Post Meal Rituals In Indian Culture : भारतीय संस्कृतीमधील प्रत्येक परंपरेमागे सखोल विज्ञान आणि उत्तम स्वास्थ्य आहे. घरातील ज्येष्ठ मंडळी नेहमी सांगतात, जेवल्यानंतर लगेच झोपू नकोस किंवा आडवा होवू नकोस, थोडे चाल किंवा शतपावली कर. हाच नियम शास्त्रांमध्येही सांगितला आहे. आयुर्वेदात याला ‘शनैः शनैः चंकर्मणं’ असे म्हटले आहे, म्हणजे जेवणानंतर सावकाश चालणे. प्राचीन ग्रंथ चरक संहिता यामध्येही जेवणानंतर किमान 100 पावले चालणे, म्हणजेच शतपावली करावी असे म्हटलेले आहे. अन्न पचन सुधारण्यास यामुळे मदत होते. तसेच आरोग्याच्या इतर समस्या होत नाहीत. पण यासगळ्यात जेवणानंतर कुंभकर्ण आणि भीम यांच्या नावाचे स्मरण का करावे? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, याबद्दल सविस्तर माहिती घेवूया.आयुर्वेदानुसार, जेवण झाल्यानंतर आपण थोडं चाललो तर पाचक अग्नि सक्रिय होतो, ज्यामुळे अन्न नीट पचते आणि मेटाबॉलिझम सुधारते. यामुळे वजन नियंत्रित ठेवणे ते अगदी रक्तातील साखरेचा समतोल देखील उत्तम राहतो. हलक्या पावलांनी चालल्याने पचनशक्ती सुधारते आणि अन्नातील रस शरीरात योग्यरीत्या शोषला जातो. तुम्ही सेवन केलेले अन्न व्यवस्थित पचते. शास्त्रांमध्ये जेवणानंतर काय करावे आणि काय करू नये याबद्दल स्पष्टपणे सांगितलेले आहे.जेवणानंतर हे काम कधीही करू नयेहजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की, जेवणानंतर लगेच झोपल्याने शरीरात अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात. झोपल्याने पोटावर दाब पडतो. त्यामुळे गॅस, अपचन, लठ्ठपणा अशा अनेक समस्या वाढतात. त्याउलट, जेवणानंतर काही पावलं चालली तर तब्येत सुधारते आणि दीर्घायुष्य प्राप्त होते.जेवणानंतर लगेच झोपावे का?आयुर्वेदातही असे स्पष्ट सांगितले आहे की जेवणानंतरची शतपावली शरीरातील वात, पित्त आणि कफ हे तीनही दोष संतुलित करते. शास्त्रांमध्ये स्पष्ट लिहिले आहे की, जेवणानंतर लगेच बसणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे शरीरात लठ्ठपणा, स्थूलता आणि पचनाशी संबंधित अनेक व्याधी निर्माण होतात. जेवण करून लगेच बसल्याने पचनतंत्र कमकुवत होते आणि शरीरात विविध समस्या घर करू लागतात.जेवणानंतर पोटावरून हात का फिरवतात?वैदिक ग्रंथांनुसार जेवणानंतर पोटावर अगदी हलक्या पद्धतीने हात फिरवायला हवा. हात फिरवण्याची ही पद्धत घड्याळाच्या दिशेन असावी. जेव्हा जेवण झाल्यानंतर तुम्ही पोटावरून हात फिरवाल तेव्हा पुढील श्लोक म्हणा,अगस्त्यम कुम्भकर्णं च शनिं च वडवानलं।भोजनं परिपाकार्थ स्मरेद भीमं च पंचमं॥ग्रहण केलेले अन्न नीट पचावे म्हणून महर्षी अगस्त्य, कुंभकर्ण, शनि, वडवानल आणि भीम या पाचजणांचे नेहमी स्मरण करावे. जेवणानंतर पोटावर हात फिरवत हा मंत्र जपल्याने पचनक्रिया सुधारते.
जेवणानंतरचे भारतीय विधी उघडणेः उत्तम पचनक्रियेसाठी विज्ञान-आधारित मार्गदर्शक
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.