मुंबई :टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताविरुद्धचा सामना न खेळण्याचा निर्णय घेऊन पाकिस्तान सरकारने भारताविरुद्ध नव्याने संघर्ष सुरू केला. मात्र, त्याच वेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) यांच्यातील संघर्ष वाढणार आहे. आयसीसीची वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी बैठक होईल आणि त्यातच पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्बंध अमलात आणण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपस्पर्धेतील आपल्या लढती श्रीलंकेत खेळवण्याची बांगलादेशची मागणी आयसीसीने फेटाळल्यापासून पाक बोर्ड आक्रमक झाले होते. आयसीसीने कठोर कारवाईचा इशारा दिल्यामुळे पाकने स्पर्धा बहिष्कार टाळला. मात्र, त्याच वेळी भारताविरुद्धच्या सामन्यात न खेळण्याचे अस्त्र उगारले. पाकने स्पर्धेतील सर्वांत महत्त्वाच्या सामन्यास लक्ष्य केल्यामुळे आता आयसीसी जास्त आक्रमक होणार हे स्पष्ट आहे.‘पाकविरुद्धच्या कारवाईबाबतचा निर्णयआयसीसीच्या बैठकीतहोईल. ही बैठक दोन दिवसांत होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप आयसीसीने त्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. एखाद्या देश अथवा संघाविरुद्ध निर्बंध अमलात आणण्याची बैठक शक्यतो आयसीसीच्या मुख्यालयात होते. तातडीने बैठक झाली तरी त्याची किमान ४८ तास सूचना देण्यात येते’ असा दावा काही सूत्रांनी केला आहे.आयसीसी आक्रमक असले, तरी त्याच वेळी भारताविरुद्धची लढत खेळण्यासाठी पाकिस्तानचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यांनीच बांगलादेशचा सहभाग निश्चित करण्यासाठी याचप्रकारे प्रयत्न केले होते. ते विफल ठरले होते, याची आठवण करून दिली, असे सूत्रांनी सांगितले.भारत-पाक सामना श्रीलंकेत होणार होता, पण तरीही पाकिस्तानने बहिष्कार का टाकला, जाणून घ्या एकमेव कारण...हा निर्णय अयोग्य : आयसीसीपाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या सरकारचाभारताविरुद्ध न खेळण्याचा निर्णयअद्याप कळवलेला नाही, असे आयसीसीच्या पत्रकात म्हटले आहे. त्याच वेळी स्पर्धेतील एखाद्या सामन्यात न खेळण्याचाबाबतचा निर्णय योग्य नव्हे. हा सर्वच क्रिकेट चाहत्यांवर अन्याय आहे. त्यात पाकिस्तानचेही चाहते आहेत, असे आयसीसीने म्हटले आहे. आयसीसीच्या स्पर्धा क्रिकेटच्या प्रगतीसाठी, सर्वांना समान संधी देत होतात. एखाद्या निर्णयाबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. मात्र, पाकने घेतलेला निर्णय खेळासाठी; तसेच त्यांच्या चाहत्यांसाठीही योग्य नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या निर्णयाचा फेरविचार करेल. त्या वेळी ते आपल्या क्रिकेटवर होणाऱ्या दूरगामी परिणामही लक्षात घेतील, याकडे आयसीसीने लक्ष वेधले आहे.पाकिस्तानची अक्कल आता ठिकाणावर येणार, भारताच्या मॅचवर बहिष्कारानंतर आयसीसी उचलणार कोणतं मोठं पाऊल, पाहा..भारताविरुद्धची लढत न खेळण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. त्यामुळे त्यावरून पाक बोर्डाविरुद्ध कारवाई करणे आयसीसीच्या संकेतास धरून नसेल, असा दावा आयसीसी आणि पाक बोर्डाचे माजी अध्यक्ष एहसान मणी यांनी केला. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या वेळी पाकमध्ये खेळणे असुरक्षित असल्याचे आमच्या सरकारचे मत आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सांगितले होते. आम्हाला सरकारने परवानगी दिलेली नाही, असेही सांगितले जात होते, याकडे मणी यांनी लक्ष वेधले.
टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारताशी पाकिस्तानचा क्रिकेट संघर्ष वाढला
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.