आपल्या दैनंदिन जीवनात एक गोष्ट अशी आहे जी प्रत्येकाच्या तब्येतीवर मोठा परिणाम करू शकते, ती म्हणजे बद्धकोष्ठता होय. पण अनेकदा लोक तिच्याकडे दुर्लक्ष करतात. सकाळची घाई, ऑफिसला जाण्याची धावपळ, चुकीच्या आहाराची सवय आणि पुरेसं पाणी न पिण्याची प्रवृत्ती यामुळे शरीरात ही समस्या तयार होत जाते. बद्धकोष्ठता ही स्थिती दिसायला साधी असली तरी शरीराच्या संपूर्ण आरोग्यावर गंभीर परिणाम घडवू शकते. विशेष म्हणजे, या त्रासामुळे मानसिक चिडचिड वाढते आणि दिवसभर एकाग्रता कमी होते.अनेकदा लोक ही अवस्था नैसर्गिक मानतात, पण प्रत्यक्षात ती आपल्या आहार आणि जीवनशैलीशी घट्ट निगडीत असते. त्यामुळे बद्धकोष्ठतेवर योग्य वेळी उपाय केले तर शरीराला पुन्हा हलकेपणाची जाणीव होऊ शकते. तर नेमके कोणते साधे उपाय या अडचणीतून बाहेर पडायला मदत करतात ते डॉक्टर शिल्पा अरोराकडून जाणून घेऊया.गाजरगाजरामध्ये मुबलक प्रमाणात तंतुमय घटक असतात जे आपल्या पचनसंस्थेला सुरळीत काम करण्यास मदत करतात.जेव्हा गाजर रोज खाल्ले जाते, तेव्हा ते आतड्यातील हालचाली वेगवान करतात आणि पोट साफ होण्याची प्रक्रिया सुलभ होते. पचन नीट न होण्यामुळे पोटातला जडपणा, पोट फुगणं आणि आळस निर्माण होतो तो गाजरामुळे कमी होतो. तसेच, गाजर शरीरात नैसर्गिक स्वच्छतेसारखं काम करतं. या साध्या उपायामुळे सकाळचा त्रास कमी होऊन दिवसभर हलकं वाटू लागतं.कच्ची पपईपचनाच्या समस्यांवर कच्च्या पपईसारखा प्रभावी नैसर्गिक उपाय क्वचितच मिळतो. पपईत ‘पापेन’ नावाचं एन्झाईम असतं, जे शरीरातील अन्नाचे पचन सुलभ करतं आणि साचलेले विषारी घटक बाहेर टाकतं. कच्च्या पपईचं पराठ्यासारखं सेवन करण्याची पद्धत आरोग्यासाठी उपयुक्त मानली जाते. जसं आलू भरून पराठा बनवला जातो, तसंच किसलेल्या पपईचं पीठात भरून पराठा तयार करता येतो.या स्वादिष्ट पदार्थामुळे पोट नीट साफ होतं, त्यामुळे त्रासदायक बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.देशी तुपाचे फायदेकच्च्या पपईच्या पराठ्याला जर देशी तूप लावलं तर त्याचे फायदे अधिक वाढतात. तूप आतड्यांना नैसर्गिक लुब्रिकेशन देते, ज्यामुळे मल सैल होतो आणि सहज बाहेर पडतो. शिवाय तुपामध्ये असे घटक असतात जे हार्मोन्सचं संतुलन राखतात. आहारात नियमित प्रमाणात तुपाचा समावेश केल्यास पचनशक्ती सुधारते आणि आतड्यांचा त्रास कमी होतो.पाणी आणि द्रवपदार्थांचं महत्त्वशरीरात पुरेशा प्रमाणात पाणी न मिळाल्यास मल कठीण होतो आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो.त्यामुळे दररोज भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे. फक्त साधं पाणी नव्हे तर ताक, डाळीचं पाणी, फळांचे रस यांसारख्या द्रवपदार्थांचा समावेश केल्यास शरीरातील आर्द्रता टिकून राहते. पाण्याची योग्य पातळी असल्यास पचनक्रिया सुरळीत होते आणि आतडे सहज रिकामं होतं. हा साधा उपाय असूनही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात, पण तोच या समस्येवर सर्वात प्रभावी उपाय ठरतो.पोट साफ होण्यासाठी ुडॉक्टरचे ुउपायView this post on InstagramA post shared by Shilpa Arora (@dr.shilpaarora)जीवनशैली आणि झोपेचा परिणामबद्धकोष्ठतेचं आणखी एक मोठं कारण म्हणजे निष्क्रिय जीवनशैली. दिवसभर खुर्चीवर बसून काम करणं, चालण्याची-व्यायामाची सवय नसणं, उशिरापर्यंत जागरणं हे घटक पचनसंस्थेला आळशी करतात. यामुळे मलत्यागाची प्रक्रिया मंदावते. जर दररोज नियमित व्यायामाची सवय लावली, पुरेशी झोप घेतली आणि सक्रिय जीवनशैली स्वीकारली, तर या समस्येवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येतं.टिप :हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. हा वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लेखातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी MT घेत नाही.
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी सोपे उपाय उघडणेः डॉ. शिल्पा अरोरा यांचे मार्गदर्शन
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.