ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या 4 February 2026 च्या भागात नागराज विरोधात कोर्टात केस चालू असते. सुमन त्याच्या विरोधात साक्षात असताना नागराजचे वकील तर्क लावतात की ती मानसिक दृष्ट्या सक्षम नाही त्यामुळे तिची साक्ष ग्राह्य धरले जाऊ नये. न्यायाधीशांना सुद्धा त्यांचं म्हणणं पटतं. त्यानंतर रविराज कोर्टात म्हणतो की या माणसाने गेली 22 वर्ष माझ्या कुटुंबा विरोधात कटकारस्थान रचला आहे. माझी पत्नी व माझ्या मुलीला त्याने माझ्यापासून दूर ठेवले आहे. तेव्हा नागराजचे वकील म्हणतात की ही केस नक्की कसली आहे. अपघाताची की सुमन किल्लेदार यांच्या किडनॅपिंगची. जर अपघाताचे म्हणायचे असेल तर त्यामध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही. सगळी माणसं सुखरूप आहेत. तसंच सुमन यांची मानसिक स्थिती ठीक नाही त्यामुळे त्यांच्यावरही आपण विश्वास ठेवू शकत नाही.रविराज म्हणतो की या नागराज मुळे माझ्या मुलीला गरीबीत दिवस काढावे लागले, ती अनाथाश्रमात वाढली ही फक्त एका दिवसाची केस नसून गेल्या 22 वर्षांपासूनचा अन्याय आहे. आज मी तुमच्याकडे एक बाप म्हणून, एक पती म्हणून न्याय मागत आहे. सुभेदारांच्या घरात प्रिया मात्रनागराज आणि महिपतयांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी सतत प्रार्थना करत असते. ती देवाला म्हणते की मी आजपर्यंत तुझ्याकडे काहीही मागितले नाही आणि जे मागितलं ते तू कधी पूर्णही केलं नाहीस त्यामुळे हे तरी माझं ऐक. त्या दोघांना जेलमध्ये सडक म्हणजे मी इथे मोकळा श्वास घेऊ शकते.बॉलिवूडवर राज्य करायची ही मराठी अभिनेत्री, पण दिग्दर्शकाच्या प्रेमाच्या जाळ्यात फसली! पत्नीचा खाल्ला मार अन् करियरही पाण्यातरविराजने काढला 22 वर्षांपासूनचा रागकोर्टात अर्जुन रविराजला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलवतो. आणि त्याला प्रश्न विचारू लागतो. तो विचारतो की तुमचा जो अपघात झाला त्याबद्दल तुमच्यात आणि नागराज किल्लेदार यांच्यामध्ये कधी बोलणं झालेलं का? यावर रविराज म्हणतो- गेल्या 22 वर्षात आमच्यात या विषयावर बराच संवाद झाला पण त्यांनी शिताफिने माझ्यापासून बऱ्याच गोष्टी लपवल्या. मी अनेक गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यात मला यश आलं नाही. पण गेल्या काही दिवसात मी ते पुरावे पुन्हा नीट पडताळून पाहिले तेव्हा मला नागराज विरोधात बरेच पुरावे सापडले आहेत.Tharala Tar Mag : सायली अर्जुनला छूपी मदत करणार प्रिया, रविराजने शोधला नागराजच्या खोटेपणाचा आणखी एक पुरावा, महिपतचे हात साक्षीमुळे दगडाखालीमहिपतने मारली पलटीत्यानंतर अर्जुन महिपत शिखरेला कोर्टात बोलावतो. तो त्याला विचारतो की 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताची सुपारी तुझ्याकडेच होती याचा आमच्याकडे पुरावा आहे. आता ती सुपारी तुला कोणी दिली याबद्दल तू सांग. पण महिपत आपल्या साक्षीला काहीतरी होईल या भीतीने काहीच सांगायला तयार नसतो. अर्जुन आरडा ओरड करून त्याच्याकडून खरं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करतो पण त्यावेळी नागराजचे वकील भालेराव त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतात. न्यायाधीश जेव्हा महिपतला तुला काही सांगायचं आहे का असं विचारतात तेव्हा तो नकार देत तिथून निघून जातो. महिपतच्या या अशा वागण्यामुळे नागराजचं पारडं जड ठरतं. नंतर अर्जुन पुरावा म्हणून कोर्टात सुमनने काढलेला व्हिडिओ दाखवतो पण यावरही भालेराव हा व्हिडिओ मॉर्फ केलेला असू शकतो असा तर्क काढतात. त्यामुळे तो सुद्धा पुरावा ग्राह्य धरला जात नाही.जुई गडकरीच्या वैयक्तिक गोष्टी ऐकून तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेलनागराजला मिळणार बेल?नागराज विरोधात ठोस कोणतेच पुरावे नाहीत यासाठी भालेराव न्यायाधीशांना विनंती करतो की तुम्ही त्यांना बेल मिळवून द्यावेत. न्यायाधीश सुद्धा थोडासा कल नागराज कडे निकाल उद्यावर ढकलतात. कोर्टाची वेळ संपल्यावर सुमन खूप घाबरलेली असते आता पुन्हा एकदा नागराज मोकाट फिरणार आणि आपल्याला त्रास देणार अशी भीती ती व्यक्त करते. तेव्हा सगळे तिला धीर देतात आणि आम्ही तुझ्यासोबत आहोत असं म्हणतात.Tharala Tar Mag मध्ये नागराज पुन्हा एकदा जेलमध्ये येतो. तेव्हा महिपत त्याला विचारतो की मोठ्या बाता मारत गेलास की माझी बेल लगेच होणार मग आता इथे का आलास. तेव्हा नागराज सुद्धा त्याला फुशारक्या मारत म्हणतो की माझी बेल झाल्यातच जमा आहे. न्यायाधीशांनी माझ्या विरोधातले पुरावे फारसे ग्राह्य धरलेले नाही त्यामुळे निकाल उद्या वर ढकलला आहे. तू बस इथे सडत.
न्याय मागणेः एका वडिलांची न्यायालयात याचिका
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.