Tur Kharedi :तूरखरेदीच्या हंगामात मोठा गोंधळ निर्माण झाला असून नाफेडमार्फत सुरू असलेलीतूरखरेदी अचानक बंद पडल्याने वणी तालुक्यातील शेकडोशेतकरीअडचणीत सापडले आहेत.(Tur Kharedi) दुसरीकडे, वाशिम जिल्ह्यात हमीभावाने सुरू असलेल्या तूर खरेदीलाही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे.(Tur Kharedi) वणीमध्ये खरेदी बंद; ५००शेतकरीअडकले नाफेड (NAFED) मार्फत व्हीसीएमएस संस्थेच्या माध्यमातून वणी खरेदी-विक्री संघात तूर खरेदी सुरू होती. मात्र, ५ मार्चपासून ही खरेदी अचानक बंद करण्यात आली. सुरुवातीला केवळ दोन दिवस खरेदी सुरू ठेवून पुन्हा केंद्र बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण १,०७८ शेतकऱ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी केवळ २१७ शेतकऱ्यांकडून ३,२८७.५० क्विंटल तूर खरेदी झाली असून सुमारे ५०० शेतकरी विक्रीपासून वंचित आहेत. खरेदी केंद्राची अंतिम मुदत २० मार्च असताना केंद्र बंद राहिल्याने अनेक शेतकऱ्यांना आपला माल विकता आलेला नाही. त्यामुळे उर्वरित तूर खरेदी तातडीने सुरू करून ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी, तसेच हरभरा खरेदीही सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यात हमीभाव खरेदीला कमी प्रतिसाद वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत हमीभावाने तूर खरेदी सुरू असली तरी शेतकऱ्यांचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा कमी आहे. ६,७४७ शेतकऱ्यांनी नोंदणी प्रत्यक्षात केवळ १,६१६ शेतकऱ्यांनी तूर विकली एकूण २४,०४४ क्विंटल खरेदी जिल्ह्यात दि विदर्भ को-ऑप मार्केटिंग फेडरेशन लि (Vidarbha Cooperative Marketing Federation), शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड (Maharashtra State Cooperative Marketing Federation) यांच्या माध्यमातून एकूण ३६ केंद्रांवर १३ फेब्रुवारीपासून खरेदी सुरू आहे. अल्प प्रतिसादामागील कारणे हमीभाव खरेदीला कमी प्रतिसाद मिळण्यामागे अनेक कारणे आहेत * खुल्याबाजारातजवळपास समान दर मिळणे * ई-पीक नोंदणीतील तांत्रिक अडचणी * शासकीय खरेदीतील विलंब आणि गुणवत्ता कपातीची भीती * यापूर्वीच्या सोयाबीन खरेदीतील अनुभवामुळे शेतकऱ्यांचा कमी विश्वास पुढील काळात प्रतिसाद वाढण्याची शक्यता सध्या खुल्याबाजारातीलतुरीचे दर हळूहळू घसरू लागले आहेत. त्यातच मार्चअखेरमुळे बाजार समित्यांचे व्यवहार काही दिवस ठप्प राहणार असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक व्यवहारांसाठी पैशांची गरज भासणार आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांचा हमीभाव खरेदीकडे कल वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट एकीकडे वणी येथे खरेदी बंद असल्याने शेतकरी अडचणीत आहेत, तर दुसरीकडे वाशिम जिल्ह्यात खरेदी सुरू असूनही कमी प्रतिसाद मिळत आहे. या दुहेरी परिस्थितीमुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे. तूर खरेदी व्यवस्थेत समन्वयाचा अभाव, तांत्रिक अडचणी आणि बाजारातील परिस्थिती यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्यासच परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. हे ही वाचा सविस्तर :Harbhara Kharedi : हरभरा खरेदी कासवगतीने; नाफेड केंद्रांवर शेतकरी रांगेत अधिक वाचा :Washim APMC Market : वाशिम बाजार समिती ५ एप्रिलपर्यंत बंद; जाणून घ्या नेमकं कारण
नाफेडच्या वणी तालुक्यातील तूर खरेदी अचानक थांबल्याने शेकडो शेतकरी प्रभावित
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.