अनेकदा आपल्या पाहण्यात, वाचण्यात येते की, तुरुंगात असलेल्या अमूक एका व्यक्तीला पॅरोल मिळाला. अशा व्यक्ती पॅरोल तुरुंगातून बाहेर येता आणि सुट्टी संपल्यानंतर परत जातात. यात अनेक आरोपी पॅरोलवर सुटल्यानंतर फरार होतात. तर काहीजण दुसरा गुन्हा करतात. पण, कैद्यांसाठी असलेला पॅरोल किंवा फर्लो रजा काय असते? दखलपात्र गुन्ह्यात एकदा का आरोपी कारागृहात गेला की अर्धे अधिक आयुष्य तिथेच खिचपत पडून राहावे लागते; परंतु शिक्षेदरम्यानही कैद्यांना काराबाहेर बाहेर रजेवर येण्याची मुभा असते. पॅरोल किंवा फर्लो कुणाला मिळते? शिक्षा भोगताना कैद्यांना अभिवचन रजा म्हणजेच पॅरोल आणि दुसरी संचित म्हणजे फर्लो रजेसाठी विनंती करण्याचा अधिकार असतो. या दोन्ही रजा केवळ पक्का बंदी म्हणजेच गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा लागलेल्या कैद्यांना लागू असतात. रजा कधी व कशी मिळते ? कारागृह प्रशासन कैद्याचा अर्ज विभागीय आयुक्तांकडे पाठवतात. अर्जाचे गांभीर्य पाहून संबंधित कैदी जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या गुन्हे शाखेकडे अभिप्रायासाठी पाठवला जातो. तिथे अर्जातील कारणाची शहानिशा केली जाते. संचित रजेचा १५, तर पॅरोल रजेचा कालावधी १ महिन्याचा असतो. विनंतीवरून पॅरोल तीन महिन्यांपर्यंत वाढवता येतो. जवळचे नातेवाईक मृत झाल्यास दहा दिवसांची पॅरोल कारागृह अधीक्षक मंजूर करू शकतात. या रजेचा कालावधी शिक्षेत गणला जात नाही. कैदी जितके दिवस रजेवर राहतो, तेवढे शिक्षेचे दिवस वाढतात. यादरम्यान त्याने गुन्हे केल्यास परत कोणतीच रजा मिळत नाही.
पॅरोल आणि फर्लो लीव्हः भारतातील कैद्यांच्या सुटकेच्या धोरणांचा आढावा
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.