अनिकेत यादव, अहिल्यानगर:बिबट्या–मानव संघर्ष रोखण्यासाठी वनविभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केला असून, अहिल्यानगर येथे एआय वाईल्ड नेत्र ही अत्याधुनिक सौरऊर्जेवर चालणारी सायरन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. बिबट्याची हालचाल कॅमेर्यात कैद होताच ही प्रणाली तात्काळ सक्रिय होऊन मोठ्या आवाजातील सायरनद्वारे नागरिकांना धोक्याचा इशारा देणार आहे. वनविभागाच्या सहकार्याने दादा रिसर्च फाउंडेशन संचलित दावेल लाईफ सायन्स कंपनीने विकसित केलेल्या या प्रणालीत अॅडव्हान्स कॉम्प्युटर व्हिजन आणि डीप लर्निंग आधारित एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. बिबट्याचा स्वतंत्र डेटाबेस फीड करण्यात आल्याने कॅमेर्यासमोर बिबट्या येताच यंत्रणा आपोआप सायरन वाजवते.एआय प्रणालीमुळे बिबट्यांच्या हालचाली, वेळ व वावराचा परिसर याची अचूक माहिती वनविभागाला मिळणारविशेष म्हणजे ही यंत्रणा कोणत्याही मोबाईल नेटवर्कशिवाय कार्यरत राहते. सौरऊर्जेवर चालणारी ही प्रणाली ग्रामीण व जंगलालगतच्या भागांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सायरनच्या इशाऱ्यामुळे नागरिक घराबाहेर जाणे टाळू शकतात, जनावरे व लहान मुलांची योग्य काळजी घेणे शक्य होणार आहे. बिबट्या–मानव संघर्ष टाळण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून वनविभागाला तातडीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याच निधीतून हा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात आला आहे.या एआय प्रणालीमुळे बिबट्यांच्या हालचाली, वेळ व वावराचा परिसर याची अचूक माहिती वनविभागाला मिळणार असून, भविष्यात संघर्ष व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल, असा विश्वास उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी व्यक्त केला आहे.Dhananjay Munde: 'नियती इतकी क्रूर कशी असू शकते?'; अजित पवारांच्या पार्थिवासमोर धनंजय मुंडेंचा अखेरचा दंडवतएआय वाईल्ड नेत्र प्रणाली360 अंश कॅमेरा कव्हरेज, सुमारे 200 मीटरपर्यंत रेंज राहणार आहे.सायरनचा आवाज तब्बल 2 किलोमीटरपर्यंत ऐकू जाणार. या प्रणालीत अॅडव्हान्स कॉम्प्युटर व्हिजन आणि डीप लर्निंग या अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, बिबट्यांचा स्वतंत्र डेटाबेस कॅमेऱ्यात फीड करण्यात आला आहे. त्यामुळे कॅमेऱ्यासमोर बिबट्या आल्याचे ओळखताच ही यंत्रणा आपोआप सक्रिय होते आणि मोठ्या आवाजातील सायरनद्वारे गावकऱ्यांना धोक्याचा इशारा या सायरांमुळे मिळणार आहे तसेच 360 अंश कॅमेरा कव्हरेज, सुमारे200मीटरपर्यंत रेंज राहणार आहे.सायरनचा आवाज तब्बल 2 किलोमीटरपर्यंत ऐकू जाणारबिबट्या दिसल्यानंतर किमान 2 मिनिटांत सायरन सक्रिय होत असून दोन तासानंतर पुन्हा एकदा रिमाइंडर देत गावकऱ्यांनासावधकरणार आहे.
बिबट्या-मानव संघर्ष रोखण्यासाठी भारताच्या वन विभागाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारी सायरन प्रणाली तैनात केली
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.