहोचलं. आता रशियाकडून तेल खरेदी मर्यादित करण्याच्या सहमतीनंतर हे अतिरिक्त शुल्क हटवण्यात आलं आहे.
7 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 4, 2026, 04:08 AM
हिंदू धर्मातील शनि प्रदोष व्रताचे महत्त्व आणि त्याची शुभ वेळ

हिंदू धर्मातील शनि प्रदोष व्रताचे महत्त्व आणि त्याची शुभ वेळ

हिंदू धर्मात प्रदोष व्रताला अत्यंत महत्व आहे. हे व्रत भगवान शंकराला समर्पित असतात. जो व्यक्ती या दिवशी नियमाने व्रत करून महादेवाची मनोभावे पूजा करतो त्यांच्या मनोकामना भगवान शिव पूर्ण करतात अशी मान्यता आहे. हे व्रत यंदा अतिशय खास आहे कारण येणारा प्रदोष व्रत हा शनिवारी असल्याने त्याला शनी प्रदोष म्हणतात. शनी प्रदोष महत्वाचा यामुळे असतो कारण यादिवशी महादेवासोबतच शनिदेवाची कृपा देखील मिळते. यामुळे ज्या व्यक्तींवर साडेसाती किंवा शनीची कुदृष्टी आहे त्यांनी यादिवशी व्रत करून शनिदेवाची देखील पूजा करावी असे सांगितले जाते. पाहुयात मग वर्षातील पहिला शनिप्रदोष केव्हा आहे .शनिप्रदोष तारीखपंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी १४ फेब्रुवारी शनिवारी सायंकाळी ४ वाजून २ मिनिटांनी सुरु होईल. ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच २ फेब्रुवारी रविवारी सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे उदय तिथीनुसार प्रदोष व्रत हे १४ तारखेलाच केले जातील.शनिप्रदोष मुहूर्तवर्षातील पहिले प्रदोष व्रत हेशनिप्रदोषआहे. हे व्रत १४ फेब्रुवारी रोजी केले जातील. यादिवशी प्रदोषकाळात पूजा करणे सर्वोत्तम मानले जाईल. प्रदोषकाळाची वेळ ही १४ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजून २५ मिनिटे ते ६ वाजून ५५ मिनिटांपर्यंत असेल. त्यामुळे या शुभ मुहूर्तावर तुम्ही भगवान शिवाची पूजा मांडून सर्व विधी करू शकता.प्रदोष पूजा विधीशनिप्रदोषच्या दिवशी सकाळी लवकर उठावे स्नान झाल्यानंतर पांढरे वस्त्र घालावे. आपल्या देवघरातील देवांची पूजा करावी. मग महादेवाच्या पूजेसाठी एक चौरंग घ्यावा त्यावर पांढरे वस्त्र अंथरून महादेवाचे शिवलिंग ठेवावे. शिवलिंगाचा अभिषेक करावा त्यानंतर भस्म लावावे व बेलपत्र पांढरी फुले वाहावीत. धूप दीप अगरबत्ती लावावी. चुर्म्याचा नैवेद्य दाखवावा. देवी पार्वतीला शृंगाराचे सामान अर्पण करावे. मग प्रदोषव्रताची कथा वाचावी. आरती करून प्रसाद वाटावा.शनिप्रदोषच्या दिवशी पूजा कशी करावीहे व्रत शनिवारी आल्याने याला शनिप्रदोष असे म्हणतात. त्यामुळे यादिवशीमहादेवासोबतचभगवान शनिदेवाची पूजा करणे देखील महत्वाचे मानले जाते. महादेवाची पूजा झाल्यानंतर शनिदेवाचे स्मरण करावे. शनी स्तोत्र व शनीचालीसा पठण करावी. त्यानंतर सायंकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे व दिवा लावावा . शनी मंदिरात जाऊन शनिदेवाला तेल अर्पण करावे. यामुळे शनिदोष नाहीसा होतो असे मानतात.
19 shares
😊
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 04:00 AM
वसामत विभागातील साखर कारखान्यांमध्ये दळणवळणाची गती कायम

वसामत विभागातील साखर कारखान्यांमध्ये दळणवळणाची गती कायम

चालू गाळप हंगामातहिंगोलीजिल्ह्याच्या वसमत विभागातील साखर कारखान्यांनी आपला वेग कायम राखला असून गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत दोन सहकारी आणि एका खासगी कारखान्याने मिळून एकूण ७ लाख ८६ हजार मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप केले आहे. शेतात उभा असलेलाऊसवेगाने कारखान्यांकडे वळत असून फेब्रुवारीअखेरपर्यंत सर्व उसाचे गाळप पूर्ण होईल, असा विश्वास कारखाना प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.विभागातील तिन्ही कारखान्यांनी आपापल्या क्षमतेनुसार गाळप प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला आहे. पूर्णा सहकारी साखर कारखान्याने ८७ दिवसांत ३ लाख ४८ हजार, कोपेश्वर साखर कारखाना ८६ दिवसांत ३ लाख १३ हजार, टोकाई सहकारी साखर कारखान्याने ७५ दिवस १ लाख २३ हजार असा एकूण ७ लाख ८६ हजार मेट्रिक टन उसाचे आतापर्यंत गाळप केले आहे. शेतकऱ्यांना दिलासा यावर्षी गाळप प्रक्रिया नियोजित वेळेनुसार सुरू असल्याने फेब्रुवारीअखेरपर्यंत कार्यक्षेत्रातील संपूर्णऊसगाळपाला जाईल. यामुळे उन्हाची तीव्रता वाढण्यापूर्वीच ऊस तुटणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. कारखाना प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तोडणी आणि वाहतुकीचे नियोजन चोख असल्यामुळे गाळपाचा वेग समाधानकारक आहे. हेही वाचा : कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारी परदेशी भाजीपाला शेती; जाणून घ्या सविस्तर
82 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 03:56 AM
सुनेत्रा पवार यांनी स्मारकाला भेट दिली आणि दुर्घटनेतील पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली

सुनेत्रा पवार यांनी स्मारकाला भेट दिली आणि दुर्घटनेतील पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली

अजित पवारांच्यानिधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली आहे. त्यांनी नुकतीच शपथ घेऊन आपल्या कामाला सुरुवात केली आहे. आपल्या पहिल्याच दौऱ्यात त्यांनी कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि या अपघातात प्राण गमावलेल्या विदिप जाधव यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
5 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 4, 2026, 03:55 AM
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीजवळ विमान अपघातात निधन झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीजवळ विमान अपघातात निधन झाले.

बारामती:राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथील विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. कामाचा माणूस अशी ओळख असणाऱ्या अजित पवार यांच्या निधनाने राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अशातच आज बारामती इथं अजित पवार यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या शेवटच्या फोन कॉलबाबत माहिती दिली आहे. अजित पवार यांनी अपघाताच्या सहा मिनिटे आधी आपले चुलत पुतणे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीजीत पवार यांच्याशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत संवाद साधला होता. श्रीजीत पवार यांच्यासह बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव आणि राष्ट्रवादीच्या इतर पदाधिकाऱ्यांनी आज बारामतीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या शेवटच्या कॉलचे रेकॉर्डिंग ऐकवले आहे.श्रीजीत पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण माळी समाजाच्या उमेदवाराला संधी दिली पाहिजे, अशी मागणी करणारा टेक्स्ट मेसेजअजित पवारयांना केला होता. हा मेसेज प्राप्त झाल्यानंतर विमान प्रवासात असलेल्या अजित पवारांनी सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी श्रीजीत पवारांना फोन करून आपण सर्व जाती-धर्माच्या लोकांना निवडणुकीत कशी संधी दिली आहे, याबाबतची माहिती दिली.श्रीजीत पवारांनी पत्रकार परिषदेत ऐकवलेल्या कॉल रेकॉर्डमध्ये नेमका काय संवाद?अजित पवार-आम्ही पण सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जातो.श्रीजीत पवार-मला जे वाटलं ते मत मी मांडलं दादा.अजित पवार-अहो, बरोबर आहे. पण मी माळी समाजाला जिल्हा परिषदेची उमेदवारी सुपे गटातून दिली आहे. ती जागा ओबीसी प्रवर्गासाठी राखी होती. असं असतानाही इतर पक्षांनी वेगळे उमेदवार दिले. मात्र त्या पद्धतीने आपण केलं आहे.श्रीजीत पवार-ठीक आहे दादा, तुम्हाला जो योग्य वाटतो, तो निर्णय घ्या.अजित पवार-ओके.दरम्यान, "शेवटच्या क्षणापर्यंत सर्व जातीतील समाज घटकाला सोबत घेऊन जाण्याची दादांची भूमिका अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी जपली, हे या संवादातून स्पष्ट होतं," असं श्रीजीत पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं आहे.
14 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 03:48 AM
प्रादेशिक पारपत्र कार्यालयाने एजंटची हेराफेरी रोखण्यासाठी उपाययोजना राबवल्या

प्रादेशिक पारपत्र कार्यालयाने एजंटची हेराफेरी रोखण्यासाठी उपाययोजना राबवल्या

एजंटांचा सुळसुळाट रोखण्यासाठी उपाय पासपोर्ट काढताना एजंटांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, अपॉइंटमेंट प्रणाली, ओपन हाऊस उपक्रम राबविले जात आहेत. यामुळे नागरिकांना थेट कार्यालयात मार्गदर्शन मिळत आहे. पासपोर्ट काढण्याची सुलभ प्रक्रिया ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा अपॉइंटमेंटनुसार वेळेवर सेवा कागदपत्रांची तपासणी जलद गतीने पोलिस पडताळणीसाठी समन्वयायामुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचत असून, प्रक्रिया अधिक पारदर्शक झाली आहे.
6 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 03:47 AM
उत्साह आणि गोलंदाजीचा प्रभाव वाढवण्यासाठी एम. सी. सी. ने कसोटी क्रिकेटचा नवा नियम आणला

उत्साह आणि गोलंदाजीचा प्रभाव वाढवण्यासाठी एम. सी. सी. ने कसोटी क्रिकेटचा नवा नियम आणला

Test Cricket New Rule: क्रिकेटचे नियम बनवणारी संस्था मेलबर्न क्रिकेट क्लब (एमसीसी) ने २०२६ साठी नवीन कायदे नियम जाहीर केले आहेत. या कायद्याअंतर्गत क्रिकेटचे अनेक नियम बदलण्यात आले आहेत, ज्यामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये मोठा बदल झाला आहे. एमसीसीने कसोटी क्रिकेटमध्ये एक नियम बदलला आहे, ज्यामुळे या फॉरमॅटमध्ये अधिक उत्साह निर्माण होईल. क्रिकेटमधील बरेचसे नियम फलंदाजधार्जिणे असतात असे बोलले जाते. पण हा नवा नियम गोलंदाजी संघाला मदतनीस ठरू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये नियमात मोठा बदल मेलबर्न क्रिकेट क्लबच्या नियम १२.५.२ नुसार, दिवसाच्या शेवटच्या षटकात विकेट पडल्यास कसोटी क्रिकेटमध्ये दिवसाचा खेळ थांबवला जाणार नाही. सामान्यतः दिवसाच्या शेवटच्या षटकात विकेट पडल्यास, त्या वेळी दिवसाचा खेळ थांबवला जायचा. त्यानंतर फलंदाजी करणारा संघ दुसऱ्या दिवशी त्यांच्या रणनीतीनुसार फलंदाजाला मैदानात उतरवायचा. पण आता एमसीसीच्या नियमांनुसार, शेवटच्या षटकात विकेट पडल्यास, सामना त्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत चालू राहील. यामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सामन्यावर नियंत्रण मिळविण्यात किंवा विरोधी संघावर दबाव आणण्यास मदत होईल. म्हणजेच मेलबर्न क्रिकेट क्लब (एमसीसी) च्या नवीन कायद्यानुसार, जर कसोटी सामन्यात दिवसाच्या शेवटच्या षटकात विकेट पडली, तर खेळ तिथेच थांबणार नाही, शेवटचा षटक पूर्ण होईपर्यंत खेळ सुरू राहील. MCC has today announced its new edition of the Laws of Cricket for 2026, which will come into force from 1 October.The new edition is the first to be published since 2022.Read more -https://t.co/rWJJZgLnoLpic.twitter.com/VnPgTEoiUx महिला क्रिकेटमध्येही झाला बदल एमसीसीच्या नवीन नियमांनुसार, महिला क्रिकेट आणि ज्युनियर क्रिकेटमध्ये (१३ वर्षांखालील) वापरल्या जाणाऱ्या चेंडूमध्ये मोठा बदल होणार आहे. आतापर्यंत महिला क्रिकेटमध्ये चेंडूचे वजन १४० ते १५१ ग्रॅम दरम्यान होते आणि आकार २१-२२.५ सेमी होता, परंतु नवीन नियमांनुसार, आता चेंडूचे वजन १४० ग्रॅम ते १४९ ग्रॅम दरम्यान असेल आणि त्याचा आकार २१.५ ते २२ सेमी असेल. आतापर्यंत, ज्युनियर क्रिकेटमध्ये (१३ वर्षांखालील) वजन १३३-१४४ ग्रॅम होते आणि आकार २०.५-२२ सेमी होता. परंतु नियमांमध्ये बदल झाल्यानंतर, वजन १४०-१४४ ग्रॅम आणि आकार २०.५-२१ सेमी असेल.
96 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 03:45 AM
अपघाताच्या आधी अजित पवारांचा शेवटचा फोन आला होता उघडकीस

अपघाताच्या आधी अजित पवारांचा शेवटचा फोन आला होता उघडकीस

बारामती - उपमुख्यमंत्रीअजित पवारयांनी अपघातापूर्वी कार्यकर्त्याला केलेला अखेरचा कॉल रेकॉर्ड समोर आला आहे. अपघाताच्या दिवशी सकाळी ८ वाजून ३७ मिनिटांनी दादांचा हा अखेरचा कॉल कार्यकर्त्याला आला होता. हा कॉल रेकॉर्ड बारामतीत पत्रकार परिषद घेतराष्ट्रवादी काँग्रेसच्यापदाधिकाऱ्यांनी ऐकवला. विमानातून लँडिंग होण्यापूर्वी अजितदादांचं कार्यकर्त्यासोबत बोलणे झाले होते. कार्यकर्त्याने केलेल्या मेसेजला अजितदादांनी कॉल करून उत्तर दिले होते असंअजित पवारांशीशेवटचा संवाद साधणारे श्रीजित अरविंद पवार यांनी सांगितले. श्रीजित पवार हे अजित पवारांचे नात्याने चुलत पुतणे लागतात. श्रीजित यांनी अजितदादांना जिल्हा परिषदेच्या उमेदवार निवडीबाबत मेसेज केला होता. हा मेसेज अजितदादांनी बारामतीला विमान आल्यानंतर जेव्हा लँडिंग होणार होते. तेव्हा रेंज येताच वाचला. त्यानंतर लगेच अजित पवारांनी श्रीजित यांना कॉल केला. याबाबत श्रीजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं की, अजितदादा कायम कामासाठी तत्पर असायचे. सातत्याने काम करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यानुसार माझा मेसेज पाहिल्यानंतर ८.३७ मिनिटांनी कॉल माझ्या नंबरवर आला होता. हा त्यांचा शेवटचा कॉल होता असं त्यांनी सांगितले. अखेरच्या कॉलवर अजितदादांनी सर्व जातीधर्माला मी सोबत घेऊन जातोय आणि आपण सगळे एकत्र राहतोय. सगळ्यांना न्याय देण्याचं आपण नक्की काम करू. तू निवांत राहा असं दादांनी म्हटलं. १ मिनिटांचा हा कॉलवरील संवाद होता असं श्रीजित यांनी सांगितले. हा कॉल रेकॉर्ड ऐकवण्याचा मुद्दा एवढाच की एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याने मेसेज केला तरीही दादा तत्परतेने त्यांना कॉल करत होते. फ्लाईटमध्ये असतानाही जसे त्यांना रेंज मिळाली त्यांनी हा कॉल केला असं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं. अखेरच्या कॉलवर दादा काय बोलले? अजितदादा - तुम्हाला माहिती नसते, काय नसते..आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा.. कार्यकर्ता - नाही, दादा मला जे वाटले ते तुमच्याशी बोललो अजितदादा - माहिती आहे, पण तसं नाही, माळी समाजाला मी सुपे गटातून उमेदवारी दिलेली आहे. तिथे ओबीसींचे आरक्षण होते. बाकीच्यांनी दिले नाही. इतर पक्षांनी दुसरेच दिलेत, आपण तसे केले नाही. कार्यकर्ता - चालेल, दादा तुम्हाला जो योग्य वाटतो तो निर्णय घ्या अजितदादा - ठीक आहे, ओके... दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेसाठी अजित पवार बारामतीला येणार होते. सकाळी मुंबईहून खासगी विमानाने अजित पवार बारामतीला निघाले. मात्र हे विमान बारामतीत लँडिंग होताना त्याचा अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह ४ जणांचा दुदैवी मृत्यू झाला. पण सकाळी ८ वाजून ३७ मिनिटांनी अजितदादांनी कॉलवर कार्यकर्त्याशी संवाद साधला. त्यानंतर ८ वाजून ४६ मिनिटांनी त्यांच्या विमानाचा अपघात झाला.
39 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 4, 2026, 03:44 AM
राजकीय सहभागामुळे मुंबईच्या बेलासीस उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीला विलंब

राजकीय सहभागामुळे मुंबईच्या बेलासीस उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीला विलंब

सुशांत मोरे, मुंबई :पूर्णपणे तयार होऊन सज्ज असलेल्या मुंबईतील काही महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आता महापौर-उपमहापौर आल्यानंतरच करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे सर्व कामे पूर्ण होऊनही केवळ राजकीय नेत्यांच्या अट्टाहासामुळे महत्त्वाचा असा बेलासिस उड्डाणपूल विलंबानेच वाहनचालकांच्या सेवेत येणार आहे.मुंबई सेंट्रलस्थानकानजीक रेल्वे मार्गावरील ब्रिटिशकालीन बेलासिस उड्डाणपूल धोकादायक जाहीर झाल्यानंतर त्याच्या पुनर्बांधणीचे काम महापालिकेने हाती घेतले. या पुलाच्या बांधकामाचा कार्यादेश सप्टेंबर २०२४मध्ये देण्यात आला. प्रत्यक्ष कामाला १ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरुवात झाली होती. महानगरपालिका पूल विभाग व रेल्वे विभागाचे अभियंते पहिल्या दिवसापासूनच पुलाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील होते. तयासाठी संपूर्ण कामाची विभागणी करून नियोजन करण् यात आले. कामकाजाचची कालमर्यादा निश्चित करण् यात आली. तसेच, कोणत् याही परिस्थितीत कालमर्यादा पाळली जाईल, याची दक्षता अभियंत् यांनी घेतली. त्यानुसार ताडदेव-नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणारा बेलासिस पूल २० जानेवारी २०२६ रोजी म्हणजे अवघ्या १५ महिने सहा दिवसांत पूर्ण झाला. निविदा अटी-शर्तीनुसार या उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यासाठी एप्रिल २०२६ची मुदत होती. मात्र हे काम मुदतीपूर्वीच पूर्ण झाले.Mumbai Local: लोकल तिकिट काढणं होणार अधिक सुलभ, रेल्वे स्थानकांवर 325 नवे ATVM बसवणार; कुठे-कसा होणार फायदा?यापुलाचे उद्घाटन२६ जानेवारीला करण्याचे नियोजन होते. मात्र मुंबईला महापौर-उपमहापौर मिळाल्यानंतरच त्यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्याचे नियोजन आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ११ किंवा १२ फेब्रुवारीला महापौर निवडणूक होण्याची शक्यता आहे, तोपर्यंत हा पूल उदघाटनाच्या प्रतीक्षेत राहणार आहे.Pune News : वाहतूक कोंडीतील दीड तास वाचणार, थेट हिंजवडीपासून मुंबईला बस सेवा, एसटी विभागाच्या हालचालीवाहतूककोंडी कमी होण्यास मदतदक्षिण मुंबईतील जहांगीर बोमन बेहराम मार्गावरील (पूर्वीचे बेलासिस रोड) बेलासिस पूल हामुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेव या भागांना लोहमार्गावरून पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. बेलासिस पुलाच्या पुनर्बाधणीमुळे दोन वर्षांपासून बाधित झालेली पूर्व-पश्चिम वाहतुकीची सुविधा पुन्हा सुरू होणार आहे. बेलासिस पूल कार्यान्वित झाल्यावर जहांगीर बोमन बेहराम मार्ग (पूर्वीचे बेलासिस रोड), दादासाहेब भडकमकर मार्गावरील (ग्रॅण्ट रोड), विशेषतः पठे बापूराव मार्ग व महालक्ष्मी स्थानक पुलावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
70 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 03:42 AM
एक छप्पर संकुलः महामंडळ विभाग आणि सेवांसाठी एक केंद्र

एक छप्पर संकुलः महामंडळ विभाग आणि सेवांसाठी एक केंद्र

सर्व विभाग एका छताखाली येणार या ठिकाणी 6 ते 18 मजल्यांच्या चार इमारती आहेत. प्रत्येक इमारतीला 3 तळघरे (बेसमेंट) आहे. येथे नागरी सेवा केंद्र, बहुउद्देशीय हॉल, ई-गव्हर्नन्स सेंटर, ग््रांथालय, क्लिनिक, वाचनालय, प्रदर्शन हॉल, संग््राहालय, बहुउद्देशीय हॉल, भव्य सहभागृह, पत्रकार कक्ष असणार आहे. नगरसेवक संख्या वाढ लक्षात घेऊन भव्य सभागृह व दालने उभारण्यात आले आहे. चारचाकी 479 आणि दुचाकी 2 हजार 713 वाहने पार्क करता येईल, असे वाहनतळ असणार आहे. एकूण 16 लिफ्टची सुविधा असणार आहे. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर इमारत असल्याने ती नागरिकांसह, नगरसेवक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोईस्कर ठरणार आहे. चिंचवड मेट्रो स्टेशनही जवळच असणार आहे. एकाच इमारतींमध्ये महापालिकेचे सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी बसू शकतील, अशी क्षमता आहे. सर्व विभागांचे कामकाज येथून चालणार असल्याने सर्व विभाग एका छताखाली येणार आहेत. विविध विभागांत एकूण 2 हजार 689 अधिकारी व कर्मचारी बसू शकतील इतकी आसन व्यवस्था असणार आहे. अजितदादांचा पुतळा सिटी सेंटरच्या जागेत नवीन महापालिका भवनासमोर दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा पुतळा असणार नाही, तर डी मार्टशेजारी असणाऱ्या खाणीच्या जागेत तो पुतळा उभारण्याचे नियोजन आहे. पुतळ्याची उंची 22 मीटर इतकी असणार आहे. त्या भोवती आकर्षक विद्युत रोषणाईने सुशोभीकरण केला जाणार आहे. तसेच कारंजे असणार आहेत. त्या कामासाठी स्वतंत्र निविदा काढली जाणार आहे. त्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली आहे. त्यामुळे त्या जागेत उभारण्यात येणारा सिटी सेंटर हा आंतराष्ट्रीय व्यापारी संकुल प्रकल्प रद्द केला जाऊ शकतो.
20 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 4, 2026, 03:41 AM
पुणे जिल्ह्यात नकार मिळाल्यानंतर प्रेयसीची माजी जोडीदाराची हत्या

पुणे जिल्ह्यात नकार मिळाल्यानंतर प्रेयसीची माजी जोडीदाराची हत्या

श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड: प्रियकराच्या सततच्या त्रासाला कंटाळून प्रेयसीने आपला मुलगा आणि त्याच्या मित्राच्या मदतीने प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणात उत्तर चाकण पोलिसांनी तब्बल 20 दिवसांच्या तपासानंतर तिघा आरोपींना अटक केली असून, दारूच्या बाटल्या आणि सिगारेटच्या आधारे गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे.त्रासाला कंटाळून हत्यामुंजा धोंडीबा नरहरे(वय 25) याचे उषा नानासाहेब चव्हाण (वय 40, विवाहित) हिच्याशी गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मुंजा उषाला बेदम मारहाण करत होता आणि मानसिक व शारीरिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून उषा चव्हाण हिने पुण्यात कामानिमित्त आलेल्या आपला मुलगा निखिल नानासाहेब चव्हाण (वय 21) याच्याकडे आपली व्यथा मांडली. ती स्वतः चाकण येथे मुलाकडे आली. प्रियकराकडून होणाऱ्या मारहाणीची माहिती दिल्यानंतर उषा चव्हाण आणि तिचा मुलगा निखिल यांनी मुंजा नरहरेची हत्या करण्याचा कट रचला. या कटात निखिलचा मित्र स्वप्नील नरहरी पारधी यालाही सहभागी करून घेण्यात आले.Ajit Pawar: दिवंगत अजित पवार यांच्याशी संबंधित विषयावर बारामतीत माध्यमांशी संवाद साधला जाणार7 जानेवारी रोजी उषा चव्हाण हिने मुंजा नरहरे यालाचाकणमध्ये भेटण्यासाठी बोलावलं. गंगाखेड येथून मुंजा चाकणला आल्यानंतर निखिल आणि स्वप्नील यांनी दुचाकीवरून त्याला सोबत घेतलं. त्यानंतर खराबवाडी येथील मद्यविक्री दुकानातून दारूच्या बाटल्या खरेदी करून बिरदवाडी येथील ओढ्याजवळील निर्मनुष्य ठिकाणी दारू पार्टी करण्यात आली. दारू पित असतानाच निखिल आणि स्वप्नील यांनी मुंजा नरहरेवर कोयत्याने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली. ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचा चेहरा दगडाने ठेचून विद्रूप करण्यात आला.दारुच्या बाटल्या अन्...ही घटना घडल्यानंतर 11 जानेवारी रोजी त्या परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती उत्तर चाकण पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तपास सुरू केला; मात्र आरोपींनी मृताची ओळखपत्रे आणि मोबाईल काढून घेतल्याने सुरुवातीला कोणताही ठोस पुरावा हाती लागत नव्हता. तरीही पोलिसांनी हार न मानता सीसीटीव्ही फुटेज आणि परिसरातील कंपन्यांमधील कामगारांकडे कसून चौकशी सुरू ठेवली. पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असताना घटनास्थळी आढळलेल्या दारूच्या बाटल्या आणि सिगारेटच्या आधारे पोलिसांनी खराबवाडी येथील मद्यविक्री दुकानांमध्ये चौकशी केली.Trimbakeshwar Nagar Parishad: 'स्वीकृत'साठी तब्बल सव्वा कोटीची बोली! त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत पैशांचा खेळ, सामंजस्याने कमाई?7 जानेवारी रोजी पहाटे सहाच्या सुमारास तिघेजण दारूच्या बाटल्या खरेदीसाठी आल्याचे स्पष्ट होताच तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली. पुढील तपासात गुन्ह्यात वापरलेली दुचाकी निखिलच्या मित्राची असल्याचेही निष्पन्न झाले. या संपूर्ण हत्येचा कट उषा चव्हाण आणि तिचा मुलगा निखिल यांनी रचल्याचे स्पष्ट झाले असून, उत्तर चाकण पोलिसांनी उषा चव्हाण, निखिल चव्हाण आणि स्वप्नील पारधी या तिघांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
85 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 4, 2026, 03:38 AM
अमेरिका-भारत व्यापार करारः ऐतिहासिक कराराला मंजुरी देण्यात सर्जियो गोरची भूमिका

अमेरिका-भारत व्यापार करारः ऐतिहासिक कराराला मंजुरी देण्यात सर्जियो गोरची भूमिका

Who's Behind US-India Trade Deal:भारत आणि अमेरिकेतील सूर पुन्हा एकदा जुळू लागले आहेत. अमेरिकेने प्रथम भारतावर 25 टक्के बेसिक टॅरिफ लादला आणि नंतर रशियन तेल खरेदीचा हवाला देत अतिरिक्त 25 टक्के टॅरिफचा बोजा लादला ज्यामुळे भारतीय आयातींवरील एकूण कर 50% झाला. यामुळेदोन्ही देशांमधील संबंधांमध्ये कटुतानिर्माण झाली, पण आता अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत.भारत-अमेरिकेतील व्यापार करारामागील सूत्रधार कोण?जगातील दोन बड्या अर्थव्यवस्थांमधील सर्वात मोठ्या करारामागील सूत्रधार भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर असल्याचे म्हटले जात आहे, ज्यांनी महिन्याभरापूर्वीच भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून पदभार स्वीकारला होता आणि एका महिन्यातच वर्षभरापासून रखडलेला करार मार्गी लावला. चला जाणून घेऊया सर्जियो गोर कोण आहे.कोण आहेत सर्जिओ गोरअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे आणि विश्वासू सहकारी मानले जाणारे सर्जियो गोर यांनी याआधी व्हाईट हाऊसच्या प्रेसिडेंशियल पर्सनल ऑफिसचे संचालक म्हणून काम केले होते. भारत-अमेरिका संबंधांमध्ये टॅरिफ आणि व्यापार मुद्द्यांवरून तणाव वाढत असताना ट्रम्प यांनी गोर यांची भारतीय दूतावासात नियुक्ती केली.एका महिन्यापूर्वीच पदभार सांभाळलासर्जियो गोर यांनी 12 जानेवारी 2026 रोजी भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून पदभार स्वीकारला होता आणि त्यानंतर लगेचच भारत-अमेरिकेत सर्व काही ठीक आहे आणि व्यापार चर्चा सुरू असल्याचे सांगितले होते.सुरुवातीपासूनच सकारात्मक दृष्टिकोनपदभार स्वीकारण्यापूर्वीच गोर यांनी ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक खास भेट पाठवली - दोन्ही नेत्यांचा स्वाक्षरी केलेला फोटो, ज्यामध्ये ‘श्री. पंतप्रधान, तुम्ही महान आहात’ असा संदेश लिहिलेला होता. ट्रम्प यांनी युक्रेन युद्धात भारतावर रशियाला मदत केल्याचा आरोप केला आणि शुल्क वाढवण्याची धमकी दिली असली तरी, गोर सुरुवातीपासूनच सकारात्मक राहिले. पदभार सांभाळण्याच्या पहिल्याच दिवशी आपल्या संबोधनात गोर यांनी दोन्ही देश व्यापारात सक्रियपणे गुंतले असल्यावर भर दिला आणि अलीकडेच जाहीर झालेला व्यापार करार या वचनाची पुष्टी करतो.अमेरिकेबाहेर जन्म30 नोव्हेंबर 1986 रोजी उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे सर्जियो गोर यांचा जन्म झाला. त्यावेळी उझबेकिस्तान सोव्हिएत युनियनचा भाग होता, पण गोर तरुण असतानाच त्यांचे कुटुंब माल्टाला स्थायिक झाले. येथे त्यांनी कॅथोलिक मुलांच्या शाळेत असलेल्या डे ला सॅले कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.किती शिकलेले आहेत सर्जिओ गोर1999 मध्ये सर्जिओ आपल्या कुटुंबासह अमेरिकेला पोहोचले, जिथे त्यांनी लॉस एंजेलिसमधील हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि नंतर जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केले. शिक्षणादरम्यान गोर राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले असून त्यांचे पालक रशियन वंशाचे आहेत आणि त्यांच्या आईकडे इस्रायली नागरिकत्व आहे.डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू अन् जवळचे व्यक्ती2020 मध्ये सर्जियो गोर यांनी ट्रम्प व्हिक्टरी फायनान्स कमिटीचे चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम केलेले. जो बायडन यांच्याकडून ट्रम्प यांच्या पराभवानंतरही ट्रम्प यांच्याशी संपर्कात राहिले. त्यांनी ट्रम्प यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांच्यासोबत एका प्रकाशन गृहाची सह-स्थापना केली, ज्याने ट्रम्पची अनेक सर्वाधिक विक्री होणारी पुस्तके प्रकाशित केली आहेत.
66 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 03:36 AM
मंदार शिंदेः दिग्दर्शकापासून चालकापर्यंत-उद्योगाला शाप?

मंदार शिंदेः दिग्दर्शकापासून चालकापर्यंत-उद्योगाला शाप?

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक म्हणजेकेदार शिंदे.याचकेदार शिंदेंचेभाऊ सुद्धा एकेकाळी सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वात सक्रीय होते. त्यांचं नाव मंदार शिंदे. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना मंदार यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या की आज त्यांच्यावर ड्रायव्हिंग करण्याची वेळ आली आहे. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला. काय म्हणाले? केदार यांच्याविषयी काय म्हणाले मंदार शिंदे? मंदार शिंदे हे शाहीर साबळे यांचे नातू आणि केदार यांचे भाऊ आहेत. मंदार शिंदे म्हणाले, ''मी जर चांगला दिग्दर्शक नसतो तर इतक्या मालिका मी स्वतः दिग्दर्शित केल्या, ज्या चॅनलला टेलिकास्ट होत होत्या. TRP उच्च होते, ते श्रेय फक्त कलाकारांचं आहे? त्या कॅमेराच्या मागचा दिग्दर्शक नव्हता? रागही येतो पण सांगायचं कोणाला? मी सध्या एका व्यापाराकडे ड्रायव्हिंगचा जॉब करतो. सुरुवातीला थोडं वाईट वाटलं पण मला माझं घर चालवायचं आहे. मला करावं लागलं.'' ''आपल्या इंडस्ट्रीला आजही हा शाप आहे की, कंपू आहेत. कलाकार कितीही हुशारीचा असला, चांगलं काम करत असला तरीही त्याला द्यायचं नाही. म्हणजे इथे घरातूनच काम मिळत नाही तर बाहेरच्यांकडे काय मागू?'', असा भावुक खुलासा मंदार शिंदेंनी केला.
54 shares
😢