Achira News Logo
Achira News
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 12:18 AM
तंबाखूची घातक पकडः कर्करोगास कारणीभूत असलेल्या जीवनशैलीच्या सवयींविरुद्ध कारवाई करण्याचे आवाहन

तंबाखूची घातक पकडः कर्करोगास कारणीभूत असलेल्या जीवनशैलीच्या सवयींविरुद्ध कारवाई करण्याचे आवाहन

कॅन्सरने मरणाऱ्यांपैकी 43 टक्के रुग्ण हे तंबाखू खाण्याने कर्करोग होऊन मरत असतात. जगातच तंबाखूच्या वापराबाबत वारंवार इशारे दिले जात असतात. लोकांना त्यातला धोका कळावा म्हणून तंबाखू दिन साजरा करून त्या दिवशी लोकांना तंबाखूचे दुष्परिणाम समजावून सांगितले जात असतात; पण तंबाखूवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रयत्न मात्र कोणीही करीत नाही. वास्तविक, बदलत्या जीवनशैलीने कर्करोग वाढत आहे असे केवळ म्हणून चालणार नाही, तर या जीवनशैलीतल्या कोणत्या गोष्टी अनुचित आहेत, याची अचूक माहिती दिली गेली पाहिजे. नागरिकांनी जीवनशैली बदलण्याची गरज आहे. खाण्यापिण्याच्या अनेक पातळ्यांवर बदल करावे लागणार आहेत. सध्या जगात जास्तीत जास्त धान्य पिकवण्याची स्पर्धा सुरू आहे आणि या स्पर्धेतून शेतावर रासायनिक खतांचा मारा केला जात आहे. पिकांवर रोग पडले की, एकापेक्षा एक विषारी जंतुनाशके मारली जाताहेत; पण त्यांचे अंश पिकांत उतरतात आणि खाण्यातून शरीरात जातात. कर्करोग होण्याचे हेही एक कारण आहे. पंजाबच्या भटिंडा जिल्ह्यात कर्करोगाचे प्रमाण फार मोठे आहे. त्याची कारणे शोधली असता पिकांवर मारली जाणारी कीटकनाशके त्याला कारणीभूत असल्याचे आढळले; पण याबाबत म्हणावी तेवढी जागृती केली जात नाही.
83 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 04:33 AM
ग्राम मंडळ गागोडे बुधक पेन खोपोली गावातील शाश्वत शेती पद्धती

ग्राम मंडळ गागोडे बुधक पेन खोपोली गावातील शाश्वत शेती पद्धती

ग्राममंडळ गागोदे बुद्धक पेण खोपोली महामार्गलगत वसलेल गाव, आचार्य विनोबा भावे यांचे जन्मगाव त्यामुळे उभ्या महाराष्ट्राला परिचित असलेल हे गाव येथील शेतकरी वर्षाकाठी दोन पीक घेतो. खरीपात भातपीक आणि स्थीत वालाची शेती शेतकरी आधुनिक रासायनिक खते न वापरता सेंद्रीय खताचा वापर करून जमिनीचे आरोग्याची निगा राखतपेराल ते उगवते, हा निसर्गाचा नियम याच तत्त्वावर आधारीत भात कापणी संपताच वाल पेरले जातात. शेताला सभोवार कुंपण घातले की बुटक्या जातीचे बियाणे एकरी बार ते पाच किलो पेरले की काम फत्ते झाले समजा.असा दावा शेतकरी वर्गातून केला जात आहे.
53 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 05:47 AM
डाळिंबाचे बहुआयामी आरोग्य फायदे उघडणेः एकूण कल्याणासाठी एक पौष्टिक फळ

डाळिंबाचे बहुआयामी आरोग्य फायदे उघडणेः एकूण कल्याणासाठी एक पौष्टिक फळ

रामफळ हे एक उष्णकटिबंधीय फळ आहे. जे आपल्या आहारात समाविष्ट केल्यास अनेकआरोग्यफायदे मिळवता येतात. हे फळ व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असते. त्यामुळे त्याच्या सेवनामुळे शरीराच्या विविध अंगांवर सकारात्मक परिणाम होतात आणि अनेक प्रकारच्या रोगांना टाळता येते. रामफळातील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्तीला मजबुती देते. ज्यामुळे आपल्या पांढऱ्या रक्त पेशींचे उत्पादन वाढवून शरीराच्या संरक्षण शक्तीला वृद्धी मिळते. त्यामुळे संक्रमण आणि इन्फेक्शनच्या धोक्यापासून शरीर संरक्षित राहते. त्याचप्रमाणे, रामफळात उपस्थित फायबर पचन प्रक्रियेचे सुगम करते. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि पचनशक्ती सुधारते. हे फळ हृदयाच्याआरोग्यासाठीदेखील अत्यंत फायदेशीर आहे. रामफळात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम उपस्थित असतात जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यात आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात. यामुळे हृदय निरोगी राहते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. रामफळ आपल्या त्वचेसाठी देखील उत्कृष्ट आहे. त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी त्वचेच्या आरोग्याला पोषक ठरतात. त्यामुळे ताजेतवाने आणि चमकदार त्वचा मिळवण्यास मदत होते. हे फळ केसांच्या आरोग्यासाठी देखील लाभकारी आहे. रामफळाच्या नियमित सेवनाने केसांची गुणवत्ता सुधारते आणि गळती कमी होऊ शकते. रामफळाच्या सेवनाचे आणखी एक महत्त्वाचे फायदे म्हणजे त्याचे मेंदूवर सकारात्मक परिणाम. यामध्ये असलेला व्हिटॅमिन बी६ मेंदूच्या कार्यप्रणालीला उत्तेजित करतो आणि मानसिक स्फूर्ती वाढवतो. तज्ञांचे मत आहे की, ऋतुनुसार फळांचे सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते. हे आपल्याला अधिक पोषणमूल्य प्रदान करते आणि शरीराला नैसर्गिक पोषण मिळवण्यास मदत करते. तरीही, विविध कारणांमुळे आपण फळांचे सेवन सशक्तपणे करत नाही. तथापि, शरीराच्या योग्य कार्यासाठी आणि आरोग्यपूर्ण जीवनासाठी रामफळाचा समावेश आपल्या आहारात अवश्य करावा. ज्यामुळे शरीराला विविध गुणकारी घटकांचा नैसर्गिक पुरवठा होतो. हेही वाचा : मंदीच्या लाटेत देखील 'हा' शेतकरी म्हणतोय मेथीची एक जुडी देतेय ५० रुपयांचे उत्पन्न; वाचा सविस्तर
57 shares
😊
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 1, 2026, 04:33 AM
भारत 1 फेब्रुवारीपासून दैनंदिन जीवनात व्यापक बदल आणत आहे

भारत 1 फेब्रुवारीपासून दैनंदिन जीवनात व्यापक बदल आणत आहे

आजपासून फेब्रुवारी महिना सुरु झाला आहे आणि संसदेत देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होणार असताना सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित अनेक मोठे बदल देखील आजपासून लागू झाले आहेत. 1 फेब्रुवारीपासून सिगारेट, तंबाखू, तंबाखू उत्पादने, एलपीजी, पीएनजी, सीएनजी, फास्टॅग आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांमध्ये बदल लागू होतील. आज बँकिंग नियमांमध्येही महत्त्वपूर्ण बदल होत आहेत.आजपासून बँकिंग नियम बदलणारआजपासून बँकिंग नियमांमध्ये अनेक मोठे बदल होत आहेत. यामध्ये एसबीआय, एचडीएफसी बँक, ICICI बँक आणि पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) यांचा समावेश असेल. या बदलांचा ग्राहकांच्या दैनंदिन बँकिंग क्रियाकलाप, आयएमपीएस व्यवहार, क्रेडिट कार्ड फायदे आणि केवायसी अपडेटवर परिणाम करतील. आज कोणते नवीन बदल येत आहेत ते जाणून घेऊया.FASTag नियमांमध्ये बदल​भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे NHAI ने FASTags साठी KYC पडताळणी प्रक्रिया पूर्णपणे बंद केली आहे. 1 फेब्रुवारीपासून तुमचा FASTag सक्रिय केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त KYC पडताळणीची आवश्यकता राहणार नाही. आता वाहनांशी संबंधित सर्व पडताळणी आगाऊ पूर्ण करण्याची जबाबदारी जारी करणाऱ्या बँकांची असेल.सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ आणखी महागणार1 फेब्रुवारीपासून सिगारेट, गुटखा, जर्दा, पान मसाला (तंबाखू असलेले) आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांवरील कर वाढणार आहे. यामध्ये फिल्टर केलेल्या आणि लांब सिगारेटवर जास्त शुल्क आकारले जाणार असून केंद्र सरकारने उत्पादन शुल्क वाढवले आहे आणि पान मसाल्यावर आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर देखील लादला आहे. तसेच बिडीवरील कमी कर स्लॅब कायम राहील, ज्यामुळे धूम्रपान करणाऱ्यांवर भार वाढेल.अर्थसंकल्पाआधी LPG सिलिंडर महागला1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पापूर्वीच एलपीजी सिलिंडर ग्राहकांना धक्का बसला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आणि घरगुती सिलिंडरचे दर आज, 1 फेब्रुवारी 2026 रोजी सुधारित केले गेले आहेत. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढला आहे, तर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.एसबीआयचे नवीन नियमभारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, 15 फेब्रुवारीपासून एसबीआयचे आयएमपीएस व्यवहार शुल्काशी संबंधित नियम बदलणार आहेत. एसबीआयने काही आयएमपीएस व्यवहारांवरील सेवा शुल्क बदलण्याचा निर्णय घेतला आहे.आयसीआयसीआय बँकेचे नवीन नियम1 फेब्रुवारी 2026 पासून आयसीआयसीआय बँक काही क्रेडिट कार्डवरील बुकमायशो मोफत चित्रपट तिकिटाचा लाभ बंद करेल. पण वाहतूक आणि विमा खर्चावर मिळवलेले रिवॉर्ड पॉइंट्स सुरू राहतील. काही कार्डांसाठी रिवॉर्ड सिस्टममध्ये आणखी सुधारणा केली जाईल, म्हणजेच चित्रपटाचा फायदा काढून टाकला जाईल, मात्र, इतर रिवॉर्ड्स कायम राहतील.एचडीएफसी बँकेचे नवीन नियमएचडीएफसी बँकेने प्रीमियम इन्फिनिया मेटल क्रेडिट कार्डसाठी रिवॉर्ड पॉइंट रिडेम्पशन नियम बदलले आहेत. 1 फेब्रुवारी 2026 पासून ग्राहक दरमहा पाच वेळा रिवॉर्ड पॉइंट रिडीम करू शकतील. याआधी कोणतीही मर्यादा नव्हती, म्हणून हाय-एंड कार्ड वापरकर्त्यांना हा बदल लक्षात ठेवावा लागेल.
5 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Jan 17, 2026, 02:44 PM
आमिर खानने त्याच्या आहार योजनेचा खुलासा केलाः पारंपारिक आणि आंतरराष्ट्रीय पाककृतींचा समतोल

आमिर खानने त्याच्या आहार योजनेचा खुलासा केलाः पारंपारिक आणि आंतरराष्ट्रीय पाककृतींचा समतोल

Aamir Khan Shared His Diet Plan : आमिर खान बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. आमिर कुठल्या ना कुठल्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. अभिनेता खूप शिस्तप्रिय असून, त्यामुळेच त्याला द परफेक्शनिस्ट, असंही म्हटलं जातं. अशातच अभिनेता पुन्हा एकदा त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत आला आहे. येत्या काळातआमिर खानलवकरच त्याचा ६१ वा वाढदिवस साजरा करणार आहे. अशातच त्यानं नुकतंच १८ किलो वजन घटवल्याचं म्हटलं आहे. आरोग्याच्या कारणांमुळे त्यानं त्याच्या आहारामध्ये बदल केला होता; पण यामुळे त्याला वजन घटवण्यात मदत झाली आणि त्याशिवाय याचे काही फायदेही त्याला जाणवल्याचं त्यानं सांगितलं. यावेळी आमिरनं विशिष्ट पद्धतीचा एक डाएट प्लॅन फॉलो केला आहे. वयाच्या साठीत आमिर खान फिटनेससाठी काय करतो आणि त्याचा हा डाएट प्लॅन नेमका कसा आहे ते जाणून घेऊयात… ‘बॉलीवूड हंगामा’शी संवाद साधताना आमिर खान म्हणाला, “हे आपसूकच घडलं. मी माझ्या आरोग्याच्या कारणांमुळे एक नवीन डाएट प्लॅन फॉलो करत होतो आणि तो माझ्यासाठी जादूसारखं काम करत आहे.” सातत्यानं मायग्रेनचा त्रास होत असल्यामुळे आमिर खाननं हा नवीन डाएट प्लॅन सुरू केला असल्याचं सांगितलं. त्याबद्दल अभिनेता म्हणाला, “मी मायग्रेनमुळे हा डाएट प्लॅनसुरू केला. मी अँटी इन्फ्लेमेट्री हा डाएट प्लॅन फॉलो करतो. त्यामुळे माझं वजन फक्त १८ किलो कमी झालेलं नाहीये, तर मायग्रेनचा त्रासही कमी झाला आहे.” अँटी इन्फ्लेमेट्री डाएटमध्ये ताजी फळं, भाज्या आणि पदार्थांचा समावेश असतो. प्रोसेस्ड फुडचं सेवन न करता, अशा प्रकारच्या आहारावर या डाएटमध्ये भर दिला जातो. फळं, पालेभाज्या, मासे आणि नैसर्गिक पद्धतीनं बनलेल्या सर्व पदार्थांचा यामध्ये समावेश असतो. अँटी इन्फ्लेमेट्री डाएटमुळेच आमिर खाननं तब्बल १८ किलो वजन घटवलं असून, त्याचा मायग्रेनचा त्रासही कमी झाल्याचं उल्लेख केलेल्या माध्यमाशी संवाद साधताना सांगितलं आहे; पण फिटनेसमुळे लक्ष वेधून घेण्याची आमिर खानची ही पहिली वेळ नव्हे. यापूर्वीसुद्धा आमिर खाननं त्याच्या ‘दंगल’ या सुपरहिट चित्रपटासाठी बरंच वजन वाढवलं होतं. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार ‘दंगल’ या चित्रपटातील महावीर फोगाट हे पात्र साकारण्यासाठी आमिर खाननं तब्बल ३० किलो वजन वाढवलं होतं. दरम्यान, आमिर खाननं उल्लेख केलेल्या माध्यमाशी संवाद साधताना त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हॅप्पी पटेल’ या चित्रपटाची माहिती दिली आहे. त्यानेच या चित्रपटाची निर्मितीही केली आहे. त्याच्यासह या चित्रपटात त्याचा भाचा इमरान खानसुद्धा झळकत आहे. यावेळी त्यानं “इमरान व मी या चित्रपटात आम्ही केमिओ केले आहेत. मी आजवरच्या माझ्या करिअरमध्ये फार विनोदी भूमिका साकारल्या नाहीयेत; पण तरीसुद्धा आजही लोकांना माझा अंदाज अपना अपना हा चित्रपट आठवतो.” असं म्हटलं आहे.
84 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Jan 15, 2026, 03:33 PM
दिल्लीतील आरोग्य संकटः प्रदूषण आणि जीवनशैलीच्या चिंतेमुळे श्वासोच्छवासाच्या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ

दिल्लीतील आरोग्य संकटः प्रदूषण आणि जीवनशैलीच्या चिंतेमुळे श्वासोच्छवासाच्या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ

नवीदिल्ली:दिल्लीतीलवाढतेप्रदूषणआणि बदलती जीवनशैली यांचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. दिल्ली सरकारने जाहीर केलेल्या ताज्या अधिकृत आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये श्वसनाशी संबंधित आजारांमुळे झालेल्यामृत्यूंचीसंख्या २०२३च्या तुलनेत वाढली आहे, तर हृदयविकार हेमृत्यूचेसर्वात मोठे कारण ठरले आहेत. श्वसनविकारांमुळे मृत्यूत वाढ मीडिया रिपोर्ट्सनुसार, आकडेवारीचा सरासरी आढावा घेतल्यास, २०२४ मध्ये दिल्लीत श्वसनाशी संबंधित (Respiratory) आजारांमुळे ९,२११ मृत्यू झाले. म्हणजेच, राजधानीत दररोज सुमारे २५ जणांचा मृत्यू श्वसनाशी संबंधित आजारांमुळे झाला, तर २०२३ मध्ये ८,८०१ मृत्यू झाले. म्हणजेच, एका वर्षात श्वसनविकारांमुळे मृत्यूंची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. तज्ज्ञांच्या मते, दमा, न्यूमोनिया, फुफ्फुसांचा कर्करोग आणि क्षयरोग (टीबी) हे प्रमुख कारणे आहेत. प्रदूषित हवा, धूळ-धूर, विषारी वायू आणि अस्वस्थ जीवनशैली यामुळे ही समस्या तीव्र होत आहे. चिंतेची बाब म्हणजे, हे आजार आता केवळ वृद्धांपुरते मर्यादित न राहता तरुण आणि लहान मुलांनाही प्रभावित करत आहेत. हृदयविकार ठरले मृत्यूचे सर्वात मोठे कारण २०२४ मध्ये परिसंचरण तंत्राशी (Circulatory System) संबंधित आजार हे दिल्लीतील मृत्यूचे सर्वात मोठे कारण ठरले. २०२४ मध्ये २१,२६२ मृत्यू झाले, तर २०२३ मध्ये १५,७१४ जणांचा यामुळे बळी गेला. एका वर्षात तब्बल ५,५०० हून अधिक मृत्यूंची वाढ नोंदवण्यात आली आहे. यामध्ये हार्ट अटॅक, स्ट्रोक, धमन्यांतील अडथळे आणि हृदयविकार अपयश (हार्ट फेल्युअर) यांचा समावेश आहे. संक्रामक आजारांमुळे मृत्यूत घट; मात्र धोका कायम २०२४ मध्ये संक्रामक आणि परजीवी आजार हे मृत्यूचे दुसरे मोठे कारण ठरले. २०२४ मध्ये १६,०६० मृत्यू झाले, तर २०२३ हा आकडा २०,७८१ होता. मागील वर्षाच्या तुलनेत मृत्यूंची संख्या कमी झाली असली, तरी दूषित पाणी, अपुरी स्वच्छता आणि दाट लोकसंख्या यामुळे धोका अजूनही कायम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
88 shares
😐
L
Lokmat
Jan 13, 2026, 02:38 PM
शीत लाटेचा इशाराः असुरक्षित गटांसाठी तज्ज्ञांचा सावधगिरीचा सल्ला

शीत लाटेचा इशाराः असुरक्षित गटांसाठी तज्ज्ञांचा सावधगिरीचा सल्ला

देशात थंडीची लाटेबाबत इशारा हवामान विभागाने इशारा दिला आहे. जास्त थंडीमुळे हृदय, फुफ्फुस, मधुमेह आणि मूत्रपिंडाच्या रुग्णांना धोक्याचे ठरु शकते. मुले किंवा वृद्धांवर थंडीचा परिणाम होऊ शकतो. या संदर्भात, एम्सच्या तज्ज्ञडॉक्टरांनीसोमवारी आरोग्यविषयक इशारा दिला. त्यांनी थंडीच्या लाटेत मीठ सेवन, भरपूर पाणी पिणे, योग्य वेळी चालणे आणि औषधे टाळण्याचा सल्ला दिला आहे. थंडीमुळे शरीराच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे रक्तदाब अचानक वाढू शकतो, यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. जर तुम्हाला छातीत जडपणा, श्वास लागणे, अचानक थकवा किंवा पायांमध्ये सूज येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, असा इशारा एम्सचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राजीव नारंग यांनी दिला. इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य हिवाळ्यात मीठ, लोणचे, पापड आणि प्रक्रिया केलेले अन्न यापासून दूर राहणे खूप महत्वाचे आहे. कमी पाणी पिणे देखील धोकादायक ठरू शकते, कारण ते रक्त जाड करते आणि हृदयावर दबाव वाढवते. दररोज तुमचा रक्तदाब तपासत रहा. सकाळी फिरायला जाण्याच्या सवयीमुळे वृद्धांना समस्या येऊ शकतात. फक्त सूर्यप्रकाश असतानाच बाहेर जा.डॉक्टरांच्यामते, दुपारी जेवणापूर्वी हलके फिरणे सर्वात सुरक्षित आहे. जर प्रदूषण जास्त असेल तर बाहेर जाणे टाळा. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुमच्या रक्तदाबाची औषधे आणि इतर नियमित औषधे घेणे थांबवू नये. फुफ्फुस, दमा आणि सीओपीडी असलेल्या रुग्णांना धोका दिल्लीतील एम्स येथील औषध विभागाचे डॉ. संजीव सिन्हा यांच्या मते, थंड हवा श्वसनमार्गांना आकुंचन पावते. यामुळे दमा आणि सीओपीडी रुग्णांना त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला खोकला, कफ, श्वास घेण्यास त्रास किंवा वारंवार संसर्ग होत असेल तर ताबडतोब सावध रहा. बाहेर जाताना तुमचे नाक आणि तोंड झाका, सूप किंवा चहासारखे गरम द्रव प्या. एम्सचे प्राध्यापक राजेश खडगावत यांनी सांगितले की, थंडी हे आळसाचे निमित्त असू नये. हलके चालणे, घरातील योगा किंवा स्ट्रेचिंग दररोज आवश्यक आहे. तळलेले आणि जास्त मीठ असलेले पदार्थ हानिकारक असू शकतात. हिवाळ्यात रक्तातील साखर आणि किडनीच्या कार्याचे नियमित निरीक्षण करणे अधिक महत्त्वाचे होते. लहान मुले आणि कमी वजनाच्या बाळांना सर्दी होण्याची शक्यता जास्त असते. डोके, कान आणि छाती झाकून ठेवा. जर मूल सुस्त दिसत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर उशीर करू नका, अशी माहिती एम्सचे बालरोगतज्ञ डॉ. राकेश लोढा यांनी दिली.
52 shares
😢
Loksatta logo
Loksatta
Dec 30, 2025, 03:14 PM
नागार्जुनचा तंदुरुस्ती मंत्रः वयहीन तारुण्यासाठी एक पाककृती

नागार्जुनचा तंदुरुस्ती मंत्रः वयहीन तारुण्यासाठी एक पाककृती

Nagarjun Fintness Mantra : राष्ट्रीय पुरस्कारविजेते नागार्जुन त्यांच्या दमदार अभिनयासह फिटनेससाठीही ओळखले जातात. ‘मास’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेले नागार्जुन ६५ वर्षांचे आहेत. पण, त्यांचा फिटनेस पाहून कोणीही त्यांना ४० हून अधिक वयाचं समजणार नाही. त्यामुळे अनेकांना त्यांच्या फिटनेस, डाएट प्लॅनबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. ‘ई टाइम्स’च्या वृत्तानुसार जेव्हा नागार्जुन यांना आजही ते इतके तरुण कसे दिसतात, असं विचारलं गेलं तेव्हा ते म्हणाले, “मला माहीत नाही. मी भूक मारत नाही आणि क्रॅश डाएटही करीत नाही.” यासह त्यांनी त्यांच्या फिटनेसबद्दलच्या काही गोष्टी शेअर केल्या होत्या. ‘एबीपी’च्या वृत्तानुसार नागार्जुन म्हणालेले, “मी ४५ वर्षांपासून एक्सरसाइज करणं कधीच थांबवलं नाही. तेव्हा जिमसुद्धा नव्हते; पण आरोग्यासाठी मी काटेकोरपणे एक्सरसाइज केली आहे. सर्वांत महत्त्वाचं हे आहे की, मी कायम पॉझिटिव्ह विचार करतो. मी काहीही झालं तरी कधीच निराश होत नाही.” ‘कुली’ चित्रपटात रजनीकांत व नागार्जुन एकत्र झळकले. उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार या चित्रपटाच्या एका कार्यक्रमादरम्यान, रजनीकांत गमतीत नागार्जुन यांना म्हणालेले, “मी त्याच्यासह १९९१ मध्ये ‘शांती क्रांती’ चित्रपटात काम केलेलं. तो तेव्हापासून ते आजपर्यंत तितकाच तरुण आहे. माझे तर सगळे केस गेले’; पण त्यानं मात्र त्याच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेतली आहे. मी जेव्हा त्याला हे त्यानं कसं केलं याबद्दल विचारलं तेव्हा त्यानं एक्सरसाइज आणि योग्य आहार हे उत्तर दिलं.” दरम्यान, नागार्जुन हे दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी अलीकडे ‘कुबेरा’, ‘कुली’, ‘ना सामी रंगा’ अशा अनेक चित्रपटांतून काम करत त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेते नेहमी कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात. नागार्जुन यांचा येत्या काळात १००वा चित्रपट प्रदर्शित होणार असून ते रा कार्तिक यांच्या आगामी चित्रपटातून झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.
87 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Dec 19, 2025, 03:30 PM
boAt ने व्हॅलोर रिंग 1 चे अनावरण केलेः सुज्ञ आरोग्य मागोवासाठी एक स्क्रीनलेस स्मार्ट रिंग

boAt ने व्हॅलोर रिंग 1 चे अनावरण केलेः सुज्ञ आरोग्य मागोवासाठी एक स्क्रीनलेस स्मार्ट रिंग

BoAt ने एक नवीन आणि खास उत्पादन बाजारात आणले आहे. कंपनीने आपली पहिली स्मार्ट रिंग, boAt Valour Ring 1 सादर केली आहे, जी विशेषत: अशा युजर्ससाठी डिझाइन केली गेली आहे ज्यांना स्क्रीनलेस, हलके आणि वेगळे आरोग्य ट्रॅकिंग डिव्हाइस हवे आहे.ही स्मार्ट रिंग हृदय गती परिवर्तनशीलता (HRV), एसपीओ 2, झोपेचेविश्लेषण आणि इतर आवश्यकआरोग्य मेट्रिक्स 24/7 ट्रॅक करते. त्याचे सर्वात मोठे फीचर्स म्हणजे त्याची 15 दिवसांची बॅटरी लाईफ, जी त्याला इतर वेअरेबल्सपेक्षा वेगळे बनवते. जे स्मार्टवॉचऐवजी जुन्या पद्धतीचे घड्याळ घालण्यास प्राधान्य देतात, परंतु आरोग्य देखरेखीवर तडजोड करू इच्छित नाहीत त्यांच्यासाठी boAt चे हे पाऊल फायदेशीर आहे.याची किंमत किती?BoAt Valour Ring 1 ची किंमत भारतात 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हीस्मार्ट रिंग अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि BoAt च्या अधिकृत वेबसाइटवर तसेच निवडक ऑफलाइन स्टोअरवर उपलब्ध असेल. हे रिंग आकारात7ते 12 मध्ये येते आणि सध्या केवळ कार्बन ब्लॅक मॅट फिनिशमध्ये उपलब्ध आहे. कंपनी ग्राहकांना रिंग साइझिंग किट देखील देते, जेणेकरून ते घरी बसून त्यांच्या बोटाचा योग्य आकार मोजू शकतील.आकाराची पुष्टी झाल्यानंतरच अंगठी ऑर्डर केली जाऊ शकते, जेणेकरून चुकीच्या आकाराची समस्या उद्भवणार नाही. त्याचे लाइटवेट टायटॅनियम बॉडी डिझाइन त्याला स्टायलिश आणि प्रीमियम लुक देते.कोणती आरोग्य आणि फिटनेस फीचर्स उपलब्ध?हेल्थ आणि फिटनेस फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर व्हॅलोर रिंग 1 खूपच अ‍ॅडव्हान्स्ड आहे. यात सतत हृदय गती देखरेख, एचआरव्ही अंतर्दृष्टी, रक्तातील ऑक्सिजन पातळी, त्वचेचे तापमान, तणाव ट्रॅकिंग आणि व्हीओ 2 मॅक्स अंदाज यासारखी फीचर्स आहेत.या व्यतिरिक्त हे स्टेप्स आणि दैनंदिन क्रियांचा देखील मागोवा घेते. झोपेच्या ट्रॅकिंगमध्ये, हे झोपेच्या टप्प्याचे विश्लेषण आणि दिवसा घेतलेल्या डुलकी देखील ओळखते. सर्व आरोग्य डेटा boAt Crest अ‍ॅपमध्ये पाहिला जाऊ शकतो, ज्यामध्ये नवीन आणि सुलभ युजर्स इंटरफेस आहे. ज्यांना खेळाची आवड आहे त्यांच्यासाठी धावणे, सायकलिंग, चालणे आणि सपोर्ट प्रशिक्षण यासारख्या 40 हून अधिक क्रीडा मोड आहेत.डिझाइनच्या बाबतीत ही स्मार्ट रिंग किती खास?ही स्मार्ट रिंग डिझाइन आणि बॅटरीच्या बाबतीतही उत्कृष्ट आहे. त्याचे वजन सुमारे 6 ग्रॅम आहे आणि ते 5 ATM वॉटर रेझिस्टन्ससह येते, ज्यामुळे ते पोहणे आणि शॉवर घेतानाही परिधान केले जाऊ शकते. यात कोणतेही प्रदर्शन नाही, ज्यामुळे दिवसभर परिधान करणे आरामदायक होते. USB टाइप-सी डॉक चार्जिंगद्वारे ही रिंग केवळ 90 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होते, असा दावा करण्यात आला आहे.
43 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Dec 19, 2025, 02:57 PM
सांधे आणि युरिक एसिडसाठी आले ओट्सचे फायदेः सांधेदुखीच्या मूळ कारणावर नियंत्रण ठेवणे

सांधे आणि युरिक एसिडसाठी आले ओट्सचे फायदेः सांधेदुखीच्या मूळ कारणावर नियंत्रण ठेवणे

Ginger Oats Benefits For joints And Uric Acid :वाढत्या वयानुसार शरीर अनेक आजारांना बळी पडते. याशिवाय, वाढत्या वयानुसार, सांधेदुखी, चालण्यास त्रास होणे आणि बोटांमध्ये कडकपणा यासारख्या समस्या देखील खूप सामान्य झाल्या आहेत. जेव्हा सांधेदुखी किंवा अशा समस्या शरीरात येऊ लागतात तेव्हा समजून घ्या की शरीरात यूरिक अ‍ॅसिडची पातळी वाढली आहे. खरं तर, प्युरिन नावाच्या घटकाच्या विघटनामुळे शरीरात यूरिक अ‍ॅसिड तयार होते, जे सहसा लघवीद्वारे शरीरा बाहेर टाकले जाते. युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी काय करावे आणि ते कसे दूर करता येईल याबाबच मुरादाबाद येथील तीर्थंकर महावीर विद्यापीठाचे निवासी डॉक्टर डॉ. मनीष जैन यांनी सांगितले. जनसत्ताच्या वृत्तानुसार, डॉ. मनीष जैन यांच्या मते, आपण जे अन्न खातो त्यात प्युरिन नावाचा घटक असतो, जो सामान्यतः लघवीद्वारे बाहेर टाकला जातो.पण जर शरीरात यूरिक अ‍ॅसिडची पातळी जास्त झाली तर सांधेदुखी तसेच इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत, शरीरातील यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित करणे खूप महत्वाचे आहे. डॉ. मनीष जैन म्हणाले की,’जेव्हा शरीर यूरिक अ‍ॅसिड योग्यरित्या बाहेर काढू शकत नाही तेव्हा ते रक्त आणि सांध्यामध्ये जमा होऊ लागते आणि संधिवात, संधिरोग, सूज आणि वेदना यासारख्या समस्या सुरू होतात. अशा परिस्थितीत, काही प्रभावी आणि घरगुती उपायांचा अवलंब करून देखील यूरिक अ‍ॅसिड नैसर्गिकरित्या बाहेर टाकता येते. ओट्स आणि आल्याचा एक उपाय यूरिक अ‍ॅसिडसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. ओट्समध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे सांध्यातील सूज आणि वेदना कमी होतात. आले शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास देखील मदत करते. दोन्ही अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात, जे यूरिक अ‍ॅसिडचे उत्पादन मर्यादित करतात. या दोघांचे मिश्रण पचन सुधारते आणि शरीर स्वच्छ करते. जेव्हा युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते तेव्हा सांध्यामध्ये स्फटिक तयार होतात ज्यामुळे वेदना आणि कडकपणा येतो. ओटमील आणि आल्यामध्ये नैसर्गिक वेदना कमी करणारे गुणधर्म असतात. त्यांचे सेवन केल्याने सांध्यांची सूज कमी होते आणि हालचाल सोपी होते. हा उपाय गुडघेदुखी किंवा पाठदुखीसाठी विशेषतः फायदेशीर आहे. शरीरातून युरिक अ‍ॅसिड मूत्राद्वारे बाहेर टाकले जाते, परंतु जर मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करत नसेल तर हे अ‍ॅसिड जमा होत राहते. आले आणि ओट्स दोन्ही यकृत आणि मूत्रपिंडाचे कार्य सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी होते. युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढणे आणि सांधेदुखी हे देखील पचनक्रियेतील बिघाडामुळे होते. हळद आणि आले दोन्हीही पचनसंस्थेसाठी फायदेशीर मानले जातात. ते अन्न सहज पचवण्यास मदत करतात आणि गॅस, अपचन आणि आम्लता कमी करतात.
21 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Dec 12, 2025, 02:55 PM
जेवणानंतरचे भारतीय विधी उघडणेः उत्तम पचनक्रियेसाठी विज्ञान-आधारित मार्गदर्शक

जेवणानंतरचे भारतीय विधी उघडणेः उत्तम पचनक्रियेसाठी विज्ञान-आधारित मार्गदर्शक

Post Meal Rituals In Indian Culture : भारतीय संस्कृतीमधील प्रत्येक परंपरेमागे सखोल विज्ञान आणि उत्तम स्वास्थ्य आहे. घरातील ज्येष्ठ मंडळी नेहमी सांगतात, जेवल्यानंतर लगेच झोपू नकोस किंवा आडवा होवू नकोस, थोडे चाल किंवा शतपावली कर. हाच नियम शास्त्रांमध्येही सांगितला आहे. आयुर्वेदात याला ‘शनैः शनैः चंकर्मणं’ असे म्हटले आहे, म्हणजे जेवणानंतर सावकाश चालणे. प्राचीन ग्रंथ चरक संहिता यामध्येही जेवणानंतर किमान 100 पावले चालणे, म्हणजेच शतपावली करावी असे म्हटलेले आहे. अन्न पचन सुधारण्यास यामुळे मदत होते. तसेच आरोग्याच्या इतर समस्या होत नाहीत. पण यासगळ्यात जेवणानंतर कुंभकर्ण आणि भीम यांच्या नावाचे स्मरण का करावे? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, याबद्दल सविस्तर माहिती घेवूया.आयुर्वेदानुसार, जेवण झाल्यानंतर आपण थोडं चाललो तर पाचक अग्नि सक्रिय होतो, ज्यामुळे अन्न नीट पचते आणि मेटाबॉलिझम सुधारते. यामुळे वजन नियंत्रित ठेवणे ते अगदी रक्तातील साखरेचा समतोल देखील उत्तम राहतो. हलक्या पावलांनी चालल्याने पचनशक्ती सुधारते आणि अन्नातील रस शरीरात योग्यरीत्या शोषला जातो. तुम्ही सेवन केलेले अन्न व्यवस्थित पचते. शास्त्रांमध्ये जेवणानंतर काय करावे आणि काय करू नये याबद्दल स्पष्टपणे सांगितलेले आहे.जेवणानंतर हे काम कधीही करू नयेहजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की, जेवणानंतर लगेच झोपल्याने शरीरात अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात. झोपल्याने पोटावर दाब पडतो. त्यामुळे गॅस, अपचन, लठ्ठपणा अशा अनेक समस्या वाढतात. त्याउलट, जेवणानंतर काही पावलं चालली तर तब्येत सुधारते आणि दीर्घायुष्य प्राप्त होते.जेवणानंतर लगेच झोपावे का?आयुर्वेदातही असे स्पष्ट सांगितले आहे की जेवणानंतरची शतपावली शरीरातील वात, पित्त आणि कफ हे तीनही दोष संतुलित करते. शास्त्रांमध्ये स्पष्ट लिहिले आहे की, जेवणानंतर लगेच बसणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे शरीरात लठ्ठपणा, स्थूलता आणि पचनाशी संबंधित अनेक व्याधी निर्माण होतात. जेवण करून लगेच बसल्याने पचनतंत्र कमकुवत होते आणि शरीरात विविध समस्या घर करू लागतात.जेवणानंतर पोटावरून हात का फिरवतात?वैदिक ग्रंथांनुसार जेवणानंतर पोटावर अगदी हलक्या पद्धतीने हात फिरवायला हवा. हात फिरवण्याची ही पद्धत घड्याळाच्या दिशेन असावी. जेव्हा जेवण झाल्यानंतर तुम्ही पोटावरून हात फिरवाल तेव्हा पुढील श्लोक म्हणा,अगस्त्यम कुम्भकर्णं च शनिं च वडवानलं।भोजनं परिपाकार्थ स्मरेद भीमं च पंचमं॥ग्रहण केलेले अन्न नीट पचावे म्हणून महर्षी अगस्त्य, कुंभकर्ण, शनि, वडवानल आणि भीम या पाचजणांचे नेहमी स्मरण करावे. जेवणानंतर पोटावर हात फिरवत हा मंत्र जपल्याने पचनक्रिया सुधारते.
62 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Dec 4, 2025, 03:29 PM
गंडुशाची शक्ती उघडाः मौखिक आरोग्यासाठी एक समग्र दृष्टीकोन

गंडुशाची शक्ती उघडाः मौखिक आरोग्यासाठी एक समग्र दृष्टीकोन

तोंडाचे बाह्य रूप छान राहावे म्हणून लोक नाना प्रयत्न करत असतात, पण “तुमच्या तोंडाचे आभ्यन्तर रूपसुद्धा महत्त्वाचं असतं आणि ते आतले स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी तुम्ही काय करता?” असे विचारले तर प्रश्न ऐकूनच अर्धे लोक गोंधळून जातील. त्यातल्या अर्ध्या लोकांना तर तोंडाचे आभ्यन्तर स्वास्थ्य म्हणजे काय हेच माहीत नसेल. ज्यांना माहित आहे, ते म्हणतील “आम्ही रोज दिवसातून दोन वेळा दात घासतो की!” मौखिक आरोग्य-जतन हे लोकांनी रोजच्या दात घासण्यापुरतेच मर्यादित ठेवले आहे. मुळात आजचा दात घासण्याचा विधी जिथे दातांचे स्वास्थ्य धड सांभाळू शकत नाही, तिथे तोंडामधील जीभ, हिरड्या, गालफडं, लालाग्रंथींची मुखं वगैरे अंगांना त्यांचा लाभ होण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. उलट विविध केमिकल्सनी भरलेल्या आजच्या टूथपेस्ट तोंडामधील या अंगांना इजा करण्याची शक्यता अधिक. आयुर्वेदाने मात्र तोंडामधील विविध अंगांचे स्वास्थ्य उत्तम राहावे यासाठी एक विशेष विधी सांगितला आहे,ज्याचे नाव गंडूष. सामान्य भाषेमध्ये सांगायचे तर गंडूष म्हणजे गुळण्या. मात्र त्यात काही फरक आहे. एखादा द्रव तोंडामध्ये भरुन घेऊन जेव्हा तो तोंडातल्या तोंडात इथून-तिथे खुळखुळवता येतो, तेव्हा त्याला ‘कवल’ म्हणतात (तोंडामध्ये इकडून तिथे हलवता येतो तो घास म्हणजे कवल) , तर जेव्हा कोणताही द्रव तोंड संपूर्ण भरुन जाईल इतका घेतला जातो की तो तोंडामध्ये हलवता येत नाही, तेव्हा त्या विधीला गंडूष म्हणतात. हे उभय विधी आयुर्वेदाने मुख्यत्वे तोंड व तोंडामधील अंगांचे स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी सांगितले आहेत, जे नित्यनेमाने करणे अपेक्षित आहे. त्यातही हिवाळ्यामध्ये जेव्हा शरीराला अधिकाधिक स्नेहनाची गरज असते, तेव्हा तर रोज गंडूष करणे योग्य. हेही वाचा >>>वायू प्रदुषणामुळे तुमच्याही डोळ्यांना त्रास होतोय? मग अशाप्रकारे घ्या काळजी, तज्ज्ञ सांगतात… नित्यनेमाने गंडूष करायचा झाल्यास तो नेमका कशाने करावा? याचे उत्तर अष्टाङ्गहृदयकार महर्षी वाग्भट देतात ‘तिळ तेल आणि मांसरस’.त्यातही जे वातप्रकृतीचे आहेत व ज्यांना कोरडेपणा वाढल्याचा त्रास होतो, जसे – तोंड कोरडे पडणे, तोंडामध्ये लाळ कमी प्रमाणात स्त्रवणे, हिरड्या-दात, गालफडं ओलसर न राहणे, वगैरे. अशा कोरडेपणा वाढल्याने संभवणार्‍या समस्या असताना गंडूष करण्यासाठी तीळ तेलाचा उपयोग करावा, तर जे अशक्त, कृश, किडकिडीत शरीराचे आहेत, ज्यांना तोंडामधील जीभ, दात, हिरड्या, गालफडं यांची ताकद वाढवणे आवश्यक वाटते त्यांनी मांसरसाचा उपयोग करावा. वास्तवात वातप्रकृती व्यक्तीच सहसा कृश-किडकिडीत शरीराच्या असतात व त्यांनाच ताकद वाढवण्याची आवश्यकता असते. साहजिकच त्यांनी मांसरस व तीळ तेल यांचा आलटून-पालटून उपयोग करावा.
50 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Dec 1, 2025, 03:35 PM
डोक्यातील कोंड्यापासून बचावः निरोगी त्वचा आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी टिपा

डोक्यातील कोंड्यापासून बचावः निरोगी त्वचा आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी टिपा

राहणीमान :थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम, उबदार कपडे घालूनच घराबाहेर पडावे. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह चांगला राहतो. स्नानानंतर शरीराला खोबर्‍याचे तेल लावावे. जेणेकरून त्वचा कोरडी पडणार नाही. हवामान कसेही आणि कोणतेही असो दररोज आठ ते दहा ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. हे शरीरातून विषारी तत्त्व (टॉक्सिंस) बाहेर काढण्यास मदत करते. दररोज सकाळी उन्हात दहा ते वीस मिनिटे बसावे. त्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करेल आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.
30 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Nov 3, 2025, 04:34 PM
आरोग्य-जागरूक प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने प्रिमियम गाड्यांमध्ये साखर-मुक्त जेवणाची सुरुवात केली

आरोग्य-जागरूक प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने प्रिमियम गाड्यांमध्ये साखर-मुक्त जेवणाची सुरुवात केली

Indian Railways Diabetic food : देशातमधुमेहींचेवाढते प्रमाण लक्षात घेता भारतीयरेल्वेनेप्रवाशांच्याआरोग्यासाठीआतारेल्वेप्रवासात साखरमुक्त जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे. वंदे भारत एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी आणि दुरांतोसारख्या प्रीमियम गाड्यांमध्ये रेल्वे प्रशासनाने डायबेटिक फूड' म्हणजेच साखरमुक्त जेवण सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षात रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयी-सुविधांकडे विशेष लक्ष दिले आहे. तसेच सध्या रेल्वे प्रवाशांकडून 'डायबेटिक फूड' प्रकारच्या अन्नाची मागणी वाढली आहे. या मागणीला अनुसरून रेल्वे मंत्रालयाने अशाप्रकारच्या अन्नाची सुविधा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना आता तिकीट बुकिंग दरम्यानमधुमेहीआहार आणि नियमित जेवण यापैकी एक निवडता येईल. हा पर्याय निवडणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांच्या साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करणारा संतुलित आहार दिला जाईल, असे आयआरसीटीसीने म्हटले आहे. त्यामुळे मधुमेहाने ग्रस्त प्रवाशांना आरामदायी प्रवास करताना डायबेटिक फूडने प्रवास अधिकच सुखकर होणार आहे. डायबेटिक फुड म्हणजे नेमके काय असते? 'डायबेटिक फूड' म्हणजे मधुमेहाच्या रुग्णांसाठी बनवलेल किंवा शिफारस केलेले पौष्टिक आणि संतुलित अन्न होय. यातआरोग्यदायीपदार्थांचा समावेश असतो, जसे की फले भाज्या, संपूर्ण धान्य आणि कमी चरबीचे प्रथिने. हे अन्न रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. मधुमेहींची खाण्या-पिण्याची चिंता मिटणार? बाहेरगावीजाताना मधुमेही रुग्णांना खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष ठेवावे लागते. बऱ्याच वेळा हे रुग्ण डायबेटिक फूड सोबत ठेवत असतात. तसेच प्रवासात बाहेरूनही असे पदार्थ मागवत असतात. मात्र, आता हे पदार्थ रेल्वेतच मिळणार असल्याने अशा प्रवाशांची प्रवासात खाण्या-पिण्याची चिंता मिटणार आहे. कोणत्या रेल्वे गाडीत मिळणार ही सुविधा वंदे भारत, राजधानी, शताब्दी आणि दुरांतो सारख्या प्रीमियम गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या मधुमेही प्रवाशांना 'डायबेटिक फूड' मिळणार आहे. सध्या भुसावळ विभागातुन धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस व राजधानी एक्सप्रेस मध्ये ही सुविधा सुरू आहे. तसेच अन्य रेल्वेगाड्यांमध्येही भविष्यात ही सुविधा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. भविष्यात अन्य रेल्वेमध्येही सुविधा लवकरच सुरू होणार रेल्वेने आता मधुमेहींना अनुकूल अन्नपदार्थांचा मेनूमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जे प्रवाशांना त्यांच्या साखरेच्या पातळीबद्दल जागरूक राहावे लागेल. त्यांना आता रेल्वे प्रवासादरम्यान बाहेरून येणारे असुरक्षित अन्न खाण्याची गरज भासणार नाही. हे पाऊल केवळ प्रवाशांच्या सोयी सुधारेल असे नाही तर निरोगी खाण्याच्या सवयींना देखील प्रोत्साहन देईल. जर हा उपक्रम यशस्वी झाल तर भविष्यात इतर प्रीमियम आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येही ही सुविधा सुरू होणार आहे.
47 shares
😊
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Oct 17, 2025, 02:38 PM
इष्टतम आरोग्यासाठी पानांच्या लपलेल्या गुणांना उघडे करणे

इष्टतम आरोग्यासाठी पानांच्या लपलेल्या गुणांना उघडे करणे

डिनरनंतर किंवा सणासुदीच्या वेळी पान खाण्याची सवय आपल्या घराघरात आजही दिसते. हिरवं, चमकदार आणि सुगंधी पान केवळ मुखशुद्धी म्हणूनच नाही तर आरोग्यासाठीही अनेक प्रकारे उपयोगी ठरतं. पण आपण बहुतेक वेळा त्याकडे केवळ परंपरेचा भाग म्हणून पाहतो. खरं तर या छोट्याशा पानात शरीराला तंदुरुस्त ठेवणारे गुण लपलेले आहेत. आपल्या पूर्वजांनी जे पानाच्या सेवनाचं महत्त्व सांगितलं, ते केवळ परंपरेपुरतं नव्हतं, त्यामागे वैद्यकीय कारणंही होती.भारतातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बिमल छाजेर यांच्या मते, जर पानाचं सेवन योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने केलं, तर आपण दीर्घकाळ निरोगी राहू शकतो. चला, जाणून घेऊ या या साध्या पण प्रभावी पानाच्या आरोग्यदायी फायद्यांविषयी.पचनशक्ती वाढवणारं नैसर्गिक औषधजेवणानंतर पान खाण्याची परंपरा काही उगीच नाही. पानातील नैसर्गिक घटक पचनसंस्थेचं कार्य सुरळीत ठेवतात. हे अन्न लवकर पचायला मदत करतं,पोटफुगी, आम्लपित्त किंवा गॅसयांसारख्या त्रासांपासून आराम मिळवून देतं. पान खाल्ल्यानं लाळेचं स्राव वाढतो, ज्यामुळे पचनक्रिया सक्रिय होते. जे लोक वारंवार अजीर्ण किंवा जडपणाचा त्रास अनुभवतात, त्यांनी पानाचं सेवन केल्यानं फरक जाणवू शकतो.श्वसनाच्या तक्रारींवर दिलासाहवामानातील बदलामुळे अनेकांनासर्दी, खोकला, दम्यासारख्या समस्यावाढतात. पानामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुण श्वसनसंस्थेतील सूज कमी करण्यात मदत करतात. गरम पाण्यात पान उकळून त्याचा वाफेचा श्वास घेतल्यास कफ ढिला होतो आणि श्वास घेणं सोपं होतं. अशा प्रकारे पान हे घरगुती औषधासारखं उपयोगी ठरतं.कॅन्सरपासून बचाव करणारे घटक​पानामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्सअसतात जे शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करतात. हेच फ्री रॅडिकल्स दीर्घकाळात पेशींना नुकसान पोहोचवतात आणि कॅन्सरचा धोका वाढवतात. त्यामुळे पानाचं नियमित सेवन शरीराला या हानीकारक घटकांपासून संरक्षण देतं. याशिवाय पानामधील फाइटोन्युट्रिएंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.मन शांत करणारा प्रभावआपल्याला थकवा, चिडचिड किंवा उदासीनता जाणवली तर पानाचं सेवन मेंदूला शांतता आणि ताजेपणा देतं. पानामधील काही नैसर्गिक रसायनं मेंदूत ‘एसीटिलकोलाइन’ नावाचं तत्व संतुलित ठेवतात, जे मूड सुधारण्यास मदत करतं. त्यामुळे हलक्या स्वरूपाच्या डिप्रेशनमध्येही हे उपयुक्त ठरतं. म्हणूनच आपल्या आजीआजोबा जेवणानंतर हसत पानाचा तुकडा घेत, त्यामागं एक मानसिक शांतीही दडलेली होती.तोंड आणि शरीराचं रक्षणपानाचे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण शरीरातील सूक्ष्मजंतूंना नष्ट करतात. त्यामुळे तोंडातील दुर्गंधी कमी होते आणि हिरड्यांची सूजही कमी होते. याशिवाय हे जंतुनाशक म्हणून कार्य करत असल्याने संसर्गांपासून शरीराचं रक्षण करतं. पानाचं चहात उकळून सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दीखोकल्यापासून बचाव होतो.कसं खावं हे पान?पानाचं सेवन नेहमी नैसर्गिक आणि संतुलित पद्धतीने करावं. चूना, कत्था किंवा सुपारी टाळावी, कारण ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. शुद्ध हिरवं पान जेवणानंतर खाणं किंवा पानाचा काढा करून पिणं हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंपरेत लपलेलं हे ज्ञान आपल्या दैनंदिन जीवनात परत आणलं, तर लहानशा सवयीमुळेही मोठं आरोग्य लाभू शकतं.टिप :हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. हा वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लेखातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी MT घेत नाही.
71 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Oct 16, 2025, 03:33 PM
सूर्यफूल बियाण्यांची शक्ती उघडणेः आरोग्यविषयक फायद्यांचा खजिना

सूर्यफूल बियाण्यांची शक्ती उघडणेः आरोग्यविषयक फायद्यांचा खजिना

आपल्याला वाटतं का की फक्त मोठे सुपरफूड्सच शरीरासाठी चमत्कार घडवतात? प्रत्यक्षात, आपल्या स्वयंपाकघरातच काही अशा छोट्या गोष्टी लपलेल्या असतात, ज्या आरोग्याचा खजिना असतात. त्यापैकीच एक म्हणजे सूर्यफुलाच्या बिया. या बिया दिसायला लहान असल्या तरी त्यात लपलेलं पोषण मोठं आहे. कधी सॅलडवर शिडकाव म्हणून, तर कधी स्नॅक म्हणून या बिया वापरल्या जातात. पण बहुतांश लोकांना त्यांचे खरे फायदे माहिती नसतात. सूर्यफुलाच्या बियांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि चांगल्या चरबी असतात.त्यांचा नियमित सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते, हृदय निरोगी राहते आणि त्वचा उजळते. विशेष म्हणजे या बिया नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, त्यामुळे लहान-मोठ्या आजारांपासूनही संरक्षण मिळते. चला, आता पाहूया या छोट्याशा पण शक्तिशाली बियांचे आरोग्यदायी फायदे आणि योग्य सेवन पद्धत.हृदय निरोगी ठेवण्यासाठीसूर्यफुलाच्या बियांमध्ये असंतृप्त फॅटी अ‍ॅसिड, फायटोस्टेरॉल्स आणि मॅग्नेशियम हे घटक असतात. हे घटक वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करून चांगल्या कोलेस्ट्रॉलची (HDL) पातळी टिकवतात. त्यामुळे हृदयावर ताण कमी पडतो आणि रक्तदाब नियंत्रित राहतो. नियमितपणे या बिया खाल्ल्यास रक्तवाहिन्या लवचिक राहतात आणिहार्ट अटॅकचा धोका कमी होतो.​पचनक्रिया सुधारून शरीर हलकं ठेवतातया बियांमधील फायबर पचनासाठी अमृतासारखं काम करतं. ते आतड्यांतील हालचाल सुरळीत ठेवतं, बद्धकोष्ठता टाळतं आणि चांगल्या जीवाणूंचं प्रमाण वाढवतं. विशेषतः जड आहारानंतरसूर्यफुलाच्या बिया खाल्ल्यास पचन सुधारतंआणि पोट हलकं वाटतं.रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्तसूर्यफुलाच्या बियांतील मॅग्नेशियम आणि प्रथिने रक्तातील साखर स्थिर ठेवण्यात मदत करतात. त्यामुळेटाइप २ मधुमेह असणाऱ्यांसाठीया बिया फायदेशीर ठरतात. या बियांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने त्या हळूहळू ऊर्जा देतात आणि साखर अचानक वाढत नाही.रोगप्रतिकारक शक्ती आणि त्वचेचं आरोग्य वाढवतातव्हिटॅमिन ई, झिंक आणि सेलेनियम हे सूर्यफुलाच्या बियांमधले प्रमुख घटक आहेत. हे शरीरातील पेशींचं संरक्षण करतात, त्वचा उजळ ठेवतात आणि संसर्गांपासून बचाव करतात. व्हिटॅमिन ई हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असल्याने ते त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यातही मदत करतं.ताण कमी करून मूड सुधारण्यास मदतया बियांमधील मॅग्नेशियम मज्जासंस्थेला शांत ठेवतं. त्यामुळे ताण, चिंता आणि मनातील अस्थिरता कमी होते. दिवसातून थोड्या प्रमाणात या बिया खाल्ल्यास मन प्रसन्न राहतं आणि झोपही सुधारते.हाडे व कोलेस्ट्रॉलसाठी लाभदायकया बिया हाडे मजबूत करण्यासाठी मदत करतात. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन के जास्त प्रमाणात असते. शिवाय हे कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. यात हेल्दी फॅट आणि फायबर भरपूर असते.सुर्यफुलाच्या बिया कशा खाव्यात?​View this post on InstagramA post shared by Dr Smita Bora (@arham_ayurved)​सुर्यफुलाच्या बिया खाण्याचे फायदे​在 Instagram 查看这篇帖子Pallavi Jassal (@dt.pallavijassal) 分享的帖子​या पद्धतीने खा सुर्यफुलाच्या बियादररोज एका मूठभर (सुमारे २५ ते ३० ग्रॅम) सूर्यफुलाच्या बिया खाणं पुरेसं असतं. मीठ न घालता, कच्च्या किंवा हलक्या भाजलेल्या स्वरूपात त्यांचं सेवन करणं अधिक आरोग्यदायी ठरतं. या छोट्याशा बियाण्यांचा समावेश जर तुम्ही रोजच्या आहारात केला, तर तुम्ही केवळ ऊर्जा नाही तर दीर्घकाळ टिकणारं आरोग्यही मिळवू शकता.टिप :हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. हा वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लेखातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी MT घेत नाही.
24 shares
😐
Sakal logo
Sakal
Oct 13, 2025, 04:04 PM
आर्थिक ताण आणि कर्जाच्या ओझ्यामुळे भारतीय शेतकऱ्याची आत्महत्या

आर्थिक ताण आणि कर्जाच्या ओझ्यामुळे भारतीय शेतकऱ्याची आत्महत्या

कन्नड - तालुक्यातील जवळी खुर्द येथील एका शेतकऱ्याने नापिक पिकांमुळे कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून जीवन संपविल्याची घटना रविवारी (ता. १२) रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली. विलास गुलाबराव बचाटे (वय ५०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विलास बचाटे यांच्याकडे गट क्रमांक ६८ मध्ये दोन एकर शेती आहे. त्यांनी मक्याचे व कपाशीचे पीक घेतले होते. यासाठी त्यांनी उसने पैसे घेऊन बियाणे व खते खरेदी केली होती. मात्र, मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे एक एकरातील मका व कपाशीचे पीक पूर्णपणे वाया गेले.पीकहानी आणि कर्जाच्या वाढत्या विवंचनेमुळे बचाटे गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होते. अखेर या विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी रविवारी (ता. १२) रोजी रात्री विषारी औषध प्राशन केले.त्यांनी औषध घेतल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी श्रीमती पठाडे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सोमवारी डॉ. पठाडे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
57 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Oct 9, 2025, 03:06 PM
दिवाळीच्या सोप्या उपायांनी तुमच्या घरच्या स्विचबोर्डला चमकवा

दिवाळीच्या सोप्या उपायांनी तुमच्या घरच्या स्विचबोर्डला चमकवा

दिवाळीला घर सजवणे, दिवे लावणे आणि स्वच्छतेवर भर देणे प्रत्येकाच्या यादीत असते. पण घरातील स्विचबोर्ड काळे, पिवळट दिसत असतील, तर संपूर्ण घराची शोभा कमी होते. काळजी करू नका! फक्त काही सोप्या होम रेमेडीज वापरून तुम्ही स्विचबोर्ड चमकदार बनवू शकता.स्विचबोर्डवर धूर, धुळ किंवा हाताने लागलेले डाग सहज जमा होतात. हे दिसायला फिकट किंवा जड रंगाचे होऊ शकतात, ज्यामुळे घराची संपूर्ण सफाई आणि सजावट अधुरी वाटू शकते. अशा परिस्थितीत रसायनांचा वापर न करता घरच्या घरी उपलब्ध साध्या उपायांनी स्विचबोर्ड लगेच स्वच्छ आणि नवीनसारखा दिसू शकतो.हे उपाय फक्त स्वच्छतेसाठी नाहीत, तर दिवाळीच्या प्रकाशात तुमच्या घरातील स्विचबोर्डवर चमक आणून सजावटीला एक परफेक्ट फिनिशही देतात.स्टेप्स स्विचबोर्ड साफ करण्यासाठीस्विचबोर्ड स्वच्छ ठेवणे फक्त घराच्या देखाव्यापुरते मर्यादित नाही; ते आरोग्य आणि हायजीनसाठीही महत्त्वाचे आहे. घरी जमा झालेली धूळ किंवा गंदगी केवळ दिसायला खराब वाटत नाही, तर अॅलर्जी किंवा संसर्गाचा धोका देखील वाढवू शकते. त्यामुळे दिवाळीच्या वेळी स्विचबोर्ड, स्विच प्लेट्स आणि आसपासच्या भागांची सफाई करणे अधिक आवश्यक ठरते.नेल पॉलिश रिमूव्हर वापरास्विचबोर्ड हलक्या कापडावर किंवा कॉटन बॉलवर नेल पॉलिश रिमूव्हर घाला.स्विचबोर्डवरील काळे डाग किंवा धूराचे ठसे हलक्या हाताने पुसा.टीप: इलेक्ट्रिक स्विच बंद करूनच ही प्रक्रिया करा.दिवाळी स्विचबोर्ड क्लीनिंग​​साबणाच्या पाण्याचा उपायथोड्या साबणाच्या पाण्यात कॉटन किंवा सूक्ष्म कापड भिजवा.स्विचबोर्ड हलक्या हाताने पुसून स्वच्छ करा.सोडा-पाण्याचा मिश्रणएक चमचा बेकिंग सोडा + थोडे पाणी करून पेस्ट तयार करा.स्विचबोर्डावर हलके हात घालून पेस्ट पुसल्यास डाग सहज निघतात.सोडा-पाण्याचा मिश्रणएक चमचा बेकिंग सोडा + थोडे पाणी करून पेस्ट तयार करा.स्विचबोर्डावर हलके हात घालून पेस्ट पुसल्यास डाग सहज निघतात.साफ आणि चमकदार फिनिशशेवटी कोरड्या मऊ कापडाने स्विचबोर्ड पुसा.दिवाळीच्या दिव्यांसोबत स्विचबोर्ड लगेच चमकदार दिसेल.टीपनेहमी स्विच बंद करूनच स्वच्छता करा.रासायनिक द्रव्यांचा वापर फार जास्त करू नका, नाहीतर स्विचचे पॉलिश किंवा रंग खराब होऊ शकतो.
92 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Oct 6, 2025, 02:53 PM
नैसर्गिक ऊर्जा उघडणेः सकाळच्या दिनचर्येत बीट आणि चिया बियाण्यांच्या रसाची ताकद

नैसर्गिक ऊर्जा उघडणेः सकाळच्या दिनचर्येत बीट आणि चिया बियाण्यांच्या रसाची ताकद

सकाळ ही दिवसाची दिशा ठरवते असं म्हटलं जातं. जर उठल्यावर मन आणि शरीर ताजेतवाने असेल तर दिवसभर उत्साहाने प्रत्येक काम करता येतं. पण आजच्या धावपळीच्या आयुष्यात सकाळीच थकवा, अपचन किंवा पित्तासारख्या समस्या जाणवल्या तर मूड बिघडतो आणि ऊर्जा हरवते. यामुळे कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाते. आरोग्य तज्ञ सांगतात की सकाळी योग्य आहार घेतला, तर शरीराला नैसर्गिक शक्ती मिळते आणि मनही प्रसन्न राहतं.यासाठी काही लोक कॉफी किंवा चहा घेतात, तर काहीजण डिटॉक्स वॉटर पितात. पण अलीकडे एक नैसर्गिक पेय खूप लोकप्रिय होत आहे – बीटरूट आणि चिया सीड्सचा रस. हा पेय केवळ डिटॉक्ससाठीच नाही, तर त्वचा, रक्त आणि पचन यांसाठीसुद्धा अत्यंत उपयुक्त ठरतो. त्यामुळे दिवसाची सुरुवात या रसाने केल्यास आरोग्याबरोबरच ऊर्जा मिळून कामात जास्त चांगलं लक्ष देता येतं.शरीर डिटॉक्ससाठी उपयुक्त पेय​बीटरूट आणि चिया सीड्सदोन्ही नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहेत. बीटामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर काढतात. तर चिया सीड्स पचन सुधारून आतड्यांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ करतात. डिटॉक्स झाल्यावर रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीर हलकं वाटतं. सकाळी हा रस घेतल्यास दिवसभराची जडत्वाची भावना कमी होते आणि ताजेतवानेपणा जाणवतो.रक्तशुद्धी आणि हिमोग्लोबिन वाढवतो​बीटरूटमध्ये लोह मुबलक प्रमाणातअसतं. त्यामुळे हिमोग्लोबिन कमी असलेल्या व्यक्तींना हा रस खूप फायदेशीर ठरतो. लोहामुळे शरीरात लाल रक्तपेशींची निर्मिती वाढते आणि रक्त शुद्ध राहते. तर चिया सीड्समध्ये असणारी मिनरल्स ही प्रक्रिया अधिक परिणामकारक बनवतात. नियमित सेवनाने अॅनिमियासारखी समस्या टाळता येते आणि थकवा कमी होतो.त्वचेसाठी नैसर्गिक सौंदर्यदायकअनेकांना सकाळी उठल्यावर त्वचा निस्तेज वाटते. पण बीटरूट रसामधील जीवनसत्त्व C आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला आतून चमकदार ठेवतात. चिया सीड्समधील ओमेगा–३ फॅटी ॲसिड्सत्वचेतील कोरडेपणा कमी करतातआणि सुरकुत्या येण्याची गती कमी करतात. या पेयाचं नियमित सेवन केल्यास त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो आणि रसायनयुक्त उत्पादनांवर अवलंबून राहावं लागत नाही.पचनसंस्था आणि वजन नियंत्रणात मदतआजकाल बहुतेकांना बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे अशा समस्या जाणवतात. बीटरूटमध्ये असलेलं फायबर पचन सुधारतं आणि आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवतं. चिया सीड्स पोटात फुगून बराच वेळ भूक लागत नाही. त्यामुळे ओव्हरईटिंग टाळलं जातं. जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी हा रस उत्तम आहे. तो पोटभर ठेवतो, ऊर्जा देतो आणि कॅलरीज कमी ठेवतो.बघा ज्यूसची रेसिपी​View this post on InstagramA post shared by Zenithdietclinic | Best Dietitian in Delhi NCR (@dieticianpriyamittal)​बीटरूट चिया सीड्स ज्यूस​​रस तयार करण्याची सोपी पद्धतहा रस तयार करणे अगदी सोपं आहे. बीटरूट स्वच्छ धुऊन बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये वाटून घ्यावं. त्यात एक चमचा भिजवलेले चिया सीड्स टाकून पुन्हा मिक्स करावं. हवं असल्यास थोडं गाजर किंवा सफरचंदही घालता येतं. चवीसाठी लिंबाचा रस टाकल्यास तो अजून पौष्टिक होतो. या नैसर्गिक रसाचा एक ग्लास सकाळी घेतल्यास तो औषधांपेक्षा जास्त परिणामकारक ठरतो.टिप :हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. हा वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लेखातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी MT घेत नाही.
92 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Oct 5, 2025, 03:06 PM
राजगीर बियाणेः हाडांचे आरोग्य आणि मधुमेह व्यवस्थापनासाठी पोषक तत्वांनी समृद्ध अन्न

राजगीर बियाणेः हाडांचे आरोग्य आणि मधुमेह व्यवस्थापनासाठी पोषक तत्वांनी समृद्ध अन्न

राजगिरा हे पोषक तत्त्वांचे भांडार मानले जाते. त्यात प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेेशियम, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे यांसारखे पोषक तत्त्व असतात. त्यात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात आणि ते ग्लूटेन-मुक्त असते. राजगिराच्या बियांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण लक्षणीय असते, जे हाडे मजबूत करण्यासाठी एक आवश्यक पोषक तत्त्व आहे. ते ऑस्टिओपोरोसिसचा धोका देखील कमी करते. राजगिरा फायबरने समृद्ध आहे. त्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स देखील आहे, जो रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो. मधुमेहींसाठी हा एक आरोग्यदायी पर्याय आहे.
14 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Oct 3, 2025, 03:29 PM
चिंचेच्या पाण्याचे आरोग्यदायी फायदे उघडाः रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनक्षमतेसाठी पोषक तत्वांनी समृद्ध पेय

चिंचेच्या पाण्याचे आरोग्यदायी फायदे उघडाः रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनक्षमतेसाठी पोषक तत्वांनी समृद्ध पेय

तमालपत्राचे पाणी अँटीऑक्सिडंटस् आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध असते. ते प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि सर्दी आणि फ्लू टाळण्यास मदत होते. तमालपत्राचे पाणी पचनसंस्था मजबूत करते आणि गॅस, अपचन आणि पोटदुखीसारख्या समस्या कमी करण्यास मदत करते. तमालपत्र शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. नियमित सेवनाने रक्त शुद्ध होते आणि त्वचा स्वच्छ राहते.
72 shares
😊
Pudhari logo
Pudhari
Sep 29, 2025, 02:48 PM
चंदननगर-खराडी येथील फिटनेस क्लबजवळ मसाज पार्लरवर छापा

चंदननगर-खराडी येथील फिटनेस क्लबजवळ मसाज पार्लरवर छापा

चंदननगर-खराडी भागातील एका फिटनेस क्लबजवळ असलेल्या इमारतीत आरोपी मसाज पार्लर चालवित होते. या मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवयास सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खात्री केली. पोलिसांनी मसाज पार्लरवर छापा टाकून कारवाई केली. मसाज पार्लरमधून तीन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे. चौकशीत मसाज पार्लरमधील तरुणींना आरोपींनी जादा पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे तपास करत आहेत.
42 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Sep 25, 2025, 03:52 PM
आईच्या अचानक जाण्याने मुलाच्या तब्येतीचे संकट

आईच्या अचानक जाण्याने मुलाच्या तब्येतीचे संकट

याबाबत अधिक माहिती अशी, देवळा तालुक्यातील सरस्वतीवाडी येथील सुशिलाबाई अभिमन विश्वास (वय ६८) यांचे बुधवारी (दि.२४) अल्पशा आजाराने निधन झाले.आईच्या निधनाची धास्ती घेऊन त्याच दिवशी मुलगा दत्तू अभिमन विश्वास (४२) यांचा ब्लड प्रेशर वाढला. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला देवळा येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला नाशिकच्या मविप्रच्या आडगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना गुरूवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.
24 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Sep 20, 2025, 03:27 PM
अश्वगंधाः तणाव-संबंधित झोपेच्या अस्वस्थतेसाठी एक नैसर्गिक उपाय

अश्वगंधाः तणाव-संबंधित झोपेच्या अस्वस्थतेसाठी एक नैसर्गिक उपाय

ताण व झोप यांचा संबंध समजून घेणे आवश्यक आहे. जेव्हा शरीर सतत तणावाखाली असते तेव्हा कॉर्टिसोल नावाचे हार्मोन अधिक प्रमाणात स्रवते. या वाढलेल्या हार्मोनमुळे मन अस्वस्थ होते, झोप येण्यास अडथळा निर्माण होतो किंवा वारंवार झोपमोड होते. त्यामुळे निद्रानाश, थकवा व बेचैनी वाढते. अशा परिस्थितीत अश्वगंधाचे सेवन अतिशय उपयुक्त ठरते. यातील गुणकारी घटक कॉर्टिसोलचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करतात आणि मनाला शांतता मिळवून देतात. परिणामी, झोप गाढ लागते व झोपेची गुणवत्ता सुधारते.
72 shares
😊
Pudhari logo
Pudhari
Sep 11, 2025, 02:55 PM
नवीन पालकांसाठी नियोक्त्याचे सहाय्य पॅकेजः एक सर्वसमावेशक विभाजन

नवीन पालकांसाठी नियोक्त्याचे सहाय्य पॅकेजः एक सर्वसमावेशक विभाजन

गर्भधारणा स्पष्ट झाल्यावर चेकअप, औषधे आणि इतर गर्भावस्थेतील गरजांसाठी 63 हजार 100 रुपये, पब्लिक ट्रान्स्पोर्ट (बस, ट्रेन) वापरण्यासाठी 44 हजार 30 रुपये, बाळ जन्मल्यावर एकरकमी 1.26 लाख रुपये तिला व तिच्या पतीला देण्यात आले.
14 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Sep 5, 2025, 02:45 PM
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना आजारपणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना आजारपणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पंजाबचेमुख्यमंत्रीभगवंत मानयांची प्रकृती बिघडली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना फोर्टीसहॉस्पिटलमध्येभरती करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना बरे वाटत नव्हते. डॉक्टरांकडून औषधे घेऊन ते घरीच आराम करत होते. परंतू, त्यांच्या प्रकृतीत काही सुधारणा झाली नाही. यामुळे त्यांना डॉक्टरांनीहॉस्पिटलमध्येदाखल होण्यास सांगितले होते. पुरामुळेपंजाबचेसर्व जिल्हे पाण्याखाली आहेत. प्रचंड नुकसान झाले आहे. शेती, गुरे वाहून गेली आहेत. गेल्या काही दिवसांपासून मान हे पूर परिस्थितीच्या उपाययोजनांमध्ये व्यस्त होते. यानंतर ते आजारी पडले होते.
53 shares
😢
Sakal logo
Sakal
Sep 4, 2025, 02:55 PM
अधूनमधून उपवास केल्याने टाइप 2 मधुमेह नैसर्गिकरित्या उलटू शकतो का?

अधूनमधून उपवास केल्याने टाइप 2 मधुमेह नैसर्गिकरित्या उलटू शकतो का?

थोडक्यात:इंटरमिटंट फास्टिंग ही ठराविक वेळेत खाण्याची आणि उर्वरित वेळ उपवास करण्याची सोपी आणि लवचिक पद्धत आहे.ही पद्धत वजन कमी करण्यास मदत करते, इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते.मधुमेह रुग्णांनी ही पद्धत अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.Can intermittent fasting reverse type 2 diabetes naturally:अलीकडच्या काळात इंटरमिटंट फास्टिंग म्हणजेच ठराविक वेळेच्या कालावधीतच जेवण्याची आणि उर्वरित वेळेत उपवास ठेवण्याची पद्धत प्रसिद्ध झाली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण ही पद्धत अवलंबत आहेत, कारण ती सोपी, लवचिक आणि औषधांपेक्षा नैसर्गिक उपाय मानली जाते.संशोधनांनुसार ही पद्धत इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते, रक्तातील साखर कमी करते आणि काही रुग्णांमध्ये औषधांशिवायही साखर नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेह रुग्णांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने हा एक प्रभावी पर्याय ठरू शकतो. चला तर मग त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.इंटरमिटंट फास्टिंग (IF) ही एक खाण्याची विशिष्ट पद्धत आहे, ज्यामध्ये ठराविक वेळेत खाणे आणि उर्वरित वेळ उपवास करणे याचा समावेश असतो. पारंपरिक आहारापेक्षा ही पद्धत तुम्हीकायखाता यावर नव्हे, तरकेव्हाखाता यावर लक्ष केंद्रित करते. या पद्धतीत जेवण ठराविक तासांच्या कालावधीत घेतले जाते आणि उर्वरित वेळ उपाशी राहिले जाते. यामुळे शरीर ग्लुकोजऐवजी साठवलेली चरबी ऊर्जा म्हणून वापरू लागते, जे आरोग्यदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते.अनेक संशोधनांमधून असे दिसून आले आहे की इंटरमिटंट फास्टिंगमुळे वजन कमी होणे, HbA1c ची पातळी घटणे आणि शरीराचे चयापचय सुधारणे अशा सकारात्मक परिणामांची नोंद झाली आहे.400 हून अधिक टाइप 2 मधुमेही रुग्णांवर करण्यात आलेल्या एका ट्रायलमध्ये, फास्टिंग करणाऱ्यांमध्ये औषध घेणाऱ्यांच्या तुलनेत रक्तातील साखर अधिक नियंत्रणात आल्याचे आढळले, तसेच त्यांचे वजन सरासरी 10 किलोने कमी झाले आणि रक्तदाब, कंबरेचा घेर व कोलेस्टेरॉलची पातळीही सुधारली.चीनमध्ये झालेल्या एका छोट्या अभ्यासात इंटरमिटंट फास्टिंग करणाऱ्या रुग्णांपैकी सुमारे निम्मे रुग्ण औषधांशिवाय साखर नियंत्रणात ठेवू शकले, तर काही रुग्णांनी दीर्घकाळ इन्सुलिनवर असतानाही एका महिन्याच्या आत इन्सुलिन घेणे पूर्णपणे थांबवले.इन्सुलिन प्रतिकार कमी होतो:इंटरमिटंट फास्टिंगमुळे शरीरात इन्सुलिनची पातळी घटते आणि पेशींमध्ये संवेदनशीलता वाढतेवाढलेली चरबी कमी होते:विशेषतः यकृत आणि पॅन्क्रिॲजभोवतीची चरबी कमी होऊन आरोग्य सुधारतेऊर्जेचा स्त्रोत बदलतो:इंटरमिटंट फास्टिंगमुळे शरीर साखरेऐवजी चरबी आणि केटोनचा वापर करू लागतंहार्मोनल समतोल:भूक आणि समाधान हे दोन्ही नियंत्रित ठेवणाऱ्या हार्मोन्सचे संतुलन सुधारतेडॉक्टरांचा सल्ला घ्या, विशेषतः जर तुम्ही आधीच काही औषधे घेत असाल तरब्लड शुगर नियमित तपासा12:12 किंवा 14:10 यासारख्या सौम्य पद्धतीने सुरुवात कराआहारात पोषक घटकांचा समावेश करा, जसे की फायबर, सत्वयुक्त चरबी, प्रथिनं आणि गुंतागुंतीचे कार्बोहायड्रेट्स
10 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Sep 4, 2025, 02:41 PM
सरकारने जीवनावश्यक वस्तू आणि औद्योगिक उत्पादनांवरील कर कमी केले

सरकारने जीवनावश्यक वस्तू आणि औद्योगिक उत्पादनांवरील कर कमी केले

देशातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी साबण, डिटर्जंट, टॅल्कम पावडर, टूथपेस्ट, टूथब्रश यांसारख्या वस्तूंवरील करदर कमी करण्यात आले. वस्त्रोद्योगातील तयार कपडे, पादत्राणे, सौंदर्यप्रसाधने यांसारख्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरील करदरही कमी करण्यात आले आहेत. खत निर्मिती क्षेत्रातील नायट्रस अॅसिड, अमोनिया, वस्त्रोद्योगातील सूत, तसेच चामड्यावरील दर कमी करण्यात आले आहेत. पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी सिमेंटवरील कर २८% वरून १८% करण्यात आले आहेत. लहान प्रवासी वाहने व मालवाहतूक वाहने यांवरील कर १८% करण्यात आला असून, यामुळे महाराष्ट्रातील वाहनउद्योग व निर्यात क्षेत्राला चालना मिळेल.
41 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Aug 29, 2025, 03:35 PM
सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पुणे आरोग्य विभागाने समिती स्थापन केली

सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पुणे आरोग्य विभागाने समिती स्थापन केली

पुणे: सह्याद्री रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया प्रकरणाचे गांभीर्य समोर आल्यानेआरोग्ययंत्रणेने वेगाने पावले उचलली आहेत. रुग्ण व यकृतदाता अशा दोघांचाही मृत्यू झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठीआरोग्यविभागाने आठ सदस्यीय उच्चस्तरीय समिती नेमली असून, चौकशी पूर्ण होईपर्यंत सह्याद्री रुग्णालयातील लिव्हिंग लिव्हर ट्रान्सप्लांट उपचार स्थगित ठेवण्यात आला आहे. चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीत देशातील नामवंत तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. समितीत महाराष्ट्रासह बाहेरील राज्यातील तज्ज्ञांचाही समावेश असून, चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. समितीत चेन्नईचे नामवंत यकृत प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. मोहम्मद रेला, केईएम मुंबईचे डॉ. राम प्रभू, अतिदक्षता तज्ज्ञ डॉ. राहुल पंडित, संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. वसंत नागवेकर, डॉ. विजय व्होरा, डॉ. आकाश शुक्ला, ससून रुग्णालयाचे डॉ. पद्मसिंह रणबागळे आणि आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांचा समावेश आहे. समितीकडे रुग्णालयाने सादर केलेली उपचारपत्रके, शस्त्रक्रियेची कागदपत्रे व शवविच्छेदन अहवाल तपासले जाणार आहेत. या प्रकरणात वैद्यकीय निष्काळजीपणा झाला आहे की नाही? रुग्ण व दाता या दोघांच्या मृत्यूंना रुग्णालय जबाबदार आहे की नाही, यावर समिती अंतिम निर्णय देणार आहे. दरम्यान, मृत महिलेच्या नातेवाइकांनी डेक्कन पोलिस ठाण्यात वैद्यकीय निष्काळजीपणाची तक्रार दाखल केली आहे. तर दुसरीकडे, रुग्णालय प्रशासनाने आरोग्य विभागाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. १३ ऑगस्ट रोजी बापू कोमकर यांच्यावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. त्यांच्या पत्नी कमिनी यांनी यकृताचा एक भाग दान केला होता. मात्र, १५ ऑगस्ट रोजी बापू कोमकर यांचे निधन झाले आणि आठ दिवसांतच २२ ऑगस्टला कमिनी यांचाही मृत्यू झाला. सलग दोन मृत्यूनंतर नातेवाइकांनीडॉक्टरांवरनिष्काळजीपणाचा गंभीर आरोप केला आहे. या सर्व प्रकरणाची आता सखोल चौकशी होणार असून, आठ सदस्यीय समिती चौकशी समिती अहवाल सादर करणार आहे. हा अहवाल केवळ सह्याद्री रुग्णालयासाठीच नव्हे तर राज्यातील अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेसाठी दिशादर्शक ठरणार आहे.
30 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Aug 28, 2025, 02:50 PM
राष्ट्रीय अस्तित्व टिकवण्यासाठी भारतीयांनी तीन मुले जन्माला घालावीत-आर. एस. एस. प्रमुखांचे आवाहन

राष्ट्रीय अस्तित्व टिकवण्यासाठी भारतीयांनी तीन मुले जन्माला घालावीत-आर. एस. एस. प्रमुखांचे आवाहन

मोहन भागवत म्हणाले, ‘जगातील सर्व शास्त्रे सांगतात की ज्या समाजाचा जन्मदर 3 पेक्षा कमी आहे, तो हळूहळू लुप्त होण्याच्या मार्गावर असतो. वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, उशिरा विवाह टाळून आणि तीन अपत्यांना जन्म देऊन आई-वडील आणि मुलांचे आरोग्य चांगले राहते. भारतातील प्रत्येक नागरिकाने हे लक्षात घ्यावे की, आपल्या कुटुंबात तीन मुले असावीत. मुलांना एकमेकांशी समन्वय साधायला शिकता येते. त्यांच्यात अहंकाराचे व्यवस्थापन होते आणि भांडणे कमी होतात.’
39 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Aug 28, 2025, 02:49 PM
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी सोपे उपाय उघडणेः डॉ. शिल्पा अरोरा यांचे मार्गदर्शन

बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी सोपे उपाय उघडणेः डॉ. शिल्पा अरोरा यांचे मार्गदर्शन

आपल्या दैनंदिन जीवनात एक गोष्ट अशी आहे जी प्रत्येकाच्या तब्येतीवर मोठा परिणाम करू शकते, ती म्हणजे बद्धकोष्ठता होय. पण अनेकदा लोक तिच्याकडे दुर्लक्ष करतात. सकाळची घाई, ऑफिसला जाण्याची धावपळ, चुकीच्या आहाराची सवय आणि पुरेसं पाणी न पिण्याची प्रवृत्ती यामुळे शरीरात ही समस्या तयार होत जाते. बद्धकोष्ठता ही स्थिती दिसायला साधी असली तरी शरीराच्या संपूर्ण आरोग्यावर गंभीर परिणाम घडवू शकते. विशेष म्हणजे, या त्रासामुळे मानसिक चिडचिड वाढते आणि दिवसभर एकाग्रता कमी होते.अनेकदा लोक ही अवस्था नैसर्गिक मानतात, पण प्रत्यक्षात ती आपल्या आहार आणि जीवनशैलीशी घट्ट निगडीत असते. त्यामुळे बद्धकोष्ठतेवर योग्य वेळी उपाय केले तर शरीराला पुन्हा हलकेपणाची जाणीव होऊ शकते. तर नेमके कोणते साधे उपाय या अडचणीतून बाहेर पडायला मदत करतात ते डॉक्टर शिल्पा अरोराकडून जाणून घेऊया.गाजर​गाजरामध्ये मुबलक प्रमाणात तंतुमय घटक असतात जे आपल्या पचनसंस्थेला सुरळीत काम करण्यास मदत करतात.जेव्हा गाजर रोज खाल्ले जाते, तेव्हा ते आतड्यातील हालचाली वेगवान करतात आणि पोट साफ होण्याची प्रक्रिया सुलभ होते. पचन नीट न होण्यामुळे पोटातला जडपणा, पोट फुगणं आणि आळस निर्माण होतो तो गाजरामुळे कमी होतो. तसेच, गाजर शरीरात नैसर्गिक स्वच्छतेसारखं काम करतं. या साध्या उपायामुळे सकाळचा त्रास कमी होऊन दिवसभर हलकं वाटू लागतं.कच्ची पपईपचनाच्या समस्यांवर कच्च्या पपईसारखा प्रभावी नैसर्गिक उपाय क्वचितच मिळतो. पपईत ‘पापेन’ नावाचं एन्झाईम असतं, जे शरीरातील अन्नाचे पचन सुलभ करतं आणि साचलेले विषारी घटक बाहेर टाकतं. कच्च्या पपईचं पराठ्यासारखं सेवन करण्याची पद्धत आरोग्यासाठी उपयुक्त मानली जाते. जसं आलू भरून पराठा बनवला जातो, तसंच किसलेल्या पपईचं पीठात भरून पराठा तयार करता येतो.या स्वादिष्ट पदार्थामुळे पोट नीट साफ होतं, त्यामुळे त्रासदायक बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.​देशी तुपाचे फायदेकच्च्या पपईच्या पराठ्याला जर देशी तूप लावलं तर त्याचे फायदे अधिक वाढतात. तूप आतड्यांना नैसर्गिक लुब्रिकेशन देते, ज्यामुळे मल सैल होतो आणि सहज बाहेर पडतो. शिवाय तुपामध्ये असे घटक असतात जे हार्मोन्सचं संतुलन राखतात. आहारात नियमित प्रमाणात तुपाचा समावेश केल्यास पचनशक्ती सुधारते आणि आतड्यांचा त्रास कमी होतो.पाणी आणि द्रवपदार्थांचं महत्त्व​शरीरात पुरेशा प्रमाणात पाणी न मिळाल्यास मल कठीण होतो आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो.त्यामुळे दररोज भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे. फक्त साधं पाणी नव्हे तर ताक, डाळीचं पाणी, फळांचे रस यांसारख्या द्रवपदार्थांचा समावेश केल्यास शरीरातील आर्द्रता टिकून राहते. पाण्याची योग्य पातळी असल्यास पचनक्रिया सुरळीत होते आणि आतडे सहज रिकामं होतं. हा साधा उपाय असूनही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात, पण तोच या समस्येवर सर्वात प्रभावी उपाय ठरतो.पोट साफ होण्यासाठी ुडॉक्टरचे ुउपाय​View this post on InstagramA post shared by Shilpa Arora (@dr.shilpaarora)​जीवनशैली आणि झोपेचा परिणामबद्धकोष्ठतेचं आणखी एक मोठं कारण म्हणजे निष्क्रिय जीवनशैली. दिवसभर खुर्चीवर बसून काम करणं, चालण्याची-व्यायामाची सवय नसणं, उशिरापर्यंत जागरणं हे घटक पचनसंस्थेला आळशी करतात. यामुळे मलत्यागाची प्रक्रिया मंदावते. जर दररोज नियमित व्यायामाची सवय लावली, पुरेशी झोप घेतली आणि सक्रिय जीवनशैली स्वीकारली, तर या समस्येवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येतं.टिप :हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. हा वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लेखातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी MT घेत नाही.
12 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Aug 15, 2025, 02:45 PM
वस्तू आणि सेवा कर व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याचा भारताचा प्रस्ताव

वस्तू आणि सेवा कर व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याचा भारताचा प्रस्ताव

नवी दिल्ली - केंद्र सरकारने गुड्स अँन्ड सर्व्हिसेस टॅक्स(GST)मध्ये मोठा बदल करण्याचा प्रस्ताव आणला आहे. त्यात ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टॅक्स स्लॅब असावेत अशी शिफारस आहे तर तंबाखू, पान मसालासारख्याआरोग्याशीनिगडित जोखीम असणाऱ्या वस्तूंवर ४० टक्केजीएसटीलावण्याचा प्रस्ताव आहे. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्याजीएसटीकौन्सिलच्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चेत येणार आहे. जीएसटी स्लॅबमध्ये होणाऱ्या बदलाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी सप्टेंबरमध्ये २ दिवसीय बैठक होईल. पंतप्रधाननरेंद्र मोदीयांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून लोकांना संबोधित केले. त्यात दिवाळीपर्यंत जीएसटीमध्ये मोठे बदल होतील अशी घोषणा केली. ते म्हणाले की, या दिवाळीला मी मोठी भेट देणार आहे. मागील ८ वर्षात आम्ही जीएसटीसारखे अनेक बदल केले आहेत. त्यामुळे देशातील कर प्रणाली सोयीस्कर झाली आहे. आता याचा आढावा घेतला जाईल. आम्ही राज्यांसोबत चर्चा करत आहोत. आता आम्ही पुढील पिढीसाठी जीएसटीत सुधारणा लागू करणार आहोत असं त्यांनी म्हटलं. GST प्रणालीत सध्या ४ स्लॅब सूत्रांनुसार, सरकारकडून जीएसटी सुधारणेत कृषी उत्पादने,आरोग्यसंबंधित गोष्टी, हस्तशिल्प, विमा यासारख्या करांमध्ये कपात करण्याचा समावेश आहे. त्यातून ग्राहक वाढतील आणि आर्थिक विकासाला गती मिळेल असं सरकारला वाटते. सध्या जीएसटी प्रणालीत ४ स्लॅब आहेत, त्यात ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के असे आहेत. १२ आणि १८ टक्के स्लॅबमध्ये बहुतांश वस्तू आणि सेवा कव्हर केल्या जातात. प्रस्तावित सुधारणांमध्ये १२ टक्के स्लॅब काढून टाकणे आणि त्या अंतर्गत येणाऱ्या वस्तू ५ टक्के आणि १८ टक्के स्लॅबमध्ये समायोजित करणे समाविष्ट आहे. जीएसटीमधील सुधारणेनंतर लोकांना आवश्यक असणाऱ्या सेवांवरील टॅक्स कपात होतील. एमएसएमईचा लाभ होईल, रोजच्या वापरामधील वस्तू स्वस्त होतील त्यामुळे देशातील अर्थव्यवस्थेला आणखी गती मिळेल. या सुधारणेत हेल्थ आणि लाइफ इन्सुरन्ससारख्या आवश्यक सेवांवरील कर कपातीचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. दिवाळीपूर्वी देशात ही सुधारणा लागू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
24 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Aug 1, 2025, 02:46 PM
आयर्नचे लपलेले आरोग्य फायदे उघडणेः काजूची आश्चर्यकारक शक्ती

आयर्नचे लपलेले आरोग्य फायदे उघडणेः काजूची आश्चर्यकारक शक्ती

फक्त डाळिंब किंवा बीट खाल्लं की शरीरात आयर्न अर्थात लोह वाढतं, अशी एक सार्वत्रिक समजूत आपल्याला आहे. पण खरंतर शरीरात आयर्न शोषलं जाणं, ते टिकवून ठेवणं आणि ते नैसर्गिक पद्धतीने वाढवणं यासाठी काही ठराविक पदार्थ अधिक प्रभावी ठरतात. महिलांमध्ये आयर्नच्या कमतरतेचं प्रमाण अधिक दिसतं आणि त्यातूनच थकवा, अशक्तपणा, केसगळती, चक्कर येणे यांसारख्या समस्या सुरू होतात. म्हणूनच, रोजच्या आहारात काही नैसर्गिक स्रोतांचा समावेश केल्यास ही कमतरता लवकर भरून निघू शकते.काजूआपल्याला वाटतंकाजूम्हणजे फक्त चरबी आणि कॅलरीजचा स्रोत, पण खरं तर काजूमध्ये लपलेलं आरोग्याचं एक मोठं गुपित आहे आयर्न. दर १०० ग्रॅम काजूमध्ये जवळपास ६.६८ मिग्रॅ आयर्न असतं, जे आपल्या शरीराच्या रोजच्या गरजेसाठी भरपूर आहे. काजू कोलेस्टेरॉल वाढवत नाही, उलट, तो शरीरात ऊर्जा निर्माण करतो. त्यामुळे आयर्नच्या कमतरतेने ग्रासलेल्या व्यक्तींनी रोजच्या आहारात ५–६ काजू जरूर घ्यावेत.काळे तीळआयुर्वेदाच्या मते,काळ्या तिळांमध्येपांढऱ्या तिळांपेक्षा अधिक प्रमाणात आयर्न असतो. तिळाचं वैशिष्ट्य म्हणजे ते शरीराला गरज असलेले फॅटी अॅसिड्स, अँटीऑक्सिडंट्स आणि आयर्न एकत्र पुरवतात. रोज सकाळी १ चमचा भाजलेले काळे तीळ खाल्ल्यास शरीराला आयर्नची चांगली मात्रा मिळू शकते.खजूर, अंजीर, किशमिशअशक्तपणाची लक्षणं दिसू लागली की, सुकामेव्याचा वापर वाढवणं केवळ चवीनं नव्हे, तर पोषणमूल्यांच्या दृष्टीनेही योग्य ठरतं. अंजीर हे अशा फळांपैकी एक आहे, ज्यामध्ये जवळपास २९.४९ मिग्रॅ आयर्न आढळतो. याशिवाय खजूर आणि किशमिश देखील शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपयोगी पडतात. आलुबुखारा जरी आयर्नने खूप समृद्ध नसला, तरी त्यामधील व्हिटॅमिन C शरीराला आयर्न शोषण्यास मदत करतो.मटारदिसायला लहान असला तरी मटार म्हणजे एक प्रभावी आयर्नचा स्त्रोत आहे. १०० ग्रॅम मटारात सुमारे १.५ मिग्रॅ आयर्न आढळतो. दररोजच्या जेवणात जर मटार, राजमा किंवा सोयाबीन यांचा योग्य समावेश केला, तर शरीराला रोजची आयर्नची गरज नैसर्गिक रितीनं पूर्ण होते. शाकाहारींसाठी ही एक उत्तम संधी आहे.सोयाबीनसोयाबीन देखील लोहाचा एक चांगला स्रोत आहे. अर्धा कप शिजवलेल्या सोयाबीनमध्ये सुमारे ४-५ मिलीग्राम लोह आढळते.बाजरीबाजरी हे एक धान्य आहे ज्याची भाकरी रक्ताने खाल्ली जाते. ते खूप पौष्टिक आहे. बाजरीमध्ये मॅग्नेशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते आणि त्यात लोह देखील चांगल्या प्रमाणात असते. शिजवलेल्या बाजरीमध्ये 1 कप 6 मिलीग्राम लोह असते.गूळहिवाळ्यात जवळजवळ प्रत्येक घरात खाल्ल्या जाणाऱ्या गोड गूळामुळे तुमच्या शरीरातील लोहाची कमतरता दूर होण्यास मदत होते. असे म्हटले जाते की सुमारे २० ग्रॅम गुळात (लहान तुकडा) १-२ मिलीग्राम लोह असते.मखानातुमच्या आवडत्या नाश्त्याच्या मखान्याचे नाव देखील या यादीत समाविष्ट आहे. अनेक पोषक तत्वांनी भरलेले १ कप मखाना खाल्ल्याने तुम्हाला १ मिलीग्राम लोह सहज मिळू शकते.कांद्याच्या बियाकांदा बियाणे म्हणून ओळखले जाणारे कांदा बियाणे हे लोहाचे एक चांगले स्रोत आहेत. फक्त एक चमचा कांदा बियाण्यांमध्ये १.५-२ मिलीग्राम लोह असते.डाळींब-बीटवर विसंबू नका, योग्य पर्याय निवडाबहुतेकदा आयर्नची कमतरता दिसली की लोक डाळिंब आणि बीट खाण्याचा सल्ला देतात. पण हे दोघंही काही प्रमाणातच आयर्न वाढवू शकतात. त्याऐवजी वर उल्लेख केलेले फळे आणि पदार्थ यांचा समावेश केल्यास अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. हे पदार्थ ना केवळ हिमोग्लोबिन वाढवतात, तर रोगप्रतिकारशक्ती, मसल ग्रोथ आणि त्वचेचं आरोग्यही सुधारतात.टिप :हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. हा वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लेखातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी MT घेत नाही.
62 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Jul 31, 2025, 02:48 PM
बटाट्याच्या पसंतीमुळे तुम्ही रक्त शुद्ध करणाऱ्या 4 भाज्यांकडे दुर्लक्ष करत आहात

बटाट्याच्या पसंतीमुळे तुम्ही रक्त शुद्ध करणाऱ्या 4 भाज्यांकडे दुर्लक्ष करत आहात

रक्त हा आपल्या शरीरासाठी अगदी मूलभूत आणि महत्त्वाचा घटक आहे. शरीरात जर रक्ताचीच कमतरता असेल तर सर्वसाधारण थकवा, अशक्तपणा, त्वचेचा रंग फिका होणे, धाप लागणे यांसारख्या लक्षणांनी सुरुवात होते आणि ही स्थिती पुढे जाऊन एनीमियासारख्या गंभीर जीवघेण्या आजारातही बदलू शकते. पण केवळ रक्ताची कमतरता नव्हे, तर अनेकदा रक्तात टॉक्सिन्स म्हणजेच विषारी घटकही साचत जातात.हेच टॉक्सिन्स शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांपर्यंत पोहोचतात आणि गंभीर परिणाम घडवतात. आयुर्वेदामध्ये काही विशिष्ट भाजीपाला असा सांगितला आहे जो रक्त शुद्ध करण्यास हातभार लावतो. पण दुर्दैवाने या परंपरागत सल्ल्याकडे आजच्या पिढीकडून दुर्लक्ष होत आहे. जाणून घ्या कोणत्या त्या ४ भाज्या आहेत ज्या रक्त शुद्ध करतात.चौसष्ट प्रकारच्या भाज्यांऐवजी ‘आलू-पनीर’वर अवलंबूनआजच्या जेवणाच्या ताटात भाजी म्हणून वारंवार पनीर किंवा बटाटा दिसतो. खवय्येपणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या आपल्या देशात इतर सर्व भाजीपाला जणू विस्मरणात गेला आहे. प्रत्येक बेतात बटाट्याचेच पर्याय दिसतात आणि यामुळे आपल्या शरीरातील आवश्यक पोषणही बिघडते.रोजच्या आहारात या ‘चार’ हिरव्या भाज्या हव्यातच​हिरव्या भाज्यांमध्येव्हिटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तशुद्धीसाठी या भाज्यांचा समावेश आपल्या रोजच्या आहारात करणे आवश्यक आहे. विशेषतः चौलाई ही अशी भाजी आहे जी रक्तातील घातक घटक म्हणजेच टॉक्सिन्स दूर करण्याची क्षमता ठेवते. याशिवाय पालक, मेथी आणि शेवग्याच्या शेंगाही अत्यंत फायदेशीर आहेत. ह्या भाज्या वेगवेगळ्या स्वरूपात म्हणजेच सूप, भाजी, पराठा किंवा कोशिंबीर करून खाल्ल्या जाऊ शकतात.‘एनीमिया’ पासून संरक्षण करणारा नैसर्गिक उपायडॉ. तन्मय गोस्वामी यांच्या मते, जर वर नमूद केलेल्या भाज्यांचे नियमित सेवन केले गेले, तर रक्ताची कमतरता म्हणजेचएनीमियाचा त्रासहोणारच नाही. शिवाय, रक्तात अनावश्यक उष्णता किंवा जळजळ निर्माण करणारे टॉक्सिन्स देखील नियंत्रित राहतील. यामुळे त्वचेवर चमक येईल, डोळे निरोगी राहतील आणि झपाट्याने थकवा जाणवणार नाही.बाकी दिवसांच्या आहारातही ही काळजी घ्यासप्ताहातील उर्वरित दिवसांमध्ये पडवळ आणि दुधीभोपळा यांसारख्या हलक्या पण उपयुक्त भाज्यांचा समावेश करा. या भाज्या शरीरात थकवा निर्माण होऊ न देता आवश्यक ऊर्जा देण्याचे काम करतात. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या भाज्या उष्णतेला नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.डाळी आणि मिलेट्ससुद्धा आवश्यकभाज्यांप्रमाणेच, काळी डाळ, उडीद आणि तूरडाळ याही आहारात असाव्यात. त्यांच्यात प्रथिने आणि लोहाचे प्रमाण भरपूर असते. बाजरी, ज्वारी, रागी यांसारख्या मिलेट्सचे सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि स्किनच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. या सगळ्याचा थेट फायदा म्हणजे वाढत्या वयाच्या खुणा कमी दिसतात, आणि वयाच्या ५०व्या वर्षातही तुम्ही तरुण दिसू लागता. जर हाच आहार पद्धतशीरपणे सातत्याने घेतला, तर रक्ताची कमतरता, त्वचेसंबंधी तक्रारी, थकवा आणि अनेक लपलेल्या आजारांपासून आपण सहजपणे दूर राहू शकतो.टिप :हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. हा वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लेखातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी MT घेत नाही.
81 shares
😢
Sakal logo
Sakal
Jul 25, 2025, 03:02 PM
लांब, चमकदार केसांसाठी बायोटिनयुक्त अन्नपदार्थः निरोगी कुलूपांसाठी मार्गदर्शक

लांब, चमकदार केसांसाठी बायोटिनयुक्त अन्नपदार्थः निरोगी कुलूपांसाठी मार्गदर्शक

थोडक्यात:केसांची चमक आणि घनता कमी होत असेल, तर आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.बायोटिन (व्हिटॅमिन B7) हे केसांच्या मुळांना बळकट करतं आणि गळती रोखतं.बायोटिनयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास केस अधिक दाट, मजबूत आणि निरोगी होऊ शकतात.Biotin Rich Foods For Long And Shiny Hair:तुमचे केस आधीसारखे दाट आणि चमकदार राहिले नाहीत का? जर होय, तर तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे! केस मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी केवळ महागडे शॅम्पू किंवा ट्रीटमेंट पुरेसे नाहीत, तर योग्य पोषणही तितकेच आवश्यक आहे. चला, जाणून घेऊया ५ बायोटिनयुक्त पदार्थ (Biotin Rich Foods) जे तुमच्या केसांना नैसर्गिक चमक आणि मजबुती देऊ शकतात.तुमचे केस कोरडे, निस्तेज झाले असतील किंवा कमकुवत झाले असतील; केस गळती वाढली असेल किंवा केसांची वाढ थांबली असेल, तर यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे बायोटिनची कमतरता असू शकते.बायोटिन, ज्याला व्हिटॅमिन B7 देखील म्हणतात, हे केस, त्वचा आणि नखांसाठी अतिशय आवश्यक आहे. हे केसांच्या मुळांना मजबूत करते, गळती थांबवते आणि केसांना नैसर्गिक चमक देते. चांगली गोष्ट म्हणजे, तुम्ही तुमच्या आहारात काही बायोटिन-युक्त पदार्थ समाविष्ट करून केसांची घनता आणि आरोग्य सुधारू शकता.बदाम आणि अक्रोड केवळ मेंदूसाठी नाही, तर केसांसाठीही खूप फायदेशीर आहेत! यामध्ये भरपूर प्रमाणात बायोटिन, व्हिटॅमिन E आणिओमेगा-३ फॅटी ॲसिड्सअसतात, जे केस तुटण्यापासून वाचवतात आणि त्यांना मजबूत करतात.दररोज ५-६ भिजवलेले बदाम आणि २-३ अक्रोड खाल्ले तर योग्य परिणाम दिसून येतात.मजबूत आणि दाट केस हवे असतील, तर आहारात अंडी समाविष्ट करा! अंड्याच्या पिवळ्या भागात (Egg Yolk) भरपूर बायोटिन असते, जे केसांच्या वाढीस मदत करते. तसेच, अंड्यात प्रथिने आणि ॲमिनो ॲसिड असतात, जे खराब झालेले केस दुरुस्त करण्यास मदत करतात.रोज १-२ उकडलेलीअंडीखा किंवा अंड्याचे ऑमलेटही खाल्ले तरी चालते.ॲव्होकाडो हे एक सुपरफूड आहे जे केसांना मुलायम चमकदार बनवते. यामध्ये बायोटिन, हेल्दी फॅट्स आणि व्हिटॅमिन E असतात, जे टाळूचे आरोग्य सुधारतात आणि केस गळती थांबवतात.ॲव्होकाडोचे स्मूदी, सलाड किंवा सॅन्डविचमध्ये घालून सेवन करू शकता.केसांचे आरोग्य सुधारायचे असेल, तर आहारात सूर्यफुलाच्या बिया जरूर समाविष्ट करा. यामध्ये बायोटिन, झिंक आणि व्हिटॅमिन B6 असते, जे केसांच्या मुळांना बळकट करतात आणि नवीन केस वाढण्यास मदत करतात.१-२ चमचे सूर्यफुलाच्या बिया स्नॅक्स म्हणून खा किंवा सॅलडमध्ये टाका.रताळ्यामध्ये बायोटिन, बीटा-कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे केस गळणे थांबवतात आणि केसांची लांबी वाढवण्यास मदत करतात.उकडलेले किंवा भाजलेले रताळे खा किंवा चवदार चाट तयार करून खा.केसांची चमक आणि लांबी टिकवण्यासाठी फक्त बाहेरून काळजी घेणे पुरेसे नाही, तर योग्य आहार घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुम्ही बायोटिनयुक्त पदार्थ आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट केले, तर तुमच्या केसांचे आरोग्य लवकरच सुधारू शकेल.
16 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Jul 4, 2025, 02:40 PM
ग्रामीण आरोग्य सर्वेक्षण आणि उपचारांचे प्रयत्न सुरू

ग्रामीण आरोग्य सर्वेक्षण आणि उपचारांचे प्रयत्न सुरू

गावात ८० घरे असून प्रत्येक घरी तपासणी करण्यात आली आहे. ताप, मळमळ, पोटदुखी, हगवण, डोकेदुखी अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींना तातडीने उपचार मिळवून देण्यात येत आहेत. ठिक-ठिकाणच्या पाण्याचे १५ नमुने तपासण्यात येत आहेत. सर्वेक्षण, उपचारासाठी २ वैद्यकीय अधिकारी, १ समुदाय आरोग्य अधिकारी, २ आरोग्य सहायक, ४ आरोग्यसेवक, ३ आशासेविका, अंगणवाडी सेविका असे मनुष्यबळ कार्यरत आहे. यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने सर्वेक्षण करत असताना पिण्याचे पाणी उकळून व आर. ओ. पाण्याचा वापर किंवा मेडिक्लोरचा उपयोग करण्याच्या सूचना नागरिकांना दिला.
59 shares
😐
Loksatta logo
Loksatta
May 25, 2025, 02:54 PM
अमरावतीमध्ये सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्याची आत्महत्या

अमरावतीमध्ये सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्याची आत्महत्या

अमरावती :दुसरी मुलगी झाल्यापासून पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ चालवला. या सततच्या छळाला कंटाळून आरोग्य विभागात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत विवाहितेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील जयभोले येथे उघडकीस आली. याप्रकरणी मृत विवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीवरुन बँक व्यवस्थापक पतीसह पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच ही घटना उजेडात आल्याने कौटुंबिक छळाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शुभांगी नीलेश तायवाडे (३२) रा. जयभोले कॉलनी, तपोवन,अमरावती,असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी शुभांगी यांचा पती नीलेश अंकुरराव तायवाडे (३५), भासरा नितीन तायवाडे (३८), भाचा नयन रामटेके (२५) यांच्यासह सासू व नणंद यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी नीलेश तायवाडे, सासू व नणंदेला रविवारी दुपारीच अटक करण्यात आली. शुभांगी या धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चिंचपूर उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी पदावर कार्यरत होत्या. शुभांगी यांचे माहेर नागपुरातील हिंगणा भागातील आहे. शुभांगी यांचा विवाह सेंट्रल बँकेत व्यवस्थापक असलेल्या नीलेश तायवाडेसोबत सहा नोव्हेंबर २०२१ रोजी झाला होता. त्यांना दोन मुली आहेत. दरम्यान, शुभांगी यांचे वडील राजेंद्र तुरकाने (६५) रा. हिंगणा,नागपूरयांच्या तक्रारीनुसार लग्नानंतर काही दिवसांनीच नीलेशने पत्नी शुभांगीला त्रास द्यायला सुरुवात केली. शुभांगीला दुसरी मुलगी झाल्यानंतर पतीसह सासरच्या मंडळींचा त्रास आणखी वाढला. मागील काही दिवसांपासून पती नीलेश हा तिला सातत्याने नोकरी सोडण्यासाठी आग्रह करीत होता. मात्र, शुभांगी नोकरी सोडण्यास तयार नव्हती. २४ मे रोजी सायंकाळी शुभांगीचा मला शेवटचा कॉल आला. त्यावेळी ती अत्यंत निराश असल्याचे जाणवत होते. पती नीलेशसह सासरचे लोकं वारंवार भांडण करतात. पती चारित्र्यावर संशय घेतो. त्यांना या घरात मी नकोशी झाली आहे, असेही तिने त्यावेळी मला सांगितले. त्यावेळी आम्ही तिला समजाविले. मात्र, रविवारी सकाळी शुभांगीच्या पतीच्या मोबाइलवरून शेजारी राहणाऱ्या महिलेचा कॉल आला. शुभांगीने गळफास लावला आहे, असे त्यांनी मला सांगितले. पती व सासरच्या मंडळीने दिलेल्या त्रासामुळेच मुलगी शुभांगीने आत्महत्या केली, असे त्यांनी तक्रारीत नमुद केले आहे.
50 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 15, 2025, 02:40 PM
विवेक शौकः एक विनोदी जीनियस ज्याने आम्हाला खूप लवकर सोडले

विवेक शौकः एक विनोदी जीनियस ज्याने आम्हाला खूप लवकर सोडले

'गदर' (Gadar Movie) चित्रपटाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर येतात त्या सनी देओलची तारा सिंग, अमिषा पटेलने साकारलेली सकीना आणि अमरीश पुरी यांच्या अशरफ अली यांची व्यक्तिरेखा. पण आणखी एक व्यक्तिरेखा खूप लोकप्रिय झाली, ज्याची तारा सिंगसोबतची जोडी लोकांना खूप भावली होती. ती व्यक्तिरेखा होती दरम्यान सिंग, जी विवेक शौक (Vivek Shauq) याने साकारली होती. तो एक लोकप्रिय विनोदी कलाकार आणि अभिनेता होता. पण त्याचा शेवट इतका वाईट होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. विवेक शौकने त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात नाट्य आणि मालिकेतून केली. दूरदर्शनवरील जसपाल भट्टी यांच्या 'फ्लॉप शो'मध्ये तो झळकला आणि हिट ठरला. त्यानंतर त्याने पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 'गदर' व्यतिरिक्त विवेक शौकने '३६ चायना टाउन', 'ऐतराज', 'हमको दीवाना कर गये' आणि 'दिल है तुम्हारा' यांसारखे अनेक चित्रपट केले. लिपोसक्शन शस्त्रक्रियेनंतर अभिनेत्याची बिघडली तब्येत विवेक शौक यांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि कारकिर्दीत सर्व काही ठीक चालले होते. परंतु त्यांनी वजन कमी करण्याचा आग्रह धरला आणि हा हट्ट त्यांच्यासाठी घातक ठरला. ३ जानेवारी २०११ रोजी विवेकने वजन कमी करण्यासाठी लिपोसक्शन शस्त्रक्रिया केली. ठाण्यातील कारखानीस नर्सिंग होममध्ये त्याने ही शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दोन तासांत विवेकची तब्येत बिघडली आणि त्याला ३ हृदयविकाराचे झटके आले, असे सांगितले जाते. त्यानंतर त्याला ताबडतोब ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉ. विजय सुरसे यांनी 'मुंबई मिरर'ला विवेक शौकच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. त्यांच्या मते, विवेकला तीन वेळा हृदयविकाराच्या झटक्यांनंतर ३ जानेवारी रोजी रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यांचे हृदय पूर्णपणे काम करणे थांबले होते. २००३ मध्ये अभिनेत्याची झालेली अँजिओप्लास्टीडॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, विवेक शौकला तीन वेळा इलेक्ट्रिक शॉक देण्यात आले, परंतु तो शुद्धीवर आला नाही. त्यानंतर त्याला लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले, त्यानंतर तो कोमात गेला. डॉक्टरांनी सांगितले होते की, जेव्हा त्याने विवेक शौकचे वैद्यकीय रिपोर्ट पाहिले तेव्हा तो हार्ट पेशंट असल्याचे आढळून आले. २००३ मध्ये त्याची अँजिओप्लास्टी झाली होती. त्याच्या हृदयात तीन स्टेंट टाकण्यात आले होते. तो रक्त पातळ करणारी औषधे घेत होता, परंतु लिपोसक्शन शस्त्रक्रियेपूर्वी त्याने ही औषधे घेणे बंद केले होते. अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप त्याचवेळी, विवेक शौकची शस्त्रक्रिया करणारे डॉ. समीर कारखानी यांनी सांगितले होते की, अभिनेत्याने त्यांना शस्त्रक्रियेपूर्वी त्याच्या रक्त पातळ करणाऱ्या औषधांबद्दल आणि अँजिओप्लास्टीबद्दल काहीही सांगितले नव्हते. जेव्हा त्याचा ईसीजी आणि २डी इको करण्यात आला तेव्हा तो सामान्य होता. परंतु शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दोन तासांत विवेकची प्रकृती गंभीर झाली. तो कोमात गेला. आणि त्यानंतर सात दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. अभिनेत्याच्या पश्चात त्याची पत्नी सरबजीत, दोन मुली आणि एक मुलगा आहे- सादिका, मुदिता आणि सुनीस्ट. मुलगी मुदिता ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती तिच्या बहिणी आणि आईसह एलआयसीमध्ये विमा एजेंट म्हणून देखील काम करत असल्याचे समजते आहे.
7 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 9, 2025, 03:26 PM
मुंबईतील झोपेच्या कमतरतेची महामारीः एक जागतिक शहरी जीवनशैली आव्हान

मुंबईतील झोपेच्या कमतरतेची महामारीः एक जागतिक शहरी जीवनशैली आव्हान

देशाची आर्थिक राजधानी असलेल्यामुंबईतराहणारे बहुतेक काम करणारे नागरिक झोपेपासून वंचित आहेत.मुंबईसेंट्रल येथील वोकहार्ट हॉस्पिटलने नुकत्याच केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात ३० ते ५५ वयोगटातील कार्यरत मुंबईकरांनी भाग घेतला. या लोकांनी झोप पूर्ण का होत नाही? त्याचे कारण सांगितले आहे, जे ऐकल्यानंतर अनेकांची झोप उडाली. वोकहार्ट हॉस्पिटल सर्वेक्षणानुसार, मुंबईतील तब्बल ६३.५७ टक्के लोक आठवड्यातील सहा दिवस ६ तासांपेक्षा कमी झोप घेतात. ही समस्या जागतिक स्तरावर शहरी जीवनशैलीच्या आव्हानांना प्रतिबिंबित करते. लोकांना माहिती आहे की, पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे, परंतु त्यांच्या व्यस्त दिनचर्येमुळे त्यांना ते शक्य होत नाही, असे वोकहार्ट हॉस्पिटलचे सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रशांत मखीजा यांनी म्हटले आहे. झोप आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याला केवळ एक पर्याय न मानता आरोग्याचा मूलभूत आधारस्तंभ मानण्याची वेळ आली आहे, असाही त्यांना इशारा दिला. आवाजांमुळे झोप येत नाहीसर्वेक्षणात ६४.२३ टक्के लोकांनी ध्वनी प्रदुषणामुळे त्यांची झोप पूर्ण होत नसल्याचे सांगितले. मुंबईत सुरू असलेल्या पुनर्विकासाची कामे आणि वाहनांच्या हॉर्नच्या आवाजामुळे झोप येत नाही, असे त्यांनी म्हटले. पंरतु, अपुऱ्या झोपेमुळे उच्च रक्तदाब आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, जे आजारपणाला आमंत्रित करते. सुट्टीच्या दिवशी झोप पूर्ण करणारया सर्वेक्षणात सर्वांना आश्चर्यचकीत करणारी गोष्ट समोर आली. ५९.६२ टक्के लोकांना वाटते की, ते सुट्टीच्या दिवशी आठवड्याभराची झोप पूर्ण करतील. डॉ. मखीजा यांच्या मते, हा समज चुकीचा आहे. शनिवारी आणि रविवारी जास्त झोपून आठवड्याभराची झोप पूर्ण करता येत नाही. सर्वेक्षणातील सकारात्मक गोष्टीसर्वेक्षणात काही सकारात्मक चिन्हे देखील आढळली. सुमारे ७५.४० टक्के लोकांना झोपण्यापूर्वी शांतता हवी. तर, ५५.७४ टक्के लोक झोपेचा त्याग करत नाहीत, कोणत्याही परिस्थितीत ते आपली झोप पूर्ण करतात. दरम्यान, ५२.६६ टक्के लोकांना माहित होते की, अपूर्ण झोप मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर थेट परिणाम करते.
33 shares
😢
Pudhari logo
Pudhari
May 8, 2025, 02:30 PM
सकारात्मकतेची जोपासना करणेः चांगल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा मार्ग

सकारात्मकतेची जोपासना करणेः चांगल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा मार्ग

चिंता,तणाव यामुळे शरीराला नुकसानच होते. दिवसभर चांगला विचार करा, चांगले राहा, चांगले बोला, सकारात्मक राहा. नकारात्मक गोष्टी डिलीट करा.
50 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 6, 2025, 03:34 PM
बकुल वृक्षाचे औषधी गुणधर्म उघडणेः आरोग्यविषयक फायद्यांचा खजिना

बकुल वृक्षाचे औषधी गुणधर्म उघडणेः आरोग्यविषयक फायद्यांचा खजिना

बकुळ वृक्ष (Mimusops elengi) हा एक अत्यंत उपयुक्त आणि औषधी गुणधर्म असलेला वृक्ष आहे. हा वृक्ष प्रामुख्याने भारतात विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक आणि दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर आढळतो. बकुळच्या फुलांना सौम्य आणि सुखद सुगंध असतो त्यामुळे तो धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वापरला जातो. परंतु बकुळ फक्त सुगंधासाठीच नव्हे तर त्याचे औषधी उपयोगही खूप महत्त्वाचे आहेत. बकुळच्या साली, पाने, फुले आणि फळांचा उपयोग आयुर्वेदात विविध प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. हा वृक्ष आयुर्वेदिक औषधांमध्ये एक महत्त्वाचा घटक आहे. जाणून घेऊया याच गुणकारी बकुळचेआरोग्यदायीफायदे. दात आणि हिरड्यांसाठी उपयुक्त बकुळच्या सालीमध्ये दंतविकारांवर गुणकारी असणारे घटक असतात. याच्या सालीचा काढा किंवा अर्क हिरड्यांमधून होणारे रक्तस्त्राव थांबवण्यासाठी आणि तोंडातील व्रणांवर उपयोगी ठरतो. बकुळच्या सालीचा दंतमंजन किंवा अर्क नियमित वापरल्यास दात मजबूत होतात आणि तोंडातील दुर्गंधीही दूर होते. पचनसंस्थेसाठी फायदेशीर बकुळची साल अतिसार, जुलाब, पोटदुखी आणि आतड्यांतील कृमी यांवर उपयोगी आहे. बकुळच्या सालीचा काढा पिण्यामुळे पाचनक्रिया सुधारते. त्यामुळे हा काढा घरगुती उपाय म्हणून अनेकदा वापरला जातो. मूत्रसंस्थेवर उपयुक्त बकुळच्या सालीत मूत्रवर्धक गुणधर्म असतात. त्यामुळे लघवी करताना होणारी जळजळ कमी होते. मूत्राशयातील दाह किंवा संसर्ग असल्यास बकुळचा अर्क आराम देतो. अँटिऑक्सिडंट गुणधर्म बकुळच्या फळांमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात. यामुळे त्वचा निरोगी राहते आणि विविध प्रकारच्या ऍलर्जींच्यावर नियंत्रण मिळवता येते. इतर औषधी उपयोग बकुळची पाने डोकेदुखी, दातदुखी आणि विषारी प्रकरणांमध्ये उपयोगी ठरतात. पानांचा रस बाह्य वापरासाठी उपयुक्त असून सूज कमी करण्यासाठी वापरला जातो. काही पारंपरिक औषधांमध्ये बकुळचा उपयोग ताप कमी करण्यासाठीही केला जातो. सुगंध आणि धार्मिक महत्त्व बकुळची फुले अतिशय सुगंधी असतात. या फुलांचा उपयोग देवपूजेत धार्मिक विधींमध्ये आणि घरातील प्रसन्न वातावरण निर्माण करण्यासाठी केला जातो. फुले सुकवून ती चूर्ण स्वरूपात वापरली जातात. वरील सर्व माहिती सामान्य माहिती असून अधिक माहितीसाठी आणि अतिरिक्त सेवन करण्याआधी आपल्याआरोग्यतज्ञांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल. हेही वाचा : शरीराच्या विविध अन्न घटकांच्या पूर्ततेसाठी परिपूर्ण असलेल्या गुणकारी अनानसाचे वाचा आरोग्यदायी फायदे
93 shares
😊
Loksatta logo
Loksatta
Apr 28, 2025, 02:48 PM
नातेसंबंधांमधील संघर्ष आणि तणावाचे व्यवस्थापनः प्रेम पुन्हा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक

नातेसंबंधांमधील संघर्ष आणि तणावाचे व्यवस्थापनः प्रेम पुन्हा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक

डॉ. शशांक सामक आणि डॉ. जेसिका सामकEffects of Conflict and Stress on Relationships health अबोला ही वादाची प्रतिक्रिया असते, दिवस-दिवस नाही तर आठवडा -आठवडा पती-पत्नी एकमेकांशी वादच काय संवादही करीत नाहीत. त्यांच्यातील नाते ‘हँग’ होत असते. नातेसंबंधाचा कॉम्प्युटर ‘रिस्टार्ट’ करण्यासाठी ‘कंट्रोल, आल्टर, डिलीट’ची तीन बटणे वापरत वादावर ‘पडदा टाकण्याची’ तीच वेळ असते. याची सवय करायला हवी.थंडावलेले कामजीवनदोघेही उच्चशिक्षित होते. माझ्यासमोरच तो सांगत होता, ‘सारख्या सारख्या वादामुळे कामजीवनच थंडावले आहे आमचे. छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप टोकाचे वाद होतात आणि माझा सगळा मूड जातो. कालचीच गोष्ट सांगतो. मी डोक्यातील इतर सर्व विषय बंद करून केवळ रोमँटिक विचार करीत बेडरूममध्ये तिची वाट पाहत बसलो होतो. हिने आल्या आल्या कुठला विषय काढला असेल, उद्या ब्रेकफास्टला काय करायचं. मी म्हटलं, मला आवडणारे पोहे कर. ती म्हणाली, नको बरेच दिवस शिरा केला नाही तर तेच करीन. मी म्हटलं, नको. साखर आता कमी करायचं मी ठरवलंय. तू पोहेच कर. तरीही ही म्हणाली, नको. कमी साखरेचा शिरा करते. जवळजवळ पंधरा मिनिटे या वादात आम्ही घालवली. जोरदार वाद केला. ‘तू तुझंच खरं करायचा प्रयत्न करतोस, तू नेहमीच मला हवं त्याच्या विरुद्धच ठरवतेस’, वगरे एकमेकांना बोलून रोमँटिक मूड घालवून झोपलो. सकाळी उठून बघतोय तर हिने ब्रेकफास्टला काय केले तर उपमा. डॉक्टर, वैताग येतो हो या सगळ्या गोष्टीचा. काउन्सेलिंग हवंय आम्हा दोघांनाही.’होत्याचे नव्हते! रोमँटिक मूडचे आणि वादविवादाचे नाते हे कापूर आणि काडेपेटीची पेटलेली काडी यांच्यासारखेच आहे. कामजीवनाचे क्षणार्धात ‘होत्याचे नव्हते’ करणारी ‘वाद’ ही बाब पती-पत्नी नात्याचा अविभाज्य भाग आहे, ही गोष्ट वादातीत आहे. म्हणून ‘वाद’ परिस्थिती टाळता येत नसली तरी ती आटोक्यात आणणे ही एक कला असून प्रत्येक विवाहिताने ती मोठ्या कष्टाने आत्मसात केली पाहिजे. वादातील सिंहाचा वाटा नव्वद टक्के वादांना आपला जोडीदारच कारणीभूत असतो, असे एक ‘त्रिकालाबाधित सत्य’ प्रत्येक जण डोक्यात ठेवूनच वागत असतो. प्रत्येक वादप्रसंगात आपला ‘सिंहाचा वाटा’ असतो हे प्रत्येकानेच लक्षात ठेवले पाहिजे. वादामध्ये आपला वाटा ‘खारीचा वाटा’च राहील इतपत वागायचा प्रयत्न प्रत्येक नवरा-बायकोने केला पाहिजे. नाही तर प्रसिद्ध आंग्ल लेखक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी म्हटल्याप्रमाणे ‘आयुष्यातील खरा आनंद लग्नानंतरच कळला..पण तोवर वेळ निघून गेली होती!’ अशी मन:स्थिती होईल. …तर भडका उडणार नाही वरील उदाहरणाप्रमाणे काही वाद जरी ‘आ बैल मुझे मार’ अशा बेसावधपणे स्वनिर्मित असले तरी वाद होण्याचे मूळ कारण म्हणजे पती-पत्नींमध्ये असणारी मतभिन्नता. दोघेही वेगवेगळ्या वातावरणातून आपले विचार, आपली मते आणि आपल्या कल्पना घेऊनच विवाह-बंधनात अडकतात. थोडक्यात लग्न मुळातच दोन व्यक्तींचे नसून दोन व्यक्तिमत्त्वांचे असते आणि केवळ लग्नसंस्थेमुळे ही दोन वेगवेगळी व्यक्तिमत्त्वे एका छताखाली राहायला लागतात. पण आपल्यात मतभिन्नता असणारच हे गृहीत धरून जर दोघांनीही संवादाचा प्रयत्न केला तर वादाचा ‘भडका’ उडणार नाही किंवा तो कमीत कमी राहील. वादाचा भडका होण्याचे कारण केवळ मतभिन्नता नसून ‘आपली मते जोडीदारावर लादायचा होणारा प्रयत्न’ हे असते. ‘कान-बंद कला’ उपजत ‘ईगो’ प्रवृत्तीमुळे माणसाच्या मनात नेहमीच एक वाक्य असतं, ‘तू कोण मला शिकवणार. मला काही अक्कल नाही?’ आणि याचमुळे पती-पत्नी नात्यात कुठल्याही संवादामध्ये लगेचच बंडाची भिंत उभी राहते. या ‘ईगो-बंडा’मुळे कान बंद होतात आणि नात्यातील श्रवणशक्ती कमी होत जाते. काही नवऱ्यांना असे वाटते की, आदर्श नवरा तोच जो बायको बोलत असताना शांत राहून केवळ मान डोलावण्याचे काम करत असतो. आणि मग ते ‘कान-बंद कला’ आत्मसात करतात. परंतु विधायक, सकारात्मक वैवाहिक जीवनाला असे हानीकारक असते हे लक्षात ठेवा. कारण त्या वेळच्या स्थितीमधील स्फोटकता टाळली तरी जोडीदाराशी संवाद कलाच विकसित न केल्याने नातेच कच्चे राहत असते. आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हे टाळणेच जरुरीचे असते. (१३ एप्रिल २०१३ रोजी चतुरंग पुरवणीमध्ये प्रकाशित झालेला हा लेख पुनर्प्रकाशित करत आहोत.)
61 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Apr 25, 2025, 02:48 PM
15 वर्षांच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी वडिलांनी किडनी दान केली

15 वर्षांच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी वडिलांनी किडनी दान केली

उज्वल भालेकर/अमरावती: बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयातही अनेक गंभीर आजार पहायला मिळत आहे. एका १५ वर्षीय मुलीची किडनी फेल झाल्याने बापाच्या काळजाचा पाझर फुटला. आपल्या मुलींच्या पुढील आयुष्यासाठी बापाने आपली एक किडनी दान करत तिला नवे जीवनदान दिले आहे. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटीहॉस्पिटल) येथे शुक्रवारीही किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे. अमरावतीयेथील रहिवासी असलेली जानवी हरेश वैद्य (१५) ही मागील तीन महिन्यापासून किडनी आजाराने त्रस्त होती. त्यामुळे तिच्यावर डायलिसिस उपचार सुरु होते. कमी वयात तिला किडनीचा आजार झाल्याने तिच्या पुढील दीर्घकालीन आयुष्यासाठी किडनी प्रत्यारोपण हाच योग्य पर्याय असल्याची माहिती डॉक्टरांनी तिच्या वडीलांना दिली. तसेच डायलिसिस दरम्यान मुलीला होणारा त्रास लक्षात घेता लेकीसाठी वडील हरीश महादेवराव वैद्य (४८) यांच्या काळजाला पाझर फुटला आणि त्यांनी आपली एक किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. सुपर स्पेशालिटीहॉस्पिटलचेवैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नेफरोलॉजिस्ट डॉ. प्रणित काकडे, डॉ.नयन काकडे, युरो सर्जन डॉ.राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. राहुल घुले, डॉ. विशाल बाहेकर, बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. रोहित हातगावकर, डॉ. बाळकृष्ण बागवाले , डॉ. शितल सोळंके, डॉ. अश्विनी मडावी, डॉ. अंजू दामोदर, डॉ. विक्रांत कुळमेथे, डॉ. जयश्री पुसदेकर, डॉ. नाहीद, डॉ. उज्वल अभ्यंकर, डॉ. प्रियंका कांबळे यांनी ही किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली. अमरावती विभागात कमी वयातील किडनी प्रत्यारोपणाची ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. रुग्णालयातील ५२ वी शस्त्रक्रिया विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे २०१८ पासून किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरु करण्यात आली. मार्च २०२५ पर्यंत याठिकाणी ५१ किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागातील किडनी प्रत्यारोपण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल जागतिक आरोग्य दिनानिमित्त सुपरला प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. अशातचा आता रुग्णालयातील ५२ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया देखील यशस्वी करण्यात आली आहे.
46 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Apr 21, 2025, 02:55 PM
उन्हाळी सुरक्षा टिपाः उष्णतेशी संबंधित धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण करा

उन्हाळी सुरक्षा टिपाः उष्णतेशी संबंधित धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण करा

उन्हात अतिकष्टाची कामे करू नये. दारु, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नये. दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नये. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी. चप्पल न घालता अनवाणी उन्हात चालू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
23 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Apr 19, 2025, 03:46 PM
कुटुंबाने जखमी नातेवाईकांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले

कुटुंबाने जखमी नातेवाईकांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले

नातेवाईकांनी तात्काळ प्रथम गावातील ढाकेफळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.यास्मिन शहा यांनी तपासून पुढील उपचारासाठी बिडकीन रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.
64 shares
😐