Achira News Logo
Achira News
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 05:25 AM
'द 50'मध्ये आर्य जाधव आणि निक्की तांबोळी यांच्यात पुन्हा टक्कर

'द 50'मध्ये आर्य जाधव आणि निक्की तांबोळी यांच्यात पुन्हा टक्कर

कलर्सटीव्ही आणि जिओ हॉटस्टारवर १ फेब्रुवारी रोजी सुरु झालेला 'द 50' शो सध्या चर्चेत आहे. शोमध्ये स्पर्धक एकाच घरात राहत असून सर्वांना टीममध्ये विभागलं गेलं आहे. त्यांच्यात अनेक खेळ खेळले जात आहेत. या हिंदी शोमध्ये काही मराठी चेहरेही आहेत. बिग बॉस मराठी मध्ये सहभागी झालेली आर्या जाधव, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल आणि शिव ठाकरे हे द ५० गाजवत आहेत. दरम्यान या शोमध्येही आर्या आणि निक्की बिग बॉसमधल्याच विषयावरुन इथेही भांडत आहेत. 'बिग बॉस मराठी ५'मध्ये आर्या जाधवने निक्की तांबोळीच्या कानाखाली मारली होती. यानंतर आर्याला घरातून बाहेर काढण्यात आलं. बिग बॉस संपल्यानंतर या दोघी पुन्हा कधीच भेटल्या नाहीत. आता 'द ५०' या हिंदी रिएलिटी शोमध्ये दोघी आमनेसामने आल्या आहेत. निक्की आणि आर्या यांच्यात पुन्हा बिग बॉसमधलंच भांडण सुरु झालं आहे. तर नेहमीप्रमाणे जान्हवी किल्लेकर निक्कीच्या बाजूने उभी आहे. निक्की आर्याला उकसवत आहे. तर आर्याही तिला सडेतोड उत्तरं देत आहे. दोघी एकमेकींवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. एका हिंदी शोमध्ये या दोन मराठी मुलींनी भांडणातून अख्खा शोच डोक्यावर घेतला आहे. याआधीही प्रोमोमध्ये निक्की तांबोळी रडताना दिसत होती. तर आर्या आक्रमत होती. नेटकऱ्यांनी कमेंट्स करत आर्या जाधवचीच बाजू घेतली आहे. 'आर्या रॉक', 'जान्हवी पुन्हा तेच करत आहे निक्कीची बाजू घेत आहे आणि स्वत:चा काहीच स्टॅण्ड घेत नाही' अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
95 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 05:24 AM
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टँकरच्या अपघातामुळे वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टँकरच्या अपघातामुळे वाहतूक कोंडी

Mumbai Pune Expressway Traffic Update:रसायन वाहून नेणाऱ्या टँकरला काल संध्याकाळी झालेल्याअपघातानंतरमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रचंडवाहतूक कोंडीझाली असून, महामार्गावर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत.अपघातग्रस्तटँकरमधून ज्वालाग्राही वायूची गळती होत असल्याने यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून, सुरक्षिततेसाठी मुंबईकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मार्गावर दोन्ही बाजूंनीवाहतूक कोंडीझाली असून, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तसेच हजारो वाहनचालक अडकून पडले आहेत. मंगळवारी संध्याकाळी खंडाळा घाटामधील आडोशी बोगद्याजवळ रयासन वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात झाला होता. तेव्हापासून मुंबई-पुणे महामार्गावर ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. याबात अधिक माहिती देताना महामार्ग सुरक्षा पथकाने सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास खंडाळा घाटामध्ये मुंबई कॉरिडॉर ( मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ) आडोशी बोगदा या ठिकाणी एक केमिकल टँकर पलटी झाला आहे. त्यामधून ज्वालाग्रही गॅस लिकेज होत असून, सर्व यंत्रणा युद्धपातळीवर काम करीत आहेत. वाहनांच्या सुरक्षिततेकरिता मुंबईकडील मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई व पुणे या दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी झाली असून आज, एक्सप्रेस वे चा प्रवास शक्यतो टाळावा, असं आवाहनही महामार्ग सुरक्षा पथकाने केलं आहे. VIDEO | Traffic was paralysed overnight on the Mumbai-Pune Expressway after a gas tanker overturned in the Khandala Ghat section, leaving hundreds of vehicles stranded and causing massive congestion on both carriageways. Visuals from the spot.#Pune#PuneMumbaiExpressway(Full…pic.twitter.com/kbhHIalmcG या अपघाताला आता १६ तास उलटून गेले तरी वाहतूक सुरळीत होऊ शकलेली नाही. सुरक्षेच्या कारणास्तव महामार्हावरील एक लेन पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. तसेच टप्प्याटप्प्याने ब्लॉक घेत रस्त्या मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या वाहतूक कोंडीमुळे कोणी पहाटे चार वाजल्यापासून, तर कोणी रात्री तीन किंवा पाच वाजल्यापासून या ठिकाणी अडकले असून अनेकांची फ्लाइट चुकली आहे. काही कॅन्सरग्रस्त रुग्णही वाहतुकीत अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. पाणी, अन्न व शौचालयांची सुविधाही अपुरी असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान, “टोल वसूल केला जातो, पण आपत्कालीन परिस्थितीत महामार्ग इतका वेळ बंद का राहतो?” असा सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून महामार्ग मोकळा करावा, अशी जोरदार मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
24 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 05:24 AM
मांद्रेचे पाणीटंचाईचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार पावले उचलत आहे

मांद्रेचे पाणीटंचाईचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार पावले उचलत आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे :मांद्रे मतदारसंघातील दीर्घकाळ प्रलंबित असलेलीपाणीसमस्याकायमची दूर क करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले जात आहे. तुये आयटीआय परिसरातील ३० एमएलडी क्षमतेचापाणीप्रकल्प मांद्रेवासीयांसाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या प्रकल्पाचे लवकरात लवकर लोकार्पण करून जनतेची तृष्णा भागवली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतयांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री डॉ. सावंत तुये हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असताना त्यांनी आमदार जीत आरोलकर यांच्यासोबत ३० एमएलडी पाणी प्रकल्पाच्या कामाची पाहणी करत धावता आढावा घेतला. यावेळी त्यांनी सांगितले की, पाण्याची समस्या पूर्णपणे सुटण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, या प्रकल्पावर युद्धपातळीवर काम सुरू आहे. लवकरच समस्या मार्गी लागणार असल्याचे ते म्हणाले. येथील हजारो सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही आमदार जीत आरोलकर यांनी व्यक्त केला. आरोग्य सुविधांत सुधारणा मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतयांचे शंभर टक्के सहकार्य मिळत असल्यामुळे मांद्रे मतदारसंघाचा झपाट्याने विकास शक्य होत आहे. तुये हॉस्पिटल गोमेकॉ हॉस्पिटलला लिंक झाल्याने आरोग्य सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे. तसेच येणाऱ्या काळात रवींद्र भवनाची पायाभरणी, एक्वेरियम प्रकल्प, क्रीडा मैदान, तसेच तुये येथील नियोजित इलेक्ट्रॉनिक सिटीला जोडणारा लिंक रस्ता पूर्ण केला जाणार आहे. किमान १२ तास होणार नियमित पाणीपुरवठा आमदार जीत आरोलकर म्हणाले, आपण आमदार झाल्यानंतर मांद्रे मतदारसंघातील पाण्याची समस्या टप्याटप्प्याने सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. तुये आयटीआय परिसरात हा महत्त्वाकांक्षी ३० एमएलडी पाणी प्रकल्प साकार होत आहे. मार्च महिन्यात हा प्रकल्प कार्यान्वित होईल, त्यानंतर मांद्रेवासीयांना किमान १२ तास नियमित पाणीपुरवठा मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.
8 shares
😊
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 05:18 AM
सेलिना जेटलीने लग्नाच्या 15व्या वर्धापनदिनानिमित्त पतीकडून घटस्फोटाची धक्कादायक सूचना उघड केली

सेलिना जेटलीने लग्नाच्या 15व्या वर्धापनदिनानिमित्त पतीकडून घटस्फोटाची धक्कादायक सूचना उघड केली

'नो एन्ट्री' आणि 'गोलमाल रिटर्न्स' फेम अभिनेत्रीसेलिना जेटलीसध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर एक अत्यंत भावुक पोस्ट शेअर करत आपल्या १५ वर्षांच्या सुखी वाटणाऱ्या संसारामागचे धक्कादायक वास्तव समोर आणले आहे. लग्नाच्या १५ व्या वाढदिवशीच मिळालेली घटस्फोटाची नोटीस सेलिनाने उघड केले की, ज्या दिवशी त्यांच्या लग्नाचा १५ वा वाढदिवस होता, त्याच दिवशी तिच्या पतीने तिला आश्चर्याचा धक्का देण्याच्या बहाण्याने एका स्थानिक पोस्ट ऑफिसमध्ये नेले. तिथे तिला 'भेटवस्तू' ऐवजी घटस्फोटाची नोटीस हातात देण्यात आली. तिने सांगितले की, "सप्टेंबरच्या सुरुवातीला मला ही नोटीस मिळाली आणि त्या एका क्षणात माझे संपूर्ण जग उद्ध्वस्त झाले." सेलिनाने तिचा ऑस्ट्रियन पती पीटर हाग याच्यावर घरगुती हिंसाचार, मानसिक आणि शारीरिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. तिने सांगितले की, ती अनेक वर्षांपासून हे सर्व सहन करत होती. केवळ आपल्या मुलांसाठी आणि संसारासाठी तिने गप्प राहणे पसंत केले होते. तिने मुंबईच्या अंधेरी न्यायालयात ५० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, पीटरने तिला कामापासून रोखले आणि तिला आर्थिकदृष्ट्या परावलंबी बनवले. घटस्फोटाच्या या प्रक्रियेत सेलिनाला सर्वात जास्त दुःख तिच्या तीन मुलांपासून (विन्स्टन, विराज आणि आर्थर) दूर राहावे लागत असल्यामुळे होत आहे. तिने असा दावा केला आहे की, ऑस्ट्रियन कोर्टाचे आदेश असूनही तिला तिच्या मुलांशी संवाद साधू दिला जात नाहीये. मुलांचे 'ब्रेनवॉशिंग' केले जात असून त्यांना आईच्या विरोधात भडकवले जात असल्याचा आरोपही तिने केला आहे. सेलिना म्हणाली, "मी या काळात शिकले की तुम्ही एखाद्यावर कितीही जास्त प्रेम केले तरी तुम्ही त्याला बदलू शकत नाही. जे आधीच तुटले आहे, त्या नात्याला प्रेमाच्या माध्यमातून पुन्हा जोडू शकत नाही." तिने पुढे असेही सांगितले की, ती जेव्हा काही बोलू शकत नव्हती, तेव्हा ती लिहिण्याचा आधार घ्यायची. तिची ही पत्रे तिच्यावरील अत्याचाराचा आणि संघर्षाचा पुरावा आहेत. सध्या सेलिना भारतात असून आपल्या हक्कांसाठी आणि मुलांच्या ताब्यासाठी कायदेशीर लढा देत आहे.
65 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 05:08 AM
ऊस स्पर्धा वाढलीः श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यास शेजारच्या गिरण्यांच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे

ऊस स्पर्धा वाढलीः श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यास शेजारच्या गिरण्यांच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे

सोमेश्वरनगर :बारामतीतालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे गाळपासाठी स्वतःचा पुरेसाऊसउपलब्ध असतानाही, इतर साखर कारखान्यांकडून सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात थेट घुसखोरी सुरू झाल्याने साखर उद्योगात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सख्खा शेजारी असलेल्या माळेगाव साखर कारखान्याने अलीकडच्या अनेक वर्षात प्रथमच सर्व अलिखित संकेत धुडकावून सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात दहा ते बाराऊसतोडटोळ्या पाठवल्याचा आरोप होत आहे. यामुळे आतापर्यंत जपली गेलेली निकोप स्पर्धा धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या वाढली असून, काही कारखान्यांनी क्षमतेचे मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण केले आहे. परिणामीपुणेजिल्ह्यासह सातारा व अहिल्यानगर जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये उसासाठी चढाओढ वाढली आहे. या स्पर्धेत अनेक कारखाने थेटपुणेजिल्ह्यातील ऊस पळवत असल्याचे चित्र आहे. सोमेश्वर साखर कारखान्याने गेल्या काही वर्षात अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिमा राबवत सिंचन योजनांच्या माध्यमातून ऊस क्षेत्रात लक्षणीय वाढ केली. उपलब्ध ऊस क्षेत्राचा अभ्यास करून कारखान्याने योग्य ते विस्तारीकरण केले आहे. सध्याच्या हंगामात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गाळप चालेल आणि १४ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सोमेश्वरची पहिली उचल टनाला ३३०० रुपये असून, अंतिम दर उच्चांकी राहण्याचे संकेत देण्यात आले आहेत. मात्र, जिराईत भागातील काही शेतकरी ऊसतोडीची घाई करत माळेगाव कारखान्याकडे ऊस देऊ लागल्याचे चित्र आहे. मोरगाव, सुपे, जेजुरी या पट्ट्यात माळेगाव कारखान्याने परवानगीशिवाय टोळ्या व वाहने उतरवल्याचा आरोप सोमेश्वर व्यवस्थापनाने केला आहे. त्यामुळे कारखाना प्रशासनात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले, सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती हे कारखाने अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली गेली तीन दशके परस्पर समन्वयाने काम करत आहेत. आमच्यात काही अलिखित करार व संकेत आहेत. त्यानुसार परवानगी किंवा कराराशिवाय एकमेकांच्या कार्यक्षेत्रातील ऊस न नेण्याचे समान धोरण आहे. स्पर्धा दराची, उताऱ्याची व गाळपाची असावी. मात्र, ती निकोप असली पाहिजे. दुर्दैवाने माळेगावच्या काही टोळ्या सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडत आहेत. ऊस पळवण्याचे प्रकार होणे दुर्दैवी◼️ सोमेश्वर साखर कारखाना १ फेब्रुवारीपासून पहिली उचल टनाला ३४०० रुपये, तर १ मार्चपासून ३५०० रुपये प्रतिटन देणार आहे.◼️ शिवाय अंतिम दर दिवाळीत उच्चांकी दिला जाणार असल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. दरम्यान, कराराशिवाय असे प्रकार घडने हे दुर्दैवी आहे. अधिक वाचा:शासनाने बिगरशेती एनए परवानगी देण्याचे कलेक्टरचे अधिकार काढले; आता कोण देणार परवानगी?
46 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 04:59 AM
बाजारातील घडामोडी आणि डॉलरच्या कमकुवतपणामुळे जागतिक स्तरावर सोने आणि चांदीच्या दरात वाढ

बाजारातील घडामोडी आणि डॉलरच्या कमकुवतपणामुळे जागतिक स्तरावर सोने आणि चांदीच्या दरात वाढ

Gold Silver Rate :जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि डॉलरच्या कमकुवतपणामुळे देशांतर्गत सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्यादरांचा अक्षरशः उद्रेक झाला आहे. बुधवारी, ४ फेब्रुवारी रोजी सोन्याने १ लाख ६० हजार रुपयांचा ऐतिहासिक टप्पा पार केला, तरचांदीच्यादरात ६ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली. लग्नसराईच्या काळात दागिन्यांचे दर गगनाला भिडल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे. MCX वर ऐतिहासिक उच्चांकमल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्या-चांदीच्या व्यवहारात मोठी तेजी पाहायला मिळाली. सोने एप्रिल वायदा सोने ४ टक्क्यांहून अधिक वधारून १,६०,७५५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. तर मार्च वायदा चांदी ६ टक्क्यांच्या जोरदार उसळीसह २,८४,०९४ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. जागतिक बाजारपेठेचा प्रभावआंतरराष्ट्रीय स्तरावर स्पॉट गोल्डचे दर २.२ टक्क्यांनी वधारून ५,०४४.७४ डॉलर प्रति औंस या विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचा नरम कल आणि येन वगळता इतर चलनांच्या तुलनेत डॉलर कमकुवत झाल्यानेगुंतवणूकदारांनीसुरक्षितगुंतवणूकम्हणून सोन्याला पसंती दिली आहे. महाराष्ट्रासह प्रमुख शहरांतील दर (प्रति १० ग्रॅम)गुड रिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, आजचे दर खालीलप्रमाणे आहेत,| शहर | २४ कॅरेट सोने (₹) | २२ कॅरेट सोने (₹) || मुंबई/पुणे | १,६०,५३० | १,४७,१५० || चेन्नई | १,६२,५६० | १,४९,००० || दिल्ली | १,६०,६८० | १,४७,३०० || कोलकाता | १,६०,५३० | १,४७,१५० || बंगळुरू | १,६०,५३० | १,४७,१५० || अहमदाबाद | १,६०,५८० | १,४७,२०० | तेजीची प्रमुख कारणे वाचा -वेदांताचे अनिल अग्रवाल ७५% संपत्ती 'या' क्षेत्रासाठी करणार दान; मुलाच्या स्मरणार्थ घेतला निर्णय (टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही.शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
42 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 04:56 AM
मराठी अभिनेत्री अपूर्वा गोरे आणि अभिनेता अंशुमन जोशी यांचे नाते जुळले

मराठी अभिनेत्री अपूर्वा गोरे आणि अभिनेता अंशुमन जोशी यांचे नाते जुळले

मराठी कलाविश्वात सध्या सनई चौघडे वाजत आहेत. साक्षी महाजन, ज्ञानदा रामतीर्थकर, रेवती लेले यांच्याबरोबरच आणखी एका अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. 'आई कुठे काय करते' मालिकेत ईशा ही भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री अपूर्वा गोरेनेही चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. अपूर्वा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटो शेअर करत अपूर्वा लग्न ठरल्याची बातमी चाहत्यांना दिली. मात्र तिने नाव आणि चेहरा गुलदस्त्यात ठेवला होता. त्यामागचं गुपित आता उलगडलं आहे. अपूर्वाचा होणारा नवरा कोण? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. राजश्री मराठीने दिलेल्या वृत्तानुसार अपूर्वाच्या होणाऱ्या नवऱ्याचं मराठी सिनेसृष्टीशी कनेक्शन आहे. अपूर्वाचा होणारा नवरा हा लोकप्रिय अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आहे. अभिनेता अंशुमन जोशी याच्यासोबत अपूर्वा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अंशुमनला तुम्ही शाळा या सिनेमात पाहिलं असेल. त्याची शाळा सिनेमातील भूमिका प्रचंड गाजली होती. अपूर्वाने फोटो शेअर करत "आमचं ठरलंय" असं कॅप्शन देत चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. तिच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हापासून अपूर्वाच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. आता अपूर्वा आणि अंशुमन लग्न कधी करणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे.
86 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 04:53 AM
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे डहाणू येथे बोगद्याचे काम पूर्ण

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे डहाणू येथे बोगद्याचे काम पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/पालघर/डहाणू: मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल (बुलेट ट्रेन) प्रकल्पाच्या डहाणू इथल्या डोंगरामध्ये भुयारीकरण पूर्ण करून यशस्वी ब्रेक-थ्रू करण्यात आले. मंगळवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणिपालघरचेखासदार हेमंत सावरा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. पालघर जिल्ह्यातीलबुलेट ट्रेनप्रकल्पामध्ये एकूण ७ बोगदे असून, मंगळवारी पूर्ण झालेला एमटी-६ हा दुसरा बोगदा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा बोगदा ४५६ मीटर लांबीचा असून रुंदी १४.४ मीटर आहे. बोगद्याच्या भुयारीकरणासाठी न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या पद्धतीत ड्रिलिंग आणि नियंत्रित स्फोटांद्वारे खोदकाम केले जाते, जे जटिल भूगर्भीय परिस्थितीसाठी उपयुक्त मानले जाते. हे काम अवघ्या १२ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आले असून, उर्वरित बोगद्यांचे काम देखील लवकरच पूर्ण होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, कार्यक्रमात खासदार हेमंत सवरा यांनी पालघरमधील रेल्वे प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. पालघर हा देशातील वेगाने विकसित होणारा जिल्हा ठरत आहे. जिल्ह्यातून हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन), डीएफसीसी (डेसिकेटेड फ्रेट कॉरिडॉर) आणि देशातील सर्वात मोठे ‘वाढवण बंदर’ असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभे राहत आहेत, असे खा. सवरा म्हणाले. २७.४ किमीचे बोगदे प्रकल्पाच्या संपूर्ण ५०८ किमीच्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये २७.४ किलोमीटरचे बोगदे आहेत, यात २१ किलोमीटर भूमिगत आणि ६.४ किमी पृष्ठभागावरील बोगद्यांचा समावेश आहे. प्रकल्पात आठ डोंगरी बोगदे बांधले जात आहेत. सात बोगदे महाराष्ट्रात असून एकत्रित लांबी अंदाजे ६.०५ किमी आहे, तर एक ३५० मीटर लांबीचा बोगदा गुजरातमध्ये आहे. ठाणे ते बीकेसी ५ किमी भूमिगत बोगदा सप्टेंबर २०२५ मध्ये पूर्ण झाला होता. रेल्वे प्रकल्पांचा धडाका बोरिवली ते विरार ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेचे काम प्रगतिपथावर आहे. विरार ते डहाणू ३ ऱ्या आणि ४ थ्या मार्गिकेचे काम वेगाने सुरू आहे. पालघर रेल्वेस्थानकाचा ‘अमृत भारत’ योजनेंतर्गत पुनर्विकास होत आहे. वसई येथे नवीन मेगा टर्मिनल उभारले जाणार आहे., २०१४ नंतर महाराष्ट्राला वर्षाला सरासरी २३,००० कोटी रुपयांचा निधी मिळत आहे. यावर्षी महाराष्ट्रात १ लाख ७० हजार कोटींहून अधिक रकमेची कामे सुरू असल्याचे खासदार डॉ. सवरा यांनी सांगितले. महाराष्ट्रात एका महिन्यात दुसऱ्यांदा डोंगरी बोगद्याचे काम पूर्ण होणे ही एक मोठी उपलब्धी आहे. पुढील वर्षी बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा बिलीमोरा ते सुरतदरम्यान सुरू करणार असून महाराष्ट्रातील टप्पा देखील लवकर पूर्ण करण्यात येणार आहे.अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री पालघर हा सर्वांत वेगाने प्रगती करणारा जिल्हा बनत आहे. गेल्या काही वर्षांपासून बरीच विकासकामे सुरू आहेत आणि बुलेट ट्रेनच्या डोंगरी बोगद्याच्या प्रगतीने त्याच्या वैभवात भर घातली आहे.- हेमंत सावरा, खासदार, पालघर
50 shares
😊
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 04:46 AM
उत्तर प्रदेशात जातीच्या पलायनावरून झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी एका व्यक्तीने शेजाऱ्यांची हत्या केली

उत्तर प्रदेशात जातीच्या पलायनावरून झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी एका व्यक्तीने शेजाऱ्यांची हत्या केली

शेजारी राहणाऱ्या पती-पत्नीकडून मारल्या जाणाऱ्या टोमण्यांना वैतागलेल्या एका तरुणाने मित्राच्या मदतीने या दोघांचीही हत्या केल्याची धक्कादायक घटनाउत्तर प्रदेशमधीलमैनपुरी जिल्ह्यात घडली आहे. आरोपीची बहीण परजातीमधील तरुणासोबत पळून गेल्यावरून हे दाम्पत्य सारखे टोमणे मारायचे. त्याला वैतागून शेजारी राहणाऱ्या या तरुणाने एका नातेवाईकासोबत मिळून या दाम्पत्याची हत्या केली. तसेच त्यांच्या घरातील ऐवजाची लूट केली. या घटनेचा तातडीने तपास करत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी आरोपींकडून चोरलेले दागदागिने आणि दोन कट्टे जप्त केले आहेत. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फुलापूर गावातील महेश चंद्र आणि त्यांची पत्नी अनिता देवी या दाम्पत्याची २६ जानेवारी रोजी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तसेच आरोपींनी घरात लुटालूट केल्याचंही दिसून आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना पकडण्याचे आश्वासन दिलं होतं. तसेच आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी ५ पथके तयार केली आणि आनंद आणि अर्जुन नावाच्या २ आरोपींना अटक केली. यापैकी आनंद हा मृत दाम्पत्याचा शेजारी तर अर्जुन हा त्यांचा चुलत जावई होता. पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान, पुढे आलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी आनंद याची बहीण परजातीमधील एका तरुणासोबत पळून गेली होती. त्यावरून शेजारी राहणारं हे दाम्पत्य ‘तुझी बहीण तर पळून गेली’, असे म्हणून सारखे टोमणे मारायचे. त्यामुळे आनंद हा वैतागलेला होता. त्याच रागातूनन आनंद याने मृत दाम्पत्याचा चुलत जावई असलेल्या अर्जुन याच्या मदतीने या दोघांचीही हत्या केली. मृत दाम्पत्याच्या घरी १८ फेब्रुवारीला मुलाचा लग्नसोहळा होता. त्यामुळे घरात दागदागिने असतील, याचा अंदाज बांधून आरोपींनी घरात लुटालूटही केली. खरंतर आरोपींना केवळ महेश चंद्र यांचीच हत्या करायची होती. मात्र गोळी झाडत असतानाच त्यांची पत्नी तिथे आल्याने आरोपींनी तिचीही हत्या केली. त्यानंतर आरोपी घरातील दागदागिने घेऊन पसार झाले. मात्र यादरम्यान, आरोपींची टॉर्च घटनास्थळी राहिली. या टॉर्चवरूनच पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या.
93 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 04:00 AM
वसामत विभागातील साखर कारखान्यांमध्ये दळणवळणाची गती कायम

वसामत विभागातील साखर कारखान्यांमध्ये दळणवळणाची गती कायम

चालू गाळप हंगामातहिंगोलीजिल्ह्याच्या वसमत विभागातील साखर कारखान्यांनी आपला वेग कायम राखला असून गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत दोन सहकारी आणि एका खासगी कारखान्याने मिळून एकूण ७ लाख ८६ हजार मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप केले आहे. शेतात उभा असलेलाऊसवेगाने कारखान्यांकडे वळत असून फेब्रुवारीअखेरपर्यंत सर्व उसाचे गाळप पूर्ण होईल, असा विश्वास कारखाना प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.विभागातील तिन्ही कारखान्यांनी आपापल्या क्षमतेनुसार गाळप प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला आहे. पूर्णा सहकारी साखर कारखान्याने ८७ दिवसांत ३ लाख ४८ हजार, कोपेश्वर साखर कारखाना ८६ दिवसांत ३ लाख १३ हजार, टोकाई सहकारी साखर कारखान्याने ७५ दिवस १ लाख २३ हजार असा एकूण ७ लाख ८६ हजार मेट्रिक टन उसाचे आतापर्यंत गाळप केले आहे. शेतकऱ्यांना दिलासा यावर्षी गाळप प्रक्रिया नियोजित वेळेनुसार सुरू असल्याने फेब्रुवारीअखेरपर्यंत कार्यक्षेत्रातील संपूर्णऊसगाळपाला जाईल. यामुळे उन्हाची तीव्रता वाढण्यापूर्वीच ऊस तुटणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. कारखाना प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तोडणी आणि वाहतुकीचे नियोजन चोख असल्यामुळे गाळपाचा वेग समाधानकारक आहे. हेही वाचा : कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारी परदेशी भाजीपाला शेती; जाणून घ्या सविस्तर
82 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 03:14 AM
डिसेंबरमध्ये हळदीचे दर वाढल्याने शेतकरी अडचणीत

डिसेंबरमध्ये हळदीचे दर वाढल्याने शेतकरी अडचणीत

शेतकऱ्यांचे 'पिवळे सोने' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीने यंदाबाजारपेठेतमोठी उलथापालथ घडवून आणली. गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेल्या हळदीच्या दरात डिसेंबर महिना उजाडताच सुधारणा पाहायला मिळाली. मात्र, जेव्हा शेतकऱ्यांकडे माल होता तेव्हा भाव दबावात होते आणि आता भाव वधारले आहेत, तेव्हा बहुतांश शेतकऱ्यांकडे हळद शिल्लक नाही. परिणामी, या भाववाढीचा खरा लाभ घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांऐवजी साठा करून ठेवलेल्या व्यापाऱ्यांना होताना दिसत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात सुरुवातीला हळदीला क्विंटलमागे एक ते दोन हजार रुपये कमी भाव मिळाला. एप्रिल आणि में महिन्याच्या मुख्य हंगामात हळदीला सरासरी १४ हजार रुपये प्रति क्विंटल भाव होता. जून आणि जुलैमध्ये या भावात किंचित घसरण पाहायला मिळाली. तर ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यांच्या काळात भाव स्थिर राहिले. मात्र, डिसेंबर महिना सुरू होताचबाजारातीलचित्र बदलण्यास सुरुवात झाली. आवक मंदावताच हळदीला सोन्याची झळाळी मिळाली असून, सध्या हे दर सरासरी १६ हजार रुपयांच्या घरात पोहोचले आहेत.हिंगोलीकृषी उत्पन्न बाजार समितीचे संत नामदेव मार्केट यार्ड हे हळदीसाठी प्रसिद्ध असून, येथे मराठवाड्यासह विदर्भातून मोठ्या प्रमाणात हळदीची आवक होते. मुख्य हंगामात या ठिकाणी दररोज सरासरी ४ ते ५ हजार क्विंटलची आवक असते. मात्र, सध्या हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने ही आवक घटून केवळ एक ते दीड हजार क्विंटलवर आली आहे. आवक कमी झाल्यामुळेच दरात वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. तर दुसरीकडे अगोदरच हळद विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे हात मात्र रिकामेच आहेत. नव्या हळदीला समाधानकारक भाव मिळावा • नवी हळद साधारणतः १५ मार्चनंतर बाजारात येण्याची शक्यता आहे. सध्याची बाजारपेठेतील तेजी पाहता, येणाऱ्या नवीन हंगामात हळदीला समाधानकारक भाय मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. • जर हीच दरवाढ कायम राहिली, तर पुढील वर्षी शेतकऱ्यांना चांगला आर्थिक नफा मिळू शकतो. मात्र, सध्याच्या स्थितीत 'भाव असून माल नाही' अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. हंगाम संपल्यावरच भाव का वाढतात? जेव्हा शेतकऱ्यांकडे शेतमाल उपलब्ध होतो, हंगाम असतो, तेव्हा भाव पडते असतात आणि माल व्यापाऱ्यांच्या गोदामात गेला की भाव वाढतात, हे कोडे शेतकऱ्यांना सुटत नाही. बाजारपेठेच्या या विचित्र गणितामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीही पुढे येत असते. आर्थिक निकडीमुळे शेतकऱ्यांना हंगामातच हळद विक्री करावी लागते. परंतु, त्यावेळी भाव मात्र समाधानकारक मिळत नसल्याचा अनुभव नेहमीचाच असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ३५,३८४ हेक्टरवर हळद लागवड नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन गत दोन-तीन वर्षापासून पडता भाव आणि उत्पादनातील घट यामुळे परवडत नसल्याचे चित्र आहे. तसेच तूर, कापसासह इतर पिकांच्या तुलनेत हळद परवडणारे पीक ठरत असल्यामुळे गत तीन-चार वर्षांपासून जिल्ह्यातीलशेतकरीहळदीकडे वळला आहे. यंदाच्या हंगामात (२०२५-२६) जिल्ह्यात ३५ हजार ३८४ हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड झाली आहे. सन २०२५-२६ मधील हळद लागवड (क्षेत्र हेक्टरमध्ये) हेही वाचा : तूर शेती ठरतेय शेतकऱ्यांना फायद्याची; पारंपरिक पिकांना फाटा देत तयार होतंय तूर हब
53 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 02:19 AM
आर. सी. बी. ने न्यू जर्सीचे अनावरण केले आणि आयपीएलचे विजेतेपद कायम राखण्याचे उद्दिष्ट ठेवले

आर. सी. बी. ने न्यू जर्सीचे अनावरण केले आणि आयपीएलचे विजेतेपद कायम राखण्याचे उद्दिष्ट ठेवले

RCB Jercsey change, new look video: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) गेल्या वर्षभरापासून मैदानावर दमदार कामगिरी करताना दिसत आहे. गेल्या वर्षी, फ्रँचायझीने पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद जिंकले. दरम्यान, WPL 2026 हंगामात, RCB महिला संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे आणि दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. यामुळे महिला संघाला दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याची संधी मिळाली आहे. तशातच RCB पुरुष संघ IPL 2026 स्पर्धेसाठी सज्ज होत आहे. जेतेपद आपल्याकडे कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. याचदरम्यान, RCB फ्रँचायझीने नवीन हंगामासाठी नवीन जर्सी लाँच केली आहे, ज्यात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आरसीबीची नवीन जर्सी लाँच २६ मार्चपासून सुरू होणाऱ्या IPL 2026साठी RCB संघ पहिल्यांदाच गतविजेता संघ म्हणून स्पर्धेत उतरणार आहे. नवीन हंगामासाठी बेंगळुरूच्या संघातील बहुतांश खेळाडू कायम आहेत. पण ते सर्व खेळाडू एका नवीन लूकमध्ये दिसतील. हा नवीन लूक आरसीबीच्या नवीन जर्सीमध्ये दिसून येईल. आरसीबीने सोशल मीडिया व्हिडिओ पोस्टमध्ये त्यांच्या जर्सीचा लूक रिव्हिल केला आहे. आरसीबीचे खेळाडू यंदा त्यांची त्यांची नवी जर्सी परिधान करतील ज्यात छातीजवळ लोगोच्या वरच्या बाजूला एक सोनेरी स्टार मार्क करण्यात आला आहे. या नवीन जर्सीमध्ये आरसीबीच्या लोगोच्या वर असलेला एक स्टार म्हणजे त्यांच्या पहिल्या विजेतेपदाचे प्रतीक आहे. ------------- FIRST STAR IN RCB MEN'S IPL JERSEY 🔥pic.twitter.com/Wy9qx9Mve1 दरम्यान, RCB ने गेल्या वर्षी IPLचे विजेतेपद जिंकल्यानंतर एका विजयी रॅलीचे आयोजन केले होते. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सत्कार समारंभ होणार होता आणि त्याचवेळी एक विजयी रॅली निघणार होती. पण RCBने या विजयी रॅलीबाबत पोलिसांनी आयत्यावेळी सांगितले, त्यामुळे त्यांना गर्दी नियोजनाला पुरेसा वेळ मिळाला नाही. परिणामी चेंगराचेंगरीमध्ये अनेक चाहत्यांना आपला जीव गमवावा लागला.
50 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 01:56 AM
हवाई दळणवळणाचा समावेश करण्यासाठी मुंबईच्या किनारी रस्ते प्रकल्पाचा विस्तार

हवाई दळणवळणाचा समावेश करण्यासाठी मुंबईच्या किनारी रस्ते प्रकल्पाचा विस्तार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई कोस्टलरोडमुळे मरिन ड्राइव्ह ते वांद्रेपर्यंतचा प्रवास वेगवान झाल्यानंतर येथे हवाई वाहतुकीची जोड देत मल्टीमॉडेल कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे हेलिपॅड बांधण्यासाठी मागविलेल्या निविदेला रेमंड्स आणि जिंदाल या कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. अटी-शर्तींची पूर्तता आणि छाननीअंती कंत्राटदाराची निवड केली जाईल. या हेलिपॅडची उभारणी, संचालन आणि देखभालही या कंत्राटदारामार्फत केली जाईल. मुंबईचेदक्षिण टोक असलेल्या नरिमन पॉइंटपासून उत्तर टोकाकडील दहिसरपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प टप्प्याटप्प्याने बांधण्यात येत आहे. त्यातील शामलदास गांधी मार्ग ते वरळी-वांद्रे सी लिंकच्या टोकापर्यंत १०.५८ किलोमीटरचा पहिला टप्पा वाहतुकीस खुला केला आहे. आता कोस्टल रोडच्या वाहतुकीच्या प्रवासाला हवाई वाहतुकीचीही जोड देऊन मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट उभारण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला. मुंबईत अनेक मोठी रुग्णालये असून, अनेकदा रुग्णांची ने-आण करण्यासाठी एअर ॲम्ब्युलन्सचा वापर केला जातो. मात्र, सध्या विमानतळावर या ॲम्ब्युलन्स उतरवून रुग्णांना तिथेपर्यंत रुग्णालयापर्यंत न्यावे लागते. त्यामुळे दक्षिण मुंबईत हेलिपॅड झाल्यास रुग्णांना मोठा दिलासा मिळेल. एअर ॲम्ब्युलन्स : रुग्णांना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी या हेलिपॅडचा वापर प्राधान्याने केला जाईल.सुरक्षा यंत्रणा : किनारपट्टीची सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी कोस्टल पोलिस व सुरक्षा दलांना हे केंद्र फायदेशीर ठरेल.अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी : सध्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी महालक्ष्मी रेसकोर्सवरील हेलिपॅड वापरले जाते. मात्र, कोस्टल रोडवरील हेलिपॅडमुळे तेथील ताण कमी होईल.डीजीसीए मानांकन : नागरी विमानचालन महासंचालनालयाच्या सर्व सुरक्षा निकषांनुसार हे हेलिपॅड सज्ज असेल. हेलिपॅड चालवण्याचे कंत्राट सुरुवातीला पाच वर्षांच्या कालावधीसाठी दिले जाण्याची शक्यता आहे. कंत्राटदाराला ठरावीक मासिक परवाना शुल्क आणि प्रत्येक लँडिंगमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही हिस्सा द्यावा लागेल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
24 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 01:46 AM
जन्म आणि मृत्यू नोंदींबाबत जनजागृती करण्यासाठी मोहीम सुरू

जन्म आणि मृत्यू नोंदींबाबत जनजागृती करण्यासाठी मोहीम सुरू

ही प्रक्रिया राबवताना कुठेही निष्काळजीपणा होणार नाही याची दक्षता घेऊन मोहीम स्वरूपात हे काम तडीस न्यावे. नागरिकांना जन्म-मृत्यू नोंदीची कोणतीही माहिती मिळवण्यासाठी ‌‘104‌’ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध असल्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. फारुख देसाई, ग््राामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले तसेच सर्व गटविकास अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
2 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 01:45 AM
समाज सेवा विभागाच्या अधीक्षकांनी व्हर्जिन मातांना भावनिक पाठबळ दिले

समाज सेवा विभागाच्या अधीक्षकांनी व्हर्जिन मातांना भावनिक पाठबळ दिले

समाजसेवा अधीक्षक विभागाचा आधार कुमारी मातांना सीपीआरच्या समाजसेवा अधीक्षक विभागाचा मोठा मानसिक आधार मिळत आहे. येथे दाखल झाल्यापासून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हा विभाग संबंधित कुमारी मातेला आणि त्यांच्या कुटुंबाला मानसिक आधार देत असतो.
5 shares
😊
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 01:42 AM
अद्वितीय भौगोलिक आधार क्रमांक निर्मितीसाठी भूखंडांचे एकत्रीकरण

अद्वितीय भौगोलिक आधार क्रमांक निर्मितीसाठी भूखंडांचे एकत्रीकरण

अशा सर्व भूभागांचे मोजणी करून नकाशा व अधिकार अभिलेख यांचे सलग्नीकरण केले जाणार आहे. त्याद्वारे प्रत्येक भूभागास भू-आधार क्रमांक (अल्पीन) तयार केला जाणार आहे. त्याद्वारे कृषिविषयक योजना तसेच शेतकऱ्याऱ्यांना वित्त पुरवठा करण्यासंबंधी योजना व पीक सर्वेक्षण इत्यादी योजना यशस्वीरीत्या राबविण्यासाठी ग््राामीण भागातील शेत जमिनीच्या भूभागांचे धारक, खाते निहाय पोटहिस्स्यांची मोजणी करून पोटहिस्सा भूभागांची सीमा व क्षेत्र निश्चित करून त्याद्वारे अधिकार अभिलेख व नकाशे तंतोतत केले जाणार आहेत.
72 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 01:33 AM
भारताच्या चांदीच्या व्यवसायाला अभूतपूर्व दरवाढीचा फटका

भारताच्या चांदीच्या व्यवसायाला अभूतपूर्व दरवाढीचा फटका

एक ते दीड महिन्याच्या कालावधीत एक लाख रुपयांच्या जवळपास खेळत असणाऱ्या चांदी दराने ‌‘न भूतो, न भविष्यती‌’ असा तब्बल 4 लाखांचा टप्पा ओलांडला होता. सातत्याने होत असलेल्या भरघोस दरवाढीने देशातील बाजारपेठेवरील दागिन्यांच्या मागणीत मोठ्याप्रमाणात घट झाली होती. परिणामी, चांदी खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. यापुढील कालावधीत चांदी व्यवसायाचे भविष्य अंधःकारमय झाल्याने हुपरी व परिसरातील चांदी व्यावसायिक अनेक प्रकारच्या विवंचनेत सापडला होता. सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असणाऱ्या येथील चांदी व्यवसायाचे कंबरडे मोडणारी ही दरवाढ ठरली होती. संपूर्ण चांदी व्यवसायाच्या जणू मुळावरच दरवाढ उठल्याने सर्वच व्यावसायिकांनी आपले व्यवहार काही काळासाठी बंद ठेवणे पसंद केले आहेत.
93 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 4, 2026, 01:16 AM
बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा उदय आणि बेपत्ता होणे

बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा उदय आणि बेपत्ता होणे

बॉलिवूडमध्ये अनेक सौंदर्यवती प्रेक्षकांना घायाळ करतात. ज्यांची जादू कित्येक वर्ष प्रेक्षकांवरुन उतरत नाही. अशीच एक अभिनेत्री म्हणजे उर्मिला मातोंडकर . सुरुवातीच्या काळात तिने बॉलिवूडला आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षक, निर्माते दिग्दर्शक यांची मन जिंकली पण अचानक ती एकाएकी गायब झाली.उर्मिलाने वयाच्या तिसऱ्या वर्षी बाल कलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये एण्ट्री घेतली. पुढे तिने 1991 मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.उर्मिला मातोंडकरपहिल्यांदा 1977 मध्ये पडद्यावर दिसली, तेव्हा ती तीन वर्षांची होती. तिने "कर्मा" चित्रपटात काम केले आणि नंतर शेखर कपूर यांच्या "मासूम" मध्ये काम केले, या सिनेमांतल्या तिच्या निरागसतेचे कौतुक झाले. पुढे ती लीड रोल मध्ये दिसली. उर्मिलाने 1991 मध्ये "नरसिंहा" चित्रपटात काम केले, पण निर्माते राम गोपाल वर्मा यांच्या रंगीलाने तिच्या करिअरला वेगळी दिशा दिली.Ajit Pawar : अजित पवारांवर बायोपिक काढला तर कोणत्या अभिनेत्यानं साकारावी भूमिका; ही होती दादांची इच्छाउर्मिलाच्या कानशिलात मारलं गेलंया चित्रपटानंतर राम गोपाल वर्मा आणि उर्मिला यांनी "दौड," "सत्या," आणि "कौन" यासह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यांच्या एकत्र कामामुळे त्यांच्यात जवळीक वाढत गेली. पण, त्यावेळी चित्रपट निर्मात्याचे रत्नाशी लग्न झाले होते. पुढे, राम गोपाल वर्मा आणि उर्मिला डेट करत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. या नात्याचा अभिनेत्रीच्या व्यावसायिक जीवनावर मोठा परिणाम झाला. शिवाय काही ठिकाणी असेही म्हटले गेले की राम गोपाल वर्माच्या पत्नीने अभिनेत्रीच्या कानाखाली मारली होती.Rohit Shetty च्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; गेल्या दोन महिन्यांपूर्वीच रचलेला कट, रेकी झालेली अन्...राम गोपाल वर्मा यांचा घटस्फोटउर्मिला आणि राम गोपाल वर्मा यांच्या नात्याचा चित्रपट निर्मात्याच्या वैवाहिक जीवनावर खोलवर परिणाम झाला. असे म्हटले जाते की राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या पत्नीसोबतचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांनी कधीही याबद्दल उघडपणे काही म्हटले नाही. त्यांच्या आत्मचरित्रात, चित्रपट निर्मात्याने त्यांच्या घटस्फोटाचे कारण स्पष्ट केले, असे म्हटले आहे की गझल हे त्यांच्या घटस्फोटाचे कारण होते, कारण त्यांच्या पत्नीला गझल ऐकायला आवडत होती आणि त्यांना इलैयाराजाची गाणी खूप आवडत होती. ते म्हणाले, "गझल हे माझ्या घटस्फोटाचे एक कारण आहे. माझ्या पत्नीला गझल आवडतात आणि मला इलैयाराजाची गाणी ऐकायला खूप आवडायची. ती रात्री गझल वाजवायची, जे मला आवडत नव्हते."उर्मिला मातोंडकर यांच्याशी दिलखुलास गप्पाउर्मिलाबद्दल काय म्हणालेले निर्मातेत्याच आत्मचरित्रात, चित्रपट निर्मात्याने असेही लिहिले आहे की चित्रपटांमध्ये प्रवेश केल्यानंतर, त्यांना प्रभावित करणारी पहिली मुलगी उर्मिला मातोंडकर होती. पण जेव्हा तिच्या कारकिर्दीचा विचार केला जातो तेव्हा राम गोपाल वर्माचे चित्रपट कलाकारांशी संबंध चांगले नव्हते आणि त्यावेळी उर्मिलाचे नाव त्यांच्याशी जोडले गेले होते, ज्यामुळे अभिनेत्रीला चित्रपटांच्या ऑफर कमी येऊ लागल्या. एक काळ असा होता जेव्हा उर्मिलाकडे वर्षानुवर्षे एकही चित्रपट नव्हता. तिच्या वैयक्तिक आयुष्यात, उर्मिलाने 2016 मध्ये मोहसिन अख्तर मीरशी लग्न केले. पण गेल्यावर्षी त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्याही येऊ लागल्या होत्या.
30 shares
😊
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 01:16 AM
रॉक्स सिटीमध्ये अमली पदार्थांचा प्रचंड स्फोटः व्यसनाधीनांना मारहाण, सार्वजनिकरित्या कपडे उतरवले

रॉक्स सिटीमध्ये अमली पदार्थांचा प्रचंड स्फोटः व्यसनाधीनांना मारहाण, सार्वजनिकरित्या कपडे उतरवले

शहरातील उद्याने, क्रीडांगणे, मोकळ्या जागा, पडिक इमारतींमध्ये नशेखोरांचा मुक्त वावर होता. याठिकाणी रात्रभर नशेखोरांचा धिंगाणा सुरू असायचा. विश्रामबागमधील पडिक इमारतींसह नशेखोरांच्या अड्ड्यांवर पोलिसांनी धाव घेतली. नशेखोरांना चोपत रस्त्यावर आणले. नागरिकांसमोर त्यांना उठा-बशा काढायला लावल्या. पळ काढणाऱ्या नशेखोरांचा पाठलाग करत त्यांना चोप देण्यात आला. यानंतर कल्पद्रुम क्रीडांगण परिसरात पोलिसांचा मोर्चा वळला. त्याठिकाणी तळीरामांना पोलिसांनी पाठलाग करत खाक्या दाखविला.
52 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 01:14 AM
प्रभाग क्रमांक 16: शहरातील क्रियाकलापांचे मध्यवर्ती केंद्र

प्रभाग क्रमांक 16: शहरातील क्रियाकलापांचे मध्यवर्ती केंद्र

प्रभाग क्रमांक 16 हा शहरातील मध्यवर्ती प्रभाग असून येथे 40 हून अधिक गल्ल्या, मुख्य रस्ते, फुटपाथ, चौक, बाजारपेठा, मच्छी व मटण मार्केट, शासकीय कार्यालये, शाळा, कॉलेज, एमएसईबी कार्यालय, उद्याने अशा अनेक वर्दळीच्या ठिकाणांचा समावेश आहे. त्यामुळे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे नगरसेविका शिंदे यांनी यावेळी सांगितले.
68 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 01:01 AM
अजित पवारांची अस्थी सातारा येथे अंत्यसंस्काराच्या उपस्थितीच्या मुद्द्यांनंतर दिसली

अजित पवारांची अस्थी सातारा येथे अंत्यसंस्काराच्या उपस्थितीच्या मुद्द्यांनंतर दिसली

मात्र, अनेकांना बारामतीला जाता आले नव्हते, या लोकांच्या भावनांचा विचार करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अजितदादांचा अस्थिकलश सातारा येथे आणण्यात आला. मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 3.30 यावेळेत हा अस्थिकलश दर्शनासाठी कार्यालयात ठेवण्यात आला होता.
1 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 12:59 AM
भारताच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने रुग्णालय भरपाई योजनेसाठी निधी मंजूर केला

भारताच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने रुग्णालय भरपाई योजनेसाठी निधी मंजूर केला

सार्वजनिक आरोग्य विभागाने या योजनेंतर्गत असलेल्या रूग्णालयांचे दावे निकाली काढण्यासाठी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पित केलेल्या तरतूदीनुसार 1 हजार 162 कोटी 8 लाख 63 हजार 321 रूपये इतका निधी राज्य आरोग्य हमी आरोग्य हमी सोसायटीकडे देण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून दरवर्षी हजारो रूग्ण या योजनेतून उपचार घेतात. या योजनेतून सरकारच्यावतीने खासगी, सार्वजनिक रूग्णालयांना उपचारांच्या परतावा मिळत असतो.
34 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 12:58 AM
अजितदादा यांच्या अस्थी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि गावांपर्यंत पोहोचल्या, शोककळा पसरली

अजितदादा यांच्या अस्थी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि गावांपर्यंत पोहोचल्या, शोककळा पसरली

अजितदादा यांच्या अस्थी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत व गावागावात पोहचल्या असून त्या अस्थींचे दर्शन घेताना दादांच्या हितचिंतकांचा शोक अनावर झाला. त्यांचे सर्वांवर असलेले नितांत प्रेम, असाच प्रेमाचा ओलावा राजेंद्र चोरगे यांना कर्मधर्म सहयोगाने लाभला म्हणून सातारची स्मशानभूमी मुहूर्त रुपात साकारली. अन्यथा अनेक अडचणींवर मात करताना चोरगे यांना मोठी कसरत करावी लागली असती. पण अजितदादा यांचा चोरगेंवरचा दांडगा विश्वास या समाजोपयोगी कामात कामी आला.
46 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 12:56 AM
निवडणुकांमध्ये मानवतेचा उलगडाः कुटुंबाचे ट्रम्प यांच्या राजकारणाशी संबंध

निवडणुकांमध्ये मानवतेचा उलगडाः कुटुंबाचे ट्रम्प यांच्या राजकारणाशी संबंध

प्रचारात आता आपला माणूस एका मतासाठी सुरू असलेली धावपळ ही प्रचारापुरती मर्यादित न राहता, विसरलेली आपुलकी, तुटलेले संवाद आणि दुरावलेली नाती पुन्हा जोडणारी ठरत आहे.कित्येक वर्षांपासून न भेटलेले नातेवाईक या निमित्ताने पुन्हा घराच्या ओसरीवर येऊन बसत आहेत. कामानिमित्त परगावी गेलेले, शेतात राबणारे तसेच रोजीरोटीसाठी गावाबाहेर स्थायिक झालेले आप्तस्वकीयही गावाकडे परतत आहेत. राजकारणाची चर्चा नंतर होते; आधी तब्येतीची, शेती आणि लेकराबाळांची चौकशी होत आहे. ‌‘आपलाच माणूस‌’ हा शब्द कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे काही कुटुंबांत मतभेद असले, तरी नात्यांची दोरी पूर्णपणे तुटलेली नाही, हे निवडणुकीतून स्पष्ट होत आहे. मतदार आता उमेदवाराकडे नेता म्हणून नव्हे, तर अडचणीच्या काळात सोबत राहणारा माणूस म्हणून पाहू लागले आहेत. लढत सत्तेसाठीची न राहता संवेदनशीलतेची बनली असून माणुसकीची आठवण करून देणारीही ठरत आहे.
77 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 12:50 AM
अनेक वर्षांच्या विलंबानंतर हनबरवाडी-धनगरवाडी सिंचन योजनेचे पुनरुज्जीवन

अनेक वर्षांच्या विलंबानंतर हनबरवाडी-धनगरवाडी सिंचन योजनेचे पुनरुज्जीवन

हणबरवाडी -धनगरवाडी उपसा सिंचन योजना गेली अनेक वर्षे रखडलेली होती. मसूर पूर्व विभागातील शेतकरी आपल्या शेतामध्ये पाणी कधी येणार या प्रतिक्षेत गेली अनेक वर्षे होते. परंतु आ.मनोजदादा घोरपडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व युती शासनाच्या माध्यमातून या योजनेला गती मिळाली. त्यामुळे हणबरवाडी व धनगरवाडी टप्पा क्र.1चे पाणी गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पोहचले होते. टप्पा क्रमांक 2 चे काम प्रगतीपथावर असतानाच या टप्प्याचे काम जानेवारी अखेर पूर्ण करण्याचे आश्वासन आ. घोरपडे यांनी दिले होते.
58 shares
😊
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 12:45 AM
मान तालुक्यातील सकारात्मक बदल आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भाजप नेत्याचा भर

मान तालुक्यातील सकारात्मक बदल आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भाजप नेत्याचा भर

माण तालुक्यातील कुकुडवाड गटातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री जयकुमार गोरे पुढे म्हणाले, आपल्या माण-खटाव मतदारसंघातील आपले आमदार आज राज्यात मंत्री म्हणून काम करत आहेत. मतदारसंघातील प्रत्येक गावात पायाभूत सुविधा मजबूत होण्यापासून पाणीयोजनांची हजारो कोटींची कामे मार्गी लागत आहेत. ग्रीन कॉरिडॉर एमआयडीसी, शक्तीपीठ महामार्गासारखी कधी स्वप्नात आली नाहीत अशी कामे साकारणार असल्याने जनतेचा आमच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. इतकी चांगली कामे होत असताना आपण विरोध करणे योग्य नाही, अशा भावना अनेकांच्या आहेत. त्या भावनेतूनच भाजपकडे येणाऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे. भाजपमध्ये येणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जात आहे. सर्वांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेतले जात आहे.
20 shares
😊
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 12:44 AM
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झालेल्या विमान अपघाताची डी. जी. सी. ए. ची चौकशी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झालेल्या विमान अपघाताची डी. जी. सी. ए. ची चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: उपमुख्यमंत्रीअजित पवारयांच्या विमान अपघाताची चौकशी डीजीसीए करणार आहे. चौकशीसाठी ‘डीजीसीए’ने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती आपला प्राथमिक चौकशी अहवाल १५ फेब्रुवारीपर्यंत सादर करणार आहे.अजित पवारयांना विमान पुरवणाऱ्या ‘व्हीएसआर व्हेन्चर्स’ या कंपनीचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश डीजीसीएने दिले आहेत. या विशेष ऑडिट समितीमध्ये डीजीसीएचे डेप्युटी डायरेक्टर जनरल आर.के. आनंद यांच्या नेतृत्वाखाली डीजीसीएच्या एअर सेफ्टी विभागाचे डेप्युटी डायरेक्टर जनरल पथिक वाघेला, एअरवर्दीनेस विभागाचे डेप्युटी डायरेक्टर जनरल सुशील मलिक, एअर सेफ्टी विभागाचे सहायक संचालक शिव कुमार जदाला आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अन्य चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्रीसुनेत्रा पवारयांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी हा निर्णय घेतला. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद रिक्त झाले होते.
18 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 12:43 AM
गळती होत असलेल्या पाईपलाईनमुळे सांगलीतील रहिवाशांची कारवाईची मागणी

गळती होत असलेल्या पाईपलाईनमुळे सांगलीतील रहिवाशांची कारवाईची मागणी

सांगली :सांगली - हरिपूर रस्त्याचे काम सुरू असताना पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली असून पाण्याची गळती होऊन पाणी रस्त्यावर आले आहे. ही गळती तातडीने थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी महापालिकेकडे केली होती. महापालिकेने गळती काढण्यासाठी रस्त्यावर भलामोठा खड्डा काढला. परंतु सध्या महापालिकेने गळतीही काढली नाही अन्‌‍ खड्डाही मुजवला नाही. त्यामुळे सध्या भागात पिण्यासाठी पाणीही नाही अन्‌‍ रस्त्यावर अडथळाही निर्माण झालेला आहे.
2 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 12:40 AM
विकासाच्या प्रयत्नांमुळे भाजपची मतांची टक्केवारी वाढलीः ना शिवेंद्रराजे

विकासाच्या प्रयत्नांमुळे भाजपची मतांची टक्केवारी वाढलीः ना शिवेंद्रराजे

ना. शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, जावली तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी-वस्तीमध्ये विकास पोहोचवला आहे. रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य या सगळ्या क्षेत्रात सातत्याने काम केलं. म्हणूनच प्रत्येक निवडणुकीत भाजपचं मताधिक्य वाढतच आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही मतदारांनी भाजपाला विकासकामांची पोहोचपावती द्यावी.
28 shares
😊
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 12:38 AM
रत्नागिरी बायपास रोडवर कारचा अपघात

रत्नागिरी बायपास रोडवर कारचा अपघात

रत्नागिरी ःभरधाव दुचाकीसमोर अचानकपणे कुत्रा आडवा आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला. अपघाताची ही घटना रविवारी, 1 फेब्रुवारी रोजी रात्री 9.30 वा. सुमारास फणसोप हायस्कूलच्या मागे बायपास रोडवर घडली. दुचाकीवरून तिघेजण जात असताना यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालकाचा, तसेच त्याच्या मागे बसलेला त्याचा सख्ख्या भावाचा मृत्यू झाला असून, तिसरा स्वार जखमी झाला आहे.
68 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 12:35 AM
ऊस लागवड करताना भारतीय महिलेला सापडले सोन्याचे प्राचीन नाणे

ऊस लागवड करताना भारतीय महिलेला सापडले सोन्याचे प्राचीन नाणे

शिरोली दुमाला :कसबा बीड (ता. करवीर) येथील महिला सुनीता सरदार माने यांना कोगे पाणंद रोडला संजय पाटील यांच्या शेतात उसाची लावण करत असताना सोन्याची मुद्रा म्हणजेच बेडा सापडला. यावर त्रिशुळाचे अंकण असून बेड्याचा व्यास 8 मि.मि., तर वजन 0.74 ग््रॉम इतके आहे.
55 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 12:35 AM
अर्थसंकल्पातील पारदर्शकतेवर ग्रामीण विकास प्रमुखांची टीका आणि विकास प्रकल्पांच्या वेगवान प्रगतीचे आश्वासन

अर्थसंकल्पातील पारदर्शकतेवर ग्रामीण विकास प्रमुखांची टीका आणि विकास प्रकल्पांच्या वेगवान प्रगतीचे आश्वासन

ना. गोरे म्हणाले, तुमच्याकडे आमदार, खासदार, मंत्री, बँक अध्यक्ष आणि साखर कारखान्यांचे चेअरमन आहेत. तरीही उमेदवार आमच्याकडून घ्यावे लागतात, हे तुमचे अपयश नाही तर काय? ग्रामपंचायत कार्यालये, अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी, मंदिर विकास, घरकुल योजना, विहिरी, पाणीपुरवठा, वीज डीपी आणि पर्यटन विकासाची कामे ग्रामविकास खात्यातून मंजूर होतात. माझ्या खात्याचा 54 हजार कोटींचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे बावधनच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याची ताकद माझ्याकडे आहे. बावधन-हुमगाव रस्त्याचा विकास, मंदिरांना ‌‘ब वर्ग‌’ पर्यटन दर्जा आणि मांढरदेव परिसराच्या पर्यटन विकासासाठी गती देणार आहे.
9 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 12:33 AM
रत्नागिरीच्या तळागाळातील विकासावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भर

रत्नागिरीच्या तळागाळातील विकासावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भर

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून विरोधकांचा समाचार घेत विकासाचा नवा संकल्प मांडला. सभेच्या सुरुवातीला ढोल-ताशांच्या गजरात आणि भगव्या झेंड्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री शिंदे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना ते म्हणाले की, रत्नागिरी ही क्रांतीकारकांची आणि कष्टकऱ्यांची भूमी आहे. या मातीने नेहमीच सत्याला आणि विकासाला साथ दिली आहे. आज साळवी स्टॉप येथे झालेली ही गर्दी पाहता, येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचेच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही विकासाची मुख्य केंद्रे असून, तिथे सक्षम नेतृत्व असणे गरजेचे आहे. आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचला. ते म्हणाले की, आमचे सरकार हे फेसबुकवरून चालणारे नसून प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करणारे सरकार आहे. आम्ही सर्वसामान्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन निर्णय घेतो. कोकणातील काजू-आंबा उत्पादक शेतकरी असो वा मच्छीमार बांधव, प्रत्येकाच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे आहे. रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासोबतच ग्रामीण भागातील रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत सुविधांना आम्ही प्राधान्य दिले आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता कधीही पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
25 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 12:32 AM
विकास प्रकल्पांच्या बैठकीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

विकास प्रकल्पांच्या बैठकीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

या बैठकीला उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत (दूरदृश्य प्रणालीद्वारे), मुख्य सचिव राजेश अग््रावाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासु, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांच्यासह सर्व संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) उपस्थित होते.
93 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 12:30 AM
भाजप निवडणुकांपेक्षा विकासाला प्राधान्य देतेः उदयनराजे

भाजप निवडणुकांपेक्षा विकासाला प्राधान्य देतेः उदयनराजे

खा. उदयनराजे पुढे म्हणाले, भाजप हा केवळ निवडणुकीपुरता दिसणारा पक्ष नाही, तर काम करणारा, उत्तरदायित्व स्वीकारणारा आणि विकासाला प्राधान्य देणारा पक्ष आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती या ग्रामीण विकासाच्या कणा आहेत. या संस्थांच्या माध्यमातून गावागावांतील रस्ते, पाणी, आरोग्य सेवा, शाळा, अंगणवाडी, स्वच्छता आणि शेतीपूरक सुविधा मजबूत करता येतात. ही कामे वेगाने आणि पारदर्शकपणे करायची असतील तर या ठिकाणी भाजपचे सक्षम आणि विकासाभिमुख प्रतिनिधी निवडून येणे अत्यंत गरजेचे आहे.
58 shares
😊
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 4, 2026, 12:30 AM
बी. एस. एन. एल. ने दीर्घकालीन वैधता असलेल्या वापरकर्त्यांसाठी दोन वार्षिक प्रीपेड योजना सादर केल्या

बी. एस. एन. एल. ने दीर्घकालीन वैधता असलेल्या वापरकर्त्यांसाठी दोन वार्षिक प्रीपेड योजना सादर केल्या

तुम्ही BSNL चे युजर्स असाल तर ही बातमी नक्की वाचा. BSNL सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी आपल्या लाखो युजर्सना दोन जबरदस्त वार्षिक प्रीपेड प्लॅन देत आहे. या प्लॅनमध्ये बेसिक बेनिफिट्ससह लॉन्ग टर्म व्हॅलिडिटी मिळत आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये वर्षभर सेवा दिली जाते, ज्यामुळे ज्यांना कमी पैशात दररोज डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज SMS हवा आहे त्यांच्यासाठी ते सर्वोत्तम पर्याय आहेत. यापैकी एक प्लॅन संतुलित वापरावर लक्ष केंद्रित करते, तर दुसरी अशा युजर्ससाठी आहे ज्यांना दररोज अधिक डेटाची आवश्यकता आहे. या दोन प्लॅनबद्दल विस्ताराने जाणून घेऊया. चला तर मग जाणून घेऊया.BSNL चा 2,626 रुपयांचा वार्षिक प्लॅनBSNL ने काही काळापूर्वी हा प्लॅन सादर केला आहे. या फोनची वैधता 365 दिवसांची असून त्याची किंमत 2,626 रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2.6 GB हाय-स्पीड डेटा मिळतो, जो वेब ब्राउझिंग, व्हिडिओ स्ट्रीमिंग, सोशल मीडिया ब्राउझिंग आणि ऑनलाइन चॅटिंग यासारख्या वापरासाठी पुरेसा आहे.डेटा बेनिफिट्स व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये भारतातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस ऍक्सेस देखील दिले जाते. यासह,युजर्स कोणत्याही अतिरिक्तशुल्काशिवाय कॉल करण्यास सक्षम असतील, मग ते लोकल कॉल असो किंवा राष्ट्रीय कॉल. एवढेच नाही तर या प्लॅनमध्ये संपूर्ण वैधता कालावधीत दररोज 100 SMS देखील दिले जातात.BSNL चा 2,799 रुपयांचा वार्षिक प्लॅनBSNL च्या या प्लॅनची किंमत 2,799 रुपयांपासून सुरू होते जिथे तुम्हाला 365 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये युजर्संना दररोज 3 GB डेटा दिला जातो. तसेच या प्लॅनमध्ये युजर्संना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. यासर्व गोष्टी लक्षात घेऊनअसे म्हणता येईल की, ज्यांना जास्त डेटाची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन सर्वोत्तम पर्याय आहे.लक्षात घ्या की BSNL चा 2,626 रुपयांचा प्लॅन केवळ मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे आणि 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत रिचार्ज केला जाऊ शकतो. तर, 2,799 रुपयांचा प्लॅन किती काळ लाइव्ह आहे याची कोणतीही माहिती नाही.BSNL च्या 99 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळत आहे. या BSNL च्या या प्लॅनची वैधता 14 दिवसांची आहे. यात प्लॅनमध्ये केवळ 50MB हाय-स्पीड 4G डेटा मिळतो आणि त्यानंतर स्पीड 40kbps पर्यंत जातो. BSNL चा प्लॅन जास्त डेटा वापरणाऱ्यांसाठी नाही, असे म्हणणे योग्य ठरेल.
100 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 12:20 AM
ग्रॅमी पुरस्कार जागतिक सर्जनशीलता आणि विविधता साजरे करतात

ग्रॅमी पुरस्कार जागतिक सर्जनशीलता आणि विविधता साजरे करतात

हा केवळ पुरस्कारांचा कार्यक्रम न राहता, मानवी सर्जनशीलतेचा गौरव करणारा सोहळा ठरला. पुरस्कारांच्या वितरणामध्ये यावर्षी विविधता आणि समावेशकतेला मोठे प्राधान्य दिल्याचे दिसून आले. आफ्रिकन आणि आशियाई कलाकारांच्या नामांकनांची संख्या लक्षणीय होती, ज्यामुळे ग्रॅमी आता केवळ पाश्चिमात्य संगीतापुरते मर्यादित न राहता खऱ्या अर्थाने ‌‘जागतिक‌’ झाल्याचे प्रत्ययाला आले. रेड कार्पेटवरील फॅशन असो वा मंचावरील आक्रमक सादरीकरण, प्रत्येक गोष्टीतून एक नवीन ऊर्जा प्रवाहित होत होती.
87 shares
😊
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 12:09 AM
भारताची शुल्क कपातः व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेला चालना

भारताची शुल्क कपातः व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेला चालना

शुल्क कपातीच्या निर्णयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वागत केले आहे. महाराष्ट्र हे कायम निर्यातीत अग््रेासर असलेले राज्य आहे. त्यामुळे भारत-अमेरिका मैत्री वृद्धिंगत झाल्या कारणाने राज्यातील व्यवसायांसाठी नवे क्षितिज खुले होईल. डेटा सेंटर्स, आर्टिफिशियल इंटलिजन्स आणि अन्य क्रांतिकारी तंत्रज्ञानांमध्ये महाराष्ट्राला मोठी गुंतवणूक प्राप्त होईल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. शुल्क कपातीनंतर सेन्सेक्स प्रचंड उसळला. माघारी फिरत असलेली परदेशी संस्थागत गुंतवणूक आता पुन्हा येऊ लागेल आणि घसरलेला रुपया लक्षणीय प्रमाणात सावरेल, ही बाजाराची अपेक्षा अनाठायी नाही. अमेरिकेने बाझीलवर 50 टक्के, चीनवर 37, दक्षिण आफ्रिका 30, बांगला देश 20, मलेशिया 19 व पाकिस्तानवरही 19 टक्क शुल्के लावलेले आहे. बांगला देश व पाकिस्तानवर अगोदरच याच पातळीवर शुल्क लावण्यात आले होते. त्या तुलनेत अमेरिकेने भारतावर अन्यायच केला होता; मात्र भारताने युरोपियन महासंघ, बिटन, ओमान, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया आणि मॉरिशससह अनेक देशांशी व्यापारी करार करून, अमेरिकेच्या दबावापुढे आम्ही झुकत नाही, हे दाखवून दिले. अर्थात, काही प्रमाणात भारतालाही अमेरिकेच्या मागण्या मान्य कराव्या लागणार आहेत, हे नाकारण्याचे कारण नाही, तरीदेखील येथील शेतकऱ्यांचे हित जपावेच लागेल.
70 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 12:07 AM
भारतीय राज्य सरकारने महिला लाभार्थ्यांना तीन महिन्यांचे हप्ते देऊन दिलासा दिला

भारतीय राज्य सरकारने महिला लाभार्थ्यांना तीन महिन्यांचे हप्ते देऊन दिलासा दिला

दरम्यान, ई-केवायसी न झाल्याने अनेक महिलांचे हप्ते थांबले. काही महिलांनी ई-केवायसी पूर्ण करूनही पैसे जमा न झाल्याने नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी महिला थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करतानाही दिसल्या. या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभागाने संबंधित महिलांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तसेच नियम आणि अटी डावलून करण्यात आलेल्या अर्जांची सध्या पडताळणी सुरू आहे. अशा परिस्थितीत आता लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक आणि आनंदाची मोठी बातमी समोर आली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट 4500 रुपये जमा होणार आहेत. काही महिलांना आधीच दोन महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. ज्यांचे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांचे हप्ते थकले होते, त्यांना आता 4500 रुपये मिळणार, तर ज्यांना दोन हप्ते मिळाले त्यांना मात्र जानेवारीचा एकच हप्ता मिळणार आहे.
13 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 11:55 PM
जाणीवपूर्वक उत्क्रांतीः प्राण्यांमध्ये जगण्याची रणनीती म्हणून लैंगिक उलथापालथ

जाणीवपूर्वक उत्क्रांतीः प्राण्यांमध्ये जगण्याची रणनीती म्हणून लैंगिक उलथापालथ

प्राण्यांमधील लिंगबदल हा योगायोग नसून, जाणीवपूर्वक उत्क्रांत झालेली रणनीती आहे. लोकसंख्या कमी असताना किंवा नर-मादी प्रमाण बिघडले असताना, ही क्षमता प्रजातीच्या टिकावासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. क्लाऊनफिश हे याचे प्रसिद्ध उदाहरण आहे. हे मासे कडक सामाजिक श्रेणीमध्ये राहतात. गटातील प्रमुख मादी मरण पावल्यास सर्वात मोठा नर मादीमध्ये रूपांतरित होतो. रॅसेस या रंगीबेरंगी प्रवाळमाशांमध्ये अनेक प्रजाती जन्मतः मादी असतात आणि नंतर नर बनतात.
65 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 11:52 PM
नवीन पूल पूर्ण झाल्यानंतर सांगली शहरातील वाहतूक कोंडी वाढली

नवीन पूल पूर्ण झाल्यानंतर सांगली शहरातील वाहतूक कोंडी वाढली

ते म्हणाले, सांगली शहरात अधिकाधिक सुविधा दिल्या जात आहेत. कृष्णा नदीवर समांतर पूल बांधण्यात आला. त्यामुळे वाहने आता या नवीन पुलावरून येत आहेत. वाहतूक कोंडी वाढली आहे. आवश्यक तिथे उड्डाण पूल, रस्ते रुंदीकरण आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आराखडा तयार केला जाईल.
57 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 11:51 PM
कूनूर गायीचा गोंधळः भटक्या प्राण्यांनी सायकल शोरुममध्ये जाळपोळ केली

कूनूर गायीचा गोंधळः भटक्या प्राण्यांनी सायकल शोरुममध्ये जाळपोळ केली

कुन्नूर :केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील कुत्तुपरंबा येथे रविवारी सकाळी घडलेल्या एका अनपेक्षित घटनेने परिसरात खळबळ उडवून दिली. कन्नवम जंगलातून भरकटलेला एक गवा थेट शहरातील एका दुचाकी शोरूममध्ये घुसला आणि काही मिनिटांतच मोठ्या प्रमाणावर नुकसान करून पसार झाला. ही घटना 1 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 8.10 वाजता घडली असून, संपूर्ण प्रकार शोरूममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
57 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 11:38 PM
सुसाई जेसू यांची उत्तर मॅनिटोबा आणि सास्काचेवानसाठी आर्चबिशप म्हणून नियुक्तीः समजूतदारपणाचे एक नवीन युग

सुसाई जेसू यांची उत्तर मॅनिटोबा आणि सास्काचेवानसाठी आर्चबिशप म्हणून नियुक्तीः समजूतदारपणाचे एक नवीन युग

कॅनडामध्ये त्यांनी आदिवासी कॅथलिक समुदायांमध्ये सेवा करत त्यांच्या भाषा, संस्कृती आणि ऐतिहासिक वेदना समजून घेतल्या. 2022 मध्ये एडमंटन येथे पॅरिशमध्ये पोप फ्रान्सिस यांचे त्यांनी स्वागत केले. त्यावेळी पोप यांनी आदिवासी निवासी शाळांच्या ‌‘विनाशकारी‌’ व्यवस्थेबाबत चर्चची भूमिका मान्य करत माफी मागितली होती. 26 जानेवारीपासून सुसाई जेसू हे उत्तर मॅनिटोबा आणि सस्कॅचवानसाठी आर्चबिशप म्हणून नियुक्त झाले आहेत. टेक्सासपेक्षा मोठ्या प्रदेशात विखुरलेल्या सुमारे 49 हजार, बहुतेक आदिवासी कॅथलिकांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. क्री, डेन, इंग्रजी, फ्रेंच, ओजी-क्री आणि तमिळ भाषेतील प्रार्थना व पारंपरिक ढोलवादनाच्या साक्षीने त्यांचा अभिषेक झाला.
63 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Feb 3, 2026, 08:32 PM
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे नूतनीकरण प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे नूतनीकरण प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण

पालघर :तारापूर येथे ऑक्टोबर १९६९ मध्ये सुरू झालेल्या देशातील पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्राथमिक पुनर्संचरण लूपची वाहिनी बदलण्याचे आव्हानात्मक काम पूर्ण झाले आहे. सहा वर्षानंतर १६० मेगावॉट क्षमतेची वीजनिर्मिती या अणुभट्टीतून झाली. तारापूर १ व २ या अणुभट्ट्यांचे किमान १० वर्षे आयुर्मान लक्षात घेता त्यांचे पुनरुज्जीवनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला यश आले आहे. ‘बॉईलिंग वॉटर रिॲक्टर’ अर्थात पाणी उकळून वीजनिर्मिती करणाऱ्या दोन अणुभट्ट्या तारापूर येथे १९६९ मध्ये कार्यरत करण्यात आल्या. मात्र तांत्रिक अडचणींमुळे सुरुवातीला २२० मेगावॉट वीजनिर्मिती क्षमता १६० मेगावॉट इतकी मर्यादित ठेवण्यात आली होती. सध्या ‘प्रेशराईज हेवी वॉटर रिॲक्टर’ पद्धतीच्या प्रत्येकी दोन ५४० मेगावॅट अणुभट्ट्यांच्या (३ व ४) साहाय्याने तारापूर येथे १४०० मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. तारापूरच्या अणुभट्टी १ येथे नियमित तपासणीदरम्यान ‘रिसर्क्युलेशन पायपिंग’ अर्थात पुनर्संचरण लूपच्या वाहिनीची दुरवस्था झाल्याचे निदर्शनास आले. त्यातून गळतीची शक्यता लक्षात घेता जानेवारी २०२० मध्ये अणुभट्टी बंदचा निर्णय झाला. जुलै २०२० मध्ये अणुभट्टी २ याच समस्येमुळे बंद करण्यात आली. या वाहिनीच्या नूतनीकरणाचा प्रकल्प हाती घेऊन देशातील या पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोर इंजीनियरिंग कंपनीच्या माध्यमातून झालेल्या या कामासाठी ४५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यात अणुभट्टी १ च्या कामाला प्राधान्य देण्यात आले. अणुऊर्जा नियामक मंडळाने तपासणी करून ऑक्टोबर २०२५ मध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वीजनिर्मितीस ही अणुभट्टी कार्यक्षम असल्याचा दाखला दिला. त्यानंतर अणुभट्टीत इंधन म्हणून युरेनियम साठा भरण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा ३० डिसेंबर २०२५ रोजी पूर्ण करण्यात आला. त्यानंतर २९ जानेवारी रोजी रात्री १०.२२ वाजता अणुभट्टी १ मधून उत्पादित वीज राष्ट्रीय विद्युत ग्रीडला जोडण्यात आली. मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी तांत्रिक कारणामुळे वीज उत्पादन बंद करण्यात आले. टरबाइनमधील काही ज्वलनशील पदार्थांमुळे धूर येण्याची घटना घडल्याची शक्यता तारापूर अणुऊर्जा केंद्राचे प्रकल्प संचालक अजय कुमार भोळे यांनी लोकसत्ताकडे व्यक्त केली. आवश्यक दुरुस्ती व बदल करून पुढील चार-पाच दिवसांत अणुभट्टी १ मधून वीजनिर्मिती सुरू केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अणुभट्टी २ मधील बहुतांश नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून त्याचे परीक्षण अणुऊर्जा नियम मंडळातून होऊन त्यानंतर पुढील तीन महिन्यांत या अणुभट्टीमधून वीज उत्पादन १६० मेगावॉटपर्यंत सुरू करण्याचा निर्धार अजय कुमार भोळे यांनी व्यक्त केला. अणुभट्टीचे पुनरुज्जीवन दोन वर्षांपूर्वीच करण्याचे नियोजन होते. मात्र इटलीतून साहित्य उपलब्धतेला विलंब झाल्याने प्रकल्प रखडला. आता अणुभट्टीमधून ९० मेगावॉट क्षमता गाठेपर्यंत धिम्या गतीने वीज उत्पादन केले जात असून १६० मेगावॉट वीज उत्पादन क्षमता गाठण्यासाठी चार ते पाच दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता असते.
65 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Feb 3, 2026, 08:26 PM
नवी मुंबई-पाम बीच रस्त्यालगतच्या लक्झरी गृहनिर्माण प्रकल्पावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

नवी मुंबई-पाम बीच रस्त्यालगतच्या लक्झरी गृहनिर्माण प्रकल्पावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

नवी मुंबई: नेरुळ येथे पाम बीच मार्गालगत खाडी आणि कांदळवन पट्ट्यानजीकच्या भूखंडावरील गृहप्रकल्पावरून नवीन वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत. या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या आलिशान घरे आणि बंगल्यांच्या प्रकल्पासाठी वाढीव परवानग्या देण्याचे विशेषाधिकार ‘सिडको’ला बहाल करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने घेतला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत असलेल्या या भूखंडाचे अधिकार महापालिकेकडून काढून घेण्याच्या या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. नवीमुंबईमहानगरपालिकेच्या हद्दीतील विकास आराखड्यावर राज्य सरकारने नुकतीच अंतिम मोहाेर उमटवली. त्यानुसार पाम बीच मार्गावरील पाणथळीच्या जागा, सीआरझेडच्या सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत.नवी मुंबईशहराची मूळ आखणी आणि नियोजन सिडकोने केले असले तरी आता नियोजनाचे तसेच बांधकाम परवानग्यांचे अधिकार नवी मुंबई महापालिकेस आहेत. असे असताना पाम बीच मार्गालगत कांदळवन क्षेत्राला लागून असलेल्या भूखंड पट्ट्याबाबत राज्याच्या नगरविकास विभागाने घेतलेल्या वेगळ्या भूमिकेने नवा वाद निर्माण झाला आहे. पाम बीच मार्गालगत नेरुळ, सेक्टर ६० येथील ३५.५५ हेक्टरचा भूखंड नोव्हेंबर २०१६ मध्ये सिडकोने मे. मिस्त्री कन्स्ट्रक्शन कंपनीला विकला. ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’, ‘ई’ अशा पाच पट्ट्यांत विभागलेल्या या क्षेत्रात ‘डी’ आणि ‘ई’ हे पट्टे आलिशान घरे आणि बंगल्यांच्या उभारणीसाठी आरक्षित करण्यात आले होते. हा भाग तेव्हाही महापालिकेच्या हद्दीत होता. मात्र पालिकेचा विकास आराखडा अंतिम झाला नसल्याने विशेष प्राधिकरण म्हणून या प्रकल्पासाठी बांधकाम परवानग्या देण्याचे अधिकार सिडकोकडे सोपवण्यात आले. या ठिकाणी सध्या ‘अदानी रियाल्टी ९ पीबीआर’ या आलिशान गृहप्रकल्पाची उभारणी सुरू आहे. या प्रकल्पासाठी जुन्या नियमांनुसार दीड चटई क्षेत्रानुसार बांधकाम परवानग्या देण्यात आल्या होत्या. मात्र सुधारित एकीकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीमुळे (यूडीसीपीआर) या प्रकल्पालाही वाढीव चटई क्षेत्राचा लाभ मिळणार आहे. त्यासाठीच मिस्त्री कन्स्ट्रक्शनच्या वतीने वाढीव बांधकामाचा आराखडा सिडकोकडे सादर करण्यात आला आहे. नवी मुंबई महापालिकेने या प्रस्तावास हरकत घेऊन नियोजन प्राधिकरण म्हणून या परवानग्यांचे अधिकार महापालिकेला मिळायला हवेत, अशी भूमिका सिडकोकडे मांडली होती. महापालिकेच्या विकास आराखड्याला परवानगी देताना राज्य सरकारने या गृहप्रकल्पाला लागूनच असलेल्या पाणथळ जागांच्या पट्ट्यालाही मंजुरी दिली आहे. असे असताना या गृहप्रकल्पासाठीच्या पुढील परवानग्यांचे अधिकार मात्र सिडकोला देण्यात आले आहेत. या भूखंडाबाबतच्या आधीच्या परवानग्या सिडकोने दिल्या असल्याने आणि त्यानुसार बांधकाम प्रगतिपथावर असल्याने सिडकोकडूनच पुढील परवानग्या देण्यात याव्यात, असे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने काढले आहेत. दरम्यान, या संदर्भात सिडकोची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, ‘आताच याबाबत बोलणे योग्य ठरणार नाही’ अशी भूमिका सिडकोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने घेतली. तर ‘मिस्त्री कन्स्ट्रक्शन’च्या प्रवक्त्याने ‘हा राज्य सरकारमधील दोन यंत्रणांमधील समन्वयाचा मुद्दा आहे. प्राधिकृत यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या निर्णयाचे आम्ही पालन करू’ असे म्हटले. या संदर्भात अदानी रियाल्टीशी ईमेल आणि लघुसंदेशाद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. पाम बिच मार्गावरील पॉकेट ‘डी’ व ‘ई’ या सिडकोने वितरित केलेल्या भूखंडांवर यापूर्वी सिडकोने परवानग्या दिल्या आहेत. त्यानुसार बांधकाम प्रगतिपथावर असल्याची सिडकोच्या पत्रातील नमूद बाब विचारात घेता, सदर जागेवर सिडकोने विकास परवानग्या सुरू ठेवणेबाबत सिडकोची विनंती विचारात घेण्यात येत आहे. तथापि, सदर क्षेत्राकरिता नियोजन प्राधिकरण हे नवी मुंबई महानगरपालिका असल्याने विकास परवानगीकरिताचे विकास शुल्क, अधिमूल्य इत्यादी नवी मुंबई महापालिकेस जमा करणे आवश्यक राहील. तसेच महापालिकेने नमूद केल्याप्रमाणे ९३३ चौरस मीटरचे क्षेत्र पाणथळीत मोडत असल्याने त्यावर बांधकाम परवानग्या देऊ नयेत, असे नगरविकास विभागाच्या आदेशात म्हटले आहे. या गृहप्रकल्पाला अगदी खेटूनच ९३३ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड पाणथळ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. मुळात हा संपूर्ण परिसर कांदळवने आणि पाणथळींनी युक्त असून येथील जैवविविधतेला गृहप्रकल्पामुळे धोका पोहोचण्याची भीती पर्यावरणप्रेमींकडून सातत्याने व्यक्त होत आहे. यासाठी पर्यावरणप्रेमी वेगवेगळ्या पातळ्यांवर संघर्षही करत आहेत. विक्री करण्यात आलेला भूखंड आणि लगतचा परिसर बांधकाम क्षेत्र असल्याची भूमिका सिडकोकडून घेण्यात येत असल्याने या महामंडळाच्या भूमिकेबद्दल पर्यावरणप्रेमी संशय व्यक्त करतात. असे असताना सिडकोकडेच या भूखंडाच्या परवानग्यांचे अधिकार देण्याचा निर्णय विरोधाचे कारण ठरू शकतो.
95 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 06:31 PM
मुंबई विमानतळावर एअर इंडिया आणि इंडिगो विमानांची मध्य-विमानात झालेली भीषण टक्कर टळली

मुंबई विमानतळावर एअर इंडिया आणि इंडिगो विमानांची मध्य-विमानात झालेली भीषण टक्कर टळली

मुंबई :मुंबई विमानतळावर मंगळवारी (दि.३) एअर इंडिया आणि इंडिगो एअरलाईन्सच्या विमानांचे पंखे एकमेकांना घासल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही विमानांचा वेग कमी असल्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. दोन्ही विमानातील प्रवासी सुखरूप असून या दुर्घटनेमध्ये दोन्ही विमानांचे किरकोळ नुकसान झाले.
57 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 04:18 PM
रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे युक्रेनच्या ऊर्जा पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान

रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे युक्रेनच्या ऊर्जा पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान

रशियाआणि युक्रेनमधीलयुद्धथांबवण्यासाठी विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहेत. मात्र असे असले तरी, उभय देशांतील तणाव कमी होण्याचे नाव नाही.रशियानेमंगळवारी युक्रेनच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य केले. ७० हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ४५० ड्रोन्सच्या सहाय्याने हे जोरदार हल्ले करण्यात आले. असा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर झेलेन्स्की यांनी केला आहे. यासंदर्भात झेलेन्स्की यांनी 'एक्स' पोस्ट करत माहिती दिली आहे. यात त्यांनी सांगितले, "या हल्ल्यामुळे राजधानी कीवमधील १,००० हून अधिक निवासी इमारतींचा हीटिंग पुरवठा खंडित झाला असून येथील तापमान उणे २० अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. नागरिक थंडीने गारठले आहेत. रशियाने कडाक्याच्या थंडीचा फायदा घेत जाणूनबुजून ऊर्जा केंद्रांवर हल्ला चढवला. सध्या बाधित भागांत दुरुस्तीचे काम सुरू आहे. याशिवाय, दुसऱ्या महायुद्धातीलऐतिहासिक 'मदरलँड' स्मारकाचेही या हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे." झेलेन्स्की पुढे म्हणाले, रशियाने सुमी, खार्किव, कीव, निप्रो, ओडेसा आणि विनित्सिया या भागांना प्रामुख्याने लक्ष्य केले. या हल्ल्यांमध्ये ९ जण जखमी झाले असून निवासी इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. Recovery efforts following the Russian strike across our regions are ongoing. Once again, there was a targeted attack specifically on energy facilities – the Russians used a significant number of ballistic missiles in combination with other missiles, more than 70 missiles in…pic.twitter.com/EymOingPiY यासंदर्भात बोलताना युक्रेनच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी म्हटले आहे की, "रशियाने दुसऱ्या महायुद्धाच्या विजयाचे प्रतीक असलेल्या 'मदरलँड' स्मारकावर केलेला हल्ला निंदनीय आहे.
30 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 04:17 PM
एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीमलाइनरला इंधन नियंत्रण स्विचमध्ये बिघाड झाल्याने मंजुरी

एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीमलाइनरला इंधन नियंत्रण स्विचमध्ये बिघाड झाल्याने मंजुरी

लंडनहून बेंगळुरूला येणाऱ्याएअर इंडियाच्याबोइंग ७८७ ड्रीमलाइनर विमानाच्या फ्यूल कंट्रोल स्विचमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारीनंतर हवाई क्षेत्रात खळबळ उडाली होती. मात्र, नागरी विमान महासंचालनालयाने या विमानाच्या तपासणीनंतर एक मोठा खुलासा केला आहे. तपासणीत फ्यूल कंट्रोल स्विचमध्ये कोणतीही तांत्रिक त्रुटी आढळली नसल्याचे सांगत मंत्रालयाने या विमानाला 'क्लीन चिट' दिली आहे. रविवारी लंडनच्या हिथ्रो विमानतळावरूनएअर इंडियाच्या(एआय १३२) विमानाने उड्डाण केले. उड्डाणानंतर काही वेळातच विमानातील डाव्या इंजिनचा फ्यूल कंट्रोल स्विच आपोआप कटऑफ मोडवर गेला. वैमानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी हा स्विच दोनदा रन मोडवर आणला, पण तो पुन्हा पुन्हा कटऑफवर जात होता. अखेर तिसऱ्या प्रयत्नात तो लॉक झाला. हा स्विच इंजिनला होणारा इंधन पुरवठा नियंत्रित करतो. जर तो कटऑफ झाला, तर हवेतच इंजिन बंद पडण्याचा धोका असतो. बेंगळुरूमध्ये लँडिंग केल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. डीजीसीएने स्पष्ट केले की, स्विचमध्ये कोणतीही प्रत्यक्ष खराबी सापडलेली नाही. इंजिन चालू असताना किंवा इतर कोणत्याही वेळी यंत्रणेने वॉर्निंग किंवा 'कॉशन' दिलेले नाही. असे असले तरी, सुरक्षेचा उपाय म्हणून एअर इंडियाने आपल्या ताफ्यातील सर्व ड्रीमलाइनर विमानांच्या फ्यूल स्विचची पुन्हा एकदा तपासणी सुरू केली आहे. १२ जून २०२५ रोजी अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात २६० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्या भीषण अपघातामागेही फ्यूल कंट्रोल स्विचमधील बिघाड हेच प्रमुख कारण असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. त्यामुळेच आता लंडन-बेंगळुरू विमानात घडलेल्या प्रकारामुळे वैमानिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. बोइंग ७८७ विमानांच्या इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये काही तरी गंभीर दोष आहे का, याची तातडीने चौकशी करण्याची मागणी कॅप्टन सी. एस. रंधावा यांनी केली आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, हे विमानाचे असे बटण आहे जो इंजिनला डिझेल/पेट्रोल पुरवतो. बोइंग ७८७मध्ये दोन इंजिनसाठी दोन स्विच असतात. जर, हा स्विच चुकून कटऑफ झाला, तर इंजिनला इंधन मिळणे बंद होते आणि विमान कोसळण्याचा धोका निर्माण होतो. एअर इंडियाने आता या विषयावर बोइंग कंपनीकडे स्पष्टीकरण मागितले आहे. तोपर्यंत वैमानिकांना उड्डाणापूर्वी सर्व तांत्रिक चाचण्या काटेकोरपणे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
66 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 3, 2026, 03:50 PM
इराणमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे इंडिगोने आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली

इराणमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे इंडिगोने आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली

इंडिगो एअरलाइनने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. इराणमधील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता कंपनीने 28 फेब्रुवारीपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी घेण्यात आला आहे.निवेदनइंडिगोने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, "इराणच्या आसपास निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आम्ही आमच्या उड्डाण वेळापत्रकात काही बदल केले आहेत. आमच्या प्रवाशांची आणि क्रू मेंबर्सची सुरक्षा सुनिश्चित करणे, तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, हा यामागील मुख्य उद्देश आहे."कोणत्या शहरात जाणारी उड्डाणे रद्दइंडिगोने त्बिलिसी (जॉर्जिया), बाकू (अझरबैजान),अल्माटी(कझाकस्तान) आणि ताशकंद (उझबेकिस्तान) या शहरांसाठीची ये-जा करणारी उड्डाणे 28 फेब्रुवारीपर्यंत रद्द केली आहेत. यापूर्वी ही उड्डाणे 11 फेब्रुवारीपर्यंत रद्द होती, पण आता ही मुदत वाढवण्यात आली आहे. इंडिगो या चार शहरांसाठीच्या उड्डाणांसाठी इराणच्या हवाईक्षेत्राचा वापर करते. मात्र, सध्या इराणमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे आणि संभाव्य लष्करी संघर्षाच्या शक्यतेमुळे, कंपनीने या मार्गावर विमानांचे उड्डाण करणे टाळले आहे. या चार शहरांसाठी भारतातून साधारणपणे सहा ते सात तासांचा विमान प्रवास असतो.प्रवाशांसाठी पर्यायज्या प्रवाशांची उड्डाणे रद्द झाली आहेत, त्यांच्यासाठी इंडिगोने दोन पर्याय दिले आहेत. एकतर ते पर्यायी प्रवासाची व्यवस्था पाहू शकतात किंवा त्यांना तिकीटाचे पूर्ण पैसे परत मिळतील. कंपनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि पुढील कोणतीही माहिती आपल्या अधिकृत संवाद माध्यमांद्वारे देईल. इंडिगो या मार्गांवर A320 neo विमानांचा वापर करते. या विमानांची इंधन क्षमता मर्यादित असते. त्यामुळे, इराणच्या हवाईक्षेत्राऐवजी लांबचा पर्यायी मार्ग निवडल्यास विमानांना अधिक इंधन लागेल, जे या विमानांसाठी शक्य नाहीसध्या इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. या तणावामुळे पश्चिम आशियामध्ये लष्करी संघर्षाची शक्यता वर्तवली जात आहे.अमेरिकेनेआपले नौदलातील अब्राहम लिंकन ही युद्धनौका देखील पश्चिम आशियामध्ये तैनात केली आहे. त्यामुळे याचा परिणाम थेट विमानसेवेवर होत आहे.
53 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 03:45 PM
ह्युंदाई मोटर इंडियाने तिसऱ्या तिमाहीत आणि नऊ महिन्यांत मजबूत आर्थिक कामगिरी नोंदवली

ह्युंदाई मोटर इंडियाने तिसऱ्या तिमाहीत आणि नऊ महिन्यांत मजबूत आर्थिक कामगिरी नोंदवली

ह्युंदाईमोटर इंडिया लिमिटेड (HMIL) ने आर्थिक वर्ष २०२६ ची तिसरी तिमाही आणि नऊ महिन्यांचा आर्थिक कामगिरीचा अहवाल प्रसिद्ध केला. गत तिमाहीत,ह्युंदाईनेतब्बल ₹१७९७३५ दशलक्ष एवढा महसूल नोंदवला होता, जो वर्षिक आधारावर ८% वाढला आहे. या तिमाहीत व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीचे उत्पन्न (EBITDA) ₹२०१८३ दशलक्ष होते, जे ७.६% ने वाढले आहे. करपश्चात नफा ६.३% वाढून ₹१२,३४४ दशलक्षवर पोहोचला आहे. सणासुदीच्या हंगाम आणि GST २.० किंमतीत कपात. यामुळे घाऊक विक्रीत सातत्याने सुधारणा झाली आणि डिसेंबर २०२५ मध्ये संपलेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत, ह्युंदाईने ₹६६,३२५ दशलक्ष EBITDA नोंदवला. जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ३.३% ने वाढला आहे. यात क्रेटाने देशातील सर्वाधिक विक्री होणारी SUV म्हणून आपले स्थान पुन्हा प्राप्त केले. महत्वाचे म्हणजे, या मध्यम आकाराच्या एसयूव्हीने २०२५ च्या कॅलेंडर वर्षात २००००० वर्षिक विक्रीचा टप्पाही ओलांडला. दुसरीकडे, नवीन पिढीच्या व्हेन्यूला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. ऑर्डर बुकिंग सुरू झाल्यापासून अवघ्या तीन महिन्यांतच, या कॉम्पॅक्ट एसयूव्हीसाठी तब्बल ८०००० हून अधिक बुकिंग मिळाले. यांत पहिल्यांदाच खरेदी करणआरे ग्राहक अंदाजे ४८% आहेत. व्हेन्यूची एक्स-शोरूम किंमत ₹७.८९ लाख ते ₹१५.४८ लाखांपर्यंत जाते. व्हेन्यूचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स -व्हेन्यूमध्ये थ्री-लेयर सेटअपसह खास डॅशबोर्ड लेआउट आहे. सेंट्रल एसी, कॉफी-टेबल सेंटर कन्सोलमध्ये अँबियंट लाइटिंग, गियर शिफ्ट लीव्हर, वायरलेस चार्जर, दोन कप होल्डर्स, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आहे. व्हेन्यूमध्ये स्टिअरिंग व्हील बिल्कुल नवे D-कट आहे. यावर चार डॉट्स आहेत, ते 'H' अक्षर दर्शवतात. याशिवाय, ड्युअल-टोन इंटिरिअर थीम (डार्क नेव्ही आणि डव्ह ग्रे), क्वाड बीम एलईडी हेडलॅम्प, ट्विन हॉर्न एलईडी डीआरएल, ब्रिज-टाइप रूफ रेल, नवीन १६-इंच डायमंड-कट अलॉय व्हील्स, याशिवाय सहा एअरबॅग्ज, लेव्हल २ एडीएएस, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आदी अनेक फीचर्स आहेत. ह्युंदाई व्हेन्यू इंजिन पर्यायइंजिनसंदर्भात बोलायचे झाल्यास, यात गत मॉडेलसारखेच पर्याय आहेत. पेट्रोल पर्यायांमध्ये ८३ एचपी जनरेट करण्याची क्षमता असलेले १.२-लिटर नॅचरली एस्पिरेटेड इंजिन, १२० एचपी जनरेट करणारे १.०-लिटर टर्बोचार्ज्ड इंजिन आहे. पहिले फक्त ५-स्पीड मॅन्युअलसह येते, तर दुसरे ६-स्पीड मॅन्युअल किंवा ७-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिकसह येते. व्हेन्यूमध्ये ११६ एचपी जनरेट करणारे १.५-लिटर डिझेल इंजिनही आहे. गियरबॉक्स पर्यायांमध्ये ६-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक समाविष्ट आहे.
43 shares
😊