Achira News Logo
Achira News
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 10:17 AM
महाराष्ट्रात महसुली कामांना विलंब झाल्याने नागरिकांचे आंदोलन

महाराष्ट्रात महसुली कामांना विलंब झाल्याने नागरिकांचे आंदोलन

या आंदोलनाद्वारे सातबारा उतारा दुरुस्ती, फेरफार नोंद, वारस नोंद यांसह विविध महसूल कामांमध्ये होत असलेली दिरंगाई, तसेच नागरिकांना कराव्या लागणाऱ्या वारंवार चकरा याकडे लक्ष वेधण्यात आले. शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान” या योजनेचा अधिक प्रभावी प्रचार व अंमलबजावणी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
65 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 10:12 AM
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दुचाकीस्वार आढळला

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दुचाकीस्वार आढळला

गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वरई फाटा उड्डाणपुलाच्या गुजरात मार्गिकेवरून एक दुचाकीस्वार गुजरातच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. दरम्यान, उड्डाणपुलाच्या उतारावरील वांद्री नदी पुलाच्या वळणावर त्याचे दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट पुलावरून चाळीस फूट खोल वांद्री नदीच्या पात्रात कोसळली. अपघातात दुचाकीस्वाराला दुखापत झाली.
71 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 10:10 AM
गुडी पाडव्याच्या पूर्वसंध्येला सद्गुरु मच्छिंद्रनाथाच्या समाधीला भाविकांची गर्दी

गुडी पाडव्याच्या पूर्वसंध्येला सद्गुरु मच्छिंद्रनाथाच्या समाधीला भाविकांची गर्दी

Crowds of devotees at Machhindranath Fort आष्टी, पुढारी वृत्तसेवाआष्टी तालुक्यातील सावरगाव जवळ गर्भगिरी पर्वतरांगांमध्ये वसलेल्या मच्छिंद्रनाथ गड येथे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला लाखो भाविकांनी उपस्थित राहून सद्गुरु मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. नवनाथांपैकी एक असलेल्या मच्छिंद्रनाथ यांच्या या पवित्र स्थळावर महाराष्ट्रासह देशभरातून भक्तांचा जनसागर लोटला होता. वर्षातून केवळ एकदाच दर्शनासाठी खुली होणारी ही संजीवन समाधी पाहण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसरापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. दुचाकी व चारचाकी वाहनांचा मोठा ओघ दिवसभर सुरू होता. या पार्श्वभूमीवर अंभोरा पोलीस ठाण्याचे पीआय मंगेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिस्तबद्ध नियोजनामुळे कोणतीही अनुचित घटना न घडता भाविकांना शांततेत व सुरळीतपणे दर्शन घेता आले. दरम्यान, आमदार सुरेश धस यांच्या नियोजनामुळे यंदा दर्शन प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली. काही पारंपरिक रूढींमध्ये आवश्यक बदल करून दर्शन लवकर खुले केल्याने प्रत्येक भाविकाला समाधीचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले. आष्टी येथील सद्गुरु सेवेकरी मंडळाच्या वतीने सुमारे ५० हजार भाविकांसाठी महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. दाल-खिचडी, बुंदीचे पाकीट व पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच बेलगाव येथील गाई मंदिर ट्रस्टतर्फे गेल्या १४ वर्षांप्रमाणे यंदाही सायंकाळी चहा-बिस्किटांची व्यवस्था करण्यात आली. सद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज की जय, अलख निरंजन आदेश अशा जयघोषांनी गड परिसर दुमदुमून गेला होता. आतिषबाजी आणि रोषणाईमुळे गड उजळून निघाला. या भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे भाविकांना आध्यात्मिक समाधानाची अनुभूती लाभली.
95 shares
😊
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 10:05 AM
अपव्ययासाठी भारत सरकारच्या विकासात्मक खर्चाची छाननी सुरू

अपव्ययासाठी भारत सरकारच्या विकासात्मक खर्चाची छाननी सुरू

स्थानिक नागरिकांच्या मते, शासनाकडून विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो; मात्र नियोजनाचा अभाव व देखभाल नसल्यामुळे हा पैसा वाया जात आहे. दुभाजकांवर पुन्हा रंगरंगोटी करून तात्पुरता देखावा निर्माण केला जात असला तरी मूळ समस्या कायम आहे. तसेच, रस्त्यांच्या सिमेंटीकरण डांबरीकरणनंतर अल्पावधीतच विविध कामांसाठी पुन्हा खोदकाम करण्यात आल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत.
43 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 10:03 AM
फ्लोरिडाच्या माणसाने अनवधानाने स्वतःला कॅमेऱ्यात कैद केल्यानंतर तो व्हायरल झाला

फ्लोरिडाच्या माणसाने अनवधानाने स्वतःला कॅमेऱ्यात कैद केल्यानंतर तो व्हायरल झाला

पेटने ट्विटवर हा व्हिडिओ शेअर केला असून तो म्हणतो, 'हाय मी पाल्म बीच बेट. माझा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने मी माझी I-95 चालवत असताना अचानक व्हिडिओ शूट केला. मला काही कळालेच नाही. दुसऱ्या दिवशी माझ्या लक्षात आलं की मी आता एक व्हायरल सेन्सेशन झालो आहे. माझा फोन हा तब्बल चार तास डाऊन होता. मला माझा फोन असंख्य कमेंट्स आणि त्या व्हिडिओने भरला होता. मला चांगलाच भाव मिळाला आहे. हे खूप भन्नाट आहे थँक यू.'
13 shares
😊
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 10:03 AM
सध्या सुरू असलेल्या सुरक्षेच्या चिंतांमध्ये अपघातानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी त्वरित प्रतिसाद दिला

सध्या सुरू असलेल्या सुरक्षेच्या चिंतांमध्ये अपघातानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी त्वरित प्रतिसाद दिला

अपघात होताच प्रशासन सतर्क सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून, घटनेची माहिती मिळताच आयपीएस व्यंकटरमन, तहसीलदार श्रीकांत निळे, तसेच सहायक पोलिस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
77 shares
😐
P
Pudhari
Mar 20, 2026, 09:58 AM
निष्काळजीपणामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण झाल्याने कालबाह्य झालेल्या वस्तूंचे नुकसान

निष्काळजीपणामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण झाल्याने कालबाह्य झालेल्या वस्तूंचे नुकसान

अग्रवाल लाइफस्टाइल परिसरात मोठ्या प्रमाणावर कुटुंबे राहत असल्यामुळे या निष्काळजीपणामुळे सार्वजनिक आरोग्यावर मोठा धोका निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेला सर्व एक्सपायर्ड माल वसई येथे नेऊन नष्ट करण्यात आला, जेणेकरून त्याचा पुन्हा वापर होऊ नये.
71 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 09:57 AM
शिक्षण आणि रोजगार उपक्रमांसाठी सरकारी मंजुरी निधी

शिक्षण आणि रोजगार उपक्रमांसाठी सरकारी मंजुरी निधी

आगामी काळात 60 वस्तीगृहांची उभारणी करावयाची असून यामध्ये सत्तावीस हजार विद्यार्थी राहतील अशी व्यवस्था होईल अशी माहिती दिली डॉक्टर आंबेडकर यांच्या पीपल एज्युकेशन सोसायटीच्या विविध ठिकाणच्या इमारतींची नव्याने बांधणी व दुरुस्तीसाठी शासनाने 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यामधून विविध ठिकाणची कामे केली जातील असे जाहीर केले याप्रसंगी अनुसूचित जाती जमाती मधील 189 लोकांना समाज कल्याण खात्यात नोकरी देण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली चवदार तळे कामासंदर्भात येत्या पंधरा दिवसात कामाला सुरुवात होऊन पुढील फेब्रुवारी पूर्वी ही सर्व कामे पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त केला ऐतिहासिक महाडला आगामी काळात देशाच्या नकाशावर उंचावर नेण्याचे काम करणार असून महाड प्रमाणेच बिहारमधील बौद्धगया येथे जाणाऱ्या भीमभक्त अनुयायांसाठी स्थानिक शासनाकडून दहा एकर जागा प्राप्त झाल्यास त्या ठिकाणी भीम अनुयायांसाठी होस्टेल बांधण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखविला.
63 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 20, 2026, 09:53 AM
उज्जैनमध्ये अपघातात दोघांचा मृत्यू; इतर दोघे गंभीर जखमी

उज्जैनमध्ये अपघातात दोघांचा मृत्यू; इतर दोघे गंभीर जखमी

जितेंद्र खापरे, नागपूर :उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या कारचा मध्यप्रदेशातील ढाकना गावाजवळ भीषण अपघात होऊन कामठी आणि नागपूरातील मामा-भाच्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या अपघातात अन्य दोघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कामठी आणि नागपूर परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये शुभम जयस्वाल (२८, रा. रनाळा, कामठी) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्याचा मामा पारस कनोजिया (३५, रा. मानकापूर, नागपूर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात अमन जयस्वाल (२६) आणि जतिन कनोजिया (३४) हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी भोपाळ येथे हलविण्यात आले आहे.कार पालटलीमिळालेल्या माहितीनुसार, अमन, जतिन, पारस आणि शुभम हे चौघेजण उज्जैनजवळील नलखेडा परिसरातील बगलामुखी मंदिराचे दर्शन घेऊन नागपूरकडे परतत होते. गुरुवारी सकाळी बैतूल आणि हरदा जिल्ह्यांच्या सीमेवरील ढाकना गावाजवळील हरई परिसरात त्यांच्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्यावर पलटी झाले.कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगरप्राथमिक तपासात चालकाला झोपेचा झटका आल्याने हा अपघात घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अपघातानंतर मागून येणाऱ्या टवेरा वाहनाचे चालक अंकित तिवारी (रा. कल्याणपूर, बैतूल) यांनी तत्परता दाखवत जखमींना कारमधून बाहेर काढले. त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात मदत केली. जखमी अमन जयस्वाल यांनी सांगितले की, “मी आणि शुभम मागील सीटवर झोपलो होतो, तर पारस गाडी चालवत होता.” त्यानंतर झालेल्या अपघातात शुभमचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी पारस यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.Raj Thackeray : 'महाराष्ट्र नेक्स्ट' वेबसाईट नेमकी काय आहे? राज ठाकरेंनी पाडवा मेळाव्यात सविस्तर सांगितलंअमन यांचा हात फ्रॅक्चर झाला असून जतिनची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कामठी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून स्थानिक नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे. शुभम जयस्वाल यांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्याताब्यातदेण्यात आला आहे.तपास सुरुदरम्यान, या अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून वाहनाचा वेग, चालकाची स्थिती आणि रस्त्याची परिस्थिती यांचा सखोलतपासकेला जात आहे.
91 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 09:51 AM
घाऊक विक्रेत्यांची कपात करत भारतीय शेतकऱ्यांनी कृषी-पर्यटनाचे नवीन मॉडेल वापरून पाहिले

घाऊक विक्रेत्यांची कपात करत भारतीय शेतकऱ्यांनी कृषी-पर्यटनाचे नवीन मॉडेल वापरून पाहिले

बहुतेक शेतकरी आपला माल घाऊक व्यापाऱ्यांना विकतात. मात्र थेट ग्राहकांना शेतात बोलावून विक्री केल्यामुळे शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल. आणि पर्यटनालाही चालना मिळणार आहे. घोसाळे किल्ल्याच्या परिसरात होणारा हा प्रयोग जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी कृषी-पर्यटनाचा एक नवीन आदर्श ठरू शकतो.
49 shares
😊
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 20, 2026, 09:44 AM
अध्यक्षांच्या अचानक राजीनाम्यानंतर एच. डी. एफ. सी. बँकेच्या कॉर्पोरेट प्रशासनाची छाननी सुरू

अध्यक्षांच्या अचानक राजीनाम्यानंतर एच. डी. एफ. सी. बँकेच्या कॉर्पोरेट प्रशासनाची छाननी सुरू

मुंबई:एचडीएफसी बँक सध्या चर्चेत आहे. अतानु चक्रवर्ती यांच्या अचानक राजीनाम्यामुळे बँकेच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बँकेने केकी मिस्त्री यांची अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. बँकेचे सध्याचे डीएमडी, कैझाद भरुचा यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित झाले आहे. मिस्त्री यांनी असेही म्हटले आहे की भरुचा यांना अधिक जबाबदाऱ्या दिल्या जातील. त्यांनी सांगितले की बँकेच्या संघटनात्मक रचनेचा आढावा घेतला जात आहे आणि भरुचा यांना लवकरच अतिरिक्त जबाबदाऱ्या दिल्या जातील.शुक्रवार, 20 मार्च रोजी भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली असली तरी, एचडीएफसी बँकेचे शेअर्स दबावाखाली राहिले. शेअरचा भाव सुमारे ₹780 ते ₹790 पर्यंत घसरला. अध्यक्षांच्या अचानक राजीनाम्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेली चिंता या घसरणीतून दिसून येते.कैझाद भरुचा यांचा एचडीएफसी बँकेतीलप्रवास जवळपास तीन दशकांचा आहे. वाणिज्य शाखेचे पदवीधर असलेल्या भरुचा यांनी 1983 मध्ये एसबीआय कमर्शियल अँड इंटरनॅशनल बँकेतून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली, परंतु 1995 मध्ये ते एचडीएफसी बँकेत रुजू झाले. तेव्हापासून ते बँकेतच कार्यरत आहेत. भरुचा सध्या बॅलन्स शीट ॲसेट व्यवसायाचे काम पाहतात आणि संचालक मंडळ व व्यवस्थापन स्तरावर उच्च पदावर आहेत.जानेवारी 2026 मध्ये, भारतीय रिझर्व्ह बँकेने भरुचा यांच्या पुनर्नियुक्तीला मंजुरी दिली. ते एप्रिल 2026 पासून पुढील तीन वर्षांसाठी बँकेचे पूर्ण-वेळ संचालक म्हणून काम पाहतील. बँकेच्या सर्वात जास्त काळ सेवा केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक असलेल्या भारुचा यांना बँकेच्या कामकाजाची सखोल माहिती आहे. गेल्या दशकात कैझाद भरुचा यांच्या कार्यक्षेत्राचा सातत्याने विस्तार झाला आहे, यावरून त्यांच्या सामर्थ्याचा अंदाज लावता येतो. 2014 मध्ये, त्यांची प्रथम कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांच्याकडे होलसेल बँकिंग तसेच इन्व्हेस्टमेंट बँकिंगची जबाबदारी सोपवण्यात आली. 2023 मध्ये, त्यांना उपव्यवस्थापकीय संचालक पदावर पदोन्नती मिळाली, जे पद पाच वर्षांपासून रिक्त होते. उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाल्यावर, त्यांनी रिटेल बँकिंगची जबाबदारीही स्वीकारली, जी यापूर्वी राहुल शुक्ला यांच्याकडे होती.सध्या, भरुचा केवळ बँकेच्या मुख्य कामकाजावरच देखरेख करत नाहीत, तर एचडीएफसी लाईफ आणि एचडीएफसी सिक्युरिटीज यांसारख्या उपकंपन्यांच्या संचालक मंडळावरही कार्यरत आहेत, ज्यामुळे संपूर्ण एचडीएफसी परिसंस्थेवरील त्यांची पकड अधिक मजबूत होत आहे. एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेच्या ऐतिहासिक विलीनीकरणादरम्यान एकीकरण समितीचे सह-अध्यक्ष म्हणून भरुचा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता, बँक नेतृत्वाच्या संकटाचा आणि घसरणाऱ्या शेअर किमतीचा सामना करत असताना, भरुचा यांची भूमिका 'संकटमोचका'ची झाली आहे.
29 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 09:44 AM
भारतातील टी. डी. आर. प्रक्रियेला गती देण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे आदेश

भारतातील टी. डी. आर. प्रक्रियेला गती देण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे आदेश

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी यापूर्वीच टीडीआर प्रक्रियेला गती देण्यासाठी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, प्रस्तावाच्या टप्प्यांची संख्या कमी करणे, तांत्रिक अडचणी दूर करणे आणि निश्चित कालमर्यादेत प्रकरणे निकाली काढणे यावर भर देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात प्रस्ताव दाखल झाल्यानंतर विधी विभागाकडून 45 दिवसांत कायदेशीर बाबींची पूर्तता केली जाणार आहे. त्यानंतर त्रुटी दुरुस्तीसाठी 90 ते 120 दिवसांचा कालावधी निश्चित करण्याचा विचार आहे. दुसऱ्या टप्प्यात भूमी अभिलेख विभागाकडून होणारी मोजणी वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी सुरुवातीपासूनच सहभागी होण्याचा पर्याय तपासला जात आहे. या सर्व प्रक्रियेसाठी एसओपी तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यानुसार बांधकाम विभागाने पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
1 shares
😐
P
Pudhari
Mar 20, 2026, 09:43 AM
शिवसेना गटाने शोभा यात्रेदरम्यान स्वातंत्र्यसैनिक आणि पौराणिक कथा सादर केल्या

शिवसेना गटाने शोभा यात्रेदरम्यान स्वातंत्र्यसैनिक आणि पौराणिक कथा सादर केल्या

शिवसेना दक्षिण मुंबई उबाटा गटातर्फे ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थांची झाडाखाली बसलेली अतिशय विलोभनीय प्रतिमा साकारली होती. शोभा यात्रेच्या मार्गावर स्वामींचा चित्ररथ येताच श्री स्वामी समर्थांच्या नावाचा जयघोष सुरू झाला होता. शोभायात्रेदरम्यान सावरकर भगतसिंग यासारख्या स्वातंत्र्यवीर आणि पौराणिक कथांवर आधारित सुंदर चित्ररथ देखावे साकारण्यात आले होते.
70 shares
😊
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 20, 2026, 09:40 AM
महाराष्ट्रात इंधन दरवाढः मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे भारत त्रस्त

महाराष्ट्रात इंधन दरवाढः मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे भारत त्रस्त

Fuel Price Hike Maharashtra 2026:मिडल-ईस्टमधील युद्धामुळे तेल आणि गॅसचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इराणमध्ये आखाती देशांमधील ऊर्जा पुरवठ्यांना लक्ष्य केले ज्याचा भारताला सर्वात मोठा धक्का बसताना दिसत आहे. मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात आता महागाईचा भस्मासुर डोकं वर काढताना दिसत आहे.घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरांमध्ये वाढ झाल्यावर भारतात पेट्रोल आणि डिझेलच्यादरात वाढ होण्यास सुरुवात झालीआहे. तेल कंपन्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये स्पीड आणि पॉवर या सर्व प्रीमियम पेट्रोल ब्रँड्सच्या दरात प्रति लिटर 2.09 रुपयांनी वाढ केली आहे.West Asia Conflict: सागरी संकटात भारताचे ‘सुरक्षा’ कवच, निर्यातदारांना सरकारकडून 497 कोटींची ‘RELIEF’ संजीवनीची घोषणापुणेकरांच्या खिशाला युद्धाची झळतेल कंपन्यांनी प्रीमियम पेट्रोलचा भाव वाढवल्यावर आता पुण्यात आजपासून पेट्रोलचे दर वाढले आहेत. गॅसच्या पाठोपाठ प्रीमियम पेट्रोलच्या दरातही वाढ करण्यात आली आहे, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य पुणेकरांच्या खिशावर होणार आहे.इंधन विक्रेत्यांच्या माहितीनुसार हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे ‘Power’ आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे ‘XP95’ यांसारख्या ब्रँडेड प्रीमियम पेट्रोलचे दर प्रति लिटर सुमारे 2.09 रुपयांनी वाढले आहेत. अशाप्रक्रारे, या प्रीमियम पेट्रोलचा दर, जो यापूर्वी प्रति लिटर सुमारे 111.68 रुपये होता, आता वाढून अंदाजे 113.77 रुपये प्रति लिटर झाला आहे.Rupee Crash: अमेरिकेसमोर रुपयाची अजूनही दयनीय अवस्था; बाजार उघडताच रुपी अबकी बार 93 वर ; 1 डॉलर = 92.92 रुपये!पेट्रोलच्या किमती वाढण्याचे कारण कायमध्य पूर्वेतील वाढता तणाव शुक्रवारी, 20 मार्च पासून लागू होणाऱ्या प्रीमियम पेट्रोलच्या दरवाढीचे मुख्य कारण आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा तेलाच्या बाजारपेठेवर थेट परिणाम झाला असून जसजशी परिस्थिती बिघडत आहे, तसतशी तेल पुरवठ्याबद्दल चिंता वाढत आहे, ज्यामुळे तेलाच्या दरात सतत चढ-उतार होत आहेत.Oil Supply: 'होर्मुझ' कोंडीनं अमेरिकेत हाहाकार; ट्रम्प इराणवरील 'तेल निर्बंध' हटवण्याच्या विचारातपश्चिम आशिया युद्धाचा तेल पुरवठ्यावर परिणामजगातील तेलाचा मोठा हिस्सा होर्मूझमधून जात असताना इराणने या जलमार्गावर नाकाबंदी केली आहे. अशा स्थितीत, या जलमार्गावरील अडथळ्याचा पुरवठ्यावर परिणाम होत आहे, ज्याचा फटका भारतासह अनेक देशांना बसत आहे.अशा परिस्थितीत, मध्यपूर्वेतील तणाव असाच सुरू राहिल्यास येत्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती आणखी भडकण्याची शक्यता असून या दरवाढीची झळ थेट सर्वसामान्यांच्या खिशालाही बसेल.
37 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 09:30 AM
रुग्णसंख्येत वाढ झाल्याने भारतातील सरकारी रुग्णालये भारावून गेली; डिजिटल उपायांची अंमलबजावणी

रुग्णसंख्येत वाढ झाल्याने भारतातील सरकारी रुग्णालये भारावून गेली; डिजिटल उपायांची अंमलबजावणी

त्यामुळे अनेक रुग्ण आता मोफत किंवा अल्पदरात उपलब्ध असलेल्या शासकीय उपचारांचा लाभघेण्याला प्राधान्य देताना दिसत आहेत. मात्र रुग्णसंख्या वाढल्याने सरकारी रुग्णालयांत ओपीडीसाठी गर्दी होते. त्यातून, ओपीडीसाठी नंबर लावण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना रांगेत उभे राहावे लागते. त्यामध्ये विशेषतः वृद्ध, दिव्यांग आणि लहान मुलांसह आलेल्या पालकांना विशेषतः त्रास सहन करावा लागतो. काहीवेळा केवळ नंबर लावण्यासाठीच तासनतास वाया जात असल्याने नागरिकांत नाराजीही व्यक्त होते. या साऱ्याचा विचार करून आरोग्य विभागाने ओपीडीसाठी नंबर लावण्यासाठी डिजिटल सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची शासकीय रुग्णालयांमध्ये अंमलबजावणीही सुरू झाली आहे.
30 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 09:29 AM
गुजरात चालकाने महाराष्ट्र पोलिसांचा पर्दाफाश केलाः दंड भरण्याऐवजी लाच मागितली

गुजरात चालकाने महाराष्ट्र पोलिसांचा पर्दाफाश केलाः दंड भरण्याऐवजी लाच मागितली

रस्त्याच्या कडेला कार थांबलेली आहे. बाजूलावाहतूक पोलीसउभा आहे. तो कारमधील माणसाजवळ येतो आणि त्यांच्या बोलणं सुरू आहे, असे सगळं दिसत असलेला एक व्हिडीओसोशल मीडियावरव्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाठीमागे उभ्या असलेल्या कारमधील लोकांनी चित्रित केला. व्हिडीओ शेअर करणाऱ्याने दावा केला की, सीट बेल्ट नसल्यामुळे पोलिसाने कार थांबवली. पण, त्याने थेट लाच मागितली. गुजरातच्या कार चालकाने सीमेवरमहाराष्ट्रपोलिसांना उघड पाडलं आहे. व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे की, सीटबेल्ट नसल्याने पोलिसांनी कार थांबवली. पण, त्याने ५०० रुपये देण्याची मागणी केली. त्यासाठी चालकाला चलनही दिले गेले नाही. Gujarat driver exposes Maharashtra cops at state border: stopped for no rear seatbelt (₹1000 fine), but cops demand ₹500 "compromise" cash, no official challan issued!pic.twitter.com/pWhJxZ2lBI एका यूजरने म्हटले आहे की, नक्कीच याची सीमेवर दारू पकडली गेली असेल, तेव्हा याने त्यांना उघड पाडलं. रोख रक्कम जिथे येते तिथे कायद्याचे राज्य संपते. एका यूजरने म्हटले आहे की, मला हे प्रत्येक टोल आणि नाक्यावर हफ्ता वसूल करताना दिसतात. हा व्हिडीओ इतर काही लोकांनीहीसोशल मीडियावरशेअर केला आहे. यावर पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.
7 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 09:29 AM
नाविन्यपूर्ण प्रणालीमुळे कृषी उत्पादन प्रक्रिया आणि संरक्षणात क्रांती

नाविन्यपूर्ण प्रणालीमुळे कृषी उत्पादन प्रक्रिया आणि संरक्षणात क्रांती

आयुर्वेदिक वनस्पतींवर प्रक्रिया करण्यासाठी ही प्रणाली विशेष उपयुक्त असून हॉटेल व औषध निर्मिती उद्योगांसाठीही आवश्यक सामग्री तयार करता येते. या प्रणालीवर आतापर्यंत 50 हून अधिक फळे, भाज्या, पालेभाज्या, औषधी वनस्पती तसेच विविध प्रकारच्या माशांवर यशस्वी प्रयोग करण्यात आले आहेत. या पद्धतीने प्रक्रिया केलेला शेतमाल 3 ते 12 तासांत सुकून सुमारे बारा महिन्यांपर्यंत सुरक्षितपणे साठवता येतो. नैसर्गिक पद्धतीने सुकवण्याच्या तुलनेत ही पेटंटेड प्रक्रिया सुमारे तीन पट अधिक कार्यक्षम असल्याचे संशोधक निनाद पाटील आणि निमिष राऊत यांनी सांगितले.
87 shares
😊
P
Pudhari
Mar 20, 2026, 09:24 AM
अशोकचा डी. आय. वाय. दृष्टीकोनः त्याच्या स्वप्नातील घरासाठी प्रेमाचे श्रम

अशोकचा डी. आय. वाय. दृष्टीकोनः त्याच्या स्वप्नातील घरासाठी प्रेमाचे श्रम

अशोक हे खरेतर शेतकरी व उन्हाळ्यात मजुरकर म्हणून काम करतात मात्र त्यांनी घरकुल मंजूर झाल्यावर विटांचा बंदोबस्त व्हावा व त्यासाठी निधीची अडचण येऊ नये यासाठी स्वतः हाताने विटा थापायला सुरुवात केली आहे. 20 हजार विटा तयार झाल्या असून यासाठी त्यांना 40 हजारांचा खर्च आला आहे. अशोक यांच्या पत्नीने यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे.
78 shares
😐
L
Lokmat
Mar 20, 2026, 09:19 AM
सुरत रहिवाशाचे ए. टी. एम. मधून पैसे काढण्याचे दुःस्वप्नः एक 9 वर्ष जुना निराकरण न झालेला मुद्दा

सुरत रहिवाशाचे ए. टी. एम. मधून पैसे काढण्याचे दुःस्वप्नः एक 9 वर्ष जुना निराकरण न झालेला मुद्दा

सूरत - ATM मधून कॅश काढताना अनेकदा अकाऊंटमधील पैसे कट होतात, परंतु कॅश काढताना त्रास होतो. या परिस्थितीत जर तुम्हीबँकेततक्रार केली तर तुमच्या खात्यातून गेलेली रक्कम पुन्हा परत केली जाते. गुजरातच्या सूरत येथे राहणाऱ्या व्यक्तीसोबत ९ वर्षापूर्वी असाच प्रकार घडला होता. काय आहे प्रकार? १८ फेब्रुवारी २०१७ रोजी घडलेला हा प्रकार आहे. सूरतच्या उधना येथे राहणारा एक व्यक्तीएटीएममधूनपैसे काढण्यासाठी गेला. हे एसबीआयचंएटीएमहोते आणि या व्यक्तीचेबँकखाते बँक ऑफ बडोदामधील होते. त्याला एटीएममधून १० हजारांची रोकड काढायची होती. त्याने पिन वैगेरे टाकला परंतु एटीएममधून कॅश आली नाही मात्र त्याच्या बँक खात्यातून १० हजार कापल्याचा मेसेज आला. संबंधित ग्राहकाने याबाबत त्याच्या बँकेत अनेकदा तक्रार केली परंतु कुणीही फारशी दखल घेतली नाही. त्यामुळे ही तक्रार करून काही फायदा झाला नाही. बँकेने आपले हात वर करत व्यवहार झाला असून ग्राहकाला पैसे मिळाल्याचा दावा केला. बँकेने वारंवार पैसे देण्यास नकार दिल्यानंतर जतिन पटेल या ग्राहकाने माहितीच्या अधिकाराचा वापर केला. त्याने एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज आणि नोंदणी वही मागितली. फुटेजमधून एटीएममध्ये जतिनला कुठलीही कॅश मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले. तरीही बँकेने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर जतिनने ग्राहक न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. सूरतच्या ग्राहक तक्रार निवारण आयोगात हे प्रकरण दाखल झाले. सुनावणीनंतर कोर्टाने बँकेची चूक असल्याचे निदर्शनास आणले. बँकेने ग्राहकाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले शिवाय पुरावे मिळूनही त्याला पैसे न दिल्याचा ठपका बँकेवर ठेवला. बँकेला चूक महागात पडली आरबीआयच्या नियमानुसार, एटीएममधील ट्रान्झक्शन अयशस्वी झाल्यास बँकेला ग्राहकाच्या तक्रारीनंतर ५ दिवसांत पैसे परत करणे बंधनकारक असते. पैसे परत न दिल्यास बँकेला प्रतिदिन १०० रूपये दंड आकारला जातो. हे प्रकरण ९ वर्षापूर्वीचे असल्याने तक्रारीपासून ३२८८ दिवस पूर्ण झाले. त्यामुळे बँकेला प्रतिदिन १०० रूपये या हिशोबाने ३२८८ दिवसांसाठी ३ लाख २८ हजार दंड बसला आहे. त्याशिवाय १० हजाराच्या रक्कमेवर वार्षिक ९ टक्के व्याजही बँकेला द्यावे लागणार आहे. सोबतच ग्राहकाला झालेला मानसिक त्रास आणि कायदेशीर लढाईसाठी ५ हजारांचा दंड बँकेला ठोठावण्यात आला आहे.
74 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 09:15 AM
स्मार्ट मीटरच्या बिघाडामुळे मालवण धुडीवाडा येथील ग्राहकांसाठी अनपेक्षित वीजपुरवठा खंडित

स्मार्ट मीटरच्या बिघाडामुळे मालवण धुडीवाडा येथील ग्राहकांसाठी अनपेक्षित वीजपुरवठा खंडित

स्मार्ट वीज मीटरमुळे ग्राहकास फटका मालवण धुरीवाडा येथील स्नेहल मेथर यांनी आपल्या घरी बसविण्यात आलेल्या स्मार्ट वीज मीटरबाबत तक्रार मांडताना मागील महिन्याचे वीज बिल भरलेले असतानाही या महिन्यात अचानक २३३ रुपये भरावयाचे आहेत, असा मॅसेज मोबाईलवरून येऊन तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला, या महिन्याची वीज बिल देयक तारीख २० मार्च असतानाही त्यापूर्वीच चुकीच्या पद्धतीने वीज पुरवठा खंडित करण्यात आला, असे सांगत या प्रकारबाबत तीव्र संताप व्यक्त केला. याबाबत नितीन बाळके व इतर ग्राहकांनीही आवाज उठवत मेथर यांचा वीज पुरवठा तत्काळ सुरू करावा, अशी मागणी केली. यावर अभियंता श्री. म्हेत्रे यांनी याविषयी स्मार्ट वीज मीटरबाबतच्या आयटी विभागाशी संपर्क करून वीज पुरवठा सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नितीन वाळके म्हणाले, महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या प्रयत्नातून दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी ऊर्जा मित्र बैठक आयोजित केली जात असून वीज ग्राहकांनी आपल्या वीज समस्या ग्राहक पंचायतीकडे मांडव्यात, जेणेकरून बैठकीत त्यावर चर्चा करून वीज प्रश्न मार्गी लावता येतील, असे सांगितले.
68 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 09:14 AM
स्पष्टीकरणानंतर ठाण्यातील डॉक्टरांना महानगरपालिकेत नोंदणी करण्यापासून सूट

स्पष्टीकरणानंतर ठाण्यातील डॉक्टरांना महानगरपालिकेत नोंदणी करण्यापासून सूट

परिणामी डॉक्टरांना ठाणे मनपाकडे नोंदणीची आवश्यकता नसल्याचे सांगितले. त्यावर नगरसेवक आक्रमक होत, बोगस डॉक्टरांना पाठीशी घालण्याचा हा प्रकार आल्याचा आरोप प्रशासनावर करण्यात आला असून यावरून प्रशासनाची तारांबळ उडाली होती.
91 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 20, 2026, 09:13 AM
नवी दिल्लीतील दिवसाच्या प्रकाशात चोरांनी आईचे दागिने, पिशवी आणि फोन चोरले

नवी दिल्लीतील दिवसाच्या प्रकाशात चोरांनी आईचे दागिने, पिशवी आणि फोन चोरले

चोरी करणं हा गुन्हा आहे, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. चोरी केल्यास कडक शिक्षा होते. पण हे माहित असूनही काही लोक चोऱ्या करताना दिसतात. अशाच काही चोरांचा व्हिडिओ समोर आला आहे. एक महिला आपल्या मुलीला शाळेत सोडत होती. त्यावेळी चोरट्यांच्या टोळीनं तिला घेरलं आणि तिचे दागिने, बॅग आणि मोबाईल फोन हिसकावून घेतले. ही घटना रस्त्यावरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून आता हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य - @gajabhauX/X.com)कशी झाली चोरी?हा व्हिडिओ @gajabhauX या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शननुसार ही घटना नवी दिल्लीमध्ये घडली आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की, एक महिला आपल्या मुलीला शाळेच्या बसमध्ये बसवून घरी जात होती. त्याच वेळी चोरट्यांच्या टोळीनं तिला घेरलं. तिच्याकडील फोन, पैसे आणि दागिने हिसकावून घेतले आणि ते पळून गेले. लक्षवेधी बाब म्हणजे ही घटना भरदिवसा रस्त्यावर घडली.(फोटो सौजन्य - @gajabhauX/X.com)मदतीसाठी कोणीच पुढे आलं नाही​​हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी तीव्र टीका केली आहे. दिल्ली पोलिसांनी चोरट्यांना शोधून त्यांना शिक्षा करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, आसपास उभी असलेली लोकं काय करत होती, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. कारण या महिलेच्या मदतीसाठी कोणीच पुढे आलं नाही.(महत्वाची टीप - या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)
84 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 09:13 AM
उष्ण हवामानात थंड राहण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे

उष्ण हवामानात थंड राहण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे

गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे. शक्य त्या ठिकाणी पक्षी व प्राण्यांना योग्य त्या ठिकाणी पिण्याच्या पाणी ठेवण्यात यावे. नागरिकांसाठी पानपोईची व्यवस्था करावी. घर थंड ठेवण्यासाठी पडदे शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. तसेच, रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात. पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सूर्यप्रकाशाचा संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे. पहाटेच्यावेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. बाहेर कामकाज करीत असल्यास मध्ये मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा. गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी.
40 shares
😐
P
Pudhari
Mar 20, 2026, 09:05 AM
बिबट्या दिसल्याने भारतीय गावांमध्ये भीती आणि आर्थिक नुकसान होते

बिबट्या दिसल्याने भारतीय गावांमध्ये भीती आणि आर्थिक नुकसान होते

हातकणंगले तालुक्यातील कुंभोज, दानोळी, आळते, नेज, शिवपुरी, हिंगणगाव या गावांमध्ये बिबट्याचा वावर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याच्या हल्ल्यामुळे पाळीव जनावरे बळी ठरत आहेत. या प्रकारामुळे पशुपालनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
4 shares
😢
L
Lokmat
Mar 20, 2026, 09:04 AM
'धुरंधरः द रिव्हेंज पार्टी'मध्ये अभिनेत्री सौम्या टंडन रणवीर सिंगला मारण्याचा प्रयत्न करतानाचा व्हिडिओ व्हायरल

'धुरंधरः द रिव्हेंज पार्टी'मध्ये अभिनेत्री सौम्या टंडन रणवीर सिंगला मारण्याचा प्रयत्न करतानाचा व्हिडिओ व्हायरल

दिग्दर्शक आदित्य धरचा 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar: The Revenge) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सुसाट सुटला आहे.रणवीर सिंगआणिसारा अर्जुनयांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०२.५५ कोटींची ऐतिहासिक कमाई करत नवा विक्रम प्रस्थापित केला. या यश साजरं करण्यासाठी आयोजित केलेल्या 'सक्सेस पार्टी'मधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 'धुरंधर: द रिव्हेंज'ला प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतररणवीर सिंग, आदित्य धर, यामी गौतम आणि संपूर्ण टीमने एका शानदार पार्टीचे आयोजन केले होते. याच पार्टीत 'उल्फत हुसेन'ची भूमिका साकारणाऱ्या सौम्या टंडनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सौम्या टंडन गमतीने रणवीर सिंग आणि पार्टीत उपस्थित असलेल्या इतर लोकांना कानशिलात मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. वास्तविक, 'धुरंधर'च्या पहिल्या भागात सौम्याने अक्षय खन्नाला (रहमान डकैत) कानाखाली मारली होती. तर दुसऱ्या भागात तिने रणवीर सिंगच्या (हमजा अली मजारी) कानशिलात लगावल्याचे दृश्य आहे. सेटवर सौम्याच्या या 'कानशिलात' मारण्याच्या स्टाईलमुळे रणवीरने तिला गमतीने "स्लॅपिंग क्वीन" असा टॅग दिला आहे. सौम्या टंडनने तिच्या इंस्टाग्रामवर या पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये रणवीर सिंग 'FA9LA' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या पार्टीला कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा आणि अभिनेत्रीसारा अर्जुनयांनीही हजेरी लावली होती.
6 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 09:01 AM
शिक्षकांच्या'नो फ्लॉवर्स, लेट्स गिव्ह बुक्स'उपक्रमामुळे भारतातील साक्षरतेस चालना मिळाली

शिक्षकांच्या'नो फ्लॉवर्स, लेट्स गिव्ह बुक्स'उपक्रमामुळे भारतातील साक्षरतेस चालना मिळाली

'फूल नको, पुस्तक देऊया', असा संदेश देणारे शिक्षक जावेद तांबोळी यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचे औचित्य साधून चौकुळ नं. ४ मराठीवाडी शाळेचे शिक्षक जावेद तांबोळी यांनी आपल्या घरी पारंपरिक गुढीप्रमाणेच पुस्तके सजवून ही ज्ञानाची गुढी उभारली. सण-उत्सवांच्या माध्यमातून ज्ञानाचा वारसा पुढे जावा, हा उदात्त हेतू यामागे आहे. सलग तीन वर्ष तांबोळी गुरुजींनी हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवून वाचन चळवळीला बळ दिले आहे. मोबाईलमध्ये व्यग्र असलेल्या तरुण पिढीला पुन्हा पुस्तकांकडे वळवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
28 shares
😊
P
Pudhari
Mar 20, 2026, 09:00 AM
अतिरिक्त एफ. एस. आय. प्रीमियम देयकामुळे भारतीय महामंडळाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे

अतिरिक्त एफ. एस. आय. प्रीमियम देयकामुळे भारतीय महामंडळाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे

तसेच, यूडीसीपीआर नियमानुसार प्रीमियम भरून अतिरिक्त 35 टक्के एफएसआय बांधकाम परवानगी देताना दिला जातो. हा अतिरिक्त एफएसआय मिळवण्यासाठी विकासकाला जमिनीच्या दरानुसार प्रीमियम महापालिकेला भरावा लागतो. त्यापैकी 50 टक्के हिस्सा हा शासनाला द्यावा लागतो. त्यातून सन 2020-21 ते 9 मार्च 2026 अखेर एकूण 1 हजार 460 कोटी रुपये बांधकाम परवानगी विभागाला मिळाले. त्यापैकी सहा वर्षांत जमा झालेल्या उत्पन्नातून 730 कोटी रुपयांचा हिस्सा शासनाला द्यावा लागणार आहे. या दोन्ही बाबी मिळून महापालिकेला तब्बल 1 हजार 418 कोटी रुपये राज्य शासनाला द्यावे लागणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाने मुख्य लेखा व वित्त विभागाला कळविले आहे. प्रशासकीय काळातील उधळपट्टी, कर्ज, आणि दायित्वाचा वाढलेला डोंगर तसेच, लवाद प्रकरणातील मोठी देणी यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. तसे असताना आणखी 1 हजार 418 कोटींच्या खर्चाचा भार महापालिका तिजोरीवर येणार असल्यामुळे हे नवे आर्थिक संकट नव्या कारभाऱ्यांसमोर निर्माण झाले आहे.
10 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 08:59 AM
भारतीय संस्कृती आणि ज्योतिषशास्त्रात अनामिका बोटाचे महत्त्व

भारतीय संस्कृती आणि ज्योतिषशास्त्रात अनामिका बोटाचे महत्त्व

Ring Finger:भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये अनेक गोष्टींना महत्त्व आहे. डोक्याच्या केसांपासून ते तळपायापर्यंत मानवी शरीर अनेक गोष्टींसाठी महत्त्वाचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात यातील अनेक गोष्टींवरून व्यक्तिमत्व, स्वभाव, भविष्यातील घटना, गुण-दोष यांचा अंदाज बांधला जाऊ शकतो. आताच्या घडीला अनामिका बोटावरून चर्चा सुरू आहे. अनामिका म्हणजे नेमके कोणते बोट? ज्योतिषशास्त्रानुसार अनामिका बोटाचे महत्त्व काय आहे? अध्यात्मिकदृष्ट्या अनामिका बोटाची महती काय? जाणून घेऊया... हिंदू धर्मात अनामिका बोटाला अत्यंत पवित्र आणि सात्त्विक मानले जाते. या बोटाचा थेट संबंध 'सूर्य' ग्रहाशी असल्याने यश, कीर्ती आणि आत्मविश्वासाचे ते प्रतीक मानले जाते. धार्मिक पूजेत गंध, हळद-कुंकू लावणे, अक्षता वाहणे, पवित्रक धारण करणे, यासाठी हे बोट श्रेष्ठ मानले जाते. अनामिका म्हणजे नेमके कोणते बोट?नाम ओढण्यासाठी करंगळी वापरली जात नाही. शास्त्रांमध्ये कोणत्याही शुभ कार्यासाठी ती निषिद्ध मानली जाते. करंगळी शेजारी अनामिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बोटामुळे मानसिक शक्ती मजबूत होते. हे बोट सूर्य ग्रहाशी संबंधित आहे. शास्त्रांनुसार, या बोटाने देव, गुरू किंवा इतर कोणत्याही शुभ प्रसंगी टिळा लावावा. या बोटाने नाम लावल्याने मानसिक ऊर्जा वाढते आणि आज्ञाचक्र जागृत होते, ज्यामुळे व्यक्तीमध्ये एक नवीन ऊर्जा येते, अशीही मान्यता असल्याचे सांगितले जाते. नामिका बोटाची नस ही हृदयाशी जोडलेली असते असे म्हणतात की अनामिका बोटाची नस ही हृदयाशी जोडलेली असते. हे बोट हाताच्या सर्वात लहान बोटापेक्षा म्हणजे करंगळीपेक्षा थोडे लांब असते. सूर्याचे स्थान अनामिका बोटाच्या तळाशी आहे. सहसा हे बोट मधल्या बोटापेक्षा लहान असते. परंतु अनेक लोकांच्या हातात या बोटाची लांबी आणि आकार सामान्य बोटापेक्षा वेगळा असू शकतो.हस्तरेषाशास्त्रानुसार, अनामिका बोटाची लांबी, रुंदी, गोलाकारपणा आणि आकार पाहून आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि भविष्याबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकतो. कालिदासांनी अनामिका असे केले नामकरण कालिदास हे संस्कृतमधील सर्वश्रेष्ठ कवी. आपल्या करंगळीच्या बाजूच्या बोटाला अनामिका नाव पडण्यामागे कवि कालिदास कारणीभूत आहेत, असे मानले जाते. कारण, ज्या वेळेस विद्वानांच्या नावांची यादी करायची ठरली, तेव्हा पहिले नाव कालिदासाचे घेतले गेले, त्यानंतर त्यांच्या तोडीस तोड विद्वान कोणता याचा विचार होऊ लागला, पण तेवढी साहित्यिक ऊंची कोणाही साहित्यिकाला गाठता आली नाही, म्हणून ती यादी तिथेच थांबली आणि करंगळीच्या बाजूचे बोट विद्वानाच्या नावासाठी पारखे राहिले, म्हणून ती ठरली अनामिका! साखरपुड्याची अंगठी अनामिका बोटातच का घातली जाते? साखरपुड्यात वर आणि वधू एकमेकांना अंगठी घालतात. तुम्ही पाहिले असेल की, जेव्हा जोडपे एकमेकांना अंगठी घालतात तेव्हा ते हाताच्या चौथ्या बोटात म्हणजेच अनामिकामध्ये घालतात. प्राचीन इजिप्तमध्ये अंगठी घालण्याची सुरुवात झाली. त्यानंतर अंगठी घालण्याबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या, ज्या आजही सुरू आहेत. इजिप्शियन लोकांचा असा विश्वास होता की, लव्हर्स व्हेन नावाची एक रक्तवाहिनी माणसाच्या अनामिकेतून थेट हृदयात जाते. याचा अर्थ असा की, या बोटाची तार थेट हृदयाशी जोडली जाते. या कारणामुळे लोक या बोटात अंगठी घालू लागले.
84 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 08:54 AM
उष्माघातः लक्षणे, जोखीम घटक आणि प्रतिबंधात्मक उपाय

उष्माघातः लक्षणे, जोखीम घटक आणि प्रतिबंधात्मक उपाय

उष्माघाताची मळमळ, उलटी, हात-पायात गोळे येणे, तीव्र थकवा, शरीराचे तापमान वाढणे, त्वचा गरम व कोरडी पडणे, घाम न येणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे, डोकेदुखी, छातीत धडधड, मानसिक अस्वस्थता किंवा बेशुद्धावस्था ही प्रमुख लक्षणे आहेत. तसेच लहान मुले, गरोदर महिला, वयोवृद्ध व्यक्ती, खेळाडू, सतत उन्हात काम करणारे कामगार तसेच हृदय, फुफ्फुस किवा मूत्रपिंड विकार असलेले रुग्ण यांना अधिक धोका असतो. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे कष्टाची कामे सकाळी लवकर किंवा सायंकाळी करावीत,
45 shares
😢
P
Pudhari
Mar 20, 2026, 08:54 AM
नवीन मेट्रो गाड्यांसह पुण्याच्या मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टिमचा विस्तार

नवीन मेट्रो गाड्यांसह पुण्याच्या मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टिमचा विस्तार

माण, हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर 37 मेट्रो ट्रेन म्हणजेच मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम धावणार आहेत. त्यापैकी 22 ट्रेन या यार्डात दाखल झाल्या असून, त्यांची चाचणीदेखील पूर्ण झाली आहे. त्यात आता धावण्याची तारीख निश्चित झाल्यानंतर आणखी 15 ट्रेन या मार्च महिन्याच्या अखेरी आंध्र प्रदेश येथील श्रीसिटी येथून दाखल होणार आहेत. साधारण 3 कोचच्या या मेट्रो असतील. विशेष म्हणजे याचे सर्व देखभाल दुरुस्तीचे जबाबादारी खासगी कंपनीने महिलांना दिली आहे.
9 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 20, 2026, 08:53 AM
ईद-उल-फित्र उत्सवः तारखा आणि परंपरा

ईद-उल-फित्र उत्सवः तारखा आणि परंपरा

Eid ul fitar 2026 moon rise time : ईद उल फितर पर्व रमजान संपल्यानंतर येते. इस्लामिक दिनदर्शिकेनुसार रमजान हा वर्षातील नववा महिना असतो. या संपूर्ण महिन्यात मुस्लिम लोक रोज करतात आणि नमाज पढतात. अल्लाहची इबादत करण्यात आपला पूर्ण वेळ घालवतात. हा महिनाभर रोजा करून महिन्याच्या शेवटच्या दिवशी चांद पाहून ईद उल फितर साजरी करतात. या नंतर रमजानचा महिना संपून शव्वाल महिन्याची सुरुवात होते. भारतात ईदचे पर्व खाडी देशात चांद पाहिल्यानंतर ठरवले जाते. सौदी अरब मध्ये २० मार्च रोजी ईद साजरी केली जाईल. तसेच भारतात २० मार्च रोजी चांद दिसेल. पाहुयात महाराष्ट्रात कोणत्या शहरात ईदचा चांद केव्हा दिसेल.महाराष्ट्रात ईदचा चांद दिसण्याची वेळमुंबई7:05 PMपुणे7:10 PMनांदेड7:00 PMनागपूर7:10 PMनाशिक7:00 PMकोल्हापूर7:00 PMईदचे महत्वईद उल फितरला मुस्लिम लोक मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करतात. यादिवशी नवीन कपडे घालून मिठाई वाटून अनेकजण ईद साजरी करतात. ईद उल फितरला मीठी ईद असेही म्हणतात. यादिवशी नमाज वाचल्यानंतर मुस्लिम लोक एकमेकांना ईदच्या शुभेच्छा आणि गिफ्ट देतात. तसेच शेवयाची खीर म्हणजेच शीरखुर्मा खायला आपल्या मित्रांना,प्रियजनांना घरी बोलावून ही ईद साजरी केली जाते.
2 shares
😊
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 20, 2026, 08:52 AM
मागणी मजबूत राहिल्याने भारताच्या सोन्याच्या बाजारपेठेत दुबईशी स्पर्धा

मागणी मजबूत राहिल्याने भारताच्या सोन्याच्या बाजारपेठेत दुबईशी स्पर्धा

Gold Markets in India:गेल्या एका वर्षभरात सोन्याने चांगलाच भाव खाल्ला आहे. कधीकाळी केवळ हजारांमध्ये असलेल्या सोन्याचा दर आता लाखांपर्यंत पोहोचाल आहे, पण तरीही लोकांचा सोनं खरेदीचा उत्साह कमी झालेला नाही. अनेक लोक सोनं किंवा सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी दुबईला जातात मात्र, भारतातही दुबईला टक्कर देणारे ‘गोल्ड मार्केट’ आहे जिथे स्वस्त किंमतीत सोनं खरेदी करता येते.सोन्याचा आजचा दर कायगेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांमध्ये चढ-उतार सुरूच आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रचंड स्वस्त झालेल्या सोन्याच्या किमतीत बुधवारी, 20 मार्च रोजी 1.68% किंवा 2428 वाढ झाली 10 ग्रॅम सोन्याचा दर 1.47 लाखांवर पोहोचला.भारतातील टॉप-10 स्वस्त गोल्ड मार्केटदुबईप्रमाणेच मुंबईही भारताचे ‘गोल्ड सिटी’ म्हणून ओळखली जाते. मुंबईतील झवेरी बाजार देशातील सर्वात प्रमुख ‘सोन्याचे मार्केट’ आणि दुबईच्या बाजाराशी स्पर्धा करेल इतके मोठे आहे. त्यानंतर, चेन्नई, कोची, बेंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाता हेही मोठे आणि देशातील स्पर्धात्मक गोल्ड मार्केटपैकी आहेत. या गोल्ड मार्केटमध्ये पारंपरिक आणि आधुनिक डिझाइनचे दागिने उत्कृष्ट दरात मिळतात.मुंबईतील झवेरी बाजारभारतातील सर्वात मोठे सोन्याच्या व्यापाराचे केंद्र म्हणूनच मुंबईची दुबईच्या गोल्ड मार्केटशी तुलना केली जाते. मुंबईतील मुंबा देवी मंदिराजवळील झवेरी बाजारात केवळ सोन्याचा व्यापारीच होत नाही तर, येथे मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात केली जाते.जळगाव - भारतातील ‘सुवर्ण बाजारपेठ’मुंबईनंतर महाराष्ट्रातील जळगाव दुसरी मोठी बाजारपेठ आहे, जिथं सराफांची मोठी साखळी आहे. 160 वर्षांची सोन्याची परंपरा असणाऱ्या जळगावला ‘सुवर्णनगरी’ म्हणूनही ओळखले जाते. शुद्ध सोनं आणि गुणवत्तेमुळे देशभरातील लोक जळगावच्या सराफा बाजारात सोने खरेदी करण्यासाठी येतात.चेन्नईउच्च दर्जा, शुद्ध सोन्याच्या दागिन्यांसाठी (22 ते 24 कॅरेट) चेन्नई शहर प्रसिद्ध आहे. येथे पारंपरिक, बारिक कारागिरीचे दागिने घडवले जाते, ज्याला ग्राहकांची मोठी मागणी आहे.कोचीकेरळच्या गोल्ड मार्केटमध्ये सराफांमध्ये तीव्र स्पर्धा पहायला मिळते आणि दरडोई सोन्याच्या सर्वाधिक वापराचे केंद्र मानले जाते. इथं अनेक व्यापार स्पर्धेत कायम राहण्यासाठी कमी दर ऑफर करतात आणि सोन्याच्या दागिन्यांवर कमी मेकिंग चार्ज आकारला जातो ज्यामुळे ग्राहकांना कमी दरात सोनं खरेदी शक्य होते.बेंगळुरू (कर्नाटक)उच्च विश्वासार्हता, नाविन्यपूर्ण डिझाइन आणि उच्च-मूल्याच्या विक्रीसाठी बेंगळुरू एक मजबूत, आधुनिक बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे.हैदराबाद (तेलंगणा)सोन्यातील वाढत्या गुंतवणुकीचे दक्षिण भारतातील एक प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाणारे हैदराबादमध्ये खास पारंपरिक डिझाईनचे दागिने मिळतात. म्हणूनच या शहरातील सोन्याचे बाजार नेहमीच गजबजलेले असते.दिल्ली (एनसीआर)दिल्लीत सध्या उत्तर भारतातील मोठे गोल्ड मार्केट असून इथे ग्राहकांना डिझाइन्समध्ये विविधता मिलते आणि व्यापाऱ्यांमधील स्पर्धेमुळे ग्राहकांना कमी किमतीत दागिने उपलब्ध होतात.कोलकाता (पश्चिम बंगाल)पारंपरिक, नाजूक आणि अत्यंत कुशलतेने हाताने बनवलेल्या सोन्याच्या दागिने, बंगाली डिझाइनच्या दागिन्यांसाठी कोलकाता मार्केट लोकप्रिय आहे.जयपूर (राजस्थान)कुंदन आणि मीनाकारी दागिने - पारंपरिक जयपुरी शैली, ज्यात आकर्षक एनॅमलचे काम असते आणि लग्न सोहळ्यासाठी अत्यंत शोभून असलेल्या दागिन्यांसाठी शहर प्रसिद्ध आहे. जयपूरमधील दागिन्यांमध्ये शाही थाट दिसून येतो.अहमदाबाद आणि सुरतअहमदाबाद आणि सुरत गुजरातमधील ही दोन शहरेही भारतातील गोल्ड मार्केटपैकी आहेत. सणासुदीच्या दिवसात अहमदाबादच्या गोल्ड बाजारात लोकांची लगबग वाढते तर, सुरतला डायमंड सिटी म्हणून ओळखले जाते. सुरतमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी आणि हलके वजन आणि मशीनवर दागिने तयार केले जातात.
60 shares
😐
P
Pudhari
Mar 20, 2026, 08:43 AM
मध्यपूर्वेतील तणावामुळे जेट इंधनाच्या किंमती वाढल्या, जागतिक विमान कंपन्यांवर परिणाम

मध्यपूर्वेतील तणावामुळे जेट इंधनाच्या किंमती वाढल्या, जागतिक विमान कंपन्यांवर परिणाम

या संकटामागे सर्वात मोठा घटक म्हणजे मध्यपूर्वेतील तणाव आणि विशेषतः हॉर्मुज सामुद्रधुनीतील अडथळे. या मार्गातून जगातील मोठ्या प्रमाणात तेल आणि जेट इंधनाची वाहतूक होते. कुवैतसारख्या मोठ्या निर्यातदार देशाकडून होणारा पुरवठा यामुळे प्रभावित झाला आहे. याच पार्श्वभूमीवर जेट इंधनाच्या किमतींमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. उत्तर-पश्चिम युरोपमध्ये जेट इंधनाची किंमत प्रति टन 1,730 डॉलरपर्यंत पोहोचली असून ती दुप्पट झाली आहे. या वाढत्या किमतींमुळे अनेकएअरलाईन्सवरअब्जावधी डॉलरचा अतिरिक्त खर्च पडत आहे. काही कंपन्यांना उड्डाणे रद्द करण्याची वेळही आली आहे.
91 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 08:42 AM
झारखंडच्या स्वर्णरेखा नदीत बॉम्ब सापडल्याने खळबळ

झारखंडच्या स्वर्णरेखा नदीत बॉम्ब सापडल्याने खळबळ

झारखंडमधीलजमशेदपूर जिल्ह्यातील बहरागोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या स्वर्णरेखा नदीमध्ये तब्बल २२६ किलो वजनाचा बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. सुरुवातील नदीत सापलेली ही लोखंडी वस्तू काहीतरी सामान्य वस्तू असावी असे मानले जात होते. मात्र तपासामध्ये हा लोखंडाचा साधा तुकडा नाही तर बॉम्ब असल्याचे तपासणीनंतर समोर आल्यानंतर साऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. रांचीमधून येथे दाखल झालेल्या बॉम्ब स्क्वॉडने प्राथमिक तपासानंतर हा ५०० पौंड म्हणजेच सुमारे २२६ किलो वजनाचा शक्तिशाली बॉम्ब असल्याची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर आता या बॉम्बच्या हाताळणीबाबत अधिक खबरदारी घेतली जात आहे. बॉम्ब स्क्वॉडचे प्रभारी नंदकिशोर सिंह यांनी सांगितले की, हे कुठले सामान्य स्फोटक नाही तर खूप मोठा आणि धोकादायक बॉम्ब असल्याचे दिसत आहे. या बॉम्बला निष्क्रिय करण्यासाठी विशेष तंत्रज्ञान आणि बॉम्ब निष्क्रिय करण्याचं कौशल्य आवश्यक आहे. हे कौशल्या सर्वसाधारणपणे भारतील लष्कराजवळ उपलब्ध असतं. अशा परिस्थितीत आता बॉम्ब सुरक्षितपणे निष्क्रिय करण्यासाठी लष्कराची मदत घेतली जात आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासन सतर्क झालं आहे. तसेच हा बॉम्ब ज्या ठिकाणी सापडला ते ठिकाण त्वरित सील करण्यात आलं आहे. तसेच संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. प्रशासनाने आजूबाजूच्या ग्रामस्थांना या परिसरात न येण्याची आणि संशयास्पद वस्तूंना हात न लावण्याटी सूचना दिली आहे. दरम्यान, बहरागोडा येथील अधिकारी राजाराम मुंडा यांनी सांगितले की, बॉम्ब स्क्वॉडने घटनास्थळाचं निरीक्षण केलं आहे. तसेच पुढील कारवाईसाठी उच्चाधिकाऱ्यांशी समन्वय साधला जात आहे. परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, लोकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
50 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 08:40 AM
'धुरंधर 2'दक्षिण भारतात छाप पाडण्यात अपयशी ठरला कारण उस्ताद भगत सिंगने मध्यवर्ती भूमिका घेतली

'धुरंधर 2'दक्षिण भारतात छाप पाडण्यात अपयशी ठरला कारण उस्ताद भगत सिंगने मध्यवर्ती भूमिका घेतली

South Cinema:सध्या इंडियन बॉक्स ऑफिसवर आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर २ ने बॉक्स ऑफिसवर अक्षरश धुमाकूळ घातला आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर आता या सीक्वलकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहेत. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' हासिनेमाकाल १९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा गाठलाय. रणवीरचा हासिनेमावेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. मात्र, एकीकडे धुरंधर २ सिनेमाची देशभरात चर्चा सुरू असताना साऊथमध्ये 'उस्ताद भगत सिंग 'सिनेमानं बॉक्स ऑफिसवर बाजी मारली आहे. 'धुरंधर २' ने केवळ पेड प्रिव्ह्यूमधूनच ४३ कोटी रुपयांची कमाई केली. भारतातील पहिल्या दिवसाचे निव्वळ कलेक्शन १०२ कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. परंतु,साऊथमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणण्यास फारसं यश मिळालेलं दिसत नाही. याचं कारण म्हणजे यावेळी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत सुपरस्टारपवन कल्याणच्या'उस्ताद भगत सिंग' क्रेझ पाहायला मिळतेय. दक्षिण भारतात विशेषतः 'सिंगल स्क्रीन'वर 'उस्ताद भगत सिंग' चित्रपटाने दबदबा निर्माण केला आहे. धुरंधर २ च्या वादळातही हा सिनेमा ताठ मानेने उभा आहे.हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर २' ला टक्कर देताना दिसतोय. सॅकनिल्कचा रिपोर्टनुसार,पवन कल्याणच्या'उस्ताद भगत सिंग' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३१.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तरधुरंधर सिनेमानेसाऊथमध्ये ६० लाख इतकी कमाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमध्ये'उस्ताद भगत सिंग' सिनेमाचे ७५४शोज सुरु आहेत. तर धुरंधर २ ला केवळ ८४ स्क्रिन्स मिळाल्यात. ज्याचा चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होतोय. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये 'उस्ताद भगत सिंग' या टॉलिवूड अॅक्शन थ्रिलर चित्रपटाची बरीच चर्चा होती. अखेरीस बऱ्याच प्रतीक्षेनंतर हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. रिलीजपूर्वीच 'उस्ताद भगत सिंग'या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये तब्बल २० कोटींचा टप्पा ओलांडला होता. पण, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पवन कल्याणची क्रेझ पाहता, तिथे चित्रपटाने ५० ते ६० कोटींची कमाई केल्याची माहिती मिळते आहे.
95 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 20, 2026, 08:39 AM
हरियाणातील तरुण परिचारिकेचे जीवनः प्रेमकथा उलगडते

हरियाणातील तरुण परिचारिकेचे जीवनः प्रेमकथा उलगडते

गुरुग्राम :लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हरियाणातील गुरुग्राम येथील गढी हरसरु भागात हा प्रकार घडला. मयत विवाहिता व्यवसायाने नर्स होती. पतीनेच विषारी इंजेक्शन देऊन तिचा जीव घेतल्याचा आरोप महिलेच्या भावाने केला आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.काय आहे प्रकरण?उत्तर प्रदेशातील कानपूर येथील मूळ रहिवासी असलेली २३ वर्षीय तरुणी काजल कुटुंबासह हरियाणातील गढी हरसारु येथे वास्तव्यास आहे. काजल एका खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होती. तिथेच तिची ओळख अरुणशी झाली. अरुण त्या रुग्णालयाच्या एक्स-रे विभागात काम करत असे. दोघांनी चार महिन्यांपूर्वी विवाह केला. त्यानंतर ते बसई परिसरातील एका भाड्याच्या घरात राहू लागले.Pune Mumbai E-Way Accident : रात्रभर सिनेमे पाहिले, पहाटे लोणावळ्याला सूर्योदय पाहायला गेलो; तिघा तरुणांचा अपघाती अंत, मित्रांनी सांगितला घटनाक्रमवादानंतर नवऱ्याने तळ मजल्यावर नेलंहोळीनिमित्त काजल पती अरुणसोबतगढी हरसारुयेथील आपल्या माहेरी गेली होती. अरुणला अमली पदार्थांचे व्यसन असून त्याने सध्या आपली नोकरीही सोडल्याची माहिती आहे. बुधवारी सकाळी दोघा पती-पत्नीमध्ये काही कारणावरुन वाद झाला. त्यानंतर अरुणने काजलला काहीतरी बोलायचं असल्याचं निमित्त करुन घराच्या पहिल्या मजल्यावरुन तळ मजल्यावर बोलावून घेतलं, असा आरोप काजलच्या भावाने केला आहे.गुढीपाडव्यानिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांच्या शुभेच्छा; नागपूर शोभयात्रेत सहभागी होत लुटला आनंददहा मिनिटात प्रकृती बिघडलीअवघ्या दहा मिनिटांतच काजलची प्रकृती खालावू लागली आणि तिच्यानाकातून रक्तयेऊ लागलं. तिच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं. तिथून तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी काजलचं निधन झाल्याचं त्यांना सांगितलं. या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे.Indore Fire : काळ सर्वकाही हिरावून घेईल; स्टेटस ठेवून झोपले, मध्यरात्री आगीने गिळलं, सासरे-सुनेचा मृत्यू, मायलेक जखमीबाथरुममध्ये इंजेक्शन सापडलंकुटुंबीयांनी असा आरोप केला आहे की, त्यांना घरातीलबाथरुममध्ये एक इंजेक्शनसापडलं. पतीने काजलला विषारी इंजेक्शन दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला, असा आरोप करण्यात आला आहे. सेक्टर-९३ चौकी आणि सेक्टर-१० पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बॉडी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आली असून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच तिच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
27 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 08:38 AM
जागतिक संघर्षांमध्ये सलोख्याचे आर. एस. एस. प्रमुख मोहन भागवत यांचे आवाहन

जागतिक संघर्षांमध्ये सलोख्याचे आर. एस. एस. प्रमुख मोहन भागवत यांचे आवाहन

Mohan Bhagwat on Iran Crisis:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेसरसंघचालकमोहन भागवतयांनी पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण विधान केले आहे. जगात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होण्यासाठी स्वार्थाचा त्याग, एकता आणि चांगल्या मूल्यांचे पालन आवश्यक आहे.नागपूरयेथे विश्व हिंदू परिषद कार्यालयाच्या भूमिपूजनानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. संघर्षांचे मूळ कारण स्वार्थ आणि वर्चस्वाची भावना भागवत यांनी जागतिक संघर्षांच्या मुळाशी स्वार्थ आणि वर्चस्व गाजवण्याची मानसिकता असल्याचे सांगितले. याच कारणामुळे जगभरात युद्धे आणि संघर्ष सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणतात, गेल्या दोन हजार वर्षांपासून जग विविध विचारसरणींच्या माध्यमातून संघर्ष सोडवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र त्यात विशेष यश मिळालेले नाही. धार्मिक असहिष्णुता, जबरदस्ती धर्मांतर आणि श्रेष्ठत्व-हीनत्वाच्या भावना आजही अस्तित्वात असल्याचे त्यांनी नमूद केले. bभागवत यांनी ठामपणे सांगितले की, सध्या सुरू असलेल्या जागतिक युद्धांना थांबवण्याची क्षमता भारतात आहे. संघर्षात अर्थ नाही, समन्वयातच खरा अर्थ आहे. भारताची ‘सर्व एक आहेत’ ही प्राचीन परंपरा जगाला सौहार्दाचा मार्ग दाखवू शकते. मात्र, त्यासाठी देशात धर्माचे पालन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. धर्म म्हणजे केवळ ग्रंथ नव्हे, आचरणही महत्त्वाचे आरएसएस प्रमुखांनी धर्माच्या संकल्पनेवर भाष्य करताना सांगितले की, धर्म हा केवळ शास्त्रांपुरता मर्यादित नसून, तो लोकांच्या आचरणातही दिसला पाहिजे. अनुशासन आणि नैतिक मूल्यांचे पालन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. मानवतेचा दृष्टिकोन भारताची ओळख भागवत यांनी सांगितले की, भारत मानवतेच्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवतो, तर इतर अनेक देश शक्ती आणि वर्चस्वाला अधिक महत्त्व देतात. भारताचे संविधान आणि सांस्कृतिक वारसा हीच विचारसरणी प्रतिबिंबित करतात. संघर्षाऐवजी सौहार्दाची गरज जग सध्या विनाशाच्या दिशेने जात असल्याची चिंता व्यक्त करत भागवत म्हणाले की, आजच्या परिस्थितीत संघर्ष नव्हे तर सहकार्य आणि सौहार्दाची आवश्यकता आहे. आधुनिक विज्ञानही हळूहळू ‘सर्व एक आहेत’ या विचाराकडे झुकत असल्याचे त्यांनी सांगितले.
64 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 20, 2026, 08:36 AM
मुंबईची उत्क्रांतीः छोट्या गावापासून जागतिक केंद्रापर्यंत

मुंबईची उत्क्रांतीः छोट्या गावापासून जागतिक केंद्रापर्यंत

मुंबई या शहराला स्वप्नांची नगरी म्हणतात. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. दररोज कोट्यवधींचे व्यवहार मुंबईत होतात. जगभरातील मोठ्या कंपन्यांची कार्यालयं मुंबईत आहेत. आज मुंबई हे शहर जगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. पण लक्षवेधी बाब म्हणजे, एक वेळ अशीही होती जेव्हा मुंबई हे एक छोटंसं गाव होतं. भारतात इंग्रज आले आणि त्यांचं लक्ष या छोट्याशा गावावर पडलं. आणि पाहता पाहता एका लहानशा बेटाचं रूपांतर भल्यामोठ्या, संपन्न शहरात झालं. चला पाहूया १८व्या शतकात कशी बदलत गेली मुंबई. हा AI व्हिडिओ पाहून तुम्हीही दंग व्हाल.(फोटो सौजन्य - kaalchakra.bharat/Instagram)मुंबईची निर्मिती कशी झाली?​View this post on InstagramA post shared by Kaalchakra.Bharat (@kaalchakra.bharat)​हे व्हिडिओ kaalchakra.bharat या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आले आहेत. हे व्हिडिओ AI सॉफ्टवेअरच्या मदतीने तयार करण्यात आले आहेत. या व्हिडिओंमध्ये तुम्ही मुंबईचा इतिहास पाहू शकता. गंमत म्हणजे हे व्हिडिओ इतक्या प्रभावी पद्धतीने तयार केले आहेत की पाहताना जणू २०० वर्षांपूर्वीच्या काळात गेल्यासारखं वाटतं. कोळी लोकं मासेमारी कशी करायचे, पहिली रेल्वे कशी सुरू झाली, पहिला स्टॉक एक्स्चेंज कसा होता, मुंबई ही सात बेटांची बनलेली आहे पण २००-३०० वर्षांपूर्वी ही बेटं कशी होती, यांसारख्या अनेक रंजक गोष्टी या व्हायरल व्हिडिओंमध्ये पाहायला मिळतात.कशी झाली स्टॉक एक्सेंजची निर्मिती?​View this post on InstagramA post shared by Kaalchakra.Bharat (@kaalchakra.bharat)​हे व्हिडिओ १ लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले आहेत. अनेकांनी या व्हिडिओंचं कौतुकही केलं आहे. कारण मुंबईबद्दल बरीच माहिती सर्वश्रुत आहे. तिच्या इतिहासावर अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत, पण तीच माहिती या व्हिडिओंमध्ये दृश्य स्वरूपात पाहायला मिळते. त्यामुळे हे व्हिडिओ अधिक प्रभावी वाटतात आणि २००-३०० वर्षांपूर्वीच्या काळात गेल्याचा अनुभव देतात.(महत्वाची टीप - या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)
61 shares
😊
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 08:33 AM
महाराष्ट्र ऑटोरिक्षा संघटनांनी कल्याण मंडळाच्या निर्णयांना विरोध केला आणि स्वतंत्र नोंदणी मंडळाची मागणी केली

महाराष्ट्र ऑटोरिक्षा संघटनांनी कल्याण मंडळाच्या निर्णयांना विरोध केला आणि स्वतंत्र नोंदणी मंडळाची मागणी केली

मुंबई : राज्यातील ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनांनी कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी शुल्कासह विविध निर्णयांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गिरगावमध्ये रविवारी पार पडलेल्या राज्यस्तरीय बैठकीत या मुद्द्यांवर एकमुखाने निषेध नोंदवण्यात आला असल्याचे ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना कृती समिती महाराष्ट्रचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले. या बैठकीला मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील शहरे तसेच ग्रामीण भागातील संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. ऑटो रिक्षा चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी गेल्या २० वर्षांपासून शासनाकडे केली. मात्र, मंडळ स्थापन करताना शासनाने संबंधित संघटनांशी कोणतीही चर्चा न करता एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप करत शासनाने मंडळाच्या नोंदणीसाठी ५०० रुपये प्रवेश शुल्क आणि ३०० रुपये वार्षिक शुल्क बंधनकारक केल्याबाबत नाराजी आहे. रिक्षाचालकांवर नोंदणीसाठी दबाव टाकल्याचा आरोप -काही प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) रिक्षाचालकांवर नोंदणीसाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप संघटनांनी केला. नोंदणी न केल्यास परवाना नूतनीकरण, पासिंग यांसारखी कामे रोखण्याची धमकी दिली जात असल्याचे सांगितले. ही बाब बेकायदेशीर असून ती तातडीने थांबवावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. दरम्यान, राज्य सरकारने पारंपरिक ऑटो रिक्षांच्या परवाना वितरणावर स्थगिती आणली असताना इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा आणि ई-रिक्षांना मात्र सूट दिल्याबाबतही संताप व्यक्त करण्यात आला. सरकारची ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका संघटनांनी केली. तसेच विविध मागण्यांसंदर्भात ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती येत्या २३ मार्च रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील आरटीओ कार्यालयात निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती राव यांनी दिली.
1 shares
😢
L
Lokmat
Mar 20, 2026, 08:29 AM
मुंबई क्लीन लीगच्या कार्यक्रमात अक्षय कुमारने वादग्रस्त वक्तव्य केले

मुंबई क्लीन लीगच्या कार्यक्रमात अक्षय कुमारने वादग्रस्त वक्तव्य केले

बॉलिवूडचा'खिलाडी' अर्थातअक्षय कुमार(Akshay Kumar) नेहमीच आपल्या शिस्तीसाठी आणि सामाजिक कार्यासाठी ओळखला जातो. मंगळवारी अक्षयने मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) 'मुंबई क्लीन लीग' (Mumbai Clean League) कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात स्वच्छतेवर बोलताना अक्षयने सध्या चर्चेत असलेल्या संजय दत्त आणि नोरा फतेही यांच्या 'सरके चुनर तेरी' या गाण्यावर आणि मुंबईच्या खालावलेल्या हवेच्या गुणवत्तेवर (AQI) आपली रोखठोक मते मांडली. अक्षयला यावेळी कार्यक्रमादरम्यान नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्या 'सरके चुनर तेरी' या वादग्रस्त गाण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तो म्हणाला, "हा बीएमसीशी संबंधित विषय नाही. जरबॉलिवूडस्वच्छ करणं बीएमसीचं काम असतं, तर मी त्यांना नक्कीच साफसफाई करण्यास सांगितलं असतं". मुंबईतील वाढत्या AQI बाबत विचारलं असता, त्यानं सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला दिला. तो म्हणाला, "प्रत्येक ठिकाणी काही चांगलं आणि काही वाईट असतं. प्रत्येक गोष्टीत चुका शोधू नका. एका खोलीत अनेक दिवे असतात, त्यातील एक बंद असेल तर फक्त त्याच्याकडे लक्ष देऊ नका". आगामी चित्रपटअक्षय कुमारलवकरच दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या 'भूत बंगला' या हॉरर-कॉमेडी चित्रपटात दिसणार आहेत. या कार्यक्रमाला तो थेट शूटिंगमधूनच वेळ काढून पोहोचला होता. स्वच्छतेसारख्या महत्त्वाच्या विषयावर बोलताना त्यानं सांगितलं की, "मी आज शूटिंगमधून वेळ काढून इथे आलो, कारण स्वच्छता हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आपल्याला सकारात्मक विचारसरणीसह पुढे जायला हवं".
60 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 08:28 AM
रस्त्यांची खराब स्थिती उघडकीस आल्यानंतर मुंबईच्या उपमहापौरांच्या प्रभागात धुळीचे लोट पसरले

रस्त्यांची खराब स्थिती उघडकीस आल्यानंतर मुंबईच्या उपमहापौरांच्या प्रभागात धुळीचे लोट पसरले

मुंबई: उपमहापौर संजय घाडी यांचा प्रभाग क्र. ५ अशोकवन-चिंतामणी नगर चकाचक करण्यात आला आहे. या प्रभागात अस्वच्छता असल्याबाबत ‘रस्ते खोदले, मलब्याचे ढीग... रोज धुळीशी सामना’ या मथळ्याखाली उपमहापौरांचा वॉर्ड रिपोर्ट ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाला होता. या वृत्ताची दखल घेत आर उत्तर विभागाचे सहायक आयुक्त नयनिश वेंगुर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबवत परिसर चकाचक केला. संत ज्ञानेश्वर मार्ग व अशोक वन या परिसरात सखोल स्वच्छता करण्यात आली. यावेळी पाण्याच्या टँकरने रस्ते व पदपथ धुऊन स्वच्छ करण्यात आले. यावेळी २० टन गाळ, कचरा, ऑड आर्टिकल्स, अनधिकृत फलक हटवून ३६ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. स्वच्छता मोहिमेमध्ये पालिकेचे ४० कामगार, ५ अभियंते सहभागी झाले होते. एक जेसीबी, चार डंपर, एक पाण्याचा टँकरचा वापर करण्यात आला होता. वाहतूककोंडी सोडवणार -नॅन्सी कॉलनी एस.टी. डेपो परिसरात होणाऱ्या धुळीच्या प्रदूषणाबाबत लवकरच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेणार आहोत. वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांबरोबर बैठक घेणार असल्याचे घाडी यांनी सांगितले. यावेळी प्रवक्त्या संजना घाडी, शाखाप्रमुख विद्या पोतदार, युवासेना विधानसभा समन्वयक सुयश घाडी आदी उपस्थित होते.
41 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 08:27 AM
क्रिकेटपेक्षा कुटुंबाला प्राधान्य, लॉकी फर्ग्युसन आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यातून बाहेर

क्रिकेटपेक्षा कुटुंबाला प्राधान्य, लॉकी फर्ग्युसन आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यातून बाहेर

न्यूजीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन (Lockie Ferguson) याने IPL 2026 च्या यंदाच्या हंगामाआधी फॅमिली फर्स्ट असे म्हणत सुरुवातीच्या टप्प्यातील सामन्यातून माघार घेतली आहे. प्रिती झिंटाच्या मालकीच्यापंजाब किंग्ससंघाचा भाग असलेला लॉकी फर्ग्युसन नुकताच बाबा झाला आहे. त्यामुळे पत्नी आणि नवजात बाळासोबत वेळ घालवण्यासाठी त्याने IPL स्पर्धेतील यंदाच्या हंगामात उशीरा संघात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! चार दिवस सुट्टी अन् मग नॅशनल ड्युटी ऑकलंडमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी फर्ग्यूसनने स्पष्ट केले की, नवजात मुलगा आणि पत्नीसोबत घरी राहणे गरजेचे आहे. आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान काही दिवस त्याने सुट्टी घेतली होती. पण चार दिवसांतच तो पुन्हा राष्ट्रीय संघासोबत आपली ड्युटी बजावताना दिसला. आता त्याने IPL स्पर्धेआधी मोठा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी विंटर टूरसाठी ताजेतवाने होण्याचा विचार करत आहेत. IPL मधून 'हे' ५ दिग्गज संघ का गायब झाले? एक तर विजेता..., पुण्याचे दोन संघ होते, वाचा रंजक इतिहास फॅमिली फर्स्ट, मग IPL... फर्ग्यूसनने सांगितले की, सध्याच्या क्रिकेटमध्ये सामने आणि लीग्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे विश्रांतीसाठी योग्य वेळ निवडणे कठीण होते. वर्ल्ड कपदरम्यान पत्नी एकटीच बाळाची काळजी घेत होती. त्यामुळे आता कुटुंबासोबत वेळ घालवणे गरजेचे आहे. प्रितीच्यापंजाब किंग्सचाप्लॅन-बी तयारफर्ग्यूसनच्या अनुपस्थितीत प्रिती झिंटाच्या सह मालकीच्या पंजाबकडे पर्यायांची कमतरता नाही. संघ व्यवस्थापन ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज बेन ड्वॉरशुइस याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकते. त्याच्यासाठी पंजाब किंग्जच्या संघाने लिलावात ४.४ कोटी रुपये मोजले आहेत. याशिवाय अर्शदीप सिंग, मार्को यान्सेन, बार्टलेट, ओमरझाई आणि मार्कस स्टॉयनिस यांच्या रुपात पंजाबची गोलंदाजी एकदम तगडी असल्याचे दिसते. IPL मधील कामगिरी लॉकी फर्ग्युसन गेल्या दोन हंगामापासून २ कोटी मूळ किंमतीसह पंजाब किंग्सच्या संघासोबत आहे. याआधी त्याने कोलकाता नाईट रायडर्स, गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे प्रतिनीधीत्व केले आहे. IPL मध्ये ४९ सामन्यात त्याच्या खात्यात ५१ विकेट्स जमा आहेत.
25 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 08:25 AM
नाफेडच्या वणी तालुक्यातील तूर खरेदी अचानक थांबल्याने शेकडो शेतकरी प्रभावित

नाफेडच्या वणी तालुक्यातील तूर खरेदी अचानक थांबल्याने शेकडो शेतकरी प्रभावित

Tur Kharedi :तूरखरेदीच्या हंगामात मोठा गोंधळ निर्माण झाला असून नाफेडमार्फत सुरू असलेलीतूरखरेदी अचानक बंद पडल्याने वणी तालुक्यातील शेकडोशेतकरीअडचणीत सापडले आहेत.(Tur Kharedi) दुसरीकडे, वाशिम जिल्ह्यात हमीभावाने सुरू असलेल्या तूर खरेदीलाही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे.(Tur Kharedi) वणीमध्ये खरेदी बंद; ५००शेतकरीअडकले नाफेड (NAFED) मार्फत व्हीसीएमएस संस्थेच्या माध्यमातून वणी खरेदी-विक्री संघात तूर खरेदी सुरू होती. मात्र, ५ मार्चपासून ही खरेदी अचानक बंद करण्यात आली. सुरुवातीला केवळ दोन दिवस खरेदी सुरू ठेवून पुन्हा केंद्र बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण १,०७८ शेतकऱ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी केवळ २१७ शेतकऱ्यांकडून ३,२८७.५० क्विंटल तूर खरेदी झाली असून सुमारे ५०० शेतकरी विक्रीपासून वंचित आहेत. खरेदी केंद्राची अंतिम मुदत २० मार्च असताना केंद्र बंद राहिल्याने अनेक शेतकऱ्यांना आपला माल विकता आलेला नाही. त्यामुळे उर्वरित तूर खरेदी तातडीने सुरू करून ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी, तसेच हरभरा खरेदीही सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यात हमीभाव खरेदीला कमी प्रतिसाद वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत हमीभावाने तूर खरेदी सुरू असली तरी शेतकऱ्यांचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा कमी आहे. ६,७४७ शेतकऱ्यांनी नोंदणी प्रत्यक्षात केवळ १,६१६ शेतकऱ्यांनी तूर विकली एकूण २४,०४४ क्विंटल खरेदी जिल्ह्यात दि विदर्भ को-ऑप मार्केटिंग फेडरेशन लि (Vidarbha Cooperative Marketing Federation), शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड (Maharashtra State Cooperative Marketing Federation) यांच्या माध्यमातून एकूण ३६ केंद्रांवर १३ फेब्रुवारीपासून खरेदी सुरू आहे. अल्प प्रतिसादामागील कारणे हमीभाव खरेदीला कमी प्रतिसाद मिळण्यामागे अनेक कारणे आहेत * खुल्याबाजारातजवळपास समान दर मिळणे * ई-पीक नोंदणीतील तांत्रिक अडचणी * शासकीय खरेदीतील विलंब आणि गुणवत्ता कपातीची भीती * यापूर्वीच्या सोयाबीन खरेदीतील अनुभवामुळे शेतकऱ्यांचा कमी विश्वास पुढील काळात प्रतिसाद वाढण्याची शक्यता सध्या खुल्याबाजारातीलतुरीचे दर हळूहळू घसरू लागले आहेत. त्यातच मार्चअखेरमुळे बाजार समित्यांचे व्यवहार काही दिवस ठप्प राहणार असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक व्यवहारांसाठी पैशांची गरज भासणार आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांचा हमीभाव खरेदीकडे कल वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट एकीकडे वणी येथे खरेदी बंद असल्याने शेतकरी अडचणीत आहेत, तर दुसरीकडे वाशिम जिल्ह्यात खरेदी सुरू असूनही कमी प्रतिसाद मिळत आहे. या दुहेरी परिस्थितीमुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे. तूर खरेदी व्यवस्थेत समन्वयाचा अभाव, तांत्रिक अडचणी आणि बाजारातील परिस्थिती यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्यासच परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. हे ही वाचा सविस्तर :Harbhara Kharedi : हरभरा खरेदी कासवगतीने; नाफेड केंद्रांवर शेतकरी रांगेत अधिक वाचा :Washim APMC Market : वाशिम बाजार समिती ५ एप्रिलपर्यंत बंद; जाणून घ्या नेमकं कारण
39 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 08:25 AM
ठाण्यामध्ये सांस्कृतिक महत्त्व आणि सामाजिक जागृतीसह गुढीपाडवा साजरा

ठाण्यामध्ये सांस्कृतिक महत्त्व आणि सामाजिक जागृतीसह गुढीपाडवा साजरा

सांस्कृतिक वैभव जपत समाजप्रबोधनाचा संदेश देणारी ही शोभायात्रा ठाणेकरांच्या एकजुटीची आणि सकारात्मकतेची जिवंत साक्ष ठरली. प्रत्येकाच्या मनात नव्या आशा, नव्या संकल्पांची पालवी फुटावी आणि येणारे वर्ष सर्वांसाठी यश, समाधान आणि समृद्धी घेऊन यावे, अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली. गुढीपाडव्याच्या या सांस्कृतिक सोहळ्याने ठाणे शहराला नवचैतन्याची प्रेरणा देत नववर्षाचे स्वागत अधिक अर्थपूर्ण आणि संस्मरणीय केले.
90 shares
😊
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 08:20 AM
भारताने शालेय पोषण कार्यक्रमाचे सामाजिक लेखापरीक्षण केले

भारताने शालेय पोषण कार्यक्रमाचे सामाजिक लेखापरीक्षण केले

मुंबई : इयत्ता पहिली ते आठवीच्याशाळांमध्येराबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान पोषणशक्ती निर्माण योजनेचे सोशल ऑडिट करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार पोषण आहाराची गुणवत्ता, पारदर्शकता आणि खर्चाची सखोल तपासणी होणार आहे. राज्यातील पाच टक्के म्हणजेच चार हजार ३२५शाळांचीनिवड करून त्यांचे टप्प्याटप्प्याने सोशल ऑडिट स्वतंत्र यंत्रणेमार्फत केले जाणार आहे. मुंबईत एकूण महापालिकेच्या आणि खासगी प्राथमिक अनुदानित मिळून एक हजार ३११ प्राथमिक शाळांत रोज तीन लाख ८० हजार ५०० मुलांना आहार दिला जातो. या आहाराचे पडताळणीअंती ऑडिट केले जाणार असून, लोकसहभागातून पारदर्शकता वाढवली जाणार आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, ९३१ पालिका आणि ३८१ अनुदानित शाळांपैकी पालिकेंतर्गत १२ तालुके (युआरसी-शहर साधन केंद्र) आणि शिक्षण उपसंचालकांतर्गत सात तालुक्यांमधील पाच टक्के शाळांची तपासणी होणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये एकाच निकषांनुसार तपासणी नंतर त्याचा अहवाल शिक्षण संचालकांना सादर करून सरकारकडे पाठविणे आवश्यक राहणार आहे. धान्य खरेदी, स्वयंपाक खर्चाचा आढावामुलांच्या ताटातील अन्नाची पोषकता, आहाराचे प्रमाण, गुणवत्ता तसेच नियमितता यांची सविस्तर तपासणी होणार आहे. खर्चाचा सविस्तर हिशेबाचा आढावा घेतला जाणार आहे. धान्य खरेदी, स्वयंपाक खर्च, मानधन आणि निधी वापराची पडताळणी केली जाणार आहे. अनियमितता आढळल्यास शिस्तभंगाची कारवाईधान्यसाठा, स्वच्छता, स्वयंपाकगृह सुविधा पाहणी, भांडी, स्वयंपाकगृह, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि नोंदवही यांची प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे.त्यात अनियमितता आढळल्यास, निधी गैरवापर किंवा त्रुटी आढळल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी शासनाच्या नवीन निर्देशानुसार मुंबईतील इयत्ता पहिली ते आठवीच्या शाळांमध्ये पोषण आहार योजनेचे सामाजिक ऑडिट केले जाणार आहे. यामुळे पारदर्शकता वाढेल.कीर्तीवर्धन किरतकुडवे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, महापालिका
70 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 08:17 AM
भारतः राज्य सरकारने कर्जबाजारी एमएमआरडीए प्रकल्पांसाठी निधी जारी केला

भारतः राज्य सरकारने कर्जबाजारी एमएमआरडीए प्रकल्पांसाठी निधी जारी केला

मुंबई : मुंबई महानगरात सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे कर्जबाजारी झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) प्रकल्पांसाठी निधीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून जमा झालेले १,०६१ कोटी रुपये ‘एमएमआरडीए’ला दिले आहेत. तर कफ परेड ते आरेमेट्रो३ या भुयारीमेट्रोचीउभारणी करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (एमएमआरसी) २४१ कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे ‘एमएमआरडीए’च्या प्रकल्पांसाठी निधीचा मार्ग मोकळा होणार आहे. ‘एमएमआरडीए’ने मुंबई महानगरात मेट्रो, रस्ते, भुयारी मार्ग प्रकल्पांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहेत. या प्रकल्पांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. त्यातून या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या खर्चासाठी कर्जावर भिस्त आहे. भुयारी मेट्रोसाठी १३७ कोटींचे दुय्यम कर्ज -भुयारी मेट्रो ३ प्रकल्पासाठी ‘एमएमआरसीएल’ला १३७ कोटी रुपये दुय्यम कर्ज राज्य सरकारने दिले आहे. या प्रकल्पात राज्य सरकारचा हिस्सा म्हणून ४८३५ कोटी रुपये दिले जाणार आहेत. यातील राज्य सरकारने आतापर्यंत ४,५६४ कोटी रुपये ‘एमएमआरसीएल’ला दिले आहेत. ‘मुद्रांक’वर अधिभारमुंबई महानगरातील महत्वाकांक्षी पायाभूत नागरी परिवहन प्रकल्पांसाठी निधीचा पुरवठा व्हावा, यासाठी राज्य सरकारने मालमत्तांच्या खरेदी विक्रीतून येणाऱ्या मुद्रांक शुल्कावर १ टक्का अतिरिक्त अधिभार लागू केला आहे. राज्य सरकार या माध्यमातून जमा झालेला निधी प्रकल्पांच्या कामासाठी ‘एमएमआरडीए’ला देते. अनेक समस्या मार्गीमुंबई महानगरात जून २०१९ पासून हे अतिरिक्त मुद्रांक शुल्क आकारले जात असून त्यातून राज्य सरकारच्या तिजोरीत जून २०२५ पर्यंत ९ हजार ८१३ कोटी रुपये जमा झाले. राज्य सरकारने आतापर्यंत यातील केवळ ४,४२० कोटी रुपयांचा निधी ‘एमएमआरडीए’ला दिला होता. तर तब्बल ५३९४ कोटी रुपये मिळणे बाकी होते. आता आणखी १०६१ कोटी रुपये देण्यात आले असून त्यातून प्रकल्पांसाठी निधीचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे. राज्य सरकारने मुद्रांक शुल्कातून जमा झालेले ९५४ कोटी रुपये २५ सप्टेंबर २०२५ ला ‘एमएमआरडीए’ला दिले होते. तर २४ डिसेंबर २०२५ मध्ये आणखी २९१ कोटी रुपये दिले होते.
17 shares
😊
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 08:17 AM
अर्जुन बिजलानीला कर्जतच्या घरात शांतता मिळते

अर्जुन बिजलानीला कर्जतच्या घरात शांतता मिळते

मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचे अनेकांचे स्वप्न असते.बॉलिवूडमधीललोकप्रिय अभिनेता अर्जुन बिजलानीने (Arjun Bijlani) नुकतेच हे स्वप्न पूर्ण केले आहे. अर्जुनने महाराष्ट्रातील निसर्गरम्य अशा कर्जतमध्ये एक आलिशान आणि भव्य घर खरेदी केला आहे. नुकताच त्याने आपल्या कुटुंबासह या नवीन घरात गृहप्रवेश केला, ज्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.डोंगराच्या कुशीत कोट्यवधींचा बंगलाअर्जुनने खरेदी केलेलं हे नवं घर डोंगररांगांच्या कुशीत असून ते अतिशय भव्य आहे. या घराच्या गृहप्रवेशाच्या पूजेचे काही खास क्षण अर्जुनने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये अर्जुन पांढऱ्या रंगाच्या कुर्ता-पायजम्यामध्ये दिसत आहे, तर त्याची पत्नी नेहा स्वामी लाल रंगाच्या पारंपारिक ड्रेसमध्ये पूजेला बसलेली दिसत आहे. त्यांचा मुलगा अयान देखील या पूजेत सहभागी झाला होता. अर्जुनच्या या घराची एक विशेष गोष्ट म्हणजे घराचे इंटिरिअर. त्याने संपूर्ण घरासाठी 'व्हाईट थीम' (White Theme) निवडली आहे. घरातील फर्निचर, पडदे, पेंट आणि सजावटीच्या वस्तू सर्व पांढऱ्या रंगाच्या आहेत, ज्यामुळे घर अधिक प्रशस्त आणि सुंदर दिसत आहे. घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून कर्जतचे निसर्गसौंदर्य आणि हिरवळ पाहायला मिळते. अर्जुनने या स्वप्नपूर्तीबद्दल गणपती बाप्पाचे आभार मानले आहेत. त्याचे हे नवीन घर पाहून मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी आणि त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. कर्जतमध्ये केवळ अर्जुनच नाही, तर शिल्पा शिंदे सारख्या इतर अनेक सेलिब्रिटींनी देखील आपले 'हॉलिडे होम' बनवले आहे. सध्या अर्जुनच्या या नव्या घराच्या फोटोंनी सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
32 shares
😊
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 08:12 AM
कल्याण वेस्टने उत्साहपूर्ण स्वागत मार्चसह नवीन वर्ष साजरे केले

कल्याण वेस्टने उत्साहपूर्ण स्वागत मार्चसह नवीन वर्ष साजरे केले

कल्याणमध्ये निघाली स्वागतयात्रा कल्याण पश्चिमेकडे कल्याण संस्कृती मंच आणि जैन चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली. मुरबाड रोडला असलेल्या सिंडिकेट येथून सुरू झालेल्या स्वागत यात्रेचा नमस्कार मंडळ येथे समारोप झाला. कल्याणच्या विविध स्तरातील संस्था/संघटनांसह कल्याणकर स्वागत यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील चौकांत ढोल/झांंज पथके यात्रेचे स्वागत करत होती. कल्याण पूर्व, डोंबिवली ग्रामीण, एमआयडीसीच्या निवासी विभागात स्थानिकांनी काढलेल्या स्वागत यात्रा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या.
97 shares
😊
L
Lokmat
Mar 20, 2026, 08:09 AM
आर्मोरीमध्ये दुचाकी-ट्रकच्या भीषण धडकेत 55 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

आर्मोरीमध्ये दुचाकी-ट्रकच्या भीषण धडकेत 55 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी:आजारी जावयाची विचारपूस करून परतणाऱ्या सासऱ्याची दुचाकी उभ्या ट्रकवर धडकली. याअपघातातगंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना १५ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता एका पेट्रोलपंपाजवळ घडली. भावराव जनाजी मंगरे (५५, रा. वनखी, ता. आरमोरी) असे मयताचे नाव आहे. त्यांचे जावई अर्जुन चिंचोलकर (रा. कोसारा, जि. चंद्रपूर) हे आजारी असल्याने ब्रह्मपुरी येथील एका खासगी रुग्णालयात जावयाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भावराव ब्रह्मपुरीला गेले होते. ते दुचाकीने (एमएच ३४ सीएन-२०५४) परतत असताना आरमोरी येथे उभ्या ट्रकवर दुचाकी आदळली. यात जखमी झालेले भावराव यांना तातडीने ब्रह्मपुरीला खासगी दवाखान्यात भरती केले. १६ मार्च रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. 'तो' ट्रक ठरला काळ! आरमोरीजवळील एका पेट्रोल पंपासमोर ट्रक (सीजी ०७ सीएम-४७९५) कोणत्याही प्रकारचे रिफ्लेक्टर किंवा सुरक्षेचे चिन्ह न लावता रस्त्याच्या मधोमध उभा होता. मृत भावराव यांचे पुतणे प्रफुल्ल मंगरे यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालकावर गुन्हा नोंद झाला.
88 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 08:08 AM
नागरिक समितीने लोटे येथील प्रशासनाला पर्यावरणीय समस्या सादर केल्या

नागरिक समितीने लोटे येथील प्रशासनाला पर्यावरणीय समस्या सादर केल्या

लोटे, चिरणी, आंबडस, भेलसई, सोनगाव कालुस्ते बुद्रूक, घाणेखुंट, आवाशी, गुणदे, शेल्डी या ग्रामपंचायतींनी मिळून लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती नावाने ४५ नागरिकांची समिती गठित केली आहे. या समितीने प्रशासनासमोर स्थानिक नागरिकांच्या भावना मांडल्या आणि कंपनीमुळे होणाऱ्या पर्यावरणीय व सामाजिक परिणामांविषयी सविस्तर माहिती दिली. या बैठकीत आंदोलनाचे प्रमुख प्रतिनिधी रवींद्र हरिश्चंद्र गोवळकर, संजय आंब्रे, संजय साळवे, अविनाश आंब्रे, किशोर आंब्रे, उदय घाग, सुबोध सावंत देसाई आदी उपस्थित होते.
94 shares
😐