Achira News Logo
Achira News

पाकिस्तानच्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या निर्णयामुळे 2 अब्ज डॉलर्सच्या महसुलाचे नुकसान झाल्याने वाद निर्माण झाला आहे.

Lokmat
पाकिस्तानच्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या निर्णयामुळे 2 अब्ज डॉलर्सच्या महसुलाचे नुकसान झाल्याने वाद निर्माण झाला आहे.
Full News
Share:

IND vs PAK ICC Loss, T20 World Cup 2026: कोणत्याहीआयसीसीस्पर्धेत भारतीय संघाच्या सामन्यांमधून सर्वाधिक उत्पन्न मिळते. विशेषतः जेव्हा सामना भारत आणिपाकिस्तानयांच्यात असतो, तेव्हा हे उत्पन्न कित्येक पटीने वाढते. पण जर सामना झाला नाही तर नुकसानही तितकेच मोठे असू शकते. येत्या टी२० विश्वचषकात भारताशी सामना खेळणार नाही, असेपाकिस्तानक्रिकेट बोर्डाने सांगितले आहे. स्पर्धेला सहा दिवस शिल्लक असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या या अजब निर्णयामुळे ICC ला तब्बल २ अब्ज रुपयांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण होतो की, या नुकसानीची भरपाई कुणाकडून केली जाणार... नेमका घोळ काय? पाकिस्तानने जाहीर केले की ते विश्वचषकात भारताविरुद्ध आपला संघ मैदानात उतरवणार नाहीत. पीसीबीने या निर्णयामागे पाकिस्तान सरकारच्या आदेशांचा उल्लेख केला. पाकिस्तानच्या निर्णयानंतर,आयसीसीनेएका निवेदनात गंभीर परिणामांचा इशारा दिला. असे मानले जाते की जर पीसीबीने आपला निर्णय बदलला नाही तर आयसीसी मोठा दंड आकारू शकते. काण जर हा सामना झाला नाही, तर आयसीसीला स्वतःला २ अब्ज रुपयांपर्यंतचे नुकसान सहन करावे लागू शकते. T20 World Cup 2026: BCCIचा 'मास्टरप्लॅन'! भारताने गुपचूप केला पाकिस्तानचा 'गेम' भारत-पाक सामन्याच्या कमाईचे गणित गेल्या अनेक वर्षांपासून, भारत-पाकिस्तान सामना हा आयसीसीच्या प्रत्येक स्पर्धेत सर्वात लक्षवेधी ठरला आहे. कारण केवळ ICC स्पर्धांच्या सामन्यातच हे दोन्ही संघ एकमेकांशी भिडतात. परिणामी, या सामन्याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. परिणामी, भारत-पाकिस्तान सामन्यांनी आयसीसीला सातत्याने सर्वाधिक महसूल मिळवून दिला आहे. विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यांच्या वेळापत्रकामुळे आयसीसीला प्रसारकांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क मिळते. पण जर हा सामना झाला नाही, तर स्पर्धेतील सर्वात मोठा प्रसारक असलेल्याजिओ-हॉटस्टारला कोणताही महसूल मिळणार नाही आणि शेवटी याचा परिणाम आयसीसीवर होईल. कारण त्यांना या सामन्याचे शुल्क मिळणार नाही. IND vs PAK: पाकिस्तानच्या निर्णयामुळे ICCचा संताप, 'या' पाच प्रकारे कारवाई होण्याची शक्यता ICC पाकिस्तान बोर्डाला दणका देण्याच्या तयारीत क्रिकबझच्या अहवालानुसार, कोणत्याही आयसीसी स्पर्धेत भारताचे सामने सुमारे १०० कोटी रुपये कमावतात. भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये हे जवळजवळ दुप्पट होते. कारण भारत-पाकिस्तान टी२० सामन्यासाठी प्रत्येक १० सेकंदांच्या जाहिरातीचा दर साधारणपणे २५ लाख ते ४० लाख रुपयांच्या दरम्यान असतो. अशा परिस्थितीत, हे नुकसान सुमारे २०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. जर आयसीसीला असा तोटा झाला तर त्याचा महसूल वाटप मॉडेलवर परिणाम होईल, ज्यामुळे बीसीसीआय आणि पीसीबीसह सर्व क्रिकेट बोर्डांच्या उत्पन्नावर परिणाम होईल. आधीच श्रीमंत असलेल्या बीसीसीआयसाठी हे मोठे नुकसान नसले तरी पीसीबी आणि इतर बोर्डांसाठी ते मोठे नुकसान असू शकते. शिवाय, आयसीसी बोर्डाच्या जवळच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, सामना रद्द झाल्यास आयसीसी पीसीबीला शिक्षा म्हणून झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यास भाग पाडू शकते.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

पाकिस्तानच्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या निर्णयामुळे 2 अब्ज डॉलर्सच्या महसुलाचे नुकसान झाल्याने वाद निर्माण झाला आहे. | Achira News