चंद्रपूर :ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी पशुधन हे उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे. मात्र, जनावरे आजारी पडल्यास त्यांना दवाखान्यात नेणे हे वेळखाऊ आणि खर्चिक ठरत असे. या समस्येवर उपाय म्हणून शासनाने '१९६२' ही टोल-फ्री हेल्पलाइन सुरू केली आहे. आता शेतकऱ्यांना केवळ एक फोन कॉल केल्यावर तज्ज्ञ पशुवैद्यकीय सेवा थेट त्यांच्या बांधावर उपलब्ध होणार आहे. या सेवेंतर्गत प्रशिक्षित डॉक्टर, औषधे आणि आवश्यक उपकरणांसह मोबाइल व्हेटरनरी क्लिनिक घटनास्थळी पोहोचते. त्यामुळे उपचारात होणारा विलंब टळून पशुधनाचे प्राण वाचत आहेत. विशेषतः दुभत्या जनावरांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैशाची बचत होत आहे. पशुधनासाठी '१९६२' ही टोल-फ्री हेल्पलाइनशासनाकडून सुरू केलेली '१९६२' ही हेल्पलाइन पूर्णपणे टोल-फ्री आहे. पशुधन आजारी असल्यासशेतकरीत्वरित या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. डॉक्टर शेतकऱ्यांना जनावरांच्या देखभालीबाबत मार्गदर्शन करतात. आहार, स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती दिली जाते. एका कॉलवर घरपोच पशुवैद्यकीय सेवाएक फोन कॉल केल्यानंतर डॉक्टर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचतात. औषधे आणि प्राथमिक उपचार तत्काळ उपलब्ध करून दिले जातात. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि आर्थिकही बचत होते. हेल्पलाइनवर कॉल करणे पूर्णपणे मोफत आहे. सेवा अत्यल्प दरात किंवा शासनाच्या योजनेनुसार उपलब्ध केली जाते. हेल्पलाइनवर कॉल करणे पूर्णपणे मोफत आहे. हेल्पलाइनद्वारे मिळणाऱ्या प्रमुख सेवातपासणी, औषधोपचार, लसीकरण आणि प्राथमिक शस्त्रक्रिया सेवा दिल्या जातात. तसेच विविध आजारांबाबत तज्ज्ञ सल्लाही दिला जातो, यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. या सेवेमुळे जनावरांना वेळेत उपचार मिळत असल्याचे विभागाने सांगितले. Heatstroke : खिशात कांदा ठेवल्याने ऊन लागत नाही, हे खरं आहे का? काय आहे यामागचं लॉजिक
पशुधनाच्या शेतकऱ्यांसाठी सरकारने टोल-फ्री हेल्पलाईन'1962'सुरू केली
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.