Achira News Logo
Achira News
P
Pudhari
Mar 20, 2026, 09:52 AM
भारतीय तृतीयपंथीय मान्यता विधेयकामुळे एल. जी. बी. टी. क. + कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली

भारतीय तृतीयपंथीय मान्यता विधेयकामुळे एल. जी. बी. टी. क. + कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली

विधेयकात ‌‘ट्रान्सजेंडर व्यक्ती‌’ची व्याख्या संकुचित करण्यात आली आहे. इंटरसेक्स आणि ट्रान्स ओळखी एकत्र केल्याने अनेकांच्या स्वतंत्र ओळखी नाकारल्या जात आहेत. तसेच, स्व-ओळखीचा अधिकार काढून घेऊन केवळ हिजरा, किन्नर, अरावणी किंवा जोगती अशा विशिष्ट गटांनाच मान्यता देण्याचा प्रयत्न होत असल्याचे कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
73 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 09:35 AM
जागतिक इंधन-ऊर्जा संकटः सहा देशांनी इराणच्या होरमुझच्या सामुद्रधुनीतील अडथळ्याचा निषेध केला

जागतिक इंधन-ऊर्जा संकटः सहा देशांनी इराणच्या होरमुझच्या सामुद्रधुनीतील अडथळ्याचा निषेध केला

Todays Maharashtra Breaking News Live Updates in Marathi:अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना कूटनीतीने उत्तर देत, इराणने होर्मुझ सामुद्रधुनी रोखल्याने अनेक देशांमध्ये इंधन-ऊर्जासंकट निर्माण झालं आहे. याची गंभीर दखल घेऊन ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स आणि जपान हे सहा देश एकत्र आले असून त्यांनी इराणला तंबी दिली आहे. युद्धाच्या झळा कमी होण्याची चिन्हं नसताना, इस्रायलने अमेरिकेला युद्धात ओढल्याचा दावाबेंजामिन नेतन्याहूयांनी फेटाळून लावला आहे. या युद्धामुळे भारतात निर्माण झालेली एलपीजी टंचाई आणि गॅस सिलिंडरसाठी लागलेल्या रांगा काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र आहे. मात्र, व्यावसायिकांना सिलिंडरसाठी अजूनही आटापिटा करावा लागतोय. महाराष्ट्रात अशोक खरात लैंगिक छळ प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. त्याचे पडसाद विधिमंडळात उमटण्याची शक्यता आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातराज ठाकरेयांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारलाही टीकेचं लक्ष्य केल्यानं मनसे विरुद्ध भाजपा असा संघर्षही पाहायला मिळू शकतो. युद्ध आणि अमेरिकेतील अर्थकारण यामुळे कोसळलेला शेअर बाजार पुन्हा कधी आणि कसा सावरणार, याची काळजी गुंतवणूकरादांना आहे. दुसरीकडे, आयपीएलचे वारे वाहू लागले असून क्रिकेटचाहत्यांना रनसंग्रामाचे वेध लागले आहेत. या आणि अशा महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... LIVE जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव येथे काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. या गारपिटीचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला असून, एका शेतकऱ्याच्या तब्बल तीन एकर केसर आंबा बागेचे मोठे नुकसान झाले आहे. गारांच्या तडाख्यामुळे झाडांवरील बहुतांश आंबे खाली पडले असून, उरलेल्या फळांनाही गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण बाग होत्याची नव्हती झाल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्वतंत्र प्रभार असलेले केंद्रीय जयंत चौधरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. चौधरी यांच्या टीमकडून यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली. एका भारतीय मोबाईल क्रमांकावरून कॉल आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. Union MoS Jayant Chaudhary has received a death threat. Police have received a complaint from his team, and it is being examined. The threat call was made from an Indian number: Delhi Policepic.twitter.com/PG8ELpLqxi सातारा: जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत भाजपचे तोडफोडीचे राजकारण व 'ऑपरेशन लोटस' यशस्वी झाले. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिंदेसेनेचे ३५ चे बहुमत असतानाही भाजपाच्या तोडफोडीच्या राजकारणाने त्यांचा पराभव झाला. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष प्रिया शिंदे यांची आणि उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड झाली. विशेष म्हणजे प्रिया शिंदे या शिंदेसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. बीड जिल्ह्यातील अनेक भागांना अवकाळी गारपिटीचा जोरदार तडाखा बसला आहे. लिंबागणेश परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतातील कलिंगड, आंबा आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पोखरी घाट येथील शेतकरी दादासाहेब खिल्लारे यांच्या कलिंगड पिकाला सर्वाधिक फटका बसला असून, ऐन बहरात आलेले पीक पूर्णपणे वाया गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी जिल्हा परिषदेत आल्यानंतर केले आहे. या वक्तव्यामुळे भाजपला बाजूला ठेवून ही निवडणूक होणार असल्याची चर्चा साताऱ्यात रंगू लागली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अशोक खरात प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. रुपाली चाकणकर यांच्याविरोधात आता पक्षातीलच रुपाली पाटील ठोंबरे आक्रमक झाल्या आहेत. रुपाली पाटील ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर या फरार झाल्या असल्याचा दावा केला आहे. संपूर्ण राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा देण्यात आलेला असताना, धुळे शहरासह जिल्ह्यातही अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. साक्री तालुका आणि शिंदखेडा तालुक्यात गारपीट झाल्याने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या असून वादळी वाऱ्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके आडवी पडली आहेत. रुपाली चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. चाकणकर आणि खरात याचे आर्थिक संबंध होते. ईडीने चाकणकरांच्या उत्पन्न स्त्रोताची चौकशी केली पाहिजे. या प्रकरणात सहआरोपी करून चाकणकरांना अटक झाली पाहिजे. चाकणकरांच्या खरात याच्या गुन्ह्याची माहिती होती असा आरोप उद्धवसेनेच्या नेते सुषमा अंधारे यांनी केला आहे. सांगलीच्या खानापूर तालुक्यात झालेल्या गारपिटीचा फटका द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. तुफानी गारपिटीमुळे द्राक्षांचे घड अक्षरशः उध्वस्त झाले आहेत. भिवघाट, करंजे, बानूरगड, पळशीसह आसपासच्या गावांमध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. अशोक खरात प्रकरणावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. "गृहमंत्र्यांच्या बुडाखाली अंधार पसरलाय, वरपासून खालपर्यंत गृह विभागातील अधिकारी-कर्मचारी भोकं पाडून लुटायला बसलीत", असे सपकाळ म्हणाले. "देवेंद्र फडणवीस यांच्यातील गृहमंत्र्यांना आपल्या विभागावर वचक ठेवता येत नसेल तर त्यांनी रात्री अपरात्री हूडी घालून पोलिस स्टेशन्सच्या दौऱ्यावर निघायलाच हवे. हे वाचल्यानंतर हुडी घालून पंत दौऱ्यावर जाण्याचा विचार ही करतील कारण त्यांना आपल्या कलागुणांचा वापर करण्याची सवय आहेच. पण त्यांचेच हात या भ्रष्टाचारात जर बरबटलेले असले तर…? मुख्यमंत्री / गृहमंत्र्यांचीच जर या भ्रष्टाचारात टक्केवारी ठरली असेल तर भ्रष्टाचारमुक्त राज्य निर्माण करण्याची अपेक्षा तरी कोणाकडून ठेवायची?", असा सवाल सपकाळ यांनी केला आहे. जालना जिल्ह्यात काल ठिकठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. जिल्ह्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार काल दुपारनंतर ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला असून, जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दाभाडीसह धनसावंगी तालुक्यातील रांजणी या ठिकाणी गारांचा पाऊस झाला आहे. तर परतूर मंठा जालना शहरासह जाफराबाद तालुक्यात मुसळधार तर रिमझिम स्वरूपचा पाऊस पडला आहे. या पावसामुळे काढणीला आलेला गहू ज्वारी मका पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. "सर्वात आधी मी हे सांगू इच्छितो की, मी जिवंत आहे आणि तुम्ही सगळे यांचे साक्षीदार आहात. याचसोबत मी सर्व फेक न्यूज फेटाळून लावत आहे", असे विधान इस्रायल पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांनी केले. सोशल मीडियावर नेतन्याहू इराणच्या हल्ल्यात मारल्या गेल्याच्या चर्चा गेल्या आठवड्यात सुरू झाल्या होत्या. त्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या मृत्यूबद्दल सुरू झालेल्या चर्चांना उत्तर दिले. बीड जिल्ह्यात कालपासून अवकाळीने कहर केला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि गारांचा पाऊस. यामुळे फळबागा व शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.. बीड जिल्ह्यातील आष्टी, केज तालुक्यातील अनेक गावांमध्ये काल झालेल्या गारपिठीमुळे डोंगरदऱ्यामध्ये गारांचा खच पाहायला मिळत आहे.तब्बल दोन ते तीन इंच गारांचा खच पडल्याचे दिसून येत आहे. यांचे व्हिडिओ आता समोर आले आहेत. नाशिकमधील भोंदू अशोक खरात यांची कृत्ये समोर आल्यानतर राज्यात खळबळ उडाली आहे. विशेषतः रुपाली चाकणकर यांचे या खरातसोबत चांगले संबंध असल्याची चर्चा आहे. चाकणकर आणि खरात यांचे अनेक फोटो व्हायरल झाले असून, त्यातील काही फोटो शेअर करत अंजली दमानियांनी रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
2 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 09:33 AM
सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या माध्यमातून अपुऱ्या सुविधांसाठी महानगरपालिकेची नवी उमेद

सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या माध्यमातून अपुऱ्या सुविधांसाठी महानगरपालिकेची नवी उमेद

या प्रकल्पांच्या उभारणीसाठी लागणारा खर्च मोठा असल्याने अनेक सुविधा पूर्णत्वास जाण्यास पाच ते सहा वर्षांचा कालावधी लागत होता. शिवाय, या जागांवर कोणती सुविधा उभारावी, यासाठी नगरसेवकांकडून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षांत उभारलेल्या सुविधांवर झालेला खर्च आणि त्यावर आकारण्यात येणारे भाडे यामुळे अनेक ठिकाणी या सुविधा वापराविना पडून राहिल्या आहेत. काही ठिकाणी सामाजिक संस्थांना संयुक्त प्रकल्पांतर्गत या जागा देण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांवर वापराबाबत निर्बंधही आले आहेत. परिणामी, कोट्यवधींचा खर्च करून उभारलेल्या सुविधा महापालिकेसाठी आर्थिक बोजा ठरत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सुमारे पाच वर्षांपूर्वी ‌‘ॲमेनिटी स्पेस‌’चा पीपीपी तत्त्वावर विकास करण्याचा प्रस्ताव प्रशासन आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी पुढे आणला होता. मात्र, 2008 च्या जागावाटप नियमावलीत अशा प्रकारच्या विकासाला परवानगी नसल्याने ती योजना विरोधामुळे अमलात येऊ शकली नाही. आता 2023 मध्ये नियमावलीत करण्यात आलेल्या बदलामुळे पीपीपी तत्त्वावर विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार, प्रत्येक जागेच्या स्वरूपानुसार कोणत्या सुविधा विकसित कराव्यात, याचे नियोजन करून सल्लागाराच्या मदतीने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
91 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 08:54 AM
ज्योतिषीवरील बलात्काराच्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने घेतली बचावात्मक भूमिका

ज्योतिषीवरील बलात्काराच्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने घेतली बचावात्मक भूमिका

Praful Patle on Ashok Kharat:नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील अंकशास्त्रज्ञ आणि स्वयंघोषित ज्योतिषीअशोक खरातयाच्यावर बलात्काराचे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षारुपाली चाकणकरयांचे नाव वारंवार समोर येत असल्याने आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही बचावात्मक पाऊल उचलले आहे. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी या प्रकरणी कारवाई करण्याचे संकेत दिल्याने चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अशोक खरातयाने आपल्या कार्यालयात अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. दरम्यान, सोशल मीडियावर खरात आणिरुपाली चाकणकरयांचे काही व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये चाकणकर या खरातचे पाद्यपूजन करताना, त्याच्या पाया पडताना आणि त्याच्यावर छत्री धरताना दिसत आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा एका भोंदू बाबासमोर अशा प्रकारे नतमस्तक झाल्याने विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. प्रफुल पटेलांची रोखठोक भूमिका वाढत्या दबावानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. "अशोक खरातने जे काही केले आहे, ते अतिशय निंदनीय आणि घाणेरडे आहे. यावर सक्त कारवाई केली पाहिजे. या प्रकरणात ज्या ज्या राजकीय व्यक्तींची नावे जोडली गेली आहेत, त्या सर्वांची सखोल चौकशी केली जाईल. केवळ खरातवरच नाही, तर त्याच्याशी संबंधित असलेल्यांवरही सक्तीने कारवाई होणे गरजेचे आहे," असेप्रफुल्ल पटेलम्हणाले. ज्या राजकीय लोकांचे नाव त्याच्याशी जोडलं आहे त्यावर आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार, असेही पटेल म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे, येत्या एक-दोन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यावर मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. आम्ही पक्ष म्हणून योग्य ती पावले उचलू, असे सांगत पटेलांनी अप्रत्यक्षपणे रुपाली चाकणकर यांच्या पदाबाबत सूचक विधान केले आहे. फोटोंवरुन संबंध जोडणे हे योग्य नाही. कारण अनेक मान्यवरांचे फोटो आहेत. सार्वजनिक जीवनात अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो, असेही पटेल यांनी म्हटलं. अशोक खरात राजकारण्यांचा आवडता ज्योतिषी? नाशिकचा हा भोंदू बाबा केवळ सामान्य महिलांनाच नव्हे, तर राज्यातील अनेक बड्या राजकीय हस्तींनाही आपल्या जाळ्यात ओढून बसला होता. ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली मंत्र-मंत्राचे सल्ले देण्यासाठी अनेक मोठे नेते त्याच्याकडे जात असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, नाशिक पोलिसांनी खरातला बेड्या ठोकल्या असून त्याच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे, रुपाली चाकणकर यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
80 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 08:20 AM
जादूटोणा प्रकरणाशी पवारांचा संबंध असल्याचा महाराष्ट्र आमदाराचा दावा

जादूटोणा प्रकरणाशी पवारांचा संबंध असल्याचा महाराष्ट्र आमदाराचा दावा

पुणे - अजितदादांच्या बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदूबाबाने जादूटोणा केला तर मग या भोंदूबाबाबाला भोंदूगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांचा या राक्षसी महत्त्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? असा थेट प्रश्न आमदाररोहित पवारयांनी उपस्थित केला आहे.अजित पवारयांच्या विमान अपघाताशी संबंधित कनेक्शन नाशिकच्या भोंदूबाबाशी जोडणारा दावा आमदारअमोल मिटकरीयांनी केला. मिटकरींच्या या दाव्यावरूनरोहित पवारांनीहीप्रश्न उपस्थित केले आहेत. आमदार रोहित पवार म्हणाले की, पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात भोंदूगिरीला स्थानही नाही आणि त्यावर कोणाचा विश्वासही नाही. परंतु आमदारअमोल मिटकरीम्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाच्या बाहेर केलेला जादूटोणा तसेच देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदूबाबाबाच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याची समोर येत असलेली माहिती बघता हे प्रकरण खूपच भयंकर दिसते असं त्यांनी म्हटलं. तसेच या काळात अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले?, २७ जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरिवर आले होते का? याचा तपास होणे गरजेचे आहे. सुनेत्राकाकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण आजचं बेभरवशी राजकारण चांगलं राहिलेलं नाही असा सल्लाही रोहित पवार यांनी दिला आहे. काय म्हणाले होते अमोल मिटकरी? १८, १९ आणि २० नोव्हेंबर २०२५ रोजी शिवरात्री, अमावस्या होती. याच काळातअजित पवारांच्याबारामती येथील सहयोग सोसायटीबाहेर भिगवण रोडला अघोरी पूजेचा प्रकार केला गेला. लिंगपिसाट भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या शिवलिका आश्रम हा भगवान शंकराच्या पूजेचा आहे. या आश्रमात अघोरी पूजा व्हायची असा दावा आमदार मिटकरी यांनी केला. या पूजेत लिंबू पुजले होते, कुंकू हळद होते. कुणाच्या तरी सांगण्यावरून हा अघोरी प्रकार केला गेला होता का? आता व्हीएसआर विमानासोबत या बाबाचे फोटो पाहता त्याचे या कंपनीच्या मालकासोबत राजकीय कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणात एसआयटी असेल सीआयडी असेल त्यांनी या भोंदूबाबाचे २६ ते ३१ जानेवारीपर्यंतचे कॉल डिटेल्स काढावेत. हा कुणाच्या संपर्कात होता हे शोधावे अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे.
73 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 08:13 AM
जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या निवडीस भाजप अपयशी ठरल्याबद्दल शिवसेना नेत्यांचा निषेध

जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या निवडीस भाजप अपयशी ठरल्याबद्दल शिवसेना नेत्यांचा निषेध

मुंबई : काहीजिल्हा परिषदांच्याअध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत भाजपने डावलले. इतर पक्षांशी घरोबा करत युतीधर्म पाळला नाही, अशा तक्रारी त्या-त्या ठिकाणच्या शिंदेसेनेच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेसेनेचे ४ सदस्य फोडून भाजपने सत्ता स्थापन केली. परभणीमध्ये भाजप-शिंदेसेनेने एकत्र येऊन अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडण्याचे निश्चित केले होते. मात्र नंतर शिंदेसेना, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी अशी युती होणार अशी शक्यता गृहीत धरून भाजपने आ. राजेश विटेकर यांच्या भावाला उपाध्यक्षपद देऊन राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. भाजपचा अध्यक्ष, राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष तर शिंदेसेनेचा पंचायत समितीत सभापती करू, असे सांगण्यात आले. मात्र फसवणूक झाली, असे त्यांनी सांगितले.
73 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 20, 2026, 08:12 AM
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय

सुधीर पाटील, सातारा:सातारा जिल्हा परिषदेवर अखेर भाजपचा भगवा फडकला आहे. अवघ्या एका मताने प्रिया शिंदे अध्यक्षपदी आणि राजू भोसले उपाध्यक्षपदी निवडून आले. विशेष म्हणजे नवनिर्वाचित अध्यक्षा प्रिया शिंदे या शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत. दरम्यान ही निवडणूक प्रचंड तणाव आणि पोलीस बंदोबस्तात झाली. जिल्ह्यातील सर्वच मातब्बर नेत्यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. यात अखेर भाजपला यश आलं असून राष्ट्रवादी आणि शिवसेनेला पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला असला तरी जिल्हा परिषद आवारात अजूनही गोंधळ सुरू असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही सदस्यांना मतदान न करू दिल्याचा आरोप केला जात असून मंत्री शंभूराज देसाई जिल्हा परिषद इमारतीत तळ ठोकून असल्याचे समजते.अध्यक्षपदाच्या निवडीच्या आदल्या रात्रीजिल्हा परिषद सदस्यांच्याअपहरणासंदर्भात तक्रारी दाखल झाल्या. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या सदस्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस आले होते. ते सदस्य सभागृहात हजर राहू शकले नसते तर भाजपाला सहज विजय मिळवणे शक्य झाले असते. अशावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई आक्रमक झाले. त्यांनी सायरन लावून आपल्या गाडीतून सदस्यांना थेट जिल्हा परिषदेच्या आवारात आणले.जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या उमेदवार प्रिया शिंदे यांना 33 तर मनीषा फडतरे यांना 32 मते मिळाली. अवघ्या एका मताने त्या विजयी झाल्या. उपाध्यक्षपदाचे उमेदवार राजू भोसले यांनाही 33 मते मिळाली. निवडीच्या वेळी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे झाडून सगळे नेते जिल्हा परिषदेत दाखल झाले होते.भाजपविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र निवडणूक रिंगणात उतरली. राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदासाठी मनीषा फडतरे तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या अशोक पाटील यांनी अर्ज दाखल केले होते. त्यांचा एका मताने पराभव झाला. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने महायुतीत सत्ता संघर्ष निर्माण झाला. तसेच नेत्यांमधील संबंध देखील ताणले गेले आहेत.
16 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 08:01 AM
इराणसोबतचा अमेरिका-इस्रायल संघर्ष अविरत सुरूः जागतिक परिणाम आणि खोटे दावे

इराणसोबतचा अमेरिका-इस्रायल संघर्ष अविरत सुरूः जागतिक परिणाम आणि खोटे दावे

America Israel Iran War:अमेरिकाइस्रायलआणिइराणयांच्यातील युद्ध अद्यापही सुरूच आहे. कोणताही देश माघार घेण्यास तयार नाही. या युद्धामुळे जगातील अनेक देशांना मोठा फटका बसला असून, अनेक बाबतीत नुकसान सोसावे लागत आहे. भारतालाही या युद्धाची झळ बसली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धाबाबत अनेक दावे केले आहेत. पंरतु, त्यापैकी बहुतांश दावे फोल ठरत असल्याचे पाहायला मिळत आहेत. अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनीइराणयुद्धात विजय मिळवल्याचा दावा करत इराणचे नेतृत्व आता संपले असल्याचा दावा केला होता.इस्रायलचेपंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही युद्धात विजय मिळवल्याचा दावा केला होता. तसेच आता कोणतीही बॅलिस्टिक क्षेपणास्त्र क्षमता शिल्लक राहिलेली नाही, असेही म्हटले होते. यातच क्षेपणास्त्र निर्मिती क्षमता नष्ट केल्याच्याअमेरिकाआणि इस्रायलच्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर इराणने मोठा इशारा दिला आहे. क्षेपणास्त्रांची कोणतीही कमतरता नाही इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने असा दावा केला आहे की, युद्धाच्या काळातही क्षेपणास्त्रांचे उत्पादन अव्याहतपणे सुरू आहे. त्यांच्याकडे क्षेपणास्त्रांची कमतरता नाही. क्षेपणास्त्रांचे उत्पादन वेगाने होत आहे. याकडे, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना दिलेले प्रत्युत्तर म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान, इस्रायलने इराणच्या पार्स गॅस क्षेत्रावर हल्ला केला. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कतारपासून बहरीनपर्यंतच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर प्रतिहल्ले केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या गॅस क्षेत्रावरील हल्ल्याची माहिती नसल्याचे सांगत, नेतान्याहू यांना याची पुनरावृत्ती न करण्याचे आवाहन केले होते.
17 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 08:00 AM
तंत्र-मंत्र आणि अघोरी कायद्यांच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांवर शिवसेना नेत्याचा आरोप

तंत्र-मंत्र आणि अघोरी कायद्यांच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांवर शिवसेना नेत्याचा आरोप

Sushma Andhare On Rupali Chakankar Ashok Kharat Case:कॅप्टनअशोक खरातबलात्कार प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे. आता या प्रकरणात समोर आलेल्या एका खुलाशामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेना (ठाकरे गट) नेत्यासुषमा अंधारेयांनी थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षारुपाली चाकणकरयांच्यावर तंत्र-मंत्र आणि अघोरी कृत्यांमध्ये सामील असल्याचा गंभीर आरोप केला आहे. 'त्या' बोटाला बँडेज कशासाठी? अंधारेंनी दाखवले फोटो सुषमा अंधारेयांनी पत्रकार परिषदेतरुपाली चाकणकरयांचे काही फोटो दाखवे, ज्यात त्यांच्या हाताच्या अनामिका (रिंग फिंगर) बोटाला बँडेज बांधलेले दिसत आहे. अंधारे यांच्या दाव्यानुसार, चाकणकर या स्वतः अघोरी विद्या करतात. एका पीडितेचा हवाला देत अंधारे यांनी सोमवती अमावस्येला रुपाली चाकणकर यांनी अघोरी विद्या केल्याचा आरोप केला. काय आहे 'अनामिका' कापण्यामागचे गूढ? "रुपाली चाकणकरांनी सुरुवातीला सांगितले की आमचा काही संबंध नाही. पण खरातच्या घरगुती कार्यांमध्ये चाकणकर होत्या. खरात आणि चाकणकर यांचे आर्थिक संबंध आहेत. एका पीडितेने सांगितले की, रुपाली चाकणकर या स्वतःत तंत्र मंत्र करायच्या. त्यांनी अक्षरक्षः अनामिका (रिंग फिंगर) कापली. हे काय प्रकरण आहे हे कळलं नसल्याने मी याची माहिती काढली. तंत्र मंत्र विद्येमध्ये अनामिका महत्त्वाची असते. कारण ती सूर्य आणि सूर्य आणि शुक्र ग्रहपासून ऊर्जा वहनासाठी मुख्य केंद्र आहे. या बोटाचा वापर प्रामुख्याने मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी, विशिष्ट मुद्रा करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला वश करण्यासाठी केला जातो. या बोटाद्वारे ऊर्जा शरीरात प्रवाहित किंवा शोषित केली जाऊ शकते. तंत्रमंत्र विद्येच्याच लोकांनी सांगितल्यानुसार हे बोट सूर्य म्हणजे यश आणि शुक्र याच्याशी जोडलेले आहे. ज्यामुळे मंत्रोच्चाराद्वारे एखाद्याला आकर्षित करणे आणि यश प्राप्त करणे असा हा या विद्येचा अर्थ आहे," असा खुलासा सुषमा अंधारे यांनी केला. "त्यांनी सांगितले की हे सोमवती अमावस्येला करतात. १२ सप्टेंबर २०२४ च्या फोटोमध्ये चाकणकरांच्या अनामिकेला मोठं बँडेज दिसत आहे. ९ सप्टेंबरच्या फोटोतही त्या एका कार्यक्रमात बोलताना दिसतात जिथंही बँडेज दिसतं. मग हे सगळं शोधल्यावर लक्षात आलं की २ सप्टेंबर २०२४ ला सोमवती अमावस्या होती. ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलं आहे त्या बाई सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वत:ची अनामिका कापून अशा प्रकारची तंत्रमंत्र करतात असं पीडित महिलेला सांगतात, ही जखम किती मोठी असू शकते याचा अंदाज फोटो पाहून लक्षात येतं, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या. भोंदू बाबाशी लागेबांधे? कॅप्टनअशोक खरातचालवत असलेल्या संस्थेत रुपाली चाकणकर या केवळ सदस्यच नव्हत्या, तर त्या खरातच्या समोर अक्षरशः लोटांगण घालत होत्या, असा दावाही अंधारेंकडून करण्यात आला . "एकीकडे महिलांच्या हक्कासाठी लढणारे घटनात्मक पद आणि दुसरीकडे अघोरी विद्येचा वापर, हे महाराष्ट्रासाठी घातक आहे," असेही अंधारे म्हणाल्या.
77 shares
😢
L
Lokmat
Mar 20, 2026, 07:52 AM
बलात्कार प्रकरणातील वादाच्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी अशोक खरातियावर गंभीर आरोप केले आहेत.

बलात्कार प्रकरणातील वादाच्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी अशोक खरातियावर गंभीर आरोप केले आहेत.

पुणे:स्वयंघोषित ज्योतिषी आणि बलात्कार प्रकरणातील आरोपीअशोक खरातयाच्याशी संबंधित प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून,सुषमा अंधारेयांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना अनेक गंभीर आरोप केले. अंधारे यांनी दावा केला की, आरोपीअशोक खरातयांच्या ट्रस्टशी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा संबंध असल्याचे पुरावे त्यांच्या हाती आहेत.माध्यमांशी बोलतानासुषमा अंधारेयांनी खालील मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडली, रूपाली चाकणकर यांना तात्काळ अटक करण्यात यावी त्यांची नार्को टेस्ट घेण्यात यावी. दोघांना समोरासमोर बसवून चौकशी करावी चौकशीपूर्वी चाकणकर यांना पदावरून बाजूला करावे.. त्या फरार होण्यापूर्वी कारवाई व्हावी त्या पुढे म्हणाल्या, चाकणकर आणि खरात यांचे CDR (Call Detail Records) तपासावेत. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीनेही तपास करावा दोघांच्या संपत्तीचे स्त्रोत तपासावेत, विशेषतः खरात यांची देश-विदेशातील मालमत्तेची चौकशी व्हावी.पत्रकार परिषदेत पुढे बोलतांना अंधारे यांनी आरोपही केला की,रूपाली चाकणकर या त्यांच्या राजकीय प्रभावाचा वापर करून तपासावर परिणाम करू शकतात. तसेच, त्या सध्या कुठे आहेत याबाबतही शंका उपस्थित करत त्यांनी त्या महाराष्ट्रात आहेत की बाहेर, याची चौकशी करण्याची मागणी केली. अंधारे यांनी स्पष्ट केले की,या प्रकरणात कुणीही दोषी असेल, तो आमच्या पक्षाचा असला तरी कारवाई व्हावी. त्यांनी जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांची नावे घेतली, मात्र त्यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचेही सांगितले.
79 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 07:51 AM
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची'ऑपरेशन लोटस'यशस्वी

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची'ऑपरेशन लोटस'यशस्वी

सातारा:जिल्हा परिषदअध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत भाजपचे तोडफोडीचे राजकारण व 'ऑपरेशन लोटस' यशस्वी झाले. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिंदेसेनेचे ३५ चे बहुमत असतानाहीभाजपाच्याफोडाफोडीच्या राजकारणाने त्यांचा पराभव झाला. साताराजिल्हा परिषदअध्यक्षपदी भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष प्रिया शिंदे यांची आणि उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड झाली. विशेष म्हणजे प्रिया शिंदे या शिंदेसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. गेल्या महिनाभरापासून प्रतीक्षेत असलेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडी गुरुवारी होणार असल्याने जिल्हा परिषद परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. सर्व सदस्यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत जिल्हा परिषदेत आणण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. सातारा जिल्हा परिषद सत्तेसाठी भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत जोरदार फील्डिंग लावली होती. तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपापसातील समन्वय कायम ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण, यामध्येभाजपानेमोठे यश मिळवले आहे.
57 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 07:43 AM
भारताने विक्रम दोराईस्वामी यांची चीनमधील नवीन राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे.

भारताने विक्रम दोराईस्वामी यांची चीनमधील नवीन राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे.

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील मुद्द्यांवरून निर्माण झालेल्या तणावानंतर दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा सुधारण्याच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर, विक्रम दोराईस्वामी यांचीचीनमधीलभारताचेनवे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १९९२ च्या तुकडीचेभारतीयपरराष्ट्र सेवा अधिकारी असलेले दोराईस्वामी सध्या ब्रिटनमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून कार्यरत आहेत. ते आताचीनमध्येप्रदीप कुमार रावत यांची जागा घेणार आहेत. दोराईस्वामी यांना मँडरिन, फ्रेंच आणि काही प्रमाणात कोरियन भाषा अवगत आहे. विक्रम दोराईस्वामी हे दिल्ली विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आयएफएसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी एक वर्ष पत्रकार म्हणून काम केले. पंतप्रधानांचे खासगी सचिव म्हणूनही काम पाहिलेदिल्लीतील सेवाकालीन प्रशिक्षणानंतर (१९९२-१९९३), मे १९९४ मध्ये त्यांची हाँगकाँग येथे नियुक्ती झाली. तेथे त्यांनी चिनी भाषेचा डिप्लोमा पूर्ण केला. सप्टेंबर १९९६ मध्ये चार वर्षांच्या कार्यकाळासाठी बीजिंग येथे बदली झाली. त्यांनी पंतप्रधानांचे खासगी सचिव तसेच अन्य महत्त्वाच्या पदावर काम केले.
78 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 07:40 AM
बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींनी जाहीर केली उमेदवारांची दुसरी यादी

बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींनी जाहीर केली उमेदवारांची दुसरी यादी

कोलकाता : प. बंगालमध्ये राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी ५० हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यावरून मुख्यमंत्रीममता बॅनर्जीयांनी उच्च स्तरावरून होत असलेला हा राजकीय हस्तक्षेप असल्याची टीका केली. कोणतीही पूर्वसूचना न देता या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी इच्छुक -पक्षश्रेष्ठींनी परवानगी दिल्यास बहरामपूरमधून निवडणूक लढवण्यास आपण तयार आहोत, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे. सुवेंदूंचा प्रचारास प्रारंभविरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी गुरुवारी दक्षिण कोलकातामधील अत्यंत चुरशीच्या भवानीपूर मतदारसंघात भाजपच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. या जागेवर त्यांची लढत मुख्यमंत्रीममता बॅनर्जीयांच्याशी होत आहे. त्यांनी येथे एक सभाही घेतली. भाजपची दुसरी यादी जाहीरभाजपने राज्य विधानसभेसाठी १११ उमेदवारांची दुसरी यादी गुरुवारी जाहीर केली. यात महाभारतात द्रौपदीची भूमिका करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री रूपा गांगुली यांच्या नावाचा समावेश आहे. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या लहान बंधूंनाही उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात अत्याचार व हत्या झालेल्या पीडितेच्या मातेने भाजपकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. २४-परगणा जिल्ह्यात पनिवाटी मतदारसंघातून त्यांना तिकीट दिले जाऊ शकते. हा मतदारसंघ भाजपसाठी महत्त्वाचा आहे.
56 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 07:38 AM
केरळच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीला शशी थरूर यांचा नकार

केरळच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीला शशी थरूर यांचा नकार

नवी दिल्ली : “काँग्रेसकडूनकेरळच्यामुख्यमंत्रिपदाचा मी संभाव्य दावेदार नाही,” अशी स्पष्टोक्ती पक्षाचे ज्येष्ठ नेतेशशी थरूरयांनी गुरुवारी दिली. मुख्यमंत्री आदर्श पद्धतीने निवडून आलेल्या आमदारांतून निवडले गेले पाहिजेत, असे त्यांनी म्हटले आहे.वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत थरूर यांनी आपण निवडणूक लढवत नसल्याचे स्पष्ट करून राज्याच्या काेनाकोपऱ्यात जाऊन प्रचार करण्यासाठी आपण आतुर आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.काँग्रेसच्यानेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडी ८५ ते १०० जागा मिळवू शकली तर उत्तमच, असेही त्यांनी नमूद केले. ‘पक्षचिन्ह महत्त्वाचे’निवडणूक जवळ येत जाईल तसा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जनतेसमोर आणणे योग्य राहील, असे थरूर म्हणाले. एखाद्या नावाऐवजीकेरळमध्येएक भूमिका, मिशन हाती घेऊन पक्षचिन्हाच्या आधारे काँग्रेस अधिक चांगले निकालदेऊ शकेल, असा दावाही त्यांनी केला. तर पक्षाने उमेदवार निवडीसंबंधी सर्व मुद्दे निकाली काढले असल्याचा दावा पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही. डी. सतीशन यांनी केला.भाजपची दुसरी यादी गुरुवारी भाजपने केरळमध्ये ३९ उमेदवारांची आपली दुसरी यादी जाहीर केली आहे.
95 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 07:18 AM
अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करण्यामागील तर्कावर नगरसेवकाचे प्रश्न

अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करण्यामागील तर्कावर नगरसेवकाचे प्रश्न

अनधिकृतपणे रस्ते अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करावी, ही भूमिका नगरसेवकांनी प्रत्येक वेळेस का घ्यावी? अतिक्रमण विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारवाई करावी असे का वाटत नाही? असा सवाल मीनाक्षी शिंदे यांनी उपस्थित केला. तर, अमित सरय्या यांनी प्रभाग क्रमांक 15 मधील मंगळवारच्या मार्केटमुळे नागरिकांना होणाऱ्या समस्येचा पाढा वाचला.
38 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 07:05 AM
पुराच्या मैदानातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची महानगरपालिकेची घोषणा

पुराच्या मैदानातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची महानगरपालिकेची घोषणा

नदीच्या निळ्या व लाल पुररेषेतील अनधिकृत बांधकामांचे महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयनिहाय सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार शहरात नद्याच्या पात्रालगत व पूररेषेत निवासी, व्यावसायिक बांधकामे असे एकूण 2 हजार 917 बांधकामे आढळून आली आहेत. त्यामध्ये निवासी 1 हजार 508, व्यावसायिक 1 हजार 382 आणि इतर 27 अशी बांधकामे आहेत. आता त्या आकडेवारीत मोठी भर पडली आहे. त्या सर्व बांधकामाना नोटीस देऊनही राजकीय दबावामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालिन आयुक्त शेखर सिंह यांनी कारवाई थांबवली. त्यानंतर महापालिका निवडणुकही झाली. मात्र, प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने पूर रेषेत बांधकामे व पत्राशेड जोरात सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. महापालिकेचे नवे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहरातील कोणत्याही अनधिकृत बांधकामांना थारा देणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्याबाबत क्षेत्रीय अधिकार्यांना जबाबदार धरणार असे, त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आयुक्तांच्या काळात तरी शहरातील अनधिकृत बांधकामांना लगाम बसतो का, नियमितपणे कुदळवाडीप्रमाणे कारवाई होते का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
21 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 20, 2026, 06:47 AM
कतारवर इराणचा हल्लाः मध्यपूर्वेतील संघर्षामुळे ऊर्जा उत्पादनावर परिणाम

कतारवर इराणचा हल्लाः मध्यपूर्वेतील संघर्षामुळे ऊर्जा उत्पादनावर परिणाम

Iran Strike on Qatar:तुम्ही ऐकलं असेलच की दोंघांच्या भांडणात तिसऱ्याने हस्तक्षेप करू नये, पण कदाचित कतारने ही म्हण ऐकली नाही. म्हणून इराण आणि अमेरिका-इस्रायलच्या संघर्षात कतारची कोंडी होताना दिसत असून तिसरा पक्ष - कतार - ने स्वतःचेच मोठे नुकसान करून घेतले आहे. मध्यपूर्वेतील युद्धामुळे कोणाला सर्वाधिक फटका बसला असेल, तर तो कतारलाच.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपल्या व्हाईट हाऊसमध्ये बसून इस्रायलच्या खांद्यावर हात ठेवून बंदूक चालवत आहेत. पण प्रत्यक्षात खरं नुकसान कतारचेच झाले आहे, ज्याच्या ऊर्जा उत्पादनालाइराणमुळे सर्वात मोठा फटका बसलाआहे. परिस्थिती अशी आहे की या धक्क्यामुळे कतारला पुढील काही दिवस वार्षिक सुमारे 2 लाख कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागेल, ज्याचा सर्वात मोठा परिणाम भारतावरही दिसून येईल.Stock Market: मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजाराचे दणक्यात ‘कमबॅक’, युद्ध सुरुच तरीही आठवड्याच्या शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांना दिलासाइराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा कतारला फटकाइराणच्या अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या तणावात सर्वाधिक फटका आखाती देशांना, विशेषतः कतारला बसला आहे. इराणने अमेरिकेच्या सर्व मित्र राष्ट्रांवर हल्ल्यांची मालिका सुरू केली ज्याचा सर्वाधिक फटका कतारच्या गॅस उत्पादनाला बसला आहे. अलीकडेच बुधवारी, इराणने कतारचे 17% गॅस उत्पादन नष्ट केले ज्यामुळे पुढील पाच वर्षांसाठी कतारला दरवर्षी 2 ट्रिलियन रुपयांचे नुकसान सोसावे लागू शकते असा अंदाज आहे.युद्ध सुरू झाल्यापासून इराण अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर क्षेपणास्त्रे डागत असून आतापर्यंत संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, कतार आणि कुवेत यांसह सर्व आखाती देशांना लक्ष्य केले आहे पण, सर्वाधिक नुकसान मात्र कतारचे झाले आहे. इराणने अलीकडेचकतारच्या एलएनजी उत्पादनाला लक्ष्यकेले ज्यामध्ये 17% गॅस उत्पादन नष्ट झालं आणि आता दरवर्षी निर्यातीत 20 अब्ज डॉलर्स किंवा अंदाजे 1.85 लाख कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागण्याचा अंदाज आहे.Gold Silver Rate 20th March 2026: एका दिवसात दर बदलले; चांदी तब्बल 7,000 रुपयांनी महाग; सोन्याच्या किमतीतही वाढकतारला इतकं नुकसान कसं झालंइराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे कतारचे रास लाफान औद्योगिक शहरातील एनर्जी ट्रेन 4 आणि 6 नष्ट झाले. कतार या दोन ट्रेनमधून वार्षिक 12.8 लाख टन गॅसचे उत्पादन करायचा, जे कतारच्या एकूण गॅस उत्पादनाच्या अंदाजे 17% होते. अशाप्रकारे, इराणच्या हल्ल्यानंतर आता त्यांची उत्पादन क्षमता पुन्हा सुरू करण्यासाठी अंदाजे पाच वर्षे लागू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.यादरम्यान कतारने आधीच आपलं एलपीजी उत्पादन थांबवलं आहे आणि गॅस प्लांटच्या विध्वंसामुळे नुकसानीत आणखी भर पडली असून कतारकडून गॅस खरेदी करणाऱ्या सर्व देशांवरही, विशेषतः भारतावर दूरगामी परिणाम होणे अपेक्षित आहे जो आपल्या एकूण एलपीजी वापरापैकी 60 टक्के आयात करतो आणि यापैकी 60 टक्क्यांहून अधिक आयात एकट्या कतारमधून केली जाते.
1 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 06:44 AM
विमान अपघाताचा संबंध महिलांच्या गॉडफादरशी असल्याचा भारतीय राजकारणाचा दावा

विमान अपघाताचा संबंध महिलांच्या गॉडफादरशी असल्याचा भारतीय राजकारणाचा दावा

अकोला - नाशिकच्या भोंदूबाबा प्रकरणानं राज्यात खळबळ उडाली आहे. महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या या भोंदूबाबाचे राजकीय कनेक्शन समोर आले आहेत. त्यानंतर आताअजित पवारांच्याविमान अपघाताशी याचे कनेक्शन आहे का असा थेट सवाल करत आमदारअमोल मिटकरीयांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. दादांच्या विमान अपघाताच्या १ महिनापूर्वी अघोरी पूजेचा प्रकार त्यांच्या बंगल्याबाहेर करण्यात आला होता असं मिटकरींनी म्हटलं आहे. आमदारअमोल मिटकरीयांनी म्हटलं की, नाशिकच्या कॅप्टन खरातचे व्हीएसआर कंपनीशी संबंधित फोटो समोर आलेत. हा नराधम, भामटा बाबा होता. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ हाती लागतेल. राजकीय लोकांचा गॉडफादर, नेत्यांचा सल्लागार असलेला हा बाबा होता. त्याचे कृत्य जनतेसमोर आले आहे. २८ जानेवारीला राज्याचे उपमुख्यमंत्रीअजित पवारयांचा विमान अपघात झाला. ज्या VSR कंपनीच्या विमानाचा अपघात झाला त्याच्याशी भोंदूबाबाचे कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. VSR कंपनीच्या नादुरुस्त विमानात बसण्याचा सल्ला कदाचित या भोंदूबाबाने दिला असावा हे नाकारता येत नाही. हा अध्यात्मातील नव्हे राजकीय बाबा होता. राजकारणात यश मिळण्यासाठी बळी घेण्याचा सल्ला दिला असेल. अजितदादा अघोरी प्रथांपासून दूर असायचे. पवार कुटुंबातील कुणीही यावर विश्वास ठेवत नाही. परंतु विमान अपघाताच्या १ महिन्यापूर्वी मुंबईतील देवगिरी, बारामतीतील सहयोग बंगल्याबाहेर अघोरी पूजेचा प्रकार आढळला होता असा आरोप त्यांनी केला. तसेच या पूजेत लिंबू पुजले होते, कुंकू हळद होते. कुणाच्या तरी सांगण्यावरून हा अघोरी प्रकार केला गेला होता का? आता व्हीएसआर विमानासोबत या बाबाचे फोटो पाहता त्याचे या कंपनीच्या मालकासोबत राजकीय कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणात एसआयटी असेल सीआयडी असेल त्यांनी या भोंदूबाबाचे २६ ते ३१ जानेवारीपर्यंतचे कॉल डिटेल्स काढावेत. हा कुणाच्या संपर्कात होता. अजित पवार बायरोड बारामतीला जाणार होते, परंतु त्यांना विमानाने जायला लावा असं या बाबाने कुणाला सांगितले का? व्ही.के सिंगला सांगून नादुरुस्त विमानाने अजित पवारांना जायला भाग पाडले का? अशी शंकाही मिटकरी यांनी उपस्थित केली. दरम्यान, विमानात इंधनाचा साठा होताच परंतु आणखी काही विषारी द्रव्ये भरले होते असं आम्हाला कळते. त्यामुळे जेव्हा हे विमान लँडिग होत होते तेव्हा हे विषारी द्रव्ये सोडले गेले असावे. त्यामुळे विमानातील पायलट, क्रू मेंबर्स आणि इतर प्रवासी बेशुद्ध पडले असावेत त्यानंतर विमानाचा अपघात होऊन त्याचा स्फोट झाला. ही शक्यताही नाकारता येत नाही. विषारी वायूचा प्रयोग केला गेला आहे का? VSR कंपनीवर एफआयआर घेतला नाही. त्या कंपनीच्या मालकाला अटक झाली नाही. त्यामुळे या अपघाताचे धागेदोरे नाशिकच्या आश्रमापर्यंत येऊन पोहचतात. या भोंदूबाबाचे कॉल डिटेल्स काढले पाहिजे. अजित पवारांच्या विमानाचा अपघात की घातपात त्याचे उत्तर नाशिकच्या खरात प्रकरणात दडलेले असेल असा दावा अमोल मिटकरी यांनी केला. अधिवेशनात मुद्दा मांडणार नाशिकचा बाबा कुणाच्या मर्जीतला होता, बाबाच्या मर्जीतल्या भक्तांची वेगळी डायरी असेल. हे भक्त कोण हे शोधले पाहिजे. बाबाच्या मर्जीतला व्यक्ती हा दादांच्या घातपात कटातील मुख्य आरोपी असू शकतो. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. हा विषय मी अधिवेशनात मांडणार आहे. या प्रकरणावर चर्चा होईल अशी माहिती मिटकरी यांनी दिली.
16 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 20, 2026, 06:39 AM
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकः आर. जी. कर रुग्णालयातील पीडितेची आई भाजपकडून निवडणूक लढवणार

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकः आर. जी. कर रुग्णालयातील पीडितेची आई भाजपकडून निवडणूक लढवणार

कोलकाता :आर. जी. कार रुग्णालयातीलपीडितेच्या आईने गुरुवारीपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकभाजपची उमेदवार म्हणून लढण्याची इच्छा व्यक्त केली. तृणमूल काँग्रेस सरकारला सत्तेवरून हटवण्यासाठी राजकीय मार्ग निवडत असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील 'पाणिहाटी' मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट असण्याची शक्यता आहे. यापूर्वी त्यांना भाजपकडून उमेदवारीची विचारणा झाली होती; परंतु त्यावेळी मी मानसिकदृष्ट्या तयार नव्हते, असे त्यांनी म्हटले. राज्य सरकारने माझ्या मुलीच्या प्रकरणातील तपास आणि न्याय प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही त्यांनी केला.पीडितेच्या आईने भाजपकडून आलेली तिकीटाची ऑफर स्वीकारली आणि तृणमूल काँग्रेस तसेच डाव्या पक्षांवर सडकून टीका केली. या दोन्ही पक्षांनी अत्याचार प्रकरणाचा राजकीय गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांनी केला आहे.Assam Election: आसाममध्ये काँग्रेसला पुन्हा धक्का! प्रतीक बोरडोलोईंची निवडणूक रिंगणातून माघार, नाकारली उमेदवारीबदल्यांवरून ममतांची टीकाकोलकाता : पश्चिम बंगालमधील ५०हून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांबद्दलमुख्यमंत्री ममता बॅनर्जीयांनी गुरुवारी तीव्र चिंता व्यक्त केली. हा सर्वोच्च राजकीय हस्तक्षेप आहे, असे त्यांनी म्हटले. निवडणूक आयोगाविरुद्ध टीकेचा सूर त्यांनी कायम ठेवला असून, अशा प्रकारची कृती म्हणजे संस्थांचे राजकीयीकरण आणि संविधानावर केलेला थेट हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.Delhi Police Tight Security: दिल्लीत कडेकोट बंदोबस्त; ईदच्या पार्श्वभूमीवर तणाव टाळण्यासाठी पोलिस सज्जलोकप्रिय चेहऱ्यांना संधीभाजपने गोवा, नागालैंड, कर्नाटक आणि त्रिपुरा या राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकांसाठी गुरुवारी उमेदवारांची घोषणा केली. या पोटनिवडणुकांसाठी पक्षाने लोकप्रिय चेहऱ्यांना संधी दिली आहे.हल्ल्याबाबत अहवाल मागवलाकोलकाता: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या आठवड्यात झालेल्या सभेपूर्वी, तृणमूल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्याच्या मंत्री शशी पांजा यांच्या निवासस्थानावर कथित हल्ला झाल्याप्रकरणी, निवडणूक आयोगाने कोलकाता पोलिसांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. शहर पोलिसांनी सादर केलेला प्राथमिक अहवाल अपूर्ण असल्याचे आढळून आले; त्यामध्ये या घटनेबाबतचे महत्त्वाचे तपशील समाविष्ट नव्हते. पूर्वीच्या अहवालात घटनाक्रमाचा संपूर्ण वृत्तांत आणि महत्त्वाच्या माहितीचा समावेश नव्हता..
18 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 20, 2026, 06:27 AM
बलात्कार प्रकरणातील आरोपींशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांचे आर्थिक संबंध असल्याचा शिवसेना नेत्याचा आरोप

बलात्कार प्रकरणातील आरोपींशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांचे आर्थिक संबंध असल्याचा शिवसेना नेत्याचा आरोप

पुणे:नाशिक येथील महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरात याच्याशी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसंच रुपाली चाकणकर यादेखील तंत्र-मंत्र विद्येचा वापर करत होत्या, असा धक्कादायक दावा एका पीडित महिलेच्या हवाल्याने करत अंधारे यांनी चाकणकरांच्या अटकेची मागणी केली आहे.रुपाली चाकणकर यांच्यावर आरोपांची सरबत्ती करताना पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे म्हणाल्या की, "अशोक खरात याचे प्रकरण पुढे आणणाऱ्या 'खबरदार पुढारी' वृत्तपत्राच्या पत्रकारावर गुन्हे दाखल करावेत, यासाठी रुपाली चाकणकर यांनी दबाव आणला होता आणि याबाबतचे पुरावे आता समोर आले आहेत. ज्योतिष सांगणं आणि तंत्र-मंत्र करणं, काळी जादू करणं या वेगळ्या गोष्टी आहेत. काळी जादू करणं हे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं उल्लंघण करणारं आहे. मी किती सुधारणावादी विचारांची आहे, हे आयोगाच्या अध्यक्षा सांगत असतात. पण वास्तव वेगळं आहे. आरोपी अशोक खरात याच्याशी माझा व्यक्तिगत संबंध नाही, असं चाकणकरांनी सांगितलं. पण खरातचे वडील वारले तेव्हा चाकणकर तिथं गेल्या होत्या, खरातच्या मुलीचे लग्न जमले तेव्हा चाकणकर सगळ्यात पुढे होत्या, खरातची भाची चाकणकरांच्या घरी राहते. खरात आणिरुपाली चाकणकरयांचे आर्थिक हितसंबंध असल्याची कागदपत्रे मी दोन दिवसांत सर्वांसमोर आणणार आहे," असा इशारा अंधारे यांनी दिला आहे.रुपाली चाकणकरांनी स्वत:चं बोट कापलं?तंत्र-मंत्र विद्येचा वापर करण्यासाठी रुपाली चाकणकर यांनी आपलं बोट कापलं होतं, असा खळबळनजक आरोपही सुषमा अंधारे यांनी यावेळी केला आहे. त्यांनी म्हटलं की, "अशोक खरातप्रकरणातील एका पीडित महिलेशी मी काल बोलले तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. पीडितेने सांगितलं की चाकणकर बाई स्वत: तंत्र-मंत्र विद्या करायच्या. चाकणकर यांनी आपल्या हाताची अनामिका (बोट) कापली होती. तंत्र-मंत्र विद्येमध्ये हाताची अनामिक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण ती सूर्य आणि शुक्र ग्रहाशी संबंधित असून ऊर्जावहनाचे मुख्य केंद्र आहे. या बोटाचा वापर मुख्यत्वे मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी, विशिष्ट मुद्रा करण्यासााठी किंवा एखाद्या व्यक्तीला वशिभूत करण्यासाठी केला जातो. एखाद्याला आकर्षित करणे आणि यश प्राप्ती करणे, असा या तंत्र-मंत्र विद्येचा अर्थ आहे. पीडितेने सांगितलं की हे तंत्र-मंत्र विशिष्ट वेळेत केले जाते. हे सोमवती अमावस्येला केले जाते. रुपाली चाकणकर यांचे २०२४ मधील सप्टेंबर महिन्यातील काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये त्यांच्या बोटाला बॅण्डेज लावलेले दिसत आहे. २ सप्टेंबर २०२४ ला सोमवती अमावस्या होती आणि त्यानंतर विविध फोटोंमध्ये चाकणकर यांच्या बोटाला बॅण्डेज दिसत आहे," असा दावा अंधारे यांनी केला आहे.दरम्यान, याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी केलेल्या गंभीर आरोपांना रुपाली चाकणकर या कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतात आणि आपली बाजू कशी मांडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
33 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 06:07 AM
इराणसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या'पर्ल हार्बर "या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

इराणसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या'पर्ल हार्बर "या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

मध्यपूर्वेतीलइराणसोबतच्यायुद्धसदृश परिस्थितीमुळे जागतिक राजकारण तापले असताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षडोनाल्ड ट्रम्पयांनीजपानच्यापंतप्रधान साने ताकाइची यांच्याशी झालेल्या संवादात जुन्या जखमांना उजाळा दिला आहे. "जेव्हा तुम्ही (जपान) पर्ल हार्बरवर हल्ला केला होता, तेव्हा आम्हाला कल्पना का दिली नव्हती?" असा रोखठोक आणि उपरोधिक सवाल ट्रम्प यांनी ताकाइची यांना विचारला आहे. इराणनेकतार आणि सौदी अरेबियातील तेल प्रकल्पांवर मिसाईल हल्ले केल्यानंतर, 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधील सुरक्षा धोक्यात आली आहे. जपानच्या गरजेपैकी ९०% तेल याच मार्गावरून येते. जेव्हा पंतप्रधान ताकाइची यांनी या भागात अमेरिकेच्या लष्करी मदतीबाबत चर्चा केली, तेव्हा ट्रम्प यांनी 'अमेरिका फर्स्ट' धोरणाचा पुनरुच्चार केला. ट्रम्प यांच्या मते, जपानने स्वतःच्या तेल पुरवठ्याचे रक्षण करण्यासाठी स्वतःचे सैन्य आणि खर्च उचलला पाहिजे, कारण अमेरिका आता इतरांच्या संरक्षणाची फुकट जबाबदारी घेणार नाही. पर्ल हार्बरचा उल्लेख का?१९४१ मधील पर्ल हार्बर हल्ल्याचा संदर्भ देऊन ट्रम्प यांनी जपानला हे सुचवण्याचा प्रयत्न केला की, जपान जेव्हा स्वतःच्या हितासाठी आक्रमक होऊ शकतो, तर आता स्वतःच्या तेलाच्या संरक्षणासाठी त्यांनी मागे का राहावे? ताकाइची या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान असून त्या कट्टर उजव्या विचारसरणीच्या मानल्या जातात. तरीही ट्रम्प यांच्या या अनपेक्षित विधानामुळे जपानच्या राजनैतिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जपानची कोंडी?जपानच्या तेल आयातीचा मोठा हिस्सा इराणजवळील 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' मधून येतो. तरीही जपान या भागात सक्रिय लष्करी भूमिका घेण्यास कचरत आहे. ट्रम्प यांनी 'पर्ल हार्बर'चा संदर्भ देऊन हे स्पष्ट केले की, आता जपानने केवळ अमेरिकेच्या जीवावर अवलंबून न राहता स्वतःच्या व्यापारी मार्गांचे रक्षण स्वतः करावे.
4 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 05:17 AM
इराणच्या होरमुझ सामुद्रधुनीवर सहा देशांनी केलेल्या नाकाबंदीमुळे जागतिक इंधन-ऊर्जा संकट चिघळले

इराणच्या होरमुझ सामुद्रधुनीवर सहा देशांनी केलेल्या नाकाबंदीमुळे जागतिक इंधन-ऊर्जा संकट चिघळले

Todays Maharashtra Breaking News Live Updates in Marathi:अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना कूटनीतीने उत्तर देत, इराणने होर्मुझ सामुद्रधुनी रोखल्याने अनेक देशांमध्ये इंधन-ऊर्जासंकट निर्माण झालं आहे. याची गंभीर दखल घेऊन ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स आणि जपान हे सहा देश एकत्र आले असून त्यांनी इराणला तंबी दिली आहे. युद्धाच्या झळा कमी होण्याची चिन्हं नसताना, इस्रायलने अमेरिकेला युद्धात ओढल्याचा दावाबेंजामिन नेतन्याहूयांनी फेटाळून लावला आहे. या युद्धामुळे भारतात निर्माण झालेली एलपीजी टंचाई आणि गॅस सिलिंडरसाठी लागलेल्या रांगा काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र आहे. मात्र, व्यावसायिकांना सिलिंडरसाठी अजूनही आटापिटा करावा लागतोय. महाराष्ट्रात अशोक खरात लैंगिक छळ प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. त्याचे पडसाद विधिमंडळात उमटण्याची शक्यता आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातराज ठाकरेयांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारलाही टीकेचं लक्ष्य केल्यानं मनसे विरुद्ध भाजपा असा संघर्षही पाहायला मिळू शकतो. युद्ध आणि अमेरिकेतील अर्थकारण यामुळे कोसळलेला शेअर बाजार पुन्हा कधी आणि कसा सावरणार, याची काळजी गुंतवणूकरादांना आहे. दुसरीकडे, आयपीएलचे वारे वाहू लागले असून क्रिकेटचाहत्यांना रनसंग्रामाचे वेध लागले आहेत. या आणि अशा महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... LIVE सांगलीच्या खानापूर तालुक्यात झालेल्या गारपिटीचा फटका द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. तुफानी गारपिटीमुळे द्राक्षांचे घड अक्षरशः उध्वस्त झाले आहेत. भिवघाट, करंजे, बानूरगड, पळशीसह आसपासच्या गावांमध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. अशोक खरात प्रकरणावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. "गृहमंत्र्यांच्या बुडाखाली अंधार पसरलाय, वरपासून खालपर्यंत गृह विभागातील अधिकारी-कर्मचारी भोकं पाडून लुटायला बसलीत", असे सपकाळ म्हणाले. "देवेंद्र फडणवीस यांच्यातील गृहमंत्र्यांना आपल्या विभागावर वचक ठेवता येत नसेल तर त्यांनी रात्री अपरात्री हूडी घालून पोलिस स्टेशन्सच्या दौऱ्यावर निघायलाच हवे. हे वाचल्यानंतर हुडी घालून पंत दौऱ्यावर जाण्याचा विचार ही करतील कारण त्यांना आपल्या कलागुणांचा वापर करण्याची सवय आहेच. पण त्यांचेच हात या भ्रष्टाचारात जर बरबटलेले असले तर…? मुख्यमंत्री / गृहमंत्र्यांचीच जर या भ्रष्टाचारात टक्केवारी ठरली असेल तर भ्रष्टाचारमुक्त राज्य निर्माण करण्याची अपेक्षा तरी कोणाकडून ठेवायची?", असा सवाल सपकाळ यांनी केला आहे. जालना जिल्ह्यात काल ठिकठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. जिल्ह्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार काल दुपारनंतर ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला असून, जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दाभाडीसह धनसावंगी तालुक्यातील रांजणी या ठिकाणी गारांचा पाऊस झाला आहे. तर परतूर मंठा जालना शहरासह जाफराबाद तालुक्यात मुसळधार तर रिमझिम स्वरूपचा पाऊस पडला आहे. या पावसामुळे काढणीला आलेला गहू ज्वारी मका पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. "सर्वात आधी मी हे सांगू इच्छितो की, मी जिवंत आहे आणि तुम्ही सगळे यांचे साक्षीदार आहात. याचसोबत मी सर्व फेक न्यूज फेटाळून लावत आहे", असे विधान इस्रायल पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांनी केले. सोशल मीडियावर नेतन्याहू इराणच्या हल्ल्यात मारल्या गेल्याच्या चर्चा गेल्या आठवड्यात सुरू झाल्या होत्या. त्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या मृत्यूबद्दल सुरू झालेल्या चर्चांना उत्तर दिले. बीड जिल्ह्यात कालपासून अवकाळीने कहर केला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि गारांचा पाऊस. यामुळे फळबागा व शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.. बीड जिल्ह्यातील आष्टी, केज तालुक्यातील अनेक गावांमध्ये काल झालेल्या गारपिठीमुळे डोंगरदऱ्यामध्ये गारांचा खच पाहायला मिळत आहे.तब्बल दोन ते तीन इंच गारांचा खच पडल्याचे दिसून येत आहे. यांचे व्हिडिओ आता समोर आले आहेत. नाशिकमधील भोंदू अशोक खरात यांची कृत्ये समोर आल्यानतर राज्यात खळबळ उडाली आहे. विशेषतः रुपाली चाकणकर यांचे या खरातसोबत चांगले संबंध असल्याची चर्चा आहे. चाकणकर आणि खरात यांचे अनेक फोटो व्हायरल झाले असून, त्यातील काही फोटो शेअर करत अंजली दमानियांनी रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
16 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 20, 2026, 05:16 AM
जागतिक आणि देशांतर्गत दबावामुळे भारतीय रुपयाची सार्वकालिक नीचांकी पातळीवर घसरण

जागतिक आणि देशांतर्गत दबावामुळे भारतीय रुपयाची सार्वकालिक नीचांकी पातळीवर घसरण

Rupee Slides to All-Time Low:शुक्रवारी, 20 मार्च रोजी, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 93.94 च्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला आहे. देशांतर्गत बाजार एकीकडे आदल्या दिवसाच्या मोठ्या घसरणीतून सावरताना दिसत आहे, तर दुसरीकडे मजबूत डॉलर, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि परकीय निधी सतत बाहेर पडणे यासारख्या जागतिक आणि देशांतर्गत घटकांमुळे रुपयावर दबाव राहिला. इराण-अमेरिका युद्ध सुरू झाल्यापासून रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत कमकुवत होत आहे.अमेरिकन डॉलरसमोर रुपयाचा नीचांकशुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी, रुपया पहिल्यांदाच 93 वर पोहोचला. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या जागतिक ऊर्जा पुरवठ्यात व्यत्यय आल्याने झालेल्या नुकसानीत वाढ झाल्याने सुरुवातीच्या व्यवहारात रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 3 पैशांनी घसरून 92.92 वर आला, ज्यामुळे आशियातील तिसऱ्या सर्वात मोठ्याअर्थव्यवस्थेचा विकास-महागाईचा समतोलबिघडण्याचा धोका निर्माण झाला.West Asia Conflict: सागरी संकटात भारताचे ‘सुरक्षा’ कवच, निर्यातदारांना सरकारकडून 497 कोटींची ‘RELIEF’ संजीवनीची घोषणाभडकलेल्या युद्धात तेलाला उकळीआखाती देशातील महत्त्वपूर्ण ऊर्जा सुविधांवरील हल्ल्यांमुळे गुरुवार, 19मार्च रोजी तेलाचे दर प्रति बॅरल जवळपास 120 डॉलरपर्यंत वधारले, मात्र शुक्रवारी काहीशी घसरण दिसून आली. मध्यपूर्वेतील ऊर्जा पायाभूत सुविधांवर झालेल्या हल्ल्यांमुळे मागील सत्रात 119.13 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचलेले 'ब्रेंट क्रूड' शुक्रवारी घसरून 107 डॉलर प्रति बॅरलवर आले.राजीनामा देताच HDFC बँकेचे तब्बल 1 लाख कोटी रुपये पाण्यात; अतनु चक्रवर्ती नेमके कोण?इराणने कतारच्या रास लाफान औद्योगिक शहर, जे एक महत्त्वाचे जागतिक LNG केंद्र आहे, हवाई हल्ल्यांची नवी लाट आणल्यानंतर क्रूडचा भाव उसळला. या सुविधेचे झालेले नुकसान दुरुस्त होण्यास अनेक वर्षे लागण्याची शक्यता असून यामुळेतेलाच्या किमती गगनाला भिडल्या.त्याचवेळी, युरोपीय देशांचा एक गट आणि जपानने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग सुनिश्चित करण्यासाठी आणि ऊर्जा बाजाराला शांत करण्यासाठीच्या ‘खऱ्या प्रयत्नांना’ पाठिंबा देण्याची हमी दिल्यानंतर किमती स्थिर झाल्या.Oil Supply: 'होर्मुझ' कोंडीनं अमेरिकेत हाहाकार; ट्रम्प इराणवरील 'तेल निर्बंध' हटवण्याच्या विचारातरुपयाचा नवीन नीचांक, रिझर्व्ह बँकेच्या भूमिकेकडे लक्षयुद्धामुळे दबावाखाली आलेल्या आणि सतत नवीन नीचांक गाठणाऱ्या रुपयाला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मार्च महिन्यात 15 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त डॉलरची विक्री केल्याचा अंदाज असून आता रुपया 93 च्या पातळीखाली घसरू नये यासाठी आरबीआय डॉलरची विक्री सुरू ठेवेल, अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे. आरबीआयचा हस्तक्षेप सामान्यतः आर्थिक वर्षाच्या शेवटी तीव्र होतो, ज्यामुळे अल्पकालीन आधाराची शक्यता निर्माण होते.
61 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 20, 2026, 05:12 AM
आर. जी. कर रुग्णालयातील पीडितेच्या कुटुंबातून भाजप उमेदवार बाहेर आला; आसाममध्ये काँग्रेसला फटका

आर. जी. कर रुग्णालयातील पीडितेच्या कुटुंबातून भाजप उमेदवार बाहेर आला; आसाममध्ये काँग्रेसला फटका

कोलकाता :आर. जी. कार रुग्णालयातीलपीडितेच्या आईने गुरुवारीपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकभाजपची उमेदवार म्हणून लढण्याची इच्छा व्यक्त केली. तृणमूल काँग्रेस सरकारला सत्तेवरून हटवण्यासाठी राजकीय मार्ग निवडत असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील 'पाणिहाटी' मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट असण्याची शक्यता आहे. यापूर्वी त्यांना भाजपकडून उमेदवारीची विचारणा झाली होती; परंतु त्यावेळी मी मानसिकदृष्ट्या तयार नव्हते, असे त्यांनी म्हटले. राज्य सरकारने माझ्या मुलीच्या प्रकरणातील तपास आणि न्याय प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही त्यांनी केला.पीडितेच्या आईने भाजपकडून आलेली तिकीटाची ऑफर स्वीकारली आणि तृणमूल काँग्रेस तसेच डाव्या पक्षांवर सडकून टीका केली. या दोन्ही पक्षांनी अत्याचार प्रकरणाचा राजकीय गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांनी केला आहे.Assam Election: आसाममध्ये काँग्रेसला पुन्हा धक्का! प्रतीक बोरडोलोईंची निवडणूक रिंगणातून माघार, नाकारली उमेदवारीबदल्यांवरून ममतांची टीकाकोलकाता : पश्चिम बंगालमधील ५०हून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांबद्दलमुख्यमंत्री ममता बॅनर्जीयांनी गुरुवारी तीव्र चिंता व्यक्त केली. हा सर्वोच्च राजकीय हस्तक्षेप आहे, असे त्यांनी म्हटले. निवडणूक आयोगाविरुद्ध टीकेचा सूर त्यांनी कायम ठेवला असून, अशा प्रकारची कृती म्हणजे संस्थांचे राजकीयीकरण आणि संविधानावर केलेला थेट हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.Delhi Police Tight Security: दिल्लीत कडेकोट बंदोबस्त; ईदच्या पार्श्वभूमीवर तणाव टाळण्यासाठी पोलिस सज्जलोकप्रिय चेहऱ्यांना संधीभाजपने गोवा, नागालैंड, कर्नाटक आणि त्रिपुरा या राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकांसाठी गुरुवारी उमेदवारांची घोषणा केली. या पोटनिवडणुकांसाठी पक्षाने लोकप्रिय चेहऱ्यांना संधी दिली आहे.हल्ल्याबाबत अहवाल मागवलाकोलकाता: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या आठवड्यात झालेल्या सभेपूर्वी, तृणमूल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्याच्या मंत्री शशी पांजा यांच्या निवासस्थानावर कथित हल्ला झाल्याप्रकरणी, निवडणूक आयोगाने कोलकाता पोलिसांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. शहर पोलिसांनी सादर केलेला प्राथमिक अहवाल अपूर्ण असल्याचे आढळून आले; त्यामध्ये या घटनेबाबतचे महत्त्वाचे तपशील समाविष्ट नव्हते. पूर्वीच्या अहवालात घटनाक्रमाचा संपूर्ण वृत्तांत आणि महत्त्वाच्या माहितीचा समावेश नव्हता..
95 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 05:09 AM
इराणमध्ये त्वरित विजय मिळवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यावर लष्करी पराभवानंतर आग

इराणमध्ये त्वरित विजय मिळवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यावर लष्करी पराभवानंतर आग

डोनाल्ड ट्रम्प हे इराणवरील एअर स्ट्राईक हा ऑपरेशन सिंदूर सारखा असेल. इराण काही दिवसातच गुडघ्यावर येईल अमेरिकेला कोणतेही नुकसान होणार नाही असं म्हणत होते. अमेरिकेची लष्करी ताकद इतकी मजबूत आहे की इराण काही करू शकणार नाही असं डोनाल्ड ट्रम्प म्हणत होते. मात्र आता एफ १५, रीपर ड्रोन आणि इंधन वाहून नेणारं विमान अशी १६ लष्करी एअर क्राफ्ट्स गमावल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा आता उलटा पडत असल्याचं दिस आहे. त्यातच अमेरिकेचे जवान देखील शहीद होत आहेत. इराणमध्ये त्वरित विजय होणार असं सांगणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर त्यांच्या पक्षातूनच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे प्लॅनिंग चुकल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.
58 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 05:09 AM
इराण हल्ल्याचा निषेध न केल्याबद्दल भारतीय राजकारण्याने केली पंतप्रधान मोदींवर टीका

इराण हल्ल्याचा निषेध न केल्याबद्दल भारतीय राजकारण्याने केली पंतप्रधान मोदींवर टीका

इराणवरून मोदी सरकारवर नाराजी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काही गोष्टी राहून गेल्या. जो इराण इतकी वर्षे आपल्याला साथ देत होता. काश्मिरच्या मुददयावर आपल्याला पाठिंबा देत आला, त्याच्या अडचणीच्या काळात आपण उभे राहिलो नाही. इराणवर आज हल्ले होत आहेत, आपण इराणला साथ दयायला पाहिजे होती. देशात येणारे बरेचसे तेल इराणमधून येत होते. ते आपल्याला रूपयात तेल देत आले. पण खामेनी गेल्यानंतरही पंतप्रधानांनी निषेधाचे एक वक्तव्य केले नाही, हल्ल्यावरही काही बोलले नाही. त्याचा त्रास भविष्यात आपल्याला होणार, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. आपल्याकडे स्वदेशीचे तुणतुणे वाजवले जाते. पण ज्यावर देश चालतो ते तेलपण बाहेरून येते. बाहेरून पैसे आणण्यापेक्षा बाहेरचे मेंदू आणा, असेही राज म्हणाले.
7 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 04:36 AM
जिल्हा परिषद परिसरात राजकीय उलथापालथीदरम्यान प्रशासनाचे पोलीस दल तैनात

जिल्हा परिषद परिसरात राजकीय उलथापालथीदरम्यान प्रशासनाचे पोलीस दल तैनात

दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे प्रशासनाचीही चांगलीच धावपळ उडाली होती. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि शिस्त राखण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनेक वर्षांनंतर जिल्हा परिषद परिसरात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
13 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 04:17 AM
रोहित पवारांचा अजित पवारांच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह, संयुक्त राष्ट्रांच्या हस्तक्षेपाची योजना

रोहित पवारांचा अजित पवारांच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह, संयुक्त राष्ट्रांच्या हस्तक्षेपाची योजना

यदु जोशी, राजकीय संपादक, लोकमत मिळेल त्या व्यासपीठावर जाऊन गेले काही दिवस रोहित पवार हे ‘माजी उपमुख्यमंत्रीअजित पवारयांचामृत्यूहा अपघात नाही तर घातपात होता’ हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. ते संयुक्त राष्ट्रसंघाकडेही जातील कदाचित.मृत्यूनंतरदादांना ते इतके जपत असतात, आधीच जपले असते तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते. राजकारणात ज्यांचे ऐकले नाही त्यांच्याबद्दल मोठा आवाज करून बोलले जात आहे. गेल्यानंतरच माणसाबद्दल आदर वाटू लागतो वा त्याची किंमत कळते असे आपण म्हणतोच ना..! ‘आपण दीर्घकाळ ज्या सभागृहात राहिलो, महाराष्ट्राच्या हिताचे अनेक निर्णय घेतले, तिथे आपल्याच मृत्यूची चर्चा का होत नसेल’, असा प्रश्न अजितदादांनाही स्वर्गात पडला असेल. सरकारलाही संधीआरोपांची राळ ज्यांनी उठविली आहे ते रोहित पवार विधानसभेचे सदस्य आहेत, सभागृहात हा विषय आला तर ते आणखी मोठे गौप्यस्फोट करतील असे त्यांच्या जवळची एक व्यक्ती परवा सांगत होती. हा अपघात होता की घातपात? हे उद्या ‘सीबीआय’पासून तत्सम चौकशांमधून समोर येईलच; पण त्याबाबत संशयाचे धुके रोहित यांनी नक्कीच तयार केले आहे. या धुक्यात तर विधिमंडळातील चर्चा हरवली नाही ना अशी शंका येत आहे. तो घातपातच होता असे लोकांना अजूनही वाटत नाही; पण ‘तो घातपात तर नव्हता ना?’ अशी शंका लोकांच्या मनात रोहित यांनी निर्माण केली आहे. या शंकेचे निरसन करण्याची संधी या विषयावर विधिमंडळात चर्चा घडवून आणत सरकारला साधता येऊ शकते. अजित पवारयांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी केली जाईल, अशी भूमिका राज्य सरकारने आधीच घेतली आहे. त्यासाठी एक प्रक्रिया असते. राज्य सरकारने केंद्राला तसे पत्र पाठवावे लागते, ते अद्याप पाठविलेले नाही, असा रोहित पवार यांचा आरोप आहे. सीबीआय चौकशीच्या अनुषंगाने आतापर्यंत काय-काय झाले ते सरकारला सभागृहाच्या माध्यमातून राज्याला सांगता येऊ शकेल. चर्चा घेतलीच नाही तर शंकांना उगाच बळ येईल, ते होऊ द्यायचे का ते सरकारने ठरवायला हवे. मुख्यमंत्र्यांचे पत्रमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन आठवड्यांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची पारदर्शक, कालबद्ध आणि सर्वसमावेशक चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यात आ. रोहित पवार यांनी व्यक्त केलेल्या शंकांचाही उलगडा व्हायला हवा अशी भूमिका घेतली आहे. चाैकशी यंत्रणांना आपले सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी हमी या पत्रात देण्यात आली आहे. फडणवीस आणि अजितदादांची एक वेगळीच केमिस्ट्री होती, दोघांचा एकमेकांवर प्रचंड विश्वास होता. ‘अपघाताच्या निमित्ताने उपस्थित करण्यात आलेल्या प्रत्येक मुद्यातील तथ्य समोर आणलेच जाईल,’ असे फडणवीस यांनी अजित पवारांच्या कुटुंबीयांनाही सांगितले आहे. सगळे नेमके कशासाठी?अपघातासंदर्भात एक संशयाचे जे वातावरण तयार केले जात आहे त्याद्वारे मुख्यत्वे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील विशिष्ट नेत्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न आहे. पक्षाची सूत्रे प्रस्थापित नेत्यांकडे राहू नयेत, त्यांना बाजूला केले जावे असे वाटणाऱ्या ज्या व्यक्ती दोन्ही राष्ट्रवादींमध्ये आहेत त्या या मोहिमेत अग्रेसर आहेत. आरोपांमध्ये तथ्य नाही असे समोर आले तर विशिष्ट नेत्याला बदनाम करण्याचाच केवळ हेतू होता हे आणखीच स्पष्ट होईल. बरेचदा अशा दुर्घटनांच्या निमित्ताने काही जणांची राजकीय वाट रोखली जाते, राजकारण बिघडविले जाते, तथ्य समोर येते तेव्हा त्यांची कारकीर्द संपून गेलेली असते. अजितदादांच्या मृत्यूने असे काही घडू द्यायचे नसेल तर सरकारनेही तथ्य तातडीने समोर आणले पाहिजे. कारण शंका उपस्थित करायला सत्याचा आधार घ्यावाच लागतो असे नाही. शंका-कुशंकांच्या आधारे कोणाला घेरले जात असेल तर ते योग्य नाहीच; पण उद्या शंकाच सत्य निघाल्या तर त्या मागील सूत्रधारांनाही सोडता कामा नये या दोन्ही बाबींचा विचार करून विधिमंडळात चर्चा होणे आणि अपघातप्रकरणाची सीबीआय चौकशी तातडीने होणे गरजेचे आहे. ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूच्या निमित्तानेही असेच काही जणांना लक्ष्य करण्यात आले होते. मात्र, त्यात काही तथ्य नसल्याचे नंतरच्या काळात स्पष्ट झाले. इतिहासातही अनेक मोठ्या नेत्यांच्या अपघाती मृत्यूमागे षडयंत्राची थिअरी मांडली गेली होती. असे म्हणतात की पुणे-बारामतीत घर असलेल्या एका वैमानिकाने अजितदादांच्या अपघातासंबंधीचा घटनाक्रम, हवाई वाहतुकीचे तांत्रिक मुद्दे, ‘त्या’ विमानातील तांत्रिक कच्चे दुवे, त्यावेळचे हवामान या आधारे ‘अपघात नाही घातपात’ अशी मांडणी केली आहे. रोहित पवार यांच्यासह एक-दोन नेत्यांकडे त्याने हे सगळे पोहोचविले आहे. रोहित पवार हे त्यातल्याच बहुतेक मुद्यांची मांडणी करत असतात, जोडीला त्यांनी अन्य काही तज्ज्ञांकडूनही इनपुट घेतले आहेत. पुणे-बारामतीच्या त्या व्यक्तीला वैमानिक होण्यासाठी अजितदादांनीच मदत केली होती, अशी माहिती आहे.yadu.joshi@lokmat.com
49 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 04:07 AM
छळ आणि शोषणः राजकीय वास्तवाचे सडलेले प्रतिबिंब

छळ आणि शोषणः राजकीय वास्तवाचे सडलेले प्रतिबिंब

दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयाचा सोहळा I। - या तुकोबारायांच्या पंक्तींची तंतोतंत प्रचिती देणारी खळबळजनक घटनानाशिकमध्येउघडकीला आली आहे. स्वतःला ‘कॅप्टन‘ म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात नावाच्या वासनांध भोंदूबाबाच्या लीलांचे गलिच्छ तपशील बाहेर आल्याने लोक संतापले आहेत. पतीच्या मृत्यूची भीती दाखवून एका महिलेवर अत्याचार, सोबत तब्बल ५८ व्हिडिओ अशा काळ्या कृत्याचे या खराताचे भांडे तर फुटलेच, वरून आपली राजकीय व्यवस्था किती किडलेली, सारासार विवेक गमावलेली आहे, हेही चव्हाट्यावर आले. हा केवळ एका गुन्हेगाराचा भांडाफोड नाही; तो राजकीय वास्तवाचे सडलेले प्रतिबिंब दाखवणारा आरसा आहे. महिलांचे शोषण, मानसिक गुलामी, अंधश्रद्धेच्या नावाखाली विकृत कारभार हे सारे संतापजनक आहेच; पण त्याहून अधिक धक्कादायक आहे ती या बाबाच्या दरबारात बडे राजकीय नेते, उच्च पदस्थांची लागणारी रांग. समस्यांनी ग्रासलेला, परिस्थितीने पिचलेला सामान्य माणूस अशा बुवाबाबांच्या आश्रयाला जाणे, त्यांच्या कच्छपी लागून सर्वस्व गमावण्याइतका आंधळा व हतबल होणे एकवेळ समजून घेता येईल. पण ज्यांच्या हाती सत्ता, संपत्ती, यंत्रणा अशी सारी सूत्रे आहेत, त्या बड्या नेत्यांनी या असल्या टीनपाट भोंदूंच्या मागे का लागावे? या मंत्री-संत्री लोकांची अशी काय हतबलता असते की भलत्या चमत्कारांचे दावे करणाऱ्या कुण्या बाबाचे पाय धुवून पुसण्याची गरज त्यांना भासावी? मुख्यमंत्री, मंत्री वा तत्सम पदे भूषविलेले सत्ताधारी- विरोधक, पुरुष-महिला या सगळ्यांचीच या खराताच्या ‘दरबारात’ लागणारी उपस्थिती केवळ योगायोग नाही. त्यामागे प्रामुख्याने तीन कारणे असतात - असुरक्षितता, लालसा आणि काळे व्यवहार. सत्तेवरील लोकांना भीती असते ती सत्ता गमावण्याची.निवडणूक जिंकायची, खुर्ची टिकवायची, प्रतिस्पर्ध्याला हरवायचे या सगळ्यासाठी ‘काहीही’ करण्याची मानसिकता प्रसंगी कोणत्या टोकाला जाते याचे सांप्रत काळीचे दाखले कित्येक हजार. पण अंधश्रद्धेच्या कर्दमात सामान्यांना लोटून सर्व प्रकारचे भोग सुखनैव भोगणाऱ्या असल्या बाबांच्या पायी लीन होणारे, त्यांची पूजा-अर्चा करणारे राजकीय नेते ही ऱ्हासाची नक्की कोणती पातळी म्हणायची? हे सत्ताधारी किंवा सत्तेच्छू लोक चक्क वासनांधांच्या दरबारात हजेरी लावून असे लवलवून वाकतात याचे दुसरे कारण लालसा. सत्ता, तिच्यातून मिळणारा अमाप पैसा आणि वाढता प्रभाव यातून आपण कुणाला प्रतिष्ठा देतो आहोत, हे समजून घेण्याचे भान राहात नाही. तिसरे कारण आहे काळे व्यवहार लपवण्याची धडपड. काळा पैसा पांढरा करण्यासाठी, चौकशा थांबवण्यासाठी किंवा ‘वरच्या’ स्तरावरून संरक्षण मिळवण्यासाठी अशा भोंदूंचा वापर केला जातो, हे आता गुपित राहिलेले नाही. अशोक खरात प्रकरणात पुढाऱ्यांच्या या जवळिकीपेक्षा अधिक धक्कादायक आहे ते, ज्यांच्यावर राज्यभरातील महिलांच्या संरक्षणाची घटनादत्त जबाबदारी त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर याच कथित ‘कॅप्टन’च्या देवस्थानाच्या विश्वस्त असाव्यात आणि महिलांचे शोषण करणाऱ्या या बाबासोबतचे त्यांचे व्हिडिओ, छायाचित्रे अटकेनंतर काही तासांत सोशल मीडियात यावीत! म्हणून किमान या भोंदूच्या काळ्या कृत्याचा न्यायनिवाडा न्यायालयात होईपर्यंत नैतिक जबाबदारी म्हणून महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पद सोडायला हवे. खरात प्रकरणाच्या तपशिलांमुळे एकीकडे सामान्य माणूस संतापलेला असताना त्यातल्या त्यात सकारात्मक बाब म्हणजेनाशिकचेपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी राजकीय दडपणाला न जुमानता केलेली कारवाई. ही केवळ एका आरोपीवरची कारवाई नाही; ती व्यवस्थेतल्या कणखरपणाची झलकदेखील आहे. मात्र, अशी कारवाई अपवाद न ठरता नियम ठरावा. या प्रकरणात फक्त अशोक खरात नावाचा इसम दोषी नाही. त्याच्या दरबारात उपस्थित राहून त्याला वैधता, प्रतिष्ठा देणारे राजकीय चेहरेही तितकेच जबाबदार आहेत. ‘आम्ही फक्त दर्शनाला गेलो होतो’ हा त्यांचा बचाव आता यंत्रणेने आणि जनतेनेही चालवून घेता कामा नये. ज्यांनी विवेक, विज्ञाननिष्ठा आणि कायद्याचा आदर राखायचा, तेच जर अंधश्रद्धेच्या पायाशी लोटांगण घालत असतील, तर सामान्य माणसाने कोणावर विश्वास ठेवायचा? गावोगावी भोंदूबाबा उगवतात, कारण त्यांना पोसणारी राजकीय माती सुपीक असते. ती माती बदलली नाही तर आजचा खरात जाईल आणि उद्या दुसरा ‘कॅप्टन’ उभा राहील. कदाचित आणखी प्रभावी, आणखी धोकादायक. तेव्हा या थोतांडाचा निकाल जनतेच्या दरबारातही लागला पाहिजे. न्यायव्यवस्थेने त्याचा चाैरंग करायला हवा आणि भोंदू भोगसम्राटांच्या पायावर झुकणाऱ्या राजकीय नेत्यांना जनतेने रोकडा जाब विचारायला हवा.
20 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 04:04 AM
इस्रायलने एकट्यानेच युद्ध पुकारले, नेतान्याहू यांचा दावा फेटाळला

इस्रायलने एकट्यानेच युद्ध पुकारले, नेतान्याहू यांचा दावा फेटाळला

इस्रायलनेचअमेरिकेलाइराणविरूद्धच्यायुद्धातओढले, अशी चर्चा संघर्ष सुरू झाल्यापासून होत आहे. याबद्दल बोलतानाइस्रायलचेपंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. आम्ही अमेरिकेला यायुद्धातजबरदस्ती ओढलेले नाही, असे ते म्हणाले. इराणच्यासाउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नेतन्याहू म्हणाले की, "खरंच कुणाच्या मनात असा विचार येईल का की आम्ही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विचारू की, काय करायला हवे?" इराणच्या साउथ पार्स गॅस फील्डवर करण्यात आलेल्या हल्ल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांना आधी दिली गेली होती का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर नेतन्याहू म्हणाले की, 'इस्रायलने एकट्याने ही कारवाई केली आहे. ट्रम्प यांनी आम्हाला यापुढे हल्ले करण्यापासून रोखले आहे आणि आम्ही तसेच करत आहोत.' ट्रम्प यांनीही चर्चा फेटाळली २८ फेब्रुवारी रोजी इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धाची ठिणगी पडली. याच दिवशी इस्रायल-अमेरिकेने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई मारले गेले. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये अणुऊर्जा कार्यक्रमाबद्दल चर्चा सुरू होती. त्याच काळात अचानक इस्रायल, अमेरिकेने युद्ध सुरू केले. अमेरिकेनेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही असा प्रश्न विचारला गेला होता की, अमेरिकेला इस्रायलने बळजबरी युद्धात ओढले. त्यावर त्यांनी नकार दिला. ते सातत्याने असे काही झाले नसल्याचेच म्हणत आहे. "कदाचित असेही झाले असावे की, मी त्यांना (इस्रायल) युद्धात सामील होण्यासाठी मजबूर केले. बघा, आम्ही मुर्खांसोबत (इराण) चर्चा करत होतो, आणि माझे असे मत आहे की, ते (इराण) आधी हल्ला करणार होते", असे ट्रम्प व्हाईट हाउसमध्ये मार्चच्या सुरुवातीला झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते. केंट यांच्या राजीनाम्याने अमेरिकेच्या भूमिकेवर शंका अमेरिकेमध्ये या मुद्द्यावरून चर्चा सुरू आहे की, अमेरिका या युद्धात का सामील झाली आहे आणि यात इस्रायलची भूमिका काय आहे? अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी केंद्राचे संचालक जोसेफ केंट यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिल्यानंतर या चर्चेला वेग आला आहे. केंट यांनी ट्रम्प यांना दिलेल्या राजीनाम्यामध्येच हे स्पष्ट आहे की आम्ही (अमेरिका) इस्रायल आणि त्यांच्या शक्तिशाली लोकांच्या लॉबीने टाकलेल्या दबावामुळे सुरू केले आहे. त्यांनी एका मुलाखतीतही सांगितले की, इस्रायलने युद्धाचा निर्णय समोर मांडला. इस्रायली अधिकारी सर्व प्रक्रिया बाजूला सारून अमेरिकेच्या खासदारांचे युद्धासाठी मत परिवर्तन करत होते.
21 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 03:52 AM
रूपाली चाकणकरच्या राजीनाम्यावरून करूणा मुंडेंचा उपोषणाचा इशारा

रूपाली चाकणकरच्या राजीनाम्यावरून करूणा मुंडेंचा उपोषणाचा इशारा

करुणा मुंडे यांचा उपोषणाचा इशारा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यासाठी करुणा मुंडे-शर्मा यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. चाकणकर यांना तत्काळ पदावरून दूर केले नाही, तर मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा स्पष्ट इशारा मुंडे यांनी दिल्याने राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे.
32 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 03:44 AM
इराणच्या ऊर्जा हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेतील तणावात तेलाच्या किंमती वाढल्या

इराणच्या ऊर्जा हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेतील तणावात तेलाच्या किंमती वाढल्या

दुबई :इराणनेसौदी अरेबिया, कतार आणि कुवेतमधील प्रमुख ऊर्जा प्रकल्पांवर गुरुवारी केलेल्या हल्ल्यांमुळे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू दरात मोठी उसळी आली आहे. इस्रायलने एक दिवस आधीइराणच्या‘साउथ पार्स’ वायू क्षेत्रावर केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात ही कारवाई करण्यात आली. या घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील संघर्ष अधिकच तीव्र झाला असून, जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती ११८ डॉलर प्रतिबॅरलपर्यंत पोहोचल्या असून, २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्यायुद्धानंतरत्या ६० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीतून जगातील सुमारे २० टक्के तेल वाहतूक होते; मात्र इराणच्या कारवायांमुळे हा मार्ग जवळपास अडथळाग्रस्त झाला आहे. यूएईतील ‘अल धाफ्रा’ हवाई तळावर इराणी हल्ल्यांमुळे नुकसान झाल्याचे उपग्रह चित्रांवरून स्पष्ट झाले आहे. येथे सुमारे २,००० अमेरिकन सैनिक तैनात होते. ‘शेल’कडून नुकसानीचे मूल्यांकन ऊर्जा कंपनी शेलने कतारमधील रास लाफान औद्योगिक क्षेत्रातील ‘पर्ल जीटीएल’ प्रकल्पाच्या नुकसानीचे मूल्यांकन सुरू केल्याचे सांगितले. या हल्ल्यातील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली असून, कतार एनर्जी सोबत समन्वय साधून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. हवाई वाहतूक आणि लष्करी घडामोडीहाँगकाँगस्थित कॅथे पॅसिफिक एअरलाइनने दुबई आणि रियाधसाठीच्या उड्डाणे एप्रिलअखेरपर्यंत स्थगित केली आहेत. संघर्षामुळे अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी आखाती मार्ग टाळण्याचा निर्णय घेतला आहे. तेलसाठ्यांवर हल्ल्याने युरोप चिंतेतफ्रान्सने या संघर्षाला बेजबाबदार म्हणत रमजान महिन्याच्या अखेरीसयुद्धविरामाचेआवाहन केले.जर्मनीने कोणत्याही लष्करी मोहिमेत सहभागी होणार नाही. हल्ले थांबवल्यास मदत करू शकतो, असे म्हटले.ऑस्ट्रियाने युरोपला या युद्धात ओढू युरोपला ब्लॅकमेल करता येणार नाही, असे ठामपणे सांगितले.अरब लीगने या हल्ल्यांनी तेलदरात होणारी वाढ धोकादायक आहे. याचा फटका संपूर्ण जगाला बसेल. चीनने आंतरराष्ट्रीय संबंधांत बळाचा वापर करू नका. हा संघर्ष तत्काळ थांबवून परिस्थिती नियंत्रणात ठेवावी, असे म्हटले आहे.ऑस्ट्रेलियाने इराणचे असे प्रत्युत्तरात्मक हल्ले बेजबाबदार आहे. त्यांनी युद्ध पेटवू नये, असे म्हटले. ‘इराणची सर्व पाणबुडी क्षमता निष्प्रभ’वॉशिंग्टन : इराणची नौदल क्षमता मोठ्या प्रमाणावर निष्प्रभ झाली असून, त्यांच्या सर्व ११ पाणबुड्या नष्ट झाल्याचा दावा अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीटर हेगसेथ यांनी केला. पीटर हेगसेथ यांनी उल्लेख केलेल्या इराणच्या पाणबुड्या या लहान आकाराच्या (मिजेट) असून, त्या आखातातील उथळ समुद्री प्रदेशात चालवल्या जातात. पर्शियाचे आखात आणि होर्मुझ सामुद्रधुनीसारख्या अरुंद समुद्री मार्गांमध्ये या पाणबुड्यांमार्फत सहज लपून पाण सुरुंग पेरणे आणि टॉरपिडो हल्ले करणे शक्य होते. या युद्धात अमेरिकेचे सैन्य निर्णायक टप्प्यात आहे.
97 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 03:28 AM
भाजपाचे अनपेक्षित पाऊलः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर परभणीसाठी मैदानात

भाजपाचे अनपेक्षित पाऊलः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर परभणीसाठी मैदानात

साताऱ्यात मकरंद पाटलांवर फिल्डिंग परभणीमध्ये भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार ) आमदार राजेश विटेकर यांना सोबत घेऊन शिवसेनेला धक्का दिला. आता साताऱ्यातही शिवसेनेला कात्रजचा घाट दाखविण्याची रणनीती आखली आहे. साताऱ्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना धक्का देण्यासाठी शिवसेना नेते आणि मंत्री शंभूराज देसाई व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे दोघे एकत्र येऊन भाजपाला सत्तेबाहेर ठेवतील अशी चर्चा जिल्ह्यात होती . पण, भाजपाने मकरंद पाटील यांना सोबत घेऊन सातारा जिल्हा परिषदेवर अध्यक्ष बसविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपाला सत्ता स्थापनेसाठी पाच सदस्यांची गरज आहे. शिवसेनेचे दोन सदस्य भाजपाच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यातच मकरंद पाटील भाजपासोबत आल्यास भाजपा आणि राष्ट्रवादी युतीची सत्ता स्थापन होईल. परभणीप्रमाणे साताऱ्यातही राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष होऊ शकतो. आपल्या जिल्ह्यात भाजपाने शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्याची रणनीती आखल्याने एकनाथ शिंदे कमालीचे नाराज असल्याचे समजते.
44 shares
😊
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 03:24 AM
नेपाळच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचा ऐतिहासिक विजय, बालेंद्र शाह होणार पंतप्रधान

नेपाळच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचा ऐतिहासिक विजय, बालेंद्र शाह होणार पंतप्रधान

शेजारील देश असलेल्यानेपाळच्याराजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने (आरएसपी) ऐतिहासिक विजय नोंदवला असून, आता देशाची धुरा तरुण आणि डॅशिंग नेते बालेंद्र शाह ऊर्फ 'बालेन' यांच्या हाती जाणार आहे. येत्या २७ मार्च रोजी बालेंद्र शाहनेपाळच्यापंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ५ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या २७५ सदस्यीय प्रतिनिधी सभेच्या निवडणुकीत आरएसपीने १८२ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या विजयामुळे नेपाळमधील जुन्या आणि प्रस्थापित पक्षांना मोठा धक्का बसला आहे. आरएसपीने निवडणुकीपूर्वीच बालेंद्र शाह यांना पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून घोषित केले होते, ज्याला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. पक्षाचे अध्यक्ष रवि लामिछाने, ज्येष्ठ नेते बालेंद्र शाह आणि स्वर्णिम वाग्ले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शपथविधीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी २६ मार्च रोजी पार पडेल आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, २७ मार्चला बालेंद्र शाह पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारतील. विशेष म्हणजे, नेपाळच्या संसदेचे नवीन भवन अद्याप पूर्णपणे तयार नसल्यामुळे हा सोहळा एका तात्पुरत्या हॉलमध्ये आयोजित केला जाणार आहे. संसद सचिवालयाचे प्रवक्ते एकराम गिरी यांनी सांगितले की, कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून ध्वनी आणि प्रकाश व्यवस्थेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या निवडणुकीत नेपाळी काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावेळी १०० पारची घोषणा देणाऱ्या नेपाळी काँग्रेसला केवळ ३८ जागांवर समाधान मानावे लागले. पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार गगन थापा यांचा आरएसपीच्या अमरेश सिंह यांनी पराभव केला. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत गगन थापा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय सीपीएन-यूएमएलला २५, तर कम्युनिस्ट पार्टीला १७ जागा मिळाल्या आहेत. निवडणूक आयोगाचे कार्यवाह मुख्य आयुक्त राम प्रसाद भंडारी यांनी निवडणुकीचे अंतिम निकाल राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांना सादर केले. अत्यंत कठीण आणि गुंतागुंतीच्या परिस्थितीतही निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडल्याबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले आहे.
16 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 03:02 AM
पोंडा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून रितेश नाईक यांची उमेदवार म्हणून घोषणा

पोंडा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून रितेश नाईक यांची उमेदवार म्हणून घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा :भाजपकडून फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रवी नाईक यांचे पुत्र रितेश यांना गुरुवारी उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर आम आदमी पक्षाने गीतेश नाईक यांना तिकीट दिले आहे. तर रितेश यांना उमेदवारी जाहीर होताच विश्वनाथ ऊर्फ अपूर्व दळवी हे प्रचंड नाराज झाले. दुपारी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी त्यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्यही उपस्थित होते. दळवी समर्थकांनी खडपाबांध येथे बैठक घेत लवकरच पुढील निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. त्यामुळे दळवी यांनी बंडाची तयारी केल्याची चर्चा आहे. दरम्यान, दळवी यांचे मन वळविण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे त्यांची भेट घेणार आहेत. मतदारसंघात आता रितेश नाईक, काँग्रेसचे डॉ. केतन भाटीकर आणि आपचे गीतेश नाईक अशी तिरंगी अथवा बहुरंगी लढतीची शक्यता व्यक्त होत आहे. गुरुवारी तिकीट जाहीर होताच रितेश नाईक यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. गेल्या ३५-४० वर्षापासून त्यांच्या वडिलांना मिळालेल्या जनतेच्या पाठिंब्याप्रमाणेच यावेळीही साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी फोंडावासीयांना केले आहे. रितेश यांनी दिवंगत रवी नाईक यांचे कार्य पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करत विजयाबाबत आत्मविश्वास व्यक्त केला. तसेच सर्वांशी समन्वयाने काम करू असे त्यांनी स्पष्ट केले. फोंड्यात वातावरण तापले, खडपाबांध येथे शक्तिप्रदर्शन पोटनिवडणुकीसाठी रितेश नाईक यांना उमेदवारी जाहीर झाल्याने बंडाळी अटळ असल्याचे चित्र गुरुवारी संध्याकाळी निर्माण झाले. दुपारी सुमारे साडेचारच्या सुमारास विश्वनाथ (अपूर्व) दळवी यांच्या समर्थकांनी खडपाबांध येथे मोठे शक्तिप्रदर्शन केले. दळवी यांच्या घरासमोर समर्थक, कार्यकर्ते जमल्याची माहिती मिळताच प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, सर्वानंद भगत आदींनी खडपाबांध येथे दळवी यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी दळवी समर्थकांनी नाईक यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दळवी यांनाच उमेदवारी मिळायला हवी असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. कार्यकर्ते कोणत्याही परिस्थितीत ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. विश्वनाथ दळवी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून समाजोपयोगी अनेक कामे केली आहेत. ते कार्यकर्त्यांनी किंवा नागरिकांनी हाक मारताच धावून जातात. पक्षासोबत ते एकनिष्ठ राहिलेले आहेत. त्यांची कदर म्हणून भाजपने त्यांच्या नावाचा विचार करायला हवा होता, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. राजकारणातचढ-उतार येतातच : दामू नाईक दरम्यान, निवासस्थानी झालेल्या चर्चेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष नाईक, विनय तेंडुलकर हे विश्वनाथ दळवी यांच्यासह तेथून बाहेर पडले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, 'विश्वनाथ दळवी हे एक परिपक्वराजकारणीआहेत. गेली अनेक वर्षे ते पक्षासोबत आहेत. पुढेसुद्धा ते सोबत राहतील. प्रामाणिक कार्यकर्ता अशी त्यांची आजपर्यंतची ओळख आहे. पक्ष म्हणून जो वरिष्ठ पातळीवर निर्णय होतो, त्या निर्णयाशी प्रत्येक कार्यकर्ता बांधील असायला हवा. राजकारणात क्षणिक विचार चालत नाही. दीर्घकाळाचा विचार करून निर्णय घेतले जातात. दळवी यांनीसुद्धा त्यादृष्टीने विचार करावा, राजकारणात चढउतार हे असतातच. काहीवेळा मनाविरुद्ध प्रसंगही घडतात. सर्वांचा सारासार विचार करून सामोरे जायला हवे. मीसुद्धा अशा चढ-उतारामधूनच घडलो आणि आज भाजपचे सर्वोच्च पद माझ्याकडे आले आहे. कार्यकर्त्यांची बैठक त्यानंतर दळवी यांच्या घरी जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात एक बैठक घेऊन आपला रोष व्यक्त केला. बैठकीला माजी नगराध्यक्ष व माजी भाजप मंडळ अध्यक्ष शांताराम कोलवेकर, नगरसेवक शौनक बोरकर, शिवानंद सावंत यांसह पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीमध्ये आता विश्वनाथ दळवी हे जो काही निर्णय घेतील, त्यामागे आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहायचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. स्थानिक मागणी प्रभावी रवीं यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वारशाला पुढे नेण्यासाठी त्यांचे पुत्र रितेश यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी स्थानिक स्तरावरून पुढे आली. सरकारातील भाजपचा मित्र पक्ष मगोपनेही याला पाठिंबा दर्शवला होता. आमदार गोविंद गावडे यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रितेश यांना तिकीट देण्याची भूमिका घेतली होती. विरोधक मित्रच, फोंड्यात विजय आमचाच : रॉय दरम्यान, रॉय नाईक यांनी विरोधकांबाबत 'ते आमचे मित्रच आहेत' असे म्हटले आहे. फोंडा पोटनिवडणुकीत भाजपने रितेश यांना उमेदवारी दिल्याने सर्वजण एकत्रितपणे काम करतील, असा विश्वास रॉय यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला. आपकडून गीतेश नाईक यांना तिकीट दरम्यान, आम आदमी पक्षाने फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गीतेश नाईक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गीतेश हे फोंडा मतदारसंघातील एक परिचित नाव असून, त्यांनी स्थानिक पातळीवर सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावली आहे. गीतेश नाईक यांनी सुरुवातीला स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवत आपली ओळख निर्माण केली. पारंपरिक पक्षांपासून वेगळा पर्याय म्हणून त्यांनी 'आप'मध्ये प्रवेश केला. गोव्यात 'आप' पक्ष विस्तार करत असताना, नव्या चेहऱ्यांवर भर देण्याच्या धोरणात त्यांना संधी मिळाली. रितेश यांचे केले अभिनंदन विश्वनाथ दळवी यांची समजूत काढल्यानंतर दामू नाईक हे खडपाबांध येथे रितेश नाईक यांच्या घरी गेले आणि त्यांचे अभिनंदन केले. यावेळी नाईक म्हणाले, 'भाजपच्या कामामुळे देशभर सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. साहजिकच प्रत्येकजण या पक्षाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी बनण्याचे स्वप्न पाहतात. त्यादृष्टीने प्रयत्न करतात. मात्र पक्षाची प्रक्रिया समान असते. सर्वच लोकांचा उमेदवारीसंदर्भात विचार करणे शक्य नाही. सर्व्हे केला जातो. म्हणूनच भाजप प्रत्येक निवडणूक जिंकत पुढे जात आहे. ही पोटनिवडणूक आम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकू. कार्यकर्त्यांच्या सल्ल्याने निर्णय : विश्वनाथ दळवी याविषयी विश्वनाथ दळवी म्हणाले की, 'कार्यकर्त्यांच्या सहकार्यावर व त्यांनी घेतलेल्या मेहनतीवरच माझी आजची ओळख निर्माण झाली आहे. कार्यकर्ते सर्वोच्च स्थानी आहेत. हितचिंतक व समर्थक जो काही निर्णय घेतील, त्यावर विचारमंथन करू. उमेदवारी न मिळाल्याने मला धक्का बसला आहे. सावरण्यासाठी मला किमान बारा तास लागतील.
76 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 20, 2026, 02:43 AM
मुंबईचे नवनिर्वाचित महापौर नूतनीकरण केलेल्या बंगल्यात जाणार, स्मारक बांधण्याचे नियोजन

मुंबईचे नवनिर्वाचित महापौर नूतनीकरण केलेल्या बंगल्यात जाणार, स्मारक बांधण्याचे नियोजन

मुंबई :भायखळा येथीलवीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानआणि प्राणिसंग्रहालयातील महापौर बंगल्यात नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी अद्याप प्रवेश केलेला नाही. नव्या महापौर येण्याआधीच या बंगल्याची बाह्य आणि अंतर्गत दुरुस्तीची कामे करण्यात आली होती. मात्र, आता महापौरांच्या सूचनेनुसार पुन्हा अंतर्गत दुरुस्ती व सजावटीची कामे केली जाणार आहेत. यासाठी मुंबई महापालिकेने एक कोटी ४८ लाख ११ हजार रुपयांची निविदा जारी केली आहे.दादरच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होणार आहे. त्यामुळे २०१९मध्ये महापौर राहिलेले विश्वनाथ महाडेश्वर यांना हा बंगला सोडावा लागला होता. त्यांनी भायखळ्याच्या राणी बागेतील महापौर बंगल्यात प्रवेश केला होता. महापौर किशोरी पेडणेकर यांचे वास्तव्यही याच बंगल्यात होते. त्यानंतर प्रशासक काळ होता.Unseasonal Rain: राज्यात अवकाळी, गारपिटीचा मारा; नाशिक, मराठवाड्यात पिकांचे नुकसान, पुण्यातही हजेरीप्रशासक काळात या बंगल्याचा वापर होत नसल्याने काही ठिकाणी वाळवी लागली, तर काही लाकडी फर्निचरचीही दुरवस्था झाली होती. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या काही महिने आधीच या बंगल्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले. यासाठी निविदा काढून कंत्राटदार नेमण्यात आला. संरचनात्मक दुरुस्ती, कौलांच्या आधारलाकडाची दुरुस्ती, पेंटिंग व पॉलिशिंगची कामे, वाळवीप्रतिरोधक कामांसह अन्य कामे या कंत्राटदारांकडून करण्यात आली. मात्र, नव्या महापौरांनी बंगल्याची पाहणी केल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार आता अंतर्गत सजावटीसह अन्य दुरुस्त्या केल्या जाणार आहेत.सध्यामहापौर तावडेया घाटकोपर पश्चिमेला टेलिफोन एक्स्चेंज लेन येथील एका इमारतीत राहतात. महापौर निवासस्थान ही महापालिकेची मालमत्ता असून, त्याच्या देखभाल-दुरुस्तीचे निर्णय संबंधित प्रशासकीय विभागाकडून नियमित प्रक्रियेनुसारच घेतले जात असल्याचे महापौर कार्यालयाकडून याआधी स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, महापौर बंगल्याची डागडुजी आधीच झालेली असतानाच पुन्हा दुरुस्ती केली जणार असल्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.Raj Thackeray: इराणवरील हल्ल्यांचा साधा निषेधही नाही! राज ठाकरेंची परराष्ट्र धोरणावर सडकून टीकामहापौरांचा प्रवेश लांबणारनव्या महापौरांच्या सूचनेनुसार महापौर बंगल्यात अंतर्गत सजावटीसह अन्य दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेने निविदा काढली आहे. ही निविदा भरण्याची अंतिम तारीख २७मार्च आहे. निविदाप्रक्रिया राबवून कार्यादेश दिल्यानंतर काम पूर्ण होण्यासाठी एक ते दीड महिन्याचा अवधी लागणार आहे. त्यामुळेमहापौरांचा बंगल्यातील प्रवेशआणखी लांबणार आहे.
18 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 02:39 AM
पोंडा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचे मॅगोकडून स्वागत

पोंडा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचे मॅगोकडून स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा :राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना मगोचे प्रदेश अध्यक्ष दीपक ढवळीकर म्हणाले की, फोंडा पोटनिवडणुकीत रितेश नाईक यांना भाजपची उमेदवारी मिळाली याचा आम्हाला आनंद आहे. रवी नाईक यांचे निधन झाले त्याच दिवशी आम्ही श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले होते की, रितेश नाईक यांना उमेदवारी द्यायला हवी. त्यासाठी भाजपचे आभार मानतो. युतीचा धर्म पाळताना आम्ही सर्वजण रितेश मागे उभे राहणार आहोत. केतन भाटीकर यांच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, राजकीय भवितव्य नजरेसमोर ठेवून त्यांनी पक्षांतर कले असेल. ते जरी रिंगणात असले तरी युतीच्या उमेदवाराला त्याचा कोणताही धोका नाही. मागच्या वेळी भाटीकर यांना जी मते मिळाली होती त्यामध्ये मगोच्या मतांचासुद्धा समावेश होता. त्यामुळेच ते त्यावेळेस अटीतटीची लढत देऊ शकले होते. यावेळी मगोची मते भाजपच्या मागे उभे राहणार आहेत. त्यांच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या. त्यामुळे ते मगोप सोडून गेले. अन्य पक्षांमध्येही असे महत्त्वाकांक्षी लोक पक्ष सोडून गेलेले आहेत. आमची ही युती २०२७ च्या विधानसभा निवडणुकीतदेखील कायम राहणार आहे. उमेदवारीबाबत समाधान फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने रखी नाईक यांचे पुत्र रितेश यांना तिकीट दिल्याने सरकारात घटक पक्ष असलेल्या मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, 'रवींचे निधन झाले, त्याच दिवशी मी त्यांचे पुत्र रितेश यांना तिकीट दिले जावे, अशी मागणी केली होती. माझ्यानंतर इतरांनीही या मागणीला पाठिंबा दिला. रवी हे आमचे चांगले मित्र होते. त्यांचे कार्य कुणीही विसरू शकणार नाही. रवी यांच्या वारशाचा विचार करता त्यांच्या पुत्रालाच तिकीट देणे योग्य ठरले.' वडिलांचा वारसा चालविण्याची संधी : रितेश उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रितेश नाईक व रॉय नाईक यांनी स्व. रवी नाईक यांच्या समाधीस्थळी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्याबरोबर भाजपचे काही कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी तपोभूमी येथे जाऊन स्वामी ब्रम्हेशानंद यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी नगरसेवक आनंद नाईक व रूपक देसाई उपस्थित होते. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रितेश नाईक यांनी पक्षाचे आभार मानले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्या वडिलांनी जो राजकीय वारसा निर्माण करून ठेवला आहे, तो पुढे येण्याची संधी मला मिळाली आहे. लोकांच्या विश्वासास पात्र ठरण्याचा मी १०० टक्के प्रयत्न करेन. त्यांच्या स्वप्नातील फोंडा घडवण्यासाठी मी सदोदित प्रयत्नशील राहीन. फोंडा भाजपमध्ये आम्ही सर्व एकत्र असून विश्वनाथ दळवी यांच्या सहकार्यानेच ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत. मगो-भाजप युती असल्याने मगोचे मला पाठबळ मिळणार आहे. वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांचा आशीर्वादसुद्धा माझ्या पाठीशी आहे.
96 shares
😊
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 02:29 AM
मध्यपूर्वेतील तणाव वाढलाः कतारच्या एल. एन. जी. प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला

मध्यपूर्वेतील तणाव वाढलाः कतारच्या एल. एन. जी. प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला

मध्यपूर्वेतीलइराणआणि अमेरिका-इस्रायल संघर्षाने आता भीषण वळण घेतले आहे.इराणनेकतारमधीलजगातील सर्वात मोठ्या गॅस निर्यात केंद्रांपैकी एक असलेल्या 'रास लफ्फान' एलएनजी प्रकल्पावर मिसाइल हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळेकतारच्यागॅस क्षमतेत १७ टक्क्यांची मोठी घट झाली असून, या नुकसानीची भरपाई करण्यासाठी तब्बल ५ वर्षांचा कालावधी लागू शकतो, अशी धक्कादायक माहिती 'कतार एनर्जी'ने दिली आहे. इराणचा दावा कतारने फेटाळलाइराणने हा हल्ला अमेरिकन तळांना लक्ष्य करण्यासाठी केल्याचा दावा केला होता. मात्र, कतारचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुलरहमान बिन जासिम अल थानी यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. "आमच्या नागरी सुविधांवर झालेले हे हल्ले कोणत्याही प्रकारे अमेरिकन हिताशी संबंधित नाहीत. इराणचे दावे धादांत खोटे असून ते आम्हाला मान्य नाहीत," अशा कडक शब्दांत त्यांनी इराणला सुनावले आहे. जगावर गॅस टंचाईचे सावट?कतार एनर्जीच्या माहितीनुसार, या हल्ल्यामुळे देशाला दरवर्षी सुमारे २० अब्ज डॉलर्सचा (१.६ लाख कोटी रुपये) महसूल गमवावा लागणार आहे. कतार आता अनेक देशांसोबतच्या करारांबाबत 'फोर्स मेज्योर' घोषित करणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूचे दर कडाडण्याची शक्यता असून ऊर्जा संकट गडद होऊ शकते. इराणविरोधात युरोपियन युनियन आक्रमकइराणच्या या 'अंधाधुंद' लष्करी कारवायांचा युरोपियन कौन्सिलने तीव्र निषेध केला आहे. युरोपियन नेत्यांच्या शिखर परिषदेत एक विशेष ठराव मंजूर करण्यात आला असून, नागरी पाणीपुरवठा आणि ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले त्वरित थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. युरोपियन युनियनने या संकटात कतार आणि बाधित देशांसोबत खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
1 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 20, 2026, 02:17 AM
विधानसभा निवडणुकीपूर्वी गोवा फॉरवर्ड पार्टी स्वतंत्र मार्ग तयार करणार

विधानसभा निवडणुकीपूर्वी गोवा फॉरवर्ड पार्टी स्वतंत्र मार्ग तयार करणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी:येत्या विधानसभा अधिवेशनाच्या दृष्टीनेगोवाफॉरवर्ड पक्ष वेगळी भूमिका घेणार आहे. यापुढे काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्षांच्या निर्णयांवर अवलंबून न राहतागोवाफॉरवर्ड पक्षाचा विस्तार हेच ध्येय ठेऊन काम करणार आहोत. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किमान दहा मतदारसंघात पक्षाची कार्यकारणी तयार करणार आहोत. त्यानंतर योग्य तो निर्णय घेऊ, असा नवीन वर्षाचा संकल्प गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी गुरुवारी जाहीर केला. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना आमदार सरदेसाई यांनी सांगितले की, काँग्रेसकडूनच आरोप होत असल्याने आता पुन्हा त्यांच्यासोबत खांद्याला खांदा देऊन चालणे जास्त शक्य होणार नाही. त्यामुळे आता आमदार व गोवा फॉरवर्ड पक्ष म्हणून पुन्हा लोकांमध्ये जाणार आहे. फातोड्र्ध्यातून याला सुरुवात करणार आहे. नंतर राज्यभर फिरणार आहे. माझ्या आतापर्यंतच्या अनुभवनातून वाटते की, २०२७ मध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विधानसभा निवडणूक होईल. त्या अनुषंगाने एप्रिल २०२७ च्या शेवटपर्यंत दहा मतदारसंघातील गोवा फॉरवर्डची कार्यकारणी समिती पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. काँग्रेसच्या सध्याच्या नेत्यांना वाटत असावे की, मी कॉंग्रेसमध्ये येणार आहे किंवा काँग्रेसच्या निर्णयांचा भाग होणार आहे. याच भीतीने विरोधी पक्षनेते किंवा इतर आमदार आरोप करत आहे. विधानसभेत मी जे काही केले किंवा सभापतींना सल्ला दिला हा कामकाजाचा भाग आहे. व्होट ऑफ अकाऊंट हेच यावेळी योग्य पर्याय होता. कारण २४ हजार कोटींचा अर्थसंकल्प कुठल्याही चर्चेशिवाय पास करणे हा लोकांवर अन्याय आहे. यापूर्वी मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असतानाही त्यांनी हा पर्याय वापरला होता. त्यात काहीच चुकीचे किंवा सेटींग म्हणण्यासारखे नाही, असेही सरदेसाई म्हणाले. काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी आगामी निवडणूक लक्षात घेत जर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला तरच ही समस्या सुटू शकते. हे सगळ्या गोष्टी ती खुचीं आपल्या हातातून जाऊ शकते या भीतीनेच होत आहे, असे सरदेसाई म्हणाले. काँग्रेस नेतृत्वाला दिलेला शब्द पाळला भाजपची साथ सोडल्यानंतर काँग्रेससोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी काँग्रेसचे केंद्रिय नेतृत्व राहुल गांधी यांना शब्द दिला होता की, २०२२ पर्यंत काँग्रेससोबत राहीन आणि तो शब्द मी शब्द पाळला, असे सांगून सरदेसाई म्हणाले, जेव्हा भाजपला सरकार बनविण्यासाठी एका आमदाराची गरज होती, तेव्हा देखील मी काँग्रेससोबत थांबलो. त्यानंतर काँग्रेसमधील आठजण फुटीर भाजपमध्ये गेले. आता चित्र वेगळे आहे. लोकांनाही हे आता कळायला लागले आहे. आता गोमंतकीयांना एका प्रस्थापित विरोधी पक्षाची गरज आहे आणि त्यासाठीच माझा पक्ष काम करणार आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले. विरोधकांमध्ये एकी नाही विरोधक कधीच सरकारविरोधात बोलताना दिसत नाही. आमच्यामध्येत आमचे पटत नाही, असेच होत चालले आहे, हे लोकांबरोबरच सरकारच्याही लक्षात येत आहे. प्रत्येक विरोधी पक्ष आपल्यापरीने विचार करत आहे. भाजप हा मजबूत पक्ष आहे, केवळ सक्षम युतीच भाजपला पराभूत करू शकते. पण हे होणे शक्य वाटत नाही. फोंडा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेशिवाय अर्थसंकल्प मंजूर करण्यात येईल याचा अंदाज मला पहिलाच आला होता, तेव्हाच मी यांना सांगितले होते. पण त्यांनी त्यावेळी काहीच हालचाली केल्या नाही, आणि आता निवडणूक आयोगाकडे जाण्याच्या गोष्टी ते करत आहे. राज्यपालांकडे जाण्याबाबत देखील काँग्रेसने आधी आरजी व इतर पक्षातील विरोधी आमदारांना सांगितले व नंतर ऐन क्षणी मला सांगण्यात आले. याचा अर्थ असाच होतो की मी त्यांना तिथे आलेला नको होतो. हे अंतर्गत वाद संपत नाही तोपर्यंत आम्ही लोकांच्या समस्या मांडूच शकत नाही, असेही आमदार सरदेसाई म्हणाले.
68 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 01:20 AM
सभापतींच्या निवडणुकीतील मतभेदांमुळे भाजप आणि महायुतींना धक्का

सभापतींच्या निवडणुकीतील मतभेदांमुळे भाजप आणि महायुतींना धक्का

भाजप आणि महायुतीसाठी हा धक्का मानला जात आहे, मात्र सभापती निवडीत तरी आघाडीमध्ये मतभेद निर्माण होतील का?, याकडे त्यांचेही लक्ष लागले आहे. विरोधकांकडून आघाडीतील नाराजीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आघाडीने अधिक सावध भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषदेत स्थिर कारभारासाठी एकजूट आवश्यक असल्याचे जाणून नेतेमंडळी संयमाने पावले टाकत आहेत. पुढील आठवड्यात सभापती निवडीच्या कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
60 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 12:58 AM
भारताचे व्यावहारिक परराष्ट्र धोरण-राष्ट्रीय हितसंबंधांचा समतोल

भारताचे व्यावहारिक परराष्ट्र धोरण-राष्ट्रीय हितसंबंधांचा समतोल

भारताचे परराष्ट्र धोरण मूलत: राष्ट्रीय हितसंबंधांवर आधारित आणि व्यवहार्य आहे. इस्रायल, इराण आणि आखाती देशांसोबत एकाच वेळी मजबूत संबंध राखण्याची क्षमता भारताने दाखवून दिली आहे. अशाप्रकारचे संतुलन राखणे अनेक देशांसाठी कठीण ठरते; मात्र भारताने ते प्रभावीपणे साध्य केले आहे. जागतिक संघर्षाच्या काळात मुक्त संवादाची भूमिकाही भारताने लावून धरली आहे.
81 shares
😊
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 12:30 AM
मध्यपूर्वेतील युद्धात इराणच्या प्रत्युत्तरात्मक कृतीमुळे आखाती प्रदेशाला मोठा फटका

मध्यपूर्वेतील युद्धात इराणच्या प्रत्युत्तरात्मक कृतीमुळे आखाती प्रदेशाला मोठा फटका

मध्य पूर्वेतील युद्धाला कारणीभूत ठरलेल्या अमेरिका-इस्रायल हल्ल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने केलेल्या कारवाईचा सर्वाधिक फटका आखाती प्रदेशाला बसला आहे. इराणने अमेरिकेच्या मालमत्तांना लक्ष्य करण्याबरोबरच ऊर्जा प्रकल्पांवरही हल्ले केले आहेत. त्यामुळे या प्रदेशातील हायड्रोकार्बन समृद्ध राजेशाहींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
97 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 12:21 AM
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी'ऑपरेशन लोटस'थांबवले, जिल्हा परिषदेत युतीचे सरकार स्थापन

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी'ऑपरेशन लोटस'थांबवले, जिल्हा परिषदेत युतीचे सरकार स्थापन

राष्ट्रवादी व शिवसेनेमध्ये रात्री उशीरापर्यंत ऑपरेशन लोटसला थोपवण्याच्या हालचाली सुरू होत्या. मकरंद पाटील व शंभूराज देसाई यांनी 33 सदस्य इनटॅक्ट ठेवले तरच ऑपरेशन लोटस थोपवले जाईल, अन्यथा भाजप स्वबळावर सत्तेवर आलेली दिसेल. फोडाफोडीच्या राजकारणाऐवजी महायुती म्हणून तिन्ही पक्षांनी एकत्र जिल्हा परिषदेत जाण्याच्यादृष्टीनेही चर्चा सुरू होती. त्यामुळे अंतिम क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने तीनही पक्ष जिल्हा परिषदेच्या सत्तेत दिसले तर आश्चर्य वाटायला नको.
98 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 12:08 AM
वैद्य आणि पवार यांनी कागदपत्रे दाखल केल्यानंतर भारतात नेतृत्व निवडीचा निकाल लागला

वैद्य आणि पवार यांनी कागदपत्रे दाखल केल्यानंतर भारतात नेतृत्व निवडीचा निकाल लागला

वैद्य, पवार यांनी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी अर्ज दाखल केले. तेव्हापर्यंत अध्यक्ष, उपाध्यक्ष होणार आहेत, याची कल्पना नसल्याची माहिती अध्यक्ष वैद्य, उपाध्यक्ष पवार यांनी सांगितले. दरम्यान, अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड होणार असल्याने भाजपच्या 38 सदस्यांना बालाजी सरोवर येथे सकाळी 10 वाजता बोलाविले. काही सदस्य सकाळी नऊलाच येऊन थांबले तर काही सदस्यांनी अकरा वाजता हजेरी लावल्याचे चित्र पहायला मिळाले.
87 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Mar 20, 2026, 12:01 AM
महायुति नेतृत्व संकटामुळे भारतीय संसदेची परिणामकारकता धोक्यात

महायुति नेतृत्व संकटामुळे भारतीय संसदेची परिणामकारकता धोक्यात

आता प्रश्न केवळ देशमुख विरुद्ध फरास असा राहिलेला नाही, तर महायुतीच्या नेतृत्वक्षमतेचा प्रश्न आहे. अंतर्गत मतभेद सोडवून एकसंघपणे काम करण्याची क्षमता सत्ताधाऱ्यांकडे नसेल, तर पुढील काळात असे प्रकार वाढण्याचीच शक्यता आहे. सभागृहातील हा गोंधळ प्रशासनालाही ‌‘मोकळे रान‌’ देणारा ठरू शकतो. कारण, लोकप्रतिनिधी परस्परांशीच झुंजत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण राहणार नाही.
6 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Mar 19, 2026, 11:56 PM
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर नव्या राजकीय समीकरणाचा उदय

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर नव्या राजकीय समीकरणाचा उदय

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाली आहे. या निवडीमुळे माजी आ. राऊत आणि पवार यांचा विधान परिषद निवडणुकीतील मार्ग बंद झाला असून, माजी आ. प्रशांत परिचारक, राजन पाटील, दिलीप माने यांच्यापैकी एकाला संधी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मात्र, भाजप पक्षश्रेष्ठी ऐनवेळी कोणाच्या गळ्यात विधान परिषद सदस्यत्वाची माळ घालतील याविषयी जिल्हाभर उत्सुकता आहे.
90 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 19, 2026, 03:56 PM
एम. एन. एस. ने 20 वर्षे साजरी केली, राज ठाकरे यांनी मराठी प्रेक्षकांना गुढीपाडवाच्या शुभेच्छा दिल्या

एम. एन. एस. ने 20 वर्षे साजरी केली, राज ठाकरे यांनी मराठी प्रेक्षकांना गुढीपाडवाच्या शुभेच्छा दिल्या

मुंबई:गुढीपाडवा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा हे आता एक समीकरण बनले आहे. मनसेच्या स्थापनेला १९ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, आज शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) मनसेचा भव्य पाडवा मेळावा पार पडला. रायगडच्या पायथ्याशी 'साध्या' पद्धतीने वर्धापन दिन साजरा केल्यानंतर, राज ठाकरे मुंबईत काय तोफ डागणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत राजकीय फटकेबाजी केली आहे.गुढीपाडवा आणि मनसेच्या प्रवासाचे २० वे वर्षराज "जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम मी आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. ९ मार्च २००६ ला आपला पक्ष स्थापन झाला आणि १९ मार्च २००६ ला आपली पहिली जाहीर सभा याच शिवतीर्थावर झाली. आज पक्षाला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. आनंदाची आणि भाग्याची गोष्ट अशी की, २० वर्षांनंतर बरोबर १९ मार्चलाच गुढीपाडवा आला आहे, मी याला एक शुभ संकेतच मानतो. निवडणुका आल्या आणि गेल्या, रणशिंग फुंकले गेले, हे सर्व झाले पण आपण जे उभे आहोत, ते महाराष्ट्रासाठी आहोत हे लक्षात ठेवा.",महाराष्ट्राचे गतवैभव आणि सत्तेचा आत्मविश्वास"मी आता जे काही बोलतोय, ते तुमच्या टाळ्या मिळवण्यासाठी बोलत नाहीये. महाराष्ट्राचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी मी जो शब्द दिला आहे, त्यासाठी भविष्यात आपण सत्ता हाती घेणारच, हा माझा आत्मविश्वास आहे. सध्या राज्यात पुढची तीन वर्षे कोणत्याही निवडणुका नाहीत, त्यामुळे कंत्राटदारांकडून पैसे खायला सगळे मोकळे झाले आहेत. आज देशातही एक प्रकारची धाकधूक आणि भीषण परिस्थिती आहे.Dhananjay Munde : 'महाराष्ट्रातल्या बड्या नेत्यांनी मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले होते', धनंजय मुंडे यांचं वक्तव्यसर्वसामान्य नागरिकांना साध्या सुविधा मिळणे कठीण झाले असून लोक सध्या तणावाखाली गॅसवर आहेत. खरं तर, काही गोष्टी आपल्याकडूनही राहून गेल्या आहेत." असंराज ठाकरेम्हणाले आहेत.'बाळासाहेबांचा कानमंत्र"पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "आज तुम्ही सर्वजण फुरसतीत आला आहात ना? मग जरा निवांत ऐका. मी ज्यावेळी राजकारणात आलो आणि माझे पहिले भाषण झाले, त्यानंतर मला आदरणीय बाळासाहेबांनी बोलावून काही महत्त्वाची वाक्ये सांगितली होती. ती वाक्ये एखाद्या स्क्रूप्रमाणे माझ्या डोक्यात फिट बसली आहेत. त्यांनी मला सांगितले होते की, "भाषण करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तू काय बोलला यापेक्षा तू लोकांना विचार करायला काय दिले, याला जास्त महत्त्व आहे." त्यामुळे भाषण करताना माझ्यावर नेहमी एकमानसिक दडपणअसते की, आज मी तुम्हाला नवीन काय देऊ? असे काय सांगू, ज्यामुळे तुम्ही आणि हे सरकारही विचार करायला लागेल?"
100 shares
😊
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 19, 2026, 03:49 PM
तेलाच्या किंमती कमी करण्यासाठी इराणवरील निर्बंध हटवण्याचा ट्रम्प यांचा विचार

तेलाच्या किंमती कमी करण्यासाठी इराणवरील निर्बंध हटवण्याचा ट्रम्प यांचा विचार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तेल-गॅसच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. फॉक्स बिझनेसला दिलेल्या एका मुलाखतीत अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेंटने गुरुवारी सांगितले की, ट्रम्प इराणच्या तेलावरून निर्बंध काढू शकतात. त्यांनी म्हणाले की, हे रशियन तेलावरील निर्बंध उठवण्यासारखे असेल हे एक तात्पुरते पाऊल असेल.स्कॉट बेसेंट पुढे सांगितले की, येत्या काही दिवसांत, आम्ही त्या इराणी तेल ावरून निर्बंध काढू शकतो जे सध्या समुद्रात आहे. हे सुमारे 140 मिलियन बॅरल आहे. हे 10 दिवसांपासून 2 आठवड्यांपर्यंत उपलब्ध असणार आहे. इराणच्या या तेल आणि गॅस स्थळांवर हल्ले आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद होण्याने उत्पादन कमी करण्यासाठी तेल उत्पादन करणाऱ्या देशांना हतबल व्हावे लागले आहे. यामुळे तेलाच्या किमती 50 टक्क्याहून अधिक वाढल्या आहेत.तेलाचे दर अन्...ब्रेंट क्रूडहे इराण युद्धापूर्वी 79 डॉलर प्रति बॅरल होते. ते 119 डॉलरच्या उच्च स्तरापर्यंत पोहोचले होते. ते सतत 100 डॉलर प्रति बॅरलहून अधिक आहे. गुरुवारी 115 डॉलरच्या स्तराला होते. बेसेंटने इराणी तेलावरून निर्बंधां उठवण्याच्या विचाराला 'मास्टरस्ट्रोक' म्हटले आहे. त्यांच्या मते, यामुळे इराणी तेलाचा वापर इराणच्या विरोधात केला जाईल ज्यामुळे पुढील 10 किंवा 14 दिवसांत दर कमी राहतील, जोपर्यंत आमचे हे अभियान सुरू आहे." तथापि, बेसेंटने या प्रकारच्या व्यवस्थेखाली इराणला पुढील दोन आठवड्यांपर्यंत निर्बंधमुक्त महसूल म्हणून होणारे मोठे फायदे याबाबत ट्रम्प प्रशासनाचं काय विचार करते यावर काही म्हणाले नाही.अमेरिकेत परिस्थिती बिकटट्रम्प यांना देशात आणि परदेशात जोरदार टीकेला सामोरे जावे लागत आहे. कारणतेलआणि गॅसच्या किमती दशकांतील उच्च स्तरावर पोहोचल्या आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेत गॅसची सरासरी किंमत 30 वर्षात दुसऱ्या सर्वात उच्च स्तरावर पोहोचली आहे. गॅसच्या किमतीत चार आठवड्यांत झालेली वाढ 2022 च्या गॅस संकटाच्या (जेव्हा रशियाने युक्रेनवर पूर्ण आक्रमण केले होते), 2008 च्या आर्थिक संकट आणि 1999 मध्ये OPEC द्वारे उत्पादन कपातीच्या तुलनेत अधिक आहे.जीडीपीची चिंता, निवडणूका, प्रतिकूल परिस्थितीऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत अमेरिकन अर्थव्यवस्था 1.4 टक्क्यांच्या अपेक्षेपेक्षा फक्त 0.7 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. हा विकास अशावेळी थांबला आहे जेव्हा बेरोजगारी 2002 नंतरच्या उच्च स्तरावर पोहोचली आहे आणि जेव्हा ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळाची सुरुवात केली आहे तेव्हापासून मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये 78,000 लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. अमेरिकेत लवकरच निवडणूक होणार आहे आणि त्याआधी अर्थव्यवस्थेची अशी वाईट स्थिती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी चिंता वाढवणारी आहे.
1 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Mar 19, 2026, 02:18 PM
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांबाबत आखाती आणि मुस्लिम देशांचा इशारा

इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांबाबत आखाती आणि मुस्लिम देशांचा इशारा

रियाध: इराणनं बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करत आखाती देशांवर जोरदार हल्ले सुरु ठेवले आहेत. यानंतर आत आखाती देशांनी इराणला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. आखाती आणि मुस्लिम देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची रियाधमध्ये एक बैठक पार पडली. इराणकडून सातत्यानं होत असलेले हल्ले, मध्य पूर्वेत सुरु असलेलं युद्ध या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला अझरबैझान, बहारिन, इजिप्त, जॉर्डन, कुवेत, लेबनॉन, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबिया, तुर्की, सीरिया, यूएईचे परराष्ट्र मंत्री उपस्थित होते.इराणनं त्यांच्याकडून सुरु असलेले हल्ले तात्काळ थांबवावेत, असं आवाहन १२ मुस्लिम देशांकडून करण्यात आलं आहे. इराणनं सुरक्षा परिषदेच्या प्रस्ताव २८१७ (२०२६) चं पालन करावं, यावर इराणनं जोर दिला. इराणनं हल्ले थांबवावेत, शेजारी देशांवरील कारवाया थांबवाव्यात, दहशतवादी संघटनांना पाठिंबा देऊ नये, अर्थ पुरवठा करु नये, अशा मागण्या मुस्लिम देशांनी केल्या आहेत.इराणनं होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक सुरळीत करावी, त्यात कोणतेही अडथळे आणू नयेत, बाब अल-मंदाबची सुरक्षा धोक्यात घालू नये, असं मुस्लिम देशांनी एका संयुक्त पत्रकात म्हटलं आहे. यावेळी मु्स्लिम देशांच्या मंत्र्यांनी आखात सहकार्य परिषदेच्या देशांवर इराणकडून झालेल्या हल्ल्यांबद्दल चर्चा केली.बॅलेस्टिक क्षेपणास्त्रं आणि ड्रोनचा वापर करुन इराण आखाती देशांवर सातत्यानं हल्ले करत आहे. या हल्ल्यांचा मुस्लिम देशांकडून निषेध करण्यात आला. इराणनं सुरुवातीला आखाती देशांमधील अमेरिकेच्या हवाई आणि नौदल तळांना लक्ष्य केलं. मात्र आता इराण आखाती देशांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करत आहे. खनिज तेलाचे शु्द्धीकरण प्रकल्प, गॅस प्रकल्प इराणकडून लक्ष्य करण्यात आले आहेत. यामुळे आखाती देशांचं प्रचंड नुकसान झालं आहे.आखातामधील बहुतांश देशांची अर्थव्यवस्था खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या निर्यातीवर अलवंबून आहे. पण गेल्या १५ दिवसांपासून या देशांची निर्यात जवळपास ठप्प झाली आहे. इराणनं ऊर्जा प्रकल्पांवर केलेले हल्ले, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या वाहतुकीची केलेली कोंडी यामुळे आखाती देशांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं आहे.
19 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Mar 19, 2026, 01:31 PM
शिरळा तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप महायुतीचा विजय

शिरळा तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप महायुतीचा विजय

विकास शहाशिराळा : शिराळा तालुक्यातजिल्हा परिषदव पंचायत समिती निवडणुकीत मोठी मुसंडी मारून पंचायत समितीवर झेंडा फडकवला.जिल्हा परिषदगटासाठी राष्ट्रवादी आघाडी ३ तर भाजप महायुती १ उमेदवार विजयी झाले आहेत. जिल्हा परिषदेत माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी पुन्हा एकदा करेक्ट कार्यक्रम केला आहे. त्यामुळे शिराळा तालुक्यातील विराज नाईक की राजेश्वरी नाईक यांना सभापतीपद मिळण्याची खात्री झाली आहे. जिल्हा परिषद गटासाठी विराज नाईक हे सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आले आहेत.यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी केली होती. यामुळे या निवडणुकीत मोठे यश मिळाले होते. तालुक्याला आतापर्यंत जिल्हा परिषदमध्ये माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांना अध्यक्ष व सभापतीपद, आमदार सत्यजित देशमुख यांना उपाध्यक्ष व सभापतीपद तसेच लोकनेते माजी विधानपरिषद सभापती शिवाजीराव देशमुख, दिवंगत नेते उदयसिंगराव नाईक, वैशाली नाईक यांना सभापतीपद मिळाले होते.जिल्हा परिषदमध्ये पहिल्यापासून शिराळा तालुक्याचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राजेश्वरी नाईक किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्याकडून विराज नाईक यांना सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे. यादृष्टीने राजकीय समीकरणे करण्यात येत आहेत.मांगले गटात विराज नाईक सर्वाधिक मतांनी निवडून आले आहेत तर वाकुर्डे बुद्रुक गटात राजेश्वरी नाईक यांनी मोठा विजय मिळवला आहे. तसेच या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी आघाडीने आपली सत्ता टिकवून ठेवली आहे. पंचायत समितीमध्ये माजी आमदार मानसिंगराव नाईक व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी ६ जागांवर विजय मिळवला आहे. शिराळा पंचायत समिती सभापती सम्राटसिंह नाईक, शिराळा नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक तसेच आता जिल्हा परिषद सभापतिपदी कोणत्या नाईक यांची वर्णी लागणार याचीच तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.
91 shares
😐