Achira News Logo
Achira News

समुद्रकिनारे क्रीडा पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचे महाराष्ट्राचे उद्दिष्ट

Pudhari
समुद्रकिनारे क्रीडा पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचे महाराष्ट्राचे उद्दिष्ट
Full News
Share:

उद्घाटनप्रसंगी पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी सांगितले की, “खेळामुळे व्यक्तिमत्त्व घडते, आत्मविश्वास वाढतो आणि खेळाडूंनी खेळाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. दमनच्या धर्तीवर शिरगाव व चिंचणी येथील समुद्रकिनारे विकसित करून या भागाला क्रीडापर्यटनाचे केंद्र बनवले जाईल.” त्यांच्या या घोषणेला उपस्थितांकडून जोरदार दाद मिळाली. राष्ट्रीय टग ऑफ वॉर फेडरेशनचे अध्यक्ष हरीशंकर गुप्ता यांनी दोरीखेच हा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त खेळ असल्याचे स्पष्ट करताना सांगितले की, “या खेळातून नोकरीच्या संधी, स्कॉलरशिप आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे दरवाजे खुले होतात. महाराष्ट्रात ही स्पर्धा होत असल्याचा आम्हाला अभिमान आहे.”

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

समुद्रकिनारे क्रीडा पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचे महाराष्ट्राचे उद्दिष्ट | Achira News