Achira News Logo
Achira News
L
Lokmat
May 6, 2026, 12:57 AM
भारतीय मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ गायन सत्रांद्वारे सहकाऱ्यांना चकित केले

भारतीय मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ गायन सत्रांद्वारे सहकाऱ्यांना चकित केले

मुंबई:ये राते ये मौसम नदी का किनारा, जांभूळ पिकल्या झाडाखाली, लग जा गले के फिर... अशी एकाहून एक सरस गाणी एरवी अतिशय रूक्ष वातावरण अनुभवणाऱ्यामंत्रालयातमंगळवारी कामाच्या वेळात ऐकायला मिळाली. मंत्रालयम्हटले की, शुद्ध सरकारी वातावरण बघायला मिळते. फायलींच्या ढिगापलीकडे बसलेले कर्मचारी, अधिकारी, टिपिकल सरकारी धाटणीची उत्तरे देण्याची त्यांची पद्धत असे कंटाळवाणे वातावरण असते, पण मंगळवारची दुपार आणि सायंकाळ मधुर गाणी घेऊन आली होती. जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय काही अचंबित तर काहींच्या तिखट प्रतिक्रिया मंत्रालयात कामासाठी आलेले लोक मात्र या गाणे-बजावण्यामुळे अचंबित झाले. कामाच्या वेळेत गाणे कशासाठी, असा प्रश्न काहींना पडला. सुट्टीच्या दिवशी हा कार्यक्रम झाला असता, अशा काही प्रतिक्रिया आल्या. गाण्यांचा गारव्यात अधिकारी न्हाऊन निघाले मंगळवार हा मंत्रिमंडळ बैठकीचा दिवस, या दिवशी तर खूपच जास्त गर्दी असते. मात्र, आज मंत्रिमंडळाची बैठक ही सह्याद्री अतिथीगृहावर होती आणि मंत्रालय सुप्रसिद्ध गायिका, गीत-संगीताच्या गाढ्या अभ्यासक डॉ.मृदुला दाढे व त्यांच्या चमूने सादर केलेल्या गाण्यांमध्ये न्हाऊन निघाले. घामटा काढणारे ऊन मी म्हणत असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना गाण्यांचा गारवा अनुभवायला मिळाला. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील मधल्या मोकळ्या जागेत (त्रिमूर्ती) हा कार्यक्रम झाला. आगळा-वेगळा असा ‘टेक-वारी’ उपक्रम सामान्य प्रशासन विभागाने सध्या ‘टेक-वारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांना तणावमुक्त वातावरणात काम करता यावे, म्हणून कला, संगीत, योगासने, ध्यानधारणा आदींचे सादरीकरण व प्रशिक्षण त्यांना दिले जात आहे. सहा हजार कर्मचारी प्रत्यक्ष तर जवळपास नऊ लाख कर्मचारी हे ऑनलाइन सहभागी झाले आहेत. त्या अंतर्गतच आजचा ‘रहे ना रहे हम’ हा गाण्यांचा कार्यक्रम झाला. कार्यक्रम ४ वाजता सुरू होऊन साडेपाचला संपला.
8 shares
😐
L
Lokmat
May 6, 2026, 12:47 AM
पुणे बाल लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे संतापाची लाट, पोलिसांकडून विशेष सरकारी वकिलाची मागणी

पुणे बाल लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे संतापाची लाट, पोलिसांकडून विशेष सरकारी वकिलाची मागणी

पुणे:नसरापूर चिमुकलीवर लैंगिक अत्याचार आणि खूनप्रकरणी संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. यासाठी न्यायालयात फिर्यादी पक्षाची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.पुणेग्रामीण पोलिस अधीक्षकांनी याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या विधि आणि न्याय विभागाला पाठविला आहे. प्रस्तावात तीन वकिलांची नावे पोलिसांनी सुचविली आहेत. त्यापैकी एकाची नियुक्ती करण्यात येईल, असे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने ७ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी नराधमाने ओरडू नये म्हणून तोंडात पायमोजा कोंबला नसरापूर येथील मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करताना आरोपीने ती ओरडू नये म्हणून मुलीच्या तोंडात पायमोजा कोंबला, तसेच झटापटीत पीडितेच्या छातीवर वळ उमटल्याचे शवविच्छेदनात निदर्शनास आले आहे. ससून रुग्णालय प्रशासनाने शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना दिला असल्याची माहिती ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिली. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी अंतर्गत अवयवांचे नमुने तपासणीसाठी ठेवण्यात आले आहेत. तपासणीचा अहवाल सादर करण्याची सूचना ससून रुग्णालयात या प्रकरणातील आरोपीची सक्षमता तपासणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा जलदगतीने तपास सुरू असल्याने सक्षमता तपासणीचा अहवाल तातडीने सादर करण्याची सूचना पोलिसांनी रुग्णालयाकडे केली आहे.
68 shares
😢
L
Lokmat
May 6, 2026, 12:40 AM
महाराष्ट्र सरकारने भरती प्रक्रियेत सुधारणा आणल्या

महाराष्ट्र सरकारने भरती प्रक्रियेत सुधारणा आणल्या

मुंबई :राज्यसरकारनेसरकारीनोकरभरतीच्या प्रक्रियेत मोठे बदल करत वर्ग अ, वर्ग ब सोबतच वर्ग क ची कर्मचारी भरतीही महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)मार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. गट ब (अराजपत्रित अधिकारी) आणि गट क च्या निवडीवेळी मुलाखती होणार नाहीत. राज्य शासनाने प्रशासन अधिक पारदर्शक, सुलभ आणि परिणामकारक करण्याच्या दृष्टीने भरती प्रक्रियेत या सुधारणा केल्या आहेत. वेगवेगळ्या विभागांकडून होणाऱ्या स्वतंत्र भरती प्रक्रियेमुळे निर्माण होणारी गुंतागुंत, विलंब आणि विसंगती दूर होणार आहे. पूर्वी समान स्वरूपाच्या पदांसाठी वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जात होत्या. यामुळे उमेदवारांवर मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक ताण वाढत होता. आता एकसंध परीक्षा प्रणालीमुळे हा ताण कमी होणार आहे. राज्य शासनाने एकूण ५५३ संवर्गांच्या सेवाप्रवेश नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे. राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शासन निर्णय जारी राज्य मंत्रिमंडळाच्या गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत कर्मचारी भरतीत मोठे बदल करण्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार मंगळवारी शासन निर्णय जारी करण्यात आला. लवकरच जाहिराती येणार नवीन नियम जाहिरात निघाल्यानंतरच्या पदांसाठी लागू असतील. आधीच सुरू असलेल्या भरतीवर ते परिणाम करणार नाहीत. काही विशेष भरती (जसे शिक्षक, पोलिस) पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. पदोन्नती आणि प्रतिनियुक्तीला प्राधान्य काही राजपत्रित व अराजपत्रित पदे थेट मुलाखतीने भरण्याऐवजी पदोन्नती किंवा प्रतिनियुक्तीद्वारे भरली जातील. यामुळे विभागीय कर्मचाऱ्यांना प्रगतीची अधिक संधी मिळणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि बदललेल्या प्रशासकीय गरजांच्या पार्श्वभूमीवर कालबाह्य ठरलेली पदे ही मृत संवर्ग म्हणून घोषित केली जातील. त्या पदांवर आधीपासून असलेल्या कर्मचाऱ्यांचे हक्क मात्र अबाधित राहणार आहेत. मुलाखती पूर्णपणे रद्द गट-ब (अराजपत्रित) आणि गट-क पदांसाठी मुलाखती पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुलाखतींच्या आडून होणाऱ्या ‘अर्थपूर्ण’ व्यवहारांना चाप बसेल. निवड प्रक्रिया केवळ लेखी परीक्षेवर आधारित असेल. यामुळे पारदर्शकता वाढणार असून, पक्षपाताच्या शक्यता कमी होतील.
100 shares
😐
L
Lokmat
May 6, 2026, 12:31 AM
महाराष्ट्रात रुग्णवाहिका प्रतिसादाला उशीर झाल्याने इटापल्ली येथील महिलेचा मृत्यू

महाराष्ट्रात रुग्णवाहिका प्रतिसादाला उशीर झाल्याने इटापल्ली येथील महिलेचा मृत्यू

अहेरी/ एटापल्ली (जि.गडचिरोली) :आरोग्य सुविधेचा दुष्काळ आणि खड्डेमय रस्त्यांचा शाप काय असतो, याचा भयानक अनुभव पुन्हा एकदा एटापल्ली तालुक्यात ४ मे रोजी आला. घरगुती वादातून विष प्राशन केलेल्या एका माउलीला वाचविण्यासाठी तिच्या नातेवाइकांनी चक्क दुचाकीवर आडवे ठेवून सुसाट वेगाने सहा किमी अंतर कापून रुग्णालय गाठले. नंतर ‘लोकमत’चे अहेरी तालुका प्रतिनिधी प्रतीक मुधोळकर यांनीही स्वतः रुग्णवाहिकेचे स्टेअरिंग हाती घेतले; मात्र, जीवन-मृत्यूच्या या संघर्षात अखेर मृत्यू जिंकला! पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने दाखवली माणुसकी मीरा गणेश लेकामी (वय २५, रा. कांदोळी, ता. एटापल्ली) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. एटापल्ली तालुक्यातील बुर्गी-कांदोळी मार्गावर ४ मे रोजी दुपारी १२ वाजता एका दुचाकीवर दोघेजण मीरा लेकामी यांना आडवे पकडून जिवाच्या आकांताने येत होते. त्याचवेळी समोरून येणारे ‘लोकमत’चे प्रतिनिधी प्रतीक मुधोळकर यांना हे दृश्य दिसले. त्यांनी पाठलाग करत विचारणा केली असता, महिलेने विष घेतल्याचे समजले. मुधोळकर यांनी तत्काळ सहा बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून डॉक्टरांना सतर्क केले. रुग्णवाहिकेचा चालक रजेवर, ‘सक्शन’ची नळीही खराब बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यंत्रणा सज्ज ठेवली; पण, विष पोटातून काढण्यासाठीच्या सक्शन या यंत्राची नळी खराब होती, त्यामुळे त्यांना तत्काळ एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात हलविण्याशिवाय पर्याय नव्हता. रुग्णवाहिकेचा चालक रजेवर असल्याने मोठी अडचण झाली. यावेळी ‘लोकमत’चे प्रतिनिधी मुधोळकर यांनी रुग्णवाहिकेची चावी द्या, मी त्यांना रुग्णालयात पोहोचवतो, अशी विनंती केल्यानंतर डॉक्टरांनी चावी दिली. त्यानंतर मीरा यांना घेऊन मुधोळकर यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांतून वाट काढत अवघ्या २५ मिनिटांत रुग्णवाहिका एटापल्ली रुग्णालयात पोहोचवली. एटापल्ली रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘सक्शन’द्वारे विष बाहेर काढण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न केले. मात्र, तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. दोन चिमुकल्यांना पोरके करून गेली मृत मीरा यांना दोन चिमुकली मुले आहेत. एक दोन वर्षांचा व दुसरा अवघ्या सहा महिन्यांचा आहे. मात्र एका चुकीच्या निर्णयामुळे दोन चिमुकले कायमचे पाेरके झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
87 shares
😢
L
Lokmat
May 6, 2026, 12:20 AM
युनेस्को अमली पदार्थ प्रकरणः आरोपीकडून त्याच्या घरी अंमली पदार्थ पोहोचवणाऱ्या कुरिअर सेवेचा खुलासा

युनेस्को अमली पदार्थ प्रकरणः आरोपीकडून त्याच्या घरी अंमली पदार्थ पोहोचवणाऱ्या कुरिअर सेवेचा खुलासा

गौरी टेंबकर-कलगुटकर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई :नेस्को ड्रग्सप्रकरणी अटक करण्यात आलेला बारावा आरोपी मार्क ऊर्फ महेश खेमलानी (वय ४४) याच्या घरी एक व्यक्ती कुरिअरने ड्रग्ज पुरवठा करत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला तो हाँगकाँग आणि मीरा रोड या दोन्ही ठिकाणी ये-जा करीत असल्याने यातील तथ्य वनराई पोलिस पडताळून पाहात आहेत. एक्स्टसी (एमडीएमए) या नशेच्या गोळ्यांचा व्यापार क्रिप्टो करन्सीमध्येही झाल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांना असून त्या अनुषंगाने चौकशी सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. ड्रग्ज कुरिअरने पाठविले वनराई पोलिसांच्या चौकशीत ‘’माझ्या घरी ड्रग्जचे पार्सल कुरिअरने यायचे’’ असे त्याने सांगितले आहे. तो हाँगकाँग आणि मीरा भाईंदरच्या लोढा कासा मॅक्झीमा सोसायटीत जिया रिचेल जेकब सोबत राहत होता. त्यामुळे त्याला हे ड्रग्ज विकणारा कोण आहे, याचा तपास करीत ड्रग्ज फॅक्टरीशी त्याचा संबंध पोलिस पडताळून पाहात आहेत. कॉन्सर्टमध्ये ज्या ड्रग्जच्या गोळ्यांची विक्री करण्यात आली, त्याचे ऑनलाईन ट्रांजेक्शन पोलिसांना सापडले आहे. मात्र, रोख रकमेच्या स्वरूपातही या गोळ्यांची विक्री झाल्याबाबत पडताळणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना व्यवहार क्रिप्टो करन्सीमध्ये झाल्याचा संशय आहे. ९३८ एक्स्टसीच्या गोळ्या लागल्या हाती दरम्यान, अद्याप आमच्या हाती ९३८ एक्स्टसीच्या गोळ्या लागल्या असून आरोपींमध्ये जवळपास ६० लाखांचा व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. या गुन्ह्यामध्ये एकमेकांची नावे घेत असल्याने त्यांना समोरासमोर बसवून सत्य वदवून घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. सात महिन्यांपूर्वी आयुषची ‘हाँगकाँग’ वारी! आयुष हा या प्रकरणातील मुख्य आरोपी सात महिन्यांपूर्वी हाँगकाँगला गेला असताना त्याची मार्कशी भेट झाल्याचे तपासात दिसून आले आहे. त्याच्या पासपोर्टची पडताळणी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने नमूद केले.
52 shares
😐
L
Lokmat
May 6, 2026, 12:18 AM
अडकलेल्या नाविकांच्या सुटकेचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, जहाज मालकांवर टीका

अडकलेल्या नाविकांच्या सुटकेचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, जहाज मालकांवर टीका

मुंबई :मुंबई किनाऱ्याजवळ अटक करण्यात आलेल्या तीन जहाजांवर अडकलेल्या ५० खलाशांची मुक्तता करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले, तसेच खलाशांना अनेक महिन्यांपासून अत्यल्प अन्न आणि पाणी देऊन पाळीव प्राण्यांपेक्षाही वाईट वागणूक दिली, अशा शब्दांत न्यायालयाने जहाज मालकांना फटकारले. पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला ‘जीवन एकदाच मिळते. आम्ही पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाही,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले, तसेच त्यांनी खलाशांच्या आरोग्यापेक्षा व्यावसायिक हिताला प्राधान्य दिल्याचेही न्यायालयाने म्हटले. खलाशांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते की, जहाज मालकांनी जहाजे जवळपास सोडून दिल्याने ते अत्यल्प अन्न व पाण्यासह अडकून पडले. ही जहाजे शहरापासून ११ नॉटिकल मैल अंतरावर समुद्रात बेकायदेशीर इंधन तेल व शिलाजित हस्तांतरणप्रकरणी जप्त करण्यात आली होती. एमटी ॲस्फाल्ट स्टार, एमटी स्टेलर रुबी आणि एमटी अल जाफझिया या जहाजांवर ५० खलाशी अडकले होते. त्यापैकी सात जणांनी उच्च न्यायालयात ‘हॅबियस कॉर्पस’ याचिका दाखल केली होती. जहाजावर जाण्यास खलाशांचा नकार न्यायालयाने सोमवारी सर्व ५० खलाशांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्याचे आदेश यलो गेट पोलिसांना दिले होते. न्या. रवींद्र घुगे आणि न्या. हितेन वेणगावकर यांच्या खंडपीठासमोर सर्व खलाशांना हजर करण्यात आले. त्यांनी कोणालाही पुन्हा जहाजावर परत जायचे नसल्याचे सांगितले, कारण त्यांना तेथे बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्यात आले होते. रोज केवळ ३०० मिलि पाणी; अत्यल्प अन्न खलाशांनी न्यायालयाला सांगितले की, त्यांना दररोज केवळ ३०० मिलि पाणी दिले जात होते आणि अत्यल्प अन्नावर त्यांना जगावे लागत होते. यावर न्यायालयाने जहाज मालकांना कठोर शब्दांत फटकारले. ‘खलाशांना दररोज फक्त ३०० मिलि पाणी कसे देऊ शकता? घरी पाळीव प्राण्यांनाही यापेक्षा जास्त पाणी दिले जाते. मानवी जीवांशी अशी वागणूक होऊ देणार नाही,’ अशा शब्दांत न्यायालयाने जहाज मालकांना सुनावले तसेच मानवी जीवांचे रक्षण करू; जहाजांची काळजी मालकांनी घ्यावी. तुमच्या जहाजांशी काही देणे-घेणे नाही. हे हॅबियस कॉर्पस याचिकेचे क्षेत्र नाही. मालकांचे वर्तन असे आहे की ते मानवी जीवांना महत्त्वच देत नाहीत. त्यांना फक्त व्यावसायिक बाबींचीच चिंता आहे,’ असेही न्यायालयाने नमूद केले.
23 shares
😢
L
Lokmat
May 6, 2026, 12:13 AM
भारताने कृषी जमिनीचे वर्गीकरण सुलभ केले, महसूल आणि मालकी हक्कांना चालना दिली

भारताने कृषी जमिनीचे वर्गीकरण सुलभ केले, महसूल आणि मालकी हक्कांना चालना दिली

नारायण जाधव लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई :राज्यातील ‘सिलिंग’ अंतर्गत मिळालेल्या शेतीजमिनींना (वर्ग-२) आता वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्याचा मार्ग अधिक स्पष्ट आणि सुलभ झाला आहे. या निर्णयामुळे जमीनधारकांना मालकी हक्क बळकट करण्याची संधी मिळणार असून, शासनाच्या महसूल वाढीलाही मोठी चालना मिळणार आहे. पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला महसूल व वन विभागाने ४ मे २०२६ रोजी अधिसूचना काढून हे नवे नियम लागू केले. यामुळे जमीन व्यवहार, बँक कर्जप्रक्रिया आणि गुंतवणूक अधिक सुलभ होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघाचे महासचिव प्रकाश बाविस्कर यांनी या निर्णयाचे स्वागत करताना, प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत राबवावी, अशी मागणी केली. आदिवासी लाभार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबवावी, तसेच जिल्हास्तरावर शिबिरे घेऊन मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सुचवले. अनेक कुटुंबांना नोंदणी प्रक्रिया गुंतागुंतीची वाटत असल्याने प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. जमिनीच्या अधिमूल्याचे दर क्षेत्रानुसार वेगवेगळे यात अधिमूल्याचे दर क्षेत्रानुसार वेगवेगळे आहेत. महानगर आणि शहर परिसरात ३० टक्के, तर इतर भागात २५ टक्के अधिमूल्य आकारले जाणार आहे. वापर बदललेल्या जमिनींसाठी हा दर २० ते ३० टक्क्यांदरम्यान असेल. बाजारमूल्य ५० लाखांपर्यंत असल्यास जिल्हाधिकारीच निर्णय घेऊ शकतात; त्यापेक्षा जास्त प्रकरणांसाठी शासनाची मंजुरी आवश्यक राहील. मात्र, शासनाने अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि शुल्काबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यास या निर्णयाचा फायदा अधिक वेगाने जमीनधारकांपर्यंत पोहोचू शकतो. तीन महिन्यांत पडताळणी नव्या नियमानुसार, जमीन मिळाल्यापासून किमान १० वर्षे पूर्ण झाल्यानंतरच रूपांतरणासाठी अर्ज करता येणार आहे. जमीन वाटपाच्या अटींचे उल्लंघन नसणे आवश्यक असून, उल्लंघन असल्यास ते आधी नियमित करणे बंधनकारक आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागणार असून, तीन महिन्यांत पडताळणी आणि त्यानंतर १५ दिवसांत अंतिम आदेश देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांना गती मिळण्याची शक्यता आहे. ५० लाखांवरील प्रकरणांवर सरकारची मोहोर जमिनीचे बाजारमूल्य ५० लाखांपेक्षा कमी असल्यास निर्णयाचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असेल. मात्र, ५० लाखांपेक्षा जास्त मूल्याच्या प्रकरणांना राज्य सरकारची पूर्वपरवानगी अनिवार्य केली आहे. यामुळे मोठ्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न दिसून येतो. मात्र, जमीन वाटपाच्या अटींचे उल्लंघन आढळल्यास आणि ते नियमित न केल्यास, जिल्हाधिकारी अर्ज फेटाळू शकतात. त्यामुळे अर्जदारांनी अटींची पूर्तता करणे आवश्यक ठरणार आहे.
48 shares
😢
L
Lokmat
May 6, 2026, 12:05 AM
मुलाच्या हत्येनंतर लैंगिक गुन्हेगारांना पॅरोल मिळण्यापासून रोखण्यासाठी भारताच्या मुख्यमंत्र्यांचे नवीन कायद्याचे आदेश

मुलाच्या हत्येनंतर लैंगिक गुन्हेगारांना पॅरोल मिळण्यापासून रोखण्यासाठी भारताच्या मुख्यमंत्र्यांचे नवीन कायद्याचे आदेश

मुंबई :पुण्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार व हत्येच्या घटनेचे पडसाद मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटले. लैंगिक गुन्ह्यांमधील आरोपींना पॅरोल मिळू नये यासाठी नव्याने कायदा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी व न्याय विभागाला दिले आहेत. “असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन लैंगिक गुन्ह्यांतील आरोपी पॅरोलवर सुटल्यानंतर पुन्हा त्याच प्रकारचे गुन्हे करीत असल्याचे नरसापूर प्रकरणातून समोर आले असून याची दखल मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली. २०१४ ते २०१९ या काळात फडणवीस मुख्यमंत्री असताना लैंगिक गुन्ह्यातील आरोपींना पॅरोल देऊ नका, असा कायदा केला होता. त्यानुसार या आरोपींना पॅरोल नाकारला जात होता. मात्र, हा कायदा दोन ते तीन वर्षेच लागू राहिला व नंतर न्यायालयाने रद्द केला. त्यामुळे सक्षम व न्यायालयीन कसोटीवर टिकणारा कायदा करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सुरक्षिततेला प्राधान्य लैंगिक गुन्ह्यांच्या प्रकरणातील ८० ते ९० टक्के आरोपी पॅरोलवर सुटल्यानंतर त्या काळात ते परत तसेच गुन्हे करतात. त्यामुळे समाजाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने असा कायदा आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. नवा कायदा केल्याने काय होणार बदल? नव्या कायद्यातील तरतुदी ठोस आणि कायदेशीरदृष्ट्या भक्कम असाव्यात, जेणेकरून न्यायालयात त्याचे समर्थन करता येईल, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. या प्रस्तावित कायद्यामुळे गंभीर स्वरूपाच्या लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल मिळण्यावर मोठ्या प्रमाणात निर्बंध येतील आणि पुनरावृत्ती होणाऱ्या गुन्ह्यांना आळा बसेल.
10 shares
😢
L
Lokmat
May 6, 2026, 12:01 AM
अमेरिकेने पर्शियन आखातात शस्त्रसंधीची पुष्टी केली, नौवहन मार्गांच्या संरक्षणासाठी सैन्य तैनात केले

अमेरिकेने पर्शियन आखातात शस्त्रसंधीची पुष्टी केली, नौवहन मार्गांच्या संरक्षणासाठी सैन्य तैनात केले

दुबई :इराणशीझालेला युद्धविराम अद्याप कायम असून अमेरिकेच्या नौदलातील १५ हजाराहून अधिक सैनिक आणि १०० हून लष्करी विमाने पर्शियाच्या आखातातील सागरी मार्गाचे संरक्षण करत असल्याचे अमेरिकेचे संरक्षण सचिव पीटर हेगसेथ आणि जॉइंट चीफ चेअरमन डॅन केन यांनी मंगळवारी स्पष्ट केले. या संरक्षणात अमेरिकेच्या दोन जहाजांनी सुरक्षितपणे होर्मुझचा मार्ग पार केल्याची माहिती या दोघांनी दिली. गरज पडल्यास या प्रदेशात सैन्य संख्या वाढवण्याचा आम्ही विचार करू असे हेगसेथ म्हणाले. “असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन सोमवारीइराणनेअमेरिकेवर हल्ला केल्याचा दावा केला होता. तो दावा अमेरिकेने फेटाळत इराणच्या सहा युद्धनौका उडवल्या असे सांगितले. या घटनेवर इराणने युद्धविरामाचे अमेरिकेने उल्लंघन केल्याचा आरोप केला. पण अमेरिकेने हे हल्ले मोठ्या युद्धाच्या श्रेणीत येत नसल्याचा पवित्रा घेत तांत्रिकदृष्ट्या शांतता करार सुरूच असल्याचे सांगितले. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पोप लिओ चौदावे इराणला मदत करून कॅथलिक धर्मीयांना धोक्यात टाकत असल्याची टीका केली.
39 shares
😐
L
Lokmat
May 5, 2026, 11:57 PM
इंडिगो विमानाच्या पॉवर बँकमध्ये स्फोट; 5 प्रवासी जखमी

इंडिगो विमानाच्या पॉवर बँकमध्ये स्फोट; 5 प्रवासी जखमी

चंडीगड :हैदराबादहून चंडीगडला आलेल्या इंडिगोच्या ६ई १०८विमानातमंगळवारी पॉवर बँकचास्फोटझाला. यात ५ प्रवासी जखमी झाले. ही पॉवर बँक एका प्रवाशाच्या बॅगेत ठेवलेली होती. “असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन विमानतळावरहे विमान उतरल्यावर ही घटना घडली.स्फोटानंतरकेबिनमध्ये धूर पसरला व प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. क्रू मेंबर्सनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. सर्व प्रवाशांना आपत्कालीन प्रवेशद्वारातून बाहेर काढण्यात आले. (वृत्तसंस्था) स्फोट कशामुळे? पॉवर बँकचा स्फोट नेमका कोणत्या कारणाने झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस आणि विमानतळ अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे. मात्र, प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार या प्रवाशाने ती पॉवर बँक वापरत असताना सलग अडीच तास मोबाइलवर सिनेमे पाहिले होते. सर्व प्रवाशांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविले सर्व प्रवाशांना तातडीने विमानाच्या बाहेर काढण्यात आले. जखमी प्रवाशांना रुग्णालयात नेण्यात आले. तसेच संबंधित सर्व यंत्रणांना त्वरित माहिती देण्यात आली. मी, माझी पत्नी कोमल आणि आठ वर्षांचा मुलगा नमन याच विमानात होतो. धूर येऊ लागला तेव्हा धावपळ उडाली. धावपळीत अनेक पडले, जखमी झाले. सुदैवाने हे विमान काही मिनिटांआधीच चंडीगडला लँड झाले होते. त्यामुळे आम्ही वाचलो. हे जर विमान हवेत असताना घडले असते तर अनर्थ घडला असता. एका मोठी दुर्घटना होण्यापूर्वी आम्ही वाचलो, हे आमचे सुदैव. रोशन राजेंद्र छाजेड, छत्रपती संभाजीनगर
6 shares
😢
L
Lokmat
May 5, 2026, 11:54 PM
नवी मुंबईतील डी. पी. एस. फ्लेमिंगो तलावाच्या संवर्धनासाठी उपाययोजना करण्याचे राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश

नवी मुंबईतील डी. पी. एस. फ्लेमिंगो तलावाच्या संवर्धनासाठी उपाययोजना करण्याचे राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश

नवी मुंबई :नवी मुंबईतील डीपीएस फ्लेमिंगो तलावाच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय हरित लवादाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. लवादाने नियुक्त केलेल्या संयुक्त तपासणी समितीने सिडकोला दोन महिन्याची डेडलाईन देत या प्रकरणी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. तलावात भरती-ओहोटीचे पाणी नैसर्गिकरीत्या प्रवाहित होईल याची खात्री करा आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासाचा विचार करून विकास आराखड्यात बदल करा, असे स्पष्ट निर्देश सिडकोला देण्यात आले आहेत. समितीने नवी मुंबई महापालिकेलाही फ्लेमिंगो अधिवास जपण्यासाठी आवश्यक दुरुस्ती कामे तातडीने करण्यास सांगितले आहे. २८ एप्रिल २०२६ रोजीच्या आदेशानुसार, पक्षी विषयातील तज्ज्ञ संस्थेकडून अभ्यास करून दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...तर न्यायालयाचा अवमान नॅटकनेक्ट फाउंडेशनने या प्रकरणी राज्य पाणथळ प्राधिकरणाकडे तक्रार केली आहे. कुमार यांनी सांगितले की, “पाण्याचा प्रवाह कायम ठेवण्याचे आदेश असताना त्याचे पालन झालेले नाही. हा प्रकार न्यायालयाचा अवमान ठरू शकतो.” यापूर्वीच या क्षेत्राला संवर्धन राखीव दर्जा देण्याची शिफारस केली होती. फ्लेमिंगोंच्या मृत्यूमुळे प्रकरण गाजले गेल्या वर्षी तलावात सात फ्लेमिंगो मृतावस्थेत आढळल्याने हे प्रकरण पुढे आले. त्यानंतर हरित लवादाने स्वतःहून दखल घेऊन संयुक्त समिती नेमली होती. या समितीत वन विभाग, पाणथळ प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महापालिका आणि सिडकोचे अधिकारी सहभागी होते. हरित लवादाचे आदेश बंधनकारक हरित लवाद हा पर्यावरण विषयांवरील अर्ध-न्यायालयीन मंच असतो. यामुळे त्याचे आदेश कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असतात. त्याकडे दुर्लक्ष करणे प्रशासन किंवा संस्थांसाठी धोकादायक ठरू शकते. केंद्र-राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सिडकोसारख्या संस्थांना ते पाळणे बंधनकारक आहेत. हे अधिकार हरित लवाद कायदा २०१० अंतर्गत दिलेले आहेत. फ्लेमिंगो तलाव तक्रारीसारख्या प्रकरणात भरती-ओहोटीचा प्रवाह सुरू ठेवण्याचे आदेश बंधनकारक आहेत. आदेश न पाळल्यास सिडको/महापालिकेवर मोठा आर्थिक दंड आकारला जाऊ शकतो. तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर वैयक्तिक कारवाईसह प्रकल्प/कामे थांबविण्याचे आदेश लवाद देऊ शकतो. आदेश जाणीवपूर्वक न पाळल्यास ‘न्यायालयाचा अवमान’ मानला जातो. हरित लवादाला थेट अवमान अधिकार मर्यादित असले, तरी प्रकरण पुढे उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊ शकते.
1 shares
😐
L
Lokmat
May 5, 2026, 11:49 PM
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे.

कोलकाता :विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर राजीनामा देण्यास पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुखममता बॅनर्जीयांनी मंगळवारी स्पष्ट नकार दिला. मी राजीनामा देणार नाही. कारण, हा निकाल जनतेचा खरा कौल नसून, एका कटकारस्थानाचा परिणाम असल्याचा दावा त्यांनी केला. “असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा सामना भाजपशी नव्हता, तर भाजपसाठी काम करणाऱ्या निवडणूक आयोगाशी होता, असा आरोप बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत केला. त्या म्हणाल्या, माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण आम्हाला जनतेच्या कौलामुळे नव्हे, तर कटकारस्थानामुळे पराभव पत्करावा लागला... मी हरले नाही, मी लोक भवनात जाणार नाही. ते घटनात्मक नियमांनुसार कारवाई करू शकतात. तथ्यशोधन समितीची घोषणा निवडणुकीनंतर हिंसाचाराच्या घटनांची पाहणी करण्यासाठी १० सदस्यीय तथ्यशोधन समिती स्थापन करण्याची घोषणा बॅनर्जी यांनी केली. या समितीमार्फत “निवडणुकीनंतर हिंसाचारग्रस्त” भागांचा प्रत्यक्ष आढावा घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. मी हरलेली नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी लाेकभवनात जाणार नाही. ममता बॅनर्जी, मावळत्या मुख्यमंत्री काय लागला निकाल? : २९४ सदस्यीय विधानसभेत भाजपने २०७ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. निवडणुकीनंतर हिंसा : तृणमूलचा आरोप; भाजपने आरोप फेटाळले पश्चिम बंगालमध्ये अनेक भागांत सोमवारी तृणमूल काँग्रेसच्या अनेक कार्यालयांना आग लावण्यात आली आणि त्यांची तोडफोड करण्यात आली. तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते राज्यात मिळालेल्या प्रचंड विजयाचा जल्लोष साजरा करताना दिसले. तृणमूल काँग्रेसने या हिंसाचारात भाजप कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप केला. हे आराेप भाजपने फेटाळले. मतमोजणीवर प्रश्नचिन्ह मतमोजणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोपही त्यांनी केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सुमारे १०० जागांवरील जनादेश लुटला असा दावा करत, पक्षाचे मनोबल खच्ची करण्यासाठी मतमोजणी जाणीवपूर्वक हळूहळू केली. याने इतिहासात एक काळा अध्याय लिहिला गेला, असेही ममता ठामपणे म्हणाल्या. ‘इंडिया’आघाडी सोबत’ बॅनर्जी निवडणूक निकालानंतर विरोधी ‘इंडिया’ आघाडीतील अनेक नेत्यांनी संपर्क साधून पाठिंबा दिल्याचे सांगितले. आघाडीतील नेत्यांनी मला फोन करून एकजूट दर्शवली. सोनिया गांधी, राहुल गांधी यांनीही माझ्याशी संवाद साधला. आता राष्ट्रीय स्तरावर विरोधी आघाडी मजबूत करण्यावर आपला भर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. अमित शाह ठरविणार बंगालचा सीएम, सुवेंदू अधिकारींचे नाव चर्चेत नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधिमंडळ पक्षनेता अर्थात मुख्यमंत्री निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नियुक्ती केली आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहनचरण मांझी बंगालसाठी सह-निरीक्षक असतील. प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सुवेंदू अधिकारी यांचे नाव आघाडीवर आहे. प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, तसेच राज्यात महिला मुख्यमंत्री करायची असेल तर रूपा गांगुली व अग्निमित्रा पॉल यांच्या नावांची चर्चा आहे.
78 shares
😢
L
Loksatta
May 5, 2026, 08:41 PM
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास ममता बॅनर्जी यांचा नकार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास ममता बॅनर्जी यांचा नकार

नवी दिल्ली/ कोलकाता :विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. निवडणूक निकाल हे जनमताचे प्रत्यंतर नसून, ते निवडणूक आयोगाने भाजपच्या साथीने रचलेले षड्यंत्र असल्याचा आरोप ममतांनी केला. हा संघर्ष रस्त्यावर नेणार असून, विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी बळकट करण्याचा निर्धार त्यांनी कोलकाता येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला. ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांच्या नेत्यांनीही ममतांच्या आरोपांना पाठिंबा दिल्याने नवा राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. पश्चिम बंगाल विधानसभेच्या २०७ जागा जिंकून सत्तास्थापनेची तयारी भाजपने सुरू केली आहे.निवडणूकआयोगानेही निवडणूक निकालाची अधिसूचना राज्यपालांकडे पाठवली आहे. असे असताना, कोलकात्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देण्याचा पवित्रा घेतला. ‘तृणमूल काँग्रेसने केवळ भाजपविरोधात नव्हे तर, निवडणूक आयोगाविरोधात निवडणूक लढवली. आयोगाने भाजपसाठी काम केले. लोकमताद्वारे पराभूत झाले नसल्याने राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. मी पराभूत झालेले नाही, त्यामुळे लोकभवन येथे (राजीनामा देण्यासाठी) जाण्याचा प्रश्नच नाही,’ असे ममता म्हणाल्या. मतमोजणीदरम्यान मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली, तृणमूलच्या १०० जागा हडप करण्यात आल्या, कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी मतमोजणी संथगतीने करण्यात आली, असे आरोप ममतांनी केले. निवडणूक आयुक्तांचा उल्लेख त्यांनी खलनायक असा केला. निकालानंतर बदलत्या रणनीतीचे संकेत ममता बॅनर्जी यांनी देत राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची आघाडी भक्कम करण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे स्पष्ट केले. त्याच बरोबर ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांनी संपर्क साधला असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी,अरविंद केजरीवाल,मेहबुबा मुफ्ती यांच्यासह ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांच्या नेत्यांनी ममता यांच्या आरोपांना पाठिंबा दिला आहे. ‘आसाम आणि बंगालमधील जनादेशाची चोरी करण्यात आली आहे. ही बाब भारतीय लोकशाही नष्ट करण्याच्या भाजपच्या मोहिमेतील एक मोठे पाऊल आहे. त्यामुळे क्षुद्र राजकारण बाजूला ठेवा. हा मुद्दा कोणत्याही एका पक्षाचा किंवा दुसर्‍याचा नाही,’ अशी टीका राहुल गांधींनी केली. ‘भाजपने पश्चिम बंगालमध्ये जे केले तेच दिल्लीत आमच्याविरोधात केले. सध्या लोकशाही धोक्यात आहे. ते जर पंजाबमध्ये सत्तेत आले तर पंजाबची लूट करतील,’ असे केजरीवाल म्हणाले. मेहबुबा मुफ्ती यांनी ‘निवडणूक आयोगाने निवडणुकीत घोळ करण्यात प्रावीण्य मिळवले आहे,’ अशी टीका केली. राजीनामा न देण्याची ममता बॅनर्जी यांची भूमिका भारतीय राजकारणातील अपवादात्मक घटना मानली जात आहे. कायद्यानुसार ममता यांना असे करणे शक्य नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मात्र, बॅनर्जी या ठाम राहिल्यास राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपने ममता यांच्या या भूमिकेवर टीका करताना ‘भारतीय लोकशाही परंपरेच्या विरोधातला हा निर्णय अराजक निर्माण करेल,’ असे म्हटले आहे. तसेच इंडिया आघाडीतील नेत्यांच्या प्रतिक्रियेलाही उत्तर दिले आहे. काँग्रेस जेथे पराभूत होते तेथे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. जिथे विजय होतो तेथे स्वीकारला जातो हे दुटप्पी धोरण असल्याची टीका भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी केली. कोलकाता : निवडणूक निकालानंतर राज्यात झालेल्या हिंसाचारात भाजप व तृणमूल काँग्रेसचा एक कार्यकर्ता ठार झाला. न्यू टाऊन परिसरात विजयी मिरवणुकीदरम्यान तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत मधू मोंडल हा भाजप कार्यकर्ता ठार झाला. तर बिरभूममध्ये तृणमूल काँग्रेसच्या अबिर शेख या कार्यकर्त्याची हत्या केल्याचा भाजपवर आरोप आहे. तृणमूलच्या कार्यालयांमध्ये तोडफोड केल्याचा आरोप पक्षाने केला. कोलकात्यातील टॉलीगंज आणि कसबा तसेच बैरूपूर, कामरहाती, बारनगर उपनगरांत या घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. * पराभवानंतर ममता बॅनर्जी यांना राजीनामा द्यावाच लागेल अन्यथा राज्यपाल त्यांना बडतर्फ करू शकतात, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. * विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ सात मे रोजी संपुष्टात येईल. त्यानंतर ममता यांचा कार्यकाळही आपोआप संपेल, असे ज्येष्ठ वकील अजित सिन्हा यांनी म्हटले. * नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर बॅनर्जी यांना पायउतार होण्याशिवाय पर्याय नाही, असे घटनातज्ज्ञ पी. डी. टी. आचार्य यांनी सांगितले. वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीतील यशाबद्दल पंतप्रधाननरेंद्र मोदीयांचे अभिनंदन केले आहे. हा ऐतिहासिक आणि निर्णायक विजय असल्याचे व्हाइट हाऊसचे प्रवक्ते कुश देसाई यांनी नमूद केले. गेल्याच महिन्यात ट्रम्प यांनी दूरध्वनीवरून पंतप्रधानांचे कौतुक केले होते.
32 shares
😢
L
Loksatta
May 5, 2026, 08:29 PM
पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापनेसाठी भाजपकडून अमित शहांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती

पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापनेसाठी भाजपकडून अमित शहांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये अभूतपूर्व विजय मिळवल्यानंतर भाजपने सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला गती दिली असून, मंगळवारी पक्षाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन माझी हे सहनिरीक्षक असतील. भाजपच्या नव्या सरकारचा ९ मे रोजी शपथविधी होणार आहे. सरकार स्थापनेची प्रक्रियाही विनाअडथळा व्हावी या उद्देशाने मुख्यमंत्री निवडीपासून मंत्र्यांच्या नियुक्तीपर्यंत सर्व निर्णय अमित शहा घेणार आहेत. त्यासाठी शहा पश्चिम बंगालला रवाना होतील. शपथविधीसाठी पंतप्रधाननरेंद्र मोदीउपस्थित राहणार आहेत. आसाममध्ये सरकार स्थापनेसाठी भाजपकडून केंद्रीयमंत्री जे. पी. नड्डा यांना केंद्रीय निरीक्षक व हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांना सहनिरीक्षक म्हणून पाठवले जात आहे. * भाजपचा आक्रमक चेहरा असलेले सुवेंदू अधिकारी हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अग्रभागी असून प्रदेशाध्यक्ष शमिक भट्टाचार्य, अग्निमित्रा पोल, रूपा गांगुली आदी नेत्यांचीही नावे चर्चेत आहेत. * एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे विश्वासू मानले जाणारे अधिकारी भाजपमध्ये आल्यानंतर शहांचे निष्ठावान बनले. यावेळी निवडणुकीतही त्यांनी हिंदुत्वाचा आक्रमक प्रचार केला. शिवाय, अधिकारी यांनी दोनदा ममता बॅनर्जी यांचा पराभव केला आहे.
29 shares
😐
L
Loksatta
May 5, 2026, 08:24 PM
भाजपने सत्ता बळकावल्याने प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाला धोका

भाजपने सत्ता बळकावल्याने प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाला धोका

भाजपविरोधी सरकारे असलेल्या राज्यांमधील प्रादेशिक पक्षांचे गेल्या काही वर्षांत काय झाले, यावर एक नजर टाकली, तरी तृणमूलच्या भवितव्याचा अंदाज येऊ शकतो. वेगवेगळी विचारसरणी असलेले देशभरातील प्रादेशिक पक्ष हे भारतीय लोकशाहीचे सौंदर्य आहे, हे वाक्य आता केवळ पाठ्यपुस्तकी उरले आहे, याचा प्रत्यय देश अलीकडच्या काळात सातत्याने घेत आहे. पश्चिम बंगालची विधानसभानिवडणूकहे त्याचे अलीकडचे उदाहरण. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या आणि तमिळनाडूतील द्रमुकच्या पराभवामुळे देशातील प्रस्थापित प्रादेशिक पक्षांपुढे अस्तित्वाचे कडवे आव्हान उभे राहिले आहे. तशीही आपल्या गेल्या १२ वर्षांच्या कार्यकाळात विविध राज्यांमधील प्रादेशिक पक्ष कसे संपतील याच दिशेने भाजपची व्यूहरचना होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाजपला आव्हान देत होत्या. पण भाजपने पश्चिम बंगाल पादाक्रांत करत ममता यांच्या पक्षाची, तृणमूल काँग्रेसची सद्दी संपवली. आता पुढच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत तृणमूल काँग्रेसचे काय होऊ शकते, हे सांगण्यासाठी कुणा राजकीय तत्त्ववेत्त्याची अजिबात गरज नाही. भाजपविरोधी सरकारे असलेल्या राज्यामधील प्रादेशिक पक्षांचे गेल्या काही वर्षांत काय झाले, यावर एक नजर टाकली, तरी तृणमूलच्या भवितव्याचा अंदाज येऊ शकतो. सपाटून आपटलेल्या पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचा आणि त्यांच्या सरकारचा कार्यकर्तृत्वाचा जमाखर्च हा वेगळा मुद्दा, पण ममता जिंकल्या असत्या तर दिवसेंदिवस आव्हानात्मक होत चाललेल्या राष्ट्रीय राजकारणात त्यांची भूमिका महत्त्वाची असली असती हे निर्विवाद. विरोधी राजकारणाचा चेहरा म्हणून जे काही मोजके नेते आहेत, त्यात ममता बॅनर्जी यांचे स्थान अपरिहार्य आहे. पण गेली दोन वर्षे पद्धतशीर नियोजन करीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये केवळ तृणमूल काँग्रेसलाच नाही तर ममता बॅनर्जी यांंनाही घरी पाठवले आहे. हे फक्त याच राज्यात घडले आहे, असे नाही. शेजारील ओडिशामध्ये दोन वर्षांपूर्वी भाजपने अशाच पद्धतीने नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाची २५ वर्षांची सत्ता संपुष्टात आणली. वास्तविक, नवीन पटनायक यांनी कायम भाजपला अनुकूल अशी भूमिका घेतली होती. पण आपण पटनायक यांचा पराभव करू शकतो याचा अंदाज आल्यावर भाजपने आक्रमक राजकीय भूमिका घेत जुन्या मित्राला घरी बसविले. या पराभवातून बिजू जनता दल वा नवीन पटनायक अजूनही बाहेर येऊ शकलेले नाहीत. उलट नेतेमंडळी पक्ष सोडू लागली आहेत. पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. ओडिशात काँग्रेस वाढू नये म्हणून भाजपकडून पटनायक यांच्या पक्षाला सध्या तरी जीवदान दिले गेले आहे. उद्या ममता बॅनर्जी यांची हीच अवस्था झाल्यास आश्चर्य वाटायला नको. आंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डी आणि तेलंगणात के. चंद्रशेखर राव या दोन प्रादेशिक पक्षांच्या मुख्यमंत्र्यांचाही भाजपने काँग्रेसच्या विरोधात वापर करून घेतला. संसदेत या दोन्ही पक्षांनी भाजपला वेळोवेळी मदत केली. पण वेळ आल्यावर भाजपने या दोन्ही मित्र पक्षांना दूर सारले. एवढेच नाही तर भाजपला नेहमी मदत करणार्‍या आणि विरोधकांपासून चार हात राहणार्‍या चंद्रशेखर राव यांच्या कन्येला, कविता यांना दिल्लीतील मद्य घोटाळ्यात ईडीने अटक केली होती. जगन मोहन यांचे विरोधक तेलुगू देशमचे चंद्राबाबू नायडू यांच्याशी मैत्री करीत भाजपने तेथील सत्तेत सहभाग घेतला. कर्नाटकात देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाला भाजपने असेच गुंडाळले. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असलेल्या आम आदमी पक्षाची दिल्लीतील १० वर्षांची सत्ता भाजपने लीलया उखडून टाकली. ‘आप’चे राज्यसभेचे सहा खासदार फोडून भाजपने पुढील वर्षी पंजाबमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत काय होऊ शकते याची चुणूक दाखवली आहे. प्रादेशिक पक्षांचे भाजपला किती वावडे आहे, यासंदर्भात महाराष्ट्राचे उदाहरणही फार जुने नाही.एकनाथ शिंदेआणिअजित पवारयांच्या बंडाला फूस देत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही प्रादेशिक पक्षांना भाजपने कमकुवत केले. या दोन्ही पक्षांना आता भाजपच्या कच्छपी लागल्याशिवाय पर्याय नाही. गृहमंत्री अमित शहा यांनी २०२९ मध्ये राज्यात स्वबळाचा कानमंत्र आधीच दिला आहे. तशी संधी आल्यास भाजप या पक्षांला वाळीत टाकल्याशिवाय राहणार नाही. पंजाबमध्ये अकाली दल, आसाममध्ये आसाम गण परिषद, गोव्यात महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष अशा विविध राज्यांमधील प्रादेशिक पक्षांचा हात धरीत त्या त्या राज्यांमध्ये भाजपने बस्तान बसविले. पुढे या पक्षांमध्येच फूट पाडून वा त्यांना कमकुवत करीत आपली ताकद वाढविली. आपली सत्ता वाढवत नेणे हे लोकशाहीत योग्यच असले तरी ती लोकशाही मार्गांनीच वाढवायची असते, हे मर्म भाजपने बाजूला टाकले, असा आरोप सातत्याने होताना दिसतो तो त्यामुळेच. भाषावार प्रांतरचना, त्यातून निर्माण झालेला असंतोष, वाढती प्रादेशिक अस्मिता, काँग्रेसची एकहाती सत्ता असताना राज्यांकडे झालेले दुर्लक्ष यातून १९७०च्या दशकात प्रादेशिक पक्षांचा हळूहळू उदय झाला. दक्षिण भारतात प्रादेशिक अस्मिता ज्वलंत असल्यानेच प्रादेशिक पक्षांना पोषक वातावरण तयार झाले. हिंदी सक्तीच्या विरोधातील आंदोलनातून द्रमुकने तमिळनाडूची सत्ता १९६७ मध्ये हस्तगत केली. तेव्हापासून काल टीव्हीकेला विजय मिळेपर्यंत या राज्यात द्रमुक व त्यातून फुटून निर्माण झालेल्या अण्णा द्रमुकचा वरचष्मा कायम राहिला. तेलुगू अस्मितेच्या मुद्द्यावर चित्रपट अभिनेते एन. टी. रामाराव यांनी स्थापन केलेल्या तेलुगू देशमला दोनतृतीयांशपेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या. तर मुंबईत‘हटाव लुंगी’च्या घोषणेवर शिवसेना वाढली. अशा पद्धतीने देशभर प्रादेशिक पक्ष स्थिरावले, त्यांनी राज्यकारभार केला. पण भाजपने हळूहळू प्रादेशिक पक्षांची जागा व्यापण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात युतीत १९९० ते २०१४ अशी जवळपास २५ वर्षे शिवसेना मोठा भाऊ होता. संधी मिळाल्यावर भाजपने शिवसेनेला ‘लहान भाऊ’ केले आणि नंतर तर पक्षातच फूट पाडली. शरद पवारांपासून ते ममता बॅनर्जी, जगनमोहन रेड्डी, चंद्रशेखर राव अशा विविध प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची पाळेमुळे ही काँग्रेसमधील. त्या अर्थाने ही काँग्रेसच्या झाडावरील कलमेच. पण पक्षांतर्गत विरोध किंवा दिल्लीच्या राजकारणाला कंटाळून या नेत्यांनी आपापल्या वेगळ्या पक्षांची स्थापना केली. पण आता भाजपच्या आक्राळविक्राळ राजकारणात या सर्व नेत्यांची, त्यांच्या राजकारणाची कोंडी झाली आहे वा त्यांच्या पक्षांना घरघर लागली आहे. वास्तविक देशभरातील सर्व भाजपविरोधी पक्ष एकत्र आले तर त्यांचा सामना करणे भाजपलाही कठीण जाते, याचे अलीकडचे उदाहरण म्हणजे महिला आरक्षण व मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या संदर्भात मांडण्यात आलेले घटना दुरुस्ती विधेयक. गेल्या लोकसभा निवडणुकीतही सर्व प्रमुख विरोधी पक्ष इंडिया आघाडी म्हणून एकत्र लढल्याच्या परिणामी ‘चारसो पार’चा नारा देणार्‍या भाजपला बहुमताचा आकडाही गाठता आला नाही. भाजप सतत ज्या काँग्रेसविरोधाचा नारा देतो, तो काँग्रेस लोकसभेत सर्वाधिक मोठा पक्ष ठरला. काळाचे चक्र कसे फिरते पहा. आज भाजपच्या एकाधिकारशाहीला विरोध हा काँग्रेस आणि त्याच्या परिघातल्या पक्षांचा अजेंडा आहे, तर काँग्रेसच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात, विरोधकांच्या ऐक्याची कल्पना १९६० च्या दशकात ज्येष्ठ समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांनी मांडली होती. त्यांनी मांडलेल्या बिगरकाँग्रेसवाद या संकल्पनेवर तेव्हा बरेच काथ्याकूट झाले होते. या विरोधकांची खरी ताकद वाढली ती १९६७ मध्ये काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतरच. तेव्हाच्या निवडणुकीत देशातील आठ राज्यांमध्ये काँग्रेसला सत्ता गमवावी लागली होती. २०१४ मध्ये भाजप सत्तेवर आल्यावर मोदी-शहा यांनी ‘काँग्रेसमुक्त भारता’चा नारा देत त्या दृष्टीने पावले टाकली. यामुळेच आजच्या घडीला देशातील ७० टक्क्यांपेक्षा अधिक भूभागावर भाजप किंवा मित्र पक्षांची सरकारे सत्तेत आहेत. दक्षिण भारत वगळता देशाच्या सर्व भागांमध्ये भाजपने बस्तान बसविले आहे. भाजपला गेल्या १२ वर्षांच्या सत्तेनंतरही काँग्रेस डोळ्यात का खुपते या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसला मिळणार्‍या मतांच्या टक्केवारीत आहे. एकेकाळी काँग्रेस विरुद्ध प्रादेशिक पक्ष असा सामना होता. या पक्षांचा आधार घेत भाजपने अनेक राज्यांमध्ये बस्तान बसवले आणि मग हळूहळू या पक्षांना संपवले. त्यामध्ये काँग्रेसची कलमे असलेले नेते आणि त्यांचे पक्षही आले. भाजपने ‘कलम’ केलेल्या या कलमांनी आता आपल्या मूळ खोडाला मजबूत करायला हवे. प्रादेशिक पक्ष संपल्यामुळे आता यापुढच्या काळात थेट सामना भाजप विरुद्ध काँग्रेस असा असेल. तो विषम जरूर असेल, पण लोकशाहीतील विरोधी आवाजाची जबाबदारी आता काँग्रेसला अधिक गंभीरपणे पार पाडावी लागेल, हे या निकालांनी अधोरेखित केले आहे.
29 shares
😢
L
Lokmat
May 5, 2026, 06:59 PM
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध संजू सॅमसनचे द्विशतक, रचला इतिहास

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध संजू सॅमसनचे द्विशतक, रचला इतिहास

टीम इंडियाचा अनुभवी विकेट किपर बॅटरसंजू सॅमसनचेन्नई सुपर किंग्सच्यासंघाकडून यंदाच्या हंगामात धमाक्यावर धमाका करताना दिसत आहे.दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात तो आणखी एका शतकाच्या जवळ पोहचला होता. धावा कमी असल्यामुळे त्याची शतकी संधी हुकली. पणदिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात नाबाद ८७ धावा करत त्याने खास 'द्विशतकी' डाव साधला. आयपीएलच्या एका हंगामात एका फ्रँचायझी संघा विरुद्धच्या दोन सामन्यात २०० पेक्षा अधिक धावा करणारा तो विराट कोहली आणि लोकेश राहुल या दिग्गजानंतर तिसरा फलंदाज ठरला. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! १९ वर्षांच्या इतिहासात फक्त तिघांनीच साधलाय 'द्विशतकी' डाव यंदाच्या हंगामातसंजू सॅमसनयाने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या चेन्नईच्या मैदानातील पहिल्या सामन्यात ५६ चेंडूत नाबाद ११५ धावांची नाबाद खेळी केली होती. त्यानंतर आता ८७ धावासह त्याने या संघाविरुद्ध एका हंगामात २०२ धावा केल्या. आयपीएलच्या आतापर्यंतच्या १९ वर्षांच्या इतिहासात विराट कोहली, केएल राहुल आणि संजू सॅमसन या तिघांनीच एका हंगामात एका फ्रँचायझी संघाविरुद्ध दोन सामन्यात २०० धावांचा आकडा गाठला आहे. संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम विराट कोहलीसह KL राहुलच्या नावे खास विक्रम हंगामात एकाच संघाविरुद्ध दोन शतके झळकवण्याचा खास विक्रम हा विराट कोहली आणि लोकेश राहुलच्या नावे आहे. विराट कोहलीनं २०१६ च्या हंगामात गुजरात लायन्स संघाविरुद्ध पहिल्या सामन्यात नाबाद शतक आणि दुसऱ्या सामन्यात १०९ धावांच्या खेळीसह २०९ धावा केल्या होत्या. लोकेश राहुलनं २०२२ च्या हंगामात मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळलेल्या दोन सामन्यात प्रत्येकी १०३, १०३ धावांची नाबाद खेळी साकारली होती. या दोघांप्रमाणे संजूलाही दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध एका हंगामात दोन शतके झळकवण्याचा डाव साधण्याच्या संजू अगदी जवळ होता. पण अल्प धावांचा पाठलाग करत असल्यामुळे ते साध्य झालं नाही.
48 shares
😊
L
Loksatta
May 5, 2026, 06:40 PM
बौद्ध संघटनांनी अनुसूचित जातींच्या न्याय्य प्रतिनिधीत्वासाठी मोहीम सुरू केली

बौद्ध संघटनांनी अनुसूचित जातींच्या न्याय्य प्रतिनिधीत्वासाठी मोहीम सुरू केली

मुंबई :अनुसूचित जातीच्या विकासासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात दिला जाणारा निधी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागांमधून उपलब्ध होणारे राजकीय प्रतिनिधीत्व यांमध्ये योग्य वाटा मिळवण्यासाठी देशातील १६ व्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन पंचायत समिती आणि आंबेडकरी अभ्यासक-विचारवंतांनी ‘जात सांगा’ असे अभिनव अभियान सुरु केले आहे. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे प्रस्तावित असलेले उपवर्गीकरण आणि विलंबाने होत असलेली जनगणना यांमुळे बौद्ध समाजात प्रतिक्रिया उमटू लागली आहे. १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. बौद्धांमध्ये जाती नाहीत, त्यामुळे जनगणनेत बौद्ध धर्म सांगणार पण पूर्वाश्रीमची जात नमूद करणार नाही, अशी अनेक नवबौद्धांची ताठर भूमिका आहे. यामुळे बौद्ध धर्मियांचा टक्का वाढला तरी अनुसूचित जातीची लोकसंख्या मात्र घटली. परिणामी, लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणारा निधी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय प्रतिनिधित्व कमी झाले. सहा महिन्यांपूर्वी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या विषयाला तोंड फुटले होते. नुकत्याच सुरु झालेल्या जनगणनेमध्ये ही चूक दुरुस्त करण्याचा निर्णय नवबौद्ध समाजाने घेतला आहे. यामध्ये आंबेडकर कुटुंबिय विश्वस्त असलेल्या भारतीय बौद्ध महासभा आणि बौद्धजन पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे. जागोजागी बैठका घेतल्या जात आहेत. अनेक संघटना व समाजातील अभ्यासक- विचारवंतांनी पत्रके काढली आहेत. जनगणनेमध्ये प्रथम बौद्ध धर्म नोंद करा. बौद्ध धर्म नोंद केल्याने अनुसूचित जातीचे आरक्षण जाणार नाही. हिंदू व शिखांप्रमाणे बौद्धांमधील अनुसूचित जातींना आरक्षणाचे लाभ मिळण्याबाबत १९९० मध्ये कायद्यामध्ये दुरुस्ती केली आहे. बौद्ध धर्म नोंदवल्यानंतर संविधानिक अधिकाराचा लाभ मिळण्यासाठी पूर्वाश्रमीची जातसुद्धा सांगा, त्याचबरोबर बौद्ध साहित्य ज्या भाषेमध्ये आहे ती पाली अधिकची भाषा म्हणून नोंद करा, असे आवाहन केले जात आहे. राज्यात २०११ च्या जनगणनेप्रमाणे १ कोटी ३२ लाख अनुसूचित जातीची लोकसंख्या असून त्यामध्ये ६५ लाख ३१ हजार बौद्ध आहेत. हे अभियान राष्ट्रीय पातळीवर राबवण्यात येत आहे. १९५६ चे धर्मांतर आणि पूर्वाश्रीमीची जात नमूद न करणे यामुळे १९६१ पासूनच्या जनगणनांमधील नवबौद्धांच्या लोकसंख्येसंदर्भात संभ्रम निर्माण झालेला आहे. एकीकडे राजकीय प्रतिनिधीत्व आणि निधीचा लाभ घेण्याबरोबरच राष्ट्रीय पातळीवर बौद्धांची नोंदणी १० कोटीपर्यंत नेण्याचे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. उत्तरेत चमार, सैनी, मौर्य, खुशवा, गुजरातमध्ये वाल्मिकी व वणकर, कर्नाटकमध्ये वल्लुवन आणि महाराष्ट्रात चर्मकार व मातंग व इतरांनी जनगणनेमध्ये बौद्ध धर्म नोंदवावा, असे आम्ही आवाहन करत आहोत.– भीमराव आंबेडकर, कार्याध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा. बौद्ध धर्माचरण करणारे पण कागदपत्रावर हिंदू व अनुसूचित जातीचा उल्लेख केलेले लाखो नागरिक आहेत. त्यांनी या जनगणनेमध्ये बौद्ध धर्माबरोबरच पूर्वाश्रीमीची जात नोंदवावी, असे आमचे आवाहन आहे.– राजकुमार बडोले, माजी सामाजिक न्याय मंत्री.
68 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 04:05 PM
ऐतिहासिक टी-20 विश्वचषक विजयानंतर भारताने आयसीसी टी-20 क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले

ऐतिहासिक टी-20 विश्वचषक विजयानंतर भारताने आयसीसी टी-20 क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इतिहास रचणाऱ्या टीम इंडियाने आयसीच्या वार्षिक टी-२० क्रमवारीत अव्वलस्थान कायम राखले आहे. एका बाजूला आयपीएल स्पर्धेचा थरार रंगला असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं मंगळवारी नवी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत टीम इंडियाने 'नंबर वन'चा ताज कायम राखला आहे. इंग्लंड क्रिकेट संघ दुसऱ्या, तर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इतिहास रचला अन् टीम इंडियाने आपला दबदबा कायम ठेवला सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने मार्चमध्येआयसीसीटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील जेतेपदाचा यशस्वीरित्या बचाव करुन दाखवला. एवढेच नाही तर विक्रमी तिसऱ्यांदा भारतीय संघाने वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरले. या कामगिरीच्या जोरावर आता भारतीय संघाने वार्षिक टी-२० क्रमवारीत आपला दबदबा कायम राखला आहे. हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर नव्या क्रमवारीत टीम इंडियापाठोपाठ लागतो इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा नंबरआंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, ताज्या क्रमवारीत मे २०२५ नंतर खेळल्या सर्व सामन्यांसह त्याआधीच्या दोन वर्षांतील सामन्यांतील ५० टक्के कामगिरीच्या आधारावर नवी क्रमवारी तयार करण्यात आली आहे. यात टीम इंडिया २७५ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडच्या खात्यात (२६२) तर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ २५८ गुणांसह इंग्लंडच्या अधिक जवळ पोहोचला आहे. पाकिस्तान कितव्या स्थानी? आयसीसीच्यानव्या क्रमवारीत अव्वल सात संघांच्या स्थानात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे न्यूझीलंड (२४७), दक्षिण आफ्रिका (२४४), पाकिस्तान (२४०) आणि वेस्ट इंडिज (२३३) हे संघ अनुक्रमे चौथ्या ते सातव्या स्थानावर कायम आहेत. श्रीलंकेला फटका, अमेरिकेा फायद्यात श्रलींकेच्या संघाला ६ रेटिंग पॉइंट्सचा फटका बसला अशून ते आठव्या स्थानावरुन नवव्या स्थानावर घसरले आहेत. दुसरकीडे बागंलादेशच्या संघाने आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. अफगाणिस्तानचा संघ दहाव्या स्थानावर असून झिम्बाब्वे आणि आयर्लंड अनुक्रेम ११ व्या आणि १२ व्या स्थानी आहेत. अमेरिकेच्या संघाने दोन स्थानांच्या सुधारणेसह १३ व्या स्थानावर झेप घेतली आहे.
71 shares
😊
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 03:58 PM
मुंबई उच्च न्यायालयाने 16 वर्षीय बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी दिली

मुंबई उच्च न्यायालयाने 16 वर्षीय बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी दिली

नागपूर :मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी अकोला जिल्ह्यातील लैंगिक अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्याची परवानगी दिली. न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व राज वाकोडे यांनी हा निर्णय दिला. वैद्यकीय मंडळाद्वारे सादर अहवालाच्या अधीन राहून या मुलीचा अकोला येथील सरकारी रुग्णालयामध्ये गर्भपात करण्यात यावा. ही प्रक्रिया बुधवारपर्यंत पूर्ण करण्यात यावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले. मुलगी १६ वर्षे ११ महिने वयाची असून ती २६ आठवड्याची गर्भवती आहे. मुलीचे तिच्याच गावातील आरोपीसोबत प्रेम संबंध होते. आरोपीने मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, तसेच लग्न करण्याचे आमीष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यामुळे मुलीला गर्भधारणा झाली. ही बाब उघडकीस आल्यानंतर पिंजर पोलिसांनी २३ एप्रिल २०२६ रोजी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. परंतु, आरोपीच्या कुकृत्यामुळे मुलीचे आयुष्यच उद्ध्वस्त होण्याच्या काठावर आले होते. दरम्यान, योग्यवेळी आवश्यक मार्गदर्शन मिळाल्यामुळे तिने गर्भपाताची परवानगी मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. ॲड. सोनिया गजभिये यांनी मुलीची बाजू मांडताना गर्भपाताची गरज अधोरेखित केली. मुलगी अत्यंत गरीब असून बाळाचे पालनपोषण करण्याची तिची आर्थिक क्षमता नाही. तसेच, ती अल्पवयीन असल्याने बाळाला जन्म देण्याची तिची शारीरिक-मानसिक क्षमताही नाही. या परिस्थितीत बाळाला जन्म देण्यास भाग पाडल्यास याचा तिला आयुष्यभर मनस्ताप सहन करावा लागेल, असेही ॲड. गजभिये त्यांनी सांगितले. न्यायालयाला या मुद्यांमध्ये तथ्य आढळून आल्यामुळे मुलीला दिलासा देण्यात आला.
5 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 03:48 PM
अंबेगाव तालुक्यातील परगावमध्ये स्वतःच्या वडिलांनी आणि सहकाऱ्यांनी विवाहित महिलेचे केले अपहरण

अंबेगाव तालुक्यातील परगावमध्ये स्वतःच्या वडिलांनी आणि सहकाऱ्यांनी विवाहित महिलेचे केले अपहरण

लोकमत न्यूज नेटवर्क, अवसरी -आंबेगाव तालुक्यातील पारगाव परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून विवाहित मुलीचे तिच्याच वडिलांनी इतर साथीदारांसह अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या चार तासांत सर्व ७ आरोपींना अटक केली आहे. दि. ०४ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास सौ. साक्षी विशाल भागवत (रा. पारगाव, लबडे मळा, ता. आंबेगाव, जि. पुणे) या त्यांच्या सासरच्या व्यक्तीसोबत असताना ही घटना घडली. पीडितेच्या वडिलांसह अन्य सहा जणांनी तिला मारहाण करत, शिवीगाळ व दमदाटी करून जबरदस्तीने एका वाहनात टाकून अपहरण केले. या अपहरणामागील उद्देश फिर्यादीस जबरदस्तीने दुसरे लग्न लावून देण्याचा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तात्काळ हालचाल सुरू केली. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी शोधमोहीम राबवत अवघ्या ४ तासांच्या आत सर्व आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. या प्रकरणी पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात शिवाजी भाऊ खाटेकर (वय ४५, रा. पारगाव, ता. आंबेगाव,) अमोल चांगदेव रोडे (वय ३३), सचिन रावसाहेब रोडे (वय २९), अक्षय विश्वनाथ वाडगे (वय २९), अभिजीत बारकू रोडे (वय २६), नंदकिशोर विलास तितर (वय ३२, सर्व रा. नांदूर खंदरमाळ, ता. संगमनेर, जि. अहमदनगर), जयश्री अशोक कुदनर (वय ३५, रा. साकोर, ता. संगमनेर, जि. अहील्यानगर) यांना अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पारगाव पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पोलीस उपनिरीक्षक भाउसाहेब लोकरे, पोलीस हवालदार अविनाश कालेकर, सचिन डामसे, पोलीस अंमलदार संजय साळवे, मंगेश अंभग, चंद्रकांत गव्हाणे, प्रशांत जगताप व महिला पोलीस अंमलदार काजल फलके यांनी केली.
58 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 03:46 PM
मंदार जाधवने अभिनय कारकिर्दीतील त्याच्या संघर्षाबद्दल केला खुलासा

मंदार जाधवने अभिनय कारकिर्दीतील त्याच्या संघर्षाबद्दल केला खुलासा

मुंबई -लोकप्रिय अभिनेता मंदार जाधवला स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. या मालिकेमध्ये त्यानं जयदीपची भूमिका साकारलेली. ही मालिका बंद झाली असली तरी आजही चाहते त्याला जयदीप म्हणूनच ओळखतात. मंदार जाधवने यापूर्वी हिंदी मालिकेतही काम केलंय. अभिनेत्यानं हिंदी मालिकेतून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये मंदार जाधवने त्याच्या संघर्षाबद्दल सांगितलं आहे.मंदार जाधवनं सांगितला संघर्षमंदार जाधवनं नुकतीच 'सर्व काही' या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान मंदारनं त्याला 'अल्लादिन' ही हिंदी मालिका कशी मिळाली, याबद्दल सांगितलंय. मंदार म्हणाला की, 'माझा लहान भाऊ मेघन जाधवसोबत मी ऑडिशनला गेलेलो, त्याला पाठिंबा देण्यासाठी. पण, तिथे मलाच विचारणा झाली. ते म्हणाले की, आम्ही जशा मुलाच्या शोधात आहोत तू तसाच आहेस तू. या मालिकेत काम करशील का? त्यावर मीसुद्धा 'हो मी पण करेन' असं म्हणालो. तिथून माझा प्रवास सुरू झाला. त्यामुळे माझी पहिली मालिका मिळवण्यासाठी मला स्ट्रगल करावा लागला नाही.'Anupam Kher : मी तुझं काय वाईट केलंय? बंगाल जिंकताच भाजप नेत्यानं काढला अनुपम यांच्या नसलेल्या केसांचा विषय; अभिनेत्याचं चोख उत्तरअभिनेत्यानं दिल्या ७०० ते ८०० ऑडिशनकाम मिळवण्यासाठीच्यासंघर्षाबद्दलबोलताना मंदार जाधव म्हणाला की, 'हो संघर्ष आहे. कलाकार म्हणून काम करणं कठीण असतं. माझी पहिली मालिका संपली तेव्हा मला बऱ्यापैकी लोकप्रियता मिळाली होती. दोन अडीच वर्षे ती मालिका सुरू होती, पण ती मालिका संपल्यानंतर माझा संघर्ष सुरू झाला. जरी मला अभिनेता व्हायचं नव्हतं तरी माझ्या नशिबात ते लिहिलं होतं त्यामुळे ती मालिका करत असताना मला अभिनय आवडतो याची जाणीव झाली. ती मालिका संपली त्यावेळी मी खूप बारीक होतो. त्यामुळे मी जेव्हा ऑडिशनला जायचो तेव्हा तू खूप बारीक आहेस, जरा बॉडी बनव, चांगलं खा आणि हिरोसारखं बन आधी, असं सांगितलं जायचं. तेव्हा मला जाणवलं की, जर तुम्हाला काम मिळवायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. मी अजिबात तसा दिसत नव्हतो. मग मी स्वत:वर काम केलं. त्यावेळी मी हिंदीमध्ये जवळपास ७०० ते ८०० ऑडिशन दिल्या आहेत. चार-पाच वर्षे हे सुरू होतं आणि मला बऱ्याचदा नकार मिळाला.'मंदार जाधवने आयुष्यातील खास क्षण केला शेअर'घरी परिस्थिती ठीक-ठाक होती. आम्ही चाळीत वाढलोय, त्याचा मला आनंद आहे. पण, संघर्षाबद्दल बोलायचं झालं तर पहिल्या मालिकेनंतर मला दुसरं काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. जिथे जायचो तिथे नकार मिळत होता. तेव्हा मी ठरवलेलं की मी एक चांगलीमालिकाकेली आहे. त्यात छान काम केलंय त्यामुळे आपण या क्षेत्रातच राहायला हवं. आई-बाबांचा पाठिंबा होता, त्यामुळे मी त्यातून बाहेर आलो. बाबासुद्धा अभिनेते, दिग्दर्शक, लेखक असल्यानं त्यांना याची जाणीव होती. त्यामुळे, या क्षेत्रातील संघर्ष त्यांना माहीत होता.' असं मंदारनं शेवटी सांगितलं
48 shares
😊
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 03:29 PM
दिल्लीच्या फलंदाजीचा संघर्ष सुरूच, के. एल. राहुल अपयशी

दिल्लीच्या फलंदाजीचा संघर्ष सुरूच, के. एल. राहुल अपयशी

दिल्ली:आयपीएल 2026चा आजचा सामना हा दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरु आहे. सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये सुरु आहे. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अक्षर पटेलचा हा निर्णय काही योग्य ठरलेला पाहायला मिळाला नाही. संघाने अतिशय खराब सुरुवात केली. या दरम्यान के एल राहुलची जोरदार चर्चा होत आहे.KL Rahul चीचेन्नई सुपर किंग्सविरुद्धचीकामगिरी खराब होती. राहुलने खूप सावकाश फलंदाजी करत 13 चेंडूंमध्ये केवळ 12 धावा केल्या. या उजव्या हाताच्या फलंदाजाचा स्ट्राईक रेट 92.31 होता. दिल्लीला आशा होती की राहुल आक्रमक फलंदाजी करून पॉवरप्लेमध्ये एक चांगली सुरुवात करून देईल, पण तसे झाले नाही. राहुलने या सामन्यात दोन चौकार मारले, पण एका खराब शॉटमुळे त्याचा डाव संपला.Rohit Sharma: रोहित आधीच फिट होता, तरी त्याला खेळवलं नाही असं का? मुंबईच्या कोचने सगळं सांगून टाकलंकेएल राहुलची मौल्यवान विकेट अकील हुसेनने घेतली. या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने राहुलला एक लांब षटकार मारण्याच्या आशेने एक उंच चेंडू टाकला, पण तो त्यात पूर्णपणे अपयशी ठरला. राहुलने लांब षटकार मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटच्या मधोमध लागला नाही आणि ऋतुराज गायकवाडने सोपा झेल घेतला. बाद होण्यापूर्वी राहुलचा पंचांशी वादही झाला होता. दुसऱ्या षटकात राहुल धाव घेण्यासाठी धावला आणि चुकून खेळपट्टीच्या मधोमध पडला. त्यानंतर पंचांनी त्याला खेळपट्टीच्या मधोमध धावल्याबद्दल फटकारले. तेव्हा राहुलने स्पष्ट केले की, गोलंदाज त्याच्या समोर आल्यामुळे त्याला आपली दिशा बदलावी लागली.केएल राहुल चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध अपयशी ठरला असेल, पण त्याने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थान मिळवले आहे. राहुलने 10 सामन्यांमध्ये 49.44 च्या सरासरीने 445 धावा केल्या असून, 440 धावा करणाऱ्या अभिषेक शर्माला मागे टाकले आहे. हेनरिक क्लासेन 425 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. वैभव सूर्यवंशीनेही 10 सामन्यांमध्ये 404 धावा केल्या आहेत. साई सुदर्शनने 10 सामन्यांमध्ये 385 धावा केल्या आहेत.
47 shares
😢
Pudhari logo
Pudhari
May 5, 2026, 03:23 PM
मालवाहू ट्रकचा अपघात, चालकाचा मृत्यू

मालवाहू ट्रकचा अपघात, चालकाचा मृत्यू

अपघात इतका भीषण होता की, मालवाहू ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. चालक गाडीत अडकून पडल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने प्रयत्न करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
12 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 03:22 PM
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय, 15 वर्षांनंतर तृणमूल काँग्रेसचा पराभव

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय, 15 वर्षांनंतर तृणमूल काँग्रेसचा पराभव

Assembly Election 2026:पश्चिम बंगालविधानसभा निवडणुकीत यंदा मतदारांनी १५ वर्षांपासूनचे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूलकाँग्रेसचेसरकार पायउतार करीत गेल्या सुमारे ५० वर्षांपासून राज्यात ठराविक काळानंतर सत्तापालट घडवून आणारी एकतर्फी निवडणुकीची परंपरा कायम राखली.पश्चिम बंगालमध्येभाजपालातब्बल २०६ जागा मिळाल्या. तर तृणमूलकाँग्रेसलाकेवळ ८० जागांवर समाधान मानावे लागले. आसाम येथेहीभाजपानेविजयाची लय कायम ठेवली. आता भाजपा पुढील तयारीला लागल्याचे सांगितले जात असून, भाजपाने जे टार्गेट सेट केले आहे, त्यामुळे काँग्रेसच्या चिंतेत भर पडू शकते, असे म्हटले जात आहे. पश्चिम बंगालच्या विजयानंतर भाजपप्रणित रालोआशासित राज्यांची संख्या २२ वर पोहचली आहे. त्यामुळे भाजपाची ताकद वाढली आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच सरकार स्थापन करण्याच्या तयारीत भाजपा आहे. ९ मे रोजी पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो, असा कयास बांधला जात आहे. यामुळे आता झारखंड हे पूर्व भारतातील भाजपा सरकार नसलेले एकमेव राज्य ठरणार आहे. या राज्यांमध्ये काँग्रेसचा जवळपास पूर्णपणे सफाया झाला आहे. परिणामी, काँग्रेसवर पुन्हा सत्तेत येण्याचा दबाव वाढला आहे. भाजपाविरुद्ध लढताना सत्ता टिकवणे हे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासमोर एक मोठे आव्हान असेल. झारखंडला चारही बाजूंनी भाजपाचा वेढा! झारखंडच्या शेजारील राज्ये बिहार, छत्तीसगड आणि ओडिशा यांच्या पाठोपाठ आता भाजपाने पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन केले आहे. आतापर्यंत झारखंड आणि पश्चिम बंगाल या पूर्व भारतातील राज्यांमध्ये भाजपा किंवा एनडीएचे सरकार नव्हते. मात्र, आता पश्चिम बंगालमधील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. याचा परिणाम झारखंड निवडणुकांवर होईल, असे म्हटले जात आहे. या नव्या राजकीय परिस्थितीत हेमंत सोरेन सरकारवर दबाव वाढला आहे. हेमंत सोरेन यांचे अलीकडील दिल्ली दौरे, आघाडीतील अंतर्गत कुरबुरी आणि केंद्रीय निधी वितरणातील विलंबाच्या तक्रारी यामुळे आता याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडी 'अभेद्य' असल्याचे वारंवार म्हटले असले तरी, पश्चिम बंगाल आणि आसामच्या निवडणुकांवरून काँग्रेस आणि मित्रपक्षांमधील मतभेद सातत्याने चव्हाट्यावर आलेले पाहायला मिळाले आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस आणि मित्रपक्षांचे नेते एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये जेएमएम आणि काँग्रेस पक्ष संगनमताने एकत्रित लढले असते, तर आता चित्र वेगळे पाहायला मिळाले असते, असे म्हटले जात आहे.
34 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 03:21 PM
बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये लग्नाच्या सोहळ्यादरम्यान वधूची बदली

बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये लग्नाच्या सोहळ्यादरम्यान वधूची बदली

पाटणा: लग्न सोहळ्यातील विधी सुरु होते. मांडवात आनंदीआनंद होता. दोन्ही कुटुंबांमध्ये उत्साह होता. पण एका नोटेनं नवरदेवाचं पितळ उघडं पडलं आणि अखेरच्या क्षणी लग्न मोडलं . पाठवणीच्या वेळी नवरदेवाचं बिंग फुटलं. यानंतर नवरदेवाला नवरीशिवाय घरी परतावं लागलं. यानंतर तिचा विवाह अन्य तरुणाशी झाला. ही चक्रावून टाकणारी घटना बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये घडली आहे.बरियारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या गावात हा प्रकार घडला. गावात मनियारी परिसरातून शुक्रवारी एक वरात आली होती. रात्रभर विवाह विधी चालले. लग्न सोहळा संपन्न झाला. मंडपात बसलेला नवरदेव वेगळाच आहे, याची कल्पना तोवर कोणालाच आलेली नव्हती. ज्या तरुणाशी विवाह निश्चित झाला होता, त्याच्या जागी वेगळाच तरुण नवरदेव म्हणून सर्व विधी करत होता.Indigo Flight Power Bank Fire: प्रवाशाच्या पॉवर बँकला आग, संपूर्ण विमानात धूर; एमर्जन्सी गेटनं प्रवाशांची थरारक सुटकाशनिवारी सकाळच्या सुमारास नवरीनं नवरदेवाची परीक्षा घेण्यासाठी त्याला २०० रुपयांची नोट दिली. ही कितीची नोट आहे, असा प्रश्न नवरीनं नवरदेवाला विचारला. त्यावर २००० रुपयांची नोट असल्याचं उत्तर नवरदेवानं दिलं. त्यामुळे सगळ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. नवरदेवाला २०० आणि २००० रुपयांच्या नोटांमधील फरक लक्षात न आल्यानं तिथे असलेल्या महिला वर्गानं गोंधळ घातला.Jabalpur Boat Accident: आईनं जीव सोडला, पण ती माऊली बाळाला सोडतच नव्हती! माय-लेकरांना बाहेर काढणारं बचाव पथक हळहळलंहळूहळू विषय तापत गेला. आमच्या सोबत विश्वासघात झाल्याचं म्हणत वधू पक्षानं नवरीची पाठवणी करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिलाय लग्नात झालेल्या गोंधळाची माहिती बरियापूर पोलीस ठाण्याला देण्यात आली. त्यानंतर काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही कुटुंबांना समजावण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण वर पक्षानं ऐकलं नाही. अखेर नवरदेवाला रिकाम्या हातानं परतावं लागलं. नवरीशिवाय वरात पसरली. पोलिसांनी वर पक्षातील एका तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली आहे.
1 shares
😢
M
Maharashtra Times
May 5, 2026, 03:20 PM
हट्टी महिलेचे टीव्ही-सेव्हिंग तंत्र बिहारमध्ये व्हायरल

हट्टी महिलेचे टीव्ही-सेव्हिंग तंत्र बिहारमध्ये व्हायरल

काही लोकांचा स्वभाव फारच हट्टी असतो. त्यांना कितीही समजावलं तरी ते आपला हट्ट काही सोडत नाहीत. किंबहुना अशी मंडळी प्रत्येक गोष्ट आपल्या ईगोवर घेतात आणि मग पुढे त्यांचं काय होतं हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही.अशाच एका हट्टी महिलेचा व्हिडिओ समोर आला आहे. तिनं आपल्या घरात टीव्ही लावताना तो थेट AC च्या खाली लावला. वास्तविक, टीव्ही आणि AC एकाखाली एक कधीच लावू नयेत. कारण काही वेळा AC मधून पाणी येतं आणि ते थेट टीव्हीवर पडून टीव्ही खराब होऊ शकतो.पण टेक्निशियनच्या सांगण्यावरूनही ती महिला काही ऐकली नाही. अखेर आपली नोकरी वाचवण्यासाठी टेक्निशियनने काय जुगाड केला आहे, हे आता तुम्हीच पाहा. हा व्हिडिओ पाहून अख्खं इंटरनेट आता या महिलेची फिरकी घेत आहे.नेमकं घडलं तरी काय?हा व्हिडिओ @ChapraZila या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ही घटना बिहारमधील छपरा जिल्हा येथे घडल्याचं म्हटलं जात आहे.व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका महिलेनं जबरदस्तीने टेक्निशियनला AC च्या अगदी खाली टीव्ही लावायला सांगितलं. टेक्निशियनने तिला संभाव्य समस्या स्पष्टपणे सांगितल्या होत्या, पण ती काही ऐकायला तयार नव्हती.अखेर त्याने तिचा हट्ट पूर्ण केला आणि सोबतच आपली नोकरी वाचवण्यासाठी एक व्हिडिओ शूट केला, ज्यामध्ये संपूर्ण घटना स्पष्ट करून सांगितली. गंमत म्हणजे व्हिडिओमध्ये महिलेनं स्वतःच्या सांगण्यावरूनच AC आणि टीव्ही एकाखाली एक लावल्याचं मान्य केलं.(फोटो सौजन्य - Raymond Aquila/pexels.com)टेक्निकल समस्या काय आहे?​​AC चालू असताना आतमध्ये थंड हवा तयार होते आणि पाण्याचे थेंबही तयार होतात. हे पाणी पाईपद्वारे बाहेर टाकलं जातं. पण जर पाईप जाम झाला किंवा AC मध्ये काही तांत्रिक बिघाड झाला, तर पाणी बाहेर जाण्याऐवजी आतूनच गळू लागतं. अशा वेळी खाली टीव्ही असेल, तर हे पाणी थेट त्यावर पडून टीव्हीमध्ये बिघाड होऊ शकतो.म्हणूनच टीव्ही आणि AC वेगवेगळ्या भिंतींवर लावण्याचा सल्ला दिला जातो. हा व्हिडिओ ४ लाख ३३ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि नेटकऱ्यांनी तिची चांगलीच फिरकी घेतली आहे.(महत्वाची टीप - या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)
70 shares
😢
M
Maharashtra Times
May 5, 2026, 03:16 PM
स्वच्छता आणि दळणवळणावर भर देत पुणे पालखी सोहळ्याची तयारी करत आहे

स्वच्छता आणि दळणवळणावर भर देत पुणे पालखी सोहळ्याची तयारी करत आहे

स्नेहल निमगिरे, पुणे :पुणे शहरामध्ये पालखी सोहळ्याच्या नियोजनाला सुरुवात करण्यात आली आहे. वारकरी संप्रदायाच्या आस्थेचा आणि भक्तिभावाचा महासागर असलेल्या पालखी सोहळ्यासाठी पुणे शहरात महानगरपालिकेकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. लाखो भाविकांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी महापौर मंजुषा दीपक नागपुरे यांनी प्रशासनाला अत्यंत स्पष्ट आणि कडक सूचना दिल्या आहेत.कचरामुक्त परिसर ठेवण्याचे आदेशगेल्या वर्षी पालखी मुक्कामाच्या बैठकीत मोठा गोंधळ झाला होता. मात्र यंदा पालखी मार्गावर कुठेही गोंधळ, अस्वच्छता किंवा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी संपूर्ण नियोजनावर भर देण्यात आला आहे. मार्गावर स्वच्छता मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, ठिकठिकाणी कचरामुक्त परिसर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वागत मंडळांनी स्पीकर व्यवस्था, पिण्याचे शुद्ध पाणी आणि पुरेशी स्वच्छतागृहे तातडीने उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.फील्डवर सक्रिय राहण्याचे निर्देशभाविकांच्या सोयीसाठी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या सुविधा उभारल्या जाणार आहेत. यामध्ये जलपान केंद्रे, वैद्यकीय तपासणी शिबिरे आणि आपत्कालीन सेवा केंद्रांचा समावेश असेल. कोणत्याही परिस्थितीत भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाला “फील्डवर सक्रिय” राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.Pune Crime : गहू खरेदीला बोलावलं, मग पिस्तूल रोखून लुटलं; पोलिसांनी दरोडेखोरांना फिल्मी स्टाईलने पकडलंबोपोडी हाइट बॅरिअररस्त्यांची अवस्था लक्षात घेऊन पालखी मार्गावरील खराब रस्त्यांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. विशेषतः बोपोडी परिसरात असलेल्या तीव्र चढ-उतारामुळे तेथे ‘हाइट बॅरिअर’ बसवण्याचे आदेश PWD विभागाला देण्यात आले आहेत, जेणेकरून गर्दीतही सुरक्षितता कायम राहील.गर्दीचे नियोजन अधिक सुटसुटीत करण्यासाठी होळकर पूल परिसरातील पालखी थांबा वेळ कमी करण्याचा विचार प्रशासनाकडून केला जात आहे. तसेच PMPML बससेवा अधिक सक्षम करून भाविकांसाठी सुलभ वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचेहीनिर्देशदेण्यात आले आहेत.उत्सव काळात शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक व्यवस्थापन काटेकोरपणे राबवले जाणार आहे. शाळा, स्थानिक संस्था आणि विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधून संपूर्ण यंत्रणा एकत्रितपणे कार्यरत राहणार आहे.बोपोडी आणि खडकी परिसरात पालखी विश्रांतीसाठी सुमारे १५ मिनिटांचा कालावधी निश्चित करण्यात येणार असून, त्या वेळेत भाविकांना दर्शन घेण्यासाठी सुव्यवस्थित व्यवस्था केली जाणार आहे. एकूणच, लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा हा भव्य सोहळा सुरक्षित, स्वच्छ आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी पुणे प्रशासनाने तयारीला वेग दिला असून शहर “पालखी स्वागतासाठी पुणे सज्ज” झाले आहे.
5 shares
😢
P
Pudhari
May 5, 2026, 03:09 PM
खंडणीच्या वादावरून पतीने पत्नीला बेदम मारहाण केली

खंडणीच्या वादावरून पतीने पत्नीला बेदम मारहाण केली

दि. ३ मे रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास आरोपींनी “माहेरून २ लाख रुपये आण” या कारणावरून महिलेशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर पतीने स्वयंपाकघरातील चाकूने तिच्या उजव्या गालावर वार करून जखमी केले. तर इतर आरोपींनीही मारहाण करत तिला घराबाहेर काढण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
38 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 03:09 PM
उन्हाळी पिके परिपक्वता गाठतेः भरण्याच्या टप्प्यांमध्ये योग्य काळजी घेण्यासाठी टिपा

उन्हाळी पिके परिपक्वता गाठतेः भरण्याच्या टप्प्यांमध्ये योग्य काळजी घेण्यासाठी टिपा

Agriculture News :सध्या उन्हाळ बाजरी - दाणे भरणे ते परिपक्वतेच्या अवस्थेत आहे, तर उन्हाळी भुईमूंग - आऱ्या उतरण्याची ते शेंगा लागण्याची अवस्था /शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत नेमकी कशी काळजी घ्यावी, हे समजून घेऊयात... उन्हाळ बाजरी - दाणे भरणे ते परिपक्वता अवस्था उन्हाळी भुईमूंग - आऱ्या उतरण्याची ते शेंगा लागण्याची अवस्था /शेंगा भरण्याच्या अवस्थेत - ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी
25 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 03:05 PM
पुणेः पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन दर म्हणून 16 कोटी 1 लाख रुपये निश्चित करण्यात आले

पुणेः पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन दर म्हणून 16 कोटी 1 लाख रुपये निश्चित करण्यात आले

पुणे:पुरंदरयेथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीयविमानतळासाठीभूसंपादनाचा अंतिम दर १ कोटी ६१ लाख रुपये निश्चित केला आहे. गुरुवारपासून (दि. ७) प्रत्यक्ष भूसंपादन-करारनाम्याला सुरुवात होईल. जमीन मोजणीवेळी ९६ टक्के शेतकऱ्यांनी संमती दिली असली तरी प्रत्यक्ष भूसंपादनावेळीही संमती आवश्यक आहे. १० जूनपर्यंत संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति एकरी सरासरी दोन कोटी रुपयांचा मोबदला मिळेल. संमती न दिलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी सक्तीने संपादित होणार आहेत. मोबदल्यासाठीचा दर राज्य सरकारने विशेष बाब म्हणून निश्चित केला असून यात आता कोणताही बदल होणार नाही. भूसंपादनाचे काम पूर्ण झाल्यानंतर निविदा काढण्यात येणार असूनविमानतळाचेकाम ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. डुडी म्हणाले, “पुरंदरविमानतळासाठी गेल्यावर्षी एप्रिलमध्ये अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये करण्यात आलेल्या मोजणीदरम्यान ९६ टक्के शेतकऱ्यांनी जमीन देण्यास संमती दर्शविली होती. त्यानुसार १ हजार २१६ हेक्टर अर्थात सुमारे ३ हजार एकर जमीन विमानतळासाठी घेण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले. या भूसंपादनाचा प्रस्ताव एमआयडीसीकडे पाठविण्यात आला. त्याला ९ फेब्रुवारी रोजी मान्यता देण्यात आली. भूसंपादनापोटीच्या मोबदल्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केल्यानंतर त्यासंदर्भातील दर निश्चिती नुकतीच करण्यात आली.” यासाठी तालुक्यातील सात गावांमधील बागायती क्षेत्रासह जिरायत जमिनीला गेल्या तीन वर्षांत मिळालेला सरासरी दर लक्षात घेऊन प्रति एकरी १ कोटी ६१ लाख १ हजार ९२५ रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये अधिसूचना जारी झाल्यापासून आजवर मोबदल्याच्या रकमेवरील व्याजदेखील समाविष्ट करण्यात आले आहे. हे व्याज प्रति एकरी सुमारे ८ लाख रुपये इतके आहे. शेतात असणारी वनझाडे, फळझाडे, विहिरी, बोअरवेल, पाईपलाईन, घरे, पोल्ट्री याचेही मूल्य काढून हा दर निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार काही शेतकऱ्यांना सुमारे सव्वादोन कोटी रुपये प्रति एकर मोबदला मिळणार आहे, तर काही शेतकऱ्यांना १ कोटी ६१ लाखांपर्यंत मोबदला मिळेल. बहुतांश शेतकऱ्यांना सरासरी सुमारे दोन कोटी रुपयांपर्यंत मोबदला मिळणार आहे. हा दर सध्याच्या बाजारभावाच्या तुलनेत चारपटीहून अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या गुरुवारपासून प्रत्यक्ष करारनामे करण्यास सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया १० जूनपर्यंत सुरू राहणार असून त्या दरम्यान करारनामा पूर्ण होणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला आरटीजीएसद्वारे थेट खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या रकमेवर कोणतेही व्याज आकारण्यात येणार नाही. तसेच संपूर्ण रक्कम रोख जमा करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी करारनामे केले नाहीत अशांच्या जमिनी १० जूननंतर सक्तीने संपादित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. करारनामे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सासवड येथील उपविभागीय कार्यालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी नऊ पथके नेमण्यात आले असून भूसंपादन अधिकाऱ्यांसह मंडळ अधिकारी, बँकेचे प्रतिनिधी, सेतू केंद्र चालक यांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच मोबदला खात्यावर जमा करण्यासाठी कर्जबोजा, थकबाकी, मालमत्तेचा दावा या स्वरूपाची कागदपत्रे द्यावी लागणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. संपादित होणारी जमीन उदाचीवाडी ५८.३४ वनपुरी १५४.०६ कुंभारवळण २४५.४८ खानवडी २६९.२२ मुंजवडी ८२.५६ एखतपूर १९९.०३ पारगाव १८८.०७ संपादनासाठी उशिरा संमती दिल्यास दर वाढवून मिळेल असा गैरसमज काही शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. मात्र, ही अफवा आहे. राज्य सरकारकडून यानंतर कोणताही वाढीव मोबदला मिळणार नाही. सर्वांना सारखा दर देण्यात येणार असून प्रथम येणाऱ्या प्राधान्य या तत्त्वावर करारनामे करावेत. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये.- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी
16 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 03:02 PM
मेट गाला व्हायरलः सेलिब्रिटींचे लाल गालिचेचे स्वरूप आणि बसण्याचे अपारंपरिक नियम

मेट गाला व्हायरलः सेलिब्रिटींचे लाल गालिचेचे स्वरूप आणि बसण्याचे अपारंपरिक नियम

मुंबई -हॉलवूड आणि फॅशन जगतातील सर्वात मोठा ' मेट गाला ' हा कार्यक्रम सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमातील कलाकारांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतायत. 'मेट गाला' हा दरवर्षी होणारा एक मोठा कार्यक्रम असून २०२६ मध्येही हा कार्यक्रम सेलिब्रिटींच्या रेड कार्पेटवरील लूकमुळे चर्चेत आहे. गेल्या काही वर्षांपासून, मेट गालाचं आयोजन व्होग मासिकाच्या जागतिक संपादकीय संचालक अ‍ॅना विंटूर यांच्या देखरेखीखाली केलं जातंय. या कार्यक्रमात प्रवेश मिळवणं हे त्याचे नियम पाळण्याइतकंच आव्हानात्मक आहे. यापैकी एक नियम असा आहे की, नवरा-बायको एकत्र बसू शकत नाहीत. याच नियमाचं पालन न केल्यास कायमस्वरूपी बंदी घातली जाऊ शकते.पती-पत्नी एकत्र का बसत नाहीत?मेट गालासाठी बसण्याची व्यवस्था खूप आधीच तयार केली जाते. एकविशेष नियमअसा आहे की, कोणताही पाहुणा आपल्या जोडीदारासोबत बसू शकत नाही. आयोजकांची इच्छा असते की लोकांनी नवीन लोकांना भेटावं आणि त्यांच्याशी संवाद साधावा. बसण्याची व्यवस्था अशा प्रकारे केली जाते की, विविध पार्श्वभूमीचे लोक एकत्र बसून नवीन विषयांवर चर्चा करू शकतील.Prajakta Mali : 'लग्नाचं प्रेशर कसं हाताळतेस?' प्राजक्ता माळीला चाहत्याचा प्रश्न; अभिनेत्री म्हणाली, 'जे होतं ते चांगल्यासाठी...'जेवणात लसूण आणि कांद्यावर बंदीमेट गालाच्या मेन्यूमध्ये लसूण आणि कांद्याला सक्त मनाई आहे. आयोजकांच्या मते, तोंडाची दुर्गंधी आणि संवादातील अडचणी टाळण्यासाठी त्यांचा वापर केला जात नाही.पाहा: प्रियांकाच्या 'त्या' पेहरावाची अशीही कहाणी!फोनवर बंदीमेट गालामध्येउपस्थितराहण्यासाठी पाहुणे किमान १८ वर्षांचे असणं आवश्यक आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी फोनचा वापर आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सक्त मनाई आहे. पाहुण्यांनी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि आपली प्रायव्हसी जपावी, अशी आयोजकांची इच्छा आहे.Tharala Tar Mag Promo : याचसाठी केलेला अट्टाहास! सायलीनं खोट्या तन्वीला मारून-मारून केलं बेहाल, लवकरच 'ठरलं तर मग' मालिकेत होणार प्रियाचा पर्दाफाशधूम्रपान आणि ड्रेस कोडहा कार्यक्रम न्यूयॉर्क शहरात आयोजित केला जात असल्यामुळे, शहराच्यानियमांनुसारधूम्रपानास सक्त मनाई आहे. ड्रेस कोडबद्दल बोलायचं झाल्यास, २०२६ ची थीम 'कॉस्ट्यूम आर्ट' आहे आणि ड्रेस कोड 'फॅशन इज आर्ट' आहे. यावर्षी, सेलिब्रिटींनी त्यांच्या पोशाखातून आपला लूक कॅनव्हासप्रमाणे सादर केला आहे.Anupam Kher : मी तुझं काय वाईट केलंय? बंगाल जिंकताच भाजप नेत्यानं काढला अनुपम यांच्या नसलेल्या केसांचा विषय; अभिनेत्याचं चोख उत्तरत्याचबरोबर विशेष गोष्ट म्हणजे, 'मेट गाला'चं तिकीट जे एकेकाळी फक्त ५० रुपये डॉलरला मिळायचं , ते यावेळी जवळपास १ लाख डॉलर्स म्हणजेच अंदाजे ९० लाख रुपयांना मिळत आहे. याशिवाय, जर तुम्हाला या कार्यक्रमात टेबल बुक करायचं असेल, तर तुम्हाला ३ लाख ५० हजार डॉलर्स म्हणजेच अंदाजे ३ कोटी रुपये खर्च करावे लागतील.
48 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 03:01 PM
आयपीएल 2026: लोकेश राहुलचे पुनरागमन सुरूच, धावसंख्येच्या यादीत अव्वल

आयपीएल 2026: लोकेश राहुलचे पुनरागमन सुरूच, धावसंख्येच्या यादीत अव्वल

IPL 2026 : टीम इंडियाचा स्टायलिश बॅटरलोकेश राहुलयंदाच्या हंगामात सर्वोत्तम कामगिरीसह सुपर स्ट्राइक रेटसह आपल्या फलंदाजीतील आक्रमक अंदाज दाखवून देताना दिसतोय. स्ट्राइक रेटच्या मुद्यावरुन अनेकदा स्टायलिश क्रिकेटरला ट्रोल करण्यात आले. एवढेच नाही तर टीम इंडियाच्या टी-२० संघाचे दरवाजेही त्याच्यासाठी बंद झाले. पणदिल्ली कॅपिटल्सच्यासंघात आल्यापासून त्याचे तेवर बदलले. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉपला यंदाच्या हंगामात तर तो तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत युवा बॅटर्संना टक्कर देताना दिसतोय.चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात तो स्वस्तात माघारी फिरला. पण यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत तो टॉपला पोहचला.लोकेश राहुलनं१० सामन्यातील १० डावात ४९.४४ च्या सरासरीसह १८०.८९ स्ट्राइक रेटसह ४४५ धावा केल्या आहेत. यात ३ अर्धशतकासह एका शतकाचा समावेश आहे. संयमी फलंदाजीसाठी ओळखला जाणारा लोकेश राहुल आक्रमकतेसह घातक फलंदाज कसा झाला? जाणून घेऊयात त्यासंदर्भातील खास गोष्ट २७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं चौकट मोडून काढल्याचा अभिमान जिओस्टारच्या सुपरस्टार शोमध्ये राहुल म्हणाला की, १० वर्षांपूर्वी टी-२० संघात स्थान मिळवण्यासाठी मी काहीही करायला तयार होतो. माझ्याकडे कधीही टी-२० खेळाडू म्हणून पाहिलं गेलं नाही, किंवा चांगला व्हाइट-बॉल खेळाडू मानलं गेलं नाही. माझी ओळख ही फक्त कसोटीपुरती मर्यादीत राहिली. त्या चौकटीबाहेर येऊन माझा व्हाइट-बॉल गेम सुधारून इथपर्यंत पोहोचणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे." प्रत्येक वेळी गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, पण...बदलाच्या प्रवासात मी चुका केल्या, काही गोष्टी अजून चांगल्या करता आल्या असत्या. पण मला याचा अभिमान आहे की प्रत्येक वेळी मैदानात उतरलो तेव्हा मी शंभर टक्के दिलं आणि स्वतःला यशस्वी होण्याची सर्वोत्तम संधी देण्यासाठी पूर्ण तयारी केली. प्रत्येक वेळी गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. तुम्हाला ते स्वीकारावं लागतं आणि या प्रवासाचा आनंद घ्यावा लागतो. जिंकणं-हारणं काहीही असो, मी स्वतःला नेहमी संतुलित ठेवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मला वाटतं की, मी काहीच साध्य केलं नाही, तेव्हा मी माझ्या यशाची आठवण करून घेतो आणि त्यातून मला योग्य दृष्टिकोन मिळतो. अजून माझ्याकडे वेळ आहे, असे म्हणत त्याने येत्या काळात आणखी दमदार कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे.
59 shares
😊
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 02:57 PM
नागपूरमध्ये तापमानात घट, उष्णतेची लाट आटोक्यात

नागपूरमध्ये तापमानात घट, उष्णतेची लाट आटोक्यात

नागपूर:प्रचंड उकाड्याने त्रस्त झालेल्याविदर्भाच्याबहुतेक जिल्ह्यातील नागरिकांना मंगळवारी अखेर काहीसा दिलासा मिळाला. तापमान १ ते २.५ अंशापर्यंत घसरल्याने उष्णतेचा त्रास बऱ्यापैकी कमी झाला. यादरम्यान गाेंदिया जिल्ह्यात वादळासह आणि भंडारा जिल्ह्यात तुरळकपाऊसझाला. ब्रम्हपुरीतही तुरळक पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने ३ ते ५ मे दरम्यानविदर्भातीलसर्व जिल्ह्यात वादळासह पावसाचा अंदाज वर्तवला हाेता. मात्र दाेन दिवस ढगांची उपस्थिती राहूनही उन्हाचे चटके व उकाड्याने छळले आहे. अखेर मंगळवारी सूर्याचा ताप घटला.नागपूरलासकाळपासून उन पडले हाेते, पण दुपारनंतर वातावरण बदलले व आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली हाेती.पाऊसहाेईल, अशी स्थिती हाेती, पण ढगांमधून सरी बरसल्या नाही. मात्र उन्हाची तीव्रता बऱ्यापैकी कमी झाली. कमाल तापमान २.४ अंशाने खाली घसरत ४०.८ अंशाची नाेंद झाली. अनेक दिवसानंतर तापमान सरासरीपेक्षा १.९ अंशाने खाली आल्याने उष्णतेचा त्रास कमी झाला. सायंकाळचे वातावरणही आल्हाददायक झाले. रात्रीचे तापमान २.४ अंशाने खाली आले. गाेंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जाेराचे वादळ आले. काही ठिकाणी पाऊस झाल्याचीही माहिती आहे. मात्र शहरात पावसाची नाेंद झाली नाही. तापमान मात्र २.५ अंशाने घसरत ४० अंशाच्या खाली ३८ अंशावर पाेहचले. भंडारा जिल्ह्यात तुरळक पाऊस झाल्याची माहिती आहे. येथे तापमान २ अंशाने खाली घसरत ३९ अंशावर पाेहचले आहे. ब्रम्हपुरीला ०.६ मिमी पावसाची नाेंद झाली. साेमवारी देशात सर्वाधिक उष्ण असलेल्या ब्रम्हपुरीचे तापमान २ अंशाने घसरून ४२.२ अंशावर आले. इतर जिल्ह्यातही अंशत: घट झाली आहे. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार अवकाळीचे ढग आणखी एक दिवस आकाशात असतील. त्यामुळे एक दाेन दिवस उकाड्याचा त्रास कमी जाणवेल. त्यानंतर मात्र पारा ३ ते ५ अंशाने उसळण्याची शक्यता असून उन्हाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे.
75 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 02:41 PM
ए. आय. एम. आय. एम. चे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पश्चिम बंगालच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

ए. आय. एम. आय. एम. चे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पश्चिम बंगालच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

AIMIM Asaduddin Owaisi On West Bengal Election 2026 Result:पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत यंदा मतदारांनी १५ वर्षांपासूनचे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालीलतृणमूल काँग्रेसचेसरकार पायउतार करीत गेल्या सुमारे ५० वर्षांपासून राज्यात ठराविक काळानंतर सत्तापालट घडवून आणारी एकतर्फी निवडणुकीची परंपरा कायम राखली. पश्चिम बंगालमध्येभाजपालातब्बल २०६ जागा मिळाल्या. तरतृणमूल काँग्रेसलाकेवळ ८० जागांवर समाधान मानावे लागले. भवानीपूर मतदारसंघात सुवेंदू अधिकारी यांनी तब्बल १५ हजार १०५ मतांनी ममता बॅनर्जी यांचा मोठा पराभव केला. सुवेंदू अधिकारी यांना एकूण ७३ हजार ९१७ मते मिळाली, तर ममता बॅनर्जी यांना ५८ हजार ८१२ मतांवर समाधान मानावे लागले. या निकालाबाबत संपूर्ण देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. AIMIM पक्षाचे नेतेअसदुद्दीन ओवेसीयांनीही यावर भाष्य केले. AIMIMने पश्चिम बंगालमध्ये ११ ठिकाणी उमेदवार उभे केले होते, परंतु ते सर्व पराभूत झाले. यावर ओवेसी यांनी पक्षाला मतदान करणाऱ्या लोकांचे आभार मानले आहेत. तसेच आम आदमी पक्ष, उद्धवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांसारख्या पक्षांनी यापूर्वी सॉफ्ट हिंदुत्वाचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला होता, असे सांगत ओवेसी यांनी मुस्लिम समाजाला आवाहन करताना सांगितले की, आपले स्वतंत्र राजकीय नेतृत्व तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सेक्यूलर पक्षभाजपालारोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा पश्चिम बंगाल राज्याच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला सत्ता दिली आहे आणि या जनादेशाचा आदर केला पाहिजे. हा जनतेचा निर्णय आहे, तो आपल्याला स्वीकारावा लागेल. मी यापूर्वीही म्हटले आहे की, तथाकथित 'धर्मनिरपेक्ष पक्ष' भाजपाचा विस्तार रोखू शकणार नाहीत, असे ओवेसी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, मी राजीनामा देण्यासाठी लोकभवनात जाणार नाही. आम्ही पक्षाच्या सदस्यांसोबत आमच्या पुढील रणनीतीवर चर्चा करू. मी भाजपाचे अत्याचार यापुढे सहन करणार नाही. मी पुन्हा रस्त्यावर उतरेन. आम्ही निवडणूक हरलेलो नाही, आमचा पराभव करण्यात आला आहे. आमची लढाई भाजपाशी नव्हती, तर निवडणूक आयोगाशी होती. मी माझ्या आयुष्यात अशी निवडणूक पाहिली नाही. निवडणूक आयोग हाच मुख्य खलनायक आहे. SIR मधून ९० लाख मते काढून टाकण्यात आली. भाजपाने १०० जागा चोरल्या आहेत. इंडिया आघाडी एकजूट आहे आणि माझ्यासोबत आहे, या शब्दांत ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत टीका केली.
79 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 02:40 PM
जागतिक स्तरावर 12,000 ते 15,000 कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात कपात करण्याची कॉग्निझंटची घोषणा

जागतिक स्तरावर 12,000 ते 15,000 कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात कपात करण्याची कॉग्निझंटची घोषणा

Cognizant Layoff:आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी कॉग्निझंटमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरकपातीची तयारी सुरू झाली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावर सुमारे १२,००० ते १५,००० कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामध्ये भारतातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतावर सर्वाधिक परिणाम? कंपनीत सुमारे ३,५७,०००कर्मचारीकार्यरत असून त्यापैकी जवळपास २,५०,०००कर्मचारीभारतात आहेत. त्यामुळे होणाऱ्या कपातीचा मोठा भाग भारतात होण्याची शक्यता आहे. ‘प्रोजेक्ट लीप’ अंतर्गत पुनर्रचना कॉग्निझंटने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘Project Leap’ अंतर्गत ही पुनर्रचना केली जात आहे. कंपनीला या प्रक्रियेसाठी $२३० मिलियन ते $३२० मिलियन इतका सेवरन्स खर्च (भरपाई) अपेक्षित आहे. कंपनीचे CEO रवी कुमार यांनी सांगितले की, ही जागतिक पातळीवरील प्रक्रिया असून, कंपनीच्या विविध विभागांमध्ये टप्प्याटप्प्याने राबवली जाईल. कामकाजाच्या पद्धतीत बदल कंपनी आता डिजिटल तंत्रज्ञान आणि मानवी कामाचा समन्वय असलेल्या नव्या मॉडेलकडे वळत आहे. यामुळे भविष्यात काम करण्याच्या पद्धतीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. नव्या भरतीची योजना कायम विशेष म्हणजे, फेब्रुवारीत कंपनीने २०२६ मध्ये सुमारे २४,००० ते २५,००० नव्या ग्रॅज्युएट्सची भरती करण्याची घोषणा केली होती. ही रणनीती कंपनीच्या वर्कफोर्स स्ट्रक्चरला तळापासून मजबूत करण्याचा भाग आहे. Coinbase मध्येही नोकरकपात दरम्यान, क्रिप्टोकरन्सी क्षेत्रातील Coinbase या कंपनीनेही सुमारे १४% कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे CEO ब्रायन आर्मस्ट्रॉंग यांनी या निर्णयामागे दोन प्रमुख कारणे दिली. पहिले म्हणजे, क्रिप्टो बाजारातील मंदी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे बदलणारी कामाची पद्धत. तज्ज्ञांच्या मते, जागतिक स्तरावर आयटी आणि टेक कंपन्यांमध्ये नोकरकपातीचा ट्रेंड वाढत आहे. AI चा वाढता वापर आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे कंपन्या खर्च कमी करण्याच्या दिशेने पावले उचलत आहेत. भविष्यात कौशल्याधारित आणि डिजिटल-फोकस्ड कामकाजालाच अधिक प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.
33 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 02:38 PM
रोहित शर्माच्या'ब्रिलियंट 84'ने मुंबई इंडियन्सचा लखनौ सुपर जायंट्सवर दणदणीत विजय

रोहित शर्माच्या'ब्रिलियंट 84'ने मुंबई इंडियन्सचा लखनौ सुपर जायंट्सवर दणदणीत विजय

मुंबई:मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या यशस्वी धाव-पाठलागात दुखापतीतून परतलेल्या रोहित शर्माच्या शानदार 84 धावांच्या खेळीचे कौतुक केले. लखनौविरुद्ध मुंबई असा सामना काल वानखेडेमध्ये रंगला. या सामन्यात मुंबईला अखेर विजय झाला. मुंबईने कालचा सामना 6 विकेट्सने जिंकला. या सामन्यानंतर रोहितबद्दलची एक गोष्ट समोर आली आहे.संघाच्या मालकीण नीता अंबानी यांनीरोहितला मॅव्हरिक अवॉर्ड'प्रदान केला, त्यावेळी जयवर्धने म्हणाले, 'रोहितच्या बोलण्याआधी मला काहीतरी सांगायचं आहे, त्याचा प्रयत्न शानदार होता. त्याने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली. रोहित खेळण्यासाठी खूप उत्सुक होता, पण यावेळी आम्ही ओल्ड मॅन(रोहित)सोबत धैर्य ठेवले. तो एका आठवड्यात परतला असता, पण आम्ही त्याला आणखी एक आठवडा अधिकच दिला, कारण तो पूर्णपणे तयार व्हायला पाहिजे', असं महेला जयवर्धने म्हणाला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर, रोहितने त्याला बरे होण्यास मदत केल्याबद्दल MI च्या वैद्यकीय टीमचे आभार मानले.12 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध धावांचा पाठलाग करताना रोहितला हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती. तेव्हापासून, संघाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागल्याने MI ने अनेक वेगवेगळ्या सलामीच्या जोड्या वापरून पाहिल्या आहेत. पाच डावांमध्ये रोहितने 55.25 च्या सरासरीने आणि 174.01 च्या स्ट्राइक रेटने 221 धावा केल्या आहेत. त्याने या हंगामात दोन अर्धशतके झळकावली आहेत.229 धावांचे लक्ष्य गाठताना रोहित आणि रायन रिकेल्टन यांनी 65 चेंडूंमध्ये 143 धावांची भागीदारी केली. या अनुभवी सलामीवीराने सात षटकार आणि सहा चौकार मारत 44 चेंडूंमध्ये 84 धावा केल्या. डावखुरा फिरकी गोलंदाज मणिकरण सिद्धार्थने त्याला बाद केले आणि त्याचे तिसरे आयपीएल शतक हुकले. मुंबईचा पुढील सामना हा आरसीबीविरुद्ध असणार आहे. आता पुढील सामन्यात पण रोहितच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष असणार आहे. दरम्यान हार्दिक पंड्या आरसीबीविरुद्ध पुढील सामना खेळणार की नाही याबाबत अजूनही ससपेन्स कायम आहे.
53 shares
😊
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 02:38 PM
अमरावती पोलिसांनी बनावट वस्तूंच्या कारखान्याचा पर्दाफाश केला, 71 लाख रुपयांच्या वस्तू जप्त केल्या

अमरावती पोलिसांनी बनावट वस्तूंच्या कारखान्याचा पर्दाफाश केला, 71 लाख रुपयांच्या वस्तू जप्त केल्या

प्रदीप भाकरे ​अमरावती:नाव मोठ्या कंपन्यांचे, पण आतला माल मात्र बनावट!अमरावतीशहर गुन्हे शाखेने वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या एका मोठ्या 'फेक फॅक्टरी'चा पर्दाफाश केला आहे. मंगळवारी नया अकोला परिसरातील दोन कारखान्यांवर पोलिसांनी धाड टाकून तब्बल ७१ लाख २० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या कारवाईने बनावट वस्तू बनवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम सुरू असतानाच, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. चांदुरबाजार रोडवरील नया अकोला येथे ब्रँडेड कंपन्यांच्या नावाखाली बनावट साबण आणि निरमा पावडर तयार केली जात होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोन कारखान्यांवर एकाच वेळी छापा टाकला. ​जप्त केलेला मुद्देमाल (किंमत ७१.२० लाख रुपये): ​इलेक्ट्रिक वजन काटा आणि सतीननगर येथील गोदामातील मोठ्या प्रमाणावर असलेला कच्चा मालाचा समावेश आहे. या बेकायदेशीर कारखान्याशी संबंधित असलेल्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये जुनेद खान यासीन खान (२८, पाकिजा कॉलनी), प्रफुल विष्णुपंत डोईफोडे (४८, न्यु म्हाडा कॉलनी), शेख भुरु शेख मुनीर (५०, झेंडा चौक) आणि शेख कलीम शेख माजीद (४०, बिस्मीला नगर) यांचा समावेश आहे. या आरोपींकडे कारखाना चालवण्याचा कोणताही अधिकृत परवाना नव्हता. हा बनावट माल नेमका कुठून आणला जात होता आणि कुठे विकला जाणार होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत. ही मोठी कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त गणेश शिंदे, सागर घुगे, आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, सपोनि मनिष वाकोडे, पोलीस अंमलदार सतिश देशमुख, मंगेश लोखंडे, गजानन ढेवले आणि इतर सहकाऱ्यांचा समावेश होता.
19 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 02:32 PM
चोप्रा शहरातील इंधनाच्या टंचाईचा वाहनचालकांना फटकाः लाईव्ह अपडेट्स

चोप्रा शहरातील इंधनाच्या टंचाईचा वाहनचालकांना फटकाः लाईव्ह अपडेट्स

महाराष्ट्रासहदेश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... LIVE चोपडा शहरातील पेट्रोल पंपांवर डिझेल आणि पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनधारकांना इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे. चोपडा शहरातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल उपलब्ध आहे, मात्र डिझेल उपलब्ध नाही. तर काही ठिकाणी डिझेल उपलब्ध आहे, पण पेट्रोल उपलब्ध नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे ज्या पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध आहे, त्या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे, ज्या पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध आहे, त्या ठिकाणी डिझेल भरण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी होत आहे. डिझेल आणि पेट्रोल टंचाईमुळे वाहनधारक आवश्यकतेपेक्षा अधिक इंधन भरून घेताना दिसत आहेत. जालन्यातील मोतीराम अग्रवाल को-ऑपरेटिव्ह बँक तसेच पूर्णवादी नागरी सहकारी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी रायचंद कुरंगळ याची मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली आर्थिक गुन्हे शाखेने सुरू केल्या आहेत. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे. कुरंगळ हा वेअरहाऊसचा मालक असून मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक तसेच पूर्णवादी नागरी सहकारी बँकेकडून शेतमाल तारण ठेवून कर्ज देण्याची योजना होती. मात्र, कुरंगळ याने आपल्या दलालामार्फत गरजू नागरिकांची कागदपत्रे गोळा करून बँकेकडे शेतमाल तारण कर्जासाठी अर्ज सादर केले. या प्रक्रियेदरम्यान वेअरहाऊसमध्ये प्रत्यक्ष शेतमाल नसतानाही शेतमाल तारण ठेवलेला असल्याच्या बनावट पावत्या देऊन मर्चंट बँकेची २३ कोटी ३३ लाख रुपये तर पूर्णवादी बँकेची ८ कोटी १२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी आधीच मर्चंट बँक घोटाळ्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या कुरंगळसह पाच जणांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चोपडा तालुक्यात ज्या प्रमाणात केळीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते, त्याचप्रमाणे कापूस लागवडही शेतकरी मोठ्या प्रमाणावर करत होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून कापूस पिकासमोरील विविध अडचणींमुळे आता कापूस क्षेत्रात घट होताना दिसत आहे. अनियमित पाऊस, कापसाच्या जुन्या वाणांचा वापर, तसेच लाल्या आणि बुरशीजन्य रोगांसह अळीच्या प्रादुर्भावामुळे कापसाच्या उत्पादनात सातत्याने घट होत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे. कापूस लागवडीपासून ते वेचणीपर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च, मजूर टंचाई आणि उत्पादन खर्चात वाढ यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच कापूस वेचणीनंतर बाजारात अपेक्षित भाव मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी अधिकच संकटात सापडत आहेत. या सर्व कारणांमुळे चोपडा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी आता हळूहळू कापूस लागवडीपासून दूर जाताना दिसत आहेत. यंदा चोपडा तालुक्यात कापूस लागवडीखालील क्षेत्र सुमारे 35 ते 40 टक्क्यांनी घटण्याची शक्यता असून, त्याऐवजी पपई आणि केळी पिकांच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याची माहिती शेतकरी देत आहेत. बदलापूरहून दादरकडे जाणाऱ्या एसी लोकलच्या टपावर मनोरुग्ण तरुण चढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विठ्ठलवाडी ते कल्याण दरम्यान दुपारी सुमारे २:०३ वाजण्याच्या सुमारास एसी लोकल ट्रेनच्या छतावर एक तरुण चढल्याने प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. विठ्ठलवाडी स्थानकावर पोलिसांनी संबंधित तरुणाला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. तो काही वेळ खाली उतरला; मात्र काही वेळाने पुन्हा लोकलच्या टपावर चढला, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. यानंतर ट्रेन पुढे कल्याण स्थानकाकडे रवाना करण्यात आली. कल्याण स्थानकावर ट्रेन पोहोचल्यानंतर हमाल, रेल्वे पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी संयुक्त प्रयत्न करत सुमारे २:५० वाजता त्या तरुणाला खाली उतरवण्यात यश मिळवले. यानंतर त्याला तात्काळ रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या संपूर्ण प्रकारामुळे सुमारे अर्धा ते पाऊण तास प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. - तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन यांना नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते- आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक अत्याचार मानसिक छळ आणि धर्मांतराच्या आरोपाखाली करण्यात आले आहेत आरोपींवर गुन्हे दाखल- आज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर पुढील पुण्यात ताबा घेण्यासाठी एसआयटी कडून करण्यात आला आहे न्यायालयात अर्ज- येत्या एक ते दोन दिवसात पुन्हा एसआयटी घेणार संशयित आरोपींचा ताबा भिवंडी शहर गुटखा व अमली पदार्थांच्या विक्री व वितरणाचे मुख्य केंद्र बनले असून पोलीस यंत्रणा सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्यामुळे शहर नशेच्या विळख्यात अडकत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे शहराध्यक्ष प्रवीण पाटील यांनी केला आहे. भिवंडीत गुटखा व अमली पदार्थ बंदीचा केवळ दिखावा केला जात असल्याचा आरोप करत प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आसबीबी येथील पक्ष कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी गुटखा व प्रतीकात्मक अमली पदार्थांची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला गहू अवकाळी पावसामुळे भिजल्याची घटना घडली आहे. अंदाजे 1200 ते 1500 क्विंटल गहू पावसात भिजल्याची माहिती समोर आली आहे. हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्यासाठी तीन दिवसांचा येलो अलर्ट जारी केला होता. मात्र, अचानक गव्हाची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने साठवण व्यवस्थेवर ताण आला आणि पावसामुळे मोठे नुकसान झाले. हवामान विभागाच्या वतीने गोंदिया जिल्ह्याला आज पावसाचा अलर्ट देण्यात आला होता. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला असून दुपारनंतर गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातावरण झाले व त्यानंतर अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वारा आल्याने कापणीला आलेला धानपिक तसेच आंबा पिक व भाजीपाल्याच्या शेतीला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्याचा पारा 41 अंशांवर गेला असताना अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना असह्य उकाड्यापासून मात्र दिलासा मिळाला आहे. - चर्चगेट–बोरिवली ५:३९ महिला लोकलमधील प्रवाशांना महिला टीसींकडून गुलाब फुलांचे वितरण- महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या विशेष सेवेला आज ३४ वर्षे पूर्ण होत असून, या निमित्ताने रेल्वे प्रशासनाने प्रवाशांप्रती आपली कृतज्ञता आणि जिव्हाळा व्यक्त केला- लोकलमधील प्रवाशांना महिला तिकीट तपासनीस कर्मचाऱ्यांनी गुलाब फुले देत आनंदाचा क्षण साजरा केला सोलापूर : शेतीच्या वादातून एकाचा खून, दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी गावातील घटना, शासकीय रूग्णालयात ग्रामस्थांची मोठी गर्दी नसरापूर बलात्कार-हत्या प्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून पोलिसांकडून तीन नावांची शिफारस करण्यात आली आहे. उज्ज्वल निकम, अजय मिसर किंवा अनिकेत निकम या नावांची सध्या चर्चा आहे. आदिवासी बांधवांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण निर्णय. स्वयंसेवी संस्थाच्या पाच प्राथमिक व 19 माध्यमिक अनुदानित आश्रमाशाळांची श्रेणीवाढ. प्राथमिकमधून माध्यमिक आणि माध्यमिकमधून कनिष्ठ महाविद्यालय अशी श्रेणीवाढ, त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती व आवश्यक खर्चाच्या तरतूदीस मंजुरी. डोंगराळ, दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांचे शिक्षण गतीमान होणार. सोलापूरसाठी महत्वाचा निर्णय सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पदवीस्तराचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु करण्यास मंजुरी. सोलापूर आणि आजुबाजुच्या परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या होतकरूंच्या दृष्टीने हिताचा निर्णय. प्रत्येकी साठ प्रवेश क्षमतेचे एआय अँण्ड मशिन लर्निंग, कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इंजिनियरींग, इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन असे तीन नवे अभियांत्रिकी अभ्यासक्रम. अभियांत्रिकी विद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरीत धाराशिव जिल्हयातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्याचा निर्णय. महाविद्यालयाचे सक्षमीकरण होणार, अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधांमुळे या परिसरातील होतकरूंना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण उपलब्ध होण्याची संधी. नसरापूर प्रकरणानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गुन्हेगारांवर लगाम घालण्यासाठी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीसयांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून, लैंगिक शोषणातील आरोपींना पॅरोल न देण्याबाबत नवीन कायदा करण्याचे आदेश विधी व न्याय विभागाला दिले आहेत. चीनमधीलएका फटाक्याच्या फॅक्ट्रीत झालेल्या भीषणस्फोटात२१ जणांचामृत्यूझाला असून ६१ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतरचीनचेराष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.वाचा सविस्तर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या निकालाबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत. "जी दिल्ली आणि पश्चिम बंगाल भाजपाला मोदी लाट शिखरावर असताना जिंकता आले नाही. २०१५ साली दिल्लीमध्ये आणि २०१६ साली बंगालमध्ये प्रत्येकी तीन जागा मिळाल्या. त्या दिल्ली आणि बंगालमध्ये भाजपाने अशा काळात विजय मिळवला, जेव्हा मोदींची लोकप्रियता संपूर्ण देशात रसातळाला चालली आहे, असे कसे?", असा सवाल केजरीवालांनी उपस्थित केला आहे. जनतेने पंतप्रधान मोदी आणि देशाच्या विकासावर आपला विश्वास व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालच्या लोकांनी भाजपाला मतदान केले, कारण ते ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील सरकारवर असमाधानी होते अशी प्रतिक्रिया शिंदेसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली आहे. #WATCH| Delhi | On the BJP-NDA's performance in the Assembly elections in 4 states and 1 UT, Shiv Sena MP Shrirang Barne says, "...The public has bestowed its trust on PM Modi and development...The public of West Bengal voted for the BJP as they were dissatisfied with the Mamata…pic.twitter.com/sWGGTVYYVT इराणने संयुक्त अरब अमिरातीमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाले आहेत. यूएईतील फुजैराहमध्ये इराणने मिसाईल डागली. त्यात तीन भारतीय जखमी झाले. या घटनेबद्दल भारताने तीव्र संताप व्यक्त केला. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जायस्वाल म्हणाले की, "फुजैराहमध्ये झालेल्या हल्ल्यात तीन भारतीय जखमी झाले आहेत. हे अजिबात खपवून घेण्यासारखं नाहीये. हे हल्ले ताबडतोब थांबण्यात यावे आणि सर्वसामान्य लोकांना, तसेच अत्यावश्यक सेवांना लक्ष्य करणे बंद करण्यात यावे." सर्वात आधी विजय यांना त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडू द्या, त्यांच्या भूमिकेनंतर आम्ही कुणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवू. आम्ही DMK आघाडीसोबत आहोत. यात शंका नाही असं विधान सीपीआयचे सचिव पी. षण्मुगम यांनी म्हटलं. Chennai | Tamil Nadu CPI(M) Secretary P Shanmugam says, "First, let Vijay clearly state his position. Once he does, we will decide whom to support. There is no doubt that we are with the DMK alliance"pic.twitter.com/sG3Y1l6qQN जनतेने पंतप्रधान मोदी आणि देशाच्या विकासावर आपला विश्वास व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालच्या लोकांनी भाजपाला मतदान केले, कारण ते ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील सरकारवर असमाधानी होते अशी प्रतिक्रिया शिंदेसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली आहे. #WATCH| Delhi | On the BJP-NDA's performance in the Assembly elections in 4 states and 1 UT, Shiv Sena MP Shrirang Barne says, "...The public has bestowed its trust on PM Modi and development...The public of West Bengal voted for the BJP as they were dissatisfied with the Mamata…pic.twitter.com/sWGGTVYYVT राज्यसभा सदस्य आणि भाजप नेते राघव चड्ढा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी राष्ट्रपती भवनात दाखल #WATCH| Delhi: Rajya Sabha MP and BJP leader Raghav Chadha reaches Rashtrapati Bhavan to meet President Droupadi Murmu.pic.twitter.com/XTISlAVpLi नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलानेही वडिलांच्या कृत्याचा तीव्र निषेध करत कठोर शब्दांत संताप व्यक्त केला. "तो माझा बाप आहे हीच माझी चूक आहे. त्याला लवकरात लवकर फाशी द्या", अशी मागणी त्याने केली आहे. त्या चिमुरडीला जितक्या वेदना झाल्या, तशाच वेदना त्यालाही झाल्या पाहिजेत, असेही तो म्हणाला
73 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 02:30 PM
व्होडाफोन-आयडियाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी किफायतशीर हायब्रिड प्रीपेड पॅकचे अनावरण केले

व्होडाफोन-आयडियाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी किफायतशीर हायब्रिड प्रीपेड पॅकचे अनावरण केले

आज आम्ही तुम्हाला व्होडाफोन-आयडिया च्या नव्या प्लॅनची माहिती देणार आहोत. या नवीन हाइब्रिड प्लॅनची वैधता पूर्ण 365 दिवस म्हणजेच एक वर्ष इतकी आहे. यामध्ये युजर्सना भारतात असताना अमर्यादित कॉलिंग आणि डेटा मिळतोच, पण परदेश प्रवासातही ठराविक आउटगोइंग कॉल्स आणि डेटाची सुविधा दिली जाते. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी वेगळा महागडा रोमिंग पॅक घेण्याची गरज नसल्याने हा प्लॅन प्रवाशांसाठी अतिशय फायदेशीर आणि किफायतशीर ठरत आहे.व्होडाफोन आयडियाने (Vi) एक नवीन हायब्रिड प्रीपेड पॅक लाँच केला आहे. टेलिकॉम कंपनीचा हा प्रीपेड पॅक भारत आणि परदेशातील युजर्सना अखंड कनेक्टिव्हिटी देईल. या प्लानची किंमत 4,997 रुपये आहे. एअरटेलच्या ग्लोबल आयआर पॅकनंतर व्होडाफोन आयडियाने हायब्रिड पॅक लाँच केला आहे. या प्लानमध्ये युजर्संना एक वर्षाच्या वैधतेसह डेटा आणि अनेक आंतरराष्ट्रीयफायदे मिळत आहेत. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर.Vi चा हायब्रीड प्लॅनVi च्या या हायब्रिड प्लॅनची किंमत 4,997 रुपये आहे. या प्लानमध्ये युजर्संना दररोज 1.5 GB डेटा मिळतो. तसेच या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 फ्री SMS मिळतात.या पॅकमध्ये 100 मिनिटांचे आउटगोइंग कॉल आणि आंतरराष्ट्रीय वापरासाठी इनकमिंग कॉलचा समावेश आहे. हे फीचर सेट 1 साठी आहेत, ज्यात 59 देशांचा समावेश आहे. तर 65 देशांसाठी सेट 2 मध्ये युजर्सला 50 मिनिटांचे आउटगोइंग कॉल मिळत आहेत. मिनिट संपल्यानंतर आउटगोइंग आणि इनकमिंग कॉल दोन्हीसाठी प्रति मिनिट 10 रुपये शुल्क आकारले जाते.याव्यतिरिक्त, हा प्लॅन सेट 1 च्या देशांमध्ये 5GB आंतरराष्ट्रीय डेटा आणि सेट2 च्या देशांमध्ये 1GB डेटादेतो. रोमिंग दरम्यान आउटगोइंग SMS साठी प्रत्येक मेसेजसाठी 15 रुपये शुल्क आकारले जाते. युएईसाठी, आंतरराष्ट्रीय रोमिंग फायद्यांमध्ये 25 मिनिटांच्या आउटगोइंग आणि इनकमिंग कॉलचा समावेश आहे, कोणताही डेटा नाही.हा पॅक त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे जे बऱ्याचदा भारताबाहेर जातात आणि ते अशी योजना शोधत असतात जी भारत तसेच इतर देशांमध्ये कार्य करते.एअरटेलसोबत स्पर्धाVi चा हा प्लॅन एअरटेलच्या नुकत्याच लाँच झालेल्या ग्लोबल आयआर पॅकशी थेट स्पर्धा करताना दिसत आहे. टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये कंपन्या आता आंतरराष्ट्रीय युजर्सना डोळ्यासमोर ठेवून तयार केलेल्या प्लॅन्सवर लक्ष केंद्रित करत आहेत. व्यवसाय, प्रवास किंवा इतर कारणांसाठी वारंवार परदेशात प्रवास करणाऱ्यांसाठी हा प्लॅन प्लॅन विशेष उपयुक्त आहे. एकाच रिचार्जमध्ये भारत आणि परदेशात कनेक्टिव्हिटी मिळणे हे विशेष बनवते. अशा युजर्ससाठी हा प्लॅन सोयीस्कर आणि दीर्घकालीन पर्याय ठरू शकतो.
11 shares
😊
M
Maharashtra Times
May 5, 2026, 02:26 PM
बारामती पोलिसांनी सोन्याचे आणि चांदीचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला

बारामती पोलिसांनी सोन्याचे आणि चांदीचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला

दीपक पडकर, बारामती :बारामती एमआयडीसी येथे गहू देण्याच्या बहाण्याने बोलावून फिर्यादीला पिस्तूलाचा धाक दाखवून मारहाणं करत अंगावरील सोन्या, चांदीचे दागिने पळवून नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. बारामती तालुका पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पिस्तूल, जिवंत काडतुसे, दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.रवी संजय माने (वंजारवाडी, बारामती), श्रीकांत अर्जुन घुले (ढेकळवाडी, बारामती), अभिषेक भाऊसो ठोंबरे (ढेकळवाडी, बारामती), अतुल मोहन भोलणकर (वंजारवाडी, बारामती) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सूरज सरजेराव गावडे (वय २७) यांनी फिर्याद दिली आहे.नेमकं काय झालं?याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सूरज सरजेराव गावडे (वय २७) (रा. तासगाव, जि. सांगली) यांना ४ मे २०२६ रोजी बारामती एमआयडीसी येथे गहू नेण्यासाठी बोलावून त्यांना पिस्तूलाचा धाक दाखवत मारहाण केली व त्यांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि वाहन हिसकावून घेतले. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.Raigad Beach Tar Balls Pollution: रायगडच्या समुद्रकिनारी डांबराचा खच; मासोळीवर विषबाधेचे सावट, मानवी आरोग्यालाही मोठा धोकापोलिस कारवाईगुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि माहितीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात आला. विविध ठिकाणी पाठलाग करत अखेर सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अटकेतील आरोपींमध्येरवी संजय माने, श्रीकांत अर्जुन घुले,अभिषेक भाऊसो ठोंबरे अतुल मोहन भोलणकर यांचा समावेश आहे.टोळीने यापूर्वीही केले आहेत गुन्हेआरोपींकडून दोन बनावट पिस्तुले, तीन जिवंत काडतुसे, सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली वेगनार कार आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले. पोलिसांच्या चौकशीत या टोळीने यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे समोर येत असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या पथकाने केली.Pune Crime : किरकोळ वाद, भररस्त्यात गाठलं; जुन्या रागातून तरुणाला संपवलं; 4 अल्पवयीन मुलांचं कृत्यथरारक पाठलाग करून अटकसिन्नरमास कंपनी जवळ समोरून भिगवण पोलिस आणि मागून वालचंदनगर व बारामती पोलिसांनी घेराव घालत पाठलाग तीव्र केला. अखेर रात्री सुमारे ८.५० वाजता तीन आरोपींना गाडीसह ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर चौथा आरोपी अतुल भोलणकर याला त्याच्या घरातून अटक करण्यात आली. या कारवाईदरम्यान आरोपींकडून ७,५०,००० रु चे सोन्या चांदीचे दागिने, घड्याळ, जिवंत काडतूस सह दोन पिस्तूल, ६५,००० रु रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.गाडी न थांबवता पळ काढलापोलीस निरीक्षक यादव यांच्याकडून इंदापूर, भिगवण, वालचंदनगर पोलिसांना सतर्क करून रस्त्यावर नाकाबंदी लावण्यात आली. पोलिसांनी आरोपींची गाडी पाहिली; मात्र त्यांनी गाडी न थांबवता पळ काढला. पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच आरोपींनी आरोपींनी गाडीचा वेग आणखी वाढविला. त्यानंतरही पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.Pune Crime : मार्कशीटवर खाडाखोड अन् बापाचं डोकं फिरलं; 9 वर्षांच्या पोटच्या मुलीला निर्घृणपणे संपवून घराला आग लावलीकारवाईत या पथकाचा सहभागही धडाकेबाज कारवाईत पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, API विक्रम पवार, PSI धनश्री भगत, HC भारत खारतोडे, नितीन ढवण, जितेंद्र शिंदे, शशिकांत दळवी, दादा दराडे, सुरेंद्र वाघ, संतोष कांबळे, आफ्रिन शेख, वालचंद नगर पोलीस स्टेशनचे API राजकुमार डूणगे, HC गणेश काटकर, किसान बेलदार, अभिजित कळसकर, विक्रम मोरे, भिगवन पोलीस ठाण्याचे PSI अमित पाटील, HC महेश उगले, अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील ASI गोरख पवार आदींचाकारवाईसहभाग होता.
55 shares
😢
Pudhari logo
Pudhari
May 5, 2026, 02:23 PM
भारताने ऊस उत्पादन खर्च आणि 2026-27 हंगामासाठी वाजवी आणि मोबदला किंमत जाहीर केली

भारताने ऊस उत्पादन खर्च आणि 2026-27 हंगामासाठी वाजवी आणि मोबदला किंमत जाहीर केली

केंद्र सरकारच्या माहितीनुसार, २०२६–२७ हंगामासाठी ऊस उत्पादन खर्च सुमारे १८२ रुपये प्रति क्विंटल आहे. त्याच्या तुलनेत जाहीर केलेला एफआरपी १००.५ टक्क्यांनी अधिक आहे. तसेच हा दर चालू २०२५–२६ हंगामापेक्षा २.८१ टक्क्यांनी जास्त आहे.
91 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 02:21 PM
हैदराबादहून चंदीगडला जाणाऱ्या विमानात पॉवर बँक अग्निशमन दलाकडून आपत्कालीन सुटका

हैदराबादहून चंदीगडला जाणाऱ्या विमानात पॉवर बँक अग्निशमन दलाकडून आपत्कालीन सुटका

चंदिगढ: चंदिगढ विमानतळावर मंगळवारी एकच गोंधळ उडाला. हैदराबादहून आलेल्या एका विमानातील प्रवाशाच्या पॉवर बँकेला अचानक आग लागली. त्यामुळे विमानात एकच खळबळ उडाली. एअरलाईन्सननं दिलेल्या माहितीनुसार, फ्लाईट 6E-108 लँडिंगनंतर धावपट्टीवर उभं होतं. तितक्यात एका प्रवाशाच्या पॉवर बँकेनं पेट घेतला. सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता प्रवाशांना विमानातून तातडीनं बाहेर काढण्यात आलं. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे टर्मिनलपर्यंत पोहोचवण्यात आलं.प्रवाशाच्या पॉवर बँकचा स्फोट झाल्यानंतर विमानात सर्वत्र धूर पसरला. त्यामुळे अन्य प्रवासी घाबरले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात प्रवासी धावपट्टीवर उतरताना दिसत आहेत. 'सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्यात आलं. विमानानं पुन्हा उड्डाण करण्याआधी त्याची पूर्ण तपासणी केली जाईल,' अशी माहिती एअरलाईन्सकडून देण्यात आली.नागरी उड्डाण महासंचलनालयाच्या २०२६ च्या नियमांनुसार, विमानात पॉवर बँक नेण्याची परवानगी केवळ कॅरी ऑन सामानतच असते. प्रवाशांना फ्लाईटमध्ये फोन आणि अन्य डिव्हाईस चार्ज करण्यासाठी पॉवर बँकचा उपयोग करण्याची परवानगी आहे. पॉवर बँक आणि अतिरिक्त बॅटरी सारख्या वस्तू फ्लाईटमध्ये असलेल्या वरील कंपार्टमेंट ठेवण्याची परवानगी नाही. कारण अशा ठिकाणी आग लागल्यास ती विझवणं अधिक अवघड असतं.
51 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 02:21 PM
पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी पुणे तात्पुरत्या उपाययोजना करत आहे

पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी पुणे तात्पुरत्या उपाययोजना करत आहे

पुणे:शहरातील पावसाचे पाणी साचणाऱ्या ५६ ठिकाणी कायमस्वरूपी उपाय योजना करणे खर्चीक आणि वेळ खाणारे असल्याने या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. त्यामुळे या ५६ ठिकाणी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका आयुक्तांनी सोमवारी विभाग प्रमुखांच्या बैठकीत पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला. शहरात पावसाळ्यात पाणी साचणारी सुमारे १२० ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, त्या ठिकाणी सुरू असलेल्या कामांची स्थिती तपासण्यात आली. यावेळी प्रशासनाने सादर केलेल्या अहवालानुसार, १२० पैकी ५६ ठिकाणी नवीन पावसाळी वाहिन्या टाकणे, चेंबर बांधणे, जुन्या वाहिन्या बदलणे आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी जाळे विकसित करणे, अशी मोठ्या स्वरूपाची कामे करणे आवश्यक आहे. या कामांसाठी मोठ्या निधीसह किमान सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने ती यंदाच्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे या ५६ ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना तातडीने पाणी निचरा करण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. पूरस्थिती उद्भवल्यास त्वरित प्रतिसाद देता यावा, यासाठी मनुष्यबळ, यंत्रसामुग्री आणि अन्य उपाययोजना उपलब्ध ठेवण्यासह उर्वरित ६४ ठिकाणांवरील कामे पुढील महिन्याभरात पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले.
42 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 02:17 PM
नागपूरमधील लाकूड व्यापाऱ्यांच्या गोदामाला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही

नागपूरमधील लाकूड व्यापाऱ्यांच्या गोदामाला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:कळमना येथील चिखली ले-आऊट परिसरात मंगळवारी मध्यरात्री टिंबर ट्रेडर्सच्या (सॉ मील) गोदामाला भीषणआगलागली. या घटनेत मे. रामेश्वर टिंबर ट्रेडर्स आणि मे. कमला टिंबर ट्रेडर्सचे मोठे नुकसान झाले असून, सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांची मालमत्ता जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज मनपाच्या अग्निशमन विभागाने वर्तवला आहे. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्लॉट क्रमांक ६२६, चिखली ले-आऊट येथील पुरुषोत्तम रामजी पटेल यांच्या मालकीचे मे. रामेश्वर टिंबर ट्रेडर्स आणि शंकरलाल पटेल यांच्या मालकीचे मे. कमला टिंबर ट्रेडर्स येथे मंगळवारी मध्यरात्री १.२० वाजताच्या सुमारासआगलागली. या आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण केले. या दुर्घटनेत सागवान लाकूड, दोन वुड कटिंग मशिन्स, संपूर्ण टीन शेड, इलेक्ट्रिक वायरिंग आणि एसी पूर्णपणे जळून खाक झाले. आगीची भीषणता ऐवढी होती की आगीतून कोणतीही मालमत्ता वाचवता आली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने हालचाली सुरू केल्या. घटनास्थळी कळमना, सिव्हिल लाईन्स, सुगतनगर, सक्करदरा, वाठोडा, लकडगंज आणि कॉटन मार्केट या सात अग्निशमन केंद्रातून पाण्याचे बंब पाठवण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किट किंवा अन्य कारण असू शकते, असा संशय असून अग्निशमन विभाग आणि स्थानिक पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
28 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 02:09 PM
भाजप नेत्याच्या केस वाढवण्याच्या दाव्याने बंगालच्या राजकारणात विनोदी वादाला तोंड फुटले

भाजप नेत्याच्या केस वाढवण्याच्या दाव्याने बंगालच्या राजकारणात विनोदी वादाला तोंड फुटले

मुंबई -बंगालच्या राजकारणात निवडणुकीच्या निकालांसोबत जर आणखी कशाची चर्चा होत असेल, तर ती आहे अनुपम खेर यांच्या 'केसांची'. भाजप नेत्याच्या एका वक्तव्यानं सोशल मीडियावर गोंधळ उडाला आहे. यावर आता अनुपम खेर यांनी स्वतः प्रतिक्रिया दिलीये.बंगालच्या निवडणुकीत व्हायरल झालेल्या झालमुरीपासून ते सात्विक माशापर्यंत अनेक मजेशीर क्षण पाहायला मिळाले. भाजपनंऐतिहासिक विजयहीमिळवला आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पण मग, आणखी एक विनोदी दावा समोर आला असून त्यावर अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेते सामिक भट्टाचार्य यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष बंगालमध्ये पुन्हा सत्तेत येणार नाही, असं म्हटलं. त्याचबरोबर सामिक यांनी अनुपम खेर यांच्या न वाढणाऱ्या केसांची शपथ घेतली. सामिक यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.Riteish Deshmukh : 'राजा शिवाजी सिनेमाचं बजेट दाखवलं जातंय ते खोटं'; बॉलिवूड कलाकारांच्या मानधनाबद्दलबही स्पष्टच बोलला रितेश देशमुखकाय म्हणाले सामिक भट्टाचार्य?भाजप नेते म्हणाले, 'तृणमूल काँग्रेस नष्ट होणारच होती. बघा, आकाश पृथ्वीवर कोसळू शकतं, समुद्र आकाशात उसळू शकतो. अनुपम खेर यांच्या डोक्यावर पुन्हा केस उगवू शकतात. पण तृणमूल काँग्रेस सत्तेवर येईल ही कल्पना स्वप्नांच्या पलीकडची आहे.'Tharala Tar Mag Promo : याचसाठी केलेला अट्टाहास! सायलीनं खोट्या तन्वीला मारून-मारून केलं बेहाल, लवकरच 'ठरलं तर मग' मालिकेत होणार प्रियाचा पर्दाफाशअनुपम खेर यांचं भन्नाट उत्तरअनुपम खेरयांनीही हा व्हिडिओ पाहिला आणि सामिक यांचा व्हिडिओ शेअर करत गंमतीदार उत्तर दिलंय. अनुपम खेर यांनी म्हटलं की, 'अरे भावा. मी तुझं काय वाईट केलंय? तुला माझ्या डोक्यावर केस का उगवावेत असं वाटतंय? मी शंभर जन्मांतही यासाठी प्रार्थना करणार नाही. जय श्री राम!'अनुपम खेर यांच्या या पोस्टवर एका युजरने लिहिलं की, 'अनुपम सर विचार करत असतील, 'मुझे क्यू तोडा' काही नेटकरी म्हणाले, 'सर, तुम्ही खुश असायला हवं, कोणीतरी तुमच्या वाढणाऱ्या केसांबद्दल बोलत आहे.'मत व्यक्त करणे हा माझा मुलभूत अधिकार आहे: अनुपम खेरदरम्यान, अनुपम खेर अनेकदा विविध विषयांवर किंवा व्हायरलव्हिडिओंवरआपलं मत व्यक्त करतात. अनुपम यांच्या कामाबद्दल सांगायचं तर ते शेवटचे 'तन्वी द ग्रेट' या सिनेमात दिसले होते. या सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनीच केलेलं. अनुपम खेर लवकरच 'खोसला का घोसला पार्ट २' आणि 'फ्लिकर'मध्ये दिसणार आहेत. हे दोन्ही चित्रपट २०२६ च्या अखेरीस प्रदर्शित होणार आहेत.
70 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 02:07 PM
थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला

थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला

Thalapathy Vijay Tvk Win :तामिळनाडूविधानसभा निवडणुकीतथलापती विजयनेऐतिहासिक विजय मिळवत नवा इतिहास रचला. राज्यातील जनतेनं, विजयच्या TVK पक्षाला १०८ जागांवर दणदणीत विजय मिळवून दिला. अनेक वर्षांपासूनतामिळनाडूच्याराजकारणावर वर्चस्व गाजवणाऱ्या DMK आणि AIADMK ला जोरदार धक्का बसला आहे. एमके स्टालिन यांची केवळ हातातून सत्ता निसटली नाही तर, स्वत: देखील कोलाथूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक हरले. आता विजय हा तामिळनाडूचा मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे. विजयच्या दणदणीत विजयानंतर राजकीय आणि मनोरंजन विश्वातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच लोकप्रिय दिग्दर्शकराम गोपाल वर्मांनीएक विजयचा एक खास फोटो शेअर केला आहे. राम गोपाल वर्मायांनी त्यांच्या 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर विजयचा दिवंगत महान राजकारणी आणि माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्यासोबतचा एक दुर्मिळ फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एका कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी करुणानिधी दिसत आहेत, तर त्यांच्या अगदी मागे तरुण विजय उभा आहे. हा फोटो शेअर करताना वर्मा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, "कळैगनार (करुणानिधी) यांनी कधी कल्पनाही केली नसेल की, त्यांच्या मागे उभा असलेला हा मुलगा एके दिवशी त्यांचा पक्ष (DMK) उद्ध्वस्त करेल". राम गोपाल वर्मा यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. Kalaingar wouldn’t have dreamed that the kid behind him would one day destroy his party 🙏👍🔥pic.twitter.com/7NNp6Ge73S दरम्यान, विजयचा राजकारणातील उदय हा केवळ त्यांच्या स्टारडमचा परिणाम नसून, मागील १५ वर्षांच्या सखोल आणि नियोजनबद्ध कामाचा परिणाम आहे. आपल्या फॅन क्लब्सना संघटित करून मजबूत राजकीय आधार तयार करण्याच्या रणनीतीमुळेच TVK ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे. सुपरस्टार विजयनं २०२४ मध्ये तमिळगा वेत्री कळगम (TVK) नावाच्या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर विक्रवंडी येथे झालेल्या पहिल्या सभेत तब्बल ८ लाखांची गर्दी जमवली. सुरुवातीला ही गर्दी केवळ सुपरस्टारच्या लोकप्रियतेचा परिणाम मानली गेली, मात्र २०२६ च्या निवडणूक निकालांनी या आकलनाला पूर्णपणे खोटे ठरवले.
82 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 02:05 PM
पशुधनाच्या शेतकऱ्यांसाठी सरकारने टोल-फ्री हेल्पलाईन'1962'सुरू केली

पशुधनाच्या शेतकऱ्यांसाठी सरकारने टोल-फ्री हेल्पलाईन'1962'सुरू केली

चंद्रपूर :ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी पशुधन हे उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे. मात्र, जनावरे आजारी पडल्यास त्यांना दवाखान्यात नेणे हे वेळखाऊ आणि खर्चिक ठरत असे. या समस्येवर उपाय म्हणून शासनाने '१९६२' ही टोल-फ्री हेल्पलाइन सुरू केली आहे. आता शेतकऱ्यांना केवळ एक फोन कॉल केल्यावर तज्ज्ञ पशुवैद्यकीय सेवा थेट त्यांच्या बांधावर उपलब्ध होणार आहे. या सेवेंतर्गत प्रशिक्षित डॉक्टर, औषधे आणि आवश्यक उपकरणांसह मोबाइल व्हेटरनरी क्लिनिक घटनास्थळी पोहोचते. त्यामुळे उपचारात होणारा विलंब टळून पशुधनाचे प्राण वाचत आहेत. विशेषतः दुभत्या जनावरांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैशाची बचत होत आहे. पशुधनासाठी '१९६२' ही टोल-फ्री हेल्पलाइनशासनाकडून सुरू केलेली '१९६२' ही हेल्पलाइन पूर्णपणे टोल-फ्री आहे. पशुधन आजारी असल्यासशेतकरीत्वरित या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. डॉक्टर शेतकऱ्यांना जनावरांच्या देखभालीबाबत मार्गदर्शन करतात. आहार, स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती दिली जाते. एका कॉलवर घरपोच पशुवैद्यकीय सेवाएक फोन कॉल केल्यानंतर डॉक्टर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचतात. औषधे आणि प्राथमिक उपचार तत्काळ उपलब्ध करून दिले जातात. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि आर्थिकही बचत होते. हेल्पलाइनवर कॉल करणे पूर्णपणे मोफत आहे. सेवा अत्यल्प दरात किंवा शासनाच्या योजनेनुसार उपलब्ध केली जाते. हेल्पलाइनवर कॉल करणे पूर्णपणे मोफत आहे. हेल्पलाइनद्वारे मिळणाऱ्या प्रमुख सेवातपासणी, औषधोपचार, लसीकरण आणि प्राथमिक शस्त्रक्रिया सेवा दिल्या जातात. तसेच विविध आजारांबाबत तज्ज्ञ सल्लाही दिला जातो, यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. या सेवेमुळे जनावरांना वेळेत उपचार मिळत असल्याचे विभागाने सांगितले. Heatstroke : खिशात कांदा ठेवल्याने ऊन लागत नाही, हे खरं आहे का? काय आहे यामागचं लॉजिक
32 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 02:03 PM
अहिल्यानगर गुन्हेगारीः सासरच्या 12 लाख रुपयांच्या मागणीवरून डॉक्टरची आत्महत्या

अहिल्यानगर गुन्हेगारीः सासरच्या 12 लाख रुपयांच्या मागणीवरून डॉक्टरची आत्महत्या

Ahilyanagar Crime : फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून १२ लाख रुपये आणण्यासाठी सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून २६ वर्षीय महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली.अहिल्यानगरच्यापारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे शनिवारी ही घटना घडली. डॉ. गौरी अमित दळवी-चौरे असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून पती अमित बाबासाहेब दळवी, सासू संगीता बाबासाहेब दळवी, सासरा बाबासाहेब हरिभाऊ दळवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुनील जबाजी चौरे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गौरीचे लग्न २३ नोव्हेंबर २०२४ रोजी अमित बाबासाहेब दळवी याच्याशी झाले. मुंबईला गेल्यानंतर पती अमित दळवी याने फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून १२ लाख रुपये आणण्यासाठी गौरीला त्रास देण्यास सुरुवात केली. 'तुम्ही साधे लग्न केले भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा पैसे आण', असे म्हणून तिचा छळ केला. गौरी ही खासगी रुग्णालयात कार्यरत होती. तिचा पगारही काढून घेतला. लग्नातील दागिनेही बळकावल्याचे गौरीने आई-वडिलांना फोनवर सांगितले होते. पती अमित हा दारूच्या आहारी गेला होता. पैशांसाठी तो सतत तिला मारहाण करीत होता. तसेच त्याचे इतर मुलींशी अनैतिक संबंध असल्याचेही गौरीने फेब्रुवारी २०२६मध्ये माहेरी सांगितले होते. त्यानंतर तिची आई मुंबईला जाऊन वाद मिटवून आली. मात्र, त्यानंतरही छळ सुरू होता. दरम्यान, २७ एप्रिल रोजी गौरी, तिचा पती अमित आणि सासरे बाबासाहेब हे गोरेगाव येथे आले. त्यावेळी अमितने 'तू इथेच थांब, मी पप्पांना नगरला सोडून तुला घ्यायला येतो', असे सांगून निघून गेला. त्यानंतर तो परत आलाच नाही. फोनही घेत नव्हता. २८ एप्रिल रोजी गौरी व तिची आईअहिल्यानगरव मुंबई येथे गेली असता, दोन्ही ठिकाणी घरांना कुलूप लावले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी गोरेगाव येथील घरात एकटी असताना गौरीने दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. आई शेतातून परत आल्यावर हा प्रकार समोर आला. तिला तातडीने पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
80 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 02:02 PM
आयपीएल 2026: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज-प्लेऑफ बर्थच्या शोधात निर्णायक सामना

आयपीएल 2026: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज-प्लेऑफ बर्थच्या शोधात निर्णायक सामना

IPL 2026 DC vs CSK : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरदिल्ली कॅपिटल्सआणिचेन्नई सुपर किंग्सप्लेऑफ्सच्या शर्यतीत आगेकूच करण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. या महत्त्वपूर्ण सामन्यात दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! DC ला मोठा दिलासा, CSK दोन बदलासह उतरला मैदानात दिल्ली कॅपिटल्सला यासामन्यात मोठा दिलासा मिळाला आहे. कारण दुखापतीतून सावरून लुंगी एनिग्डी पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. कायले जेमिसनच्या जागी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूलाचेन्नई सुपर किंग्सच्यासंघाने दुखापतग्रस्त रामकृष्ण घोषसह दोन बदलासह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. फिरकीपटू अकिल होसीन आणि गुरजपनीत सिंग यांनी चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने कमबॅकची संधी दिली आहे. २७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं दिल्ली पराभवाची परतफेड करणार? यंदाच्या हंगामातील दोन्ही संघातील हा दुसरा सामना आहे. याआधीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सच्या २३ धावांनी पराभूत केले होते. घरच्या मैदानात या पराभवाची परतफेड करत दिल्ली कॅपिटल्स दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत आपले स्थान अधिक भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील असेल. चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, डेवॉल्ड ब्रेविस, जेमी ओवर्टन, अकिल होसेन, नूर अहमद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, गुरजपनीत. दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल (यष्टीरक्षक, पथुम निसंका, करुण नायर, ट्रिस्टन स्टब्स, नितीश राणा, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, लुंगी एनिग्डी, टी नटराजन.
50 shares
😊
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 02:00 PM
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय, तृणमूल काँग्रेसचा पराभव

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय, तृणमूल काँग्रेसचा पराभव

Manoj Jarange Patil On West Bengal Election 2026 Result:पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत यंदा मतदारांनी १५ वर्षांपासूनचे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसचे सरकार पायउतार करीत गेल्या सुमारे ५० वर्षांपासून राज्यात ठराविक काळानंतर सत्तापालट घडवून आणारी एकतर्फी निवडणुकीची परंपरा कायम राखली. पश्चिम बंगालमध्येभाजपालातब्बल २०६ जागा मिळाल्या. तर तृणमूल काँग्रेसला केवळ ८० जागांवर समाधान मानावे लागले. भवानीपूर मतदारसंघात सुवेंदू अधिकारी यांनी तब्बल १५ हजार १०५ मतांनी ममता बॅनर्जी यांचा मोठा पराभव केला. सुवेंदू अधिकारी यांना एकूण ७३ हजार ९१७ मते मिळाली, तर ममता बॅनर्जी यांना ५८ हजार ८१२ मतांवर समाधान मानावे लागले. या निकालावरून इंडिया आघाडीसह विरोधकभाजपातसेच केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका करत आहेत. यातच आता महाराष्ट्रातील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनीही याबाबत शंका उपस्थित केली आहे. पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर राज्यात सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच सत्ता मिळाल्यामुळे पक्षासाठी मुख्यमंत्रिपदाचा निर्मय महत्त्वाचा ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पश्चिम बंगालमधील विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्यासोबत ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरन मांझी यांना सह-पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले. ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही ज्याला विचारले तो म्हणतो की, मी यांना मतदान केले नाही, तरी हे जिंकतात. पश्चिम बंगालमध्ये ममतादीदींना पाडले, पण लोक म्हणतात ममतादीदी कधीच पडणार नाही. मला पहिल्यांदा वाटायचे काही नसेल पण आता नक्की काहीतरी भानगड आहे, त्यांनी कुठेतरी काड्या खोचून ठेवल्या आहेत, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली. भाजपाच्या विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी भाजपावर जोरदार टीका केली होती. आता, मनोज जरांगे पाटील यांनीही भाजपाच्या विजयावर शंका घेतली आहे. दरम्यान, सध्या राज्यात वाढलेल्या गुन्हेगारीबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. हे असले रत्न आपल्याला लाभले आहेत, हे गुंडांना जेलमध्ये एसी लावून देतात आणि मोबाईल फोन देतात. यांच्या काळात गुंडांचे चालणार आहे. हे सरकार राक्षसी वृत्तीचे असून आता ते आपटावेच लागेल, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.
94 shares
😐