Achira News Logo
Achira News
P
Pudhari
Mar 20, 2026, 09:20 AM
वडंगे ग्रामपंचायतीच्या अपुरी कचरा व्यवस्थापन पद्धतीवर टीका

वडंगे ग्रामपंचायतीच्या अपुरी कचरा व्यवस्थापन पद्धतीवर टीका

वडणगे ग्रामपंचायत प्रशासनाकडे कचरा डम्पिंगसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याने, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण होत नाही. तसेच कचऱ्याची वैधानिक विल्हेवाट लावण्यासाठी घनकचरा प्रकल्प नाही. स्थानिक प्रशासनाकडून हा कचरा गावाबाहेरील झाडवाट कुरण मंडळ येथील पूरप्रवण क्षेत्रात मोठ्या खड्ड्यात माती टाकून मुजवला जातो. यामुळे पंचगंगा नदीसह येथील शेती क्षेत्राला या कचऱ्यामुळे धोका निर्माण झाला असल्याच्या गंभीर प्रकाराकडे याचिकेतून न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. सोमवारी होणाऱ्या या याचिकेच्या सुनावणीकडे लक्ष लागले असून, न्यायालय यावर कोणते निर्देश देणार याबाबत उत्सुकता आहे.
14 shares
😢
P
Pudhari
Mar 20, 2026, 07:26 AM
भारत कोकण प्रदेशातील नद्यांवर तरंगणारे सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करणार

भारत कोकण प्रदेशातील नद्यांवर तरंगणारे सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करणार

(नदीच्या नैसर्गिक प्रवाहावर आधारित) असल्याने यात मोठ्या धरणांची किंवा विस्थापनाची समस्या येणार नाही. कोकणातील बारमाही वाहणाऱ्या नद्या आणि ओढ्यांवर हे प्रकल्प उभारून स्थानिक पातळीवर विजेची गरज भागवता येवू शकणार आहे.
90 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 06:10 AM
संभाजीनगर पालिकेच्या शाळेतील अनधिकृत बांधकामामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका

संभाजीनगर पालिकेच्या शाळेतील अनधिकृत बांधकामामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका

Sambhajinagar News: Encroachment near the municipal school destroyed छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :महापालिकेच्या कांचनवाडी येथील शाळेत ३०० हून अधिक विद्यार्थी असून, या शाळेच्या संरक्षण भींतीला लागून एकाने अनधिकृत बांधकाम सुरू केले आहे. या बांधकामामुळे शाळेची भिंत धोकादायक बनली असून, बुधवारी (दि. १८) महापालिका अतिक्रमण हटाव विभागाला माहिती मिळताच पथकाने अनधिकृत बांधकामासह शेड जमीनदोस्त केले. त्यासोबतच मालकी हक्काची जागा नसताना बांधकाम केल्यामुळे गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. परिसरात कांचनवाडी महापालिकेची शाळा आहे. या शाळेजवळ शेख अक्रम व काही लोकांनी मिळून २० हजार चौरस फूट जागेवर अतिक्रमण केले होते. या जागेवर मातीचा भराव टाकण्यात आला. त्यामुळे मनपा शाळेच्या भिंतीला अगोदर तडे गेले. हळूहळू भिंत कोसळू लागली. शाळेची तीन बाजूची भिंत कोसळली. शाळेतील मुलांच्या अंगावर ही भिंत को सळली नाही, ही सुदैवाची बाब आहे. याघटनेची माहिती मिळताच अतिक्रमण हटाव विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी पाहणी केली. अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला अगोदर मालकी हक्काची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. त्यांनी कागदपत्रे नसल्याची सांगितले. मातीचा भराव टाकून वॉचमनसाठी एक रूमही तयार केली होती. ही रूम मनपाच्या पथकाने जमीनदोस्त केली. अतिक्रमण करणाऱ्यांवर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वाहुळे यांनी दिली. यावेळी वॉर्ड अधिकारी अर्चना राजपूत, उपअभियंता जावेद काझी, इमारत निरीक्षक मुकेश खडसे आदी उपस्थित होते.
56 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 05:59 AM
ऐतिहासिक घसरणीनंतर सोने-चांदीच्या दरात घसरण

ऐतिहासिक घसरणीनंतर सोने-चांदीच्या दरात घसरण

Gold-Silver Price Today :गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ऐतिहासिक पडझडीनंतर, शुक्रवारी भारतीय सराफा बाजार आणि मौल्यवान धातूंशी संबंधित ईटीएफमध्ये जोरदार पुनरागमन पाहायला मिळाले. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या भूमिकेमुळे गुरुवारी ८ टक्क्यांपर्यंत कोसळलेल्या किमतींनी शुक्रवारी गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला.चांदीच्याभावात एकाच दिवसात ८,५०० रुपयांहून अधिक तेजी नोंदवण्यात आली, तर सोन्याचे दरही ३ टक्क्यांनी सावरले आहेत. ईटीएफ मार्केटमध्ये तेजीचे पुनरागमनशुक्रवारी बाजार उघडताच सोन्या-चांदीच्याम्युच्युअल फंड्स आणि ईटीएफमध्ये गुंतवणूकदारांची मोठी खरेदी दिसून आली. MCX आणि जागतिक बाजारातील चित्रदेशांतर्गत वायदा बाजारात शुक्रवारी किमतींनी उसळी घेतली. गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा 'गुरुमंत्र'सध्याच्या अस्थिर वातावरणात घाबरून जाण्याची गरज नसल्याचे मत बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.तज्ज्ञांच्या मते, किमतीत आलेली ही घसरण दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी खरेदीची सुवर्णसंधी आहे. सोने-चांदी हे नेहमीच सुरक्षित गुंतवणुकीचे साधन राहिले आहेत. बाजाराची 'टायमिंग' करण्यापेक्षा आपल्या पोर्टफोलिओमधील गुंतवणुकीचे प्रमाण योग्य राखण्यावर भर द्यावा.मध्य आशियातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाईचा धोका कायम आहे. त्यामुळे घसरणीच्या काळात दर्जेदार फंड्समध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक वाढवणे शहाणपणाचे ठरेल. वाचा -एकदाच गुंतवणूक करुन दरमहा ११,००० रुपये 'पेन्शन' मिळवा; SBI ची ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना (टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
93 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 05:44 AM
अवकाळी पावसाच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये गोंधळ

अवकाळी पावसाच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये गोंधळ

For the second consecutive day, unseasonal rains lashed the city and its surrounding areas छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: शहर व परिसरात बुधवारी (दि.१८) रात्री कोसळलेल्या अवकाळी पावसानंतर सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.१९) शहरासह परिसराला जोरदार पावसाने झोडपले. दिवसभर ढगाळ वातावरण, त्यानंतर रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह धुवांधार पाऊस झाला. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तर शहरातील सखल भागांत पाणी साचल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागला. शहराच्या तापमानाने ४० अंशांचा टप्पा गाठला. त्यानंतर बुधवारी रात्री अचानक शहर व परिसरात गारपिटीसह जोरदार अवकाळी पाऊस बरसला. या पावसाने सलग दुसऱ्या दिवशी गुरुव ारीही शहर व परिसरात हजेरी लावली. दिवसभर आकाश ढगांनी व्यापलेले होते. सूर्यदर्शन होत नसल्याने उष्णतेत घट झाली होती, मात्र संध्याकाळनंतर वातावरणात अचानक बदल झाला. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शहर व परिसरात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहरातील चिकलठाणा, सिडको, हडको, लेबर कॉलनी, ज्युबली पार्क, जालना रोड, औरंगपुरा, भावसिंगपुरा, छावणी, सातारा, देवळाई, शिवाजीनगर, पुंडलिकनगर, उस्मानपुरा व क्रांती चौक अशा सर्वच भागांत विजेच्या कडकडाटासह धुवांधार पाऊस झाला. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली. पावसाच्या या सरींमुळे शहरातील काही सखल भागांत पाणी साचले. तसेच रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. विशेषतः दुचाकीस्वारांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला. हवामानातील या बदलामुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली असून, वातावरणात गारवा जाणवत आहे. मात्र, सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकरीवर्गात चिंता व्यक्त होत आहे. काढणीच्या हंगामात पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या वादळी पावसामुळे शहरात वातावरणात गारवा आला असला तरी जनजीवनावर त्याचा काही प्रमाणात परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले. आणखी दोन दिवस पाऊस हवामान विभागाने पुढील एक-दोन दिवस अशाच ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्यावर न थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरासह परिसराला सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपले असून, जिल्ह्यातील फुलंब्रीसह काही गावांसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी काहीप्रमाणात गारा पडल्या. त्यामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा पिके आडवी पाडली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, रब्बी हगांमातील पिकांचे अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लाईट गुल शहरात रात्री साडेनऊच्या सुमारास पावसाला सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच विविध भागातील लाईट गुल झाली. त्यामुळे एकीकडे पावसाने हैराण झालेल्या नागरिकांना बत्ती गुल झाल्याने रात्र अंधारात काढावी लागली. सिडको एन-१ मध्ये झाडाला आग रात्री अचानक पावसाला सुरूवात होताच ढगांचा गडगटात वादळी वारा वाहण्यास सुरूवात झाली. या वादळी वाऱ्यामुळे सिडको एन-१ भागातील महावितरणच्या अति उच्च दाबाच्या विद्युत तारांचे एकमेकांना घर्षणाने झाडाला आग लागली. अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. मात्र, अग्निशमन दल पोहचण्यापूवीच नगरसेविका सुरेखा सानप याचे चिरंजीव विशाल सानप यांच्यासह परिसरातील नागरिकांनी धाव घेत झाडाला लागलेली आग विझवली. पुढील तीन तासांत पावसाचा संदेश पुढील ३ तासांत आपल्या जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता असून, नागरिकांनी सतर्क राहावे, असा संदेश प्रत्येकाच्या मोबाईलला येत होता. राज्य आपत्कालीन कार्य संचालन केंद्र, मंत्रालय, मुंबईकडून देण्यात येणाऱ्या सतर्कतेच्या संदेशामुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात काळजीचे वातावरण पहायला मिळाले. विशेषतः बाहेर जाणाऱ्या नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले.
81 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 05:27 AM
अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे पूर्व भारतातील पिकांवर परिणाम

अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे पूर्व भारतातील पिकांवर परिणाम

भुलेश्वर :पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दिवसभर तापमानात लक्षणीय वाढ झाली होती. दुपारनंतर अचानक जोरदार वाऱ्याला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग इतका होता की अनेक ठिकाणी कांदा बियाण्यांची पिके भुईसपाट झाली. सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह गारांचापाऊससुरू झाला. माळशिरस, टेकवडी, राजेवाडी, पारगाव आणि नायगाव या भागात गारपीट व वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. सुमारे एक तास चाललेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील कांदे, गहू, हरभरा आणि ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. याशिवाय आंब्याच्या झाडांवरील मोहर व कैऱ्या, डाळिंब, तसेच फुलझाडांचेही वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे. दरवर्षीप्रमाणे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पिसर्वे येथील प्रगतशील शेतकरी मच्छिंद्र आबा कोलते यांनी सांगितले की, मका, कडवळ, कांदा गोट बी, कलिंगड, काकडी, पालक आदी पिकांचे गारांमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.
67 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 05:02 AM
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा तडाखाः राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा तडाखाः राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचं संकट अजूनही कायम असून शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी परिस्थिती निर्माण झाली आहे.(Maharashtra Weather Update) गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेला पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नसून, हवामान विभागाने शुक्रवारी (२० मार्च) देखील राज्यातील अनेक भागांत पावसाचा इशारा दिला आहे. तब्बल १४ जिल्ह्यांत पावसाची शक्यता असून ६ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जाहीर करण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update) कोठे बरसणार सरी? IMD ने दिलेल्या माहितीनुसार,कोकण-गोवा विभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मध्यमहाराष्ट्रआणिमराठवाडाभागात काही ठिकाणी गारपीट, मेघगर्जना आणि ५० ते ६० किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान विभागाने, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता असल्याने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तापमानात चढ-उतार पुढील २४ तासांत राज्यातील कमाल तापमानात २-३ अंशांची घट होणार असून त्यानंतर पुन्हा ३-५ अंशांनी वाढ होईल. किमान तापमानातही १-२ अंशांची घट अपेक्षित आहे. हवामानातील या सततच्या बदलामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शनिवारीही पावसाचा इशारा अवकाळी पावसाचं हे संकट केवळ शुक्रवारीच नाही, तर शनिवार (२१ मार्च) रोजीही कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शेतमालाचे नुकसान वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईत कसे असेल हवामान? मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील. मात्र पहाटेच्या सुमारास हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान : ३१°C किमान तापमान : २२°C शेतकऱ्यांसाठी सल्ला अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः काढणीस तयार पिके आणि साठवलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे ही वाचा सविस्तर :Gudi Padwa Weather Alert : गुढीपाडव्याला 'या’ भागांत मुसळधार पाऊस आणि गारपीटीचा इशारा अधिक वाचा :Marathwada Irrigation Project : मराठवाड्याच्या दुष्काळावर मोठा उपाय; ३ सिंचन प्रकल्पांनी बदलणार चित्र!
21 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 04:56 AM
कमी दाबाचे क्षेत्र आणि पश्चिमेकडील चक्रीवादळामुळे भारतात मोठ्या प्रमाणात गारपीट

कमी दाबाचे क्षेत्र आणि पश्चिमेकडील चक्रीवादळामुळे भारतात मोठ्या प्रमाणात गारपीट

गरम जमीन, थंड हवा अन्‌‍ जोरदार वाऱ्यामुळे गारपीट पुणे :राज्यातील बहुतांश भागात गत दोन दिवसांपासून गारपिटीसह पाऊस सुरू आहे. गरम जमीन, थंड हवा, जोरदार वारे यांसह कमी दाबाचा पट्टा अन्‌‍ पश्चिमी चक्रावाताचा हा परिणाम असल्याचे मत हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, गुरुवारप्रमाणे शुक्रवारीही बहुतांश भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात तयार झाला आहे. तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने देशातील बहुतांश भागात गारपीट, पाऊस, वादळी वारे असे पावसाळी वातावरण तयार झाले आहे. या अवकाळी पावसाचा जोर विदर्भ व मराठवाड्यात जास्त आहे. कारण या भागात हवेचा दाब कमी झाला आहे. हा पाऊस गत दोन दिवसांपासून सुरू असून शक्रवारपर्यंत सुरू राहणार आहे. या भागात वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 कि.मी. इतका आहे. कोकण अन्‌‍ मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी आहे.
94 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 04:52 AM
अवकाळी पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्यात गारपीट

अवकाळी पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्यात गारपीट

गुरुवारी सायंकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी, वांगी, रानमसले, कळमण, बीबी दारफळ, वडाळा, बाणेगाव, मार्डी या परिसरामध्ये अवकाळी पावसाने कहर केला. गुरुवारी (ता. १९) रात्री सव्वा अकराच्या सुमारास वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. जवळपास एक तास हा वादळी वाऱ्यासह पाऊस पडत होता. त्यामध्ये अंकुश सिरसट यांची तीन एकर द्राक्षबाग जमीनदोस्त झाली आहे.
27 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 04:32 AM
प्रदूषणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईचा वायू गुणवत्ता निर्देशांक 100 वर पोहोचला

प्रदूषणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईचा वायू गुणवत्ता निर्देशांक 100 वर पोहोचला

प्रदूषणात वाढ चार दिवसांनंतर मुंबईचा सरासरी एक्यूआय शंभरीपार (102) गेला. कुलाब्यानंतर माझगाव (150), मालाड (146) आणि महालक्ष्मी (144) आणि विक्रोळी येथील कन्नमवार नगर 2 (124) आदी भागांमध्ये प्रदूषणाचा टक्का वाढत आहे. 15 ते 18 मार्च या कालावधीत मुंबईचा सरासरी एक्यूआय 73 ते 90 दरम्यान होता. त्यात आता 12 अंकांनी वाढ झाली.
51 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 04:20 AM
रायगड पोलिसांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चवदार तलावात वाहिली श्रद्धांजली

रायगड पोलिसांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चवदार तलावात वाहिली श्रद्धांजली

आज सकाळी साडेआठ वाजता रायगड पोलीस दलातर्फे 21 पोलीस कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चवदार तळ्याच्या प्रांगणा मध्ये मानवंदना दिली.
14 shares
😊
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 04:16 AM
सहा तालुक्यांमध्ये पिकांचे नुकसान नोंदवलेः एकूण प्रभावित क्षेत्र 844.7 हेक्टर आहे

सहा तालुक्यांमध्ये पिकांचे नुकसान नोंदवलेः एकूण प्रभावित क्षेत्र 844.7 हेक्टर आहे

बाधित तालुका ः क्षेत्र ः नुकसान झालेली पिके हवेली ः 170 ः गहू, कांदा, भाजीपाला, डाळिंब राजगड ः 3.70 ः गहू, कांदा, भाजीपाला, काकडी, कलिंगड दौंड ः 110.20 ः हरभरा, केळी, गहू, कांदा, भाजीपाला, फुले पुरंदर ः 389.80 ः गहू, कांदा, भाजीपाला, फळ, फुल, चारापिके शिरूर ः 93 ः गहू, कांदा, भाजीपाला, फळपिके भोर ः 78 ः गहू, कांदा, भाजीपाला एकूण 6 तालुके ः 844.70
89 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 03:49 AM
अवकाळी पावसामुळे या भागातील कांद्याच्या पिकाची गुणवत्ता धोक्यात

अवकाळी पावसामुळे या भागातील कांद्याच्या पिकाची गुणवत्ता धोक्यात

कांदा पिकासाठी काढणीनंतरचे हवामान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. काढलेला कांदा काही काळ उन्हात वाळवणे आवश्यक असते; मात्र याच काळात पाऊस झाल्यास कांद्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती असते. कांदा ओला झाल्यास तो कुजणे, काळपट पडणे, वजन घटणे तसेच बाजारभावात घसरण होणे अशा अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आधीच उत्पादन खर्चाचा बोजा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. बुधवारी सकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. दुपारनंतर अनेक ठिकाणी ढग दाटून आल्याने अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली. त्यामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. काहींनी कांद्याच्या ढिगांवर प्लास्टिक कागद टाकले, तर काहींनी उपलब्ध साधनसामग््राीच्या मदतीने कांदा झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला.
11 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 03:35 AM
भारतात मधमाशी काढताना झाडावरून पडून व्यक्तीचा मृत्यू

भारतात मधमाशी काढताना झाडावरून पडून व्यक्तीचा मृत्यू

नसरापूर (ता. भोर) येथील बनेश्वर मंदिराबाहेरील वनविभागाच्या हद्दीतील असणाऱ्या झाडावरील मधमाशांचे पोळे काढताना विष्णू मारुती पवार हा पडून मृत्युमुखी पडला. ही घटना बुधवारी (दि. 18) रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली आहे. पोळे काढण्यासाठी हजर असलेले इतरांनी झाडावरून पडलेल्या विष्णू पवार याला नसरापूर येथील एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून ससून येथे उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, घटनास्थळी सत्यशोधक बहुजन आघाडीचे राज्याचे सचिव गणपत काटेकर यांनी पाहणी करून मृत्युमुखी पडलेल्या मयत विष्णू पवार याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देणार असल्याची भूमिका घेतली.
1 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 20, 2026, 03:21 AM
पावसामुळे पुण्याला उष्णतेपासून दोन दिवसांचा दिलासा

पावसामुळे पुण्याला उष्णतेपासून दोन दिवसांचा दिलासा

म.टा. प्रतिनिधी, पुणे:शहराच्या वेगवेगळ्या भागांत दुपारी झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने सलग दुसऱ्या दिवशी उन्हाची तीव्रता जाणवली नाही. दुपारनंतर ऊन आणि ढगाळ वातावरण असा खेळ सुरू होता. संध्याकाळी गार वारा सुटल्याने आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळाले. त्यामुळे पाडव्याच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांना उन्हाचा त्रास झाला नाही. पुणे शहराप्रमाणे जिल्ह्याच्या काही भागातही पावसाने हजेरी लावली.पावसामुळे उन्हाचा तडाखा कमीविदर्भ, मराठवाड्यामध्येगेल्या आठवड्यात उष्णतेची लाट आली होती; तर पुण्यामध्ये तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली होती. दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मार्चमध्ये एवढा तीव्र उन्हाळा; तर एप्रिलमध्ये काय होणार, अशी शहरात चर्चा सुरू असताना हवामानातील घडामोडींमुळे बुधवारी वातावरण बदलले. भोर, वेल्हे, नसरापूर भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. पुण्यातही काही भागात पावसाच्या सरी बरसल्या, त्यामुळे उन्हाचा तडाखा कमी झाला.Unseasonal Rain: राज्यात अवकाळी, गारपिटीचा मारा; नाशिक, मराठवाड्यात पिकांचे नुकसान, पुण्यातही हजेरीगुरुवारीदेखील सकाळी काही भागात आकाश अंशतः ढगाळ होते. दुपारी दीडच्या सुमारास कोथरूड, कर्वेनगर, वारजे माळवाडी, सिंहगड रस्त्यावर पावसाच्या हलक्या सरी पडल्या. गुढीपाडव्याची सुट्टी असल्याने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची काही वेळासाठी धांदल उडाली; पण मध्यवर्ती पुण्यात बाजारपेठांमध्ये पाऊस नसल्याने नागरिकांनी खरेदीचा मुहूर्त चुकवला नाही. दुपारनंतर सगळीकडेच ढगाळ वातावरण होते. दिवसभरात कमाल ३४ आणि किमान १९.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. सर्वाधिक तापमान ३६.३ अंश सेल्सिअस लोहगावमध्ये नोंदवले गेले. सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरमध्येही पाऊस पडला.लातूरमध्ये गारपीट झाली.खेड तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची अवकाळी पावसाने कांदा झाकून ठेवताना प्रचंड धावपळ उडाली; तर अनेक ठिकाणी काढणीला आलेला कांदा, गहू पिकाचेदेखील नुकसान झाले.Gudi Padwa Unseasonal Rain : गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा हाहाकार, धाराशिव, जालना, सांगलीत गारपिटीचा तडाखा; शेतकरी हवालदिलठराविक ठिकाणीच पाऊस का?पावसाळ्यात ढग मोठ्या आकारात तयार झालेले असल्याने एकाच वेळी सर्वदूर सरी बरसतात; पण उन्हाळ्यातील ढग आकाराने लहान असतात. ज्या भागात ढग तयार होतात, तेथे ते बरसतात, त्यामुळे प्रत्येक वेळी संपूर्ण शहरात एकाच वेळी पाऊस पडतोच असे नाही. त्यामुळे दोन दिवसांपासून काही भागात जोरात पाऊस तर काही ठिकाणी केवळ ढगाळ वातावरण असे चित्र बघायला मिळाले. गुरुवारी कोथरूड, वारजे माळवाडी भागात पाऊस पडला; तर मध्यवर्ती पेठा कोरड्या होत्या. पुढील दोन दिवस शहरात दुपारनंतर आकाश ढगाळ राहणार असून, काही भागातढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यताआहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिली.
95 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 03:13 AM
शहरात हलका पाऊस, वेधशाळेने नोंदवला मुसळधार पाऊस नाही

शहरात हलका पाऊस, वेधशाळेने नोंदवला मुसळधार पाऊस नाही

शहरात बुधवारी सायंकाळी हलक्या पावसाने हजेरी लावली. गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे दुपारी 1 च्या सुमारास हलका ते मध्यम पाऊस झाला. पावसाचा फार जोर नसल्याने वेधशाळेत पावसाची नोंद झाली नाही.
73 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 01:56 AM
सुपर एल निनो इव्हेंटमुळे जागतिक हवामान पद्धती विस्कळीत होणार

सुपर एल निनो इव्हेंटमुळे जागतिक हवामान पद्धती विस्कळीत होणार

‌‘सुपर अल निनो‌’चा प्रभाव केवळ भारतापुरता मर्यादित राहणार नाही. पश्चिम अमेरिकेमध्ये भीषण उष्णता आणि जंगलातील आगीच्या घटना वाढू शकतात. पॅसिफिक महासागरात चक्रीवादळांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, तर अटलांटिक क्षेत्रात ती कमी राहू शकते. चीन, जपान आणि फिलिपिन्ससारख्या देशांना शक्तिशाली टायफूनचा सामना करावा लागू शकतो. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियामध्ये तीव दुष्काळाची स्थिती निर्माण होऊ शकते, तर दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि इक्वाडोरमध्ये ढगफुटीसारखा पाऊस आणि विनाशकारी महापूर येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
13 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 01:10 AM
अवकाळी पावसामुळे या भागातील कापणी केलेल्या पिकांची नासधूस

अवकाळी पावसामुळे या भागातील कापणी केलेल्या पिकांची नासधूस

तालुक्यातील झरे आणि आसपासच्या भागात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू आणि हरभरा ही काढणीला आलेली पिके भिजली आहेत. काही ठिकाणी मळणीची कामे सुरू असतानाच पावसाने धडक दिल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. या अस्मानी संकटाचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला आहे. डाळिंब व द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी डाळिंबाची फळे गळून पडली आहेत. काही भागात झाडे उन्मळून पडल्याने बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याशिवाय चाऱ्याचेही नुकसान झाल्याने जनावरांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
66 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 01:00 AM
द्राक्ष शेतकऱ्याच्या वाया गेलेल्या प्रयत्नांचे वर्षः आर्थिक आणि भावनिक अवशेष

द्राक्ष शेतकऱ्याच्या वाया गेलेल्या प्रयत्नांचे वर्षः आर्थिक आणि भावनिक अवशेष

तीन एकर बाग तोडून टाकली हवामानातील अनियमितता आणि रोगराईमुळे यावर्षी त्यांच्या तीन एकर बागेला द्राक्षेच लागली नाहीत. त्यामुळे संपूर्ण वर्षभराचा खर्च वाया गेला. शेवटी निराश होऊन त्यांनी संपूर्ण द्राक्षबाग तोडून टाकली. ही घटना त्यांच्या मानसिक स्थितीवर मोठा आघात करणारी ठरली.
64 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 12:51 AM
मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे जिल्ह्याला फटका, पिकांचे मोठे नुकसान

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे जिल्ह्याला फटका, पिकांचे मोठे नुकसान

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. गुरुवारी अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा आणि ज्वारी या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. द्राक्ष बागांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. पालेभाज्या आणि इतर फळभाज्यांचेही नुकसान झाल्याने बाजारपेठेतील आवक आणि दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
77 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 12:42 AM
अचानक आलेल्या पावसामुळे भारतीय शेतकऱ्यांना दिलासा आणि नुकसान

अचानक आलेल्या पावसामुळे भारतीय शेतकऱ्यांना दिलासा आणि नुकसान

घराच्या वळचणीवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. चार महिन्यांपासून उन्हाचे चटके कमी अधिक प्रमाणात जाणवत होते. गुरूवारी पुदपारी पावसाने अचानक हजेरी लावली. उंडाळे, ओंड,नांदगाव,टाळगाव,घोगाव,साळशिरंबे, मनू,जिंती,तुळसण,सवादे यासह परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक सुरू झालेल्या पावसाने रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
42 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 12:02 AM
उत्तर सोलापूर जिल्ह्यात पावसानं पिकांना झोडपून काढले

उत्तर सोलापूर जिल्ह्यात पावसानं पिकांना झोडपून काढले

उत्तरमध्ये गहू, हरभरा पिकांना फटका उत्तर सोलापूर :द्राक्ष बागेचा माल बेदाणा रॅकवर टाकला आणि संध्याकाळी अवकाळी पावसाला सुरुवात झाली. रॅकवरील द्राक्षाचा माल भिजू नये, यासाठी त्यावरील कागद ओढताना शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अवकाळी पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील द्राक्ष, ज्वारी, गहू, आंबा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पडसाळी, वांगी, कळमण, रानमसले, वांगी, वडाळा या गावांमध्ये अवकाळला सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपला द्राक्षाचा माल बेदाणा करण्यासाठी बेदाणा रॅकवर टाकला आहे.
85 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 19, 2026, 11:36 PM
एलिसीः विद्युत सायकलींमधील युरोपचा नवीनतम शोध प्रदूषण आणि गर्दी हाताळतो

एलिसीः विद्युत सायकलींमधील युरोपचा नवीनतम शोध प्रदूषण आणि गर्दी हाताळतो

लंडन :वाढते प्रदूषण आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर मात करण्यासाठी जगभरात नवनवीन प्रयोग होत आहेत. याच पार्श्वभूमीवर, कार आणि सायकलचे उत्तम मिश्रण असलेली ‌‘एलेसी‌’ ( Elecy) नावाची एक अनोखी इलेक्ट्रिक सायकल युरोपमध्ये विकसित करण्यात आली आहे. दिसायला एखाद्या छोट्या कारसारखी वाटणारी ही सायकल सध्या ऑटोमोबाईल विश्वात चर्चेचा विषय ठरली आहे. सामान्य सायकलींना दोन चाके असतात; मात्र ‌‘एलेसी‌’ला चार चाके देण्यात आली आहेत. यामुळे सायकल चालवताना समतोल राखण्याची कसरत करावी लागत नाही. थांबल्यावर पाय खाली टेकवण्याचीही गरज पडत नाही, ज्यामुळे ती अत्यंत सुरक्षित आणि स्थिर मानली जाते.
94 shares
😊
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 19, 2026, 01:57 PM
महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रांमध्ये अवकाळी पावसाचा कहर

महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रांमध्ये अवकाळी पावसाचा कहर

मुंबई :आज सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह, नववर्षाचे स्वागत आणि मांगल्याचे वातावरण असतानाच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. धाराशिव, जालना, वाशिम, नांदेड आणि सांगली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. सोसाट्याचा वारा आणि गारांच्या वर्षावामुळे रब्बी पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले असून, सणाच्या दिवशीच बळीराजावर चिंतेचे मोठे संकट ओढावले आहे.धाराशिव: वाशी तालुक्यात गारांचा वर्षावधाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्याला आज सायंकाळी ६ च्या सुमारास अवकाळी पावसाने झोडपून काढले. इंदापूर, खानापूर, तेरखेडा, वाशी, बोरी आणि गोलेगाव परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली. यामध्ये उभी ज्वारी, गहू, हरभरा आणि काढणीस आलेला कांदा भूईसपाट झाला आहे. याशिवाय आंबा आणि द्राक्ष बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, कलिंगड आणि पालेभाज्याही गारांच्या माऱ्याने उद्ध्वस्त झाल्या आहेत.जालना: शहरासह ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीतजालना जिल्ह्यात हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला. परतूर, मंठा, बदनापूर आणि जालना शहरात सायंकाळी ५ च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत नागरिकांची धावपळ उडाली. अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून झोपडपट्टी भागातील नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य भिजल्याने त्यांचे हाल झाले. गहू, हरभरा, मका यासह मोसंबी आणि केळीच्या बागांना या पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.Akola Crime : 'तू माझ्याकडे का पाहतोस?'; चहा टपरीवर वाद, तीन जणांचा हल्ला, 17 वर्षांच्या माविशचा जीव गेलावाशिम आणि अर्धापूर: पिकांचे कंबरडे मोडलेवाशिम जिल्ह्यात दुपारच्या सुमारास झालेल्या पावसाने वातावरणात गारवा आणला असला, तरी शेतकऱ्यांसाठी हा पाऊस 'काळ' ठरला आहे. येथे बिजवाई कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काढणीला आलेला गहू आणि हरभरा गारांच्या माऱ्यामुळे जमिनीदोस्त झाला आहे.अर्धापूर (नांदेड):अर्धापूर तालुक्यातील चाबरा शिवारात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात पावसाने हजेरी लावल्याने पाहुण्यांची मोठी तारांबळ उडाली. हळद, गहू आणि हरभरा पिकांचे येथे मोठे नुकसान झाले आहे.सांगली: पळशीच्या द्राक्ष बागायतदारांना तडाखासांगलीच्या खानापूर घाटमाथ्यावर निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. भिवघाट, हिवरे आणि पळशी परिसरात भीषण गारपीट झाली. पळशी हे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी ओळखले जाते. छाटणीसाठी तयार असलेल्या आणि काढणीवर आलेल्या द्राक्ष मण्यांना गारांमुळे तडे गेल्याने बागायतदारांचेलाखोरुपयांचे नुकसान झाले आहे.बळीराजाची मागणी: पंचनामे तातडीने करानिसर्गाच्या या अवकृपेमुळे सणासुदीच्या काळात शेतकरी वर्ग पूर्णपणे खचला आहे. "दिवस-रात्र कष्ट करून पिकवलेली पिके डोळ्यादेखत मातीमोल होताना पाहून आता जगायचे कसे?" असा सवाल शेतकरी विचारत आहेत. प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी, अशीमागणीआता जोर धरत आहे.
17 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 19, 2026, 12:28 PM
ओहायोच्या लोरेन तलावावर शक्तिशाली उल्कापिंडाचा स्फोट

ओहायोच्या लोरेन तलावावर शक्तिशाली उल्कापिंडाचा स्फोट

वॉशिंग्टन - दररोज अनेक उल्का पृथ्वीच्या वातावरणात आदळतात आणि रात्रीच्या वेळी अनेकदा तेजस्वी प्रकाशाच्या झोतांच्या रूपात दिसतात. पण मंगळवारी अमेरिकेच्या ओहायो राज्यातील क्लीव्हलँडमध्ये जे घडले त्याने स्थानिकांना चकित केले. स्थानिकांनी इथं एक मोठा आवाज ऐकला, ज्याची तुलना काहींनी एका शक्तिशाली स्फोटाशी केली. ही एक शक्तिशाली उल्का होती. याहूनही विशेष गोष्ट म्हणजे ती दिवसा दिसली, जेव्हा त्या जवळजवळ पूर्णपणे अदृश्य असतात. शेकडो किलोमीटर दूर बसलेल्या लोकांनी आगीचा गोळा पाहिल्याचे समोर आले. सकाळी ९ वाजता ही घटना घडली. अमेरिकन मेटिअर सोसायटीने सांगितले की, त्यांना विस्कॉन्सिन ते मेरीलँडपर्यंत परिसरात उल्का दिसल्याची माहिती मिळाली. अमेरिकेची अंतराळ संस्थानासाच्यामेटिओरॉइड एन्व्हायर्नमेंट ऑफिसनेही याची पुष्टी केली. ही वस्तू एक घन लघुग्रह होती, ज्याचा व्यास अंदाजे ६ फूट आणि वजन ७ टन होते. मिळालेल्या माहितीनुसार, ही वस्तू ताशी अंदाजे ७२,४०० किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या वातावरणात शिरली. हा उल्कापिंड सर्वप्रथम लोरेनजवळ एरी सरोवराच्या सुमारे ८० किलोमीटरवर दिसला. वरच्या वातावरणातून जाताना तो वेगाने दक्षिण पूर्व दिशेकडे सरकला. २५० TNT इतका स्फोट ओहायोच्या सुमारे ४८ किलोमीटर उंचीवर उल्कापिंड फुटले आणि त्यातून बाहेर पडलेली ऊर्जा विनाशकारी होती. हवेत झालेल्या या स्फोटातून २५० टन टीएनटीच्या स्फोटाइतकी ऊर्जा बाहेर पडली. हे एका अत्यंत मोठ्या मिलिट्री ग्रेड स्फोटाच्या बरोबरीचे होते असंनासानेअंदाज लावला. या स्फोटातून निघालेला प्रकाश इतका प्रखर होता की वॉशिंग्टनसह अमेरिकेतील किमान १० राज्यांतील आणि कॅनडातील ओंटारियोमधील लोकांनी ते पाहिले. हे खरोखरच एका आगीच्या गोळ्यासारखे दिसत होते असं अमेरिकन मेटिअर सोसायटीचे कार्यकारी संचालक खगोलशास्त्रज्ञ कार्ल हर्गेनरोथन यांनी सांगितले. शिवाय क्लीव्हलँडमधील राष्ट्रीय हवामान सेवेच्या कर्मचाऱ्यांनीही एक मोठा स्फोट ऐकला आणि त्यांना कंपने जाणवल्याचे म्हटलं. NASA reports a 7-ton meteor broke apart over northern Ohio around 9AM local time ☄️pic.twitter.com/XGBELHJ6em पृथ्वीला धोका या उल्कापिंडाबद्दलची सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे याबाबत कुणालाही कल्पना आली नाही. नासा आणि इतर संस्था पृथ्वीजवळून जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवतात पण त्यांना याचा शोध लागला नाही. या उल्कापिंडाने पृथ्वीच्या ग्रहीय संरक्षण प्रणालीला चकमा दिला आणि तो पृथ्वीत शिरला. २५० टन टीएनटीच्या स्फोटाएवढा स्फोट घडवण्यास सक्षम असलेला खडक कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय एखाद्या लोकवस्तीच्या भागावर आदळू शकतो असा भविष्यात एक धोका यामुळे निर्माण झाला आहे.
9 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Mar 19, 2026, 11:21 AM
गारपिटीच्या वादळामुळे स्थानिक भागात हावोकची नासधूस

गारपिटीच्या वादळामुळे स्थानिक भागात हावोकची नासधूस

आज दुपारी बारा वाजल्यानंतरच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते अचानक हवेत गारवा निर्माण झाला आणि लगोलग मोठ्या गारा पडू लागल्या. बघता बघता शेतात, रस्त्यांवर, घरांवर, छपरांवर गारा पडू लागल्या. छोट्या बोरा एवढ्या पडलेल्या गारपिटीमुळे हातात तोंडाशी आलेली द्राक्षे अक्षरशः सडा मारतात त्याप्रमाणे जमिनीवर खाली पडली.
89 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 19, 2026, 10:46 AM
रुग्णालयांमधील पर्यावरणपूरक सांडपाणी व्यवस्थापनासाठी भारत सरकार वचनबद्ध

रुग्णालयांमधील पर्यावरणपूरक सांडपाणी व्यवस्थापनासाठी भारत सरकार वचनबद्ध

मुंडे म्हणाल्या, शासकीय रुग्णालयांमध्ये पर्यावरणपूरक आणि आधुनिक सांडपाणी व्यवस्थापन प्रणाली उभारण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मुंबईतील प्रमुख शासकीय रुग्णालयांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन व पर्यावरणीय निकषांचे पालन होण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जात आहे.
55 shares
😊
Lokmat logo
Lokmat
Mar 19, 2026, 10:14 AM
एकरकमी रक्कम विरुद्ध एस. आय. पी.: बाजारातील सुधारणांमुळे गुंतवणुकीची संधी उपलब्ध

एकरकमी रक्कम विरुद्ध एस. आय. पी.: बाजारातील सुधारणांमुळे गुंतवणुकीची संधी उपलब्ध

Lumpsum vs SIP :गेल्या काही महिन्यांपासूनशेअर बाजारातसुरू असलेल्या अस्थिरतेने आणि अलीकडच्या 'करेक्शन'ने सामान्यगुंतवणूकदारांनासंभ्रमात टाकले होते. मात्र, बाजार विश्लेषकांच्या मते, ही घसरण म्हणजे धोका नसून गुंतवणुकीची एक उत्तम संधी आहे. जागतिक अनिश्चिततेमुळे जेगुंतवणूकदारआतापर्यंत बाजारापासून दूर होते, त्यांच्यासाठी आता 'व्हॅल्यूएशन' रास्त स्तरावर आले असून, एकरकमी गुंतवणुकीसाठी वातावरण पोषक झाले आहे. ऐतिहासिक सरासरीच्या खाली 'व्हॅल्यूएशन' एकरकमी गुंतवणुकीसाठी 'लार्ज-कॅप'ला पसंती जोखीम टाळण्यासाठी 'बॅलन्स्ड' धोरण वाचा -कतारचा गॅस 'होर्मुज'मध्ये अडकला! भारतासमोर कोणते पर्याय? तुमच्या स्वयंपाकघरातील बजेट कोलमडणार? (टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही.शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
49 shares
😢
L
Lokmat
Mar 19, 2026, 09:54 AM
एम-सँड प्रकल्प सातारा येथे सुरूः वाळूची कमतरता आणि पर्यावरणीय समस्यांवरील उपाय

एम-सँड प्रकल्प सातारा येथे सुरूः वाळूची कमतरता आणि पर्यावरणीय समस्यांवरील उपाय

सातारा : पर्यावरणाचा समतल आणि वाळू टंचाईवर उपाय असणारा एम-सँड प्रकल्प शिरगाव (ता. कराड) येथील तरुण उद्योजक धैर्यशील पाटील यांनी सुरू केला आहे. राज्यातील हा पहिला प्रकल्प असल्याने महसूल मंत्रीचंद्रशेखर बावनकुळेयांनी उपक्रमाचे कौतुक केले आहे. दरम्यान, प्रकल्पाला जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी अधिकृत पत्र दिले आहे.नद्यांमधील वाळू उपशामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. यावर उपाय म्हणून शासनाने २३ मे २०२५ रोजी ‘एम-सँड’ धोरण जाहीर केले होते. याच धोरणांतर्गत शिरगाव येथील गट नं. १७३ मधील क्षेत्र ०.४४.५० हे. आर.वर हा प्रकल्प आकारास येत आहे.युवा उद्योजक धैर्यशील पाटील यांनी या नावीन्यपूर्ण प्रकल्पासाठी पुढाकार घेतला असून, राज्यात सातारा जिल्हा एम-सँड निर्मितीत आघाडीवर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकल्पामुळे बांधकामासाठी दर्जेदार आणि पर्यावरणपूरक कृत्रिम वाळू उपलब्ध होणार असून, नदीपात्रातील वाळूवरील ताण कमी होण्यास मदत होईल. महसूल विभागाच्या एम-सँडचे धोरणाचा फायदा उद्योजकांनी घेतला पाहिजे. नवीन उद्योग यामुळे उभे राहतील आणि वाळूवरील अवलंबित्व संपेल. तसेच पर्यावरणाचेही रक्षण होईल. तसेच घरांची भक्कमता अधिक वाढणार आहे. -धैर्यशील पाटील, उद्योजक पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन या दृष्टीने एम-सँड प्रकल्प महत्त्वाचे आहेत. प्रत्येक जिल्ह्यात किमान १०० प्रकल्पांना मान्यता देणार असून, वीज आणि रॉयल्टीमध्येही सवलत दिली आहे. जास्तीत जास्त तरुण उद्योजकांनी या उद्योगाकडे वळावे. -चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री, महाराष्ट्र
50 shares
😊
P
Pudhari
Mar 19, 2026, 09:42 AM
एच. डी. एफ. सी. बँकेच्या अध्यक्षांच्या अचानक राजीनाम्यामुळे बाजारात खळबळ

एच. डी. एफ. सी. बँकेच्या अध्यक्षांच्या अचानक राजीनाम्यामुळे बाजारात खळबळ

विशेष म्हणजे, HDFC बँकेच्या चेअरमनच्या अचानक राजीनाम्याने बाजारातील वातावरण अधिकच नकारात्मक झालं. आधीच जागतिक दबावाखाली असलेल्या बाजाराला या बातमीचा मोठा धक्का बसला आणि गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झाला.
70 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 19, 2026, 09:26 AM
भारतीय शेअर बाजारात घसरण, गुंतवणूकदारांना मोठा तोटा, शेअर बाजारात 2164 अंकांची घसरण

भारतीय शेअर बाजारात घसरण, गुंतवणूकदारांना मोठा तोटा, शेअर बाजारात 2164 अंकांची घसरण

Stock Market Crash Live Updates:शेअर बाजारामध्येआज चौफेर घसरण पाहायला मिळत असूनगुंतवणूकदारांचंमोठं नुकसान झालंय. बीएसई (BSE) चा ३० शेअर्सचा निर्देशांक 'सेन्सेक्स' २१६४ अंकांची मोठी डुबकी लगावून ७४,५३९ च्या पातळीवर आला आहे. त्याचप्रमाणे निफ्टी ६७२ अंकांच्या घसरणीसह २३,१०५ वर पोहोचला आहे. निफ्टी मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकातही २ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवण्यात आली. विशेष म्हणजे, निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी केवळ ओएनजीसी (ONGC) हा एकच शेअर ग्रीन झोनमध्ये आहे, तर सेन्सेक्समधील सर्व ३० शेअर्स रेड झोनमध्ये व्यवहार करत होते. दरम्यान, यामुळेगुंतवणूकदारांचं८.५ लाख कोटींहून अधिकचं नुकसान झालं. भारतीय बाजारपेठेत आलेल्या या भूकंपामुळे अनेक दिग्गज आणि मिडकॅप शेअर्समध्ये तीव्र विक्री दिसून आली. सेन्सेक्सवर इटरनल ५.४६%, बजाज फायनान्स ५.३४%, महिंद्रा अँड महिंद्रा ४.८६%, एलअँडटी ४.५७%, एचडीएफसी बँक ४.३५%, इंडिगो ४.२१% आणि बजाज फिनसर्व्ह ४.०८ टक्क्यांनी घसरले आहेत. केमिकल क्षेत्रातील कंपनी 'कॅमलिन फाईन सायन्सेस'मध्ये सर्वाधिक ६.८७% घसरण झाली असून तो शेअर १२०.६० रुपयांवर आला आहे, तर फार्मा क्षेत्रातील दिग्गज कंपनी सिप्लामध्येही २ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. क्षेत्रीय नुकसानीचा विचार करता, निफ्टी ऑटो ४.१% पेक्षा जास्त कोसळला आहे. रिअल्टी क्षेत्रात ३.४% तर मेटल, आयटी, कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि बँकिंग निर्देशांकात सुमारे ३ टक्क्यांची घसरण झाली. मध्य पूर्वेतील संघर्षा मुळे तेल आणि वायूच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे महागाई वाढण्याची आणि आर्थिक विकासावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे, ज्याचा दबाव जागतिक इक्विटी मार्केटवर दिसून येत आहे. युरोपचा 'स्टॉक्स ६००' १.२ टक्क्यांनी घसरून या वर्षातील सर्वात खालच्या स्तरावर आला आहे, तर MSCI आशिया पॅसिफिक इंडेक्समध्ये २.७% आणि उदयोन्मुख बाजारपेठेतील इक्विटीमध्ये २.६% घट झाली आहे. सोन्या-चांदीच्या दरात भूकंप; ₹१३,००० नं आपटले चांदीचे दर; Gold च्या दरातही मोठी घसरण कच्च्या तेलाच्या किमतीतील तेजी कायम असून ब्रेंट क्रूड सुमारे ५.७ टक्क्यांनी वधारून ११३ डॉलर प्रति बॅरलच्या वर पोहोचलं आहे. युद्ध सुरू झाल्यापासून यात सुमारे ४८ टक्क्यांची वाढ झाली. एका महत्त्वाच्या एलएनजी निर्यात केंद्राचं नुकसान झाल्यामुळे युरोपियन नॅशनल गॅसच्या किमतीत ३५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, यामुळे पुरवठा विस्कळीत होण्याची चिंता अधिक गडद झाली आहे.
4 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 19, 2026, 07:42 AM
साकरी तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका, भुईमूग पिकांचे नुकसान

साकरी तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका, भुईमूग पिकांचे नुकसान

गेल्या काही दिवसांपासून वर्तवण्यात आलेला अवकाळी पावसाचा अंदाज अखेर खरा ठरला असून, बुधवारी सायंकाळी धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील अनेक भागांना वादळी पावसाने झोडपून काढले. तालुक्यातील नांदवन शेतशिवारात तब्बल एक तास झालेल्या पावसामुळेकांदापिकाचे नुकसान झाले. बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार एन्ट्री केल्याने ग्रामस्थांची व शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. नांदवन परिसरात पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, शेतात काढून ठेवलेला आणि उभा असलेलाकांदापाण्यात भिजला. यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीतीशेतकरीसिकंदर अहिरे व चेतन पाटील यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामुळे हिरावला जातो की काय, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. ढगाळ हवामान अजूनही कायम असल्याने काढणीला वेग आला असला तरी, पावसाच्या अनिश्चिततेमुळेशेतकरीहवालदिल झाला आहे. प्रशासनाने या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. रब्बी हंगामातील पिके गहू, हरभरा पिकांचेही नुकसान सध्या रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या पिकांच्या काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अनेक ठिकाणी ही पिके काढणीसाठी तयार आहेत, तर काही ठिकाणी मळणीची कामे सुरू आहेत. अशा स्थितीत आलेल्या पावसामुळे गहू व हरभरा काढणीला आलेली पिके भिजल्याने दाण्यांचा दर्जा खराब होण्याची शक्यता आहे. नांदवण परिसरात तासभर झाला वादळीपाऊस •तालुक्यातील नांदवण परिसराला अवकाळीचा मोठा तडका बसला. सुमारे तासभर झालेल्या पावसामुळे परिसरातील कांदा पिकाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्यामुळे परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला. • शेतात साठवून ठेवलेला माल सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकरी ताडपत्रीचा आधार घेत असून, पावसापासून पीक वाचवण्यासाठी मोठी धडपड सुरू होती. हेही वाचा : रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा नैसर्गिक खजिना; जाणून घ्या आरोग्यदायी 'शिंगाडा'चे लाभदायक फायदे
17 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 19, 2026, 04:40 AM
गुढीपाडवा हवामानाचा इशाराः राज्यभरात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

गुढीपाडवा हवामानाचा इशाराः राज्यभरात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

Gudi Padwa Weather Alert : गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर राज्यभरात हवामानाने अचानक पलटी घेतली असून शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी चिंता वाढवणारी परिस्थिती निर्माण झाली आहे.(Gudi Padwa Weather Alert) भारतीय हवामान विभाग (IMD) ने पुढील २४ तासांसाठी राज्यातील तब्बल २९ जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.(Gudi Padwa Weather Alert) राज्यभरात वादळी पावसाचा इशारा पश्चिमी विक्षोभ (Western Disturbance) सक्रिय झाल्यामुळेमहाराष्ट्रातीलवातावरण ढगाळ झाले असून आज (गुरुवार) वादळ, विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही भागांत ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असून गारपीटही होऊ शकते. कोकणातवादळी वारे आणि पावसाची शक्यता कोकणकिनारपट्टीत आज वादळी वातावरण राहणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस ताशी ३०–५० किमी वेगाने वारे मुंबईसह काही भागांत ढगाळ वातावरण मध्यमहाराष्ट्रातअवकाळी पावसाचा फटका मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर येथे वादळासह पाऊस ताशी ४०–६० किमी वेगाने वारे घाट भागात जोरदार सरींची शक्यता अहमदनगरला ऑरेंज, इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट उत्तर महाराष्ट्रात गारपीटीचा धोका उत्तर महाराष्ट्रात परिस्थिती अधिक गंभीर राहण्याची शक्यता आहे. नाशिक, जळगाव येथे ऑरेंज अलर्ट धुळे, नंदूरबार येथे यलो अलर्ट ताशी ५०–६० किमी वेगाने वारे विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता मराठवाड्यात २४ तास धोक्याचे मराठवाड्यातही अवकाळी पावसाचे संकट गडद झाले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड – ऑरेंज अलर्ट हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव – यलो अलर्ट वादळी पाऊस, गारपीट आणि ताशी ५०–६० किमी वेगाने वारे विदर्भातहीअवकाळी पावसाचा इशारा विदर्भातपुढील ४८ तास महत्त्वाचे ठरणार आहेत. नागपूर, अमरावतीसह बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट ताशी ४०–५० किमी वेगाने वारे गारपीट आणि पावसाची शक्यता तापमान ३६ ते ४१ अंशांच्या दरम्यान रब्बी पिकांना मोठा फटका हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि कळमनुरी भागात झालेल्या वादळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गव्हाचे पीक आडवे पडले केळी व फळबागांचे नुकसान काढणीस आलेल्या पिकांवर संकट हे ही वाचा सविस्तर :Marathwada Irrigation Project : मराठवाड्याच्या दुष्काळावर मोठा उपाय; ३ सिंचन प्रकल्पांनी बदलणार चित्र! अधिक वाचा :Maharashtra Weather Update : हिटवेव्ह की अवकाळी? 'या' भागांत पावसाचा यलो अलर्ट वाचा सविस्तर
91 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Mar 19, 2026, 04:34 AM
भारतीय पर्यावरण मंत्रालयाने आस्थापनांची तपासणी केली, ₹15.5 लाखांचा दंड वसूल केला

भारतीय पर्यावरण मंत्रालयाने आस्थापनांची तपासणी केली, ₹15.5 लाखांचा दंड वसूल केला

एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत 1 लाख 24 हजार 783 आस्थापनांची तपासणी करण्यात आली, यापैकी 3 हजार 390 आस्थापनांवर कारवाई करून 1 कोटी 55 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
27 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Mar 19, 2026, 03:27 AM
जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा, पिकांचे नुकसान आणि वीजपुरवठ्यात व्यत्यय

जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा, पिकांचे नुकसान आणि वीजपुरवठ्यात व्यत्यय

जळगावजिल्ह्याच्या अनेक भागात बुधवारी सायंकाळी अवकाळीपाऊसझाला. या पावसाने कापणीवर आलेला गहू, हरभरा आणि मक्याला मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे वीज प्रवाह खंडित झाला होता. तोंडापूर, सारोळा काही प्रमाणात गारा पडल्या. भुसावळसह तालुक्यातील शिंदीसह मोंढाळा, मानमोडी व विचवा परिसरात सायंकाळी पावणे सात ते सव्वा आठ वाजेच्या दरम्यान सुमारे सव्वा तास जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. बोदवड येथे अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आठवडी बाजारात विक्रेत्यांनी लावलेले पाल वाऱ्यामुळे उडून गेले. कजगाव, खेडगाव (ता. भडगाव), नगरदेवळा, लोहारा, बाळद, वरखेडी (ता. पाचोरा), पातोंडा व लोंढे (ता. चाळीसगाव) आणि शेंदुर्णी, तोंडापूर (ता. जामनेर) पारोळा येथेही सायंकाळी पावसाने हजेरी लावली. हेही वाचा : भारतीय वारसा कायद्यानुसार हाताने लिहिलेले 'मृत्युपत्र' वैध ठरेल का? जाणून घ्या सविस्तर
42 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 19, 2026, 02:28 AM
पंचगंगा नदी प्रदूषण संकटः दुर्लक्षामुळे हजारो माशांचा मृत्यू

पंचगंगा नदी प्रदूषण संकटः दुर्लक्षामुळे हजारो माशांचा मृत्यू

शिरोळ तालुक्याची जीवनदायिनी मानली जाणारी पंचगंगा नदी सध्या गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून, नदीत लाखो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी तीव आक्रमक भूमिका घेतली आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाच्या वाढत्या समस्येबाबत वारंवार तोंडी व लेखी सूचना देऊनही प्रदूषण नियंत्रण मंडळाने व जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम म्हणून शिरोळ येथील बंधाऱ्याजवळ नदीत मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत आढळले. या घटनेमुळे पर्यावरणासोबतच नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील यांनी शिरोळ बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली. यावेळी काँग््रेासचे शिरोळ तालुका अध्यक्ष दरगू गावडे,पंचगंगा नदी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष बंडू पाटील, सदस्य विश्वास बालिघाटे, शेखर पाटील नगरसेवक सचिन शिंदे, माजी सरपंच गजानन संकपाळ, कृष्णराव भाट, बापूसाहेब गंगधर, वसंत चुडूमुंगे आदींनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
61 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 19, 2026, 02:24 AM
हिंगोली जिल्ह्यातील रब्बी पिकांना वादळी वाऱ्याचा तडाखा

हिंगोली जिल्ह्यातील रब्बी पिकांना वादळी वाऱ्याचा तडाखा

हिंगोली : जिल्ह्यातील वसमत आणि कळमनुरी तालुक्यांत बुधवारी मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. गव्हाचेपीकआडवे झाले असून, वसमत तालुक्यात फळबागांना सर्वाधिक फटका सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासहपाऊसहोईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. १८ मार्चला रात्री १२ च्या सुमारास वसमत तालुक्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह दोन तासपाऊसझाला. यात केळीच्या बागा आणि काढणीला गव्हाचेपीकआडवे झाले. कळमनुरी तालुक्यात रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे भाजीपाला, गहू, हरभरा, करडई या पिकांना फटका बसला आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव येथे रात्री गारपीट झाली असून, या भागातील पिकांचीही मोठी हानी झाली आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलानरवेल (जि. बुलढाणा) : नरवेल परिसरात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. गारपीट झाल्याने गहू, हरभरा, कांदा तसेच उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरांसाठी साठवून ठेवलेला चारा भिजल्याने पशुपालकांना ही फटका बसला आहे. काढणीला आलेली पीके जमीनदोस्त झाल्याने अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. नाशिकमध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊसनाशिक : अनेक गावांत बुधवारी (दि. १८) दुपारी अवकाळीने हजेरी लावली. काही भागांत अल्पकाळ गारपीटही झाल्याने पिकांचे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ओझरला तुरळक पाऊस झाला. या पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा आणि कांदा पिकांना फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. जळगाव जिल्ह्याला आज ‘ऑरेंज अलर्ट’जळगाव : जिल्ह्यावर अवकाळी पावसाचे संकट ओढावले आहे. हवामान विभागाने १९ मार्च रोजी जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला असून, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता पसरली आहे.
68 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 19, 2026, 02:02 AM
शेलोली परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपीट

शेलोली परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपीट

शेळोली परिसरात फळपिकांचे नुकसान कडगाव : भुदरगड तालुक्यातील शेळोली परिसरात गारपिटीसह अवकाळी पावसाने झोडपून काढले. गारांसह झालेल्या पावसामुळे परिसरातील काजू, आंबा, जांभूळ, करवंदी आदी फळ पिकांचे मोठे नुकसान झाले.
72 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 19, 2026, 01:30 AM
नाशिक रस्ता आणि आसपासच्या भागात गारपीट, पिकांवर परिणाम

नाशिक रस्ता आणि आसपासच्या भागात गारपीट, पिकांवर परिणाम

नाशिक :जिल्ह्यात नाशिकरोडसह सिन्नर, निफाड, पिंपळगाव, दिंडोरी सटाणा, कळवण परिसरात बुधवारी (दि. १८) दुपारी गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. यामुळे काढणीला आलेलेल्या गहू, हरभरा आणि कांदा पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.सिन्नर शहरासह परिसरात दुपारी चारच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. उकाडा वाढल्याने पावसाची चिन्हे दिसत होती. त्यानंतर अचानकपावसाच्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी पाच ते सात मिनिटे गाराही पडल्या.दरम्यान, सिन्नर शहरातील सरदवाडी उपनगरात झालेल्या पावसामुळे सरदवाडी रस्त्यावर वाजे लॉन्स परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. गुडघाभर पाण्यातून वाहनचालकांना वाट काढावी लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही गल्ल्यांमधूनही पाणी वाहत होते. सिन्नर शहरापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावरील काही भागांतही पावसाच्या सरी कोसळल्या. मोह, वडझिरे, नायगाव, जायगाव, देशवंडी, चिंचोली, माळेगाव, दातली तसेच परिसरातील काही गावांमध्ये दुपारी तीन ते पाच या वेळेत पावसाने हजेरी लावली.Nashik Tapovan: तपोवनात अंधश्रद्धेचा बाजार! झाडांना फोटो, बिब्बे अन् बाहुल्या लावून जादूटोणा, पर्यावरणप्रेमींचा संतापकळवणला गारपीटकळवण : शहर व तालुक्यातगारांसह अवकाळी पाऊसझाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सायंकाळी सहा वाजता अवघा पंधरा मिनिटे गारांसह झालेल्या पावसामुळे कांदा, मिरची, टमाटे, डाळिंब, द्राक्ष, गहू व भाजीपाला पिकांना फटका बसणार आहे. आधीच शेतमालाला योग्य व अपेक्षित बाजारभाव मिळत नसून, शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. बँका, पतसंस्था यांना मार्च महिना वसुलीसाठी अत्यंत महत्वाचा असतांना झालेला अवकाळी व गारपिटीचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.Ashok Kharat : महिलेवरील अत्याचार प्रकरण; ज्योतिषी अशोक खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी, नाशिक सत्र न्यायालयाचा निर्णयबागलाण परिसराला तडाखासटाणा : बागलाण तालुक्यातील पश्चिम भागातसह मोसम परिसरात आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसाचा सर्वाधिक परिणाम कांदा आणि डाळिंब बागांवर झाला असून, अनेक ठिकाणी गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांद्याच्या पिकावर गारांचा मारा झाल्याने पिके आडवी पडली असून, साठवणुकीसाठी तयार असलेला कांदाही खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर, डाळिंब बागांमध्ये फळे गळून पडल्यानेशेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसानझाले असून, पंचनामे करण्याची मागणी होत आहे.पिकांना फटका बसणारनिफाड : तालुक्यात बुधवारी दुपारनंतर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या, तर काही ठिकाणी तुरळक गारा झाल्या. दुपारी ४ वाजेच्या दरम्यान चांदोरी, पिंपळगाव बसवंत, ओढा, ओझर, चितेगाव, लासलगाव या भागात पाऊस झाला. लासलगाव शहरात ५ वाजेच्या दरम्यान तुरळक गारांचा पाऊस झाला. सध्या शेतकरी गहू काढण्याचे काम करत आहे. तसेच काही ठिकाणी उन्हाळ कांदा काढण्याचेही सुरू आहे. तर, द्राक्षांचे हार्वेस्टिंग सुरू आहे. या पावसामुळे या पिकांना फटका बसणार आहे.दृष्टिक्षेपात गारपीट...-सिन्नर शहरासह परिसरात बुधवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत पावसाचा दणका-जायगाव घाटाच्या पायथ्याशी, तसेच मोह शिवारात गारपीट-निफाडमध्येही तुरळक गारपीट-कळवणला शहर व तालुक्यात गारांसह अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल-कांदा, मिरची, टोमॅटो, डाळिंब, द्राक्ष, गहू व भाजीपाला पिकांना फटका-बागलाण तालुक्यातील पश्चिम भागासह मोसम परिसरात गारपिटीचा तडाखा-कांदा आणि डाळिंब बागांना फटका, कांद्याची पिके आडवी
8 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Mar 19, 2026, 12:25 AM
फलटण तालुक्यात गारपिटीचा तडाखा, फळबागांचे नुकसान

फलटण तालुक्यात गारपिटीचा तडाखा, फळबागांचे नुकसान

फलटण :फलटण तालुक्यातील धुमाळवाडी, गिरवी व निरगुडी परिसरात बुधवारी दुपारी गारपिटीसह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडाली. या गारपिटीचा द्राक्षबागा, आंबा व इतर फळपिकांना फटका बसला आहे.
24 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 19, 2026, 12:12 AM
नामिबियाच्या इटोशा पॅनमधील दुर्मिळ'फॅंटम लेक्स'मुसळधार पावसानंतर उगम पावतात

नामिबियाच्या इटोशा पॅनमधील दुर्मिळ'फॅंटम लेक्स'मुसळधार पावसानंतर उगम पावतात

नामिबियामधील ‌‘इटोशा पॅन‌’ हे ‌‘द ग््रेाट व्हाईट प्लेस‌’ म्हणून ओळखले जाते. सुमारे 1,800 चौरस मैलांवर पसरलेला हा भाग आफ्रिकेतील सर्वात मोठ्या क्षारयुक्त मैदानांपैकी एक आहे. 2011 मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे एकुमा आणि ओशिगाम्बो या दोन नद्यांच्या पात्राबाहेर पाणी वाहू लागले. या पुराच्या पाण्याने वाळवंटातील सखल भाग व्यापला आणि काही काळापुरते हे सुंदर तलाव तयार झाले. नासाच्या अर्थ ऑब्झर्व्हेटरीने याला ‌‘फँटम लेक्स‌’ (मायावी तलाव) असे संबोधले आहे. कारण, पाण्याचे बाष्पीभवन होताच हे तलाव पुन्हा गायब होतात.
17 shares
😐