Achira News Logo
Achira News
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 10:02 AM
पूर्णा पोलीस ठाण्याच्या परिसरात चोरांना पकडले, अटक आणि तपास सुरू

पूर्णा पोलीस ठाण्याच्या परिसरात चोरांना पकडले, अटक आणि तपास सुरू

पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील १३ ते १६ मार्च दरम्यान दोन जबरी चो-यांचे गुन्हे घडले होते.त्यातील गुन्हेगारांचा कसून तपास घेत ५ चोरटे पकडून जेरबंद केले.त्यांकडील चोरीतील ६ दुचाकी,११ मोबाईल हस्तगत करत जप्त केले आहेत.सदर आरोपीस विद्यमान न्यायालयाने पोलीस कस्टडी सुनावली आहे.त्याच बरोबर रेल्वे स्थानक परिसरात चोरट्यांचा वावर होत आहे का? यावर शोध लावण्यासाठी रेल्वेचे जि आर पी पोलिस आणि लोकल पोलीस कर्मचारी मिळून गोपनीय पद्धतीने तपास सुरु असतो.
34 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 09:19 AM
पुणे आणि पिंपरी-चिंचवाड स्पा केंद्रांवर मानवी तस्करीचे आरोप, कडक कायद्याचे आश्वासन

पुणे आणि पिंपरी-चिंचवाड स्पा केंद्रांवर मानवी तस्करीचे आरोप, कडक कायद्याचे आश्वासन

पिंपरी:पुणेआणि पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा आणि वेलनेस सेंटर्स’च्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापार आणि मानवी तस्करीचा मुद्दा बुधवारी (दि. १८) विधान परिषदेत आला. आमदार अमित गोरखे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे याकडे लक्ष वेधले. स्पा व्यवसायासाठी तीन महिन्यांत स्वतंत्र आणि कडक नियमावली लागू केली जाईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्रीयोगेश कदमयांनी दिले. आमदार गोरखे म्हणाले, शहरात शिक्षणासाठी येणारी तरुण पिढी स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रकारांत बरबाद होत आहे. हे केवळ स्पा नसून अंमली पदार्थ आणि मानव तस्करीचे अड्डे बनले आहेत.पोलिसकारवाई करतात, पण दोन दिवसांत तेच मालक नव्या नावाने सेंटर सुरू करतात.गृहराज्यमंत्रीयोगेश कदमम्हणाले, या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन समिती तयार केली आहे. नगरविकास आणि ग्रामविकास विभागाचा अहवाल लवकरच सादर होईल. पुढील तीन महिन्यांत नवीन नियमावली लागू केली जाईल. नायडू, पटेल, शेख, फकीर टोळी पिंपरी-चिंचवडमधील नायडू, पटेल, शेख, फकीर, अधिकारी, बांदोडकर अशा अनेक ठराविक लोकांची संघटित साखळी हा काळा बाजार चालवत आहेत. केवळ कर्मचाऱ्यांवर गुन्हे न नोंदवता, या मास्टरमाइंड्सच्या मालमत्तांची चौकशी करून त्यांच्यावर 'मकोका'अंतर्गत कठोर कारवाई करावी, स्वतंत्र नियमावलीची मागणीदेखील आमदार गोरखे यांनी केली.
76 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 08:47 AM
वादातून महिलेची चोरी करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोघांना अटक

वादातून महिलेची चोरी करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोघांना अटक

अखेर गोपनीय माहिती व तपासाच्या आधारे त्यांना जेरबंद करण्यात आले. खेड पोलिस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल होता. या प्रकरणातील फिर्यादी फातिमा इसाक सुर्वे (रा. सवनस, ता. खेड, जि. रत्नागिरी) आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जुहूर अब्दुल रज्जाक सुर्वे व गुफरान अब्दुल रज्जाक सुर्वे (दोघेही रा. सवणस, ता. खेड) यांनी २००५ मध्ये मयत आबिदा मियांसो सुर्वे (७५) यांच्या घरातून १० हजार रुपये चोरी केले होते. त्यापैकी ५ हजार रुपये परत केले होते. मात्र उर्वरित रकमेच्या मागणीवरून वाद वाढल्याने आरोपींनी आबिदा सुर्वे यांचा खून करून पुरावा नष्ट केला व तेथून फरार झाले होते. दरम्यान, आरोपींनी आपली ओळख लपवण्यासाठी नावे व पत्ते बदलले होते. ते अनुक्रमे राजू गजानन तांबे व संदीप गजानन तांबे या नावाने मोहो, चिखले (ता. पनवेल, जि. रायगड) येथे राहत होते.
67 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 08:42 AM
पुणे सुरक्षा रक्षकाने पोलिसांत तक्रार दाखल केली

पुणे सुरक्षा रक्षकाने पोलिसांत तक्रार दाखल केली

धनकवडी: कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयच्या आवारात शिरूनचोरट्यांनीचंदनाची झाडे कापूनचोरीचाप्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी भारती विद्यापीठपोलिसांनीअज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सुरक्षा रक्षक श्रीपती देवीदास कसबे (वय ३०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरूनपोलिसांनीगुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास चोरटे प्राणी संग्रहालयाच्या आवारात शिरले. त्यांनी आवारातील चंदनाची चार झाडे कापून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास हा प्रकार येताच चोरटे घटनास्थळावरून पसार झाले. दरम्यान, यापूर्वीही प्राणी संग्रहालयाच्या आवारातून चंदनाची झाडे चोरीला गेल्याच्या घटना घडल्या असल्याचे समोर आले आहे. त्या मुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे. आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपींचा माग काढला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील करत आहेत.
12 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 08:10 AM
पीक विम्याचे खोटे दावे केल्याप्रकरणी जळगाव सी. एस. सी. केंद्राच्या संचालकांना अटक

पीक विम्याचे खोटे दावे केल्याप्रकरणी जळगाव सी. एस. सी. केंद्राच्या संचालकांना अटक

जळगाव :हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत जिल्ह्यात तब्बल ७५ कोटी ३९ लाख ९१ हजार रुपयांच्या बोगसगिरीचा प्रकार आतापर्यंत उघडकीस आला आहे. प्रत्यक्ष शेतातकेळीचीबाग नसताना कागदोपत्री पीक दाखवून शासनाची आणि विमा कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी १८ मार्चच्या रात्री जिल्ह्यातील ६ तालुक्यांमधील ४२ सीएससी केंद्रांच्या चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. कृषी आयुक्तालयाने जिल्ह्यातील विमा क्षेत्राची पडताळणी केली असता, ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्षातकेळीलागवडच झाली नसल्याचे समोर आले. तरीही २९ हजार शेतकऱ्यांच्या नावावर विमा उतरविला होता. यातून कोट्यवधी रुपयांचा विमा हप्ता आणि संभाव्य भरपाई हडपण्याचा मोठा कट रचला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. कृषी आयुक्तालयाने एकूण ४८ सीएससी चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते, त्यापैकी ४२ जणांवर आतापर्यंत कारवाई पूर्ण झाली असून, उर्वरित ६ चालकांवर देखील गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून 'लोकमत'ला देण्यात आली आहे. चोपडा तालुक्यात सर्वाधिक 'मलिदा'जिल्ह्यात सर्वाधिक घोटाळा चोपडा तालुक्यात झाला असून, येथे ३० कोटी ३० लाख रुपयांचा अपहार समोर आला आहे. अडावद पोलिस ठाण्यात ५ कोटी, चोपडा शहर पोलिस ठाण्यात २३ कोटी आणि चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात १ कोटी अशा एकूण ३० कोटींच्या फसवणूकप्रकरणी वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यावलमध्ये क्षेत्र वाढवून दाखवलेयावल तालुक्यात २ हजार ४१ शेतकऱ्यांच्या शेतात केळी नसताना - पीक दाखवले गेले, तर १ हजार ९७५ शेतकऱ्यांच्या १ हजार ८९ हेक्टर - क्षेत्रावर प्रत्यक्ष लागवडीपेक्षा जास्त क्षेत्र दाखवून शासनाची दिशाभूल करण्यात आली. याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांच्या फिर्यादीवरून ६ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
77 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 08:01 AM
बिहार-नेपाळ सीमेवरून बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन बहिणींना इगतपुरी पोलिसांनी वाचवले

बिहार-नेपाळ सीमेवरून बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन बहिणींना इगतपुरी पोलिसांनी वाचवले

Nashik Crime News: इगतपुरी तालुक्यातील टिटोली रेल्वे क्वॉर्टर परिसरातून बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन बहिणींचा इगतपुरीपोलिसांनीशिताफीने शोध लावून त्यांना बिहार-नेपाळ सीमेवरून सुरक्षित ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी इगतपुरीपोलिसठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेकर, उपअधीक्षक हरीश खेडकर व पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक अमोल गायधनी व हवालदार दीपक निकुंभ यांच्यासह पथकाने तत्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान संबंधित मुली रेल्वेमार्गे बिहारच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी खासगी वाहनाने सलग २८ तासांचा प्रवास करत गुप्त माहितीच्या आधारे बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील भीमनगर (भारत-नेपाल सीमेवर) येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून मुलींना ताब्यात घेतले. मुली स्वेच्छेने गेल्या होत्या की कोणीतरी फूस लावून त्यांना पळवून नेले होते, याबाबतचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कांचन भोजने व त्यांचे पथक करत आहेत. दोन्ही अल्पवयीन मुलींना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
60 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 08:00 AM
कोठडीत मुलाच्या मृत्यूबाबत पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

कोठडीत मुलाच्या मृत्यूबाबत पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई : २०१९ मध्ये वडाळा ट्रक टर्मिनसपोलिसठाण्यात मुलाचापोलिसांच्याताब्यात असताना मृत्यू झाल्याने संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारी मुलांच्या वडिलांची याचिका मुंबईउच्च न्यायालयानेफेटाळली. पोलिसांविरुद्धचे आरोप असमर्थनीय आहेत, असे म्हणत न्यायालयाने सीबीआयच्या अहवालाला मान्यता दिली. सीबीआयने पोलिसांना क्लीन चिट देण्यात आली असून ज्या व्यक्तींची मृत व्यक्तीशी झटपट झाली होती त्यांनाही मारहाणीच्या आरोपातून मुक्त करण्यात आले आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये या प्रकरणाचा तपासउच्च न्यायालयानेसीबीआयकडे सोपवला. न्या. भारती डांगरे आणि न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने म्हटले की, सीबीआयने स्पष्टपणे निष्कर्ष काढला आहे की, मृत्यू पोलिसांकडून मारहाणीमुळे झाला नाही, तर तो अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला. १३ मार्च रोजी दिलेल्या निकालात न्यायालयाने नमूद केले की, सीबीआयने या प्रकरणात सर्व बाजूंनी तपास करून पोलिसांनी मारहाण केली का, याचा शोध घेतला आणि सुरुवातीपासूनच उत्तर नकारार्थी होते. कोणताही दखलपात्र गुन्हा न आढळल्याने न्यायालयाने सीबीआयच्या अहवालावर शंका घेण्याचे कारण नसल्याचे सांगत पोलिसांविरुद्धची याचिका फेटाळली. नेमके प्रकरण काय?ऑक्टोबर २०१९ मध्ये वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी विजय सिंग याला एका भांडणाच्या प्रकरणात ताब्यात घेतले होते. एका जोडप्याने आरोप केला होता की, तीन पुरुषांनी त्या महिलेचा लैंगिक छळ केला. या प्रकरणातील दुसरा याचिकाकर्ता निर्मल सिंग हा स्वत:ला मारहाणीचा साक्षीदार असल्याचा दावा करत होता. विजयचे वडील हृदयसिंग यांचे वकील विनय नायर यांनी असा युक्तिवाद केला की, त्यांच्या मुलाचा मृत्यू हा पोलिसांच्या क्रूर मारहाणी आणि अमानुष वागणुकीमुळे झाला. ...म्हणून याचिका दाखलट्रक टर्मिनस पोलिस ठाण्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी त्याच्या वडिलांनी याचिका दाखलकेली होती.
95 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 07:37 AM
करचुकवेगिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा नगरपरिषदेचा इशारा

करचुकवेगिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा नगरपरिषदेचा इशारा

यापुढेही थकबाकीदारांविरोधात अशीच कठोर कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचा इशारा नगरपरिषद प्रशासनाने दिला आहे. तसेच कर थकबाकीदारांनी तात्काळ थकबाकी भरून कारवाई टाळावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
95 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 07:10 AM
अशोक खरात घोटाळाप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना हटवण्याची शिवसेनेची मागणी

अशोक खरात घोटाळाप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना हटवण्याची शिवसेनेची मागणी

Ashok Kharat Case :नाशिक येथीलअशोक खरातप्रकरणाची राज्यभरात चर्चा सुरू आहेत. या प्रकरणात खरात याचे ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आले आहेत. आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले. "रूपाली चाकणकर यांना तात्काळ पदावरून हटवून त्यांना अटक करावी आणि त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी," अशी मागणी अंधारे यांनी केली आहे. सोने, चांदी, महागड्या कार, फार्म हाऊस अन् बरंच काही...; भोंदूबाबा कॅप्टन खरातची संपत्ती किती? पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, रूपाली चाकणकर आणिअशोक खरातयांचे 'सीडीआर' तपासले जावेत. इतकेच नाही तर या दोघांना समोरासमोर बसवून चौकशी होणे गरजेचे आहे. चाकणकर या राजकीय दबावाचा वापर करू शकतात, यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा, अशा मागणीही अंधारे यांनी केली. त्या फरार होण्यापूर्वी पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावे, असेही अंधारे म्हणाल्या. स्वत:ची अनामिका कापल्याचा धक्कादायक आरोप यावेळी सुषमा अंधारे यांनी चाकणकर स्वत: तंत्रमंत्रमध्ये होत्या असा धक्कादायक आरोप केला. याबाबत एका पिडितेने आपल्याला सांगितल्याचा दावा अंधारे यांनी केला. २ सप्टेंबर २०२४ ला रोजी सोमवती अमावस्येला स्वत:ची अनामिका कापली होती. रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या करत होत्या, असा धक्कादायक आरोप सुषमा अंधारे यांनी केला. यावेळी पत्रकार परिषदेत अंधारे यांनी चाकणकर यांचे फोटो दाखवले. या फोटोमध्ये रुपाली चाकणकरांच्या अनामिकाला बँडेंज लावल्याचे दिसत आहे. त्यामुळे रुपाली चाकणकरांना अटक करुन त्यांची नार्को चाचणी करा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. संपत्तीची चौकशी करा या प्रकरणात केवळ पोलीसच नाही, तर ED आणि आर्थिक गुन्हे शाखेने लक्ष घालण्याची गरज असल्याचे अंधारे यांनी म्हटले. खरात याच्या मालमत्ता देश-विदेशात पसरलेल्या आहेत, त्यामुळे खरात आणि चाकणकर यांच्या संपत्तीचे स्त्रोत तपासले जावेत, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. पक्षपाताचा आरोप फेटाळला "यात कुणीही दोषी असेल, मग तो आमच्या पक्षाचा असला तरी कारवाई करा. जयंत पाटील किंवा मिलिंद नार्वेकर यांचीही चौकशी करा," असे आव्हान अंधारे यांनी दिले. मात्र, पाटील आणि नार्वेकर यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नसताना रूपाली चाकणकर यांच्याविरोधात अनेक पुरावे समोर येत असल्याचा दावा त्यांनी केला. चाकणकर सध्या महाराष्ट्रात आहेत की बाहेर, त्या फरार आहेत का? याचा तपासही पोलिसांनी करावा, असे त्या म्हणाल्या. अंधारेंना धमक्यांचे फोन या खळबळजनक प्रकरणानंतर सुषमा अंधारे यांनी आपल्याला धमक्या येत असल्याचे सांगितले. "मला कालपासून ८ वेगवेगळ्या नंबरवरून धमक्यांचे फोन येत आहेत. अत्यंत घाणेरड्या भाषेत मला धमकावले जात आहे," असेही त्या म्हणाल्या
76 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 06:11 AM
बनावट नोटांच्या रॅकेटवर पोलिसांची कारवाई, मोठी रक्कम आणि उपकरणे जप्त

बनावट नोटांच्या रॅकेटवर पोलिसांची कारवाई, मोठी रक्कम आणि उपकरणे जप्त

क्राईम ब्रांचनं दिलेल्या माहितीनुसार या सात आरोपींची चौकशी सुरू असून पोलीस कोठडीची देखील मागणी करण्यात आली आहे. अट केलेल्या आरोपींमध्ये मुकेश थुम्मरची भूमिका महत्वाची होती. तपासात असं दिसून आलं आहे की तो गुजरातमध्येच सक्रीय होता. पोलिसांनी आरोपींना २.१ कोटी रूपयांपेक्षा जास्त नकली नोटांसोबत अटक केली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदाबाद क्राईम ब्रांचने सूरत पोलिसांच्या मदतीने सूरतमध्ये देखील शोध मोहीम राबवली. तिथून २८ लाख रूपये फेक करन्सी आणि प्रिंटिंग साधने, प्रिंटिंग मशिन जप्त करण्यात आले.
70 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 06:10 AM
ऑनलाईन गुंतवणूक घोटाळ्यामुळे आंध्र प्रदेशच्या रहिवाशांना पैसे गमवावे लागले

ऑनलाईन गुंतवणूक घोटाळ्यामुळे आंध्र प्रदेशच्या रहिवाशांना पैसे गमवावे लागले

मडगाव येथील गोत्रू क्रांती राजकुमार (मूळ रहिवासी आंध्र प्रदेश) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. दि. ९ मार्च ते १३ मार्च २०२६ या कालावधीत अज्ञात आरोपींनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला. वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून जास्त नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत आरोपींनी त्यांना गुंतवणुकीस प्रवृत्त केले. संशयितांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने विविध व्यवहारांद्वारे एकूण २ लाख २० हजार रुपये हस्तांतरित केले.
91 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 05:51 AM
लैंगिक शोषणाचा आरोपी गुंडः राज्य सरकारने चौकशीसाठी एस. आय. टी. ची स्थापना केली

लैंगिक शोषणाचा आरोपी गुंडः राज्य सरकारने चौकशीसाठी एस. आय. टी. ची स्थापना केली

नाशिक - महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपात भोंदूबाबा कॅप्टनअशोक खरातराज्यात चर्चेत आला आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने एसआयटी स्थापन करून तपास करण्याचे आदेश दिलेत. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे एसआयटीचे प्रमुखपद दिले आहे. खरात प्रकरणातील तपासात बरेच आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो हाती लागले आहेत. सेलेब्रिटीपासून अनेक राजकीय मंडळी खरातचे भक्त होते. अशोक खरातयाने राजकीय नेते, प्रशासनातील बडे अधिकारी त्याशिवाय सेलेब्रिटी यांना जाळ्यात ओढून अमाप माया जमवली असल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. नाशिक शहर, सिन्नर येथे आलिशान बंगले, मीरगाव येथे फार्म हाऊस सोबतच अनेक जमिनी स्वत: तसेच कुटुंबियांच्या नावे आहेत. सोने, चांदी, मौल्यवान वस्तू, दोन महागड्या कार अशी एकूण तब्बल २०० कोटींच्या संपत्तीचा मालक खरात हाच असल्याचा पोलिसांना अंदाज आहे. तपासात आता पुढे काय? 'एसआयटी'कडे तपासाची सूत्रे आल्यानंतर डिजिटल फॉरेन्सिक तपासाचा आधार घेतला जाणार असून, पोलिसांच्या हाती लागलेल्या ५८ व्हिडीओंमधील पीडितांना न्याय देण्यावर भर असेल. फोन कॉल्स तपासणे, तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे कामसुद्धा सुरू करण्यात आले आहे. आर्थिक व्यवहार, नेटवर्क तपास, संभाव्य सहकारी आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. याशिवाय कॅप्टन खरात याचे आर्थिक सोर्स तपासून इतकी अमाप माया त्याने कशी जमविली, याचे सखोल विश्लेषण केले जाणार आहे. नोकराकडूनच धमकी ? नीरज जाधव हा खरातकडे ऑफिसबॉय होता. शिर्डीच्या तक्रारदार तरुणीच्या माहितीनुसार नाशिकला खरातच्या कार्यालयात नीरजशी ओळख झाली. जाधव बनावट अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. नंतर हाच जाधव खरात यालाही ब्लॅकमेल करीत असल्याचा संशय पोलिसांना आहे. रूपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या बलात्कार प्रकरणातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरात याच्या ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आहेत. त्या पदावर राहिल्या तर पुरावे नष्ट करण्याची भीती आहे. त्यामुळे रूपाली चाकणकर यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे.
88 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 20, 2026, 05:01 AM
कॅप्टन अशोक खरात यांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.

कॅप्टन अशोक खरात यांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक:कॅप्टन अशोक खरात या ज्योतिषाकडून झालेल्या लैंगिक शोषण प्रकरणासह दाखल गंभीर गुन्ह्यांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने ‘विशेष तपास पथक’ (एसआयटी) नेमले आहे. बड्या राजकीय नेत्यांच्या संपर्कात असलेल्या खरात प्रकरणाचे धागेदोरे नाशिकसह विविध जिल्ह्यांत पसरले असल्याने सरकारने उच्चस्तरीय तपासाचा निर्णय घेतला आहे. कॅप्टन खरातचा ऑफिसबॉय संशयित नीरज जाधव या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा संशय असून, पुण्यातील महिला आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात पथकाने गुरुवारी नाशिकमध्ये येऊन चौकशी सुरू केली.या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, असे निर्देश पोलिस महासंचालकांना दिले आहेत. यानंतर राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी तातडीने ‘एसआयटी’ स्थापन करीत पुणे येथील एसआरपीएफच्या बल गट क्र. एकच्या समादेशक (आयपीएस) तेजस्वी सातपुते यांना तपासाचे आदेश दिले. सातपुतेंनी गुरुवारीनाशिकमध्येदाखल होत गुन्हे शाखा युनीट एकच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची माहिती घेतली.कर्मयोगीनगरमध्ये पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी घरात सहा लाखांची रोकड मिळून आली. याशिवाय त्याच्या सिन्नरच्या फार्म हाऊसमधून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्याच्यावर वावी, शिर्डी आणि सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असून, या गुन्ह्यांची कागदपत्रे ‘एसआयटी’ने ताब्यात घेतली आहेत. कॅनडा कॉर्नर परिसरातील ‘ओजस प्रॉपर्टीज’ या कार्यालयातअशोक खरातनेअनेक महिलांवर अत्याचार केल्याचा संशय आहे. डिसेंबर २०२५ मध्ये खरातच्या ऑफिस बॉयने कार्यालयातून ५८ महिलांवरील बलात्काराचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. यानंतर त्याने खरातला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. नीरज आणि त्याच्या साथीदारांनी वादग्रस्त क्लिप्सच्या बदल्यात खरातकडे पाच कोटींची खंडणी मागितल्याचे समजते. परंतु, खरातने दाद न दिल्याने नीरजने पीडित महिलांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. त्याने शिर्डीतील एका २४ वर्षीय विवाहितेचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडीओ तिलाच व्हॉट्सॲपवर पाठवून धमकावले. या पीडितेने खरातला कळविले. परंतु, खरातने स्वतःला वाचविण्यासाठी तिला पोलिसात जाण्यास सांगितले. खरातकडून पैसे मिळण्याची शक्यता धूसर झाल्याने नीरजने सिडकोतील २८ वर्षीय विवाहितेचा व्हिडीओ तिच्या मेहुण्याला पाठविला. मेहुण्याने पीडितेला धीर देऊन तिला सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फिर्यादकरिता प्रोत्साहित केले.विशेष तपास पथकात नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे, तांत्रिक पुरावे आणि केस डायरी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. सातपुते यांनी तपास सुरू केल्याने पीडितांना न्याय मिळण्याच्या आशा उंचावल्या असून, या प्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
39 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 04:58 AM
पुण्यात कुत्रा चोरीच्या संशयावरून तरुणाची हत्या

पुण्यात कुत्रा चोरीच्या संशयावरून तरुणाची हत्या

पुणे :कबुतर चोरीच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना वानवडी परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी चार सख्ख्या भावांना अटक करण्यात आली आहे. गौरव विजयकुमार माजी (वय २२), सचिन विजयकुमार माजी (वय २३), मोनू विजयकुमार माजी (वय २६), बंटी विजयकुमार माजी (वय. १८, सर्व रा. शंकर मठ, पावर सोसायटी वैदवाडी हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना बुधवारी (दि. १८) पहाटेच्या सुमारास घडली. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने या चौघा सख्ख्या भावांना अटक केली आहे. तर रुपेश धनराज शिंदे (वय १९, रा. मोशी,पिंपरी-चिंचवड) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील धनराज बळीराम शिंदे (वय ४५) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश शिंदे आणि त्याचा मित्र अजय टिंगरे हे दोघे पहाटे दुचाकीवरून मोशीकडे जात होते. हडपसर येथील शंकरमठ परिसरात ते थांबले असता जवळील मोकळ्या जागेत कबुतरांच्या पेट्यांजवळ गेले. त्यावेळी कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे स्थानिकांना संशय आला आणि काही जणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. भीतीपोटी दोघे पळू लागले, मात्र पळताना रुपेश घसरून पडला आणि तो आरोपींच्या ताब्यात सापडला. यानंतर आरोपींनी त्याला लाकडी बॅट, लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्याला कबुतरांच्या ढाबळीला बांधून ठेवले. सकाळी त्याची प्रकृती बिघडल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपींनी अपघाताचा बनाव रचत त्याला रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. खंडणीविरोधी पथकाचे पोलिस हवालदार नितीन मुंढे यांना त्यांच्या बातमीदाराने ही माहिती दिली होती. पोलिसांनी रुग्णालयाच्या चाळीस क्रमांकाच्या वॉर्डात जाऊन चौकशी केली. तेव्हा दोघे संशयित त्यांना मिळून आले. तोपर्यंत रुग्णवाहिकेतून आणलेला तरुण मयत झाला होता. चौकशीत दोघांनी सांगितले आमची कबुतराची ढाबळ आहे. खून झालेला तरुण रुपेश हा कबुतरे चोरी करण्यासाठी आला असावा, असा संशय आम्हाला आला. त्यातूनच त्याला आम्ही पाच जणांनी बेदम मारहाण केली. रात्री त्याला ढाबळीला बांधून ठेवले. सकाळी पाहिले तेव्हा त्याला उलटी होत होती. तसेच तो शुद्धीत नव्हता. त्यामुळे आम्ही सुरुवातीला त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याला डॉक्टरांनी ससून रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. अपघाताचा बनाव रचण्याची आम्ही तयारी करत होते. ससूनमध्ये घेऊन येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. ही कामगिरी पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने केली.
40 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 04:52 AM
महिला शोषण आणि जादूटोण्याच्या आरोपाखाली अशोक खरात यांना अटक

महिला शोषण आणि जादूटोण्याच्या आरोपाखाली अशोक खरात यांना अटक

Ashok Kharat Latest News : हायप्रोफाइल ज्योतिषी व स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याच्याविरोधात महिला अत्याचार व जादूटोण्याचा गुन्हा दाखल होऊन अटक झाल्यानंतर आता खरात याच्या कारनाम्यांची चर्चा सिन्नर तालुक्यात रंगू लागली आहे. दरम्यान, बुधवारी (१८ मार्च) रात्री क्राईम ब्रँचने मिरगाव येथील खरातच्या बंगल्यावर झडती घेतल्याचे समजते. मूळ सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी येथील असलेल्या खरात याच्या शिक्षणापासून ते स्वयंघोषित कॅप्टन पदापर्यंतच्या वेगवेगळ्या चर्चा परिसरात सुरू आहे. सुमारे १७ ते १८ वर्षांपूर्वी मिरगाव शिवारात जागा घेऊन या ठिकाणी बांधण्यात आलेले ईशान्येश्वर मंदिर, मंदिर परिसराचा वाढलेला विस्तार आणि मंदिराच्या पाठीमागील बाजूला बांधलेला आलिशान दगडी चिरेबंदी बंगला, याच परिसरात वाढलेला शेतीचा विस्तार याबाबतच्या विविध चर्चाना उधाण आले होते. महागड्या गाड्या, आलिशान बंगले, विविध ठिकाणी खरेदी केलेल्या जमिनी व प्लॉट याबाबतही तर्कवितर्क लढवले गेले. बंगल्यावर मजुरांचा राबता बुधवारी रात्रीनाशिकक्राईम ब्रँचच्यापोलिसांनीमिरगाव शिवारातील बंगल्यावर येऊन काही साहित्य ताब्यात घेतल्याचे समजते. या बंगल्यावर गुरुवारी दिवसभर कामाला असलेल्या मजुरांचा राबता दिसून आला. बंगल्यावर गुढीपाडव्यानिमित्त गुढी उभारल्याचेही दिसून आले. मिरगाव येथील मंदिर भाविकांना दर्शनासाठी उघडे होते. किरकोळ प्रमाणात भाविकांची दर्शनासाठी या ठिकाणी वर्दळ सुरू होती.
35 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 01:39 AM
कुख्यात बाबा यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोपः चौकशीसाठी एस. आय. टी. ची स्थापना

कुख्यात बाबा यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोपः चौकशीसाठी एस. आय. टी. ची स्थापना

नाशिक: महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या तपासासाठी स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. पुणे येथीलपोलिसउपायुक्त तेजस्वी सातपुते (आयपीएस) यांच्याकडे एसआयटीप्रमुख म्हणून तपासाची सूत्रे असतील. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे असलेल्या खरातच्या फार्महाउसमधूनपोलिसांनीपिस्तूल जप्त केले आहे. तसेच झडतीत आणखी काही आक्षेपार्ह व्हिडीओसुद्धा हाती लागल्याचे समजते. खरातला त्याचा एकेकाळचा नोकरच ब्लॅकमेल करीत असल्याचा संशय गडद झाल्याने घटनेतील गुंतागुंत वाढली आहे. या घटनेचे धागेदाेरे शिर्डी येथील एका प्रकरणाशी जोडले जात आहेत. शिर्डी परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीने आपले एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लील फोटो तयार करत ब्लॅकमेल केल्याप्रकरणी खरातकडे नोकरीला असलेल्या नीरज जाधव याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. नोकराकडूनच कॅप्टनला ब्लॅकमेलची धमकी?नीरज जाधव हा खरातकडे ऑफिसबॉय होता. शिर्डी येथील तक्रारदार तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे तीन वर्षांपूर्वीनाशिकयेथे खरात याच्या कार्यालयात नीरजशी तिची ओळख झाली.या ओळखीचा गैरफायदा घेऊन जाधव पीडित महिलेला बनावट अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. नंतर हाच जाधव खरात यालाही ब्लॅकमेल करीत असल्याचा संशय पोलिसांना आहे. तपासात आता पुढे काय?‘एसआयटी’कडे तपासाची सूत्रे आल्यानंतर डिजिटल फॉरेन्सिक तपासाचा आधार घेतला जाणार असून, पोलिसांच्या हाती लागलेल्या ५८ व्हिडीओंमधील पीडितांना न्याय देण्यावर भर असेल. फोन कॉल्स तपासणे, तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे कामसुद्धा सुरू करण्यात आले आहे. आर्थिक व्यवहार, नेटवर्क तपास, संभाव्य सहकारी आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. याशिवाय कॅप्टन खरात याचे आर्थिक सोर्स तपासून इतकी अमाप माया त्याने कशी जमविली, याचे सखोल विश्लेषण केले जाणार आहे. कॅप्टन अशोक खरात २०० कोटींचा मालकअशोक खरात याने राजकीय मंडळी, प्रशासनातील बडे अधिकारी, तसेच सेलेब्रिटी यांना जाळ्यात ओढून अमाप माया जमविली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.नाशिक शहर, तसेच सिन्नर येथील आलिशान बंगले, मीरगाव (ता. सिन्नर) येथे आलिशान फार्महाउस, याशिवाय अनेक जमिनी, स्वतः तसेच कुटुंबीयांच्या नावे आहेत. सोने, चांदी अन् मौल्यवान वस्तू, दोन महागड्या कार अशा एकूण तब्बल २०० कोटींच्या संपत्तीचा मालक खरात हाच असल्याचा अंदाज आहे.
42 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 12:36 AM
कोरेगावमध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचे प्रकरण प्रलंबित

कोरेगावमध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचे प्रकरण प्रलंबित

कोरेगाव :निगडी रंगनाथ स्वामी, ता. कोरेगाव येथील अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर सात दिवस उलटून गेले तरी कारवाई होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी तपास करून मुलीचा शोध न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशारा पीडित कुटुंबाने दिला आहे.
58 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 19, 2026, 11:46 PM
आरोपी भोसलेची गुन्हेगारी नोंद उघड

आरोपी भोसलेची गुन्हेगारी नोंद उघड

भोसले याच्याविरुद्ध ठाणे, पालघरसह नवी मुंबई परिसरात घरफोडी, चोरी, दरोड्यासह अन्य गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचे रेकॉर्ड असल्याचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले. दि. 15 फेबुवारी रोजी सायंकाळी संशयिताने भिवंडी सबजेलच्या बाथरूममधील लोखंडी ग््राील उचकटून धूम ठोकली. यापूर्वी मुंबई रेल्वे पोलिसांना हिसडा मारून त्याने पलायन केले होते.
52 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 19, 2026, 11:36 PM
मोटारचे पाणी चोरणाऱ्या टोळीचा भारतीय पोलिसांनी पर्दाफाश केला, 15 लाख रुपये आणि 21 मोटार जप्त केल्या

मोटारचे पाणी चोरणाऱ्या टोळीचा भारतीय पोलिसांनी पर्दाफाश केला, 15 लाख रुपये आणि 21 मोटार जप्त केल्या

कोल्हापूर :नदीकाठासह शेतात विहिरीवरील पाणी उपसा करणाऱ्या महागड्या मोटरची चोरी करणाऱ्या टोळीला करवीर पोलिसांनी गुरुवारी बेड्या ठोकल्या. करवीर, पन्हाळ्यासह कळे परिसरातील 7 गुन्ह्यांची चोरट्यांनी कबुली दिली आहे. 21 मोटर्ससह 15 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि सीमाभागातील चोरीचे अनेक गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे.
16 shares
😢
L
Lokmat
Mar 19, 2026, 01:30 PM
गडचिरोली पोलिसांनी ऐतिहासिक कामगिरी केली, दुर्गम भागातील नक्षलवाद्यांच्या ताब्यात प्रवेश केला

गडचिरोली पोलिसांनी ऐतिहासिक कामगिरी केली, दुर्गम भागातील नक्षलवाद्यांच्या ताब्यात प्रवेश केला

लोकमत न्यूज नेटवर्क‎गडचिरोली:नक्षलवाद्यांचा शेवटचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या आणि अतिशय दुर्गम असलेल्या भामरागड तालुक्यातील 'बंगाडी' परिसरातगडचिरोलीपोलिसांनी १९ मार्च रोजी ऐतिहासिक कामगिरी फत्ते केली. तब्बल १००० सी-६० कमांडोंच्या फौजेसह पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या नक्षल गडात शिरून 'पोलीस मदत केंद्रा'चा गुढी उभारण्यात आली. या मोहिमेमुळे नक्षलवाद्यांची कोंडी झाली असून, छत्तीसगड सीमेवर आता 'खाकी'ची अभेद्य भिंत उभी राहिली आहे.‎​गेल्या अनेक वर्षांपासून बंगाडी हा भाग सुरक्षा दलांच्या आवाक्याबाहेर होता. या 'सुरक्षा पोकळी'चा फायदा घेतनक्षलवादीयेथे आपली समांतर सत्ता चालवत असत. मात्र, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली आखलेल्या 'प्लॅन ११' नुसार, लाहेरीपासून ८ किमी अंतरावर असलेल्या या गावात गुरुवारी पहाटेच कमांडोंनी एन्ट्री केली. १८ बीडीडीएस पथके आणि ५०० विशेष पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने अवघ्या एका दिवसात या ठिकाणी १५ पोर्टा कॅबिन, वाय-फाय आणि मोबाईल टॉवर उभारून प्रशासनाने आपले अस्तित्व सिद्ध केले. ३१ मार्च पर्यंत माओवाद हद्दपार करण्यासाठी पोलिस यंत्रणा जोमाने कामाला लागल्याचे दिसून येत आहे.‎काय आहे या 'मोहिमे'चे वैशिष्ट्य? ‎​बंगाडी केंद्रामुळे आता छत्तीसगडला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे. या केंद्रामुळे नक्षलवाद्यांच्या हालचालींवर आता चोवीस तास वॉच राहणार आहे. गुंडेनूर नाल्यावरील पुलाचे काम आणि भविष्यात येथे एसटी बस पोहोचवण्याचा निर्धार पोलिसांनी व्यक्त केला आहे.‎​‎स्थानिकांना साहित्य वाटप ‎​केवळ चौकी उभारून पोलिस थांबले नाहीत, तर त्यांनी स्थानिक आदिवासींशी संवाद साधला. आयोजित जनजागरण मेळाव्यात साड्या, भांडी, ब्लँकेट आणि तरुणांना फुटबॉल-क्रिकेटच्या किटचे वाटप करण्यात आले. माओवाद्यांच्या दहशतीखाली असलेल्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता विकासाची नवी आशा फुलली आहे.‎​"बंगाडी पोलिस मदत केंद्र हे या भागातील विकासाचे प्रवेशद्वार आहे. रस्ते, पूल आणि मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून हा भाग आता जिल्ह्याच्या मुख्य प्रवाहाशी जोडला जाईल."‎- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली.
38 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 19, 2026, 12:57 PM
लखनौमधील विनायक टॉवरच्या 13व्या मजल्यावरून उडी मारून एका व्यक्तीचा मृत्यू

लखनौमधील विनायक टॉवरच्या 13व्या मजल्यावरून उडी मारून एका व्यक्तीचा मृत्यू

लखनऊ: दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन व्यक्तींच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४ च्या जवळ असलेल्या महागुनपुरम सोसायटीत घडली. विनायक टॉवरच्या १३ व्या मजल्यावरुन एका ४० वर्षीय व्यक्तीनं उडी मारली. राजवीर असं त्याचं नाव आहे. राजवीरनं १३ व्या मजल्यावरुन उडी घेत आयुष्य संपवलं.एका व्यक्तीनं जीवन संपवल्याची माहिती मिळताच पोलीस पोहोचले. विनायक टॉवरच्या तळमजल्यावर राजवीरच्या आईचा फ्लॅट आहे. पोलीस या फ्लॅटमध्ये गेले. तिथे एका महिलेचं शव होतं. हे शव राजवीरच्या आईचं असल्याचं सांगण्यात आलं. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.Crime News: वेळ अन् ठिकाण ठरवा! 15 पोलिसांचे मुडदे पडतील! धमकी देणारा कुख्यात गुन्हेगार एन्काऊंटरमध्ये ठारमहागुनपुरम एओएचे महासचिव डॉक्टर सुरजीत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. विनायक टॉवरच्या तळमजल्यावर असलेल्या फ्लॅट क्रमांक ०२८ मध्ये राजवीर नावाच्या व्यक्तीची आई राहते. गुरुवारी राजवीरनं इमारतीच्या तेराव्या मजल्यावरुन उडी घेत आयुष्य संपवलं. राजवीर इतरांचं भविष्य सांगायचा. राजवीर टोकाचं पाऊल उचलेल असा विचारही कोणी केला नव्हता.स्थानिक रहिवासी सचिन त्यागी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजवीर पॉडकास्टचं काम करायचा. काही दिवसांपासून त्याला बरंच आर्थिक नुकसान सहन करावं लागत होतं. राजवीरची पत्नी किरण बाला स्वत:च्या मुलांसह गौड सिटीमध्ये स्वतंत्र राहते. राजवीरचं शव ताब्यात घेतल्यावर पोलीस फ्लॅट क्रमांक ०२८ मध्ये पोहोचले. तेव्हा आतून तीव्र दुर्गंधी येत होती. पोलिसांनी दार उघडलं, तेव्हा त्यांना आतमध्ये बेडवर राजवीरच्या आईचं शव दिसलं.Youth Dies In Wedding: लग्नात जेवणावर ताव, रसगुल्ला खाताना तरुणाचा मृत्यू; लग्न मंडपात गोंधळ, कुटुंब धक्क्यातयानंतर कवीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारीदेखील घटनास्थळी पोहोचले. राजवीरच्या आईचा मृत्यू होऊन तीन दिवस झाले असावेत, असा अंदाज एसीपी सूर्यबली मौर्या यांनी व्यक्त केला. मृत्यूचं कारण अद्याप समजलेलं नाही. घटनास्थळी फॉरेन्सिकचं पथक पोहोचलं आहे. सगळ्या शक्यता लक्षात घेऊन पोलीस तपास करत आहेत. आई आणि मुलाच्या मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.
96 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 19, 2026, 12:54 PM
नाशिकमध्ये कौटुंबिक वादावरून मुलाने वडिलांना बेदम मारहाण केली

नाशिकमध्ये कौटुंबिक वादावरून मुलाने वडिलांना बेदम मारहाण केली

Nashik crime: कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादातून रागाच्या भरात पेठ रोडवरील नवनाथनगरला राहणाऱ्या पोटच्या ३५ वर्षीय मुलाने ६५ वर्षीय वृद्ध पित्याच्या पोटात धारदार चाकूने वार करून गंभीर जखमी केले होते. सव्वा महिन्याभरापूर्वी घडलेल्या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या पित्याचा उपचार सुरू असताना मंगळवारी (१७ मार्च)मृत्यूझाल्याने मुलावर पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सखाराम पंडित भावसार (६५) असे चाकू हल्ल्यात जखमी होऊनमृत्यूपावलेल्या वृद्ध पित्याचे नाव आहे. पित्याचा खून केल्याच्या कारणावरूनपोलिसांनीअश्विन सखाराम भावसारलाअटककेली आहे. ५ फेब्रुवारी रोजी दुपारी रोकडे चाळ येथे राहणाऱ्या दोघा भावसार पिता-पुत्रात कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी दारूच्या नशेत संशयित आरोपी अश्विन याने वडील सखाराम यांना शिवीगाळ करत हातातील धारदार चाकूने पोटात डाव्या बाजूला वार केला. त्यात सखाराम गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला.
56 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 19, 2026, 12:52 PM
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखालील बलात्काराचा आरोपी ज्योतिषी ट्रस्ट

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखालील बलात्काराचा आरोपी ज्योतिषी ट्रस्ट

पुणे :भोंदूगिरी करणारा स्वयंघोषित ज्योतिषी आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरात यांच्या ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आहेत. त्या पदावर राहिल्या तर पुरावे नष्ट करण्याची भीती आहे. त्यामुळे रूपाली चाकणकर यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नेत्या रूपाली पाटील -ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत केली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अशोक खरात यांची पाद्यपूजा केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याबाबत रूपाली पाटील -ठोंबरे म्हणाल्या, हा विषय कोणत्याही पक्षाचा किंवा जातीचा नाही, हा पूर्णपणे महिलांचा विषय आहे. एक वर्षापूर्वीच या प्रकरणाची वाचा फुटली होती. तरीही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या ट्रस्टवर असल्यामुळे पोलिस कारवाई होत नव्हती का? ५८ व्हिडिओ सापडले आहेत, म्हणजे किमान ५८ महिलांवर अत्याचार झाला असण्याची शक्यता आहे. रूपाली चाकणकर यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होणार नाही. त्या पदावर राहिल्या तर पुरावे नष्ट करण्याची भीती आहे. सर्व संबंधित ट्रस्टवर गुन्हे दाखल व्हायला हवेत. जर रूपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला नाही तर संपूर्णमहाराष्ट्रातआंदोलन करण्यात येईल. मी हा विषय सुनेत्रा पवार यांच्या कानावर घालणार आहे. संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीमुळे तपास प्रभावित होऊ शकतो, त्यामुळे त्यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा, असे रूपाली ठोंबरे यांनी सांगितले.
28 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 19, 2026, 11:40 AM
ज्योतिषीच्या अटकेमुळे ट्रस्ट आणि मंदिराची चौकशी सुरू

ज्योतिषीच्या अटकेमुळे ट्रस्ट आणि मंदिराची चौकशी सुरू

Ashok Kharat News : 'हायप्रोफाइल' स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याने सिन्नर तालुक्यातील मिरगाव शिवारात उभारलेल्या ईशान्येश्वर मंदिरासह स्थापन केलेले शिवनिका संस्थान ट्रस्टही चर्चेत आले आहे. या मंदिराला अनेक राजकीय नेत्यांनी भेटी देतानाच ट्रस्टवर राजकीय क्षेत्रातील मातब्बरांची वर्णी लावलेली असल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. खरात याने सुमारे १७ वर्षापूर्वी सिन्नर तालुक्यातील मिरगाव शिवारात श्री ईशान्येश्वर मंदिराची अंकशास्त्राच्या आधारे नदीच्या ईशान्य कोपऱ्यात उभारणी केली. या मंदिराचा कारभार पाहण्यासाठी त्यांनी शिवनिका संस्थान नावाने ट्रस्ट निर्माण करून त्यावर राज्यातील मातब्बर लोकांची वर्णी लावली. तेव्हापासून खरात अधिक चर्चेत आला. ईशान्येश्वर मंदिराची उभारणी केल्यानंतर शिर्डीला येणारे अनेक भाविक सिन्नर-शिर्डी रस्त्याच्या कडेला मिरगाव शिवारात असलेल्या मंदिरात दर्शनासाठी यायचे. यात अनेक बडे राजकारणी, उद्योजक व कलाकारांचा समावेश होता. या मंदिराची उभारणी करतांना खरात यांनी मोठा गाजावाजा केला होता. मंदिराच्या कळसाची उंची किती पाहिजे, गाभारा केवढा पाहिजे, पायऱ्या किती असाव्यात, मंदिराचा मुख्य दरवाजा, नंदी, मंदिराचा दगड आणि पिंड कशी असावी असे सर्व अंकशास्त्रानुसार निकष लावून या मंदिराची उभारणी करण्यात आल्याचे सांगण्यात यायचे. त्यामुळे ईशान्येश्वर मंदिर अधिक चर्चेत आले होते. देश, विदेशातून खरात याचे शिष्य या मंदिरात पूजेसाठी येत होते. १३ ऑगस्ट २००९ रोजी श्री शिवनिका संस्थान, मिरगाव या नावाने ट्रस्टची नोंदणी करण्यात आली होती. तेव्हापासून यावर संचालक मंडळ अस्तित्वात असून त्यावर अशोक खरात हा अध्यक्ष आहे. या शिवनिका संस्थानच्या माध्यमातून त्याने अनेक समाजोपयोगी उपक्रम देखील राबविले आहेत. त्यामुळे परिसरात त्याच्या नावाचा दबदबा वाढला होता. आलिशान बंगला आणि शेती सिन्नर तालुक्यातील मिरगाव शिवारात श्री ईशान्येश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस खरात यांचा अलिशान बंगला आणि शेती आहे. याठिकाणी आंब्याची बाग लावण्यात आली असून समोर श्री शिवनिका संस्थानचा मोठा सभामंडप बांधण्यात आला आहे. याठिकाणी विविध कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमाला नेहमीच देशभरातून मोठ्या प्रमाणावर गर्दी असायची. संचालक मंडळाच्या नावांचा फलक गायब.. श्री ईशान्येश्वर मंदिराच्या सभामंडपात श्री शिवनिका संस्थानच्या संचालक मंडळाच्या नावाची पाटी (फलक) लावण्यात आली होती. मात्र खरात यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर रातोरात याठिकाणी असलेली संचालक मंडळाचा फलक गायब झाल्याची चर्चा होती. श्रावणात, गुरुपौर्णिमेला चाकणकरांची उपस्थिती खरात यांनी स्थापन केलेल्या श्री शिवनिका संस्थान, मिरगाव या संस्थानवर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर या ट्रस्टी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक कार्यक्रम, महाशिवरात्र आणि श्रावण महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमांना व गुरूपौर्णिमेला चाकणकर या उपस्थित असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. सदर फोटो व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी चाकणकर यांना आता लक्ष्य करणे सुरू केले असून, त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी होऊ लागली आहे. दोन वर्षांपूर्वी शिवनिका ट्रस्टमध्ये बदल... शिवनिका ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर तालुक्यातील व काही बाहेर जिल्ह्यातील प्रतिष्ठित या ट्रस्टचे संचालक होते. मात्र दोन वर्षापूर्वी तीन ट्रस्टींनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. तेव्हाच काहीतरी गडबड असल्याची चर्चा सुरू झाली होती. तर काही जुने ट्रस्टी कायम ठेवून नवीन ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती. त्यावर खरात यांच्या पत्नी यांना सरचिटणीस बनविण्यात आले होते. खरात आहे बहुभाषिक; १५४ देशांचा प्रवास ६७ वर्षीय खरात हा मूळचे सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी (शिवाजीनगर) येथील भूमिपुत्र आहेत. शालेय शिक्षणानंतर ते अचानक गायब झाल्याची चर्चा आहे. त्यानंतर अनेक वर्षानंतर ते प्रकटले आणि आपण मर्चेंट नेव्हीमध्ये कॅप्टन पदावर असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत होते. २२ वर्षे नेव्हीमध्ये नोकरी केल्यानंतर १५४ देशांमध्ये ते फिरल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे त्यांना अनेक देशांच्या व प्रांताच्या भाषा बोलता येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते बहुभाषिक आहेत. त्यांना अनेक देशांच्या धार्मिक चालीरिती, परंपरा आणि संस्कृतीचा अभ्यास असल्याचेही कळते.
56 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 19, 2026, 11:39 AM
लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अशोक खरात याला अटक; इराणने सौदीच्या यानबूला लक्ष्य केले

लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अशोक खरात याला अटक; इराणने सौदीच्या यानबूला लक्ष्य केले

Ashok Kharat Case :नाशिकमधीलअशोक खरात याच्यावर एका महिलेने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहे. या प्रकरणी त्याला काल पोलिसांनी अटक केली, या प्रकरणी आता पोलिसांनी आणखी तपास सुरू केला असून काल त्याच्या फॉर्म हाऊस आणि निवासस्थानाची झाडाझडती घेतली. पोलिसांना त्याच्या फॉर्महाऊससमध्ये एक पिस्तूलही सापडले आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन आठवड्या पूर्वीच आल्याची माहिती समोर आली आहे. फडणवीस यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. होर्मुझनंतर आता इराणने 'यानबू'ला केले लक्ष्य; सौदीच्या सॅमरेफ रिफायनरीवर केला हल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन आठवड्यापूर्वीच लक्ष घातलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतरच राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या आदेशाने ही कारवाई केली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिस महासंचालकांशी चर्चा केली होती. दोन आठवड्यापासून पोलिसांनी ही कारवाई गुप्त ठेवली होती. पोलिसांनी आधी पुरावे गोळा केले. यानंतरच पोलिसांनी धडक कारवाई केली. चोर शिरल्याचे कारण देत केला प्रवेश पोलिसांनी अशोक खरात याला ताब्यात घेण्यासाठी त्याच्या निवासस्थान परिसरात चोर शिरल्याचे कारण दिले. पोलिसांनी परिसरात तपास केल्याचे दाखवले. यानंतर पोलिसांनी अशोक खरात याच्या निवासस्थानी प्रवेश केला. बाहेर पोलिसांनी मोठा फौजफाटा ठेवला, यानंतर पोलिसांनी अशोक खरात याला ताब्यात घेतले. राज्य सरकारने SIT नेमली शोक खरात प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून, या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या पथकाचे नेतृत्व डॅशिंग पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कॅप्टन खरात याच्यावर महिला अत्याचाराचे गंभीर आरोप होत होते. या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता सरकारने एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तेजस्वीनी सातपुते यांच्याकडे जबाबदारी आल्याने आता या प्रकरणाचा छडा अत्यंत वेगाने लागण्याची शक्यता आहे. खरातने यापूर्वी केलेले अन्य काही काळे कारनामे आणि त्याचे लागेबंधे आता एसआयटीच्या चौकशीत उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
32 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 19, 2026, 11:28 AM
गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचा भारताचा निर्धार

गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचा भारताचा निर्धार

भोसले यांनी पुढे सांगितलं की, अशा प्रकारच्या नराधमांना कोणत्याही प्रकारे पाठीशी घालू नये आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी. “कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न न करताकायद्यानेयोग्य ती कारवाई होईल, यावर आमचा पूर्ण विश्वास आहे,” असंही त्यांनी ठामपणे म्हटलं.
82 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 19, 2026, 10:52 AM
जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टर प्रकरणामागील संघटित रॅकेटचा पोलीस अधिकाऱ्याने केला खुलासा

जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टर प्रकरणामागील संघटित रॅकेटचा पोलीस अधिकाऱ्याने केला खुलासा

या दबावामुळे जप्त केलेले ट्रॅक्टर आणि आरोपींना सोडावे लागले, असा दावा करत वडेट्टीवार यांनी हा प्रकार साधी चोरी नसून नक्षलग्रस्त भागात सक्रिय असलेल्या संघटित टोळ्यांचे मोठे रॅकेट असल्याचे सांगितले. या तस्करांचे आणि संबंधितांचे मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड तपासल्यास राज्यातील मोठ्या सागवान तस्करी जाळ्याचा उलगडा होऊ शकतो, असेही वडेट्टीवार म्हणाले. तसेच नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संरक्षणासाठी शस्त्रे देण्याची मागणीही त्यांनी केली.
73 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 19, 2026, 10:41 AM
अकोलाच्या चहाच्या दुकानातील वादात'तुला माझ्यात काय दिसते?'या कारणावरून तरुणाची हत्या

अकोलाच्या चहाच्या दुकानातील वादात'तुला माझ्यात काय दिसते?'या कारणावरून तरुणाची हत्या

प्रियंका जाधव, अकोला :शहरामधील डाबकी रोड परिसरात गुरुवारी रात्री एका चहाच्या टपरीवर झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान एका भीषण हत्येत झाले आहे. "तू माझ्याकडे काय पाहतोस?" या साध्या कारणावरून झालेल्या वादातून तीन जणांनी १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर चाकूने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली. माविश मोहम्मद आझम असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अकोला पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या ६ तासांत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.नेमकी घटना काय?मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास डाबकी रोड रेल्वे स्टेशन परिसरात घडली. मृत माविश हा एका चहाच्या टपरीवर उभा असताना तिथे उपस्थित असलेल्या अन्य काही तरुणांशी त्याचा शाब्दिक वाद झाला. आरोपींनी "तू माझ्याकडे का पाहतोस?" असे म्हणत माविशशी हुज्जत घातली. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी माविशला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान एका आरोपीने धारदार चाकू काढून माविशवर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माविशला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.पोलिसांची जलद कारवाईघटनेची माहिती मिळताच डाबकी रोड पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेची चार विशेष पथके तयार करण्यात आली. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे, आरोपी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मार्गे मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून अवघ्या ६ तासांत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.Pune News : 11 महिन्यांचा संसार, वेगवेगळ्या देशात नोकरी, जोडपं पुणे कोर्टात, लग्न जुळवणाऱ्या माऊलींनीच घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण केलीपोलीस अधीक्षकांचे आवाहनया घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक केल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, "या घटनेचा तपास सुरू असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवरविश्वासठेवू नका आणि शहरात शांतता राखावी."सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपींचीपार्श्वभूमीतपासली जात आहे.
100 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 19, 2026, 10:33 AM
न्यू रेल्वे कॉलनी, साबळेनगर, कुर्ला येथे मारहाणीची घटना घडली

न्यू रेल्वे कॉलनी, साबळेनगर, कुर्ला येथे मारहाणीची घटना घडली

सदर घटना सोमवारी रात्री सव्वानऊ वाजता कुर्ला येथील साबळेनगर, न्यू रेल्वे कॉलनीतील इमारत क्रमांक 105 समोर घडली. जयराज हे याच परिसरात राहत असून त्यांच्या मालकीची एक ऑटो रिक्षा आहे. सोमवारी तिथे आरोपी मुलगा त्यांच्या रिक्षामध्ये बसत होता. यावेळी त्यांनी रिक्षात बसू नकोस, असे सांगून टोकले होते. त्याचा राग आल्याने त्याने त्याच्याकडील चाकूने त्यांच्या मानेवर वार केले.
32 shares
😢
L
Lokmat
Mar 19, 2026, 10:11 AM
मिझोराममध्ये बेकायदेशीर प्रवेश आणि संशयास्पद कृत्यांसाठी सात परदेशी नागरिकांना अटक

मिझोराममध्ये बेकायदेशीर प्रवेश आणि संशयास्पद कृत्यांसाठी सात परदेशी नागरिकांना अटक

मिझोरममध्ये बेकायदेशीर प्रवेश आणि संशयास्पद हालचालींप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 7 परदेशी नागरिकांबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. यूक्रेनचे 6 आणि अमेरिकेचा 1 नागरिक अटकेत असून, ते भारताचा वापर करूनम्यानमारमध्येजाण्यासाठी ‘ट्रांझिट कॉरिडॉर’ तयार करत होते. एवढेच नाही तर तो ड्रोन आणि आधुनिक युद्ध तंत्राचे प्रशिक्षणही देत ​​होते, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी एनआयएच्या दोन टीम स्लीपर सेल मॉड्यूलच्या शोधात मिझोरम-म्यानमारसीमेवर पोहोचल्या आहेत. या संवेदनशील प्रकरणाची चौकशी करणाऱ्या केंद्रीय संयुक्त तपास पथकाला माहिती मिळाली की, या मॉड्यूलला मिझोराम-म्यानमार सीमेवरील स्थानिक नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळाला होता. हे नागरिक भारत आणि म्यानमार या दोन्ही देशातील आहेत. केंद्रीय तपास पथकही म्यानमारच्या तपास यंत्रणांच्या संपर्कात असून, येत्या काही दिवसांत आणखी काही मोठ्या अटकेची शक्यता आहे. तपासादरम्यान या आरोपींकडून ड्रोन आणि आधुनिक युद्धतंत्राचे प्रशिक्षण दिल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, त्यांचे भारतविरोधी किंवा प्रतिबंधित संघटनांशी संबंध असू शकतात, अशीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या प्रकरणात गुप्तहेरगिरीचा कोनही तपासात समाविष्ट करण्यात आला आहे. तपासात असेही समोर आले आहे की ‘मॅथ्यू’ नावाचा एक अमेरिकन नागरिक परदेशातील काही ख्रिश्चन संस्था आणि धार्मिक गटांकडून देणगी गोळा करत होता. ही रक्कम सामाजिक आणि धार्मिक कार्यांसाठी घेतली जात असल्याचे सांगितले जात होते; मात्र त्यातील काही निधी भारत-म्यानमार सीमेवरील बंडखोर गटांकडे वळवण्यात आल्याचा संशय आहे. अशीही माहिती समोर आली आहे की, काही विदेशी भाडोत्री लढवय्ये म्यानमारमधील गृहयुद्धात सहभागी होण्यासाठी भारताचा मार्ग वापरत होते. हे लढवय्ये नेमके कोणासाठी काम करत होते, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये यूक्रेनचा मारियन स्टेफानकिव याचाही समावेश असून, त्याला डोनबास संघर्षाचा अनुभव असल्याचा संशय आहे. तथापि, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. सध्या सर्व आरोपींची कसून चौकशी सुरू असून, या प्रकरणामागील संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्न करत आहेत.
66 shares
😢
L
Lokmat
Mar 19, 2026, 09:58 AM
गुजरात पोलिसांनी सुरतमध्ये बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला, 2 कोटींहून अधिक बनावट नोटा जप्त केल्या

गुजरात पोलिसांनी सुरतमध्ये बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला, 2 कोटींहून अधिक बनावट नोटा जप्त केल्या

सूरत - गुजरात पोलिसांनी बनावट नोटांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेत अहमदाबाद क्राइम ब्रांचने मोठा खुलासा केला आहे. सूरत येथे बनावट नोटा चालवणारे मोठे रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले. यात २ कोटीहून अधिक बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. त्याशिवाय ६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण कारनामा एका आध्यात्मिक आश्रमातून उघड झाला आहे. या तपासात समोर आले की, सूरतच्या कामरेज तालुका येथील श्री सत्य योग फाऊंडेशन आश्रमात बनावट नोटा छापण्याचा काळा कारनामा सुरू होता. बाहेरून धर्म आणि योग केंद्र दिसणाऱ्या आश्रमात आतमधून देशाच्या अर्थव्यवस्थेला कमकुवत करणारा प्रकार सुरू होता. क्राइम ब्रांचला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सूरत येथून अहमदाबादला बनावट नोटांची वाहतूक केली जाणार होती. त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात एका महिलेसह ६ जणांना अटक केली. त्यांच्या जवळून ५०० रूपये किंमतीच्या ४० हजाराहून अधिक बनावट नोटा जप्त केल्या. ज्याची एकूण किंमत २ कोटी असल्याचे बोलले जाते. ५०० रुपये द्या आणि त्याच्या तिप्पट बनावट नोटा घ्या या बनावट नोटा सुरतच्या वराछा परिसरात छापण्यात आल्या होत्या आणि त्या चलनात आणण्यासाठी एक विशिष्ट योजना आखण्यात आली होती. ५०० खऱ्या नोटा द्या आणि १५०० बनावट नोटा घ्या अशी स्कीम असल्याचे तपासात उघड झाले. याचा अर्थ ६६ लाख खऱ्या नोटांच्या बदल्यात २ कोटी रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्या जात होत्या. मात्र पोलिसांनी सापळा रचत पहिल्याच व्यवहाराआधी आरोपींना अटक केली. दरम्यान, क्राइम ब्रांचच्या पथकाने सुरतमधील आश्रम आणि इतर ठिकाणी छापा टाकून प्रिंटिंग मशीन, कॉम्प्युटर, विशेष कागदे, रंग आणि अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. या नेटवर्कमध्ये आश्रमाच्या वाहनांचाही वापर केला जात होता. पंचनामा करताना ४०,००० हून अधिक नोटांचे अनुक्रमांक नोंदवण्यासाठी पोलिसांना तासनतास संघर्ष करावा लागला.
45 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 19, 2026, 09:45 AM
पोलीस हवालदाराची योजना उघडकीस आलीः सागर भुजबलचा जमीन व्यवहार घोटाळा

पोलीस हवालदाराची योजना उघडकीस आलीः सागर भुजबलचा जमीन व्यवहार घोटाळा

सातारा : अंगात खाकी वर्दी असल्यामुळे त्याला कायद्याचे सर्व ज्ञान; पण याच कायद्याचा दुरुपयोग करून त्याने आपल्याच सहकाऱ्यांना गळ घालून नफा कमावण्याचं आमिष दाखवलं. प्लाॅट देतो, असे सांगून त्यानंपोलिसदलातील सहकाऱ्यांपासून आयटी इंजिनिअरपर्यंत सगळ्यांनाच गंडवलं. फसवणुकीची रक्कम डोईजड झाल्यानंतर त्याला ड्यूटीवर हजर न राहता मात्र परागंदा व्हावं लागलं. ही कहाणी आहे एकापोलिसकाॅन्स्टेबलची.सागर भुजबळ असं या पोलिस काॅन्स्टेबलचं नाव. खेळामध्ये प्रावीण्य मिळविलेला सागर पोलिस दलात भरती झाल्यानंतर तो साताऱ्यातील पोलिस प्रबोधनीमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून रुजू झाला. तो खेळाडू घडवत असताना दुसरीकडे मात्र त्याचे भलतेच उद्योग सुरू झाले. जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करतो, असे तो आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना सांगू लागला.प्लाॅट खरेदीत झटपट पैसा मिळतोय, हे तो पटवून देऊ लागला. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून पोलिस दलातील काही पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला लाखोत पैसे दिले. जमीन व्यवहार खरा वाटावा म्हणून त्यानं दस्त, नोंदी सारी कागदपत्रे बनावट बनवली. एक-एक सावज हेरत तो पैसे उकळत गेला. अगदी आयटी इंजिनिअर, नोकरदार, सैन्य दलातील जवानाचे कुटुंब अशा सगळ्यांकडून त्याने पैसे उकळले; पण जेव्हा या गुंंतवणूकदारांकडून तगादा सुरू झाला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन हादरली.एकीकडे नोकरीचे टेन्शन, तर दुसरीकडे बदनामी. या कसरतीत त्याने वडिलोपार्जित जमीनही देतो म्हणून आयटीआयचे क्लार्क धैर्यशील देशमुख यांना २५ लाखांना गंडा घातला. याच तक्रारीचा पहिला गुन्हा काॅन्स्टेबल सागर भुजबळवर दाखल झाला. त्यानंतर मात्र, त्याचे कारनामे आणखी समोर आल्यानंतर सारेच हादरले. कोणाकडून १० लाख, तर कोणाकडून १८ लाख, तर कोणाकडून ९ लाख, अशी रक्कम घेतल्याचा त्याच्यावर आरोप होत असून, सर्व कागदपत्रे घेऊन तक्रारदार पोलिस अधीक्षकांकडे धाव घेत आहेत.म्हणे, अंगातील वर्दीमुळे तो फसविणार नाही, याची खात्रीकधी तो जमीन व्यवहारात पैसे गुंतविण्यास सांगायचा, तर कधी शाळांसाठी लागणाऱ्या बॅगच्या कोट्यवधी रुपयांच्या टेंडरमधून नफा मिळवून देण्याचे आश्वासन द्यायचा. अंगात वर्दी असल्यामुळे तो फसविणार नाही, याची खात्री सगळ्यांनाच म्हणे होती; पण जेव्हा त्याचे फसवणुकीचे आकडे समोर आले तेव्हा सारेच अवाक् झाले. आपल्याच सहकाऱ्याविरोधात तक्रार देण्याची वेळ पोलिसांवर आली.या प्रकरणाची पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दखल घेतल्यामुळेच काॅन्स्टेबल सागर भुजबळवर पहिला गुन्हा दाखल झाला. आता तक्रारदारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अधीक्षकांनी यामध्ये लक्ष घालून फसलेल्या पोलिसांना व इतर नागरिकांना न्याय द्यावा, एवढीच अपेक्षा पीडित तक्रारदारांची आहे.यांची झाली फसवणूकधैर्यशील देशमुख २५, महाबळेश्वर पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल प्रवीण जाधव ९ लाख ६० हजार, अन्य एक पोलिस कर्मचारी १५ लाख, जवानाची पत्नी १० लाख, आयटी इंजिनिअर मयूर कणसे १८ लाख, एक व्यावसायिक १.५० लाख, अशी फसवणुकीची रक्कम आहे. हा फसवणुकीचा आकडा आणखी वाढू शकतो, असे पोलिस सांगताहेत.
54 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 19, 2026, 09:02 AM
विलंबित तपासामुळे न्यायाला अडथळाः यश गायकवाड प्रकरण

विलंबित तपासामुळे न्यायाला अडथळाः यश गायकवाड प्रकरण

...तर यशला देखील मिळाला असता न्याय दहिवडी येथील साईराज मांजरे याच्या घटनेचे गांभीर्य ओळखून शिक्रापूर पोलिसांनी घटनेचा छडा लावला. त्याचप्रकारे 21 महिन्यांपूर्वी यश गायकवाडच्या प्रकरणाचे तत्कालीन तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास केला असता, तर यश गायकवाडला देखील न्याय मिळाला असता, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
56 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Mar 19, 2026, 08:34 AM
सरकारने ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात खटला सादर केला

सरकारने ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात खटला सादर केला

ठाणे जिल्हा व सत्र न्यायालय - 3 चे न्यायमूर्ती डी. एस. देशमुख यांच्या दलनात विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी सरकारच्या वतीने युक्तिवाद करीत न्यायालयात साक्षीदार आणि पुरावे सादर केले तर घटनास्थळाचे परिस्थितीजन्य पुरावे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी न्यायालयात सादर केले. न्यायमूर्ती डी. एस. देशमुख यांनी न्यायालय समोर असलेले साक्षी पुरावे ग्राह्य धरीत आरोपी सुनीलकुमार बितुली रजक, आरोपी सुदीपकुमार राजू रविदास या दोघांना आजन्मठेपेची शिक्षा आणि एक लाखाचा दंड, दंड न भरल्यास एक वर्षाची अतिरिक्त करीत अशी शिक्षा हत्या आणि प्लॅनिंग बाबत ठोठावली.
95 shares
😐
P
Pudhari
Mar 19, 2026, 08:18 AM
गँगस्टर रवी पुजारीला अटकेनंतर नवीन तुरुंगात हलवण्यात आले

गँगस्टर रवी पुजारीला अटकेनंतर नवीन तुरुंगात हलवण्यात आले

बंगलोर जिल्हा कारागृहातून घेतले ताब्यात परदेशातून प्रत्यापन करून आणलेला गँगस्टर रवी पुजारी ला खंडणी आणि जिवे ठार मारण्याच्या धमकी बाबत अनेक गुन्ह्यात समाविष्ट असल्याने त्याला कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदिस्त होता. कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये बांधकाम व्यवसायिकाला दहा कोटीची खणी मागून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात ठाणे गुन्हे शाखा खननिविरोधी पथकाने बेंगलोर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात संपर्क साधून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करीत अखेर 17 मार्च रोजी ताब्यात घेऊन ठाण्यात आणण्यात आले.
8 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 19, 2026, 08:04 AM
पोलिसांकडून कबुतराशी संबंधित हल्ल्याचे गूढ उघड

पोलिसांकडून कबुतराशी संबंधित हल्ल्याचे गूढ उघड

...कबूतरचोरीचा संशय? आरोपींनी नेमक्या कोणत्या रागातून ही टोकाची मारहाण केली, याचा उलगडा पोलिस करीत आहेत. कबूतर चोरण्याच्या संशयातून ही घटना घडली का? या दिशेने देखील पोलिस कसून तपास करीत आहेत.
100 shares
😢
L
Lokmat
Mar 19, 2026, 07:54 AM
मुंबईत अल्पवयीन मुलाने रिक्षाचालकाची भोसकून हत्या केली

मुंबईत अल्पवयीन मुलाने रिक्षाचालकाची भोसकून हत्या केली

मुंबई : रिक्षात बसू दिले नाही, ह्याच रागातून वाद घालत एका अल्पवयीन मुलाने रिक्षा चालकाची चाकूने भोसकून निर्घृणपणे हत्या केली. कुर्ला पूर्वेतील साबळे नगर, न्यू रेल्वे कॉलनी रस्त्यावर सोमवार, १६ मार्च रोजी रात्री ही घटना घडली. जयराज जयपाल नायडू (४८) असे मृताचे नाव आहे. हत्येनंतर पळून गेलेल्या आरोपीच्या नेहरूनगरपोलिसांनीमुसक्या आवळल्या असून, हत्येचा गुन्हा नोंदवत त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. जोशुवा जयराज नायडू (२१) यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचे वडील जयराज नायडू यांनी अल्पवयीन मुलाला रिक्षामध्ये बसण्यास मज्जाव केला, याच रागातून त्या मुलाने जयराज यांच्या मानेवर डाव्या बाजूला वार केला. यात ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी जयराज यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रिक्षा चालकाच्या मुलाच्या तक्रारीवरूनपोलिसांनीगुन्हा दाखल करून पुढील तपास केला असल्याचे सांगितले आहे.
41 shares
😢
L
Lokmat
Mar 19, 2026, 07:51 AM
संजय परांजपे हत्या प्रकरणः कुंडल वेसमध्ये एज्युकेशन सोसायटीचे संचालक मृतावस्थेत आढळले

संजय परांजपे हत्या प्रकरणः कुंडल वेसमध्ये एज्युकेशन सोसायटीचे संचालक मृतावस्थेत आढळले

पलूस : शहरातील पंडित विष्णू दिगंबर शिक्षण संस्थेचे विद्यमान संचालक संजय प्रभाकर परांजपे (रा. कुंडलवेस पलूस, वय ६०) यांची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडली. हत्या करून आरोपी फरार झाला. या घटनेची माहिती पलूसपोलिसांनामिळताचपोलिसांनीधाव घेतली. या घटनेचा पंचनामा रात्री उशिरापर्यंत सुरू होता.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संजय परांजपे हे कुंडल वेस येथील अपार्टमेंटमध्ये रहात होते. ते कुटुंबासमवेत घरी बसले होते. ते अचानक उठून बिल्डिंगच्या खाली मंदिरात गेले होते. काही वेळानंतर परांजपे घरी आले नाहीत म्हणून कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.बिल्डिंगच्या खाली येऊन पहाताच त्यांचा अडगळीच्या जागेत त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पलूस पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संजय परांजपे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तात्काळ त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले.आरोपीने त्यांच्या डोक्यावर, मानेवर कानाजवळ व डोळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वर्मी घाव केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते. पोलिस या घटनेचा रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते. मृतदेह पुढील तपासासाठी पाठविला असून हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संजय परांजपे हे पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत होते. उदय परांजपे हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. कुटुंबाला सामाजिक, शैक्षणिक वारसापलूसमध्ये परांजपे कुटुंबाला सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील समृद्ध परंपरेचा वारसा आहे. आजोबा माधवराव परांजपे व वडील प्रभाकर परांजपे यांचा वारसा या कुटुंबाने आजवर पुढे नेला आहे. अशा कुटुंबातील व्यक्तीच्या हत्येने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पलूस शहरात घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. पोलिस आरोपीला लवकरात लवकर पकडतील. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. रात्री उशिरा पंचनामा करून अज्ञातावर गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू करू. -सिद्धेश्वर जंगम, पोलिस निरीक्षक, पलूस.
23 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 19, 2026, 07:50 AM
पुणे गुन्हे शाखेने हत्येचा प्रयत्न हाणून पाडला, चार संशयितांना अटक

पुणे गुन्हे शाखेने हत्येचा प्रयत्न हाणून पाडला, चार संशयितांना अटक

पुणे:किरकोळ वादातून एकाचा खून करण्यासाठी कोयते बाळगणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेच्या युनिट सहाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून कोयते, गिलवर, दुचाकी असा ८१ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १७ मार्च रोजी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास हडपसरमधील लक्ष्मी माता मंदराजवळ करण्यात आली. याप्रकरणी आरोपींविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अंमलदार शेखर काटे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे गुन्हे शाखेच्या युनिट सहामध्ये कार्यरत असून, १७ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी दुचाकीवरून चौघेजण प्रवास करत असल्याचे त्यांना दिसून आले. संशय आल्यामुळे त्यांनी संबंधितांना गाडी थांबवून खाली उतरवले. त्यांची अंगझडती घेतली असता, आरोपींकडे कोयते आणि गिलवर असे साहित्य मिळून आले. चौकशीत त्यांनी एकाचा खून करण्यासाठी प्लॅनिंग केल्याची कबुली दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करत आहेत.
18 shares
😢
M
Maharashtra Times
Mar 19, 2026, 07:45 AM
नागपूर पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार सितू सिंगच्या दहशतीचे साम्राज्य मोडून काढले

नागपूर पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार सितू सिंगच्या दहशतीचे साम्राज्य मोडून काढले

नागपूर :नागपूर शहरात दहशतीचं साम्राज्य उभं करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार सीटू सिंहचा ‘रुबाब’ अखेर पोलिसांनी रस्त्यावर उतरवत मोडून काढला. बुधवारी रात्री धडक कारवाई करत त्याची जाहीर धिंड काढली. या कारवाईद्वारे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याचा ठोस संदेश देण्यात आला आहे. सीटू सिंहच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी कठोर भूमिका घेत ही कारवाई केल्याचे स्पष्ट झाले आहे.सीटू सिंह याच्यावर खून, प्राणघातक हल्ला, खंडणी, बलात्कार, हाणामारी, शस्त्राच्या धाकावर वसुली आणि शिवीगाळ यांसारख्या गंभीरगुन्ह्यांचेअनेक दाखले आहेत. वारंवार गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी होत असल्याने त्याच्या वर्तणुकीत कोणतीही सुधारणा होत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्याला अनेक वेळा समज देण्यात आली होती, मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. उलट त्याची दहशत दिवसेंदिवस वाढतच होती. त्यामुळे थेट मैदानात उतरत पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवण्यासाठी सार्वजनिकरित्या ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला.बुधवारी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारासनागपूरमधीलयशोधरा नगर परिसरातील कांजी हाऊस चौकातून सीटू सिंहची धिंड काढण्यात आली. हात दोरीने बांधून आणि हात जोडलेल्या अवस्थेत त्याला सुमारे चार किलोमीटर अंतर पायी फिरवण्यात आले. या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परिसरातील नागरिकांनी या कारवाईला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि अनेकांनी पोलिसांच्या या भूमिकेचे स्वागत केले.या धिंडीमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून, सुमारे चार किलोमीटरचा हा प्रवास सीटू सिंहसाठी ‘दहशतीतून अपमानाकडे’ असा ठरला. अशा कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलिसांनी उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. यापूर्वीही नागपूर शहर पोलीस दलाने कुख्यात गुन्हेगारांविरोधात अशाच प्रकारे कठोर भूमिका घेतली होती. काही गुंडांची सार्वजनिक धिंड काढून त्यांच्या दहशतीला आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर सीटू सिंह विरोधातील ही कारवाईही त्याच धर्तीवर करण्यात आली आहे.दरम्यान, पोलिसांकडून शहरात गुन्हेगारीविरोधात आणखी कठोर धोरण राबवले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
60 shares
😢
M
Maharashtra Times
Mar 19, 2026, 07:27 AM
नाशिक गुन्हे शाखेने बलात्काराच्या आरोपी ज्योतिषाला अटक केली

नाशिक गुन्हे शाखेने बलात्काराच्या आरोपी ज्योतिषाला अटक केली

नाशिक:नाशिक जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडवून देणारी एक मोठी कारवाई नाशिक गुन्हे शाखेने केली आहे. बड्या राजकीय नेत्यांचे भविष्य सांगणारा स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात उर्फ "कॅप्टन" याच्याविरोधात सरकारवाडा पोलिसांत एक पीडित महिलेने बलात्काराची तक्रार दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करून नाशिक गुन्हे शाखा १ च्या पथकाने अटक केली. त्यानंतर आता गुन्हे शाखेच्या पथकाकडून आता याबाबत कसून चौकशी सुरू असून खरात याच्या फार्म हाऊसवर छापा टाकण्यात आला आहे.अशोक खरात याच्यामिरगावइथल्या फार्म हाऊसवर पोलिसांकडून छापा टाकण्यात आला आहे. या छाप्यात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहर गुन्हे शाखा १ च्या पथकाने रात्री उशिरा मिरगाव शिवारातील खरात याच्या फार्म हाऊसची झडती घेतली. यावेळी पोलिसांच्या हाती काही अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे लागली आहेत. यामध्ये खरातच्या विविध मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे आणि काही संशयास्पद फाईल्सचा समावेश आहे. नाशिक पोलिसांनी हा सर्व ऐवज ताब्यात घेतला असून या कागदपत्रांच्या आधारे खरातच्या आर्थिक व्यवहारांची मोठी साखळी उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या छाप्यातील सर्वात खळबळजनक बाब म्हणजे, फार्म हाऊसच्या झडतीदरम्यान पोलिसांना एक पिस्तूल देखील सापडले असून, केवळ शस्त्रच नव्हे, तर पोलिसांनी तिथून काही जिवंत काडतुसे देखील जप्त केली असल्याची सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे.दरम्यान, ज्योतिषीकॅप्टन अशोक खरातयाच्यावर झालेल्या या कारवाईमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. जप्त करण्यात आलेले शस्त्र आणि मालमत्तेच्या कागदपत्रांमुळे खरातच्या अडचणीत मोठी वाढ होणार असल्याची चिन्हे आहेत. सध्या गुन्हे शाखा या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, लवकरच काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
14 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 19, 2026, 06:41 AM
कोल्हापूरमध्ये बी. एस. एन. एल. च्या कार्यालयात चोरी, 7 कोटी 18 लाखांचे साहित्य चोरले

कोल्हापूरमध्ये बी. एस. एन. एल. च्या कार्यालयात चोरी, 7 कोटी 18 लाखांचे साहित्य चोरले

कोल्हापूर: न्यू शाहूपुरी येथील संचार कॉलनीतबीएसएनएलच्याबंद कार्यालयातून सात कोटी एक लाख ८६ हजार रुपयांचे टॉवरचे साहित्य चोरट्याने लंपास केले. हा प्रकार १४ ते १५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घडला. याबाबतबीएसएनएलचेअधिकारी रविकांत शेषनारायण ओझा (४४, सध्या रा. ताराबाई पार्क,कोल्हापूर, मूळ रा. बिहार) यांनी बुधवारी (दि. १८) शाहूपुरीपोलिसठाण्यात फिर्याद दिली.शाहूपुरीपोलिसांनीदिलेल्या माहितीनुसार, बीएसएनएल कंपनीच्या मोबाइल टॉवरचे काही साहित्य संचार कॉलनी येथील एका बंद कार्यालयात ठेवले होते. चोरट्यांनी खिडकीचे लोखंडी गज कापून आत प्रवेश केला. आतील लाकडी कपाटाचे कुलूप तोडून कंट्रोलकार्ड, ऑप्टिकल मॉड्युलर, आरसीए कार्ड असे साहित्य लंपास केले.हा प्रकार दोन दिवसांपूर्वी निदर्शनास आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने व्यवस्थापक ओझा यांनी फिर्याद दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक आकाश जाधव करीत आहेत.
20 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Mar 19, 2026, 05:44 AM
कॅप्टन अशोक खरात विनयभंगाच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी नाशिक सरकारने एस. आय. टी. ची स्थापना केली

कॅप्टन अशोक खरात विनयभंगाच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी नाशिक सरकारने एस. आय. टी. ची स्थापना केली

Captain Ashok Kharat Case :नाशिकमधील'कॅप्टन' अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणात आज एक मोठी अपडेट समोर आली आहे. 'कॅप्टन' अशोक खरात प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून, या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या पथकाचे नेतृत्व डॅशिंग पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. गुंगी आणणारं पाणी पाजून लैंगिक अत्याचार; नाशकातील स्वयंघोषित ‘कॅप्टन’ ज्योतिषी अशोक खरातला बेड्या गेल्या काही दिवसांपासून कॅप्टन खरात याच्यावर महिला अत्याचाराचे गंभीर आरोप होत होते. या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता सरकारने एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तेजस्वीनी सातपुते यांच्याकडे जबाबदारी आल्याने आता या प्रकरणाचा छडा अत्यंत वेगाने लागण्याची शक्यता आहे. खरातने यापूर्वी केलेले अन्य काही काळे कारनामे आणि त्याचे लागेबंधे आता एसआयटीच्या चौकशीत उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कॅप्टन खरात सध्यानाशिकक्राईम ब्रँचच्या ताब्यात असून, त्याला २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोठडीत असतानाच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. क्राईम ब्रँचच्या पथकाने खरातच्या मिरगाव येथील फार्म हाऊसवर मध्यरात्री उशिरा मोठी छापेमारी केली. या कारवाईत पोलिसांच्या हाती धक्कादायक पुरावे लागले आहेत. फार्म हाऊसच्या झाडाझडती दरम्यान पोलिसांना एक पिस्तूल सापडले आहे. यासोबतच काही वापरलेली आणि काही न वापरलेली (जिवंत) काडतुसे देखील जप्त करण्यात आली आहेत. एका अत्याचार प्रकरणात आता बेकायदेशीर शस्त्रसाठा सापडल्याने खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. शस्त्रांशिवाय खरातच्या मालमत्तेचे महत्त्वाचे दस्तावेज आणि इतर काही संशयास्पद कागदपत्रेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. नाशिक पोलिसांनी यापूर्वीच खरातच्या घराची झडती घेतली होती. आता फार्म हाऊसवर मिळालेले पुरावे आणि एसआयटीचा तपास यातून खरातचे मोठे रॅकेट उघड होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस आता जप्त केलेल्या कागदपत्रांची आणि मालमत्तेची चौकशी करत असून, यामागे आणखी कोणाचे पाठबळ होते का, याचाही शोध घेतला जात आहे.
88 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Mar 19, 2026, 05:44 AM
कॅप्टन अशोक खरात प्रकरणः विनयभंगाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एस. आय. टी. ची स्थापना केली

कॅप्टन अशोक खरात प्रकरणः विनयभंगाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एस. आय. टी. ची स्थापना केली

Captain Ashok Kharat Case :नाशिकमधील'कॅप्टन' अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणात आज एक मोठी अपडेट समोर आली आहे. 'कॅप्टन' अशोक खरात प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून, या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या पथकाचे नेतृत्व डॅशिंग पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. गुंगी आणणारं पाणी पाजून लैंगिक अत्याचार; नाशकातील स्वयंघोषित ‘कॅप्टन’ ज्योतिषी अशोक खरातला बेड्या गेल्या काही दिवसांपासून कॅप्टन खरात याच्यावर महिला अत्याचाराचे गंभीर आरोप होत होते. या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता सरकारने एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तेजस्वीनी सातपुते यांच्याकडे जबाबदारी आल्याने आता या प्रकरणाचा छडा अत्यंत वेगाने लागण्याची शक्यता आहे. खरातने यापूर्वी केलेले अन्य काही काळे कारनामे आणि त्याचे लागेबंधे आता एसआयटीच्या चौकशीत उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कॅप्टन खरात सध्यानाशिकक्राईम ब्रँचच्या ताब्यात असून, त्याला २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोठडीत असतानाच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. क्राईम ब्रँचच्या पथकाने खरातच्या मिरगाव येथील फार्म हाऊसवर मध्यरात्री उशिरा मोठी छापेमारी केली. या कारवाईत पोलिसांच्या हाती धक्कादायक पुरावे लागले आहेत. फार्म हाऊसच्या झाडाझडती दरम्यान पोलिसांना एक पिस्तूल सापडले आहे. यासोबतच काही वापरलेली आणि काही न वापरलेली (जिवंत) काडतुसे देखील जप्त करण्यात आली आहेत. एका अत्याचार प्रकरणात आता बेकायदेशीर शस्त्रसाठा सापडल्याने खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. शस्त्रांशिवाय खरातच्या मालमत्तेचे महत्त्वाचे दस्तावेज आणि इतर काही संशयास्पद कागदपत्रेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. नाशिक पोलिसांनी यापूर्वीच खरातच्या घराची झडती घेतली होती. आता फार्म हाऊसवर मिळालेले पुरावे आणि एसआयटीचा तपास यातून खरातचे मोठे रॅकेट उघड होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस आता जप्त केलेल्या कागदपत्रांची आणि मालमत्तेची चौकशी करत असून, यामागे आणखी कोणाचे पाठबळ होते का, याचाही शोध घेतला जात आहे.
45 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 19, 2026, 05:43 AM
छत्रपती संभाजीनगरमध्ये हुंड्याच्या वादावरून सासूला तिच्या सासूने आणि सूनाने मारहाण केली

छत्रपती संभाजीनगरमध्ये हुंड्याच्या वादावरून सासूला तिच्या सासूने आणि सूनाने मारहाण केली

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर :लग्नात झालेल्या खर्चाच्या कारणावरून सुनेसह तिच्या आईने सासु-सासरा आणि पतीला शिवीगाळ करून जबर मारहाण केली. तसेच सासूच्या तोंडावर ठोसा मारून त्यांचा एक दात पाडला. ही घटना १७ मार्च रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास ब्रिजवाडी परिसरात घडली. कोमल करण सुरडकर (वय २२), उमा मिलिंद घोरपडे (वय ४०) आणि पायल जावळे (वय २५, सर्व रा. ब्रीजवाडी, एमआयडीसी चिकलठाणा) अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत.काय आहे प्रकरण?प्रकरणात मंदा परमेश्वर सुरडकर (वय ३८, रा. ब्रिजवाडी,एमआयडीसी चिकलठाणा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मंदा सुरडकर यांना दोन मुलं असून एका मुलाचे लग्न झालं आहे. तो पत्नीसह वेगळे रहातो, तर मंदा सुरडकर या पती व त्यांच्या दुसऱ्या मुलासह राहतात. सुनेच्या प्रसुतीनंतर मुलगा अधूनमधून घरी येत होता.Pune Friends Death : लेह-लडाखहून परत येताना काळाचा घाला, पुण्यातील तीन मित्रांचा अपघाती अंत, विमानाने परतलेला दोस्त धक्क्यातसासूबाईंचा दात पाडलादरम्यान, १७ मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मंदा सुरडकर या पती व लहान मुलासोबत घरी होत्या. त्यावेळी सून कोमल सुरडकर हिच्यासह तिची आई उमा घोरपडे व बहीण पायल जावळे या तिघी सुरडकर यांच्या घरी आल्या. घरासमोर उभे राहून त्यांनी शिवीगाळ सुरू केली. खाली येण्यास सांगितल्यानंतर मंदा सुरडकर व त्यांचा मुलगा करण खाली आले असता तिघींनी लग्नातील खर्चाच्या कारणावरून वाद घालत शिवीगाळ केली व हाताचापटांनी मारहाण केली.सुट्टीत फिरायचा प्लॅन करताय? महाराष्ट्रातील १० बजेटफ्रेंडली ठिकाणांची यादीअत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीया मारहाणीत सून कोमल हिनेसासू मंदा सुरडकरयांच्या तोंडावर जोरात ठोसा मारल्याने त्यांचा समोरील दात पडला. गोंधळ ऐकून पती परमेश्वर सुरडकर यांनी त्यांची भांडण सोडविली. दरम्यान हाणामारीनंतर सून कोमल हिने तुमच्या मुलावर अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करून तुम्हाला गुन्ह्यात अडकवणार असे म्हणत धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या सुनेसह वरिल तिघी हे सुरडकर कुटुंबाला वारंवार त्रास देतात.Pune Crime : पुण्यातील 12 वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूचं गूढ उकललं, समलिंगी संबंधाला विरोधातून नात्यातील तरुणाने संपवलं, 22 वर्षीय आरोपी अटकेतमंदा सुरडकर यांचा मुलगा व सुनेचाप्रेम विवाहअसून लग्नामध्ये झाले खर्चाच्या कारणावरून वांरवार पैशांची मागणी केली जात आहे. अशी माहिती तक्रारीत देण्यात आली आहे. या प्रकरणी मंदा सुरडकर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
14 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Mar 19, 2026, 05:37 AM
अलीकडील गुन्ह्यासाठी कठोर शिक्षेच्या मागणीसाठी रस्ता अडवण्यात आला

अलीकडील गुन्ह्यासाठी कठोर शिक्षेच्या मागणीसाठी रस्ता अडवण्यात आला

नीलम खताळ म्हणाल्या, की भविष्यात अशा गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी आरोपींना कठोर शिक्षा होणे अत्यावश्यक आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी निवेदन स्वीकारले याचबरोबर आरोपीचा लवकरात लवकर शोध लावण्यासाठी पोलिस प्रशासन काम करत असल्याचे ते म्हणाले. वडगाव पान फाटा परिसरात सुमारे दोन ते अडीच तास हे रास्ता रोको आंदोलन सुरू होते. त्यामुळे तीनही बाजूनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
12 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 19, 2026, 05:25 AM
पोलिस ऑपरेशन फॉईल्स पळून जाण्याचा प्रयत्न, आरोपींविरोधात गुन्हा दाखल

पोलिस ऑपरेशन फॉईल्स पळून जाण्याचा प्रयत्न, आरोपींविरोधात गुन्हा दाखल

या कारवाईदरम्यान चार महिलांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, मुख्य आरोपी श्रीराम फुंदे निसटण्यात यशस्वी झाला. महिला पोलीस कर्मचारी उत्कर्षा वडते यांच्या फिर्यादीवरून श्रीराम फुंदे व दीपक बटुळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
35 shares
😐
L
Lokmat
Mar 19, 2026, 05:22 AM
बनावट चलन आणि बॉम्बच्या धमक्या-अहमदाबाद आणि मुंबईची अद्ययावत माहिती

बनावट चलन आणि बॉम्बच्या धमक्या-अहमदाबाद आणि मुंबईची अद्ययावत माहिती

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाइव्ह अपडेट्स... LIVE अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत एका महिलेसह सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे दोन कोटी रुपये मूल्य असलेल्या बनावट नोटा सापडल्या. या प्रकरणाचा अधिकचा तपास केला जात असून, पोलिसांनी आरोपी वापरत असलेली कारही जप्त केली आहे, असे सहआयुक्त शरद सिंघल यांनी सांगितले. #WATCH| Ahmedabad, Gujarat | Crime Branch has arrested six people, including a woman, with counterfeit currency of a face value of Rs 2 crore. The car used by the accused has been seized by Crime Branch Ahmedabad Citypic.twitter.com/td9uyYwKCb बुधवारी महाराष्ट्रातील मुंबईच्या बीकेसी येथील पासपोर्ट कार्यालयात बॉम्बची धमकी मिळाली. ही धमकी ईमेलद्वारे पाठवण्यात आली होती, ज्यात पासपोर्ट कार्यालय आणि स्वच्छतागृहांमध्ये सायनाइड भरलेले १९ बॉम्ब ठेवल्याचा आणि आज दुपारी १:३० वाजता त्यांचा स्फोट होईल, असा दावा करण्यात आला होता. माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने परिसर रिकामा करून शोध घेतला, परंतु काहीही आढळले नाही, ज्यामुळे अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला. ज्या ईमेलमधून धमकी पाठवण्यात आली होती, त्या ईमेलचा तपशील आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. उत्तर प्रदेशातीलमहाराजगंज जिल्ह्यातीलभाजपाकार्यालयात एकच खळबळ उडाली. एका महिलेने एका पदाधिकाऱ्याला चोप दिला. स्वागत समारंभाच्या दरम्यान अचानक घडलेल्या या घटनेमुळे उपस्थित असलेले कार्यकर्तेही अवाक झाले. बघता बघता कार्यक्रमस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.वाचा सविस्तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात दहशतवाद विरोधी केंद्राचे संचालक राहिलेल्या जोसेफ केंट यांनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिला आहे. जोसेफ केंट यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता बोलताना त्यांनी म्हटले आहे की, अमेरिका-इस्रायलच्या ऑपरेशनमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई मारले गेले. हीच ती गोष्ट होती जी आम्ही सगळ्यात शेवटी करायला हवी होती. जेव्हा तुम्ही त्यांना हटवता किंवा हल्ला करून मारून टाकता. असे केल्याने लोक, सरकार आणि पुढचे सर्वोच्च नेते हे एकजूट होतील. मला वाटते की आमच्याजवळ जी माहिती आहे, त्यानुसार मोजतबा खामेनेई यांच्याबाबतीत तेच होत आहे', असे केंट म्हणाले आहेत. गुढीपाडवा आणि मराठी नववर्षामुळे राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह राज्यात ठिकठिकाणी गुढीपाडव्या निमित्ताने शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील गिरगाव, डोंबिवली, पुण्यात काढण्यात आलेल्या शोभायात्रामध्ये देखावे सादर करण्यात आले. मराठी कलाकार, राजकीय नेतेही या शोभायात्रांमध्ये सहभागी झाले. गुढीपाडव्यानिमित्त नागपूरमध्ये शोभायात्रा काढण्यात आली. या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री सई ताम्हणकर हे सहभागी झाले. #WATCH| Nagpur: Maharashtra: Marathi actress Sai Tamhankar also joined the Gudi Padwa festivities alongside Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis.https://t.co/GtlmCsauDMpic.twitter.com/AP2CdAAeUx
58 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 19, 2026, 05:04 AM
भारतीय राजकारणी तावडे यांच्यावर शाळेतील कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप

भारतीय राजकारणी तावडे यांच्यावर शाळेतील कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप

तावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाळेत घुसून मुख्याध्यापिका आणि इतर कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. यावेळी दोन शिक्षकांना कानाखाली मारल्याचा आणि त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तावडे यांच्याविरुद्ध भादंवि कलम 353 (सरकारी कामात अडथळा), 332 (दुखापत करणे) आणि 504 (शांतता भंग करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
78 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 19, 2026, 04:44 AM
केळी पीक विमा योजनेत ₹474 कोटींचा गैरवापर केल्याप्रकरणी सी. एस. सी. केंद्र संचालकांवर गुन्हा दाखल

केळी पीक विमा योजनेत ₹474 कोटींचा गैरवापर केल्याप्रकरणी सी. एस. सी. केंद्र संचालकांवर गुन्हा दाखल

शासनाची फसवणूक आणि शेतकऱ्यांच्या नावाने बोगसपीक विमानोंदणी केल्याप्रकरणी रावेर तालुक्यातील चार सीएससी केंद्र चालकांवर रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे ४ कोटी ७४ लाख ६५ हजार ५५० रुपयांचा हा गैरव्यवहार असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. 'लोकमत'ने हा प्रकार उघडकीस आणला होता. पुनर्चित हवामानावर आधारित फळपीक विमायोजना २०२५-२६ (आंबिया बहार) अंतर्गत केळी पिकासाठी विमा उतरवण्याची प्रक्रिया रावेर तालुक्यात राबवण्यात आली होती. या योजनेत शासनाचा मोठा हिस्सा अनुदान म्हणून दिला जातो. मात्र, काही सीएससी केंद्र चालकांनी आर्थिक फायद्यासाठी ज्या क्षेत्रावर केळीची लागवडच नव्हती, अशा क्षेत्राचा खोटा विमा उतरवून शासनाचा विश्वासघात केल्याचा आरोप आहे. प्रशासकीय कारवाईचा बडगा • सीएससी केंद्रांनी विमा पोर्टलवर माहिती भरताना त्रुटी ठेवल्यास किंवा खोटी कागदपत्रे अपलोड केल्यास केंद्र चालक जबाबदार राहतील, असे शासनाच्या निर्णयात स्पष्ट नमूद आहे. • या घोटाळ्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असते, जे वेळीच रोखण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास रावेर पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल योगेश हिरालाल महाजन करीत आहेत. गुन्हा दाखल झालेले केंद्र चालक व रक्कम • अहवालानुसार तपासणी केलेल्या क्षेत्रापैकी सुमारे ४३५३.०५ हेक्टर क्षेत्रावर केळीचे पीक आढळून आले नाही. • अंदाजे ३२.७९ टक्के क्षेत्रावर प्रत्यक्ष लागवडीपेक्षा जास्त विमा संरक्षण घेतल्याचे दिसून आले. • एकूण ४८ संशयास्पद केंद्रांपैकी रावेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ४ केंद्रांवर थेट कारवाई करण्यात आली आहे. उपग्रह छायाचित्रांमुळे फुटले बिंग महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र, नागपूरमार्फत उपग्रह छायाचित्रांद्वारे करण्यात आलेल्या क्षेत्रीय तपासणीत हा घोटाळा उघडकीस आला. तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब चंद्रकांत वाळके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चार संशयित आरोर्पीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हेही वाचा : मृत्युपत्र करावे की बक्षीसपत्र; नक्की फायद्याचे काय? जाणून घ्या सविस्तर
45 shares
😢