म. टा. वृत्तसेवा, अमरावती:गेल्या तीन वर्षांपासून निसर्गाच्या सोबतीने शांत असलेला दक्षिण सातपुडा सध्या वणव्याच्या विळख्यात सापडला आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या या पर्वतरांगांमध्येभीषण आगलागली आहे. गेल्या तीन वर्षांतील वनविभागाची तपश्चर्या अवघ्या काही तासांत खाक झाली आहे. या वणव्यामुळे केवळ वनसंपत्तीच नव्हे, तर सीमावर्ती भागातील मानवी वस्त्यांनाही उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत आहे.सातपुडा पर्वतरांगांमधील अंबाडोरी, खोकरा, गारगोटी, सालबर्डी आणि गामुख या दुर्गम पट्ट्यात आगीने रौद्ररूप धारण केले आहे. विशेष म्हणजे, मागील तीन वर्षे या भागात एकही वणवा लागला नव्हता. वनविभागाच्या या कामगिरीबद्दल शासनाकडून स्थानिक ग्रामस्थांना प्रोत्साहनपर पुरस्कारही देण्यात आले होते. मात्र, यंदा ही परंपरा खंडित झाली असून आगीच्या संकटामुळे वनविभागाच्या चिंतेत भर पडली आहे. यंदा तापमानाने ४७ अंशांचा टप्पा ओलांडला आहे.Jellyfish Warning Alibaug : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये समुद्रकिनाऱ्यावर जाताय तर सावधान! निळाशार ‘ब्लू बटन’चा सापळा, अलिबागमध्ये पर्यटकांना सतर्कतेचा इशारायंत्रणेची कसोटीसध्या ही आग शेकडो हेक्टर वनक्षेत्रात पसरली असून, विशेषत: अंबाडोरी आणि सालबर्डी वनपरिक्षेत्रातील वन खंडात मौल्यवान लाकूड धोक्यात आले आहे. आग विझवण्यासाठी दीडशेहून अधिक वनमजूर दुर्गम भागात तैनात आहेत. वीसपेक्षा जास्त ब्लोअर मशीन आणि स्थानिक साहित्याच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही राज्यांचे वनाधिकारी आणि ग्रामीण पोलिस अधीक्षक यांची तातडीची बैठक पार पडली.आंतरराष्ट्रीय तस्करीरोखणे आणि वणवा विझविणे हे दुहेरी आव्हान प्रशासनासमोर असून, लोकप्रतिनिधींनीही या प्रकरणी वनमंत्र्यांकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.नागरिकांचे हालवणव्याच्या आगीमुळे सीमेवरील गावांमध्ये गरम वारे वाहू लागले आहेत. या वाऱ्यांमुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून, जनजीवन विस्कळित झाले आहे. ही आग लवकर आटोक्यात न आल्यास दुर्मीळ वनौषधी आणिवन्यजीवांचे मोठे नुकसानहोण्याची भीती व्यक्त केली जात आहे.वारा, डोंगराळ भाग ठरतोय अडथळाडोंगराचा दुर्गम भाग आणि सातत्याने वाहणारे उष्ण वारे यामुळे आग विझविण्याच्या मोहिमेत मोठा अडथळा येत आहे. एका बाजूला आग विझविली, की वाऱ्याच्या झोतामुळे दुसऱ्या बाजूला ठिणग्या पडून नवीन वणवा पेटत आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांचे वन कर्मचारी, वनरक्षक आणि निसर्गप्रेमी वनमित्र वणवा विझविण्यासाठी झटत आहेत. मध्य प्रदेशातील यंत्रणाही या लढ्यात खांद्याला खांदा लावून काम करीत आहे.
भारतातील दक्षिण सातपुडा पर्वतरांगांमध्ये जंगलातील आग
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.