Achira News Logo
Achira News
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 02:17 AM
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (एम. ए. एच. टी. ई. टी.) 2025 मधील कमी उत्तीर्ण दरः केवळ 11.28% शिक्षक पात्र ठरतात

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (एम. ए. एच. टी. ई. टी.) 2025 मधील कमी उत्तीर्ण दरः केवळ 11.28% शिक्षक पात्र ठरतात

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :महाराष्ट्रशिक्षकपात्रतापरीक्षा(महाटीईटी) २०२५चा अंतिम निकाल राज्यपरीक्षापरिषदेकडून जाहीर करण्यात आला आहे. या अंतिम निकालामध्ये फक्त ११.२८ टक्केशिक्षकउमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. पावणे पाच लाख शिक्षकांपैकी ३ लाख ९६ हजार शिक्षक नापास झाले आहेत. एकूण ४ लाख ७५ हजार ६६९ उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी ४ लाख ४६ हजार ७३० उमेदवार परीक्षेला उपस्थित राहिले, तर २८ हजार ९३९ उमेदवार अनुपस्थित होते. एकूण ५० हजार ३६९ उमेदवार उत्तीर्ण झाले असून ३ लाख ९६ हजार ३२५ उमेदवार अनुत्तीर्ण ठरले आहेत. अंतिम निकालाचा टक्का ११.२८ इतका आहे.
37 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 03:13 PM
पुणे महानगरपालिका निवडणूकः निवडून आलेल्या नगरसेवकांच्या शैक्षणिक पातळीचा खुलासा

पुणे महानगरपालिका निवडणूकः निवडून आलेल्या नगरसेवकांच्या शैक्षणिक पातळीचा खुलासा

पुणे:पुणेमहापालिकेच्या १६५ नगरसेवकांमध्ये ६१ नगरसेवकांनी पदवीपर्यंतचेशिक्षणघेतले आहे. तर दहावीपर्यंत शिकलेल्या नगरसेवकांची संख्या ४५ आहे. त्यामध्ये इयत्ता दुसरी, चौथी, आठवी, नववीपर्यंतशिक्षणघेतलेल्यांचा समावेश आहे. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या नगरसेवकांची संख्या ३३ आहेत. केवळ १४ नगरसेवकांचे शिक्षण ‘पदव्युत्तर पदवी’पर्यंत झाले आहे. पुणे महापालिकेची निवडणूक झाली. त्यात ४१ प्रभागांतून १६५ नगरसेवक निवडून आले. त्यात भाजपच्या ११९ , राष्ट्रवादीकाँग्रेस(अजित पवार ) २७, राष्ट्रवादीकाँग्रेस(शरद पवार) ३ , काँग्रेसचे १५ आणि उद्धवसेना पक्षाचा १ उमेदवार निवडून आलेला आहे. पुणे शहराचा कारभार हे नगरसेवक हाकणार आहेत. महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरताना इच्छुकांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे. या १६५ सदस्यांपैकी ३५ टक्के म्हणजे ६१ नगरसेवकांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. तर केवळ ८ टक्के सभासदांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. सर्वसाधारण २० टक्के म्हणजे ३३ सदस्यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. तर, २५ टक्के म्हणजे ४५ सदस्य दहावीपर्यंत शिकलेले आहेत. पदविका मिळविलेले सदस्य : ५पदव्युत्तर शिक्षण : १४बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले : ३३दहावीपर्यंत शिकलेले नगरसेवक : ४५पदवी घेतलेले सभासद : ६१शिक्षणाची माहिती उपलब्ध नसलेले नगरसेवक : ७
86 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 01:39 PM
शालर्थ घोटाळाः महाराष्ट्रात अधिकाऱ्यांना अटक, खासगी संस्थांवर गुन्हे दाखल

शालर्थ घोटाळाः महाराष्ट्रात अधिकाऱ्यांना अटक, खासगी संस्थांवर गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगर:राज्यभरात गाजत असलेल्या शालेय शिक्षण विभागातील शालार्थ घोटाळ्यात आतापर्यंत अनेक अधिकाऱ्यांना अटक झाली. मात्र, संबंधितशिक्षक, कर्मचाऱ्यांना नियुक्त्या देत बनावट कागदपत्रे सादर करणारे खासगी शिक्षण संस्थाचालक मोकाटच होते. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने कर्मचाऱ्यांच्या मूळ नियुक्तीत अनियमितता असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित व्यवस्थापनाच्या (संस्थाचालक) विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देशच शासन निर्णयाद्वारे दिले आहेत. शालेय शिक्षण विभागात शालार्थ घोटाळा गाजत आहे. या घोटाळ्यात शिक्षण विभागातील अनेक अधिकाऱ्यांना अटक झाली आहे. घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रात असल्यामुळे २०१२ पासून दिलेल्या वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडीची विशेष तपास पथकाच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. त्यात दोषी आढळल्यानंतर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई होत आहे. मात्र, ज्या संस्थाचालकांनी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याकडे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले होते. ६ फेब्रुवारी २०१२ च्या शासन निर्णयानुसार खासगी ‘व्यवस्थापन’ हेच कर्मचाऱ्यांचे नियुक्ती प्राधिकारी आहे. पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया राबविणे ही त्यांची जबाबदारी आहे. २३ ऑगस्ट २०१७ व १० जून २०२२ रोजी वैयक्तिक मान्यता व शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याची सुधारित कार्यपद्धती निर्गमित केलेली आहे. तरीही काही व्यवस्थापनाने कागदपत्रांमध्ये फेरफार, चुकीची माहिती किंवा माहिती दडपून प्रस्ताव सादर करतात. त्यामुळे या गुन्ह्यातील सहभागी सर्वांवरच कार्यवाही झाली पाहिजे. मात्र, केवळ कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई होते. मूळ नियुक्ती प्रक्रियेतील व्यवस्थापनावर ठोस कार्यवाही होत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा शासन निर्णय ३० जानेवारीला निर्गमित केला आहे. आता काय होणारशिक्षकव शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यताची तपासणी करताना ६ फेब्रुवारी २०१२ व १० जून २०२२ मधील शासन निर्णयातील तरतुदीनुसार कर्मचारी नियुक्ती संदर्भातील संस्थेचा ठराव, नियुक्ती आदेश, प्रत्यक्ष रुजू झाल्याचा अहवाल तपासावा, कर्मचाऱ्याच्या शाळेचा प्रत्यक्ष हजेरी पट आणि संस्थेचे कार्यालयाच्या ‘आवक-जावक’ नोंदवहीची तपासणी करावी. त्यात कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता, शालार्थ प्रणालीत अनियमितता आढळल्यास व्यवस्थापनातील व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता व इतर कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेशही ३० जानेवारी २०२६ च्या शासन निर्णयात दिले आहेत.
70 shares
😢
Loksatta logo
Loksatta
Feb 3, 2026, 01:19 PM
कल्याण-डोम्बिवली परीक्षाः विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मेट्रोचे काम थांबवले

कल्याण-डोम्बिवली परीक्षाः विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मेट्रोचे काम थांबवले

कल्याण– फेब्रुवारी, मार्च महिन्यांमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. कल्याण, डोंबिवली शहरे आणि शिळफाटा, कल्याण मुरबाड रस्ता भागातील शाळांमधील परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांची महिनाभर येजा असणार आहे. या कालावधीत शिळफाटा रस्त्यावरील मेट्रो मार्गाची, शाळा परिसरातील सीमेंट काँक्रीट रस्ते कामे सुरू असलेल्या ठिकाणची सर्व कामे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचण्याचा विचार करून काही दिवस थांबून ठेवावीत, अशी मागणी डोंबिवली रिक्षा चालक मालक संघटनेचे कार्याध्यक्ष दत्ता माळेकर, सरचिटणीस किशोर सोरखादे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महानगर आयुक्तांकडे केली आहे. मागील दोन वर्षापासूनकल्याण,डोंबिवलीत दिवस, रात्र वाहतूक कोंडी असते. शिळफाटा रस्त्यावर मेट्रो मार्गाची कामे सुरू आहेत. काटई गावाजवळ निळजे उड्डाण पुलाचे काम रेल्वेकडून सुरू आहे. हा भाग नेहमी वाहतूक कोंडीने गजबजलेला असतो. शिळफाटा रस्त्याच्या दुतर्फा मानपाडा, उंबार्ली, काटई, पलावा भागात अनेक शाळा आहेत. याठिकाणी डोंबिवली शहर परिसरातील विद्यार्थी दहावी, बारावीच्या परीक्षा देण्यासाठी येणार आहेत. शिळफाटा परिसरातील विद्यार्थी डोंबिवलीतील शाळांमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी जाणार आहेत. या विद्यार्थ्यांना कोंडी मुक्त रस्ते असतील तर ते योग्य वेळेत परीक्षा केंद्रावर पोहचणार आहेत. परंतु, नेहमीप्रमाणे शिळफाटा रस्त्यावरील ते कल्याणमधील शिवाजी चौक परिसरातील मेट्रो मार्गाची कामे सुरू ठेवली तर तेथील कामाच्या यंत्रणेमुळे कोंडीतून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत अवघड होणार आहे. हे रस्ते दहावी, बारावी परीक्षांच्या काळात मोकळे असावेत यासाठी कल्याण, डोंबिवलीतील शिळफाटा रस्ता, कल्याण शहरातील मेट्रो मार्गाची, कल्याण मुरबाड मार्गावरील काँँक्रीट रस्त्यांची कामे परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात यावीत, अशी मागणी रिक्षा संघटनेचे माळेकर यांनी केली आहे. परीक्षेच्या काळात अनेक पालक आपल्या मुलाला परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यासाठी कायमस्वरुपी रिक्षा भाड्याने निश्चित करून ठेवतात. काही खासगी वाहनाने प्रवास करतात. कल्याण, डोंबिवलीत प्रभावी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालक रिक्षांवर अवलंबून असतात. या कालावधीत रस्त्यांवर वाहतूक कोंडी असेल तर रिक्षा चालकांना परीक्षा केंद्रापर्यंत विद्यार्थ्यांना वेळेत पोचविणे शक्य होणार नाही. दहावी, बारावी हे विदयार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील महत्वाचे टप्पे आहेत. विद्यार्थी हिताचा विचार करून दहावी, बारावीच्या २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीतील परीक्षा काळात कल्याण, डोंबिवलीतील मेट्रो मार्गाची कामे पूर्णता बंंद ठेवावीत. यामुळे विद्यार्थ्यांना झटपट रिक्षा, खासगी वाहने परीक्षा केंद्रापर्यंत पोहचणे शक्य होणार आहे, असे पदाधिकाऱ्यांनी पत्रात म्हटले आहे. कल्याण, डोंबिवलीत एमएमआरडीएकडून सीमेंट काँक्रीटची कामे सुरू आहेत. या कामांचे सामान घेऊन मिक्सर, डम्पर, हायवा, पाण्याचे टँकर शहरात धावत असतात. त्यामुळे शहरात कोंडी होते. ही कामेही परीक्षा कालावधीत काही दिवस थांबवावित. काही शाळांच्या परिसरात काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. तेथे परीक्षा केंद्रावर जाताना कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घेण्याची मागणी रिक्षा संघटनेने एमएमआरडीए, वाहतूक उपायुक्त यांच्याकडे केली आहे.
29 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 11:25 AM
पुणे शिक्षण मंडळाकडून मृतांसाठी शोकसभेचे आयोजन

पुणे शिक्षण मंडळाकडून मृतांसाठी शोकसभेचे आयोजन

पुणे:महाराष्ट्रातीलपुराेगामी फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार पुढे नेत २० टक्केराजकारणआणि ८० टक्के समाजकारण करणारे लाेकनेते, आधारवड अर्थात उपमुख्यमंत्रीअजित पवारयांचे अकाली निधन झाले आणिमहाराष्ट्रहळहळला, अशी भावना मान्यवरांनी वाहिली. या वातावरनाने बालगंधर्व रंगमंचही गहिवरले हाेते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने बालगंधर्व रंगमंच येथे मंगळवारी (दि. ३) आयाेजित श्रद्धांजली सभेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, ‘लाेकमत’चे संपादक संजय आवटे, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, डॉ. गजानन एकबोटे, भाऊसाहेब जाधव, डॉ. मनोहर चासकर, राजेश पांडे, विवेक सावंत, प्रमोद रावत, बाबासाहेब शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी, नंदकुमार निकम, एमआयटीचे राहुल कराड, विजय कोलते, आमदार चेतन तुपे, अनिल गुंजाळ, माजी कुलगुरू डॉ. अरूण अडसूळ, केजे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक धनपाल कांबळे, माजी आमदार विलास लांडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत आदींनी श्रद्धांजली वाहिली. ॲड. संदीप कदम म्हणाले की, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाला २० वर्षांत प्रगतीपथावर नेण्यातअजित पवारयांचे मोठे योगदान आहे. कमी आयुष्यात त्यांनी समाजासाठी मोठे काम केले आहे. संपादक संजय आवटे म्हणाले की, कामाचा माणूस म्हणजे अजित पवार. त्यांनी कर्तृत्वाने शब्दाला किंमत मिळवली. म्हणून आज संपूर्ण देश हळहळ व्यक्त करीत आहे. शिक्षण प्रसारक मंडळाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन म्हणाले की, बदलत्या काळात शिक्षण संस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही अजित पवार यांच्याकडे आशेने पाहत होतो. माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर म्हणाले की, शालेय ते उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढीसाठी अजित पवार यांनी काम केले. शिष्यवृत्ती, ग्रंथालये सुरू केली. अनेक महाविद्यालयांचा उत्कर्ष अजित पवार यांच्यामुळे झाला. सतीश मगर म्हणाले की, माझा आणि अजित पवार यांचा १९७८पासून स्नेह. त्याचे पुढे नात्यात रूपांतर झाले. त्यांचा वक्तशीरपणा, व्यवस्थितपणा घेतला पाहीजे.
44 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 11:22 AM
कोल्हापूर महानगरपालिकेची शिष्यवृत्ती वाढवून शिक्षणाला चालना

कोल्हापूर महानगरपालिकेची शिष्यवृत्ती वाढवून शिक्षणाला चालना

कोल्हापूर: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शिक्षणविषयक विचारांचा वारसा जपणाऱ्याकोल्हापूरमहानगरपालिकेने विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एक ऐतिहासिक व क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. प्राथमिक शिक्षण समितीमार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘राजर्षी छत्रपती शाहूशिष्यवृत्ती’योजनेच्या रकमेत लक्षणीय वाढ करून हीशिष्यवृत्तीआता २४०० रुपयांवरून थेट ५,००० रुपये करण्यात आली आहे.शासनाच्या शिष्यवृत्तीच्या बरोबरीची स्वतंत्र शिष्यवृत्ती देणारी कोल्हापूर ही एकमेव महानगरपालिका ठरली आहे. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सक्षमपणे तयार करण्याच्या उद्देशाने महापालिका दोन सराव चाचण्या व एक अंतिम सराव परीक्षा घेते. यातील गुणवत्ता यादीत पहिल्या २५ क्रमांकावर येणाऱ्या विद्यार्थ्यांना सलग दोन वर्षांसाठी ही ‘शाहू शिष्यवृत्ती’ प्रदान केली जाते.महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या प्रेरणेतून, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, प्रशासन अधिकारी डी. सी. कुंभार तसेच सहायक कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबवले जात आहेत. तत्कालीन उपायुक्त साधना पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमात शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, चंद्रकांत कुंभार, परीक्षा विभाग प्रमुख संजय शिंदे यांच्यासह सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.‘इस्रो’दौऱ्याचाखर्चविशेष बाब म्हणजे, राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षांपासून ‘इस्रो’या जागतिक दर्जाच्या संस्थेचा शैक्षणिक अभ्यास दौरा विमान प्रवासाद्वारे घडवून आणला जात आहे आणि या संपूर्ण दौऱ्याचा खर्च कोल्हापूर महानगरपालिका स्वतः उचलत आहे.अनुकरणीय पॅटर्नफक्त पाचवीच नव्हे, तर इयत्ता पहिली व दुसरीसाठी ‘कोल्हापूर टॅलेंट सर्च’ तिसरी व सहावीकरिता प्रज्ञाशोध परीक्षा, तसेच चौथी व सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करून महापालिकेने शिक्षणाचा एक आदर्श व अनुकरणीय पॅटर्न उभा केला आहे. “विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देत या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे.” -के. मंजुलक्ष्मी, आयुक्त.“महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्तीइतकीच ५,००० रुपयांची रक्कम आता मनपाकडून विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.” -डी. सी. कुंभार, प्रशासन अधिकारी
41 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 10:49 AM
सी. टी. ई. टी. परीक्षेच्या योगायोगामुळे शिक्षकांची निवडणूक कर्तव्यातून हकालपट्टी

सी. टी. ई. टी. परीक्षेच्या योगायोगामुळे शिक्षकांची निवडणूक कर्तव्यातून हकालपट्टी

सांगली : राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्यामतदानाच्यादिवशीचशिक्षकांसाठीबंधनकारक असलेली सीटीईटीची परीक्षा असल्याने सांगली जिल्ह्यातील १ हजार ४८४शिक्षकांनासोमवारी निवडणूक कामातून वगळण्यात आले. राज्यभरातील परीक्षार्थी शिक्षकांचा आढावा घेत त्यांना वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्याची तातडीने दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने अशा शिक्षकांना निवडणूक कामातून मुक्त करण्याची सूचना दिली होती. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका दोन दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर निवडणूक कामात नियुक्त करण्यात आलेल्या राज्यभरातील शिक्षकांची कोंडी झाली आहे. सक्तीची असलेली सीटीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) ज्या दिवशीमतदानआहे त्याच दिवशी म्हणजे ७ फेब्रुवारीस आहे. ८ फेब्रुवारीलाही काही शिक्षकांची परीक्षा आहे. त्यामुळे शिक्षकांसमोर यक्षप्रश्न उभा राहिला होता.‘लाेकमत’ने हा प्रश्न मांडल्यानंतर आयोगाने दखल घेत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आढावा घेत अशा शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, शिक्षणाधिकारी आणि निवडणूक विभागाच्या अन्य अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी सीटीईटी परीक्षा देणारे एक हजार ४८४ शिक्षकांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक कामकाजातून वगळले आहे. यामुळे सीटीईटी परीक्षार्थी शिक्षकांची गैरसोय दूर होणार आहे.सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती संकलनराज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी सीटीईटी परीक्षेला बसलेल्या व निवडणूक कामासाठी नियुक्त शिक्षकांची माहिती संकलित केली आहे. येत्या दोन दिवसांत राज्यातील अन्य शिक्षकांनाही निवडणूक कामातून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. निवडणूक कामातून वगळलेले तालुकानिहाय शिक्षकतालुका / मतदान केंद्र संख्या / एकूण नियुक्त कर्मचारी, अधिकारी/ नियुक्त रद्द शिक्षक संख्याआटपाडी / १५२ / ८२७ / १५८जत / २९२ / १६२० / ३३५खानापूर / १३० / ७१९ / १४७कडेगाव / १४८ / ६८० / १३४तासगाव / २०१ / ९६६ / १०७क.महांकाळ / १३० / ६९० / ११८पलूस / १२९ / ६०० / ६१वाळवा / ३६० / १७७६ / १९२शिराळा / १७१ / ७६० / ९५मिरज / ३२६ / १५७१ / १३७एकूण २०३९ / १०२०९ / १४८४ शिक्षकांना निवडणूक कामातून वगळल्यामुळे कडेगाव तालुक्यात १०६, तासगाव २५, पलूस २८ आणि शिराळा तालुक्यात ९५ कर्मचारी कमी पडले आहेत. या ठिकाणी मिरज तालुक्यातील उपलब्ध शिक्षकांना निवडणूक ड्युटी लावली आहे. आटपाडी तालुक्यात जत तालुक्यातील शिक्षकांची नियुक्ती केली आहे. -अशोक काकडे, जिल्हाधिकारी सांगली
27 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Feb 3, 2026, 10:09 AM
अभिनयाच्या कारकिर्दीसाठी शिक्षण सोडण्याचा दीपिका पदुकोणचा निर्णय

अभिनयाच्या कारकिर्दीसाठी शिक्षण सोडण्याचा दीपिका पदुकोणचा निर्णय

Deepika Padukone Education : इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत जे पेशाने डॉक्टर, इंजिनीअर आहेत, पण त्या क्षेत्रात ते आता काम करत नसून आता पूर्णपणे अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत; तर काही कलाकारांनी अभिनय क्षेत्रात काम करता यावं यासाठी शिक्षण सोडलं आहे. यापैकीच एक नाव म्हणजे बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण. पण, तुम्हाला माहीत आहे का दीपिका पादुकोणचं शिक्षण किती झालं आहे? दीपिका पादुकोण सध्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. येत्या काळातही ती काही आगामी चित्रपटांतून झळकणार आहे. दीपिकाला बॉक्स ऑफिस क्वीनही म्हटलं जातं. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण, तुम्हाला माहीत आहे का तिने याच क्षेत्रात काम करण्यासाठी शिक्षण सोडलं होतं. दीपिका किती शिकली आहे, कोणत्या शाळेतून तिचं शिक्षण झालं आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात… ५ जानेवारी १९८६ ला डेन्मार्कमध्ये जन्मलेल्या दीपिकाने एबीपीच्या वृत्तानुसार सोफिया हायस्कूल, बंगळुरूमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. यानंतर तिने माउंट कार्मेल कॉलेज, बंगळुरूमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. पण, मॉडेलिंग आणि अभिनयात करिअर करण्यासाठी तिने शिक्षण अर्ध्यातच सोडलं. तिने मॉडेलिंगपासून तिच्या करिअरची सुरुवात केलेली. उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार २००४ मध्ये तिने नामांकित ब्रँडच्या जाहिरातींमध्ये काम केलं आणि किंगफिशरच्या कॅलेंडरमुळे तिला ओळख मिळालेली. त्यानंतर २००६ मध्ये कन्नड चित्रपट ‘ऐश्वर्य’मधून तिने चित्रपटसृष्टीत काम केलं. त्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. दीपिकाने इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय कलाकारांबरोबर काम केलं आहे. आज ती बॉलीवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. दरम्यान, दीपिका पादुकोण फार शिकलेली नसून तिने तिचं शिक्षण अभिनयासाठी अर्ध्यातच सोडलं असलं तरी अभिनेत्रीला तिच्या आवडीच्या क्षेत्रात भरपूर यश मिळालं आहे. तिने कलेच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकत इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. यासह ती एक उद्योजिकासुद्धा आहे.
96 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 04:38 AM
केंद्रीय अर्थसंकल्पाचा गोव्याला होणार फायदाः मुख्यमंत्री

केंद्रीय अर्थसंकल्पाचा गोव्याला होणार फायदाः मुख्यमंत्री

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :केंद्रीय अर्थसंकल्पातून गोव्यात पर्यटन, शेती व शिक्षणासह विविध लाभघटकांना होईल मुख्यमंत्रीप्रमोद सावंतयांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी मंत्री माविन गुदिन्हो, मंत्री सुभाष शिरोडकर, मुख्य सचिव व्ही. कांडावेलू, वित्त खात्याचे संयुक्त सचिव (बजेट) प्रणव भट उपस्थित होते. अर्थसंकल्पात पर्यटन सुविधा, मत्स्य प्रक्रिया व शीतगृहे, विविध उद्योगांसाठी वित्तपुरवठा व शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता वाढविण्यावर विशेष भर दिला आहे.' हा अर्थसंकल्प गोव्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा असून रोजगारनिर्मिती, उत्पन्नवाढ आणि राज्याच्या आर्थिक स्थैर्यास बळकटी देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री म्हणाले की, 'गोव्यातील खाजन शेती पुनरुज्जीवनासाठीही केंद्र सरकारने गोव्याच्या मागणीची सकारात्मक दखल घेतली आहे. हवामान सहिष्णू पायाभूत सुविधा उभारणी तसेच आपत्ती प्रतिबंधासाठी विशेष साहाय्य मिळावे यासाठी जलस्रोत खात्याने सादर केलेले प्रस्ताव केंद्र सरकारकडे आहेत. याशिवाय वनाग्नी प्रतिबंधासाठी वन खात्याचे आणि आपत्ती व्यवस्थापन व नुकसानभरपाईसाठी महसूल विभागाचे प्रस्तावही मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. केंद्र सरकारकडून या प्रस्तावांना मान्यता मिळाल्यास गोव्यातील शेती, पर्यावरण संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठे बळ मिळेल.' मुख्यमंत्री म्हणाले की, 'पायाभूत सुविधा विकास निधीतून गोव्याला निधी मिळणार आहे. नव्यानेच निर्मिती झालेल्या कुशावती या तिसऱ्या जिल्ह्यासाठी ५० वर्षाच्या व्याजमुक्तकर्जाच्यायोजनेद्वारे ५०० कोटी रुपये निधी उपलब्ध होईल. सरकारने तशी मागणी याआधीच केलेली आहे. कुशावती जिल्ह्यात मोठी विकासक्षमता आहे. हा निधी पायाभूत सुविधांसाठी प्रभावीपणे वापरता येईल. २४,४४४ कोटी रु. पंधराव्या वित्त आयोगाच्या २०२०-२१ ते २०२५-२६ या पाच वर्षांच्या कालावधीत कालावधीत करवाटपातून मिळाले.
79 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 04:22 AM
पुण्यातील शिक्षकांना सी. टी. ई. टी. साठी निवडणूक कर्तव्यातून सूट

पुण्यातील शिक्षकांना सी. टी. ई. टी. साठी निवडणूक कर्तव्यातून सूट

पुणे:केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेस बसणाऱ्या शिक्षकांना अखेर निवडणुकीच्या कामकाजातून वगळण्यात आले आहे. जिल्ह्यात असे सुमारे साडेतीन हजार शिक्षक असून या कर्मचाऱ्यांच्या जागेवर नगरपरिषदेच्या निवडणुकीत तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना या कामासाठी आता नेमण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने या शिक्षकांना निवडणूक कामाची मुभा दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने अतिरिक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे या परीक्षार्थी शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बहुतांश सर्वच विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात शिक्षकांचादेखील समावेश होता. मात्र, सध्या शिक्षक म्हणून कार्यरत असलेले व बढतीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांना केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. ही परीक्षा ऐन पूर्वीच्या वेळापत्रकानुसार मतमोजणीच्या दिवशी तर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीला दोन दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर मतमोजणीच्या दिवशी होणार आहे. त्यामुळे या शिक्षकांना निवडणुकीचे कामकाज द्यायचे की परीक्षा देण्यास मुभा द्यायची, असा संभ्रम जिल्हा प्रशासनापुढे निर्माण झाला होता. या संदर्भात सर्व बारा जिल्ह्यांमधून अहवाल मागविण्यात आला. त्यानुसार आता राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या सर्व परीक्षार्थी शिक्षकांना निवडणूक कामकाजातून वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी नगरपरिषदेच्या निवडणुकीत कामकाज पाहिलेल्या अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात नेमण्यात आलेल्या सुमारे १९ हजार कर्मचाऱ्यांपैकी एकूण शिक्षकांची संख्या १६ हजार ४०३ इतकी आहे. त्यातील ३ हजार ४७४ शिक्षक या परीक्षेत बसले आहेत. या जागांवर अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांना कामकाजाची नियुक्ती देण्यात आली आहे. परीक्षेस बसलेले तालुकानिहाय शिक्षक जुन्नर २५४, आंबेगाव ३४०, शिरूर ३६३, खेड ४०५, मावळ २४०, मुळशी १६९, हवेली ४६३, दौंड २१०, पुरंदर १०३, राजगड १०४, भोर १५५, बारामती ३३०, इंदापूर ३३८ एकूण ३४७४.
70 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 04:01 AM
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी पेडणे येथील शैक्षणिक संस्थांना भेट दिली

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी पेडणे येथील शैक्षणिक संस्थांना भेट दिली

लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणेतुये येथील आत्मविश्वास विद्यालयाला दिलेल्या भेटीत मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतयांनी विशेष मुलांशी संवाद साधत त्यांच्या अभ्यासपद्धती, दैनंदिन उपक्रम व प्रगती यांची माहिती घेतली. शिक्षकांकडून आलेल्या सूचना व समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री सावंत यांनी दिली. तुये हॉस्पिटलच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतयांनी येथील विशेष मुलांचे 'आत्मविश्वास विद्यालय' तसेच पेडणे येथील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाला भेट देत शैक्षणिक व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी आमदार जीत आरोलकर हेही उपस्थित होते. मुख्यमंत्री व आमदार जीत आरोलकर यांनी पेडणेतील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाला भेट दिली. येथे सुरू असलेल्या दुरुस्ती कामांचा आढावा घेत वाचनालयाची स्थिती, शाळेतील सुविधा तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत मुख्याध्यापकांकडून माहिती घेतली. शैक्षणिक संस्थांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन आवश्यक ते सहकार्य करेल, असे आश्वासन दिले. आवश्यक सुविधांवर भर काही विशेष मुले सर्वसाधारण मुलांप्रमाणे प्रगती करत असून, त्यांना पुढील शिक्षणासाठी मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये समाविष्ट करण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांना सूचना केल्या. विशेष मुलांच्या आरोग्याची काळजी, सुरक्षितता तसेच आवश्यक सुविधा पुरवण्यावर सरकारचा भर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. नव्या इमारतीचा प्रस्ताव यावेळी शिक्षिका गावडे व शिक्षक सीताराम गावडे यांनी मुख्यमंत्री व आमदारांचे स्वागत केले. संस्थापक सीताराम गावडे यांनी माहिती देताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत व आमदार जीत आरोलकर यांच्या सहकार्यामुळे विद्यालयासाठी साडेतीन हजार चौरस मीटरहून अधिक जागा उपलब्ध झाल्याचे सांगितले. या जागेवर नव्या इमारतीचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
76 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 03:11 PM
गैरवर्तनाची चिंता असूनही नागपूरची वादग्रस्त परीक्षा केंद्रे परीक्षा घेणार

गैरवर्तनाची चिंता असूनही नागपूरची वादग्रस्त परीक्षा केंद्रे परीक्षा घेणार

निशांत वानखेडेनागपूर:दहावी-बारावीच्या परीक्षेमध्ये गैरप्रकाराबाबत वादग्रस्त ठरलेल्या, तसेच संवेदनशील असलेल्या जिल्ह्यातील २९ केंद्रांवर यंदाही परीक्षा हाेणार आहेत. व्यवस्थेची स्थिती लक्षात घेता त्यांची मान्यता रद्द करण्याऐवजी त्या केंद्रांवर कडक नियंत्रण ठेवून परीक्षा घेतली जात आहे. राज्यशिक्षणमंडळाद्वारे १० फेब्रुवारीपासून बारावीची आणि २० फेब्रुवारीपासून दहावीची परीक्षा घेतली जात असून परीक्षांची तयारी जाेरात सुरू आहे. जिल्ह्यात यंदा बारावीच्या १७२ केंद्रांवर आणि दहावीच्या २२२ केंद्रांवर परीक्षा हाेणार आहे. यासाठी विभागीयशिक्षणमंडळ व शिक्षण विभागाकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे. नुकतीच २९ जानेवारीला जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत जिल्हा दक्षता समितीची बैठक घेण्यात आली, ज्यामध्ये शिक्षण विभागासह पाेलीस विभाग व महसूल विभागाला व्यवस्थेबाबत निर्देश देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान परीक्षेदरम्यान काॅपीसारखे गैरप्रकार राेखण्यासाठी शिक्षण मंडळाकडून कठाेर पाऊले उचलली जात आहेत. याअंतर्गत नेहमी गैरप्रकारासाठी कुप्रसिद्ध असलेल्या संवेदनशील केंद्रांची तपासणी करून त्यांचा अहवाल पाठविण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले हाेते. त्यानुसार बाेर्डाकडून जिल्ह्यातील अशा २९ केंद्रांची माहिती देण्यात आली आहे. या केंद्रांवर गेल्यावर्षी गैरप्रकार आढळून आले हाेते. यात शहरातील ३ आणि ग्रामीण भागातील २६ संवेदनशील केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांची मान्यता रद्द करण्यापर्यंतची कारवाई करण्याचे निर्देश शिक्षण मंडळाने दिले हाेते. मात्र मान्यता रद्द न करता त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. या कारणाने पुन्हा संधी या केंद्रांवर माेठ्या संख्येने विद्यार्थी आहेत. शिवाय नियमानुसार ५ किमीच्या परीघात आसपास याेग्य केंद्र उपलब्ध नसल्याने त्याच केंद्रांना पुन्हा परीक्षेची संधी देण्यात आली आहे. मात्र या केंद्रांची माहिती महसूल व पाेलीस विभागाला देण्यात आली असून कडक नियंत्रण ठेवून या केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. विभागाचे ६ भरारी पथक, ड्राेननेही लक्ष दरम्यान परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार राेखण्यासाठी शिक्षण विभागाकडून कडक व्यवस्था करण्यात येत आहे. केवळ विभागाचीच ६ भरारी पथक तैनात केलेली आहे. यात शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांची पथके असतील.
55 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 2, 2026, 12:26 PM
मेट्रो प्रकल्पाला विलंब, कल्याण-डोम्बिवलीमध्ये वाहतूक कोंडी; परीक्षा लांबणीवर

मेट्रो प्रकल्पाला विलंब, कल्याण-डोम्बिवलीमध्ये वाहतूक कोंडी; परीक्षा लांबणीवर

कल्याण-डोंबिवलीमधील मेट्रो प्रकल्पाची कामे काटई नाका, पलावा, मानपाडा, सोनारपाडा, दावडी, रिजन्सी अनंतम् गेट, टाटा पॉवर, सूचक नाका, पत्री पूल, बैल बाजार, कल्याण स्टेशन परिसर या भागात सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. २० फेब्रुवारी ते १८ मार्चपर्यंत दहावी, तर १० फेब्रुवारी ते ११ मार्च रोजी बारावीच्या परीक्षा होणार आहेत. या कालावधीमध्ये मेट्रोचे काम बंद ठेवावे, जेणेकरून विद्यार्थी वेळेत परीक्षाकेंद्रांपर्यंत पोहोचतील. विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या रिक्षाचालक इतर वाहनधारकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल. असेही मेट्रो सारखे प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाहीत.
78 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 2, 2026, 10:59 AM
सार्वजनिक शाळेतील घटनेप्रकरणी राजस्थानच्या व्यक्तीला अटक

सार्वजनिक शाळेतील घटनेप्रकरणी राजस्थानच्या व्यक्तीला अटक

अमित कमलसिंग शर्मा (वय २५ रा. ता. सिधमुख, राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुपरवायझरी हेडने फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सुपरवायझरी हेड असून, १ फेबु्रवारीला औंधमधील डी.ए.व्ही पब्लिक स्कुलमध्ये काम पाहत होते.
2 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 2, 2026, 10:13 AM
भारताने उद्योग-अकादमी एकत्रीकरणासाठी पाच विद्यापीठ वसाहतींची घोषणा केली

भारताने उद्योग-अकादमी एकत्रीकरणासाठी पाच विद्यापीठ वसाहतींची घोषणा केली

पाच ‘युनिव्हर्सिटी टाउनशिप’: शिक्षण आणि उद्योग यांचा संगम या अर्थसंकल्पातील महत्त्वाचा निर्णय म्हणजे पाच युनिव्हर्सिटी टाउनशिप उभारण्याची घोषणा. औद्योगिक आणि लॉजिस्टिक कॉरिडॉरजवळ स्थापन होणाऱ्या या शैक्षणिक संकुलांमध्ये: * अनेक विद्यापीठे * संशोधन संस्था * कौशल्य विकास केंद्रे * विद्यार्थी वसतिगृहे * निवासी संकुले असतील. यामुळे उद्योग–शिक्षण–संशोधन यांचा थेट संबंध प्रस्थापित होऊन, रोजगाराभिमुख शिक्षणाला चालना मिळणार आहे.
2 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Feb 2, 2026, 09:55 AM
राज्यव्यापी आदेशः सर्व प्रकारच्या शाळांमध्ये शैक्षणिक सुट्ट्या एकसमानपणे लागू होतात

राज्यव्यापी आदेशः सर्व प्रकारच्या शाळांमध्ये शैक्षणिक सुट्ट्या एकसमानपणे लागू होतात

नागपूर :राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चालू शैक्षणिक वर्षासाठी मंजूर करण्यात आलेल्या शैक्षणिक सुट्ट्या सर्व व्यवस्थापन, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तसेच सर्व प्रकारच्या अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, महापालिका, अल्पसंख्यांक शाळांना लागू असतात. शासनाचे तसे निर्दश असतानाही अनेक सीबीएसई शाळा सुट्ट्या देत नसल्याचे आढळून येते. त्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सीबीएसई स्कूल स्टाफ वेल्फेअर असोसिएशनने (सिस्वा) नुकतेच शासनाला निवेदन दिले असून नुकत्याच झालेल्या बैठकीत सीबीएसई शाळांसाठी राज्याच्या शैक्षणिक वर्षाच्या सुट्ट्या अनिवार्य करण्यात आल्या आहेत. सीबीएसई शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्यायिक अधिकारासाठी लढणाऱ्या सीबीएसई स्कूल स्टाफ वेल्फेअर असोसिएशनने (सिस्वा) शिक्षणाधिकाऱ्यांतर्फे निर्देशित करण्यात येणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या सर्वच प्रकारच्या सुट्ट्या सीबीएसई शाळा संचालक लागू करत नसल्याचे निवेदन दिले होते. हे निवेदन पंतप्रधाननरेंद्र मोदी,केंद्रीय शिक्षण मंडळ आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनाही पाठवण्यात आले होते. याची दखल घेत ‘सिस्वा’च्या अध्यक्षा दिपाली डबली यांची शिक्षणाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर सर्व शाळांना शासनाच्या निर्देशानुसार सुट्ट्या देण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व सीबीएसई शाळेचे २०२६-२७ वर्षाचे त्या-त्या शाळेचे शैक्षणिक नियोजन शिक्षणाधिकाऱ्यांतर्फे ठरवले जाते. राज्याच्या प्रत्येक भागातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून उन्हाळा, दिवाळी आणि नाताळ्याच्या सुट्ट्यांचे नियोजन केले जाते. या वर्षी येणाऱ्या दिवाळी व नाताळाच्या प्रत्येकी १० दिवस सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत. या सुट्ट्यांमध्ये एकसमानता राहावी अशी मागणी सिस्वाच्या वतीने करण्यात आली होती. या सुट्ट्यांव्यतिरिक्त वर्षभरात जिल्हाधिकारी यांच्यातर्फे आणि अन्य सणांसाठी देण्यात येणाऱ्या सुट्ट्या देण्यास सीबीएसई शाळा संचालकांकडून नकार दिला जातो. अन्य सर्व शाळांना सुट्ट्या असतानाही सीबीएसई शाळा या सुट्ट्या देण्यास अनेकदा टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याविरोधात सिस्वाने दिलेल्या लढ्याला यश आले असून जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चालू शैक्षणिक वर्षासाठी मंजूर करण्यात आलेल्या सुट्ट्या सर्व व्यवस्थापन, सर्व मंडळ (सीबीएसई) यांना लागू राहणार असे निर्देश देण्यात आले आहेत.
58 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 07:50 AM
भाजपच्या रूपराणी संग्राम निकम यांची कोल्हापूरच्या महापौरपदी नियुक्ती

भाजपच्या रूपराणी संग्राम निकम यांची कोल्हापूरच्या महापौरपदी नियुक्ती

कोल्हापूर:कोल्हापूरच्यामहापौरपदी भाजपच्या रूपाराणी संग्राम निकम यांच्या नावाची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्रीचंद्रकांत पाटीलयांनी पत्रकार परिषदेत केली. आजच दुपारी निकम या महापौरपदासाठी अर्ज भरतील. पाटील यांनी भाजप कार्यालयात खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रा. जयंत पाटील, राहूल चिकोडे यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेतली आणि त्यांच्या चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत पाटील यांनी ही घोषणा केली. पाटील म्हणाले, प्रदेशकडे आम्ही सहा नावे पाठवली होती. त्यातील रूपाराणी निकम या नावावर प्रदेशने शिक्कामोर्तब केले आहे. त्यानुसार त्या अर्ज भरतील. उपमहापौरपद हे शिंदेसेनेला देण्यात येणार आहे. परंतू त्यांच्यात आणि जनसुराज्यमध्ये काही चर्चा सुरू असेल तर ते त्यांचे नेते सांगतील. मंत्री हसन मुश्रीफ हे महापौरपदाची खांडोळी होवू नये असे म्हणत असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही हीच इच्छा आहे.उपमहापौरपदी अक्षय जरग उपमहापौरपदी जनसुराज्यचे एकमेव नगरसेवक अक्षय जरग यांची निवड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जनसुराज्यचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी याबाबत रविवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
62 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 2, 2026, 06:12 AM
छत्रपती संभाजीनगरमध्ये आई-मुलगा जोडीचा कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश

छत्रपती संभाजीनगरमध्ये आई-मुलगा जोडीचा कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: शिक्षण 7वी पास, काम भिशी चालवणे आणि घोटाळा 3 कोटींचा हा कारनामा आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील एक महिला व तिच्या मुलाचा. पण स्कॅम मात्र कोटींचा केला. दोन्ही मायलेकांनी शहरातील 16 हून अधिक सधन नागरिकांना तब्बल 2 कोटी 99 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, या हायप्रोफाईल फसवणुकीची सध्या शहरात चांगलीच चर्चा आहे.लोकांचा विश्वास संपादन केलानंदाबाई रमेश अधुडे (वय 45) आणि मुलगा सौरभ रमेश अधुडे(वय 22, दोघे रा. व्यंकटेश पार्क, बीड बायपास) असं आरोपींचं नाव आहे. तर जयश्री गजानन गिरी (रा. मुकुंदवाडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. याप्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, मुळची जालना जिल्ह्यातील असलेली नंदाबाई आधुडे या महिलेनं 2014 पासून शहरात भिशी चालवण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला छोट्या रकमा वेळेवर परत करून तिने लोकांचा विश्वास संपादन केला. मात्र, हा विश्वास म्हणजे एका मोठ्या आर्थिक सापळ्याची तयारी होती. सातवी पास असूनही तिने ज्या पद्धतीने कोट्यावधींचे व्यवहार हाताळले, ते पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत.Pune Crime : नवऱ्याचा सतत त्रास, दोन लेकरं अन् सायकल घेऊन निघाली; पुण्यात विवाहितेनं दोन चिमुकल्यांसह आयुष्य संपवलंकष्टाचा पैसा बंगल्यात आणि मंदिरात...गुंतवणूकदारांच्या घामाच्या पैशातून या महिलेने स्वतःचे आयुष्य ऐशो-आरामात व्यतीत केले. लोकांच्या पैशातून नंदाबाईने शहरात 70 लाखांचा भव्य बंगला बांधला. तसेच शहरात 3 ते 4 विविधठिकाणी तिने मालमत्ता खरेदी केल्याचं उघड झालं आहे. स्वतःच्या मुळ गावी शेती खरेदी करून तिथे मंदिरही बांधलं आहे.Ajit Pawar: दादा असे जाऊच शकत नाही, ज्यांनी हे पाप केलंय, त्यांच्या घरात...; धक्का बसलेल्या राष्ट्रवादीच्या आमदाराला भावना अनावर!पैसे मागताच उलट पोलिसांची भीती...जेव्हा जयश्री गिरी, सपना मरकड 50 लाख आणि मीरा फलके 50 लाख यांच्यासारख्या गुंतवणूकदारांनी मुदत संपल्यावर आपले पैसे मागितले, तेव्हा नंदाबाई आणि तिचा मुलगा सौरभ यांनी त्यांना दाद दिली नाही. उलट, पैसे मागणाऱ्यांनाच पोलिसांत खोट्या तक्रारी करण्याची धमकी देऊन या माय-लेकानं दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अखेर पीडितांनी मुकुंदवाडी पोलिसांत धाव घेतली आणि या3 कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाशझाला. पोलीस आता या माय-लेकाच्या मालमत्तेचा आणि इतर गुंतवणुकीचा सखोल तपास करत आहेत.
87 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 2, 2026, 05:34 AM
निधीविना शाळांवर शिक्षण विभागाचा आर्थिक बोजा

निधीविना शाळांवर शिक्षण विभागाचा आर्थिक बोजा

एकीकडे शाळांना गेल्या 12 वर्षांत कोणताही निधी न देता शिक्षण विभाग एवढा आर्थिक भार कसा टाकू शकते, असा प्रश्न उपस्थित करीत शिक्षण मंडळ सीसीटीव्ही सक्ती करत असेल, तर त्यांनी आमच्या शाळा केंद्र म्हणून घेऊ नये, अशी भूमिका या संस्थाचालकांच्या संघटनांनी घेतली होती. त्यावर तोडगा काढत शिक्षण मंडळाने नवीन सूचना जाहीर केल्या आहेत.
13 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 2, 2026, 03:29 AM
भारताचा अर्थसंकल्प 2023: ए. व्ही. जी. सी. उद्योगासाठी एक संमिश्र पैलू, शैक्षणिक उपक्रमांसह एक उज्ज्वल ठसा

भारताचा अर्थसंकल्प 2023: ए. व्ही. जी. सी. उद्योगासाठी एक संमिश्र पैलू, शैक्षणिक उपक्रमांसह एक उज्ज्वल ठसा

एव्हीजीसी म्हणजे आजच्या तरुणांच्या स्वप्नांचा, कल्पनाशक्तीचा आणि रोजगाराचा उद्योग आहे. या अर्थसंकल्पात या क्षेत्राचा उल्लेख झाला, हे स्वागतार्ह आहे; पण प्रत्यक्ष उद्योगासाठी थेट आर्थिक पाठबळ नसल्याने अनेक कलाकार, तरुणांमध्ये निराशा आहे. तरीही शाळा आणि महाविद्यालयांमधून एव्हीजीसीचे प्रशिक्षण सुरू करण्याचा निर्णय भविष्यातील पिढी घडवणारा ठरेल, अशी आशा आहे. महाराष्ट्र हे एव्हीजीसी उद्योगाचे हृदय आहे. इथूनच देशाला जागतिक दर्जाचे कंटेंट निर्माते मिळतात. त्यामुळे या बजेटचा खरा लाभ महाराष्ट्रातील तरुण, कलाकार आणि क्रिएटिव्ह उद्योजकांपर्यंत पोहोचला पाहिजे. संतोष रासकर, संस्थापक संचालक, सृजन कॉलेज ऑफ डिझाईन पुणे अर्थसंकल्पात जाहीर केलेले शिक्षण उपक्रम - विद्यापीठ टाउनशिपपासून ते मुलींच्या वसतिगृहांपर्यंत आणि कौशल्य प्रयोगशाळांपर्यंत - योग्य दिशेने उचललेले स्वागतार्ह आणि अत्यंत आवश्यक पाऊल आहे. तथापि, वार्षिक पुर्नर्कौशल्य कार्यक्रम, अभ्यासक्रमाची प्रासंगिकता उदा. वास्तविक प्रकल्पांद्वारे मिळवलेले क्रेडिट, 8 वर्षांपर्यंत मूलभूत वाचन आणि संख्या कौशल्ये, शिक्षक प्रशिक्षणातील तफावत एकाच वेळी भरून काढल्याशिवाय ही उद्दिष्टे पूर्णपणे साध्य होऊ शकत नाहीत. हर्षदा देशमुख-जाधव, एमडी, ट्रिनिटी इन्स्टिट्यूट तथा सदस्य, रयत शिक्षण संस्था अर्थसंकल्प भारताच्या विकासाचा रोडमॅपच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडलेला अर्थसंकल्प भारताच्या विकासाचा जणू रोडमॅपच आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतला विकसित भारत साकार करण्यासाठी या अर्थसंकल्पात काही महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत. त्यादृष्टीने नियोजनबद्ध शहरीकरणावर भर देण्यात येईल. उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचे काम हा अर्थसंकल्प करेल. तसेच गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीसाठी अनेक ठोस उपाय या अर्थसंकल्पातून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मांडले आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. एकूणच, देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने पुढे जाईल, हे सुनिश्चित करणारा हा अर्थसंकल्प आहे, असेच म्हणता येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री महिलांसाठी विविध योजना असलेला अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा आणि महिलांसाठी विविध योजनांवर भर दिलेला आहे. या अर्थसंकल्पाचे मी स्वागत करते, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. महिलांसाठी लखपती दीदी योजनेच्या यशानंतर महिला बचत गटांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मोठी योजना जाहीर केली आहे. महिला नेतृत्वाखाली उद्योग उभे राहावेत, यासाठी स्वतंत्र व्यवस्था तयार केली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढेल. तसेच प्रत्येक जिल्ह्यातसाठी हॉस्टेल उभारण्याची घोषणा केली आहे. आरोग्यसेवा अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक जिल्हा रुग्णालयात कॅज्युअल्टी आणि ट्रॉमा सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. याचा गरीब भागातील नागरिकांना मोठा फायदा होईल. हा अर्थसंकल्प विकासाला गती देणारा, रोजगार निर्माण करणारा आणि देशाला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने नेणारा आहे, असेही मिसाळ यांनी म्हटले आहे. माधुरी मिसाळ, नगरविकास राज्यमंत्री फिस्कल डेफिसिएट कमी करणारा अर्थसंकल्प भारतातील उत्पादन वाढवून इन्फास्ट्रक्चरमध्ये सुधारणा करणारा व त्याद्वारे रोजगारनिर्मिती वाढवणारा, युवकांची क्षमता वाढवून त्यांच्या अपेक्षांची पूर्ती करणारा, सर्वांना सोबत घेऊन जाणारा, शहरे व गावे यांचा विकास करणारा, शेती, मत्स्योत्पादन, दुग्धव्यवसाय व आनुषंगिक उत्पादने यांना प्रोत्साहन देणारा, महिलांचा विकास व सुरक्षितता देणारा, हा अर्थसंकल्प आहे. संरक्षण खात्याशी संबंधित सामग््राीची निर्मिती, नद्यांमधील वाहतूक, रेअर अर्थ मटेरिअल कॉरिडॉर, सेमीकंडक्टर्स, सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर्स, बायोफार्मा, डाटा सेंटर हब अशी काही या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्‌‍ये आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार मेधा कुलकर्णी यांनी दिली. मेधा कुलकर्णी, खासदार थेट दिलासा देणाऱ्या योजना, सवलतींचा अभाव अर्थसंकल्पात सरकारकडून फारसे ठोस बदल दिसून येत नाहीत. सोन्या-चांदी बद्दल कोणत्याही धोरणांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आलेली नाही. ‌‘मेड इन इंडिया‌’ प्रकल्पावर विशेष भर देण्यात आला आहे. मात्र, महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी थेट दिलासा देणाऱ्या योजना किंवा सवलतींचा अभाव जाणवतो. करसवलत, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना अपेक्षित होत्या, पण त्या दिसून आल्या नाहीत. मयूर देवकर, संचालक, देवकर ज्वेलर्स
44 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 2, 2026, 01:00 AM
नवीन राष्ट्रीय रचना संस्थेसह भारताने रचना शिक्षणाला प्राधान्य दिले

नवीन राष्ट्रीय रचना संस्थेसह भारताने रचना शिक्षणाला प्राधान्य दिले

आणखी एक मुद्दा म्हणजे केंद्र सरकारने यंदा शिक्षणातील डिझाईनवर विशेष भर दिला आहे. यासंदर्भातील एक अद्ययावत संस्था मुंबईमध्ये उभी केली जाणार आहे. तसेच पूर्व भारतात नवीन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन स्थापन करण्याची घोषणा केली आहे. यामुळे डिझाईन शिक्षणाचे विकेंद्रीकरण होईल. सेमीकंडक्टर, एआय, मिशन या क्षेत्रांमध्ये संशोधन आणि विकासाबरोबरच आता डिझायनिंगचा विचारही प्राधान्याने पुढे आला आहे, ही बाब देशातील सर्जनशील तरुणांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. ऑरेंज इकॉनॉमीच्या दृष्टीने हा निर्णय दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे. तसेच या माध्यमातून शिक्षणाला व्यावसायिक रुप देण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला आहे.
39 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 1, 2026, 10:27 AM
शिक्षणाद्वारे स्थानिक समुदायांचे सक्षमीकरणः उच्च महाविद्यालये आणि मूलभूत कौशल्य अभ्यासक्रमांसाठी आवाहन

शिक्षणाद्वारे स्थानिक समुदायांचे सक्षमीकरणः उच्च महाविद्यालये आणि मूलभूत कौशल्य अभ्यासक्रमांसाठी आवाहन

तंत्रज्ञानाचे युग लक्षात घेता तालुक्यात एखादे उच्च महाविद्यालय उभारणे गरजचे बनले आहे त्याच प्रमाणे किमान कौशल्य अभ्यास क्रम राबविणे गरजेचे बनले.मात्र या दोन्ही कडे दुर्लक्ष होत विकास कामे सभागृह ,वाडी वरचा रस्ता यामध्ये अडकलेलं दिसुन येत आहे विद्यार्थी च्या भविष्यचा व देशाच्या भविष्यातील घडामोडी बघता येणाऱ्या काळात विकास कामात आरोग्य सेवा सह शिक्षण ला महत्व देणे गरजेचे बनले आहे.
71 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 1, 2026, 10:23 AM
सी. टी. ई. टी. परीक्षेच्या वेळापत्रकात वादः जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीदरम्यान शिक्षकांची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

सी. टी. ई. टी. परीक्षेच्या वेळापत्रकात वादः जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीदरम्यान शिक्षकांची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

दरम्यान, सीटीईटी परीक्षा जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रशिक्षणाच्या दिवशी येत असल्याने सीटीईटी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी केली जात आहे. तर, सीटीईटीपूर्वी टीईटीचा निकाल जाहीर करावा, अशी अपेक्षा उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यानुसार परीक्षा परिषदेने टीईटीच्या अंतिम निकालाची तयारी पूर्ण केली आहे. प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न चुकल्यामुळे संबंधित प्रश्नांचा गुण वजा करून उमेदवारांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे निकाल जाहीर करण्याच्या गुणोत्तरात बदल होणार आहे.
63 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 1, 2026, 10:10 AM
आर. टी. ई. प्रवेशः अधिकारी सखोल तपासणी करतात, नोंदणी फेब्रुवारीमध्ये सुरू होणार

आर. टी. ई. प्रवेशः अधिकारी सखोल तपासणी करतात, नोंदणी फेब्रुवारीमध्ये सुरू होणार

यामध्ये भाडेकरारनामा आणि आयकर उत्पन्न प्रमाणपत्र तसेच जातीचे प्रमाणपत्र यांची कसून तपासणी केली जाणार आहे. फेबुवारीच्या पहिल्याच आठवड्यात आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू करण्यात येऊन विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी पुरेसा कालावधी देण्यात येणार असल्याचेदेखील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
77 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 1, 2026, 10:03 AM
टून कॅम्पः कार्टून उत्साही लोकांसाठी एक प्रशिक्षण कार्यक्रम

टून कॅम्पः कार्टून उत्साही लोकांसाठी एक प्रशिक्षण कार्यक्रम

या ‌‘टून कॅम्प‌’मध्ये व्यंग्यचित्रकलेची ओळख, व्यंग्यचित्रकलेचे प्रकार, कॅरेक्टर डिझायनिंग, भारतातील व्यंग्यचित्रकलेचा इतिहास, व्यंग्यचित्रकलेत वापरली जाणारी आधुनिक सॉफ्टवेअर्स व कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांचा उपयोग तसेच व्यंग्यचित्र रसग््राहण, अशा विषयांचा समावेश आहे. या प्रशिक्षण सत्रांसाठी सुप्रसिद्ध व्यंग्यचित्रकार सूरज ‌‘एस्के‌’ श्रीराम, चारुहास पंडित, प्रशांत कुलकर्णी, प्रा. विवेक मगर तसेच संग््राहालयाच्या क्युरेटर डॉ. प्रिया गोहाड मार्गदर्शन करणार आहेत. ‌‘टून कॅम्प‌’च्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दि. 7 फेबुवारी रोजी व्यंग्यचित्रकला संग््राहालयात सहभागींच्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.
25 shares
😐
Sakal logo
Sakal
Feb 1, 2026, 07:13 AM
भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प 2026: शिक्षण आणि परदेशी खर्चासाठीच्या प्रमुख घोषणा

भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प 2026: शिक्षण आणि परदेशी खर्चासाठीच्या प्रमुख घोषणा

Union Budget 2026 foreign education announcement: भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज ११ वाजता अर्थसंकल्प संसदेत सादर केला. त्यांनी सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करुन नवा विक्रम नावे केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात विमा, कर,शिक्षण, नोकरी, आरोग्य, तंत्रज्ञान, पर्यंटन यासारख्या अनेक क्षेत्रांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. तसेच शैक्षणिक खर्चाबाबत एक मोठी घोषणा केली आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात परदेशातील वैद्यकीय आणि शैक्षणिक खर्चाबाबत एक मोठी घोषणा केली. टीसीएस खर्चावरील व्याजदर 5% वरून 2% पर्यंत कमी करण्यात आला आहे.
65 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 1, 2026, 05:46 AM
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या बांधकामास विलंब

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या बांधकामास विलंब

बापू सोळंके शासनाने दोन वर्षांपूर्वी परभणी येथील वसंतराव नाईकमराठवाडाकृषी विद्यापीठांतर्गतछत्रपती संभाजीनगरजिल्ह्यात लिहाखेडी (ता. सिल्लोड) येथे शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर केले. महाविद्यालयासाठी लिहाखेडी येथे ४३ हेक्टर जमीन ६ महिन्यापूर्वीच विद्यापीठाला हस्तांतरितही केली. मात्र, महाविद्यालयाच्या इमारतीसाठी निधीला प्रशासकीय मंजुरी दिली नाही. दुसऱ्या बाजूला महाविद्यालय सुरू होऊन दोन वर्ष उलटले तरी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे अद्याप मंजूर केलेली नाहीत. संभाजीनगरातील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्या इमारतीत सुरू असलेल्या या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिक्षण उधार उसनवारीवर येणाऱ्या गेस्ट लेक्चरर्सवर कसेबसे सुरू आहे. लिहाखेडीत शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर झाल्यानंतर लगेच प्रवेश प्रक्रियाही राबविण्यात आली. मात्र, महाविद्यालयासाठी लिहाखेडी येथे इमारत नसल्याने गत २ वर्षांपासून हे महाविद्यालय तात्पुरत्या स्वरूपात महानुभाव आश्रम चौकालगतच्या राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्या इमारतीत सुरू आहे. राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. सूर्यकांत पवार हे प्रभारी प्राचार्य म्हणून अतिरिक्त कारभार सांभाळत आहेत. शासनाने या महाविद्यालयासाठी कोणत्याही सोयी, सुविधा दिल्या नाही. प्राध्यापकांची पदभरती केलेली नाही. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी इतर केंद्रांतील कृषीशास्त्रज्ञांना आमंत्रित केले जाते. लिहाखेडी शासकीय कृषी महाविद्यालयाचे यंदा दुसरे वर्ष सुरू आहे. लिहाखेडी येथे जमीन मिळाली आहे. इमारत बांधकामासाठी निधी शासनाने मंजूर केला नाही. प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मंजूर व्हावीत, यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.- डॉ. सूर्यकांत पवार, प्रभारी प्राचार्य. ४३ हेक्टर जागा परभणी कृषी विद्यापीठाला हस्तांतरित कृषी महाविद्यालयासाठी शासनाने ४३ हेक्टर जमीन परभणी कृषी विद्यापीठाला हस्तांतरित केली. जमीन मिळाली असली तरी महाविद्यालयाची इमारत, वसतिगृह, प्रशासकीय इमारतीचा आराखडा अद्याप शासनाने मंजूर केलेला नाही. इमारत बांधकाम पूर्ण होईपर्यंत हे महाविद्यालयछत्रपती संभाजीनगरातचसुरू राहणार आहे. हेही वाचा : कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारी परदेशी भाजीपाला शेती; जाणून घ्या सविस्तर
79 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 1, 2026, 01:00 AM
मालमत्ता कराच्या थकबाकीवरून कुपवाड हायस्कूलचे कार्यालय सील

मालमत्ता कराच्या थकबाकीवरून कुपवाड हायस्कूलचे कार्यालय सील

महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार कुपवाड शहरातील एका हायस्कूलचे कार्यालय मालमत्ता कर थकबाकीपोटी महापालिका प्रशासनाने शनिवारी सायंकाळी सील केले. संबंधित संस्थेकडे 4 लाख 73 हजार 98 रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. सदर संस्थेला महापालिका प्रशासनाने यापूर्वी अनेकदा कर भरण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, संस्थेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आयुक्त गांधी यांच्या आदेशानुसार प्रत्यक्ष कारवाईचा बडगा उगारला. पथकाने संस्थेचे कार्यालय आणि स्टाफरूम अधिकृतपणे सील केले.
28 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 1, 2026, 12:35 AM
महाराष्ट्र शिक्षक महामंडळाचे 53वे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित

महाराष्ट्र शिक्षक महामंडळाचे 53वे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित

रत्नागिरी :महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकतर महामंडळाचे 53 वे राज्यस्तरीय अधिवेशन 1 फेब्रुवारी रोजी चेंबूर, मुंबई येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मैदानावर आयोजित करण्यात आल्याची माहिती शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र केळकर यांनी दिली. या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये शिक्षकतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर विचारविनिमय, चर्चासत्रे व परिसंवादांचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी विविध विषयतज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
69 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 1, 2026, 12:30 AM
पाकिस्तानचे शिक्षण अधिकारी परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी सी. सी. टी. व्ही. कॅमेरे लावतात

पाकिस्तानचे शिक्षण अधिकारी परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी सी. सी. टी. व्ही. कॅमेरे लावतात

शाळा व परिसरासह परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्ग खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत केंद्र असलेल्या सर्व शाळा प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. विभागीय मंडळ स्तरावर उपद्रवी व संवेदनशील परीक्षा केंद्रांची यादी निश्चित केली आहेत. कोणतेही गैरप्रकार होऊ नये, यासाठी विभागीय मंडळ व जिल्हा प्रशासनाकडून तेथे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय दक्षता समितीचे पुनर्गठन करण्यात आले असून संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यांची समिती काम करणार आहे.
44 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Jan 30, 2026, 03:23 PM
महाराष्ट्र शिक्षण विभागाने शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

महाराष्ट्र शिक्षण विभागाने शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

पुणे :राज्यातील खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वैयक्तिक मान्यतेबाबतील अनियमितता प्रकरणात आतापर्यंत केवळ संबंधित शिक्षक, कर्मचारी यांच्यावर कारवाई केली जाते. मात्र, आता वैयक्तिक मान्यता अनियमितता प्रकरणात संबंधित शिक्षण संस्थेवरही कारवाई करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती, वैयक्तिक मान्यता, पदोन्नती आणि त्या संदर्भात ६ फेब्रुवारी २०१२ रोजी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्याशिवाय महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१नुसार शाळा व्यवस्थापन हे नियुक्ती प्राधिकारी असून, पारदर्शक पध्दतीने भरती प्रक्रिया राबविणे ही त्यांची जबाबदारी आहे, अशी तरतूद आहे. तसेच, २३ ऑगस्ट, २०१७ रोजीच्या शासन निर्णयाद्वारेही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. १० जून २०२२ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे वैयक्तिक मान्यता, शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत सुधारित कार्यपद्धती प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, काही शाळा व्यवस्थापनांकडून कागदपत्रांमध्ये फेरफार, चुकीची माहिती किंवा माहिती दडपून प्रस्ताव सादर केले जातात. वस्तुतः अशा गुन्ह्यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांवर कायद्यानुसार कारवाई होणे आवश्यक असताना सद्यःस्थितीत केवळ कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कारवाई होते. त्यामुळे मूळ नियुक्ती प्रक्रियेत अनियमितता केलेल्या व्यवस्थापनावर कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतासंबंधी क्षेत्रिय स्तरावरील सक्षम प्राधिकाऱ्यांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत शिक्षण विभागाने नव्याने सूचना दिल्या आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता प्रदान करत असताना संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी ६ फेब्रुवारी २०१२ आणि १० जून २०२२ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींसह प्रशासकीय नोंदी संबंधित कर्मचाऱ्याच्या नियुक्तीसंदर्भात संस्थेचा ठराव, नियुक्ती आदेश आणि प्रत्यक्ष रुजू झाल्याचा अहवाल, संबंधित कर्मचाऱ्याच्या शाळेचा प्रत्यक्ष हजेरी पट, संस्था आणि कार्यालयाच्या ‘आवक-जावक’ नोंदवहीतील नोंदींची पुनःश्च पडताळणी करणे, प्रचलित कार्यपद्धती आणि शासन आदेशानुसारच भरती केली आहे की नाही याची खात्री करणे अनिवार्य आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता अनियमितता प्रकरणी जबाबदार व्यवस्थापन किंवा व्यक्तींवर दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित दखलपात्र गुन्ह्यामध्ये सहभागी असणारी प्रत्येक व्यक्ती, संस्था यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार फौजदारी कारवाई होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता प्रकरणी अनियमितता करणाऱ्या संबंधित खाजगी व्यवस्थापन, व्यक्तींवर बनावट कागदपत्रे तयार करून सादर केल्याप्रकरणी दखलपात्र गुन्ह्यात सहभागी असल्याचे सकृतदर्शनी निष्पन्न होत असल्यास भारतीय न्यायसंहिता आणि संबंधित कायद्याअंतर्गत कारवाई करावी, असे नमूद करण्यात आले आहे. शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता प्रकरणात अनियमितता आढळल्यास संबंधित संस्था, व्यक्तींवर कारवाई झाली पाहिजे. शिक्षण विभागाचा निर्णय योग्य आहे. मात्र, अशा गुन्ह्याची माहिती असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. – रवींद्र फडणवीस, सरकार्यवाह, शिक्षण संस्था महामंडळ
34 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Jan 27, 2026, 04:02 PM
भारतीय महाविद्यालये जाती-आधारित भेदभाव रोखण्यासाठी उपाययोजना राबवतात

भारतीय महाविद्यालये जाती-आधारित भेदभाव रोखण्यासाठी उपाययोजना राबवतात

महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये जाती-आधारित भेदभाव रोखण्यासाठी लागू केलेल्या नवीन नियमांनुसार, UGC ने संस्थांना तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विशेष समित्या, हेल्पलाइन आणि देखरेख पथके स्थापन करण्यास सांगितले आहे, विशेषतः अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी.
38 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Jan 27, 2026, 03:38 PM
प्रमुख मुद्यांवर चर्चा करण्यासाठी किसान सभेच्या शिष्टमंडळाने घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट

प्रमुख मुद्यांवर चर्चा करण्यासाठी किसान सभेच्या शिष्टमंडळाने घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई :वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करावी, समुद्राला वाहून जाणारे पाणी स्थानिकांसाठी तसेच महाराष्ट्रातल्या कोरडवाहू भागासाठी वापरावे, पेसा भरती सुरू करून रोजगार उपलब्ध करावा आदी मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या लॉन्ग मार्चच्या पार्श्वभूमीवर आज अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाने मंत्रालयातील बैठकीत शेतकऱ्यांची बाजू मांडली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे, वन मंत्री गणेश नाईक, यांच्यासह मुख्य सचिव व विविध खात्यांचे अधिकारी यांच्यासोबत दोन तास किसान सभेच्या शिष्टमंडळाने विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.शिष्टमंडळाने यानंतर वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मान्य करण्यात आलेल्या सर्व मागण्यांच्या अंमलबजावणीची संपूर्ण हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. अंमलबजावणीत त्रुटी राहू नये यासाठी मंत्री स्तरावर सातत्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.कोणकोणत्या मागण्या मान्य?वनाधिकार कायद्याच्या अंतर्गत दावे केलेल्या सर्व दावेदारांच्या वन हक्क दाव्यांची पुन्हा तपासणी करण्याचे यावेळी मान्य करण्यात आले. नावे करण्यासाठी पात्र करण्यात आलेली शेती व प्रत्यक्ष ताबा यातील तफावत वन विभागाच्या चुकीच्या अभिप्रायामुळे वाढली असून त्यामुळे हजारो शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये सर्व दाव्यांची पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रांतांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांच्या समित्या नेमून प्रत्येक वन हक्क प्रकरण तपासण्याची घोषणा करण्यात आली. पुढील तीन महिन्यांत ही सर्व तपासणी करून वन जमीन धारकांना न्याय देण्यात येणार असून या प्रक्रियेला चालना देण्यासाठी मंत्र्यांच्या समावेशासह अंमलबजावणी समिती गठित करण्यात आली.वन जमिनीची पीक पाहणी लावून सर्व शासकीय योजनांचा लाभ वन जमीन धारकांना देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. आदिवासी विकासमंत्र्यांनी त्या संदर्भातले आदेश निर्गमित केले.वन जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांची भात खरेदी तसेच वरई नागली सावा व आदिवासी पिके, स्ट्रॉबेरी व बाळ हिरडा ही फळे रास्त दराने खरेदी केली जावी याबाबत किसान सभेने आग्रह धरला. भात उत्पादकांना दिला जाणारा बोनस वन जमीन धारकांनाही द्यावा याबाबतची मागणी करण्यात आली. या व इतर सर्व शासकीय योजनांचे लाभ वन धारकांना मिळावेत यासाठी ई पीक पाहणी आवश्यक असते. वन धारकांची ई पीक पाहणी करून या सर्व योजनांचा लाभ त्यांना देण्याचे यावेळी मान्य करण्यात आले.देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे त्या जमिनी करण्यासंदर्भातला कायदा किसान सभेच्या सातत्याच्या आंदोलन व पाठपुराव्यामुळे तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या संदर्भातला मसुदा किसान सभेला उपलब्ध करून देण्यात आला आहे. या मसुद्यामधील काही गोष्टी स्वागतार्ह असल्या तरी त्यात काही आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता किसान सभेने अधोरेखित केली. पुढील आठ दिवसांत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात किसान सभेच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित करून यातील त्रुटी दूर करण्याच्या बाबत निर्णय करण्यात आला.Anjali Bharti : अंजली भारतीच्या अडचणी वाढणार? शिवसेना महिला सेनेचं राज्य महिला आयोगाला पत्रठाणे-पालघर जिल्ह्यातील वरकस जमिनी नियमानुकुल करण्याच्या दृष्टिकोनातून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मकता दर्शवली असून याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या जमिनी कसणाऱ्यांना न्याय देण्याच्या बाबत मागणी मान्य करण्यात आली.आदिवासी भागात पडणारे पाणी सात पश्चिमवाहिनी नद्यांच्या मधून समुद्राला जाऊन मिळते. हे पाणी गुजरातला वळवण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. तसे न करता हे पाणी स्थानिकांना तसेच महाराष्ट्रातील कोरडवाहू भागाला उपलब्ध करून द्यावे ही मागणी किसान सभेने आग्रहपूर्वक केली. विविध प्रकारचे साखळी बंधारे बांधून हे पाणी जागेवर अडवून स्थानिकांना उपलब्ध करून देण्याबाबत ठोस कृती कार्यक्रम यावेळी ठरवण्यात आला. नाशिक जिल्हाधिकारी स्तरावर याबाबत सविस्तर आराखडा करण्यात येणार असून या संपूर्ण प्रक्रियेत किसान सभेने सादर केलेल्या प्रस्तावांचा गांभीर्याने विचार केला जाईल. समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळवून मराठवाड्यासह कोरडवाहू भागाला देण्याबाबतची योजना गतिमान करण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.पेसा अंतर्गत पदे 50% मर्यादेत भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करून आदिवासी विभागात पेसा भरती करण्याचे यावेळी मान्य करण्यात आले.शेतकऱ्यांना दिवसा लाईट देण्याच्या बद्दल आग्रही मागणी किसान सभेने केली. ज्या जिल्ह्यांमध्ये शेती सिंचनासाठी रात्री लाईट दिली जाते त्याची माहिती तातडीने संकलित करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिवसा लाईट देण्याच्या बद्दल निर्णय करण्यात आला.Jitendra Awhad : 'हाथी चले अपनी चाल कुत्ते भोंके हजार', सहर शेखच्या आव्हानावर जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रियाशालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना अत्यंत तुटपुंजे मानधन देण्यात येते. त्यांच्या मानधनात वाढ करण्याचे आश्वासन अद्याप पाळले गेले नसल्याने याबाबत किसान सभेने आग्रह धरला. याबाबत तातडीने निर्णय करून शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची घोषणा करण्यात आली.ग्रामीण आदिवासी दुर्गम भागामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सर्व सोयी उपलब्ध व्हाव्यात यासाठी शाळा इमारती व खोल्यांची डागडुजी करून आवश्यक तेथे शिक्षक भरती करण्याची मागणी किसान सभेने केली होती. शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी याबाबत ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिले.अकोले मार्गे जाणारी नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे पूर्वीच्या सर्वेक्षणाप्रमाणे व्हावी यासंदर्भामध्ये शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना विनंती केली. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग बदलण्याबद्दलच्या तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत विविध प्रस्तावांचा पुनर्विचार करून मार्ग काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.किसान सभेच्या राज्य नेतृत्वाशी आणि मुख्य म्हणजे खर्डी येथे जमलेल्या आंदोलनकर्त्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. उद्या 28 सप्टेंबरला सायंकाळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि नाशिकचे जिल्हाधिकारी आंदोलकांना संबोधि करतील आणि मग आंदोलनाबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल.आजच्या शिष्टमंडळात डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जे. पी. गावीत, डॉ. अजित नवले, आमदार विनोद निकोले, उमेश देशमुख, सुभाष चौधरी, इंद्रजित गावीत, इरफान शेख, किरण गहला, सुनील मालुसरे, भिका राठोड, देवीदास वाघ, रामदास पवार, रडका कलांगडा, चंद्रकांत घोरखाना, एकनाथ मेंगाळ इत्यादींचा समावेश आहे.
93 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Jan 27, 2026, 02:55 PM
मराठी भाषा शिकवण्यात अपयशी ठरलेल्या शाळांवर कारवाई करण्याची मनसे अध्यक्षांची मागणी

मराठी भाषा शिकवण्यात अपयशी ठरलेल्या शाळांवर कारवाई करण्याची मनसे अध्यक्षांची मागणी

"शिक्षण क्षेत्रातील ही बेशिस्त आणि दुराग्रही वृत्तीमराठीभाषेला केवळ दुय्यम स्थान देत नाही, तर ती राज्याच्या सांस्कृतिक अस्मितेवरच आघात करते. पालकांकडून लाखोंची फी घेत असताना याशाळाराज्याच्या कायद्याचे उल्लंघन करतात, हे अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह आहे", अशा शब्दात नाराजी व्यक्त करत मनविसेचे अध्यक्षअमित ठाकरेंनीराज्य सरकारचेमराठीमुद्द्यावर लक्ष वेधले होते. या मागणीवर राज्य सरकारकडून कार्यवाही करण्यात आल्यानंतरअमित ठाकरेंनीसरकारच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. ५ ऑगस्ट २०२५ रोजी अमित ठाकरे यांनी शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांना पत्र लिहूनशाळांमधीलमराठी भाषेचा मुद्दा मांडला होता. शासनाने अधिनियमाची अंमलबजावणी होत आहे की नाही, यावर पुण्यातील महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग संचालनालय यांच्या माध्यमातून तात्काळ अहवाल मागवावा. ज्या शाळांनी मराठी भाषा शिकवणे टाळले आहे, अशा शाळांवर योग्य ती शिस्तभंगाची किंवा मान्यता रद्द करण्याची कारवाई करावी. सक्ती बाळगून पुन्हा असे घडणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा मागण्या केल्या होत्या. सरकारचे कौतुक करताना अमित ठाकरे काय म्हणाले? अमित ठाकरे यांनी ५ ऑगस्ट २०२५ रोजी लिहिलेले पत्र आणि २७ जानेवारी २०२६ रोजी शालेय शिक्षण विभागाने काढलेला आदेशाची प्रत शेअर केली आहे. अमित ठाकरे यांनी म्हटले आहे की, "महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन सक्तीचे करण्याबाबतचा कायदा अस्तित्वात असूनही, अनेक शाळा या निर्णयाची अंमलबजावणी करत नसल्याचे निदर्शनास आले होते. यासंदर्भात ५ ऑगस्ट २०२५ रोजी आम्ही शासनाकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती." "आज आनंद वाटतोय की, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. राज्यातील ज्या शाळा मराठी भाषेच्या अध्यापनाचा निर्णय डावलत आहेत, त्यांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहेत. प्रशासनाने दाखवलेल्या या तत्परतेचं आम्ही स्वागत करतो", अशा भावना अमित ठाकरेंनी व्यक्त केल्या आहेत. मराठी फक्त भाषा नाही, आपली ओळख "मराठी ही केवळ एक भाषा नसून ती आपली ओळख आहे. आपल्या मातीत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मराठी भाषा आलीच पाहिजे, ही आमची भूमिका होती आणि राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर योग्य ती कार्यवाही होईल आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, ही आमची अपेक्षा आहे", असेही अमित ठाकरे यांनी म्हटले आहे.
71 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Jan 24, 2026, 03:30 PM
आंध्र प्रदेशने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घातली

आंध्र प्रदेशने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घातली

तुम्ही पालक असाल तर ही बातमी नक्की वाचा. आता तुमच्या 16 वर्षांखालील मुलांसाठी एक नियम येणार आहे. हा नियम ऑस्ट्रेलिया सरकारच्या धरतीवर घेण्यात आला आहे. आता सोशल मीडियासंदर्भातील भारतामधल्या कोणत्या राज्यात सोशल मीडियासंदर्भातला नियम लागू करण्यात आला आहे, याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.भारतातील हे राज्य ऑस्ट्रेलियाप्रमाणे 16 वर्षांखालील मुलांसाठीसोशल मीडियावरही बंदी घालणारआहे. हो. ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालणारे आंध्र प्रदेश हे भारतातील पहिले राज्य ठरणार आहे.ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालणारे आंध्र प्रदेश हे भारतातील पहिले राज्य ठरणार आहे. आंध्र प्रदेश सरकारने अलीकडेच मंत्री गटाची (GOM) स्थापना केली आहे, ज्याला माहिती आणि शिक्षण मंत्र्यांचा अध्यक्ष बनविण्यात आले आहे.समाज माध्यमांचे नियमन करणाऱ्या विद्यमान कायद्यांचा आढावा घेणे आणि महिला आणि मुलांविरोधात चुकीची माहिती, बनावट बातम्या आणि दिशाभूल करणारा मजकूर रोखण्यासाठी राज्यस्तरावर नवीन नियम लागू करणे हा या समितीचा उद्देश आहे. यागटाने देशातील अनेककायदे आणि परदेशात स्वीकारलेल्या धोरणांचा अभ्यास केला आहे. यासह, हा गट 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा ऑस्ट्रेलियाचा कायदा स्वीकारण्याचा विचार करीत आहे.राज्याचे माहिती व शिक्षण मंत्री नारा लोकेश म्हणाले की, मुलांना ऑनलाइन कंटेंटच्या वापरापासून आणि प्रदर्शनापासून वाचविणे महत्वाचे आहे कारण ते समजून घेण्याइतके त्यांचे वय नाही. सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार राज्यस्तरावर विशेष कायदा आणण्याच्या पर्यायांवर विचार करत आहे. गृहमंत्री वनगलपुडी अनीता, आरोग्यमंत्री सत्यकुमार यादव आणि माहिती व जनसंपर्क मंत्री यांचाही या गटात समावेश आहे.गृहमंत्री अनिता म्हणाल्या की, हा गट सोशल मीडिया प्रकरणांचे सांख्यिकीय विश्लेषण करीत आहे जिथे मुलांवर अत्याचार केले जात आहेत किंवा इतरांशी असे करण्यात सामील आहेत. 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये उद्भवणार् या मानसिक आणि वर्तणुकीशी संबंधित पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेतली आहे.हा गट मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा तयार करेल जो केंद्र सरकारसोबतही सामायिक केला जाईल. गरज पडल्यास आम्ही केंद्राला विनंती करू की आंध्र प्रदेशने केलेल्या सांख्यिकी विश्लेषण आणि पुराव्यांच्या अभ्यासावर आधारित एक विशेष कायदा आणावा, कारण इतर राज्यांमध्येही असेच आहे.
69 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Jan 24, 2026, 02:38 PM
उत्तर प्रदेशातील तरुणांनी वैद्यकीय शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी स्वतःची पंजा कापली

उत्तर प्रदेशातील तरुणांनी वैद्यकीय शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी स्वतःची पंजा कापली

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या जौनपूरच्या लाईन बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणाला अज्ञातांनी मारहाण केली. त्यात तो बेशुद्ध झाला आणि त्यांनी जाताना त्याच्या डाव्या पायाचा पंजा कापून नेला, अशी माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला. त्यातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे.२५ वर्षीय तरुणानं स्वत:च्या पायाचा पंजा स्वत:च कापल्याचं तपासातून उघड झालं. त्यासाठी त्यानं आधी इंजेक्शन टोचलं. पायाकडेचा भाग बधीर केला. यानंतर त्यानं ग्राईंडरनं पायाचा पंजा कापला. तरुणानं डीफार्माचं शिक्षण घेतलेलं असल्यानं त्याला इंजेक्शन देता येतं. दिव्यांग कोट्यातून एमबीबीएस ला प्रवेश घेण्यासाठी त्यानं हा सगळा प्रकार केला. कारण एमबीबीएस प्रवेश परीक्षा नीट यूजीमध्ये तो दोनदा नापास झाला होता. पायाचा पंजा कापून तो दिव्यांग प्रमाणपत्र तयार करणार होता आणि दिव्यांगांसाठी असलेल्या कोट्यातून प्रवेश मिळवणार होता. त्यासाठी त्यानं बीएचयू, वाराणसीला जाऊन दिव्यांग प्रमाणपत्राची माहितीदेखील घेतली होती.दोन बायका, फजिती ऐका! वाद टोकाला, ग्राम पंचायत बसताच पेच सुटला; 3-3-1 चा फॉर्म्युला ठरलापोलीस अधिकारी गोल्डी गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्री १२ वाजता घडली. त्याची माहिती पोलिसांना सकाळी मिळाली. २५ वर्षांच्या सूरज भास्करला कोणीतरी मारहाण केली आणि त्याच्या पायाचा पंजा कापला असल्याचं समजलं. आम्ही अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. सूरजकडून घटनाक्रमाची माहिती घेतली. तो घटनाक्रम संशयास्पद वाटत होता.पोलिसांनी सलग दोन दिवस रुग्णालयात जाऊन सूरजची चौकशी केली. त्याच्या जबाबात विसंगती आढळून आली. तो जबाब वारंवार बदलत होता. पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. यानंतर पोलिसांनी सीडीआर आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा केले. त्यातून धक्कादायक उलगडा झाला. या प्रकरणात बाहेरील व्यक्तीचा हात नव्हता. सूरजनं त्याचा पाय स्वत:चा कापला होता. शेतात काही इंजेक्शन्स सापडली. सूरजनं स्वत:ला इंजेक्शन टोचून पाय सुन्न करुन घेतला होता.कोण घुसलंय गं घरात? आई, भाऊ कामाला जाताच काकी दारात; लोखंडी पेटी उघडली अन् एकच खळबळ उडालीपोलिसांनी सूरजचा सीडीआर काढला. त्यात एका नंबरवर सूरजचे जास्त कॉल होते. तो नंबर सूरजच्या प्रेयसीचा होता. पोलिसांनी तिची चौकशी केली. त्यातून सूरजचं भांडं फुटलं. सूरजला काहीही करुन २०२६ मध्ये डॉक्टर व्हायचं होतं. तो ऑक्टोबरमध्ये बीएचयूच्या वैद्यकीय महाविद्यालयातही गेला होता. त्यानं दिव्यांग प्रमाणपत्र तयार करायचा प्रयत्न करुन पाहिला. पण कोणतंही व्यंग नसल्यानं त्याला प्रमाणपत्र मिळालं नाही.
63 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Jan 22, 2026, 04:07 PM
बैलाच्या शाळेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनास गावकरी आणि अधिकारी प्रतिसाद देतात

बैलाच्या शाळेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनास गावकरी आणि अधिकारी प्रतिसाद देतात

समोर जे येईल त्याच्यावर हल्ला करण्याच्या पवित्र्यात होता. दरम्यान शाळेजवळ बैल गेल्याने विद्यार्थी आणि शिक्षक भयभीत झाले. गावकऱ्यांनी तहसीलदार, वनविभाग, पशुधन अधिकारी आणि पोलिस यांच्याशी संपर्क साधला. त्या नंतर सरपंच कैलास जाधव, उपसरपंच गणेश गालफाडे, राजेश तिडके, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब बांगर यांनी दत्ता तोंडे यांना माहिती दिली.
97 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Jan 22, 2026, 04:07 PM
बैलाच्या शाळेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनास गावकरी आणि अधिकारी प्रतिसाद देतात

बैलाच्या शाळेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनास गावकरी आणि अधिकारी प्रतिसाद देतात

समोर जे येईल त्याच्यावर हल्ला करण्याच्या पवित्र्यात होता. दरम्यान शाळेजवळ बैल गेल्याने विद्यार्थी आणि शिक्षक भयभीत झाले. गावकऱ्यांनी तहसीलदार, वनविभाग, पशुधन अधिकारी आणि पोलिस यांच्याशी संपर्क साधला. त्या नंतर सरपंच कैलास जाधव, उपसरपंच गणेश गालफाडे, राजेश तिडके, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब बांगर यांनी दत्ता तोंडे यांना माहिती दिली.
8 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Jan 19, 2026, 03:23 PM
रत्नागिरी पंचायत समिती निवडणूकः शिक्षणमंत्र्यांनी 11 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली

रत्नागिरी पंचायत समिती निवडणूकः शिक्षणमंत्र्यांनी 11 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली

रत्नागिरी:रत्नागिरीपंचायत समितीसाठीउद्याेगमंत्री तथा पालकमंत्रीउदय सामंतयांनी शिंदेसेनेची दुसरी ११ जणांची यादी रविवारी जाहीर केली. निवडणुकीसाठी नव्या चेहऱ्यांना संधी देत एकूण १६ उमेदवार जाहीर केले आहेत.मंत्रीउदय सामंतयांनी शनिवारीपंचायत समितीसाठीपाचजणांची नावे जाहीर केली हाेती. यामध्ये विद्या विलास बोंबले (हातखंबा), नेहा प्रवीण गावणकर (देऊड), सुमेश सुरेश आंबेकर (केळ्ये), डॉ. पद्मजा संजय कांबळे (नाणीज), परेश रामकृष्ण सावंत (साखरतर) यांचा समावेश हाेता. त्यानंतर रविवारी अन्य ११ जणांचे नावे जाहीर करण्यात आली आहेत.शिंदेसेनेने पंचायत समितीच्या माजी सभापती अनुष्का अभय खेडेकर यांना वाटद गणातून उमेदवारी दिली आहे. मागील कालावधीत त्यांचे पती अभय खेडेकर हे पंचायत समिती सदस्य होते. अनुष्का खेडेकर यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. तर अन्य १५ उमेदवार हे नव्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. शिंदेसेनेचे दुसऱ्या यादीतील उमेदवारवाटद : अनुष्का अभय खेडेकर, करबुडे : प्रवीण धोंडू पांचाळ, नेवरे : पूर्वा सचिन दुर्गवळी, कोतवडे : स्वप्नील सदानंद मयेकर, झाडगाव (म्युन्सिपल बाहेर) : साक्षी परेश कुमठेकर, खेडशी : वैभव विठोबा पाटील, नाचणे : सचिन सुधाकर सुपल, कर्ला : कांचन कृष्णकांत नागवेकर, गोळप : अर्चना तुषार साळवी, पावस : नामदेव नारायण कोकरे, गावखडी : स्वाती संदेश शिंदे. आई-वडिलांनंतर मुलगा रिंगणातखेडशी पंचायत समिती गणातून वैभव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वैभव पाटील यांचे वडील विठोबा पाटील हे यापूर्वी पंचायत समिती सदस्य होते. त्यानंतर त्यांच्या मातोश्री वैभवी पाटील यांनी पंचायत समितीचे सभापतीपद भूषविले हाेते.
77 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Jan 16, 2026, 03:28 PM
हिवाळी पशुधनाची काळजीः इष्टतम आरोग्य आणि दूध उत्पादनासाठी ऊर्जा आणि प्रथिने वाढवणे

हिवाळी पशुधनाची काळजीः इष्टतम आरोग्य आणि दूध उत्पादनासाठी ऊर्जा आणि प्रथिने वाढवणे

Agriculture News :हिवाळ्यात पशुधनाला जास्त ऊर्जा आणि प्रथिनांची गरज असते. यामुळे हिवाळ्यात पशुधनाची विशेष काळजी घ्यावी लागते. नेमका कुठला आहार द्यावा, कुठली पेंड द्यावी, हे समजून घेऊयात... हिवाळ्यात आहार व्यवस्थापनशरीरस्वास्थ आणिदूधउत्पादनासाठी जनावरांना ऊर्जा लागते. जर शरीरस्वास्थासाठी लागणारी ऊर्जा कमी पडली, तरदूधउत्पादनासाठीची ऊर्जा तिथे वापरली जाते. त्यामुळे दूध उत्पादनात किंवा फॅट आणि एसएनएफमध्ये घट दिसून येते. कारण या काळात ऊर्जेची गरज वाढलेली असते. थंड हवामानात वाढलेल्या ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी गाईंचा आहाराचे नियोजन करावे. शरीराचे तापमान राखण्यासाठी गाईंना जास्त ऊर्जा लागते. जनावरांना उच्च गुणवत्तेचा चारा द्यावा. आहारात चांगल्या दर्जाचे गवत, कडबा किंवा मुरघासाचा वापर करावा. हिवाळ्यात गाई, म्हशींच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खाद्य नियोजन करावे. हिवाळ्यात जास्त प्रथिनयुक्त आहार दिला गेल्यास उच्च दर्जाच्या प्रथिनांचा अधिक वापराने अॅसिडोसिस होण्याची शक्यता असते. त्यामुळे आम्ल शोषले जात नसल्याने किण्वन पोटाचा (रुमेन) सामू कमी होतो. या अॅसिडोसिसचा परिणाम होऊन दूध आणि दुधातील एसएनएफचे प्रमाण कमी होते. त्यासाठी गव्हाणीमध्ये पुरेसा चारा उपलब्ध आहे याची खात्री करावी. कोरडा चारा जितका जास्त तितकी शरीरातील ऊर्जा जास्त असते. हिवाळ्यात तापमान कमी झाल्यामुळे जनावरांच्या शरीरातील ऊर्जा वापरली जाऊन वजन, प्रकृतिअंक (बॉडी स्कोअर) खालावतो. अशावेळी खाद्यात उर्जेचे प्रमाण अतिरिक्त वाढवून दिले पाहिजे. थंडीच्या ताणामुळे जनावराच्या शरीराची प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्व इत्यादींच्या गरजा बदलत नाहीत. एका अभ्यासानुसार घटत जाणाऱ्या एक अंश फॅरनहाइट तापमानाप्रमाणे एक टक्का जास्त ऊर्जेची पूर्तता पशू आहारातून केली पाहिजे. हिवाळ्यात ऊर्जेची गरज साधारणतः १० ते २५ टक्के इतकी जास्त असते. - ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी
93 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Jan 15, 2026, 03:00 PM
माधव श्रीवाद यांच्या अचानक झालेल्या निधनाने शैक्षणिक आणि आध्यात्मिक वर्तुळात शोककळा पसरली आहे

माधव श्रीवाद यांच्या अचानक झालेल्या निधनाने शैक्षणिक आणि आध्यात्मिक वर्तुळात शोककळा पसरली आहे

माधव श्रीवाड हे स्वतःच गाडी चालवत होते. छातीत दुखत असल्यामुळे कदाचित रस्त्यातच त्यांना अटॅक आला असावा त्यामुळे त्यांचे गाडीवरून नियंत्रण सुटून गाडी रस्त्यावरील पुलास धडकली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील शैक्षणिक पंढरीत माधव श्रीवाड हे सर्वदूर सर्वत्र परिचित होतो.शैक्षणिक कार्याबरोबरच अध्यात्मिक क्षेत्रातही ते कार्यरत होते. ह.भ.प.म्हणून ते नावारूपास आले होते. या त्यांच्या आकस्मिक निधनाने तालुक्याच्या शैक्षणिक, अध्यात्मिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
19 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Jan 11, 2026, 02:37 PM
तरुण विद्यार्थी सिद्धार्थ तावडेच्या आकस्मिक निधनामुळे समाजाचे शोकसंदेश

तरुण विद्यार्थी सिद्धार्थ तावडेच्या आकस्मिक निधनामुळे समाजाचे शोकसंदेश

अपघातातील मयत सिद्धार्थ तावदारे हा केएलई संस्थेच्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये तिसरी इयतेमध्ये शिकत होता.त्याच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्‍याच्या पश्चात आई, वडील,आजी आजोबा, भाऊ असा परिवार आहे.
3 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Jan 8, 2026, 03:10 PM
उत्तर प्रदेश पोलीस निरीक्षकाने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली

उत्तर प्रदेश पोलीस निरीक्षकाने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या हापूड जिल्ह्यातील एका महिला सहपोलीस निरीक्षकानं तिच्या पती आणि त्याच्या कुटुंबाविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. महिला सहपोलीस निरीक्षक पायल रानीनं तिचा पती गुलशन आणि त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहे. हुंड्यासाठी छळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे आरोप पायलनं केले आहेत.२ डिसेंबर २०२२ रोजी लग्न झाल्यानंतर लगेचच सासरच्यांनी १० लाख रुपये आणि कार देण्याची मागणी केली. त्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ सुरु केला. पती आणि सासू सासरे मागणी पूर्ण न झाल्यास ऍसिड फेकण्याची धमकी द्यायचे, असा पायलचा आरोप आहे. तर तिच्या पतीनं वेगळाच दावा केला आहे. मी मेहनत घेऊन पत्नीला शिकवलं. तिला पोलीस होण्यास मदत केली. या सगळ्यात तिला मोलाची साथ दिली. पण आता लग्नाला २ वर्षे होऊन गेलेली असताना ती मला खोट्या प्रकरणात अडकवत आहे, असा गुलशनचा दावा आहे.कोणी मेलंच नाही, मग कबर कोणाची? शेजारी पणती, फुलं अन् चिल्लर; गावात दहशत; 15 दिवस सरले अन्...लग्नात माझ्या कुटुंबानं त्यांच्या ऐपतीनुसार हुंडा दिला होता. पण त्यानं गुलशन आणि त्याच्या कुटुंबाचं समाधान झालं नाही. अधिक हुंडा आणण्यासाठी त्यांनी मला अनेकदा मारहाण केली, असं पायल रानी यांनी लेखी तक्रारीत म्हटलं आहे. सासरच्यांनी माझ्यावर ऍसिड फेकण्याची, मला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मला सुरक्षेची काळजी वाटते, असं रानी यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. यानंतर पोलिसांनी हुंड्यासाठी मारहाण, छळ केल्याचा आणि धमकावल्याचा गुन्हा नोंदवला आहे.दुसरीकडे आरोपी पती गुलशननं वेगळीच कहाणी सांगितली आहे. त्यानं पत्नीचे सगळे आरोप फेटाळले आहेत. पोलीस अधीक्षकांकडे न्याय देण्याची मागणी केली आहे. आम्ही दोघे २०१६ पासून एकमेकांना ओळखतो. २०२१ मध्ये कोर्टात लग्न केलं. मग २०२२ मध्ये रितसर विधीवत लग्न केलं. यानंतर मी माझ्या मेहनतीनं पायलला शिकवलं. तिला सहपोलीस निरीक्षण होण्यात मदत केली. पोलीस झाल्यावर तिचा रुबाब वाढला आणि मग तिनं माझ्यावर आणि कुटुंबावर खोटा गुन्हा नोंदवला, असा दावा गुलशननं केला आहे.मधमाशांचा हल्ला, जीव वाचवण्यासाठी गवतात लपले; काही तासांनंतर जिवंत जळून शरीराचा अक्षरश: कोळसाहापूडचे पोलीस अधीक्षक कुंवर ज्ञानंजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पोलिसाच्या लिखित तक्रारीवरुन गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुर आहे. दोन्ही बाजूंचे जबाब नोंदवून पुरावे गोळा करण्याचं काम सुरु आहे.
93 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Jan 4, 2026, 03:09 PM
ट्रॅजेडी स्ट्राइकः 12 वर्षीय विद्यार्थ्याची वसतिगृहातील खोलीत आत्महत्या

ट्रॅजेडी स्ट्राइकः 12 वर्षीय विद्यार्थ्याची वसतिगृहातील खोलीत आत्महत्या

राजकुमार जाेंधळे लातूर- शहरातील जवाहर नवाेदय विद्यालयात सातवीमधील एका विद्यार्थिनीने वसतिगृहात टाॅवेलने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ८ वाजता समाेर आली. अनुष्का किरणकुमार पाटाेळे (वय १२, रा. टाका ता. औसा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. मृत मुलीच्या कुटुंबीयांनी शाळेतील दाेषींविराेधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत संताप व्यक्त केला. नातेवाईकांच्या आक्राेशाने दिवसभर रुगणालय परिसरात तणावाचे वातावरण हाेते. रात्र झाल्याने मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले नाही. कुटुंबीयांनीही त्याला विराेध दर्शवत जाेपर्यंत गुन्हा दाखल हाेत नाही, ताेपर्यंत पार्थिव ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली. याबाबत रात्री उशिरापर्यंत कुठलाही नाेंद झाली, नसल्याचे पाेलिसांनी सांगितले. अनुष्काने जिथे गळफास घेतला त्या हाॅलमध्ये दाेन महिला कर्मचारी आणि १८ विद्यार्थिनी हाेत्या. काेणालाच कसे काय दिसले नाही? असा सवाल अनुष्काचे वडील किरणकुमार पाटाेळे यांनी केला आहे. तसेच गावातील शिक्षक सुधारकर लाेहकरे म्हणाले, अनुष्का ही हुशार विद्यार्थिंनी हाेती. तिच्यावरील अन्याय प्रशासनाने दूर केला पाहिजे तर रवी पाटील यांनी शाळेतील दाेषींवर खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली आहे. रुग्णालय परिसरात आक्राेश करणारे आई-वडील म्हणाले, सकाळी ९ वाजता आम्हाला शाळेतून फाेन आला. तुम्ही तातडीनेलातूरयेथील शासकीय रुग्णालयात या. काय झाले आहे, ते सांगितले नाही. लपवा-छपवी केली. आम्हाला मृतदेहही दाखविला नाही. बसलेल्या स्थितीत गळफास कसा काय बसताे? असा सवाल आईचा हाेता. शासकीय रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी गर्दी केली हाेती. दिवसभर आक्राेश सुरू हाेता. दरम्यान, घटनेची माहिती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना कळल्यानंतर उपविभागीय अधिकारी राेहिणी नऱ्हे, तहसीलदार साैदागर तांदळे नवाेदय विद्यालयात पाेहोचले. घटनेची कसून चाैकशी केली जावी, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थी नवाेदयमध्ये शिकतात. त्यामुळे घटनेच्या मुळाशी जावून अनुष्काला न्याय मिळवून देणे, वस्तुस्थिती समाेर आणण्यासाठी समिती गठित केली आहे. टाका गावात इयत्ता पाचवीपर्यंत अनुष्काचे शिक्षण झाले. जवाहर नवाेदय विद्यालयात इयत्ता सहावीसाठी तिला प्रवेश मिळाला. अभ्यासात हुशार असलेल्या अनुष्काला शाळेतील शिक्षकांनी नवाेदय परीक्षेसाठी प्राेत्साहित केले. शुक्रवारी आईला केला शेवटचा काॅल... अनुष्काने शेवटचा काॅल शुक्रवार, २ जानेवारी राेजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास केला हाेता. तिने आईशी पाच मिनिटे संवाद साधला. ती हसून बाेलल्याचे आईने सांगितले. अनुष्काने काॅल केल्यानंतर आईला म्हणाली, मम्मी तू आणि अंटी मला शेंगदाण्याचे लाडू, बिस्कीट पुडे घेऊन ये. मी लग्नाला येते, मात्र माझी परीक्षा आहे. लग्न लावून लागलीच परत जाणार आहे.
39 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Dec 28, 2025, 03:21 PM
सी. ई. टी. कक्षाने 24 मार्चच्या सामायिक प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले

सी. ई. टी. कक्षाने 24 मार्चच्या सामायिक प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले

सीईटी सेलमार्फत यंदा २४ मार्चपासून सामायिक प्रवेश परीक्षांना सुरुवात केली जाणार आहे. सध्या एकूण १७ प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यात पदवी अभ्यासक्रमाच्या १२ प्रवेश परीक्षा, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ५ प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहेत. यातील बहुतांश प्रवेश परीक्षा सकाळी व दुपारच्या सत्रात ऑनलाइन घेतल्या जातील. तर काही प्रवेश परीक्षा सायंकाळच्या सत्रात देखील होतील.
95 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Dec 27, 2025, 03:12 PM
विद्यापीठ क्रिकेट सामनेः अजमेर, संभाजीनगर आणि गडचिरोली संघांचे वर्चस्व

विद्यापीठ क्रिकेट सामनेः अजमेर, संभाजीनगर आणि गडचिरोली संघांचे वर्चस्व

महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ अजमेर संघाने व्हिएनएस गुजरात युनिव्हर्सिटी संघाचा ७-० असा सहज पराभव केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर संघाने युनिव्हर्सिटी ऑफ कोटा संघाचा ८-० असा धुव्वा उडविला. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संघाने महाराज सुरजमल ब्रीज विद्यापीठ भरतपूर संघाचा १३-० असा एकतर्फी पराभव केला.
39 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Dec 23, 2025, 03:31 PM
बनावट शालार्थ आयडी तयार केल्याप्रकरणी यवतमाळ जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याला अटक

बनावट शालार्थ आयडी तयार केल्याप्रकरणी यवतमाळ जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याला अटक

- योगेश पांडेनागपूर- ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई करत यवतमाळ येतील शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर यांनाअटककेली आहे. नागपुरात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी असताना त्यांनी बोगस शालार्थ आयडी तयार केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. त्यांना वर्धा येथूनअटककरण्यात आली असून हे प्रकरण थंडबस्त्यात गेल्याची चर्चा करणाऱ्या शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. ऑनलाईन शालार्थ आयडी प्रणालीचा गैरवापर करून अनेक शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. या प्रकरणात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी रविंद्र ज्ञानेश्वर पाटील यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास राज्यपातळीवरील विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. या प्रकरणात यवतमाळचे शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर यांची सुरुवातीला चौकशीदेखील झाली होती व त्यांना अटकपूर्व जामीनदेखील मिळाला होता. काटोलकर हे अगोदर भंडारा येथे कार्यरत होते. २४ डिसेंबर २०२१ ला ते नागपुरात प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाले. २० मार्च २०२२ पर्यंत ते जिल्हा परिषदेत असताना त्यांना अनेक शिक्षण व कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी बनावट असल्याची माहिती होती. परंतु वेतन संबंधात शाळेकडून आलेल्या प्रस्तावाची कुठलीही शहानिशा न करता त्यांचे थकीत वेतन देण्याची प्रक्रिया राबविली. त्यातून त्यांनी शासनाची १२ कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केली. नागपुरातून त्यांची यवतमाळला बदली झाली. त्यांचे राहणे वर्धा येथे होते. मंगळवारी पोलिसांच्या पथकाने तेथून काटोलकरांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालायासमोर हजर करण्यात आले व २५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यातील अटकेतील आरोपींची संख्या आता एकूण २७ इतकी झाली आहे. यात तीन शिक्षण उपसंचालक, चार शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक, तीन मुख्याध्यापक, दोन शाळा संचालक यांच्यासह सहायक शिक्षक, सहा लिपीक व कनिष्ठ लिपीकांचा समावेश आहे.
100 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Dec 23, 2025, 02:35 PM
डेटा एंट्री आणि व्हॅलिडेशन कार्येः फॉरवर्ड व्हॅलिडेशन डेटा पूर्ण करणे आणि बरेच काही

डेटा एंट्री आणि व्हॅलिडेशन कार्येः फॉरवर्ड व्हॅलिडेशन डेटा पूर्ण करणे आणि बरेच काही

ते पुढे म्हणाले की, दोन दिवसांत संचमान्यता डाटा फॉरवर्ड करा, यूडायस (UDISE) नोंदी पूर्ण करा, व्हीएसके अ‍ॅपवर विद्यार्थी उपस्थिती नोंदवा, विद्यार्थी सुरक्षा प्रश्नावली पूर्ण करा आणि पाठवा, १०० % आधार व्हॅलिडेशन आणि अपार आयडी काम पूर्ण करा,
55 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Dec 22, 2025, 02:32 PM
नॅशनल हेराल्ड प्रकरणातील कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय मागे घेण्याची ईडीची मागणी

नॅशनल हेराल्ड प्रकरणातील कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय मागे घेण्याची ईडीची मागणी

दिल्ली उच्च न्यायालयातील सुनावणीवेळी ईडीच्या वतीने युक्‍तीवाद करताना सॉलिसिटर जनरल (एसजी) तुषार मेहताम्‍हणाले की, जर नॅशनल हेराल्ड प्रकरणातील कनिष्ठ न्यायालयाचा आदेश कायम ठेवला गेला, तर त्याचा अनेक प्रकरणांवर परिणाम होईल आणि त्याचबरोबर कनिष्ठ न्यायालयाने किती मोठी चूक केली आहे, हे देखील यातून दिसून येईल.
7 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Dec 16, 2025, 03:13 PM
पुणेः शिक्षक भरती नोंदणीसाठी पवित्र पोर्टल सुरू

पुणेः शिक्षक भरती नोंदणीसाठी पवित्र पोर्टल सुरू

पुणे:शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर नोंदणी केली जात असून, पात्र उमेदवारांनी वेळेत नोंदणी करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. यासाठी शिक्षण विभागाने अधिकृत https://tait2025.mahateacherrecruitment.org.in हे संकेतस्थळ देखील दिलेले आहे. टेट २०२४च्या प्रक्रियेनंतर आता टेट २०२५ साठी पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू झाली आहे. यामुळे राज्यातील हजारो पात्र शिक्षक उमेदवारांना संधी मिळणार आहे. भरतीसाठी पवित्र पोर्टल हेच अधिकृत माध्यम असणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत ही नोंदणी केली जात आहे. यासाठी पात्र उमेदवारांना संदेशही पाठविण्यात आला आहे. शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता, अचूकता आणि एकसंध प्रणाली राबविण्याच्या उद्देशाने पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू आहे. या पोर्टलवर उमेदवारांना वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, टीईटी, सीटीईटी तपशील तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती ऑनलाइन भरावी लागणार आहे. तत्पूर्वी अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करणे आवश्यक आहे. यात चुकीची माहिती भरल्यास पुढील टप्प्यात अडचणी येऊ शकतात, त्यामुळे सर्व तपशील योग्यरीत्या भरावेत, असेही आवाहन केले आहे.
29 shares
😐