Achira News Logo
Achira News
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 03:58 PM
मुंबई उच्च न्यायालयाने 16 वर्षीय बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी दिली

मुंबई उच्च न्यायालयाने 16 वर्षीय बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी दिली

नागपूर :मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी अकोला जिल्ह्यातील लैंगिक अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्याची परवानगी दिली. न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व राज वाकोडे यांनी हा निर्णय दिला. वैद्यकीय मंडळाद्वारे सादर अहवालाच्या अधीन राहून या मुलीचा अकोला येथील सरकारी रुग्णालयामध्ये गर्भपात करण्यात यावा. ही प्रक्रिया बुधवारपर्यंत पूर्ण करण्यात यावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले. मुलगी १६ वर्षे ११ महिने वयाची असून ती २६ आठवड्याची गर्भवती आहे. मुलीचे तिच्याच गावातील आरोपीसोबत प्रेम संबंध होते. आरोपीने मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, तसेच लग्न करण्याचे आमीष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यामुळे मुलीला गर्भधारणा झाली. ही बाब उघडकीस आल्यानंतर पिंजर पोलिसांनी २३ एप्रिल २०२६ रोजी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. परंतु, आरोपीच्या कुकृत्यामुळे मुलीचे आयुष्यच उद्ध्वस्त होण्याच्या काठावर आले होते. दरम्यान, योग्यवेळी आवश्यक मार्गदर्शन मिळाल्यामुळे तिने गर्भपाताची परवानगी मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. ॲड. सोनिया गजभिये यांनी मुलीची बाजू मांडताना गर्भपाताची गरज अधोरेखित केली. मुलगी अत्यंत गरीब असून बाळाचे पालनपोषण करण्याची तिची आर्थिक क्षमता नाही. तसेच, ती अल्पवयीन असल्याने बाळाला जन्म देण्याची तिची शारीरिक-मानसिक क्षमताही नाही. या परिस्थितीत बाळाला जन्म देण्यास भाग पाडल्यास याचा तिला आयुष्यभर मनस्ताप सहन करावा लागेल, असेही ॲड. गजभिये त्यांनी सांगितले. न्यायालयाला या मुद्यांमध्ये तथ्य आढळून आल्यामुळे मुलीला दिलासा देण्यात आला.
5 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 03:46 PM
मंदार जाधवने अभिनय कारकिर्दीतील त्याच्या संघर्षाबद्दल केला खुलासा

मंदार जाधवने अभिनय कारकिर्दीतील त्याच्या संघर्षाबद्दल केला खुलासा

मुंबई -लोकप्रिय अभिनेता मंदार जाधवला स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. या मालिकेमध्ये त्यानं जयदीपची भूमिका साकारलेली. ही मालिका बंद झाली असली तरी आजही चाहते त्याला जयदीप म्हणूनच ओळखतात. मंदार जाधवने यापूर्वी हिंदी मालिकेतही काम केलंय. अभिनेत्यानं हिंदी मालिकेतून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये मंदार जाधवने त्याच्या संघर्षाबद्दल सांगितलं आहे.मंदार जाधवनं सांगितला संघर्षमंदार जाधवनं नुकतीच 'सर्व काही' या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान मंदारनं त्याला 'अल्लादिन' ही हिंदी मालिका कशी मिळाली, याबद्दल सांगितलंय. मंदार म्हणाला की, 'माझा लहान भाऊ मेघन जाधवसोबत मी ऑडिशनला गेलेलो, त्याला पाठिंबा देण्यासाठी. पण, तिथे मलाच विचारणा झाली. ते म्हणाले की, आम्ही जशा मुलाच्या शोधात आहोत तू तसाच आहेस तू. या मालिकेत काम करशील का? त्यावर मीसुद्धा 'हो मी पण करेन' असं म्हणालो. तिथून माझा प्रवास सुरू झाला. त्यामुळे माझी पहिली मालिका मिळवण्यासाठी मला स्ट्रगल करावा लागला नाही.'Anupam Kher : मी तुझं काय वाईट केलंय? बंगाल जिंकताच भाजप नेत्यानं काढला अनुपम यांच्या नसलेल्या केसांचा विषय; अभिनेत्याचं चोख उत्तरअभिनेत्यानं दिल्या ७०० ते ८०० ऑडिशनकाम मिळवण्यासाठीच्यासंघर्षाबद्दलबोलताना मंदार जाधव म्हणाला की, 'हो संघर्ष आहे. कलाकार म्हणून काम करणं कठीण असतं. माझी पहिली मालिका संपली तेव्हा मला बऱ्यापैकी लोकप्रियता मिळाली होती. दोन अडीच वर्षे ती मालिका सुरू होती, पण ती मालिका संपल्यानंतर माझा संघर्ष सुरू झाला. जरी मला अभिनेता व्हायचं नव्हतं तरी माझ्या नशिबात ते लिहिलं होतं त्यामुळे ती मालिका करत असताना मला अभिनय आवडतो याची जाणीव झाली. ती मालिका संपली त्यावेळी मी खूप बारीक होतो. त्यामुळे मी जेव्हा ऑडिशनला जायचो तेव्हा तू खूप बारीक आहेस, जरा बॉडी बनव, चांगलं खा आणि हिरोसारखं बन आधी, असं सांगितलं जायचं. तेव्हा मला जाणवलं की, जर तुम्हाला काम मिळवायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. मी अजिबात तसा दिसत नव्हतो. मग मी स्वत:वर काम केलं. त्यावेळी मी हिंदीमध्ये जवळपास ७०० ते ८०० ऑडिशन दिल्या आहेत. चार-पाच वर्षे हे सुरू होतं आणि मला बऱ्याचदा नकार मिळाला.'मंदार जाधवने आयुष्यातील खास क्षण केला शेअर'घरी परिस्थिती ठीक-ठाक होती. आम्ही चाळीत वाढलोय, त्याचा मला आनंद आहे. पण, संघर्षाबद्दल बोलायचं झालं तर पहिल्या मालिकेनंतर मला दुसरं काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. जिथे जायचो तिथे नकार मिळत होता. तेव्हा मी ठरवलेलं की मी एक चांगलीमालिकाकेली आहे. त्यात छान काम केलंय त्यामुळे आपण या क्षेत्रातच राहायला हवं. आई-बाबांचा पाठिंबा होता, त्यामुळे मी त्यातून बाहेर आलो. बाबासुद्धा अभिनेते, दिग्दर्शक, लेखक असल्यानं त्यांना याची जाणीव होती. त्यामुळे, या क्षेत्रातील संघर्ष त्यांना माहीत होता.' असं मंदारनं शेवटी सांगितलं
48 shares
😊
Pudhari logo
Pudhari
May 5, 2026, 03:23 PM
मालवाहू ट्रकचा अपघात, चालकाचा मृत्यू

मालवाहू ट्रकचा अपघात, चालकाचा मृत्यू

अपघात इतका भीषण होता की, मालवाहू ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. चालक गाडीत अडकून पडल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने प्रयत्न करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
12 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 03:21 PM
बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये लग्नाच्या सोहळ्यादरम्यान वधूची बदली

बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये लग्नाच्या सोहळ्यादरम्यान वधूची बदली

पाटणा: लग्न सोहळ्यातील विधी सुरु होते. मांडवात आनंदीआनंद होता. दोन्ही कुटुंबांमध्ये उत्साह होता. पण एका नोटेनं नवरदेवाचं पितळ उघडं पडलं आणि अखेरच्या क्षणी लग्न मोडलं . पाठवणीच्या वेळी नवरदेवाचं बिंग फुटलं. यानंतर नवरदेवाला नवरीशिवाय घरी परतावं लागलं. यानंतर तिचा विवाह अन्य तरुणाशी झाला. ही चक्रावून टाकणारी घटना बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये घडली आहे.बरियारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या गावात हा प्रकार घडला. गावात मनियारी परिसरातून शुक्रवारी एक वरात आली होती. रात्रभर विवाह विधी चालले. लग्न सोहळा संपन्न झाला. मंडपात बसलेला नवरदेव वेगळाच आहे, याची कल्पना तोवर कोणालाच आलेली नव्हती. ज्या तरुणाशी विवाह निश्चित झाला होता, त्याच्या जागी वेगळाच तरुण नवरदेव म्हणून सर्व विधी करत होता.Indigo Flight Power Bank Fire: प्रवाशाच्या पॉवर बँकला आग, संपूर्ण विमानात धूर; एमर्जन्सी गेटनं प्रवाशांची थरारक सुटकाशनिवारी सकाळच्या सुमारास नवरीनं नवरदेवाची परीक्षा घेण्यासाठी त्याला २०० रुपयांची नोट दिली. ही कितीची नोट आहे, असा प्रश्न नवरीनं नवरदेवाला विचारला. त्यावर २००० रुपयांची नोट असल्याचं उत्तर नवरदेवानं दिलं. त्यामुळे सगळ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. नवरदेवाला २०० आणि २००० रुपयांच्या नोटांमधील फरक लक्षात न आल्यानं तिथे असलेल्या महिला वर्गानं गोंधळ घातला.Jabalpur Boat Accident: आईनं जीव सोडला, पण ती माऊली बाळाला सोडतच नव्हती! माय-लेकरांना बाहेर काढणारं बचाव पथक हळहळलंहळूहळू विषय तापत गेला. आमच्या सोबत विश्वासघात झाल्याचं म्हणत वधू पक्षानं नवरीची पाठवणी करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिलाय लग्नात झालेल्या गोंधळाची माहिती बरियापूर पोलीस ठाण्याला देण्यात आली. त्यानंतर काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही कुटुंबांना समजावण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण वर पक्षानं ऐकलं नाही. अखेर नवरदेवाला रिकाम्या हातानं परतावं लागलं. नवरीशिवाय वरात पसरली. पोलिसांनी वर पक्षातील एका तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली आहे.
1 shares
😢
M
Maharashtra Times
May 5, 2026, 03:20 PM
हट्टी महिलेचे टीव्ही-सेव्हिंग तंत्र बिहारमध्ये व्हायरल

हट्टी महिलेचे टीव्ही-सेव्हिंग तंत्र बिहारमध्ये व्हायरल

काही लोकांचा स्वभाव फारच हट्टी असतो. त्यांना कितीही समजावलं तरी ते आपला हट्ट काही सोडत नाहीत. किंबहुना अशी मंडळी प्रत्येक गोष्ट आपल्या ईगोवर घेतात आणि मग पुढे त्यांचं काय होतं हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही.अशाच एका हट्टी महिलेचा व्हिडिओ समोर आला आहे. तिनं आपल्या घरात टीव्ही लावताना तो थेट AC च्या खाली लावला. वास्तविक, टीव्ही आणि AC एकाखाली एक कधीच लावू नयेत. कारण काही वेळा AC मधून पाणी येतं आणि ते थेट टीव्हीवर पडून टीव्ही खराब होऊ शकतो.पण टेक्निशियनच्या सांगण्यावरूनही ती महिला काही ऐकली नाही. अखेर आपली नोकरी वाचवण्यासाठी टेक्निशियनने काय जुगाड केला आहे, हे आता तुम्हीच पाहा. हा व्हिडिओ पाहून अख्खं इंटरनेट आता या महिलेची फिरकी घेत आहे.नेमकं घडलं तरी काय?हा व्हिडिओ @ChapraZila या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ही घटना बिहारमधील छपरा जिल्हा येथे घडल्याचं म्हटलं जात आहे.व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका महिलेनं जबरदस्तीने टेक्निशियनला AC च्या अगदी खाली टीव्ही लावायला सांगितलं. टेक्निशियनने तिला संभाव्य समस्या स्पष्टपणे सांगितल्या होत्या, पण ती काही ऐकायला तयार नव्हती.अखेर त्याने तिचा हट्ट पूर्ण केला आणि सोबतच आपली नोकरी वाचवण्यासाठी एक व्हिडिओ शूट केला, ज्यामध्ये संपूर्ण घटना स्पष्ट करून सांगितली. गंमत म्हणजे व्हिडिओमध्ये महिलेनं स्वतःच्या सांगण्यावरूनच AC आणि टीव्ही एकाखाली एक लावल्याचं मान्य केलं.(फोटो सौजन्य - Raymond Aquila/pexels.com)टेक्निकल समस्या काय आहे?​​AC चालू असताना आतमध्ये थंड हवा तयार होते आणि पाण्याचे थेंबही तयार होतात. हे पाणी पाईपद्वारे बाहेर टाकलं जातं. पण जर पाईप जाम झाला किंवा AC मध्ये काही तांत्रिक बिघाड झाला, तर पाणी बाहेर जाण्याऐवजी आतूनच गळू लागतं. अशा वेळी खाली टीव्ही असेल, तर हे पाणी थेट त्यावर पडून टीव्हीमध्ये बिघाड होऊ शकतो.म्हणूनच टीव्ही आणि AC वेगवेगळ्या भिंतींवर लावण्याचा सल्ला दिला जातो. हा व्हिडिओ ४ लाख ३३ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि नेटकऱ्यांनी तिची चांगलीच फिरकी घेतली आहे.(महत्वाची टीप - या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)
70 shares
😢
M
Maharashtra Times
May 5, 2026, 03:16 PM
स्वच्छता आणि दळणवळणावर भर देत पुणे पालखी सोहळ्याची तयारी करत आहे

स्वच्छता आणि दळणवळणावर भर देत पुणे पालखी सोहळ्याची तयारी करत आहे

स्नेहल निमगिरे, पुणे :पुणे शहरामध्ये पालखी सोहळ्याच्या नियोजनाला सुरुवात करण्यात आली आहे. वारकरी संप्रदायाच्या आस्थेचा आणि भक्तिभावाचा महासागर असलेल्या पालखी सोहळ्यासाठी पुणे शहरात महानगरपालिकेकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. लाखो भाविकांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी महापौर मंजुषा दीपक नागपुरे यांनी प्रशासनाला अत्यंत स्पष्ट आणि कडक सूचना दिल्या आहेत.कचरामुक्त परिसर ठेवण्याचे आदेशगेल्या वर्षी पालखी मुक्कामाच्या बैठकीत मोठा गोंधळ झाला होता. मात्र यंदा पालखी मार्गावर कुठेही गोंधळ, अस्वच्छता किंवा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी संपूर्ण नियोजनावर भर देण्यात आला आहे. मार्गावर स्वच्छता मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, ठिकठिकाणी कचरामुक्त परिसर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वागत मंडळांनी स्पीकर व्यवस्था, पिण्याचे शुद्ध पाणी आणि पुरेशी स्वच्छतागृहे तातडीने उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.फील्डवर सक्रिय राहण्याचे निर्देशभाविकांच्या सोयीसाठी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या सुविधा उभारल्या जाणार आहेत. यामध्ये जलपान केंद्रे, वैद्यकीय तपासणी शिबिरे आणि आपत्कालीन सेवा केंद्रांचा समावेश असेल. कोणत्याही परिस्थितीत भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाला “फील्डवर सक्रिय” राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.Pune Crime : गहू खरेदीला बोलावलं, मग पिस्तूल रोखून लुटलं; पोलिसांनी दरोडेखोरांना फिल्मी स्टाईलने पकडलंबोपोडी हाइट बॅरिअररस्त्यांची अवस्था लक्षात घेऊन पालखी मार्गावरील खराब रस्त्यांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. विशेषतः बोपोडी परिसरात असलेल्या तीव्र चढ-उतारामुळे तेथे ‘हाइट बॅरिअर’ बसवण्याचे आदेश PWD विभागाला देण्यात आले आहेत, जेणेकरून गर्दीतही सुरक्षितता कायम राहील.गर्दीचे नियोजन अधिक सुटसुटीत करण्यासाठी होळकर पूल परिसरातील पालखी थांबा वेळ कमी करण्याचा विचार प्रशासनाकडून केला जात आहे. तसेच PMPML बससेवा अधिक सक्षम करून भाविकांसाठी सुलभ वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचेहीनिर्देशदेण्यात आले आहेत.उत्सव काळात शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक व्यवस्थापन काटेकोरपणे राबवले जाणार आहे. शाळा, स्थानिक संस्था आणि विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधून संपूर्ण यंत्रणा एकत्रितपणे कार्यरत राहणार आहे.बोपोडी आणि खडकी परिसरात पालखी विश्रांतीसाठी सुमारे १५ मिनिटांचा कालावधी निश्चित करण्यात येणार असून, त्या वेळेत भाविकांना दर्शन घेण्यासाठी सुव्यवस्थित व्यवस्था केली जाणार आहे. एकूणच, लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा हा भव्य सोहळा सुरक्षित, स्वच्छ आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी पुणे प्रशासनाने तयारीला वेग दिला असून शहर “पालखी स्वागतासाठी पुणे सज्ज” झाले आहे.
5 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 03:05 PM
पुणेः पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन दर म्हणून 16 कोटी 1 लाख रुपये निश्चित करण्यात आले

पुणेः पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन दर म्हणून 16 कोटी 1 लाख रुपये निश्चित करण्यात आले

पुणे:पुरंदरयेथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीयविमानतळासाठीभूसंपादनाचा अंतिम दर १ कोटी ६१ लाख रुपये निश्चित केला आहे. गुरुवारपासून (दि. ७) प्रत्यक्ष भूसंपादन-करारनाम्याला सुरुवात होईल. जमीन मोजणीवेळी ९६ टक्के शेतकऱ्यांनी संमती दिली असली तरी प्रत्यक्ष भूसंपादनावेळीही संमती आवश्यक आहे. १० जूनपर्यंत संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति एकरी सरासरी दोन कोटी रुपयांचा मोबदला मिळेल. संमती न दिलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी सक्तीने संपादित होणार आहेत. मोबदल्यासाठीचा दर राज्य सरकारने विशेष बाब म्हणून निश्चित केला असून यात आता कोणताही बदल होणार नाही. भूसंपादनाचे काम पूर्ण झाल्यानंतर निविदा काढण्यात येणार असूनविमानतळाचेकाम ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. डुडी म्हणाले, “पुरंदरविमानतळासाठी गेल्यावर्षी एप्रिलमध्ये अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये करण्यात आलेल्या मोजणीदरम्यान ९६ टक्के शेतकऱ्यांनी जमीन देण्यास संमती दर्शविली होती. त्यानुसार १ हजार २१६ हेक्टर अर्थात सुमारे ३ हजार एकर जमीन विमानतळासाठी घेण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले. या भूसंपादनाचा प्रस्ताव एमआयडीसीकडे पाठविण्यात आला. त्याला ९ फेब्रुवारी रोजी मान्यता देण्यात आली. भूसंपादनापोटीच्या मोबदल्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केल्यानंतर त्यासंदर्भातील दर निश्चिती नुकतीच करण्यात आली.” यासाठी तालुक्यातील सात गावांमधील बागायती क्षेत्रासह जिरायत जमिनीला गेल्या तीन वर्षांत मिळालेला सरासरी दर लक्षात घेऊन प्रति एकरी १ कोटी ६१ लाख १ हजार ९२५ रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये अधिसूचना जारी झाल्यापासून आजवर मोबदल्याच्या रकमेवरील व्याजदेखील समाविष्ट करण्यात आले आहे. हे व्याज प्रति एकरी सुमारे ८ लाख रुपये इतके आहे. शेतात असणारी वनझाडे, फळझाडे, विहिरी, बोअरवेल, पाईपलाईन, घरे, पोल्ट्री याचेही मूल्य काढून हा दर निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार काही शेतकऱ्यांना सुमारे सव्वादोन कोटी रुपये प्रति एकर मोबदला मिळणार आहे, तर काही शेतकऱ्यांना १ कोटी ६१ लाखांपर्यंत मोबदला मिळेल. बहुतांश शेतकऱ्यांना सरासरी सुमारे दोन कोटी रुपयांपर्यंत मोबदला मिळणार आहे. हा दर सध्याच्या बाजारभावाच्या तुलनेत चारपटीहून अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या गुरुवारपासून प्रत्यक्ष करारनामे करण्यास सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया १० जूनपर्यंत सुरू राहणार असून त्या दरम्यान करारनामा पूर्ण होणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला आरटीजीएसद्वारे थेट खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या रकमेवर कोणतेही व्याज आकारण्यात येणार नाही. तसेच संपूर्ण रक्कम रोख जमा करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी करारनामे केले नाहीत अशांच्या जमिनी १० जूननंतर सक्तीने संपादित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. करारनामे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सासवड येथील उपविभागीय कार्यालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी नऊ पथके नेमण्यात आले असून भूसंपादन अधिकाऱ्यांसह मंडळ अधिकारी, बँकेचे प्रतिनिधी, सेतू केंद्र चालक यांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच मोबदला खात्यावर जमा करण्यासाठी कर्जबोजा, थकबाकी, मालमत्तेचा दावा या स्वरूपाची कागदपत्रे द्यावी लागणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. संपादित होणारी जमीन उदाचीवाडी ५८.३४ वनपुरी १५४.०६ कुंभारवळण २४५.४८ खानवडी २६९.२२ मुंजवडी ८२.५६ एखतपूर १९९.०३ पारगाव १८८.०७ संपादनासाठी उशिरा संमती दिल्यास दर वाढवून मिळेल असा गैरसमज काही शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. मात्र, ही अफवा आहे. राज्य सरकारकडून यानंतर कोणताही वाढीव मोबदला मिळणार नाही. सर्वांना सारखा दर देण्यात येणार असून प्रथम येणाऱ्या प्राधान्य या तत्त्वावर करारनामे करावेत. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये.- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी
16 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 03:02 PM
मेट गाला व्हायरलः सेलिब्रिटींचे लाल गालिचेचे स्वरूप आणि बसण्याचे अपारंपरिक नियम

मेट गाला व्हायरलः सेलिब्रिटींचे लाल गालिचेचे स्वरूप आणि बसण्याचे अपारंपरिक नियम

मुंबई -हॉलवूड आणि फॅशन जगतातील सर्वात मोठा ' मेट गाला ' हा कार्यक्रम सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमातील कलाकारांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतायत. 'मेट गाला' हा दरवर्षी होणारा एक मोठा कार्यक्रम असून २०२६ मध्येही हा कार्यक्रम सेलिब्रिटींच्या रेड कार्पेटवरील लूकमुळे चर्चेत आहे. गेल्या काही वर्षांपासून, मेट गालाचं आयोजन व्होग मासिकाच्या जागतिक संपादकीय संचालक अ‍ॅना विंटूर यांच्या देखरेखीखाली केलं जातंय. या कार्यक्रमात प्रवेश मिळवणं हे त्याचे नियम पाळण्याइतकंच आव्हानात्मक आहे. यापैकी एक नियम असा आहे की, नवरा-बायको एकत्र बसू शकत नाहीत. याच नियमाचं पालन न केल्यास कायमस्वरूपी बंदी घातली जाऊ शकते.पती-पत्नी एकत्र का बसत नाहीत?मेट गालासाठी बसण्याची व्यवस्था खूप आधीच तयार केली जाते. एकविशेष नियमअसा आहे की, कोणताही पाहुणा आपल्या जोडीदारासोबत बसू शकत नाही. आयोजकांची इच्छा असते की लोकांनी नवीन लोकांना भेटावं आणि त्यांच्याशी संवाद साधावा. बसण्याची व्यवस्था अशा प्रकारे केली जाते की, विविध पार्श्वभूमीचे लोक एकत्र बसून नवीन विषयांवर चर्चा करू शकतील.Prajakta Mali : 'लग्नाचं प्रेशर कसं हाताळतेस?' प्राजक्ता माळीला चाहत्याचा प्रश्न; अभिनेत्री म्हणाली, 'जे होतं ते चांगल्यासाठी...'जेवणात लसूण आणि कांद्यावर बंदीमेट गालाच्या मेन्यूमध्ये लसूण आणि कांद्याला सक्त मनाई आहे. आयोजकांच्या मते, तोंडाची दुर्गंधी आणि संवादातील अडचणी टाळण्यासाठी त्यांचा वापर केला जात नाही.पाहा: प्रियांकाच्या 'त्या' पेहरावाची अशीही कहाणी!फोनवर बंदीमेट गालामध्येउपस्थितराहण्यासाठी पाहुणे किमान १८ वर्षांचे असणं आवश्यक आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी फोनचा वापर आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सक्त मनाई आहे. पाहुण्यांनी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि आपली प्रायव्हसी जपावी, अशी आयोजकांची इच्छा आहे.Tharala Tar Mag Promo : याचसाठी केलेला अट्टाहास! सायलीनं खोट्या तन्वीला मारून-मारून केलं बेहाल, लवकरच 'ठरलं तर मग' मालिकेत होणार प्रियाचा पर्दाफाशधूम्रपान आणि ड्रेस कोडहा कार्यक्रम न्यूयॉर्क शहरात आयोजित केला जात असल्यामुळे, शहराच्यानियमांनुसारधूम्रपानास सक्त मनाई आहे. ड्रेस कोडबद्दल बोलायचं झाल्यास, २०२६ ची थीम 'कॉस्ट्यूम आर्ट' आहे आणि ड्रेस कोड 'फॅशन इज आर्ट' आहे. यावर्षी, सेलिब्रिटींनी त्यांच्या पोशाखातून आपला लूक कॅनव्हासप्रमाणे सादर केला आहे.Anupam Kher : मी तुझं काय वाईट केलंय? बंगाल जिंकताच भाजप नेत्यानं काढला अनुपम यांच्या नसलेल्या केसांचा विषय; अभिनेत्याचं चोख उत्तरत्याचबरोबर विशेष गोष्ट म्हणजे, 'मेट गाला'चं तिकीट जे एकेकाळी फक्त ५० रुपये डॉलरला मिळायचं , ते यावेळी जवळपास १ लाख डॉलर्स म्हणजेच अंदाजे ९० लाख रुपयांना मिळत आहे. याशिवाय, जर तुम्हाला या कार्यक्रमात टेबल बुक करायचं असेल, तर तुम्हाला ३ लाख ५० हजार डॉलर्स म्हणजेच अंदाजे ३ कोटी रुपये खर्च करावे लागतील.
48 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 03:01 PM
आयपीएल 2026: लोकेश राहुलचे पुनरागमन सुरूच, धावसंख्येच्या यादीत अव्वल

आयपीएल 2026: लोकेश राहुलचे पुनरागमन सुरूच, धावसंख्येच्या यादीत अव्वल

IPL 2026 : टीम इंडियाचा स्टायलिश बॅटरलोकेश राहुलयंदाच्या हंगामात सर्वोत्तम कामगिरीसह सुपर स्ट्राइक रेटसह आपल्या फलंदाजीतील आक्रमक अंदाज दाखवून देताना दिसतोय. स्ट्राइक रेटच्या मुद्यावरुन अनेकदा स्टायलिश क्रिकेटरला ट्रोल करण्यात आले. एवढेच नाही तर टीम इंडियाच्या टी-२० संघाचे दरवाजेही त्याच्यासाठी बंद झाले. पणदिल्ली कॅपिटल्सच्यासंघात आल्यापासून त्याचे तेवर बदलले. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉपला यंदाच्या हंगामात तर तो तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत युवा बॅटर्संना टक्कर देताना दिसतोय.चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात तो स्वस्तात माघारी फिरला. पण यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत तो टॉपला पोहचला.लोकेश राहुलनं१० सामन्यातील १० डावात ४९.४४ च्या सरासरीसह १८०.८९ स्ट्राइक रेटसह ४४५ धावा केल्या आहेत. यात ३ अर्धशतकासह एका शतकाचा समावेश आहे. संयमी फलंदाजीसाठी ओळखला जाणारा लोकेश राहुल आक्रमकतेसह घातक फलंदाज कसा झाला? जाणून घेऊयात त्यासंदर्भातील खास गोष्ट २७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं चौकट मोडून काढल्याचा अभिमान जिओस्टारच्या सुपरस्टार शोमध्ये राहुल म्हणाला की, १० वर्षांपूर्वी टी-२० संघात स्थान मिळवण्यासाठी मी काहीही करायला तयार होतो. माझ्याकडे कधीही टी-२० खेळाडू म्हणून पाहिलं गेलं नाही, किंवा चांगला व्हाइट-बॉल खेळाडू मानलं गेलं नाही. माझी ओळख ही फक्त कसोटीपुरती मर्यादीत राहिली. त्या चौकटीबाहेर येऊन माझा व्हाइट-बॉल गेम सुधारून इथपर्यंत पोहोचणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे." प्रत्येक वेळी गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, पण...बदलाच्या प्रवासात मी चुका केल्या, काही गोष्टी अजून चांगल्या करता आल्या असत्या. पण मला याचा अभिमान आहे की प्रत्येक वेळी मैदानात उतरलो तेव्हा मी शंभर टक्के दिलं आणि स्वतःला यशस्वी होण्याची सर्वोत्तम संधी देण्यासाठी पूर्ण तयारी केली. प्रत्येक वेळी गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. तुम्हाला ते स्वीकारावं लागतं आणि या प्रवासाचा आनंद घ्यावा लागतो. जिंकणं-हारणं काहीही असो, मी स्वतःला नेहमी संतुलित ठेवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मला वाटतं की, मी काहीच साध्य केलं नाही, तेव्हा मी माझ्या यशाची आठवण करून घेतो आणि त्यातून मला योग्य दृष्टिकोन मिळतो. अजून माझ्याकडे वेळ आहे, असे म्हणत त्याने येत्या काळात आणखी दमदार कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे.
59 shares
😊
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 02:40 PM
जागतिक स्तरावर 12,000 ते 15,000 कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात कपात करण्याची कॉग्निझंटची घोषणा

जागतिक स्तरावर 12,000 ते 15,000 कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात कपात करण्याची कॉग्निझंटची घोषणा

Cognizant Layoff:आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी कॉग्निझंटमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरकपातीची तयारी सुरू झाली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावर सुमारे १२,००० ते १५,००० कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामध्ये भारतातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतावर सर्वाधिक परिणाम? कंपनीत सुमारे ३,५७,०००कर्मचारीकार्यरत असून त्यापैकी जवळपास २,५०,०००कर्मचारीभारतात आहेत. त्यामुळे होणाऱ्या कपातीचा मोठा भाग भारतात होण्याची शक्यता आहे. ‘प्रोजेक्ट लीप’ अंतर्गत पुनर्रचना कॉग्निझंटने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘Project Leap’ अंतर्गत ही पुनर्रचना केली जात आहे. कंपनीला या प्रक्रियेसाठी $२३० मिलियन ते $३२० मिलियन इतका सेवरन्स खर्च (भरपाई) अपेक्षित आहे. कंपनीचे CEO रवी कुमार यांनी सांगितले की, ही जागतिक पातळीवरील प्रक्रिया असून, कंपनीच्या विविध विभागांमध्ये टप्प्याटप्प्याने राबवली जाईल. कामकाजाच्या पद्धतीत बदल कंपनी आता डिजिटल तंत्रज्ञान आणि मानवी कामाचा समन्वय असलेल्या नव्या मॉडेलकडे वळत आहे. यामुळे भविष्यात काम करण्याच्या पद्धतीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. नव्या भरतीची योजना कायम विशेष म्हणजे, फेब्रुवारीत कंपनीने २०२६ मध्ये सुमारे २४,००० ते २५,००० नव्या ग्रॅज्युएट्सची भरती करण्याची घोषणा केली होती. ही रणनीती कंपनीच्या वर्कफोर्स स्ट्रक्चरला तळापासून मजबूत करण्याचा भाग आहे. Coinbase मध्येही नोकरकपात दरम्यान, क्रिप्टोकरन्सी क्षेत्रातील Coinbase या कंपनीनेही सुमारे १४% कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे CEO ब्रायन आर्मस्ट्रॉंग यांनी या निर्णयामागे दोन प्रमुख कारणे दिली. पहिले म्हणजे, क्रिप्टो बाजारातील मंदी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे बदलणारी कामाची पद्धत. तज्ज्ञांच्या मते, जागतिक स्तरावर आयटी आणि टेक कंपन्यांमध्ये नोकरकपातीचा ट्रेंड वाढत आहे. AI चा वाढता वापर आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे कंपन्या खर्च कमी करण्याच्या दिशेने पावले उचलत आहेत. भविष्यात कौशल्याधारित आणि डिजिटल-फोकस्ड कामकाजालाच अधिक प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.
33 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 02:32 PM
चोप्रा शहरातील इंधनाच्या टंचाईचा वाहनचालकांना फटकाः लाईव्ह अपडेट्स

चोप्रा शहरातील इंधनाच्या टंचाईचा वाहनचालकांना फटकाः लाईव्ह अपडेट्स

महाराष्ट्रासहदेश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... LIVE चोपडा शहरातील पेट्रोल पंपांवर डिझेल आणि पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनधारकांना इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे. चोपडा शहरातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल उपलब्ध आहे, मात्र डिझेल उपलब्ध नाही. तर काही ठिकाणी डिझेल उपलब्ध आहे, पण पेट्रोल उपलब्ध नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे ज्या पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध आहे, त्या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे, ज्या पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध आहे, त्या ठिकाणी डिझेल भरण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी होत आहे. डिझेल आणि पेट्रोल टंचाईमुळे वाहनधारक आवश्यकतेपेक्षा अधिक इंधन भरून घेताना दिसत आहेत. जालन्यातील मोतीराम अग्रवाल को-ऑपरेटिव्ह बँक तसेच पूर्णवादी नागरी सहकारी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी रायचंद कुरंगळ याची मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली आर्थिक गुन्हे शाखेने सुरू केल्या आहेत. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे. कुरंगळ हा वेअरहाऊसचा मालक असून मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक तसेच पूर्णवादी नागरी सहकारी बँकेकडून शेतमाल तारण ठेवून कर्ज देण्याची योजना होती. मात्र, कुरंगळ याने आपल्या दलालामार्फत गरजू नागरिकांची कागदपत्रे गोळा करून बँकेकडे शेतमाल तारण कर्जासाठी अर्ज सादर केले. या प्रक्रियेदरम्यान वेअरहाऊसमध्ये प्रत्यक्ष शेतमाल नसतानाही शेतमाल तारण ठेवलेला असल्याच्या बनावट पावत्या देऊन मर्चंट बँकेची २३ कोटी ३३ लाख रुपये तर पूर्णवादी बँकेची ८ कोटी १२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी आधीच मर्चंट बँक घोटाळ्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या कुरंगळसह पाच जणांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चोपडा तालुक्यात ज्या प्रमाणात केळीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते, त्याचप्रमाणे कापूस लागवडही शेतकरी मोठ्या प्रमाणावर करत होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून कापूस पिकासमोरील विविध अडचणींमुळे आता कापूस क्षेत्रात घट होताना दिसत आहे. अनियमित पाऊस, कापसाच्या जुन्या वाणांचा वापर, तसेच लाल्या आणि बुरशीजन्य रोगांसह अळीच्या प्रादुर्भावामुळे कापसाच्या उत्पादनात सातत्याने घट होत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे. कापूस लागवडीपासून ते वेचणीपर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च, मजूर टंचाई आणि उत्पादन खर्चात वाढ यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच कापूस वेचणीनंतर बाजारात अपेक्षित भाव मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी अधिकच संकटात सापडत आहेत. या सर्व कारणांमुळे चोपडा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी आता हळूहळू कापूस लागवडीपासून दूर जाताना दिसत आहेत. यंदा चोपडा तालुक्यात कापूस लागवडीखालील क्षेत्र सुमारे 35 ते 40 टक्क्यांनी घटण्याची शक्यता असून, त्याऐवजी पपई आणि केळी पिकांच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याची माहिती शेतकरी देत आहेत. बदलापूरहून दादरकडे जाणाऱ्या एसी लोकलच्या टपावर मनोरुग्ण तरुण चढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विठ्ठलवाडी ते कल्याण दरम्यान दुपारी सुमारे २:०३ वाजण्याच्या सुमारास एसी लोकल ट्रेनच्या छतावर एक तरुण चढल्याने प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. विठ्ठलवाडी स्थानकावर पोलिसांनी संबंधित तरुणाला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. तो काही वेळ खाली उतरला; मात्र काही वेळाने पुन्हा लोकलच्या टपावर चढला, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. यानंतर ट्रेन पुढे कल्याण स्थानकाकडे रवाना करण्यात आली. कल्याण स्थानकावर ट्रेन पोहोचल्यानंतर हमाल, रेल्वे पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी संयुक्त प्रयत्न करत सुमारे २:५० वाजता त्या तरुणाला खाली उतरवण्यात यश मिळवले. यानंतर त्याला तात्काळ रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या संपूर्ण प्रकारामुळे सुमारे अर्धा ते पाऊण तास प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. - तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन यांना नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते- आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक अत्याचार मानसिक छळ आणि धर्मांतराच्या आरोपाखाली करण्यात आले आहेत आरोपींवर गुन्हे दाखल- आज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर पुढील पुण्यात ताबा घेण्यासाठी एसआयटी कडून करण्यात आला आहे न्यायालयात अर्ज- येत्या एक ते दोन दिवसात पुन्हा एसआयटी घेणार संशयित आरोपींचा ताबा भिवंडी शहर गुटखा व अमली पदार्थांच्या विक्री व वितरणाचे मुख्य केंद्र बनले असून पोलीस यंत्रणा सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्यामुळे शहर नशेच्या विळख्यात अडकत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे शहराध्यक्ष प्रवीण पाटील यांनी केला आहे. भिवंडीत गुटखा व अमली पदार्थ बंदीचा केवळ दिखावा केला जात असल्याचा आरोप करत प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आसबीबी येथील पक्ष कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी गुटखा व प्रतीकात्मक अमली पदार्थांची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला गहू अवकाळी पावसामुळे भिजल्याची घटना घडली आहे. अंदाजे 1200 ते 1500 क्विंटल गहू पावसात भिजल्याची माहिती समोर आली आहे. हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्यासाठी तीन दिवसांचा येलो अलर्ट जारी केला होता. मात्र, अचानक गव्हाची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने साठवण व्यवस्थेवर ताण आला आणि पावसामुळे मोठे नुकसान झाले. हवामान विभागाच्या वतीने गोंदिया जिल्ह्याला आज पावसाचा अलर्ट देण्यात आला होता. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला असून दुपारनंतर गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातावरण झाले व त्यानंतर अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वारा आल्याने कापणीला आलेला धानपिक तसेच आंबा पिक व भाजीपाल्याच्या शेतीला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्याचा पारा 41 अंशांवर गेला असताना अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना असह्य उकाड्यापासून मात्र दिलासा मिळाला आहे. - चर्चगेट–बोरिवली ५:३९ महिला लोकलमधील प्रवाशांना महिला टीसींकडून गुलाब फुलांचे वितरण- महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या विशेष सेवेला आज ३४ वर्षे पूर्ण होत असून, या निमित्ताने रेल्वे प्रशासनाने प्रवाशांप्रती आपली कृतज्ञता आणि जिव्हाळा व्यक्त केला- लोकलमधील प्रवाशांना महिला तिकीट तपासनीस कर्मचाऱ्यांनी गुलाब फुले देत आनंदाचा क्षण साजरा केला सोलापूर : शेतीच्या वादातून एकाचा खून, दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी गावातील घटना, शासकीय रूग्णालयात ग्रामस्थांची मोठी गर्दी नसरापूर बलात्कार-हत्या प्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून पोलिसांकडून तीन नावांची शिफारस करण्यात आली आहे. उज्ज्वल निकम, अजय मिसर किंवा अनिकेत निकम या नावांची सध्या चर्चा आहे. आदिवासी बांधवांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण निर्णय. स्वयंसेवी संस्थाच्या पाच प्राथमिक व 19 माध्यमिक अनुदानित आश्रमाशाळांची श्रेणीवाढ. प्राथमिकमधून माध्यमिक आणि माध्यमिकमधून कनिष्ठ महाविद्यालय अशी श्रेणीवाढ, त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती व आवश्यक खर्चाच्या तरतूदीस मंजुरी. डोंगराळ, दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांचे शिक्षण गतीमान होणार. सोलापूरसाठी महत्वाचा निर्णय सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पदवीस्तराचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु करण्यास मंजुरी. सोलापूर आणि आजुबाजुच्या परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या होतकरूंच्या दृष्टीने हिताचा निर्णय. प्रत्येकी साठ प्रवेश क्षमतेचे एआय अँण्ड मशिन लर्निंग, कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इंजिनियरींग, इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन असे तीन नवे अभियांत्रिकी अभ्यासक्रम. अभियांत्रिकी विद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरीत धाराशिव जिल्हयातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्याचा निर्णय. महाविद्यालयाचे सक्षमीकरण होणार, अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधांमुळे या परिसरातील होतकरूंना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण उपलब्ध होण्याची संधी. नसरापूर प्रकरणानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गुन्हेगारांवर लगाम घालण्यासाठी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीसयांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून, लैंगिक शोषणातील आरोपींना पॅरोल न देण्याबाबत नवीन कायदा करण्याचे आदेश विधी व न्याय विभागाला दिले आहेत. चीनमधीलएका फटाक्याच्या फॅक्ट्रीत झालेल्या भीषणस्फोटात२१ जणांचामृत्यूझाला असून ६१ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतरचीनचेराष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.वाचा सविस्तर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या निकालाबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत. "जी दिल्ली आणि पश्चिम बंगाल भाजपाला मोदी लाट शिखरावर असताना जिंकता आले नाही. २०१५ साली दिल्लीमध्ये आणि २०१६ साली बंगालमध्ये प्रत्येकी तीन जागा मिळाल्या. त्या दिल्ली आणि बंगालमध्ये भाजपाने अशा काळात विजय मिळवला, जेव्हा मोदींची लोकप्रियता संपूर्ण देशात रसातळाला चालली आहे, असे कसे?", असा सवाल केजरीवालांनी उपस्थित केला आहे. जनतेने पंतप्रधान मोदी आणि देशाच्या विकासावर आपला विश्वास व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालच्या लोकांनी भाजपाला मतदान केले, कारण ते ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील सरकारवर असमाधानी होते अशी प्रतिक्रिया शिंदेसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली आहे. #WATCH| Delhi | On the BJP-NDA's performance in the Assembly elections in 4 states and 1 UT, Shiv Sena MP Shrirang Barne says, "...The public has bestowed its trust on PM Modi and development...The public of West Bengal voted for the BJP as they were dissatisfied with the Mamata…pic.twitter.com/sWGGTVYYVT इराणने संयुक्त अरब अमिरातीमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाले आहेत. यूएईतील फुजैराहमध्ये इराणने मिसाईल डागली. त्यात तीन भारतीय जखमी झाले. या घटनेबद्दल भारताने तीव्र संताप व्यक्त केला. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जायस्वाल म्हणाले की, "फुजैराहमध्ये झालेल्या हल्ल्यात तीन भारतीय जखमी झाले आहेत. हे अजिबात खपवून घेण्यासारखं नाहीये. हे हल्ले ताबडतोब थांबण्यात यावे आणि सर्वसामान्य लोकांना, तसेच अत्यावश्यक सेवांना लक्ष्य करणे बंद करण्यात यावे." सर्वात आधी विजय यांना त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडू द्या, त्यांच्या भूमिकेनंतर आम्ही कुणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवू. आम्ही DMK आघाडीसोबत आहोत. यात शंका नाही असं विधान सीपीआयचे सचिव पी. षण्मुगम यांनी म्हटलं. Chennai | Tamil Nadu CPI(M) Secretary P Shanmugam says, "First, let Vijay clearly state his position. Once he does, we will decide whom to support. There is no doubt that we are with the DMK alliance"pic.twitter.com/sG3Y1l6qQN जनतेने पंतप्रधान मोदी आणि देशाच्या विकासावर आपला विश्वास व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालच्या लोकांनी भाजपाला मतदान केले, कारण ते ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील सरकारवर असमाधानी होते अशी प्रतिक्रिया शिंदेसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली आहे. #WATCH| Delhi | On the BJP-NDA's performance in the Assembly elections in 4 states and 1 UT, Shiv Sena MP Shrirang Barne says, "...The public has bestowed its trust on PM Modi and development...The public of West Bengal voted for the BJP as they were dissatisfied with the Mamata…pic.twitter.com/sWGGTVYYVT राज्यसभा सदस्य आणि भाजप नेते राघव चड्ढा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी राष्ट्रपती भवनात दाखल #WATCH| Delhi: Rajya Sabha MP and BJP leader Raghav Chadha reaches Rashtrapati Bhavan to meet President Droupadi Murmu.pic.twitter.com/XTISlAVpLi नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलानेही वडिलांच्या कृत्याचा तीव्र निषेध करत कठोर शब्दांत संताप व्यक्त केला. "तो माझा बाप आहे हीच माझी चूक आहे. त्याला लवकरात लवकर फाशी द्या", अशी मागणी त्याने केली आहे. त्या चिमुरडीला जितक्या वेदना झाल्या, तशाच वेदना त्यालाही झाल्या पाहिजेत, असेही तो म्हणाला
73 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 02:21 PM
हैदराबादहून चंदीगडला जाणाऱ्या विमानात पॉवर बँक अग्निशमन दलाकडून आपत्कालीन सुटका

हैदराबादहून चंदीगडला जाणाऱ्या विमानात पॉवर बँक अग्निशमन दलाकडून आपत्कालीन सुटका

चंदिगढ: चंदिगढ विमानतळावर मंगळवारी एकच गोंधळ उडाला. हैदराबादहून आलेल्या एका विमानातील प्रवाशाच्या पॉवर बँकेला अचानक आग लागली. त्यामुळे विमानात एकच खळबळ उडाली. एअरलाईन्सननं दिलेल्या माहितीनुसार, फ्लाईट 6E-108 लँडिंगनंतर धावपट्टीवर उभं होतं. तितक्यात एका प्रवाशाच्या पॉवर बँकेनं पेट घेतला. सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता प्रवाशांना विमानातून तातडीनं बाहेर काढण्यात आलं. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे टर्मिनलपर्यंत पोहोचवण्यात आलं.प्रवाशाच्या पॉवर बँकचा स्फोट झाल्यानंतर विमानात सर्वत्र धूर पसरला. त्यामुळे अन्य प्रवासी घाबरले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात प्रवासी धावपट्टीवर उतरताना दिसत आहेत. 'सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्यात आलं. विमानानं पुन्हा उड्डाण करण्याआधी त्याची पूर्ण तपासणी केली जाईल,' अशी माहिती एअरलाईन्सकडून देण्यात आली.नागरी उड्डाण महासंचलनालयाच्या २०२६ च्या नियमांनुसार, विमानात पॉवर बँक नेण्याची परवानगी केवळ कॅरी ऑन सामानतच असते. प्रवाशांना फ्लाईटमध्ये फोन आणि अन्य डिव्हाईस चार्ज करण्यासाठी पॉवर बँकचा उपयोग करण्याची परवानगी आहे. पॉवर बँक आणि अतिरिक्त बॅटरी सारख्या वस्तू फ्लाईटमध्ये असलेल्या वरील कंपार्टमेंट ठेवण्याची परवानगी नाही. कारण अशा ठिकाणी आग लागल्यास ती विझवणं अधिक अवघड असतं.
51 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 02:17 PM
नागपूरमधील लाकूड व्यापाऱ्यांच्या गोदामाला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही

नागपूरमधील लाकूड व्यापाऱ्यांच्या गोदामाला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:कळमना येथील चिखली ले-आऊट परिसरात मंगळवारी मध्यरात्री टिंबर ट्रेडर्सच्या (सॉ मील) गोदामाला भीषणआगलागली. या घटनेत मे. रामेश्वर टिंबर ट्रेडर्स आणि मे. कमला टिंबर ट्रेडर्सचे मोठे नुकसान झाले असून, सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांची मालमत्ता जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज मनपाच्या अग्निशमन विभागाने वर्तवला आहे. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्लॉट क्रमांक ६२६, चिखली ले-आऊट येथील पुरुषोत्तम रामजी पटेल यांच्या मालकीचे मे. रामेश्वर टिंबर ट्रेडर्स आणि शंकरलाल पटेल यांच्या मालकीचे मे. कमला टिंबर ट्रेडर्स येथे मंगळवारी मध्यरात्री १.२० वाजताच्या सुमारासआगलागली. या आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण केले. या दुर्घटनेत सागवान लाकूड, दोन वुड कटिंग मशिन्स, संपूर्ण टीन शेड, इलेक्ट्रिक वायरिंग आणि एसी पूर्णपणे जळून खाक झाले. आगीची भीषणता ऐवढी होती की आगीतून कोणतीही मालमत्ता वाचवता आली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने हालचाली सुरू केल्या. घटनास्थळी कळमना, सिव्हिल लाईन्स, सुगतनगर, सक्करदरा, वाठोडा, लकडगंज आणि कॉटन मार्केट या सात अग्निशमन केंद्रातून पाण्याचे बंब पाठवण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किट किंवा अन्य कारण असू शकते, असा संशय असून अग्निशमन विभाग आणि स्थानिक पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
28 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 02:09 PM
भाजप नेत्याच्या केस वाढवण्याच्या दाव्याने बंगालच्या राजकारणात विनोदी वादाला तोंड फुटले

भाजप नेत्याच्या केस वाढवण्याच्या दाव्याने बंगालच्या राजकारणात विनोदी वादाला तोंड फुटले

मुंबई -बंगालच्या राजकारणात निवडणुकीच्या निकालांसोबत जर आणखी कशाची चर्चा होत असेल, तर ती आहे अनुपम खेर यांच्या 'केसांची'. भाजप नेत्याच्या एका वक्तव्यानं सोशल मीडियावर गोंधळ उडाला आहे. यावर आता अनुपम खेर यांनी स्वतः प्रतिक्रिया दिलीये.बंगालच्या निवडणुकीत व्हायरल झालेल्या झालमुरीपासून ते सात्विक माशापर्यंत अनेक मजेशीर क्षण पाहायला मिळाले. भाजपनंऐतिहासिक विजयहीमिळवला आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पण मग, आणखी एक विनोदी दावा समोर आला असून त्यावर अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेते सामिक भट्टाचार्य यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष बंगालमध्ये पुन्हा सत्तेत येणार नाही, असं म्हटलं. त्याचबरोबर सामिक यांनी अनुपम खेर यांच्या न वाढणाऱ्या केसांची शपथ घेतली. सामिक यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.Riteish Deshmukh : 'राजा शिवाजी सिनेमाचं बजेट दाखवलं जातंय ते खोटं'; बॉलिवूड कलाकारांच्या मानधनाबद्दलबही स्पष्टच बोलला रितेश देशमुखकाय म्हणाले सामिक भट्टाचार्य?भाजप नेते म्हणाले, 'तृणमूल काँग्रेस नष्ट होणारच होती. बघा, आकाश पृथ्वीवर कोसळू शकतं, समुद्र आकाशात उसळू शकतो. अनुपम खेर यांच्या डोक्यावर पुन्हा केस उगवू शकतात. पण तृणमूल काँग्रेस सत्तेवर येईल ही कल्पना स्वप्नांच्या पलीकडची आहे.'Tharala Tar Mag Promo : याचसाठी केलेला अट्टाहास! सायलीनं खोट्या तन्वीला मारून-मारून केलं बेहाल, लवकरच 'ठरलं तर मग' मालिकेत होणार प्रियाचा पर्दाफाशअनुपम खेर यांचं भन्नाट उत्तरअनुपम खेरयांनीही हा व्हिडिओ पाहिला आणि सामिक यांचा व्हिडिओ शेअर करत गंमतीदार उत्तर दिलंय. अनुपम खेर यांनी म्हटलं की, 'अरे भावा. मी तुझं काय वाईट केलंय? तुला माझ्या डोक्यावर केस का उगवावेत असं वाटतंय? मी शंभर जन्मांतही यासाठी प्रार्थना करणार नाही. जय श्री राम!'अनुपम खेर यांच्या या पोस्टवर एका युजरने लिहिलं की, 'अनुपम सर विचार करत असतील, 'मुझे क्यू तोडा' काही नेटकरी म्हणाले, 'सर, तुम्ही खुश असायला हवं, कोणीतरी तुमच्या वाढणाऱ्या केसांबद्दल बोलत आहे.'मत व्यक्त करणे हा माझा मुलभूत अधिकार आहे: अनुपम खेरदरम्यान, अनुपम खेर अनेकदा विविध विषयांवर किंवा व्हायरलव्हिडिओंवरआपलं मत व्यक्त करतात. अनुपम यांच्या कामाबद्दल सांगायचं तर ते शेवटचे 'तन्वी द ग्रेट' या सिनेमात दिसले होते. या सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनीच केलेलं. अनुपम खेर लवकरच 'खोसला का घोसला पार्ट २' आणि 'फ्लिकर'मध्ये दिसणार आहेत. हे दोन्ही चित्रपट २०२६ च्या अखेरीस प्रदर्शित होणार आहेत.
70 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 02:07 PM
थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला

थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला

Thalapathy Vijay Tvk Win :तामिळनाडूविधानसभा निवडणुकीतथलापती विजयनेऐतिहासिक विजय मिळवत नवा इतिहास रचला. राज्यातील जनतेनं, विजयच्या TVK पक्षाला १०८ जागांवर दणदणीत विजय मिळवून दिला. अनेक वर्षांपासूनतामिळनाडूच्याराजकारणावर वर्चस्व गाजवणाऱ्या DMK आणि AIADMK ला जोरदार धक्का बसला आहे. एमके स्टालिन यांची केवळ हातातून सत्ता निसटली नाही तर, स्वत: देखील कोलाथूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक हरले. आता विजय हा तामिळनाडूचा मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे. विजयच्या दणदणीत विजयानंतर राजकीय आणि मनोरंजन विश्वातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच लोकप्रिय दिग्दर्शकराम गोपाल वर्मांनीएक विजयचा एक खास फोटो शेअर केला आहे. राम गोपाल वर्मायांनी त्यांच्या 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर विजयचा दिवंगत महान राजकारणी आणि माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्यासोबतचा एक दुर्मिळ फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एका कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी करुणानिधी दिसत आहेत, तर त्यांच्या अगदी मागे तरुण विजय उभा आहे. हा फोटो शेअर करताना वर्मा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, "कळैगनार (करुणानिधी) यांनी कधी कल्पनाही केली नसेल की, त्यांच्या मागे उभा असलेला हा मुलगा एके दिवशी त्यांचा पक्ष (DMK) उद्ध्वस्त करेल". राम गोपाल वर्मा यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. Kalaingar wouldn’t have dreamed that the kid behind him would one day destroy his party 🙏👍🔥pic.twitter.com/7NNp6Ge73S दरम्यान, विजयचा राजकारणातील उदय हा केवळ त्यांच्या स्टारडमचा परिणाम नसून, मागील १५ वर्षांच्या सखोल आणि नियोजनबद्ध कामाचा परिणाम आहे. आपल्या फॅन क्लब्सना संघटित करून मजबूत राजकीय आधार तयार करण्याच्या रणनीतीमुळेच TVK ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे. सुपरस्टार विजयनं २०२४ मध्ये तमिळगा वेत्री कळगम (TVK) नावाच्या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर विक्रवंडी येथे झालेल्या पहिल्या सभेत तब्बल ८ लाखांची गर्दी जमवली. सुरुवातीला ही गर्दी केवळ सुपरस्टारच्या लोकप्रियतेचा परिणाम मानली गेली, मात्र २०२६ च्या निवडणूक निकालांनी या आकलनाला पूर्णपणे खोटे ठरवले.
82 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 02:05 PM
पशुधनाच्या शेतकऱ्यांसाठी सरकारने टोल-फ्री हेल्पलाईन'1962'सुरू केली

पशुधनाच्या शेतकऱ्यांसाठी सरकारने टोल-फ्री हेल्पलाईन'1962'सुरू केली

चंद्रपूर :ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी पशुधन हे उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे. मात्र, जनावरे आजारी पडल्यास त्यांना दवाखान्यात नेणे हे वेळखाऊ आणि खर्चिक ठरत असे. या समस्येवर उपाय म्हणून शासनाने '१९६२' ही टोल-फ्री हेल्पलाइन सुरू केली आहे. आता शेतकऱ्यांना केवळ एक फोन कॉल केल्यावर तज्ज्ञ पशुवैद्यकीय सेवा थेट त्यांच्या बांधावर उपलब्ध होणार आहे. या सेवेंतर्गत प्रशिक्षित डॉक्टर, औषधे आणि आवश्यक उपकरणांसह मोबाइल व्हेटरनरी क्लिनिक घटनास्थळी पोहोचते. त्यामुळे उपचारात होणारा विलंब टळून पशुधनाचे प्राण वाचत आहेत. विशेषतः दुभत्या जनावरांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैशाची बचत होत आहे. पशुधनासाठी '१९६२' ही टोल-फ्री हेल्पलाइनशासनाकडून सुरू केलेली '१९६२' ही हेल्पलाइन पूर्णपणे टोल-फ्री आहे. पशुधन आजारी असल्यासशेतकरीत्वरित या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. डॉक्टर शेतकऱ्यांना जनावरांच्या देखभालीबाबत मार्गदर्शन करतात. आहार, स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती दिली जाते. एका कॉलवर घरपोच पशुवैद्यकीय सेवाएक फोन कॉल केल्यानंतर डॉक्टर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचतात. औषधे आणि प्राथमिक उपचार तत्काळ उपलब्ध करून दिले जातात. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि आर्थिकही बचत होते. हेल्पलाइनवर कॉल करणे पूर्णपणे मोफत आहे. सेवा अत्यल्प दरात किंवा शासनाच्या योजनेनुसार उपलब्ध केली जाते. हेल्पलाइनवर कॉल करणे पूर्णपणे मोफत आहे. हेल्पलाइनद्वारे मिळणाऱ्या प्रमुख सेवातपासणी, औषधोपचार, लसीकरण आणि प्राथमिक शस्त्रक्रिया सेवा दिल्या जातात. तसेच विविध आजारांबाबत तज्ज्ञ सल्लाही दिला जातो, यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. या सेवेमुळे जनावरांना वेळेत उपचार मिळत असल्याचे विभागाने सांगितले. Heatstroke : खिशात कांदा ठेवल्याने ऊन लागत नाही, हे खरं आहे का? काय आहे यामागचं लॉजिक
32 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 02:02 PM
आयपीएल 2026: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज-प्लेऑफ बर्थच्या शोधात निर्णायक सामना

आयपीएल 2026: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज-प्लेऑफ बर्थच्या शोधात निर्णायक सामना

IPL 2026 DC vs CSK : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरदिल्ली कॅपिटल्सआणिचेन्नई सुपर किंग्सप्लेऑफ्सच्या शर्यतीत आगेकूच करण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. या महत्त्वपूर्ण सामन्यात दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! DC ला मोठा दिलासा, CSK दोन बदलासह उतरला मैदानात दिल्ली कॅपिटल्सला यासामन्यात मोठा दिलासा मिळाला आहे. कारण दुखापतीतून सावरून लुंगी एनिग्डी पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. कायले जेमिसनच्या जागी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूलाचेन्नई सुपर किंग्सच्यासंघाने दुखापतग्रस्त रामकृष्ण घोषसह दोन बदलासह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. फिरकीपटू अकिल होसीन आणि गुरजपनीत सिंग यांनी चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने कमबॅकची संधी दिली आहे. २७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं दिल्ली पराभवाची परतफेड करणार? यंदाच्या हंगामातील दोन्ही संघातील हा दुसरा सामना आहे. याआधीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सच्या २३ धावांनी पराभूत केले होते. घरच्या मैदानात या पराभवाची परतफेड करत दिल्ली कॅपिटल्स दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत आपले स्थान अधिक भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील असेल. चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, डेवॉल्ड ब्रेविस, जेमी ओवर्टन, अकिल होसेन, नूर अहमद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, गुरजपनीत. दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल (यष्टीरक्षक, पथुम निसंका, करुण नायर, ट्रिस्टन स्टब्स, नितीश राणा, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, लुंगी एनिग्डी, टी नटराजन.
50 shares
😊
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 01:58 PM
रेफ्रिजरेटरशिवाय थंड रहाः थंड पाण्यासाठी अद्वितीय हॅक

रेफ्रिजरेटरशिवाय थंड रहाः थंड पाण्यासाठी अद्वितीय हॅक

देशभरातील तापमान सध्या कमालीचं वाढलं आहे. वाढत्या उष्णतेमुळे लोक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळी तर घरातून बाहेर पडू नये अशी स्थिती आहे. अंगाची नुसती लाहीलाही होतेय.अशा स्थितीत घरामध्ये जर फ्रीज नसेल तर समस्या आणखी वाढतात. थंडगार पाण्यामुळे तात्पुरतं का होईना, थोडं गार वाटतं. पण जर फ्रीज नसेल तर थंड पाणी कुठून आणायचं? तुमच्या या प्रश्नाचं उत्तर या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आहे.जर तुमच्याकडे फ्रीज नसेल, तर काळजी करू नका. घरामध्ये जे मातीचं मडकं असतं, त्यामध्येच तुम्ही फ्रीजसारखं थंडगार पाणी मिळवू शकता. पण कसं? चला जाणून घेऊया हा युनिक हॅक.पाणी कसं थंड करायचं?हा सोपा हॅक तुम्ही santuchoudhary_04 या इन्स्टाग्राम पेजवर पाहू शकता. या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक मातीचं मडकं घ्या. या मडक्याभोवती काथ्याची दोरी गुंडाळा. (नारळाच्या सालीपासून बनवलेली दोरी)मग मडक्यामध्ये पाणी भरा आणि थोडं पाणी मडक्याभोवती बांधलेल्या दोरीवर टाका. या ओल्या दोरीमुळे बाहेरची उष्णता मडक्यावर थेट पडत नाही. परिणामी पाणी थंडगार राहतं.बरं, हा हॅक फारच सोपा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी थंड करण्यासाठी वीजेची गरजही लागत नाही. त्यामुळे लाईट बिलचे पैसेही वाचतात आणि फ्रीजच्या मेंटेनन्सची झंझटही संपते.(फोटो सौजन्य - santuchoudhary_04/Instagram)हा व्हिडिओ होतोय व्हायरल​View this post on InstagramA post shared by Santu Choudhary (@santuchoudhary_04)​हा व्हिडिओ ५० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच अनेकांनी या व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतंय, आता फ्रीजचे पैसे वाचले, तर कोणी म्हणतंय, हा हॅक भारताच्या बाहेर जाऊ देऊ नका.असो, तुम्हाला हा आपला देसी जुगाड हॅक कसा वाटला? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.
19 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 01:57 PM
रुग्णालयात नेत असताना महिलेचा मृत्यू झाल्याने पत्रकाराच्या मानवतावादी प्रयत्नांचा शोकांतिका अंत

रुग्णालयात नेत असताना महिलेचा मृत्यू झाल्याने पत्रकाराच्या मानवतावादी प्रयत्नांचा शोकांतिका अंत

अहेरी/ एटापल्ली :आरोग्य सुविधेचा दुष्काळ आणि खड्डेमय रस्त्यांचा शाप काय असतो, याचा विदारक अनुभव पुन्हा एकदा दुर्गम एटापल्ली तालुक्यात ४ मे रोजी आला. घरगुती कारणावरून विष प्राशन केलेल्या एका माऊलीला वाचवण्यासाठी तिच्या नातेवाईकांनी तिला चक्क दुचाकीवर आडवे ठेऊन सुसाट वेगाने सहा किमी अंतर कापून रुग्णालय गाठले. 'लोकमत'चे अहेरी तालुका प्रतिनिधी प्रतीक मुधोळकर यांनी माणुसकीच्या नात्याने स्वतः रुग्णवाहिकेचे स्टेअरिंग हाती घेऊन शर्यत लावली, मात्र दुर्दैवाने या संघर्षात प्रयत्न हरले आणि मृत्यू जिंकला ! मीरा गणेश लेखामी (२५,रा. कांदोळी ता. एटापल्ली) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. एटापल्ली तालुक्यातील बुर्गी-कांदोळी मार्गावर ४ मे रोजी दुपारी १२ वाजता एका दुचाकीवर दोघे जण मीरा लेखामी यांना आडवे पकडून जीवाच्या आकांताने येत होते. त्याचवेळी समोरून खासगी कामासाठी दुचाकीवरुन येणारे 'लोकमत'चे प्रतिनिधी प्रतीक मुधोळकर यांना हे दृश्य दिसले. त्यांनी दुचाकी वळवून पाठलाग करत विचारणा केली असता, महिलेने विष घेतल्याचे समजले. मुधोळकर यांनी त्यांना ओव्हरटेक करत तात्काळ सहा बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून डॉक्टरांना सतर्क केले. रुग्णवाहिकेचा चालक रजेवर, 'सक्शन'ची नळीही खराब ​बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. गीतांजली खिरटकर यांनी यंत्रणा सज्ज ठेवली, पण विषारी द्रव पोटाबाहेर काढण्यासाठीच्या सक्शन या यंत्राची नळी खराब होती, त्यामुळे त्यांना तात्काळ एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात हलविण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, त्याचवेळी रुग्णवाहिकेचा चालक रजेवर असल्याने मोठी अडचण झाली होती. यावेळी 'लोकमत'चे प्रतिनिधी प्रतीक मुधोळकर यांनी रुग्णवाहिकेची चावी द्या, मी त्यांना रुग्णालयात पोहोचवितो, अशी विनंती केली, माणुसकीचा भाग म्हणून डॉ. खिरटकर यांनीही रुग्णवाहिकेची चावी दिली. त्यानंतर मीरा लेखामी यांना घेऊन मुधोळकर यांनी खराब रस्ते आणि खड्ड्यांतून वाट काढत अवघ्या २५ मिनिटांत रुग्णवाहिका एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात पोहोचविली. ​डॉक्टरांनी शर्थ केली, पण मृत्यूने गाठलेच ​एटापल्लीत डॉ. उईके आणि त्यांच्या चमूने 'सक्शन'द्वारे विष बाहेर काढण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न केले. अर्धा तास ऑक्सिजन आणि उपचारांची झुंज सुरू होती. मात्र, तिची प्राणज्योत मालवली आणि उपस्थित सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्या.
85 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 01:30 PM
इंडिगो विमानाच्या पॉवर बँकेला आग, प्रवाशांची सुखरूप सुटका

इंडिगो विमानाच्या पॉवर बँकेला आग, प्रवाशांची सुखरूप सुटका

Power Bank Catches Fire On IndiGo Flight:हैदराबादहून चंदीगडला पोहोचलेल्याइंडिगोच्याविमानात मंगळवारी दुपारी लँडिंगनंतर अचानक धूर पसरल्याने एकच खळबळ उडाली. एका प्रवाशाच्या पॉवर बँकचा स्फोट झाल्यामुळे हीआगलागली असून, सुरक्षेच्या कारणास्तव आपत्कालीन स्लाइडद्वारे सर्व १९८ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. नेमकी घटना काय? मंगळवारी दुपारी साधारण ३.२९ वाजता हे विमान चंदीगड आंतरराष्ट्रीयविमानतळावरउतरले. विमान टॅक्सी वेवरून पार्किंग बे कडे जात असतानाच एका प्रवाशाच्या सीट पॉकेटमधील पाऊचमध्ये असलेल्या पॉवर बँकचा अचानक स्फोट झाला. या घटनेनंतर विमानाच्या केबिनमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला. विमान कर्मचाऱ्यांची तत्परता विमानातील कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन अग्निशमन बाटल्यांचा वापर करूनआगविझवली. धूर पसरल्यामुळे तातडीने आपत्कालीन प्रोटोकॉल लागू करण्यात आला आणि विमानाचे सर्व सहा आपत्कालीन दरवाजे उघडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. एका प्रवाशाला इजा आपत्कालीन स्लाइडवरून खाली उतरताना एका महिला प्रवाशाच्या घोट्याला दुखापत झाली आहे. तिला तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यात आली असून उर्वरित सर्व १९८ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याचे एअरलाईन्सने स्पष्ट केले आहे. DGCA आणिइंडिगोचेस्पष्टीकरण नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉवर बँक सीट पॉकेटमध्ये असतानाच पेटली होती. इंडिगोने एका निवेदनात म्हटले की, "५ मे २०२६ रोजी घडलेल्या या घटनेनंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे टर्मिनलवर नेण्यात आले आहे. सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी हे विमान पुन्हा सेवेत येण्यापूर्वी त्याची पूर्ण तपासणी केली जाईल".
60 shares
😢
M
Maharashtra Times
May 5, 2026, 01:30 PM
'थलाल द मॅग'मालिकाः सायलीने बदला घेतल्याने प्रियाचे खोटे उघड

'थलाल द मॅग'मालिकाः सायलीने बदला घेतल्याने प्रियाचे खोटे उघड

मुंबई -' ठरलं तर मग ' मालिकेमध्ये सध्या स्टार प्रवाहच्या १३ नायिका म्हणून प्रियाचे 'तीन-तेरा' वाजवतायत. काही दिवसांतच प्रियाचा खोटेपणा सुभेदार आणि किल्लेदारांसमोर येणार आहे. प्रिया खोटी तन्वी बनवून सुभेदार आणि किल्लेदारांच्या घरात वावरतेय, हे सत्य सायली आणि अर्जुन मिळून सर्वांसमोर आणणार आहेत. प्रियाचे अफेअर, पूर्णा आजीला दिलेला त्रास, अस्मिताच्या बाळाला संपवण्याचा प्रयत्न, त्याचबरोबर सायलीला जीवे मारण्याचा प्रयत्न असे प्रियाचे कारनामे सुभेदारांसमोर आले आहेत. अशातच आता स्टार प्रवाहनं नुकताच 'ठरलं तर मग' या मालिकेचा प्रोमो शेअर केलाय. यामध्ये सायली प्रियाला हाताला धरून घराबाहेर काढताना दिसतेय.'ठरलं तर मग' मालिकेचा प्रोमोस्टार प्रवाहनं शेअर केलेल्या 'ठरलं तर मग'मालिकेच्याप्रोमोमध्ये सायली प्रियाला चांगलीच चपराक देते आणि म्हणतेय, 'प्रिया या सगळ्यांच्या अश्रूंचा बदला मी घेणार! तुला इतकं मारणार, इतकं मारणार की, मारून-मारून तुला शिक्षा देणार. चल बाहेर हो, तुझ्या सगळ्या पापांची, छोट्या-मोठ्या सगळ्या गुन्ह्यांची तुला शिक्षा होणार! तू तन्वी नाहीयेस हे आता मी सर्वांना सांगणार, ते सुद्धा पुराव्यासकट…' असं म्हणत सायली प्रियाला फरफटत घराबाहेर काढते. त्याचबरोबर पोलीससुद्धा प्रियाला अटक करण्यासाठी आलेले दिसतायत. सायली, प्रियाच्या कानाखालीसुद्धा लागवते.View this post on InstagramA post shared by Star Pravah (@star_pravah)शेवटी सायलीप्रेक्षकांनाउद्देशून म्हणतेय, 'कुठेही जाऊ नका अजून हिशोब बाकीये' स्टार प्रवाह वाहिनीनं मालिकेचा प्रोमो शेअर करत, 'होणार प्रियाचा हिशोब...अखेर सायली वाजवणार प्रियाचे तीन तेरा..' असं कॅप्शन लिहिलं आहे.Dnyanesh Wadekar | रुमाल अन् प्रेमपत्र.. नागराजनं सांगितलं खऱ्या आयुष्यात त्यांचं लग्न कसं ठरलं!प्रोमोवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियाप्रोमोवर नेटकऱ्यांनीहीप्रतिक्रियादेत उत्सुकता दर्शवली आहे. 'ह्याच तर दिवसाची वाट पाहत होतो', 'मस्त मज्जा आली', 'आता तरी खरं समोर येणार', 'एक नंबर' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. त्यामुळे आता 'ठरलं तर मग' मालिकेमध्ये सायली प्रियाचं सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी काय प्रयत्न करणार आणि प्रिया आणखी नवा डाव रचणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
50 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 01:25 PM
प्राजक्ता मालीने तणाव, चिंता आणि अतिविचार व्यवस्थापित करण्यासाठी दिलासादायक सल्ला दिला

प्राजक्ता मालीने तणाव, चिंता आणि अतिविचार व्यवस्थापित करण्यासाठी दिलासादायक सल्ला दिला

Prajakta Mali on Stress Anxiety Overthinking :प्राजक्ता माळीही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. प्राजक्ता ही तिच्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. तिनं अनेक मालिका-चित्रपटांत काम केले. महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुराही यशस्वीपणे सांभाळली आहे. ती कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. प्राजक्ताचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. चाहत्यांना तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असते.प्राजक्ता माळीनेइन्स्टाग्रामवर चाहत्यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. यावेळी एकाने तिला "तणाव, चिंता आणि अतिविचारसाठी काय करू शकतो?" असा प्रश्न केला. यावर प्राजक्तानं त्याला ध्यान करण्याचा सल्ला दिला. याशिवाय आणखी एका चाहत्यानं तिला "जेव्हा मन खचतं, उदास वाटतं, तेव्हा काय करतेस?" असं विचारलं. यावर प्राजक्ता म्हणाली, "जेव्हा मला उदास वाटते, तेव्हा मी ध्यान करते. ध्यान करून मी स्वतःला पुन्हा ऊर्जावान आणि सावरण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर, कामामुळे माझा उत्साह टिकून राहतो". प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची 'फुलवंती' सिनेमात दिसली. २०२४ साली हा सिनेमा आला होता. तर मधल्या काळात ती 'देवखेळ' या वेबसीरिजमध्ये दिसली. आता प्राजक्ता जून नंतर एखाद्या प्रोजेक्टमध्ये दिसू शकते असाही तिने खुलासा केला आहे.
30 shares
😢
Pudhari logo
Pudhari
May 5, 2026, 01:21 PM
टीका होत असताना नागराज मंजुळेसोबतच्या सहकार्याचा लेखक सुधाने यांनी केला बचाव

टीका होत असताना नागराज मंजुळेसोबतच्या सहकार्याचा लेखक सुधाने यांनी केला बचाव

A post shared by Nagraj Popatrao Manjule (@nagraj_manjule) नागराज मंजुळे यांनी संपर्क साधला असता प्रतिसाद दिला नाही. लेखक दुधाणे म्हणाले की, जिओ स्टुडिओ आणि ज्योती देशपांडे यांना आमचा विरोध नाही. मात्र मंजुळे यांनी माझ्यावर केलेल्या ५ कोटींच्या अब्रुनुसान दाव्यातूनच चित्रपट माझ्या पुस्तकाावर आधारित असल्‌याचे सिद्ध होते. प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने अधिक भाष्य मला करता येत नाही.
94 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 01:16 PM
लहान मुलांच्या हल्ल्यात पुण्यातील तरुणाचा मृत्यू

लहान मुलांच्या हल्ल्यात पुण्यातील तरुणाचा मृत्यू

स्नेहल निमगिरे, पुणे :पुण्यात पुन्हा एकदा कोयत्याच्या दहशतीने शहर हादरून गेलं आहे. आंबेगाव पठार परिसरात घडलेली ही घटना इतकी थरारक आहे की ऐकणाऱ्यांच्या अंगावर काटा येतो. किरकोळ कारणावरून एका १८ वर्षीय तरुणाचा भररस्त्यात अत्यंत निर्घृण खून करण्यात आला. रविवारी रात्री सुमारे ९.१५ वाजता निलगिरी चौक परिसरात नयन सचिन जाधव (वय १८) हा तरुण नेहमीप्रमाणे परिसरात उभा होता. काही दिवसांपूर्वी त्याचा काही मुलांशी छोटासा वाद झाला होता. तो वाद तिथेच मिटेल असं वाटत असतानाच त्या वादाने भयंकर रूप घेतलं.“शिवी का दिलीस?”त्या रात्री अचानक चार ते पाच मुलांचा गट तिथे आला. सुरुवातीला बघण्यावरून पुन्हा चकमक झाली. “काय बघतोस?”, “शिवी का दिलीस?” अशा क्षुल्लक कारणांवरून वाद पेटला. काही क्षणांतच वातावरण तापलं आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. आरोपींनी अचानक कोयता आणि सिमेंट ब्लॉक हातात घेतले. नयन काही समजायच्या आतच त्याच्यावर हल्ला सुरू झाला. डोक्यावर जोरदार वार करण्यात आले. तो खाली कोसळला, पण हल्ला थांबला नाही. वारांवर वार होत राहिले आणि परिसरात भीतीचं वातावरण पसरलं.लोक ओरडत बाहेर आले, पण तोपर्यंत सगळं संपलं होतं. नयन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत पळून गेले. काही क्षणात शांत परिसरात किंकाळ्या आणि गोंधळ सुरू झाला.Pune Crime : मार्कशीटवर खाडाखोड अन् बापाचं डोकं फिरलं; 9 वर्षांच्या पोटच्या मुलीला निर्घृणपणे संपवून घराला आग लावलीसापळा कारवाई आणि गुन्ह्याची कबुलीघटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसर सील करण्यात आला. तपास सुरू झाला आणि काही तासांतच पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. आरोपी सातारा रोडवरील वेळू परिसरात लपल्याची खात्री झाली. पोलिसांनी तातडीने सापळा रचला आणि धाड टाकून चारही विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे समोर आले आहे.रागाने तरुणाचा जीव गेलापोलिस तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे की, हा खून कोणत्याही मोठ्या कारणामुळे नव्हे तर केवळ “चापट मारली” आणि “शिवी दिली” या किरकोळ कारणावरून झाला आहे. क्षणिक रागाने एकातरुणाचा जीवघेतला गेला.या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण असून नागरिकांमध्ये संताप आहे. अल्पवयीन मुलांमध्ये वाढणारी हिंसक प्रवृत्ती आणि कोयत्याचा वाढता वापर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. पोलिसांकडूनपुढील तपास सुरू आहे.
24 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 01:13 PM
बिहारमध्ये रेल्वे अपघातात दोन महिलांचा मृत्यू

बिहारमध्ये रेल्वे अपघातात दोन महिलांचा मृत्यू

Bihar Railway Accident:बिहारच्यापाटणा जिल्ह्यातील बख्तियारपूर जंक्शनवर सोमवारी एक हादरवणारी घटना घडली. रेल्वे ट्रॅक ओलांडून प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांचा भरधाव ट्रेनखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. या भीषणअपघातामुळेस्थानकावर एकच खळबळ उडाली असून, ही संपूर्ण घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. मिळालेल्या माहितीनुसार, ६२ वर्षीय इंतर देवी या आपल्या भाचीला रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी आल्या होत्या. पाटण्याच्या दिशेने जाण्यासाठी त्या रेल्वे ट्रॅक ओलांडून प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ च्या दिशेने जात होत्या. त्याच वेळी न्यू फरक्का एक्सप्रेस अत्यंत वेगाने प्लॅटफॉर्मवरून गेली. ट्रेन इतक्या वेगाने आली की या महिलांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. एका प्रवाशाने प्लॅटफॉर्मवरून आपला हात पुढे करून त्यांना वर ओढण्याचा बराच प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला. दोन्ही महिला इंजिनच्या तडाख्यात सापडल्या आणि त्यांचा जागीच अंत झाला. कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर मृत महिला बख्तियारपूर येथे एका लग्न समारंभासाठी आल्या होत्या. ज्या घरात लग्नाचा उत्साह होता, तिथे आता या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. इंतर देवी या गया जिल्ह्यातील मानपूरच्या रहिवासी होत्या, तर संगीता देवी या रामनगर दियारा येथील रहिवासी होत्या. स्थानकावर तणाव आणि रेल्वे पोलिसांची कारवाई अपघातानंतरस्थानकावर मोठी गर्दी जमा झाली आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून जीआरपी आणि आरपीएफच्या तुकड्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे. ओव्हरब्रिजची मागणी ऐरणीवर बख्तियारपूर स्थानकाच्या टोकावर मुख्य प्रवेशद्वार आणि बुकिंग काउंटर असल्याने तिथे प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र, जवळच ओव्हरब्रिज नसल्यामुळे प्रवासी घाईघाईत रेल्वे ट्रॅक ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातात. या जीवघेण्या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी येथे तातडीने ओव्हरब्रिज बांधण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
35 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 01:13 PM
कॉग्निझंटला मोठ्या कामावरून काढून टाकण्याचा सामना करावा लागत आहे, भारताला याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता

कॉग्निझंटला मोठ्या कामावरून काढून टाकण्याचा सामना करावा लागत आहे, भारताला याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता

मुंबई:आयटी क्षेत्र पुन्हा एकदा मोठ्या कर्मचारी कपातीच्या धोक्याचा सामना करत आहे. कॉग्निझंट आपल्या जागतिक कर्मचारी संख्येत लक्षणीय कपात करण्याचा विचार करत आहे. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, 12,000 ते 15,000 कर्मचारी आपली नोकरी गमावू शकतात. याचा सर्वात मोठा परिणाम भारतात अपेक्षित आहे, जिथे कंपनीचे निम्मेहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.29 एप्रिल रोजी, कंपनीने आपल्या'प्रोजेक्ट लीप' या नवीन प्रकल्पाअंतर्गत 230 मिलियन ते 320 मिलियन डॉलर खर्चाचा अंदाज वर्तवला. कंपनीने कर्मचारी कपातीची संख्या अधिकृतपणे जाहीर केली नाही. कॉग्निझंटमध्ये 3,50,00 हून अधिक कर्मचारी आहेत, त्यापैकी 2,50,000 हून अधिक भारतात आहेत. त्यामुळे, कोणत्याही मोठ्या निर्णयाचा परिणाम येथे जाणवण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार, भारतातील सरासरी पगार वार्षिक सुमारे 15 लाख रुपये आहे. जर सेवा समाप्ती वेतन सहा महिन्यांच्या पगाराएवढे असेल, तर प्रति कर्मचारी खर्च अंदाजे 7.5 लाख रुपये होईल. या आधारावर, असा अंदाज आहे की केवळ भारतातच 12,000 ते 13,000 नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो.अमेरिकेसारख्या देशांमध्ये पगार खूप जास्त आहेत. तेथील सरासरी पगार वार्षिक सुमारे 1 लाख डॉलर पर्यंत पोहोचते. परिणामी, चार ते सहा महिन्यांचा सेवा समाप्ती मोबदला (सेव्हरन्स पे) प्रति कर्मचारी सुमारे 50000 डॉलर इतका असतो. त्यामुळे, त्याच बजेटमध्ये कमी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाऊ शकते. यामुळेच एकूण कर्मचारी कपातीमध्ये भारताचा वाटा जास्त असण्याची शक्यता आहे.आयटी उद्योगातील कामाच्या पद्धती झपाट्याने बदलत आहेत. कंपन्या जुन्या पिरॅमिड मॉडेलपासून दूर जात आहेत. तज्ञांच्या मते, ग्राहक आता कमी लोकांपेक्षा मोठ्या टीम्सना प्राधान्य देत आहेत. ते नवीन कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर खर्च करण्यास तयार नाहीत. कंपनीचे सीईओ, रवी कुमार एस, यांनी असेही सूचित केले आहे की कंपनी एक लहान आणि अधिक कार्यक्षम कर्मचारी मॉडेल स्वीकारेल, जे डिजिटल आणि मानवी श्रमांना एकत्र करेल.Ai आणि ऑटोमेशनचा प्रभावकर्मचारी कपातीची सर्वात मोठी कारणे ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत. कंपन्या आता कमी लोकांसह अधिक उत्पादकता मिळवू पाहत आहेत. ॲप्लिकेशन मेंटेनन्स आणि सपोर्ट यांसारख्या पारंपरिक आयटी सेवांची मागणी पूर्वीइतकी राहिलेली नाही. परिणामी, कंपन्या खर्च कमी करण्यावर आणि नफ्याचे प्रमाण सुधारण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत.आयटी क्षेत्रात हा ट्रेंड नवीन नाही. गेल्या वर्षभरात अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, ॲक्सेंचर, एचसीएलटेक आणि ओरॅकल यांसारख्या कंपन्यांनीही आपल्या वर्कफोर्सची पुनर्रचना केली आहे. कॉग्निझंटनेही यापूर्वी असेच एक पाऊल उचलले आहे. 2023-24 दरम्यान, कंपनीने आपल्या नेक्स्टजेन प्रोग्राम अंतर्गत अंदाजे 3,500 नोकऱ्या कमी केल्या आणि कार्यालयाची जागा लक्षणीयरीत्या कमी केली.
6 shares
😢
L
Lokmat
May 5, 2026, 01:12 PM
वनडोंगरीमध्ये नायब तहसीलदार घरात लटकलेला आढळला

वनडोंगरीमध्ये नायब तहसीलदार घरात लटकलेला आढळला

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणा :वारंवार दार ठोठावून तसेच फोन करून भाऊ प्रतिसाद देत नसल्याने भेटायला आलेल्या बहिणीने शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता, बहिणीला तिचा भाऊ छताला लटकलेल्या अवस्थेत दिसला. भाऊ मौदा तहसील कार्यालयात नायब तहसीलदारपदी कार्यरत होता तसेच त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. ही घटना एमआयडीसी (हिंगणा) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वानाडोंगरी येथे रविवारी (दि. ३) रात्री ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. वैभव रामेश्वर राठोड (४२, रा. ग्रीन फिल्ड सोसायटी, वानाडोंगरी, ता. हिंगणा) असे मृताचे नाव आहे. ते मागील काही महिन्यांपासून मौदा तहसील कार्यालयात नायब तहसीलदारपदी कार्यरत होते. ते पत्नी, मुलगा व मुलीसोबत वानाडोंगरी येथील ग्रीन फिल्ड सोसायटीतील फ्लॅटमध्ये राहायचे. त्यांच्या मेव्हण्याकडे विवाह सोहळा असल्याने पत्नी, मुलगा व मुली लग्नासाठी गेल्याने तसेच रविवारी सुटी असल्याने ते घरी एकटेच होते. दरम्यान, कळमनुरी (जिल्हा हिंगोली) येथे राहणारी त्यांची बहीण रविवारी रात्री त्यांना भेटण्यासाठी आली होती. फ्लॅटचे दार आतून बंद असल्याने तिने दार ठोठावले प्रतिसाद न मिळाल्याने तिने त्यांच्या मोबाइल फोनवर वारंवार कॉल केले. ते प्रतिसाद देत नसल्याने तिने शेवटी शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना कळविले. पोलिसांनी दार उघडून बघितले असता, ते बेडरूममध्ये छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होताच पोलिसांनी पाहणी व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.
29 shares
😐
L
Lokmat
May 5, 2026, 01:05 PM
महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ शेतकऱ्यांकडून भरड धान्य खरेदी करणार

महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ शेतकऱ्यांकडून भरड धान्य खरेदी करणार

नाशिक :महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई कार्यालयामार्फत हंगाम 2025-2026 साठी राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार भरडधान्य ( ज्वारी, मका, बाजरी, रागी) खरेदी करण्यात येणार आहे. खरेदीकरीता BeAM पोर्टलवर केंद्र शासनाच्या सूचनांनुसार आधार प्रमाणीकरण नोंदणीसाठी 15 मे 2025 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ई-समृध्दी पोर्टलवर विहित मुदतीत नोंदणी करुन आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अति.प्र. जिल्हा पणन अधिकारी आर. एस. इंगळे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. खरेदी प्रक्रिया 1 मे ते 30 जून 2026 या कालावधीत होणार आहे. रब्बी हंगाम 2025-26 मधील ज्वारी, मका, बाजरी व रागी चा पिकपेरा नमुद असलेला 7/12 उताऱ्याची मूळ प्रत, आधारकार्ड छायांकीत प्रत, बँक खाते (राष्ट्रीयकृत) पासबुकच्या प्रथम पानाची छायांकीत प्रतीसह तालुक्यातील खरेदी केद्रांवर ऑनलाईन नोंदणी करावी. त्यासाठी पणन महासंघाने 19 खरेदी केंद्र मंजूर केलेले आहेत. असे आहेत तालुकानिहाय मंजूर खरेदी केंद्र व संपर्क क्रमांक शेतकऱ्यांनी खरेदीसाठी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एस.एम.एस. द्वारे माल घेवून येण्याचा दिनांक कळविला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांना ज्वारी, मका, बाजरी व रागी ची विक्री करावयाची आहे. त्या शेतकऱ्यांनी स्वत: नोदंणीच्या ठिकाणी उपस्थित राहवे. नोंदणी व खरेदीसाठी आपआपल्या तालुक्यातील संबंधीत भरडधान्य खरेदी केंद्रावर संपर्क साधावा, असेही अति.प्र. जिल्हा पणन अधिकारी इंगळे यांनी कळविले आहे. Soyabean Market : सोयाबीनच्या दराची MSP च्या दिशेने वाढ, चालू मे महिन्यात क्विंटलमागे किती रुपये मिळतील!
13 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 01:05 PM
ज्येष्ठ पंचांगकारांनी 2040 पर्यंतच्या शुभ अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या तारखा उघड केल्या

ज्येष्ठ पंचांगकारांनी 2040 पर्यंतच्या शुभ अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या तारखा उघड केल्या

ठाणे: आज अंगारकी संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधत ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी पुढील २०४० पर्यंतच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. गणेशभक्तांसाठी अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या या दिवसांची माहिती मिळाल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व असून, मंगळवारी येणारी संकष्टी म्हणजेच ‘अंगारकी संकष्टी’ अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी भगवान गणेशाची उपासना केल्यास सर्व संकटे दूर होतात, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे वर्षभरात येणाऱ्या अंगारकी संकष्टीच्या दिवसांची माहिती जाणून घेण्यासाठी भाविकांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. आजच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी पुढील अनेक वर्षांसाठी या महत्त्वाच्या दिवसांचा तपशील जाहीर केला आहे. त्यांच्या पंचांगानुसार २०२७ पासून ते २०४० पर्यंत विविध वर्षांमध्ये येणाऱ्या अंगारकी संकष्टीच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. या यादीत २२ जून २०२६ पासून सुरुवात होत असून, पुढे ८ ऑगस्ट २०२८, ५ डिसेंबर २०२८, १ मे २०२९, २२ जानेवारी २०३०, १८ जून २०३०, १ ऑक्टोबर २०३०, २ डिसेंबर २०३१, ३० मार्च २०३२, १७ मे २०३३, ११ ऑक्टोबर २०३३, २८ नोव्हेंबर २०३४, २७ मार्च २०३५, १३ मे २०३६, ९ सप्टेंबर २०२६, ३ फेब्रुवारी २०३७, २७ ऑक्टोबर २०३७, २३ मार्च २०३८, १२ एप्रिल २०३९, ६ सप्टेंबर २०३९, ३ जानेवारी २०४० अशा विविध तारखांचा समावेश आहे. तसेच पुढील वर्षांमध्येही नियमित अंतराने अंगारकी संकष्टी येत राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या तारखांमुळे गणेशभक्तांना उपवास, पूजा आणि धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन आधीच करता येणार आहे. अनेकजण या दिवशी उपवास करून चंद्रदर्शनानंतरच भोजन करतात, तर काही ठिकाणी मंदिरांमध्ये विशेष पूजा, आरती आणि भजनाचे आयोजन केले जाते. पंचांगकर्त्यांनी दिलेल्या या माहितीचा आधार घेऊन भाविकांनी आपल्या धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.अंगारकी संकष्टीचे हे दिवस केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जा देणारे मानले जातात. त्यामुळे या तारखांची माहिती मिळाल्याने भाविकांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
33 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 01:04 PM
विजय सर्वदेशत्रपती संभाजीनगरमधील सिकल सेल एनिमिया मोहिमेचे सकारात्मक परिणाम

विजय सर्वदेशत्रपती संभाजीनगरमधील सिकल सेल एनिमिया मोहिमेचे सकारात्मक परिणाम

- विजय सरवदेछत्रपती संभाजीनगर:सिकलसेल तपासणी किट खरेदीसाठी केवळ जिल्ह्याला मिळालेला ५० लाखांचा निधी फलदायी ठरला. या निधीतून खरेदी केलेल्या किटद्वारे नागरिकांच्या रक्ताची तपासणी केली असता, तब्बल ४२ नवे रुग्ण आणि १८३ नवे वाहक आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९९ रुग्ण आणि ७०६ वाहक सक्रिय असल्याचे निदान झाले असून, सिकलसेल विरोधातील लढ्यातआरोग्ययंत्रणेला यश मिळाले आहे. जिल्ह्यात १५ जानेवारीपासून ७ फेब्रुवारीदरम्यान जिल्हाआरोग्यविभागाने संशयित नागरिकांची रक्त तपासणी करण्याची ‘अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया’ मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली. त्यानंतर आरोग्य विभागाने जिल्ह्यातील ५.५० लाख नागरिकांची तपासणी पूर्ण होईपर्यंत मोहीम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु, रक्त तपासणीसाठी आवश्यक किट नसल्यामुळे आरोग्य विभागाने शासनाकडे ५० लाखांच्या निधीची मागणी केल्यानंतर तो मिळाला. त्या निधीतून तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना गरजेनुसार किट खरेदीच्या सूचना दिल्या. त्या किटद्वारे ४ लाख ६० हजार रक्त तपासण्या केल्या. निधी प्राप्त होण्यापूर्वी २.५ लाख नागरिकांची तपासणी झाली होती. १५ जानेवारीपासून सुरू झालेल्या मोहिमेत तेव्हा ५ नवीन रुग्ण व ३२ वाहक आढळले होते. तर ही मोहीम सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यात ५२ रुग्ण आणि ४९१ वाहक होते. असे एकूण ५७ रुग्ण व ५२३ वाहक आढळून आले होते. आदिवासीबहुल भागात रुग्णसंख्याप्रामुख्याने आदिवासीबहुल भागात रुग्ण, वाहक संख्या मोठी आहे. यात सिल्लोडमध्ये वाहक १६९, रुग्ण ३०, कन्नडमध्ये वाहक २२८, रुग्ण २५, सोयगावमध्ये वाहक ९६, रुग्ण १२, संभाजीनगरमध्ये वाहक ४९, रुग्ण १३, खुलताबादेत वाहक १५, रुग्ण ३, फुलंब्रीत वाहक २५, रुग्ण ०१, गंगापूरमध्ये वाहक ०९, रुग्ण ०७, पैठणमध्ये वाहक ५२, रुग्ण ०३, वैजापूरमध्ये वाहक ६३, रुग्ण ५ आहेत. ५० लाखांचा निधी फलद्रुप ठरलाप्रारंभी या मोहिमेला किटअभावाचा फटका बसला; मात्र शासनाकडून ५० लाखांचा निधी मंजूर होताच मोहिमेला नवसंजीवनी मिळाली. तालुकास्तरावर किट खरेदीला वेग आल्याने तपासण्यांचा आकडा वाढला. या निधीतून खरेदी केलेल्या किटद्वारे ४ लाख ६० हजार नागरिकांच्या रक्त तपासण्या झाल्या. आता प्रत्येक ‘पीएचसी’कडे १०-१५ किट शिल्लक आहेत.- डॉ. अभय धानोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी
78 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 01:02 PM
पश्चिम बंगालमध्ये टीएमसीला बहुमत गमवावे लागल्याने भाजप सरकार स्थापन करणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये टीएमसीला बहुमत गमवावे लागल्याने भाजप सरकार स्थापन करणार आहे.

संपूर्ण भारताचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालचा निकाल सोमवारी (४ मे) जाहीर झाला. भारतीय जनता पक्षाने (भाजप) २९४ पैकी २०६ जागा जिंकून सरकार स्थापन करण्याची तयारी केली आहे. तर १५ वर्षे सत्तेत असलेल्याममता बॅनर्जीयांच्या तृणमूल काँग्रेसला (टीएमसी) अवघ्या ८० जागांवर समाधान मानावं लागलं आहे. या निकालावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेले बॉलिवूडचे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनीममता बॅनर्जींच्यापराभवानंतर आनंद व्यक्त केला आहे. विवेक अग्नीहोत्री यांनी पोस्ट शेअर करत बंगालमधील जनतेचे अभिनंदन केले. त्यानं लिहलं, "ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो, ममता बॅनर्जी यांनी 'द कश्मीर फाइल्स' प्रदर्शित झाल्यानंतर मला पश्चिम बंगालमध्ये 'बॅन' केलं. चित्रपट थिएटरमधून काढून टाकण्यात आला आणि मला बंगालमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असंही सांगण्यात आलं. गेल्या वर्षी त्यांनी 'द बंगाल फाइल्स' वर पूर्णपणे बंदी घातली. आमच्या ट्रेलर लॉन्चलाही अडथळे आणले गेले. आमच्यावर हल्ले झाले, अनेक FIR दाखल करण्यात आले. राज्यपालांकडून मिळणारा पुरस्कार घ्यायलाही मी जाऊ शकलो नाही". पुढे ते म्हणाले. "पण,आम्ही हार मानली नाही. निवडणुकीदरम्यान आम्ही 'द बंगाल फाइल्स' शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचवला.आम्ही आमच्या पद्धतीने लढलो आणि शेवटी... ही अभूतपूर्व विजयाची नोंद झाली. पश्चिम बंगालच्या जनतेचं अभिनंदन. आता तुम्ही भीतीशिवाय, डोकं उंच ठेवून चालू शकता".
88 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 12:58 PM
धाडसी तरुणाच्या ट्रेनच्या वरच्या चढण्याने मुंबईत घबराट

धाडसी तरुणाच्या ट्रेनच्या वरच्या चढण्याने मुंबईत घबराट

कल्याण: बदलापूरहून दादरकडे जाणाऱ्या एसीलोकलट्रेनच्या टपावर चढून एका तरुणाने थरारक प्रवास केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती. यामुळे रेल्वे वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला. दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास विठ्ठलवाडी तेकल्याणदरम्यान एसीलोकलच्याछतावर एक तरुण चढल्याचे आढळून आले. या तरुणाची मानसिक स्थिती ठिक नसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे डब्यातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. विठ्ठलवाडी स्थानकावर रेल्वे पोलिसांनी त्या तरुणाला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो गाडीच्या टपावरुन खाली येण्यास तयार नव्हता. त्यामुळे परिस्थिती लक्षात घेता संबंधित लोकल पुढे कल्याण स्थानकाकडे रवाना करण्यात आली. कल्याण रेल्वे स्थानकावर ट्रेन पोहोचताच रेल्वे पोलीस आणि कर्मचाऱ्यांसह हमालांच्या मदतीने त्या तरुणाला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. अखेर सुमारे ३ वाजता मोठ्या प्रयत्नांनंतर त्याला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात यश आले. त्यानंतर संबंधित तरुणाला तात्काळ रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. काही दिवसापूर्वी एका तरुणाने मद्यधुंद अवस्थेत रेल्वेच्या ओव्हरहेड वायर पोलवर चढल्याची घटना घडली होती. तेव्हा देखील रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. आज पुन्हा एक तरुण एसी ट्रेनच्या टपावर चढून प्रवास करीत असल्याची घटना घडल्याने रेल्वे प्रशासनाची सुरक्षा व्यवस्था फोल ठरली आहे.
9 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 12:56 PM
आयपीएलमधील खराब फॉर्मदरम्यान ऋषभ पंतच्या कामगिरीवर जस्टिन लँगरचे प्रश्नचिन्ह

आयपीएलमधील खराब फॉर्मदरम्यान ऋषभ पंतच्या कामगिरीवर जस्टिन लँगरचे प्रश्नचिन्ह

Justin Langer On Rishabh Pant 27 Crore Price Tag : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातमुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातील पराभवासह लखनौ सुपर जाएंट्सचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. या सामन्यानंतररिषभ पंतच्यानेतृत्वासह फलंदाजीतील त्याच्या खराब कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत होत आहे. यावर लखनौ संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी रोखठोक मत मांडताना पंतसंदर्भात मोठं वक्तव्य केले आहे. २७ कोटी रुपयांची किंमत म्हणजे हमखास चांगली कामगिरी असे नाही, अशा शब्दांत त्यांनी प्राइज टॅगचा मुद्दा गौण असल्याचे सांगत नेतृत्वात पंत कमी पडला हे मान्य केले आहे. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! पंतच्या कामगिरीबद्दल काय म्हणाले कोच?मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवानंतररिषभ पंतच्याकामगिरीबद्दल बोलताना लँगर म्हणाले की, " त्याच्या खराब कामगिरीचा पैशांशी काही संबंध नाही. कर्णधारपद सांभाळणं सोपं नसते. त्याच्यावर प्रचंड दबाव आहे, पण तो सातत्याने मेहनत घेत आहे. पंत जेव्हा आत्मविश्वासाने आणि आनंद घेऊन खेळतो, तेव्हा तो सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसतो. हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर सराव तगडा, त्यामुळे अजूनही कमबॅकची आसदोन दिवसांपूर्वीच्या सराव सामन्यात त्याने ३०-४० चेंडूत ९५ धावा केल्या. तो त्याच्या सर्वोत्तम फॉर्मपासून फार दूर नाही. पंतने कसोटी क्रिकेटमध्ये पाचव्या क्रमांकावर खेळताना अनेक वेळा सामन्याचे पारडे फिरवले आहे, त्यामुळे त्याच्याकडून पुढील सामन्यांत मोठ्या अपेक्षा आहेत, असा विश्वासही लँगर यांनी व्यक्त केला आहे. हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर पंतची निराशजनक कामगिरी लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाने रिषभ पंतसाठी विक्रमी २७ कोटी एवढी मोठी बोली लावून आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या पंतकडे नेतृत्वाची जबाबदारीही देण्यात आली. पण गत हंगामाप्रमाणे यंदाही तो किंमतीप्रमाणे हिंमत दाखवू शकलेला नाही. यंदाच्या हंगामात त्याने पहिल्या ९ डावात २५.५० च्या सरासरीसह १२८.३० च्या स्ट्राईक रेटनं फक्त २०४ धावा केल्या आहेत. त्याच्या बॅटमधून फक्त ७ षटकार पाहायला मिळाले आहेत.
86 shares
😢
Pudhari logo
Pudhari
May 5, 2026, 12:52 PM
इंडिगोचे प्रवासी जखमी, घटनेनंतर विमान तपासणीसाठी वळवण्यात आले

इंडिगोचे प्रवासी जखमी, घटनेनंतर विमान तपासणीसाठी वळवण्यात आले

या घटनेत पाच प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.इंडिगो एअरलाईन्सने या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ‘सर्व प्रवाशांना विमानतळ टर्मिनलपर्यंत सुरक्षितरित्या पोहोचवण्यात आले आहे.प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देतो.सुरक्षा तपासणी झाल्यानंतरच विमान पुन्हा झेपावेल',असे इंडिगोने निवेदनात म्हटले आहे.
7 shares
😐
L
Lokmat
May 5, 2026, 12:39 PM
टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात वन्य डुक्कर पाहून पर्यटकांना आनंद

टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात वन्य डुक्कर पाहून पर्यटकांना आनंद

यवतमाळ:जिल्ह्यातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांना मंगळवारी सकाळीवाघीणीसहबछड्याचे दर्शन झाल्याने सफारीचा अनुभव अविस्मरणीय ठरला. उन्हाळी सुट्ट्यांमुळे आधीच गर्दी असताना, अचानक समोर आलेल्या या जोडीने काही क्षणांसाठी जंगलात रोमांचक वातावरण निर्माण केले. सफारीदरम्यान मुक्तपणे फिरणारीवाघीणआणि तिचा बछडा दिसत पर्यटकांनी आनंद व्यक्त करत हा खास क्षण कॅमेऱ्यात कैद केला. काही क्षणांसाठी सर्वत्र शांतता पसरली होती, तर पुढच्याच क्षणी उत्साहाची लाट उसळली. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याच्या शोधात वन्यप्राणी जलस्रोतांच्या दिशेने वळत असल्याने अशा दर्शनांच्या घटना वाढत असल्याचे वनविभागाने सांगितले. दरम्यान, पर्यटकांनी जंगलातील नियमांचे पालन करून सुरक्षित अंतर राखणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
51 shares
😊
L
Lokmat
May 5, 2026, 12:35 PM
नागपूरच्या भारतीय माहिती आणि तंत्रज्ञान संस्थेत विद्यार्थ्याची आत्महत्या

नागपूरच्या भारतीय माहिती आणि तंत्रज्ञान संस्थेत विद्यार्थ्याची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीच्या द्वितीय वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्याने सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास वसतिगृहाच्या नवव्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचा मोबाइल 'अनलॉक' झाल्यानंतर त्याच्या आत्महत्येचे खरे कारण समजू शकणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. श्रेयस चंद्रकांत माने (२१) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो मूळचा कोल्हापूर येथील रहिवासी असून तो नागपुरातील बुटीबोरी परिसरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीच्या द्वितीय वर्षाला शिकत होता. मंगळवारी श्रेयसची सेमिस्टर परीक्षा सुरू होणार होती. तो वसतिगृहात राहत होता. त्याच्या खोलीत एकूण ४विद्यार्थीराहत होते. परंतु, श्रेयस मागील काही दिवसांपासून खोलीतील मित्रांशीदेखील काही बोलत नव्हता. अभ्यास झाला नसल्यामुळे तो तणावात होता, अशी माहिती त्याच्या खोलीतील विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिल्याची माहिती आहे. सोमवारी पहाटे ४ वाजेनंतर तो खोलीच्या बाहेर निघाला. त्यानंतर तो लिफ्टने नवव्या माळ्यावर गेला. तेथून त्याने उडी मोबाइल अनलॉक झाल्यानंतर कळेल कारण घेतली. यात जखमी झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने बुटीबोरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. बुटीबोरी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी श्वानपथक, ठसेतज्ज्ञ व न्याय वैद्यक विभागाला पाचारण केले. श्रेयसने चौथ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. परंतु, त्याने नेमक्या कोणत्या कारणावरून आत्महत्या केली, हे मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबतनागपूरग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के यांना विचारणा केली असता श्रेयसचा मोबाइल अनलॉक झाल्यानंतर आत्महत्येचे कारण समजू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
26 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 12:35 PM
प्रतिकूलतेवर मातः आदित्य मंगलची प्रेरणादायी यशोगाथा

प्रतिकूलतेवर मातः आदित्य मंगलची प्रेरणादायी यशोगाथा

जितेंद्र खापरे, नागपूर :म्हणतात ना, "पाखरांच्या पंखात बळ असलं की क्षितीजही ठेंगणं वाटतं." नागपूरच्या आदित्य मंगलने हे केवळ ऐकून सोडून दिलं नाही, तर ते सत्यात उतरवून दाखवलं आहे. डोळ्यांत नियतीने कायमचा अंधार दिला असला, तरी त्याने आपल्या अंतर्मनातील प्रकाशाच्या जोरावर यशाचं असं एक शिखर सर केलंय, ज्यासमोर शारीरिक मर्यादाही थिट्या पडल्या आहेत. प्रतिकूल परिस्थिती, घरची बेताची आर्थिक ओढतण आणि रोजचा संघर्षाचा प्रवास... या सगळ्या अडथळ्यांची शर्यत पार करत आदित्यने १२ वीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नियतीला आव्हान देत, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या जिद्दी तरुणाचा प्रवास केवळ एका विद्यार्थ्याचा निकाल नाही, तर संकटांवर मात करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत आहे.शेतकरी कुटुंबातला विद्यार्थीमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात आदित्यने कला शाखेत हे यश मिळवले. नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिक्षण घेणारा आदित्य हा एका साध्या शेतकरी कुटुंबातून आलेला आहे. वडील शेतकरी तर आई गृहिणी, अशा मर्यादित साधनसंपत्तीत वाढलेल्या आदित्यने प्रतिकूल परिस्थितीला कधीही आपल्या मार्गात अडथळा होऊ दिला नाही.“माझ्या डोळ्यांना दिसत नाही, पण..."आदित्य दृष्टिहीन असला तरी त्याच्या स्वप्नांना कधीच अंधार पडला नाही. नागपूरमधील समाजकल्याण वसतिगृहात राहून तो दररोज सिटी बसने कॉलेजला जात असे. हा प्रवास केवळ अंतराचा नव्हता, तर संघर्षाचा आणि आत्मविश्वासाचा होता. रोजच्या या कष्टमय दिनक्रमातही त्याने अभ्यासात सातत्य ठेवले आणि स्वतःच्या मर्यादांवर मात करत यशाचे शिखर गाठले. “माझ्या डोळ्यांना दिसत नाही, पण माझ्या मनाला माझं लक्ष्य स्पष्ट दिसतं,” असे सांगणाऱ्या आदित्यने आपल्या यशाचे श्रेय शिक्षक, मित्र आणि कुटुंबीयांना दिले आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळेच हे स्वप्न साकार झाल्याचे तोनम्रपणे सांगतो.अधिकारी बनण्याचा निर्धारआजच्या काळात अनेक विद्यार्थी छोट्या अडचणींमुळे खचून जातात, पण आदित्यची कहाणी त्यांना नवसंजीवनी देणारी आहे. आर्थिक अडचणी, शारीरिक मर्यादा आणि सामाजिक अडथळे यांवर मात करून त्याने मिळवलेले हे यश केवळ त्याचे वैयक्तिक यश नाही, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. आदित्यचे स्वप्न इथेच थांबत नाही. पुढे एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनण्याचा त्याचा निर्धार आहे. “मला समाजासाठी काम करायचं आहे, लोकांच्या अडचणी सोडवायच्या आहेत,” असे तो ठामपणे सांगतो. अंधारातही उजेड शोधणाऱ्या या जिद्दी युवकाची ही यशोगाथा अनेकांसाठी आशेचा किरण ठरते. डोळ्यांत प्रकाश नसला तरी मनात असलेली जिद्द आणि आत्मविश्वास असेल, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे आदित्यने आपल्याकृतीतून सिद्ध करून दाखवलेआहे.
95 shares
😢
L
Lokmat
May 5, 2026, 12:31 PM
गहू बाजारातील अपडेटः भारतीय बाजारात गव्हाच्या किंमती बदलतात

गहू बाजारातील अपडेटः भारतीय बाजारात गव्हाच्या किंमती बदलतात

Wheat Market Update : राज्यातील विविधबाजारसमित्यांमध्ये आज (५ मे) रोजी गव्हाच्या दरात मिश्र चित्र पाहायला मिळाले. (Gahu Arrivals) काहीबाजारांमध्येदरात चांगली तेजी दिसून आली, तर काही ठिकाणी दर स्थिर किंवा कमी पातळीवर राहिले. आवकही काही बाजारात मोठ्या प्रमाणात वाढली असून काही ठिकाणी मर्यादित राहिली.(Gahu Arrivals) एकूण आवक: ३०,६३५ क्विंटल सरासरी दर: २,४७८ रुपये प्रति क्विंटल कुठे दर वधारले? पुणे (शरबती): ४,४०० ते ६,२०० रुपये सर्वाधिक दर मुंबई (लोकल): २,९०० ते ५,००० रुपये मोठी तेजी दिसली सोलापूर (शरबती): २,६०५ ते ३,९४५ रुपये माजलगाव (पिवळा): २,६३१ ते २,९५० रुपये दुधणी: १,९०० ते २,९०० रुपये दौंड-केडगाव: २,४०० ते २,७०१ रुपये शरबती व उच्च प्रतीच्या गव्हाला मोठी मागणी कुठे दर कमी राहिले? आष्टी (वर्धा): २,००० रुपयांपासून परतूर: २,००० ते २,४३१ रुपये मेहकर: २,००० ते २,४०० रुपये वाशीम: सरासरी २,१५० रुपये भोकरदन: २,०१० ते २,१५० रुपये लोकल व मध्यम प्रतीच्या गव्हावर दराचा दबाव कोणत्या जातीला मागणी? शरबतीगहू: सर्वाधिक मागणी (पुणे, सोलापूर) लोकलगहू: सर्वाधिक आवक, पण दर स्थिर २१८९ जात: मध्यम दर, स्थिर व्यवहार बन्सी / अर्जुन: मर्यादित आवक, सरासरी दर कुठे आवक वाढली? मुंबई: ७,३१५ क्विंटल सर्वाधिक आवक कारंजा: ४,००० क्विंटल जालना: ३,०३७ क्विंटल अमरावती: २,६४६ क्विंटल हिंगणघाट: १,५५० क्विंटल नागपूर: १,५०० क्विंटल मोठ्या बाजारांमध्ये पुरवठा वाढल्यामुळे दरावर दबाव कुठे आवक कमी? देवळा: ८ क्विंटल साक्री: ९ क्विंटल परांडा: १३ क्विंटल जामखेड: २० क्विंटल कमी आवक असलेल्या बाजारांमध्ये दर तुलनेने स्थिर होते. राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Gahu Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर शेतमाल :गहू दर प्रती युनिट (रु.) (सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ) हे ही वाचा सविस्तर :Soybean Market : सोयाबीनने घेतली झेप; ६ हजार पार दर, अजून वाढणार का? अधिक वाचा :Harbhara Market : हरभरा उत्पादक अडचणीत; बाजारात दर घसरले, प्रति क्विंटल मोठा तोटा
36 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 12:22 PM
'डान्स रिअॅलिटी शो'पासून'स्ट्रीट फूड'पर्यंतः'द अनलॉकी स्टोरी ऑफ श्याम नाथ गोस्वामी'

'डान्स रिअॅलिटी शो'पासून'स्ट्रीट फूड'पर्यंतः'द अनलॉकी स्टोरी ऑफ श्याम नाथ गोस्वामी'

'डान्स इंडिया डान्स' या रिअॅलिटी शोचा पहिला सीझन २००९ मध्ये आला होता. तेव्हापासून आता १७ वर्षे झाली आहेत आणि आतापर्यंत त्याचे ७ सीझन आणि अनेक 'स्पिन-ऑफ' आले आहेत. या डान्स रिअॅलिटी शोने राघव जुयाल, धर्मेश, पुनीत पाठक आणि शक्ती मोहन यांसारखे प्रसिद्ध चेहरे दिले, तर दुसरीकडे अनेक स्पर्धक लोकांच्या नजरेतून गायब झाले. अनेकांना डान्सची आवड होती, पण कोणाला घराची परिस्थिती तर कोणाला जबाबदाऱ्या आणि आर्थिक अडचणींमुळे आपल्या स्वप्नांचा बळी द्यावा लागला. असाच एक स्पर्धक होता, जो 'डान्स इंडिया डान्स'च्या चौथ्या सीझनमध्ये दिसला होता. त्याने आपल्या डान्सने परीक्षकांनाही प्रभावित केले होते, पण आज तो समोसे आणि कचोरी विकत आहे. या स्पर्धकाचं नाव श्याम नाथ गोस्वामी आहे. घरची परिस्थिती अशी होती की, श्याम नाथ गोस्वामीला डान्सर आणि कोरिओग्राफर बनण्याचं स्वप्न सोडावं लागलं आणि वडिलांना मदत करण्यासाठी समोसे-कचोरीचा विकावी लागली. श्याम नाथने लहानपणापासूनच खूप गरीबी पाहिली होती. श्याम नाथ गोस्वामीने एकदा 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'ला सांगितलं होतं की, हैदराबादमध्ये त्याचं एक घर होतं आणि वडील समोसे विकायचे. त्याचं काम बटाटे सोलणं आणि ग्राहकांना पाणी देणं हे असायचं. दुकानातून फार मोठी कमाई होत नव्हती, पण घर चालेल इतके पैसे मिळायचे. जेव्हा तो सहावीत होता, तेव्हा घरात पहिल्यांदा टीव्ही आला आणि तेव्हा पहिल्यांदाच 'डान्स इंडिया डान्स' सारख्या रिअॅलिटी शोबद्दल माहिती मिळाली. "मी डान्सर्स आणि त्यांच्या स्टेप्स पाहून पूर्णपणे भारावून गेलो होतो. मलाही तिथे जावेसं वाटायचं. मी रात्रभर जागून DID बघायचो आणि रात्री २ वाजेपर्यंत सराव करायचो. शाळेतून आल्यावर मी इंटरनेट कॅफेमध्ये जायचो, फक्त YouTube वर डान्स व्हिडिओ पाहण्यासाठी, आणि मग एकटाच सरावासाठी छतावर पळायचो. जेव्हा मी १९ वर्षांचा होतो, तेव्हा मला कळलं की जवळच DID चं ऑडिशन होत आहेत, म्हणून मी कोणालाही न सांगता कॉलेज बुडवलं आणि ऑडिशनला गेलो. ५ तासांनंतर, अखेर मला संधी मिळाली. मी माझ्या खास 'टॉलिवूड' स्टाईलमध्ये ३० सेकंदांचा परफॉर्मन्स दिला आणि माझी निवड झाली." "पहिल्याच दिवशी लोकल ट्रेनमध्ये माझी बॅग आणि फोन चोरीला गेला आणि मी फक्त एक जोडी कपड्यांच्या जोरावर बोरीवली स्टेशनवर झोपून रात्र काढली. जेव्हा माझी पाळी आली, तेव्हा मी इतका थकलो होतो की टीव्ही राउंड ऑडिशन पास होऊ शकलो नाही. परीक्षकांनी सांगितलं की तुम्ही डान्स चांगला करता, पण तुम्हाला अधिक सरावाची गरज आहे. मला वाटलं की एका मिनिटात सर्व काही संपलं, पण जेव्हा माझे ऑडिशन व्हिडीओ ऑनलाईन व्हायरल होऊ लागले, तेव्हा लोकांच्या मागणीमुळे मला परत बोलावण्यात आलं. त्यांनी माझ्यासोबत एक एपिसोड शूट केला, पण तो कधीच प्रसारित झाला नाही" असं सांगितलं. जेव्हा श्याम नाथ घरी परतला तेव्हा त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. त्याच्या मोठ्या भावाचा मृत्यू झाला, त्यानंतर घराची सर्व जबाबदारी श्याम नाथच्या खांद्यावर आली. श्यामचे आई-वडील पूर्णपणे खचले होते. परिस्थिती अशी होती की श्याम त्यांना एकटं सोडू शकत नव्हता. आपल्या स्वप्नांचा चक्काचूर करून श्याम पुन्हा समोसे-कचोरीच्या दुकानात परतला आणि आजही तेच दुकान सांभाळत आहे. आता १२ वर्षे झाली आहेत.
34 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 12:19 PM
चिंचवाड स्थानकाच्या महावीर चौक मेट्रो बांधकाम स्थळी खांब कोसळण्याचे तात्पुरते निराकरण

चिंचवाड स्थानकाच्या महावीर चौक मेट्रो बांधकाम स्थळी खांब कोसळण्याचे तात्पुरते निराकरण

पिंपरी :पिंपरी ते निगडीमेट्रोमार्गाचे काम सुरू असताना सोमवारी (दि. ४) दुपारी दोनच्या सुमारास चिंचवड स्टेशन येथील ४१३ क्रमांकाच्या खांबाचा लोखंडी सांगाडा अचानक कलंडला. मात्र, तीन क्रेनच्या सहाय्याने सांगाडा पुन्हा उभा केला आहे, त्यामुळे दुर्घटना टळली.चिंचवड स्टेशन येथील महावीर चौकातमेट्रोचेखांब उभारण्याचे काम सुरू आहे. पिंपरी ते निगडीतील भक्ती - शक्ती चौक या ४.४१ किलोमीटरच्या विस्तारीत मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या टप्प्यावरील सुमारे ५०% काम पूर्ण झाले आहे. आज दुपारी सांगाडा जमिनीकडे कलंडत असताना दोन क्रेनच्या मदतीने आधार दिला. तिसरी क्रेन मागवून सांगाड्याला केबलच्या साहाय्याने धरून ठेवले. हा गोंधळ सुरू असताना काही अंतरावरून वाहनांची वर्दळ सुरूच होती. अधिकाऱ्यांना अंधारात ठेवले घटना दुपारी घडली असताना ठेकेदार व साइटवर उपस्थित मेट्रोच्या अभियंत्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती दिली नाही. माध्यमांच्या प्रतिनिधींनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना याप्रकरणी विचारणा केली, तेव्हाच त्यांना या घटनेची माहिती मिळाली. अधिकाऱ्यांनी साइटवरील अभियंत्यांना विचारणा केली असता, ‘सांगाडा उभा करण्याचे काम सुरू आहे’, अशी माहिती देण्यात आली. अनाकलनीय उत्तरे “ही आमच्या नियमित कामात घडलेली घटना आहे आणि वाऱ्याच्या वेगामुळे सांगाडा कलंडला होता,” असे उत्तर येथील अभियंत्याने दिले. दरम्यान, याबाबत नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर महावीर चौकातील ट्रॅफिक वॉर्डनने सांगितले की, आम्ही दुपारी दोन वाजता कामावर आलो, त्यावेळी हा सांगाडा झुकलेला होता. या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, मेट्रो प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मी येथून जात असताना मेट्रोचा सांगाडा खाली झुकलेला पाहिला. सांगाडा कधी खाली कोसळेल, अशी भीती वाटत होती.- राजेश जाधव, रिक्षाचालक सांगाडा झुकत असल्याचे लक्षात येताच मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेनच्या साहाय्याने काम सुरू केले. त्यामुळे वाहतूक बंद करण्याची वेळ आली नाही.- अमित डोळस, पोलिस निरीक्षक, पिंपरी वाहतूक विभाग मेट्रोच्या स्तंभाचा सांगाडा थोडासा कलंडला होता. मात्र, क्रेनच्या सहाय्याने काही वेळातच तो पूर्ववत करण्यात आला.- चंद्रशेखर तांबवेकर, जनसंपर्क अधिकारी,पुणेमेट्रो
16 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 12:14 PM
भारतीय शेअर बाजारात घसरणीचा कल कायम

भारतीय शेअर बाजारात घसरणीचा कल कायम

Share Market:शेअर बाजारावरमंगळवारी दबाव कायम राहिला. BSE Sensex २५१.६१ अंकांनी घसरून ७७,०१७.७९ वर बंद झाला, तर Nifty 50 ८६.५० अंकांनी घसरत २४,०३२.८० पातळीवर स्थिरावला. दिवसभरात सेन्सेक्स सुमारे ७५० अंकांपर्यंत कोसळला होता; मात्र शेवटी काही प्रमाणात रिकव्हरी दिसून आली. बाजारातील एकूण चित्र वाढ झालेले शेअर्स: १,८९०घसरलेले शेअर्स: २,११०स्थिर शेअर: १६९ यावरून बाजारातील कमजोरी स्पष्ट दिसून आली. घसरणीमागील प्रमुख कारणे भूराजकीय तणाव: Strait of Hormuz परिसरात अमेरिका-इराण तणाव वाढलाकच्च्या तेलाच्या किमतीत वाढ: ब्रेंट क्रूड ११४ डॉलर प्रति बॅरलरुपयाची घसरण: डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी स्तर या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम बाजारावर झाला. NSE मधील टॉप-५ घसरणारे शेअर्स ICICI Bank: -१.५७%Jio Financial Services: -१.४८%Coal India: -१.४८%Tech Mahindra: -१.३९%Axis Bank: -१.३६% रुपया विक्रमी नीचांकीवर रुपया डॉलरच्या तुलनेत ९५.२५ या नव्या विक्रमी नीचांकी स्तरावर बंद झाला. इंट्रा-डे ट्रेडमध्ये तो ९५.४४ पर्यंत घसरला होता. ओपनिंग: ९५.३०इंट्रा-डे लो: ९५.४४क्लोजिंग: ९५.२५ मध्यपूर्वेतील तणाव, सप्लाय चेनची चिंता आणिगुंतवणूकदारांचीजोखीम टाळण्याची प्रवृत्ती यामुळे रुपयावर दबाव वाढला आहे. (टीप- यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हागुंतवणूकीचासल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
78 shares
😐
M
Maharashtra Times
May 5, 2026, 12:11 PM
पुण्यात मार्कशीट खराब झाल्याचा संशय आल्याने वडिलांनी केली 9 वर्षांच्या मुलीची हत्या

पुण्यात मार्कशीट खराब झाल्याचा संशय आल्याने वडिलांनी केली 9 वर्षांच्या मुलीची हत्या

दीपक पडकर, पुणे:माणुसकीला काळिमा फासणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी एक अत्यंत भीषण घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात उघडकीस आली आहे. पोटच्या गोळ्यावर प्रेम करण्याऐवजी, एका नराधम बापाने केवळ संशयापोटी आपल्या ९ वर्षांच्या चिमुकलीची इलेक्ट्रिक करवतीने निर्घृण हत्या केली. या अघोरी कृत्याने संपूर्ण देऊळगाव राजे परिसर सुन्न झाला असून आरोपी बापाविरुद्ध सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.नेमका प्रकार काय?मिळालेल्या माहितीनुसार, ३ मे २०२६ रोजी दुपारी ३.१५ च्या सुमारास ही घटना घडली. आरोपी शांताराम चव्हाण याला आपला मुलगा संस्कार याच्या शाळेच्या गुणपत्रिकेवर (Marksheet) कोणीतरी खाडाखोड केल्याचा संशय होता. या किरकोळ कारणावरून रागाच्या भरात असलेल्या शांतारामने आपली ९ वर्षांची मुलगी अनामिका हिच्यावर लाकूड कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक करवतीने थेट हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात चिमुकल्या अनामिकाचा जागीच मृत्यू झाला.पुरावे नष्ट करण्यासाठी घराला लावली आग!हत्या केल्यानंतर या नराधमाने क्रूरतेची सर्व सीमा ओलांडली. हा खून नसून अपघात आहे असे भासवण्यासाठी त्याने मुलीचा मृतदेह कपड्यात गुंडाळून घरात ठेवला आणि घराला आग लावून दिली. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या चिंगु भोसले हिनेही ही गंभीर बाब पोलिसांपासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Nagpur News : मला समाजासाठी काम करायचं आहे! दृष्टिहीन आदित्यची 12वीत 84 टक्क्यांसह गगनभरारी, अधिकारी होण्याचा निर्धारपोलिस कारवाई आणि तपासनिलेश आत्माराम फडणीस यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी शांताराम चव्हाण आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका बापाने इतक्या क्रूरपणे स्वतःच्या लेकीचा जीव घेतल्याने समाजातील ढासळत्या मानसिकतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.बिबवेवाडीत ९ वर्षीय चिमुरडीला छेडण्याचा प्रयत्न; नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेपुणे :बिबवेवाडी परिसरात ९ वर्षांच्या मुलीवर छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी गोरख कामठे नावाच्या इसमाला नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून नागरिकांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून पुढील कायदेशीरकारवाई केली जाणारआहे.
30 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 11:57 AM
तामिळनाडूच्या निवडणुकीत थलपती विजयच्या भविष्यातील यशाचा चित्रपट अंदाज वर्तवतो

तामिळनाडूच्या निवडणुकीत थलपती विजयच्या भविष्यातील यशाचा चित्रपट अंदाज वर्तवतो

मुंबई -दिग्दर्शक व्यंकट प्रभू सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. याचं कारण म्हणजे, चाहत्यांनी त्यांच्या 'The Greatest of All Time' या चित्रपटातील एका रंजक गोष्टीनं लक्ष वेधलं आहे. थलपती विजयच्या निवडणुकीतील प्रचंड यशानंतर, चाहत्यांनी या चित्रपटातील सीन्स आणि फुटेज पुन्हा एकदा पाहण्यास सुरुवात केली. चित्रपटातील एका सीननं आता सर्वांचं लक्ष वेधलं आहे.Thalapathy Vijay : विजयच्या TVKला अभूतपूर्व यश, DMKला हरवत तमिळनाडूत थलपती सरकार, सुपरस्टार CM होणार२०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'GOAT' या चित्रपटात,विजयच्यागाडीची नंबर प्लेट 'TN07 CM2026' अशी दाखवण्यात आली होती. आता चाहते सिनेमातील या सीनला दिग्दर्शक व्यंकट प्रभू यांनी केलेली एक भविष्यवाणी म्हणत आहेत. अनेक वर्षांपूर्वीच विजयच्या भविष्याबद्दल संकेत दिल्याबद्दल, चित्रपट दिग्दर्शकाचं कौतुक सोशल मीडियावर होत आहे.Prajakta Mali : 'लग्नाचं प्रेशर कसं हाताळतेस?' प्राजक्ता माळीला चाहत्याचा प्रश्न; अभिनेत्री म्हणाली, 'जे होतं ते चांगल्यासाठी...''GOAT' सिनेमातील गाडीच्या नंबर प्लेटमुळे चाहत्यांमध्ये चर्चा'GOAT'सिनेमातदाखवण्यात आलेला गाडीचा क्रमांक हा सोशल मीडियावर चर्चेचा सर्वात मोठा विषय ठरला आहे. 'CM2026' हा गाडीचा नंबर आता विजयच्या यशाला पूर्णपणे साजेसा आहे. त्यामुळे 'GOAT' या सिनेमातील सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विजयच्या अनेक चाहत्यांनी चित्रपटातील स्क्रीनशॉट्स शेअर करण्यास सुरुवात असून सिनेमा तो गाडीचा नंबर दाखवल्याबद्दल व्यंकट प्रभू यांचं कौतुक केलं आहे. काही चाहत्यांनी तर गंमतीने त्यांना 'भविष्य वर्तवणारा' दिग्दर्शकही म्हटलंय.View this post on InstagramA post shared by Behindwoods (@behindwoodsofficial)व्यंकट प्रभू यांनी विजयसोबतचा एक जुना फोटो शेअर केलाव्यंकट प्रभू यांनी 'GOAT'सिनेमाच्या शुटिंगच्याठिकाणचा, विजयसोबतचा एक जुना फोटो शेअर केला. त्यांनी 'GOAT' चा एक छोटा व्हिडिओ देखील पोस्ट केला.View this post on InstagramA post shared by Venkat Prabhu (@venkat_prabhu)दरम्यान, २०२६ च्या तामिळनाडू निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले असून तामिळ सुपरस्टार विजयचा पक्ष, टीव्हीकेनं, १०८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवलं आहे. विजयच्या दणदणीत विजयामुळे तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष असलेल्या डीएमकेला सर्वात मोठा धक्का बसला आहे. मागील निवडणुकीत डीएमकेनं १३३ जागा जिंकल्या होत्या. मात्र, यावेळी त्यांना ७४ जागा गमवाव्या लागल्या.
76 shares
😊
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 11:57 AM
'द महाराष्ट्र फाईल': बॉलिवूड चित्रपट भ्रष्टाचार आणि राजकीय हस्तक्षेपाचा पर्दाफाश करतो

'द महाराष्ट्र फाईल': बॉलिवूड चित्रपट भ्रष्टाचार आणि राजकीय हस्तक्षेपाचा पर्दाफाश करतो

मुंबई: देशात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांवर बेतलेल्या द काश्मीर फाइल्स, द बंगाल फाइल्स अशा बॉलिवूड सिनेमांची बरीच चर्चा झाली. आता आगामी ' द महाराष्ट्र फाईल ' या आगामी सिनेमाचीही चर्चा सुरू आहे.सामाजिक आशयाचा चित्रपटराज्यातल्या शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि सामान्य शेतकरी कुटुंबाच्या न्यायासाठीचा संघर्ष यावर आधारित'द महाराष्ट्र फाईल' हा सामाजिक आशयाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाचे मोशन पोस्टर व्हायरल होत होते. आता समोर आलेल्या चित्रपटाच्या पोस्टरनं चित्रपटाची उत्सुकता वाढविली आहे .'द महाराष्ट्र फाईल' हा चित्रपट केवळ एका महिलेच्या संघर्षाची कथा नाही, तर तो संपूर्ण व्यवस्थेतील छुप्या कार्यपद्धतीचे वास्तव उघड करणारा आरसा आहे. सरकारी कर्मचारी आणि दलालांकडून जनतेची कशी दिशाभूल केली जाते, न्याय कसा लांबवला जातो आणि भ्रष्टाचार कसा बोकाळतो, हे या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आल्याचं म्हटलं जातंय..कागदाच्या ढिगाऱ्यांत लपलेलं सत्य जेव्हा बाहेर येतं, तेव्हा फक्त फाईल्स उघड्या पडत नाहीत तर संपूर्ण व्यवस्था हादरते अशी या सिनेमाची टॅग लाइन आहे. असं काहीसं चित्रण चित्रपटात पाहायला मिळणार आहे.केव्हा प्रदर्शित होणार 'द महाराष्ट्र फाईल' सिनेमा?येत्या २९ मे २०२६ पासून हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल.View this post on InstagramA post shared by Aryan Rathod (@aryan_rathod217)निर्माते, दिग्दर्शक, लेखन, कथा, पटकथा अशी सर्व बाजूंनी चित्रपटाची धुरा संजीव कुमार राठोड यांनी सांभाळली आहे. तर क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि सह निर्माते म्हणून शालिनी राठोड यांनी बाजू सांभाळली आहे. तर क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून आर्यन राठोड याने बाजू पाहिली.दिग्गज कलाकारांची फौजया चित्रपटात दिग्गज कलाकार मंडळींची फौज पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री उषा नाडकर्णी , मंगेश देसाई , वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे, सन्नी लिओनी, सपना चौधरी, आर्यन राठोड, गौतमी पाटील, मंगली ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी नितीन सावंत, अजित केतकर आणि सिद्धार्थ कश्यप यांनी सांभाळली आहे.
13 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 11:35 AM
'पेड्डी'चित्रपट अपडेटः राम चरणचा नवीन लूक आणि गाणी चाहत्यांना रोमांचित करतात

'पेड्डी'चित्रपट अपडेटः राम चरणचा नवीन लूक आणि गाणी चाहत्यांना रोमांचित करतात

राम चरणचा 'पेड्डी' सिनेमा २०२६ मधील सर्वात बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे.जान्हवी कपूरआणि जगपति बाबू यांसारख्या दमदार कलाकारांसह, पोस्टर्सपासून गाण्यांपर्यंत प्रत्येक अपडेटने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. निर्मात्यांनी आता एक दमदार नवीन पोस्टर प्रदर्शित केलं आहे. ४ जूनला प्रदर्शित होणाऱ्या पेड्डी सिनेमाला आता अवघे ३० दिवस बाकी उरले आहेत. या सिनेमाच्या नव्या पोस्टरमध्ये राम चरण हातात बिडी घेऊन निवांत बसल्याचं दिसत आहे. चित्रपटातील त्याच्या या नव्या लूकची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. या पोस्टरवर सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी ३० दिवस बाकी असल्याचं म्हटलं आहे. 'पेड्डी' सिनेमातील गाण्यांनी चाहत्यांना भुरळ पडली आहे. चित्रपटातील पहिले गाणे "चिकिरी चिकिरी" ए. आर. रहमान यांच्या खास टचसह प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले. या गाण्याने सर्व प्लॅटफॉर्म्सवर २०० मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. त्यानंतर "राई राई रा रा" या गाण्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातील हाय-एनर्जी बीट्स आणि उत्कृष्ट कोरिओग्राफीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या गाण्याने यूट्यूबवर ६५ मिलियन व्ह्यूजचा टप्पा ओलांडला असून, 'पेड्डी'बद्दलची चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. बुची बाबू साना लिखित आणि दिग्दर्शित 'पेड्डी'मध्ये राम चरण मुख्य भूमिकेत असून त्यांच्यासोबत शिवा राजकुमार,जान्हवी कपूर, दिव्येंदु शर्मा आणि जगपति बाबू देखील दिसणार आहेत. वेंकट सतीश किलारू यांनी 'वृद्धि सिनेमाज'च्या बॅनरखाली याची निर्मिती केली आहे आणि 'माइथ्री मूवी मेकर्स'च्या सहकार्याने हा चित्रपट साकारण्यात आला आहे. हा चित्रपट ४ जून २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
95 shares
😊
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 11:27 AM
'चला हवा आओ दाओ'सीझन 2 वैयक्तिक कारणांमुळे विलंबितः नीलेश साबळे आणि अनिभाऊ कदम यांच्या अनुपस्थितीचे स्पष्टीकरण

'चला हवा आओ दाओ'सीझन 2 वैयक्तिक कारणांमुळे विलंबितः नीलेश साबळे आणि अनिभाऊ कदम यांच्या अनुपस्थितीचे स्पष्टीकरण

'चला हवा येऊ द्या'हा मराठी टेलिव्हिजनचा सगळ्यात गाजलेला शो. या शोचं दुसरं पर्व काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. मात्र या शोमध्येनिलेश साबळेआणिभाऊ कदमदिसले नाहीत. 'चला हवा येऊ द्या'च्यानवीन पर्वात का दिसले नाहीत? यामागचं कारण एका मुलाखतीत बोलतानाभाऊ कदमनेसांगितलं आहे.निलेश साबळेनसल्याने मीदेखील नकार दिल्याचा खुलासा भाऊने केला आहे. भाऊ कदमने 'सागर खापरे अरे बापरे' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत भाऊ म्हणाला, "निलेश साबळे मला खूप मानतो. तो माणूसच गोड आहे. कोणाबद्दल वाईट विचार करत नाही. त्याचं कामावर खूप प्रेम आहे. तो नेहमी कामात व्यस्त असतो. त्याच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मी असतो. आणि जर निलेश साबळे असेल तरच मीही काम करतो. चला हवा येऊ द्या नंतर बंद करण्याचा निर्णय चॅनेलने घेतला होता. तीन महिने कार्यक्रम बंद ठेवणं आम्हाला चालणार होतं. पण, ७-८ महिने कार्यक्रम बंद करून चालणार नव्हता. कारण, आम्हाला घर वगैरे चालवायचं असतं. त्यामुळे हे मला आणि निलेशला दोघांनाही परवडणारं नव्हतं". "पण, शेवटी दुसरा सीझन सुरू करायला ७-८ महिने गेले. तेव्हा साबळेने नकार दिला. निलेश साबळे नाही म्हणून मग मी पण नकार दिला. कारण शो लिहिणारच नाही म्हणाला. मी गेलो असतो, काम केलंही असतं...पण ती मजा मला आली नसती. कारण, त्याने जे करून ठेवलंय ते स्टँडर्ड जपणं गरजेचं आहे. त्यांनी त्यांच्या परिने शो चांगला केला. पण, निलेश साबळे असता तर चला हवा येऊ द्याच्या दुसऱ्या सीझनमध्ये मी काम केलं असतं", असा खुलासाही भाऊने केला.
18 shares
😢
M
Maharashtra Times
May 5, 2026, 11:20 AM
रितेश देशमुखच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासह'राजा शिवाजी'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला

रितेश देशमुखच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासह'राजा शिवाजी'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला

रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत 'राजा शिवाजी' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची चर्चा केवळ त्याच्या भव्यतंमुळंच नाही, तर 'देशमुख' कुटुंबाच्या खास सहभागामुळंही होत आहे.रितेश देशमुख (छत्रपती शिवाजी महाराज)या चित्रपटात रितेश देशमुखने स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारली आहे. अभिनयासोबतच या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखनही रितेशनंच केलं आहे. त्याच्या या भूमिकेला चाहत्यांची पसंती मिळाली आहे, तर नेटकऱ्यांमध्ये मात्र दोन गट पडले आहेत.'राजा शिवाजी' चित्रपटात देशमुख कुटुंब पडद्यावर!रितेश देशमुखचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या 'राजा शिवाजी' चित्रपटानं मराठी सिनेसृष्टीत नवा इतिहास रचला आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे यात रितेशसोबत त्याची पत्नी, दोन्ही मुले आणि भाऊदेखील झळकले आहेत.जिनिलिया देशमुख (महाराणी सईबाई)रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जिनेलिया देशमुख हिनं चित्रपटात महाराणी सईबाईंची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची निर्मितीही तिच्या 'मुंबई फिल्म कंपनी'नं केली आहे. रितेश आणि जिनिलिया यापूर्वी वेड सिनेमात एकत्र दिसले होते. रितेशनं राजा शिवाजी सिनेमाची घोषणा केली तेव्हाच, सईबाईंची भूमिका कोण साकारणार, याबद्दल चर्चा सुरू होती. अखेर निर्माती जिनिलिया हिनंच ही महत्त्वाची भूमिका साकारली.रियान देशमुख (छत्रपती शिवाजी महाराज - बालपण/तरुणपण)रितेशचा मोठा मुलगा रियान हा देखील या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका विशेष कालखंडातील भूमिकेत दिसत आहे. अशाप्रकारे दोन्ही मुलांनी शिवरायांच्या आयुष्यातील विविध टप्पे पडद्यावर जिवंत केले आहेत.राहील देशमुख (बाल शिवाजी)रितेशचा धाकटा मुलगा राहील यानं चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण केलं आहे. त्यानं चित्रपटात 'बाल शिवाजी' यांची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली असून, ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच त्याच्या भूमिकेचं कौतुक होत आहे.धीरज देशमुखरितेशचे धाकटे बंधू आणि माजी आमदार धीरज देशमुख यांनीही या चित्रपटात एक महत्त्वाची ऐतिहासिक भूमिका साकारली आहे. 'छत्रपती' या गाण्यात त्यांची खास झलक पाहायला मिळाली आहे. राजकारणातून थेट अभिनयाच्या मैदानात उतरलेल्या धीरज यांच्या कामाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.रितेशच्या मित्रमंडळींच्याही विशेष भूमिकादेशमुख कुटुंबाव्यतिरिक्त या चित्रपटात रितेशचे मित्र असलेले बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार आहेतसंजय दत्त: अफजल खानअभिषेक बच्चन: संभाजी शहाजी भोसलेविद्या बालन: खदिजा सुलतानाभाग्यश्री: राज माता जिजाऊसलमान खान: जीवा महाला (विशेष भूमिका)कुटुंबियांसोबत मिंत्र मंडळींच्या मुलांचंही स्वप्न केलं पूर्णतर या सिनेमात रितेशनं त्याच्या कुटुंबियांसोबतच त्याच्या जवळच्या मित्रमंडळींच्या मुलांनाही आपलं स्वप्न पूर्ण करण्याचं, मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी दिली आहे. संगीतकार अजय अतुल यांच्या कुटुंबातल्या आर्य ला देखील त्यांनी या सिनेमात झळकण्याची संधी दिली.
72 shares
😐
Pudhari logo
Pudhari
May 5, 2026, 11:16 AM
कोविड-19 च्या उद्रेकाचे मूळ जहाजाबाहेर असल्याचे तपासात उघड झाल्याने जहाजावरील विलगीकरण संपुष्टात आले

कोविड-19 च्या उद्रेकाचे मूळ जहाजाबाहेर असल्याचे तपासात उघड झाल्याने जहाजावरील विलगीकरण संपुष्टात आले

दरम्यान, जहाज चालवणाऱ्या कंपनीने प्राथमिक तपासात संसर्ग जहाजावरून सुरू झाल्याचे कोणतेही संकेत नसल्याचे स्पष्ट केले आहे. एका प्रवाशाने दक्षिण अमेरिकेत प्रवास केल्यानंतर हा संसर्ग आणला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
34 shares
😢
P
Pudhari
May 5, 2026, 11:14 AM
घटनेनंतर रुग्णाला उपचार मिळतात

घटनेनंतर रुग्णाला उपचार मिळतात

यानंतर गत चार दिवस त्याच्यावर कोल्हापूर येथील वनखात्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर व डॉ. अमित कुंभार यांच्या वैद्यकीय पथकाने उपचार केले. मात्र, उपचारास प्रतिसाद न मिळता जखमी गव्याचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला.
78 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 11:14 AM
एस. बी. आय. चे कर्मचारी दोन दिवसीय संपावर

एस. बी. आय. चे कर्मचारी दोन दिवसीय संपावर

मुंबई:या महिन्याच्या अखेरीस स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ( SBI ) बँकिंग सेवांवर परिणाम होऊ शकतो. कर्मचारी संघटनांनी दोन दिवसांच्या देशव्यापी संपाची घोषणा केली आहे, ज्यामुळे चार दिवस शाखांचे कामकाज विस्कळीत होऊ शकते. ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशनने संपाची घोषणा केली आहे. 23 मे हा चौथा शनिवार आणि 24 मे हा रविवार असल्याने, एसबीआयच्या बहुतेक शाखा सलग चार दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.बँक संप का होतोय?25 आणि 26 मे रोजी संपावरबसणार आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता, सेवेच्या अटी, भरती धोरणे आणि निवृत्तीवेतन यांसारख्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मुद्द्यांवरून हे आंदोलन केले जात असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांशी संबंधित अनेक करार अद्याप लागू झालेले नाहीत, असा आरोपही संघटनेने केला आहे.संघटनेच्या एकूण 16 मागण्या2 मे रोजी एसबीआयच्या अध्यक्षांना सादर केलेल्या सूचनेत म्हटले आहे की, हा संप औद्योगिक विवाद कायदा 1947 अंतर्गत केला जाईल. संघटनेने असेही सूचित केले आहे की, जर मध्ये सार्वजनिक सुट्टी आली, तर संप 27 मे पर्यंत वाढवला जाऊ शकतो. युनियनने एकूण 16 मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये सहाय्यक कर्मचाऱ्यांची भरती, सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये सुधारणा आणि वेतनातील तफावत दूर करणे यांचा समावेश आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीअंतर्गत उत्तम निवृत्तीवेतन पर्याय, करिअर प्रगतीमध्ये बदल आणि निवृत्तीवेतन गणनेत अतिरिक्त घटकांचा समावेश करण्याचीही त्यांची मागणी आहे.भरतीत घटयुनियनने असेही म्हटले आहे की, मेसेंजर आणि आर्मगार्ड यांसारख्या पदांसाठीची भरती घटली आहे, ज्यामुळे रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत आणि शाखांच्या सुरक्षेवर परिणाम होत आहे. संपापूर्वी 5 ते 18 मे दरम्यान निदर्शने, सोशल मीडिया मोहीम, पत्रकार परिषदा आणि धरणे आयोजित केली जातील. 19 मे रोजी अर्थमंत्र्यांना आणि 21 मे रोजी पंतप्रधानांना निवेदन सादर करण्याची योजना आहे. जर संप झाला, तर 25 आणि 26 मे रोजी रोख व्यवहार, चेक क्लिअरिंग आणि शाखा सेवांवर परिणाम होऊ शकतो. डिजिटल बँकिंग सेवा सुरू राहतील.
69 shares
😢