Achira News Logo
Achira News
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 05:59 AM
खडकवासला धरण पुनरुज्जीवन प्रकल्पः ओसाड जमिनीचे सुपीक जमिनीत रूपांतर

खडकवासला धरण पुनरुज्जीवन प्रकल्पः ओसाड जमिनीचे सुपीक जमिनीत रूपांतर

यावेळी ग््राीन थंब संस्थेचे अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील यांनी खडकवासला धरण पुनरुज्जीवन प्रकल्पाची माहिती दिली. कर्नल पाटील म्हणाले, धरणातील काढलेला गाळ तीरावर पडीक, दलदलीच्या ठिकाणी टाकून पाचशेहून अधिक एकर जमीन तयार केली आहे.
87 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 4, 2026, 05:49 AM
महाराष्ट्रातील तापमान आणि आर्द्रता पातळीः उष्ण हवामानाचा अंदाज

महाराष्ट्रातील तापमान आणि आर्द्रता पातळीः उष्ण हवामानाचा अंदाज

मुंबई:फेब्रुवारीच्या सुरूवातीपासूनच महाराष्ट्रत गारठा कमी होत असल्याचं जाणवू लागलं असून कोकण किनारपट्टीवरील वातावरण दमट होण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईमध्ये आज दिवसभार वातावरण उष्ण राहील असा अंदाज हवामान विभागानं काल वर्तवला होता. काही ठिकाणी तर पारा 34 अंश सेल्सियसपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.ढगाळ वातावरणगेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांतपावसाचा इशारादेण्यात आला असून, ठिकठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रासह कोकणातील काही भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. येते काही दिवस हवामान स्थिर राहून फारसा बदल होणार नसल्याची शक्यता आहे.Mumbai Pune Expressway : वाहनावरील नियंत्रण सुटलं, आडोशी बोगद्याच्या तोंडाशी टँकर पलटी, मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर वाहतूक ठप्प; पर्यायी मार्ग कोणता?आज उष्ण वातावरणमुंबईत आज 2026मधील सर्वाधिक उष्ण वातावरणाची नोंद होण्याची शक्यता आहे. सांताक्रूझसह दक्षिण मुंबईतील काही ठिकाणी तापमानाचा पारा 34 अंश सेल्सियसवर पोहचणार असून, येत्या काही दिवसांत उष्ण वातावरण कायम राहण्याची चिन्हे आहेत. तसेच, पहाटेच्या वेळेत शहरातील अनेक भागांत धुक्याची चादर पसरत असून, दृष्यमानता कमी होत आहे.उत्तर भारतात थंडीचा कडाकाकेंद्रीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. हरियाणा, पंजाब, राजस्थान, दिल्ली या ठिकाणी गारठा वाढत असून काही राज्यांमध्ये शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उत्तर भारतात काही ठिकाणी बर्फवृष्टीसुद्धा होत आहे. त्याचवेळी दक्षिण भारतात उकाडा वाढत असल्याची चिन्ह आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तर ढगाळ वातावरणासह मुसाळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे.Belasis Flyover: वेळेपूर्वी काम पूर्ण झाल्याचा डंका, दक्षिण मुंबईतील कोंडी फोडणारा उड्डाणपूल तयार; तरी उद्घाटन का लांबणीवर?येत्या 24 तासांत राज्यातीलहवामान स्थिर राहूनउकाडा वाढण्याची शक्यता आहे. तसेच, मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावत असून आज सकाळी AQI 280 वर होतं. त्यामुळे मुंबईसह उपनगरातील हवेची गुणवत्ता ढासळली असून नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं अवाहान केलं गेलं आहे. वाढत्या प्रदुषणामुळे काही मुंबईकरांना श्वास घेण्यात त्रास होत असून, आजारांचे प्रमाण देखील वाढले आहे. वाढत्या तापमानमुळे हवेची गुनवत्ता सुधारण्याची शक्यता आहे.
70 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 12:10 AM
सेंद्रिय शेती आणि औषधी लागवडीसह पर्यावरणीय उपक्रमांवर तामिळनाडू शाळेचा भर

सेंद्रिय शेती आणि औषधी लागवडीसह पर्यावरणीय उपक्रमांवर तामिळनाडू शाळेचा भर

2023-24 दरम्यान टप्प्याटप्प्याने भाजीपाला बाग, वेलभाजीसाठी थोंगम थोट्टम, औषधी वनस्पतींची लागवड आणि फळझाडांची बाग विकसित करण्यात आली. गांडूळ खत प्रकल्पामुळे संपूर्ण शेतीसाठी सेंद्रिय खत उपलब्ध झाले. औषधी वनस्पतींच्या नावांसह त्यांच्या उपयोगाची माहिती फलकांवर लावण्यात आली. सुरुवातीला शिक्षकांनी स्वतःच्या पैशातून खर्च केला. पुढे, शाळेच्या पर्यावरणीय बांधिलकीची दखल घेऊन तामिळनाडू सरकारच्या ‌‘ग्रीन स्कूल योजना 2024-25‌’अंतर्गत 20 लाख रुपयांपर्यंत निधी मंजूर झाला.
65 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 12:30 PM
कोल्हापूरचा अखंड उत्तरायण किरणोत्सव अवकाळी थंडीमुळे सपाट पडला

कोल्हापूरचा अखंड उत्तरायण किरणोत्सव अवकाळी थंडीमुळे सपाट पडला

कोल्हापूर: करवीर निवासिनी श्रीअंबाबाईचा अखंड उत्तरायण किरणोत्सव यंदा निराशेत गेला. किरणोत्सवाच्या गेल्या तीन दिवसांत एकदाही मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाई मूर्तीपर्यंत पोहोचू शकली नाहीत. या वर्षी थंडी लांबल्याचा हा परिणाम असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. यासह नव्याने होत असलेल्या गरुड मंडप कमानीपैकी एक कमान आणि जोडलेली एक पट्टीही किरणोत्सवाच्या अडथळ्याचे कारण ठरणारे आहे.श्रीअंबाबाईचा किरणोत्सव पाच दिवसांचा असतो. त्यातीन मुख्य तीन दिवस. सोमवारी किरणोत्सवाचा अखेरचा दिवस होता. या पाचपैकी एकादाही मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाईच्या मूर्तीपर्यंत पोहोचू शकली नाहीत. सोमवारी तर ही किरणे गरुड मंडपातील सदरेपर्यंतच येऊन लुप्त झाली. नव्या वर्षातील किरणोत्सवात साधा चरणस्पर्शही झाला नाही. यंदा थंडीचा कडाका जास्त होता, शिवाय थंडीचा कालावधीही लांबला. आत्ताही रोज मध्यरात्री थंडी असते. ढगाळ वातावरण, धूलिकण याचा परिणाम सूर्यकिरणांच्या तीव्रतेवर झाला. कमीनात आत्ताच हवी दुरुस्ती...यंदा सूर्यकिरणांची तीव्रता नव्हती हे खरेच, पण नव्याने होत असलेल्या गरुड मंडपाची महाद्वारसमोरील कमान किरणांच्या प्रवासात अडथळा ठरत असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. अंबाबाई मूर्तीच्या चेहऱ्यासमोर उभे राहून समोर बघितले की, गरुड मंडपाची कमान आणि त्या खाली लावलेली पट्टी दिसत आहे. आत्ता गरुड मंडप उभारणीच्या अवस्थेत आहे, तोपर्यंतच कमान वर उचलून घेणे किंवा त्यात दुरुस्ती करणे गरजेचे आहे. एकदा गरुड मंडप उभारल्यानंतर काही करता येणार नाही.
19 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 12:06 PM
महाराष्ट्रातील मंत्र्यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड टळला

महाराष्ट्रातील मंत्र्यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड टळला

छत्रपती संभाजीनगर :राज्याच्या पर्यावरण मंत्रीपंकजा मुंडेयांच्या हेलिकॉप्टरला आज छत्रपती संभाजीनगर विमानतळावर तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. सुदैवाने, उड्डाण घेण्यापूर्वीच हा बिघाड वैमानिकाच्या लक्षात आल्याने एक मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, यावर आता स्वत: मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले. Latest Marathi News LIVE: छ. संभाजीनगरच्या महापौरपदासाठी AIMIM ची मोर्चेबांधणी, भाजपाला दूर ठेवण्यासाठी... "कालही वाटले होते की हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड आहे. त्या तांत्रिक अडचणीमुळे मी त्या हेलिकॉप्टरने प्रवास केला नाही. मला सांगण्यात आले होते की दुसरे हेलिकॉप्टर पाठवण्यात येईल, मात्र त्यालाही विलंब झाला. मी कारणे देऊन सभा रद्द केली असती, पण ते योग्य वाटले नाही. लोक वाट पाहत होते. ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. सभा घेऊन त्यांना ऊर्जा आणि ताकद द्यायला हवी. सभा दोन तास उशिरा झाली असली तरी लोक वाट पाहायला तयार होते, असंही मुंडे म्हणाल्या. ‘देव पाण्यात ठेवले’ याचा अर्थ असा होतो की आई रोज लँड झाली का? टेकऑफ झाली का? याच विचारात असते. अजित दादांच्या मोठ्या दुर्घटनेनंतर सगळ्यांची मनं हादरली आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात तणाव आहे. अनेक कार्यकर्ते विमान किंवा हेलिकॉप्टरचा वापर करू नका, असे संदेशही देत आहेत. मात्र सध्या त्याला पर्याय नाही, असंही मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडेम्हणाल्या, “बसण्याआधी सर्व तांत्रिक बाबी स्पष्ट केल्या जातात, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. काम थांबणार नाही. काही झालं तरी दौरा रद्द होणार नाही. नवीन लोकांना भीती वाटणं साहजिक आहे, पण आपलं कर्तव्य पार पाडावंच लागतं.” लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेला अजित पवार यांचं नाव देण्याच्या मागणीवर त्या म्हणाल्या, “याबाबत देवेंद्र फडणवीस योग्य निर्णय घेतील. हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे.” अजित पवार यांच्या मृत्यूबाबत संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास पंकजा मुंडे यांनी नकार दिला. “मी कुणाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देऊन मीडियाच्या लाईमलाईटमध्ये येत नाही. गेली २० वर्षे मी अशा गोष्टींवर बोलत नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
41 shares
😢
Loksatta logo
Loksatta
Feb 3, 2026, 10:09 AM
तांत्रिक बिघाडामुळे पंकज मुंडेंच्या हेलिकॉप्टरला उशीर

तांत्रिक बिघाडामुळे पंकज मुंडेंच्या हेलिकॉप्टरला उशीर

Pankaja Munde Helicopter Technical Glitch :राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचे उड्डाण काही काळ रखडले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकरता त्यांचा दौरा नियोजित करण्यात आला होता. मात्र, या तांत्रिक बिघाडामुळे त्यांच्या दौऱ्याला दोन तास उशीर झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोमवारीपंकजा मुंडेया छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्कामी होत्या. मंगळवारी सकाळी पंकजा मुंडे यालातूर,धाराशिव व सोलापूर या तीन जिल्ह्यातील त्यांच्या नियोजित सभांसाठी हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा विमानतळावरून निघण्याच्या तयारीत होत्या. पण विमानात तांत्रिक बिघाड झाला. याबाबत त्या म्हणाल्या, “सकाळी साडेदहा वाजता मी निघणार होते. पण मला कळवण्यात आलं की काल जे हेलिकॉप्टर होतं त्यात बिघाड झाला आहे. ते हेलिकॉप्टर मला जरा जुनंही वाटत होतं. त्यात काय बिघाड आहे हे माहीत नाही. त्यामुळे दुसरं हेलिकॉप्टर पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सभा रद्द करण्यात आलेली नाही. लोक वाट बघायला तयार आहेत. ही कार्यकर्त्यांचीनिवडणूकआहे, त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे.” “माझी आई लँड झाली का? टेकऑफ झाली का विचारत असते. एवढी मोठी दुर्घटना झाली आहे की सर्वांची मने हादरली आहेत, टेन्शन लोकांच्या मनात आहे. अनेक लोक मेसेज करत होते की हेलिकॉप्टरमध्ये बसू नका. पण याशिवाय पर्याय नाही, कारण आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. काही काळजी करायचं कारण नाही. काम तर चालत राहणार. काहीही झालं तरी दौरा रद्द होणार नाही”, असंही त्या पुढे म्हणाल्या. “जेव्हापासून अजित दादांचा अपघात झालाय, तेव्हापासून मी क्षणोक्षणी विचार करतेय की विमानातील लोकांना अपघातावेळी काय वाटलं असेल? आमच्या घरात सर्व व्यथित आहोत. महाराष्ट्रात सर्वांच्या घरात हेच चित्र असेल”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
32 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 09:40 AM
केंद्रीय मंत्री येत्या काळात जाहीर सभांना संबोधित करणार

केंद्रीय मंत्री येत्या काळात जाहीर सभांना संबोधित करणार

पुढील काही दिवसांत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ग््राामविकासमंत्री जयकुमार गोरे आणि पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी दिली.
75 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 09:36 AM
सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांना आव्हानांचा सामना करावा लागत आहे कारण अनपेक्षित हवामानामुळे पिकांवर परिणाम होतो

सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांना आव्हानांचा सामना करावा लागत आहे कारण अनपेक्षित हवामानामुळे पिकांवर परिणाम होतो

प्रमोद शेजूळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात रब्बीचे महत्वाचे पीक असलेल्या हरभरा पिकावर सध्या मर, करपा, भुरी, घाटेअळी अशा विविध रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादूर्भाव झाल्याचे दिसत आहे. बदलत्या हवामानावा हा फटका असून खरीपापाठोपाठ रब्बी पिकेही हातची जातात की, काय, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत असून ते अडचणीत सापडले आहेत. सिल्लोड तालुक्यातील खरीप पिकांना यंदा अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. अनेक शेतकऱ्यांचीशेतीपिकांसह खरडून गेली. या दुःखातून कसेबसे सावरत शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची लागवड केलेली आहे. किमान यातून तरी थोडे नुकसान भरुन निघेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. खरीप पिकांमध्ये यंदा तालुक्यात २५ हजार हेक्टरवर हरभरा पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. यात चांगला दर मिळणाऱ्या डॉलर हरभऱ्याचे प्रमाण मोठे आहे. सध्या हे पिक फुलोऱ्यासह घाट्यात असताना कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण, तर कधी अचानक वाढलेली आर्द्रता अशा बदलत्या हवामानाचा या पिकावर विपरीत परिणाम झाला आहे. हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणावर मर, करपा, भुरी तसेच घाटे पोखरणाऱ्या घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. तर काही भागांत हरभरा पिवळा पडून वाळत असल्यानेशेतकरीप्रचंड धास्तावले आहेत. फुलोरा व घाटे धरण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेतच या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होण्याची भीतीशेतकरीव्यक्त करत आहेत. भराडी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी रोग नियंत्रणासाठी हजारो रुपये खर्च करून औषध फवारणी केली, मात्र सतत बदलणाऱ्या हवामानामुळे अपेक्षित परिणाम मिळत नसल्याची तक्रार आहे. सिल्लोड तालुक्यात हरभरा पिकाची २५ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. मर रोग नियंत्रणासाठी बुरशीनाशकाची फवारणी करावी. तसेच कृषी कर्मचाऱ्यांना संबंधित प्रादुर्भाव क्षेत्रावर पाठवून मार्गदर्शन केले जाईल.- डॉ. संदीप जगताप, तालुका कृषी अधिकारी. नुकसान आणखी वाढू शकते! शेतकऱ्यांनी व्यक्त केली भीती खत, बियाणे व मजुरीचा खर्च आधीच वाढलेला असताना औषध फवारणीचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढवत आहे. कृषी विभागाकडून वेळेवर तांत्रिक मार्गदर्शन व योग्य औषधांची माहिती न मिळाल्यास नुकसान आणखी वाढू शकते, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. हेही वाचा : मंदीच्या लाटेत देखील 'हा' शेतकरी म्हणतोय मेथीची एक जुडी देतेय ५० रुपयांचे उत्पन्न; वाचा सविस्तर
31 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 3, 2026, 08:35 AM
सोन्याचे दरः किंमती आणखी घसरतील का? चढउतारांदरम्यान अनिश्चितता कायम

सोन्याचे दरः किंमती आणखी घसरतील का? चढउतारांदरम्यान अनिश्चितता कायम

Gold Rate:सोन्याची किंमत आणखी घसरणार की वाढणार? भविष्यात सोन्याच्या किमती काय असतील? या वर्षअखेरपर्यंत सोन्याचा दर किती वाढेल? हेच प्रश्न सध्या सोनेप्रेमींना सतावत आहेत. सध्याच्या अनिश्चित वातावरणात सोन्याच्या किमतींवरील एकाधक्कादायक अहवालाने खळबळउडाली आहे.सोन्यात ऐतिहासिक घसरणसोन्याच्या दरातील सततच्या चढ-उतारांनी खरेदी करणारे आणि गुंतवणूक केलेल्यांची धाकधूक वाढली आहे. गगनाला भिडणाऱ्या सोन्याच्या किमतीने आधीच हैराण झालेले सोनेप्रेमी अलीकडच्या प्रचंड घसरणीनेही तितकेच हैराण झाले आहेत. केवळ चारच दिवसांत सोन्याच्या दरात ऐतिहासिक घसरण झाली 31000 रुपयांनी भाव खाली उतरला.सोन्याबाबत अमेरिकेतून आला मोठा संकेत​गेल्या काही दिवसातील घसरण पाहणारे सोनेप्रेमी सोन्याच्या किमती आणखी कमी होतील का? की त्यांनी आताच सोने खरेदी करावे? यावर चर्चा करत आहेत. पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे का? ग्लोबल इन्व्हेस्टमेंट बँक, जेपी मॉर्गन, ने आपल्या अलीकडच्या अहवालाने सराफा बाजारात खळबळ उडाली. सध्या जागतिक बाजारात सोन्याची किंमत $5,500 वरून $4,700 वर घसरली असून काही दिवसांतच $700 पेक्षा जास्त कमी झाली. त्याचवेळी, भारतीय बाजारात सोन्याची किंमत 1.40 लाखांपर्यंत कमी झाली होती.सोन्यातील गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक बातमीजेपी मॉर्गनचा अहवाल सोन्यातील गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक ठरू शकतो. जागतिक इन्व्हेस्टमेंट बँकेने या वर्षाच्या अखेरीस सोन्याचा भाव 6,300 डॉलरपर्यंत उसळी घेण्याचा अंदाज वर्तवला आहे. म्हणजे सध्याच्या पातळीवर सोन्याचा भाव 32% वाढायचा अंडज असून अशाप्रकारे, भारतीय बाजारात सोन्याची किंमत 2 लाखांचा उंबरठ्यावर ओलांडू शकते. मध्यवर्ती बँका आणि गुंतवणूकदारांकडून मागणी वाढल्याने सोन्याच्या किमती वाढतील, असा जेपी मॉर्गनचा अंदाज आहे.मध्यवर्ती बँका 800 टन सोने खरेदीचा अंदाजप्लास्टिक मालमत्तेच्या तुलनेत वास्तविक मालमत्तेच्या कामगिरीबद्दल जेपी मॉर्गन चेस अँड कंपनीने म्हटले आहे की, ‘आधीच स्पष्ट, संरचनात्मक आणि सातत्यपूर्ण विविधीकरण स्थापित केल्यामुळे मध्यम कालावधीत सोन्यासाठी मजबूत सकारात्मक वाढीचा कल दिसत आहे, जे आणखी विकसित करायची गरज आहे.’ जगभरातील मध्यवर्ती बँका 2026 मध्ये तब्बल 800 टन सोने खरेदी करायचा जेपी मॉर्गनचा अंदाज आहे.चांदीची किंमत घसरत राहणार की वाढणार?दुसरीकडे, जेपी मॉर्गनने चांदीबद्दल म्हटले की गेल्या वर्षी डिसेंबरपासून चांदीची किंमत 80 डॉलरच्या वर उसळल्या असून चांदीतील दरवाढीचे कारण ओळखणे किंवा त्यांचे अचूक मूल्यांकन करणे कठीण झाले आहे आणि सावधगिरी बाळगली पाहिजे. एकेकाळी 120 डॉलर्सपेक्षा जास्त महागलेली चांदीची किंमत आता 80 डॉलर्सपर्यंत घसरली आणि सध्या 81 डॉलरच्या आसपास ट्रेड करत आहे.भविष्यात ​चांदीच्या दरवाढीचा अंदाजयाशिवाय जेपी मॉर्गनने येत्या आठवड्यात सोने-चांदीचे प्रमाण आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे, कारण मध्यवर्ती बँका सोन्याइतकेच चांदीचे खरेदीदार नाहीत. ‘सोन्याच्या तुलनेत चांदी लक्षणीयरीत्या महागली आहे, पण पूर्णपणे किंमत कमी होण्याची शक्यता नाही,’ जेपी मॉर्गन म्हणाले आणि सध्या चांदीसाठी सरासरी अप्पर सपोर्ट $75 ते $80 प्रति औंसच्या मागील अपेक्षेपेक्षा जास्त अंदाज वर्तवला आहे.(Disclaimer: वरील माहिती फक्त वाचकांच्या माहितीसाठी आहे. येथे सादर केलेले किमती, विश्लेषणे आणि अंदाज जेपी मॉर्गन सारख्या कंपन्यांच्या बाजार परिस्थितीवर आधारित आहेत. सोने आणि चांदीच्या किमतीतील चढ-उतार आंतरराष्ट्रीय घडामोडी, चलनवाढ आणि मध्यवर्ती बँकेच्या निर्णयांवर अवलंबून असतात. म्हणून, सोने किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा आणि स्वतःचे माहितीपूर्ण निर्णय घ्या.)
40 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 08:15 AM
गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नाशिक जिल्ह्यातील ऊस पिके आणि शेतजमीन उद्ध्वस्त

गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नाशिक जिल्ह्यातील ऊस पिके आणि शेतजमीन उद्ध्वस्त

- कृष्णा अष्टेकरनाशिक:गतवर्षी जिल्ह्यात अति मुसळधार झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला तीन ते चार वेळेस पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागातील शेतजमिनीसह पिके पाण्याखाली राहिल्याने उसाचे पाच हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले. शेतात जास्त काळ पाणी राहिल्याने जमिनीतील क्षार वाढून शेतजमीन नापिकी होऊ लागली आहे. परिणामी शेतजमीन नापिकी झाल्यानेऊसपिकाला कारखाने तोडण्यास तयार नसल्याने शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला आहे. निफाडच्या दक्षिण भागाला गोदावरी नदीचा प्रचंड मोठा किनारा लाभल्याने या भागातील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली असून बागायती आहे. या भागातऊसया बारमाही पिकासह अनेक पिकांची पारंपरिकशेतीकेली जाते. दरवर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते. येथील पश्चिम भाग हा पावसाचे माहेरघर म्हणून ओळखला जातो. या भागात अनेक नद्या व धरण प्रकल्पातील पाणी गोदावरीला सोडले जाते. परिणामी गोदावरी नदीला पूरपरिस्थिती निर्माण होऊन दरवर्षी या भागातील सायखेडा, चांदोरी, शिंगवे, गोंदेगांव, करंजगाव, कोठुरे, चापडगात, मांजरगाव, कुरडगाव व सुंदरपूर आदी गावांना पुराचा फटका बसतो. पुराचे पाणी शेतात आल्याने ऊस, सोयाबीन, मका पिकांचे मोठे नुकसान होत असते. दोन्ही बाजूंनी शेतकरी भरडला जातोयगेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे ऊस पिकाचे भरपूर नुकसान झाले व उत्पन्नातही घट झाली. परिसरातील व बाहेरील अनेक कारखान्यांचे ऊसतोड कामगार असतानासुद्धा आर्थिक देवाण-घेवाण करूनच ऊस तोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. एकीकडून निसगनि शेतकऱ्यांवर केलेला अन्याय व दुसरीकडून कारखान्याकडून होणारी लूट यामध्ये दोन्हीही बाजूने शेतकरी भरडला गेला. क्षाराचे प्रमाण वाढतेदरवर्षी गोदावरीला पूरपरिस्थिती निर्माण होते. यात मोठे नुकसान होते. सन २०१६ व २०१९ मध्ये महापूर आला होता, तेव्हा खूप मोठे नुकसान झाले होते. येथील शेतजमिनीत क्षाराचे प्रमाण वाढून जमिनी नापिकी झाल्या आहेत. गतवर्षी मेपासून सुरू झालेल्या पावसाने ऑक्टोबरपर्यंत मुक्काम केल्याने गोदावरीला पूरपरिस्थिती निर्माण झाली. अधिक काळ पाणी शेतात राहिल्याने जमिनीत क्षाराचे प्रमाण वाढले. जमिनी नापिकी झाल्या. उसाच्या मुळ्यांची वाढ खुंटली. कारखाना ऊस तोडणीला तयार नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. - विष्णू मोगल, शेतकरी, कोठुरे
55 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 3, 2026, 07:51 AM
मुंबई 2026 च्या पहिल्या उष्णतेच्या लाटेसाठी सज्ज, थंडीची लाट ओसरली

मुंबई 2026 च्या पहिल्या उष्णतेच्या लाटेसाठी सज्ज, थंडीची लाट ओसरली

मुंबई:महाराष्ट्रात जानेवारी महिन्याच्या अखेरीसच थंडी कमी होऊ लागली होती. फेब्रुवारीच्या सुरूवातीला तर अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. पण आता येत्या काही दिवसांत मुंबईसह परिसरातील भागांत उष्णतेची लाट जाणवणार आहे. उद्या मुंबई उपनगरातील अनेक भागांत 2026ची पहिली उष्णनतेची लाट अनुभवायला मिळणार आहे.आज सकाळपासूनमुंबईसह उपनगरातवातावरणात थंडीची तीव्रता कमी झालेली जाणवू लागली आहे. पहाटे काही ठिकाणी धुकं दाटलेलं सुद्धा दिसून आलं होतं. परंतु, फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच किमान तापमानात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज दिवसभर शहरात आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तसेच, आज किमान तापमान 23 अंश सेल्सियस असून, कमाल 32 अंश सेल्सियस असेल. हिवाळ्याच्या सुरूवातीपासूनच शहरात हवेची गुणवत्ता ढासाळली आहे. गेल्या काही दिवसांपासून वायू प्रदुषणाच्या पातळीत चढ-उतार होत असून, स्थानिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.Mumbai Local: लोकल तिकिट काढणं होणार अधिक सुलभ, रेल्वे स्थानकांवर 325 नवे ATVM बसवणार; कुठे-कसा होणार फायदा?सर्वाधिक फटका कुठे?पण उद्यापासूनकिमान तापमानातआणखी घसरण होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. उद्या, म्हणजेच 4 फेब्रुवारीचा दिवस, 2026मधील सर्वाधिक उष्ण दिवस ठरणार आहे. मुंबईतील वांद्रे, अंधेरी, जुहू, वर्सोवा आणि पश्चिम मुंबईत उद्या 2026मधील पहिली उष्णतेची लाट अनुभवायला मिळणार आहे. सांताकृझमध्ये तर तापमान 34 अंश सेल्सियसपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईत दुपारी तापमान 29-30 अंश सेल्सियस पर्यंत राहणार असून, रहिवाशांना उष्णतेचा इतका त्रास सहन करावा लागणार नाही.Mumbai News: मुंबईकरांनो, आता रस्त्यावर थुंकणं, कचरा टाकणं पडणार महागात; महापालिका आकारणार 25 हजारांपर्यंत दंड, कशासाठी किती दंड?मुंबईतील पश्चिम आणि मध्य उपनगरातील तापमानात सर्वाधिक वाढ होण्याची शक्यता असून, रहिवाशांना 4 फेब्रुवारीला दुपारच्या वेळेत आवश्यकता नसल्यास बाहेर पडणे टाळावे असा सल्ला देण्यात आला आहे. वाढत्या उकाड्यामुळे हवेची गुणवत्ता सुद्धा स्थिर होण्याचे संकेत आहेत.काही जिल्ह्यांत पाऊसमराठवाड्यातील काही जिल्ह्यांना काल हवामान विभागाकडूनयलो अलर्ट जारीकेला असून या भागांत येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, मुंबईसह नवी मुंबई, पुणे, पालघर जिल्ह्यातील हवामान कोरडं राहणार आहे.
2 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 07:00 AM
हवामान बदलामुळे कृषी औषधांच्या किमती वाढल्याने नाशिकचे शेतकरी त्रस्त

हवामान बदलामुळे कृषी औषधांच्या किमती वाढल्याने नाशिकचे शेतकरी त्रस्त

नाशिक :बागलाण तालुक्यात हवामान बदलाचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत असून, त्याचाच गैरफायदा काही कृषी सेवा केंद्र चालकांकडून घेतला जात आहे. रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता सांगत कीटकनाशके, बुरशीनाशके व इतर कृषी औषधांची अवाच्या सव्वा दराने विक्री केली जात असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण, आर्द्रता व तापमानातील चढ-उतार पाहायला मिळत आहे. यामुळे पिकांवर रोगांचा धोका वाढल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी वाढली असून, या गरजेचा फायदा घेत काही केंद्रांनी 'एमआरपी'पेक्षा अधिक दर, तसेच अनावश्यक औषधांचे पॅकेज शेतकऱ्यांच्या गळ्यात मारल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. औषधांच्या वाढीव दरांमुळे लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. काही शेतकऱ्यांनी सांगितले की, एका फवारणीसाठी पूर्वी ८०० ते १००० रुपये खर्च येत होता, तोच खर्च आता १५०० ते २००० रुपयांपर्यंत गेला आहे. कृषी विभागाची उदासीनताया प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या कृषी विभागाकडून मात्र तपासणी मोहिमा, दरपत्रकांची पडताळणी, तक्रारींची दखल याबाबत कोणतीही ठोस कारवाई दिसून येत नाही. तालुक्यातील बहुतांश कृषी सेवा केंद्रांवर दरपत्रके लावलेली नाहीत, तरीही संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. शेतकरी लुटला जात असताना यंत्रणा सुस्त असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. जर वेळीच पावले उचलली नाहीत, तर शेतकऱ्यांचा कृषी व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत आहे. शेतकऱ्यांची मागणीसर्व कृषी सेवा केंद्रांवर एमआरपी व दरपत्रक सक्तीने लावावे. औषध विक्रीत बिल देणे बंधनकारक करावे. तक्रार निवारणासाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करावी. दोषी केंद्रांवर दंड व परवाना रद्द करण्याची कठोर कारवाई करावी.
61 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 06:51 AM
तांत्रिक बिघाडामुळे पंकज मुंडेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण, पर्यायी व्यवस्थेसह मोहीम दौरा पुन्हा सुरू

तांत्रिक बिघाडामुळे पंकज मुंडेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण, पर्यायी व्यवस्थेसह मोहीम दौरा पुन्हा सुरू

छत्रपती संभाजीनगर:भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्रीपंकजा मुंडेयांच्या हेलिकॉप्टरला आजछत्रपती संभाजीनगरविमानतळावर तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने, उड्डाण घेण्यापूर्वीच हा बिघाड वैमानिकाच्या लक्षात आल्याने एक मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेमुळे समर्थकांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण पसरले होते. पंकजा मुंडेसध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज लातूर जिल्ह्यात त्यांच्या झंझावाती प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे झेपावण्याच्या तयारीत असतानाच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे निष्पन्न झाले. सुरक्षेच्या कारणास्तव वैमानिकाने तात्काळ उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला. जिद्द कायम, कार्यक्रम लांबणीवरया तांत्रिक बिघाडामुळे पंकजा मुंडे यांच्या लातूरमधील सभांच्या वेळेत काहीसा बदल झाला आहे. मात्र, कार्यकर्त्यांची निराशा होऊ नये म्हणून त्यांनी तातडीने पर्यायी व्यवस्था केली असून, त्या लातूरकडे रवाना होणार आहेत. "नियोजित कार्यक्रमांना थोडा उशीर झाला असला, तरी सर्व सभांना उपस्थित राहणार," असा संदेश त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आला आहे. मुंडे सुरक्षित असल्याची खात्री पटताच राज्यभरातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
49 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 03:54 AM
मुलांच्या आरोग्याचे संरक्षणः पर्यावरणीय अनुकूलतेसाठी पालकांचे मार्गदर्शक

मुलांच्या आरोग्याचे संरक्षणः पर्यावरणीय अनुकूलतेसाठी पालकांचे मार्गदर्शक

बदलत्या वातावरणाचा परिणाम लहान मुलांवर लगेच होतो. त्यामुळे पालकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. लहान मुलांनी किमान नऊ तासांची झोप घ्यावी. आहारामध्ये प्रथिने, कर्बोदके, फायबर आणि जीवनसत्वे यांचा वापर करावा. हलका व्यायाम व वेळेनुसार लसीकरण करून घ्यावे, लहान मुलांना दम लागत असेल तर तात्काळ तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. डॉ. महेंद्र चव्हाण, बालरोगतज्ज्ञ.
30 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 2, 2026, 11:56 AM
अनियंत्रित वाहन धुण्यामुळे स्थानिक समुदायातील सार्वजनिक आरोग्यास धोका

अनियंत्रित वाहन धुण्यामुळे स्थानिक समुदायातील सार्वजनिक आरोग्यास धोका

सदर शोरूम मध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर वाहन धुलाई केली जाते. मात्र धुलाईनंतर निर्माण होणाऱ्या दूषित पाण्याच्या निचऱ्यासाठी कोणतीही शोषखड्डे, ड्रेनेज व्यवस्था अथवा ऑइल सेपरेटर यंत्रणा उभारण्यात आलेली नाही. परिणामी ऑइलमिश्रित पाणी थेट महामार्गालगत उघड्यावर साचत असून या साचलेल्या दूषित पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच हे पाणी जमिनीत मुरल्यास भूजल प्रदूषित होण्याचीही शक्यता असल्याचे जाणकारांचे मत आहे.
77 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 10:45 AM
अनिश्चित हवामानाच्या पद्धतींमुळे नाशिकच्या शेतकऱ्यांना अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे

अनिश्चित हवामानाच्या पद्धतींमुळे नाशिकच्या शेतकऱ्यांना अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे

नाशिक :जिल्ह्यात सध्या हवामानात अचानक अनपेक्षित बदल दिसून येत आहेत. अनियमित तापमान आणि बदलती पर्जन्यमान परिस्थितीमुळे शेतकरी चिंतेत आहेत.गहू,ज्वारीआणि बाजरी सारख्या महत्त्वाच्या धान्य पिकांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान विभागाच्या अहवालानुसार, निफाड, नांदगाव आणि येवला तालुक्यात अवकाळी पावसाच्या ढगांनी अचानक हवामान बदलले. यामुळेगहूआणि इतर रब्बी पिकांचे वाढणारे टप्पे बाधित झाले असून पिकांना नुकसान होत आहे. काही भागात तापमानातील बदलामुळे उभ्या पिकांचे नुकसानही नोंदले गेले आहे. किडीचा प्रादुर्भावबदलत्या हवामानामुळे त्यांच्या पारंपरिकशेतीवेळापत्रकात अडथळे निर्माण झाले आहेत. पेरणी व कापणीच्या वेळेत बदल झाल्याने रोग व हानीकारक किडीचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. अशा करा उपाययोजना रब्बीज्वारीकणसांमध्ये दाणे भरण्याचीअवस्थापहिला पंधरवडा पक्ष्यांपासून संरक्षण करावे (पक्षीथांबे / मचाण बसविणे).पाण्याच्या उपलब्धतेनुसार तिसरे पाणी द्यावे व पक्षांपासून संरक्षण करावे.ज्वारी पिकाची कोळपणी व खुरपणी करुन पिक तणविरहीत ठेवावेउपलब्ध जमिनीतील ओलाव्याच्या स्थितीनुसार कोळपणी करावी आणि कोळपणी नंतर तण काढणी करावी. गहूफुलोरा अवस्था / ओंबी लागण्याची अवस्थासद्यःस्थितीत ओंब्या बाहेर पडल्या आहेत. अशावेळी वारा नसताना पाण्याची पाळी द्यावी. कारण त्यामुळे गहू लोळण्याची शक्यता असते. ओंब्या बाहेर पडल्यानंतर पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी देऊ नये. कारण त्यामुळे गव्हाच्या दाण्यांची चकाकी कमी राहून दर्जात घट होते. - ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन सेवा केंद्र, इगतपुरी
28 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 08:27 AM
प्रदूषणामुळे राष्ट्रीय आरोग्य आणीबाणी जाहीर, ठोस कारवाईची राहुल गांधींची मागणी

प्रदूषणामुळे राष्ट्रीय आरोग्य आणीबाणी जाहीर, ठोस कारवाईची राहुल गांधींची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली: वाढते प्रदूषण ही आता केवळ पर्यावरणीय समस्या राहिलेली नाही तर ती आता एक राष्ट्रीय आरोग्य आणीबाणी झाली आहे. त्यामुळे या मुद्द्यावर संसदेत चर्चा होणे गरजेचे असून, केंद्राने ठोस पावले उचलण्याची गरज लोकसभेचे विरोधी पक्षनेतेराहुल गांधीयांनी व्यक्त केली. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात उपाययोजनांसाठी संसाधने उपलब्ध करून देण्याची मागणी रविवारी गांधी यांनी केली. प्रदूषणासारख्या गंभीर मुद्द्यावर गेल्या काही दिवसांत भारतीय नागरिकांनी हजारो संदेश पाठवले आहेत. त्यात विशेषत: मुले, वृद्ध आणि कुटुंबाच्या आरोग्याबाबतची चिंता ठळकपणे पुढे येत आहे. भारतीय नागरिकांना केवळ पोकळ आश्वासने किंवा अहवाल नको आहेत. त्यांना स्वच्छ हवा हवी असल्याचे फेसबुक या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्येराहुल गांधींनीनमूद केले. उल्लेखनीय बाब म्हणजे गत आठवड्यातही राहुल गांधींनी साेशल मीडियाद्वारे वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्यावर व देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असून, या समस्येमुळे लहान मुले व वृद्धांना सर्वाधिक फटका बसत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली होती.
27 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 2, 2026, 06:32 AM
औद्योगिक स्पर्धात्मकता आणि कार्यक्षमता वाढवण्याचे भारताच्या अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट

औद्योगिक स्पर्धात्मकता आणि कार्यक्षमता वाढवण्याचे भारताच्या अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट

बजेटमध्ये 200 औद्योगिक क्लस्टरचे पुनरुज्जीवन योजनांमुळे स्पर्धात्मकता आणि कार्यक्षमता सुधारली जाईल. हे स्वागतार्ह आहे. चँपियन सूक्ष्म ही योजना सादर केली आहे. त्याचा सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना फायदा होईल. व्यापार देयक सवलत प्रणालीमुळे उद्योगांची देयके 45 दिवसांत मिळतील पण ह्यासाठी सर्व उद्योगांनी ह्या प्रणालीची नोंदणी केली तरच ह्याचा फायदा होईल. पातळी 2 आणि पातळी 3 शहरांमध्ये कॉर्पोरेट मित्र या गटाचे विकासाबाबत सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांच्या अनुपालन आवश्यकतांची पूर्तता करण्यात मदत करतील. लहान शहरांमधील उद्योगांचा विकास व वाढ होण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण होईल संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना
52 shares
😊
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 2, 2026, 05:32 AM
महाराष्ट्रात हवामानाचा इशाराः मुंबई, ठाणे आणि इतर भागात अवकाळी पावसाची शक्यता

महाराष्ट्रात हवामानाचा इशाराः मुंबई, ठाणे आणि इतर भागात अवकाळी पावसाची शक्यता

मुंबई:महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या सुरुवातीला वातावरणात मोठे बदल दिसणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावासाने हजेरी लावली असून मुंबई, ठाणे, पुणे शहरात ढगाळ वातावरण दिसून येत आहे. या आठवड्यासाठी हवामान विभागाने काय संकेत दिले आहेत ते जाणून घेऊया.राज्यात पुढील काही दिवसांत वातावरण झपाट्यानं बदलणार असून अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना IMD कडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज दिवसभरात कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.अरबी समुद्रातूनकोकण किनारपट्टीवर येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. यामुळेच पावसाळी वातावरण निर्माण झालं आहे.Union Budget 2026: मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरांना जोडणार 7 नव्या हाय-स्पीड ट्रेन, रेल्वे नेटवर्कचा विस्तार; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणाकिमान तापमानात वाढहवामान विभागाच्या मते, आता पावसासाठी वातावरण अनुकूल झालं आहे. राज्याभरीतल किमान तापमानात हळूहळू वाढ होत असून येत्या काही दिवसांत थंडीचा प्रभाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे.मुंबईमध्येपहाटे धुक्याची स्थिती दिसून येत असून दिवसभर आकाश निर्भ्र राहणार आहे. कमाल तापमान 31 अंश सेल्सियस राहून किमानतापमान 23 अंश सेल्सियस असणार आहे. ठाणे जिल्ह्यातील काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे.पश्चिम महाराष्ट्रात वातावरण आठवडाभर कोरडं राहणार असून, पुण्यात कमाल तापमान 30 अंश सेल्सियस तर किमान तापमान 15 अंश सेल्सियस असणार आहे. मराठवाड्यातील काही भागांत पावसाची शक्यता आहे. संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 31 अंश सेल्सियस असून, किमान तपामान 17 अंश सेल्सियस राहणार आहे.Vadhavan Airport: समुद्रातील पहिलं विमानतळ मुंबईजवळ उभारणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, पण केंद्राकडे अद्याप प्रस्ताव नाहीच; कारण काय?यलो अलर्ट कुठे?हवामान विभागानं जळगाव, नाशिक, धुळे, अहिल्यानगर आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. नाशिकमधील कमाल तापमान 31 अंश सेल्सियस असून किमान तापमानाचा पारा वाढून 18 अंश सेल्सियसवर पोहचला आहे. विदर्भातही थंडीचा कडाका कमी झाला असून,नागपूरमध्ये कमाल तापमान31 अंश सेल्सियस असून, किमान तापमान 14 अंश सेल्सियस नोंदवलं गेलं आहे.
82 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 2, 2026, 12:55 AM
महाराष्ट्रात पुरेसा पाऊस होऊनही विजेची टंचाई

महाराष्ट्रात पुरेसा पाऊस होऊनही विजेची टंचाई

गणेशचंद्र पिसाळ पाटण :कोयनेसह महाराष्ट्रात यंदा मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमी असला तरी सध्यस्थितीत धरणात मुबलक पाणी आहे. मात्र त्यानंतरही मागील आठ महिन्यांत तब्बल 149.629 दशलक्ष युनिट वीज कमी निर्माण झाली आहे.
19 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 2, 2026, 12:51 AM
बिबट्या ढिगाऱ्याखालीः वन विभागाने रात्रीच्या शोधासाठी औष्णिक ड्रोन कॅमेरे तैनात केले

बिबट्या ढिगाऱ्याखालीः वन विभागाने रात्रीच्या शोधासाठी औष्णिक ड्रोन कॅमेरे तैनात केले

रात्रीच्या थंड वातावरणात उष्ण रक्ताचा जीवंत प्राणी फिरत असेल, तर तेथे लाल स्पॉट दिसतो. त्याला थर्मल ड्रोन कॅमेरा म्हणतात. याद्वारे गत 48 तासांपासून बिऊर, उपवळे, तडवळे परिसर रात्रीचा पिंजून काढला जात आहे. मात्र त्यात बिबट्या कुठेही आढळला नाही. दिवस उजाडला की बिबट्या लपून बसतो. नंतर अंधार पडताच तो बाहेर पडतो. त्यामुळे वन विभागाचे अधिकारी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा थर्मल ड्रोन कॅमेऱ्याने त्याचा शोध घेत आहेत.
70 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 1, 2026, 10:00 PM
कोल्हापूर-कोकण रेल्वे मार्गः 27 बोगदे आणि अनेक पूल असलेला निसर्गप्रेरित प्रवास

कोल्हापूर-कोकण रेल्वे मार्गः 27 बोगदे आणि अनेक पूल असलेला निसर्गप्रेरित प्रवास

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, पन्हाळा, गगनबावडा या तालुक्यांतून आणि कोकणातील वैभववाडी तालुक्यातून जाणारा हा मार्ग निसर्गाच्या कुशीतून जाणार आहे. या मार्गावर 28 कि.मी. लांबीचे एकूण 27 बोगदे असतील. सर्वात मोठा बोगदा 3.96 कि.मी. लांबीचा आहे. 2 कि.मी.पेक्षा जादा लांबीचे 3 तर त्यापेक्षा कमी लांबीचे 24 बोगदे असतील. या मार्गावर रस्त्यावरील 55 उड्डाणपूल, रस्त्याखालील 68 पूल असतील. यासह छोटे पूल 74 तर मोठे पूल 55 असतील. या मार्गावर एकूण दहा स्थानकेही प्रस्तावित आहेत.
67 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 1, 2026, 01:18 PM
महाराष्ट्रात हवामान अपडेटः काही भागात हलक्या पावसाची शक्यता

महाराष्ट्रात हवामान अपडेटः काही भागात हलक्या पावसाची शक्यता

Weather Update :उद्या सोमवार दि. २ ते बुधवार दि. ४ फेब्रुवारी पर्यंतच्या ३ दिवसात महाराष्ट्रातील संगमनेर, अकोला, कोपरगांव, राहता, सिन्नर, इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, निफाड, सटाणा, कळवण, देवळा, मालेगाव, धुळे, साक्री, सिंदखेडा, शिरपूर इ. तालुके व नंदुरबार व जळगांव जिल्हे इत्यादि व लगतच्या परिसरात केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी झालाच तर २ ते ४ मिमी. इतक्या अगदी किरकोळ हलक्या पावसाची शक्यता जाणवते. गुरुवार दि. ५ फेब्रुवारी पासुन मात्र लगेचच ढगाळ वातावरण निवळण्याची शक्यता जाणवते. फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यातील तापमान-शनिवार दि.७ फेब्रुवारी पर्यन्तच्या आठवड्यात महाराष्ट्रात पहाटे ५ च्या किमान तापमानाचा पारा फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यातील त्याच्या ह्या काळातील सरासरी तापमानापेक्षा ३ ते ४ डिग्रीने अधिक राहून थंडी ऐवजी उत्तर कोकण व मध्य महाराष्ट्र तील १३ जिल्ह्यात थंडी ऐवजी रात्रीचा उकाडा जाणवेल.उर्वरित महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यात मात्र पहाटे ५ च्या किमान तापमानाचा पारा सरासरी इतका राहून संमिश्र वातावरणाच्या अनुभवातून केवळ माफक थंडीची शक्यता जाणवते.उर्वरित फेब्रुवारी महिन्यातील महाराष्ट्रातील थंडी-फेब्रुवारी महिन्यातील उर्वरित ३ आठवड्यात महाराष्ट्रात थंडी जाणवेल, परंतु मुंबईसह संपूर्ण कोकण खान्देश व मध्य महाराष्ट्र व छ. सं. नगर व जालना अश्या १९ जिल्ह्यात मात्र थंडीचे प्रमाण मात्र कमी असेल. फेब्रुवारी महिन्यातील महाराष्ट्रातील दिवसाचे कमाल तापमान -नाशिक व अहिल्यानगर असे दोन जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांत दुपारी ३ चे दिवसाचे कमाल तापमान सुद्धा दरवर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात जाणवणाऱ्या कमाल तापमानापेक्षा, ह्यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात दुपारचे कमाल तापमान अधिक असेल. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात दुपारीही उन्हाचा चटका जाणवेल. त्यामुळे रब्बीच्या बागायती शेत पिकांनाही ह्या महिन्यात अधिक सिंचनाच्या आवर्तनाची गरज भासण्याची शक्यता जाणवेल.उर्वरित फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे काय?संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात भागानुसार पावसाचे प्रमाण सहसा शून्य ते १० मिमी.असते. चालु २०२६ च्या संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात अहिल्यानगर छ. सं.नगर जालना अमरावती नागपूर भंडारा असे ६ जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यात पावसाची शक्यता ही सरासरी पेक्षा म्हणजे १० मिमी पेक्षा कमी असेल. म्हणजेच संपूर्ण महिना जवळपास पावसाविना कोरडा जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. असे वातावरण कशामुळे झाले?नेहमी जम्मू काश्मिर, लेह लडाख ह्यांच्या अक्षवृत्तांवरून पश्चिमेंकडून पूर्वेकडे जाणारे पश्चिमी प्रकशोभ सध्या ह्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अधिक दक्षिणेकडे म्हणजे पंजाब राजस्थान राज्यांच्या अक्षवृत्तांवरून पश्चिमेंकडून पूर्वेकडे जातांना, वाहणारे थंड व कोरडे वारे खान्देशसह सध्या उत्तर महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. शिवाय ह्या बरोबरच सध्या महाराष्ट्रावर प्रत्यावर्ती चक्रीय वारे स्थित असल्यामुळे, बं. उपसागरातील वाहून येत असलेली आर्द्रता ह्या थंड वाऱ्यात मिसळत आहे. म्हणून खान्देश सह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रावर ढगाचे सावट आहे.अहिल्यानगर, छ. सं.नगर, जालना, अमरावती, नागपूर, भंडारा, जिल्ह्यांत मात्र सरासरी इतक्या म्हणजे शून्य ते १० मिमी किंवा त्या पेक्षा कमी इतक्या किरकोळ पेंडकळवनी पावसाची शक्यता जाणवते. रब्बी पिकांच्या बाबतीत ही एक जमेची बाजू समजावी, इतकेच! - माणिकराव खुळेMeteorologist (Retd)IMD Pune.
32 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 1, 2026, 12:40 PM
कामाच्या ठिकाणी अनपेक्षित प्रसूतीः फेडेक्स कर्मचाऱ्याने बाथरूममध्ये बाळाला जन्म दिला

कामाच्या ठिकाणी अनपेक्षित प्रसूतीः फेडेक्स कर्मचाऱ्याने बाथरूममध्ये बाळाला जन्म दिला

या जीवसृष्टीत जेव्हा एखाद्या जीवाला गर्भधारणा होते, तेव्हा त्यात बरेच छोटे-मोठे शारीरीक बदल होत असतात. जीवांच्या जातीप्रमाणे गर्भधारणेचा ठरावीक काळही असतो. मानवाच्या बाबतीत हा काळ साधारणपणे ९ महिन्यांचा असतो. या गर्भधारणा काळमहिलांमध्येकाही अपरिहार्य बदल होत असतात. मात्र, अमेरिकेतील आयोवा येथून एक आश्चर्य चकित करणारी घटना समोर आली आहे. येथील 'फेडएक्स' नावाच्या कंपनीत कार्यरत असलेल्या एका महिलेने, कंपनीतच एका गोंडस मुलाला जन्म दिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आपण गर्भवती आहोत याची साधी कल्पनाही तिला नव्हती. नेमकं प्रकरण काय? -केसीसीआय आणि केईएनएस या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, एमीथिस्ट ब्लूमबर्ग असे यामहिलाकर्मचाऱ्याचे नाव आहे. संबंधित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आपली शिफ्ट संपवत असताना बाथरूमला गेली. यावेळी, तिला अचानकच असह्य वेदना होऊ लागल्या. यानंतर काही क्षणांतच बाळाचे डोके बाहेर आल्याचे दिला जाणवले. तिने कसा-बसा बाथरूमचा दरवाजा उघडला आणि मदतीसाठी हाक दिली. यानतंर, जॉनस्टन-ग्राइम्स फायर डिस्ट्रिक्टच्या टीमने घटनास्थळी पोहोचून तिची सुरक्षित प्रसूती केली. यानंतर बाळाला आणि त्याच्या आईला रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या आई आणि मुलगा दोघेही सुखरूप असून तिने मुलाचे नाव 'ओनिक्स किंग ईस्टरली' ठेवण्यात आले आहे. एमीथिस्ट आधीच एका मुलाची आई आहेत. पहिल्या वेळेस तिला गर्भधारणेची सर्व सामान्य लक्षणे जाणवली होती. मात्र यावेळी ती तिला जाणवली नाही. तिचे वजन वाढण्याऐवजी कमी होत गेले. "मला केवळ प्रसूतीदरम्यान पाठदुखी सुरू झाली आणि बाळ खाली सरकल्यावरच त्याच्या हालचाली जाणवल्या," असे तिने सांगितले. आपल्या मुलाला तिने गमतीने 'आमचा फेडएक्स बेबी' असेही म्हटले आहे. खरे तर, अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही, तर यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. काही आठवड्यांपूर्वी इलिनॉयमधील मेलानी स्मिथ या २८ वर्षीय महिलेला ख्रिसमसच्या दिवशी अचानकच एका मुलाला जन्म दिला होता.
9 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 1, 2026, 10:13 AM
बांधकाम स्थळांमध्ये योग्य सुरक्षा उपायांचा आणि प्रदूषणाच्या देखरेखीचा अभाव

बांधकाम स्थळांमध्ये योग्य सुरक्षा उपायांचा आणि प्रदूषणाच्या देखरेखीचा अभाव

स्थळपाहणी अहवालानुसार आढळलेल्या बाबी विकासकांनी बांधकाम प्रकल्पांच्या भोवती किमान 25 फूट उंचीचे धातूचे पत्रे लावण्यात आल्याचे दिसून येत नाही.,बांधकाम चालू असणाऱ्या सर्व इमारतींच्या भोवती ओल्या हिरव्या कापडाने / ओल्या तागाच्या कापडाने / ताडपत्रीने बंदिस्त करण्यात आल्याचे दिसून येत नाही.,बांधकामच्या ठिकाणी वॉटर स्प्रिंकलर / स्मॉग गन द्वारे सतत फवारणी करण्यात आल्याचे दिसून येत नाही. बांधकाम जागेवरील हवेमध्ये प्रदूषण करणाऱ्या भंगार / पाडकाम साहित्यावर पाणी शिंपडण्यात आल्याचे दिसून येत नाही. बांधकाम साहित्य तसेच रेडी मिक्स काँक्रीट वाहून नेणारी सर्व वाहने पूर्णपणे वरच्या बाजूने व सर्व बाजूनी पूर्ण झाकलेली असावीत. वाहनातून कोणत्याही प्रकारे गळती होऊ नये तसेच ओव्हरलोड होऊ नये, ह्याची दक्षता घेतल्याचे दिसून येत नाही. , बांधकामाच्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यात आल्याचे दिसून येत नाही. बांधकामाच्या ठिकाणी सेन्सर आधारित वायू प्रदूषण मॉनिटर्स लावणे बंधनकारक असेल, प्रदूषणाची पातळी ओलांडणार नाही याबाबत उपाययोजना करण्यात आल्याचे दिसून येत नाही. बांधकामाच्या ठिकाणी ग्राइंडिंग, कटिंग, ड्रोलिंग, सोईग आणि ट्रिमिंग ची कामे बंदिस्त भागात करावी व हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी पाण्याचे स्प्रिंकलर वापरून सतत फॉगिंग करण्यात आल्याचे दिसून येत नाही. बांधकामाच्या ठिकाणी असणारी माती, वाळू, बांधकाम साहित्य हे बंदिस्त भागामध्ये साठविण्यात आल्याचे दिसून येत नाही.
5 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 1, 2026, 09:40 AM
कांद्याच्या लागवडीमध्ये स्थायी पिकाचे संरक्षण इष्टतम करणेः एक मार्गदर्शक

कांद्याच्या लागवडीमध्ये स्थायी पिकाचे संरक्षण इष्टतम करणेः एक मार्गदर्शक

Kanda crop Seed :कांदाबीजोत्पादनाचे उभे पीक दर्जेदार बियाणे मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, या काळात योग्य खत, पाणी आणि कीड व्यवस्थापन आवश्यक असते. या काळात नेमके व्यवस्थापन कसे केले जाते, ते समजून घेऊयात... कांदाबीजोत्पादनाचे उभे पीक पीक संरक्षण - ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन सेवा केंद्र, इगतपुरी
44 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 1, 2026, 09:19 AM
वडगावमधील अवैध लाकडाची वाहतूक वन विभागाने रोखली

वडगावमधील अवैध लाकडाची वाहतूक वन विभागाने रोखली

वनविभागाकडून मिळालेली माहीती अशी की, नागाव (ता. हातकणंगले) येथील पवन महादेव लोंढे व ट्रॅक्टर मालक सुदर्शन अरुण बिरांजे हे दोघे विनापरवाना मौजे वडगाव ते नागाव दरम्यान लाकूड वाहतूक करत होते. दरम्यान वनविभागाच्या गस्त पथकाने मौजे वडगांव गावच्या हद्दीत लाकूड घेवून जाणारा ट्रॅक्टर ( क्र. एम एच ५१ ए २८७७) आडवला. यामधील पवन लोंढे व सुदर्शन बिरांजे यांच्याकडे चौकशी केली असता कसलेही अधिकृत परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले.
42 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 1, 2026, 08:45 AM
बुलढाणा जिल्ह्यात फेब्रुवारीमध्ये हवामानात लक्षणीय बदल होईलः आय. एम. डी. चा अंदाज

बुलढाणा जिल्ह्यात फेब्रुवारीमध्ये हवामानात लक्षणीय बदल होईलः आय. एम. डी. चा अंदाज

थंडी आता हळूहळू ओसरत असून फेब्रुवारीत बुलढाणा जिल्ह्यात तसेच राज्याच्या हवामानात लक्षणीय बदल जाणवण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या अंदाजानुसार या महिन्याततापमानाचाआलेख सातत्याने चढता राहणार असून हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. त्यामुळे हिवाळ्याचा निरोप घेऊन उन्हाळ्याची चाहूल लागल्याचे चित्र असून याचा थेट परिणामशेती, जलसाठे आणि मानवी आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात बुलढाणा जिल्ह्यात कमालतापमान३० ते ३२ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. मात्र, महिन्याच्या उत्तरार्धात तापमानाचा पारा आणखी वाढून ३५ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. किमान तापमानही १६ ते २० अंश सेल्सिअसपर्यंत राहणार असल्याने थंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, तर दुपारच्या वेळेत उष्णतेचा त्रास अधिक जाणवू शकतो. जलव्यवस्थापन करावे! फेब्रुवारी महिन्यात पावसाची शक्यता अत्यल्प असल्याचे हवामान तज्ज्ञ सांगतात. बहुतांश दिवस स्वच्छ आकाश, कमी आर्द्रता आणि कोरडे वातावरण राहणार असल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम थेट रब्बी पिकांवर होणार असून सध्या अंतिम वाढीच्या टप्प्यात असलेल्या हरभरा, गहू, ज्वारीसह इतर पिकांना आवश्यक असलेल्या ओलाव्याची कमतरता भासू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना जलव्यवस्थापन करावे लागणार आहे. उन्हात सिंचन टाळावे ! कृषी तज्ज्ञांच्या मते, या काळात सिंचनाचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक आहे. ठिबक व तुषार सिंचनासारख्या कमी पाण्यात अधिक परिणामकारक पद्धतींचा वापर करावा, तसेच दुपारच्या तीव्र उन्हात सिंचन टाळावे, असा सल्ला देण्यात येत आहे.पाणीसाठ्याचाकाटकसरीने वापर केल्यास रब्बी पिकांचे नुकसान टाळता येऊ शकते. फेब्रुवारीत हवामानातील बदल अधिक स्पष्ट होईल. हेही वाचा : कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारी परदेशी भाजीपाला शेती; जाणून घ्या सविस्तर
36 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 1, 2026, 08:28 AM
पर्यावरण शिक्षणाचे विसरलेले महत्त्व

पर्यावरण शिक्षणाचे विसरलेले महत्त्व

निसर्ग आपला मित्र! हे सुवचन केवळ शाळेत फळ्यावर लिहिले जाते, मुलांकडून वाचून घेतले जाते, पण ते शिकणे राहून जाते. शिकून सवरून मोठे झाल्यावर लक्षात येते की, जगण्यात उतरणे तर दूरच; परंतु पर्यावरणाच्या ‌‘प‌’ ची ओळख देखील झालेली नसते. पर्यावरणाचा विचार करणाऱ्यांची, त्याविषयी बोलणाऱ्यांची, पर्यावरणपूरक जीवन जगणाऱ्यांची संख्या तर नगण्य दिसून येते. शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण विषयाचे स्थानही नगण्य आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. इतर विषयांच्या तुलनेत पर्यावरण विषय कुणाच्या खिजगणतीतही नाही, कारण त्याची शंभर गुणांची परीक्षाच नाही. शिक्षक, विद्यार्थी, पालक सगळ्यांनाच अतिरिक्त वाटणारा विषय म्हणजे पर्यावरण! तो जीवनावश्यक असूनही त्याची ओळख देखील नसणे, ही तर खरी शोकांतिका आहे. मग पुढची पिढी केवळ आत्मकेंद्रित होत आहे, असा नाराजीचा सूर काढण्यावाचून आपल्या हाती काही उरत नाही.
43 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 1, 2026, 07:48 AM
पर्यावरण संवर्धनासाठी पनवेल महानगरपालिकेची कटिबद्धता

पर्यावरण संवर्धनासाठी पनवेल महानगरपालिकेची कटिबद्धता

नागरिकांचे आरोग्य, स्वच्छ हवा व पर्यावरण संरक्षण याबाबत पनवेल महापालिका कटिबद्ध असून, यापुढेही अशा प्रकारच्या तपासण्या व कारवाई नियमितपणे सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
69 shares
😊
Pudhari logo
Pudhari
Feb 1, 2026, 05:58 AM
अर्थमंत्र्यांनी आर्थिक विकासासाठी त्रिस्तरीय दृष्टिकोनाची रूपरेषा मांडली

अर्थमंत्र्यांनी आर्थिक विकासासाठी त्रिस्तरीय दृष्टिकोनाची रूपरेषा मांडली

अर्थमंत्र्यांनी पुढे सांगितले की, या त्रिस्तरीय दृष्टिकोनासाठी सहाय्यक वातावरण आवश्यक आहे. आमची पहिली आवश्यकता म्हणजे संरचनात्मक सुधारणांची अनुकूल आणि प्रगतीशील गती राखणे. दुसरी आवश्यकता म्हणजे कार्यक्षम भांडवल वाटप आणि चांगल्या जोखीम व्यवस्थापनाचा पाया रचणे. तिसरी आवश्यकता म्हणजे सुशासनाला पाठिंबा देण्यासाठी एआय अनुप्रयोग आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करणे.
90 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Jan 31, 2026, 02:36 PM
महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीदरम्यान सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीदरम्यान सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

Sunetra Pawar took Oath as Deputy CM of Maharashtra : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी विमान अपघातात बारामतीमध्ये निधन झालं. त्यांच्या निधनानंतर तीन दिवसांनी आज ३१ जानेवारी रोजी सुनेत्रा अजित पवार यांनी राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्या शपथ ग्रहण समारंभानंतर मराठी अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट केली आहे. सगळा महाराष्ट्र राजकारणाचा क्रूर, हिंस्त्र आणि निर्दयी खेळ बघतोय. अर्थात हा काळ यावाच लागतो. महाराष्ट्रातल्या बहुजनांना ही नीच विचारसरणी समजून त्यांचे डोळे उघडेपर्यंत याहून अनेक खुनशी, रक्तरंजीत घटनांचे साक्षीदार आपल्याला व्हायचे आहे. असो.…सुनेत्रावहिनींनी आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांना मी जेवढे पाहिले आहे तेवढ्या प्रसंगात अतिशय संवेदनशील, मायाळू आणि पर्यावरणावर प्रेम असलेलं व्यक्तीमत्त्व मला दिसलं.तीन वर्षांपुर्वी त्यांनी स्वत: फोन करून मला त्यांच्या एनव्हायरलमेन्टल फोरमच्या वर्धापनदिनादिवशी प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रित केलं होतं. त्याआधी मला अजितदादांच्या पत्नी याव्यतिरीक्त एक व्यक्ती म्हणून त्यांच्याबद्दल फारशी ओळख नव्हती.…तिथं गेल्यावर मला समजलं की सुनेत्रावहिनींनी बारामतीमध्ये एनव्हायरमेन्टल फोरमच्या माध्यमातनं पर्यावरणविषयक जागृतीचं अफाट काम केलंय ! एखाद्या राजकीय नेत्याच्या कुटूंबियांनी पदाचा, अधिकारांचा, आर्थिक सबलतेचा, जनाधाराचा, सामाजिक प्रतिष्ठेचा वापर समाजोपयोगी कामांसाठी कसा करावा, याचं उत्तम उदाहरण पाहिलं मी.कार्यक्रमादिवशी संवाद साधताना वहिनींचा निसर्ग, प्राणी, पक्षी, झाडं यावरचा सखोल अभ्यास पाहुन मी अक्षरश: थक्क झालो!पर्यावरणशास्त्र, हवामानबदल, प्रदुषण, प्राणी-पक्षी याबद्दल सर्वांमध्ये, विशेषत: लहान मुलांमध्ये अवेअरनेस यावा यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतलेले दिसून आले. हल्ली मोबाईल गेम्समध्ये अडकलेल्या लहान मुलांना खुल्या मैदानात आणून लगोरी, सूरपारंब्या, गोट्या, विटीदांडू अशा अनेक लुप्त होत चाललेल्या खेळांच्या स्पर्धाही त्या भरवतात हे समजले. आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीत खूप मोलाचं काम त्या करतात हे पाहून भारावून गेलो.आज त्या दु:खातून सावरल्याही नाहीत, तोवर त्यांना या राजकारणाच्या जुल्मी सारीपाटावर स्वत:ला उभं करावं लागलं. अर्थात यामागचं गूढ राजकारण न समजण्याइतक्या त्या कमकुवत नाहीत. ‘जवळचे आणि दूरचे’ ओळखून त्या या सगळ्याला समर्थपणे तोंड देतील हा विश्वास आहे. उपमुख्यमंत्रीपद हे संवैधानिक नाही, त्यामुळे मिडीयानं पसरवलेलं ‘पहिल्या महिला उपमुख्यमंत्री’ वगैरे बिरूद मला फार महत्त्वाचं वाटत नाही. त्याहून जास्त पतीच्या निधनाचं दु:ख बाजूला ठेवून त्यांची अपुर्ण स्वप्नं पुर्ण करण्यासाठी काटेरी सिंहासन निवडणारी खंबीर भगिनी म्हणून त्यांचा अभिमान आहे.अभिनंदन सुनेत्राताई, अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे. राज्याच्या ११ व्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवककल्याणआणि अल्पसंख्याक विकास ही तीन खाती देण्यात आली आहेत. तर अजित पवारांचे नियोजन आणि वित्त हे खाते मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीसयांनी स्वतःकडे ठेवले आहे.
79 shares
😢
Loksatta logo
Loksatta
Jan 30, 2026, 03:20 PM
रेल्वे रुळाखाली कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकल्यामुळे ठाणे-कळवा रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत.

रेल्वे रुळाखाली कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकल्यामुळे ठाणे-कळवा रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत.

ठाणे– कळवा रेल्वे रूळाखाली असलेल्या नाल्यामधील कचऱ्याला शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अचानकपणे आग लागली. या आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले. परिणामी कर्जत कसाऱ्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक १० ते १५ मिनिटे उशीराने धावत होती. कळवा येथील रेल्वे रूळाखाली असलेल्या नाल्यामध्ये शुक्रवारी ५ वाजताच्या सुमारास कचऱ्याला आग लागली. या आगीच्या धुराचे लोट सर्वत्र पसरले. परिणामी ऐन गर्दीच्यावेळी धुराचे लोट पसरत असल्यान कर्जत कसाराकडे जाणाऱ्या लोकल गाड्या १० ते १५ मिनिटे उशीरा धावत आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रेल्वे पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. कचऱ्याला लागलेली आग रेल्वे पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
75 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Jan 29, 2026, 02:37 PM
वेशभूषेची कलाः कुंपोचे मंत्रमुग्ध करणारे हेस्टॅक नृत्य

वेशभूषेची कलाः कुंपोचे मंत्रमुग्ध करणारे हेस्टॅक नृत्य

काय आहे प्रकार खरे तर या नृत्यात एक व्यक्ती डोक्यापासून पायापर्यंत वाळलेल्या ताडाच्या पानांच्या किंवा पेंढ्याच्या ढिगाऱ्याखाली पूर्णपणे स्वतःला झाकून घेतो. बाहेरून पाहणाऱ्याला कोणताही माणूस दिसत नाही, फक्त फिरणारा गवताचा ढिगारा दिसतो. या नर्तकाला कुम्पो म्हणतात. कुम्पोच्या डोक्यावर एक लाकडी काठी असते. नाचताना हा नर्तक त्या काठीवर स्वतःला तोलून धरतो आणि अत्यंत वेगाने भवऱ्यासारखा गोलाकार फिरतो.
38 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Jan 26, 2026, 02:48 PM
फेब्रुवारीमध्ये डाळिंब पीक नियमन आणि कीटक व्यवस्थापन

फेब्रुवारीमध्ये डाळिंब पीक नियमन आणि कीटक व्यवस्थापन

Dalimb Crop Management :डाळिंबपिकाच्या बाबतील फेब्रुवारी महिन्यात (अंबिया बहार) पिक नियमन करणे महत्वाचे आहे. सध्याडाळिंबपीक नवीन पालवी फुटण्याची अवस्थेत असून या काळात विशेष काळजी घ्यावी लागते. डाळिंब - आंबिया बहार (फेब्रुवारी पिक नियमन)कीड व्यवस्थापननवीन पालवी फुटण्याची अवस्थापहिले पाणी दिल्यानंतर १० ते १५ दिवसांनी निळे किंवा पिवळे चिकट सापळे २५ ते ३० सापळे प्रती एकर याप्रमाणे झाडाच्या सर्वात उंच फांदीपासून १० ते १५ सें.मी. खाली बांधवे. हे सापळे चिकटलेल्या किडीनुसार २० ते २५ दिवसांनी बदलावेत. वाढीची अवस्थाॲझाडिरॅक्टिन / कडुनिंब तेल १% (१० हजार पीपीएम) ३ मिली किंवा करंज तेल ३ मिली किंवा वरील दोन्ही तेलांचे मिश्रण प्रत्येकी ३ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे आवश्यकतेनुसार ७ ते १० दिवसांच्या अंतराने एक-दोन फवारण्या घ्याव्यात. फुलधारणा / फुलकळी येण्याची अवस्था७ ते १० दिवसांच्या अंतराने सायअँट्रानिलीप्रोल (१०.२६ ओडी) ०.९ मिली किंवा क्लोर अँट्रानिलीप्रोल (१८.५ थायक्लोप्रिड (४८० एससी) ०.५ मिली अधिक स्टीकर स्प्रेडर ०.२५ एससी) ०.३ मिली किंवा फ्लुबेन्डीॲमाइड मिली लिटर पाणी याप्रमाणे एक-दोन फवारण्या घ्याव्यात. - ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
69 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Jan 22, 2026, 02:55 PM
अचानक हवामान बदलामुळे निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक रोग आणि आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे

अचानक हवामान बदलामुळे निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक रोग आणि आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे

नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात बुधवारी (दि. २१) दिवसभर ढगाळ वातावरण होते. बदलत्या वातावरणामुळे तालुक्यातील प्रमुख पिके असलेल्या कांदा, गहू, हरभऱ्यावर मावा आणि करपा रोगाचा, तर द्राक्ष पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. रोगांचा फैलाव रोखण्यासाठी औषध फवारणीचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसू लागली आहे. यंदा पावसाचे प्रमाण जास्त राहिल्याने शेतकऱ्यांनी गहू, कांदा, हरभरा यासह भाजीपाला व इतर नगदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी महिन्यात तीव्र थंडी जाणवत होती. मात्र, अलीकडे अचानक हवामानात बदल होऊन थंडी कमी झाली आणि ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या बदलामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. निफाड तालुक्यात नद्यांमुळे पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर असल्याने बाष्पीभवन वाढते. परिणामी, धुके तयार होऊन त्याचा थेट परिणाम पिकांवर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याशिवाय अतिवृष्टीमुळे कांद्याची रोपे खराब झाल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार रोपे लावावी लागली, तर काहींनी विकतची रोपे घेऊन लागवड केली. त्यामुळे यंदा कांदा पिकाच्या खर्चात आधीच वाढ झाली असून, त्यातच ढगाळ हवामानामुळे फवारणीचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे. द्राक्ष उत्पादकशेतकरीहीचिंतित गेल्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागायतदार आधीच आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. मोठा खर्च करूनही साठ ते सत्तर टक्के द्राक्ष बागा फेल गेल्या आहेत. अशा परिस्थितीत आता ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष पिकावर मावा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला असून, त्यामुळे द्राक्ष उत्पादकशेतकरीहीमोठ्या चिंतेत आहेत. या पिकांवर अधिक परिणाम • कांदा, गहू व हरभरा या तीन पिकांसाठी थंडी अधिक पोषक मानली जाते. • मात्र, अलीकडे वातावरणात अचानक झालेला बदल आणि वाढलेले ढगाळ वातावरण यामुळे कांदा, गहू, हरभरा तसेच भाजीपाला पिकांवर मावा व करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. • परिणामी, औषध फवारणीचा खर्च वाढून शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. थंडीचे प्रमाण घटले; पारा १०.७ अंशांवर निफाड तालुक्यात मंगळवारी (दि. २०) ७.९ अंश तापमानाची नोंद झाली होती, तर बुधवारी (दि. २१) ढगाळ वातावरणामुळे तापमानात ३ अंशांची वाढ होऊन तापमान १०.७ अंश नोंदवण्यात आले. सध्या कांदा, गहू, हरभरा व द्राक्ष या पिकांची वाढ मंदावलेली आहे. फुलांचा तसेच फळांचा आकार लहान राहतो आहे. गहू, हरभरा व मका पिकांची पाने पिवळी पडत असून फुलगळही मोठ्या प्रमाणावर होत आहे. यावर उपाययोजना म्हणून रात्रीच्या वेळीशेतीच्यासभोवती धूर केल्यास थंडीचा परिणाम कमी होतो. सकाळी थंडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी स्प्रिंकलरचा वापर करता येईल.- जितेंद्र पोपळे, कृषी सहायक, निफाड. कांदा पिकाला एकरी ७० ते ८० हजार होणारा खर्च होणा आहे. गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे कांद्याची रोपे खराब झाली. काही प्रमाणात नवीन रोपांची लागवड केली, तर काही विकत घेतली. वाढलेल्या खर्चामुळे चिंता वाढली आहे.- सचिन चकोर, कांदा उत्पादक शेतकरी. गतवर्षात झालेली अतिवृष्टी, त्यानंतर कडाक्याची थंडी आणि आता ढगाळ हवामानामुळे द्राक्ष घड तयार होण्यास अडचणी येतात. तापमानात चढ-उतारामुळे द्राक्षावर भुरी, डावणी या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. एकरी दोन लाखांपर्यंत झालेला खर्च देखील निधणे मुश्किल आहे.- विजय पानगव्हाणे, द्राक्ष बागायतदार, उगाव. हेही वाचा : तूर शेती ठरतेय शेतकऱ्यांना फायद्याची; पारंपरिक पिकांना फाटा देत तयार होतंय तूर हब
8 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Jan 22, 2026, 02:55 PM
अचानक हवामान बदलामुळे निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक रोग आणि आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे

अचानक हवामान बदलामुळे निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक रोग आणि आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे

नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात बुधवारी (दि. २१) दिवसभर ढगाळ वातावरण होते. बदलत्या वातावरणामुळे तालुक्यातील प्रमुख पिके असलेल्या कांदा, गहू, हरभऱ्यावर मावा आणि करपा रोगाचा, तर द्राक्ष पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. रोगांचा फैलाव रोखण्यासाठी औषध फवारणीचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसू लागली आहे. यंदा पावसाचे प्रमाण जास्त राहिल्याने शेतकऱ्यांनी गहू, कांदा, हरभरा यासह भाजीपाला व इतर नगदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी महिन्यात तीव्र थंडी जाणवत होती. मात्र, अलीकडे अचानक हवामानात बदल होऊन थंडी कमी झाली आणि ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या बदलामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. निफाड तालुक्यात नद्यांमुळे पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर असल्याने बाष्पीभवन वाढते. परिणामी, धुके तयार होऊन त्याचा थेट परिणाम पिकांवर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याशिवाय अतिवृष्टीमुळे कांद्याची रोपे खराब झाल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार रोपे लावावी लागली, तर काहींनी विकतची रोपे घेऊन लागवड केली. त्यामुळे यंदा कांदा पिकाच्या खर्चात आधीच वाढ झाली असून, त्यातच ढगाळ हवामानामुळे फवारणीचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे. द्राक्ष उत्पादकशेतकरीहीचिंतित गेल्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागायतदार आधीच आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. मोठा खर्च करूनही साठ ते सत्तर टक्के द्राक्ष बागा फेल गेल्या आहेत. अशा परिस्थितीत आता ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष पिकावर मावा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला असून, त्यामुळे द्राक्ष उत्पादकशेतकरीहीमोठ्या चिंतेत आहेत. या पिकांवर अधिक परिणाम • कांदा, गहू व हरभरा या तीन पिकांसाठी थंडी अधिक पोषक मानली जाते. • मात्र, अलीकडे वातावरणात अचानक झालेला बदल आणि वाढलेले ढगाळ वातावरण यामुळे कांदा, गहू, हरभरा तसेच भाजीपाला पिकांवर मावा व करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. • परिणामी, औषध फवारणीचा खर्च वाढून शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. थंडीचे प्रमाण घटले; पारा १०.७ अंशांवर निफाड तालुक्यात मंगळवारी (दि. २०) ७.९ अंश तापमानाची नोंद झाली होती, तर बुधवारी (दि. २१) ढगाळ वातावरणामुळे तापमानात ३ अंशांची वाढ होऊन तापमान १०.७ अंश नोंदवण्यात आले. सध्या कांदा, गहू, हरभरा व द्राक्ष या पिकांची वाढ मंदावलेली आहे. फुलांचा तसेच फळांचा आकार लहान राहतो आहे. गहू, हरभरा व मका पिकांची पाने पिवळी पडत असून फुलगळही मोठ्या प्रमाणावर होत आहे. यावर उपाययोजना म्हणून रात्रीच्या वेळीशेतीच्यासभोवती धूर केल्यास थंडीचा परिणाम कमी होतो. सकाळी थंडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी स्प्रिंकलरचा वापर करता येईल.- जितेंद्र पोपळे, कृषी सहायक, निफाड. कांदा पिकाला एकरी ७० ते ८० हजार होणारा खर्च होणा आहे. गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे कांद्याची रोपे खराब झाली. काही प्रमाणात नवीन रोपांची लागवड केली, तर काही विकत घेतली. वाढलेल्या खर्चामुळे चिंता वाढली आहे.- सचिन चकोर, कांदा उत्पादक शेतकरी. गतवर्षात झालेली अतिवृष्टी, त्यानंतर कडाक्याची थंडी आणि आता ढगाळ हवामानामुळे द्राक्ष घड तयार होण्यास अडचणी येतात. तापमानात चढ-उतारामुळे द्राक्षावर भुरी, डावणी या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. एकरी दोन लाखांपर्यंत झालेला खर्च देखील निधणे मुश्किल आहे.- विजय पानगव्हाणे, द्राक्ष बागायतदार, उगाव. हेही वाचा : तूर शेती ठरतेय शेतकऱ्यांना फायद्याची; पारंपरिक पिकांना फाटा देत तयार होतंय तूर हब
21 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Jan 18, 2026, 02:42 PM
नागपूर महानगरपालिकेत काम करत असताना अपघाताने स्वच्छता कर्मचाऱ्याचा मृत्यू

नागपूर महानगरपालिकेत काम करत असताना अपघाताने स्वच्छता कर्मचाऱ्याचा मृत्यू

नागपूर -महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने कार्यरत ए.जी. एन्व्हिरो प्रा. लि. या कंपनीतील स्वच्छतादूत सिद्धू घोडके यांचा आज अपघाती मृत्यू झाल्याने वातावरण तापले. कंपनीच्या गाडी दुरुस्ती विभागातील निष्काळजीपणामुळे हा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुली असा परिवार आहे.
4 shares
😢
Loksatta logo
Loksatta
Jan 15, 2026, 02:51 PM
भारत विरुद्ध न्यूझीलंड 3 रा एकदिवसीय सामनाः हवामान परिस्थिती क्रिकेटला अनुकूल

भारत विरुद्ध न्यूझीलंड 3 रा एकदिवसीय सामनाः हवामान परिस्थिती क्रिकेटला अनुकूल

India vs NewZeland 3rd ODI Weather Update:शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजयाची नोंद केली होती. तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने पुनरागमन केलं आणि दमदार विजय मिळवला. यासह मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. त्यामुळे मालिकेतील तिसरा सामना आता दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. हा सामना १८ जानेवारीला इंदुरमध्ये खेळवला जाणार आहे. दरम्यान या सामन्यावेळी कसं असेल हवामान? जाणून घ्या. कसं असेल हवामान? भारत आणि न्यूझीलंड हा सामना मालिकेतील निर्णायक सामना असणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सामना इंदुरच्या आहिल्याबाई होळकर स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. दरम्यान १८ जानेवारीला होणाऱ्या सामन्यात इंदुरमधील तापमान २७ डिग्री इतकं असेल. तर पाऊस पडण्याची शक्यता ही ० टक्के असणार आहे. वारे ११ किमी प्रतितास वेगाने वाहतील. तर सामन्यावेळी दिवसभर ऊन असेल. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना ५०-५० षटकांचा पूर्ण सामना पाहायला मिळेल. भारतीय संघाला पहिल्या सामन्यानंतर मोठा धक्का बसला आहे. संघातील स्टार अष्टपैलू खेळाडू वॉशिग्ंटन सुंदर वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे. पहिल्या सामन्यात गोलंदाजी करत असताना तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू आयुष बदोनीला संघात स्थान देण्यात आलं आहे. पण त्याला प्लेईंग ११ मध्ये खेळण्याची संधी दिली गेली नव्हती. दुसऱ्या सामन्यात नितीश कुमार रेड्डीचा संघात समावेश करण्यात आला होता. आता तिसऱ्या सामन्यात आयुष बदोनीला पदार्पण करण्याची संधी दिली जाणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ: भारतीय संघ: शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, रोहित शर्मा,केएल राहुल(यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा,कुलदीप यादव,अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, आयुष बदोनी.
81 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Jan 12, 2026, 03:56 PM
तापमानात वाढ झाल्याने राज्यात थंडीची लाट ओसरली

तापमानात वाढ झाल्याने राज्यात थंडीची लाट ओसरली

रविवारपर्यंत राज्यात चांगलाच गारठा होता. मात्र, सोमवारी किमान तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ झाल्याने सायंकाळी ७ ते ९ या वेळेत जाणवणारा गारठा कमी होण्यास सुरुवात झाली. उत्तरेतून येणाऱ्या शीतलहरीचा प्रभाव कमी होण्यास किमान एक आठवडा लागणार आहे. दरम्यान, किमान तापमानात १४ जानेवारीपासून हळूवार घट होईल असे संकेत आहेत.
86 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Jan 12, 2026, 03:03 PM
महाराष्ट्र नगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संभाव्य बायोपिकवर चर्चा

महाराष्ट्र नगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संभाव्य बायोपिकवर चर्चा

महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, येत्या १५ जानेवारीला राज्यात मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार आहे, तर १६ जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीचा निकाल लागणार आहे. प्रचाराच्या तोफा १३ तारखेच्या संध्याकाळी थंडावतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पनवेल या ठिकाणी मुलाखत पार पडली. प्रसाद ओक आणि अमृता खानविलकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर जर बायोपिक आला तर नाव काय असेल आणि भूमिका कोण करेल ते सांगितलं. तुमच्यावर जर बायोपिक आला तर नाव काय असेल आणि कोण भूमिका करेल? असं प्रसाद ओक आणिअमृता खानविलकरयांनी विचारलं तेव्हादेवेंद्र फडणवीसयांनी उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले माझ्यावर बायोपिक आला तर त्याचं नाव आपला देवाभाऊ असेल, तसंच या चित्रपटात माझी भूमिका कोण करेल मला माहीत नाही पण प्रसाद ओक तयार असतील मला ठाऊक आहे की ते उत्तमरित्या माझं काम करु शकतील. त्यावर प्रसाद ओक म्हणाले की मला माझा जनसंपर्क तुमच्याइतका वाढवावा लागेल या प्रश्नोत्तरानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तसंच या मुलाखतीत रॅपिड फायर राऊंडही चांगलाच चर्चेत राहिला. विकास की पर्यावरण? देवेंद्र फडणवीस : पर्यावरणपूरक विकास धर्म की कर्तव्य? देवेंद्र फडणवीस : आपल्या धर्मातच सांगितलं आहे, गीतेतच सांगितलं आहे की कर्तव्य हेच धर्म आहे. शहरं कशी असायला हवीत लिव्हेबल की लव्हेबल? देवेंद्र फडणवीस : शहरं लिव्हेबल आधी करावी लागतील, तशी झाली की आपोआप लव्हेबल होतील. फिल्मसिटी की आयटी सिटी? देवेंद्र फडणवीस : फिल्मसिटीमध्ये आपण आयटी सिटी करतो आहोत. आता फिल्म पोस्ट प्रॉडक्शन झाली आहे. घरी गेल्यानंतर राजकारणावर चर्चा होते की संगीतावर?देवेंद्र फडणवीस : राजकारणावर चर्चा मुळीच होत नाही. संगीतावर चर्चा होत असते, त्यात मला हे सांगितलं जातं की तू बेसुरा आहेस तू गाऊ नकोस, मी गाणार. आमचा एक अलिखित करार आहे की मला हजारो गाणी पाठ आहेत, मला सूर नाहीयेत. माझ्या बायकोला सूर आहे, तिला कडवी पाठ नसतात. सूरात गाणारी ती आणि शब्द सांगणारा मी. असा आमचा सूरसंगम आहे. मिसळ की मच्छी? देवेंद्र फडणवीस : मी कोल्हापूरहून आलोय त्यामुळे मिसळच. अशी खास आणि दिलखुलास उत्तरं देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहेत. तुमच्या स्वप्नातलंपनवेलआपण घडवून दाखवू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
49 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Jan 7, 2026, 03:50 PM
महाराष्ट्रात थंडीची शक्यताः पुढील पाच दिवस तापमानात वाढ होण्याचा अंदाज

महाराष्ट्रात थंडीची शक्यताः पुढील पाच दिवस तापमानात वाढ होण्याचा अंदाज

Cold Weather :काल मंगळवार दि.६ जानेवारी (अंगारकी चतुर्थी) पर्यंत जाणवलेल्या किरकोळ थंडीनंतर आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे शुक्रवार दि. ९ जानेवारीपर्यंत मुंबईसह कोकण वगळता उर्वरित संपूर्णमहाराष्ट्रातसकाळच्या वेळेस माफक थंडी जाणवेल.मुंबईसह कोकणात १७ ते २१ तर उर्वरितमहाराष्ट्रात९ ते १२ अंश से. दरम्यान किमान तापमान जाणवेल. परंतु सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बुलढाणा येथे मात्र १२ अंश से पेक्षा अधिक किमान तापमानाची नोंद होवु शकते.त्यानंतर म्हणजे शनिवार दि. १० जानेवारी ते बुधवार दि. १४ जानेवारी (मकर संक्रांती) पर्यंतच्या पुढील पाच दिवसात पहाटेच्या किमान तापमानात काहीशी वाढ होवून थंडी कमी जाणवेल.यात भोगी (१३ जानेवारी) अगोदर म्हणजे सोमवार-मंगळवार दि. १२-१३ जानेवारीच्या दोन दिवसात खान्देश नाशिक अ.नगर सांगली सोलापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची शक्यता जाणवते. तर पुणे सातारा कोल्हापूर अश्या ३ जिल्ह्यात ढगाळ वातावरणासहित झालाच तर अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यताही नाकारता येत नाही.वातावरणातील हा बदल कशामुळे?उत्तर भारतातील घड्याळ काटा दिशेने वाहणारी प्रत्यावर्ती चक्रीय वारा प्रणालीतून महाराष्ट्रावर सरकली असुन थंडी घेऊन येणारे थंड कोरडे पूर्वीय वाऱ्यांना अडथळा झाला असुन त्या ऐवजी उलट बं. उपसागरातील आर्द्रता युक्त वारे महाराष्ट्रात फेकले जात आहेत. पूर्णतः ठप्प झाले आहेत. मध्य - महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांत तर वारे उलट दिशेने म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काहीशी थंडी कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे थंडी पुन्हा कधी वाढणार?खरे तर शुक्रवार दि. ९ जानेवारीपासूनच अपेक्षित असलेली महाराष्ट्रातील थंडीतील वाढ आता सध्य: प्रणालीतील बदलानुसार मकर-संक्रांती नंतरच अपेक्षा करू या! - माणिकराव खुळेMeteorologist (Retd)IMD Pune.
63 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Jan 7, 2026, 02:38 PM
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात सुरक्षा दलांशी चकमक; जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात सुरक्षा दलांशी चकमक; जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी ठार

Jammu-Kashmir:जम्मू-काश्मीरमधीलकठुआ जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू झाली आहे. ही चकमक कठुआ जिल्ह्यातील बिलावर तालुक्यातील कमाद नाला (कहोग गाव परिसर) येथे सुरू असून, जैश-ए-मोहम्मदचे किमान तीनदहशतवादीया परिसरात लपले असून, जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. गुप्त माहितीवरून शोधमोहीम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातदहशतवादीहालचालींची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या एसओजी पथकाने शोध व घेराबंदी मोहीम सुरू केली. याचदरम्यान जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले. अतिरिक्त सुरक्षा दल घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत. स्थानिकांनी दहशतवादी पाहिल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्सनुसार, सायंकाळी सुमारे 4 वाजता बिलावर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कमाद नाल्यात स्थानिक नागरिकांनी एका संशयित दहशतवाद्याला पाहिले.अधिकाऱ्यांच्या मते, हा तोच दहशतवादी असण्याची शक्यता आहे, जो आज सकाळी धन्नू पॅरोल परिसरात दिसला होता. Op update 1:Despite darkness, thick vegetation and treacherous terrain, SOG relentlessly engaging the terrorists. Teams of CRPF are also participating in the Joint Op . 2026 मधील पहिली मोठी दहशतवादी चकमक जम्मूचे आयपीजी भीम सेन टूटी यांनी ‘X’ (ट्विटर)वर पोस्ट करून चकमकीची अधिकृत पुष्टी केली आहे. ही 2026 सालातील पहिली दहशतवादी चकमक आणि पहिले मोठे काउंटर-टेरर ऑपरेशन असल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण कारवाईवर स्वतः भीम सेन टूटी आणि कठुआच्या एसएसपी मोहिता शर्मा लक्ष ठेवून आहेत. घनदाट जंगल, अंधारातही ऑपरेशन सुरू आयजीपी भीम सेन टूटी यांनी सांगितले की, घनदाट जंगल, अंधार आणि कठीण भूप्रदेश असूनही एसओजी सातत्याने दहशतवाद्यांशी मुकाबला करत आहे. CRPFची पथकेही या संयुक्त कारवाईत सहभागी आहेत. सध्या दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरण्यात आले असून, परिसरात कडक नजर ठेवली जात आहे. कारवाई पूर्ण झाल्यानंतर सविस्तर माहिती दिली जाईल. बारामुल्लामध्ये दहशतवादी ठिकाण उद्ध्वस्त याच आठवड्यात बारामुल्ला जिल्हा येथेही सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत दहशतवाद्यांचे ठिकाण उद्ध्वस्त केले होते. त्या ठिकाणाहून शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त करण्यात आला होता.
81 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Jan 7, 2026, 02:33 PM
अवकाळी पावसामुळे नाशिकच्या कांद्याच्या शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे

अवकाळी पावसामुळे नाशिकच्या कांद्याच्या शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे

नाशिक:नामपूर (ता. बागलाण) परिसरातील काटवण भागात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या बेमोसमी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले. बिलपुरी, चिराई, दोधनपाडा, गोंमरपाडा, राहुड, टेंभे आदी गावांमध्ये अवघ्या अर्धा ते एक तास चाललेल्या या पावसाने रब्बी हंगामातीलकांदालागवडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. काटवण परिसरात सध्या रब्बी हंगामासाठीकांदालागवड जोमात सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या कर्जातून कांद्याचे बियाणे खरेदी करून रोपे तयार केली होती, तर काही ठिकाणी लागवड अंतिम टप्प्यात होती. मात्र अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले. कोवळी कांद्याची रोपे आडवी पडली, कुजण्याची भीती निर्माण झाली असून अनेक शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. कांदा लागवडीसाठी बियाणे, रोपे, खते, औषधे, मजुरी व सिंचनावर आधीच हजारो ते लाखो रुपयांचा खर्च झालेला असताना या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटात ढकलले आहे. “रब्बी कांदा हेच आमच्या वर्षभराच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. पण निसर्गाने पुन्हा एकदा आमचं कंबरडं मोडलं,” अशी व्यथा शेतकरी व्यक्त करत आहेत. मागील वर्षी २०२५ मध्येही अवकाळी पावसामुळे कांदा, मका पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यातच बाजारभावातील घसरणीने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. “कांदा ही गेला… मका ही गेला… आता जगायचं तरी कसं?” असा यक्षप्रश्न आज काटवण परिसरातील प्रत्येक शेतकऱ्यापुढे उभा आहे. निसर्गाच्या या अन्यायाविरुद्ध शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी आर्त मागणी होत आहे.
18 shares
😢
Loksatta logo
Loksatta
Jan 5, 2026, 03:00 PM
नाशिक जिल्ह्यातील जुन्या वडाच्या झाडांच्या संरक्षणाचे एनजीटीचे आदेश

नाशिक जिल्ह्यातील जुन्या वडाच्या झाडांच्या संरक्षणाचे एनजीटीचे आदेश

नाशिक– समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी ब्रिटीशकालीन जुन्या वडाच्या झाडांची तोड केली जात असल्याच्या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय हरित लवादाने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कायदेशीर प्रक्रिया राबवून वृक्षतोडीची परवानगी मिळाल्याशिवाय एकही झाड तोडू नये, असे अंतरिम आदेश दिले आहेत. याआधी तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीस लवादाने तात्पुरती स्थगिती देऊन चाप लावला आहे. कुंभमेळ्यातील कामांसाठी होणाऱ्या वृक्षतोडीचा विषय गाजत आहे. गेल्या महिन्यात वाडिवऱ्हे परिसरातील नांदुरवैद्य फाटा (व्हिटीसी फाटा) ते एसएनबीटी महाविद्यालय मार्गावरील शेकडो वर्ष जुनी वडाची झाडे तोडली जात असल्याचे उघड झाले होते. हा मार्ग समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. याची माहिती मिळताच पर्यावरणप्रेमी अश्विनी भट यांनी घटनास्थळी धाव घेत वृक्षतोडीस आक्षेप घेतला होता. पुन्हा तसाच प्रयत्न झाल्यावर गौरव देशमुख, रोहन देशपांडे आणि इतर पर्यावरणप्रेमींनी धाव घेत वृक्षतोड थांबवली होती. यावेळी पर्यावरणप्रेमींना अपघातांना कारणीभूत वृक्ष आणि फांद्याच्या तोडीस ३० दिवसांची मुदतवाढ देणारे पत्र संबंंधितांकडून दाखवले गेले होते. हे पत्र कालबाह्य झाल्याचे निदर्शनास आणल्यानंतर कर्मचाऱ्यांनी काढता पाय घेतला. या मार्गावर ब्रिटीशकालीन सुमारे २०० हून अधिक वडाची झाडे आहेत. या संदर्भातील माहिती छायाचित्र, कागदपत्रांसह दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे वकील श्रीराम पिंगळे यांनीपुणेयेथील हरित लवादात सार्वजनिक बांधकाम विभाग, विभागीय वन अधिकारी नाशिक , महाराष्ट्र शासन, मुख्य वन संरक्षक आणि महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरण यांच्या विरुद्ध अर्ज दाखल केला. त्यावर सोमवारी सुनावणी झाली, या प्रकरणात हरित लवादाने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कायदेशीर प्रक्रिया राबवून वृक्षतोडीचा परवाना मिळाल्याशिवाय एकही झाड तोडू नये, असे आदेश दिले. तसेच प्रतिवादींना आपले म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती ॲड. पिंगळे यांनी दिली. या प्रक्रियेत ॲड. पिंगळे यांच्याबरोबर सहायक म्हणून ॲड. विकास अगरवाल यांनी काम पाहिले. तपोवनातील वृक्षतोड प्रकरणात हरित लवादाने डिसेंबरमध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय झाडे तोडण्यास तात्पुरती स्थगिती दिली आहे. ही याचिका देखील ॲड. श्रीराम पिंगळे यांनी दाखल केली होती. तपोवन प्रकरणात लवादाने संयुक्त समिती स्थापन करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ जानेवारी रोजी होणार आहे. तपोवनात साधुग्राम उभारणीसाठी १८२५ झाडे तोडण्यास विरोध होत असताना सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी शहरात वेगवेगळ्या भागात १२७० वृक्ष बेमालूमपणे तोडण्यात आले होते. तपोवनातील विषय गाजत असताना हरित लवादाने संपूर्ण जिल्ह्यात कायदेशीर प्रक्रियेशिवाय वृक्षतोडीला तात्पुरती मनाई केल्याने प्रशासकीय यंत्रणेला धक्का बसला.
85 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Jan 3, 2026, 03:29 PM
विदर्भात जानेवारीत बर्फवृष्टी आणि पावसाचे सावट, फेब्रुवारी-मार्चमध्ये दिलासा

विदर्भात जानेवारीत बर्फवृष्टी आणि पावसाचे सावट, फेब्रुवारी-मार्चमध्ये दिलासा

विदर्भात जानेवारीत थोड्याफार प्रमाणात पावसाचीही शक्यता आहे. मध्य भारतातील काही भागात, विदर्भात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. सकाळी तसेच रात्री गारठा जाणवू शकतो त्याचा परिणाम आरोग्य आणि शेतीवर होऊ शकतो. या काळात श्वसन विकार असलेल्या नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ञांनी केले आहे. दरम्यान ,फेब्रुवारी, मार्च महिन्यात विदर्भामध्ये हवामान परिस्थिती बदलण्याचा अंदाज आहे. या दोन महिन्यात देखील पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून रब्बी पिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
12 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Jan 3, 2026, 03:05 PM
नाशिकच्या द्राक्ष उत्पादनास अवकाळी पावसाचा फटका

नाशिकच्या द्राक्ष उत्पादनास अवकाळी पावसाचा फटका

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात सततचे बदलते हवामान व अवकाळी पाऊस यामुळे द्राक्षशेतीचेमोठे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून द्राक्ष घड जिरणे, घड कुजणे व मणी गळणे यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यंदा निफाड तालुक्यात द्राक्ष लागवड क्षेत्र तुलनेने कमी आहे. त्यातच मागील काळात झालेल्या पावसाचा उभ्या पिकांना फटका बसला. द्राक्षबागांमध्ये डाऊनीसह विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. घड कुजणे, मणी गळणे, मणी फुटणे अशी समस्या निर्माण झाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महागड्या औषधांच्या फवारण्या केल्या. मात्र, अपेक्षित लाभ झाला नाही. उलट काही शेतकऱ्यांना औषध फवारणीचा वाढता खर्चही परवडण्याजोगा नाही. यामुळे तालुक्यातील असंख्य द्राक्षबागा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या असून, काही ठिकाणी शेतकऱ्यांना द्राक्षबाग तोडण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. द्राक्ष उत्पादनावर परिणामअवकाळी पावसामुळे निफाड तालुक्यातील द्राक्षशेतीचाहंगाम वेळेआधीच संपल्याची स्थिती निर्माण झाली आहे. उभ्या बागांमधील घड जिरणे, मणीगळ व रोगांचा वाढता प्रादुर्भाव याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. महागड्या औषध फवारण्या करूनही रोग आटोक्यात आला नसून, वाढलेला खर्च आणि कमी हंगाम यामुळे द्राक्षशेतीचे नुकसान झाले आहे. द्राक्षबागेसाठी लाखो रुपयांचा खर्च केला. मात्र, सततच्या बदलत्या हवामानामुळे मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे घड जिरले. वर्षभराचे सर्वच नियोजन कोलमडले. घेतलेले कर्ज फेडायचे कसे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.- साहेबराव डेरे, द्राक्ष उत्पादक मागील काळात सतत पडणाऱ्या अवकाळी पावसाचा द्राक्षबागांवर परिणाम झाला आहे. जवळपास ४० टक्के भागांमध्ये घड जिरण्याचे परिणाम दिसून आले. द्राक्षपंढरी यावेळी संकटात असून, द्राक्ष उत्पादन कमी होण्याची चिन्ह दिसून येत आहे.- सुनील सोनवणे, कृषी अधिकारी, पिंपळगाव
38 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Jan 1, 2026, 02:59 PM
सततच्या थंडीच्या लाटा आणि अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर भारताची तयारी

सततच्या थंडीच्या लाटा आणि अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर भारताची तयारी

नागपूर:डिसेंबरमध्ये छळणाऱ्या थंडीपासून जानेवारी महिन्यातही दिलासा मिळण्याचे चिन्ह नाहीत. तीव्रता कमी राहणार असली तरी थंडीचा प्रभाव मात्र कायम राहणार आहे. मध्य भारतासह उत्तरेकडील काही राज्यात एक-दाेन वेळा थंडीची लाट येण्याचीही शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पत्रकाद्वारे याबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे. वेधशाळेने गुरुवारी जानेवारी ते मार्च २०२६ या काळातील हवामानाचे निरीक्षण जारी केले. या निरीक्षणानुसार जानेवारी महिन्यात उत्तर भारत व मध्य भारतात रात्रीचे तापमान मासिक सरासरीच्या खालीच राहण्याची शक्यता आहे. यातविदर्भाचाहीसमावेश आहे. उत्तर-पश्चिम भारतातील पूर्व व पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मिर व लद्दाख या राज्यात, तसेच मध्य भारतातील मध्य प्रदेश, झारखंड,विदर्भया भागात किमान तापमान मासिक सरासरीच्या खाली राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या प्रदेशात थंडीच्या लाटा येण्याची शक्यता नेहमीच्या सरासरीपेक्षा अधिक राहण्याचाही अंदाज आहे. मध्य भारतातही एक ते दाेन वेळा थंड लाटेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मध्य भारतात दिवसाचे कमाल तापमान मात्र सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. पूर्वाेत्तर राज्ये आणि दक्षिणेकडील राज्यात मात्र तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. जानेवारीत नाही, पण मार्चपर्यंत पावसाची शक्यता अधिक वेधशाळेने पावसाबाबतही अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भासह मध्य भारतात जानेवारी महिन्यात अवकाळी पावसाची शक्यता नेहमीच्या सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र मार्चपर्यंत तीन महिन्याच्या काळात हाेणारा पाऊस नेहमीच्या सरासरीपेक्षा अधिक असेल, असा अंदाज आहे. विशेषत: मध्य भारत आणि उत्तर प्रदेशच्या मैदानी क्षेत्रात तीन महिन्याच्या काळात सरासरीपेक्षा अधिक पाऊस हाेण्याचे भाकितही वेधशाळेने वर्तवले आहे.
22 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Dec 31, 2025, 03:30 PM
एकाच फोनवर दोन व्हॉटसअप खाती चालवाः चरण-दर-चरण मार्गदर्शक

एकाच फोनवर दोन व्हॉटसअप खाती चालवाः चरण-दर-चरण मार्गदर्शक

Two WhatsApp Accounts on One Phone :तुम्ही दोन सिम कार्ड वापरत असाल आणि दोन्ही सिम कार्डने WhatsApp अकाउंट चालवू इच्छित असाल तर तुम्हाला WhatsApp मध्ये ही सुविधा मिळेल. WhatsApp मध्ये मल्टी अकाउंट फीचर देण्यात आले आहे, जेणेकरून वेगवेगळ्या नंबरसाठी स्वतंत्र फोन ठेवण्याची गरज भासणार नाही.हे फीचर्स विशेषत: अशा युजर्ससाठी फायदेशीर आहे जे पर्सनल आणि व्यावसायिक क्रमांक वेगळे ठेवू इच्छितात. योग्य सेटिंग्जसह, दोन्ही खाती एकाच फोनवर सुरक्षितपणे वापरली जाऊ शकतात. हे कसे करावे हे आम्ही तुम्हाला येथे सांगत आहोत.WhatsApp चे मल्टी अकाउंट फीचर काय आहे?WhatsApp युजर्सला एकाच अ‍ॅपमध्ये दोन अकाउंट अ‍ॅड करण्याची परवानगी देते.या फीचरच्या मदतीने तुम्ही थर्ड पार्टी अ‍ॅपशिवायदुसरे अकाउंट वापरू शकता. दोन्ही अकाउंटचे चॅट, कॉल आणि नोटिफिकेशन वेगवेगळे असतात, ज्यामुळे प्रायव्हसी राखली जाते. हे फीचर पूर्णपणे सुरक्षित आहे आणि WhatsApp च्या पॉलिसीनुसार काम करते.‘या’ स्टेप्स फॉलो करासर्वात आधी WhatsApp चे लेटेस्ट व्हर्जन तुमच्या फोनमध्ये अपडेट करा.WhatsApp उघडा आणि प्रोफाइल फोटो किंवा वरच्या उजव्या बाजूला तीन ठिपके टॅप करा.अकाऊंट पेजमध्ये, खाते जोडा किंवा दुसरे खाते लिंक पर्याय निवडा.आता WhatsApp चालवण्यासाठी दुसरा मोबाइल नंबर प्रविष्ट करा.ओटीपी टाकून नंबर पडताळणी पूर्ण करा.नाव आणि प्रोफाइल फोटो सेट करा.सेटअप पूर्ण होताच त्याच फोनमध्ये दुसरे WhatsApp अकाउंट अ‍ॅक्टिव्हेट केले जाईल.सेटिंग्ज आपल्याला दोन खात्यांमध्ये सहजपणे स्विच करण्याची परवानगी देतात.एका फोनमध्ये दोन WhatsApp अकाउंट कसे अ‍ॅड करावेतुमच्या फोनमध्ये दोन मोबाइल नंबर असतील तर दुसरेWhatsApp अकाउंट अ‍ॅन्ड करणे खूप सोपेआहे. आपल्याला चॅट टॅबमधून 3 डॉट्सवर क्लिक करावे लागेल आणि नंतर शेवटी जाहिरात खाते पर्याय दिसेल. येथे एक नवीन नंबर प्रविष्ट करावा लागेल आणि ओटीपीसह पडताळणी करावी लागेल. व्हेरिफिकेशन पूर्ण होताच दुसरे खाते अ‍ॅक्टिव्हेट होते आणि तुम्ही सहजपणे दोन अकाउंटमध्ये स्विच करू शकता.ड्युअल सिम आणि सिंगल सिम युजर्समध्ये काय फरक आहे?ड्युअल सिम फोन युजर्सना या फीचरचा सर्वाधिक फायदा होतो, कारण दोन्ही नंबर एकाच डिव्हाइसमध्ये राहतात. सिंगल सिम युजर्स दुसरे खाते देखील चालवू शकतात, परंतु यासाठी दुसरा नंबर सक्रिय असणे आवश्यक आहे. WhatsApp नंबर केवळ ओटीपी व्हेरिफिकेशनसाठी आवश्यक आहे, त्यानंतर खाते सिमशिवाय देखील काम करू शकते.‘हे’ फीचर्स कोणासाठी उपयोगी?ज्यांच्याकडे काम आणि पर्सनल जीवनासाठी वेगवेगळे नंबर आहेत त्यांच्यासाठी हे फीचर्स खूप उपयुक्त आहे. लहान व्यवसाय मालक, फ्रीलांसर आणि कार्यालयीन कर्मचारी एकाच फोनमध्ये वैयक्तिक आणि काम WhatsApp स्वतंत्रपणे ठेवू शकतात. यामुळे केवळ फोन हाताळणे सोपे होत नाही, तर डेटा आणि चॅट मॅनेजमेंट देखील सुधारते.
50 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Dec 29, 2025, 03:21 PM
भारतीय सर्वोच्च न्यायालयाने अरवली प्रदेशाच्या पर्यावरणीय एकात्मतेच्या पुढील चौकशीचे आदेश दिले

भारतीय सर्वोच्च न्यायालयाने अरवली प्रदेशाच्या पर्यावरणीय एकात्मतेच्या पुढील चौकशीचे आदेश दिले

भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील सुट्टीकालीन खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी घेतली. खंडपीठाने म्हटले की, वरवर पाहता असे दिसते की, समितीच्या पूर्वीच्या अहवालात आणि निकालात काही महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट करण्याचे राहून गेले आहे आणि अरवली प्रदेशाच्या पर्यावरणीय अखंडतेला बाधा पोहोचवणारी कोणतीही नियामक पोकळी टाळण्यासाठी पुढील चौकशीची नितांत गरज आहे. 100 मीटर उंची आणि टेकड्यांमधील 500 मीटर अंतराच्या निकषामुळे पर्वतरांगेचा मोठा भाग पर्यावरण संरक्षणापासून वंचित राहील की नाही, यासह महत्त्वाचे संदिग्ध मुद्दे सोडवण्याची गरज असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
70 shares
😢