Maharashtra HSC Result 2026 Declared :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी परीक्षेचा निकाल आज, २ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून, यंदाही मुलींनी मुलांच्या तुलनेत निकालात मोठी आघाडी घेतली आहे.निकालाची सांख्यिकीय माहितीया परीक्षेसाठी राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम आणि आय.टी.आय. शाखांसाठी एकूण १४,४४,७१३ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,३३,०५८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले होते आणि १२,८६,८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षीच्या (फेब्रुवारी-मार्च २०२५) ९१.८८ टक्के निकालाच्या तुलनेत यंदाचा निकाल २.०९ टक्क्यांनी कमी लागला आहे.मुलींचे यश आणि शाखानिहाय निकालनिकालाच्या टक्केवारीत मुलींनी ९३.१५ टक्के मिळवून बाजी मारली आहे, तर मुलांचा निकाल ८६.८० टक्के लागला आहे.म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ६.३५ टक्क्यांनी जास्त आहे. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९६.४४ टक्के लागला असून वाणिज्य शाखेचा निकाल ८७.०३ टक्के, व्यवसाय अभ्यासक्रम ८२.७४ टक्के, आय.टी.आय. ८१.७८ टक्के आणि कला शाखेचा निकाल ७८.०२ टक्के इतका आहे.बारावीचा निकाल जाहीर, कोकणची बाजी, लातूर तळाला, राज्याचा निकाल ८९.७९ टक्केविभागीय निकालात कोकण अव्वलराज्यातील नऊ विभागीय मंडळांपैकी कोकण विभागाचा निकाल ९४.१४ टक्के लागून हा विभाग राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. पुणे विभाग ९१.२५ टक्क्यांसह दुसऱ्या, तर अमरावती विभाग ९०.९२ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे.लातूर विभागाचा निकाल ८४.१४ टक्के असून तो सर्वात कमी आहे.याशिवाय एकूण १५३ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.दिव्यांग आणि इतर विद्यार्थ्यांची कामगिरीया परीक्षेस ८,३६७ दिव्यांग विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी ७,५७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ९०.५८ आहे. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल ८०.२१ टक्के लागला आहे. तसेच ५०,३४६ पुनर्परिक्षार्थींपैकी १८,३४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ३६.४४ आहे.गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकन सुविधानिकालानंतर गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांना रविवार, ३ मे ते १७ मे २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.यासाठी प्रति विषय ५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी याच कालावधीत अर्ज करता येईल आणि त्यासाठी प्रति विषय ४०० रुपये शुल्क असेल. पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम छायाप्रत घेणे अनिवार्य असून त्यानंतर प्रति विषय ३०० रुपये शुल्कासह ऑनलाईन अर्ज करता येईल. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारण्यासाठी पुढील तीन परीक्षांची संधी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र एच. एस. सी. निकाल 2026 जाहीरः 1% पेक्षा कमी गुणांसह मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.