Achira News Logo
Achira News
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 09:49 AM
रवी जाधव यांचे अलिबाग फार्महाऊसः शहरी जीवनातील एक भावपूर्ण मरूद्यान

रवी जाधव यांचे अलिबाग फार्महाऊसः शहरी जीवनातील एक भावपूर्ण मरूद्यान

आजच्या धकाधकीच्या शहरी जीवनात माणूस हळूहळू निसर्गापासून दूर जात आहे. अशा वेळी रवी जाधव यांच्यासारख्या व्यक्ती जेव्हा स्वतः निसर्गाशी नातं जपताना दिसतात, तेव्हा ती गोष्ट अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते. त्यांच्या अलिबागमधील फार्महाऊसकडे पाहिल्यावर हे स्पष्ट होतं की, त्यांनी केवळ विश्रांतीसाठी जागा निर्माण केली नाही, तर एक पूर्ण जीवनशैली उभी केली आहे. फार्महाऊसची रचना अत्यंत साधी पण मनाला शांत करणारी आहे. मोठं अंगण, आजूबाजूला झाडांची दाटी, मोकळी हवा आणि पक्ष्यांचा किलबिलाट हे सगळं वातावरण मन प्रसन्न करतं.शहरातील बंदिस्त घरांमध्ये जे नैसर्गिक सुख मिळत नाही, ते इथे सहज अनुभवता येतं. यामुळेच हे फार्महाऊस केवळ ‘हॉलिडे होम’ न राहता एक ‘सोलफुल स्पेस’ बनतं. शेती हा या फार्महाऊसचा मुख्य आत्मा आहे. त्यांनी विविध प्रकारच्या भाज्या आणि फळांची लागवड केली आहे. स्वतः पिकवलेली भाजी आणि फळं खाण्याचा आनंद वेगळाच असतो. त्यात केमिकलचा वापर कमी असल्याने ती अधिक आरोग्यदायी असतात. यामुळे ‘फार्म टू टेबल’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरलेली दिसते. आज अनेक लोक सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत, आणि रवी जाधव यांचे हे पाऊल त्याच दिशेने जाणारे आहे. (फोटो सौजन्य :- @ravijadhavofficial)बैलजोडी आणि पारंपरिक शेती संस्कृतीचा सन्मानया फार्महाऊसमध्ये एक विशेष आकर्षण म्हणजे बैलजोडी. आधुनिक यंत्रसामग्रीच्या युगातही बैलजोडीचा वापर करून शेतीशी जोडलेली पारंपरिक पद्धत जपली जात आहे. बैलजोडी ही भारतीय कृषी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. जमीन नांगरणे, शेतीची प्राथमिक कामं आणि ग्रामीण जीवनातील श्रम यांचं प्रतीक म्हणून ती ओळखली जाते. रवी जाधव यांनी ही परंपरा जपून ठेवली आहे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. ही गोष्ट केवळ शेतीपुरती मर्यादित नाही, तर ती आपल्या मुळांशी जोडलेलं राहण्याचं प्रतीक आहे. आधुनिकतेसोबत परंपरेचा समतोल कसा साधावा, याचं हे उत्तम उदाहरण आहे.झाडांनी वेढलेला परिसरअलिबाग हे मुंबईपासून जवळ असूनही शांत, हिरवळीनं नटलेलं ठिकाण आहे. इथेच रवी जाधव यांनी आपलं फार्महाऊस उभं केलं आहे. या ठिकाणी शहराच्या गजबजाटापासून दूर, शांत आणि निसर्गाशी जवळीक साधणं शक्य होतं. फार्महाऊसची रचना ही आधुनिक असूनही ग्रामीण सौंदर्य जपणारी आहे. लाकूड, मातीचे रंग, खुली जागा आणि झाडांनी वेढलेला परिसर हे या ठिकाणाचं वैशिष्ट्य आहे. या फार्महाऊसमध्ये प्रवेश करताच माणूस शहराच्या धावपळीपासून दूर जाऊन निसर्गाच्या कुशीत जातो, असा अनुभव येतो.इथे केवळ विश्रांतीसाठीच नव्हे तर सर्जनशील विचारांसाठीही उत्तम वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे कलाकारांसाठी किंवा सर्जनशील लोकांसाठी अशा जागा अत्यंत उपयुक्त ठरतात.पारंपरिक शेतीचा अनुभव भाजीपाला आणि फळांची लागवडरवी जाधव यांच्या फार्महाऊसची सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे तिथली शेती. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये विविध भाजीपाला आणि फळझाडं दिसून आली. या ठिकाणी टोमॅटो, वांगी, भेंडी, मिरची यांसारख्या भाज्या तसेच आंबा, पेरू, चिकू यांसारखी फळझाडं पाहायला मिळतात. ही शेती पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने केली जाते, ज्यामुळे उत्पादन अधिक आरोग्यदायी आणि सेंद्रिय असतं. शेती केवळ उत्पादनासाठी नाही तर मानसिक समाधानासाठीही महत्त्वाची आहे. जमिनीशी जोडून काम करणं, स्वतः झाडं वाढताना पाहणं आणि त्यातून मिळणारा आनंद हा वेगळाच अनुभव असतो. शहरातील लोकांसाठी हा अनुभव एक प्रकारचा ‘डिटॉक्स’ मानला जाऊ शकतो.ग्रामीण आणि आधुनिक शैलीचा संगमफार्महाऊसच्या घराची सजावटही विशेष लक्षवेधी आहे. इथे ग्रामीण आणि आधुनिक शैलीचा सुंदर संगम पाहायला मिळतो. लाकडी फर्निचर, मातीच्या रंगसंगती, मोठ्या खिडक्या आणि नैसर्गिक प्रकाश यामुळे घर अतिशय प्रसन्न वाटतं. घराच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे हिरवळ जपली गेली आहे. झाडं, कुंड्या, आणि ओपन स्पेसेस यामुळे घरात नैसर्गिक वातावरण निर्माण झालं आहे. अशा प्रकारची सजावट आजकाल अनेक लोकांना प्रेरणा देत आहे. शहरात राहूनही घराला नैसर्गिक लूक कसा देता येतो, याचे अनेक आयडिया या फार्महाऊसकडून मिळू शकतात.शहरातील लोकांसाठी प्रेरणारवी जाधव यांचे हे फार्महाऊस फक्त एक निवासस्थान नाही, तर एक संदेश आहे निसर्गाशी पुन्हा जोडले जाण्याचा. आजच्या धावपळीच्या जीवनात लोक ताणतणाव, प्रदूषण आणि डिजिटल थकव्यामुळे त्रस्त आहेत. अशा वेळी निसर्गात वेळ घालवणे, स्वतः शेती करणे किंवा ग्रीन स्पेस तयार करणे हे मानसिक आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरते.जर आपणही आपल्या जीवनात थोडा “ग्रीन टच” आणला, तर मानसिक शांतता आणि समाधान नक्कीच वाढू शकते.2
57 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 04:39 AM
मुंबईत वैद्यकीय उपचारांना विलंब झाल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

मुंबईत वैद्यकीय उपचारांना विलंब झाल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबातील चार जणांच्या मृत्यू प्रकरणात अन्नातून विषबाधा झाली की, अन्य कारण होते, याचा तपास सुरू असताना वैद्यकीय उपचार मिळण्यात सुमारे साडेपाच तासांचा विलंब झाल्याची बाब फोरेन्सिक व वैद्यकीय तज्ज्ञांच्या चर्चेतून समोर आली आहे.उपचारात विलंबजेवणानंतरकलिंगडाचे सेवनकेल्यानंतर कुटुंबातील चारही जणांना पोटदुखी, उलट्या व अतिसाराची लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर परिसरातील एका डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार घेण्यात आले. त्यामुळे त्यांना काही काळ आराम मिळाल्याचे सांगितले जाते. मात्र, काही वेळाने त्रास पुन्हा वाढला. अशा स्थितीत रुग्णालयात तातडीने दाखल होणे अपेक्षित असताना ते घरीच थांबल्याची माहिती पुढे आली आहे. प्रकृती बिघडल्यावर त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी सुमारे ११ ते पावणे १२ वाजण्याच्या सुमारास त्यांना दाखल केल्याचे समजते.विषबाधेचे नेमके कारण अद्याप अनिश्चितवैद्यकीय उपचारात ‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा मानला जातो. या काळात उपचार न झाल्यास लक्षणे गंभीर होण्याची शक्यता वाढते. शवविच्छेदनानंतर घेतलेल्या नमुन्यांच्या प्राथमिक अहवालात तीव्र स्वरूपाची विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र,पायधुनीयेथील विषबाधेचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही.Mumbai Police Duty Hours : आठ तास ड्युटीचे 'बारा' वाजले! आता '12 तास काम, 24 तास आराम' संकल्पना आणा, पोलिसांची वाढती मागणीकलिंगडाबाबत एफडीएचा अंतिम निष्कर्ष बाकीकलिंगडामुळे विषबाधा झाली का, याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून अंतिम निष्कर्ष देण्यात आलेला नाही. संबंधित तपास सुरू असून फोरेन्सिक विभाग व वैद्यकीय तज्ज्ञांचा अंतिम अहवाल अद्याप पोलिसांकडे सादर झालेला नाही. तसेच प्राथमिक उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडूनही अधिक माहिती घेतली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.सुनेत्रा पवार बारामतीच्या नव्या कारभारी, सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम नावावरतपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, मृत्यूचे नेमके कारण केवळ 'विषशास्त्र अहवाल' (Toxicology Report) प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होईल. अन्नामध्ये'मॉर्फिन'सारखे धोकादायक विषारी पदार्थअसू शकतात, असा संशय व्यक्त केला जात आहे. जे.जे. मार्ग पोलीस सर्व बाबींचा सखोल विचार करून या प्रकरणाचा तपास करत आहेत.Pune Nasrapur Case : मुलीच्या तोंडात पायमोजा कोंबला, नसरापूरमध्ये क्रौर्याची परिसीमा; आरोपीची बायको म्हणते, 11 वर्ष संबंध नाही, शिक्षा करा, बॉडीही देऊ नकाअहवाल प्राप्त होताच केली जाईल कारवाईवरिष्ठ पोलीस निरीक्षक रईस शेख यांनी सांगितले की, ठोस पुरावे (म्हणजेच अहवाल) हाती येताच पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल आणि या घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर उपाययोजना केल्या जातील. सद्यस्थितीत, या प्रकरणी 'अपघाती मृत्यूची नोंद' (ADR) करण्यात आली असून, त्याबाबतचा तपास सुरू आहे. तसेच, या संदर्भात सुमारे डझनभर व्यक्तींचे जबाबही नोंदवून घेण्यात आले आहेत.
47 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 4, 2026, 02:08 PM
गुंतागुंतीच्या प्रतिबंधासाठी मधुमेहाच्या रुग्णांना महत्वाच्या अवयवांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन

गुंतागुंतीच्या प्रतिबंधासाठी मधुमेहाच्या रुग्णांना महत्वाच्या अवयवांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन

चंद्रपूर :मधुमेहहा असा आजार आहे, जो शरीराच्या प्रत्येक अवयवावर हळूहळू परिणाम करतो. विशेषतः ज्या रुग्णांनामधुमेहहोऊन ५ वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे, त्यांनी केवळ साखरेची पातळी न तपासता शरीराच्या इतर महत्त्वाच्या अवयवांचे कार्य नियमितपणे तपासणे गरजेचे आहे. दुर्लक्ष केल्यास हृदयविकार, किडनी निकामी होणे किंवा अंधत्व येण्याचा धोका असतो. त्यामुळे वेळीच योग्य चाचण्या करणे गरजेचे आहे, असा सल्ला कार्डिओलॉजिस्ट डॉ. प्रदीप वरघणे यांनी केले आहे. हृदयविकाराचा वाढता धोका मधुमेहामुळे रक्तवाहिन्या कडक होतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता बळावते. यासाठी दरवर्षी एकदा डोळ्याची पडदा तपासणी आणि पायांच्या संवेदना तपासणे गरजेचे आहे. वेळेनुसार चाचण्यांचे नियोजन आवश्यक मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी चाचण्यांचे वेळापत्रक पाळणे हिताचे ठरते. दर महिन्याला उपाशीपोटी आणि जेवणानंतरची साखर तपासणे अनिवार्य आहे, तर दर तीन महिन्यांनी 'HbA1c' ही चाचणी करून मागील ९० दिवसांतील साखरेची सरासरी पातळी जाणून घ्यावी. याशिवाय रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण तपासण्यासाठी दर सहा महिन्यांनी "लिपिड प्रोफाइल' आणि किडनीच्याआरोग्यासाठी'क्रिएटिनिन' चाचणी करणे आवश्यक आहे. कौटुंबिक इतिहास असेल तर घ्या काळजी! कुटुंबात आई-वडिलांना मधुमेह, रक्तदाब किंवा हृदयविकाराचा इतिहास असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमितपणे 'हेल्थ चेकअप' करून घ्यावे. अनुवांशिक आजारांचा धोका टाळण्यासाठी सकस आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. ही आहेत धोक्याची लक्षणे पायांना सतत मुंग्या येणे किंवा जळजळ होणे, दृष्टी धूसर होणे किंवा डोळ्यांचा नंबर वारंवार बदलणे, लघवीच्या प्रमाणात बदल होणे किंवा अंगावर सूज येणे, साखर वारंवार अनियंत्रित होणे. तज्ज्ञ काय म्हणतात ? "मधुमेह हा केवळ रक्तातील साखरेचा आकडा नाही, तर तो संपूर्ण शरीराशी निगडित आजार आहे. ५ वर्षांहून अधिक काळ मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो. अनेकदा कोणतीही लक्षणे न दिसता हृदय किंवा किडनीवर परिणाम होऊ शकतो, ज्याला आपण 'सायलेंट डॅमेज' म्हणतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दर ३ ते ६ महिन्यांनी लिपिड प्रोफाइल, किडनी फंक्शन टेस्ट आणि गरज पडल्यास ईसीजी करणेआरोग्यासाठीसुरक्षित ठरते.- डॉ. प्रदीप वरघणे, कार्डिओलॉजिस्ट, चंद्रपूर
58 shares
😐
Pudhari logo
Pudhari
May 4, 2026, 08:53 AM
उन्हाळी आरोग्य टिपाः हायड्रेटेड आणि कूल रहा

उन्हाळी आरोग्य टिपाः हायड्रेटेड आणि कूल रहा

...असे करा उपाय : मुलांना पुरेसे पाणी पिण्याची सवय लावा. दररोज किमान 2 ते 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. नारळपाणी, ताक, ताज्या फळांचे रस देणेही फायदेशीर ठरते. कलिंगड, संत्री, काकडी यांसारखी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे आहारात समाविष्ट करावीत. जंक फूड, तेलकट, हवाबंद डब्यातील तसेच व प्रोसेस्ड फूड टाळावेत. दुपारच्या कडक उन्हात मुलांना बाहेर खेळण्यापासून रोखावे. उन्हाळ्यात हलके, सैल आणि सुती कपडे घालणे योग्य ठरते.
6 shares
😐
Loksatta logo
Loksatta
May 3, 2026, 01:46 PM
ज्वारीची उकाडः शहरातील व्यग्र रहिवाशांसाठी एक पौष्टिक भारतीय न्याहारीचा पर्याय

ज्वारीची उकाडः शहरातील व्यग्र रहिवाशांसाठी एक पौष्टिक भारतीय न्याहारीचा पर्याय

Healthy Indian Breakfast options like Jwarichi Ukad provide instant energy and aid digestion: सध्याच्या धावपळीच्या युगात वेळेअभावी अनेकजण नाश्त्याला ब्रेड, बटर किंवा मैद्याचे पदार्थ खातात. पण, हे पदार्थ शरीरातील चरबी वाढवून आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण करतात. अशावेळी ‘दोन मिनिटांत’ तयार होणारा आणि शरीराला ऊर्जा देणारा अस्सल भारतीय पर्याय तुमच्या स्वयंपाकघरातच उपलब्ध आहे. सध्या आपल्याकडे शहरीकरण वाढतेच आहे. आणि शहरातील मंडळींना काम अधिक असते किंवा वेळेत कामावर जायचे असते आणि घरी परतल्यानंतर त्यांना फार काही करण्यासाठी वेळ हाताशी नसतो, अशी तक्रार नेहमीच ऐकायला मिळते. म्हणूनच मग अनेकदा सकाळच्या न्याहारीसाठी अर्थात ब्रेकफास्टसाठी म्हणून ब्रेड बटर, जाम बटर, खारी किंवा मग टोस्टचा वापर केला जातो. शरीरात मैदा जाणे हे केव्हाही वाईटच. आणि तसे झाले की, मग शरीरातील चरबी वाढते आणि पाठोपाठ मग आरोग्याच्या अनेक तक्रारी सुरू होतात. शहरवासीयांची आणखी एक दुसरी अगतिकता म्हणजे त्यांना अनेकदा फरसाण, चिवडा, चकली किंवा मग बेकरीचे विविध पदार्थ मग त्यात कुकीजपासून ते अगदी पाव आणि ब्रेड किंवा मग बिस्किटांवर गुजराण करावी लागते. मुंबई- पुण्यासारख्या शहरांमध्ये तर वडापाव आणि सँडविच हे नित्यनेमाने खाणे झाले आहे. या साऱ्या पदार्थांतूनही मैदाच मोठ्या प्रमाणावर पोटात जात असतो. मैदा तुमच्या पोटाचे आरोग्य बिघडवतो. आणि मग पोटाचे विकार एकदा सुरू झाले की, ते माणसाची पाठ सोडत नाहीत. शहरवासीयांचे तर असे होते की औषधाने पोट बरे झाले की, परत दुसऱ्याच दिवशी परत मैदा पोटात जायला सुरुवात होते. आणि मग परत विकार बळावतात. अशा वेळेस नेमके काय करावे हे अनेकांना कळत नाही. म्हणून आजच्या या भागामध्ये आपल्याच स्वयंपाकघरात असणाऱ्या पदार्थांचा वापर करून आरोग्यदायी पदार्थ कसे करता येतील आणि ते कधी जेवणासाठी तर मग कधी न्याहारीसाठी म्हणून कसे वापरता येतील हे सांगणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अलीकडे एका बाजारू पदार्थाने गेल्या २०-२५ वर्षांमध्ये भारतातील घराघरात मूळ धरले आहे. केवळ दोन मिनिटांत तयार होणारा म्हणून त्याचे कोण कौतुकही होते. धक्कादायक म्हणजे याचे कौतुक पालकांकडून होते आणि आपल्या मुलाच्या खाण्यात पौष्टिकता नसलेली किंवा विकारांना आमंत्रण देणारी ही गोष्टी जाते आहे, याचे वैषम्यही वाटत नाही, तेव्हा खूपच वाईट वाटते. मग अशा वेळेस काही पालकांकडून मागणीही येते की, सांगा दोन मिनिटांत तयार होणारा आणि पौष्टिक असणारा अस्सल भारतीय पदार्थ. तसा असा पदार्थ कसा तयार कराल आणि तो कोणता आहे, याचीही माहिती या भागाअखेरीस दिलेली आहे. अनेक विकारात विशेषत: दीर्घ मुदतीचा ताप, कावीळ, जलोदर, मलेरिया, रक्ती मूळव्याध, मोठे शस्त्रकर्म यानंतर काय खावे असा प्रश्न पडतो. अशा वेळेस क्रमाक्रमाने अग्नी संधुक्षण व्हावयास हवे असते. त्यामुळे हळूहळू शरीराचे गाडे ठिकाणावर येते. त्याकरिता कितीही अशक्तपणा आला असला तरी प्रथम सात दिवस तांदुळाची पातळ पेज खावी. चवीला जिरे, धने, आले, लसूण, ओवा, मीठ, कणभर गूळ असे पदार्थ वापरावे. पेज भरपूर खाता येते, गॅसेस होत नाहीत. रक्त वाढते, मांस सावकाश बनते. लघवी साफ होते. रात्री उत्तम झोप लागते. जेवण नकोसे वाटत नाही. आयुर्वेदाच्या रसशास्त्र या औषधी निर्माणात विविध धातूंची भस्मप्रक्रिया करण्याअगोदर, त्या त्या धातूंच्या सामान्य शुद्धीकरिता पेजेसारखी तांदुळाची कांजी वापरतात. त्यात फक्त तांदूळ हे एकमेव घटकद्रव्य असते. लहान बालकांना घरचे अन्न रोजच वेगवेगळे काय द्यावे, हा प्रश्न पडतो. याकरिता तांदुळाची ताजी धिरडी हा उत्तम तोडगा आहे. घरी तांदूळ धुवावे. पंचावर वाळवावे. नंतर जात्यावर किंवा मिक्सरमध्ये दळून घ्यावे. निर्लेप तव्यावर साधी धिरडी, गूळ व काकडी, कोथिंबीर, आले, मिरची अशी विविध प्रकारची धिरडी करावी. आपल्या बालबच्च्यांना ताजी द्याावी. पोट भरते, समाधान वाटते. पाव-बिस्किटांपेक्षा अधिक गुणवत्ता धिरड्यात आहे. जुलाब, हगवण या विकारांत भल्याभल्यांची मती गुंग होते. त्याकरिता प्रथम एक दिवस पूर्ण लंघन करावे किंवा फक्त ताकावर राहावे. चांगला क्षुद्बोध झाला की, तांदूळ भाजून पातळ भात किंवा तांदुळाच्या पिठाची भाकरी खावी. तांदुळाच्या पिठाची भाकरी आमांश, मूळव्याध, स्थौल्य, रक्तदाबवृद्धी, भगंदर, कावीळ, जलोदर, आम्लपित्त, अल्सर, पोटदुखी या विकारांत अमृतासमान आहे. तांदुळाची भाकरी नेहमी ताजीच पाहिजे. या भाकरीसोबत चवीकरिता धने, जिरे व आले असे तुकडे मिसळावे. भाकरी ज्या मानाने खाऊ त्या मानाने शरीरात पक्काशयात निर्दोष मळ तयार होतो. या भाकरीबरोबर ताजे ताक, ताकाची आले, लसूण घातलेली कढी पाहिजे. ग्रहणीसारख्या विकारावर यासारखे अन्न नाही. मधुमेह, लठ्ठपणा, मूळव्यादा, भगंदर, सूज, रक्तदाबवृद्धी अशा विकारांत वैद्य मंडळी ज्वारीचा आग्रह धरतात. गहू, भात, बटाटा, रताळे, साबुदाणा, वाटाणा, हरभरा, मांसाहार, मिठाई, बेकार पदार्थ, पोहे, चुरमुरे इत्यादी पदार्थ वर्ज्य -कुपथ्य म्हणून सांगतात. पण रुग्णांनी खावे काय असा प्रश्न पडतो. त्याचे उत्तर ज्वारीच्या उकडीत आहे. पाणी उकळू द्यावे. त्यात थोडे थोडे ज्वारीचे पीठ टाकावे. ते पीठ चांगले शिजू द्यावे. मग त्यात थोडे ताजे ताक, आले व कढीलिंब पाने टाकावी. ही उकड थोडी शिजू द्याावी. नाष्टा, ब्रेकफास्ट याकरिता हा उत्तम पदार्थ आहे. रोज खाऊन कंटाळा येत नाही. रक्तशर्करा किंवा वजन वाढत नाही. पोटाला बोजा पडत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा पदार्थ केवळ दोन मिनिटांत तयार होतो. एरवी बाजारात मिळणाऱ्या दोन मिनिटांत तयार होणाऱ्या बाजारू पदार्थाचा हा उत्तम पौष्टिक आणि अस्सल भारतीय असा पर्याय आहे. पालकांनी आपल्य मुलांसाठीच नव्हे तर अगदी स्वतःसाठीही हा पर्याय वापरून पाहावा, आरोग्य लाभेल.
62 shares
😢
P
Pudhari
May 2, 2026, 11:55 PM
खराब आहार आणि जीवनशैलीच्या सवयींचा रोगाच्या वाढत्या जोखमीशी संबंध

खराब आहार आणि जीवनशैलीच्या सवयींचा रोगाच्या वाढत्या जोखमीशी संबंध

आजाराचे धोके जादा फास्टफूडचे सेवन, असंतुलित आहार, व्यायाम, जंकफूड, जादा मीठाचे आहार, साखर, तेलयुक्त आहार, जेवणात भाज्यांच्या कमी वापरासह आरोग्याकडे दुर्लक्ष, अनुवंशिकता, झोपेचा अभाव यामुळे आजाराचे धोके वाढतात.
1 shares
😢