यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून विरोधकांचा समाचार घेत विकासाचा नवा संकल्प मांडला. सभेच्या सुरुवातीला ढोल-ताशांच्या गजरात आणि भगव्या झेंड्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री शिंदे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना ते म्हणाले की, रत्नागिरी ही क्रांतीकारकांची आणि कष्टकऱ्यांची भूमी आहे. या मातीने नेहमीच सत्याला आणि विकासाला साथ दिली आहे. आज साळवी स्टॉप येथे झालेली ही गर्दी पाहता, येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचेच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही विकासाची मुख्य केंद्रे असून, तिथे सक्षम नेतृत्व असणे गरजेचे आहे. आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचला. ते म्हणाले की, आमचे सरकार हे फेसबुकवरून चालणारे नसून प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करणारे सरकार आहे. आम्ही सर्वसामान्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन निर्णय घेतो. कोकणातील काजू-आंबा उत्पादक शेतकरी असो वा मच्छीमार बांधव, प्रत्येकाच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे आहे. रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासोबतच ग्रामीण भागातील रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत सुविधांना आम्ही प्राधान्य दिले आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता कधीही पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
रत्नागिरीच्या तळागाळातील विकासावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भर
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.