Achira News Logo
Achira News
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 01:53 AM
भारतीय राजकारण्यांनी कामगारांमध्ये एकता आणि सहकार्यावर भर दिला

भारतीय राजकारण्यांनी कामगारांमध्ये एकता आणि सहकार्यावर भर दिला

गोकुळ दूध संघाचे संचालक अंबरिषसिंह घाटगे म्हणाले, संघर्षामुळे काहीही चांगले होणार नाही. त्यामुळेच आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत. कार्यकर्त्यांनी मनातील किंतु- परंतु काढून टाकत भविष्यातही एकत्रित येऊन काम करण्याची तयारी ठेवावी. मागील काही काढू नका. काहीजणांना चांगलं बघवत नाही. त्यांच्यापासून सावध राहा. बिद्री साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मनोज फराकटे म्हणाले, आपल्या पाच वर्षांच्या कालावधीत आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सार्वजनिक आणि वैयक्तिक लाभाच्या योजना घरोघरी पोहोचवल्या आहेत. युतीतील सर्व घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. युतीचे उमेदवार मताधिक्याने निवडून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहे.
48 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 01:41 AM
आपल्या राजकीय शत्रूचा निर्णयः भारतीय राजकारणातील एकतेचे आवाहन

आपल्या राजकीय शत्रूचा निर्णयः भारतीय राजकारणातील एकतेचे आवाहन

राजकीय वैरी कोण हे ठरवावे लागेल ः उदय सामंत दापोली-मंडणगड विधानसभा मतदारसंघामध्ये जि. प., पं. स. निवडणुकीत युती करू शकलो नाही. त्याबाबत फार काही बोलणार नाही. त्याची कारणे काही असतील. पण, ज्यावेळी आपण एकसंघपणाने लढतो त्यावेळी विजयी होतो हे चिपळूण नगर परिषद निवडणुकीने दाखवून दिले. येथे प्रचारासाठी गृह राज्यमंत्री योगेश कदम आले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आपणदेखील होतो. त्यामुळे चिपळूणसारखा इतिहास घडवायाचा असेल तर आपला राजकीय वैरी कोण असेल हे आपण सर्वांनी ठरवायला हवे. आम्ही सांगतो म्हणून उबाठा राजकीय वैरी मानण्यापेक्षा आपण सर्वांनी राजकीय वैरी ठरविला पाहिजे. आपण जि. प.च्या नवीन इमारतीसाठी निधी दिला. चिपळूण न.प.साठी निधी आणला. चिपळूणसाठी 140 कोटीची नळपाणी योजना, नारायण तलाव, सांस्कृतीक केंद्रासाठी निधी साहेब तुम्ही दिलात. निधी कमी पडणार नाही याची खात्री बाळगा आणि शिंदे साहेबांच्या वाढदिनी जि. प. आणि सर्व नऊ पं. समित्या निवडून आणूया, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.
36 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 01:33 AM
थकबाकी वाढल्याने दंडाचा कर माफ करण्याची नगरसेवकांची मागणी

थकबाकी वाढल्याने दंडाचा कर माफ करण्याची नगरसेवकांची मागणी

ते म्हणाले, शास्ती करामुळे नगरपालिकेच्या थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे, त्यामुळे शासनाने हा कर पूर्णपणे माफ करावा. याला नगरसेवक एल. एन. शहा यांनी अनुमोदन दिले. यावर शिवसेनेचे नगरसेवक आनंदराव पवार व भाजपचे राजवर्धन पाटील यांनी, असा ठराव आम्ही यापूर्वीच शासनाला पाठवला आहे. तुम्ही वेगळे काय केले? असा सवाल उपस्थित करत जनतेला आश्वासन दिल्याप्रमाणे पालिकेनेच शास्ती कर माफ केला पाहिजे, अशी भूमिका मांडली. यावर, तुम्ही सर्वांनी साथ दिली तर आम्ही तो शासनाकडून माफ करून आणतो, असे नगराध्यक्ष मलगुंडे म्हणाले.
29 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 01:33 AM
तातडीची कारवाई आवश्यकः धोरण निश्चित होईपर्यंत'कायमस्वरूपी रसायनांचे'उत्पादन थांबवा

तातडीची कारवाई आवश्यकः धोरण निश्चित होईपर्यंत'कायमस्वरूपी रसायनांचे'उत्पादन थांबवा

संदर्भात देशात अद्याप कोणतीही ठोस धोरणात्मक निश्चिती नसताना अशा केमिकल्सचे उत्पादन करणे कोणाच्याही अधिकारात येत नाही, तसेच हे रसायन मानवी आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करणारे असल्याने त्याची निर्मिती तत्काळ थांबवण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी सभागृहात केली. ही रसायने पर्यावरणात दीर्घकाळ टिकून राहणारी असल्याने त्यांना ‌‘फॉरेव्हर केमिकल‌’ म्हटले जाते. या रसायनांमुळे कर्करोग, हार्मोनल बिघाड, प्रतिकारशक्ती कमी होणे, पाण्याचे व जमिनीचे प्रदूषण यांसारखे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, असा इशारा पर्यावरणतज्ज्ञ व आरोग्य अभ्यासकांनी यापूर्वीच दिला आहे. त्यामुळे या रसायनांच्या उत्पादन, वापर व विल्हेवाटीबाबत कडक नियमावली असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
97 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 01:25 AM
मुंबई उपमहापौरपदाची निवडणूक 7 फेब्रुवारीला

मुंबई उपमहापौरपदाची निवडणूक 7 फेब्रुवारीला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: येत्या ११ फेब्रुवारीला होणाऱ्यामुंबईमहापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी येत्या शनिवारी, ७ फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज सादर झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी १५ मिनिटे आधी अर्ज मागे घेण्याची संधी उमेदवाराला दिली जाणार आहे. ही निवडणूक आवाजी पद्धतीने हात उंचावून घेतली जाणार आहे. पीठासीन अधिकारी म्हणून पालिका आयुक्त भूषण गगराणी हे कामकाज सांभाळणार आहेत. पालिका निवडणूक निकालानंतर शिंदेसेना, भाजपने गट नोंदणी केली नव्हती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस दुखवटा असल्याने गटनोंदणी आणि महापौर निवड प्रक्रिया लांबली. सोमवारी भाजप व शिंदेसेनेने कोकण आयुक्त कार्यालयात नोंदणी केल्यानंतर महापौर निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. येत्या ११ फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौर निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी शनिवारी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. अर्जाच्या छाननीनंतर पीठासीन अधिकाऱ्यांकडून महापौर पदाच्या नावाची घोषणा केली जाते. त्यानंतर नवनियुक्त महापौरांकडून उपमहापौरांचे नाव जाहीर केले जाते. निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक ८९ तर शिंदेसेनेचे २९ असे मिळून ११८ नगरसेवक निवडून आल्याने महायुतीने बहुमताचा आकडा गाठला आहे. त्यामुळे भाजपचा महापौर होणार हे निश्चित झाले आहे. एक दोन दिवसांत महापौरांचे नावही जाहीर होईल. उपमहापौरपद शिंदेसेनेला मिळणार आहे. मात्र समित्यांचे अध्यक्षपद कोणाकडे हेही दोन - तीन दिवसांत स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादी (अजित पवार)चे ३ नगरसेवक शिंदेसेनेत सामील होणार आहेत. त्यामुळे शिंदेसेनेची सदस्य संख्या ३२ वर जाणार असून शिंदेसेनेची ताकद वाढणार आहे. राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक सहभागी होणार असल्याने महायुतीची नगरसेवक संख्या १२१ वर पोहचणार आहे.
73 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 4, 2026, 01:20 AM
माजी लष्करप्रमुखांच्या अप्रकाशित पुस्तकावर बोलण्यास राहुल गांधींचा नकार

माजी लष्करप्रमुखांच्या अप्रकाशित पुस्तकावर बोलण्यास राहुल गांधींचा नकार

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: विरोधी पक्षनेतेराहुल गांधीयांना माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील मजकुराबद्दल बोलण्यास परवानगी नाकारल्याच्या मुद्द्यावरून लोकसभेत मंगळवारी, सलग दुसऱ्या दिवशी गदारोळ झाला. या गदारोळात अध्यक्षांसमोरील टेबलावर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसेच पीठासीन अधिकाऱ्यांवर कागदाचे तुकडे भिरकावणाऱ्याआठ खासदारांना निलंबितकरण्यात आले. त्यात काँग्रेसच्या सात तर माकपच्या एका खासदाराचा समावेश आहे.लोकसभेचे कामकाज मंगळवारी दुपारी सुरू झाले तेव्हाराहुल गांधीयांनी पुन्हा माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा नामोल्लेख टाळून चीनच्या घुसखोरीच्या प्रसंगाचा तोच संदर्भ देण्यास सुरुवात केली. चीन आणि पूर्व लडाखमध्ये लष्कराचे जवान हुतात्मा झाले तो मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे असे त्यांनी सांगितल्यावर भाजप सदस्यांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला. पीठासीन अधिकारी कृष्णकुमार टेनेटी यांनी, ‘तुम्हाला बोलण्यास परवानगी देण्यात आली आहे परंतु लोकसभाध्यक्षांनी या मुद्द्यासाठी परवानगी नाकारल्याने तो मुद्दा मांडता येणार नाही’, असे राहुल गांधी यांना सांगितले.Praful Patel: राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबद्दल प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा; सर्व चर्चा संपवल्या, सुनेत्रा पवारांवरही स्पष्टच बोलले!यावर संतापलेल्या राहुल यांनी, ‘मी विरोधी पक्षनेता आहे. मला बोलण्यासाठी कोणाकडून परवानगीची काय गरज आहे’, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावरसंसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजुयांनी संसदेत प्रत्येक सदस्य अध्यक्षांच्या परवानगीनेच बोलतो, असे निदर्शनास आणून दिले. तरीही राहुल गांधी यांनी आपला मुद्दा न सोडल्याने टेनेटी यांनी इतर वक्त्यांची नावे पुकारण्यास सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेस खासदार घोषणाबाजी करत हौद्यात उतरले.सातवीतल्या पोरानं तब्बल 85 लाखांचे मोमो खाल्ले; कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकलीराहुल गांधी यांचे अध्यक्षांना पत्रसर्व गदारोळाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले. त्यात त्यांनी नमूद केले आहे की, 'सभापती, सभागृहाचे निष्पक्ष संरक्षक म्हणून, विरोधी पक्षाच्या सदस्यांसह प्रत्येक सदस्याच्या हक्कांचे रक्षण करणे ही तुमची संवैधानिक जबाबदारी आहे. सभागृहात बोलण्यापासून मला रोखणे हे परंपरांचे उघड उल्लंघन आहे. मुळात जेव्हा लोकसभाध्यक्ष सदस्याला कागदपत्रे सत्यापित करण्याची किंवा त्याचा संदर्भ घेण्याची परवानगी देतात. त्यानंतर प्रतिसाद देण्याची जबाबदारी सरकारवर असते. लोकसभेत मला बोलण्यापासून रोखणे हे केवळ या परंपरेचे उल्लंघन करत नाही तर विरोधी पक्षनेते म्हणून, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर बोलण्यापासून रोखण्याचा जाणूनबुजून प्रयत्न केला जात आहे. विरोधी पक्षनेत्याचा व प्रत्येक सदस्याचा बोलण्याचा अधिकार हा लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे'.Crime News : नऊ वर्षाच्या अफेअरनंतर लग्न, पण दोनच महिन्यात नवविवाहितेने नवऱ्याचा जीव घेतला, कारण ठरलं...२ एप्रिलपर्यंत...काँग्रेसचे खासदार माणिकम टागोर यांनी लोकसभाध्यक्षांसमोरील टेबलवर चढण्याचा प्रयत्न केला. या गोंधळामुळे तहकूब झालेले कामकाज पुन्हा सुरू होताच किरेन रिजिजू यांनी गोंधळी खासदारांना एप्रिलपर्यंत निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला व तो आवाजी २ मतदानाने मंजूर झाला. त्यानंतर काँग्रेससह अनेक विरोधी पक्षीय खासदारांनी राहुल व प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली.निलंबित खासदारांची नावेप्रशांत पडोळे (भंडारा गोंदिया)माणिकम टागोरहिबी एडनअमरिंदरसिंग राजा वारिंगगुरजितसिंग औजलाकिरणकुमार रेड्डीडीन कुरियाकोसेएस. वेंकटेशन (माकप)
85 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 01:11 AM
पराभूत उमेदवारांची मुंबईत नगरसेवक म्हणून फेरनिवडणूक

पराभूत उमेदवारांची मुंबईत नगरसेवक म्हणून फेरनिवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: नव्या सभागृहात नगरसेवक म्हणून अर्थात स्वीकृत सदस्य म्हणून आपली वर्णी लागावी यासाठी काही पराभूत उमेदवारांसह, तिकीट नाकारलेल्या काही माजी नगरसेवकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पण शिंदेसेनेकडून तिकीट नाकारलेल्या दोन माजी नगरसेवकांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती केली जाणार असल्याचे समजते. भाजपमधून मात्र अद्याप कोणत्याही नावाची चर्चा नाही. शिंदेसेनेने यंदा चार माजी नगरसेवकांना तिकीट नाकारले होते. त्यापैकी दोन नगरसेवकांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते, असे खात्रीलायकरीत्या कळते. संख्याबळानुसार स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होते. त्यानुसार भाजपच्या कोट्यातून चार सदस्य नियुक्त केले जातील. मात्र ते सदस्य कोण असतील, हे भाजपमधील नेतेही ठामपणे सांगू शकत नाहीत. भाजपची एकूण कार्यपद्धती पाहता ‘फिल्डिंग’ लावूनही काही फायदा नाही, याची ‘समज’ असलेल्या मंडळींनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. तर संख्याबळानुसार काँग्रेसचा एकच सदस्य नियुक्त होणार आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस हे मागाठाणेतून पराभूत झाले होते. त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. भाजपच्या पातळीवर मात्र शांतता आहे. ‘आमच्या पक्षात शेवटपर्यंत अंदाज बांधता येत नाही, त्यामुळे शांत राहणे योग्य’, अशी प्रतिक्रिया एका माजी ज्येष्ठ नगरसेवकाने दिली.
49 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 01:10 AM
पालिकेत भाजप-राष्ट्रवादीची युती, काँग्रेसचा दणदणीत विजय

पालिकेत भाजप-राष्ट्रवादीची युती, काँग्रेसचा दणदणीत विजय

काँग्रेसमध्ये संभ्रम; एकमत होईना महापालिकेत भाजप-राष्ट्रवादी अजित पवार युती झाली आहे. या युतीत शिवसेनाही असणार आहे. त्यामुळे महायुतीचे संख्याबळ 57 होते. विरोधी काँग्रेसकडे 18 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे 3, असे एकूण 21 संख्याबळ आहे. काँग्रेसने मंगळवारअखेर महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज नेला नव्हता. महापौर, उपमहापौर या दोन्ही पदांसाठी काँग्रेसनेच उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असा मतप्रवाह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात दिसत आहे. मात्र काँग्रेसचा अजून गटनेताही निश्चित झालेला नाही. महापौर, उपमहापौर पदाचा उमेदवार कोण असणार, हेही निश्चित झालेले नाही. स्थायी समितीत कोण जाणार, स्वीकृत नगरसेवक कोण होणार, हे सर्व निश्चित करूनच गटनेता निवड व्हावी, अशा अटी, शर्तींमुळे काँग्रेसचे घोडे अडले आहे.
50 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 12:55 AM
विकास कामेः दोन दृष्टिकोनांची कथा

विकास कामेः दोन दृष्टिकोनांची कथा

विकासकामांच्या तुलनेचा दाखला देताना ते म्हणाले, “मंद्रुळकोळे या एका गावासाठी मी दहा कोटींचा निधी दिला. विरोधकांनी संपूर्ण तालुक्यात मिळून सात कोटींची कामे आणली आणि त्याचेच फ्लेक्स लावून गाजावाजा केला. काम करणाऱ्या नेत्यामध्ये आणि दिखावा करणाऱ्यामध्ये हाच फरक आहे. कामे खेचून आणण्याची धमक असावी लागते आणि ती माझ्यात आहे, आमदार, राज्यमंत्री आणि आता पालकमंत्री म्हणून तालुक्याचा सर्वांगीण विकास केला आहे”.
80 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 12:38 AM
राजापूर नगरपरिषदेची नवीन महापौरांच्या नेतृत्वाखाली पहिली बैठक

राजापूर नगरपरिषदेची नवीन महापौरांच्या नेतृत्वाखाली पहिली बैठक

लोकनियुक्त नगराध्यक्षा हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली राजापूर नगर परिषदेची पहिली सभा झाली. मुख्याधिकऱ्यांच्या अनुपस्थितीत नगराध्यक्षा खलिफे यांनी आपल्या अनुभवानुसार ही सभा कौशल्याने हाताळण्याचा प्रयत्न केला. मात्र काही महत्वाच्या विषयांबाबत प्रशासनाकडून निश्चित माहिती तत्काळ देण्यास असमर्थतता दर्शवण्यात आल्याने त्याबाबत नगरसेवकांकडून नाराजी व्यक्तकरण्यात आली. या सभेच्या विषय पत्रिकेवर तब्बल 33 विषय ठेवण्यात आले होते. त्यापैकी बरेचसे विषय प्रशासकीय पातळीवरील कामकाजाच्या मंजुरीचे होते. त्यातील अन्य काही विषयांवर सभागृहात नगरसेवकांनी चर्चेत सहभाग घेत आपली मते मांडली. सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष विनय गुरव, बांधकाम सभापती सुबोध पवार, नगर परिषदेचे पाणीपुरवठा समितीचे सभापती सौरभ खडपे, सत्ताधारी तसेच विरोधी गटनेते ॲड. जमीर खलिफे, ॲड. राहुल तांबे, सुलतान ठाकूर, सुभाष बाकाळकर, महेश शिवलकर, दिलीप चव्हाण आदींचा समावेश होता.
87 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 12:32 AM
लोकसभा अध्यक्षांनी मला बोलण्यास रोखले, राहुल गांधींचा आरोप

लोकसभा अध्यक्षांनी मला बोलण्यास रोखले, राहुल गांधींचा आरोप

विरोधी पक्षनेतेराहुल गांधीयांनी मंगळवारीलोकसभाअध्यक्षओम बिर्लायांना पत्र लिहून सरकारच्या इशाऱ्यावर आपल्याला सभागृहात बोलण्यापासून रोखल्याचा आरोप त्यांच्यावर केला. लोकशाहीवरील हा काळा डाग असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले. विरोधी पक्षनेता व प्रत्येक सदस्याला सभागृहात बोलण्याचा अधिकार हा लोकशाही व्यवस्थेचे अभिन्न अंग आहे. मात्र, त्या मतस्वातंत्र्याकडेच दुर्लक्ष होत असल्याने अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली असल्याचेराहुल गांधीयांनी म्हटले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा होता आणि विरोधी पक्षनेता म्हणून मला राष्ट्रीय सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर बोलण्यापासून जाणूनबुजून रोखले जात आहे, हे गंभीर आहे. विरोधी पक्षाच्या लोकशाही हक्कांचे संरक्षण करणे ही लोकसभेच्या अध्यक्षांची घटनात्मक जबाबदारी आहे, असे राहुल गांधी यांनी या पत्रात म्हटले आहे.
86 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 12:20 AM
आत्मचरित्रातील वादग्रस्त संदर्भांमुळे भारतीय संसदेने आठ खासदारांचे निलंबन केले

आत्मचरित्रातील वादग्रस्त संदर्भांमुळे भारतीय संसदेने आठ खासदारांचे निलंबन केले

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली: माजी लष्करप्रमुख मनोज एम. नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रातील संदर्भांवरून लोकसभेत सुरू असलेल्या गोंधळादरम्यान मंगळवारीलोकसभाअध्यक्षांच्या दिशेने कागद भिरकावल्याप्रकरणी ८ खासदारांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले. यातकाँग्रेसचे७ व माकपच्या एका सदस्याचा समावेश आहे. सोमवारी विरोधी पक्षनेतेराहुल गांधीयांनी जनरल नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रातील काही संदर्भ देत चीनशी झालेल्या संघर्षाचा मुद्दा उपस्थित केला होता. मंगळवारीही हाच मुद्दा मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, अध्यक्षांनी त्यांना बोलण्याची परवानगी नाकारली. यादरम्यानराहुल गांधीयांनी या पुस्तकातील लेख सत्यापित करून पटलावर मांडला. पण त्यांना बोलण्याची परवानगी नाकारून अध्यक्षांनी पुढील वक्त्यांची नावे पुकारताच सभागृहात गोंधळ उडाला. कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले. यादरम्यान सदस्यांनी अध्यक्षांच्या दिशेने काही कागदे भिरकावली. यानंतर अध्यक्षांनी बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले जात असल्याचे जाहीर केले. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सभागृहात कागदपत्रे भिरकावल्याप्रकरणी आठ सदस्यांची नावे जाहीर केली. सभागृहाचा अवमान आणि अध्यक्षांच्या आसनाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याच्या आरोपावरून या सदस्यांना नियम ३७४ (२) अन्वये निलंबित करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला व सभागृहाने आवाजी मतदानाने त्यास मंजुरी दिली. संसद परिसरात निदर्शने निलंबित सदस्यांनी संसद परिसरात सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यात राहुल गांधी,काँग्रेससरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे इतर सदस्यही सहभागी झाले होते. लोकसभेचे माजी सरचिटणीस पी. डी. आचारी यांच्यानुसार, संसदेच्या कामकाजाशी संबंधित कागदपत्रांचाच संदर्भ नियम ३७४ (२) नुसार देता येऊ शकतो. एकदा सादर केलेली कागदपत्रे सत्यापित झाली की त्या अनुषंगाने सदस्यांनी मांडलेल्या अनेक मुद्द्यांवर उत्तर किंवा स्पष्टीकरण देणे ही सरकारची जबाबदारी आहे. या नियमात संबंधित दस्तऐवज किंवा कागदपत्रे प्रकाशित आहेत की अप्रकाशित, याचा स्पष्टपणे असा उल्लेख नाही. निलंबित सदस्यांत काँग्रेसचे अमरिंदरसिंग, राजा वडिंग, गुरदीपसिंग औजला, हिबी ईडन, डीन कुरियाकोस, प्रशांत पडोळे, किरणकुमार रेड्डी आणि माणिकम टागोर आणि माकपचे एस. वेंकटेशन यांचा समावेश आहे. अध्यक्षांच्या दिशेने कागदपत्रे फेकण्यात आली तेव्हा अध्यक्षांच्या आसनावर कृष्णा प्रसाद टेनेटी हे सदस्य होते.
97 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 4, 2026, 12:00 AM
क्राउन इस्टेटच्या व्हिक्टरी हाऊसच्या नूतनीकरणामुळे वीरास्वामीचे भविष्य धोक्यात, कायदेशीर लढाईला तोंड फुटले

क्राउन इस्टेटच्या व्हिक्टरी हाऊसच्या नूतनीकरणामुळे वीरास्वामीचे भविष्य धोक्यात, कायदेशीर लढाईला तोंड फुटले

वादाचे मुख्य कारण म्हणजे, क्राऊन इस्टेटचा व्हिक्टरी हाऊसच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव. या प्रकल्पात रेस्टॉरंटचा काही भाग कार्यालयांमध्ये रूपांतरित करण्याचा विचार असून, प्रवेशमार्गात बदल होणार आहेत. त्यामुळे रेस्टॉरंट चालवणे अशक्य होईल, असा दावा मालक रंजित माथ्राणी आणि नमिता पंजाबी यांनी केला आहे. कायदेशीर लढाई सुरू असली, तरी शताब्दी वर्ष पूर्ण होण्याआधीच ‌‘वीरस्वामी‌’ बंद पडण्याचा धोका कायम आहे.
59 shares
😢
Loksatta logo
Loksatta
Feb 3, 2026, 08:35 PM
आर्थिक अडचणीच्या काळात भारत सरकारने कठोर धोरण स्वीकारले

आर्थिक अडचणीच्या काळात भारत सरकारने कठोर धोरण स्वीकारले

मुंबईःमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वित्त विभागाची सूत्रे हाती घेताच ‘लाडकी बहीण’सारख्या योजनांमुळे तिजोरीवर पडणारा ताण लक्षात घेऊन काटकसरीचे धोरण स्वीकरण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत. त्यानुसार सरकारच्या विविध विभागात होणाऱ्या मनमानी खरेदीला चाप लावण्यात आला असून १५ फेब्रुवारीपासून कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावांना मान्यता देऊ नये, निविदा काढू नयेत, असे आदेश वित्त विभागाने सर्व विभागांना दिले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली असली तरी त्यांच्याकडे वित्त विभागाची जबाबदारी देण्यात आलेली नाही. सुनेत्रा पवारांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून सरकारमध्येही त्या अजून रुळलेल्या नाहीत. अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया जटिल असते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करूनच वित्त विभाग आपल्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. यानुसार वित्त विभागाचा कारभार हाती घेताच फडणवीस यांनी विविध विभागांचा, योजनांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. या दरम्यान आर्थिक वर्ष संपत आल्याने विभागाला मिळालेला निधी परत जाऊ नये म्हणून खर्चाचा सपाटा अनेक विभागांनी लावला आहे. आधीच ‘लाडकी बहीण’सारख्या योजनांमुळे सरकारी तिजोरीवर ताण पडत असताना केवळ निधी खर्च करण्यासाठी काही विभागांकडून होणाऱ्या खरेदीवरील उधळपट्टीवर वित्त विभागाने आक्षेप घेतला. विभागांकडे उपलब्ध निधीच्या मर्यादेत औषधे खरेदीस या निर्बंधातून वगळण्यात आले आहे. आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागास औषधे खरेदीस परवानगी देण्यात आली आहे. तसेच, केंद्र पुरस्कृत योजना व त्या अंतर्गत राज्य हिस्सा तसेच बाह्य सहाय्यित प्रकल्पांतर्गत खरेदीच्या प्रस्तावांनाही या निर्बंधातून वगळण्यात आले आहे. जिल्हा वार्षिक योजना तसेच आमदार, खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून खरेदीसंबंधीचे प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करता येतील. मात्र त्यावर प्रकरणपरत्वे निर्णय घेण्याचे अधिकार वित्त विभागाने आपल्याकडे ठेवले आहेत. या निर्बंधातून चालू आर्थिक वर्षात कार्यालयाच्या दैनंदिन वापरातील उपभोग्य वस्तूच्या मर्यादित खरेदीस वगळण्यात आले आहे. तथापि, पुढील वर्षात आवश्यक असणाऱ्या वस्तूंची आगाऊ खरेदी करता येणार नाही.
69 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Feb 3, 2026, 07:07 PM
प्रफुल्ल पटेलांचा अजित पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा

प्रफुल्ल पटेलांचा अजित पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा

नवी दिल्ली :राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही. या स्पर्धेत नाही, असे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी स्पष्ट करत नेतृत्वाच्या वादातून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. अजित पवार व शरद पवार यांच्यामध्ये कथित विलीनीकरणाबाबत चर्चा झाल्याच्या मुद्द्यावर पटेल यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढण्याचा निर्णय झाला होता, असे पटेल यांनी नमूद केले. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचा पक्ष प्रफुल पटेल व सुनील तटकरे या दोन नेत्यांनी ताब्यात घेतल्याची टीका होऊ लागली आहे. पटेल हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून त्यांनीच अध्यक्ष होण्याची विनंती केली आहे. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतरही प्रफुल पटेल यांच्याभोवतीचा वाद शमलेला नाही. त्या संदर्भात मंगळवारी दिल्लीतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये, योग्य व्यक्तीच राष्ट्रीय अध्यक्ष होईल व माझ्याव्यतिरिक्त दुसरी व्यक्ती हे पद सांभाळेल, असे स्पष्टीकरण पटेल यांनी दिले. मी अध्यक्ष होणार असे कधीही म्हणालो नाही.राज ठाकरेवा इतर कोणी नेत्याचा आमच्या पक्षाशी संबंध काय, असा प्रश्न पटेल यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घडी पूर्णपणे बसवण्याला आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा विषय सध्या आमच्यासमोर नाही. उपमुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षनेता नियुक्त केला असून आता राष्ट्रीय अध्यक्ष नियुक्त केला जाईल. विलीनीकरणाचे पुढे बघू, असेही पटेल म्हणाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेपुणेआणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.अजित पवारयांच्याकडे या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी होती. त्यात बदल करण्यात आला नाही.
21 shares
😢
Loksatta logo
Loksatta
Feb 3, 2026, 06:51 PM
भारत-अमेरिका व्यापार करारामुळे संवेदनशील कृषी उत्पादनांचे संरक्षण, नव्या संधी उपलब्ध

भारत-अमेरिका व्यापार करारामुळे संवेदनशील कृषी उत्पादनांचे संरक्षण, नव्या संधी उपलब्ध

भारत-अमेरिका व्यापार करारात भारतीय अर्थव्यवस्थेतील संवेदनशील अशा कृषी आणि दुग्धजन्य उत्पादनांना संरक्षण देण्यात आल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले. कराराबाबत या आठवड्यात संयुक्त निवेदन जारी केले जाईल असे सुत्रांनी नमूद केले. हा करार सातत्यपूर्ण संयम आणि संतुलित धोरणाचा परिणाम आहे अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्याचे वर्णन केले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी करारावर टीका केली. या करारामुळे शेतकरी, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, उद्योजक आणि कुशल कामगारांसाठी अभूतपूर्व संधी उपलब्ध होतील, असेही पीयूष गोयल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. गोयल म्हणाले, ‘राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचा उपयोग करून पंतप्रधानांनी अमेरिकेशी व्यापार करार अंतिम केला. हा आमच्याशी स्पर्धा करणार्‍या सर्व देशांच्या तुलनेत भारतासाठी सर्वोत्तम आहे. सरकार संसदेत या करारावर निवेदन देऊ इच्छित होते; मात्र विरोधी पक्षांच्या भूमिकेमुळे ते शक्य झाले नाही, असेही त्यांनी नमूद केले. बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत निर्णायक भूमिका बजावत असून जग भारताच्या बाजूने झुकू लागले आहे, असे ठाम मत पंतप्रधाननरेंद्र मोदीयांनी मंगळवारी व्यक्त केले. ‘एनडीए’च्या संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना त्यांनी भारत-युरोपीय संघ आणि भारत-अमेरिका व्यापार करारांचा संदर्भ देत भारताचे वाढते जागतिक महत्त्व अधोरेखित केले. भारत, अमेरिका लवकरच कराराची तपशीलवार माहिती देतील. करारावर सही आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर माहिती जाहीर केली जाईल.– पीयूष गोयल, केंद्रीय वाणिज्य मंत्री कृषी उत्पादनांच्या किमती वाढून अमेरिकेतील शेतकर्‍यांचा फायदा होईल. याद्वारे अर्थव्यवस्था बळकट होईल.– ब्रुक रोलीन्स, कृषिमंत्री, अमेरिका व्यापार कराराने भारताच्या निर्यातीला आणखी बळ मिळणार आहे.– निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री हा करार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांचे रक्त आणि घाम विकला आहे. हा देशाच्या हिताशी सरळसरळ विश्वासघात आहे.–राहुल गांधी,विरोधी पक्षनेते प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षित असलेला भारत-अमेरिका व्यापार करार आणि रुपयाच्या मजबुतीमुळे बाजाराचे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने मंगळवारी मोठी झेप नोंदवली. सलग दुसर्‍या दिवशाच्या या मुसंडीत, सेन्सेक्स २,०७२.६७ अंशांनी वधारून, ८३,७३९.१३ पातळीवर स्थिरावला. निफ्टीने देखील ६३९.१५ अंशांची कमाई करून २५,७२७.५५ पातळीवर बंद नोंदवला. दुसरीकडे रुपया १२२ पैशांनी वधारून अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ९०.२७ पातळीवर बंद झाला. मंगळवारी ते सर्वोत्तम कामगिरी करणारे आशियाई चलन ठरले.
94 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 04:10 PM
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आल्याने महाराष्ट्रातील राजकीय परिदृश्य ढवळून निघाले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आल्याने महाराष्ट्रातील राजकीय परिदृश्य ढवळून निघाले

Today's India Maharashtra Breaking News in Marathi LIVE: महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरून वेगवेगळे अंदाज, तर्कवितर्क, शक्यता वर्तवण्यात येत आहेत. वेगवेगळे नेते वेगवेगळे दावे करत असल्याने या विषयाबाबतचा संभ्रम वाढतच चालला आहे. याबाबत आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात आणि भाजपा नेतृत्वाकडून काय सांगितलं जातं, याबद्दल उत्सुकता आहे. त्याचवेळी भारतासाठी एक आनंदाची बातमी अमेरिकेतून आली आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदीयांच्याशी फोनवरून चर्चा झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षडोनाल्ड ट्रम्पयांनी टॅरिफ कपातीची घोषणा केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेतेराहुल गांधीयांच्या भाषणावरून काल लोकसभेत गदारोळ झाला होता. आता आज त्याचे काय पडसाद उमटतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. या आणि अशा सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे LIVE UPDATES... LIVE मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मंगळवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. आडोशी बोगद्याजवळ एक गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. टँकरमधून गॅस लिक झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यामुळे तातडीने मुंबई -पुणे एक्स्प्रेसवरील वाहतूक थांबवण्यात आली. कर्जत शहरात अजित पवार यांच्या श्रद्धांजलीचे बॅनर काढून टाकण्यात आले. त्याचा व्हिडीओ पोस्ट करत आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला. याची चौकशी करून सरकारने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. माझ्या मतदारसंघात कर्जत शहरात नागरिकांनी अत्यंत दुःखी भावनेने आणि जड अंतःकरणाने लावलेले मा. अजितदादांच्या श्रद्धांजलीचे फ्लेक्स नगरपंचायतीने अत्यंत वाईट पद्धतीने काढून टाकले. ही बाब अत्यंत संतापजनक, मा. अजितदादांचा अवमान करणारी, नागरिकांच्या भावनांचा अनादर करणारी आणि त्यांच्या…pic.twitter.com/y5T2AUKZ7X अजित पवार यांच्या अस्थींचे मंगळवारी मुंबईतील समुद्रात विसर्जन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आणि आमदार शिवाजीराव गर्जे यांनी अस्थींचे पूजन केले आणि त्या समुद्रात विसर्जित केल्या. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विधीपूर्वक मुंबईतील समुद्रात विसर्जन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष मा. आमदार श्नी. शिवाजीराव गर्जे यांनी अस्थींचे पूजन करून त्या समुद्रात विसर्जित…pic.twitter.com/kRxeCV0GiL ठाण्यातही अजित पवार यांच्या अस्थींचे पूजन करून विसर्जन करण्यात आले. यावेळी ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. आदरणीय दादांना अखेरचा निरोप...!📍ठाणेpic.twitter.com/f1yXsYRtBp "अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल फक्त आम्हालाच नाही, तर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना, आमदारांनाही शंका आहेत. त्यामुळे या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी झाली पाहिजे", अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली. "केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जर मला कधी विमानतळावर भेटले, तर तुम्ही छोट्या आणि खासगी विमानाने प्रवास करू नका, असे मी त्यांना सांगणार आहे", असे आश्चर्यजनक विधान अनिल देशमुख यांनी केले. अजित पवार यांच्या निधनामुळे बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद रिक्त झाले. या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीसाठी सुनील तटकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. "आपण आज पुणे व बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारत आहात. आभाळाएवढे दुःख बाजूला सारून आपण महाराष्ट्राला सावरण्यासाठी जे धैर्य दाखवत आहात, ते शब्दांच्या पलीकडले आहे", असे तटकरे म्हणाले. विरोधी पक्षनेत्याला लोकसभेमध्ये बोलू दिले जात नाही असा आरोप करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. "इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय सुरक्षेसारख्या गंभीर प्रश्नावर लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेत्याला बोलू दिले जात नाहीये. जनरल नरवणे यांचे विधान आणि एपस्टिन प्रकरणावरून मोदीजी इतके का घाबरले आहेत?", असा सवाल राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींनी केला. इतिहास में पहली बार, राष्ट्रीय सुरक्षा जैसे गंभीर मुद्दे पर लोकसभा में नेता प्रतिपक्ष को बोलने नहीं दिया जा रहा है।आख़िर जनरल नरवणे के बयान और एपस्टीन मामले पर मोदी जी इतने घबराए हुए क्यों हैं?pic.twitter.com/zKJJpZX7uq आगामी टी२० विश्वचषक २०२६ मधील भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या पाकिस्तान सरकारच्या निर्णयावर भारताचे विश्वविजेते माजी कर्णधार कपिल देव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "पाकिस्तानचा हा निर्णय भारतापेक्षा पाकिस्तानच्या स्वतःच्या क्रिकेट भविष्यासाठी अधिक घातक ठरेल. हा केवळ राजकारणाचा किंवा प्रतिमेचा प्रश्न नाही, तर थेट तरुण क्रिकेटपटूंच्या करिअरचा प्रश्न आहे. जर हा निर्णय खेळाडूंनी घेतला असेल, तर त्यांनी समोर येऊन तसे सांगावे. पण जर बोर्ड सांगत असेल की तुम्ही खेळू नका, तर यामुळे तुमच्या देशाची प्रतिष्ठा खालावते." (वाचा संपूर्ण बातमी) छत्रपती संभाजीनगर महापालिकेत महापौरपदासाठी AIMIM आपला उमेदवार रिंगणात उतरवण्याची शक्यता. पक्षाचे ३३ नगरसेवक विजयी. बहुमताच्या आकड्यापासून बरेच दूर. मात्र, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेसोबत जाण्याचा, काही तडजोड करण्याचाही विचार करू; खासदार इम्तियाज जलील यांचं सूतोवाच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आजही डोकलाम मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. अप्रकाशित पुस्तकातील दाखले देणं नियमबाह्य असल्याचं सांगत सत्ताधाऱ्यांनी त्यांना विरोध केला. त्यावरून बरीच शाब्दिक चकमक झाली. त्याचवेळी, काही विरोधी खासदारांनी सभापतींच्या आसनाच्या दिशेने कागदाचे तुकडे भिरकावले. Budget session of Parliament | In connection with the uproar in Lok Sabha and the incident of papers being thrown towards the Chair, six Opposition MPs, including Hibi Eden, Amarinder Singh, Raja Warring, Manickam Tagore, Gurjeet Singh Aujla, Prashant Yadaorao Padole and Kiran…pic.twitter.com/8YFf759b6t उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. राज्य सरकारने याबाबत आज पत्रक काढलं. अजित पवारांकडे या दोन जिल्ह्यांची जबाबदारी होती, ती आता सुनेत्रा पवारांकडे देण्यात आली आहे. नाशिक- महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपने हिमगौरी आडके आणि उपमहापौरपदासाठी मच्छींद्र सानप यांच्या उमेदवारीची घोषणा भाजप नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली. आज सकाळी भाजपाच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेच आपल्या पक्षाचे नेतृत्व सोपवायचे आहे, असे विधान प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सुनेत्रा पवार यांच्याकडे जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आमच्यापुढे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय नाही, सर्वात आधी आम्हाला आमच्या पक्षातील मुद्दे सुरळीत करु द्या, इतर कोणत्याही विषयावर बोलणे आता योग्य नाही, असेही पटेल म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा निर्णय माझ्याशिवाय होईल, मी त्या शर्यतीत नाही, असे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. मागील काही दिवसांपासून अध्यक्षपदाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पटेल यांनी हे विधान केले. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानं काहींच्या पोटात दुखतंय. मात्र, विधिमंडळ पक्षनेता कोणाला करायचे हा प्रश्न आमच्या पक्षाचा आहे, असंही पटेल म्हणाले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दशक्रिया विधी होणार नाही, अशी माहिती श्रीनिवास पवार यांनी दिली . तिसऱ्या दिवशीच सर्व विधी पूर्ण केले असल्यामुळे आता दशक्रिया विधी होणार नसल्याची त्यांनी सांगितले. 'जेव्हा जेव्हा राजकीय व्यक्तीचा अपघात होतो आणि त्यामध्ये व्यक्ती दगावते, तेव्हा प्रत्येक वेळी साहजिकच त्यांचे नातेवाईक आणि विरोधकांना संशय येतो. त्या संदर्भातील चर्चा होणे चुकीचे नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याचा अहवाल लवकरच समोर येईल, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. कल्याण डोंबिवलीची महापौरपदाची निवड बिनविरोध करण्यात आली. महापौरपदी हर्षाली थविल यांची निवड करण्यात आली आहे. पुण्याचे महापौर आणि उपमहापौर ठरले असून भाजपाने नावांची घोषणा केली. महापौरपदी मंजूषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तर उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर यांच्या नावाची घोषणा झाली आहे. मराठी एकीकरण समितीने आज मीरा- भाईंदर मध्ये मराठी महापौर व्हावा या मागणीसाठी आंदोलन केले आहे. यावरुन सरनाईक यांनी टाकी केली. "मराठी एकीकरण समिती कुठून आली, नरेंद्र मेहता आमदार झाले तेव्हा आंदोलन का केले नाही? आम्हाला पाठिंबा दिला असता तर आंदोलनाची वेळ आली नसती, अशी टीका मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी एकीकरण समितीवर केली. खासदार शरद पवार यांनी आज अचानक दिल्ली दौरा रद्द केला असून आता बारामतीसाठी रवाना झाले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आता पवार यांनी अचानक दिल्ली दौरा रद्द करुन बारामतीसाठी रवाना झाले आहेत. मिरा -भाईंदरमध्ये भाजपाने डिंपल मेहता यांचे नाव महापौर पदासाठी जाहीर केले. दरम्यान, आता मेहता यांना विरोध सुरू झाला आहे. मिरा -भाईंदरमध्ये मराठी व्यक्तीच महापौर व्हावा अशी मागणी मराठी एकिकरण समितीने केली आहे. याबाबत आज समिती आंदोलन करणार आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे, यामुळे त्यांच्या आजच्या सभांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरहून हे हेलिकॉप्टर निघणार होते पण तांत्रिक बिघाड झाल्यमुळे रद्द करण्यात आले असल्याची माहिती समोर आली. मुंबईत भाजप आणि शिवसेनेच्या गटनोंदणीनंतर महापौरपदाच्या निवडीबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. यात भाजपकडून रितू तावडे, राजश्री शिरवाडकर, शितल गंभीर यांची नावं आघाडीवर आहेत. येत्या ४८ तासांत भाजपकडून मुंबईच्या महापौर कोण होईल याचं नाव जाहीर केलं जाऊ शकतं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन होऊन पाच दिवस उलटले. या दु:खातून सावरत असतानाच आता अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये जय पवार वडिलांसोबतचा एक फोटो ठेवला आहे. या फोटोला त्यांनी बाबा, 'तुमची खूप आठवण येते', ही कॅप्शन दिली आहे. Missing you a lot Dad 💔#बाबाpic.twitter.com/rMoLhSaNop दिल्ली: भारत-अमेरिका व्यापार करारावर खासदार सस्मित पात्रा म्हणाले, "हे एक अत्यंत सकारात्मक पाऊल आहे. हा करार युरोपियन युनियन-भारत मुक्त व्यापार करारानंतर आणि त्यापूर्वी झालेल्या यूके कराराच्या पार्श्वभूमीवर होत आहे, आणि आपण सध्या ज्या जागतिक आव्हानांना सामोरे जात आहोत, ते पाहता, हा व्यापार करार ती आव्हाने कमी करण्यास मदत करेल. यामुळे सहकार्याची नवीन क्षेत्रे खुली होतील. कमी झालेल्या शुल्कांमुळे देशाला आणि त्याच्या निर्यातीला अमेरिकेत बाजारपेठा शोधण्यासही मदत होईल. केवळ व्यापार आणि वाणिज्यच नव्हे, तर विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रातही संयुक्त सहकार्याची संधी मिळेल. या महिन्यात दिल्लीत होणाऱ्या 'एआय ग्लोबल इम्पॅक्ट समिट'च्या अगदी आधी हा करार होत असल्याने, ही एक अशी संधी आहे जिथे अमेरिकन तंत्रज्ञान आणि भारतीय उत्पादने एकत्र काम करू शकतात. मी याकडे एक अत्यंत सकारात्मक पाऊल म्हणून पाहतो." #WATCH| Delhi: On India-US trade agreement, BJD MP Sasmit Patra says, "It’s a very positive step... As it comes on the heels of the EU‑India FTA and, prior to that, the UK deal, and given the global headwinds we are facing, this trade deal will help lessen those headwinds. It…pic.twitter.com/XAw6KpfFEV पश्चिम बंगालमध्ये कोळसा खाणकाम आणि वाहतूक प्रकरणाशी संबंधित ईडीची छापेमारी. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने मंगळवारी पश्चिम बंगालमध्ये कोळशाच्या कथित अवैध खाणकाम आणि वाहतुकीच्या प्रकरणातील मनी लाँड्रिंगच्या तपासाचा भाग म्हणून अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली. STORY | ED raids in West Bengal linked to coal mining, transportation caseThe Enforcement Directorate on Tuesday conducted searches at multiple locations in West Bengal as part of a money laundering investigation into a case of alleged illegal mining and transportation of coal,…pic.twitter.com/ZF8w8pfjWL "चीनसोबतच्या सीमावादाच्या वेळी निर्णय घेण्यामध्ये पंतप्रधान आणि राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने आपली जबाबदारी झटकली, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या पुस्तकाच्या मुद्द्यारुन त्यांनी हा आरोप केला. VIDEO | Delhi: On former Army chief Gen Naravane’s book issue, Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, "The PM and the National Security Agency shirked their responsibility in taking decisions during the border face-off with China."(Full video available on PTI Videos –…pic.twitter.com/unnP9jQvjR "चीनसोबतच्या सीमावादाच्या वेळी निर्णय घेण्यामध्ये पंतप्रधान आणि राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने आपली जबाबदारी झटकली, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या पुस्तकाच्या मुद्द्यारुन त्यांनी हा आरोप केला. VIDEO | Delhi: On former Army chief Gen Naravane’s book issue, Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, "The PM and the National Security Agency shirked their responsibility in taking decisions during the border face-off with China."(Full video available on PTI Videos –…pic.twitter.com/unnP9jQvjR मुंबई महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेचा मुहूर्त अखेर ठरला असून येत्या ११ फेब्रुवारी रोजी मुंबईला नवा महापौर मिळणार आङे. मुंबईचा महापौर भाजपचाच असेल हे आता स्पष्ट झाले असून १८ फेब्रुवारीला महापालिकेची विशेष सभा बोलावण्यात आली आहे. त्यानंतर २६ किंवा २६ फेब्रुवारी रोजी महापालिकेचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर होणार आहे. #WATCH| Delhi | NDA MPs felicitate PM Modi for the India-US trade agreement, at NDA Parliamentary party meeting in Parliament premisespic.twitter.com/M5nMRwggtn Congress MP KC Venugopal gives Adjournment Motion Notice in Lok Sabha to discuss India-US Trade Agreement."Despite the significant economic, agricultural, and strategic implications of these reported commitments, the Government has neither made an official statement nor taken…pic.twitter.com/Kj3ESrLoiM अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा तपास सीआयडीकडे वर्ग, अधिकारी बारामतीत जाऊन चौकशी करणार; सर्व अँगल पडताळून पाहणार मैत्रीचा एक नवीन अध्याय!भारत आणि अमेरिकेमधील ऐतिहासिक व्यापार करार हा खऱ्या अर्थाने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय आहे. जागतिक व्यापारासाठी सुद्धा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण आहे.जगातील प्रमुख निर्यात करणाऱ्या…https://t.co/cOSEDXoVWp पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून झालेल्या चर्चेनंतर डोनाल्ड ट्रॅम्प यांनी टॅरिफ कपातीची घोषणा केली आहे. भारतीय वस्तूंवर आकारला जाणारा 'रेसिप्रोकल टॅरिफ' २५ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. तसंच या निर्णानंतर, अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापार करारावर सहमती झाली आहे.
20 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 03:44 PM
संरक्षण तंत्रज्ञानाच्या बदल्यात यु. ए. ई. कडून $187 दशलक्ष रक्कम मिळाल्याचा ट्रम्प यांच्यावर आरोप

संरक्षण तंत्रज्ञानाच्या बदल्यात यु. ए. ई. कडून $187 दशलक्ष रक्कम मिळाल्याचा ट्रम्प यांच्यावर आरोप

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षडोनाल्ड ट्रम्पपुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. संयुक्त अरब अमिरातीच्या एका बड्या नेत्याने ट्रम्प यांना १,६८६ कोटी रुपये (१८७ दशलक्ष डॉलर्स) दिले आणि त्या बदल्यात अमेरिकेचे अत्यंत संवेदनशील संरक्षण तंत्रज्ञान पदरात पाडून घेतले, असा खळबळजनक आरोप अमेरिकन सिनेटर ख्रिस मर्फी यांनी केला आहे. या व्यवहारामुळे अमेरिकेच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाल्याचा दावा केला जात असून, अमेरिकन राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपांनुसार, ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वी अवघे चार दिवस आधी एक गुप्त 'क्रिप्टोकरन्सी डिल' केली होती. ही डिल ५०० दशलक्ष डॉलर्सची होती. यामध्ये ट्रम्प यांच्या कौटुंबिक मालकीच्या 'वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल' या क्रिप्टो कंपनीतील ४९% हिस्सेदारी युएईच्या एका कंपनीने विकत घेतली. या व्यवहारातून ट्रम्प परिवाराला सुमारे १,६८६ कोटी रुपये, तर त्यांचे मध्यपूर्वेतील दूत स्टीव्ह विटकॉफ यांना ३१ दशलक्ष डॉलर्स मिळाल्याचा दावा सिनेटर मर्फी यांनी केला आहे. ज्या व्यक्तीने ही गुंतवणूक केली आहे, तो दुसरा तिसरा कोणी नसून युएईच्या राष्ट्राध्यक्षांचा भाऊ आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शेख तहन्नून बिन जायद अल नहयान आहे. त्यांना 'स्पाय शेख' म्हणून ओळखले जाते, कारण ते युएईच्या गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांचे सर्वेसर्वा आहेत. सुमारे १.३ ट्रिलियन डॉलर्सच्या संपत्तीवर त्यांचे नियंत्रण असून ते जगातील सर्वात शक्तिशाली गुंतवणूकदारांपैकी एक मानले जातात. HUGE welcome by President Donald J. Trump 🇺🇸 for HH Sheikh Tahnoon bin Zayed Al Nahyan 🇦🇪 and his team at the White House.Thank you@realDonaldTrumpfor having us 🙏🏼pic.twitter.com/sWDSHfhdLJ जो बायडेन प्रशासनाने युएईला आधुनिक 'AI चिप्स' देण्यास नकार दिला होता. मात्र, ट्रम्प सत्तेत येताच चित्र बदलले. शेख तहन्नून यांनी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प आणि विटकॉफ यांच्याशी अनेक गुप्त बैठका घेतल्या. या बैठकांनंतर ट्रम्प प्रशासनाने युएईला दरवर्षी ५ लाख आधुनिक AI चिप्स पुरवण्यास मंजुरी दिली. या चिप्सच्या मदतीने जगातील सर्वात मोठे डेटा सेंटर नेटवर्क उभारले जाऊ शकते, जे लष्करी आणि तांत्रिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानले जाते. सिनेटर मर्फी यांनी या प्रकरणाला खुला भ्रष्टाचार असे संबोधले आहे. "ट्रम्प यांनी स्वतःच्या फायद्यासाठी अमेरिकेचे गुपित तंत्रज्ञान परकीय शक्तीला विकले आहे. या व्यवहाराची सखोल चौकशी झाल्यास संबंधित व्यक्तींना तुरुंगाची हवाही खावी लागू शकते," असा इशारा त्यांनी दिला आहे. या गंभीर आरोपामुळे ट्रम्प यांच्या कार्यकाळावर आता संशयाचे ढग गडद झाले असून, विरोधकांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी लावून धरली आहे.
17 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 03:37 PM
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाचा प्रस्ताव सादर करण्याचे पुण्याच्या मुख्यमंत्र्यांचे निर्देश

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाचा प्रस्ताव सादर करण्याचे पुण्याच्या मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुणे:पुरंदरयेथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीयविमानतळाच्याभूसंपादनासाठी आवश्यक असणारा निधी उभारण्यासाठी कर्ज घेण्यात येणार आहे. त्याचा सविस्तर प्रस्ताव पुढील आठवड्यात अर्थात १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना दिले. भविष्यातीलपुणेशहराची गरज लक्षात घेऊनपुरंदरविमानतळाचीनिर्मिती करावी तसेच विमानतळ परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी सिडकोलाही निर्देश देण्यात आले आहेत. पुरंदर विमानतळाबाबत वर्षा निवासस्थानी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, अपर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, प्रधान सचिव (उद्योग) पी. अन्बळगन, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसू तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी उपस्थित होते. पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये हे विमानतळ होणार असून यासाठी सुमारे ३ हजार एकर जमिनी संपादित करण्यात येणार आहे. यासाठी प्रति एकरी एक कोटी रुपयांहून अधिक दर देण्याचे ठरले असून चार पट मोबदला व दहा टक्के जमीन परतावा देण्याचे राज्य सरकारने यापूर्वीच मान्य केले आहे. गेल्या महिन्यात जमिनीचा एकरी दर तसेच परताव्यापोटी देण्यात येणारी दहा टक्क्यांऐवजी वाढीव जमीन देण्यास राज्य सरकार तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी बोलताना स्पष्ट केले होते. त्यामुळे या भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्वी ५ हजार कोटी रुपयांचा निधी लागेल, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला होता. त्यानंतर या घोषणेनंतर आता हा खर्च एक हजार कोटी रुपयांनी वाढून ६ हजार कोटी रुपये झाला आहे. यासाठी राज्य सरकारने कर्ज उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाने मान्य केल्यानंतर हुडकोकडे पाठविण्यात येणार आहे. फडणवीस म्हणाले, “भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी एमआयडीसीला हुडकोकडून कर्ज घ्यावे लागणार आहे. त्यासाठीचा सविस्तर प्रस्ताव तयार करावा. याबाबत मुख्य सचिवांनी संबंधितांशी चर्चा करून हा प्रस्ताव तयार करावा. पुढील मंत्रिमंडळ बैठकीत (१० फेब्रुवारी) हा प्रस्ताव सादर करण्यात यावा. पुरंदर विमानतळाचा परिसर आता झपाट्याने विकसित होणार आहे. हा विकास परिसर म्हणून गणला जाणार आहे. त्याची अनियंत्रित वाढ होऊ नये यासाठी आतापासूनच नियोजन करावे. यासाठी सिडकोने पुढाकार घ्यावा. हे नियोजन नवी मुंबईसारखे असावे.” मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर फेब्रुवारीअखेरपर्यंत हा निधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील आठवडाभरात शेतकऱ्यांना मोबदल्याचे वाटप करण्यात येऊ शकते. त्यानंतर भूसंपादन पूर्ण करण्यात येऊन एप्रिलच्या मध्यापासून विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
69 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Feb 3, 2026, 03:18 PM
संसदेत बोलण्याची संधी नाकारल्याबद्दल राहुल गांधींचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

संसदेत बोलण्याची संधी नाकारल्याबद्दल राहुल गांधींचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

Rahul Gandhi Writes to Loksabha Speaker Om Birla :राष्ट्रपतींच्या अभिषाणाला उत्तर देताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना संसदेत बोलण्यापासून रोखण्यात आले. त्यांनी माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचा दाखला देत मोदी सरकारवर टीका केली. यावरून संसदेत गदारोळ झाला. मात्र, बोलण्यापासून रोखणे म्हणजे लोकशाहीवरील कलंक असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. “काल, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील प्रस्तावावर बोलताना, तुम्ही मला ज्या मासिकाचा संदर्भ देण्याचे निर्देश दिले होते. आज माझे भाषण पुन्हा सुरू करताना मी त्या कागदपत्राचे सादरीकरण केले. नियमानुसार, सभागृहात एखाद्या कागदपत्राचा संदर्भ घेऊ इच्छिणाऱ्या सदस्याला ते प्रमाणित करावे लागते आणि त्यातील मजकुराची जबाबदारी निश्चित करावी लागते. त्यानंतर, प्रतिसाद देण्याची सरकारची जबाबदारी असते. लोकसभेत आज मला बोलण्यापासून रोखणे हे केवळ या नियमाचे उल्लंघनच नाही तर विरोधी पक्षनेता म्हणून मला राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर बोलण्यापासून रोखण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. राष्ट्रीय सुरक्षा हा राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा एक महत्त्वाचा भाग होता, ज्यासाठी संसदेत चर्चा आवश्यक आहे”, असंराहुल गांधीम्हणाले. “माननीय सभापती महोदय, सभागृहाचे निष्पक्ष संरक्षक म्हणून विरोधी पक्षाच्या सदस्यांसह प्रत्येक सदस्याच्या हक्कांचे रक्षण करणे ही तुमची घटनात्मक आणि संसदीय जबाबदारी आहे. विरोधी पक्षनेत्याचा आणि प्रत्येक सदस्याचा बोलण्याचा अधिकार आपल्या लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे. या मूलभूत लोकशाही अधिकारांना नकार दिल्याने अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे”, असं राहुल गांधी म्हणाले. Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi writes a letter to Lok Sabha Speaker Om Birla.The letter reads, "Preventing me from speaking in the Lok Sabha today not only violates this convention, but also gives rise to a serious concern that there is a deliberate attempt to…pic.twitter.com/wAySZtKJUS ते पुढे म्हणाले, “संसदीय इतिहासात पहिल्यांदाच, सरकारच्या आदेशावरून, अध्यक्षांना विरोधी पक्षनेत्याला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलण्यापासून रोखण्यास भाग पाडले गेले आहे. हा आपल्या लोकशाहीवरील कलंक आहे, ज्याविरुद्ध मी माझा तीव्र निषेध नोंदवतो”, असा संतापही त्यानी पत्रातून व्यक्त केला आहे.
25 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 3, 2026, 03:01 PM
मुंबई महापौर निवडणूकः वादाच्या भोवऱ्यात लोकशाहीची परीक्षा

मुंबई महापौर निवडणूकः वादाच्या भोवऱ्यात लोकशाहीची परीक्षा

मुंबई :मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार? याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे महापालिका निवडणूक पार पडून आता 15 दिवसांपेक्षा जास्त दिवसांचा कालावधी लोटला आहे. तरीही महापौर पदासाठी निवडणूक कधी पार पडेल? याबाबत माहिती समोर येत नव्हती. विविध कारणास्तव महापौर पदाची निवडणूक पुढे सरकत होती. मुंबईत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीला बहुमताचा आकडा गाठता आला आहे. पण दोन्ही पक्षांच्या गटाची नोंद ही उशिरा झाल्याने या निवडणुकीला विलंब झाला असं बोललं जात होतं. राज्यातील काही महत्त्वाच्या महापालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवड झाली आहे. पण मुंबईच्या महापौर पदाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.मुंबई महापालिकेचं महापौर पद हे खुला महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याचं जाहीर झालं होतं. यानंतर भाजप की शिवसेना शिंदे गटाचा महापौर होईल? याबाबत साशंकता होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा मुक्काम मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवल्याने त्यांचा महापौर पदावर प्रबळ दावा असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण भाजपने आपला दावा सोडला नाही आणि शिंदे बॅकफूटवर गेल्याची चर्चा आहे. आता महापौर हाभाजपचाचहोईल हे निश्चित असल्याची चर्चा आहे. यासाठी काही नावांची चर्चा आहे. या दरम्यान मुंबई महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम ठरला?मुंबईच्यामहापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरल्याचं वृत्त 'टीव्ही 9 मराठी'ने दिलं आहे. येत्या 7 फेब्रुवारीला मुंबईच्या महापौरपदासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यानंतर 11 फेब्रुवारीला मुंबई महापालिकेत दुपारी 12 वाजता विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. सभागृह भरण्याच्या 15 मिनिटे आधीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. या विशेष सभेत महापौर पदाची निवड केली जाईल आणि नव्या महापौराची घोषणा करण्यात येईल.
56 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Feb 3, 2026, 02:57 PM
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन; शपथविधी सोहळ्यावर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन; शपथविधी सोहळ्यावर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. महाराष्ट्रावर या बातमीने शोककळा पसरली. २९ जानेवारीला अजित पवारांच्या पार्थिवावर बारामतीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. तर ३१ जानेवारीला संध्याकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्या या शपथविधीबाबत प्रश्न उपस्थित झाले. इतक्या घाईने शपथविधी का पार पडला? हा त्यातला प्रमुख प्रश्न होता. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या प्रश्नावर आणि विलीनीकरणावर भूमिका मांडली आहे. विलीनीकरण हा शब्द कधी आला नव्हता.निवडणूकएकत्र लढणं हा एक भाग आणि विलीनीकरण हा दुसरा भाग. आत्ता येणाऱ्या निवडणुकांमध्येही एकत्र लढायचं असं दादा मला म्हणाले होते. आत्ता जे काही प्रश्न उपस्थित होत आहेत त्यावर एक सांगेन की अजित पवारांच्या मनात १०० टक्के विश्वास होता की ते जे बोलतील त्याबाबत सुनील काही म्हणणार नाही. तारीख वगैरे ठरली होती अशा चर्चा आहेत पण लॉजिकल एंडला या चर्चा आल्या नव्हत्या असंही सुनील तटकरे यांनीही म्हटलं आहे. अजित पवारांच्या निधनानंतर ज्या काही चर्चा सुरु झाल्या त्यानंतर आम्ही नेता निवडीची प्रक्रिया सुरु केली. पण त्याला विरोध का झाला? उपमुख्यमंत्री निवडणं याचा अर्थ आम्ही विलीनीकरणाच्या विरोधात आहोत असं का चित्र निर्माण केलं जातं आहे? आमचा नेता निवडणं आणि उपमुख्यमंत्री निवडणं यावर आक्षेप का घेतला गेला? असा प्रति प्रश्न सुनील तटकरेंनी विचारला आहे. सुनेत्रा पवारांचा शपथविधी घाईने झाला का? यावर विचारलं असता तटकरे म्हणाले, विलीनीकरण हा वेगळा विषय झाला. उपमुख्यमंत्रिपद आणि विधीमंडळ नेता निवडीत इतरांचा अधिकार काय? घाई का हा प्रश्नच का विचारला जातो? अजित पवारांची इच्छा काय होती? २०१९ ला ते भाजपासह गेले होते. ८० तासांचं सरकारही झालं होतं. दादांची इच्छा काय होती? दोन पक्षांचं सरकार स्थिर राहिल. २०२२ मध्येही ठरलं होतं की सगळे आमदार म्हणाले होते की भाजपासह गेलं पाहिजे. मी त्याच्या तपशीलांमध्ये जात नाही असंही सुनील तटकरेंनी म्हटलं आहे.मुंबईतक या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सुनील तटकरेंनी हे वक्तव्य केलं आहे. अजित दादांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकली आणि मी कोसळलो. माझे वडील गेले तेव्हा जेवढं दुःख झालं त्यापेक्षा कैकपटीने जास्त दुःख मला झालं.अजित पवारअशा पद्धतीने जातील असं वाटलं नव्हतं. त्यांच्या आठवणी अनेक आहेत. अजित पवार मला एक मित्र म्हणून, दिलदार नेता म्हणून, मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचे नेते म्हणजे अजित पवार होते. मागच्या ३५ वर्षांत आम्ही एकमेकांना साथ दिली. मैत्रीला जागणारे दादा, कुटुंबवत्सल दादा, टापटीप ठेवणारे दादा अशी त्यांची अनेक रुपं मी पाहिली आहेत. त्यांनी जुनी गाणी खूप आवडत ऐकायचे. त्यांच्या कारमध्ये गाणी लावलेलीच असत. किशोर कुमार यांची गाणी त्यांना आवडत असत अशी आठवण सुनील तटकरे यांनी सांगितली.
61 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 02:51 PM
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीवरून घराणेशाहीच्या आरोपांमुळे कायदेशीर लढाईला तोंड फुटले

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीवरून घराणेशाहीच्या आरोपांमुळे कायदेशीर लढाईला तोंड फुटले

जाधव यांनी आरोप केला की, या यादीत विद्यमान अध्यक्षांच्या जवळच्या नातेवाईकांचा समावेश करून "घराणेशाहीला प्रोत्साहन" दिले जात आहे. उच्च न्यायालयाने निवडणुकांना स्थगिती दिल्यानंतर, एमसीएने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
56 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 02:51 PM
दोन राष्ट्रीय काँग्रेस पक्षांचे विलीनीकरणः एक नवीन मार्ग?

दोन राष्ट्रीय काँग्रेस पक्षांचे विलीनीकरणः एक नवीन मार्ग?

अजित पुवारांच्या अपघाती निधनानंतर, दोन्हीराष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या विलिनिकरणाच्या चर्चेने अधिकच जोर दरला आहे. दोन्हीराष्ट्रवादी काँग्रेसपक्ष एकत्र यावेत, अशी अजित दादांचीच इच्छा होती, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्यांकडून वारंवार केला जात आहे. यातच, आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेतेअनिल देशमुखयांनीही यासंदर्भात भाष्य केले आहे. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. अजितदादा हयात असताना विलिनीकरणासंदर्भात अनेक बैठका पार पडल्या. साधारण किती बैठका पार पडल्या? त्या संदर्भात आमच्या काही कानावर नाही, अशा पद्धतीची वक्तव्ये समोर येत आहेत. तुम्ही प्रत्यक्ष काही बैठकांमध्ये उपस्थित होता का आणि किती बैठका नेमक्या पार पडल्या? असे विचारले असता देशमुख म्हणाले, "अजितदादांबरोबर जवळजवळ चौदा बैठका झाल्या. अनेक बैठकांना मीही उपस्थित होतो. आमचे बाकी सहकारीसुद्धा होते. पण आता यासंदर्भात सध्या तरी दुखवट्याचा काळ सुरू आहे. हा दुखवटा संपल्यानंतर आम्ही सविस्तरपणे, कोणत्या तारखेला बैठक झाली अजित दादांबरोबर? किती वाजता बैठक झाली? त्या बैठकीला कोण कोण होतं? त्या बैठकीमध्ये काय ठरलं? या सर्व गोष्टी सांगू." "सुप्रिया सुळे आणि शरद पवार देखील काही बैठकांना उपस्थित होते. त्यामुले सर्वां माहिती आहे त्यांच्या नेत्यांनाही माहीत आहे," असेही देशमुख यांनी सांगितले. यावर,अजित पवारांचीनेमकी खद-खद काय होती? असे विचारले असता देशमुख म्हणाले, "असे आहे की या सर्व गोष्टी दुखवट्याचा काळ संपल्यानंतर सांगू. आता या गोष्टी सांगणे हे योग्य होणार नाही. दुखवट्याच्या काळात अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत," असे देशमुख म्हणाले.
48 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 3, 2026, 02:39 PM
व्यापारातील तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी शुल्कात कपात केल्याने अमेरिका-भारत संबंध दृढ झाले

व्यापारातील तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी शुल्कात कपात केल्याने अमेरिका-भारत संबंध दृढ झाले

वॉशिंग्टन:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत ावर लादलेले 50 टक्के आयात शुल्क (टॅरिफ) आता 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे. भारताचा अमेरिकेशी व्यापार करारही झाला आहे. यामुळे दोन्ही देशांमधील गेल्या एका वर्षांपासून सुरू असलेला तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. या सगळ्या घडामोडींमध्ये, भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री दृढ होण्याची शक्यता आहे. याचे श्रेय अमेरिकेचे नवे राजदूत सर्गियो गोर यांना दिले जात आहे. सर्गियो गोर हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. सर्गियो गोर यांनी 'क्वाड' (QUAD) या गटाबद्दल असे काही विधान केले आहे, ज्यामुळे चीनला थेट इशारा मिळाला आहे.चीनची दादागिरी रोखणार'क्वाड'च्या भविष्याबद्दल उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांवर इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत सर्गियो गोर म्हणाले की, हा गट (क्वाड) कुठेही जाणार नाही. त्यांनी सांगितले की,अमेरिकेचेपरराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच 'क्वाड' देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक घेतली होती. गोर यांनी पुढे सांगितले की, आमच्या अनेक योजना आहेत, ज्यांची घोषणा मी आत्ताच करणार नाही. 'क्वाड' हा गट चीनची हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात वाढती दादागिरी रोखण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या 'क्वाड' गटात भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे सदस्य देश आहेत.चीनची दहशत अन् क्वाडचं महत्त्वविशेष म्हणजे, 2025 मध्ये 'क्वाड' देशांच्या सर्वोच्च नेत्यांची बैठक भारतात होणार होती, पण ती होऊ शकली नाही. आता व्यापार करार (ट्रेड डील) झाल्यानंतर सर्गियो गोर यांच्या विधानामुळे अशी आशा आहे की, लवकरच 'क्वाड'ची शिखर बैठकभारतातहोऊ शकते. भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या अमेरिकेत आहेत आणि असे मानले जात आहे की, 'क्वाड'बद्दल त्यांची अमेरिकेतील नेत्यांशी चर्चा होईल. चीन ज्या पद्धतीने हिंद-प्रशांत क्षेत्रातील देशांना दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे 'क्वाड'ला अधिक मजबूत करण्याची मागणी जोर धरत आहे.ट्रम्प याचं धोरण बदललं पण आता...जेव्हा डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आले, तेव्हा अमेरिकेने चीनसोबतची जवळीक वाढवली. नवीन राष्ट्रीय संरक्षण धोरणात अमेरिकेने स्पष्ट संकेत दिले आहेत की, ते आपल्या सुरक्षेवर आणि पश्चिम गोलार्धावर अधिक लक्ष केंद्रित करेल. यात असे म्हटले आहे की, चीन अजूनही त्यांची मुख्य चिंतेची बाब आहे, पण चीनबद्दल कोणतेही स्पष्ट विधान केलेले नाही. त्याऐवजी, तणाव कमी करण्यावर जोर देण्यात आला आहे. पण आता क्वाडला महत्त्व मिळू लागल्यास जपान ते तैवानपर्यंत असणाऱ्या चीनच्या दहशतीच्या प्रयत्नांना धक्का बसणार आहे.
11 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 02:39 PM
महा विकास आघाडीचे उमेदवार पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र

महा विकास आघाडीचे उमेदवार पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र

वैभव गायकर पनवेलमहानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र लढलेल्या महाविकास आघाडीमधून उद्धवसेनेने फारकत घेऊन स्वतंत्र गट स्थापन केला. मात्र, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेकाप आणि काँग्रेसने एकत्रित गटनोंदणी करीत पहिल्यांदाच नगरसेवक बनलेल्या केतन भगत यांची गटनेते पदी नियुक्ती केली.यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील,अनिल नाईक,प्रकाश म्हात्रे ,देवेंद्र मढवी आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.१३ नगरसेवकांच्या गटाची नोंदणी यावेळी करण्यात आली. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांना केतन भगत यांची व्हिप अनिवार्य असणार आहे. विरोधीपक्ष नेते पदासाठी १० टक्के संख्याबळ विरोधकांकडे असणे गरजेचे आहे. ते संख्याबळ दोन पक्षाकडे असल्याने विरोधीपक्ष नेते पद या दोन पक्षांकडे राहण्याची शक्यता आहे. तसेच, १ स्वीकृत नगरसेवक देखील या दोघांना निळणार आहे. शिवसेना ठाकरे गट सोबत आल्यास आणखी एक स्वीकृत नगरसेवक महाविकास आघाडीला मिळणार आहे. स्वतंत्र गट स्थापन केलेल्या ठाकरे गटाला देखील विरोधीपक्ष नेते पद हवे असल्याने महाविकास आघाडी मधील नेते पुढील काळात काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. काँग्रेस आणि शेकाप नगरसेवकांचा एकत्रित गट स्थापन करून केतन भगत यांची गटनेते पदी नियुक्ती केल. आहे. मागील वेळेला प्रीतम म्हात्रे यांची गट नेते आणि विरोधीपक्ष नेते पदावर निवड केल्यानंतर आमच्या समोर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. पुढील काळात तसे होणार नाही. गटनेत्यांचा व्हीप सर्व नगरसेवकांना बंधनकारक असेल.- बाळाराम पाटील (शेकाप नेते)
18 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 02:37 PM
भारतीय शहराचे नवीन नेतृत्व विकासात्मक प्रगतीचे वचन देते

भारतीय शहराचे नवीन नेतृत्व विकासात्मक प्रगतीचे वचन देते

पदभार स्वीकारल्यानंतर नवनिर्वाचित महापौर अश्विनी कमलेश निकम आणि उपमहापौर अमर लुंड यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देणे, पायाभूत सुविधांच्या कामांना गती देणे, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व आरोग्य सेवा यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच प्रशासनाशी समन्वय साधून पारदर्शक व गतिमान कारभार राबवण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
40 shares
😊
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 02:23 PM
मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटः विधानसभेच्या निलंबनादरम्यान भाजपकडे बहुमत

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटः विधानसभेच्या निलंबनादरम्यान भाजपकडे बहुमत

मणिपूरमध्ये १३ फेब्रुवारी २०२५ पासून राष्ट्रपती राजवट लागू आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर ६० सदस्यीय विधानसभा निलंबित ठेवण्यात आली आहे. सध्या मणिपूरमध्ये भाजपचे ३७ आमदार आहेत. सुरुवातीला, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे ३२ उमेदवार विजयी झाले होते. जेडी(यू) ने सहा जागा जिंकल्या होत्या आणि त्यापैकी पाच आमदारांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला.
73 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 02:16 PM
पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून चार महिलांची नामनिर्देशन

पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून चार महिलांची नामनिर्देशन

पुणे:पुणेमहापालिकेच्यामहापौरपदासाठीभाजपकडुन मंजुषा नागपुरे आणि उपमहापौरपदासाठीपरशुराम वाडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या दोन्ही पदासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार )आणि कॉग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी पुणे महापालिकेत भाजपची एकहात्ती सत्ता असल्यामुळे या निवडणुकीत नागपुरे आणि वाडेकर यांचा विजय निश्चित आहे. त्यामुळे नागपुरे आणि वाडेकर यांच्या निवडीची केवळ औपचारीकता बाकी राहिली आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत ११९ जागा मिळवून भाजपला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. सर्वसाधारणमहिलाप्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. भाजपच्या चौथ्यांदा निवडून आलेल्या वर्षा तापकीर यांच्यासह मंजुषा नागपुरे, रंजना टिळेकर, मानसी देशपांडे, स्वरादा बापट यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. महापौर कोण होणार याची उत्सुकता लागली होती. महापौरपदासाठी मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत होती. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महापौरपदासाठी मंजुषा नागपुरे आणि उपमहापौरपदासाठी मुळचे आरपीआयचे असलेले आणि भाजपच्या चिन्हावर निवडुन आलेले परशुराम वाडेकर यांच्या नावावर मंगळवारी सकाळी शिक्कामोर्तब केले. त्यानंतर नागपुरे यांनी महापौर पदासाठीचा तर उपमहापौरपदासाठी वाडेकर यांनी उमेदवारी अर्ज नगरसचिव योगिता भोसले यांच्याकडे दाखल केला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, गटनेते गणेश बिडकर, माजी सभागृहनेते आणि नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्यासह पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. सिहंगड रोडला प्रथमच महापौरपदाचा मान मिळणार महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थित होणार आहे. निवडणुकीच्या दिवशी पीठासीन अधिकारी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी देतात. त्यानंतर अर्ज मागे न घेतल्यास निवडणूक प्रक्रिया राबवून सभागृहात मतदान होते. भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे नागपुरे आणि वाडेकर यांचा विजय निश्चित आहे. त्यांच्या निवडीच्या घोषणा झाल्यानंतर सिंहगड रोड परिसराला प्रथमच महापौरपदाचा मान मिळणार आहे. नागपुरे या सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. यंदाच्या महापालिका निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक ३४ मधून बिनविरोध विजयी झाल्या आहेत. मंजूषा नागपुरे या भाजपच्या निष्ठावंत नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. महापालिकेच्या कामाच त्यांचा चांगला अनुभव आहे. स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समितीवर त्यांनी काम केलेले आहे. उपमहापौरपदासाठी भाजपकडून परशुराम वाडेकर यांनी अर्ज भरला आहे. पत्नीपाठोपाठ पती उपमहापौर होणार भाजपने उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर यांना संधी दिली आहे. त्यांची निवड निश्चित होणार आहे. गेल्या टर्ममध्ये परशुराम वाडेकर यांच्या पत्नी सुनिता वाडेकर या उपमहापौर होत्या. आता परशुराम वाडेकर हे उपमहापौर होणार आहेत. त्यामुळे पत्नी पाठोपाठ पती उपमहापौर होणार आहे. वर्षा तापकीर यांच्यावर अन्याय भाजपच्या नगरसेविका वर्षा तापकीर या २००७, २०१२, २०१७ आणि आता निवडून आल्या आहेत. त्या सलग चौथ्यांदा सभागृहात आल्या आहेत. २०१७ मध्ये पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असताना वर्षा तापकीर यांना कुठल्याही पदावर संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे आता वर्षा तापकीर यांना संधी मिळण्याची दाट शक्यता होती. पण या वेळेसही वर्षा तापकीर यांना डावलण्यात आले आहे. वर्षा तापकीर या सातत्याने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेल्या भागातुन निवडून आल्या आहेत. शहराच्या ५८व्या आणि दहाव्यामहिलामहापौर होणार पुणे महापालिकेत आतापर्यंत ५७ महापौर तर कमल व्यवहारे ,ॲड. वंदना चव्हाण, वत्सला आंदेकर ,दिप्ती चवधरी, रजनी त्रिभुवन, राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, चंचला कोंद्रे , मुक्ता टिळक या नउ महिला महापौर झाल्या आहेत. मंजुषा नागपुरे यांची निवड झाल्यानंतर ५८व्या महापौर तर दहाव्या महिला महापौर ठरणार आहे. महापौर पद हे केवळ उपभोगण्यासाठी नव्हे तर पुणेकरांची सेवा करण्यासाठी मिळालेली संधी आहे. त्यामुळे पुणेकरांना हेवा वाटेल त्याप्रमाणे काम करणार आहे. भाजपच्या सर्व नेत्यांनी विश्वास ठेवून महापौर पदाची मोठी संधी दिली आहे. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची खूप इच्छा होती. परंतु ते आपल्यामध्ये आज नाहीत, याची मोठी उणीव जाणवत आहे. - मंजुषा नागपुरे, महापौर पदाच्या उमेदवार, भाजप.
81 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 02:10 PM
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेतील मृत्यूची चौकशी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची मागणी

अजित पवारांच्या विमान दुर्घटनेतील मृत्यूची चौकशी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची मागणी

अजित पवारयांच्याअपघातीमृत्यूनंतर, काही नेत्यांकडून, याअपघाताचीसखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात आहे. यातच आता, "घटनेची चौकशी फक्त DGCI ने किंवा CID ने करून चालणार नाही, तर ही चौकशी हायकोर्टाच्या जजच्या नियंत्रणाखालीच व्हायला हवी," असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर आपण, केंद्रीय मंत्रीनितीन गडकरीयांनाही, तुम्ही त्या छोट्या, खासगी विमानाने प्रवास टाळायला हवा, असे सांगणार आहोत, असेही देमुख यावेळी म्हणाले. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. देशमुख म्हणाले, "अजित पवारयांचा विमान अपघातात जो दुर्दैवी मृत्यू झाला, यासंदर्भात अनेकांना शंका आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, अजित दादांच्या पक्षाचे जे जेष्ठ नेते आहेत. माननीय छगनजी भुजबळ असोत किंवा दादांच्याच पक्षाचे काही आमदार असोत. बाहेरच्यांनीही शंका व्यक्त केली आहे की, हा अजितदादाचा अपघात आहे की घातपात आहे? कारण अनेकांना शंका आहे कि, जेव्हा हा अपघात झाला त्या वेळी नागरी विमान वाहतूक मंत्री म्हणाले की बारामतीच्या एअरपोर्टवर व्हिजिबिलीटी कमी होती आणि त्याच्यामुळे बहुतेक हा अपघात झाला असेल. पण असं आहे कि व्हिडिबिलिटीचा जेव्हा प्रश्न आहे, विमान जेव्हा बारामतीच्या जवळपास एअरपोर्टवर आलं, तेव्हा आपणही बघितले असेल की, अनेकांनी त्या विमानाचा व्हिडिओ घेतला आणि दोन किलोमिटरवरूनही त्या विमानाचा व्हिडिओ अगदी स्पष्ट आला. जर धुकं असतं तर व्हिजिबिलिटीचा प्रश्न असता तर एवढ्या दुरून तो व्हिडिओ आला नसता आणि ते पाहिल्यानंतर सगळ्यांना असं वाटतंय की, हा घातपात आहे का? यामुळे सर्व चिंतित आहेत की, वस्तुस्थिती समोर यायला हवी. त्यामुळे संजय राऊत यांनी जी मागणी केलेली आहे त्याला माझंसुद्धा समर्थन आहे.""आमचं एकच म्हणणं आहे की या घटनेची चौकशी DGCIच्या माध्यमाने तर होईल, पण त्यांच्यावर हायकोर्टाच्या जजच्या नियंत्रणाखाली व्हायला हवी. तेव्हाच खऱ्या गोष्टी काय आहेत? काय घडलं? काय नाही? घातपात आहे? की अपघात आहे? हे सर्व जनतेसमोर येईल, असेही देशमुख म्हणाले. केंद्रीय मंत्रीनितीन गडकरीयांचं नाव घेत काय म्हणाले देशमुख? -अजित पवारांचा विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे, असे संजय राऊत बोललेत, असे वाटते तुम्हाला? असे विचारले असता, "आता त्यांना शंका आहे म्हणून संजय राऊत बोलले. मी धेखील काही माध्यमांना बोललो की, माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब मला विमानतळावर वैगेरे भेटले तर, मी त्यांना नक्की सांगेन की तुम्हीसुद्धा त्या छोट्या, जी खासगी विमानं आहेत, त्यांनी तुमचा प्रवास टाळायला हवा," असेही अनिल देशमुख यावेळी म्हणाले.
60 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 02:09 PM
सातारा जिल्ह्यातील स्थानिकांना बिनशर्त पाठिंब्याचा भाजपचा निर्धार

सातारा जिल्ह्यातील स्थानिकांना बिनशर्त पाठिंब्याचा भाजपचा निर्धार

तांबवे : ‘सातारा जिल्ह्यात लोकांना कोणी वाली नाही, असं वाटत असेल तर भाजप त्यांच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री कोणीही असू दे फरक पडत नाही,’ असा इशारा तांबवे येथील सभेत ग्रामविकासमंत्रीजयकुमार गोरेयांनी दिला.तांबवे, ता. कराड येथील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले, सत्यजित पाटणकर, माजी आमदार आनंदराव पाटील, तांबवे जिल्हा परिषद गटातील उमेदवार धनंजय ताटे, पंचायत समितीचे तानाजी देवकर, स्नेहलता पाटील यांची उपस्थिती होती.मंत्रीजयकुमार गोरेम्हणाले, ‘पाटण विधानसभा मतदारसंघातील सत्यजित पाटणकर हेच या ठिकाणचे पालकमंत्री आहेत. या निवडणुकीत जनता विरोधकांना धडा शिकवेल,’ असा विश्वास व्यक्त केला. पाटण मतदारसंघात छोट्या-छोट्या कार्यकर्त्यांना आणून दम दिला असल्याचा आरोप पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जयकुमार गोरे यांनी केला.आमदार अतुल भोसले म्हणाले, ‘सध्या सर्वत्र भाजपचे वारे घोंगावत आहे. यामुळे विरोधक काहीही बोलत आहेत.’ यावेळी विजय चव्हाण, आनंदराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
53 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 02:06 PM
महाराष्ट्राचे राजकारणः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची शक्यता

महाराष्ट्राचे राजकारणः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची शक्यता

Today's India Maharashtra Breaking News in Marathi LIVE: महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरून वेगवेगळे अंदाज, तर्कवितर्क, शक्यता वर्तवण्यात येत आहेत. वेगवेगळे नेते वेगवेगळे दावे करत असल्याने या विषयाबाबतचा संभ्रम वाढतच चालला आहे. याबाबत आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात आणि भाजपा नेतृत्वाकडून काय सांगितलं जातं, याबद्दल उत्सुकता आहे. त्याचवेळी भारतासाठी एक आनंदाची बातमी अमेरिकेतून आली आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदीयांच्याशी फोनवरून चर्चा झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षडोनाल्ड ट्रम्पयांनी टॅरिफ कपातीची घोषणा केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेतेराहुल गांधीयांच्या भाषणावरून काल लोकसभेत गदारोळ झाला होता. आता आज त्याचे काय पडसाद उमटतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. या आणि अशा सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे LIVE UPDATES... LIVE कर्जत शहरात अजित पवार यांच्या श्रद्धांजलीचे बॅनर काढून टाकण्यात आले. त्याचा व्हिडीओ पोस्ट करत आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला. याची चौकशी करून सरकारने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. माझ्या मतदारसंघात कर्जत शहरात नागरिकांनी अत्यंत दुःखी भावनेने आणि जड अंतःकरणाने लावलेले मा. अजितदादांच्या श्रद्धांजलीचे फ्लेक्स नगरपंचायतीने अत्यंत वाईट पद्धतीने काढून टाकले. ही बाब अत्यंत संतापजनक, मा. अजितदादांचा अवमान करणारी, नागरिकांच्या भावनांचा अनादर करणारी आणि त्यांच्या…pic.twitter.com/y5T2AUKZ7X अजित पवार यांच्या अस्थींचे मंगळवारी मुंबईतील समुद्रात विसर्जन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आणि आमदार शिवाजीराव गर्जे यांनी अस्थींचे पूजन केले आणि त्या समुद्रात विसर्जित केल्या. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विधीपूर्वक मुंबईतील समुद्रात विसर्जन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष मा. आमदार श्नी. शिवाजीराव गर्जे यांनी अस्थींचे पूजन करून त्या समुद्रात विसर्जित…pic.twitter.com/kRxeCV0GiL ठाण्यातही अजित पवार यांच्या अस्थींचे पूजन करून विसर्जन करण्यात आले. यावेळी ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. आदरणीय दादांना अखेरचा निरोप...!📍ठाणेpic.twitter.com/f1yXsYRtBp "अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल फक्त आम्हालाच नाही, तर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना, आमदारांनाही शंका आहेत. त्यामुळे या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी झाली पाहिजे", अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली. "केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जर मला कधी विमानतळावर भेटले, तर तुम्ही छोट्या आणि खासगी विमानाने प्रवास करू नका, असे मी त्यांना सांगणार आहे", असे आश्चर्यजनक विधान अनिल देशमुख यांनी केले. अजित पवार यांच्या निधनामुळे बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद रिक्त झाले. या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीसाठी सुनील तटकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. "आपण आज पुणे व बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारत आहात. आभाळाएवढे दुःख बाजूला सारून आपण महाराष्ट्राला सावरण्यासाठी जे धैर्य दाखवत आहात, ते शब्दांच्या पलीकडले आहे", असे तटकरे म्हणाले. विरोधी पक्षनेत्याला लोकसभेमध्ये बोलू दिले जात नाही असा आरोप करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. "इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय सुरक्षेसारख्या गंभीर प्रश्नावर लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेत्याला बोलू दिले जात नाहीये. जनरल नरवणे यांचे विधान आणि एपस्टिन प्रकरणावरून मोदीजी इतके का घाबरले आहेत?", असा सवाल राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींनी केला. इतिहास में पहली बार, राष्ट्रीय सुरक्षा जैसे गंभीर मुद्दे पर लोकसभा में नेता प्रतिपक्ष को बोलने नहीं दिया जा रहा है।आख़िर जनरल नरवणे के बयान और एपस्टीन मामले पर मोदी जी इतने घबराए हुए क्यों हैं?pic.twitter.com/zKJJpZX7uq आगामी टी२० विश्वचषक २०२६ मधील भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या पाकिस्तान सरकारच्या निर्णयावर भारताचे विश्वविजेते माजी कर्णधार कपिल देव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "पाकिस्तानचा हा निर्णय भारतापेक्षा पाकिस्तानच्या स्वतःच्या क्रिकेट भविष्यासाठी अधिक घातक ठरेल. हा केवळ राजकारणाचा किंवा प्रतिमेचा प्रश्न नाही, तर थेट तरुण क्रिकेटपटूंच्या करिअरचा प्रश्न आहे. जर हा निर्णय खेळाडूंनी घेतला असेल, तर त्यांनी समोर येऊन तसे सांगावे. पण जर बोर्ड सांगत असेल की तुम्ही खेळू नका, तर यामुळे तुमच्या देशाची प्रतिष्ठा खालावते." (वाचा संपूर्ण बातमी) छत्रपती संभाजीनगर महापालिकेत महापौरपदासाठी AIMIM आपला उमेदवार रिंगणात उतरवण्याची शक्यता. पक्षाचे ३३ नगरसेवक विजयी. बहुमताच्या आकड्यापासून बरेच दूर. मात्र, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेसोबत जाण्याचा, काही तडजोड करण्याचाही विचार करू; खासदार इम्तियाज जलील यांचं सूतोवाच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आजही डोकलाम मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. अप्रकाशित पुस्तकातील दाखले देणं नियमबाह्य असल्याचं सांगत सत्ताधाऱ्यांनी त्यांना विरोध केला. त्यावरून बरीच शाब्दिक चकमक झाली. त्याचवेळी, काही विरोधी खासदारांनी सभापतींच्या आसनाच्या दिशेने कागदाचे तुकडे भिरकावले. Budget session of Parliament | In connection with the uproar in Lok Sabha and the incident of papers being thrown towards the Chair, six Opposition MPs, including Hibi Eden, Amarinder Singh, Raja Warring, Manickam Tagore, Gurjeet Singh Aujla, Prashant Yadaorao Padole and Kiran…pic.twitter.com/8YFf759b6t उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. राज्य सरकारने याबाबत आज पत्रक काढलं. अजित पवारांकडे या दोन जिल्ह्यांची जबाबदारी होती, ती आता सुनेत्रा पवारांकडे देण्यात आली आहे. नाशिक- महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपने हिमगौरी आडके आणि उपमहापौरपदासाठी मच्छींद्र सानप यांच्या उमेदवारीची घोषणा भाजप नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली. आज सकाळी भाजपाच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेच आपल्या पक्षाचे नेतृत्व सोपवायचे आहे, असे विधान प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सुनेत्रा पवार यांच्याकडे जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आमच्यापुढे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय नाही, सर्वात आधी आम्हाला आमच्या पक्षातील मुद्दे सुरळीत करु द्या, इतर कोणत्याही विषयावर बोलणे आता योग्य नाही, असेही पटेल म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा निर्णय माझ्याशिवाय होईल, मी त्या शर्यतीत नाही, असे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. मागील काही दिवसांपासून अध्यक्षपदाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पटेल यांनी हे विधान केले. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानं काहींच्या पोटात दुखतंय. मात्र, विधिमंडळ पक्षनेता कोणाला करायचे हा प्रश्न आमच्या पक्षाचा आहे, असंही पटेल म्हणाले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दशक्रिया विधी होणार नाही, अशी माहिती श्रीनिवास पवार यांनी दिली . तिसऱ्या दिवशीच सर्व विधी पूर्ण केले असल्यामुळे आता दशक्रिया विधी होणार नसल्याची त्यांनी सांगितले. 'जेव्हा जेव्हा राजकीय व्यक्तीचा अपघात होतो आणि त्यामध्ये व्यक्ती दगावते, तेव्हा प्रत्येक वेळी साहजिकच त्यांचे नातेवाईक आणि विरोधकांना संशय येतो. त्या संदर्भातील चर्चा होणे चुकीचे नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याचा अहवाल लवकरच समोर येईल, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. कल्याण डोंबिवलीची महापौरपदाची निवड बिनविरोध करण्यात आली. महापौरपदी हर्षाली थविल यांची निवड करण्यात आली आहे. पुण्याचे महापौर आणि उपमहापौर ठरले असून भाजपाने नावांची घोषणा केली. महापौरपदी मंजूषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तर उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर यांच्या नावाची घोषणा झाली आहे. मराठी एकीकरण समितीने आज मीरा- भाईंदर मध्ये मराठी महापौर व्हावा या मागणीसाठी आंदोलन केले आहे. यावरुन सरनाईक यांनी टाकी केली. "मराठी एकीकरण समिती कुठून आली, नरेंद्र मेहता आमदार झाले तेव्हा आंदोलन का केले नाही? आम्हाला पाठिंबा दिला असता तर आंदोलनाची वेळ आली नसती, अशी टीका मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी एकीकरण समितीवर केली. खासदार शरद पवार यांनी आज अचानक दिल्ली दौरा रद्द केला असून आता बारामतीसाठी रवाना झाले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आता पवार यांनी अचानक दिल्ली दौरा रद्द करुन बारामतीसाठी रवाना झाले आहेत. मिरा -भाईंदरमध्ये भाजपाने डिंपल मेहता यांचे नाव महापौर पदासाठी जाहीर केले. दरम्यान, आता मेहता यांना विरोध सुरू झाला आहे. मिरा -भाईंदरमध्ये मराठी व्यक्तीच महापौर व्हावा अशी मागणी मराठी एकिकरण समितीने केली आहे. याबाबत आज समिती आंदोलन करणार आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे, यामुळे त्यांच्या आजच्या सभांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरहून हे हेलिकॉप्टर निघणार होते पण तांत्रिक बिघाड झाल्यमुळे रद्द करण्यात आले असल्याची माहिती समोर आली. मुंबईत भाजप आणि शिवसेनेच्या गटनोंदणीनंतर महापौरपदाच्या निवडीबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. यात भाजपकडून रितू तावडे, राजश्री शिरवाडकर, शितल गंभीर यांची नावं आघाडीवर आहेत. येत्या ४८ तासांत भाजपकडून मुंबईच्या महापौर कोण होईल याचं नाव जाहीर केलं जाऊ शकतं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन होऊन पाच दिवस उलटले. या दु:खातून सावरत असतानाच आता अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये जय पवार वडिलांसोबतचा एक फोटो ठेवला आहे. या फोटोला त्यांनी बाबा, 'तुमची खूप आठवण येते', ही कॅप्शन दिली आहे. Missing you a lot Dad 💔#बाबाpic.twitter.com/rMoLhSaNop दिल्ली: भारत-अमेरिका व्यापार करारावर खासदार सस्मित पात्रा म्हणाले, "हे एक अत्यंत सकारात्मक पाऊल आहे. हा करार युरोपियन युनियन-भारत मुक्त व्यापार करारानंतर आणि त्यापूर्वी झालेल्या यूके कराराच्या पार्श्वभूमीवर होत आहे, आणि आपण सध्या ज्या जागतिक आव्हानांना सामोरे जात आहोत, ते पाहता, हा व्यापार करार ती आव्हाने कमी करण्यास मदत करेल. यामुळे सहकार्याची नवीन क्षेत्रे खुली होतील. कमी झालेल्या शुल्कांमुळे देशाला आणि त्याच्या निर्यातीला अमेरिकेत बाजारपेठा शोधण्यासही मदत होईल. केवळ व्यापार आणि वाणिज्यच नव्हे, तर विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रातही संयुक्त सहकार्याची संधी मिळेल. या महिन्यात दिल्लीत होणाऱ्या 'एआय ग्लोबल इम्पॅक्ट समिट'च्या अगदी आधी हा करार होत असल्याने, ही एक अशी संधी आहे जिथे अमेरिकन तंत्रज्ञान आणि भारतीय उत्पादने एकत्र काम करू शकतात. मी याकडे एक अत्यंत सकारात्मक पाऊल म्हणून पाहतो." #WATCH| Delhi: On India-US trade agreement, BJD MP Sasmit Patra says, "It’s a very positive step... As it comes on the heels of the EU‑India FTA and, prior to that, the UK deal, and given the global headwinds we are facing, this trade deal will help lessen those headwinds. It…pic.twitter.com/XAw6KpfFEV पश्चिम बंगालमध्ये कोळसा खाणकाम आणि वाहतूक प्रकरणाशी संबंधित ईडीची छापेमारी. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने मंगळवारी पश्चिम बंगालमध्ये कोळशाच्या कथित अवैध खाणकाम आणि वाहतुकीच्या प्रकरणातील मनी लाँड्रिंगच्या तपासाचा भाग म्हणून अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली. STORY | ED raids in West Bengal linked to coal mining, transportation caseThe Enforcement Directorate on Tuesday conducted searches at multiple locations in West Bengal as part of a money laundering investigation into a case of alleged illegal mining and transportation of coal,…pic.twitter.com/ZF8w8pfjWL "चीनसोबतच्या सीमावादाच्या वेळी निर्णय घेण्यामध्ये पंतप्रधान आणि राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने आपली जबाबदारी झटकली, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या पुस्तकाच्या मुद्द्यारुन त्यांनी हा आरोप केला. VIDEO | Delhi: On former Army chief Gen Naravane’s book issue, Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, "The PM and the National Security Agency shirked their responsibility in taking decisions during the border face-off with China."(Full video available on PTI Videos –…pic.twitter.com/unnP9jQvjR "चीनसोबतच्या सीमावादाच्या वेळी निर्णय घेण्यामध्ये पंतप्रधान आणि राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने आपली जबाबदारी झटकली, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या पुस्तकाच्या मुद्द्यारुन त्यांनी हा आरोप केला. VIDEO | Delhi: On former Army chief Gen Naravane’s book issue, Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, "The PM and the National Security Agency shirked their responsibility in taking decisions during the border face-off with China."(Full video available on PTI Videos –…pic.twitter.com/unnP9jQvjR मुंबई महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेचा मुहूर्त अखेर ठरला असून येत्या ११ फेब्रुवारी रोजी मुंबईला नवा महापौर मिळणार आङे. मुंबईचा महापौर भाजपचाच असेल हे आता स्पष्ट झाले असून १८ फेब्रुवारीला महापालिकेची विशेष सभा बोलावण्यात आली आहे. त्यानंतर २६ किंवा २६ फेब्रुवारी रोजी महापालिकेचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर होणार आहे. #WATCH| Delhi | NDA MPs felicitate PM Modi for the India-US trade agreement, at NDA Parliamentary party meeting in Parliament premisespic.twitter.com/M5nMRwggtn Congress MP KC Venugopal gives Adjournment Motion Notice in Lok Sabha to discuss India-US Trade Agreement."Despite the significant economic, agricultural, and strategic implications of these reported commitments, the Government has neither made an official statement nor taken…pic.twitter.com/Kj3ESrLoiM अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा तपास सीआयडीकडे वर्ग, अधिकारी बारामतीत जाऊन चौकशी करणार; सर्व अँगल पडताळून पाहणार मैत्रीचा एक नवीन अध्याय!भारत आणि अमेरिकेमधील ऐतिहासिक व्यापार करार हा खऱ्या अर्थाने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय आहे. जागतिक व्यापारासाठी सुद्धा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण आहे.जगातील प्रमुख निर्यात करणाऱ्या…https://t.co/cOSEDXoVWp पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून झालेल्या चर्चेनंतर डोनाल्ड ट्रॅम्प यांनी टॅरिफ कपातीची घोषणा केली आहे. भारतीय वस्तूंवर आकारला जाणारा 'रेसिप्रोकल टॅरिफ' २५ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. तसंच या निर्णानंतर, अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापार करारावर सहमती झाली आहे.
35 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 02:02 PM
पक्षविरोधी कारवाया सुरू असताना काँग्रेसने नेतृत्वात बदल केले

पक्षविरोधी कारवाया सुरू असताना काँग्रेसने नेतृत्वात बदल केले

सातारा :कराडउत्तर ब्लॉककाँग्रेसचेअध्यक्ष श्रीनिवास थोरात यांनी दिलेला राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. तसेच खटाव ब्लॉककाँग्रेसचेअध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या पक्षविरोधी कारवायांची दखल घेऊन त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आले आहे. या दोन्ही पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित केले आहे, अशी माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिली आहे.प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतकराडउत्तर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास थोरात हे भाजप व अपक्षांचा प्रचार करीत असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा काँग्रेसकडे दिला आहे. संबंधित राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. थोरात यांना पदमुक्त केले आहे. काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थोरात यांचे कोणतेही आदेश विचारात घेऊ नयेत. आता त्यांचा काँग्रेस पक्षाशी काहीही संबंध राहिलेला नाही.खटाव ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांना कातरखटाव जिल्हा परिषद मतदार संघात पक्षाची अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. परंतु त्यांनी निवडणुकीतून माघार घेऊन विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत. सदाशिव खाडे हे काँग्रेसच्या उमेदवाराविरोधी प्रचार करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संबंधित तक्रारीची शहानिशा केली असता, त्यात तथ्य आढळल्याने सदाशिव खाडे यांना पदावरून हटवले असून, त्यांना काँग्रेस पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. खटाव ब्लॉक काँग्रेसच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदी प्रभारी अध्यक्ष म्हणून परेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
75 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 3, 2026, 01:52 PM
ठाणे महानगरपालिकेने नवीन महापौर आणि उपमहापौरांची निवड केली

ठाणे महानगरपालिकेने नवीन महापौर आणि उपमहापौरांची निवड केली

विनित जांगळे, ठाणे :ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला रोहित पिंपळोलकर (गायकवाड) यांची, तर उपमहापौरपदी भाजपच्या कृष्णा दादू पाटील यांची मंगळवारी निवड झाली. या दोन्ही पदांची निवडणूक पिठासीन अधिकारी तथा ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची आणि उपमहापौरपदी भाजपच्या कृष्णा पाटील यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा पीठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी करताच पालिकेच्या सभागृहात युतीचे नगरसेवक व नगरसेविकांनी शिवसेना, भाजप, रिपाईं महायुतीचा विजय असो, अशा घोषणा देत जल्लोष केला.ठाणे महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला पिठासीन अधिकारी म्हणून ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ तसेच महापालिका सचिव मनीष जोशी उपस्थित होते. या सभेत महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली. या दोन्ही पदांसाठी विरोधी पक्षाकडून एकही अर्ज दाखल करण्यात आला नव्हता. त्यामुळे महापौरपदासाठी शिवसेनेकडून अर्ज दाखल केलेल्या शर्मिला पिंपळोलकर यांची आणि उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले.भाजपच्या कृष्णा पाटील यांची बिनविरोध निवड पिठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी केली. महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडीची घोषणा झाल्यानंतर ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांचे तुळशीचे रोप देऊन अभिनंदन आणि स्वागत केले.भगवे फेटे, उपरणे...तुतारीचा गजरशिवसेना आणि भाजप युतीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी भगवे फेटे आणि उपरणे परिधान करत पालिका सभागृहात प्रवेश केला. यावेळीमहापौरआणि उपमहापौरांची निवड होताच तुतारीच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. एकमेकांना मिठाई देत तोंड गोड करुन या निवडीचे उपस्थितांनी स्वागत केले.महापौरांचा अल्पपरिचयनाव : शर्मिला रोहित पिंपळोलकर (गायकवाड)पत्ता : कोपरी कॉलनी, सिध्दार्थ नगर, ठाणेजन्म : २५ जानेवारी १९८२शैक्षणिक पात्रता : सध्या कलाशाखेच्या दुसऱ्या वर्गात शिकत आहे. बारावी व दहावी (मुंबई विद्यापीठ)राजकीय कारकीर्द : शिवसेना नगरसेविका २०१७ ते २०२२ आणि २०२६ (प्रभाग क्र. २०)नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्ष २०१७ ते २०१९ठाणे महानगर पालिका शिक्षण समिती सदस्य २०२१ ते २०२२कोरोना योद्धा पुरस्कार २०२१ ते २०२२उत्कृष्ट नगरसेविका पुरस्कार २०२५महापौरपदी निवड झाल्यानंतर शर्मिला पिंपळोलकर यांची प्रतिक्रिया"यंदा माझी नगरसेवक पदाची दुसरी टर्म असून गेली आठ वर्षे नगरसेवक म्हणून काम केल्यानंतर यंदा महापौरपदाची संधीशिवसेनामुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मिळाल्याचा आनंद आहे. मी या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. 'ठाणे शहर' आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ही ओळख कायम ठेवली असून येत्या काळात ठाणे शहर सुंदर, स्वच्छ करण्याकडे भर असेल", अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी दिली.
59 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 01:46 PM
वसई विरारशहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत बहुजन विकास अघाडीचा दणदणीत विजय

वसई विरारशहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत बहुजन विकास अघाडीचा दणदणीत विजय

- मंगेश कराळे लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा :-वसई विरारशहर महानगरपालिकेच्यामहापौरव उपमहापौरपदाच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने आपले वर्चस्व कायम राखले आहे. मनपाच्या ७ व्या महापौरपदी बविआचे अजीव पाटील तर उपमहापौरपदी मार्शल लोपीस यांची मंगळवारी निवड करण्यात आली. महापौर व उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत बविआच्या उमेदवारांना सभागृहातील बहुमताचे पाठबळ मिळाले. निवडीनंतर सभागृहात बविआच्या नगरसेवकांनी शिट्टी वाजवून जल्लोष केला. मंगळवारी सकाळी मनपा मुख्यालयात महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी अतिरिक, आयुक्त संजय हेरवाडे आणि दिपक सावंत, उपायुक्त अजित मुठे, स्वाती देशपांडे, निवडणूक सहाय्यक आयुक्त विश्वनाथ तळेकर, यांच्यासह मनपातील अनेक अधिकारी, कर्मचारी, अनेक पक्षांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. छाननीत महापौर पदाची ४ नामनिर्देशन पत्र वैध ठरली. निषाद चोरघे, प्रफुल साने यांनी महापौर पदाचा अर्ज मागे घेतला आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विनंती केली. १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. मात्र भाजपने माघार न घेता निवडणूक केली. भाजपाच्या ऍड दर्शना त्रिपाठी यांना ४४ तर अजीव पाटील यांना ७१ मते मिळाली. तर उपमहापौर मार्शल लोपीस यांना ७१ तर भाजपचे नारायण मांजरेकर यांना ४४ मते मिळाली. नवनिर्वाचित महापौर अजीव पाटील यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार असून पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, स्वच्छता आणि नागरी सुविधा अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला. उपमहापौर मार्शल लोपीस यांनी महापौरांसोबत समन्वयाने काम करून नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षाच्या भूमिकेत बसलेल्या भाजपाच्या 'मिशन लोटस' तसेच नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार पाटील यांनी या निवडणुकीच्या पूर्वी केलेले सूचक वक्तव्य याचा कुठलाच प्रत्यय आला नाही. त्यामुळे भाजपा बहुजन विकास आघाडी पुढे निष्प्रभ झाल्याचे दिसून येते विरोधी बाकावर ती ४४ नगरसेवक हीच या सभागृहात जमेची बाजू ठरणार आहे. सहा वेळा नगरसेवक ते महापौर तब्बल सहा वेळा नगरसेवक, बविआचे संघटक सचिव, मुरब्बी राजकारणी, पत्रकारांचे चांगले मित्र, दांडगा अनुभव, प्रथम महापौर राजीव पाटील यांचे बंधू असलेले अजीव पाटील यांची मंगळवारी महापौरपदी निवड झाली आहे.
31 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 01:45 PM
सांगली जिल्हा परिषद निवडणूकः प्रचार अंतिम टप्प्यात प्रवेश करत असताना माघार आणि समर्थनाचा खेळ तीव्र झाला

सांगली जिल्हा परिषद निवडणूकः प्रचार अंतिम टप्प्यात प्रवेश करत असताना माघार आणि समर्थनाचा खेळ तीव्र झाला

सांगली: जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात माघार आणि पाठिंब्याचा खेळ सुरू झाला आहे. काटाजोड लढती असणाऱ्या मतदारसंघांत एकेक मतासाठी रस्सीखेच सुरू असून, उमेदवारांनी गठ्ठा मतदानावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे.निवडणुकीच्या जाहीर प्रचारासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. या स्थितीत मतदानाची गोळाबेरीज करण्याचे काम उमेदवारांकडून सुरू आहे. कोणत्या भागातून गठ्ठा मतदान मिळेल आणि कोणत्या भागातून मतदान फुटण्याची शक्यता आहे, याचा अभ्यास सुरू आहे. जिल्हाभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघात अपक्षांची संख्याही मोठी आहे. या अपक्षांनी मते खाल्ल्यास आपल्याला पराभवाचा दणका बसू शकतो, अशी भीती उमेदवारांना आहे.अशा अपक्षांना ऐनवेळी आपल्याकडे वळवून घेण्याचा खटाटोप सुरू आहे. त्यातूनच जिल्हाभरात माघार आणि पाठिंब्याचा खेळ रंगू लागला आहे. अनेक मतदारसंघांत अपक्षांनी माघार घेऊन अधिकृत उमेदवाराला पाठिंबा दिल्याची पत्रके निघू लागली आहेत. अर्थात, अपक्षांच्या माघारीसाठी काय सेटलमेंट झाली, हे मतदार चांगलेच जाणून आहेत. मिरज पूर्व भागातील दिग्गज नेत्याने गेल्या सहा महिन्यांपासून एका प्रस्थापित पक्षासाठी गावात प्रचार केला. पक्षनेत्याच्या जाहीर सभादेखील घेतल्या. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पक्षाचे पॅनल उभे केले. पण, प्रत्यक्ष निवडणुकीत पक्षाकडून किंवा पक्षनेत्याकडून रसद मिळेना झाल्यावर रिंगणातून माघार घेतली. तीनही उमेदवारांसह दुसऱ्या पक्षाला पाठिंबा दिल्याची घोषणा केली. इतकेच नव्हे, तर सध्या तो विरोधी पक्षाच्या जाहीर सभांमध्ये व्यासपीठावर दिसत आहे.जतमध्ये निवडणुकीत अर्ज भरुन माघारीसाठी भरभक्कम घबाड मिळविण्याच्या नियोजनात असलेल्या एका उमेदवाराला नाईलाजाने माघार घ्यावी लागली. अधिकृत उमेदवाराकडून माघारीसाठी कोणतीही विनंती न आल्याने स्वत:हून त्याने माघार घेत एका पक्षाच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा दिला. आपल्या समर्थक मतदारांनी त्याला भरभरून मते द्यावीत, असे आवाहन तो करू लागला आहे.बंडखोरांना स्वीकृतचे आमिषजिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांत स्वीकृत सदस्य घेण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. त्याचा दाखला देत बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांना माघारीच्या रिंगणात ओढण्याचे पक्षनेत्यांकडून सुरू झाले आहेत. शेवटच्या दोन-तीन दिवसात अपक्षाला माघार घ्यायला लावून प्रचारात सोबत फिरविण्याचे नियोजन आहे.
50 shares
😢
Loksatta logo
Loksatta
Feb 3, 2026, 01:38 PM
ठाणे महापौरपदी सहर शेख यांची निवडः एक गुंतागुंतीचा इतिहास उलगडला

ठाणे महापौरपदी सहर शेख यांची निवडः एक गुंतागुंतीचा इतिहास उलगडला

Sahar Sheikh At Thane Mayor Election 2026:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीनंतर महापौर पदांसाठी निवडणूका पार पडल्या. त्यानुसार, ठाणे महापालिका महापौर निवडणूक आज पार पडली. यावेळी सर्व पक्षाचे नगरसेवक पालिकेत उपस्थित होते. ‘कैसे हराया…’ म्हणणाऱ्या सहर शेख यांनी देखील ठाणे महापालिकेत उपस्थिती लावली होती. त्यावेळी सहर शेख माध्यमांशी काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्रा शहरातून एमआयएमचे पाच उमेदवार निवडून आले होते. यात,जितेंद्र आव्हाडयांचा एकेकाळी निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या यूनुस शेख यांची मुलगी सहर शेख यांचा देखील समावेश आहे. सहर शेख यांचे वडील युनूस शेख हे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून मुंब्रा भागात ब्लाॅक अध्यक्ष म्हणून काम करत होते. मध्यंतरीच्या काळात आव्हाड आणि युनूस यांचे जमेनासे झाले होते. त्यामुळे सहर विजयी झाल्यानंतर यूनुस शेख यांनी आव्हाडांवर जोरदार टीका केली होती. तर, सहर यांनी देखील त्यांच्या भाषणात ‘पुढच्या निवडणूकीत संपूर्ण मुंब्य्राला हिरवा करुन टाकू’ असे वक्तव्य केले. तर, ‘कैसे हराया…’ असे म्हणत आव्हाडांना देखील डिवचले होते. या वक्तव्यावरुन सहर या समाजमाध्यमांवर प्रचंड ट्रोल झाल्या होत्या. त्यांच्या वक्तव्याचे क्लिप सर्वत्र पसरले होते. त्यानंतरही त्यांनी माध्यामांसमोर आपली प्रतिक्रिया ठामपणे मांडली आहे. आज, महापौर निवडणूकीसाठीठाणेमहापालिकेत सर्वच पक्षाचे नगरसेवर हजर झाले होते. यावेळी सहर शेख यांनी देखील ठाणे महापालिकेत उपस्थिती लावली. महापालिकेत येताच त्यांना माध्यमांनी घेरले. त्यावेळी सहर शेख आता वक्तव्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतू, सहर शेख यांनी कोणतेही वादग्रस्त विधान न करता त्यांनी केवळ यंदाच्या महापालिका निवडणूकीत एमआयएमचे पाच नगरसेवक निवडूण आले याचा आनंद व्यक्त केला.
5 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 01:37 PM
विधुतवाडीत निवडणूक प्रचारादरम्यान शिंदे यांच्या वाहनावर हल्ला

विधुतवाडीत निवडणूक प्रचारादरम्यान शिंदे यांच्या वाहनावर हल्ला

आटपाडी : तालुक्यातील विभुतवाडी येथे निवडणूक प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या प्रचार वाहनावर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आटपाडीपोलिसठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतपोलिसांनीदिलेली अधिक माहिती अशी की, १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विभुतवाडी बसस्थानकाजवळ ही घटना घडली. याबाबत हेमंत तुकाराम मोटे (वय २५, व्यवसाय नोकरी, रा. विभुतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हेमंत मोटे हे सदर ठिकाणी उभे असताना शिंदेसेनेच्या वतीने प्रचारासाठी वापरण्यात येणारे वाहन तेथे उभे होते. संबंधित वाहनाचा चालक जवळच चहा पिण्यासाठी गेला होता. त्याचवेळी काही अंतरावर भाजप पक्षाच्या वतीने प्रचार सुरू होता. याचदरम्यान एक अनोळखी इसम फिर्यादीजवळ येऊन शिंदेसेनेच्या प्रचार वाहनाच्या स्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगू लागला. त्यावर फिर्यादीने वाहन चालक चहा पिण्यास गेला असल्याचे सांगितले. यानंतर अचानकपणे त्याठिकाणी दोन वाहने आली. या वाहनांतून ३ ते ४ अनोळखी व्यक्ती उतरल्या. त्या व्यक्तींनी शिवसेनेच्या प्रचार वाहनावर दगडफेक करत वाहनाच्या काचा फोडल्या. या दगडफेकीत प्रचार वाहनाचे अंदाजे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.दरम्यान, घडत असलेली घटना फिर्यादी हेमंत मोटे हे आपल्या मोबाइलमध्ये शूट करत असताना, त्यातील दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या हाताला धरून त्यांना बाजूला ओढले व धक्काबुक्की केली. त्यावेळी शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत फिर्यादीला सुरक्षित ठिकाणी नेले. या घटनेनंतर शिंदेसेना कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, निवडणूक प्रचारादरम्यान अशा प्रकारच्या हिंसक घटनांचा तीव्र निषेध केला आहे. निवडणूक काळात शांतता राखणे आवश्यक असताना अशा प्रकारची दगडफेक व धक्काबुक्की ही लोकशाहीला काळिमा फासणारी असल्याची प्रतिक्रिया शिंदेसेना पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
59 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 01:33 PM
सांगली महापौर निवडणूकः भाजप-राष्ट्रवादीची युती निश्चित, शिंदे सेनेचा सहभाग अनिश्चित

सांगली महापौर निवडणूकः भाजप-राष्ट्रवादीची युती निश्चित, शिंदे सेनेचा सहभाग अनिश्चित

सांगली: महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीच्या हालचाली गतिमान झाल्या असून भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष युतीवर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे, तर शिंदेसेनेच्या सत्तेतील सहभागाबाबत अजूनही अनिश्चितता आहे. महायुतीच्या वतीने महापौरपद भाजपकडे, तर उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे जाणार असल्याचे संकेत आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील उद्या, मंगळवारी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ जिल्हा दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ते भाजप पदाधिकाऱ्यांची महापौरपदासह राष्ट्रवादीच्या युतीबाबत चर्चा करण्याची शक्यताही आहे.महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक ३९ जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी एका जागेची आवश्यकता आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे १६, शिंदेसेनेचे २ नगरसेवक निवडून आले आहेत. निकालानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्याशी संपर्क साधला होता. भाजप-शिंदेसेना युतीचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून घेण्याचा निर्णय झाला. भाजपमधील काही नेत्यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचा पाठिंबा घेण्यास विरोध केला होता. त्यामुळे भाजपने राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या दोन नगरसेवकांशीही संपर्क साधला होता; पण अजित पवार यांच्या निधनानंतर युतीबाबतची गणिते बदलली आहेत.भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची युती जवळपास निश्चित आहे. विमान अपघातापूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी मुंबईत चर्चाही केली होती. त्यांच्या निधनानंतर आता भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे संख्याबळ ५५ वर पोहोचले आहे. शिंदेसेनेच्या पाठिंब्याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यांच्या दोन्ही नगरसेवकांशीही भाजप नेत्यांनी चर्चा केलेली नाही. त्यामुळे शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपकडून सत्ता स्थापन केली जाऊ शकते.महापौर व उपमहापौरपदाबाबतही दोन्ही पक्षांत समझोता झाला आहे. भाजपचा महापौर, तर राष्ट्रवादीचा उपमहापौर होणार असल्याची चर्चा आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादीनेही तयारी सुरू केली आहे. रात्री उशिरा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांच्या उपस्थितीत झाली. उद्या, मंगळवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी ते भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीला पाच वर्षे उपमहापौर, दोन वर्षे स्थायी सभापतीविमान अपघातापूर्वी आदल्या दिवशी अजित पवार यांनी महापालिकेतील सत्ता स्थापनेबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी मुंबईत मंत्रालयात चर्चा केली होती. या चर्चेत राष्ट्रवादीला पाच वर्षे उपमहापौरपद व दोन वर्षे स्थायी समिती सभापती पद देण्याचा फाॅर्म्युला निश्चित झाला होता. तिसऱ्या व चौथ्या वर्षी राष्ट्रवादीला स्थायी सभापतीपद देण्याचा निर्णय झाल्याचा दावा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने केला. आता या चर्चेनुसार पालकमंत्री पाटील हे घोषणा करतील, असेही राष्ट्रवादीतून सांगण्यात आले.
20 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 01:32 PM
मणिपूरला नवे नेतृत्व मिळालेः युमनाम खेमचंद सिंग यांची गट नेते आणि पुढील मुख्यमंत्री म्हणून निवड

मणिपूरला नवे नेतृत्व मिळालेः युमनाम खेमचंद सिंग यांची गट नेते आणि पुढील मुख्यमंत्री म्हणून निवड

ईशान्य भारतातील दोन जातींच्या हिंसाचारात गेल्या दोन वर्षांपासून होरपळत असलेल्या मणिपूर राज्याला नवीन नेतृत्व मिळाले आहे. भाजप नेते युमनाम खेमचंद सिंह यांची मणिपूरच्या भाजप आमदारांनी गटनेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीसोबतच ते आता मणिपूरचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या राजकीय हालचालींनंतर, केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत खेमचंद सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. युमनाम खेमचंद सिंह यांनी यापूर्वी मणिपूर विधानसभेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली असून, त्यांच्याकडे प्रशासकीय आणि राजकीय दांडगा अनुभव आहे. मणिपूरमधील सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत भाजपने खेमचंद सिंह यांच्या रूपाने एका अनुभवी नेत्याला संधी दिली आहे. विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वी राहिली असून, पक्षातील सर्व गटांना सोबत घेऊन जाण्यात ते यशस्वी ठरले आहेत. राज्यातील कायदा-सुव्यवस्था सुधारणे आणि शांतता प्रस्थापित करणे हे त्यांच्यासमोरील पहिले आणि सर्वात मोठे आव्हान असणार आहे.
2 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 01:27 PM
स्थानिक राजकारणात वंदना पवारांचा अनपेक्षित प्रवेश

स्थानिक राजकारणात वंदना पवारांचा अनपेक्षित प्रवेश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी मी जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यास इच्छुक नव्हतो. उमेदवारीच्या चर्चे वेळी दादांनी विचारले अरे प्रकाश पवार यांच्या कुटुंबातील कुणीही उभे नाही का? यानंतर दादांनी वंदना पवार यांना पंचायत समिती निवडणूक लढविण्याचे आदेश दिले. त्यांचे आदेश आशीर्वाद मानून पंचायत समिती लढविण्यासाठी तयारी केली.
42 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Feb 3, 2026, 01:25 PM
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Sharad Pawar on NCP Merger :अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा प्रचंड चर्चेत आला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते विलीनकरणासाठी सकारात्मक असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी मात्र विलीनीकरणाकरता विरोध दर्शवला आहे. तसंच, स्थानिक निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष एकत्र आले होते, विलीनीकरणासंदर्भात अजित पवार काही बोलले नव्हते, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केलं. यासंदर्भात आज शरद पवारांनाही प्रश्न विचारण्यात आला. शरद पवार आज पुण्यातील मोदी बागेतून बारामतीसाठी रवाना झाले. यावेळी माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला. विलीनीकरणासंदर्भात दादा बोललेच नव्हते असं प्रफुल पटेल म्हणालेत, याबाबत विचारलं असता शरद पवारांनी हात जोडले. विलीनीकरणासंदर्भात बोलण्यास शरद पवारांनी स्पष्ट नकार दिला. दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काय होणार? या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार? तसंच, या पक्षाचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनकरण होणार का? हे प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत. त्यातच, १२ फेब्रुवारी रोजी हे दोन्ही पक्ष एकत्र येणार होते, असा दावा शरद पवारांनी केला. यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्याकरता शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठकही झाली असल्याची माहिती शरद पवारांच्या गटातील अनेक नेते देत आहेत. परंतु, विलीनकरणासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचं अजित पवारांच्या गटातील नेते बोलत आहेत. त्यातच, आज शरद पवारांना यासंदर्भात विचारण्यात आल्यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला. परिणामी यासंदर्भातील खुलासे आता येत्या काळातच स्पष्ट होतील. “आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही घेऊ. पक्षाचा निर्णय योग्य पद्धतीप्रमाणे होईल. आम्ही सगळेच योग्य निर्णय घेऊ. आम्ही सुनेत्रा पवार यांच्याबाबत निर्णय घेतला आहे. त्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. पक्षाचाही निर्णय लवकरच घेतला जाईल. बाहेरचे सगळे लोक आमच्या पक्षाबाबत काय बोलत आहेत? ज्यांनी कधीनिवडणूकलढवली नाही असे लोक का बोलत आहेत? १९५२ पासून माझ्या वडिलांना महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलं. मलाही निवडणुकीत लोकांनी निवडून दिलं. आमच्या बद्दल आणि आमच्या पार्श्वभूमीबद्दल कुणी कमेंट करत असेल तर त्यांना लाज वाटली पाहिजे. मी महाराष्ट्राचा जनप्रतिनिधी म्हणून बसलो आहे. पक्षाचा निर्णय योग्य दिशेने होईल, योग्य व्यक्तीचा होईल आणि माझ्या शिवायच होईल. अजून काय सांगायचं आहे?” असा सवाल प्रफुल पटेल यांनी केला आहे.
68 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 01:24 PM
सुनेत्रा पवार यांनी घेतली अजित पवारांची काळजीवाहू मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली

सुनेत्रा पवार यांनी घेतली अजित पवारांची काळजीवाहू मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली

अजित पवारयांच्या निधनानंतर त्यांच्याकडे असलेल्या जबाबदाऱ्या हळूहळू उपमुख्यमंत्रीसुनेत्रा पवारयांच्याकडे सोपवल्या जात आहेत. मंगळवारी (३ जानेवारी) सरकारने बीड आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीसुनेत्रा पवारांकडेसोपवली. सरकारच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्षसुनील तटकरेयांनी खास पोस्ट शेअर करत त्यांच्या धैर्याचे कौतुक केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. अजित पवारांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी त्यांचा शपथविधी पार पडला. दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना सुनेत्रा पवारांनी पक्षाकडून दिलेली जबाबदारी स्वीकारली. "अजित पवारांनी अत्यंत मायेने, आपुलकीने पुणे व बीड जिल्ह्यांचे..." उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे बीड आणि पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर प्रदेशाध्यक्षसुनील तटकरेयांनी एक पोस्ट शेअर केली. तटकरे म्हणाले, "सुनेत्रावहिनी... आपल्या या धैर्याचं शब्दांत वर्णन करणं अशक्य... आपले सर्वांचे नेते, आपले प्रेरणास्थान आदरणीय अजितदादा पवार यांनी अत्यंत मायेने, आपुलकीने पुणे व बीड या दोन्ही जिल्ह्यांचे पालकत्व केले." "दादांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली, पुणे व बीड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पोरकेपणाची भावना निर्माण झाली... दादांच्या पश्चात आपण उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेऊन महाराष्ट्राला आधार दिला. त्यापुढे जात आपण आज पुणे व बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारत आहात. आभाळाएवढे दुःख बाजूला सारून आपण महाराष्ट्राला सावरण्यासाठी जे धैर्य दाखवत आहात, ते शब्दांच्या पलीकडले आहे", अशा भावना सुनील तटकरेंनी व्यक्त केल्या. "आपल्या प्रत्येक निर्णयात, प्रत्येक प्रवासात माझ्यासह संपूर्ण राष्ट्रवादी परिवार आपल्यासोबत ठामपणे उभा आहे. आपले नेतृत्व महाराष्ट्राला क्षणोक्षणी अजितदादांच्या नेतृत्वाची आठवण करून देणारे ठरेल हा मला विश्वास आहे. आपणांस पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा", असे म्हणत तटकरेंनी या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.
52 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Feb 3, 2026, 01:00 PM
अमेरिकेच्या व्यापार करारात मोदी भारताला विकून टाकतात, राहुल गांधींचा आरोप

अमेरिकेच्या व्यापार करारात मोदी भारताला विकून टाकतात, राहुल गांधींचा आरोप

आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या व्यापार करारात देशाला विकले असल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला… लोकसभा अध्यक्षांच्या अंगावर कागदपत्रे भिरकवण्याच्या आरोपाखाली काँग्रेसच्या सात खासदारांचे अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबन करण्यात आले… कल्याणमधील ठाकरे गटाचे दोन नगरसेवक लवकरच आपल्या पदांचा राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली… पिंपरी-चिंचवड महापालिकेत सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षात महापौरपदावरून नाराजी उफाळून आली… राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ… पंतप्रधाननरेंद्र मोदीयांनी अमेरिकेच्या व्यापार करारात देश विकला, असा गंभीर आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना केला. इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपतींच्या भाषणावर विरोधी पक्षनेत्याला बोलू दिले नाही. जनतेला याबद्दल विचार करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. चार फेब्रुवारीपासून रडखडलेल्या अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारावर मोदींनी २ फेब्रुवारीला सायंकाळी स्वाक्षरी केली. त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे. हजारो कोटींनी बांधलेला मोदींच्या प्रतिमेचा फुगा फुटणार आहे. आमचे पंतप्रधान धोक्यात आले आहेत. अमेरिकेत अदानींवर असलेला खटला प्रत्यक्षात मोदींवरच आहे. तसेच, एपस्टीन फाइल्सचा संदर्भ देत, अजूनही काही माहिती जाहीर व्हायची असल्यामुळे सरकारवर दबाव आहे. ही दोन मोठी दबावाची कारणे आहेत, असेही राहुल म्हणाले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अंगावर कागदपत्रे भिरकवल्याच्या आरोपाखाली इंडिया आघाडीच्या आठ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामध्ये काँग्रेसच्या सात आणि माकपच्या एका खासदाराचा समावेश आहे. अमरिंदर सिंग राजा वारिंग, डीन कुरियाकोसे, किरण कुमार रेड्डी, माणिकम टागोर, गुरजीत सिंग औजला, हिबी एडन, एस. वेंकटेश्वरन आणि प्रशांत पडोळे अशी निलंबित खासदारांची नावे आहेत. यातील प्रशांत पडोळे हे महाराष्ट्रातील भंडाऱ्याचे खासदार आहेत. हे सर्व खासदार आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होऊ शकणार नाहीत. लोकसभा अध्यक्षांच्या या कारवाईचा काँग्रेसने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांनी चीनचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सभागृहात वाद निर्माण झाला होता. त्यानंतर सभापतींनी त्यांना बोलण्याची परवानगी नाकारली. या गोंधळादरम्यान विरोधी पक्षाचे खासदार टेबलांवर चढले आणि त्यांनी सभापतींच्या दिशेने कागदपत्रे फेकण्यास सुरुवात केली. त्यामुळेच या खासदारांचे निलंबन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आणखी वाचा :सोने-चांदीचे दर आणखीनच कोसळणार की वाढणार? गुंतवणूकदारांनी काय करावे? तज्ज्ञ काय सांगतात? कल्याणमधील ठाकरे गटाचे दोन नगरसेवक लवकरच आपल्या पदांचा राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. मंगळवारीकल्याण डोंबिवलीपालिकेतील महापौर निवडीच्या वेळी ठाकरे गटाच्या नऊ नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक अनुपस्थित होते. या तिन्ही नगरसेवकांना पक्षाने सभागृहात उपस्थित राहण्याचा आदेश दिला होता. या तीन नगरसेवकांपैकी दोन नगरसेवक राजीनामा देणार असल्याची कुजबुज आमच्या कानावर आली असल्याचे ठाकरे गटाचे पालिकेतील गटनेते उमेश बोरगावकर यांनी सांगितले. मात्र, ते दोन नगरसेवक कोण हे सांगण्यात त्यांनी नकार दिला. सभागृहात गैरहजर राहणाऱ्या नगरसेवकांविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे बोरगावकर यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. त्यांचे खुलासे आल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, असेही बोरगावकर म्हणाले. पिंपरी-चिंचवड महापालिकेत सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षात महापौरपदावरून नाराजी उफाळून आल्याचे वृत्त आहे. महापौरपदासाठी इच्छुक असताना उपमहापौरपदाची उमेदवारी जाहीर झाल्याने नाराज शीतल शिंदे अर्ज दाखल न करताच महापालिका मुख्यालयातून बाहेर पडले. महापौरपदासाठी रवि लांडगे आणि उपमहापौरपदासाठी ऐनवेळी शर्मिला बाबर यांचा अर्ज दाखल झाला. महापौरपदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने भाजपामध्ये इच्छुकांची संख्या मोठी होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महापौरपदासाठी रवि लांडगे आणि उपमहापौरपदासाठी शीतल शिंदे यांचे नाव निश्चित केले. त्याबाबतचे पत्र शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना पाठविले आहे. यादरम्यान महापौरपदासाठी लांडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. हेही वाचा :सुनेत्रा पवारांआधी जानकी रामचंद्रन यांनीही अशीच घेतली होती मुख्यमंत्रीपदाची शपथ, MGR यांच्या मृत्यूनंतर जयललितांचं काय झालं होतं ? राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्रीपंकजा मुंडेयांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली. पंकजा मुंडे या सोमवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ येथे आलेल्या होत्या. यावेळी त्यांनी पिशोर, घाटनांद्रा, चौका, आडगाव, बजाजनगर आदी ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. सोमवारी सायंकाळी शहरातच मुक्काम केल्यानंतर त्या मंगळवारी सकाळी लातूर, धाराशिव व सोलापूर या तीन जिल्ह्यातील त्यांच्या नियोजित सभांसाठी हेलिकॉप्टरने जाणार होत्या. सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांचा पुढील नियोजित दौरा निश्चित होता. या दौऱ्यासाठी निघण्याची तयारी सुरू असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मंत्री पंकजा मुंडे यांचे उड्डाण काही काळ रखडले. बिघाडाच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास होऊ शकत नाही, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर मुंबई येथून दुसरे हेलिकॉप्टर मागवण्यात आल्याची माहिती पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय तथा भाजपाचे कार्यकर्ते प्रवीण घुगे यांनी दिली.
4 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 12:54 PM
विरोधकांच्या निदर्शनांनंतरही लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मोठ्या अडथळ्याशिवाय सुरू

विरोधकांच्या निदर्शनांनंतरही लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मोठ्या अडथळ्याशिवाय सुरू

आज लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पाचवा दिवस होता. मात्र हा दिवसही गदारोळातच गेला. विरोधी पक्षनेते खासदारराहुल गांधीयांनी पुन्हा एकदा माजी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला. यानंतर, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपली.राहुल गांधीयांना रोखण्याचा प्रयत्न झाला. यानंतर, विरोधी खासदारांनी प्रचंड घोषणाबाजी केली. दरम्यान, सुरू असलेल्या प्रचंड गदारोळ एका खासदाराने चेअरला थेट 'यार' म्हणून संबोधले. यावरून उपसभापती अधिकच भडकले. उपसभापती भडकले म्हणाले... -खरे तर आज (३ फेब्रुवारी) लोकसभेचे कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले. दुपारी ३ वाजता सभागुरू पुन्हा सुरू झाले. यावेळी उपसभापती कृष्णा प्रसाद तेन्नेटी यांनी सदस्यांना शिस्त पाळण्याचे आवाहन केले. दरम्यान, गदारोळ सुरू असतानाच एक सदस्य चेअरला 'यार' म्हणून संबोधित करत होता. यावर उपसभापती भडकले आणि म्हणाले, "आपण काय म्हणालात? 'हे काय आहे यार'... ही संसद आहे,लोकसभाआहे. तुम्ही चेअरला 'यार' म्हणू शकत नाही." ही टिप्पणी राहुल गांधी आणिकाँग्रेसनेते के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे इशारा करत करण्यात आल्यचाे समजते. यामुळे सभागृहात पुन्हा गदारोळ सुरू झाला. ८ खासदार निलंबित -यानंतर, कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले. मात्र, अध्यक्षांच्या दिशेने कागद भिरकावल्याप्रकरणी ८ खासदारांवर कठोर कारवाई करत त्यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले. यांत,काँग्रेसचे७ खासदार अमरिंदर सिंग राजा वडिंग, प्रशांत परोले, हिबी ईडन, गुरजीत औजला, डीन कुरियाकोस, मणिकम टागोर, किरण कुमार रेड्डी यांचा समावेश आहे, तर माकपचे खासदार एस. व्यंकटेशन यांचा समावेश आहे.
16 shares
😢
Loksatta logo
Loksatta
Feb 3, 2026, 12:43 PM
बारामतीला जाणाऱ्या विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू

बारामतीला जाणाऱ्या विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू

Sunetra Pawar News : २८ जानेवारीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. अजित पवार मुंबईहून बारामतीला पोहचत होते. त्याचवेळी विमानाचं क्रॅश लँडिंग झालं आणि अजित पवार यांच्यासह त्यांचे अंगरक्षक, विमानाचे वैमानिक, फ्लाईट अटेंडंट अशा सगळ्यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्राला शोकसागरात बुडवणारी ही बातमी ठरली. तसंच २९ जानेवारीला अजित पवारांना साश्रू नयनांनी महाराष्ट्राने निरोप दिला. २८ जानेवारीला म्हणजेच अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला तेव्हा सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे,शरद पवारहे सगळे दिल्लीमध्ये होते. अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने हे सगळे दिल्लीत होते. २८ जानेवारीच्या सकाळी अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला आहे हे सुनेत्रा पवार यांना फोनवरुन कळवण्यात आलं. त्यांचा सुरुवातीला या बातमीवर विश्वासच बसला नाही. मात्र पुढच्या काही मिनिटांत त्यांच्या समोर वास्तव आलंच. कारण ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणाहून एक व्हिडीओ कॉल सुनेत्रा पवार यांना आला. तिथली परिस्थिती त्यांनी पाहिली आणि त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे याची जाणीव त्यांना झाली. सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या फोनवर हे पाहिलं की बारामतीच्या विमानतळाजवळ एक खासगी विमान अपघातग्रस्त होऊन जळत पडलं आहे. विमानाचे तुकडे विखुरले आहेत. सुनेत्रा पवारांनी त्यांच्या फोनवर हे दृश्य पाहिलं आणि त्या भावनिकदृष्ट्या कोसळल्याच. अजित पवारांचा मृत्यू झाला आहे याची जाणीव त्यांना या फोनने दिली. नियतीने वेळ साधली आहे हे त्यांना कळलं आणि त्यांना अतीव दुःख झालं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. अजित पवारांचं निधन झालं आणि बारामतीसह सगळा महाराष्ट्र हळहळला. अजित पवारांना मुंबईहून घेऊन निघालेलं विमान सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी बारामतीत उतरणार होतं. अजित पवारांच्याबारामतीयेथील कार्यालयातले काही कर्मचारी विमानतळावर पोहचले होते. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठीअजित पवारबारामतीत पोहचले होते. त्यादिवशी त्यांच्या चार रॅली होत्या. साधारण ८.४६ च्या दरम्यान अजित पवार ज्या विमानात होते त्या विमानाने दोन घिरट्या घातल्या आणि ते विमान एका बाजूला झुकलं त्यानंतर ते कोसळलं आणि महाराष्ट्राने लोकनेता गमावला. प्रत्यक्षदर्शींनी या अपघाताबाबत माध्यमांना विमान नेमकं कसं कोसळलं याची माहिती दिली.
22 shares
😢
Loksatta logo
Loksatta
Feb 3, 2026, 12:38 PM
पिंपरी-चिंचवाड महापौरपदाची उमेदवारीः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्याने भाजपबद्दल नाराजी व्यक्त केली

पिंपरी-चिंचवाड महापौरपदाची उमेदवारीः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्याने भाजपबद्दल नाराजी व्यक्त केली

पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाचे उमेदवारी अर्ज भरताना भाजपने डावलल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) शहराध्यक्ष, नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपकडून अन्याय केला जात आहे. पुण्यात भाजपाने रिपाइंला उपमहापौर पद देऊन युतीचा धर्म पाळला. त्याप्रमाणे पिंपरीत भाजपाने स्थायी समितीचे अध्यक्षपद पद देऊन अन्याय दूर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. नगरसेवक वाव्हळकर म्हणाले, ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्ष व महायुतीसोबत काम करत आला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नसतानाही आंबेडकरी समाज आजही महायुतीसोबत ठामपणे उभा आहे. महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला १२८ पैकी पाच जागा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी प्रभाग क्रमांक २५ मधून मी आणि प्रभाग क्रमांक १६ मधून धर्मपाल तंतरपाळे हे दोन उमेदवार निवडून आले.पुणेमहापालिकेत भाजपने रिपाइंला उपमहापौर पद दिले. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील नेते, आमदारांना महायुतीच्या धर्माचा विसर पडला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. रिपाइंला स्थायी समितीचे अध्यक्षपद देऊन अन्याय दूर करावा’. रिपाइचे पाचही उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावरनिवडणूकलढले होते. त्यापैकी दोघे निवडून आले आहेत. पुण्यात भाजपने रिपाइचे परशुराम वाडेकर यांना उपमहापौर पद दिले आहे. त्याचधर्तीवर पिंपरीतील रिपाइलाही उपमहापौरपद मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, भाजपने उपमहापौर पद दिले नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त करित आता स्थायी समितीचे अध्यक्षपद रिपाइने मागितले आहे. महापालिका निवडणुकीत भाजपची दुसऱ्यांदा एकहाती सत्ता आली आहे. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा पराभव केला. भाजपच्या चारही आमदारांनी यशस्वी रणनिती अवलंबून उपमुख्यमंत्रीअजित पवारयांच्यावर मात केली. भाजपचे सर्वाधिक ८४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ ३७ नगरसेवक निवडून आले. शिवसेना (शिंदे) पक्षाचे सहा आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आला आहे. भाजपकडून महापौरपदासाठी रवि लांडगे यांनी उमेदवारी अर्ज केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे रवि लांडगे यांची महापौरपदी बिनविरोध निवड निश्चित असून शुक्रवारी शिक्कामोर्तब होईल. उपमहापौरपदासाठी भाजपकडून शर्मिला बाबर यांनी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून वैशाली काळभोर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शुक्रवारी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
7 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 3, 2026, 12:12 PM
भारत-अमेरिका व्यापार करारामुळे भारत-रशियाच्या तेल खरेदीवर कोणताही परिणाम होणार नाही-क्रेमलिन

भारत-अमेरिका व्यापार करारामुळे भारत-रशियाच्या तेल खरेदीवर कोणताही परिणाम होणार नाही-क्रेमलिन

मॉस्को :भारत आणि अमेरिका यांच्यात अखेर व्यापार करार झाला आहे. ट्रम्प प्रशासनाने 18 टक्क्यांपर्यंत टॅरिफ कमी केले आहे. करारामुळे 500 अब्ज डॉलर्सच्या उत्पादनाची भारतात आयात करण्यात येऊ शकते अशी आशा ट्रम्प व्यक्त करत आहेत. पण या व्यापार कराराचा भारत आणि रशिया यांच्यातील संबंधावर परिणाम होणार अशी चर्चा होऊ लागली. दरम्यान रशियाने यावर प्रतिक्रिया दिली आहे.रशियाची प्रतिक्रियारशियाने प्रतिक्रियेमध्ये स्पष्ट केले आहे की, भारताकडून तेल खरेदी थांबवण्याबाबत त्यांना कोणताही संकेत मिळालेला नाही आणि दोन्ही देशांमधील संबंध मजबूतपणे पुढे जात आहेत. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी माध्यमांशी बोलताना, अमेरिका आणि व्यापार करारामुळे भारत रशियाच्या तेल खरेदी करणार नाही या बातम्यांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.पेस्कोव म्हणाले की, आम्हाला आतापर्यंत भारत सरकारकडून रशियन तेल खरेदी थांबवण्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना मिळालेली नाही. त्यांचे वक्तव्य महत्त्वाचे आहे कारण पश्चिमी माध्यमांमध्ये सातत्याने असा प्रचार केला जात होता की, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत करार करण्यासाठी भारताने रशियाशी फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.रशियाचा मानसपेस्कोव यांनी केवळ तेलासंबंधी प्रतिक्रिया दिली नाही, तर त्यांनी भारतासोबतच्या व्यापक धोरणात्मक संबंधांवरही विश्वास व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, रशिया भारतासोबतचे आपले संबंध सर्वोतोपरी विकसित करण्याचा आणि पुढे नेण्याचा मानस ठेवतो. 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर, भारत रशियन कच्च्या तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार बनला होता.रशियामुळे लागू करण्यात आलेला मोठा दंडअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ दंड स्वरुपात लागू केला होता. त्या अगोदर काही दिवसांपूर्वीच 25 टॅरिफची घोषणा ट्रम्प यांनी केली होती. एकूण 50 टक्के टॅरिफ भारतावर लागू केला होता. अखेर व्यापार करारासोबत आयात शुल्क 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. त्यामुळे भारत अमेरिका यांच्यातील व्यापाराला गती मिळणार आहे. तेलासंंबधी
20 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 11:51 AM
अमेरिका-भारत व्यापार करारः शुल्कात 18 टक्क्यांची कपात, द्वैपाक्षिक व्यापाराला चालना

अमेरिका-भारत व्यापार करारः शुल्कात 18 टक्क्यांची कपात, द्वैपाक्षिक व्यापाराला चालना

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षडोनाल्ड ट्रम्पयांनी सोमवारी रात्री उशिरा, बहुप्रतिक्षितभारत-अमेरिकाव्यापार कराराची घोषणा केली. याअंतर्गतभारतावरलादण्यात आलेला करही १८% पर्यंत कमी करण्यात आला आहे. दरम्यान आता भारत अमेरिकेकडून काय काय खरेदी करणार हा अनेकांच्या औत्सुक्याचा विषय आहे. तर, भारत अमेरिकेकडून, पेट्रोलियम, संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मास्युटिकल्स, टेलिकॉम उत्पादने आणि विमाने खरेदी करेल. तसेच, दोन्ही देशांतील चर्चेनंतर, ट्रेड डीलवर अधिकृत मोहर लवकरच लागेल, असा दावा रॉयटर्स या वृ्त्त संस्थेने केला आहे.या कराराचा उद्देश दोन्ही देशांमधील व्यापार तूट कमी करणे असा आहे. आगामी काळात याचा अनेक क्षेत्रांवर प्रभाव पडेल, असे बोलले जाते. या डीलचा एक भाग म्हणून भारताने काही कृषी उत्पादनांसाठी आपली बाजारपेठ खुली करण्यासंदर्भातही भाष्यकेले आहे. मात्र याबाबतचा सविस्तर तपशील अद्याप उघड झालेला नाही, असे रॉयटर्सने संबंधित अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षडोनाल्ड ट्रम्पयांनी भारत अमेरिकन वस्तूंवर '०' टक्के टॅरिफ लावेल, असा दावा केला असून तज्ज्ञ याचे विविध अर्थ काढत आहेत. भारत करणार ५०० अब्ज डॉलरची खरेदी -राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या कराराला दुजोरा देताना म्हटले आहे की, भारत उच्च स्तरावर अमेरिकन उत्पादने खरेदी करण्यास तयार झाला आहे. तो ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत, ऊर्जा, कोळसा, तंत्रज्ञान, कृषी आणि इतर उत्पादने खरेदी करू शकतो. ऑटोवर टॅरिफ कमी होणार -दोन्ही देशांतील व्यापारात संतुलन साधण्यासाठी अमेरिकेच्या विनंतीवरून भारताने ऑटोमोबाईलवरील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अमेरिकन वाहने भारतीय बाजारपेठेत स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकतात. भारताने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही -या कराराचा पहिला हप्ता असून आगामी काळात चर्चेद्वारे याची व्याप्ती वाढू शकते. भारताच्या वाणिज्य मंत्रालयाने अद्याप यावर अधिकृत भाष्य केलेले नाही. आकडेवारीनुसार, जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान भारताची अमेरिकेला झालेली निर्यात १५.८८ टक्क्यांनी वाढून ८५.५ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, तर आयात ४६.०८ अब्ज डॉलर इतकी राहिली आहे.
52 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 11:49 AM
महाराष्ट्र विधानसभेत शिवसेना गटांमध्ये हाणामारी

महाराष्ट्र विधानसभेत शिवसेना गटांमध्ये हाणामारी

निवड प्रक्रिया पार पडत असतानाच सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक सचिन पोटे यांनी शिवसेना (यूबीटी) गटावर निशाणा साधताना तुफान फटकेबाजी केली. युबीटीच्या गटनेत्यांना टोला लगावताना पोटे म्हणाले, "तुम्ही जेव्हा निवडून आलात तेव्हा तुमची क्रिकेटची टीम होती, पण या सभागृहात येईपर्यंत ती कबड्डीची टीम झाली आहे." पोटे यांच्या या उपरोधिक टोल्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला आणि राजकीय वातावरण चांगलेच तापले.
90 shares
😢