पुणे:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात पुणे विभागीय मंडळातील ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थी उत्तीर्णतेच्या टक्केवारीत पुणे विभाग राज्यात द्वितीय स्थानावर आहे. तर पुणे विभागीय मंडळात पुणे जिल्ह्याने ९२.३२ टक्क्यांसह आघाडीचे स्थान पटकाविले आहे.पुणे विभागातून दोन लाख ४४ हजार १९१ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील दोन लाख ४१ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि त्यातील ९१.२५ टक्के म्हणजेच दोन लाख २० हजार ६८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा राज्याचाच एकूण निकाल घटल्यामुळे विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचा टक्का ०.६३ ने घसरला आहे.पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष औदुंबर उकिरडे, सचिव डॉ. मीनाक्षी राऊत यांनी निकालाची माहिती दिली. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सात हजार ६४४ पुनर्परीक्षार्थ्यांपैकी सात हजार ४७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी पाच हजार ७७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ७७.३५ इतकी आहे.
बाराव्या इयत्तेच्या निकालात पुणे विभाग महाराष्ट्र राज्यात आघाडीवर, उत्तीर्णांची टक्केवारी घटली
Sakal•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Sakal
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.