म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: विरोधी पक्षनेतेराहुल गांधीयांना माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील मजकुराबद्दल बोलण्यास परवानगी नाकारल्याच्या मुद्द्यावरून लोकसभेत मंगळवारी, सलग दुसऱ्या दिवशी गदारोळ झाला. या गदारोळात अध्यक्षांसमोरील टेबलावर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसेच पीठासीन अधिकाऱ्यांवर कागदाचे तुकडे भिरकावणाऱ्याआठ खासदारांना निलंबितकरण्यात आले. त्यात काँग्रेसच्या सात तर माकपच्या एका खासदाराचा समावेश आहे.लोकसभेचे कामकाज मंगळवारी दुपारी सुरू झाले तेव्हाराहुल गांधीयांनी पुन्हा माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा नामोल्लेख टाळून चीनच्या घुसखोरीच्या प्रसंगाचा तोच संदर्भ देण्यास सुरुवात केली. चीन आणि पूर्व लडाखमध्ये लष्कराचे जवान हुतात्मा झाले तो मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे असे त्यांनी सांगितल्यावर भाजप सदस्यांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला. पीठासीन अधिकारी कृष्णकुमार टेनेटी यांनी, ‘तुम्हाला बोलण्यास परवानगी देण्यात आली आहे परंतु लोकसभाध्यक्षांनी या मुद्द्यासाठी परवानगी नाकारल्याने तो मुद्दा मांडता येणार नाही’, असे राहुल गांधी यांना सांगितले.Praful Patel: राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबद्दल प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा; सर्व चर्चा संपवल्या, सुनेत्रा पवारांवरही स्पष्टच बोलले!यावर संतापलेल्या राहुल यांनी, ‘मी विरोधी पक्षनेता आहे. मला बोलण्यासाठी कोणाकडून परवानगीची काय गरज आहे’, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावरसंसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजुयांनी संसदेत प्रत्येक सदस्य अध्यक्षांच्या परवानगीनेच बोलतो, असे निदर्शनास आणून दिले. तरीही राहुल गांधी यांनी आपला मुद्दा न सोडल्याने टेनेटी यांनी इतर वक्त्यांची नावे पुकारण्यास सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेस खासदार घोषणाबाजी करत हौद्यात उतरले.सातवीतल्या पोरानं तब्बल 85 लाखांचे मोमो खाल्ले; कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकलीराहुल गांधी यांचे अध्यक्षांना पत्रसर्व गदारोळाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले. त्यात त्यांनी नमूद केले आहे की, 'सभापती, सभागृहाचे निष्पक्ष संरक्षक म्हणून, विरोधी पक्षाच्या सदस्यांसह प्रत्येक सदस्याच्या हक्कांचे रक्षण करणे ही तुमची संवैधानिक जबाबदारी आहे. सभागृहात बोलण्यापासून मला रोखणे हे परंपरांचे उघड उल्लंघन आहे. मुळात जेव्हा लोकसभाध्यक्ष सदस्याला कागदपत्रे सत्यापित करण्याची किंवा त्याचा संदर्भ घेण्याची परवानगी देतात. त्यानंतर प्रतिसाद देण्याची जबाबदारी सरकारवर असते. लोकसभेत मला बोलण्यापासून रोखणे हे केवळ या परंपरेचे उल्लंघन करत नाही तर विरोधी पक्षनेते म्हणून, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर बोलण्यापासून रोखण्याचा जाणूनबुजून प्रयत्न केला जात आहे. विरोधी पक्षनेत्याचा व प्रत्येक सदस्याचा बोलण्याचा अधिकार हा लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे'.Crime News : नऊ वर्षाच्या अफेअरनंतर लग्न, पण दोनच महिन्यात नवविवाहितेने नवऱ्याचा जीव घेतला, कारण ठरलं...२ एप्रिलपर्यंत...काँग्रेसचे खासदार माणिकम टागोर यांनी लोकसभाध्यक्षांसमोरील टेबलवर चढण्याचा प्रयत्न केला. या गोंधळामुळे तहकूब झालेले कामकाज पुन्हा सुरू होताच किरेन रिजिजू यांनी गोंधळी खासदारांना एप्रिलपर्यंत निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला व तो आवाजी २ मतदानाने मंजूर झाला. त्यानंतर काँग्रेससह अनेक विरोधी पक्षीय खासदारांनी राहुल व प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली.निलंबित खासदारांची नावेप्रशांत पडोळे (भंडारा गोंदिया)माणिकम टागोरहिबी एडनअमरिंदरसिंग राजा वारिंगगुरजितसिंग औजलाकिरणकुमार रेड्डीडीन कुरियाकोसेएस. वेंकटेशन (माकप)
माजी लष्करप्रमुखांच्या अप्रकाशित पुस्तकावर बोलण्यास राहुल गांधींचा नकार
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.