Achira News Logo
Achira News
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 01:28 AM
मिरजमध्ये दोन वॉन्टेड गुन्हेगारांना पोलिसांच्या पथकाने अटक केली

मिरजमध्ये दोन वॉन्टेड गुन्हेगारांना पोलिसांच्या पथकाने अटक केली

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांनी पथक नियुक्त केले होते. मिरज परिसरात उपनिरीक्षक जयदीप कळेकर यांच्यासह सुशील मस्के, ऋतुराज होळकर, सुमीत सूर्यवंशी यांचे पथक गस्तीवर असताना हद्दपार गुन्हेगार हुसेन सय्यद आणि त्याचा साथीदार सोहेल पठाण हे दोघे दुचाकीवरून येत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने दोघांवर छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले.
3 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 01:16 AM
गुन्ह्यातील तीन संशयितांची ओळखः सुतारगल्ली, पेठवाडगाव येथील रहिवासी

गुन्ह्यातील तीन संशयितांची ओळखः सुतारगल्ली, पेठवाडगाव येथील रहिवासी

रवींद्र सतीश भोसले, सुमित्रा सतीश भोसले आणि राजेंद्र सतीश भोसले (सर्व रा. सुतार गल्ली, पेठवडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित पत्नी रूपाली रवींद्र भोसले (वय 32, सध्या रा. नऱ्हे, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
100 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 12:25 AM
शहर अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोनाजे पोलिसांनी छापे टाकले

शहर अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोनाजे पोलिसांनी छापे टाकले

त्यानुसार मंगळवारी सपोनि. धोंडीराम वाळवेकर यांच्या नेतृत्वाखाली बोरगाव पोलिस ठाण्यातील हवालदार दीपक मांडवे, निलेश गायकवाड, पोलीस नाईक प्रशांत चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल सतीश पवार तसेच स्थानिक गुन्हे शाखा, सातारा येथील पोलीस अंमलदार स.फौ. अतीष घाडगे, हवालदार लक्ष्मण जगधने, हसन तडवी, राकेश खांडके, अमित माने, गणेश कापरे, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव व चालक अमृत कर्पे यांनी संयुक्त छापा टाकला.
89 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 07:02 PM
न्यायाची मागणीः निकिता शिवराज मंगोलीच्या हत्येप्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी

न्यायाची मागणीः निकिता शिवराज मंगोलीच्या हत्येप्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी

याबाबत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये निकिता शिवराज मनगोळी यांच्या जळीत हत्याकांडास कारणीभूत असणाऱ्या नराधमास आणि कट-कारस्थान करणाऱ्या लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या हत्याकांडाचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरो अथवा सीआयडीमार्फत करण्यात यावा, याप्रकरणी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधकअन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
19 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 06:32 PM
कार-दुचाकी अपघातानंतर पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी मद्यधुंद चालक आणि कुटुंबातील सदस्यांना अटक

कार-दुचाकी अपघातानंतर पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी मद्यधुंद चालक आणि कुटुंबातील सदस्यांना अटक

मिरारोड - भाईंदरच्या उत्तन भागात एका दुचाकीला उडवून नंतर पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की, मारहाण करणाऱ्या कुटुंबातील २ महिला व २ पुरुषांवर उत्तन सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ट्रिस्टन एडवर्ड गोन्सालविस (वय २३) हे सोमवारी उत्तन वरुन गोराई दिशेने जात असताना मॅक्सवेल हॉटेल समोर गोराईकडून उत्तनच्या दिशेने येणारी कार चालकाने चुकीच्या मार्गिकेवर विरुद्ध दिशेने भरधाव येऊन ट्रिस्टन ह्याच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात ट्रिस्टन ह्याला जबर मार लागला आणि दुचाकीचे नुकसान झाले. कार चालवणारा रवी गुरु धडके (वय ३८) रा. राम अनंत, इंद्रलोक, भाईंदर पूर्व हा मद्यधुंद होता. अपघाता नंतर रवी याची पत्नी शिल्पा हिने ट्रिस्टन याला चापटी मारली. रवी व शिल्पा सह भावेश (वय ३१)आणि शीतल धडके (वय २९) रा. श्री दर्शन, लोकमान्य नगर, ठाणे यांनी शिवीगाळ केली. उत्तन पोलीस आले असता शिल्पा हिने महिला पोलीस शिपाई शिंदे यांना चापट मारून शिवीगाळ, दमदाटी केली. आरोपींनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला व पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा सोळंखे यांना पण चापट मारली. मद्यधुंद अवस्थेतील या चौघांनी पोलिसांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण केला. वेगवेगळे दोन गुन्हे ह्या चौघांवर पोलिसांनी दाखल केले आहेत. हे दोन्ही दाम्पत्य गोराईवरून मद्यपान करून परत येत होते असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
42 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 03:22 PM
लातुरमध्ये वैद्यकीय खर्चावरून मुलाने वडिलांचा गळा दाबून खून केला

लातुरमध्ये वैद्यकीय खर्चावरून मुलाने वडिलांचा गळा दाबून खून केला

राजकुमार जाेंधळे लातूर : ‘आईला दवाखान्यात नेण्यासाठी पैसे का देत नाहीत? आमचा सांभाळ का करत नाहीत?’ असा जाब विचारत पोटच्याच २९ वर्षीय मुलाने आयकर विभागात अधिकारी असलेल्या आपल्या जन्मदात्या पित्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना खोपेगाव (ता. लातूर) येथे मंगळवारी सकाळी ९:४५ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, मुलाला अटक केली आहे. पाेलिसांनी सांगितले, खोपेगाव पाटी परिसरात राहणारे कृष्णकुमार संभाजी सन्मुखराव (वय ५४) आणि त्यांचा मोठा मुलगा शंतनू (२९) यांच्यामध्ये मंगळवारी सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास वाद झाला. शंतनूची आई आजारी असल्याने त्यांच्या औषधोपचारासाठी तो वडिलांकडे पैशांची मागणी करत होता. ‘तुम्ही आईच्या उपचारासाठी नेहमी पैसे का देत नाहीत? आणि आमचा सांभाळ का करत नाहीत?’ यावरून मुलगा आणि वडिलांमध्ये वादाची ठिणगी पडली. या वादाचे रूपांतर काही वेळातच हाणामारीमध्ये झाले. रागाच्या भरात असलेल्या शंतनूने घरातील भाजी कापण्याचा चाकू आणला आणि थेट वडिलांच्या मानेच्या खालच्या बाजूवर वार केले. हा वार एवढा भीषण होता की, कृष्णकुमार सन्मुखराव यांचा जागीच मृत्यू झाला. ज्या बापाने बोट धरून चालायला शिकवले, त्याच बापाचे रक्त मुलाच्या हाताला लागल्याने परिसरात संतापाची लाट पसरली. रक्ताच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने लातूरसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मयताचा धाकटा मुलगा समीर कृष्णकुमार सन्मुखराव (२३) याने दिलेल्या फिर्यादीवरून लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपी भाऊ शंतनू याच्याविराेधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आराेपी मुलाला पाेलिसांनी बेड्या ठाेकल्या आहेत. मृत हे लातूर येथे आयकर विभागात अधिकारी म्हणून कार्यरत हाेते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी खाेपेगाव पाटी येथे जागा घेऊन नवीन घर बांधले हाेते. ते नेहमीप्रमाणे कार्यालयात निघाले असता पत्नीने औषध-गाेळ्यांसाठी पैशांची मागणी केली. यातूनच दाेघा पती-पत्नीत वाद झाला अन् मुलाने गळ्यावर चाकूने वार केले. घाव एवढे जबर हाेते की, कृष्णकुमार यांचा जागीच मृत्यू झाला. आराेपी मुलगा पदवीधर असून ताे बेराेजगार हाेता. आई-वडिलांचे मंगळवारी सकाळी औषध-गाेळ्यांवरून झालेल्या वादानंतर मुलाने वडिलांवर हा हल्ला केला. यात माेठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने वडिलांचा जागीच मृत्यू झाला. - अरविंद पवार, पाेलिस निरीक्षक, लातूर
84 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 02:24 PM
अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पती पत्नीला संपवण्यासाठी मारेकऱ्यांना कामावर ठेवतो

अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पती पत्नीला संपवण्यासाठी मारेकऱ्यांना कामावर ठेवतो

पती-पत्नीचं नातं हे विश्वासाच्या धाग्यावर टिकलेलं असतं, असं म्हटलं जातं. पण याच नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटनाउत्तर प्रदेशातीलगाझियाबादमध्ये समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असलेल्या पतीने तिची हत्या करण्यासाठी चक्क ५० हजार रुपयांची सुपारी दिली. इतकंच नाही, तर पत्नीवर गोळीबार झाल्यानंतर त्याने स्वतः पोलीस ठाणे गाठून ज्याच्यावर संशय होता, त्याच तरुणाविरुद्ध तक्रारही दाखल केली. मात्र, पोलिसांच्या चाणाक्ष तपासामुळे या कपट पतीचा खरा चेहरा समोर आला आहे. गाझियाबादच्या कमिशनर कॉलनी परिसरात राहणाऱ्या अंकितला आपल्या पत्नीचे कुटुंबातीलच एका तरुणाशी अवैध संबंध असल्याचा संशय होता. हा संशय त्याच्या डोक्यात इतका भिनला की त्याने पत्नीलाच संपवण्याचा आणि त्या तरुणाला जेलमध्ये पाठवण्याचा फुलप्रूफ प्लॅन तयार केला. अंकितने तीन भाडोत्री मारेकऱ्यांशी संपर्क साधला आणि ५० हजार रुपयांत पत्नीच्या हत्येचा सौदा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकऱ्यांनी गेल्या एका आठवड्यात दोन वेळा अंकितच्या पत्नीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, पण दोन्ही वेळा तो अयशस्वी ठरला. तिसऱ्या प्रयत्नात मात्र शूटर्सनी महिलेवर गोळी झाडली आणि ते तिथून पसार झाले. सुदैवाने, या हल्ल्यातून महिला बचावली असून सध्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत आणि ती धोक्याबाहेर आहे. पत्नीला गोळी लागल्यानंतर अंकितने तात्काळ पोलीस ठाणे गाठले आणि ज्या तरुणावर त्याचा संशय होता, त्याच्याच विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केला. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पोलिसांना तीन संशयित व्यक्ती दिसल्या. त्यापैकी एकाला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सर्व सत्य सांगेन टाकले. त्याने सांगितले की, "दुसऱ्या कोणी नाही, तर स्वतः पती अंकितनेच आम्हाला ५० हजार रुपयांची सुपारी दिली होती." पोलिसांनी आता आरोपी पती अंकित आणि सुपारी घेणाऱ्या मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
82 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 3, 2026, 02:06 PM
पुणे धक्कादायक प्रकरणातील प्रियकराचा मुलगा आणि मित्राने विनयभंगाच्या जोडीदाराच्या हत्येचा कट रचला

पुणे धक्कादायक प्रकरणातील प्रियकराचा मुलगा आणि मित्राने विनयभंगाच्या जोडीदाराच्या हत्येचा कट रचला

पिंपरी- चिंचवड, श्रीकृष्ण पांचाळ:प्रियकराच्या सततच्या त्रासाला कंटाळून प्रेयसीने आपल्या मुलगा आणि त्याच्या मित्राच्या मदतीने प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणात उत्तर चाकण पोलिसांनी तब्बल २० दिवसांच्या तपासानंतर तिघा आरोपींना अटक केली असून, दारूच्या बाटल्या आणि सिगारेटच्या आधारे गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंजा धोंडीबा नरहरे (वय २५) याचे उषा नानासाहेब चव्हाण (वय ४०, विवाहित) हिच्याशी गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मुंजा उषाला बेदम मारहाण करत होता आणि मानसिक व शारीरिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून उषा चव्हाण हिने पुण्यात कामानिमित्त आलेल्या आपल्या मुलगा निखिल नानासाहेब चव्हाण (वय २१) याच्याकडे आपली व्यथा मांडली. ती स्वतः चाकण येथे मुलाकडे आली.प्रियकराकडून होणाऱ्या मारहाणीची माहिती दिल्यानंतर उषा चव्हाण आणि तिचा मुलगा निखिल यांनी मुंजा नरहरेची हत्या करण्याचा कट रचला. या कटात निखिलचा मित्र स्वप्नील नरहरी पारधी यालाही सहभागी करून घेण्यात आले.७ जानेवारी रोजी उषा चव्हाण हिने मुंजा नरहरे याला चाकणमध्ये भेटण्यासाठी बोलावले. गंगाखेड येथून मुंजा चाकणला आल्यानंतर निखिल आणि स्वप्नील यांनी दुचाकीवरून त्याला सोबत घेतले. त्यानंतर खराबवाडी येथील मद्यविक्री दुकानातून दारूच्या बाटल्या खरेदी करून बिरदवाडी येथील ओढ्याजवळील निर्मनुष्य ठिकाणी दारू पार्टी करण्यात आली.Pimpri chinchwad: पिंपरी चिंचवडच्या लॉज आणि स्पामध्ये अनैतिक धंदे; पोलिसांची धाड, रॅकेट उघड, अनेक महिलांची सुटकादारू पित असतानाच निखिल आणि स्वप्नील यांनी मुंजा नरहरेवर कोयत्याने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली. ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचा चेहरा दगडाने ठेचून विद्रूप करण्यात आला.७ जानेवारी रोजी ही घटना घडल्यानंतर ११ जानेवारी रोजी त्या परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती उत्तर चाकण पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तपास सुरू केला; मात्र आरोपींनी मृताची ओळखपत्रे आणि मोबाईल काढून घेतल्याने सुरुवातीला कोणताहीठोसपुरावा हाती लागत नव्हता.तरीही पोलिसांनी हार न मानता सीसीटीव्ही फुटेज आणि परिसरातील कंपन्यांमधील कामगारांकडे कसून चौकशी सुरू ठेवली. पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असताना घटनास्थळी आढळलेल्या दारूच्या बाटल्या आणि सिगारेटच्या आधारे पोलिसांनीखराबवाडीयेथील मद्यविक्री दुकानांमध्ये चौकशी केली.७ जानेवारी रोजी पहाटे सहाच्या सुमारास तिघेजण दारूच्या बाटल्या खरेदीसाठी आल्याचे स्पष्ट होताच तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली. पुढील तपासात गुन्ह्यात वापरलेलीदुचाकीनिखिलच्या मित्राची असल्याचेही निष्पन्न झाले.या संपूर्ण हत्येचा कट उषा चव्हाण आणि तिचा मुलगा निखिल यांनी रचल्याचे स्पष्ट झाले असून, उत्तर चाकण पोलिसांनीउषा चव्हाण, निखिल चव्हाण आणि स्वप्नील पारधी या तिघांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
100 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 01:37 PM
शिर्डी शहरात तरुण हॉटेल कर्मचाऱ्याची आत्महत्या

शिर्डी शहरात तरुण हॉटेल कर्मचाऱ्याची आत्महत्या

Ahilyanagar Crime News:शिर्डीशहरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुण कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडल्याने एकच खळबळ उडाली असून, या घटनेनंतर काही काळ हॉटेल परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव विशाल रवींद्र वायकर (वय २२) असे असून, तो मूळचा संगमनेर तालुक्यातील रहिवासी आहे. रोजगारासाठी तोशिर्डीतआला होता व सध्या राहाता तालुक्यातील गणेशनगर येथे वास्तव्यास होता. सोमवारी दुपारपासून दरवाजा होता बंद विशाल हा शिर्डीतील एका हॉटेलमध्ये कामगार म्हणून काम करत होता. सोमवारी दुपारपासून संबंधित हॉटेलमधील एका खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे हॉटेल व्यवस्थापनाच्या लक्षात आले. बराच वेळ उलटूनही दरवाजा न उघडल्याने आणि आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने व्यवस्थापनाची चिंता वाढली. अखेर संशय बळावल्याने तत्काळ शिर्डीपोलिसांनामाहिती देण्यात आली. माहिती मिळताच शिर्डीपोलिसठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सागर काळे यांच्यासह पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा तोडला आणि आत विशाल लटकलेल्या अवस्थेत दिसला पंचांच्या उपस्थितीत दरवाजा उघडण्यात आला असता, विशाल वायकर याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी सखोल पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. आत्महत्येपूर्वी कोणतीही सुसाईड नोट आढळून आली आहे का, मोबाइलमध्ये काही संदेश, कॉल रेकॉर्ड किंवा मानसिक तणावाची कारणे आहेत का, याचा तपास सुरू आहे. या घटनेची अकस्मातमृत्यूचीनोंद व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
4 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 01:02 PM
कुटुंबाला धमकावणाऱ्या तरुणाच्या विरोधात पुण्यातील महिलेची तक्रार

कुटुंबाला धमकावणाऱ्या तरुणाच्या विरोधात पुण्यातील महिलेची तक्रार

पुणे: ‘तुझे लग्न जमू देणार नाही. तुझ्या कुटुंबीयाचा खून करेल’, यासह तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येरवड्यातील लक्ष्मीनगरपोलिसांनीएका तरुणाला अटक केली. याबाबत एका २१ वर्षाच्या तरुणीने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनीदिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचे आरोपीशी चार वर्ष प्रेमसंबध होते. तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न ठरविले. त्यामुळे तरुणीने त्याला प्रेमसंबंध ठेवू नको, माझे लग्न ठरले आहे, असे आरोपीला सांगितले. त्यानंतर आरोपी तरुणाने ‘तुझे लग्न जमू देणार नाही. तुझ्या कुटुंबीयाचा खून करेल’, असे म्हणत तरुणीला शिवीगाळ करुन धमकावले. तसेच आरोपीने तरुणीच्या आईला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आरोपी तरुणाने तरुणीचा ज्याच्याशी लग्न ठरले होते. त्याला प्रेमसंबंधाची छायाचित्रे पाठविली. नियोजित पतीने लग्न मोडले. या घटनेनंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करत आहेत.
82 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 12:26 PM
कर्जाची परतफेड करण्यात अपयशी ठरल्याबद्दल बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला एक वर्षाचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे.

कर्जाची परतफेड करण्यात अपयशी ठरल्याबद्दल बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला एक वर्षाचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे.

न्यायाधीशांनी सुनावणीवेळी सांगितले की, राजपाल यादवला अनेक संधी देण्यात आल्या होत्या. पण, त्याने कर्ज फेडले नाही. त्याने कोर्टाचा विश्वास भंग केला शिवाय न्यायालयीन प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे राजपाल यादवला ट्रायल कोर्टाने दिलेली शिक्षा पूर्ण करावी लागणार आहे.
73 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 12:23 PM
प्रभावाखाली बेपर्वाईने वाहन चालवणाऱ्या सांगली चालकाला अटक

प्रभावाखाली बेपर्वाईने वाहन चालवणाऱ्या सांगली चालकाला अटक

सांगली: दारूच्या नशेत बेदरकारपणे मोटार चालवून १५ जणांना जखमी करत पाच मोटारी, दोन दुचाकींचे नुकसान करणाऱ्या चालक प्रणिकेत दत्तात्रय पांचाळ (वय २६, रा. कुलस्वामी रस्ता, लातूर) याच्याविरुद्धसांगलीशहरपोलिसांतगुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूकपोलिसलखन होवाळे यांनी फिर्याद दिली. जमावाने केलेल्या हल्ल्यात पांचाळ जखमी झाला असून, त्याच्यावर सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत.मोटारचालक पांचाळ हा पुणे येथून प्रवासी घेऊन सांगलीत आला होता. सायंकाळी सातच्या सुमारास त्याने नशेत आपल्या ताब्यातील मोटार (क्र. एमएच १४ एलबी ४९००) चालवली. पटेल चौक ते गणपती मंदिर, टिळक चौक या मार्गावर त्याने वाहनांना धडक देत कृष्णामाई महाेत्सवाच्या बंदोबस्तासाठी नेमणुकीस असलेल्या चार पोलिसांसह १५ जणांना धडक देऊन जखमी केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.चालक पांचाळ याने नशेत बेदरकारपणे मोटार चालवून पाच मोटारींना तसेच दोन दुचाकींना धडक देत मोठे नुकसान केले आहे. टिळक चौकात एका दुचाकीला धडक देऊन त्याची मोटार थांबल्यानंतर संतप्त जमावाने त्याला मोटारीतून बाहेर ओढत मारहाण केली. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून सुटका करत चालक पांचाळ याला ताब्यात घेतले. उपचारासाठी सिव्हिलमध्ये त्याला दाखल केले. वैद्यकीय तपासणीत पांचाळ याने दारू प्यायल्याचे स्पष्ट झाले आहे. दारूच्या नशेत वाहन चालवूनअपघातकेल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध पोलिस कर्मचारी लखन होवाळे यांनी फिर्याद दिली. सहायक फौजदार अमोल लोहार अधिक तपास करत आहेत.प्रवासी घेऊन सांगलीत आला होताचालक पांचाळ हा पुण्यातून प्रवासी घेऊन सांगलीत आला होता. प्रवाशांना तो छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सोडणार होता. परंतु, वाटेत त्याने दारू प्यायल्यामुळे प्रवाशांनी त्याला खडसावले होते. सांगलीत प्रथमच आल्यामुळे त्याला रस्ते माहीत नव्हते. पटेल चौकातून त्याने बेदरकारपणे मोटार चालवत वाहनांसह पोलिसांना धडक दिली. जमावाने त्यास पकडल्यानंतर वाहनातील प्रवासी निसटले.जखमींमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेशचालक पांचाळ याने १५ जणांना धडक देत जखमी केले. यात अमया राजेंद्र खोत (वय ७) व वंदन सुनील फराटे (वय ३) या दोन चिमुकल्यांचा समावेश आहे.
28 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 3, 2026, 10:58 AM
दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादवला चेक बाऊन्स प्रकरणात तुरुंग अधीक्षकांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादवला चेक बाऊन्स प्रकरणात तुरुंग अधीक्षकांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव याला चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानं मोठा दणका दिला आहे. दिलेल्या आदेशांचं वारंवार उल्लंघन केल्यासंदर्भात न्यायालयानं कडक शब्दांत ताशेरे ओढत राजपाल यादवला ४ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत संबंधित तुरुंग अधीक्षकांसमोर हजर होण्याचे आदेश दिले आहेत.प्रकरण नेमकं आहे तरी काय?हे प्रकरण मेसर्स मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि राजपाल यादव यांच्यातील आर्थिक व्यवहाराशी संबंधित आहे.मिळालेल्या माहितीनुसार २०१० मध्ये राजपाल यादवनं 'अता पता लापता' या चित्रपटाच्या निर्मितीसाठी ५ कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. व्याजासह ही रक्कम १० कोटींच्या वर गेली होती. या कर्जाच्या परतफेडीसाठी दिलेले चेक बाऊन्स झाल्यामुळं राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीविरुद्ध कलम १३८ (नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट) अंतर्गत खटला दाखल करण्यात आला होता.राजपाल यादवला यापूर्वी खालच्या न्यायालयानं सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरुद्ध त्यानं उच्च न्यायालयात दाद मागितली होती. जून २०२४ मध्ये, त्यानें थकीत रक्कम परत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर न्यायालयानं त्याच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या अनेक सुनावणींमध्ये राजपाल यादवनं पैसे भरण्यासाठी वेळ मागून घेतला, पण दिलेल्या मुदतीत रक्कम जमा केली नाही.Lagnanantar Hoilach Prem : अखेर तो क्षण आलाच! गैरसमजाची धूळ पुसली जाणार, 'जीवांदिनी' आणि 'काव्यार्थ'च्या नात्याची होणार नवीन सुरुवातन्यायालयानं दिलेली सवलत आणि दाखवलेली सहानुभूती राजपाल यादवनं गृहीत धरली आहे. वारंवार संधी देऊनही अटींचे पालन करण्यात तो अपयशी ठरला आहे, असे निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे.जारण चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचला अमृताने अनिता दातेची पोल खोललीन्यायालयानं आता स्पष्ट केलंय की, राजपाल यादवनं न्यायालयाच्या प्रक्रियेचा अनादर केला आहे. त्यामुळं त्याला देण्यात आलेले संरक्षण आता काढून घेण्यात येत असून, त्याला उद्या म्हणजेच ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत तुरुंगात हजर व्हावं लागणार आहे.Rohit Shetty च्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; गेल्या दोन महिन्यांपूर्वीच रचलेला कट, रेकी झालेली अन्...राजपाल यादव हा आपल्या विनोदी अभिनयासाठी ओळखला जातो, मात्र या कायदेशीर कचाट्यामुळे त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
41 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 10:44 AM
टेंभूर्नी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात आय. पी. सी. आणि एस. सी./एस. टी. कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल

टेंभूर्नी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात आय. पी. सी. आणि एस. सी./एस. टी. कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल

टेंभुर्णी पोलीस ठाण्यात या आरोपींविरोधात यापूर्वीही विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भारतीय दंड संहितेतील विविध कलमांन्वये गुन्हे नोंद आहेत. सदर घटनेप्रकरणी एपीआय गणेश बाबाजी चौधरी (वय ४१) यांनी फिर्याद दिली असून पोहेकॉ एन. जे. काशिद यांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. सध्या पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रोहित डी. पवार अधिक तपास करत आहेत.
80 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 09:56 AM
मुंबई गुन्हे शाखेने रोहित शेट्टीच्या घराबाहेर सुनियोजित गोळीबार उघडकीस आणला

मुंबई गुन्हे शाखेने रोहित शेट्टीच्या घराबाहेर सुनियोजित गोळीबार उघडकीस आणला

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्मातारोहित शेट्टीच्याघराबाहेर झालेल्यागोळीबारप्रकरणातमुंबईक्राईम ब्रांचचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या कटाचे एकामागून एक पदर उलगडत आहेत. लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असलेल्या आरोपींनीगोळीबारापूर्वीजुहू परिसर आणिरोहित शेट्टीच्याघराची कित्येक दिवस रेकी केली होती अशी माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांच्या मते हा हल्ला अचानक झालेला नसून त्यामागे मोठी तयारी आणि नियोजन होतं. तपासात असंही निष्पन्न झालं आहे की, गोळीबारासाठी ज्या स्कूटरचा वापर करण्यात आला, त्याच स्कूटरवरून आधी रेकी करण्यात आली होती. हल्ल्यानंतर सहजपणे पसार होता यावं हा त्यामागचा स्पष्ट उद्देश होता. घटनेच्या दिवशी शूटरने रोहित शेट्टीच्या घराबाहेर पाच राऊंड फायर केले आणि त्यानंतर स्कूटरवरून पळ काढला. त्यानंतर तो विलेपार्ले रेल्वे स्टेशनला पोहोचला, तिथे स्कूटर सोडून दिली आणि ट्रेननेमुंबईबाहेरपसार झाला. घरावर झालेल्या गोळीबारानंतर रोहित शेट्टीने सर्व प्लॅन्स केले रद्द; जवळच्या मित्रांना केली 'ही' विनंती पुण्यातून खरेदी केली होती स्कूटर क्राईम ब्रांचच्या तपासात समोर आलं आहे की, गोळीबारात वापरलेली स्कूटर पुण्यातून ३० हजार रुपयांना विकत घेतली होती. ही स्कूटर खरेदी करण्यासाठी मास्टरमाइंड शुभम लोणकर याने पैसे दिले होते. ही स्कूटर मुळात आनंद मारोटे यांच्या नावावर नोंदणीकृत होती, त्यांनी ती २००९ मध्ये खरेदी केली होती. घटनेच्या सुमारे १२ दिवस आधी मारोटे यांनी ही स्कूटर आरोपी आदित्य गायकवाडला विकली होती. लोणावळ्याहून मुंबईत पोहोचली स्कूटर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ पोमाजी याच्या सूचनेवरून सिद्धार्थ येनपुरे आणि स्वप्नील सकट हे स्कूटर पुण्याहून रस्तेमार्गे लोणावळ्याला घेऊन आले होते. मात्र शूटर लोणावळ्याला पोहोचू शकला नाही म्हणून सुमारे १० दिवसांपूर्वी ही स्कूटर मुंबईत आणून थेट अज्ञात शूटरच्या हवाली करण्यात आली. या कामासाठी आरोपींना अतिरिक्त पैसेही देण्यात आले होते. समर्थ पोमाजीने या कटात सक्रिय भूमिका बजावल्याचे तपासकर्त्यांचे म्हणणं आहे. तो सतत शुभम लोणकरच्या संपर्कात होता आणि 'सिग्नल' एपद्वारे त्यांच्यात संवाद होत असे. मध्यरात्री थरार! गोळीबार झाला तेव्हा रोहित शेट्टी कुठे होता? हल्लेखोराबाबत मिळाली मोठी माहिती पोलिसांच्या मते, आपण एका गुन्हेगारी कटाचा भाग आहोत याची समर्थला कल्पना होती. मात्र टार्गेट नक्की कोणाचं घर आहे, हे त्याला माहीत नव्हतं. तरीही त्याने हा प्लॅन यशस्वी करण्यासाठी मोठं योगदान दिलं. मुंबई क्राईम ब्रांच सध्या या प्रकरणातील प्रत्येक दुवा जोडण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणाशी संबंधित आणखी मोठे खुलासे होऊ शकतात असं पोलिसांचं म्हणणं आहे.
77 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 09:54 AM
हनुमानगडमध्ये मालमत्ता कर भरण्यात कसूर केल्याबद्दल दोन दुकाने सील

हनुमानगडमध्ये मालमत्ता कर भरण्यात कसूर केल्याबद्दल दोन दुकाने सील

दोन दुकाने सील शहरातील निवासी व बिगरनिवासी थकबाकीदारांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. क्षेत्रिय कार्यालय क्र. ०२ अशोकनगर अंतर्गत क्षेत्रिय अधिकारी राजेश जाधव व त्यांच्या पथकाने हनुमानगड भागातील सरोजा नागनाथ सुन्नेवार, विमल नागनाथ सुन्नेवार मालमत्ता या दोन मालमत्ताधारकांकडून मालमत्ता करापोटी एक लाख सहा हजार एवढी थकबाकी असल्याने नोटीस देऊनसुध्दा कर भरण्यास टाळाटाळ होत असल्याने संबंधित मालमत्ता धारकांची दोन व्यावसायिक दुकाने सील करण्यात आली आहेत.
81 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 09:21 AM
भारतीय कायद्यानुसार निवडणूक गैरवेव्हाराच्या दंडाची रूपरेषा आखण्यात आली आहे

भारतीय कायद्यानुसार निवडणूक गैरवेव्हाराच्या दंडाची रूपरेषा आखण्यात आली आहे

कायदा काय सांगतो डॉ. माने यांनी कायद्याचा दाखला देत स्पष्ट केले की, दुबार मतदान केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950: कलम 17 व 18, लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 : कलम 62 (3) व (4) या कलमान्वये दोषी आढळल्यास संबंधित मतदारावर फौजदारी खटला भरला जाऊ शकतो. शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 1 लाख 48 हजार 518 महिला, तर 1 लाख 53 हजार 425 पुरुष व 13 इतर असे एकूण 3 लाख 1 हजार 956 मतदार आहेत. पाबळ जिल्हा परिषद गटात सर्वाधिक 46 हजार 620, तर पंचायत समितीच्या केंदूर गणात सर्वाधिक 23,330 मतदार आहेत. जिल्हा परिषदेसाठी 7 फेबुवारी रोजी मतदान होणार आहे. 9 फेबुवारी रोजी कारेगाव येथील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे.
89 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 3, 2026, 09:17 AM
मुंबईतील रोहित शेट्टीच्या घरी झालेल्या शूटिंगशी बिश्नोई गँगचा संबंध

मुंबईतील रोहित शेट्टीच्या घरी झालेल्या शूटिंगशी बिश्नोई गँगचा संबंध

मुंबई: दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घरावर शनिवारी रात्री करण्यात आल्याची घटना घडल्यानं बॉलिवूडमध्ये वातावरण गंभीर झालं आहे. या गोळीबारामागं पुन्हा एकदा बिष्णोई टोळीच असल्याचं निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी या प्रकरणात लॉरेन्स बिष्णोईचा साथीदार शुभम लोणकरला आरोपी केलं आहे. हा गोळीबार करणारा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून त्यांनी दुचाकी, शस्त्र आणि इतर मदत पुरवल्याची माहिती पोलिसांनी दिली.रोहित शेट्टीच्या जुहू इथल्या बंगल्याबाहेर शनिवारी मध्यरात्री १च्या सुमारास अज्ञात व्यक्तीनं पाच गोळ्या झाडल्या होत्या. त्यातील एक बंगल्याच्या गॅलरीतील काच फोडून आत शिरली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं. फुटेजवरून आरोपी पुण्याच्या दिशेनं जात असल्याचं कळताच मुंबई पोलिसांनी पुणे पोलिसांना कळवलं.घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी स्वप्नील सकट (२३, बेरोजगार), समर्थ पोमाजी (१९, विद्यार्थी), सिद्धार्थ येनपूरे (१९, डिलिव्हरी बॉय) आणि आदित्य गायकी (१९, सेल्समन) या चौघांना पुण्यातून अटक केली. शेट्टी यांच्या घरावर पाच गोळ्या झाडणाऱ्या तरुणाला शस्त्र, दारुगोळा, दुचाकी आणि अन्य आवश्यक सामग्री पुरवल्याचा आरोप आहे. न्यायालयानं या चौघांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.Lagnanantar Hoilach Prem : अखेर तो क्षण आलाच! गैरसमजाची धूळ पुसली जाणार, 'जीवांदिनी' आणि 'काव्यार्थ'च्या नात्याची होणार नवीन सुरुवातसिग्नल ॲपवरून संपर्कातशुभम लोणकर हा अटक करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी दोघांच्या संपर्कात होता. तपास यंत्रणांच्या रडारवर येऊ नये यासाठी तो सिग्नल ॲपचा वापर करीत असल्याचं चौकशीतून समोर आलं आहे. लोणकर या ॲपच्या माध्यमातून आणखी किती जणांच्या संपर्कात होता हे तपासण्यासाठी तांत्रिक पुराव्यांची जमवाजमव केली जात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.Bhagyashree Nhalve : लग्नाच्या दोन महिन्यातच मराठी अभिनेत्रीला मातृशोक; म्हणाली, 'मला एकही फोन न करता देवाघरी गेली...'दोन महिन्यांपासून टेहळणीस्वप्नील सकट हा आपल्या एका साथीदारासोबत हल्लेखोरानं वापरलेली दुचाकी घेऊन दोन महिन्यांपूर्वी पुण्याहून मुंबईत आला होता. त्यावेळेपासून जुहू परिसरातील शेट्टी यांच्या निवासस्थानाची टेहळणी सुरू होती, असं म्हटलं जात आहे. दोन महिन्यांपासूनच्या या रेकीमध्ये सकटसोबत आणखी कोणकोण होतं याचा तपास पोलिस करीत आहेत.Ulhasnagar : दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी पोहोचला उल्हासनगरमध्ये !सुरक्षा वाढवलीदरम्यान, रोहित शेट्टीनं त्याच्या आगामी सिनेमासाठी शूटिंग सुरू केली असून, सेटवर आता पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षा असणार आहे.हल्लेखोर परराज्यातील?रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या तरुणाची ओळख पटल्याचं गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. बिष्णोई टोळीने या आधीच्या गुन्ह्यात अवलंबलेली कार्यपद्धती पाहता, परराज्यातील साथीदारावर प्रत्यक्ष हल्ल्याची जबाबदारी सोपवली जाते. त्यामुळं या गुन्ह्यातही गोळीबार करणारा आरोपीही परराज्यातील असावा, असं म्हटलं जात आहे.
16 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 08:52 AM
प्रेमाचे रूपांतर प्राणघातक झालेः विमा कार्यकारी विजय साहनीने प्रेयसी प्रिया शेट्टीला फसवल्यानंतर तिची हत्या केली

प्रेमाचे रूपांतर प्राणघातक झालेः विमा कार्यकारी विजय साहनीने प्रेयसी प्रिया शेट्टीला फसवल्यानंतर तिची हत्या केली

UP Crime: प्रेमात फसवणूक झाल्यानंतर हत्येचा अत्यंत भीषण प्रकार गोरखपूरमध्ये समोर आला आहे.मुंबईतराहणाऱ्या ३५ वर्षीय प्रिया शेट्टी या महिलेची हत्या करून तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत पुलाखाली फेकून देण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे, हा खून तिच्या प्रियकराने आपल्या पत्नीच्या मदतीने केला आहे. पकडले जाऊ नये म्हणून आरोपीने चक्क आपले डोक्याचे केस आणि दाढी-मिशा काढून स्वतःचे रूप बदलले. मात्रपोलिसांच्यानजरेतून तो सुटू शकला नाही. ३० जानेवारी रोजी गोरखपूरच्या पीपीगंज भागातील बरघट्टा पुलाखाली एका अज्ञात महिलेचा विवस्त्र मृतदेह आढळला होता. तिची ओळख पटू नये म्हणून मारेकऱ्याने तिच्या चेहऱ्यावर विटांनी वार करून तो ओखळता येणार नाही असा केला होता.पोलिसांनीतपास सुरू केला असता, सीसीटीव्हीमध्ये एका स्कूटीवर एक पुरुष आणि दोन महिला जाताना दिसल्या. त्यावरून पोलीस मुख्य आरोपी विजय कुमार साहनीपर्यंत पोहोचले. विम्याच्या कामातून ओळख, मग लिव्ह-इन आणि लग्न विजय साहनी हा एका विमा कंपनीत काम करत होता. २०१२ मध्येमुंबईतकाम करत असताना त्याची ओळख प्रिया शेट्टीशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ते दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. त्यांनी मंदिरात लग्नही केले आणि त्यांना आता १३ वर्षांचा एक मुलगाही आहे. मात्र, २०१४ मध्ये विजयने आपल्या गावी येऊन संध्या नावाच्या दुसऱ्या महिलेशी लग्न केले. प्रेयसीचा तगादा आणि खुनाचा कट विजयने दोन लग्ने केली होती, ही बाब काही काळाने त्याच्या दोन्ही पत्नींना समजली. प्रिया सातत्याने विजयकडे त्याच्या घरी राहण्यासाठी तगादा लावत होती, अन्यथा गावी येऊन गोंधळ घालण्याची धमकी देत होती. ही बाब विजयने आपली पत्नी संध्या आणि सासरा रामबिलास यांना सांगितली. सर्वांनी मिळून प्रियाला संपवण्याचा कट रचला. दारूची पार्टी आणि निर्घृण हत्या २६ जानेवारीला विजय प्रियाला घेऊन गोरखपूरला आला. दोन दिवस त्यांनी हॉटेलमध्ये मुक्काम केला आणि मद्यप्राशन केले. २९ जानेवारीच्या रात्री विजय, त्याची पत्नी संध्या आणि प्रिया एका रिक्षाने पीपीगंजला गेले. तिथे रिक्षावाल्याशी पैशांवरून वाद झाल्यानंतर ते उतरले. विजयने सासऱ्याची स्कूटी मागवली आणि ते सहजनवाच्या दिशेने निघाले. वाटेत पुन्हा दारू प्यायल्यानंतर प्रियाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तेव्हा पत्नी संध्या म्हणाली, हिचा कायमचा काटा काढून टाका. विजयने दारूच्या नशेत असलेल्या प्रियाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पुलाखाली मृतदेह नेऊन ओळख लपवण्यासाठी तिचा चेहरा विटांनी ठेचला आणि तिचे कपडे काढून तिला पूर्णपणे विवस्त्र केले. 'तो' रिक्षावाला ठरला साक्षीदार दुसऱ्या दिवशी विजयने तातडीने नाव्याकडे जाऊन आपले डोक्याचे केस आणि दाढी-मिशा काढून टाकल्या, जेणेकरून सीसीटीव्हीमध्ये तो ओळखला जाणार नाही. पत्नीने स्वतःचे कपडे नदीत फेकून दिले. मात्र, ज्या रिक्षावाल्याशी त्यांचा वाद झाला होता, त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीमुळे तपासाला वेग आला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने विजयला बेड्या ठोकल्या. तिघांनाही कोठडी पोलिसांनी या प्रकरणात विजय साहनी, त्याची पत्नी संध्या साहनी आणि ज्याची स्कूटी वापरली तो सासरा रामबिलास साहनी या तिघांनाही अटक करून जेलमध्ये पाठवले आहे. प्रियाचा १३ वर्षांचा मुलगा सध्या मुंबईत आहे.
81 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 08:44 AM
आश्वासक परिणाम असूनही भारताचे गुन्हेगारी कार्य केंद्र लक्ष वेधण्यात अपयशी ठरले

आश्वासक परिणाम असूनही भारताचे गुन्हेगारी कार्य केंद्र लक्ष वेधण्यात अपयशी ठरले

मनीषा म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: गुन्ह्यांचा तपास जलद गतीने करण्यासह संघटित गुन्हेगारी रोखणे आणि गुन्हेगारांची माहिती वेगवेगळ्या तपास संस्थांमध्ये त्वरित देण्याकरिता गुन्हे कार्यप्रणाली केंद्र (एमओबी) तयार करण्यात आले आहे. मात्र, अनेकपोलिसठाण्यांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. परिणामी अनेक प्रकरणांत आरोपीचा जुना फोटो वापरून तपास करण्याची वेळ अधिकाऱ्यांवर ओढावली आहे. दरम्यान, दोन वर्षांत मालमत्तेसारख्या गंभीर गुन्ह्यात ४,३०९ आरोपींना अटक झाली असून, त्यापैकी १८४ आरोपींचा तपशील ‘एमओबी’कडे पाठविला आहे.२०१८ पासून वेळोवेळी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी नाराजी वर्तवली होती. ‘एमओबी’ अभिलेखावर आरोपीची नोंद ठेवण्यासाठी हिस्ट्रीशीट फॉर्म, चेहरेपट्टी फॉर्म, एफआयआर, अटक पंचनामा, केस डायरी, अंगुलीमुद्रा, तळहाताच्या मुद्रा, फोटो, तसेच सीएआयएस, एमपीआयएसप्रणालीवर माहिती अपलोड करणे बंधनकारक आहे. जेणेकरून पुढील तपासाला त्याची मदत होईल. मात्र, प्रत्यक्षातपोलिसठाण्यांकडून माहिती पाठवली जात नाही. जर पाठविल्यास कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. २०२४-२०२५ कालावधीत परिमंडळ १ ते १२, तसेच बंदर परिमंडळातील अनेक पोलिस ठाण्यांनी मालमत्तेच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींचे अभिलेख अत्यल्प प्रमाणात ‘एमओबी’कडे पाठविले आहेत. कुलाबा, मरिन ड्राइव्ह, दादर, धारावी, कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, अंधेरी, कांदिवली, दहीसर आदी प्रमुख पोलिस ठाण्यांचा यामध्ये समावेश आहे. गुन्हे शाखेतील युनिट ११ वगळता इतर युनिट्सकडूनही समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नसल्याचे पोलिस आयुक्तालयाने नमूद केले. संबंधित पोलिस ठाण्यांनी मालमत्तेच्या गुन्ह्यांत अटक आरोपींची संपूर्ण कागदपत्रे तातडीने ‘एमओबी’कडे पाठवावीत, असे आदेश सर्व परिमंडळ उपायुक्तांना देण्यात आले आहेत. अन्यथा भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
29 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 08:32 AM
जमीन खरेदी घोटाळाप्रकरणी पुणे पोलिसांनी कुलसचिवांविरोधात आरोपपत्र दाखल केले

जमीन खरेदी घोटाळाप्रकरणी पुणे पोलिसांनी कुलसचिवांविरोधात आरोपपत्र दाखल केले

पिंपरी :मुंढवायेथील ४० हेक्टर जागेच्या खरेदी-विक्री घोटाळा प्रकरणात बावधन पोलिसांनी सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू आणि जमीन विक्रीबाबत कुलमुखत्यार पत्र असलेली शीतल तेजवाणी या दोघांविरुद्ध पौड न्यायालयात सोमवारी (दि. २) दोषारोपपत्र सादर केले. या गुन्ह्यात पसार असलेला दिग्विजय पाटील याच्याविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र सादर करून तपास सुरू ठेवला आहे. पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार,मुंढवायेथील ४० हेक्टर जागेच्या खरेदी-विक्री घोटाळा प्रकरणात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या ‘अमेडिया इंटरप्रायजेस एलएलपी’ कंपनीचे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील, जमीन विक्रीबाबत कुलमुखत्यार पत्र असलेली महिला शीतल तेजवाणी आणि दस्त नोंदणी करणारे सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू या तिघांविरुद्ध बावधन पोलिस ठाण्यात ६ नोव्हेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणात तेजवाणी हिलापुणेपोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर बावधन पोलिसांनी तिचा ताबा घेतला. तर, या प्रकरणातील संशयित सहदुय्यम निबंधक तारू याला भोर येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली होती. मात्र, या गुन्ह्यातील संशयित पाटील हा अद्याप पसार आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर निर्धारित मुदतीत दोषारोपपत्र सादर करणे आवश्यक असल्याने बावधन पोलिसांनी सोमवारी तारू आणि तेजवाणी या दोघांविरुद्ध पौड न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. तर, गुन्ह्यातील पसार संशयित दिग्विजय पाटील याच्याविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र सादर करून तपास सुरू ठेवला आहे.- विशाल गायकवाड (पोलिस उपायुक्त)
36 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 08:13 AM
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला

आयुक्तांकडून आढावा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी ऑनलाइन बैठकीद्वारे जिल्ह्याच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. मतदान केंद्रांची संख्या, तेथील सुविधा, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तसेच दुबार मतदारांच्या मुद्द्‌‍यांवर त्यांनी माहिती घेतली. या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी कायदा-सुव्यवस्था, सुरक्षाव्यवस्था आणि मनुष्यबळ नियोजनाबाबत सादरीकरण केले. जिल्हाधिकारी डुडी यांनी जिल्ह्यातील मतदारसंख्या, मतदान केंद्रांची रचना व मतमोजणी नियोजनाची माहिती दिली.
9 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 3, 2026, 06:55 AM
रस्ते रुंदीकरण प्रकल्पात अडथळा आणण्याबाबत एम. टी. ए. चा महानगरपालिकांना इशारा

रस्ते रुंदीकरण प्रकल्पात अडथळा आणण्याबाबत एम. टी. ए. चा महानगरपालिकांना इशारा

म.टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर:रस्ता रुंदीकरणात बाधीत होणारी बांधकामे पाडण्याच्या कारवाईच्या आड येणाऱ्या नगरसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला. महापालिका अधिनियमाचे कलम १/१० (अ) (ड) नुसार संबंधित नगरसेवकाला नोटीस द्या, त्यानंतर कारवाई कारवाई करा अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या कलमानुसार रस्ता रुंदीकरणास विरोध करणाऱ्या किंवा अतिक्रमण हटाव कारवाईस विरोध करणाऱ्या नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्द होते.निवडणूक पार पडल्यानंतर आणिमहापौर - उपमहापौर पदाचीनिवडणूक दहा फेब्रुवारी रोजी असताना महापालिकेचे प्रशासन एकदम अलर्ट मोडमध्ये आले आहे. विकास योजनेतील आठ रस्त्यांच्या रुंदीकरणाची मोहीम राबवण्याचा निर्णय सोमवारी (दोन फेब्रुवारी) पोलिस प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे शहरात पुन्हा लवकरच पाडापाडी सुरु होईल असे मानले जात आहे.Crime news: निराला बाजारात फिल्मी स्टाईल राडा! सिगारेट आणि 5 हजारांसाठी पान टपरीचालकावर पिस्तुल रोखली ; गल्ल्यातील रोकडही लंपासमहापालिकेने जून - जुलै महिन्यात शहरातरस्ता रुंदीकरणाची मोहीमराबवली, आठ रस्त्यांवर पाडापाडीची कारवाई करुन सुमारे साडेपाच हजार बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर रुंदीकरणाच्या कारवाईला ब्रेक लागला. आता पुन्हा ही कारवाई सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाआहे. या संदर्भात सोमवारी पालिका मुख्यालयात पोलिस प्रशासनासोबत बैठक पार पडली. पालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, रत्नाकर नवले , महापालिकेचे अतिक्रमण बचाव विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे व अन्य अधिकारी उपस्थित होते.रस्ता रुंदीकरणाची कारवाई करताना कायदेशीर प्रक्रिया पार पाडा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार रुंदीकरण करताना सुरुवातीला त्या रस्त्याचा टोटल स्टेशन सर्व्हे करा, रस्त्यात बाधीत होणाऱ्या मालमत्तांचे संपादन करण्यापूर्वी संबंधित मालमत्ताधारकाला नोटीस बजवा, नोटीस बजावल्यानंतर त्या मालमत्ताधारकाचे म्हणणे ऐकून घ्या, त्यानंतर भूसंपादनाची कारवाई करुन रस्ता रुंदीकरण करा, असे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले.Sanjay Shirsat : मर्सिडीज खड्यात आदळली, टायर फुटले; संजय शिरसाटांनी अपघाताचा थरार सांगितलारस्ता रुंदीकरणाची मोहीम राबवतानामहापालिका व पोलिस प्रशासनयांच्या सोयीने तारीख, दिवस निश्चित करा, मोहीम सुरू करण्याच्या आठ दिवस अगोदर पोलिस प्रशासनाला कळवा असे निर्देशदेखील बैठकीच्या दरम्यान देण्यात आले. रुंदीकरणासाठी पाडापाडी करताना त्याचे पूर्णपणे व्हिडिओ चित्रीकरणाचे स्पष्टपणे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.
80 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 06:54 AM
गरीब वाहनचालक गुंतवले जातात आणि नंतर साफ केले जातात अशा प्रकरणांमध्ये नमुना समोर येतो

गरीब वाहनचालक गुंतवले जातात आणि नंतर साफ केले जातात अशा प्रकरणांमध्ये नमुना समोर येतो

सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी निदर्शनास आणून दिले की, अशा प्रकरणांमध्ये आता एक ठराविक 'पॅटर्न' तयार झाला आहे. "एखाद्या गरीब ड्रायव्हरला गुन्ह्यात अडकवायचे, रक्ताचे नमुने बदलायचे आणि दारू प्यायल्याचे नाकारून ३ वर्षात सुटून जायचे," असे त्यांनी सांगितले. यावर सहमती दर्शवत न्यायमूर्तींनी "कायद्याला अशा लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे," असे मत व्यक्त केले.
38 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 06:41 AM
कोल्हापूर कर सल्लागारावर नियोक्त्याची ₹ 58.81 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप

कोल्हापूर कर सल्लागारावर नियोक्त्याची ₹ 58.81 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप

कोल्हापूर: येथील दत्त समर्थ सर्व्हिसेस फर्मचा कर सल्लागार तुषार तातोबा पाटील (वय २९, रा. बामणी, ता. कागल) याने इतरांची बिले फर्मच्या जीएसटी खात्यावर अपलोड करून ५८ लाख ८१ हजारांचा गंडा घातला. हा प्रकार एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान घडला. याबाबत फर्मचे प्रमुख शैलेश सुभाष जाधव (३७, रा. मंगळवार पेठ,कोल्हापूर) यांनी सोमवारी (दि. २) जुना राजवाडापोलिसठाण्यात फिर्याद दिली.जुना राजवाडापोलिसठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव यांची दत्त समर्थ सर्व्हिसेस फर्म आहे. या फर्मकडून नामांकित कंपनीच्या वस्तूंची विक्री केली जाते. एप्रिल २०२३ पासून तुषार पाटील हा फर्मचा कर सल्लागार म्हणून काम करीत होता. त्याने विश्वास संपादन करून जाधव यांच्याकडून फर्मच्या जीएसटी खात्याची माहिती घेतली.पासवर्ड बदलून त्याला स्वत:चा मेल आयडी जोडला. एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२५ या काळात त्याने दोन कोटी १५ लाख चार हजार ७१३ रुपयांची विक्रीची बिले फर्मच्या जीएसटी खात्यावर अपलोड केली. त्यानुसार जीएसटी कार्यालयाकडून जाधव यांना ५८ लाख ८१ हजार ५०३ रुपये जीएसटी भरण्याची नोटीस आली.मोठ्या रकमेचा जीएसटी भरण्याची नोटीस येताच फर्मचे मालक जाधव यांनी जीएसटी कार्यालयात जाऊन चौकशी केली. त्यावेळी कर सल्लागार पाटील याने दत्त समर्थ सर्व्हिसेस फर्मच्या खात्यावर विक्रीची दुसरीच बिले अपलोड केल्याचे लक्षात आले. त्याने ५८ लाख ८१ हजारांचा अपहार केल्याचे स्पष्ट होताच जाधव यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस उपनिरीक्षक अभिजित भोर अधिक तपास करीत आहेत.पासवर्ड बदललेतुषार पाटील हा बी.कॉम. झाला असून, तो कर सल्लागार म्हणून काम करीत होता. सीएंकडून केली जाणारी कामे चोख पद्धतीने करू, अशी ग्वाही त्याने फिर्यादी जाधव यांना दिली होती. मात्र, विश्वासघात करून त्याने फिर्यादींच्या जीएसटी खात्याचे पासवर्ड बदलले. त्याला स्वत:चा मेलआयडी जोडून जाधव यांना अंधारात ठेवले. जीएसटी विभागाची नोटीस आल्यानंतरच अपहाराचा प्रकार उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
8 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 06:33 AM
दुहेरी जीवनाचा उलगडाः खुनाच्या तपासात माणसाचा धक्कादायक खुलासा

दुहेरी जीवनाचा उलगडाः खुनाच्या तपासात माणसाचा धक्कादायक खुलासा

तपासादरम्यान पोलीस उपायुक्त एस.एम. कासिम आबिदी यांनी आरोपीबाबत धक्कादायक खुलासा केला. आरोपीचे मूळ नाव 'सौरभ' होते, मात्र त्याचे संगोपन मुस्लिम कुटुंबात झाल्यामुळे तो 'शोएब खान' या नावानेही ओळखला जात होता. याच दुहेरी ओळखीसह तो दीपिकाशी संसार करत होता. सोमवारी रात्री त्यांच्यात जोरदार भांडण झाले, ज्यामध्ये शोएबने दीपिकाचा जीव घेतला आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करून तो फरार झाला.
21 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 04:43 AM
म्हासला पोलीस ठाण्याकडे निवेदन सुपूर्द

म्हासला पोलीस ठाण्याकडे निवेदन सुपूर्द

सदरचे निवेदन म्हसळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांना देण्यात आले.यावेळी मुसद्दिक इनामदार,संजय खांबेटे,उदय कळस,दिपल शिर्के,नंदू शिर्के,सलीम बागकर,शाहिद जंजीरकर,रियाज घराडे,दिलीप करमरकर,सरफराज दर्जी,निहाल पेणकर,शगुप्ता जहांगीर आदी मान्यवर उपस्थित होते.
74 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 04:25 AM
मुंबईतील अंमली पदार्थ विरोधी पथकावर संशयित अमली पदार्थ विक्रेत्याचा हल्ला

मुंबईतील अंमली पदार्थ विरोधी पथकावर संशयित अमली पदार्थ विक्रेत्याचा हल्ला

मुंबई पोलीस विभागातील अमली पदार्थ विरोधी पथक शनिवारी रात्री उलवा परिसरात अमली पदार्थ खरेदी विक्री प्रकरणी संशयित आरोपीचा शोधार्थ धडकले होते. उलवा सेक्टर 19 येथील शगुन चौकात काही लोक आढळून आले त्यांच्या हालाचारी संशयास्पद होत्या. त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी हे पथक गेले असता आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी हा हल्ला करताना चॉपर, गावठी कट्टा, तलवार, फायटर पंच, हॉकी स्टिक याचा वापर केला आहे. हल्लेखोर अशा पद्धतीने प्रतीकार करीत प्रतिहल्ला चढवतील असे पोलीस पथकाला वाटलेच नाही. या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मांढरे, पोलीस मित्र फिरोज सिद्धीकी, अहमद रजा कुरेशी, आणि अतुल जैस्वाल हे जखमी झाले आहेत.
96 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 04:07 AM
रोहित शेट्टीच्या गोळीबाराच्या घटनेत कट असल्याचा संशय

रोहित शेट्टीच्या गोळीबाराच्या घटनेत कट असल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई:रोहित शेट्टीघरावर पाच गोळ्या झाडणाऱ्या बिष्णोई गँगच्या टोळीचा शेट्टी यांना जीवे मारण्याचा कट असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. या प्रकरणात कुख्यात लॉरेन्स बिष्णोई टोळीचा साथीदार शुभम लोणकरला आरोपी करण्यात आले असून त्याच्यासह शूटर्सचा शोध सुरू आहे. या प्रकरणात अटक चौकडीने शूटर्सला शस्त्र, वाहन पुरवल्याचा आरोप आहे. तसेच ते परराज्यातील असल्याचा संशय असून त्यानुसार तपास सुरू आहे. पथकाने पुण्यातून स्वप्निल सकट (२३), समर्थ पोमाजी (१९), सिद्धार्थ येनपुरे (१९) आणि आदित्य गायकी (१९) या चौघांना अटक केली. यापैकी समर्थ हा बेरोजगार असून पोमाजी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तर, सिद्धार्थ हा डिलिव्हरी बॉय व आदित्य सेल्समन म्हणून काम करतो. यातील एकावर पुण्यात मारहाणीचा गुन्हा नोंद आहे. तिघांनागुन्हेगारीपार्श्वभूमी नसल्याचे सांगितले. त्यांच्याकडील मोबाइलची तांत्रिक टीमकडून तपासणी सुरू आहे. शुटर्सची दुचाकी विलेपार्ले येथील सेंट जोसेफ चर्च रोडवर बेवारस अवस्थेत पोलिसांना आढळली. पाच रिकामी पुंगळ्या जप्त केल्या असून त्या बॅलेस्टिक तपासणीसाठी पाठवल्या आहेत. शूटर्स राज्याबाहेर पसार झाल्याची शक्यता आहे. गुन्ह्यातील दुचाकी पुण्याच्या अमन मारोठे या तरुणाची असून त्याला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. याच दुचाकीमुळे पुणे कनेक्शन उघडकीस आले. रोहित शेट्टीयांचे सुरक्षारक्षक स्वप्निल विजय साळुंके (३१) यांच्या तक्रारीवरून जुहू पोलिसांनी गुन्हा नोंदवला. ते गेल्या सहा वर्षांपासून शेट्टी यांच्याकडे कामाला आहेत. घटनेच्या दिवशी इमारतीच्या लॉबीमध्ये सीसीटीव्ही मॉनिटरजवळ बसलेले सुरक्षारक्षक स्वप्निल विजय साळुंके आणि त्यांचे सहकारी वाहीद अस्लम मलिक यांना शनिवारी रात्री पावणेएकच्या सुमारास फटाक्यासारखा मोठा आवाज ऐकू आला. सीसीटीव्हीची स्क्रीन पाहताच शेट्टी टॉवर बिल्डिंगच्या कंपाउंडच्या भिंतीलगत गोळीबार करताना दिसताच सर्वांना अलर्ट देण्यात आला. सुरक्षारक्षकांनी बाहेर धाव घेताच आरोपी पसार झाला. ज्या पद्धतीने गोळीबार झाला त्यातून शेट्टी यांना ठार मरण्याचा कट असल्याचा अंदाज आहे. - हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारा शुभम लोणकर हा मूळचा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या नेव्हरी या गावचा रहिवासी आहे. याआधीही शुभम लोणकर याच्यावर अकोला पोलिसांनी कारवाई करत तब्बल ३ पिस्टलसह काही जिवंत काडतुसे त्याच्याकडून जप्त केली होती. - पुढे पुण्यात भंगाराच्या दुकानात काम करणारा लोणकर लॉरेन्स बिष्णोईसाठी काम करतो. माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात त्याचा सहभाग होता. या गुन्ह्यातील अटक आरोपीच्या चौकशीत शुभमने स्नॅपचॅटद्वारे लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई याच्याशी तो अनेकदा बोलल्याचे समोर आले. - बाबा सिद्दीकी प्रकरणात शुभमने हत्येसाठी शस्त्र व काडतुसे, सिम व मोबाइल दिला होता. हत्येनंतर तिन्ही शूटर्सना एकमेकांशी बोलण्यासाठी नवीन सिम आणि मोबाइल दिले होते.
86 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 04:02 AM
पुण्यातील व्यावसायिकांना सरकारी जमीन घोटाळ्याच्या आरोपातून मुक्तता

पुण्यातील व्यावसायिकांना सरकारी जमीन घोटाळ्याच्या आरोपातून मुक्तता

पुणे:मुंढवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात ‘अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी’ कंपनीचा संचालक दिग्विजय पाटील यांच्यासहपार्थ पवारयांना वगळण्यात आले आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी शीतल तेजवानी हिच्याविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात १ हजार ८८६ पानांचे विस्तृत दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले असून, या जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी हिच्यावरच केवळ आरोपांचे ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात शीतल तेजवानी हिच्यासह इतरांवरही गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे इतरांविरोधात लवकरच दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. पुण्यातील मुंढवा येथील ४० एकर शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी ही मुख्य सूत्रधार असून, तिने बनावट कागदपत्रे आणि पॉवर ऑफ ॲटर्नीच्या जोरावर ही जमीन अमेडिया कंपनीला विकल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने शीतल तेजवानीला अटक केली आहे. या व्यवहारात सुमारे ३०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही जमीन वनस्पतीशास्त्र सर्वेक्षण विभागाची असतानाही, बनावट कागदपत्रे तयार करून ती ‘अमेडिया एंटरप्रायझेस’ या कंपनीला विकल्याचा आरोप आहे. तिने निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या मदतीने जमिनीचे अवैध हस्तांतरण केल्याचे समोर आले आहे. शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित तहसीलदार येवले, हेमंत गवंडे यांच्यावर फसवणूक, बनावटगिरी आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी यांच्यावर बोपोडी व मुंढवा अशा दोन जमीन प्रकरणात पुण्यातील खडक पोलिसांत एकच गुन्हा नोंद झाला आहे. सद्यस्थितीत गुन्ह्याचा तपासपुणेपोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. सुमारे ३०० कोटी रुपयांचा हा व्यवहार असून, यात तेजवानीची मुख्य जबाबदारी असल्याचे आरोपपत्रात नमूद आहे. मात्र दोषारोपपत्रात सूर्यकांत येवले आणि दिग्विजय पाटील यांचा कोणताही उल्लेख नाही. या जमीन गैरव्यवहारात शीतल तेजवानीचा सहभाग असल्याने तिच्या विरोधात पोलिसांनी पुरावे गोळा करून हे दोषारोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये खटल्यासंबंधी महत्त्वाचे जबाबही पोलिसांनी नोंदविले आहे. दरम्यान, दिग्विजय पाटील यांच्यासह इतर आरोपींविरोधात पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, त्यांच्या विरोधातही दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले. पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या पथकाने हे आरोपपत्र दाखल केले आहे.
95 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 04:00 AM
भारतीय अधिकाऱ्यांनी संयुक्त मोहीम राबवली, दोन आरोपी व्यक्तींना अटक

भारतीय अधिकाऱ्यांनी संयुक्त मोहीम राबवली, दोन आरोपी व्यक्तींना अटक

आरोपी अनिकेत विटकर याच्याविरुद्ध यापूर्वीचेही तीन गुन्हे दाखल असून, आरोपी आर्यन राऊत याच्याविरुद्ध मोटारसायकल चोरी व आर्म ॲक्ट 4 (25) अंतर्गत गुन्हे नोंद आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
11 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 03:26 AM
तक्रारदार आणि साक्षीदारांकडून 20 लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी

तक्रारदार आणि साक्षीदारांकडून 20 लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रणजित बाळासाहेब जाधव तसेच साक्षीदार विश्वजित अनिल तुपे, अंकुश शांताराम दिघे, प्रशांत लक्ष्मण सपकाळ, विकास कैलास भागवत, रणजित मधुकर भोंगळे व इतर यांच्या सोन्याच्या साखळ्या आणि रोख रक्कम असा अंदाजे 20 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
40 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 03:15 AM
दोन मुलांसाठीच्या निकषांमुळे निवडणुकीतील अपात्रता टाळण्यासाठी भारतीय व्यक्तीने मुलीची हत्या केली

दोन मुलांसाठीच्या निकषांमुळे निवडणुकीतील अपात्रता टाळण्यासाठी भारतीय व्यक्तीने मुलीची हत्या केली

Nanded Crime Election:राजकारणाची हाव माणसाला कोणत्या थराला नेऊ शकते, याचा एक सुन्न करणारा प्रकारनांदेडजिल्ह्यातून समोर आला आहे. ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीत सरपंच पदासाठी अपात्र ठरू नये, म्हणून एका नराधम पित्याने आपल्या सहा वर्षांच्या चिमुकलीची हत्या केली. महाराष्ट्र पंचायत राज कायद्यातील दोन अपत्यांच्या नियमात बसण्यासाठी या बापाने आपल्या एका मुलीला तेलंगणातील कालव्यात ढकलून देत तिचा काटा काढला. नेमकं प्रकरण काय? नांदेडजिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील केरूर गावचा रहिवासी पांडुरंग कोंडमंगले (वय २८) हा गावात विराट सलून चालवतो. पांडुरंगला तीन मुले आहेत—एक तीन वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांच्या जुळ्या मुली. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत त्याला सरपंच व्हायचे होते. मात्र, महाराष्ट्रातील नियमानुसार दोनपेक्षा जास्त अपत्ये असणारी व्यक्ती निवडणूक लढवण्यास अपात्र ठरते. आपल्याकडे तीन मुले असल्याने आपण निवडणूक लढवू शकणार नाही, ही भीती त्याला सतावत होती. सरपंचासोबत मिळून रचला कट या समस्येतून मार्ग काढण्यासाठी पांडुरंगने गावाचा विद्यमान सरपंच गणेश शिंदे याची मदत घेतली. दोघांनी मिळून तिसऱ्या अपत्याला कमी करण्यासाठी अनेक मार्ग शोधले. सुरुवातीला एका मुलीला दत्तक देण्याचा किंवा दुसरीकडे सोडण्याचा विचार झाला. कागदोपत्री नाव कमी करण्यासाठी तो पुणे महापालिका कार्यालयातही जाऊन आला. मात्र, जन्म दाखल्यावर नोंद असल्याने कायदेशीररीत्या मुल कमी करणे अशक्य असल्याचे त्याच्या लक्षात आले. अखेर, पोटच्या मुलीची हत्या करून हा अपघात असल्याचा बनाव रचण्याचे या दोघांनी ठरवले. तेलंगणात नेऊन मुलीला कालव्यात ढकलले ठरल्याप्रमाणे, पांडुरंग आपल्या सहा वर्षांच्या प्राची या मुलीला दुचाकीवरून तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यात घेऊन गेला. तिथे निजामसागर कालव्यापाशी पोहोचल्यावर त्याने निर्दयीपणे प्राचीला वाहत्या पाण्यात ढकलून दिले. काही वेळातच आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यांनी धाव घेतली असता चिमुकलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. असा झाला उलगडा तेलंगणापोलिसांनीमुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन तिचे फोटो सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रात प्रसिद्ध केले. हे फोटो पाहून महाराष्ट्रातील एका व्यक्तीने मुलीची ओळख पटवली आणिपोलिसांनामाहिती दिली. तेलंगणा पोलीस तातडीने नांदेडमधील केरूर गावात पोहोचले. सुरुवातीला पांडुरंगने मुलीवर उपचार सुरू आहेत असे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. दोघांवरही गुन्हे दाखल निजामाबाद पोलिसांनी पांडुरंग कोंडमंगले याला अटक केली असून, त्याला मदत करणारा सरपंच गणेश शिंदे यालाही सह-आरोपी करण्यात आले आहे. दोघांवरही हत्या आणिगुन्हेगारीकट रचल्याप्रनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेने संपूर्ण नांदेड जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. नेमका नियम काय आहे? महाराष्ट्र विधीमंडळाने २००५ मध्ये 'महाराष्ट्र नागरी स्थानिक संस्था आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम' मध्ये सुधारणा केली. यानुसार ज्या व्यक्तीला १२ सप्टेंबर २००१ नंतर दोनपेक्षा जास्त मुले (तीन किंवा त्यापेक्षा जास्त) आहेत, ती व्यक्ती ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा नगरपालिकेची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरते. स्वतःची मुले असताना एखादे मूल दुसऱ्याला दत्तक दिले, तरी कागदोपत्री त्या व्यक्तीच्या मुलांची संख्या कमी होत नाही. म्हणजेच, मूल दत्तक दिले तरी तो उमेदवार अपात्रच ठरतो.
15 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 02:27 AM
पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपीला सर्वोच्च न्यायालयाचा जामीन मंजूर, पालकांच्या भूमिकेवर टीका

पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपीला सर्वोच्च न्यायालयाचा जामीन मंजूर, पालकांच्या भूमिकेवर टीका

पुण्यातील बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणीसर्वोच्च न्यायालयानेसोमवारी महत्त्वाचा निर्णय दिला आहे. रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याचा आरोप असलेल्या ३ आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला, पण त्याचवेळी पालकांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलासह मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी तीन आरोपींनासर्वोच्च न्यायालयानेसोमवारी जामीन मंजूर केला. तसेच मुलांना कारच्या चाव्या देणे आणि मौजमजेसाठी अमाप पैसा देणे हे मुळीच स्वीकारार्ह नाही, अशी टिप्पणी न्या. बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने केली. -अमर सतीश गायकवाड, आदित्य अविनाश सूद (वय ५२) आणि आशिष सतीश मित्तल (वय ३७) अशी जामीन मंजूर झालेल्या आरोपींची नावे आहेत. अमर गायकवाड याने रक्ताचे नमुने बदलण्यासाठी मध्यस्थाची भूमिका बजावली होती. -अपघाताच्या वेळी मुख्य आरोपीसोबत असलेल्या इतर दोन अल्पवयीन मुलांच्या रक्ताच्या नमुन्यांऐवजी आदित्य सूद आणि आशिष मित्तल या दोघांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी वापरण्यात आले होते. या पुराव्यांशी छेडछाड केल्याप्रकरणी त्यांना गेल्या वर्षी १९ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. -रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी मुलाचे आई-वडील (विशाल आणि शिवानी अग्रवाल), ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर, कर्मचारी अतुल घाटकांबळे यांच्यासह १० जणांना अटक करण्यात आली होती. १९ मे २०२४ रोजी पुण्याच्या कल्याणीनगर भागात दारूच्या नशेत असलेल्या १७ वर्षीय मुलाने पोर्शे कार चालवून दोन आयटी इंजिनिअरना धडक दिली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गाडी चालक अल्पवयीन मुलगा असल्याने बाल न्याय मंडळाने आरोपी मुलाला ‘रस्ते सुरक्षा’ यावर ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याच्या अटीवर जामीन दिला होता, ज्यावरून देशभर संताप व्यक्त झाला होता. पोलिसांनी फेरविचार याचिका केल्यावर त्याला बालसुधारगृहात पाठवले होते, पण जूनमध्ये उच्च न्यायालयाने त्याच्या सुटकेचे आदेश दिले होते.
26 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 01:44 AM
सोलापूरच्या 6 व्या प्रभागात भटक्या डुकरांचा ढिगारा

सोलापूरच्या 6 व्या प्रभागात भटक्या डुकरांचा ढिगारा

दीपक शिराळकर सोलापूर :सोलापूर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग सहामध्ये मोकाट डुक्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. प्रामुख्याने देशमुख पाटील वस्ती, आमराई, गंगा नगर, हब्बू वस्ती आणि 54 मीटर रस्त्यावरील मुक्ताई मंदिर परिसरात या डुकरांनी उच्छाद मांडला आहे. हा परिसर झोपडपट्टी बहुल आहे. घरांच्या अगदी जवळ या डुकरांचा राबता असल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
96 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 01:22 AM
पंढरपूर पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली

पंढरपूर पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली

पंढरपूर :वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पंढरपूर शहर पोलीसांनी रविवार दि.1 फेब्रुवारी रोजी विशेष मोहीम राबवली. यामध्ये 105 वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करुन 57 हजार900 रुपये दंड वसुल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरिक्षक दशरथ वाघमोडे यांनी दिली.
100 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 2, 2026, 11:39 PM
कराडमध्ये घरफोड्या आणि ऑटो रिक्षा चोरीप्रकरणी पुण्यातील दोघांना अटक

कराडमध्ये घरफोड्या आणि ऑटो रिक्षा चोरीप्रकरणी पुण्यातील दोघांना अटक

कराड :कराड शहर व परिसरात रिक्षा चोरीसोबत 9 वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी करणाऱ्या पुण्यातील दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. यात एका महिलेचा समावेश असून एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कराड शहर पोलिसांनी संशयितांकडून सुमारे 13 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून सोन्याचे दागिने, रिक्षा, मोटरसायकल व इतर मुद्देमाल याचा यात समावेश आहे. रोहन सनी लोंढे (वय 22, रा. भारतनगर, पिंपरी पुणे) आणि तेजस्विनी अविनाश पाटील (वय 19, वाकड पुणे) अशी संशयितांची नावे आहेत. दोन्ही संशयित एकत्रित वास्तव्यास होते अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे.
17 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 02:43 PM
बुलढाण्यातील बांधकाम स्थळी स्थलांतरित मजूराकडून पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

बुलढाण्यातील बांधकाम स्थळी स्थलांतरित मजूराकडून पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

बुलढाण्यातली हतेडी शिवारात सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामस्थळी एका परप्रांतीय मजुराने पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेनंतर आरोपीने मुलीचे अपहरण करून तिला मलकापूर रेल्वे स्थानकात नेले; मात्र बुलढाणा ग्रामीणपोलिसांनीतातडीची कारवाई करत पीडित मुलीला सुखरूप ताब्यात घेतले असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे कंत्राट 'सॅम इंडिया' या कंपनीकडे असून, येथे मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय मजूर कार्यरत आहेत. २८ जानेवारी रोजी दुपारी परिसरात एकटी असलेल्या मुलीला आरोपी संतोष ब्रिजपाल भोईया (वय २५, रा. पलामू, झारखंड) याने फूस लावून जवळील झोपडीत नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेत मुलीला गंभीर दुखापत झाली असून, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. घटनेनंतर आरोपीने मुलीला उपचारासाठी रुग्णालयात न नेता थेट मलकापूर रेल्वे स्थानक गाठले. दरम्यान, संध्याकाळी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार मिळताच बुलढाणा ग्रामीणपोलिसांनीसंपूर्ण जिल्ह्यात सतर्कता अलर्ट जारी केला. बसस्थानके व रेल्वे स्थानकांत शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर रात्री मलकापूर रेल्वे स्थानकात आरोपीसह पीडित मुलीला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पीडितेच्या पालकांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास बुलढाणा ग्रामीण पोलिस करीत आहेत. पीडितेवर अकोल्यात उपचार सुरू! पीडित मुलीवर सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले; मात्र रक्तस्राव न थांबल्याने पुढील उपचारासाठी तिला अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपी मजुराकडे आधार कार्डही नाही! या प्रकरणाच्या तपासात आरोपी मजुराकडे आधार कार्ड किंवा कोणतेही अधिकृत ओळखपत्र नसल्याचे समोर आले असून, यामुळे कंत्राटदार कंपनीच्या कामगार व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कायदेशीर तरतुदीनुसार कामगाराची नोंदणी व ओळखपत्र असणे गरजेचे आहे. त्यांचे ओळखपत्र व पोलिस पडताळणी बंधनकारक आहे. कामगार विमा सुरक्षा देणेही गरजेचे आहे. या प्रकरणात कामगारांची पार्श्वभूमी तपासणी न केल्यास कंत्राटदारावरही प्रशासकीय व कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यादृष्टीने पोलिस आता कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे. आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे.
68 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 01:37 PM
नागपूरच्या सावनेरमध्ये तीन अल्पवयीन मुलांनी 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केलाः पोलिसात गुन्हा दाखल

नागपूरच्या सावनेरमध्ये तीन अल्पवयीन मुलांनी 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केलाः पोलिसात गुन्हा दाखल

सावनेर (नागपूर) :नात्याला काळिमा फासणारी आणि माणुसकीला लाजवणारी एक घृणास्पद घटना सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सरोदी टोला (तेलगाव कामठी) येथे उघडकीस आली आहे. अवघ्या १४ वर्षांच्या मुलीवर तिच्याच दूरच्या नातेवाईक असलेल्या तीन अल्पवयीन मुलांनी वारंवार अत्याचार केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिन्ही आरोपी एकाच गावातील रहिवासी असून एकमेकांचे दूरचे नातेवाईक आहेत. या नराधमांनी केवळ अत्याचारच केला नाही, तर पीडितेचे अश्लील व्हिडिओ देखील बनवले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला वारंवार ब्लॅकमेल करण्यात आले आणि तिचे शारीरिक शोषण करण्यात आले. पोलिसांची कारवाई आणि गुन्हे दाखल पीडितेने धीर धरून सावनेर पोलिसांत धाव घेतली, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२) (m), ६५(१), ७०(२), ३५१(४) आणि सह पोक्सो (POCSO) कायद्याच्या कलम ६६ (e) व ६७ (b) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीणनागपूरचेअतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेरचे ठाणेदार उमेष पाटील पुढील तपास करत आहेत.आरोपींची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. पोलिसांनी तिन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेऊन सावनेर न्यायालयात हजर केले. मात्र, आरोपी अल्पवयीन असल्याने न्यायालयाने त्यांना नागपूर येथील बालसुधारगृहात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. कायद्याची कमकुवत बाजू की गुन्हेगारांचे फावले? ही घटना समाजातील एका भीषण वास्तवाकडे बोट दाखवते. १४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणारे आरोपी केवळ 'अल्पवयीन' आहेत म्हणून कडक शिक्षेपासून वाचणार का? वारंवार होणारे असे गुन्हे आणि त्यांना मिळणारी मवाळ वागणूक यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढत आहे. अशा क्रूर गुन्ह्यांसाठी कायद्यात कठोर बदलांची गरज असून, तरच अशा प्रवृत्तींना चाप बसेल. अन्यथा, रोज अशा बातम्या वाचण्याची दुर्दैवी वेळ समाजावर येईल.
61 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 2, 2026, 12:40 PM
दरोडेखोरांना लक्ष्य केलेः केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल

दरोडेखोरांना लक्ष्य केलेः केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणी अश्विनी घोळवे यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने करीत आहेत.
98 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Feb 2, 2026, 12:17 PM
पुणे पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर समुपदेशन आणि इशारा देऊन कारवाई केली

पुणे पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर समुपदेशन आणि इशारा देऊन कारवाई केली

पुणे :मद्यप्राशन करुन वाहने चालविणारया मद्यपींना सोमवारी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात समुपदेशाासाठी बोलाविण्यात आले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खास शैलीत मद्यपी वाहनचालकांना इशारा दिला. ‘पुन्हा मद्यप्राशन करुन वाहन चालविल्यास कडक कारवाई करण्यात येईल’, असा दम त्यांनी मद्यपी वाहनचालकांना दिला. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात रस्ते सुरक्षा मोहिमेअंतर्गत समुपदेशन आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबािरात मद्य प्राशन करनु वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई केलेले एक हजार वाहनचालक उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाई केलेल्या वाहनचालकांशी संवाद साधला. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त हिंमत जाधव याव वेळी उपस्थित होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘मद्यप्राशन करुन वाहने चालविल्यामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. दोष नसताना वाहनचालक आणि पादचाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागते. मद्यपी वाहनचालकांच्या चुकांमुळे एखाद्याचे कुटुंब उद्ववस्त होते. मद्यप्राशन करुन वाहने चालवू नयेत. वाहन चालविल्यास पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येईल. पुन्हा मद्यप्राशन करुन वाहने चालविण्याचे धारिष्ट्य कोणी करणार नाही, हे लक्षात ठेवावे. संकेतस्थळ, समाज माध्यमात मद्यपी वाहनचालकांची छायाचित्रे प्रसारित केली जातील. मित्र, कुटुंबीयांना ही छायाचित्रे पाठविली जातील. भर चौकात मद्यपी वाहनचालकाांचा पोलिसांच्या शैलीत खास सत्कार करण्यात येईल, याची जाणीव ठेवावी.’ ‘गेल्या वर्षी मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्यांविरुद्ध सहा हजार जणांविरुद्ध कारवाई (ड्रंक अँड ड्राईव्ह) करण्यात आली. यापुढील काळात कारवाई तीव्र करण्यात येणार आहे’, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. ‘समुपदेशन शिबिरात सहभागी झालेल्या वाहन चालकांना शिक्षा देण्याचा उद्देश नाही. वाहतूक नियमांचे पालन न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भाेगावे लागतात, याबाबतचा संदेश देण्याचे काम वाहन चालकांनी करावे. भारतात दरवर्षी साधारणपणे एक लाख ८० हजार नागरिकांचा अपघाती मृत्यू होतो. आकडेवारीचा विचार केल्यास दररोज ४०० नागरिक रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडतात, याचा विचार करणे गरजेचे आहे’, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी नमूद केले. अशा प्रकारचे समुपदेशन शिबिर दर् आठवड्याला घेण्यात येणार आहे. भरधाव वेागने वाहन चालविणे, एकाच दुचाकीवरुन तिघांचा प्रवास, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे अशा प्रकारचा नियमभंग करणाऱ्यांचा परवाना जप्त केला जाणार आहे. प्रसंगी त्यांचे वाहनही जप्त केले जाईल. या शिबिरास उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्यानंतर त्यांचा परवाना दिला जाणार आहे. शहरातील गंभीर स्वरुपाचे अपघात कमी करण्याचा निर्धार पोलिसांनी केला आहे. शहरातील ३० टक्के गंभीर अपघात अवजड वाहनांमुळे होतात. शहराच्या मध्यभागात जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पुढील आठवड्यात अपघात करणारे अवजड वाहनचालक आणि वाहन मालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त.
68 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 2, 2026, 11:48 AM
उलटीच्या तक्रारीनंतर विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपी साहिल शेखला ताब्यात घेतले

उलटीच्या तक्रारीनंतर विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपी साहिल शेखला ताब्यात घेतले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साहिल शेखला एका गु्न्ह्यात विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ३१ जानेवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास त्याला पोलीस ठाण्यात आणले. या गुन्ह्यात त्याला ताब्यात घेऊन अटकेची कारवाई करण्यात येणार होती. त्या वेळी शेखने उलटी होत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली.
71 shares
😢
Loksatta logo
Loksatta
Feb 2, 2026, 11:25 AM
महिला यात्रेकरूंकडून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चार महिलांना पिंप्री पोलिसांनी अटक केली आहे.

महिला यात्रेकरूंकडून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चार महिलांना पिंप्री पोलिसांनी अटक केली आहे.

पिंपरी :भंडारा डोंगराच्या पायथ्याशी झालेल्या सप्ताहाला आलेल्या भाविक महिलांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चार महिलांना दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी अटक केली. या कारवाया शनिवारी (३१ जानेवारी) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सुदवडी गावच्या हद्दीत करण्यात आल्या. पहिल्या प्रकरणात माया सुहास गुरव (४५, डोळसनाथ मंदिराजवळ, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी वत्सला संपत गायकवाड (३५, एकनाथवाडी, पाथर्डी, अहिल्यानगर) आणि कस्तुराबाई भागवत लोखंडे (४५, एकनाथवाडी, पाथर्डी, अहिल्यानगर) यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या तोंडओळखीचे असून ते भजनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या गळ्यातील आणि इतर महिलांचे असे एकूण ४७ ग्रॅम वजनाचे २ लाख ८२ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. ही बाब उघडकीस येताच पोलिसांनी तात्काळ महिलांचा शोध घेत त्यांना अटक केली. दुसऱ्या प्रकरणात शांताबाई दत्तात्रय चव्हाण (६६, इंदोरी, मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गौळण पांडुरंग गायकवाड (४०, माउली नगर, बीड) आणि प्रीती अंबादास माहिते (३२, नडे कॉलनी, काळेवाडी) यांना अटक केली आहे. आरोपींनी भजनाच्या कार्यक्रमात गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादी आणि इतर महिलांच्या गळ्यातील ६२ ग्रॅम वजनाचे ३ लाख ७२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत सुपरवायझरला खोटी माहिती का देतो, या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाला मारहाण करण्यात आली. या मारहाण प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना रविवारी (१ फेब्रुवारी) रात्री चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे घडली. या प्रकरणात २२ वर्षीय तरुणाने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र दोघे घरी जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. “आमच्याबद्दल सुपरवायझरला खोटी माहिती का देतो,” असे म्हणून त्यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी फिर्यादीच्या मित्राने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी “तू मध्ये का आलास, तुला मारूनच टाकतो,” असे धमकावून त्याच्या पोटात चाकू खुपसला. या हल्ल्यात फिर्यादीचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत. सोमटणे फाटा येथे भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत एका ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (१ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जुना पुणे-मुंबई हायवेवर मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर घडली. बाबासाहेब रामभाऊ जाधव (५३) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात रोहित हनुमंत बजगुडे (२९, शोभा नगर, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कंटेनर चालक लाल शेखर यादव (ईसापूर, आजमगड, उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब जाधव हे आपल्या दुचाकीवरून बाजारात जात होते. यावेळी आरोपीने आपल्या ताब्यातील कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात जाधव हे वाहनाखाली आल्याने त्यांच्या पोटावरून चाक गेले आणि गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत. चऱ्होलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त चऱ्होली बुद्रुक येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली. ही कारवाई शनिवारी (३१ जानेवारी) सायंकाळी खालचा मळा, चोविसावाडी येथे करण्यात आली. पोलीस शिपाई अनिल जोशी यांनी या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या कारवाईत १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे पत्र्याच्या बंदिस्त शेडमध्ये तीन पत्ती नावाचा जुगार खेळत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम असा एकूण १३ लाख ६१ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. छाप्यावेळी ७ ते ८ जण पळून जाण्यात यशस्वी झाले असून दिघी पोलीस तपास करत आहेत. बेकायदेशीरपणे गावठी दारू विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या एका महिलेवर वाकड पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई रविवार (१ फेब्रुवारी) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वेणुनगर येथील गणपती मंदिराजवळील मोकळ्या जागेत करण्यात आली. या प्रकरणात पोलीस शिपाई दीपक शिरसाट यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ७२ लिटर गावठी गावठी दारू विक्रीसाठी घेऊन थांबली होती. पोलिसांनी तिच्याकडून ७ हजार २०० रुपये किमतीची दारू जप्त केली असून तिला नोटीस बजावण्यात आली आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.
6 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 2, 2026, 11:15 AM
मुंबई पोलिसांनी वित्तपुरवठादाराला धमकावल्याप्रकरणी आणि खुनाच्या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे.

मुंबई पोलिसांनी वित्तपुरवठादाराला धमकावल्याप्रकरणी आणि खुनाच्या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे.

फायनान्सर सनी वाघचौरे यांना धमक्या दिल्याप्रकरणी आणि बाबा सिद्दीकी खून प्रकरणात शुभम लोणकरचे नाव समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी पुण्यातील पाच जणांना अटक केली असून, ते शुभमसोबतच्या संबंधित लोकांची चौकशी करत आहेत.
8 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 2, 2026, 10:46 AM
समाजमाध्यमांवर अश्लील मजकूर पसरवणाऱ्या व्यक्तीला अटक

समाजमाध्यमांवर अश्लील मजकूर पसरवणाऱ्या व्यक्तीला अटक

महेश पाटील, नंदुरबार :युवती सोबत रहावी या उद्देशाने तिच्या सोबतचे अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रे एकाने सोशल मीडियावर प्रसारित केले. इंटरनेटच्या माध्यमातून तरुणीचा पाठलाग करून धमकावणे आणि मानसिक त्रास देणे असे कृत्य करीत होता. याबाबत पीडित युवतीने तक्रार दिली होती. संशयित आरोपी हा पुणे शिरपूर बस मधून उतरताच शिरपूर बस स्थानकावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.जळगावजिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बोरफळी, पोस्ट मेलाने येथील चुनीलाल उर्फ गणेश भोग्या पावरा (वय २७) याने पीडित २० वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून दि. १४ ऑगस्ट २०२५ ते ४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत पीडितेसोबत काढलेलेअश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रेसोशल मीडियावर प्रसारित केली. तसेच इंटरनेटच्या माध्यमातून तिचा पाठलाग करून धमकावणे आणि मानसिक त्रास देणे सुरूच ठेवले. अखेर युवतीने हिंमत दाखवत तिच्या फिर्यादीवरून म्हसावद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७८ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला दाखल केला होता.Nandurbar Crime: नगरपालिकेचे बनावट शिक्के, अधिकाऱ्यांची खोटी सही; 7 वर्षांपासून सुरु होता बोगस दाखल्यांचा गोरखधंदा, 'असा' झाला टोळीचा पर्दाफाशसंशयित आरोपीच्या शोधासाठी तत्काळ म्हसावद पोलीस ठाण्याचे विशेष पथकाने पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील आणि म्हसावद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन कामे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची जलद गतीने तपासाची चक्रे फिरवीत पीडितेच्या मदतीने मिळालेल्या माहितीनुसार आरोप हा पुण्यात असल्याचे निष्पन्न झाले.Nandurbar Crime : एकीकडे प्रजासत्ताकदिनाचा उत्साह, दुसरीकडे तापीत केंद्र प्रमुखाची बॉडी, लेकीची पोलिसांना माहिती; घटनास्थळी पोहोचले तर...पीडितेच्या मदतीने सापळा रचून त्यास पुण्याहून शिरपूरकडे येण्यास भाग पाडले तो येणार असल्याची खात्री झाल्यानंतर शिरपूर बसस्थानक येथे पहाटेच्या सुमारास सापळा लावून रात्रभर आरोपीच्या मोबाईल लोकेशनवर पाळत ठेवून शिरपूर बसस्थानकावर सकाळी ६ वाजता चोपडा-शिरपूर बसमधून उतरत असताना चुनीलाल उर्फ गणेश भोग्या पावरा याला फिल्मी स्टाइलने अटक केली. त्याला चौकशीसाठी शहादा येथे नेण्यात आले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्यावर यापूर्वी अडावद पोलीस ठाणे, जि. जळगाव येथे चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
22 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 2, 2026, 10:11 AM
आयुक्त पाटील यांच्या निर्देशानुसार शहर पोलिसांची कारवाई

आयुक्त पाटील यांच्या निर्देशानुसार शहर पोलिसांची कारवाई

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे, आनंद हल्लाळे व प्रवीण कोळसुरे यांनी पार पाडली.
4 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 2, 2026, 09:36 AM
ठाणे सत्र न्यायालयाने संध्या बच्चवला दोषी ठरवले, शिक्षा सुनावली

ठाणे सत्र न्यायालयाने संध्या बच्चवला दोषी ठरवले, शिक्षा सुनावली

सदर प्रकरण हे ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांच्या न्यायालय समोर अंतिम सुनावणी करता प्रकरण आले होते. या खटल्यात सरकारी वकील म्हणून संजय मोरे हे न्यायालयात युक्तिवाद करीत होते. या संपूर्ण खटल्यात न्यायालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सादर केलेले घटनास्थळाचे पुरावे तसेच न्यायालयात पाच साक्षीदार तपासून त्यांच्या नोंदविलेल्या साक्षी आदींना ग्राह्यधरीत न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांनी संध्या बच्छाव यांना दोषी ठरवीत सहा महिन्याच्या कारावास आणि एक हजार रुपयांचा दंड 30 जानेवारी 2026 रोजी ठाणे न्यायालयात शिक्षा ठोठावली.
100 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 2, 2026, 09:24 AM
भारतः गुंतवणूक घोटाळ्याचा पर्दाफाश, राजकारणी आणि अधिकारी अडकले

भारतः गुंतवणूक घोटाळ्याचा पर्दाफाश, राजकारणी आणि अधिकारी अडकले

दरम्यान, गुन्ह्याच्या तपासातून व अटक आरोपींच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. नार्वेकर दाम्पत्य व त्यांच्या साथीदारांनी टीडब्ल्यूजे असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेडसह पंधराहून अधिक कंपन्या स्थापन करून राज्यभरातील तब्बल 11 हजार गुंतवणूकदारांना 1 हजार 200 कोटी रुपयांचा गंडा घातला असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे अनेक शासकीय कामांचे मोठे कंत्राट मिळणार आहे अशी बतावणी करून या कंपनीने राज्यभरातील राजकीय नेते, बडे अधिकारी व उद्योजक यांना देखील आपल्या जाळ्यात ओढले होते.
33 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 2, 2026, 09:10 AM
रा. वाघोळी येथे भरधाव वेगात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी, कारचालकाला अटक

रा. वाघोळी येथे भरधाव वेगात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी, कारचालकाला अटक

या कारची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीचालक जखमी झाला. कारचालक पुन्हा वेडीवाकडी कार चालवीत असताना नागरिकांनी आरडाओरडा करून कार अडवली. चालकाला पोलिसांच्या हवाली करण्यात आले असून, दुचाकी चालकाने फिर्याद दिली. त्यानुसार कारचालक रजनीकांत श्रीनिवास उपाध्याय (रा. वाघोली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
100 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 08:53 AM
रा. वेंकटेश उद्यानात आश्रम घोटाळा करणाऱ्या महिला आणि मुलाला अटक

रा. वेंकटेश उद्यानात आश्रम घोटाळा करणाऱ्या महिला आणि मुलाला अटक

छत्रपती संभाजीनगर:शहरातील अनेकांना भिशीच्या माध्यमातून अधिक परताव्याचे आमिष दाखवून माय-लेकाने १६ जणांची तब्बल २ कोटी ९९ लाख २० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नंदाबाई रमेश आधुडे (४५) आणि तिचा मुलगा सौरभ रमेश आधुडे (२१ दोघेही रा. व्यंकटेश पार्क, बीड बायपास, मूळ रा. घनसावंगी) अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांना न्यायालयाने ३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिल्याची माहिती मुकुंदवाडी ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले यांनी रविवारी दिली. फिर्यादी जयश्री गजानन गिरी (रा. मुकुंदवाडी) यांच्या तक्रारीनुसार, बीड बायपास परिसरातील व्यंकटेश पार्क येथे राहणारी नंदाबाई रमेश आधुडे ही २०१४-१८ पासून भिशी चालवत होती. सुरुवातीला छोट्या रकमांच्या भिशी वेळेवर पूर्ण करून तिने महिलांचा विश्वास संपादन केला. नोव्हेंबर २०२२ मध्ये तिने १२ लाखांची मोठी भिशी सुरू केली. जयश्री गिरी यांनी या भिशीत २० महिने दरमहा ५० हजार रुपये, याप्रमाणे १० लाख भरले. यापूर्वीचे १० लाख आणि हे १० लाख मिळून त्यांचे एकूण २० लाख रुपये नंदाबाईकडे जमा होते. २०१८ पासून ते जुलै २०२५ पर्यंत या माय-लेकांनी १६ हून अधिक लोकांकडून एकूण २ कोटी ९९ लाख २० हजार रुपये घेतले. मात्र, मुदत संपल्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, गिरी यांच्यासह इतरांनी पोलिसांत धाव घेतली. फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पुढील तपास साहाय्यक निरीक्षक संजय बहुरे करत आहेत. या लोकांची फसवणूकआरोपी माय-लेकाने जयश्री गिरी २० लाख, प्रकाश रणमोडे १४ लाख, नमिता बेंद्रे १७ लाख ५० हजार, विलास माने ३० लाख, नंदा बेंद्रे १५ लाख ५० हजार, चांद पठाण ८ लाख, सावित्री आघाव १९ लाख ८० हजार, ज्योती घोलप २ लाख ७० हजार, छाया चव्हाण ७ लाख ९० हजार, जिजा काळे ६ लाख ५० हजार, गुलाब राठोड १५ लाख ५० हजार, कमलबाई सुरसे २१ लाख ५० हजार, रंजना आघाव १६ लाख २० हजार, सपना मरकड ५० लाख, मीरा फलके ५० लाख, राम घायाळ ४ लाख रुपयांची फसवणूक केली. त्यातील ६ लाख ९९ हजार ५०० ऑनलाइन तर २ कोटी ९२ लाख २० हजार ५०० रोख नंदाबाई व सौरभकडे जमा केले होते.
68 shares
😐