Achira News Logo
Achira News
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 10:17 AM
महाराष्ट्रात महसुली कामांना विलंब झाल्याने नागरिकांचे आंदोलन

महाराष्ट्रात महसुली कामांना विलंब झाल्याने नागरिकांचे आंदोलन

या आंदोलनाद्वारे सातबारा उतारा दुरुस्ती, फेरफार नोंद, वारस नोंद यांसह विविध महसूल कामांमध्ये होत असलेली दिरंगाई, तसेच नागरिकांना कराव्या लागणाऱ्या वारंवार चकरा याकडे लक्ष वेधण्यात आले. शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान” या योजनेचा अधिक प्रभावी प्रचार व अंमलबजावणी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
65 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 10:12 AM
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दुचाकीस्वार आढळला

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दुचाकीस्वार आढळला

गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वरई फाटा उड्डाणपुलाच्या गुजरात मार्गिकेवरून एक दुचाकीस्वार गुजरातच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. दरम्यान, उड्डाणपुलाच्या उतारावरील वांद्री नदी पुलाच्या वळणावर त्याचे दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट पुलावरून चाळीस फूट खोल वांद्री नदीच्या पात्रात कोसळली. अपघातात दुचाकीस्वाराला दुखापत झाली.
71 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 10:10 AM
गुडी पाडव्याच्या पूर्वसंध्येला सद्गुरु मच्छिंद्रनाथाच्या समाधीला भाविकांची गर्दी

गुडी पाडव्याच्या पूर्वसंध्येला सद्गुरु मच्छिंद्रनाथाच्या समाधीला भाविकांची गर्दी

Crowds of devotees at Machhindranath Fort आष्टी, पुढारी वृत्तसेवाआष्टी तालुक्यातील सावरगाव जवळ गर्भगिरी पर्वतरांगांमध्ये वसलेल्या मच्छिंद्रनाथ गड येथे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला लाखो भाविकांनी उपस्थित राहून सद्गुरु मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. नवनाथांपैकी एक असलेल्या मच्छिंद्रनाथ यांच्या या पवित्र स्थळावर महाराष्ट्रासह देशभरातून भक्तांचा जनसागर लोटला होता. वर्षातून केवळ एकदाच दर्शनासाठी खुली होणारी ही संजीवन समाधी पाहण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसरापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. दुचाकी व चारचाकी वाहनांचा मोठा ओघ दिवसभर सुरू होता. या पार्श्वभूमीवर अंभोरा पोलीस ठाण्याचे पीआय मंगेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिस्तबद्ध नियोजनामुळे कोणतीही अनुचित घटना न घडता भाविकांना शांततेत व सुरळीतपणे दर्शन घेता आले. दरम्यान, आमदार सुरेश धस यांच्या नियोजनामुळे यंदा दर्शन प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली. काही पारंपरिक रूढींमध्ये आवश्यक बदल करून दर्शन लवकर खुले केल्याने प्रत्येक भाविकाला समाधीचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले. आष्टी येथील सद्गुरु सेवेकरी मंडळाच्या वतीने सुमारे ५० हजार भाविकांसाठी महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. दाल-खिचडी, बुंदीचे पाकीट व पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच बेलगाव येथील गाई मंदिर ट्रस्टतर्फे गेल्या १४ वर्षांप्रमाणे यंदाही सायंकाळी चहा-बिस्किटांची व्यवस्था करण्यात आली. सद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज की जय, अलख निरंजन आदेश अशा जयघोषांनी गड परिसर दुमदुमून गेला होता. आतिषबाजी आणि रोषणाईमुळे गड उजळून निघाला. या भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे भाविकांना आध्यात्मिक समाधानाची अनुभूती लाभली.
95 shares
😊
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 10:05 AM
अपव्ययासाठी भारत सरकारच्या विकासात्मक खर्चाची छाननी सुरू

अपव्ययासाठी भारत सरकारच्या विकासात्मक खर्चाची छाननी सुरू

स्थानिक नागरिकांच्या मते, शासनाकडून विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो; मात्र नियोजनाचा अभाव व देखभाल नसल्यामुळे हा पैसा वाया जात आहे. दुभाजकांवर पुन्हा रंगरंगोटी करून तात्पुरता देखावा निर्माण केला जात असला तरी मूळ समस्या कायम आहे. तसेच, रस्त्यांच्या सिमेंटीकरण डांबरीकरणनंतर अल्पावधीतच विविध कामांसाठी पुन्हा खोदकाम करण्यात आल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत.
43 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 10:03 AM
फ्लोरिडाच्या माणसाने अनवधानाने स्वतःला कॅमेऱ्यात कैद केल्यानंतर तो व्हायरल झाला

फ्लोरिडाच्या माणसाने अनवधानाने स्वतःला कॅमेऱ्यात कैद केल्यानंतर तो व्हायरल झाला

पेटने ट्विटवर हा व्हिडिओ शेअर केला असून तो म्हणतो, 'हाय मी पाल्म बीच बेट. माझा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने मी माझी I-95 चालवत असताना अचानक व्हिडिओ शूट केला. मला काही कळालेच नाही. दुसऱ्या दिवशी माझ्या लक्षात आलं की मी आता एक व्हायरल सेन्सेशन झालो आहे. माझा फोन हा तब्बल चार तास डाऊन होता. मला माझा फोन असंख्य कमेंट्स आणि त्या व्हिडिओने भरला होता. मला चांगलाच भाव मिळाला आहे. हे खूप भन्नाट आहे थँक यू.'
13 shares
😊
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 10:03 AM
सध्या सुरू असलेल्या सुरक्षेच्या चिंतांमध्ये अपघातानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी त्वरित प्रतिसाद दिला

सध्या सुरू असलेल्या सुरक्षेच्या चिंतांमध्ये अपघातानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी त्वरित प्रतिसाद दिला

अपघात होताच प्रशासन सतर्क सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून, घटनेची माहिती मिळताच आयपीएस व्यंकटरमन, तहसीलदार श्रीकांत निळे, तसेच सहायक पोलिस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
77 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 10:02 AM
पूर्णा पोलीस ठाण्याच्या परिसरात चोरांना पकडले, अटक आणि तपास सुरू

पूर्णा पोलीस ठाण्याच्या परिसरात चोरांना पकडले, अटक आणि तपास सुरू

पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील १३ ते १६ मार्च दरम्यान दोन जबरी चो-यांचे गुन्हे घडले होते.त्यातील गुन्हेगारांचा कसून तपास घेत ५ चोरटे पकडून जेरबंद केले.त्यांकडील चोरीतील ६ दुचाकी,११ मोबाईल हस्तगत करत जप्त केले आहेत.सदर आरोपीस विद्यमान न्यायालयाने पोलीस कस्टडी सुनावली आहे.त्याच बरोबर रेल्वे स्थानक परिसरात चोरट्यांचा वावर होत आहे का? यावर शोध लावण्यासाठी रेल्वेचे जि आर पी पोलिस आणि लोकल पोलीस कर्मचारी मिळून गोपनीय पद्धतीने तपास सुरु असतो.
34 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 20, 2026, 10:02 AM
IPL 2026: दुखापतीमुळे प्रमुख खेळाडू संघाबाहेर

IPL 2026: दुखापतीमुळे प्रमुख खेळाडू संघाबाहेर

मुंबई :आयपीएल 2026 ला काही दिवस बाकी असताना दुखापतींचे ग्रहण खेळाडूंच्या मागे लागलं आहे. आयपीएल 2026 येत्या 28 मार्चपासून सुरू होणार आहे मात्र त्याआधीच अनेक संघांमधील महत्त्वाचे खेळाडू दुखापती असल्याने संपूर्ण स्पर्धेमधून बाहेर पडत आहेत तर काही खेळाडू काही सामन्याला मुकणार आहेत. दुखापती खेळाडूंमध्ये असे काही खेळाडू आहेत ज्यांच्यावर संघाची प्लॅनिंग अवलंबून होती. मात्र तेच आता नसलेले पुन्हा एकदा नव्याने संघ बांधणी करावी लागणार आहे. या स्पर्धेआधी नेमके कोणते खेळाडू जखमी झालेत आणि कोणते उपलब्ध नाहीत जाणून घ्या.हर्षित राणा (कोलकाता नाईट रायडर्स)या यादीमध्ये पहिल्या स्थानावर भारतीय संघाचा स्टार खेळाडू हर्षित राणा आहे. हर्षद रानाला 4 फेब्रुवारीला मुंबई झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी ट्वेन्टी सामन्याच्या सर्व दरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे तो वर्ल्डकपलाही मुकलेलाच पण आता यंदाचा आयपीएल सीझन बाहेर राहणार आहे. त्यामुळे केकेआर साठी हा मोठा धक्का मानला जात आहे.इराण, इस्रायल आणि अमेरिका संघर्षाचा परिणाम क्रिकेटविश्वावर; चेंडूंचा तुटवड्यामुळे मॅच होणार की नाही? अपडेट समोरमथिशा पथिराना (कोलकाता नाईट रायडर्स)केकेआर ने 18 कोटी रुपयांना श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाज आपल्या संघात घेतले होते मात्र नेमका खेळणार की नाही याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.Suryakumar Yadav : लग्नानंतर बायकोचा एक प्रश्न काळजाला भिडला, त्यानंतर सूर्यकुमार टीम इंडियाचा थेट कॅप्टन झाला; संपूर्ण प्रवास जाणून घ्यामिचेल स्टार्क (दिल्ली कॅपिटल्स)आयपीएल मध्ये स्टार्क सुद्धा सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. आगामी वन डे वर्ल्ड कप च्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया दवाखान्या गोलंदाजांबाबत थोडासा सावध पवितत्रा घेत आहे.IND vs PAK World Cup : वर्ल्ड कप 2026 मध्ये पुन्हा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने, क्रिकेटनंतर हॉकीमध्ये हाय व्होल्टेज सामना, हेड टू हेडमध्ये कोणाचं पारडं जड?नॅथन एलिस (चेन्नई सुपर किंग्स)सीएसकेसाठी डेथ ओव्हर स्पेशलिस्ट असलेला नॅथन एलिस हा दुखापतीमुळे संपूर्ण सीजन उपलब्ध नसणार आहे. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी 19 मार्चलाच याबाबत माहिती दिली.सॅम करन (राजस्थान रॉयल्स)राजस्थान आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झालेल्या ट्रेड डील मध्ये सीएसकेमधून राजस्थानच्या ताफ्यात दाखल झालेला इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएलमधून बाहेर पडला आहे.जॅक एडवर्ड्स (सनरायजर्स हैदराबाद)आयपीएल लिलाव २०२६ च्या लिलावात सनरायजर्स हैदराबादने ३ तीन कोटी रुपयांना घेतले. मुजरा पाहायचं दुखापतीमुळे तोही खेळू शकणार नाही, त्यामुळे आयपीएलचे पदार्पण लांबले आहे.World Cup 2026 : वर्ल्ड कप जिंकताच पहाटेच्या गाडीने पत्नीसोबत मुंबई गाठणाऱ्या शिवम दुबेने सांगितलं कारण, Video समोरपॅट कमिन्स (सनरायजर्स हैदराबाद)सनरायजर्स हैदराबाद संघाचा कर्णधार पॅट कमिन्स हा आयपीएलचे सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाहीत कारण तो दुखापती मधून सावरत आहे. आताच पार पडलेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधून आहे त्याला बाहेर राहू लागला होता. कमिन्स च्या जागी ईशान किशन हा कर्णधार असणार आहे.जोश हेझलवुड (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)गेल्या वर्षी RCB ला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा हेझलवुड, अजूनही एका दुखापतीतून सावरत आहे ज्यामुळे त्याला चार महिने खेळापासून दूर राहावे लागले होते. तो IPL 2026 च्या सुरुवातीच्या टप्प्यातील सामन्यांना मुकणार आहे.लॉकी फर्ग्युसन (पंजाब किंग्स)न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन हा देखील पंजाब किंग्स संघासाठी IPL 2026 च्या सुरुवातीच्या टप्प्यातील सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. नुकताच पिता बनलेला फर्ग्युसन, स्पर्धेच्या उत्तरार्धात कदाचित PBKS संघात सामील होण्यापूर्वी, आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याला प्राधान्य देणार आहे.
23 shares
😢
P
Pudhari
Mar 20, 2026, 09:58 AM
निष्काळजीपणामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण झाल्याने कालबाह्य झालेल्या वस्तूंचे नुकसान

निष्काळजीपणामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण झाल्याने कालबाह्य झालेल्या वस्तूंचे नुकसान

अग्रवाल लाइफस्टाइल परिसरात मोठ्या प्रमाणावर कुटुंबे राहत असल्यामुळे या निष्काळजीपणामुळे सार्वजनिक आरोग्यावर मोठा धोका निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेला सर्व एक्सपायर्ड माल वसई येथे नेऊन नष्ट करण्यात आला, जेणेकरून त्याचा पुन्हा वापर होऊ नये.
71 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 09:57 AM
शिक्षण आणि रोजगार उपक्रमांसाठी सरकारी मंजुरी निधी

शिक्षण आणि रोजगार उपक्रमांसाठी सरकारी मंजुरी निधी

आगामी काळात 60 वस्तीगृहांची उभारणी करावयाची असून यामध्ये सत्तावीस हजार विद्यार्थी राहतील अशी व्यवस्था होईल अशी माहिती दिली डॉक्टर आंबेडकर यांच्या पीपल एज्युकेशन सोसायटीच्या विविध ठिकाणच्या इमारतींची नव्याने बांधणी व दुरुस्तीसाठी शासनाने 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यामधून विविध ठिकाणची कामे केली जातील असे जाहीर केले याप्रसंगी अनुसूचित जाती जमाती मधील 189 लोकांना समाज कल्याण खात्यात नोकरी देण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली चवदार तळे कामासंदर्भात येत्या पंधरा दिवसात कामाला सुरुवात होऊन पुढील फेब्रुवारी पूर्वी ही सर्व कामे पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त केला ऐतिहासिक महाडला आगामी काळात देशाच्या नकाशावर उंचावर नेण्याचे काम करणार असून महाड प्रमाणेच बिहारमधील बौद्धगया येथे जाणाऱ्या भीमभक्त अनुयायांसाठी स्थानिक शासनाकडून दहा एकर जागा प्राप्त झाल्यास त्या ठिकाणी भीम अनुयायांसाठी होस्टेल बांधण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखविला.
63 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 20, 2026, 09:53 AM
उज्जैनमध्ये अपघातात दोघांचा मृत्यू; इतर दोघे गंभीर जखमी

उज्जैनमध्ये अपघातात दोघांचा मृत्यू; इतर दोघे गंभीर जखमी

जितेंद्र खापरे, नागपूर :उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या कारचा मध्यप्रदेशातील ढाकना गावाजवळ भीषण अपघात होऊन कामठी आणि नागपूरातील मामा-भाच्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या अपघातात अन्य दोघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कामठी आणि नागपूर परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये शुभम जयस्वाल (२८, रा. रनाळा, कामठी) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्याचा मामा पारस कनोजिया (३५, रा. मानकापूर, नागपूर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात अमन जयस्वाल (२६) आणि जतिन कनोजिया (३४) हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी भोपाळ येथे हलविण्यात आले आहे.कार पालटलीमिळालेल्या माहितीनुसार, अमन, जतिन, पारस आणि शुभम हे चौघेजण उज्जैनजवळील नलखेडा परिसरातील बगलामुखी मंदिराचे दर्शन घेऊन नागपूरकडे परतत होते. गुरुवारी सकाळी बैतूल आणि हरदा जिल्ह्यांच्या सीमेवरील ढाकना गावाजवळील हरई परिसरात त्यांच्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्यावर पलटी झाले.कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगरप्राथमिक तपासात चालकाला झोपेचा झटका आल्याने हा अपघात घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अपघातानंतर मागून येणाऱ्या टवेरा वाहनाचे चालक अंकित तिवारी (रा. कल्याणपूर, बैतूल) यांनी तत्परता दाखवत जखमींना कारमधून बाहेर काढले. त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात मदत केली. जखमी अमन जयस्वाल यांनी सांगितले की, “मी आणि शुभम मागील सीटवर झोपलो होतो, तर पारस गाडी चालवत होता.” त्यानंतर झालेल्या अपघातात शुभमचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी पारस यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.Raj Thackeray : 'महाराष्ट्र नेक्स्ट' वेबसाईट नेमकी काय आहे? राज ठाकरेंनी पाडवा मेळाव्यात सविस्तर सांगितलंअमन यांचा हात फ्रॅक्चर झाला असून जतिनची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कामठी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून स्थानिक नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे. शुभम जयस्वाल यांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्याताब्यातदेण्यात आला आहे.तपास सुरुदरम्यान, या अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून वाहनाचा वेग, चालकाची स्थिती आणि रस्त्याची परिस्थिती यांचा सखोलतपासकेला जात आहे.
91 shares
😢
P
Pudhari
Mar 20, 2026, 09:52 AM
भारतीय तृतीयपंथीय मान्यता विधेयकामुळे एल. जी. बी. टी. क. + कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली

भारतीय तृतीयपंथीय मान्यता विधेयकामुळे एल. जी. बी. टी. क. + कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली

विधेयकात ‌‘ट्रान्सजेंडर व्यक्ती‌’ची व्याख्या संकुचित करण्यात आली आहे. इंटरसेक्स आणि ट्रान्स ओळखी एकत्र केल्याने अनेकांच्या स्वतंत्र ओळखी नाकारल्या जात आहेत. तसेच, स्व-ओळखीचा अधिकार काढून घेऊन केवळ हिजरा, किन्नर, अरावणी किंवा जोगती अशा विशिष्ट गटांनाच मान्यता देण्याचा प्रयत्न होत असल्याचे कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
73 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 09:51 AM
घाऊक विक्रेत्यांची कपात करत भारतीय शेतकऱ्यांनी कृषी-पर्यटनाचे नवीन मॉडेल वापरून पाहिले

घाऊक विक्रेत्यांची कपात करत भारतीय शेतकऱ्यांनी कृषी-पर्यटनाचे नवीन मॉडेल वापरून पाहिले

बहुतेक शेतकरी आपला माल घाऊक व्यापाऱ्यांना विकतात. मात्र थेट ग्राहकांना शेतात बोलावून विक्री केल्यामुळे शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल. आणि पर्यटनालाही चालना मिळणार आहे. घोसाळे किल्ल्याच्या परिसरात होणारा हा प्रयोग जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी कृषी-पर्यटनाचा एक नवीन आदर्श ठरू शकतो.
49 shares
😊
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 20, 2026, 09:44 AM
अध्यक्षांच्या अचानक राजीनाम्यानंतर एच. डी. एफ. सी. बँकेच्या कॉर्पोरेट प्रशासनाची छाननी सुरू

अध्यक्षांच्या अचानक राजीनाम्यानंतर एच. डी. एफ. सी. बँकेच्या कॉर्पोरेट प्रशासनाची छाननी सुरू

मुंबई:एचडीएफसी बँक सध्या चर्चेत आहे. अतानु चक्रवर्ती यांच्या अचानक राजीनाम्यामुळे बँकेच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बँकेने केकी मिस्त्री यांची अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. बँकेचे सध्याचे डीएमडी, कैझाद भरुचा यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित झाले आहे. मिस्त्री यांनी असेही म्हटले आहे की भरुचा यांना अधिक जबाबदाऱ्या दिल्या जातील. त्यांनी सांगितले की बँकेच्या संघटनात्मक रचनेचा आढावा घेतला जात आहे आणि भरुचा यांना लवकरच अतिरिक्त जबाबदाऱ्या दिल्या जातील.शुक्रवार, 20 मार्च रोजी भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली असली तरी, एचडीएफसी बँकेचे शेअर्स दबावाखाली राहिले. शेअरचा भाव सुमारे ₹780 ते ₹790 पर्यंत घसरला. अध्यक्षांच्या अचानक राजीनाम्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेली चिंता या घसरणीतून दिसून येते.कैझाद भरुचा यांचा एचडीएफसी बँकेतीलप्रवास जवळपास तीन दशकांचा आहे. वाणिज्य शाखेचे पदवीधर असलेल्या भरुचा यांनी 1983 मध्ये एसबीआय कमर्शियल अँड इंटरनॅशनल बँकेतून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली, परंतु 1995 मध्ये ते एचडीएफसी बँकेत रुजू झाले. तेव्हापासून ते बँकेतच कार्यरत आहेत. भरुचा सध्या बॅलन्स शीट ॲसेट व्यवसायाचे काम पाहतात आणि संचालक मंडळ व व्यवस्थापन स्तरावर उच्च पदावर आहेत.जानेवारी 2026 मध्ये, भारतीय रिझर्व्ह बँकेने भरुचा यांच्या पुनर्नियुक्तीला मंजुरी दिली. ते एप्रिल 2026 पासून पुढील तीन वर्षांसाठी बँकेचे पूर्ण-वेळ संचालक म्हणून काम पाहतील. बँकेच्या सर्वात जास्त काळ सेवा केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक असलेल्या भारुचा यांना बँकेच्या कामकाजाची सखोल माहिती आहे. गेल्या दशकात कैझाद भरुचा यांच्या कार्यक्षेत्राचा सातत्याने विस्तार झाला आहे, यावरून त्यांच्या सामर्थ्याचा अंदाज लावता येतो. 2014 मध्ये, त्यांची प्रथम कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांच्याकडे होलसेल बँकिंग तसेच इन्व्हेस्टमेंट बँकिंगची जबाबदारी सोपवण्यात आली. 2023 मध्ये, त्यांना उपव्यवस्थापकीय संचालक पदावर पदोन्नती मिळाली, जे पद पाच वर्षांपासून रिक्त होते. उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाल्यावर, त्यांनी रिटेल बँकिंगची जबाबदारीही स्वीकारली, जी यापूर्वी राहुल शुक्ला यांच्याकडे होती.सध्या, भरुचा केवळ बँकेच्या मुख्य कामकाजावरच देखरेख करत नाहीत, तर एचडीएफसी लाईफ आणि एचडीएफसी सिक्युरिटीज यांसारख्या उपकंपन्यांच्या संचालक मंडळावरही कार्यरत आहेत, ज्यामुळे संपूर्ण एचडीएफसी परिसंस्थेवरील त्यांची पकड अधिक मजबूत होत आहे. एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेच्या ऐतिहासिक विलीनीकरणादरम्यान एकीकरण समितीचे सह-अध्यक्ष म्हणून भरुचा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता, बँक नेतृत्वाच्या संकटाचा आणि घसरणाऱ्या शेअर किमतीचा सामना करत असताना, भरुचा यांची भूमिका 'संकटमोचका'ची झाली आहे.
29 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 09:44 AM
भारतातील टी. डी. आर. प्रक्रियेला गती देण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे आदेश

भारतातील टी. डी. आर. प्रक्रियेला गती देण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे आदेश

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी यापूर्वीच टीडीआर प्रक्रियेला गती देण्यासाठी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, प्रस्तावाच्या टप्प्यांची संख्या कमी करणे, तांत्रिक अडचणी दूर करणे आणि निश्चित कालमर्यादेत प्रकरणे निकाली काढणे यावर भर देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात प्रस्ताव दाखल झाल्यानंतर विधी विभागाकडून 45 दिवसांत कायदेशीर बाबींची पूर्तता केली जाणार आहे. त्यानंतर त्रुटी दुरुस्तीसाठी 90 ते 120 दिवसांचा कालावधी निश्चित करण्याचा विचार आहे. दुसऱ्या टप्प्यात भूमी अभिलेख विभागाकडून होणारी मोजणी वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी सुरुवातीपासूनच सहभागी होण्याचा पर्याय तपासला जात आहे. या सर्व प्रक्रियेसाठी एसओपी तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यानुसार बांधकाम विभागाने पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
1 shares
😐
P
Pudhari
Mar 20, 2026, 09:43 AM
शिवसेना गटाने शोभा यात्रेदरम्यान स्वातंत्र्यसैनिक आणि पौराणिक कथा सादर केल्या

शिवसेना गटाने शोभा यात्रेदरम्यान स्वातंत्र्यसैनिक आणि पौराणिक कथा सादर केल्या

शिवसेना दक्षिण मुंबई उबाटा गटातर्फे ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थांची झाडाखाली बसलेली अतिशय विलोभनीय प्रतिमा साकारली होती. शोभा यात्रेच्या मार्गावर स्वामींचा चित्ररथ येताच श्री स्वामी समर्थांच्या नावाचा जयघोष सुरू झाला होता. शोभायात्रेदरम्यान सावरकर भगतसिंग यासारख्या स्वातंत्र्यवीर आणि पौराणिक कथांवर आधारित सुंदर चित्ररथ देखावे साकारण्यात आले होते.
70 shares
😊
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 20, 2026, 09:40 AM
महाराष्ट्रात इंधन दरवाढः मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे भारत त्रस्त

महाराष्ट्रात इंधन दरवाढः मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे भारत त्रस्त

Fuel Price Hike Maharashtra 2026:मिडल-ईस्टमधील युद्धामुळे तेल आणि गॅसचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इराणमध्ये आखाती देशांमधील ऊर्जा पुरवठ्यांना लक्ष्य केले ज्याचा भारताला सर्वात मोठा धक्का बसताना दिसत आहे. मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात आता महागाईचा भस्मासुर डोकं वर काढताना दिसत आहे.घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरांमध्ये वाढ झाल्यावर भारतात पेट्रोल आणि डिझेलच्यादरात वाढ होण्यास सुरुवात झालीआहे. तेल कंपन्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये स्पीड आणि पॉवर या सर्व प्रीमियम पेट्रोल ब्रँड्सच्या दरात प्रति लिटर 2.09 रुपयांनी वाढ केली आहे.West Asia Conflict: सागरी संकटात भारताचे ‘सुरक्षा’ कवच, निर्यातदारांना सरकारकडून 497 कोटींची ‘RELIEF’ संजीवनीची घोषणापुणेकरांच्या खिशाला युद्धाची झळतेल कंपन्यांनी प्रीमियम पेट्रोलचा भाव वाढवल्यावर आता पुण्यात आजपासून पेट्रोलचे दर वाढले आहेत. गॅसच्या पाठोपाठ प्रीमियम पेट्रोलच्या दरातही वाढ करण्यात आली आहे, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य पुणेकरांच्या खिशावर होणार आहे.इंधन विक्रेत्यांच्या माहितीनुसार हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे ‘Power’ आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे ‘XP95’ यांसारख्या ब्रँडेड प्रीमियम पेट्रोलचे दर प्रति लिटर सुमारे 2.09 रुपयांनी वाढले आहेत. अशाप्रक्रारे, या प्रीमियम पेट्रोलचा दर, जो यापूर्वी प्रति लिटर सुमारे 111.68 रुपये होता, आता वाढून अंदाजे 113.77 रुपये प्रति लिटर झाला आहे.Rupee Crash: अमेरिकेसमोर रुपयाची अजूनही दयनीय अवस्था; बाजार उघडताच रुपी अबकी बार 93 वर ; 1 डॉलर = 92.92 रुपये!पेट्रोलच्या किमती वाढण्याचे कारण कायमध्य पूर्वेतील वाढता तणाव शुक्रवारी, 20 मार्च पासून लागू होणाऱ्या प्रीमियम पेट्रोलच्या दरवाढीचे मुख्य कारण आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा तेलाच्या बाजारपेठेवर थेट परिणाम झाला असून जसजशी परिस्थिती बिघडत आहे, तसतशी तेल पुरवठ्याबद्दल चिंता वाढत आहे, ज्यामुळे तेलाच्या दरात सतत चढ-उतार होत आहेत.Oil Supply: 'होर्मुझ' कोंडीनं अमेरिकेत हाहाकार; ट्रम्प इराणवरील 'तेल निर्बंध' हटवण्याच्या विचारातपश्चिम आशिया युद्धाचा तेल पुरवठ्यावर परिणामजगातील तेलाचा मोठा हिस्सा होर्मूझमधून जात असताना इराणने या जलमार्गावर नाकाबंदी केली आहे. अशा स्थितीत, या जलमार्गावरील अडथळ्याचा पुरवठ्यावर परिणाम होत आहे, ज्याचा फटका भारतासह अनेक देशांना बसत आहे.अशा परिस्थितीत, मध्यपूर्वेतील तणाव असाच सुरू राहिल्यास येत्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती आणखी भडकण्याची शक्यता असून या दरवाढीची झळ थेट सर्वसामान्यांच्या खिशालाही बसेल.
37 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 09:35 AM
जागतिक इंधन-ऊर्जा संकटः सहा देशांनी इराणच्या होरमुझच्या सामुद्रधुनीतील अडथळ्याचा निषेध केला

जागतिक इंधन-ऊर्जा संकटः सहा देशांनी इराणच्या होरमुझच्या सामुद्रधुनीतील अडथळ्याचा निषेध केला

Todays Maharashtra Breaking News Live Updates in Marathi:अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना कूटनीतीने उत्तर देत, इराणने होर्मुझ सामुद्रधुनी रोखल्याने अनेक देशांमध्ये इंधन-ऊर्जासंकट निर्माण झालं आहे. याची गंभीर दखल घेऊन ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स आणि जपान हे सहा देश एकत्र आले असून त्यांनी इराणला तंबी दिली आहे. युद्धाच्या झळा कमी होण्याची चिन्हं नसताना, इस्रायलने अमेरिकेला युद्धात ओढल्याचा दावाबेंजामिन नेतन्याहूयांनी फेटाळून लावला आहे. या युद्धामुळे भारतात निर्माण झालेली एलपीजी टंचाई आणि गॅस सिलिंडरसाठी लागलेल्या रांगा काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र आहे. मात्र, व्यावसायिकांना सिलिंडरसाठी अजूनही आटापिटा करावा लागतोय. महाराष्ट्रात अशोक खरात लैंगिक छळ प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. त्याचे पडसाद विधिमंडळात उमटण्याची शक्यता आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातराज ठाकरेयांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारलाही टीकेचं लक्ष्य केल्यानं मनसे विरुद्ध भाजपा असा संघर्षही पाहायला मिळू शकतो. युद्ध आणि अमेरिकेतील अर्थकारण यामुळे कोसळलेला शेअर बाजार पुन्हा कधी आणि कसा सावरणार, याची काळजी गुंतवणूकरादांना आहे. दुसरीकडे, आयपीएलचे वारे वाहू लागले असून क्रिकेटचाहत्यांना रनसंग्रामाचे वेध लागले आहेत. या आणि अशा महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... LIVE जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव येथे काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. या गारपिटीचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला असून, एका शेतकऱ्याच्या तब्बल तीन एकर केसर आंबा बागेचे मोठे नुकसान झाले आहे. गारांच्या तडाख्यामुळे झाडांवरील बहुतांश आंबे खाली पडले असून, उरलेल्या फळांनाही गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण बाग होत्याची नव्हती झाल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्वतंत्र प्रभार असलेले केंद्रीय जयंत चौधरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. चौधरी यांच्या टीमकडून यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली. एका भारतीय मोबाईल क्रमांकावरून कॉल आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. Union MoS Jayant Chaudhary has received a death threat. Police have received a complaint from his team, and it is being examined. The threat call was made from an Indian number: Delhi Policepic.twitter.com/PG8ELpLqxi सातारा: जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत भाजपचे तोडफोडीचे राजकारण व 'ऑपरेशन लोटस' यशस्वी झाले. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिंदेसेनेचे ३५ चे बहुमत असतानाही भाजपाच्या तोडफोडीच्या राजकारणाने त्यांचा पराभव झाला. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष प्रिया शिंदे यांची आणि उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड झाली. विशेष म्हणजे प्रिया शिंदे या शिंदेसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. बीड जिल्ह्यातील अनेक भागांना अवकाळी गारपिटीचा जोरदार तडाखा बसला आहे. लिंबागणेश परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतातील कलिंगड, आंबा आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पोखरी घाट येथील शेतकरी दादासाहेब खिल्लारे यांच्या कलिंगड पिकाला सर्वाधिक फटका बसला असून, ऐन बहरात आलेले पीक पूर्णपणे वाया गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी जिल्हा परिषदेत आल्यानंतर केले आहे. या वक्तव्यामुळे भाजपला बाजूला ठेवून ही निवडणूक होणार असल्याची चर्चा साताऱ्यात रंगू लागली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अशोक खरात प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. रुपाली चाकणकर यांच्याविरोधात आता पक्षातीलच रुपाली पाटील ठोंबरे आक्रमक झाल्या आहेत. रुपाली पाटील ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर या फरार झाल्या असल्याचा दावा केला आहे. संपूर्ण राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा देण्यात आलेला असताना, धुळे शहरासह जिल्ह्यातही अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. साक्री तालुका आणि शिंदखेडा तालुक्यात गारपीट झाल्याने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या असून वादळी वाऱ्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके आडवी पडली आहेत. रुपाली चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. चाकणकर आणि खरात याचे आर्थिक संबंध होते. ईडीने चाकणकरांच्या उत्पन्न स्त्रोताची चौकशी केली पाहिजे. या प्रकरणात सहआरोपी करून चाकणकरांना अटक झाली पाहिजे. चाकणकरांच्या खरात याच्या गुन्ह्याची माहिती होती असा आरोप उद्धवसेनेच्या नेते सुषमा अंधारे यांनी केला आहे. सांगलीच्या खानापूर तालुक्यात झालेल्या गारपिटीचा फटका द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. तुफानी गारपिटीमुळे द्राक्षांचे घड अक्षरशः उध्वस्त झाले आहेत. भिवघाट, करंजे, बानूरगड, पळशीसह आसपासच्या गावांमध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. अशोक खरात प्रकरणावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. "गृहमंत्र्यांच्या बुडाखाली अंधार पसरलाय, वरपासून खालपर्यंत गृह विभागातील अधिकारी-कर्मचारी भोकं पाडून लुटायला बसलीत", असे सपकाळ म्हणाले. "देवेंद्र फडणवीस यांच्यातील गृहमंत्र्यांना आपल्या विभागावर वचक ठेवता येत नसेल तर त्यांनी रात्री अपरात्री हूडी घालून पोलिस स्टेशन्सच्या दौऱ्यावर निघायलाच हवे. हे वाचल्यानंतर हुडी घालून पंत दौऱ्यावर जाण्याचा विचार ही करतील कारण त्यांना आपल्या कलागुणांचा वापर करण्याची सवय आहेच. पण त्यांचेच हात या भ्रष्टाचारात जर बरबटलेले असले तर…? मुख्यमंत्री / गृहमंत्र्यांचीच जर या भ्रष्टाचारात टक्केवारी ठरली असेल तर भ्रष्टाचारमुक्त राज्य निर्माण करण्याची अपेक्षा तरी कोणाकडून ठेवायची?", असा सवाल सपकाळ यांनी केला आहे. जालना जिल्ह्यात काल ठिकठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. जिल्ह्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार काल दुपारनंतर ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला असून, जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दाभाडीसह धनसावंगी तालुक्यातील रांजणी या ठिकाणी गारांचा पाऊस झाला आहे. तर परतूर मंठा जालना शहरासह जाफराबाद तालुक्यात मुसळधार तर रिमझिम स्वरूपचा पाऊस पडला आहे. या पावसामुळे काढणीला आलेला गहू ज्वारी मका पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. "सर्वात आधी मी हे सांगू इच्छितो की, मी जिवंत आहे आणि तुम्ही सगळे यांचे साक्षीदार आहात. याचसोबत मी सर्व फेक न्यूज फेटाळून लावत आहे", असे विधान इस्रायल पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांनी केले. सोशल मीडियावर नेतन्याहू इराणच्या हल्ल्यात मारल्या गेल्याच्या चर्चा गेल्या आठवड्यात सुरू झाल्या होत्या. त्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या मृत्यूबद्दल सुरू झालेल्या चर्चांना उत्तर दिले. बीड जिल्ह्यात कालपासून अवकाळीने कहर केला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि गारांचा पाऊस. यामुळे फळबागा व शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.. बीड जिल्ह्यातील आष्टी, केज तालुक्यातील अनेक गावांमध्ये काल झालेल्या गारपिठीमुळे डोंगरदऱ्यामध्ये गारांचा खच पाहायला मिळत आहे.तब्बल दोन ते तीन इंच गारांचा खच पडल्याचे दिसून येत आहे. यांचे व्हिडिओ आता समोर आले आहेत. नाशिकमधील भोंदू अशोक खरात यांची कृत्ये समोर आल्यानतर राज्यात खळबळ उडाली आहे. विशेषतः रुपाली चाकणकर यांचे या खरातसोबत चांगले संबंध असल्याची चर्चा आहे. चाकणकर आणि खरात यांचे अनेक फोटो व्हायरल झाले असून, त्यातील काही फोटो शेअर करत अंजली दमानियांनी रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
2 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 09:34 AM
आयपीएलमधील स्वतःचा विक्रम मोडण्याचे विराट कोहलीचे उद्दिष्ट

आयपीएलमधील स्वतःचा विक्रम मोडण्याचे विराट कोहलीचे उद्दिष्ट

इतकंच नाही, तर कोहलीसमोर यंदा मोठा विक्रम करण्याची संधीही आहे. IPLच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर असून त्याने 267 सामन्यांत 8661 धावा केल्या आहेत. या हंगामात तो 9000 धावांचा टप्पा पार करणारा पहिला खेळाडू बनू शकतो.
2 shares
😊
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 09:33 AM
सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या माध्यमातून अपुऱ्या सुविधांसाठी महानगरपालिकेची नवी उमेद

सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या माध्यमातून अपुऱ्या सुविधांसाठी महानगरपालिकेची नवी उमेद

या प्रकल्पांच्या उभारणीसाठी लागणारा खर्च मोठा असल्याने अनेक सुविधा पूर्णत्वास जाण्यास पाच ते सहा वर्षांचा कालावधी लागत होता. शिवाय, या जागांवर कोणती सुविधा उभारावी, यासाठी नगरसेवकांकडून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षांत उभारलेल्या सुविधांवर झालेला खर्च आणि त्यावर आकारण्यात येणारे भाडे यामुळे अनेक ठिकाणी या सुविधा वापराविना पडून राहिल्या आहेत. काही ठिकाणी सामाजिक संस्थांना संयुक्त प्रकल्पांतर्गत या जागा देण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांवर वापराबाबत निर्बंधही आले आहेत. परिणामी, कोट्यवधींचा खर्च करून उभारलेल्या सुविधा महापालिकेसाठी आर्थिक बोजा ठरत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सुमारे पाच वर्षांपूर्वी ‌‘ॲमेनिटी स्पेस‌’चा पीपीपी तत्त्वावर विकास करण्याचा प्रस्ताव प्रशासन आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी पुढे आणला होता. मात्र, 2008 च्या जागावाटप नियमावलीत अशा प्रकारच्या विकासाला परवानगी नसल्याने ती योजना विरोधामुळे अमलात येऊ शकली नाही. आता 2023 मध्ये नियमावलीत करण्यात आलेल्या बदलामुळे पीपीपी तत्त्वावर विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार, प्रत्येक जागेच्या स्वरूपानुसार कोणत्या सुविधा विकसित कराव्यात, याचे नियोजन करून सल्लागाराच्या मदतीने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
91 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 09:30 AM
रुग्णसंख्येत वाढ झाल्याने भारतातील सरकारी रुग्णालये भारावून गेली; डिजिटल उपायांची अंमलबजावणी

रुग्णसंख्येत वाढ झाल्याने भारतातील सरकारी रुग्णालये भारावून गेली; डिजिटल उपायांची अंमलबजावणी

त्यामुळे अनेक रुग्ण आता मोफत किंवा अल्पदरात उपलब्ध असलेल्या शासकीय उपचारांचा लाभघेण्याला प्राधान्य देताना दिसत आहेत. मात्र रुग्णसंख्या वाढल्याने सरकारी रुग्णालयांत ओपीडीसाठी गर्दी होते. त्यातून, ओपीडीसाठी नंबर लावण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना रांगेत उभे राहावे लागते. त्यामध्ये विशेषतः वृद्ध, दिव्यांग आणि लहान मुलांसह आलेल्या पालकांना विशेषतः त्रास सहन करावा लागतो. काहीवेळा केवळ नंबर लावण्यासाठीच तासनतास वाया जात असल्याने नागरिकांत नाराजीही व्यक्त होते. या साऱ्याचा विचार करून आरोग्य विभागाने ओपीडीसाठी नंबर लावण्यासाठी डिजिटल सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची शासकीय रुग्णालयांमध्ये अंमलबजावणीही सुरू झाली आहे.
30 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 09:29 AM
गुजरात चालकाने महाराष्ट्र पोलिसांचा पर्दाफाश केलाः दंड भरण्याऐवजी लाच मागितली

गुजरात चालकाने महाराष्ट्र पोलिसांचा पर्दाफाश केलाः दंड भरण्याऐवजी लाच मागितली

रस्त्याच्या कडेला कार थांबलेली आहे. बाजूलावाहतूक पोलीसउभा आहे. तो कारमधील माणसाजवळ येतो आणि त्यांच्या बोलणं सुरू आहे, असे सगळं दिसत असलेला एक व्हिडीओसोशल मीडियावरव्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाठीमागे उभ्या असलेल्या कारमधील लोकांनी चित्रित केला. व्हिडीओ शेअर करणाऱ्याने दावा केला की, सीट बेल्ट नसल्यामुळे पोलिसाने कार थांबवली. पण, त्याने थेट लाच मागितली. गुजरातच्या कार चालकाने सीमेवरमहाराष्ट्रपोलिसांना उघड पाडलं आहे. व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे की, सीटबेल्ट नसल्याने पोलिसांनी कार थांबवली. पण, त्याने ५०० रुपये देण्याची मागणी केली. त्यासाठी चालकाला चलनही दिले गेले नाही. Gujarat driver exposes Maharashtra cops at state border: stopped for no rear seatbelt (₹1000 fine), but cops demand ₹500 "compromise" cash, no official challan issued!pic.twitter.com/pWhJxZ2lBI एका यूजरने म्हटले आहे की, नक्कीच याची सीमेवर दारू पकडली गेली असेल, तेव्हा याने त्यांना उघड पाडलं. रोख रक्कम जिथे येते तिथे कायद्याचे राज्य संपते. एका यूजरने म्हटले आहे की, मला हे प्रत्येक टोल आणि नाक्यावर हफ्ता वसूल करताना दिसतात. हा व्हिडीओ इतर काही लोकांनीहीसोशल मीडियावरशेअर केला आहे. यावर पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.
7 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 09:29 AM
नाविन्यपूर्ण प्रणालीमुळे कृषी उत्पादन प्रक्रिया आणि संरक्षणात क्रांती

नाविन्यपूर्ण प्रणालीमुळे कृषी उत्पादन प्रक्रिया आणि संरक्षणात क्रांती

आयुर्वेदिक वनस्पतींवर प्रक्रिया करण्यासाठी ही प्रणाली विशेष उपयुक्त असून हॉटेल व औषध निर्मिती उद्योगांसाठीही आवश्यक सामग्री तयार करता येते. या प्रणालीवर आतापर्यंत 50 हून अधिक फळे, भाज्या, पालेभाज्या, औषधी वनस्पती तसेच विविध प्रकारच्या माशांवर यशस्वी प्रयोग करण्यात आले आहेत. या पद्धतीने प्रक्रिया केलेला शेतमाल 3 ते 12 तासांत सुकून सुमारे बारा महिन्यांपर्यंत सुरक्षितपणे साठवता येतो. नैसर्गिक पद्धतीने सुकवण्याच्या तुलनेत ही पेटंटेड प्रक्रिया सुमारे तीन पट अधिक कार्यक्षम असल्याचे संशोधक निनाद पाटील आणि निमिष राऊत यांनी सांगितले.
87 shares
😊
P
Pudhari
Mar 20, 2026, 09:24 AM
अशोकचा डी. आय. वाय. दृष्टीकोनः त्याच्या स्वप्नातील घरासाठी प्रेमाचे श्रम

अशोकचा डी. आय. वाय. दृष्टीकोनः त्याच्या स्वप्नातील घरासाठी प्रेमाचे श्रम

अशोक हे खरेतर शेतकरी व उन्हाळ्यात मजुरकर म्हणून काम करतात मात्र त्यांनी घरकुल मंजूर झाल्यावर विटांचा बंदोबस्त व्हावा व त्यासाठी निधीची अडचण येऊ नये यासाठी स्वतः हाताने विटा थापायला सुरुवात केली आहे. 20 हजार विटा तयार झाल्या असून यासाठी त्यांना 40 हजारांचा खर्च आला आहे. अशोक यांच्या पत्नीने यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे.
78 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 09:23 AM
दुःखाच्या दरम्यान किशोरवयीन मुलाचे धैर्य चमकतेः आईचा अचानक मृत्यू होऊनही 16 वर्षीय मुलीने घेतली परीक्षा

दुःखाच्या दरम्यान किशोरवयीन मुलाचे धैर्य चमकतेः आईचा अचानक मृत्यू होऊनही 16 वर्षीय मुलीने घेतली परीक्षा

सईचा तर दहावीचा शेवटचा पेपर होता. अशावेळी शिवडाव विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शेजारील नागरिकांनी तिला धीर दिला आणि दहावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर देण्याचे मानसिक बळ दिले. आईचा मृतदेह घरात असतानाही सई बुधवारी सकाळी परीक्षा केंद्रावर पोहोचली. साक्षी सावंत यांच्या आकस्मिक निधनाची माहिती मिळाल्यानंतर ओटोसवाडीसह संपूर्ण शिवडाव गावात शोककळा पसरली. त्यातच सई सावंतचा दहावीचा शेवटचा पेपर असल्याने शिवडाव विद्यालयाचे शिक्षक तातडीने तिच्या घरी पोहोचले. दहावीची परीक्षा सुरू असताना कु. सई हिला परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी नेहमी धावपळ व तिची तयारी करणारी आई आज घरात निपचित पडली होती. मात्र या प्रसंगातही अवघ्या १६ वर्षाची कु. सई ही धिराने उभी राहिली आणि परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचली.
74 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 09:20 AM
भारताने खरीप 2024 आणि रब्बी हंगामासाठी पीक विमा निधीला मंजुरी दिली

भारताने खरीप 2024 आणि रब्बी हंगामासाठी पीक विमा निधीला मंजुरी दिली

Pik Vima Yojana :पीक विमायोजनेबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. खरीप २०२४ आणि रब्बी हंगाम २०२४-२५ या वर्षातीलपीक विमायोजनेचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पूरक अनुदान" योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना- रब्बी हंगाम २०२४-२५ करिता ३५ लाख ९६ हजार २६० रुपये इतकी रक्कम वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर पीक विमा योजना- खरीप हंगाम २०२४ करिता ५ कोटी ८ लाख ५४ हजार ९५३ रुपये इतकी रक्कम वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने या दोन्ही बाबीसंदर्भात निर्णय घेण्यात आला असून यास मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार दोन शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आले आहेत. आता पात्र शेतकऱ्यांना लवकरच याचे वाटप केले जाणार आहे. यामध्ये संबंधित पात्र शेतकऱ्यांनी ज्या विमा कंपन्यांच्या माध्यमातुन पीक विमा काढला आहे. त्या कंपन्यांच्या माध्यमातून विमा वितरित केला जाणार आहे. यामध्ये भारतीय कृषि विमा कंपनी, चोलामंडलम एम.एस. ज. इं. कं., एचडीएफसी इर्गो ज. इं. कं. लि, आयसीआयसीआय लोंबार्ड ज. इं. कं., ओरिएन्टल इंन्शुरन्स कं. लि., रिलायन्स ज. इं. कं.लि., एसबीआय जनरल इंन्शुरन्स कं.लि., युनायटेड इंडिया इ. कं. लि., युनिव्हर्सल सोम्पो ज. इं. कं.लि. या विमा कंपन्यांचा समावेश आहे.
87 shares
😐
P
Pudhari
Mar 20, 2026, 09:20 AM
वडंगे ग्रामपंचायतीच्या अपुरी कचरा व्यवस्थापन पद्धतीवर टीका

वडंगे ग्रामपंचायतीच्या अपुरी कचरा व्यवस्थापन पद्धतीवर टीका

वडणगे ग्रामपंचायत प्रशासनाकडे कचरा डम्पिंगसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याने, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण होत नाही. तसेच कचऱ्याची वैधानिक विल्हेवाट लावण्यासाठी घनकचरा प्रकल्प नाही. स्थानिक प्रशासनाकडून हा कचरा गावाबाहेरील झाडवाट कुरण मंडळ येथील पूरप्रवण क्षेत्रात मोठ्या खड्ड्यात माती टाकून मुजवला जातो. यामुळे पंचगंगा नदीसह येथील शेती क्षेत्राला या कचऱ्यामुळे धोका निर्माण झाला असल्याच्या गंभीर प्रकाराकडे याचिकेतून न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. सोमवारी होणाऱ्या या याचिकेच्या सुनावणीकडे लक्ष लागले असून, न्यायालय यावर कोणते निर्देश देणार याबाबत उत्सुकता आहे.
14 shares
😢
L
Lokmat
Mar 20, 2026, 09:19 AM
सुरत रहिवाशाचे ए. टी. एम. मधून पैसे काढण्याचे दुःस्वप्नः एक 9 वर्ष जुना निराकरण न झालेला मुद्दा

सुरत रहिवाशाचे ए. टी. एम. मधून पैसे काढण्याचे दुःस्वप्नः एक 9 वर्ष जुना निराकरण न झालेला मुद्दा

सूरत - ATM मधून कॅश काढताना अनेकदा अकाऊंटमधील पैसे कट होतात, परंतु कॅश काढताना त्रास होतो. या परिस्थितीत जर तुम्हीबँकेततक्रार केली तर तुमच्या खात्यातून गेलेली रक्कम पुन्हा परत केली जाते. गुजरातच्या सूरत येथे राहणाऱ्या व्यक्तीसोबत ९ वर्षापूर्वी असाच प्रकार घडला होता. काय आहे प्रकार? १८ फेब्रुवारी २०१७ रोजी घडलेला हा प्रकार आहे. सूरतच्या उधना येथे राहणारा एक व्यक्तीएटीएममधूनपैसे काढण्यासाठी गेला. हे एसबीआयचंएटीएमहोते आणि या व्यक्तीचेबँकखाते बँक ऑफ बडोदामधील होते. त्याला एटीएममधून १० हजारांची रोकड काढायची होती. त्याने पिन वैगेरे टाकला परंतु एटीएममधून कॅश आली नाही मात्र त्याच्या बँक खात्यातून १० हजार कापल्याचा मेसेज आला. संबंधित ग्राहकाने याबाबत त्याच्या बँकेत अनेकदा तक्रार केली परंतु कुणीही फारशी दखल घेतली नाही. त्यामुळे ही तक्रार करून काही फायदा झाला नाही. बँकेने आपले हात वर करत व्यवहार झाला असून ग्राहकाला पैसे मिळाल्याचा दावा केला. बँकेने वारंवार पैसे देण्यास नकार दिल्यानंतर जतिन पटेल या ग्राहकाने माहितीच्या अधिकाराचा वापर केला. त्याने एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज आणि नोंदणी वही मागितली. फुटेजमधून एटीएममध्ये जतिनला कुठलीही कॅश मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले. तरीही बँकेने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर जतिनने ग्राहक न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. सूरतच्या ग्राहक तक्रार निवारण आयोगात हे प्रकरण दाखल झाले. सुनावणीनंतर कोर्टाने बँकेची चूक असल्याचे निदर्शनास आणले. बँकेने ग्राहकाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले शिवाय पुरावे मिळूनही त्याला पैसे न दिल्याचा ठपका बँकेवर ठेवला. बँकेला चूक महागात पडली आरबीआयच्या नियमानुसार, एटीएममधील ट्रान्झक्शन अयशस्वी झाल्यास बँकेला ग्राहकाच्या तक्रारीनंतर ५ दिवसांत पैसे परत करणे बंधनकारक असते. पैसे परत न दिल्यास बँकेला प्रतिदिन १०० रूपये दंड आकारला जातो. हे प्रकरण ९ वर्षापूर्वीचे असल्याने तक्रारीपासून ३२८८ दिवस पूर्ण झाले. त्यामुळे बँकेला प्रतिदिन १०० रूपये या हिशोबाने ३२८८ दिवसांसाठी ३ लाख २८ हजार दंड बसला आहे. त्याशिवाय १० हजाराच्या रक्कमेवर वार्षिक ९ टक्के व्याजही बँकेला द्यावे लागणार आहे. सोबतच ग्राहकाला झालेला मानसिक त्रास आणि कायदेशीर लढाईसाठी ५ हजारांचा दंड बँकेला ठोठावण्यात आला आहे.
74 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 09:19 AM
पुणे आणि पिंपरी-चिंचवाड स्पा केंद्रांवर मानवी तस्करीचे आरोप, कडक कायद्याचे आश्वासन

पुणे आणि पिंपरी-चिंचवाड स्पा केंद्रांवर मानवी तस्करीचे आरोप, कडक कायद्याचे आश्वासन

पिंपरी:पुणेआणि पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा आणि वेलनेस सेंटर्स’च्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापार आणि मानवी तस्करीचा मुद्दा बुधवारी (दि. १८) विधान परिषदेत आला. आमदार अमित गोरखे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे याकडे लक्ष वेधले. स्पा व्यवसायासाठी तीन महिन्यांत स्वतंत्र आणि कडक नियमावली लागू केली जाईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्रीयोगेश कदमयांनी दिले. आमदार गोरखे म्हणाले, शहरात शिक्षणासाठी येणारी तरुण पिढी स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रकारांत बरबाद होत आहे. हे केवळ स्पा नसून अंमली पदार्थ आणि मानव तस्करीचे अड्डे बनले आहेत.पोलिसकारवाई करतात, पण दोन दिवसांत तेच मालक नव्या नावाने सेंटर सुरू करतात.गृहराज्यमंत्रीयोगेश कदमम्हणाले, या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन समिती तयार केली आहे. नगरविकास आणि ग्रामविकास विभागाचा अहवाल लवकरच सादर होईल. पुढील तीन महिन्यांत नवीन नियमावली लागू केली जाईल. नायडू, पटेल, शेख, फकीर टोळी पिंपरी-चिंचवडमधील नायडू, पटेल, शेख, फकीर, अधिकारी, बांदोडकर अशा अनेक ठराविक लोकांची संघटित साखळी हा काळा बाजार चालवत आहेत. केवळ कर्मचाऱ्यांवर गुन्हे न नोंदवता, या मास्टरमाइंड्सच्या मालमत्तांची चौकशी करून त्यांच्यावर 'मकोका'अंतर्गत कठोर कारवाई करावी, स्वतंत्र नियमावलीची मागणीदेखील आमदार गोरखे यांनी केली.
76 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 09:15 AM
स्मार्ट मीटरच्या बिघाडामुळे मालवण धुडीवाडा येथील ग्राहकांसाठी अनपेक्षित वीजपुरवठा खंडित

स्मार्ट मीटरच्या बिघाडामुळे मालवण धुडीवाडा येथील ग्राहकांसाठी अनपेक्षित वीजपुरवठा खंडित

स्मार्ट वीज मीटरमुळे ग्राहकास फटका मालवण धुरीवाडा येथील स्नेहल मेथर यांनी आपल्या घरी बसविण्यात आलेल्या स्मार्ट वीज मीटरबाबत तक्रार मांडताना मागील महिन्याचे वीज बिल भरलेले असतानाही या महिन्यात अचानक २३३ रुपये भरावयाचे आहेत, असा मॅसेज मोबाईलवरून येऊन तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला, या महिन्याची वीज बिल देयक तारीख २० मार्च असतानाही त्यापूर्वीच चुकीच्या पद्धतीने वीज पुरवठा खंडित करण्यात आला, असे सांगत या प्रकारबाबत तीव्र संताप व्यक्त केला. याबाबत नितीन बाळके व इतर ग्राहकांनीही आवाज उठवत मेथर यांचा वीज पुरवठा तत्काळ सुरू करावा, अशी मागणी केली. यावर अभियंता श्री. म्हेत्रे यांनी याविषयी स्मार्ट वीज मीटरबाबतच्या आयटी विभागाशी संपर्क करून वीज पुरवठा सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नितीन वाळके म्हणाले, महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या प्रयत्नातून दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी ऊर्जा मित्र बैठक आयोजित केली जात असून वीज ग्राहकांनी आपल्या वीज समस्या ग्राहक पंचायतीकडे मांडव्यात, जेणेकरून बैठकीत त्यावर चर्चा करून वीज प्रश्न मार्गी लावता येतील, असे सांगितले.
68 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 09:14 AM
स्पष्टीकरणानंतर ठाण्यातील डॉक्टरांना महानगरपालिकेत नोंदणी करण्यापासून सूट

स्पष्टीकरणानंतर ठाण्यातील डॉक्टरांना महानगरपालिकेत नोंदणी करण्यापासून सूट

परिणामी डॉक्टरांना ठाणे मनपाकडे नोंदणीची आवश्यकता नसल्याचे सांगितले. त्यावर नगरसेवक आक्रमक होत, बोगस डॉक्टरांना पाठीशी घालण्याचा हा प्रकार आल्याचा आरोप प्रशासनावर करण्यात आला असून यावरून प्रशासनाची तारांबळ उडाली होती.
91 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 20, 2026, 09:13 AM
नवी दिल्लीतील दिवसाच्या प्रकाशात चोरांनी आईचे दागिने, पिशवी आणि फोन चोरले

नवी दिल्लीतील दिवसाच्या प्रकाशात चोरांनी आईचे दागिने, पिशवी आणि फोन चोरले

चोरी करणं हा गुन्हा आहे, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. चोरी केल्यास कडक शिक्षा होते. पण हे माहित असूनही काही लोक चोऱ्या करताना दिसतात. अशाच काही चोरांचा व्हिडिओ समोर आला आहे. एक महिला आपल्या मुलीला शाळेत सोडत होती. त्यावेळी चोरट्यांच्या टोळीनं तिला घेरलं आणि तिचे दागिने, बॅग आणि मोबाईल फोन हिसकावून घेतले. ही घटना रस्त्यावरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून आता हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य - @gajabhauX/X.com)कशी झाली चोरी?हा व्हिडिओ @gajabhauX या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शननुसार ही घटना नवी दिल्लीमध्ये घडली आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की, एक महिला आपल्या मुलीला शाळेच्या बसमध्ये बसवून घरी जात होती. त्याच वेळी चोरट्यांच्या टोळीनं तिला घेरलं. तिच्याकडील फोन, पैसे आणि दागिने हिसकावून घेतले आणि ते पळून गेले. लक्षवेधी बाब म्हणजे ही घटना भरदिवसा रस्त्यावर घडली.(फोटो सौजन्य - @gajabhauX/X.com)मदतीसाठी कोणीच पुढे आलं नाही​​हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी तीव्र टीका केली आहे. दिल्ली पोलिसांनी चोरट्यांना शोधून त्यांना शिक्षा करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, आसपास उभी असलेली लोकं काय करत होती, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. कारण या महिलेच्या मदतीसाठी कोणीच पुढे आलं नाही.(महत्वाची टीप - या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)
84 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 09:13 AM
उष्ण हवामानात थंड राहण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे

उष्ण हवामानात थंड राहण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे

गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे. शक्य त्या ठिकाणी पक्षी व प्राण्यांना योग्य त्या ठिकाणी पिण्याच्या पाणी ठेवण्यात यावे. नागरिकांसाठी पानपोईची व्यवस्था करावी. घर थंड ठेवण्यासाठी पडदे शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. तसेच, रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात. पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सूर्यप्रकाशाचा संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे. पहाटेच्यावेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. बाहेर कामकाज करीत असल्यास मध्ये मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा. गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी.
40 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 09:09 AM
चित्रपटाला भरघोस प्रतिसाद, प्रदर्शनाच्या दिवशी शोची विक्री

चित्रपटाला भरघोस प्रतिसाद, प्रदर्शनाच्या दिवशी शोची विक्री

प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद चित्रपटाला मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन दोन्हीकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्येच चित्रपटाने मोठी कमाई केली होती. रिलीजच्या दिवशी अनेक ठिकाणी हाऊसफुल्ल शो पाहायला मिळाले.
25 shares
😊
P
Pudhari
Mar 20, 2026, 09:05 AM
बिबट्या दिसल्याने भारतीय गावांमध्ये भीती आणि आर्थिक नुकसान होते

बिबट्या दिसल्याने भारतीय गावांमध्ये भीती आणि आर्थिक नुकसान होते

हातकणंगले तालुक्यातील कुंभोज, दानोळी, आळते, नेज, शिवपुरी, हिंगणगाव या गावांमध्ये बिबट्याचा वावर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याच्या हल्ल्यामुळे पाळीव जनावरे बळी ठरत आहेत. या प्रकारामुळे पशुपालनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
4 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 09:05 AM
संजू सॅमसनने टी-20 विश्वचषकात प्रभावी कामगिरी करत विक्रम मोडले

संजू सॅमसनने टी-20 विश्वचषकात प्रभावी कामगिरी करत विक्रम मोडले

वर्ल्डकपपूर्वी त्याचा फॉर्म फारसा चांगला नव्हता. त्यामुळं त्याला पहिले काही सामने बेंचवर बसावं लागलं. मात्र तो सुपर ८ फेरीत त्याला खेळण्याची संधी मिळाली. त्यानं या संधीचं सोनं केलं. सलग तीन मोठी अर्धशतके ठोकली. वेस्ट इंडीज विरूद्ध नाबाद ९७ धावा, सेमी फायनलमध्ये इंग्लंडविरूद्ध ८९ धावांची खेळी आणि फायनलमध्ये न्यूझीलंडविरूद्ध ८९ धावा करून त्याने भारताच्या वर्ल्डकप विजयात मोलाचा वाटा उचलला. संजू सॅमसनने फक्त ५ डावात ३२१ धावा ठोकल्या. त्याने एका टी २० वर्ल्डपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादी विराट कोहलीच्या ३१९ धावांच्या विक्रमाला मागे टाकले. तसेच त्याने एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम देखील सेट केला. त्यानं टी २० वर्ल्डकप २०२६ मध्ये तब्बल २४ षटकार मारले.
91 shares
😢
L
Lokmat
Mar 20, 2026, 09:04 AM
'धुरंधरः द रिव्हेंज पार्टी'मध्ये अभिनेत्री सौम्या टंडन रणवीर सिंगला मारण्याचा प्रयत्न करतानाचा व्हिडिओ व्हायरल

'धुरंधरः द रिव्हेंज पार्टी'मध्ये अभिनेत्री सौम्या टंडन रणवीर सिंगला मारण्याचा प्रयत्न करतानाचा व्हिडिओ व्हायरल

दिग्दर्शक आदित्य धरचा 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar: The Revenge) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सुसाट सुटला आहे.रणवीर सिंगआणिसारा अर्जुनयांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०२.५५ कोटींची ऐतिहासिक कमाई करत नवा विक्रम प्रस्थापित केला. या यश साजरं करण्यासाठी आयोजित केलेल्या 'सक्सेस पार्टी'मधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 'धुरंधर: द रिव्हेंज'ला प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतररणवीर सिंग, आदित्य धर, यामी गौतम आणि संपूर्ण टीमने एका शानदार पार्टीचे आयोजन केले होते. याच पार्टीत 'उल्फत हुसेन'ची भूमिका साकारणाऱ्या सौम्या टंडनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सौम्या टंडन गमतीने रणवीर सिंग आणि पार्टीत उपस्थित असलेल्या इतर लोकांना कानशिलात मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. वास्तविक, 'धुरंधर'च्या पहिल्या भागात सौम्याने अक्षय खन्नाला (रहमान डकैत) कानाखाली मारली होती. तर दुसऱ्या भागात तिने रणवीर सिंगच्या (हमजा अली मजारी) कानशिलात लगावल्याचे दृश्य आहे. सेटवर सौम्याच्या या 'कानशिलात' मारण्याच्या स्टाईलमुळे रणवीरने तिला गमतीने "स्लॅपिंग क्वीन" असा टॅग दिला आहे. सौम्या टंडनने तिच्या इंस्टाग्रामवर या पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये रणवीर सिंग 'FA9LA' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या पार्टीला कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा आणि अभिनेत्रीसारा अर्जुनयांनीही हजेरी लावली होती.
6 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 09:04 AM
भारत सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची घोषणा केली

भारत सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची घोषणा केली

देशातीलकापूसउत्पादक शेतकऱ्यांना केंद्रसरकारनेमोठा दिलासा दिला आहे.कापूसखरेदीसाठी भारतीय कापूस महामंडळाला (सीसीआय) १,७१८.५६ कोटी रुपयांचा निधी केंद्राने मंजूर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कापूस हंगाम २०२३-२४ साठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) व्यवस्थेला बळकटी देण्याच्या उद्देशाने ही मदत देण्यात आली आहे.बाजारातकापसाचे भाव कमी झाल्यास शेतकऱ्याकडून एमएसपी दराने कापूस खरेदी करण्यासाठी या निधीचा उपयोग केला जाणार आहे. अर्थात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही याची तरतूदसरकारनेया निधीच्या माध्यमातून केली आहे. आकडे◼️ कापूस लागवड (सन २०२३-२४) - ११४.४७ लाख हेक्टर.◼️ यावर्षी उत्पादनाचा अंदाज - ३२५.२२ लाख लाख गाठी.◼️ देशात सुमारे ६० लाख शेतकरी कापूस पिकावर अवलंबून आहेत.◼️ २५% उत्पादन जगातील एकूण उत्पादनाच्या तुलनेत. सीसीआयचे नेटवर्क◼️ कापसासाठी किमान आधारभूत किंमत लागू करण्याकरिता सीसीआयला केंद्रीय नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे.◼️ ११ प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये मजबूत खरेदी जाळे स्थापन केले असून, १५२ जिल्ह्यांमध्ये ५०८ हून अधिक खरेदी केंद्रे कार्यरत आहेत. निर्णयामुळे काय बदलणार?◼️ केंद्राच्या या निर्णयामुळे कापूस शेतकऱ्यांसाठी एमएसपी यंत्रणा अधिक प्रभावी होणार आहे.◼️बाजारातदर कोसळल्यासही शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागणार नाही, कारण सीसीआयकडून थेट खरेदी केली जाईल. अधिक वाचा:महसूलमधील महाघोटाळा; राज्यातील सुमारे दीड लाख शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यातच केला बदल
75 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 09:01 AM
शिक्षकांच्या'नो फ्लॉवर्स, लेट्स गिव्ह बुक्स'उपक्रमामुळे भारतातील साक्षरतेस चालना मिळाली

शिक्षकांच्या'नो फ्लॉवर्स, लेट्स गिव्ह बुक्स'उपक्रमामुळे भारतातील साक्षरतेस चालना मिळाली

'फूल नको, पुस्तक देऊया', असा संदेश देणारे शिक्षक जावेद तांबोळी यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचे औचित्य साधून चौकुळ नं. ४ मराठीवाडी शाळेचे शिक्षक जावेद तांबोळी यांनी आपल्या घरी पारंपरिक गुढीप्रमाणेच पुस्तके सजवून ही ज्ञानाची गुढी उभारली. सण-उत्सवांच्या माध्यमातून ज्ञानाचा वारसा पुढे जावा, हा उदात्त हेतू यामागे आहे. सलग तीन वर्ष तांबोळी गुरुजींनी हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवून वाचन चळवळीला बळ दिले आहे. मोबाईलमध्ये व्यग्र असलेल्या तरुण पिढीला पुन्हा पुस्तकांकडे वळवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
28 shares
😊
P
Pudhari
Mar 20, 2026, 09:00 AM
अतिरिक्त एफ. एस. आय. प्रीमियम देयकामुळे भारतीय महामंडळाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे

अतिरिक्त एफ. एस. आय. प्रीमियम देयकामुळे भारतीय महामंडळाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे

तसेच, यूडीसीपीआर नियमानुसार प्रीमियम भरून अतिरिक्त 35 टक्के एफएसआय बांधकाम परवानगी देताना दिला जातो. हा अतिरिक्त एफएसआय मिळवण्यासाठी विकासकाला जमिनीच्या दरानुसार प्रीमियम महापालिकेला भरावा लागतो. त्यापैकी 50 टक्के हिस्सा हा शासनाला द्यावा लागतो. त्यातून सन 2020-21 ते 9 मार्च 2026 अखेर एकूण 1 हजार 460 कोटी रुपये बांधकाम परवानगी विभागाला मिळाले. त्यापैकी सहा वर्षांत जमा झालेल्या उत्पन्नातून 730 कोटी रुपयांचा हिस्सा शासनाला द्यावा लागणार आहे. या दोन्ही बाबी मिळून महापालिकेला तब्बल 1 हजार 418 कोटी रुपये राज्य शासनाला द्यावे लागणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाने मुख्य लेखा व वित्त विभागाला कळविले आहे. प्रशासकीय काळातील उधळपट्टी, कर्ज, आणि दायित्वाचा वाढलेला डोंगर तसेच, लवाद प्रकरणातील मोठी देणी यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. तसे असताना आणखी 1 हजार 418 कोटींच्या खर्चाचा भार महापालिका तिजोरीवर येणार असल्यामुळे हे नवे आर्थिक संकट नव्या कारभाऱ्यांसमोर निर्माण झाले आहे.
10 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 08:59 AM
भारतीय संस्कृती आणि ज्योतिषशास्त्रात अनामिका बोटाचे महत्त्व

भारतीय संस्कृती आणि ज्योतिषशास्त्रात अनामिका बोटाचे महत्त्व

Ring Finger:भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये अनेक गोष्टींना महत्त्व आहे. डोक्याच्या केसांपासून ते तळपायापर्यंत मानवी शरीर अनेक गोष्टींसाठी महत्त्वाचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात यातील अनेक गोष्टींवरून व्यक्तिमत्व, स्वभाव, भविष्यातील घटना, गुण-दोष यांचा अंदाज बांधला जाऊ शकतो. आताच्या घडीला अनामिका बोटावरून चर्चा सुरू आहे. अनामिका म्हणजे नेमके कोणते बोट? ज्योतिषशास्त्रानुसार अनामिका बोटाचे महत्त्व काय आहे? अध्यात्मिकदृष्ट्या अनामिका बोटाची महती काय? जाणून घेऊया... हिंदू धर्मात अनामिका बोटाला अत्यंत पवित्र आणि सात्त्विक मानले जाते. या बोटाचा थेट संबंध 'सूर्य' ग्रहाशी असल्याने यश, कीर्ती आणि आत्मविश्वासाचे ते प्रतीक मानले जाते. धार्मिक पूजेत गंध, हळद-कुंकू लावणे, अक्षता वाहणे, पवित्रक धारण करणे, यासाठी हे बोट श्रेष्ठ मानले जाते. अनामिका म्हणजे नेमके कोणते बोट?नाम ओढण्यासाठी करंगळी वापरली जात नाही. शास्त्रांमध्ये कोणत्याही शुभ कार्यासाठी ती निषिद्ध मानली जाते. करंगळी शेजारी अनामिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बोटामुळे मानसिक शक्ती मजबूत होते. हे बोट सूर्य ग्रहाशी संबंधित आहे. शास्त्रांनुसार, या बोटाने देव, गुरू किंवा इतर कोणत्याही शुभ प्रसंगी टिळा लावावा. या बोटाने नाम लावल्याने मानसिक ऊर्जा वाढते आणि आज्ञाचक्र जागृत होते, ज्यामुळे व्यक्तीमध्ये एक नवीन ऊर्जा येते, अशीही मान्यता असल्याचे सांगितले जाते. नामिका बोटाची नस ही हृदयाशी जोडलेली असते असे म्हणतात की अनामिका बोटाची नस ही हृदयाशी जोडलेली असते. हे बोट हाताच्या सर्वात लहान बोटापेक्षा म्हणजे करंगळीपेक्षा थोडे लांब असते. सूर्याचे स्थान अनामिका बोटाच्या तळाशी आहे. सहसा हे बोट मधल्या बोटापेक्षा लहान असते. परंतु अनेक लोकांच्या हातात या बोटाची लांबी आणि आकार सामान्य बोटापेक्षा वेगळा असू शकतो.हस्तरेषाशास्त्रानुसार, अनामिका बोटाची लांबी, रुंदी, गोलाकारपणा आणि आकार पाहून आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि भविष्याबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकतो. कालिदासांनी अनामिका असे केले नामकरण कालिदास हे संस्कृतमधील सर्वश्रेष्ठ कवी. आपल्या करंगळीच्या बाजूच्या बोटाला अनामिका नाव पडण्यामागे कवि कालिदास कारणीभूत आहेत, असे मानले जाते. कारण, ज्या वेळेस विद्वानांच्या नावांची यादी करायची ठरली, तेव्हा पहिले नाव कालिदासाचे घेतले गेले, त्यानंतर त्यांच्या तोडीस तोड विद्वान कोणता याचा विचार होऊ लागला, पण तेवढी साहित्यिक ऊंची कोणाही साहित्यिकाला गाठता आली नाही, म्हणून ती यादी तिथेच थांबली आणि करंगळीच्या बाजूचे बोट विद्वानाच्या नावासाठी पारखे राहिले, म्हणून ती ठरली अनामिका! साखरपुड्याची अंगठी अनामिका बोटातच का घातली जाते? साखरपुड्यात वर आणि वधू एकमेकांना अंगठी घालतात. तुम्ही पाहिले असेल की, जेव्हा जोडपे एकमेकांना अंगठी घालतात तेव्हा ते हाताच्या चौथ्या बोटात म्हणजेच अनामिकामध्ये घालतात. प्राचीन इजिप्तमध्ये अंगठी घालण्याची सुरुवात झाली. त्यानंतर अंगठी घालण्याबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या, ज्या आजही सुरू आहेत. इजिप्शियन लोकांचा असा विश्वास होता की, लव्हर्स व्हेन नावाची एक रक्तवाहिनी माणसाच्या अनामिकेतून थेट हृदयात जाते. याचा अर्थ असा की, या बोटाची तार थेट हृदयाशी जोडली जाते. या कारणामुळे लोक या बोटात अंगठी घालू लागले.
84 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 20, 2026, 08:55 AM
सागरिका घाटगे आणि झहीर खान यांनी कुटुंब आणि मित्रांसमवेत गुढीपाडवा साजरा केला

सागरिका घाटगे आणि झहीर खान यांनी कुटुंब आणि मित्रांसमवेत गुढीपाडवा साजरा केला

अभिनेत्री सागरिका घाटगे आणि माजी क्रिकेटपटू झहीर खान यांनी गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला. त्याच्या या सेलिब्रेशनचे खास फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्यांच्या घरातील सणाची सजावट विशेष लक्ष वेधून घेणारी आहे. दरवाज्याला बांधलेले झेंडूच्या फुलांचे तोरण, गुढी उभारलेली पारंपरिक मांडणी आणि घरभर पसरलेला सणाचा आनंद या सगळ्यामुळे वातावरण अगदी उत्साहपूर्ण दिसत आहे.प्रवेशद्वाराजवळ केलेली रांगोळी आणि लावलेला दिवा यामुळे सणाची शोभा अधिकच खुलून आली आहे.या सुंदर दिवशी सागरिका घाटगेने यावेळी लाल रंगाची सुंदर साडी परिधान केली होती. सोनेरी काठ असलेल्या या साडीमध्ये तिचा लूक अत्यंत मोहक दिसत होता. हलका मेकअप, पारंपरिक दागिने आणि साधी हेअरस्टाइल यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडली होती. तिच्या या लूकने चाहत्यांचे विशेष लक्ष वेधले असून, सोशल मीडियावर तिच्या स्टाइलचे भरभरून कौतुक होत आहे. (फोटो सौजन्य :- @sagarikaghatge)लाल रंगाच्या साडीत सागरिका घाटगेलाल रंगाच्या साडीत सागरिका घाटगे अत्यंत सुंदर दिसत होती. तिच्या या लूकमध्ये पारंपरिकतेसोबतच एक खास एलिगन्सही पाहायला मिळाला. सोनेरी काठ असलेल्या लाल साडीने तिच्या सौंदर्यात चारचाँद लावले होते. साधा मेकअप, नाजूक दागिने आणि नीट बांधलेली हेअरस्टाइल यामुळे तिचा संपूर्ण लूक अधिकच उठून दिसत होता.सागरिकाने अतिशय साधेपणातही ग्लॅमरस लुक दाखवली.मोत्याच्या दागिन्यांनी पूर्ण केला लुकलाल रंगाच्या साडीसोबत सागरिका घाटगे हिने मोत्यांच्या दागिन्यांची निवड करत आपला लूक अतिशय देखणा आणि उठावदार केला. गळ्यातील नाजूक मोत्यांची माळ, कानातले साधे पण एलिगंट इयररिंग्स आणि हातातील मिनिमल अॅक्सेसरीज या सगळ्यामुळे तिच्या पारंपरिक लूकला एक क्लासिक टच मिळाला.मोत्यांचे दागिने नेहमीच सोज्वळतेचे प्रतीक मानले जातात आणि सागरिकाने ते अगदी परफेक्ट पद्धतीने कॅरी केले. लाल साडी आणि पांढऱ्या मोत्यांचा कॉम्बिनेशन तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवणारा ठरला.हेअर बनने दिला हटके लुकलाल साडी आणि मोत्यांच्या दागिन्यांनंतर सागरिका घाटगे हिच्या हेअरस्टाइलने तिच्या संपूर्ण लूकला एक वेगळाच हटके टच दिला. तिने केलेला साधा पण नीटनेटका हेअर बन तिच्या पारंपरिक अवताराला अधिकच एलिगंट बनवणारा ठरला.या हेअर बनने तिच्या चेहऱ्याची वैशिष्ट्ये अधिक उठून दिसली, तसेच संपूर्ण लूकमध्ये एक क्लासी आणि ग्रेसफुल फील आला. विशेष म्हणजे, गोंडस आणि व्यवस्थित बांधलेला हा जुडा तिच्या साडी आणि दागिन्यांसोबत परफेक्ट मॅच झाला.स्लिव्हलेस ब्लाऊजने दिला हटके लुकलाल साडी, मोत्यांचे दागिने आणि एलिगंट हेअर बननंतर सागरिका घाटगे हिच्या स्लिव्हलेस ब्लाऊजने तिच्या संपूर्ण लूकला एक हटके आणि मॉडर्न टच दिला. पारंपरिक साडीला आधुनिकतेची जोड देत तिने हा लूक अतिशय कॉन्फिडंटपणे कॅरी केला.साध्या पण फिटिंग असलेल्या स्लिव्हलेस ब्लाऊजमुळे तिचा लूक अधिक स्टायलिश आणि ट्रेंडी दिसत होता.चाहत्यांनी दिल्या शुभेच्छासागरिका घाटगे आणि झहीर खान यांनी शेअर केलेल्या गुढीपाडव्याच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्यांच्या या पारंपरिक आणि साध्या सेलिब्रेशनने अनेकांच्या मनाला स्पर्श केला असून, कमेंट्समध्ये शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव पाहायला मिळत आहे.अनेक चाहत्यांनी “गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा” देत त्यांच्या आनंदी आणि कौटुंबिक क्षणांचे कौतुक केले. काहींनी सागरिकाच्या सुंदर लूकचे विशेष कौतुक करत तिच्या लाल साडीतील मराठमोळ्या अंदाजाला दाद दिली, तर काहींनी या जोडीच्या साधेपणाचे आणि संस्कृतीप्रेमाचेही अभिनंदन केले.
22 shares
😊
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 08:54 AM
ज्योतिषीवरील बलात्काराच्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने घेतली बचावात्मक भूमिका

ज्योतिषीवरील बलात्काराच्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने घेतली बचावात्मक भूमिका

Praful Patle on Ashok Kharat:नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील अंकशास्त्रज्ञ आणि स्वयंघोषित ज्योतिषीअशोक खरातयाच्यावर बलात्काराचे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षारुपाली चाकणकरयांचे नाव वारंवार समोर येत असल्याने आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही बचावात्मक पाऊल उचलले आहे. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी या प्रकरणी कारवाई करण्याचे संकेत दिल्याने चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अशोक खरातयाने आपल्या कार्यालयात अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. दरम्यान, सोशल मीडियावर खरात आणिरुपाली चाकणकरयांचे काही व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये चाकणकर या खरातचे पाद्यपूजन करताना, त्याच्या पाया पडताना आणि त्याच्यावर छत्री धरताना दिसत आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा एका भोंदू बाबासमोर अशा प्रकारे नतमस्तक झाल्याने विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. प्रफुल पटेलांची रोखठोक भूमिका वाढत्या दबावानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. "अशोक खरातने जे काही केले आहे, ते अतिशय निंदनीय आणि घाणेरडे आहे. यावर सक्त कारवाई केली पाहिजे. या प्रकरणात ज्या ज्या राजकीय व्यक्तींची नावे जोडली गेली आहेत, त्या सर्वांची सखोल चौकशी केली जाईल. केवळ खरातवरच नाही, तर त्याच्याशी संबंधित असलेल्यांवरही सक्तीने कारवाई होणे गरजेचे आहे," असेप्रफुल्ल पटेलम्हणाले. ज्या राजकीय लोकांचे नाव त्याच्याशी जोडलं आहे त्यावर आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार, असेही पटेल म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे, येत्या एक-दोन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यावर मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. आम्ही पक्ष म्हणून योग्य ती पावले उचलू, असे सांगत पटेलांनी अप्रत्यक्षपणे रुपाली चाकणकर यांच्या पदाबाबत सूचक विधान केले आहे. फोटोंवरुन संबंध जोडणे हे योग्य नाही. कारण अनेक मान्यवरांचे फोटो आहेत. सार्वजनिक जीवनात अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो, असेही पटेल यांनी म्हटलं. अशोक खरात राजकारण्यांचा आवडता ज्योतिषी? नाशिकचा हा भोंदू बाबा केवळ सामान्य महिलांनाच नव्हे, तर राज्यातील अनेक बड्या राजकीय हस्तींनाही आपल्या जाळ्यात ओढून बसला होता. ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली मंत्र-मंत्राचे सल्ले देण्यासाठी अनेक मोठे नेते त्याच्याकडे जात असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, नाशिक पोलिसांनी खरातला बेड्या ठोकल्या असून त्याच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे, रुपाली चाकणकर यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
80 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 08:54 AM
उष्माघातः लक्षणे, जोखीम घटक आणि प्रतिबंधात्मक उपाय

उष्माघातः लक्षणे, जोखीम घटक आणि प्रतिबंधात्मक उपाय

उष्माघाताची मळमळ, उलटी, हात-पायात गोळे येणे, तीव्र थकवा, शरीराचे तापमान वाढणे, त्वचा गरम व कोरडी पडणे, घाम न येणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे, डोकेदुखी, छातीत धडधड, मानसिक अस्वस्थता किंवा बेशुद्धावस्था ही प्रमुख लक्षणे आहेत. तसेच लहान मुले, गरोदर महिला, वयोवृद्ध व्यक्ती, खेळाडू, सतत उन्हात काम करणारे कामगार तसेच हृदय, फुफ्फुस किवा मूत्रपिंड विकार असलेले रुग्ण यांना अधिक धोका असतो. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे कष्टाची कामे सकाळी लवकर किंवा सायंकाळी करावीत,
45 shares
😢
P
Pudhari
Mar 20, 2026, 08:54 AM
नवीन मेट्रो गाड्यांसह पुण्याच्या मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टिमचा विस्तार

नवीन मेट्रो गाड्यांसह पुण्याच्या मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टिमचा विस्तार

माण, हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर 37 मेट्रो ट्रेन म्हणजेच मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम धावणार आहेत. त्यापैकी 22 ट्रेन या यार्डात दाखल झाल्या असून, त्यांची चाचणीदेखील पूर्ण झाली आहे. त्यात आता धावण्याची तारीख निश्चित झाल्यानंतर आणखी 15 ट्रेन या मार्च महिन्याच्या अखेरी आंध्र प्रदेश येथील श्रीसिटी येथून दाखल होणार आहेत. साधारण 3 कोचच्या या मेट्रो असतील. विशेष म्हणजे याचे सर्व देखभाल दुरुस्तीचे जबाबादारी खासगी कंपनीने महिलांना दिली आहे.
9 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 20, 2026, 08:53 AM
ईद-उल-फित्र उत्सवः तारखा आणि परंपरा

ईद-उल-फित्र उत्सवः तारखा आणि परंपरा

Eid ul fitar 2026 moon rise time : ईद उल फितर पर्व रमजान संपल्यानंतर येते. इस्लामिक दिनदर्शिकेनुसार रमजान हा वर्षातील नववा महिना असतो. या संपूर्ण महिन्यात मुस्लिम लोक रोज करतात आणि नमाज पढतात. अल्लाहची इबादत करण्यात आपला पूर्ण वेळ घालवतात. हा महिनाभर रोजा करून महिन्याच्या शेवटच्या दिवशी चांद पाहून ईद उल फितर साजरी करतात. या नंतर रमजानचा महिना संपून शव्वाल महिन्याची सुरुवात होते. भारतात ईदचे पर्व खाडी देशात चांद पाहिल्यानंतर ठरवले जाते. सौदी अरब मध्ये २० मार्च रोजी ईद साजरी केली जाईल. तसेच भारतात २० मार्च रोजी चांद दिसेल. पाहुयात महाराष्ट्रात कोणत्या शहरात ईदचा चांद केव्हा दिसेल.महाराष्ट्रात ईदचा चांद दिसण्याची वेळमुंबई7:05 PMपुणे7:10 PMनांदेड7:00 PMनागपूर7:10 PMनाशिक7:00 PMकोल्हापूर7:00 PMईदचे महत्वईद उल फितरला मुस्लिम लोक मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करतात. यादिवशी नवीन कपडे घालून मिठाई वाटून अनेकजण ईद साजरी करतात. ईद उल फितरला मीठी ईद असेही म्हणतात. यादिवशी नमाज वाचल्यानंतर मुस्लिम लोक एकमेकांना ईदच्या शुभेच्छा आणि गिफ्ट देतात. तसेच शेवयाची खीर म्हणजेच शीरखुर्मा खायला आपल्या मित्रांना,प्रियजनांना घरी बोलावून ही ईद साजरी केली जाते.
2 shares
😊
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 20, 2026, 08:52 AM
मागणी मजबूत राहिल्याने भारताच्या सोन्याच्या बाजारपेठेत दुबईशी स्पर्धा

मागणी मजबूत राहिल्याने भारताच्या सोन्याच्या बाजारपेठेत दुबईशी स्पर्धा

Gold Markets in India:गेल्या एका वर्षभरात सोन्याने चांगलाच भाव खाल्ला आहे. कधीकाळी केवळ हजारांमध्ये असलेल्या सोन्याचा दर आता लाखांपर्यंत पोहोचाल आहे, पण तरीही लोकांचा सोनं खरेदीचा उत्साह कमी झालेला नाही. अनेक लोक सोनं किंवा सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी दुबईला जातात मात्र, भारतातही दुबईला टक्कर देणारे ‘गोल्ड मार्केट’ आहे जिथे स्वस्त किंमतीत सोनं खरेदी करता येते.सोन्याचा आजचा दर कायगेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांमध्ये चढ-उतार सुरूच आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रचंड स्वस्त झालेल्या सोन्याच्या किमतीत बुधवारी, 20 मार्च रोजी 1.68% किंवा 2428 वाढ झाली 10 ग्रॅम सोन्याचा दर 1.47 लाखांवर पोहोचला.भारतातील टॉप-10 स्वस्त गोल्ड मार्केटदुबईप्रमाणेच मुंबईही भारताचे ‘गोल्ड सिटी’ म्हणून ओळखली जाते. मुंबईतील झवेरी बाजार देशातील सर्वात प्रमुख ‘सोन्याचे मार्केट’ आणि दुबईच्या बाजाराशी स्पर्धा करेल इतके मोठे आहे. त्यानंतर, चेन्नई, कोची, बेंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाता हेही मोठे आणि देशातील स्पर्धात्मक गोल्ड मार्केटपैकी आहेत. या गोल्ड मार्केटमध्ये पारंपरिक आणि आधुनिक डिझाइनचे दागिने उत्कृष्ट दरात मिळतात.मुंबईतील झवेरी बाजारभारतातील सर्वात मोठे सोन्याच्या व्यापाराचे केंद्र म्हणूनच मुंबईची दुबईच्या गोल्ड मार्केटशी तुलना केली जाते. मुंबईतील मुंबा देवी मंदिराजवळील झवेरी बाजारात केवळ सोन्याचा व्यापारीच होत नाही तर, येथे मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात केली जाते.जळगाव - भारतातील ‘सुवर्ण बाजारपेठ’मुंबईनंतर महाराष्ट्रातील जळगाव दुसरी मोठी बाजारपेठ आहे, जिथं सराफांची मोठी साखळी आहे. 160 वर्षांची सोन्याची परंपरा असणाऱ्या जळगावला ‘सुवर्णनगरी’ म्हणूनही ओळखले जाते. शुद्ध सोनं आणि गुणवत्तेमुळे देशभरातील लोक जळगावच्या सराफा बाजारात सोने खरेदी करण्यासाठी येतात.चेन्नईउच्च दर्जा, शुद्ध सोन्याच्या दागिन्यांसाठी (22 ते 24 कॅरेट) चेन्नई शहर प्रसिद्ध आहे. येथे पारंपरिक, बारिक कारागिरीचे दागिने घडवले जाते, ज्याला ग्राहकांची मोठी मागणी आहे.कोचीकेरळच्या गोल्ड मार्केटमध्ये सराफांमध्ये तीव्र स्पर्धा पहायला मिळते आणि दरडोई सोन्याच्या सर्वाधिक वापराचे केंद्र मानले जाते. इथं अनेक व्यापार स्पर्धेत कायम राहण्यासाठी कमी दर ऑफर करतात आणि सोन्याच्या दागिन्यांवर कमी मेकिंग चार्ज आकारला जातो ज्यामुळे ग्राहकांना कमी दरात सोनं खरेदी शक्य होते.बेंगळुरू (कर्नाटक)उच्च विश्वासार्हता, नाविन्यपूर्ण डिझाइन आणि उच्च-मूल्याच्या विक्रीसाठी बेंगळुरू एक मजबूत, आधुनिक बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे.हैदराबाद (तेलंगणा)सोन्यातील वाढत्या गुंतवणुकीचे दक्षिण भारतातील एक प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाणारे हैदराबादमध्ये खास पारंपरिक डिझाईनचे दागिने मिळतात. म्हणूनच या शहरातील सोन्याचे बाजार नेहमीच गजबजलेले असते.दिल्ली (एनसीआर)दिल्लीत सध्या उत्तर भारतातील मोठे गोल्ड मार्केट असून इथे ग्राहकांना डिझाइन्समध्ये विविधता मिलते आणि व्यापाऱ्यांमधील स्पर्धेमुळे ग्राहकांना कमी किमतीत दागिने उपलब्ध होतात.कोलकाता (पश्चिम बंगाल)पारंपरिक, नाजूक आणि अत्यंत कुशलतेने हाताने बनवलेल्या सोन्याच्या दागिने, बंगाली डिझाइनच्या दागिन्यांसाठी कोलकाता मार्केट लोकप्रिय आहे.जयपूर (राजस्थान)कुंदन आणि मीनाकारी दागिने - पारंपरिक जयपुरी शैली, ज्यात आकर्षक एनॅमलचे काम असते आणि लग्न सोहळ्यासाठी अत्यंत शोभून असलेल्या दागिन्यांसाठी शहर प्रसिद्ध आहे. जयपूरमधील दागिन्यांमध्ये शाही थाट दिसून येतो.अहमदाबाद आणि सुरतअहमदाबाद आणि सुरत गुजरातमधील ही दोन शहरेही भारतातील गोल्ड मार्केटपैकी आहेत. सणासुदीच्या दिवसात अहमदाबादच्या गोल्ड बाजारात लोकांची लगबग वाढते तर, सुरतला डायमंड सिटी म्हणून ओळखले जाते. सुरतमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी आणि हलके वजन आणि मशीनवर दागिने तयार केले जातात.
60 shares
😐
P
Pudhari
Mar 20, 2026, 08:49 AM
लघवीचे सेवन अस्वास्थ्यकर आणि आरोग्यदायीदृष्ट्या अस्थिर असल्याचे तज्ज्ञांचे मत

लघवीचे सेवन अस्वास्थ्यकर आणि आरोग्यदायीदृष्ट्या अस्थिर असल्याचे तज्ज्ञांचे मत

स्थानिक परंपरा कितीही जुनी असली, तरी वैद्यकीय तज्ज्ञांनी यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तज्ज्ञांच्या मते, लघवी हा मानवी शरीरातील टाकाऊ पदार्थ आहे. त्यात कोणतेही पोषक घटक नसतात. अशा प्रकारे पदार्थ सेवन केल्याने आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
51 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 08:47 AM
वादातून महिलेची चोरी करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोघांना अटक

वादातून महिलेची चोरी करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोघांना अटक

अखेर गोपनीय माहिती व तपासाच्या आधारे त्यांना जेरबंद करण्यात आले. खेड पोलिस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल होता. या प्रकरणातील फिर्यादी फातिमा इसाक सुर्वे (रा. सवनस, ता. खेड, जि. रत्नागिरी) आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जुहूर अब्दुल रज्जाक सुर्वे व गुफरान अब्दुल रज्जाक सुर्वे (दोघेही रा. सवणस, ता. खेड) यांनी २००५ मध्ये मयत आबिदा मियांसो सुर्वे (७५) यांच्या घरातून १० हजार रुपये चोरी केले होते. त्यापैकी ५ हजार रुपये परत केले होते. मात्र उर्वरित रकमेच्या मागणीवरून वाद वाढल्याने आरोपींनी आबिदा सुर्वे यांचा खून करून पुरावा नष्ट केला व तेथून फरार झाले होते. दरम्यान, आरोपींनी आपली ओळख लपवण्यासाठी नावे व पत्ते बदलले होते. ते अनुक्रमे राजू गजानन तांबे व संदीप गजानन तांबे या नावाने मोहो, चिखले (ता. पनवेल, जि. रायगड) येथे राहत होते.
67 shares
😢
P
Pudhari
Mar 20, 2026, 08:43 AM
मध्यपूर्वेतील तणावामुळे जेट इंधनाच्या किंमती वाढल्या, जागतिक विमान कंपन्यांवर परिणाम

मध्यपूर्वेतील तणावामुळे जेट इंधनाच्या किंमती वाढल्या, जागतिक विमान कंपन्यांवर परिणाम

या संकटामागे सर्वात मोठा घटक म्हणजे मध्यपूर्वेतील तणाव आणि विशेषतः हॉर्मुज सामुद्रधुनीतील अडथळे. या मार्गातून जगातील मोठ्या प्रमाणात तेल आणि जेट इंधनाची वाहतूक होते. कुवैतसारख्या मोठ्या निर्यातदार देशाकडून होणारा पुरवठा यामुळे प्रभावित झाला आहे. याच पार्श्वभूमीवर जेट इंधनाच्या किमतींमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. उत्तर-पश्चिम युरोपमध्ये जेट इंधनाची किंमत प्रति टन 1,730 डॉलरपर्यंत पोहोचली असून ती दुप्पट झाली आहे. या वाढत्या किमतींमुळे अनेकएअरलाईन्सवरअब्जावधी डॉलरचा अतिरिक्त खर्च पडत आहे. काही कंपन्यांना उड्डाणे रद्द करण्याची वेळही आली आहे.
91 shares
😢