Achira News Logo
Achira News
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 09:14 AM
ममता बॅनर्जी यांचे राजकीय भूकंपः शुभेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालमधील दोन्ही जागा जिंकल्या

ममता बॅनर्जी यांचे राजकीय भूकंपः शुभेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालमधील दोन्ही जागा जिंकल्या

गेली १५ वर्षे पश्चिम बंगालच्या राजकारणात एकछत्री अंमल गाजवणाऱ्याममता बॅनर्जीयांच्यासाठी २०२६ चे निकाल 'राजकीय भूकंप' ठरले आहेत. ज्या भवानीपूर मतदारसंघानेममता बॅनर्जींनामुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवले, त्याच पारंपरिक बालेकिल्ल्यात भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा १५,१०५ मतांनी पराभव केला. गेल्या दोन निवडणुकांत ममतांचा सुवेंदू यांनी केलेला हा दुसरा पराभव आहे.कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता गेल्या निवडणुकीत नंदीग्राममधून सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात उभ्या ठाकल्या होत्या. तिथे त्यांचा पराभव झाला होता. यंदाच्या निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांनी नंदीग्राम आणि ममतांच्या भवानीपूरमधून देखील निवडणूक लढविली होती. या दोन्ही ठिकाणी सुवेंदू अधिकारी मताधिक्याने निवडून आले आहेत. ममतांकडे आता सत्ता नाही तसेच आमदारकी देखील नाही यामुळे त्यांना विधानसभेचे सदस्यत्व मिळणार नाही. यामुळे ममता पुढे काय करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच ममतांकडे विधानसभेवर निवडून जाऊन विरोधी पक्षनेता बनण्याची संधी आहे. पोटनिवडणुकीद्वारे पुनरागमन...सुवेंदू अधिकारी दोन जागांवरून निवडून आले आहेत, त्यामुळे त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागेल. अशा रिक्त होणाऱ्या जागेवरून ममता बॅनर्जी पोटनिवडणूक लढवू शकतात. जर त्या निवडून आल्या, तर विधानसभेत 'विरोधी पक्षनेता' म्हणून त्या भाजप सरकारला धारेवर धरू शकतील. आता सुवेंदू अधिकारी कोणत्या मतदारसंघातून आमदारकीचा राजीनामा देतात यावर सारे अवलंबून असणार आहे. त्याचप्रमाणे, हुमायून कबीर हे रेजीनगर आणि नौदा या दोन मतदारसंघांतून निवडून आले आहेत. त्यांनाही एका जागेचा राजीनामा द्यावा लागेल. ममतांसमोर आव्हान : पक्षाला फुटीपासून वाचवणेसत्ता गेल्यानंतर अनेकदा आमदार पक्षांतर करतात. ८१ आमदारांचे संख्याबळ राखणे आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची फेररचना करणे ही ममतांसमोरची सर्वात मोठी अग्निपरीक्षा असेल. 'विरोधकांची योद्धा'?ममता बॅनर्जी या उपजतच 'फायटर' नेत्या आहेत. १९८४ मध्ये त्यांनी सोमनाथ चॅटर्जींसारख्या दिग्गज नेत्याला हरवून आपली कारकीर्द सुरू केली होती. आता पुन्हा एकदा शून्यातून विश्व निर्माण करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. विधानसभेबाहेर राहून रस्त्यावरची लढाई लढण्यात ममता वाकबगार आहेत, त्यामुळे बंगालमध्ये त्या 'विरोधकांची योद्धा' म्हणून कशा प्रकारे समोर येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
97 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 08:57 AM
सॅंटियागो मार्टिनच्या कुटुंबातील सदस्यांनी तामिळनाडू आणि पाँडिचेरीमध्ये निवडणुका जिंकल्या

सॅंटियागो मार्टिनच्या कुटुंबातील सदस्यांनी तामिळनाडू आणि पाँडिचेरीमध्ये निवडणुका जिंकल्या

काल लागलेल्या पाच राज्यांमधील विधानसभांच्या निवडणुकीच्या निकालांमागच्या काही अजब कहाण्या आता समोर आल्या आहेत. त्याततामिळनाडूमध्येअभिनेता विजय याच्या पक्षाने फिल्मी स्टाईलमध्ये मिळवलेलं यश चर्चेचा विषय ठरलेलं आहेत. याचतामिळनाडूतीलएका कुटुंबातील तीन सदस्यांनी तीन वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवून विजय मिळवला आहे. हे तिघेही जण लॉटरी किंग सँटियागो मार्टिन यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. विजयी झालेल्यांमध्ये मार्टिन यांची पत्नी, मुलगा आणि जावयाचा समावेश आहे. यापैकी दोघे तामिळनाडूतून तर एक जण पाँडेचेरीतून विजयी झाला आहे. लॉटरी किंग आणि इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून मोठ्या राजकीय देणग्या देणारे तामिळनाडूमधील चर्चित राजकीय देणगीदार असलेले सँटियागो मार्टिन यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांनी तीन वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये सँटियागो मार्टिन यांच्या पत्नी लिमारोज मार्टिन यांनी तामिळनाडूतील लालगुडी येथून एआयएडीएमके पक्षाकडून निवडणूक लढवत विजय मिळवला. तर विक्कीवाक्कम येथून जावई आधव अर्जुन याने अभिनेता विजय याच्या टीव्हीके पक्षाकडून निवडणूक जिंकली. टीव्हीकेचा सरसिटणीस असलेल्या आधव अर्जुन याने डीएमकेच्या कार्तिक मोहन यांचा १७ हजार ३०२ मतांनी पराभव केला. तसेच सँटियागो मार्टिन यांचा मुलगा जोस चार्ल्स मार्टिन याने पाँडेचेरीमधील कामराज नाहर येथून निवडणूक लढवून विजय मिळवला. जोस चार्ल्स मार्टिन याने लचिया जननायक काची (एलजेके) पक्षाकडून निवडणूक लढवली होती. त्याने काँग्रेस आणि टीव्हीकेच्या उमेदवारांचा पराभव केला.
46 shares
😐
S
Sakal
May 5, 2026, 08:39 AM
महाराष्ट्रातील जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत सत्तेसाठी नेत्यांची चुरस

महाराष्ट्रातील जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत सत्तेसाठी नेत्यांची चुरस

-उमेश बांबरेसातारा:जिल्हा परिषदेच्या निवडणुका असोत किंवा विषय समित्यांचे सभापतिपद, ज्या स्थानिक नेत्यांची संधी थोडक्यात हुकली किंवा ज्यांना निवडणुकीत यशाने हुलकावणी दिली, अशा नेत्यांचे डोळे आता जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीकडे लागले आहेत. जिल्ह्याच्या विकासाचे ‘बजेट’ ठरवणाऱ्या या महत्त्वाच्या समितीवर जाण्यासाठी राजकीय वर्तुळात आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली असून, ३९ जागांसाठी इच्छुकांनी नेत्यांकडे शब्द घेण्यास सुरुवात केली आहे. यातील ३२ जागा झेडपी सदस्यांतून आणि सात जागा नगरपालिकांतून निवडल्या जाणार आहेत.जिल्हा नियोजन समिती हे जिल्ह्याच्या सत्तेचे दुसरे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. त्यामुळेच, जिल्हा परिषदेत सक्रिय राहू न शकलेल्या नेत्यांना आता या समितीच्या माध्यमातून आपली राजकीय ताकद टिकवून ठेवायची आहे. महायुतीमधील तिन्ही प्रमुख पक्ष भाजप, उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात इच्छुकांची मोठी संख्या आहे. दुसरीकडे खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले अस्तित्व टिकवण्यासाठी नियोजन समितीच्या निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शवली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या वेळी नेत्यांकडून ‘संधी कोणाला द्यायची?’ याबाबत काही अलिखित नियम पाळले जाण्याची शक्यता आहे. ज्यांना यापूर्वी जिल्हा परिषदेत महत्त्वाची पदे मिळाली आहेत, त्यांना नियोजन समितीपासून दूर ठेवले जाऊ शकते. त्याऐवजी, पक्षासाठी काम करणाऱ्या पण सत्तेपासून दूर राहिलेल्या जुन्या निष्ठावंतांना आणि तरुण चेहऱ्यांना संधी देऊन त्यांचा समन्वय साधला जाणार आहे.जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्याला मंजुरी देणारी सर्वोच्च संस्था आहे. रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्यासाठी येणारा निधी कोणत्या तालुक्याला आणि कोणत्या कामाला द्यायचा, याचे सर्व अधिकार या समितीकडे असतात. त्यामुळे या समितीवर वर्णी लागणे म्हणजे आपल्या मतदारसंघात कोट्यवधींचा निधी खेचून आणण्याची संधी असते. आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता, कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.
44 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 08:26 AM
2027 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत 30 जागा जिंकण्याचे भाजपाचे उद्दिष्ट

2027 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत 30 जागा जिंकण्याचे भाजपाचे उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :गोव्यात २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे ३० जागांवर विजय संपादन करण्याचे लक्ष्य असल्याचे मुख्यमंत्रीप्रमोद सावंतव प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी जाहीर केले. पश्चिम बंगालमध्ये मिळालेले घवघवीत यश तसेच आसाम व पुद्दुचेरीमध्ये सत्ता स्थापनेसाठी केलेली आगेकूच याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी येथील मुख्य कार्यालयाजवळ मोठा जल्लोष केला. भाजप कार्यालयाजवळ झालेल्या विजयोत्सवाच्या कार्यक्रमास व्यासपीठावर बांधकाममंत्री दिगंबर कामत, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पशु संवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार दिव्या राणे, अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार रुडॉल्फ फर्नाडिस, माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळळ्येंकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यातील जनतेचाही भाजपवर तसेच मोदींवर पूर्णपणे विश्वास असून गोव्यात चौथ्यांदा भाजपचे सरकार सत्तेवर येईल. त्यानंतर २०२९ मध्येही पुन्हा केंद्रात रालोआचे सरकार स्थापन होऊन मोदीजीच पंतप्रधान बनतील. पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या कष्टाला यश : मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणाले की,' प. बंगालमधील भाजपने प्राप्त केलेला विजय अद्वितीय आहे. मोदीजी व अमित शाह यांनी त्यासाठी फार कष्ट घेतले. पंधरा दिवसात २४ रॅली काढल्या. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आता कमळ फुलले आहे. मोदींच्या 'विकसित भारत २०४७' या विजयामुळे बळ मिळाले आहे. प. बंगालात भाजप सरकार यापुढे घुसखोरांना थारा देणार नाही. त्यांना बाहेर हाकलू. देशाच्या नागरिकांनाच येथे राहण्याचा अधिकार आहे. या राज्याला देशाकडे जोडून ठेवण्याचे काम यापूर्वी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केले होते. आज हेच काम मोदी करत आहेत. सतीश धोंड यांची 'रणनीती' यशस्वी पश्चिम बंगालमधील अभूतपूर्व यशानंतर सतीश धोंड यांचे नाव चर्चेत आले आहे. बंगालमध्ये आसनसोल येथे ते भाजपचे संयुक्त सरचिटणीस (आयोजन) या महत्त्वाच्या पदावर काम करत होते. बंगालमधील यशानंतर गोव्यातही पक्ष वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा ऐतिहासिक क्षण : दामू नाईक यावेळी दामू नाईक म्हणाले, बंगालमधील विजय हा ऐतिहासिक क्षण आहे, ज्याची आम्ही आतुरतेने वाट पहात होतो. १९८२ साली तेथे भाजपला केवळ ०.५८ टक्के मते मिळाली. परंतु आम्ही हार मानली नाही. सातत्याने काम करत राहिलो. पाच वर्षांपूर्वी आम्हाला ७७ जागा मिळाल्या. तृणमूलने भाजप कार्यकर्त्यांवर अत्याचार चालवले होते. भाजपला येथे संघर्षमय प्रवास करावा लागला व आज हे यश मिळाले आहे. या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना द्यावे लागेल. 'झालमुरी' वाटून आनंदोत्सव मुख्यमंत्री सावंत व दामू नाईक यांना मोठा पुष्पहार घालण्यात आला. एकमेकांना झालमुरी वाढून आनंदोत्सव साजरा केला व त्यानंतर शहरात मोटरसायकल रॅलीही काढली. मुख्यमंत्री सावंत, दामू नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे हे दुचाकींवर मागे बसून रॅलीमध्ये सहभागी झाले. ढोल ताशांच्या गजरात घोषणा देण्यात आल्या.
95 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 08:22 AM
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत दोन महिला उमेदवार विजयी

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत दोन महिला उमेदवार विजयी

चेन्नई -तामिळनाडूविधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. चेन्नई शहरातील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ५३ महिला उमेदवारांनी निवडणूक लढवली. या ५३ पैकी केवळ दोन महिला उमेदवार विजयी झाल्या. त्या दोघीही टीवीके पक्षाच्या होत्या आणि पहिल्यांदाच निवडणूक लढवत होत्या. यात सर्वाधिक चर्चा ३६ वर्षीय एम.आर पल्लवी यांची होत आहे. ज्या आठ महिन्यांची गर्भवती असताना ही राजकीय लढाई लढत होत्या. थिरू वी नगर विधानसभा जागेवर टीवीके उमेदवार एम.आर पल्लवी यांचा विजय झाला आहे. तर पल्लवरम येथून जे कामाक्षी यांनी विजय मिळवला. या दोन्ही महिला उमेदवार पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जात होते. एम.आर पल्लवी २२ हजार ३३३ तर कामाक्षी यांनी ५४ हजार ६९३ मताधिक्यांनी विजय मिळवला आहे. चेन्नई शहरात विविध विधानसभा मतदारसंघात एकूण ५३ महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यातील २० अपक्ष उमेदवार होत्या. ३३ उमेदवार राजकीय पक्षांकडून निवडणूक लढवत होत्या. त्यात डिएमके २, एआयडिएमके ३, टीवीके २ आणि भाजपाकडून १२ जणी मैदानात होत्या. ८ महिन्याच्या गर्भवतीचा घरोघरी प्रचार एम आर पल्लवी यांच्या विजयानंतर टीवीके नेत्यांनी म्हटलं की, निवडणूक प्रचारावेळी पल्लवी यांनी घेतलेल्या मेहनतीने लोकांची मने जिंकली. त्या गर्भधारणेच्या अंतिम टप्प्यात होत्या. भीषण उन्हाळ्यातही त्या घरोघरी जात लोकांसोबत संपर्क ठेवत होत्या. प्रत्येकाशी त्या कनेक्ट होत्या. त्याचेच फळ निकालात मिळाले आहे असं त्यांनी सांगितले. तर आजपासूनच माझ्या कामाची सुरूवात झालीय. माझा मतदारसंघ मागे पडला आहे. इथे खूप काम करण्याची गरज आहे. ही माझ्यासाठी एक संधी आहे असं विजयी उमेदवार पल्लवी यांनी सांगितले. बेशुद्ध झाली, पण हार मानली नाही हा त्यांचा हक्काचा विजय आहे. पल्लवी यांना चालताना त्रास होत होता आणि डिहायड्रेशनमुळे त्या एकदा बेशुद्धही झाल्या होत्या. मतांसाठी प्रचार करत असताना, लोकांनी त्यांना ज्यूस दिला आणि घरी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांच्या दृढनिश्चयामुळेच हा विजय झाला असं टीवीकेच्या युवा शाखेचे सचिव, जे. कार्तिक यांनी म्हटलं. दरम्यान, शहरात पराभूत झालेल्या महिला उमेदवारांमध्ये भाजपाच्या तेलंगणा आणि पुदुचेरीच्या माजी राज्यपाल तमिळसाई सौंदरराजन आणि एआयएडीएमकेच्या माजी मंत्री गोकुला इंदिरा व बी. वलारमथी यांसारख्या अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश होता. डीएमकेच्या ए.पी. पूर्णिमा आणि आर.एस. कृतिका देवी यांसारख्या दोघीही डॉक्टर असलेल्या नवीन उमेदवारही पराभूत झाल्या. दिवंगत बसपा नेते आर्मस्ट्राँग यांच्या वकील पत्नी पोरकोडी आर्मस्ट्राँग यांचाही पराभव झाला.
26 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 08:18 AM
विजय सरदेसाई यांनी गोव्याच्या नुकत्याच झालेल्या भारतीय निवडणुकांमधून धडे घेतले

विजय सरदेसाई यांनी गोव्याच्या नुकत्याच झालेल्या भारतीय निवडणुकांमधून धडे घेतले

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी:देशातील अलीकडील निवडणुकांचे निकाल गोव्यासाठी महत्त्वाचे धडे देणारे ठरत आहे. यात पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाचाही समावेश असल्याचे मतगोवाफॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले. पश्चिम बंगालमध्ये अपेक्षित निकाल लागला नाही. सत्ताधारी पक्ष सत्तेत राहण्यासाठी कुठल्या पातळीपर्यंत जाऊ शकतात, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गोव्यातील जनतेने सतर्क राहून अशा प्रकारच्या डावपेचांना बळी पडू नये, असे आवाहन सरदेसाई यांनी केले. सरदेसाई म्हणाले, की गोव्यात सत्ताधारी सरकारविरोधात नाराजी असून विरोधकांच्या बाजूने जनतेची लाट दिसून येत आहे. या चित्रामध्ये कुठलाही बदल होता कामा नये. केरळमधील निकाल अपेक्षेप्रमाणेच लागला आहे. तामिळनाडूमध्ये विजय थलपती यांच्या पक्षाचा उदय झाला आहे. स्थानिक प्रश्नांवर आधारित, धाडसी आणि नवीनराजकारणालालोकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे यावरून दिसून येते. हीच विचारसरणीगोवाफॉरवर्ड पक्षाची असून, भविष्यात गोव्यातही अशाराजकारणालाबळ मिळेल.
47 shares
😊
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 08:16 AM
लुई बर्जर प्रकरणातील ईडीची कारवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्द केली, माजी मुख्यमंत्र्यांना दिलासा दिला

लुई बर्जर प्रकरणातील ईडीची कारवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्द केली, माजी मुख्यमंत्र्यांना दिलासा दिला

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि चर्चिल आलेमाव यांना मुंबईउच्च न्यायालयाच्यागोवाखंडपीठाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. लुईस बर्जर प्रकरणाशी संबंधित मनी लांड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेली कारवाई सरकारी मंजुरीशिवाय झाल्याचे नमूद करत न्यायालयाने ती रद्द ठरवली आहे. या प्रकरणात ईडीकडून तपास सुरू होता. त्यानुसार विशेष पीएमएलए न्यायालयाने २१ जुलै २०१८ रोजी दिलेल्या आदेशाच्या आधारे कामत आणि आलेमाव यांच्याविरोधात पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, ही कारवाई करण्यापूर्वी आवश्यक सरकारी परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. ईडीने ती परवानगी घेतली नसल्याने संबंधित कारवाई वैध ठरत नसल्याचा ठपका ठेवतउच्च न्यायालयानेसंपूर्ण प्रक्रिया रद्द केली. दरम्यान, न्यायालयाने कामत आणि आलेमाव यांना या प्रकरणातून पूर्णपणे निर्दोष घोषित केलेले नाही, हेही स्पष्ट केले. आवश्यक परवानगी अथवा मंजुरी प्राप्त केल्यानंतर ईडीला पुन्हा विशेष न्यायालयात अर्ज करून दाद मागण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे. यापूर्वी कामत आणि आलेमाव यांनी ईडीच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले होते. त्या याचिकांवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. त्यानुसार सोमवारी हा महत्त्वपूर्ण निवाडा देण्यात आला.
43 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 08:12 AM
नेपाळच्या सर्वात तरुण पंतप्रधानांनी घेतली भारतविरोधी भूमिका, भारतीय वस्तूंवर सीमाशुल्क लादले

नेपाळच्या सर्वात तरुण पंतप्रधानांनी घेतली भारतविरोधी भूमिका, भारतीय वस्तूंवर सीमाशुल्क लादले

नेपाळमध्येभ्रष्टाचाराविरुद्ध लढा देऊन सत्तेत आलेले सर्वात तरुण पंतप्रधान बालेंद्र शाह ऊर्फ बालेन शाह यांनी पदभार स्वीकारताच भारतासोबतचे संबंध ताणले जाण्याचे संकेत दिले आहेत. अवघ्या दोन महिन्यांच्या कार्यकाळात बालेन शाह यांनी घेतलेल्या दोन वादग्रस्त निर्णयांमुळे भारत-नेपाळसीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्याप्रमाणेच त्यांनी भारतविरोधी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. बालेन शाह सरकारने घेतलेला पहिला धक्कादायक निर्णय म्हणजे भारतीय वस्तूंवरील सीमा शुल्क. आता भारताकडून येणाऱ्या १०० नेपाळी रुपयांपेक्षा (सुमारे ६३ भारतीय रुपये) जास्त किमतीच्या कोणत्याही वस्तूवर ५% ते ८०% पर्यंत कस्टम ड्युटी लावण्यात आली आहे. भारत-नेपाळ सीमा ही जगातील सर्वात खुलीआंतरराष्ट्रीयसीमा मानली जाते. सीमेवरील नेपाळी नागरिक वर्षानुवर्षे किराणा, औषधे आणि लग्नसराईचे सामान भारतीय बाजारातून स्वस्त दरात खरेदी करत होते. मात्र, नव्या नियमांमुळे या व्यवहारांवर गदा आली असून नेपाळी नागरिकांनीच आपल्या सरकारविरुद्ध सीमाभागात मोठे आंदोलन सुरू केले आहे. दुसरा महत्त्वाचा वाद कैलास मानसरोवर यात्रेवरून पेटला आहे. भारताने जून ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत लिपुलेख आणि नथुला खिंडीतून यात्रा सुरू करण्याची घोषणा केली. मात्र, ३ मे २०२६ रोजी नेपाळ सरकारने याला अधिकृत विरोध दर्शवला आहे. १८१६ च्या सुगौली कराराचा हवाला देत लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी हे भाग नेपाळचे असल्याचा दावा बालेन शाह सरकारने केला आहे. भारताने हा दावा फेटाळून लावत लिपुलेख हा १९५४ पासून यात्रेचा पारंपरिक मार्ग असल्याचे स्पष्ट केले आहे. काठमांडूचे महापौर असतानाही बालेन शाह यांनी आपल्या कार्यालयात 'ग्रेटर नेपाळ'चा नकाशा लावून वादाला तोंड फोडले होते. आता पंतप्रधान झाल्यावर त्यांनी लिपुलेखचा मुद्दा पुन्हा उकरून काढला आहे. केपी शर्मा ओली यांनी ज्याप्रमाणे लिपुलेख-कालापानीचा नकाशा बदलून आणि चीनशी जवळीक वाढवून भारताशी संबंध बिघडवले होते, त्याच मार्गावर आता बालेन शाह चालताना दिसत आहेत.
51 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 07:11 AM
पश्चिम बंगाल निवडणूक निकालः 15 वर्षांनंतर तृणमूल काँग्रेसची सत्ता गमावली

पश्चिम बंगाल निवडणूक निकालः 15 वर्षांनंतर तृणमूल काँग्रेसची सत्ता गमावली

West Bengal next CM oath taking on 9 May:पश्चिम बंगालच्यानिवडणुकांचे निकाल सोमवारी समोर आले. तब्बल १५ वर्षांनीपश्चिम बंगालमध्येममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला. केवळ पक्षच नव्हे तर माजीमुख्यमंत्रीममता बॅनर्जी यांनाही १५ हजार मतांच्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. प. बंगाल विधानसभा निवडणुकीत यंदा मतदारांनी १५ वर्षांपासूनचे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसचे सरकार पायउतार करीत गेल्या सुमारे ५० वर्षांपासून राज्यात ठराविक काळानंतर सत्तापालट घडवून आणणारी एकतर्फी निवडणुकीची परंपरा कायम राखली. पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला असून, ९ मे रोजी सोहळा पार पडणार आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण २९३ जागांपैकी २९२ जागांचे निकाल राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर लागले. त्यापैकी २०६ जागांवर भाजपने विजय मिळवला. १५ वर्ष बंगालवर राज्य करणाऱ्या तृणमूल काँग्रेसला शंभरीही गाठता आली नाही. टीएमसीला ८० जागांवरच विजय मिळवता आला. इतकेच नव्हे माजीमुख्यमंत्रीममता बॅनर्जी यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. भाजपचे सुवेंदु अधिकारी यांनी ७३,९१७ मते मिळवली तर ममता बॅनर्जी यांना ५८,८१२ मते मिळाली. त्यामुळे ममता यांचा १५,१०५ मतांनी पराभव झाला. आता नव्या भाजप मुख्यमंत्र्यांचा शपथविधी ९ मे रोजी होणार आहे. ममता बॅनर्जींनंतर पश्चिम बंगालमध्ये महिला नेतृत्व कायम राहावे असा विचार झाल्यास मुख्यमंत्रीपदासाठी दीर्घकाळ राजकारणाचा अनुभव असलेल्या रूपा गांगुली यांचे नाव चर्चेत आहे. रूपा गांगुली या 'महाभारत' मालिकेतील 'द्रौपदी' भूमिकेतून घराघरात पोहोचवल्या. २०१५ पासून त्या पश्चिम बंगालच्या राजकारणात भाजपची भूमिका प्रभावीपणे मांडत आहेत. याशिवाय, ममता बॅनर्जींना सलग दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत पराभवाचे पाणी पाजणारे सुवेंदु अधिकारी देखील या शर्यतीत आहेत. त्यांना बंगालच्या राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे आणि ते अतिशय प्रभावी नेते आहेत. या दोघांव्यतिरिक्त प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य या नावाचीदेखील चर्चा आहे. एक हुशार राजकारणी म्हणून ते नावाजलेले आहेत. जुलै २०२५ पासून ते भाजपचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून पश्चिम बंगालचे प्रतिनिधित्व करणारे राज्यसभेचे सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत.
18 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 07:10 AM
रुपयाच्या संकटात टाटा समूहाच्या संचालक मंडळाचा वाद वाढला

रुपयाच्या संकटात टाटा समूहाच्या संचालक मंडळाचा वाद वाढला

TATA Trust News:टाटा समूहाची होल्डिंग कंपनी - टाटा सन्स - च्या संचालक मंडळात मोठ्या बदलांची तयारी सुरू आहे. टाटा ट्रस्ट्समधील वाद वाढतच चालला आहे. मेहली मिस्त्री आणि जे.एन. मिस्त्री यांनी आता वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंग यांना टाटा एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट किंवा TEDT मध्ये पुन्हा नियुक्त करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात मतदान (विटो) केले आहे.श्रीनिवासन आणि सिंग यांचा सध्याचा कार्यकाळ पुढील रविवारी संपणार असून ट्रस्टच्या नियमांनुसार, कोणत्याही विश्वस्ताचा कार्यकाळ वाढवण्यासाठी ‘सर्वानुमते संमती’ अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत, दोन विश्वस्तांनी विरोधात मतदान केल्यामुळे वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंग यांचे पुन्हा विश्वस्त होणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य दिसतआहे.Rupee Fall: तयार व्हा... महागाईचा बॉम्ब फुटणार; रुपयावरील संकट गहिरे, 95.40 चे ऐतिहासिक नीचांकी लोळण; मासिक बजेट बिघडणारटाटा ट्रस्टमधील विवाद थांबता थांबेनाTEDT टाटा सन्समध्ये थेट भागधारक नसले तरी टाटा नेटवर्कमधीलसर्वात प्रभावशाली ट्रस्टपैकीएक आहे. 5000 कोटी रुपयांहून अधिक देणगी निधीसह TEDT ट्रस्ट देशभरात शिक्षण आणि शिष्यवृत्ती कार्यक्रमांचे व्यवस्थापन करतो. वेणू श्रीनिवासन सध्या टाटा ट्रस्ट्सचे उपाध्यक्ष असून TEDT चे विश्वस्त राहिले नाही, तर त्यांच्या त्या पदावरील कार्यकाळावर गंभीर प्रश्न निर्माण होतील. नोएल टाटा, वेणू श्रीनिवासन, विजय सिंग, मेहली मिस्त्री, जे.एन. मिस्त्री आणि इतर सध्या या ट्रस्टच्या विद्यमान विश्वस्तांपैकी आहेत.Indian Economy: सातासमुद्रापारहून भारताला इशारा... अर्थव्यवस्थेवर भयानक विळखा; फक्त GDP घसरणार नाही तर तिहेरी संकटटाटा ट्रस्ट्सची 8 मे रोजी बैठक8 मे रोजी टाटा ट्रस्ट्सची एक महत्त्वपूर्ण बैठक नियोजित असताना ही घडामोड समोर आली आहे. या बैठकीत टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील ट्रस्ट्सच्या प्रतिनिधित्वाचा आढावा घेतील त्यामळे, आता सर्वांचे लक्ष नोएल टाटा या दुसऱ्या लाईफ-टाइम विश्वस्तावर असेल ज्यांनी अद्याप या विषयावर आपले मत व्यक्त केलेले नाही. सर्वच विश्वस्त या प्रस्तावाला पाठिंबा देणार नाहीत असे संकेत मिळाले असल्यामुळे TEDT मधील पुनर्नियुक्ती प्रक्रिया आधीच अनिश्चित होती.BJP Win Bengal: 'इथेच जन्म, इथेच जगलो अन् इथेच मरणार,' बंगालमध्ये भाजपच्या विजयावर उद्योजक संजीव गोएंका भावूकटाटा सन्समध्ये भास्कर भट्ट एन्ट्री करणार?त्याचवेळी, हा मतभेद केवळ एका ट्रस्टपुरता मर्यादित नसून टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील ट्रस्ट प्रतिनिधींच्या संख्येत संभाव्य बदलाचे संकेत देत आहे. भास्कर भट यांना संचालक मंडळात समाविष्ट केले जाण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
67 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 06:49 AM
निवडणुका लांबणीवर पडल्याने गोकुळ यांनी पाच सदस्यांच्या प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली

निवडणुका लांबणीवर पडल्याने गोकुळ यांनी पाच सदस्यांच्या प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली

कोल्हापूर:कोल्हापूरजिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर (गोकुळ) अखेर सोमवारी पाच सदस्यीय प्रशासक मंडळ विभागीय उपनिबंधक (दुग्ध)पुणेविभाग राजकुमार पाटील यांनी नियुक्त केले. साताराचे जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांच्या अध्यक्षतेखाली अजून चार अधिकाऱ्यांची प्रशासकीय मंडळात सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यात चंदगडचे सहायक निबंधक प्रदीप मालगावे, मुळशी (पुणे) चे सहायक निबंधक सुनील धायगुडे, लेखापरीक्षक श्रेणी-२ सहकार (पणन) कोल्हापूर सागर बलकवडे, जिल्हाधिकारी कार्यालयातील धर्मादाय कक्ष अध्यक्ष चंद्रकांत परुळेकर हे सदस्य आहेत. 'गोकुळ'च्यासंचालकांनी सहा महिने अगोदरच संचालक मंडळाची मुदत मे २०२६ मध्ये संपत असून निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली होती. पण, मध्यंतरीच्या काळात महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती होती. १० फेब्रुवारीला स्थगिती मात्र, उठवल्यानंतर 'गोकुळ'ने प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी सहायक निबंधक (दुग्ध) यांच्याकडे यादी दिली होती. त्या यादीतील १,३२० दूध संस्थांवर हरकती घेतल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेल्याने प्रक्रिया ठप्प झाली होती. दरम्यान, राज्य शासनाने कायद्यात दुरुस्ती केल्याने 'अ' वर्ग संस्थांच्या संचालकांची मुदत संपताच प्रशासक नियुक्त होतो. त्यानुसार, 'गोकुळ'च्या संचालकांची मुदत सोमवारी संपल्यानंतर तातडीने विभागीय उपनिबंधक (दुग्ध) पुणे विभाग यांनी पाच सदस्यीय प्रशासक मंडळाची नियुक्ती केली. संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासक'गोकुळ' दूध संघाची स्थापना १६ मार्च १९६३ ला झाली. गेल्या ६३ वर्षात पहिल्यांदाच संचालक मंडळ बाजूला होऊन प्रशासक नियुक्ती झाली आहे. असे राहणार प्रशासकीय मंडळ◼️ संजयकुमार सुद्रीक - अध्यक्ष◼️ प्रदीप मालगावे - सदस्य◼️ सुनील धायगुडे - सदस्य◼️ सागर बलकवडे - सदस्य◼️ चंद्रकांत परुळेकर - सदस्य आतापर्यंत चार वेळा संचालक मंडळाला मुदतवाढ◼️ 'गोकुळ'च्या ६३ वर्षांच्या इतिहासात चार वेळा विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली आहे.◼️ साल २००० च्या निवडणुकीत उमेदवार मयत झाल्याने सहा महिने निवडणूक लांबली होती.◼️ त्यानंतर २०१४ मध्ये दुष्काळामुळे दीड वर्षे, तर २०१९ मध्ये कोरोनामुळे वर्षभर मुदतवाढ मिळाली होती. या कायद्याने केली प्रशासक नियुक्तीमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ 'अ', 'अ', 'अ' (३) च्या तरतुदीतील व सुधारणाच्या अनुषंगाने व कलम ७७ (अ) (१) (ब) (दोन) मधील तरतुदीन्वये. प्रशासक नको म्हणून सत्ताधारी आघाडीचे प्रयत्न◼️ मंत्री हसन मुश्रीफ हे सत्ताधारी आघाडीचे नेते आहेत. त्यांनी संघावर प्रशासक येऊ नये, म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले.◼️ त्यासाठी सोमवारी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले; परंतु तरीही प्रशासक नियुक्त झालाच. मुख्यमंत्र्यांनीच गेल्या आठवड्यात तसे स्पष्ट केले होते. अधिक वाचा:एप्रिल ते सप्टेंबर महिन्याच्या लाईट बिलात अजून १५ टक्के सवलत; वाचा कुणाला मिळणार लाभ?
80 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 06:31 AM
बारामतीचा इतिहासः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा विक्रमी विजय

बारामतीचा इतिहासः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा विक्रमी विजय

बारामती:बारामतीविधानसभा पोटनिवडणुक महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्रीसुनेत्रा पवारयांना मिळालेल्या ‘रेकाॅर्डब्रेक’ मताधिक्क्याने एैतिहासिक ठरली. पवार यांच्या या अनोख्या एैतिहासिक विजयामुळे सोमवारी(दि ४) बारामती विधानसभा मतदारसंघाची संपूर्ण देशात चर्चा झाली.मात्र, हा जल्लोष साजरा झालाच नाही. बारामतीचे नाव देशाच्या राजकीय पटलावर ठळकपणे नोंदले गेले. मात्र, आपल्या लाडक्या नेत्याच्या अकाली ‘एक`झीट’ने शोकमग्न असणारे बारामतीकर अद्याप देखील सावरलेले नाहीत. त्यामुळे बारामतीत प्रत्येक निवडणुकीत जेसीबीने गुलाल उधळुन होणारा जल्लोष यंदा रंगलाच नाही. एकच वादा अजितदादा, या बारामतीकरांच्या घोषणा आज हवेतच विरल्या. उपमुख्यमंत्री पवार यांच्याप्रमाणेच देशात सर्वाधिक मतांनी बारामतीचे लोकप्रतिनिधी विजयी होण्याचा मान बारामतीच्या मतदारांना देखील मिळाला आहे. उपमुख्यमंत्री पवार यांना देशात विक्रमी मताधिक्क्य मिळवुन देणारे बारामतीकर आज कमालीचे शांत दिसून आले. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात झाली. निवडणुक एकतर्फी असल्याने बारामतीकरांना विजयाबाबत खात्री होती. मात्र, बारामतीकरांना आज मताधिक्क्याचा विक्रम घडविण्याच्या सोनेरी क्षणांचा साक्षीदार होण्याची उत्कंठा होती. त्यामुळे मतमाेजणी सुरु झाल्यापासून पहिल्या फेरीपासून २४ व्या फेरीपर्यंतच्या जाहिर होणाऱ्या प्रत्येक निकालावर बारामतीकर लक्ष ठेवून होते. २४ व्या फेरीअखेर विक्रमी मताधिक्क्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर देखील बारामतीकर जल्लोषापासून दुरच राहिले. सोशल मिडीयावर अनेकांनी केवळ दिवंगत उपमुख्यमंत्रीअजित पवारयांचे छायाचित्र ठेवून त्याखाली ‘बारामती माझा श्वास कधीच थांबणार नाही’ असे नमुद करीतसुनेत्रा पवारयांचे अभिनंदन केले. काहींनी सुनेत्रा पवार यांचेअजित पवारयांच्या समवेत चे फोटो सोशल मिडीयावर ठेवत मुक आनंद व्यक्त केला. सुनेत्रा पवार- बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मला भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल तमाम मायबाप बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार. आपण दाखवलेला विश्वास, प्रेम आणि पाठिंबा माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. अजितदादांच्या पश्चात झालेली बारामतीची ही पहिलीच निवडणूक होती. त्यांच्या मार्गदर्शनाची आणि त्यांच्या उपस्थितीची उणीव आज प्रकर्षाने जाणवते. हा विजय माझ्यासाठी केवळ राजकीय यश नसून, आदरणीय दादांच्या कार्याला आणि त्यांच्या स्मृतींना दिलेली खरी आदरांजली आहे. अजितदादांनी महाराष्ट्रासाठी आणि बारामतीसाठी केलेले कार्य, त्यांची जनतेशी असलेली नाळ आणि विकासाची त्यांची दृष्टी आजही प्रत्येकाच्या मनात कायम आहे. त्यांचे विचार आणि संस्कारच मला पुढे जाण्याची ताकद देत आहेत. शिव-शाहू-फुले-आंबेडकर या महामानवांच्या विचारधारेचा वारसा जपत, आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि आदरणीय अजितदादांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा माझा निर्धार कायम राहील. हा विजय म्हणजे त्यांच्या स्वप्नांना आणि त्यांच्या कार्याला पुढे नेण्याची जबाबदारी आहे, याची मला पूर्ण जाणीव असल्याचे सुनेत्रा पवार यांनी नमुद केले. खासदार सुप्रिया सुळे- अजितदादांच्या अपघाती निधनानंतर झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणूकीत विक्रमी मतांनी विजयी झाल्याबद्दल सुनेत्रावहिनी पवार यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. या निवडणुकीला दादांच्या आठवणींची किनार होती. बारामतीच्या जनतेने वहिनींना विधानसभेत पाठविताना दादांवरील आपले प्रेम प्रकट केले आहे. त्यांचे हे प्रेम आम्हा सर्वांसाठी अनमोल ठेवा आहे.बारामतीच्या जनतेने वहिनींना विधिमंडळात पाठवून त्यांच्यासाठी काम करण्याची संधी प्रदान केली याबद्दल त्यांचे मनापासून आभार. जय पवार- “बारामतीकरांनी ही निवडणूक मनावर घेतली होती. दादांच्या प्रेमाखातर नागरिकांनी दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. “दादांशिवाय निवडणूक लढवावी लागेल, असे कधी वाटले नव्हते. पण नियतीपुढे कोणाचे काही चालत नाही. आज जरी आनंदाचा क्षण असला, तरी काही दिवसांपूर्वी भोर तालुक्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे आम्हाला जल्लोष करावासा वाटत नाही.” त्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्टपणे आवाहन केले की, कुठल्याही प्रकारचा जल्लोष करू नये. तसेच सुनेत्रा पवार यांनीही संबंधित पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा, हीच भूमिका घेतल्याचे त्यांनी नमूद केले. हा विजय एका व्यक्तीचा नसून संपूर्ण टीमच्या मेहनतीचा आहे. पोलिंग एजंट्स, पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदार या सर्वांनी एकत्रितपणे काम केले. लोकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत राहणार आहोत,” असे ते म्हणाले. आमदार रोहित पवार- बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत विक्रमी मतांनी निवडून आल्याबद्दल सुनेत्राकाकींचं मनःपूर्वक अभिनंदन! हा विजय म्हणजे अपेक्षेप्रमाणे बारामतीकरांनी दाखवून दिलेलं अजितदादांवरील प्रेम आणि त्यांना कृतज्ञतेने वाहिलेली आदरांजली आहे.या विराट विजयाबद्दल समस्त बारामतीकर मतदारांचेही मनापासून आभार. युगेंद्र पवार- आजच्या विधानसभा पेाटनिवडणुकीत विक्रमी विजय मिळविल्याबद्दल सुनेत्राकाकी यांचे मनपुर्वक अभिनंदन .स्व.अजितदादांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आणि बारामतीच्या मतदारांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सुनेत्राकाकी निश्चितपणे कार्य करतीज,असा विश्वास आहे.
94 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 06:24 AM
पश्चिम बंगालमध्ये भाजपचा इतिहास, केरळमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा इतिहास, केरळमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय

चेन्नई - ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. एकीकडे पश्चिम बंगालमध्ये भाजपाने पहिल्यांदाच ममता बॅनर्जी यांच्या गडाला भेदत इतिहास रचला आहे. केरळमध्येकाँग्रेसनेतृत्वातील आघाडीने सत्ता काबीज केली आहे. आसाम, पुदुचेरी येथे भाजपाने सत्ता राखली तर दुसरीकडेतामिळनाडूतअभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने सगळ्यांनाच आश्चर्यचकीत केले.थलापती विजययांच्या पक्षाला १०८ जागा मिळाल्या आहेत. याठिकाणी बहुमतापासून टीवीके १० जागा दूर आहेत. त्यातच विजय यांचे वडील चंद्रशेखर यांनीकाँग्रेसलासत्तेची ऑफर दिली आहे. निकालानंतर विजय यांचे वडील एस चंद्रशेखर यांनी माध्यमांना सांगितले की, काँग्रेसचा एक इतिहास आणि परंपरा आहे. काँग्रेस कमकुवत का होतेय, त्याचे कारण म्हणजे सत्तेचा अभाव. दुसऱ्या पक्षाला पाठिंबा देऊन काँग्रेस आणखी कमकुवत होतेय. ती सत्ता आम्ही काँग्रेसला देऊ. विजय देण्यासाठी तयार आहे. जर तुम्हाला ती सत्ता मिळत असेल तर काँग्रेस त्यांचा इतिहास आणि वारसा वाचवू शकते. या संधीचा त्यांनी वापर करायला हवा अशी ऑफरच त्यांनी दिली. काय आहे सत्तेचे समीकरण? तामिळनाडूविधानसभेचे निकाल लागलेत. त्यात टीवीके सर्वात मोठा पक्ष बनला आहे परंतु सत्ता स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या बहुमतापासून विजय यांचा पक्ष दूर आहे. टीवीकेला १०८ जागा मिळाल्या आहेत मात्र बहुमतासाठी लागणारा ११८ आकडा गाठायला विजय यांना आणखी एका पक्षाची गरज भासत आहे. डीएमकेसोबत ते सत्तेत जाणार नाहीत कारण त्यांच्याविरोधात रागाचा वापर करून टीवीके सत्तेकडे वाटचाल करत होता. विजय यांच्या वडिलांना काँग्रेससोबत आघाडी करायची आहे. सध्याचे नंबर पाहिले तर तामिळनाडूत डिएमकेजवळ ५९ तर काँग्रेसला ५ जागा मिळाल्या आहेत. जर काँग्रेस टीवीकेसोबत आली तर हा आकडा ११३ पर्यंत पोहचतो. त्यानंतर बहुमतासाठी ५ जागांची गरज लागेल. त्यात पीएमके, आययूएलसारख्या पक्षांसोबत चर्चा होऊ शकते. ज्यांच्याकडे प्रत्येकी ४ आणि २ जागा आहेत. काँग्रेसचं तामिळनाडूत अस्तित्व काय? तामिळनाडूच्या डिएमके सरकारमध्ये काँग्रेसचा कुठलाही आमदार मंत्री नव्हता. डिएमके काँग्रेसच्या इंडिया आघाडीचा भाग असला तरी ते सरकारमध्ये सहभागी नव्हते. आता जर काँग्रेस टीवीकेसोबत गेल्यास सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळेल. देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेससाठी ही संजीवनी ठरेल. मात्र स्टॅलिन यांच्यासोबत आघाडी धर्म पाळायचा की टीवीकेसोबत जात सत्तेतून पक्ष वाढवायचा याचा निर्णय काँग्रेसला घ्यावा लागणार आहे.
31 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 05:23 AM
भारत शक्तिशाली अग्नि-4 क्षेपणास्त्राची चाचणी घेणार, दहशतवादी तळांवर धाडसी हल्ल्यांना एक वर्ष पूर्ण

भारत शक्तिशाली अग्नि-4 क्षेपणास्त्राची चाचणी घेणार, दहशतवादी तळांवर धाडसी हल्ल्यांना एक वर्ष पूर्ण

भारताने बंगालच्या उपसागरात एक मोठा 'नोटीस टू एअरमेन' (NOTAM) जारी केला असून, सुमारे ३,५५० किलोमीटरचा परिसर 'डेंजर झोन' म्हणून घोषित केला आहे. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आपली शक्तीशाली इंटरमीडिएट रेंज बॅलिस्टिक मिसाइल 'अग्नी-IV' च्या चाचणीची तयारी करत आहे. या चाचणीसाठी निवडण्यात आलेली वेळ अतिशय महत्त्वाची मानली जात असून, हा एक मोठा आंतरराष्ट्रीय संदेश असल्याचे बोलले जात आहे. ही चाचणी २५ एप्रिल २०२६ ते ६ मे २०२६ या कालावधीत होऊ शकते. विशेष म्हणजे, मे २०२५ मध्ये भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत मोठे हल्ले केले होते. या धाडसी कारवाईला एक वर्ष पूर्ण होत असतानाच भारत ही क्षेपणास्त्र चाचणी करत आहे. सहा मे रोजीच ही चाचणी होण्याची शक्यता आहे. अग्नी-IV: भारताचे अजेय अस्त्र पल्ला: ३,५०० ते ४,००० किलोमीटरपर्यंत अचूक मारा करण्याची क्षमता. क्षमता: १० हजार किलोपर्यंतचे अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम. अचूकता: आधुनिक एव्हिऑनिक्समुळे याची 'सर्कुलर एरर' १०० मीटरपेक्षाही कमी आहे, म्हणजेच हे क्षेपणास्त्र अत्यंत अचूक आहे. बनावट: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) विकसित केलेले हे दोन टप्प्यांचे, घन इंधनावर आधारित क्षेपणास्त्र आहे. तैनाती: हे क्षेपणास्त्र रस्त्यावरूनही कुठेही नेऊन डागता येते, ज्यामुळे युद्धकाळात याची उपयुक्तता वाढते. NOTAM म्हणजे काय?'नोटीस टू एअरमेन' तेव्हा जारी केला जातो जेव्हा एखाद्या विशिष्ट हवाई क्षेत्रातील नागरी विमानांची वाहतूक थांबवायची असते. क्षेपणास्त्र चाचणी किंवा युद्धाभ्यास करताना सुरक्षा उपाय म्हणून हे क्षेत्र बंद केले जाते. सध्या भारत आणि पाकिस्तान दोघांनीही गेल्या एक वर्षापासून एकमेकांसाठी हवाई क्षेत्र मर्यादित केले आहे. संरक्षण सज्जतेचा नवा टप्पाभारत केवळ अग्नी-IV नव्हे, तर ८०० किमी पल्ल्याच्या ब्रह्मोस क्रूझ मिसाइल आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्रांवरही काम करत आहे. या चाचण्या भारताच्या 'किमान विश्वसनीय प्रतिबंधक' धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहेत.
62 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 05:10 AM
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, ममता बॅनर्जी यांचा पराभव

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, ममता बॅनर्जी यांचा पराभव

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक विजय मिळवला. भाजपाने २०६ जागा जिंकून ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस पक्षाची १५ वर्षांची सत्ता संपवली. बरं, एवढंच नाही तर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर मतदारसंघात भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांनी तब्बल १५ हजार मतांच्या फरकाने पराभव केला. त्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या या पराभवावर काही नेटकऱ्यांनी मीम्सच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत. चला तर मग पाहूया व्हायरल होणारे मीम्स.ममता बॅनर्जी यांचा पराभव TMC पक्षासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. २०२१ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी याच मतदारसंघातून ७०% हून अधिक मतांनी विजय मिळवला होता.​​सुवेंदू अधिकारी यांनी २०२६ निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. पण लक्षवेधी बाब म्हणजे यापूर्वी ते ममता दिदींचे निकटचे सहकारी मानले जात होते.​​भवानीपूर हा ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला मानला जात होता. पण भाजपाने त्या ठिकाणी विजय मिळवून ममता यांच्या राजकीय कारकीर्दीला मोठा ब्रेक लावल्याची चर्चा आहे.​​भाजपाने पश्चिम बंगालमध्ये २०६ जागा जिंकल्या, तर TMC पक्षाला केवळ ८० जागांवरच विजय मिळवता आला.​​ममता बॅनर्जी यांचा पराभव होताच भाजपा समर्थकांनी झालमुडी म्हणजेच भेळ खाऊन त्यांची फिरकी घेतली.​​
14 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 05:04 AM
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय

पश्चिम बंगालमध्येभाजपाच्याप्रयत्नांना अखेर यश आले. तब्बल २०६ जागा जिंकतभाजपानेतृणमूल काँग्रेस सत्तेतून खाली खेचले. विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचाही पराभव झाला. ज्यांनी ममता बॅनर्जी यांना पराभूत केले, त्याच सुवेंदू अधिकारींनी आता पुढचा नंबरअखिलेश यादवांचाम्हणत समाजवादी पार्टीविरोधात दंड थोपटले आहेत. सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा तब्बल १५ हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने पराभव केला. या पराभवानंतर बोलताना सुवेंदू अधिकारींनी आम आदमी पक्षासारखेच तृणमूल काँग्रेसचे राजकारण होते, असे म्हटले आहे. आता मिशनउत्तर प्रदेश आमदार सुवेंदू अधिकारी यांनी भाजपाचे पुढचे लक्ष्य आताउत्तर प्रदेशअसल्याचे सांगून टाकले. ते म्हणाले, "ममता (ममता बॅनर्जी), तेजस्वी (तेजस्वी यादव), राहुल (राहुल गांधी) संपले आहेत. आता पुढचे लक्ष्य अखिलेश (अखिलेश यादव) आहेत." उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी विरुद्ध भाजपा पश्चिम बंगाल, आसाम जिंकल्यानंतर आता भाजपाने २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष्य केंद्रित केले आहे. उत्तर प्रदेशात फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये निवडणूक होणार आहे. म्हणजे अवघ्या आठ महिन्यांवर उत्तर प्रदेशची निवडणूक येऊ ठेपली आहे. उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाची ताकद पूर्वीसारखी राहिलेली नाही. काँग्रेसचा प्रभावही जेमतेम आहे. उत्तर प्रदेशात भाजपाची थेट लढाई अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासोबत असणार आहे. लोकसभा निवडणुकीत सपा ठरली होती सरस दोन वर्षापूर्वी म्हणजे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशीच लढत झाली होती. त्या निवडणुकीत अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने ३७ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसनेही ६ जागांवर विजय मिळवला होता. भाजपाला ३३ जागांवरच विजय मिळवता आला. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत भाजपाला मोठा झटका बसला होता. कारण २०१९ मध्ये भाजपाने तब्बल ६२ जागा जिंकल्या होत्या. तर समाजवादी पक्षाला फक्त ५ जागांवरच विजय मिळाला होता. काँग्रेसही एका जागेपुरतीच मर्यादित राहिली होती. त्यामुळे आता उत्तर प्रदेश पुन्हा राखण्यासाठी भाजपाला समाजवादी पक्षासोबतच लढत द्यावी लागणार आहे.
96 shares
😢
Pudhari logo
Pudhari
May 5, 2026, 05:02 AM
तामिळनाडू विधानसभा निवडणूकः विजय यांचा पक्ष स्वतंत्रपणे लढणार

तामिळनाडू विधानसभा निवडणूकः विजय यांचा पक्ष स्वतंत्रपणे लढणार

एकला चलो रेची भूमिका विजय यांच्या पक्षाने कोणत्याही पक्षाशी युती न करता सर्व 234 मतदारसंघांत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. यंदाची विधानसभा निवडणूक , द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) आणि ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम -भारतीय जनता पक्ष यांच्यातील तीव्र तिहेरी लढतीमुळे सुरुवातीलपासूनच चर्चेत होते.
55 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 04:52 AM
विधानसभा निवडणूक निकालः पाच राज्यांमध्ये आश्चर्य आणि संकुचित फरक

विधानसभा निवडणूक निकालः पाच राज्यांमध्ये आश्चर्य आणि संकुचित फरक

देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले आहेत. यात पश्चिम बंगाल आणितामिळनाडूमधीलनिकालांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. दरम्यान, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ या राज्यांत विधानसभाव निवडणुकीचे एकतर्फी निकाल लागले असले तरी काही मतदारसंघात मात्र टी-२० क्रिकेट सामन्याला लाजवेल असा थरार रंगला. त्यात एका मतदारसंघात तर अवघ्या एका मताने जय पराजयाचा फैसला झाला. ही अटीतटीची लढत झाली तीतामिळनाडूमध्ये.येथे ऐतिहासिक यश मिळवणाऱ्या विजय यांच्या पक्षाने द्रमुक आणि अण्णा द्रमुक प्रस्थापित पक्षांना धक्का देत सनसनाटी विजय मिळवला. येथीलच तिरुप्पूर मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत रंगली. या विधानसभा मतदारसंघात टीव्हीकेचे उमेदवार सिनिवास सेतुपती आर यांनी डीएमकेच्या उमेदवारावर अवघ्या एका मताने मात केली. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत टीव्हीकेच्या सिनिवास सेतुपती आर यांना ८३ हजार ३७५ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले डीएमकेचे पेरियाकरुपन यांना ८३ हजार ३७४ मते मिळाली. अशा प्रकारे सिनिवास सेतुपती यांनी अवघ्या एका मताने बाजी मारली. येथे भाजपाचे उमेदवार असलेले थिरुमरन के. सी. हे २९ हजार ५४ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. इतर राज्यांमधील कमी फरकाने झालेल्या लढतींचा विचार केल्यास केरळमधील मनालूर विधानसभा मतदारसंघात सीपीएमचे उमेदवार सी. रवींद्रनाथ यांनी काँग्रेसच्या उमेदवारावर १२६ मतांनी मात केली. आसाममध्ये सर्वात कमी मतांनी विजय मिळवण्याचा विक्रम आसाम गण परिषदेचे प्रकाशचंद्र दास यांनी केला. त्यांनी सुआलकुची मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला ७२४ मतांनी पराभूत केले. तर पश्चिम बंगालमध्ये राजारहाट न्यू टाऊन मतदारसंघात सर्वात अटीतटीची लढत झाली. या लढतीत तृणमूल काँग्रेसचे तापश चटर्जी यांनी भाजपाच्या उमेदवाराला केवळ ३२३ मतांनी पराभूत केले.
86 shares
😢
Pudhari logo
Pudhari
May 5, 2026, 04:52 AM
नौबोईचा मतदारसंघातील निवडणुकीत ए. जी. पी. च्या उमेदवाराचा विजयाचा विश्वास

नौबोईचा मतदारसंघातील निवडणुकीत ए. जी. पी. च्या उमेदवाराचा विजयाचा विश्वास

नौबोइचा मतदारसंघातील एजीपीचे उमेदवार बसंत दास यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाने मतमोजणीसाठी उत्कृष्ट व्यवस्था केली आहे. दास यांच्या मते, त्यांचा विजय 100 टक्के निश्चित आहे आणि पक्ष नेहमीप्रमाणे यावेळीही यशस्वी होईल.
10 shares
😊
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 04:49 AM
जनतेच्या असंतोषाच्या यशाचे श्रेय भाजप नेत्याने दिले; बलात्काराच्या आरोपींच्या फाशीचा निषेध

जनतेच्या असंतोषाच्या यशाचे श्रेय भाजप नेत्याने दिले; बलात्काराच्या आरोपींच्या फाशीचा निषेध

महाराष्ट्रासहदेश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... LIVE जनतेने पंतप्रधान मोदी आणि देशाच्या विकासावर आपला विश्वास व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालच्या लोकांनी भाजपाला मतदान केले, कारण ते ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील सरकारवर असमाधानी होते अशी प्रतिक्रिया शिंदेसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली आहे. #WATCH| Delhi | On the BJP-NDA's performance in the Assembly elections in 4 states and 1 UT, Shiv Sena MP Shrirang Barne says, "...The public has bestowed its trust on PM Modi and development...The public of West Bengal voted for the BJP as they were dissatisfied with the Mamata…pic.twitter.com/sWGGTVYYVT राज्यसभा सदस्य आणि भाजप नेते राघव चड्ढा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी राष्ट्रपती भवनात दाखल #WATCH| Delhi: Rajya Sabha MP and BJP leader Raghav Chadha reaches Rashtrapati Bhavan to meet President Droupadi Murmu.pic.twitter.com/XTISlAVpLi नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलानेही वडिलांच्या कृत्याचा तीव्र निषेध करत कठोर शब्दांत संताप व्यक्त केला. "तो माझा बाप आहे हीच माझी चूक आहे. त्याला लवकरात लवकर फाशी द्या", अशी मागणी त्याने केली आहे. त्या चिमुरडीला जितक्या वेदना झाल्या, तशाच वेदना त्यालाही झाल्या पाहिजेत, असेही तो म्हणाला
3 shares
😐
Pudhari logo
Pudhari
May 5, 2026, 04:45 AM
कबीर यांच्या'उन्नयन'पक्षाने भारतीय निवडणुकांमध्ये दमदार कामगिरी करून आश्चर्यचकित केले

कबीर यांच्या'उन्नयन'पक्षाने भारतीय निवडणुकांमध्ये दमदार कामगिरी करून आश्चर्यचकित केले

हुमायू कबीर दोन ठिकाणी आघाडीवर गेल्या वर्षी तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या हुमायू कबीर हे त्यांच्या रेजीनगर आणि नौदा या दोन्ही मतदारसंघांतून आघाडीवर आहेत. कबीर यांनी उन्नयन पार्टी नावाने पक्षाची स्थापना केली आहे. हे कबीर तृणमुल काँग्रेसला चांगलेच भारी पडले. तृणमूलचा टक्का घसरला या निवडणुकीत भाजपच्या मतांच्या टक्केवारीत मोठी वाढ होऊन ती 44.8 टक्क्यांवर पोहोचली आहे, तर तृणमूलची मते 41.7 टक्क्यांपर्यंत घसरली आहेत. 2011 पासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा कौल म्हणजे जनमताचा मोठा कौल मानला जात आहे.
64 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 04:42 AM
दलितांची ताकद माझ्या हातात-केंद्रीय मंत्री रामदास आठवले

दलितांची ताकद माझ्या हातात-केंद्रीय मंत्री रामदास आठवले

पुणे: ‘‘दलित समाजाची ताकद मोठी असून, कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडून आणायचे, हे माझ्या हातात आहे. काँग्रेसने महिलांना जसा विरोध केला, तसा मलाही केला होता. शिर्डीमध्ये मला जाणूनबुजून पराभूत केले, म्हणून मी काँग्रेसची साथ सोडून भाजपकडे गेलो आणिभाजपाचीसत्ता आली. त्यामुळे मी भाजपसोबत नाही तर भाजप माझ्यासोबत आहे, असे मी मानतो,’’ असे मत केंद्रीय राज्यमंत्रीरामदास आठवलेयांनी व्यक्त केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने समता भूमी येथे आयोजित केलेल्या 'भारताची भीमज्योत' कार्यक्रमातरामदास आठवलेबोलत होते. यावेळी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित गायकवाड, माजी मंत्री भाई गिरकर, उपमहापौर परशुराम वाडेकर, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी खासदार सुनील गायकवाड, 'रिपाइं'चे शहराध्यक्ष संजय सोनावणे, नगरसेवक अजय खेडेकर, पल्लवी जावळे, मनीषा लडकत आदी उपस्थित होते. आठवले म्हणाले, ‘‘बुद्धाचे तत्त्वज्ञान अंगीकारत बाबासाहेबांनी संपूर्ण मानवजातीचे कल्याण करणारे संविधान देशाला दिले. संविधान कोणीही बदलू शकत नाही. काँग्रेस आणि विरोधी पक्ष केवळ तशा वावड्या उठवत आहे. मी ज्यांच्यासोबत असतो, त्यांची सत्ता आल्याशिवाय राहत नाही. जोवर मी भाजपसोबत आहे, तोवरभाजपाचीसत्ता येणार असून, मला चौथ्यांदा मंत्री होण्याची संधी मिळणार आहे.’’
76 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 04:33 AM
आर्थिक चिंतांच्या पार्श्वभूमीवर कॅनडापासून वेगळे होण्याचा अल्बर्टाचा विचार

आर्थिक चिंतांच्या पार्श्वभूमीवर कॅनडापासून वेगळे होण्याचा अल्बर्टाचा विचार

कॅनडातीलऊर्जा संपन्न मानला जाणारा अल्बर्टा प्रांत सध्या फुटीरतावादाच्या छायेत आहे. 'स्टे फ्री अल्बर्टा' या संघटनेने सुरू केलेल्या जनमत संग्रहाच्या पुढाकारानेकॅनडाच्याराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. लाखो नागरिकांनी या मोहिमेवर स्वाक्षरी करून कॅनडापासून वेगळे होण्याच्या विचाराला पाठिंबा दिल्याचा दावा संघटनेने केला आहे. अल्बर्टा प्रांतातील नागरिकांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून "प्रादेशिक उपेक्षा" किंवा 'वेस्टर्न एलियनेशन'ची भावना प्रबळ होत आहे. ओटावा येथील फेडरल सरकार (केंद्र सरकार) आपल्या प्रांताच्या हिताकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते, असा अल्बर्टावासियांचा आरोप आहे. या संपूर्ण आंदोलनाचे मुख्य कारण आर्थिक आहे. अल्बर्टा हा तेल आणि वायू उत्पादनामुळे कॅनडातील सर्वात श्रीमंत प्रांत मानला जातो. मात्र, फेडरल सरकारची हवामान धोरणे आणि पर्यावरणाचे कडक नियम या उद्योगाला मारक ठरत असल्याचा फुटीरतावाद्यांचा आरोप आहे. जर अल्बर्टा स्वतंत्र झाला, तर ते आपल्या संसाधनांवर पूर्ण नियंत्रण ठेवून स्वतःची अर्थव्यवस्था स्वतःच्या अटींवर चालवू शकतील, असा दावा समर्थकांकडून केला जात आहे. राजकीय प्रतिनिधित्व आणि अंतर्गत विरोधअल्बर्टाच्या नागरिकांचा दुसरा मोठा आक्षेप राजकीय प्रतिनिधित्वावर आहे. कॅनडाच्या मोठ्या निर्णयांमध्ये प्रांताचा आवाज कमकुवत पडत असल्याची त्यांची भावना आहे. मात्र, या चळवळीला स्वदेशी गटांकडून तीव्र विरोध होत आहे. 'अथाबास्का चिप्व्यान फर्स्ट नेशन'सह अनेक गटांनी म्हटले आहे की, स्वतंत्र देश बनल्यास त्यांच्या ऐतिहासिक जमीन अधिकारांवर आणि जीवनशैलीवर गदा येईल. न्यायालयीन पेच आणि सद्यस्थितीहा मुद्दा सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. याआधी एका न्यायालयाने असे संकेत दिले होते की, अशा प्रकारचा जनमत संग्रह घटनाबाह्य ठरू शकतो. सध्याच्या सर्वेक्षणानुसार, केवळ २५ टक्के लोकच फुटीरतेच्या बाजूने आहेत, तर मोठा वर्ग कॅनडासोबत राहण्यास इच्छुक आहे. मात्र, आर्थिक असंतोष आणि ओळखीच्या राजकारणामुळे ही चळवळ दिवसेंदिवस जोर धरत आहे.
86 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 04:03 AM
अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात वाढ

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात वाढ

Gold-Silver Rate 5 May Latest Update:तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. गेल्या तीन महिन्यांत सोने आणि चांदी या दोन्हींच्या किमतीत घसरण दिसून आली असून सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ नोंदवली गेली आहे तर चांदीचा भाव स्थिर राहिला आहे.जागतिकबाजारात पुन्हा एकदा अस्थिरतावाढली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी भंग झाली असून इराणमध्ये अमेरिकेच्या युद्धनौकांना लक्ष्य केले. संयुक्त अरब अमिरातीवर (युएई) क्षेपणास्त्रे डागण्यात आली असून होर्मुझ संकटादरम्यान इराणने पुन्हा केलेल्या हल्ल्यांनंतर अमेरिकेने इराणला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा इशारा दिला. मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावामुळे सोन्यापासून ते तेलापर्यंतच्या किमतींवर परिणाम झाला.BJP Win Bengal: 'इथेच जन्म, इथेच जगलो अन् इथेच मरणार,' बंगालमध्ये भाजपच्या विजयावर उद्योजक संजीव गोएंका भावूकसोन्या-चांदीचा आजचा दर कायमंगळवारी, 5 मे, सकाळी MCX वर सोन्याचे दर वधारले. देशांतर्गत बाजारातील गुंतवणूकदारांनी संधी साधून सोन्यात खरेदी केली ज्यामुळे MCX वर सलग दुसऱ्या दिवशी पिवळसर सोन्याची झळाळी वाढली. मात्र, मजबूत डॉलर आणि महागाईविषयक चिंतेमुळे दरवाढीला काहीशी मर्यादा आली. दुसरीकडे, डॉलर निर्देशांक जवळपास 0.20% वधारला, ज्यामुळे सोन्याच्या मागणीवर दबाव आला.Fuel Price Hike: सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसणार... निवडणूक झाली आता कोणत्याही क्षणी पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकणारMCX वरील सोन्याचे जून फ्युचर्स 0.13% वधारून 1,49,526 रुपयांवर ट्रेड करत होते, तर चांदीचे जुलै फ्युचर्स 0.04% घसरून प्रति किलो 2,43,798 रुपयांवर उतरले.वर होते. दरम्यान, बाजाराला यूएस फेडरल रिझर्व्हकडून संकेत मिळाले ज्यामध्ये सध्या तरी व्याजदरांबाबत स्थिर भूमिका कायम ठेवायचे म्हटले गेले.सोने-चांदीच्या दरांवरील दबावाचे कारण कायअमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव, विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनीच्या संदर्भात, प्रमुख कारण आहे. आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमतीही मंगळवारी मागील सत्रातील एका महिन्याहून अधिक काळातील नीचांकी पातळीवरून वाढल्या. मात्र कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढल्याने वाढ मर्यादित राहिली, ज्यामुळे महागाईची भीती वाढली आणि व्याजदर दीर्घकाळ वाढलेले राहण्याची चिंता बळावली.अमेरिकी सैन्याने इराणची अनेक जहाजे नष्ट केली आणि क्षेपणास्त्रे व ड्रोन रोखले, तर दुसरीकडे इराणने सागरी वाहतुकीचे मार्ग विस्कळीत करण्याचा प्रयत्न केल्यास अहवालतुन समोर आले. या परिस्थितीमुळे चांदीसारख्या मौल्यवान धातूंना असलेली सुरक्षित गुंतवणुकीची मागणी कायम राहिली, मात्र मोठी तेजी आणण्याइतकी मजबूत नाही.
18 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 04:02 AM
होरमुझच्या सामुद्रधुनीमध्ये शस्त्रसंधी तुटल्याने अमेरिका-इराण तणाव वाढला

होरमुझच्या सामुद्रधुनीमध्ये शस्त्रसंधी तुटल्याने अमेरिका-इराण तणाव वाढला

पश्चिम आशियातीलयुद्धपुन्हा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण अमेरिकेने शस्त्रसंधी उधळून लावत होर्मुझ सामुद्रधुनीमध्येइराणच्यामालवाहू जहाजांनाच लक्ष्य केले. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात जहाजांवरील पाच जणांचा मृत्यू झाल्याचा दावाइराणच्यालष्कराने केला आहे. अमेरिकेने ज्या जहाजांना लक्ष्य केले, त्यायुद्धनौकानव्हत्या तर मालवाहू जहाजे होती, असे आयआरजीसीने म्हटले आहे. इराण-अमेरिकायांच्यात झालेल्या शस्त्रसंधीमुळे थांबलेला संघर्ष पुन्हा पेटू लागला आहे. अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनी मार्गे आपली अडकलेली जहाजे बाहेर काढण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. अमेरिकेच्या लष्कराने दावा केला आहे की, दोन जहाजांना यशस्वीपणे बाहेर काढले आहे. अमेरिकेच्या जहाजांवर इराणचा हल्ला दरम्यान, इराणने असा दावा केला होता की, आयआरजीसीने अमेरिकेच्या युद्धनौकेवर हल्ला केला आहे. पण, अमेरिकेच्या सैन्याने हा दावा फेटाळून लावला आहे. अशा कोणत्याही प्रकारचा हल्ला अमेरिकन युद्धनौकेवर झालेला नाही. इराणचा दावा निराधार आहे. संयुक्त अरब अमिरातीवर इराणचे मिसाईल हल्ले संयुक्त अरब अमिरातीमध्ये इराणने हल्ले केले. यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, इराणकडून डागण्यात आलेल्या मिसाईल्स एअर डिफेन्स सिस्टिमने रोखल्या. १२ बॅलेस्टिक मिसाईल्स, ३ क्रूझ मिसाईल्स आणि ४ ड्रोन्स इराणकडून डागण्यात आले होते, असे यूएईने म्हटले आहे. ४ मे रोजी डागण्यात आलेल्या मिसाईल्स आणि ड्रोन्स रोखताना चार लोक जखमी झाले. युद्ध सुरू झाल्यापासून इराणकडून यूएईवर करण्यात आलेल्या हल्ल्यांपैकी ५४९ बॅलेस्टिक मिसाईल्स, २९ क्रूझ मिसाईल्स आणि २२६० ड्रोन्स हवेतच पाडण्यात आले आहेत. आतापर्यंतच्या हल्ल्यात २२७ लोक जखमी झाले असून, यात भारतीय नागरिकांचाही समावेश आहे.
57 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 03:55 AM
पुदुच्चेरी निवडणूकः एन. रंगासामी यांच्या एआयएआरसीचा दणदणीत विजय, पुन्हा सत्ता मिळवली

पुदुच्चेरी निवडणूकः एन. रंगासामी यांच्या एआयएआरसीचा दणदणीत विजय, पुन्हा सत्ता मिळवली

पुद्दुचेरी :या केंद्रशासित प्रदेशातील ३० जागांच्या छोट्या पण राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असणाऱ्या विधानसभेचा कौल पुन्हा एकदा स्थानिक अस्मिता आणि प्रस्थापित विश्वासाला बळकटी देणारा ठरला आहे. मुख्यमंत्री एन. रंगासामी यांनी थट्टनचावडीत दणदणीत विजय मिळवला असून, त्यांच्या ऑल इंडिया एन.आर. काँग्रेस (एआयएआरसी) नेतृत्वाखाली एनडीए आघाडीने बहुमतासाठीचा १६ जागांचा जादूई आकडा गाठून पुन्हा सत्ता कायम ठेवली आहे. स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव... : पुद्दुचेरीच्या निवडणुकीवर प्रादेशिक चेहऱ्याचा मोठा प्रभाव राहिला आहे. एन. रंगासामी यांचा साधेपणा, त्यांची जनमानसातील ‘मक्कल थलैवर’ (लोकांचे नेते) अशी प्रतिमा यामुळे ते सत्ताविरोधी लाट थोपविण्यात यशस्वी ठरले. एनडीएचा दबदबा... : एआयएनआरसी आणि भाजप या दोन्ही पक्षांना ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही पट्ट्यांमध्ये समन्वयाचा फायदा मिळाला. काँग्रेस व द्रमुकच्या आघाडीने स्थानिक स्वायत्तता व नायब राज्यपालांसोबतच्या प्रशासकीय संघर्षाला प्रचाराचा मुख्य मुद्दा बनविले होते. परंतु, हा मुद्दा मतांमध्ये परावर्तित होऊ शकला नाही. विजय यांच्या पक्षाची एन्ट्री : पुद्दुचेरीच्या यंदाच्या रणसंग्रामात तमिळ चित्रपटसृष्टीतील अभिनेते विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) या पक्षाने पहिल्यांदाच आपले उमेदवार मैदानात उतरवून रंगत वाढवली.
35 shares
😢
Pudhari logo
Pudhari
May 5, 2026, 03:52 AM
बारामती पोटनिवडणुकीत अजित पवार विक्रमी मतांनी विजयी

बारामती पोटनिवडणुकीत अजित पवार विक्रमी मतांनी विजयी

यानिमित्ताने त्यांनी देशात विक्रमी मताधिक्याची नोंद स्वतःच्या नावावर केली. त्यांच्या विरोधातील सर्व २२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. बारामतीकरांनी अजितदादांना मतातून यानिमित्ताने श्रद्धांजली अर्पण केली. बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी ५८.१७ टक्के मतदान झाले होते. एकूण ३ लाख ८४ हजार ५७९ मतदारांपैकी २ लाख २३ हजार ७०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सोमवारी (दि. ४) बारामती एमआयडीसीतील राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पवार यांना ईव्हीएमद्वारे २ लाख १८ हजार ८०६ मते मिळाली.
48 shares
😐
Pudhari logo
Pudhari
May 5, 2026, 03:47 AM
तेल डेपोवर इराणच्या ड्रोन हल्ल्याच्या आरोपानंतर बहरीनने आणीबाणी जाहीर केली

तेल डेपोवर इराणच्या ड्रोन हल्ल्याच्या आरोपानंतर बहरीनने आणीबाणी जाहीर केली

बहरीनमध्ये आज रात्री राष्ट्रीय आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली. संयुक्त अरब अमीरातने सोमवारी सांगितलं की एका इराणी ड्रोनने फुजैराहमधील तेल साठ्याला आग लावली. हे केंद्र होर्मुझ स्ट्रेटला बायपास करणाऱ्या एका महत्वपूर्ण पाईपलाईन हब आहे. यानंतर ब्रिटीश लष्कराने देखील अमीरातच्या समुद्र किनाऱ्यावर एका मालवाहू जहाजाला आग लागल्याची माहिती दिली. या हल्ल्यानंतर ग्लोबल मार्केटमध्ये तेलाच्या किंमती ६ टक्क्यांनी वाढल्या. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी मात्र या हल्ल्यामागे इराणचा हात असल्याचा नकार दिला. त्यांनी अमेरिका आणि युएईच्या दलदलीत पुन्हा जाण्यापासून वाचलं पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली. या राजनैतिक संकटावर लष्करी समाधान निघू शकत नाही हा प्रश्न फक्त वाटाघाटीद्वारेच सोडवला जाऊ शकतो असं देखील मत त्यांनी व्यक्त केलं.
61 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 03:46 AM
थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडूचे राजकारण उलथवून टाकले, सर्वाधिक जागा जिंकल्या

थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडूचे राजकारण उलथवून टाकले, सर्वाधिक जागा जिंकल्या

चेन्नई :मोठमोठ्या राजकीय विश्लेषकांनाही चकीत करणारी लाट तामिळनाडूच्या राजकारणात दशकांनंतर उसळताना दिसत आहे, चित्रपटसृष्टीतील सुपरस्टारपासून प्रत्यक्ष राजकारणात उतरलेले थलापती विजय यांनी राज्यातील जनतेसमोर एक नवा आणि सक्षम पर्याय उभा केला आहे. राज्यातील गेल्या पाच दशकांपासून मजबूत असलेला द्रमुक - अण्णाद्रमुक राजकारणाचा गड, अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने हादरवून सोडला आहे. आतापर्यंत सत्तेची सूत्रे केवळ या दोन द्रविड पक्षांमध्येच फिरत होती. मात्र, यावेळी टीव्हीकेच्या उदयाने हा एकाधिकार पूर्णपणे खंडित केला आहे. तामिळनाडूच्या राजकारणावर मागील ४९ वर्षांपासून फक्त द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोनच द्रविड पक्षांचे वर्चस्व राहिले आहे. सत्तेची अदलाबदल याच दोन गटांमध्ये होत आली आहे. मात्र आता अभिनेता ते राजकारणी झालेल्या विजय यांच्या टीव्हीकेने दशकांपासून चालत आलेल्या एकाधिकारशाहीला थेट आव्हान दिले आहे. विजय यांच्या सभांमध्ये दिसणारी प्रचंड गर्दी आता मतांमध्येही परिवर्तित झाली आहे. विजय यांच्या टीव्हीके पक्षाने सर्वाधिक जागांवर विजय मिळविला आहे. तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी ११८ जागांची आवश्यकता आहे. सध्या विजय यांच्या टीव्हीके पक्षाने १०७ जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे ते कोणत्या पक्षाचे समर्थन घेतील, याबाबत चर्चा रंगू लागली आहे. प्रत्येक प्रचारसभेत विजय यांनी सत्ताधारी द्रमुक आणि केंद्रातील भाजपवर जोरदार टीका केली. या दोन्ही पक्षांना त्यांनी आपले प्रमुख राजकीय आणि वैचारिक प्रतिस्पर्धी म्हणून स्पष्टपणे मांडले. मात्र, या आक्रमक भूमिकेतही एक गोष्ट विशेष लक्षवेधी ठरली. विजय यांनी अण्णाद्रमुकबाबत कायमच सौम्य भूमिका घेतली. त्यांनी अण्णाद्रमुकवर तीव्र किंवा कडवा हल्ला केला नाही. याचा राजकीय फायदा आता विजय यांना होऊ शकतो. स्टॅलिनविरोधातील लाटेचा लाभ मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या विरोधातील सत्ताविरोधी लाटेचा सर्वाधिक आणि थेट फायदा टीव्हीकेला झाला. अण्णाद्रमुक व भाजप जनतेचा पूर्ण विश्वास संपादन करण्यात मागे पडताना दिसत आहेत. या निवडणुकीत घराणेशाही आणि नेत्यांच्या अहंकाराबद्दल जनतेत तीव्र नाराजी आहे. तामिळनाडूच्या राजकारणाचे एक अनोखे वैशिष्ट्य म्हणजे तिथे चित्रपटसृष्टीतील ‘सुपरस्टार’च राजकारणाचे ‘नायक’ ठरतात. एम. जी. रामचंद्रन, एम. करुणानिधी आणि जे. जयललिता ही नावे याच परंपरेची साक्ष देतात. जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर तमिळ राजकारणात निर्माण झालेली ‘सुपरहिरो’ची पोकळी अभिनेता थलापती विजय यांनी भरून काढत एक नवा चेहरा दिला आहे. थलापती विजय यांनी युवकांना आणि महिलांना एका स्वच्छ, प्रामाणिक पर्यायाचे स्वप्न दाखवले आहे. या नायकाने आता राजकारणाच्या खऱ्या मैदानातही आपली जादू चालवली असून, तामिळनाडूच्या राजकीय पटलावर ते एक नवा इतिहास घडविण्यास सज्ज झाले आहेत. सिनेमा ते सत्ता : ‘थलापती’चा उदय एम. के. स्टॅलिन आणि उदयनिधी स्टॅलिन यांचे चित्रपटसृष्टीशी नाते असले तरी, विजय यांची ‘स्टारडम’ची उंची अतुलनीय आहे. तमिळ चित्रपटसृष्टीत पूर्णपणे ‘मास अपील’ असलेला सुपरस्टार म्हणून विजय यांनी आपली ओळख निर्माण केली. चाहत्यांनी त्यांना दिलेली ‘थलापती’ (सेनापती/नेता) ही पदवी आज त्यांच्या राजकीय नेतृत्वाची ओळख बनली आहे. अण्णाद्रमुक देणार साथ? अण्णाद्रमुक आणि टीव्हीके यांची युती हा सर्वांत स्वाभाविक पर्याय ठरू शकतो. द्रमुकला सत्तेबाहेर करण्यासाठी हीच सर्वोत्तम संधी असल्याची जाणीव अण्णाद्रमुकलाही आहे. त्यामुळे, परिस्थिती तशी निर्माण झाल्यास अण्णाद्रमुक आपला सहयोगी भाजपचा पाठिंबा सोडून थेट विजय यांना साथ देण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘बूथ लेव्हल’पर्यंत फळी विजयने पक्षाची स्थापना केल्यापासून शांतपणे तळागाळात काम केले. त्याने थेट जनतेत जाऊन संवाद साधण्याऐवजी, प्रत्येक मतदारसंघात ‘बूथ लेव्हल’पर्यंत आपली फळी तयार केली. निवडणुकीच्या रिंगणात त्याने स्वच्छ प्रतिमेचे तरुण चेहरे आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना संधी दिली. मोठ्या सभेपेक्षा छोट्या कोपरा सभांवर दिलेला भर आणि शिट्टी या चिन्हाचा केलेला प्रचार यामुळे ग्रामीण भागात त्याची पकड घट्ट झाली.
98 shares
😢
P
Pudhari
May 5, 2026, 03:46 AM
राजकारणामुळे उद्ध्वस्त मुंबई; दडपलेल्या संकटावरून विरोधी पक्षांची रस्त्यावर उतरण्याची तयारी

राजकारणामुळे उद्ध्वस्त मुंबई; दडपलेल्या संकटावरून विरोधी पक्षांची रस्त्यावर उतरण्याची तयारी

मुंबई महापालिकेत राजकारणाने माणुसकीचा पराभव केल्याचे चित्र दिसले. बंगाल विजयाच्या जल्लोषात महाराष्ट्रातील लेकीच्या किंकाळ्या दबल्या गेल्या, अशी संतप्त भावना मुंबईकरांमध्ये निर्माण झाली आहे. आता या मुद्द्यावरून विरोधक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.
80 shares
😢
Pudhari logo
Pudhari
May 5, 2026, 03:36 AM
पक्षीय राजकारणः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत केट यांचा सत्तासंघर्ष

पक्षीय राजकारणः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत केट यांचा सत्तासंघर्ष

शहराध्यक्षपद शोभेचे? विधानसभा निवडणुकीत आमदार शंकर जगताप यांच्या उमेदवारीला नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी विरोध केला होता. पक्षात नाहक बंडाळी नको म्हणून पक्ष संघटनेत काहीच कार्य नसताना, त्यांना ऐन निवडणुकीत पक्षाचे शहर कार्याध्यक्ष पद बहाल करून शांत करण्यात आले. त्यानंतर शहराध्यक्षपदाची रितसर निवडणूक झाली. शहराध्यक्ष असतानाही काटे यांना पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार नव्हते. पक्षाच्या चार आमदारांनी उमेदवार निश्चित करण्याचे निर्णय घेतले. त्यामुळे शहराध्यक्ष पद हे केवळ शोभेचे ठरले. ऐन निवडणुकीत प्रचारात निगडी येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहराध्यक्ष काटे यांचे जाहीरपणे कान टोचले होते. पिंपळे सौदागर प्रभागातील पक्षाचे सर्वच्या सर्व चार उमेदवाराचे पॅनेल निवडून आणा, असे आदेश त्यांनी त्यांना दिला होते. मात्र, संपूर्ण पॅनेल निवडून आणण्यात काटे हे अपयशी ठरले.
1 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 03:34 AM
केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित यू. डी. एफ. ने सत्ताधारी एल. डी. एफ. चा पराभव करत बहुमत मिळवले आहे.

केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित यू. डी. एफ. ने सत्ताधारी एल. डी. एफ. चा पराभव करत बहुमत मिळवले आहे.

तिरुवनंतपुरम :केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ)ने स्पष्ट बहुमत मिळवले असून, सीपीआय(एम)च्या नेतृत्त्वाखालील सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ)ला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटक आणि तेलंगणानंतर काँग्रेसने केरळमध्येही विजय मिळविला आहे. यामुळे डाव्यांचा अखेरचा किल्लाही ढासळला आहे. आदिवासी तरुणांच्या स्वप्नांचा चक्काचूर! १२,५०० पदांची भरती सात वर्षांपासून रखडली; सरकारचे ‘भिजत घोंगडे’ कायम यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांच्या निवडीतील मोठे बदल हा निर्णायक ठरले. काँग्रेस - नेतृत्वाखालील यूडीएफने धोरणात्मक पद्धतीने ९९ जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देत, सत्ताविरोधी नाराजीला थेट उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आघाडीने केवळ २७ विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली, तर १४ आमदारांचे तिकीट कापण्यात आले. याशिवाय, मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या ८५ उमेदवारांना यावेळी संधी देण्यात आली नाही. राजकीय विश्लेषकांच्या मते, या ‘फ्रेश कँडिडेट’ रणनीतीचा उद्देश स्थानिक पातळीवरील नाराजी कमी करणे आणि मतदारांमध्ये नव्या उर्जेची भावना निर्माण करणे, हा होता. त्यात यश मिळाले आहे. किनारी भागांत मच्छीमारांचा रोष ठरला ‘गेमचेंजर’ किनारपट्टी भागांतील मच्छीमार समुदायाचा कल हा या राजकीय बदलामागील मोठा घटक मानला जात आहे. राज्यातील १४० जागांपैकी जवळपास ४० जागा किनारपट्टीच्या प्रभावाखाली येतात. तिथे १० लाख मच्छीमार मतदार निवडणुकीच्या निकालावर निर्णायक प्रभाव टाकतात. विशेषतः पुनर्वसन व समुद्रापासून अंतर राखण्याच्या प्रस्तावांमुळे अनेक कुटुंबांनी असंतोष व्यक्त केला होता. ज्यामुळे सत्ताधारी एलडीएफविरोधात नाराजीचे वातावरण तयार झाले. युद्धाचा फटका? यंदा आखाती देशांत काम करणाऱ्या प्रवासी मतदारांची मोठ्या प्रमाणावर अनुपस्थितीनेही सत्तासमीकरणांवर परिणाम केला. केरळमध्ये सुमारे २.४२ लाख नोंदणीकृत प्रवासी मतदार आहेत. यंदा पश्चिम आशियातील वाढता तणावामुळे प्रवासी मतदार केरळमध्ये पोहोचू शकले नाहीत. व्ही.डी. सतीशन हे मागील टर्ममध्ये विरोधीपक्षनेते होते. संघटनेवर मजबूत पकड. यूडीएफचा एक प्रमुख चेहरा आहे. के. सी. वेणुगोपाल यांचा काँग्रेस पक्षात राष्ट्रीय स्तरावर प्रभाव आहे. पक्षाचे ते राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. मात्र, राज्यातील सक्रीय राजकारण कमी आहे. रमेश चेन्नीथला हे माजी विरोधी पक्षनेते आहेत. अनुभवी नेते. संघटनेवर जुनी पकड आहे. यंदा कोणता फॅक्टर निर्णायक राज्यात एलडीएफ सलग दोन टर्म सत्तेत असल्यामुळे काही ठिकाणी सत्ताविरोधी लाटेचा फटका या आघाडीला बसला. अल्पसंख्यांक मतदार मोठ्या प्रमाणात यूडीएफ आघाडीकडे गेला. केरळमधील हॉट सीट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री दिवंगत ओमान चांडी यांचे चिरंजीव चांडी ओमन हे पुथुपल्ली मतदारसंघातून ५२ हजाराहून अधिक मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. हरिपाद मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला हे विजयी झाले आहेत. गॅस संकटाने केला परिणाम राज्यातील गॅसची टंचाईही एक महत्त्वाचा निवडणूक मुद्दा ठरला. पश्चिम आशियातील तणावामुळे गॅस पुरवठा बाधित झाला आणि त्याचा परिणाम केरळमध्ये घरगुती एलपीजी तसेच व्यावसायिक गॅसच्या उपलब्धतेवर झाला. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग असलेल्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि पर्यटन क्षेत्राला यामुळे मोठा फटका बसला. ते मतामध्ये परिवर्तीत झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
94 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 03:22 AM
भाजपच्या विजयामुळे प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व संपुष्टात आले, राष्ट्रीय परिघावरील द्विध्रुवीय राजकारण संपुष्टात आले

भाजपच्या विजयामुळे प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व संपुष्टात आले, राष्ट्रीय परिघावरील द्विध्रुवीय राजकारण संपुष्टात आले

मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली :‘प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व संपुष्टात आणि राष्ट्रीय परिघावर भक्कम झालेले द्विध्रुवीय राजकारण’, पश्चिम बंगालमधील भाजपचा ऐतिहासिक विजय आणि अन्य चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालांचे असे एका वाक्यात वर्णन करता येईल. हेच कल २०२९ च्या लोकसभा निवडणुकांतही कमी अधिक फरकाने कायम राहतील, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.भाजपची रणनीती यशस्वीपश्चिम बंगालच्यारणात देशाच्या राजकारणाचा पोत बदलून टाकण्याचे सामर्थ्य आहे, हे ओळखून पंतप्रधान नरेद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपसह संघपरिवाराने जाणीवपूर्वक रणनीती आखून तडीसही नेली, हिंदू मतांचे जबरदस्त ध्रुवीकरण मतपेटीत उमटेल याची बूथपातळीवरून भक्कम बांधबंदिस्ती केली, इतर राज्यांतील लाखो बंगाली मतदार मतदानासाठी येतीलच याची चोख व्यवस्था केली.संघटनात्मक परिश्रमांना SIR ची जोडनिवडणुकांत विजयच मिळवायचा असतो हे धोरण व त्याला साजेशी रणनीती करण्यात भाजपचा हात धरणारा एकही पक्ष त्यांच्या आसपासही सध्या नाही. बंगालमध्ये संघटनात्मक परिश्रमांच्या जोडीला मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणी (एसआयआर) प्रक्रियेत लाखो लोकांची नावे मतपत्रिकांतून कापली गेली. तिथपासून निवडणुकीच्या तोंडावर अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा महापूर आला. या साऱ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे भाजपने पश्चिम बंगाल नामक एक भक्कम गड यावेळी सहजासहजी सर केला.अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत महत्वाच्या प्रदेशांत एका पक्षाचे एकछत्री साम्राज्य, हे स्वातंत्र्यानंतरची जवळपास तीन दशके दिसणारे दृश्य पुन्हा दिसत असून त्यात महत्वाचा फरक इतकाच की हा पक्ष काँग्रेस नव्हे तर भाजप आहे. मुर्शिदाबाद, मालदा यासारख्या भागांतभाजपची चमकदार कामगिरीहे देशातील मतपेढीचे राजकारण अस्ताकडे जाणारे मोठे पाऊल मानले पाहिजे.BJP win in West Bengal : बंगालमध्ये कमळ फुललं, ममतांचा गड ढासळला, भाजपनं विजय कसा खेचून आणलामुस्लिम मतसंख्या निर्णायकबंगालमध्ये सुमारे ३० टक्क्यांहून अधिक मुस्लिम लोकसंख्या अनेक मतदारसंघांमध्ये निर्णायक ठरते. पारंपरिकरित्या आधी काँग्रेस, मग डावे, नंतर तृणमूल काँग्रेस यांच्यासाठी हे मतदारसंघ सत्तेची गुरुकिल्ली मानले जात. मात्र, यावेळी या मतदारसंघांमध्येही भाजपने घेतलेली आघाडी व ममता बॅनर्जी यांच्या दशकभराच्या सत्तेला बसलेला मोठा धक्का हा केवळ निवडणूक रणनीतीचा परिणाम नसून, मतदारांच्या मानसिकतेतील परिवर्तनाचेही द्योतक मानावा लागेल.दिग्गजांच्या पंक्तीत विजयतमिळनाडूच्या राजकारणातील यंदाची उलथापालथ अभूतपूर्व आहे. अभिनेते विजय थलपथी यांच्या नव्या कोऱ्या 'तामिळगा वेत्री कळघम' ची (टीव्हीके) सुप्त लाट द्रमुक, अण्णाद्रमुक या पक्षांच्या भल्याभल्या नेत्यांनाही जाणवली नाही. पदार्पणातच शंभरी गाठून राज्याची सत्ता नजरेच्या टप्प्यात आणण्याची कामगिरी करणारे एन. टी. रामाराव, अरविंद केजरीवाल (काही अंशी एम जी रामचंद्रन) यांच्या पंक्तीत विजय यांना स्थान मिळाले आहे.Kangana Ranaut : राहुल गांधींनी भाजप प्रवेश केला, तर त्यांच्याशी लग्न करेन; कंगनाने 'व्हायरल' दावे फेटाळले, राजकारणी महिलांबद्दल चिंता व्यक्तआसामात हॅटट्रिकआसामची सूत्रे काँग्रेसने प्रियांका गांधी यांच्याकडे दिली ती किती कागदोपत्री होती व अतिअहंकारी गौरव गोगोईंवर राहुल गांधी यांचा विश्वास कसा अनाठायी होता हे आसाममधील हिमंता बिस्व सरमा यांच्या विजयाच्या हॅटट्रिकने सिद्ध झाले. थोडक्यात भाजप व काॅंग्रेस असा थेट सामना जेथे असतो तेथे काँग्रेसने ऐनवेळी हातपाय गाळते हे अनेक राज्यांप्रमाणे आसामातही दिसले.लक्षणीय बदलाची शक्यताकेरळच्या रुपाने काँग्रेसने आपल्या राज्यांच्या संख्येत केलेली वाढ आणि बंगाल, आसाम व पद्दुचेरीतील भाजप-एनडीएचा विजय यातून राष्ट्रीय पातळीवरील सत्तासंतुलनातही अदृश्य पण लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे.लोकसभेत सध्याविरोधक मजबूत स्थितीतआहेत. पण दर संसद अधिवेशनात गोंधळ घालून रोजच्या रोज कामकाज बंद पाडायचे की महिला आरक्षण विधेपकाप्रमाणे एकजूट अभंग ठेवून, धारदार चर्चेने सरकारला जेरीस आणायचे याचा विचार विरोधकांना करावा लागणार आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर ती मुख्य जबाबदारी असेल. ममता बॅनर्जी यांच्यामुळे भाजपने बंगालमध्ये चंचुप्रवेश केला, या काँग्रेसच्या आरोपात तथ्य आहेच पण ममता यांनी तसे का केले याचा विचार काँग्रेसने कधी तरी करणे अपरिहार्य आहे.Watermelon Deaths : ना पाणी, ना कलिंगड-बिर्याणी; अन्नावाटे विष शरीरात गेलं नाही, चौघांच्या शरीरात मॉर्फिन कसं शिरलं? डॉक्टरांचे थक्क करणारे सवालअजिंक्य भाजपचा विरोधकांना इशाराभारतीय परिदृश्यात बंगालचे वेगळे स्थान आहे. ब्रिटिशांनी रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वाखाली २३ जून १७५७ रोजी प्लासीची निर्णायक लढाई जिंकली. त्याच विजयातून भारतात ब्रिटिश वसाहतवादी राजवटीचा पाया घातला गेला. पुढची दीडशे वर्षे ब्रिटिश राजवटीने भारतात मुक्काम ठोकला. स्वातंत्र्योत्तर काळात ४ मे २०२६ रोजी बंगालचे रण जिंकून अजिंक्य भाजपने आपल्या विरोधकांना दिलेला इशारा ‘समझनेवालों को काफी है’.
29 shares
😐
Pudhari logo
Pudhari
May 5, 2026, 03:17 AM
बारामती पोटनिवडणूकः उमेदवारांसाठी पक्षांकडून जोरदार प्रचार

बारामती पोटनिवडणूकः उमेदवारांसाठी पक्षांकडून जोरदार प्रचार

महायुतीने या पोटनिवडणुकीत मोठी ताकद सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासाठी बारामतीत आले होते. राष्ट्रवादीचे अनेक मंत्री तसेच भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांनीही बारामतीत प्रचारात कोणतीही कसर ठेवली नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानेही सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दर्शविला होता. खा. सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, पार्थ व जय पवार, राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार, सुनंदा पवार, शर्मिला पवार, युगेंद्र पवार यांनीही प्रचारात सहभागी होत सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले होते. निवडणुकीत नोंदणीकृत राजकीय पक्ष असलेल्या न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे आर. वाय. घुटुकडे हे सोलापूरचे उमेदवार, हिंदुस्थान जनता पार्टीचे जत येथील सतीश कदम हे दोन उमेदवार वगळता अन्य 20 अपक्ष निवडणुकीत उभे होते.
57 shares
😐
P
Pudhari
May 5, 2026, 02:55 AM
अमित शहांच्या बंगालमधील धोरणात्मक योजनेचे फडणवीसांनी केले कौतुक

अमित शहांच्या बंगालमधील धोरणात्मक योजनेचे फडणवीसांनी केले कौतुक

आपले मास्टर स्ट्रॅटेजिस्ट आणि आधुनिक राजकारणातले चाणक्य म्हणून ओळखले जाणारे गृहमंत्री अमित शहा यांनी चोख योजना तयार केली. या विजयासाठी अमित शहा, पक्षाध्यक्ष नितीन नबीन तसेच बंगालच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
57 shares
😊
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 02:54 AM
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार कालिता माझी यांनी ऑसग्रामची जागा जिंकली आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार कालिता माझी यांनी ऑसग्रामची जागा जिंकली आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालच्या राजकारणात यावेळी अशी कहाणी समोर आली आहे जी फक्त जय पराजय नाही तर त्याहून पुढे जात संघर्ष, अपेक्षा आणि परिवर्तनाचे मोठे उदाहरण बनली आहे.भाजपाच्याकलिता माझी यांनी तृणमूल काँग्रेसच्या श्यामा प्रसन्न लोहार यांना हरवून औसाग्राम मतदारसंघातून विजय मिळवला आहे. कलिता माझी यांनी श्यामा प्रसन्न यांना १२ हजार ५३५ मताधिक्यांनी पराभूत केले आहे. कलिता माझी यांना एकूण १ लाख ७ हजार ६९२ मते मिळाली आहेत तर श्यामा प्रसन्न यांना ९५ हजार १५७ मतांवर समाधान मानावे लागले आहे. त्याशिवाय सीपीआयचे चंचल कुमार यांना १६ हजार ४७८ मते पडली. कलिता माझी यांची कहाणी सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. कलिता माझी यांना कुठलाही मोठा राजकीय वारसा नाही. निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत. कलिता माझी याभाजपाच्याअशा उमेदवार होत्या, ज्या ४ घरांमध्ये घरकाम म्हणून काम करून महिन्याला २५०० हजार रुपये कमवायच्या. याच कलिता माझी यांना भाजपाने विधानसभेची संधी दिली आणि त्यांच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली. कलिता माझी या औसाग्राम मतदारसंघातून आमदार बनल्या आहेत. ही भाजपाची ताकद आहे. जिथे एका सर्वसामान्य माणसाला पुढे जाता येऊ शकते. ही खरोखरच एक प्रेरणादायी कहाणी आहे असं भाजपा खासदार पी.सी मोहन यांनी म्हटलं आहे. ओसाग्राम मतदारसंघातून निवडून आलेल्या कलिता माझी यांच्या विजयाने लोकशाहीत सामान्य माणसांच्या मतांची ताकद काय असते हे सिद्ध करून दाखवले आहे. ज्या कलिता माझी यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी अथवा आर्थिक पाठबळ नाही त्यांनी बड्या प्रस्थापित पक्षातील नेत्यांना पराभवाची धूळ चारली. घरकाम करून महिन्याला २५०० रुपये कमावणाऱ्या कलिता माझी यांचा हा प्रवास सोपा नव्हता. कलिता यांना २०२१ च्या निवडणुकीतही भाजपाने उमेदवारी दिली होती परंतु त्यावेळी विरोधी पक्ष टीएमसी उमेदवाराकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतरही भाजपाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आणि हा विश्वास खरा ठरवत कलिता माझी आमदार बनल्या. निवडणूक प्रचारात कलिता माझी घरोघरी जात लोकांशी संपर्क ठेवत होत्या. त्याचा निकाल आता लोकांसमोर आला आहे. रोजच्या आयुष्याशी लढणाऱ्या कलिता माझी यांनी कधीही त्या एक दिवस विधानसभेत जातील याची कल्पनाही केली नव्हती. मात्र त्यांच्या विजयाने हे स्वप्न सत्यात उतरवले आहे.
6 shares
😊
Pudhari logo
Pudhari
May 5, 2026, 02:52 AM
पेरियाकरुप्पनच्या संकुचित पराभवामुळे राजकीय खळबळ

पेरियाकरुप्पनच्या संकुचित पराभवामुळे राजकीय खळबळ

पीरियाकरुप्पन यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा अवघ्या एका मताने पराभव झाल्यामुळे DMK कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. दुसरीकडे, टीव्हीके समर्थकांनी हा मोठा राजकीय बदल असल्याचे सांगत जल्लोष केला आहे. निवडणूक आयोगाने हा निकाल पूर्णपणे पारदर्शक असल्याचे स्पष्ट केले असून, या एका मताच्या फरकाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.
61 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 02:48 AM
2029 च्या निवडणुकीपूर्वी पवार पक्षाध्यक्षांचा शेक-अपचा इशारा

2029 च्या निवडणुकीपूर्वी पवार पक्षाध्यक्षांचा शेक-अपचा इशारा

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक:आगामी २०२९ च्या निवडणुकीपूर्वी संघटना नव्याने उभी करू, असे आश्वासन देतानाच, पक्षात जो कोणी काम करणार नाही, त्याला बाहेरचा रस्ता दाखवू, अशा इशाराराष्ट्रवादी शरदचंद्र पवारपक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिला. या पुढच्या काळात व्यक्तीकेंद्रीत पक्ष ठेवू नका असा सल्लाही शिंदे यांनी छगन भुजबळ, गजानन शेलार यांचे नाव न घेता दिला.शरद पवारांनी पक्ष तसेच नेतेही वाढविलेत. परंतु, हे नेते पक्ष आणि पवारांना सोडून गेले असले तरी, आगामी काळात पक्ष संघटना बांधणीवर भर देऊन संघटनेची मजबूत बांधणी केली जाईल. पक्षासाठी अहोरात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची दखल घेऊन त्यांचे मूल्यमापन घेऊन त्यांना जबाबदारी देण्यात येईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.Nashik BJP: बंगालच्या विजयाचा भाजपकडून नाशकात जल्लोष; मंत्री गिरीश महाजनांसह भाजप कार्यकर्त्यांनी धरला ठेकायावेळी प्रभारी सुनील भुसारा, खासदार भास्कर भगरे, प्रदेश उपाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, गोकुळ पिंगळे, लक्ष्मण मंडाले, माजी आमदार संजय चव्हाण, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, माणिकराव शिंदे, अनिता दामले आदी उपस्थितीत होते.शिंदे म्हणाले की, झालेल्या निवडणुकीत उमेदवारांना मदत होऊ शकली नाही ही वस्तुस्थिती आहे. निवडणूक काळात ज्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केला, त्यांची दखल घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. प्रदेश पातळीपासून गटपातळीवर या नियुक्त्या केल्या आहेत की नाही याची शहानिशा केली जाईल, त्यांचे प्रदेश पातळीवरून नेते पाठवून मूल्याकंन केले जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यकर्त्यांना उघड्यावर सोडू नका, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही थेट मंत्रालयातून ताकद देऊ, असा शब्द शिंदे यांनी दिला.Nashik MHADA Scam: 'म्हाडा'त बनावट नकाशांद्वारे मंजुरी; नाशिकचा नायब तहसीलदार अटकेत, अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेसंघटनेतील कार्यकर्त्यांनाच पदेहल्ली विकासकामांऐवजी वेगवेगळ्या स्टॅट्रजीनुसार निवडणुका लढवल्या जात आहेत. आम्ही मात्र मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून संघटना मजबूत करण्यावर जाेर दिला आहे. मी स्वत: संघटना बांधणीवर लक्ष ठेवणार आहे. आयात केलेल्यांपेक्षा संघटनेतील कार्यकर्त्यांनाच यापुढे संधी दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बारामतीत सुनेत्राताईच निवडूनच येणार होत्या त्यांच्या प्रचारासाठीशरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासह पक्षपदाधिकऱ्यांनी झोकून दिले होते, असेही त्यांनी सांगितले.पदाधिकारी विश्वासात घेत नाहीतसुरुवातीस, प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे एेकून घेतले. यात पदाधिकाऱ्यांनी पक्षातंर्गत गटबाजीवर तक्रारी केल्या. गटबाजी आहे ती थांबविली पाहिजे. पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही. महापालिका, नगरपालिका निवडणुकीत पक्षाची उमेदवारी घेण्यास कोणीही तयार नव्हते. स्थानिकांना डावलून, नेत्यांनी परस्पर जागा वाटप केले यात पक्षाचे सक्षम उमेदवार असून, देता आले नाहीत. निवडणुकीत उमेदवार उतविल्यानंतर, पक्षाने ताकद दिली नाही, कोणीही विचारायला आले नसल्याची खंत यावेळी कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली. वेळेत सुधारणा न केल्यास पक्षाची अवस्था दयनीय होईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.Hiraman Khoskar : 'आम्ही सत्तेमध्ये आलो तर शेतकरी मारुन टाकायचे का?' सत्ताधरी आमदाराचा सरकारला घरचा आहेरपदाधिकाऱ्यांना सूचनास्थानिक प्रश्नांवर आंदोलने, मोर्चे काढाजिल्हास्तरावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कार्यक्रम द्याजिल्हा व तालुका पातळीवर कार्यकर्त्यांना ताकद द्याकोअर कमिटी तयार करून महिन्याला बैठक घ्यावीमहापालिका, विधानसभा निवडणुकीतल पराभवाचा अहवाल सादर करावामहाविकास आघाडीतील मित्र पक्षांशी एकत्रित बैठका घ्यातक्रारींच्या निवारणासाठी विशेष हेल्पलाइन कराअन्यायाविरोधात 'फायर फाइट टीम' तयार करा
59 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 02:05 AM
बारामती धक्कादायकः बारामतीकर उमेदवाराचा उपमुख्यमंत्र्यांवर विक्रमी फरकाने पराभव

बारामती धक्कादायकः बारामतीकर उमेदवाराचा उपमुख्यमंत्र्यांवर विक्रमी फरकाने पराभव

बारामती:बारामतीकरांनीउपमुख्यमंत्रीसुनेत्रा पवारयांना तब्बल २ लाख १८ हजार ९३० विक्रमी मताधिक्याने विजयी केले. अकाली एक्झिटनंतरदेखील दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीकरांच्या मनावरील ‘गारुड’ कायम असल्याचे निकालातून दिसून आले. रेकॉर्डब्रेक मताधिक्य देत अजित पवार यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली आहे. सुरुवातीला महायुतीच्या उमेदवार म्हणूनसुनेत्रा पवारयांच्या विरोधात काँग्रेसचे आकाश मोरे आणि ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, वरिष्ठ पातळीवरील घडामोडीनंतर मोरे आणि प्रा. हाके यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्याचवेळी निवडणूक एकतर्फी होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. पवार यांच्यासह २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, विरोधी उमेदवारांचा अपेक्षित प्रचार रंगलाच नाही, त्यांचा कोणताही प्रभावी जनसंपर्क दिसून आला नाही. शिवाय पवार यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना ‘रेकाॅर्डब्रेक’ मतदान मिळविण्यासाठी सुरुवातीपासूनच कंबर कसली होती. या ऐतिहासिक विजयावरही बारामतीत जल्लोषाचे रंग उमटले नाहीत. दुःखातून अद्याप सावरलेले नसल्याने बारामतीकरांनी शांततेतच हा विजय स्वीकारला. महायुतीचा पाठिंबा सन १९९१मध्ये शरद पवार संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेले. त्यावेळी अजित पवार यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन शरद पवार यांच्यासाठी जागा रिकामी केली होती. अजित पवार यांच्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलांनी खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांनी या पोटनिवडणुकीची सूत्रे घेत रणनीती आखली. शरद पवार गटाच्या वतीने आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला, तर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रचाराच्या सांगता सभेला उपस्थित राहत मतदानाचे आवाहन केले होते. खुद्द मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगता सभेला उपस्थित राहत पूर्ण पाठिंब्याचे संकेत दिले होते. १३.३ टक्के मतदान कमी पोटनिवडणुकीत ५८.२७ टक्के मतदान झाले. २०२४च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ४८ हजार ३२१ मतदारांनी म्हणजेच १३.३ टक्के मतदारांनी मतदान केले नाही. हा विजय दादांच्या कार्याला आणि त्यांच्या स्मृतींना दिलेली खरी आदरांजली आहे. त्यांच्या कार्याला पुढे नेण्याची जबाबदारी आता माझ्यावर आली आहे .शिव-शाहू-फुले-आंबेडकर या महामानवांच्या विचारधारेचा वारसा जपत, आदरणीय यशवंतराव चव्हाण आणि अजितदादांनी दाखवलेल्या मार्गावर चालणार आहे. सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री १९६७पासून ‘पवार पर्व’अबाधित ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी १९६७मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लढलेल्या पहिल्याच निवडणुकीत प्रतिस्पर्धी बाबालाल काकडे यांचा पराभव करत बारामतीच्या राजकारणात दमदार एन्ट्री केली. त्यानंतर १९७२, १९७८, १९८०, १९८५ आणि १९९० अशा सलग निवडणुकांमध्ये शरद पवार यांनी विजयाची परंपरा कायम ठेवली. १९९१ मध्ये शरद पवार राष्ट्रीय राजकारणात गेल्यानंतर बारामतीच्या राजकारणाची सूत्रे अजित पवार यांच्या हाती आली. त्यांनी मतदारसंघावरील आपली पकड वेळोवेळी सिद्ध केली. ६४ वर्षांनंतर महिला आमदार सुनेत्रा पवार या बारामतीच्या दुसऱ्या महिला आमदार ठरल्या आहेत. याआधी १९६२मध्ये मालतीबाई शिरोळे (माई) यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवत बारामतीचे प्रतिनिधित्व केले होते. तब्बल ६४ वर्षांनंतर पुन्हा एकदा महिला नेतृत्व बारामतीच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहे.
28 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 02:03 AM
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत नाशिकमध्ये भाजपचा दणदणीत विजय

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत नाशिकमध्ये भाजपचा दणदणीत विजय

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक:पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने मुसंडी मारीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमुल काँग्रेसचा मोठा पराभव केल्यानंतर नाशकात भाजपने जोरदार जल्लोष साजरा केला.कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘वसंतस्मृती’ कार्यालयासमोर ढोल ताशांच्या गजरात ठेका धरीत आनंदोत्सव साजरा केला.भाजपच्या दमदार विजयाबद्दल नाशिक महानगरतर्फे पेढे वाटून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी भाजपचे झेंडे हाती घेत ठेका धरला. मंत्री गिरीष महाजन, शहराध्यक्ष सुनील केदार, प्रदेश चिटणीस रोहिणी नायडू, आमदार सीमा हिरे,महापौर हिमगौरी आडके-आहेर, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, ज्येष्ठ नेते विजय साने, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, महानगर सरचिटणीस सुनील देसाई आदींसह मंडल अध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.Nashik MHADA Scam: 'म्हाडा'त बनावट नकाशांद्वारे मंजुरी; नाशिकचा नायब तहसीलदार अटकेत, अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेजिल्ह्यातही आनंदोत्सवपश्चिम बंगालसह इतर तीन राज्यांमध्ये भाजपला मिळालेल्या यशामुळे येवल्यात व मनमाडमध्ये भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी अन् पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला.राज्यात अराजकभ्रष्टाचार, खून, दरोडे, बलात्कार, तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची दंडेलशाही, सर्वसामान्यांवर अन्याय व अत्याचार यांनी कळस गाठला होता. तेथील अराजकतेमुळेपश्चिम बंगालभारतात आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. क्रांतीभूमी म्हणून प्रसिद्ध असलेले राज्य अराजकतेकडे वाटचाल करीत होते, असे शहराध्यक्ष केदार म्हणाले.Nashik Crime: क्लासमधील शिक्षिकेचं लाजीरवाणं कृत्य; १० वीतील तरुणीला बेडरुममध्ये पाठवलं, तिथं भाच्याने डाव साधला, घटनेनं संतापपश्चिम बंगालमधील हुकूमशाही संपली- महाजनपश्चिम बंगालमध्येममता बॅनर्जीयांच्या दादागिरी आणि हुकूमशाहीला जनता कंटाळली होती. या ठिकाणी भाजपला आता स्पष्ट बहुमत मिळाले आहे. लोकांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच आहे त्यामुळे भाजपसाठी हा आनंदाचा दिवस असून, बंगालमधील हुकूमशाही आता संपुष्टात आल्याचा दावा जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी केला. यापुढे ममता बॅनर्जी यांचे कोणी नावही घेणार नसून, आता बंगालचा विकास झपाट्याने होईल, असेही महाजन म्हणाले. नाशिकमधील सिंहस्थाच्या कामांवर पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीदेखील लक्ष घालत आहेत. त्यामुळे सिंहस्थाची सर्व कामे आम्ही वेळेत पूर्ण करू, असा दावाही महाजन यांनी केला.
8 shares
😊
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 01:54 AM
पश्चिम बंगालमधील भाजपचा दणदणीत विजय हे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावरील विश्वासाचे प्रतीक

पश्चिम बंगालमधील भाजपचा दणदणीत विजय हे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावरील विश्वासाचे प्रतीक

मुंबई :पश्चिम बंगालमध्ये भाजपला मिळालेले दोन तृतीयांश यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर तेथील जनतेने दाखविलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. हा केवळ एका राज्याचा नव्हे, तर घुसखोरी, दहशतवादी कारवाया यापासून भारताला वाचविणारा हा विजय आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी भाजपच्या येथील प्रदेश कार्यालयात बंगालसह भाजपला मिळालेल्या यशाचा जल्लोष गुलाल उधळून व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री मंगलप्रभात लोढा, आ. चित्रा वाघ आदी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. जनतेने महापरिवर्तन करून दाखविले फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवून बंगालमध्ये जनतेने महापरिवर्तन करून दाखविले. बंगाल, आसाम, पुदुच्चेरीमधील विजय हा जनतेचा पंतप्रधान मोदींवर असणाऱ्या विश्वासाचा विजय आहे. आधी ३० वर्षे काँग्रेस, ३६ वर्षे कम्युनिस्ट आणि त्यापेक्षाही खतरनाक ममतादीदींचे १५ वर्षांचे कुशासन होते. देशाच्या एफडीआयमधील अर्धा टक्काही बंगालमध्ये येत नाही. सात हजार उद्योग राज्याबाहेर गेले, लोकांना हे सगळे बदलायचे होते, त्यांनी मोदी यांच्यावर विश्वास टाकला या राज्याने मोदींच्या विकासाच्या अजेंड्यावर विश्वास टाकला. राजकारणातले चाणक्य गृहमंत्री अमित शाह यांनी चोख योजना केली. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या पक्षनेतृत्वाची सुरुवात विजयाने झाली, असे फडणवीस म्हणाले. आता खापर ‘ईव्हीएम’वर! आता ममतादीदी ‘ईव्हीएम’वर खापर फोडतील. केरळमध्ये ईव्हीएम व्यवस्थित चालतात; पण, बंगालमध्ये बदलतात. हा विजय त्या सगळ्यांना उत्तर आहे, ज्यांनी देशातील संवैधानिक संस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, संसद चुकीचे आहे म्हणणाऱ्यांना हे योग्य प्रत्युत्तर आहे. बंगाल, आसाम, पुदुच्चेरीमधील विजय हा जनतेचा पंतप्रधान मोदींवर असणाऱ्या विश्वासाचा विजय आहे. जनतेला आता एकच गोष्ट माहिती आहे “मोदी है तो मुमकीन है” असे मुख्यमंत्री म्हणाले. फडणवीस यांच्या हस्ते पक्षाच्या सहा विधान परिषद सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
77 shares
😊
M
Maharashtra Times
May 5, 2026, 01:27 AM
थलापती विजय यांच्या राजकीय उदयामुळे तामिळनाडूच्या पारंपरिक सत्तेच्या गतीशीलतेस आव्हान मिळाले आहे

थलापती विजय यांच्या राजकीय उदयामुळे तामिळनाडूच्या पारंपरिक सत्तेच्या गतीशीलतेस आव्हान मिळाले आहे

फिल्म इंडस्ट्रीला राम राम करुन राजकारणात प्रवेश केलेले 'थलपती विजय' हे तामिळनाडूचा इतिहास पालटणार आहेत. तामिळनाडूच्या राजकीय क्षेत्रात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकांमध्ये, विजय यांच्या 'TVK' या पक्षाने मोठी आघाडी घेत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. विजय यांच्या अवघ्या दोन वर्षे जुन्या पक्षाच्या या कामगिरीने DMK आणि AIADMK या पक्षांचे पायाच हादरवून टाकला आहे. यावेळी, थलपती विजय यांच्या पहिल्याच निवडणुकीतील विजयाने, गेल्या 60 वर्षांपासून तमिळनाडूवर वर्चस्व गाजवणाऱ्या AIADMK आणि DMK या दोन प्रमुख पक्षांच्या'घराणेशाही'ला थेट आव्हानदिले आहे; मात्र आता सत्तेवरील त्यांची पकड कमकुवत झाली आहे. या दोन्ही पक्षांनी गेल्या जवळपास सहा दशकांपासून आलटून-पालटून राज्याचा कारभार पाहिला. पण आता थलापती विजय या राज्याचा कारभार सांक्षाळण्यास सज्ज झाला आहे. पण विजय थलापतीचा हा प्रवास तितकासा सोप्पा नव्हता.Sambhaji Shahaji Bhosale: मराठा साम्राज्याच्या इतिहासात हरवलेलं पान पुन्हा चर्चेत, अफजल खानानं केलेला दगाफटका; अभिषेक बच्चनने साकारलेले थोरले संभाजी महाराज कोण?बालकलाकार म्हणून केले कामविजयचा चित्रपटसृष्टीशी असलेला संबंध काही नवीन नाही; तो अगदी लहानपणापासूनच फिल्मी वातावरणात वाढला आहे. त्याचे वडील, एस.ए. चंद्रशेखर, हे तमिळ फिल्म इंडस्ट्रीतील एक नावाजलेले दिग्दर्शक आहेत. विजयने अगदी लहान वयातच कॅमेऱ्यासमोर कसे जायचे हे शिकले होते. त्याने अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले. त्याच्या कारकिर्दीची सुरुवात 1984 मध्ये, त्याच्या वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या वेट्री याचित्रपटाद्वारेझाली. त्यानंतर, 1992 मध्ये त्यानीं नालैया थीरपू (Naalaiya Theerpu) या चित्रपटाद्वारे मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले; या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्याच्या वडिलांनीच केले होते.Prajakta Shukre : बिग बॉसच्या घरात राकेश बापटनं प्राजक्ता शुक्रेला केलेलं प्रपोज? गायिकेनं सांगितलं काय घडलेलंसिनेइंडस्ट्रीत यायला वडिलांचा होता नकारमात्र एक काळ असा होता जेव्हा विजयच्या वडिलांनी त्याला फिल्म इंडस्ट्रीत येण्यास चक्क मनाई केली होती. विजयला अभिनेता व्हायचे होते. त्याने त्याची ही इच्छा त्याच्या वडिलांकडे व्यक्त केली. पण त्यांची ही इच्छा त्यांच्या वडिलांनी मात्र अमान्य केली. त्यांनी अभिनेत्याला हिरो बनण्यास पाठिंबा दिला नाही. या नकाराने विजय इतके दुखावले गेले की त्यांनी घरच सोडून दिले. एका मुलाखतीत खुद्द विजयनेच हा किस्सा सांगितला होता की, रागाच्या भरात ते चेन्नई येथील 'उदयन थिएटर'च्या दिशेने निघाले होते. घर सोडताना, त्यांने तिथे एक चिठ्ठीही ठेवली होती, ज्यामध्ये त्यांनी कोणीही आपला शोध घेण्याचा प्रयत्न करू नये, अशी विनंती केली होती.एकवेळ सायली आम्हाला सोडवेल पण प्रिया नाहीच! 'ठरलं तर मग' मालिकेतील खलनायकांसोबत गप्पाविजयचा शोध घेत वडील थिएटरवर पोहोचलेत्यावेळी विजयला खरंतर एक सिनेमा पाहून घरी जायचे होते. पण जेव्हा तो रात्री उशिरापर्यंतही घरी परतला नाही, तेव्हा त्याच्या कुटुंबाला काळजी वाटू लागली. त्याचे वडील, एस.ए. चंद्रशेखर, आपल्या मुलाच्या शोधात स्वतः त्या थिएटरमध्ये गेले. तिथे, थिएटरच्या वॉचमनने त्यांना सांगितले की, विजय थिएटरमध्येच उपस्थित आहे. त्यानंतर, चंद्रशेखर यांनी विजयची समजूत घातली आणि त्याला घरी परत घेऊन आले. पुढे, एका वडिलांनीही एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला.
12 shares
😢
M
Maharashtra Times
May 5, 2026, 01:18 AM
मुंबईच्या महापौरांच्या खुर्चीमुळे विधानसभा सभागृहात गोंधळ

मुंबईच्या महापौरांच्या खुर्चीमुळे विधानसभा सभागृहात गोंधळ

मुंबई :महापालिका सभागृहात महापौर उशिरा आल्याने आणि सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक अनुपस्थित असल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्याकिशोरी पेडणेकरयांनी महापौरांच्या खुर्चीवर जाऊन बसण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकारामुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.सोमवारी दुपारी दोन वाजता सभा होणार होती. मात्र, सुमारे पावणेतीन वाजेपर्यंतमहापौर रितू तावडेआणि सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक उपस्थित नव्हते. दरम्यान, विरोधी पक्षातील शिवसेना उबाठा , काँग्रेस आणि मनसेचे नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. कोरम पूर्ण असल्याचा दावा करत पेडणेकर यांनी महापौरांच्या खुर्चीत बसून कामकाज सुरू करण्याची भूमिका घेतली.Devendra Fadnavis | अद्भूत विजय ! रसगुल्ला खाऊन तोंड गोड केलं, मोदींचं कौतुक ममतादीदींवर निशाणाया वेळी काही नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला. महापालिका सचिवालयातील अधिकाऱ्यांनी नियमांची माहिती देत समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र काही वेळ त्या भूमिकेवर ठाम राहिल्या. दरम्यान, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे सभागृहात आल्यानंतर त्यांनीही नियमांनुसार तसे करता येणार नसल्याचे सांगितले. यानंतर महापौर आणि सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक सभागृहात दाखल झाल्यानंतर पेडणेकर या आपल्या आसनावर परतल्याने परिस्थिती निवळली.पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या निमित्ताने भाजपच्या नगरसेवकांनी सोमवारी मुंबई महापालिका मुख्यालयात जल्लोष केला. या विजयानिमित्तमुंबई महापालिकासभागृहात भाजपने अभिनंदनाचा ठराव मांडला. तर सभागृहात पेढे वाटले. मात्र या अभिनंदनाच्या ठरावावर सभागृहात बोलताना विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजपला नसरापूरच्या घटनेची आठवण करून दिली.Maharashtra AI Policy: सरकारी विभागांना 'एआय' प्रकल्प बंधनकारक; गतिमान, पारदर्शक कारभारासाठी राज्य सरकारचा निर्णयपरंपरेचा मुद्दा उपस्थितसभागृह उशिरा सुरू होण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप करत पेडणेकर यांनी परंपरेचा मुद्दा उपस्थित केला. महापौर आणि उपमहापौर अनुपस्थित असल्यास माजी महापौरांना पीठासीन अधिकारी म्हणून बसवण्याची पद्धत असल्याचे त्यांनी नमूद केले. काही दिवसांपूर्वी स्थायी समिती अध्यक्षांना महापौरांच्या खुर्चीत बसवण्यात आल्याचा उल्लेख करत, त्याच पार्श्वभूमीवर आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच विरोधी पक्षाचे नगरसेवक वेळेवर उपस्थित असल्याचा दावाही त्यांनी केला.
27 shares
😢
P
Pudhari
May 5, 2026, 01:07 AM
केरळमध्ये बदलाचे मतदान, तामीळनाडूला नवे युग दिसले

केरळमध्ये बदलाचे मतदान, तामीळनाडूला नवे युग दिसले

केरळ निकालांवरून हे दिसून आले आहे की जनतेला बदल हवा आहे. आम्ही प्रचारासाठी गेलो तेंव्हाही लोक आमच्यावर विश्वास व्यक्त करत होते. तामिळनाडूतील निकालांवर भाष्य करताना ते म्हणाले की, तामिळनाडूतील निकाल आश्चर्यकारक आहेत. तिथे एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. आम्ही जनतेची नाडी ओळखण्यास कमी पडलो. दरम्यान उपस्थित पत्रकारांनी त्यांच्या सेलिब्रिटी स्टेटसमुळे जनतेने मतदान केले का? असा सवाल केल्यावर उपमुख्यमंतऱ्यानी आम्हाला वाटले होते की त्यांना ३०-४० टक्के मते मिळतील. पण त्यांना त्यापेक्षा जास्त मते मिळाली आहेत.
64 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 12:56 AM
पश्चिम बंगालमध्ये भाजपचा दणदणीत विजय; तामिळनाडूमध्ये टीव्हीके आश्चर्यचकित

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा दणदणीत विजय; तामिळनाडूमध्ये टीव्हीके आश्चर्यचकित

पाच विधानसभा निवडणुकांचे चित्र, हा मजकूर लिहीत असताना जवळपास स्पष्ट झाले आहे. तामिळनाडू वगळल्यास, निकाल अपेक्षेनुरूपच लागत आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्यापश्चिम बंगालमध्येभारतीय जनता पक्षाने मोठी आघाडी घेतली असून, तामिळनाडूत चित्रपट अभिनेता विजय जोसेफ यांच्या तमिळग वेट्री कळगम (टीव्हीके) पक्षाने अनपेक्षितरीत्या सत्तेकडे झेप घेतली आहे. आसाम, केरळम आणि पुडूचेरीतील निकाल निवडणूकपूर्व अंदाजांनुसारच आहेत. बंगालमधील भाजपचा विजय ऐतिहासिक आहे. भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या या गृहराज्यात झेंडा फडकविण्याचे भाजपचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने २०११ मध्ये बंगालची सत्ता काबीज केल्यानंतर, गेली पंधरा वर्षे राज्यावर आपली पकड मजबूत ठेवली होती; परंतु या निवडणुकीत ९२.४७ टक्के एवढे ऐतिहासिक मतदान झाले आणि तिथेच ममतादीदींची सद्दी संपत आल्याची पाल चुकचुकली! मतदारयाद्यांचे विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर), बेकायदा घुसखोर, महिला सुरक्षा, बेरोजगारी, विकास, कायदा-सुव्यवस्था हे या निवडणुकीतील प्रमुख मुद्दे होते. ‘तृणमूल’ने ‘एसआयआर’चे भांडवल केले; पण त्यामुळे ध्रुवीकरण झाले आणि इतरही मुद्दे त्या पक्षाच्या विरोधात गेले, असे निकालांवर नजर टाकल्यावर म्हणता येते. भाजपने बंगालची सत्ता तर मिळवली; पण समोर ममतादीदींसारखी जमिनीशी नाळ जुळलेली, झुंजार, लढवय्यी नेता असताना, आपला ‘अजेंडा’ पुढे रेटणे भाजपसाठी सोपे नसेल. बंगालला ‘सोनार बांगला’ करण्याची आश्वासनपूर्ती करताना, पक्षाची कसोटी लागणार आहे. गेल्या निवडणुकीत ‘तृणमूल’ने ‘खेला होबे’ हा नारा दिला होता. खेळ होईल, हा त्याचा शब्दश: अर्थ, तर आम्ही कडवी टक्कर देऊ, हा मतितार्थ! गेल्या निवडणुकीप्रमाणेच ‘तृणमूल’ने यावेळीही कडवी टक्कर देण्याचा प्रयत्न केला; पण अखेर त्या पक्षाचाच ‘खेला होलो’ म्हणजे खेळ झाला! बंगालच्या सीमेवरील आसाममध्येही भाजपने मोठा विजय मिळवत सत्ता राखली आहे. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी, घुसखोरी, नागरिकत्व, भूमिपुत्रांचे हित आणि विकास या मुद्यांवर राज्यात भाजपची पाळेमुळे घट्ट केली आहेत. आसाममधील भाजपच्या सातत्यपूर्ण यशामुळे प्रभावशाली नेता म्हणून त्यांची प्रतिमा अधिक ठळक झाली आहे. ईशान्य भारतात भाजपचा विस्तार करण्यात आणि टिकवून ठेवण्यात त्यांचे योगदान मूल्यवान ठरत आहे. आसाममधील निकाल जेवढा अपेक्षित, तेवढाच तामिळनाडूतील निकाल अनपेक्षित! त्या राज्यात ‘टीव्हीके’ला बहुमताने थोडक्यात हुलकावणी दिली. अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापना झालेल्या आणि प्रथमच निवडणुकीला सामोरा गेलेल्या पक्षासाठी हे यश म्हणजे जणू सुखद स्वप्नच! ‘टीव्हीके’ला सरकार स्थापन करण्यासाठी कमी पडणार असलेल्या जागांची बेगमी छोटे पक्ष सहज करू शकतात; पण स्थिर, मजबूत सरकारसाठी विजय जोसेफ यांना द्रमुक किंवा अण्णाद्रमुकलाच सोबत घ्यावे लागेल. ‘थलपथी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय यांच्याकडून तामिळनाडूतील चित्रपटप्रेमी जनतेला आकाशाएवढ्या अपेक्षा आहेत; परंतु रुपेरी पडद्यावरील यश आणि प्रत्यक्ष प्रशासन यात मोठा फरक असतो. त्यांना त्वरित परिणाम दाखवावे लागतील. त्यामध्ये ते कितपत यशस्वी ठरतात, यावरच ते राजकारणात दीर्घ खेळी करू शकतील, की त्यांचा ‘चित्रपट’ लवकरच संपेल, हे ठरेल! तामिळनाडूलगतच्या केरळममध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटने मोठी आघाडी घेतली आहे. केरळममध्ये दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा असल्याने, गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटला यावेळी सत्ता गमवावी लागणे अपेक्षितच होते. सातत्याने अपयश चाखणाऱ्या काँग्रेसला केरळममधील यशाने थोडा दिलासा नक्कीच मिळेल. दक्षिणेतीलच पुडूचेरी या केंद्रशासित प्रदेशात भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सत्ता राखली आहे. गत लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवता न आल्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले होते; परंतु त्यानंतर महाराष्ट्र, बिहार, हरयाणा, दिल्ली आणि आतापश्चिम बंगाल, आसाम, पुडूचेरीतील निर्णायक विजयांनी ते मिटवले आहे. उत्तर व पश्चिम दिग्विजयानंतर बंगालमधील विजयामुळे भाजपचा पूर्व दिग्विजयही पूर्ण झाला आहे. आता त्या पक्षासाठी दक्षिण भारत हे एकमेव आव्हान शिल्लक आहे. हे निवडणूक निकाल म्हणजे केवळ राजकीय पक्षांचे जय-पराजय नाहीत. ते मतदाराच्या बदलत्या अपेक्षा-आकांक्षांचे आणि लोकशाहीच्या अखंड प्रवाहाचे द्योतक आहे. विजेते आणि पराभूतांनीही या कौलातून धडे घ्यावे! तोच लोकशाहीचा खरा संदेश आहे!
1 shares
😢
P
Pudhari
May 5, 2026, 12:54 AM
कोल्हापूर बँकेच्या संचालकांच्या खुल्या बैठका, कोणतीही गुप्त राजकीय चर्चा नाही-भाजप आमदार

कोल्हापूर बँकेच्या संचालकांच्या खुल्या बैठका, कोणतीही गुप्त राजकीय चर्चा नाही-भाजप आमदार

कोल्हापूर :आमदार सतेज पाटील व मी जिल्हा बँकेत संचालक आहोत. आमची कुठे ना कुठे तरी भेट होत असते. योगायोगाने एकमेकांना दिसतो, हसतो. या व्यतिरिक्त काहीही राजकीय नाही; पण बँकेच्या हिताचे निर्णय किंवा राजकारणात जिल्ह्याच्या हिताचे निर्णय असतील, त्यावेळी चर्चा करतो. बाकी आमच्या लपून छपून बैठका नाहीत, सर्व ओपन भेटी आहेत, असे भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी सांगितले.
17 shares
😐
L
Lokmat
May 5, 2026, 12:36 AM
अमेरिकेने इराणची युद्धनौका उद्ध्वस्त केली, क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर होरमुझची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी उघडली

अमेरिकेने इराणची युद्धनौका उद्ध्वस्त केली, क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर होरमुझची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी उघडली

दुबई :होर्मुजच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांवर हल्ले करणाऱ्याइराणच्यासहा युद्धनौकांना अमेरिकेने उद्ध्वस्त केले असून हा महत्त्वाचा जलमार्ग वाहतुकीसाठी खुला केल्याचा दावा केला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे कमांडर ॲडमिरल ब्रॅड कूपर यांनी माहिती दिली की, सुरक्षित वाहतुकीसाठी अमेरिकेच्या लष्कराने जगभरातील डझनभर जहाज कंपन्यांशी संपर्क साधून त्यांना या मार्गावरून वाहतूक करण्यास सांगितले आहे. वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून सोमवारी अमेरिकेने ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ ही मोहीम राबवण्यास सुरूवात केल्यानेइराणनेहल्ले सुरू केले आहेत. ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय” यूएईवर इराणचे हल्ले सोमवारी इराणने यूएईच्या फुजैराह येथील तेल केंद्रावर चार क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाले. या हल्ल्याने तेलकेंद्राला मोठी आग लागली आहे. चार पैकी तीन क्षेपणास्त्रे निकामी तर एक क्षेपणास्त्र समुद्रात पाडल्याचा दावा यूएईने केला आहे. या घटनेची माहिती भारत सरकारला देण्यात आली आहे. १५ हजार सैनिक आणि १०० विमानांची मदत घेत अमेरिकेने अडकलेल्या जहाजांच्या सुटकेसाठी ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ मोहीम सुरू केली आहे.
63 shares
😢
L
Lokmat
May 5, 2026, 12:28 AM
इतर राजकीय स्टार्टअपच्या यशाचे प्रतिबिंब, टीव्हीके पक्षाने केले उत्साहवर्धक पदार्पण

इतर राजकीय स्टार्टअपच्या यशाचे प्रतिबिंब, टीव्हीके पक्षाने केले उत्साहवर्धक पदार्पण

नवी दिल्ली :अभिनेता-राजकारणी विजयच्या टीव्हीके पक्षाने निवडणुकीच्या मैदानात केलेल्या जबरदस्त पदार्पणामुळे राजकीय 'स्टार्टअप्स' पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. यापैकी फारच कमी 'स्टार्टअप्स'ना अल्पावधीतच 'युनिकॉर्न' (अत्यंत यशस्वी) बनणे शक्य झाले आहे. ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय” तामिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) ने सरकार स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करताना, आम आदमी पार्टी, आसाम गण परिषद आणि तेलुगू देसम पार्टी यांसारख्या पक्षांच्या पावलावर पाऊल टाकले आहे. आपने २०१३ मधील आपल्या पहिल्या निवडणुकीनंतर काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले होते, तर एजीपीने १९८५ मध्ये, पक्षाच्या स्थापनेनंतर लगेचच, 'आसाम आंदोलना'शी संबंधित यशस्वी अपक्ष उमेदवारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले होते. टीडीपीने आपल्या स्थापनेच्या अवघ्या एका वर्षानंतर, १९८३ मध्ये आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत २०१ जागा जिंकत प्रचंड बहुमताने दणदणीत विजय मिळवला होता. तथापि, फारच कमी राजकीय 'स्टार्टअप्स'ना 'युनिकॉर्न' बनणे जमले आहे; काहींना यश मिळण्यास वेळ लागला, तर काही पक्ष छाप पाडण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय” अनेकांना का अपयश? अगदी गेल्याच वर्षी, 'जन सुराज' या पक्षाला दारुण अपयशाला सामोरे जावे लागले. एक उदाहरण म्हणजे अभिनेता-राजकारणी कमल हासन यांचा 'मक्कल निधी मय्यम' हा पक्ष, ज्याला २०२१ च्यातामिळनाडूविधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. बिहारमध्ये अनेक स्टार्टअप बिहारमध्ये अनेक छोटे 'स्टार्टअप' पक्ष कार्यरत आहेत; उदाहरणार्थ, पुष्पम प्रिया चौधरी यांच्या नेतृत्वात 'प्लुरल्स' पक्ष आहे. काही असेही छोटे पक्ष आहेत ज्यांच्या महत्त्वाकांक्षा मर्यादित आहेत आणि जे केवळ विशिष्ट भागांतच आपला प्रभाव टिकवून आहेत. यात जीतन राम मांझी यांचा 'हिंदुस्तानी आवाम मोर्चा (सेक्युलर)' आणि उपेंद्र कुशवाह यांचा 'राष्ट्रीय लोक मोर्चा' यांचा समावेश होतो. उत्तर प्रदेशमध्ये निषाद पक्ष, 'पीस पार्टी', 'अपना दल (सोनेलाल)' आणि 'सुहेलदेव भारतीय समाज पक्ष' यांसारखे पक्ष अस्तित्वात आहेत.
69 shares
😢
P
Pudhari
May 5, 2026, 12:22 AM
विभागीय बाबींवर विभागप्रमुखांनी निर्णय घ्यावा

विभागीय बाबींवर विभागप्रमुखांनी निर्णय घ्यावा

संबंधित विभागाशी निगडित असलेल्या विषयावर निर्णय हा विभागप्रमुखांनी घ्यावा. धोरणात्मक निर्णयाबाबत सर्वांशी विचारविनिमय करावा. पदाधिकाऱ्यांच्या अधिकारावर कुठेही गदा येवू नये यादृष्टीने अधिकाऱ्यांनी कामकाज करावे, असा शब्दात प्रिया शिंदे व राजू भोसले यांनी अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. ऋषिकेश धायगुडे यांनी सर्वांनी समन्वय ठेवून काम करावे. पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्याचे निराकरण प्रशासनाकडून होणे अपेक्षित असल्याचे सांगितले.
10 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 12:19 AM
पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भाजपचा दणदणीत विजय

पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भाजपचा दणदणीत विजय

चंद्रशेखर बर्वे लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री बनविल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पश्चिम बंगालची निवडणूक जिंकून आज आपले विजयाचे खाते उघडले. नबीन यांच्या नेतृत्वात पाच राज्यात निवडणूक लढली गेली. यात आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपला तर पुद्दुचेरीमध्ये रालोआला यश मिळाले आहे. एवढेच नव्हे तर, पश्चिम बंगालच्या विजयानंतर भाजपप्रणित रालोआशासित राज्यांची संख्या २२ वर पोहचली आहे. त्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय” बहुतांश ‘एक्झिट पोल’ ठरले निकालांच्या जवळपास जाणारे बहुतांश एक्झिट पोलचे अंदाज प. बंगाल, आसाम व केरळबाबत प्रत्यक्ष निकालाच्या जवळपास जाणारे ठरले. ॲक्सिस माय इंडियाचा टीव्हीकेबाबतचा अंदाज अचूक ठरला. त्यानुसार अभिनेता विजय यांचा पक्ष सर्वात मोठा ठरला. बहुतांश एक्झिट पोलने प. बंगाल, आसाममध्ये भाजप, तर केरळमध्ये यूडीएफच्या विजयाचा अंदाज वर्तवला होता. पीपल्स पल्सने बंगालमध्ये तृणमूल १७७ ते १८७, तर भाजप ९५ ते ११० जागा मिळवेल, असे म्हटले हेाते. जनमत पोल्सने तृणमूलला १९५ ते २०५ तर भाजपला ८० ते ९० जागा सांगितल्या होत्या. ‘टुडेज चाणक्य’ने बंगालमध्ये भाजपला १९२ आणि तृणमूलला १०० जागांचा अंदाज मांडला होता. भौगोलिक क्षेत्रफळ: भाजप:३४% इतर पक्ष:६०% लोकसंख्या: भाजप:२५% इतर पक्ष:७०% भौगोलिक क्षेत्रफळ: भाजप:७५% इतर पक्ष:२५% लोकसंख्या: भाजप:६९% इतर पक्ष:३१% भौगोलिक क्षेत्रफळ: भाजप:७२% इतर पक्ष:२२% लोकसंख्या: भाजप:७८% इतर पक्ष:२२%
39 shares
😊