Achira News Logo
Achira News

बटाट्याच्या पसंतीमुळे तुम्ही रक्त शुद्ध करणाऱ्या 4 भाज्यांकडे दुर्लक्ष करत आहात

Maharashtra Times
बटाट्याच्या पसंतीमुळे तुम्ही रक्त शुद्ध करणाऱ्या 4 भाज्यांकडे दुर्लक्ष करत आहात
Full News
Share:

रक्त हा आपल्या शरीरासाठी अगदी मूलभूत आणि महत्त्वाचा घटक आहे. शरीरात जर रक्ताचीच कमतरता असेल तर सर्वसाधारण थकवा, अशक्तपणा, त्वचेचा रंग फिका होणे, धाप लागणे यांसारख्या लक्षणांनी सुरुवात होते आणि ही स्थिती पुढे जाऊन एनीमियासारख्या गंभीर जीवघेण्या आजारातही बदलू शकते. पण केवळ रक्ताची कमतरता नव्हे, तर अनेकदा रक्तात टॉक्सिन्स म्हणजेच विषारी घटकही साचत जातात.हेच टॉक्सिन्स शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांपर्यंत पोहोचतात आणि गंभीर परिणाम घडवतात. आयुर्वेदामध्ये काही विशिष्ट भाजीपाला असा सांगितला आहे जो रक्त शुद्ध करण्यास हातभार लावतो. पण दुर्दैवाने या परंपरागत सल्ल्याकडे आजच्या पिढीकडून दुर्लक्ष होत आहे. जाणून घ्या कोणत्या त्या ४ भाज्या आहेत ज्या रक्त शुद्ध करतात.चौसष्ट प्रकारच्या भाज्यांऐवजी ‘आलू-पनीर’वर अवलंबूनआजच्या जेवणाच्या ताटात भाजी म्हणून वारंवार पनीर किंवा बटाटा दिसतो. खवय्येपणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या आपल्या देशात इतर सर्व भाजीपाला जणू विस्मरणात गेला आहे. प्रत्येक बेतात बटाट्याचेच पर्याय दिसतात आणि यामुळे आपल्या शरीरातील आवश्यक पोषणही बिघडते.रोजच्या आहारात या ‘चार’ हिरव्या भाज्या हव्यातच​हिरव्या भाज्यांमध्येव्हिटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तशुद्धीसाठी या भाज्यांचा समावेश आपल्या रोजच्या आहारात करणे आवश्यक आहे. विशेषतः चौलाई ही अशी भाजी आहे जी रक्तातील घातक घटक म्हणजेच टॉक्सिन्स दूर करण्याची क्षमता ठेवते. याशिवाय पालक, मेथी आणि शेवग्याच्या शेंगाही अत्यंत फायदेशीर आहेत. ह्या भाज्या वेगवेगळ्या स्वरूपात म्हणजेच सूप, भाजी, पराठा किंवा कोशिंबीर करून खाल्ल्या जाऊ शकतात.‘एनीमिया’ पासून संरक्षण करणारा नैसर्गिक उपायडॉ. तन्मय गोस्वामी यांच्या मते, जर वर नमूद केलेल्या भाज्यांचे नियमित सेवन केले गेले, तर रक्ताची कमतरता म्हणजेचएनीमियाचा त्रासहोणारच नाही. शिवाय, रक्तात अनावश्यक उष्णता किंवा जळजळ निर्माण करणारे टॉक्सिन्स देखील नियंत्रित राहतील. यामुळे त्वचेवर चमक येईल, डोळे निरोगी राहतील आणि झपाट्याने थकवा जाणवणार नाही.बाकी दिवसांच्या आहारातही ही काळजी घ्यासप्ताहातील उर्वरित दिवसांमध्ये पडवळ आणि दुधीभोपळा यांसारख्या हलक्या पण उपयुक्त भाज्यांचा समावेश करा. या भाज्या शरीरात थकवा निर्माण होऊ न देता आवश्यक ऊर्जा देण्याचे काम करतात. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या भाज्या उष्णतेला नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.डाळी आणि मिलेट्ससुद्धा आवश्यकभाज्यांप्रमाणेच, काळी डाळ, उडीद आणि तूरडाळ याही आहारात असाव्यात. त्यांच्यात प्रथिने आणि लोहाचे प्रमाण भरपूर असते. बाजरी, ज्वारी, रागी यांसारख्या मिलेट्सचे सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि स्किनच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. या सगळ्याचा थेट फायदा म्हणजे वाढत्या वयाच्या खुणा कमी दिसतात, आणि वयाच्या ५०व्या वर्षातही तुम्ही तरुण दिसू लागता. जर हाच आहार पद्धतशीरपणे सातत्याने घेतला, तर रक्ताची कमतरता, त्वचेसंबंधी तक्रारी, थकवा आणि अनेक लपलेल्या आजारांपासून आपण सहजपणे दूर राहू शकतो.टिप :हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. हा वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लेखातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी MT घेत नाही.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

बटाट्याच्या पसंतीमुळे तुम्ही रक्त शुद्ध करणाऱ्या 4 भाज्यांकडे दुर्लक्ष करत आहात | Achira News