स्टार प्रवाहवर सुरु असलेली लोकप्रिय मालिका ‘ मी सावित्रीबाई जोतीराव फुले ’ प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे. या मालिकेतील प्रत्येक टप्पा प्रेक्षकांना आवडत असून, आता मालिकेत सावित्री आणि जोतीराव विवाहबंधनात अडकतानाचा अत्यंत खास आणि ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार आहे. हा विवाहसोहळा केवळ मालिकेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राकरिता एक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे.View this post on InstagramA post shared by Star Pravah (@star_pravah)या अद्भूत विवाहसोहळ्याची मांडणी अत्यंत देखणी आणि काळाच्या पार्श्वभूमीला साजेशी करण्यात आली आहे.सावित्री आणि जोतीरावयांच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण भावपूर्ण पद्धतीने सादर करताना परंपरा, विधी आणि संस्कृतीचा सन्मान राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाणार आहे. खंडोबाला लगीनचिठ्ठी अर्पण करण्याच्या मंगल परंपरेपासून ते मुहूर्तमेढ रोवण्यापर्यंत प्रत्येक विधी मोठ्या श्रद्धेने साजरे केले जाणार आहे. चुडा भरण्याचा हळुवार सोहळा, हळदीचा मंगल समारंभ, दागिने आणि साडीमागचं सांस्कृतिक व भावनिक महत्त्व या सगळ्या पारंपरिक रितीरिवाजांचं सुंदर दर्शन प्रेक्षकांना या मालिकेत अनुभवता येणार आहे.'तू बोल अजून बोल ,अजून टीका कर...' राधा पाटीलच्या टोमण्यांवर Gautami Patil चं सडेतोड उत्तर, कुठून सुरू झालेला वाद?परंपरा, संस्कार आणि भावनांनी नटलेला हा विवाहसोहळा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचं दर्शन घडवणारा ठरणार आहे. हा विवाहसोहळा प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करून जाईल यात शंका नाही. पण तत्पूर्वी मालिकेत क्रांतीकारी तात्या टोपे यांची एण्ट्री झाली आहे.बॉलिवूडवर राज्य करायची ही मराठी अभिनेत्री, पण दिग्दर्शकाच्या प्रेमाच्या जाळ्यात फसली! पत्नीचा खाल्ला मार अन् करियरही पाण्यातगावात हेरगिरी करताना ते छोट्या जोतीला हेरतात. आणि त्याची गावातल्या लोकांप्रति दक्षता पाहून त्याला आपल्या पुढील कार्यासाठी नेमतात. नायगाव शिरवाळच्या पाटलांच्या मुलीचे लग्न आहे त्याच्या आदल्या रात्रीच आपण सरकारी खजिना पळवायचा असे ते ठरवतात. पण त्या पाटलाच्या पोरीचं जोतीसोबतच लग्न ठरलेलं असतं यापासून ते अनभिज्ञ असतात. शिवाय शिरवाळ मध्ये सरकार खजिन्याची रखवाली करण्याची जबाबदारी साविच्या वडिलांवर येऊन पडते. त्यामुळे सासरे विरुद्ध जावई अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा विवाहसोहळा निर्विघ्न पार पडणार का की काही अडचणी येणार हे येत्या एपिसोडमध्येच पाहायला मिळणार. दररोज सायंकाळी 7.30 वाजता ही मालिका स्टार प्रवाहवर पाहता येईल.
सावित्रीबाई जोतिराव फुले यांच्या लग्नाचा ऐतिहासिक प्रसंगः परंपरा आणि संस्कृतीला श्रद्धांजली
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.