Achira News Logo
Achira News

रॅग्स-टू-रिच स्टोरीः दत्तू अशोक जाधव यांचा बालगृहापासून शैक्षणिक यशापर्यंतचा प्रवास

Maharashtra Times
रॅग्स-टू-रिच स्टोरीः दत्तू अशोक जाधव यांचा बालगृहापासून शैक्षणिक यशापर्यंतचा प्रवास
Full News
Share:

आशिष चौधरी, छत्रपती संभाजीनगर:आई-वडिलांचे हरवलेले छत्र, वयाच्या सहाव्या वर्षापासून बालगृहात निवास, निराधार, अनाथांप्रती समाजाचा दृष्टीकोन बदलण्यासाठी त्याने शिक्षणाची कास धरली अन् कठोर परिश्रमाच्या बळावर बारावीत दैदीप्यमान यश मिळविले. ही यशोगाधा आहे छत्रपती संभाजीनगरच्या दत्तू अशोक जाधवची. बेताची परिस्थिती असलेला दत्तू वसतिगृहात हाऊसकीपिंग, बागकामासह खाणावळीत काम करून स्वत:चा खर्च भागवतो. शिक्षणाची जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दत्तूने कलाशाखेत ९२.१७ टक्के गुण मिळविले. ‘आयएएस अधिकारी’ होण्याचे स्वप्न घेऊन तो मार्गक्रमण करत आहे.बालगृहात राहून दहावीचे शिक्षण पूर्णशहरातील देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेला दत्तू सध्या राजमाता जिजाऊ वसतिगृहात राहतो. लहानपणी भारतीय समाज सेवा केंद्रात संगोपण झाले. त्यानंतर त्याला बालगृहात पाठविण्यात आले. वयाच्या सहाव्यावर्षापासून तो बालगृहात राहत होता. याच दरम्यान त्याच्या वडिलांचेही निधन झाले. बालगृहात राहून त्याने भारतीय विद्यालयातून दहावीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणामुळेच परिस्थितीवर मात करून इतरांना न्याय देता येऊ शकतो हे त्याने ओळखले. इयत्ता सातवी-आठवीपासून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या दत्तुला शिक्षणाची जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. तेवढ्याच मेहनतीने त्याने दहावीचे शिक्षण पूर्ण केले.बारावीत नेत्रदीपक यशदहावीला त्याने ८९.८० टक्के गुण मिळविले. पुढे अकरावी, बारावीचे शिक्षणासाठी कोणती शाखा निवडायची याचा विचार त्याने सातवी, आठवीचा करून ठेवला होता. त्यानुसार त्याने कला शाखेत प्रवेश घेतला. दोन वर्ष प्रचंड अभ्यास, मेहनत आणि संकटांवर मात करून शिक्षण पूर्ण करण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने बारावीत नेत्रदीपक असे यश मिळवित इतर विद्यार्थ्यांसमोर आदर्श उभा केला. यंदा प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्येत घट झाली. त्यात कला शाखेतून नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणे म्हणजे प्रचंड अभ्यास लागतो. त्यात दत्तूने मिळविले हे यश राज्यातील विद्यार्थ्यांसमोर आदर्शवत असे ठरले आहे.मुलींनी मारली बाजी पण... बारावी निकालाची 'ही' ५ मोठी वैशिष्ट्ये; का खालावले निकालाचे प्रमाण?मदतीचे हातशिक्षणाची जिद्द असेल तर आलेली संकटेही गुडघे टेकतात. बालगृहात अठरा वर्षापर्यंतच राहता येते. तेथे असताना त्याला उपाध्यक्ष अवधूत जगताप यांनी मदत केली, शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. येथील कालावधी संपताना त्यांनी बालगृहाचे कार्यकारी अध्यक्ष आणि राजमाता जिजाऊ वसतिगृहाचे प्रमुख मानसिंग पवार यांच्या कनावर ही बाब टाकली आणि दत्तुला या वसतिगृहात राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. सध्या दत्तु राजमाता जिजाऊ वसतिगृहात राहतो. कमवा व शिका योजनेत दोन, तीन तास हाऊसकीपिंग, बागकाम तर सायंकाळी तीन तास खाणावळीत काम करतो आणि आपले शिक्षण पूर्ण करतो आहे. त्याला यासाठी महाविद्यालयाच्या शिक्षकांनीही खंबीर पाठबळ दिले.शिकवणी न करता यशदत्तुला बारावीत ६०० पैकी ५५३ गुण आहेत. विषयनिहाय पाहिले तर मानसशास्त्र विषयात ९७ गुण आहेत., समाजशास्त्र ९७, राज्यशास्त्रात ९२, मराठीत ९६, इतिहासात ९३ तर इंग्रजीत ७८ गुण आहेत. नियमित तासिकांना उपस्थिती, अभ्यासातील सातत्य, सरावावर भर दिला. खासगी शिकवणी नाही तर स्वत: नियमित अभ्यासावर हे यश मिळविल्याचे तो सांगतो. अकरावी, बारावीत ‘एनसीईआरटीई’च्या पुस्तकांचाही अभ्यास त्याने केला.बारावी निकालात मोठी खळबळ! राज्यातील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल रोखले; शिक्षकांवरही गुन्हे दाखलपरिस्थितीमुळे स्वत:ला सिद्ध करण्याशिवाय पर्याय नाही. अनाथ असल्याने आर्थिक, सामाजिक स्तरावरील अनेक अडचणी येतात. अनाथांप्रती समाजात असलेला दृष्टीकोन आपल्याला बदलायचा आहे. समजायला लागले तेंव्हाच अधिकारी होण्याचे स्वप्न मनात ठेवून मी कला शाखा निवडली.- दत्तू अशोक जाधव

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

रॅग्स-टू-रिच स्टोरीः दत्तू अशोक जाधव यांचा बालगृहापासून शैक्षणिक यशापर्यंतचा प्रवास | Achira News