Achira News Logo
Achira News

मांद्रेचे पाणीटंचाईचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार पावले उचलत आहे

Lokmat
मांद्रेचे पाणीटंचाईचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार पावले उचलत आहे
Full News
Share:

लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे :मांद्रे मतदारसंघातील दीर्घकाळ प्रलंबित असलेलीपाणीसमस्याकायमची दूर क करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले जात आहे. तुये आयटीआय परिसरातील ३० एमएलडी क्षमतेचापाणीप्रकल्प मांद्रेवासीयांसाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या प्रकल्पाचे लवकरात लवकर लोकार्पण करून जनतेची तृष्णा भागवली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतयांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री डॉ. सावंत तुये हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असताना त्यांनी आमदार जीत आरोलकर यांच्यासोबत ३० एमएलडी पाणी प्रकल्पाच्या कामाची पाहणी करत धावता आढावा घेतला. यावेळी त्यांनी सांगितले की, पाण्याची समस्या पूर्णपणे सुटण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, या प्रकल्पावर युद्धपातळीवर काम सुरू आहे. लवकरच समस्या मार्गी लागणार असल्याचे ते म्हणाले. येथील हजारो सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही आमदार जीत आरोलकर यांनी व्यक्त केला. आरोग्य सुविधांत सुधारणा मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतयांचे शंभर टक्के सहकार्य मिळत असल्यामुळे मांद्रे मतदारसंघाचा झपाट्याने विकास शक्य होत आहे. तुये हॉस्पिटल गोमेकॉ हॉस्पिटलला लिंक झाल्याने आरोग्य सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे. तसेच येणाऱ्या काळात रवींद्र भवनाची पायाभरणी, एक्वेरियम प्रकल्प, क्रीडा मैदान, तसेच तुये येथील नियोजित इलेक्ट्रॉनिक सिटीला जोडणारा लिंक रस्ता पूर्ण केला जाणार आहे. किमान १२ तास होणार नियमित पाणीपुरवठा आमदार जीत आरोलकर म्हणाले, आपण आमदार झाल्यानंतर मांद्रे मतदारसंघातील पाण्याची समस्या टप्याटप्प्याने सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. तुये आयटीआय परिसरात हा महत्त्वाकांक्षी ३० एमएलडी पाणी प्रकल्प साकार होत आहे. मार्च महिन्यात हा प्रकल्प कार्यान्वित होईल, त्यानंतर मांद्रेवासीयांना किमान १२ तास नियमित पाणीपुरवठा मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

मांद्रेचे पाणीटंचाईचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार पावले उचलत आहे | Achira News