Achira News Logo
Achira News
Lokmat logo
Lokmat
Feb 4, 2026, 04:32 AM
भारतीय शेअर बाजारात जोरदार सुरुवात, सुरुवातीच्या घसरणीनंतर पुन्हा उसळी

भारतीय शेअर बाजारात जोरदार सुरुवात, सुरुवातीच्या घसरणीनंतर पुन्हा उसळी

Share Market Today: कालच्या जबरदस्त तेजीनंतर, बुधवारी (४ फेब्रुवारी) देशांतर्गतशेअर बाजाराचीसुरुवात मोठ्या नफावसुलीनं झाली. बाजार उघडताच सेन्सेक्स ५०० अंकांनी आणि निफ्टी १२० अंकांनी घसरला होता. मात्र, त्यानंतर खालच्या स्तरावरून थोडी सुधारणा दिसून आली. सकाळी ९:३० वाजता सेन्सेक्स ८० अंकांच्या वाढीसह ८३,८०० च्या आसपास होता, तर निफ्टी ३२ अंकांच्या तेजीसह २५,७६५ वर व्यवहार करत होता. बँक निफ्टी २०९ अंकांच्या वाढीसह ६०,२४८ वर पोहोचला. आज आयटी (IT) इंडेक्समध्ये सुरुवातीलाच ५.७ टक्क्यांहून अधिक मोठी घसरण झाली. मीडिया, रियल्टी आणि मिड-स्मॉल हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्रीचा दबाव होता. दुसरीकडे ऑटो, मेटल, ऑइल अँड गॅस, कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि एफएमसीजी इंडेक्समध्ये खरेदी दिसून आली. निफ्टीवरील टॉप लूजर्स : HCL Tech, Infosys, TCS, Tech Mahindra, Wipro, Bajaj Finance, Bajaj Finserv आणि Kotak Mahindra Bank. निफ्टीवरील टॉप गेनर्स : ONGC, Coal India, M&M, Power Grid, Grasim, ITC आणि Tata Steel. आजच्या व्यवहारासाठी 'गिफ्ट निफ्टी'मधून (Gift Nifty) घसरणीचे संकेत मिळाले होते. काल अमेरिकन बाजारात आयटी क्षेत्रातील विक्रीमुळे घसरण पाहायला मिळाली. भारत-अमेरिका व्यापार कराराबाबतचे अपडेट, परकीयगुंतवणूकदारांचंपुनरागमन, अमेरिकन बाजारातील कमकुवतपणा, कमोडिटी बाजारातील तेजी आणि आरबीआयची धोरणात्मक बैठक हे सर्व घटक आज बाजाराची दिशा ठरवू शकतात.
63 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 2, 2026, 10:06 PM
इलेक्ट्राईड्सः पृथ्वीची रहस्ये उघडणे आणि मानवी प्रगतीला चालना देणे

इलेक्ट्राईड्सः पृथ्वीची रहस्ये उघडणे आणि मानवी प्रगतीला चालना देणे

शांघाय येथील ‘सेंटर फॉर हाय प्रेशर सायन्स अँड टेक्नॉलॉजी’चे भौतिकशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे सह-लेखक डक यंग किम म्हणतात की, ‘मूलद्रव्यांचे हे शोषण गेल्या दोन अब्ज वर्षांपासून हळूहळू होत असावे आणि आजही ते सुरू असू शकते.’ यामुळेच भूकंपाच्या लाटांचा अभ्यास करताना पृथ्वीच्या केंद्राची घनता ही केवळ धातूच्या अपेक्षेपेक्षा 5 ते 8 टक्क्यांनी कमी का भरते, याचा उलगडा होतो. केवळ पृथ्वीचे रहस्य उलगडण्यासाठीच नाही, तर मानवी प्रगतीसाठीही ‘इलेक्ट्राइडस्’ अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. खत निर्मिती: जपानमधील संशोधकांनी अमोनिया (खताचा मुख्य घटक) तयार करण्यासाठी एका इलेक्ट्राइडचा वापर केला आहे. यामुळे पारंपारिक पद्धतीपेक्षा 20% ऊर्जा वाचते.
17 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 1, 2026, 11:59 AM
उत्पादन आणि रोजगार वाढवण्यासाठी भारत बायोफार्मा नवोन्मेष उद्यानाची स्थापना करणार

उत्पादन आणि रोजगार वाढवण्यासाठी भारत बायोफार्मा नवोन्मेष उद्यानाची स्थापना करणार

बायोफार्मा क्षेत्रातील जागतिक दर्जाचे 'इनोव्हेशन पार्क' निर्माण करण्यासाठी या निधीचा वापर होणार आहे. या उपक्रमामुळे देशांतर्गत उत्पादन, निर्यात आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.
64 shares
😊
Lokmat logo
Lokmat
Feb 1, 2026, 07:17 AM
अर्थसंकल्प 2026: करवाढीच्या घोषणांमुळे शेअर बाजारात घसरण

अर्थसंकल्प 2026: करवाढीच्या घोषणांमुळे शेअर बाजारात घसरण

Budget 2026 Impact On Share Market: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेत २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यादरम्यान त्यांनी फ्युचर अँड ऑप्शनवर कर वाढवण्याची घोषणा केली. यानंतरशेअर बाजारजोरदार आपटल्याचा पाहायला मिळाला. यादरम्यानशेअर बाजारात१५०० अंकांपेक्षा अधिक घसरण झाली. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी शेअर बायबॅकवर आता कॅपिटल गेन टॅक्स लागू होणार असल्याचं म्हटलं. तसंच फ्युचर्स ट्रेडिंगवरील एसटीटी ०.०२ टक्क्यांवरुन ०.०५% पर्यंत वाढवण्यात आला असल्याची घोषणा अर्थमंत्रीनिर्मला सीतारामनयांनी केली. यानंतर शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १५०० अंकांपर्यंत घसरुन ८०,७५० च्या जवळ आला होता. तर निफ्टीमध्ये ४५० अंकांची घसरण झाली असून तो २४,८६० च्या जवळ आला होता. केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ लाईव्ह अपडेट्स इथे पहा. इंडिया सेमीकंडक्टर मिशन २.० : देशाला चिप निर्मितीचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी 'ISM 2.0' लाँच. संशोधन आणि प्रशिक्षणावर विशेष भर. यासाठी ४०,००० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. SME ग्रोथ फंड : लघू आणि मध्यम उद्योगांना बळ देण्यासाठी १०,००० कोटी रुपयांचा विशेष निधी. ७ नवीन हाय-स्पीड रेल कॉरिडोर : मुंबई-पुणे, पुणे-हैदराबादसह ७ मार्गांवर बुलेट ट्रेनसारख्या वेगवान प्रवासाचे जाळे विणणार. नवा फ्रेट कॉरिडोर आणि जलमार्ग : दानकुनी ते सुरत नवा मालवाहू मार्ग आणि देशात २० नवीन अंतर्देशीय जलमार्ग (उदा. ओडिशात NW-5). रेअर-अर्थ कॉरिडोर : ओडिसा, केरळ, आंध्र आणि तामिळनाडूमध्ये दुर्मिळ खनिजांच्या उत्पादनासाठी विशेष कॉरिडोर. हायटेक टूल रूम आणि माइनिंग कॉरिडोर : अत्याधुनिक टूल रूमसह केरळ-तामिळनाडूमध्ये औद्योगिक विकासासाठी माइनिंग कॉरिडोर. एआय स्टँडिंग कमिटी : कृत्रिम बुद्धिमत्तेचा रोजगारावर होणारा परिणाम तपासण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना. ३ नवीन 'एम्स' : देशातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तीन नवीन एम्स संस्थांची घोषणा. बायोफॉर्मा शक्ति मिशन : बायोफार्मा क्षमता वाढवण्यासाठी १०,००० कोटींची तरतूद. NIMHANS 2.0 : उत्तर भारतात मानसिक आरोग्यासाठी प्रमुख संस्था स्थापन करणार. आयुष सेक्टरचे आधुनिकीकरण : आयुष फार्मसी आणि प्रयोगशाळांचे अपग्रेडेशन; जामनगरमधील WHO केंद्राचा कायाकल्प. प्रत्येक जिल्ह्यात 'गर्ल्स हॉस्टेल' : विद्यार्थिनींच्या सुरक्षित निवासासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वसतिगृह. लखपती दीदी विस्तार : महिलांना केवळ मदत नाही, तर उद्योजक बनवण्यासाठी क्रेडिट-लिंक्ड सुविधा आणि कम्युनिटी रिटेल आऊटलेट्स. मत्स्य पालन विकास : ५०० जलाशयांचा विकास करून मच्छीमारांना थेट बाजारपेठेशी जोडणार. वस्त्रोद्योग कार्यक्रम : खादी आणि हस्तशिल्पासाठी 'महात्मा गांधी ग्राम स्वराज' आणि 'समर्थ २.०' मिशन. नॅशनल फायबर योजना : न्यू ऐज फायबर आणि वस्त्रोद्योगात आत्मनिर्भरतेसाठी नवीन धोरण. AVGC कंटेंट लॅब्स : ॲनिमेशन आणि गेमिंग क्षेत्रासाठी १५,००० शाळा आणि ५०० कॉलेजांमध्ये अत्याधुनिक लॅब्स. बौद्ध सर्किट : ईशान्येकडील ६ राज्यांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी बौद्ध सर्किटचा विकास. नवा इन्कम टॅक्स ॲक्ट : १ एप्रिलपासून देशात नवीन प्राप्तिकर कायदा लागू होणार. NRI मालमत्ता विक्री सुलभ : अनिवासी भारतीयांच्या मालमत्ता विक्रीवर टीडीएस भरणे सोपे; आता 'TAN' ची गरज उरणार नाही. बँकिंग सुधारणा समिती : बँकांची नफाक्षमता आणि मालमत्ता गुणवत्ता सुधारण्यासाठी उच्चस्तरीय समितीचा रोडमॅप.
53 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 1, 2026, 06:19 AM
भारताचा नववा केंद्रीय अर्थसंकल्पः अर्थव्यवस्थेला चालना आणि चीनवरील अवलंबित्व कमी करणे

भारताचा नववा केंद्रीय अर्थसंकल्पः अर्थव्यवस्थेला चालना आणि चीनवरील अवलंबित्व कमी करणे

Union Budget :2026 च्या अर्थसंकल्पासाठी आज देशाचे संसदेकडे लक्ष लागून आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांचे नववे अर्थसंकल्प सादर करत असून अर्थमंत्री निर्मला सीतारामनने यांनी अर्थसंकल्पात सेमीकंडक्टर आणि रेअर अर्थबाबत मोठी घोषणा केली ज्यामुळे चीनवरील अवलंबित्व कमी होऊ शकेल.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीसंसदेत अर्थसंकल्पीय भाषणसुरू करताच सर्वांचे लक्ष देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दिशेकडे वळले. 2026 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी अशा अनेक घोषणा केल्या ज्या सामान्य माणसापासून ते उद्योग, स्टार्टअप्स, एमएसएमई आणि पायाभूत सुविधा क्षेत्रापर्यंत सर्वांवर थेट परिणाम करतील.Gold-Silver Budget 2026: बजेटआधी आनंदवार्ता! नफावसुलीला आला जोर, ऐतिहासिक उंचीवरील सोने-चांदीच्या दरात भूकंप; ETF गुंतवणूकदारांची पंचाईतसेमीकंडक्टर-रेअर अर्थबद्दल अर्थमंत्र्यांची घोषणाअर्थसंकल्पात एक महत्त्वाची घोषणा अर्थमंत्र्यांनी म्हटले की ईएमएस पीएलआय 40000 कोटींपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. याशिवाय तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये दुर्मिळ पृथ्वी खनिजांसाठी कॉरिडॉर बांधले जातील. तसेच 40000 कोटींची तरतूद केली गेली आहे, ज्यामुळे चीनवरील अवलंबित्व कमी होईल. सेमीकंडक्टरबाबत एका मोठ्या घोषणेनंतर डिक्सन टेक, सीजी पॉवर आणि इतर चिपमेकर्सच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांपर्यंत वाढ झाली.त्याचवेळी, भारताला जागतिक बायोफार्मास्युटिकल उत्पादन केंद्र बनवण्यासाठी बायोफार्मा शक्ती योजना सुरू केली जात आहे. इंडिया सेमीकंडक्टर मिशन (ISM) 2.0 लवकरच सुरू केले जाईल. सेमीकंडक्टर क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादन योजनेचा खर्च रु. 40,000 कोटींपर्यंत वाढवण्याची बजेटमध्ये घोषणा केली गेली. ओडिशा, केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये समर्पित दुर्मिळ पृथ्वी कॉरिडॉर सुरु केले जाणार आहेत.Silver Crash on MCX: सर्वात बाजारात सर्वात मोठी घसरण, फुगा फुटला! ‘हा तर ट्रेलर पिक्चर अभी बाकी...’ चांदीचा ‘महा क्रॅश’ अजून बाकी आहेसेमीकंडक्टरसाठी अर्थमंत्र्यांची घोषणानिर्मलाताईंनी तंत्रज्ञान क्षेत्राला मोठी भेट दिली आणि सेमीकंडक्टर मिशन 2.0 ची घोषणा केली. यंदाच्या अर्थसंकल्पाकडून तंत्रज्ञान क्षेत्राला मोठ्या आशा होत्या आणि अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान, सरकार देशातील सेमीकंडक्टर क्षेत्राला बळकटी देण्यावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले.अर्थमंत्र्यांनी घोषणा केली की सेमीकंडक्टर उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि संपूर्ण पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी सेमीकंडक्टर मिशन 2.0 सुरू केले जाईल. चिप उत्पादनात भारताला स्वावलंबी बनवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
10 shares
😊
Pudhari logo
Pudhari
Feb 1, 2026, 06:12 AM
केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27: भारताला विकसित देशाचा दर्जा देण्याचे उद्दिष्ट

केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27: भारताला विकसित देशाचा दर्जा देण्याचे उद्दिष्ट

2026 -27 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, "आम्ही इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 सुरू करणार आहोत. नवीन तंत्रज्ञान उत्पादन प्रणालींमध्ये बदल घडत आहेत, तर पाणी, ऊर्जा आणि महत्त्वपूर्ण खनिजांची मागणी वेगाने वाढत आहे. भारत आत्मविश्वासाने विकसित भारताकडे वाटचाल करत राहील.
39 shares
😊
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 1, 2026, 12:30 AM
स्मार्टफोन टिपाः सोप्या उपायांसह तुमच्या फोनचे आयुष्य वाढवा

स्मार्टफोन टिपाः सोप्या उपायांसह तुमच्या फोनचे आयुष्य वाढवा

Smartphone Tips :आज आम्ही तुम्हाला स्मार्ट फोन चे लाईफ कसे वाढवता येईल, याविषयीची माहिती देणार आहोत. अनावश्यक अ‍ॅप्स काढून टाकल्याने फोनची गती आणि कार्यक्षमता देखील सुधारते. या पद्धती आपला फोन दीर्घ काळापर्यंत सहजतेने चालण्यास मदत करतील यासह अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या तुमच्या फोनची लाईफ लाढवू शकतात. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.फोनचे लाईफ आणखी वाढवायचे?आयफोन असो किंवा अँड्रॉइड स्मार्टफोन, काही काळानंतर त्यांची टिकाऊपणा आणि प्रक्रिया क्षमता कमी होऊ लागते. जर तुम्हालाही तुमच्या मौल्यवान फोनचे लाईफ आणखी वाढवायचे असेल तर सॉफ्टवेअर अपडेट केले पाहिजे. बॅटरी बदलणे आणि रीसेटकरणे यासारख्या उपायांद्वारेफोनचे लाईफ देखील वाढवले जाऊ शकते.जर तुमचा स्मार्टफोन स्लो झाला असेल आणि तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे.ऑपरेटिंग सिस्टम आणि अ‍ॅप्स अपडेट्स ठेवास्मार्टफोन वेळोवेळी अपडेटची सूचना देत असतात. अशा परिस्थितीत, आपणनवीन फीचर्स जोडण्यासाठीआणि फोनचे संरक्षण करण्यासाठी ओएस आणि विद्यमान अ‍ॅप्स अपडेट करत राहिले पाहिजे. यामुळे फोनचे लाईफ वाढते.केवळ विश्वसनीय स्टोअरमधूनच अ‍ॅप्स डाउनलोड कराजर तुम्हाला एखादा नवीन गेम किंवा इतर कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करायचे असेल तर ते केवळ Google Play Store किंवा Appleपल अ‍ॅप स्टोअर सारख्या विश्वसनीय अ‍ॅप स्टोअरवरून डाउनलोड करा जेणेकरून फोनमध्ये व्हायरस राहणार नाही.बॅटरी बदला, फोन नाहीबऱ्याच वेळा स्मार्टफोन हळू चालणे किंवा कालांतराने लटकणे सुरू होते. अशा परिस्थितीत बॅटरीचे आरोग्य तपासणे गरजेचे आहे. काही वेळा बॅटरी बदलूनच समस्या सुटते.फोनची फॅक्टरी रीसेट करातुमच्या फोनमध्ये त्रुटी येऊ लागली किंवा फोन हँक होऊ लागला तर तो रीसेट करावा लागेल. अशा परिस्थितीत, प्रथम फोनचा बॅकअप घ्या आणि नंतर फॅक्टरी रीसेट करा. यामुळे फोन बराच काळ कोणत्याही त्रासविना चालू राहील.अनावश्यक अ‍ॅप्स डिलीट कराबऱ्याच वेळा फोनमध्ये असे अनेक अ‍ॅप्स असतात जे आपण जास्त काळ वापरत नाही आणि त्यांच्यामुळे फोनची गती कमी होऊ लागते. असे अ‍ॅप्स हटवले पाहिजेत जेणेकरून फोनचे स्टोरेज आणि रॅम दोन्ही रिकामे राहतील.
20 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Jan 31, 2026, 11:43 PM
शक्तीमान स्वयं-चालित ऊस कापणी यंत्रः लाभांपेक्षा अधिक धोके उघड

शक्तीमान स्वयं-चालित ऊस कापणी यंत्रः लाभांपेक्षा अधिक धोके उघड

आजारापेक्षा उपायच भयंकर भारत सरकारच्या बुधनी (मध्य प्रदेश) येथे असलेल्या केंद्रीय कृषी मशिनरी प्रशिक्षण आणि परीक्षण संस्थेने शक्तिमान सेल्फ प्रोपेल्ड शुगरकेन हार्वेस्टर या मॉडेलद्वारे झालेल्या ऊस तोडणीचा अभ्यास करून हा अहवाल याआधीच जाहीर केला आहे. यामुळे तोडणी यंत्राद्वारे उसाची तोड करणे कितपत सोयीस्कर आणि फायद्याचे, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. तोडणी मजुरांकडून होणाऱ्या ऊस तोडीसाठीच्या अडवणुकीला वैतागून अनेक ऊस उत्पादक तोडणी यंत्राद्वारे ऊस तोडणीस प्राधान्य देत आहेत. मात्र हा उपाय आजारापेक्षा भयंकर ठरत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
13 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Jan 31, 2026, 11:31 PM
दुखापतीला हृदयाचा आश्चर्यकारक प्रतिसादः नवीन स्नायू पेशी तयार करणे

दुखापतीला हृदयाचा आश्चर्यकारक प्रतिसादः नवीन स्नायू पेशी तयार करणे

जेव्हा हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो, तेव्हा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हृदयाच्या पेशी मरू लागतात. आतापर्यंत असे मानले जात होते की, या नुकसानीची भरपाई करण्यासाठी शरीर केवळ ‘स्कार टिशू’ (एक प्रकारचा कडक डाग) तयार करते. हे स्कार टिशू हृदयाच्या सामान्य स्नायूंप्रमाणे लवचिक नसतात. त्यामुळे हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता कमी होते आणि भविष्यात ‘हार्ट फेलियर’चा धोका वाढतो. कार्डियोलॉजिस्ट डॉ. रॉबर्ट ह्यूम आणि त्यांच्या टीमला या संशोधनात असे आढळले की, मानवी हृदय केवळ स्कार टिशूच बनवत नाही, तर नवीन स्नायू पेशीही निर्माण करते.
12 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Jan 29, 2026, 04:04 PM
बिबट्या-मानव संघर्ष रोखण्यासाठी भारताच्या वन विभागाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारी सायरन प्रणाली तैनात केली

बिबट्या-मानव संघर्ष रोखण्यासाठी भारताच्या वन विभागाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारी सायरन प्रणाली तैनात केली

अनिकेत यादव, अहिल्यानगर:बिबट्या–मानव संघर्ष रोखण्यासाठी वनविभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केला असून, अहिल्यानगर येथे एआय वाईल्ड नेत्र ही अत्याधुनिक सौरऊर्जेवर चालणारी सायरन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. बिबट्याची हालचाल कॅमेर्‍यात कैद होताच ही प्रणाली तात्काळ सक्रिय होऊन मोठ्या आवाजातील सायरनद्वारे नागरिकांना धोक्याचा इशारा देणार आहे. वनविभागाच्या सहकार्याने दादा रिसर्च फाउंडेशन संचलित दावेल लाईफ सायन्स कंपनीने विकसित केलेल्या या प्रणालीत अ‍ॅडव्हान्स कॉम्प्युटर व्हिजन आणि डीप लर्निंग आधारित एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. बिबट्याचा स्वतंत्र डेटाबेस फीड करण्यात आल्याने कॅमेर्‍यासमोर बिबट्या येताच यंत्रणा आपोआप सायरन वाजवते.एआय प्रणालीमुळे बिबट्यांच्या हालचाली, वेळ व वावराचा परिसर याची अचूक माहिती वनविभागाला मिळणारविशेष म्हणजे ही यंत्रणा कोणत्याही मोबाईल नेटवर्कशिवाय कार्यरत राहते. सौरऊर्जेवर चालणारी ही प्रणाली ग्रामीण व जंगलालगतच्या भागांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सायरनच्या इशाऱ्यामुळे नागरिक घराबाहेर जाणे टाळू शकतात, जनावरे व लहान मुलांची योग्य काळजी घेणे शक्य होणार आहे. बिबट्या–मानव संघर्ष टाळण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून वनविभागाला तातडीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याच निधीतून हा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात आला आहे.या एआय प्रणालीमुळे बिबट्यांच्या हालचाली, वेळ व वावराचा परिसर याची अचूक माहिती वनविभागाला मिळणार असून, भविष्यात संघर्ष व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल, असा विश्वास उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी व्यक्त केला आहे.Dhananjay Munde: 'नियती इतकी क्रूर कशी असू शकते?'; अजित पवारांच्या पार्थिवासमोर धनंजय मुंडेंचा अखेरचा दंडवतएआय वाईल्ड नेत्र प्रणाली360 अंश कॅमेरा कव्हरेज, सुमारे 200 मीटरपर्यंत रेंज राहणार आहे.सायरनचा आवाज तब्बल 2 किलोमीटरपर्यंत ऐकू जाणार. या प्रणालीत अ‍ॅडव्हान्स कॉम्प्युटर व्हिजन आणि डीप लर्निंग या अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, बिबट्यांचा स्वतंत्र डेटाबेस कॅमेऱ्यात फीड करण्यात आला आहे. त्यामुळे कॅमेऱ्यासमोर बिबट्या आल्याचे ओळखताच ही यंत्रणा आपोआप सक्रिय होते आणि मोठ्या आवाजातील सायरनद्वारे गावकऱ्यांना धोक्याचा इशारा या सायरांमुळे मिळणार आहे तसेच 360 अंश कॅमेरा कव्हरेज, सुमारे200मीटरपर्यंत रेंज राहणार आहे.सायरनचा आवाज तब्बल 2 किलोमीटरपर्यंत ऐकू जाणारबिबट्या दिसल्यानंतर किमान 2 मिनिटांत सायरन सक्रिय होत असून दोन तासानंतर पुन्हा एकदा रिमाइंडर देत गावकऱ्यांनासावधकरणार आहे.
87 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Jan 16, 2026, 03:07 PM
बिग बॉस मराठी 6: स्पर्धकांनी घराच्या मर्यादेत तणावपूर्ण कामांमध्ये भाग घेतला

बिग बॉस मराठी 6: स्पर्धकांनी घराच्या मर्यादेत तणावपूर्ण कामांमध्ये भाग घेतला

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस’च्या घरात टास्कदरम्यान भांडणे होताना दिसतात. अनेकदा स्पर्धक एकमेकांच्या अंगावरही धावून जातात. काही वेळा अपशब्दांचा वापर होतो. तर काही वेळा एकमेकांचा अपमान केला जातो. मात्र या सगळ्यात टास्क गमतीशीर पद्धतीने खेळला गेला तर? सध्या सगळीकडे बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची चर्चा होताना दिसत आहे. स्पर्धकांच्या खेळावर प्रेक्षकांसह कलाकारांच्या प्रतिक्रियादेखील उमटत आहेत. तन्वी कोलते आणि सागर कारंडे यांच्यात झालेल्या वादानंतर अनेकजण तन्वीच्या खेळाबद्दल बोलताना दिसत आहेत. आता या सगळ्यात बिग बॉस मराठीचा असा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जो सर्वांना खळखळून हसवताना दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात पहिला कॅप्टन कोण होणार, अशी सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या कॅप्टन्सीसाठी घरात बी बी फार्म हा टास्क सुरू आहे. कलर्स मराठी वाहिनीने सोशल मीडियावर बिग बॉस मराठीचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये टास्क सुरू असल्याचे दिसते. या प्रोमोमध्ये प्रभू शेळके आणि राकेश बापट लक्ष वेधून घेत आहे. प्रभू आणि राकेश यांच्यात चुरस दिसून येत आहे. तसेच प्रभू राकेशला सापडत नसल्याचे दिसत आहे. तो प्रभूच्या मागे पळत असल्याचे पाहायला मिळत आहेत. मात्र, त्यांच्यात वादावादी, भांडणे दिसत नसून ते हसत असल्याचे दिसत आहेत. इतकेच नाही तर घरातील इतर स्पर्धकही हसत असल्याचेदेखील दिसत आहे. हा प्रोमो शेअर करताना कलर्स मराठी वाहिनीने, “टास्कमध्ये छोट्या डॉनने पळवलं राकेशच्या तोंडचं पाणी”, अशी कॅप्शन दिली आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. तर अनेकांनी असे लिहिले आहे की विनाकारण भांडण्यापेक्षा हे छान आहे. तर काहींनी प्रभू आणि राकेशचे कौतुक केले आहे. आता हा टास्क कोण जिंकणार, बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचा पहिला कॅप्टन कोण बनणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याबरोबरच बिग बॉसच्या या पर्वातील समीकरणे कशी बदलणार, नेमकं काय घडणार, कोणते स्पर्धक कोणाचे मित्र होणार आणि कोणामध्ये शत्रुत्व निर्माण होणार, हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, आठवड्याच्या शेवटी भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख कोणत्या स्पर्धकांची शाळा घेणार, नेमकं काय पाहायला मिळणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
88 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Jan 8, 2026, 03:54 PM
एलन मस्कने मुलाचे नाव नोबेल पारितोषिक विजेते खगोलभौतिकशास्त्रज्ञ आणि लॉर्ड ऑफ द रिंग्ज नायक यांच्या नावावरून ठेवले

एलन मस्कने मुलाचे नाव नोबेल पारितोषिक विजेते खगोलभौतिकशास्त्रज्ञ आणि लॉर्ड ऑफ द रिंग्ज नायक यांच्या नावावरून ठेवले

मस्क यांच्या मुलाच्या नावातील ‘सेखर’ हा भाग विशेष चर्चेत आहे. हे नाव प्रसिद्ध भारतीय-अमेरिकन खगोल-भौतिकशास्त्रज्ञ डॉ. सुब्रह्मण्यन चंद्रशेखर यांना समर्पित आहे. चंद्रशेखर हे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ होते. तार्‍यांची निर्मिती, रचना आणि आयुष्य यावर त्यांनी केलेले संशोधन विज्ञानाच्या इतिहासात मैलाचा दगड मानले जाते. तर ‘स्ट्रायडर’ हे नाव प्रसिद्ध ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ कादंबरीतील नायक अरागॉर्न (स्ट्रायडर) यावरून घेतले आहे. अशा प्रकारे मस्कने काल्पनिक साहित्य आणि वास्तवातील विज्ञान यांचा अनोखा संगम आपल्या मुलाच्या नावात केला आहे.
32 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Dec 3, 2025, 04:28 PM
महाविद्यालयीन प्रकल्पापासून जागतिक प्रभावापर्यंतः एका तरुण अभियंत्याच्या फवारणी यंत्राची प्रेरणादायी कथा

महाविद्यालयीन प्रकल्पापासून जागतिक प्रभावापर्यंतः एका तरुण अभियंत्याच्या फवारणी यंत्राची प्रेरणादायी कथा

Pune : मराठवाड्यातील एक तरूण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना प्रोजेक्ट म्हणून एक फवारणी यंत्र बनवतो, महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये या प्रोजेक्टला बक्षिसं मिळतात, पुढे याच प्रोजक्टचं प्रोडक्ट बनतं अन् हे प्रोडक्ट मराठवाड्यातील एका तरूणाला बिल गेट्स पर्यंत नेऊन पोहोचवतं. त्याने बनवलेलं, शेतकऱ्यांना कमीत कमी कष्टामध्ये पाठीवर वजन न घेता फवारणी करता येणारं यंत्र अनेकांना फायद्याचं ठरतं आणि याच यंत्राच्या विक्रीतून हा तरूण सध्या वर्षाकाठी ३ कोटींची उलाढाल करतो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चित्तेपिंपळगाव येथील योगेश गावंडे या तरूणाची ही यशोगाथा. छत्रपती संभाजीनगर येथे इंजिनिअरिंग करताना योगेश यांनी बरेच प्रयोग केले. त्यातच गावातील चुलतभावाला फवारणी करताना झालेली विषबाधा आणि त्यातून सुचलेले कल्पनेतून योगेश यांच्या जुगाडू फवारणी यंत्राचा शोध लागला. शेतकऱ्यांना शेतात काम करताना होणारा त्रास कमी व्हावा आणि महिलांनाही फवारणी करता यावी यासाठी चाकं आणि टाकी असलेलं ढकलत पुढे जाणारं फवारणी यंत्र तयार केलं. हे जुगाडू यंत्र महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये ठेवलं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. कॉलेजमध्ये या यंत्राला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी ते विकायचं ठरवलं आणि सोलापूर रस्त्यावर असलेल्या आडूळ या गावी त्याला विक्रीसाठी ठेवलं. तिथे हजारो लोकांनी ते यंत्र पाहिलं पण विकत घ्यायला कुणीच तयार नव्हतं. त्यानंतर बीडच्या दिशेने जाणाऱ्या एका व्यक्तीने या यंत्राची खरेदी केली. पहिले यंत्र तयार करण्यासाठी ३ हजार ८०० रूपये खर्च आला होता पण त्याची विक्री ३ हजार २०० रूपयांत केली. पुन्हा त्याच व्यक्तीने आणखी फवारणी यंत्राची ऑर्डर दिली. हा अनुभव त्यांच्यासाठी मोलाचा ठरला आणि तिथून त्याच्या व्यवसायाने झेप घेतली. या व्यवसायामध्ये योगेशला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेले. मार्गदर्शन मिलिंद कंद सर यांनी याच यंत्रावर काम करण्यासाठी त्यांच्या कंपनीत योगेशला पगारी नोकरी दिली आणि योगेशने झपाटून यावर काम करायला सुरूवात केली. प्रोडक्ट डेव्हलपमेंटवर काम केल्यानंतर हाताने ढकलता येणाऱ्या या यंत्रामध्ये मशीनचा वापर केला गेला आणि फवारणी अजून सोपी होत गेली. फवारणीसोबतच कोळपणी, वखरणी हे कामही या यंत्राद्वारे करता येतील अशी सोय करण्यात आली आणि एका यंत्रापासून सुरू झालेला प्रवास हे ५ ते ६ यंत्रापर्यंत पोहोचला. साधारण जुलै २०१९ मध्ये योगेशने व्यावसायिक पद्धतीने मशीन बनवायला सुरूवात केली. तेव्हापासून मार्च २०२० या काळामध्ये योगेश आणि त्याच्या टीमने ५०० पेक्षा जास्त यंत्राची विक्री केली. यातून जवळपास २० लाख ९६ हजारांची उलाढाल त्याने केली. आत्तापर्यंत योगेशने रशिया, केनिया, नायजेरिया, मोझांबिक, जांबिया आणि न्युझीलंड या देशामध्ये यंत्राची निर्यात केली असून भारतातही उत्तरप्रदेश, ओडिसा, बिहार, झारखंड आणि इतर राज्यांत त्याचे यंत्र पोहोचले आहेत. संस्थांकडून वेळोवेळी मार्गदर्शन भारतीय युवा शक्ती ट्रस्ट आणि मॅजिक या संस्थेने योगेशच्या सुरूवातीच्या काळात मदत केली. लोन मिळण्यासाठी आणि कॉलेजच्या प्रोजेक्टला प्रोडक्ट बनवण्यापासून मार्केटपर्यंत नेण्यापर्यंत मॅजिक संस्थेने मदत केली. त्यानंतर सोशल अल्फा या संस्थेनेही मोठी मदत केल्याचं तो सांगतो. बिल गेट्स यांच्यापर्यंत कसा पोहोचला? सोशल अल्फा आणि बिल अँड मिलेंडा गेट्स फाऊंडेशन यांच्या इंडिया अॅग्रिटेक इन्क्युबेशन या प्रोग्रॅम अंतर्गत योगेशला ओडिसा, उत्तरप्रदेश, झारखंड, बिहार यांसारख्या राज्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली. योगेशने बनवलेले स्प्रेयर हे वुमन फ्रेंडली म्हणजे महिलांना चालवण्यासाठी सोपे असल्यामुळे त्याला ही संधी मिळाली आणि या राज्यामध्ये महिलांना स्प्रेयर आणि इतर कृषी यंत्र सहज कसे वापरता येतील यावर काम करायला मिळालं. या राज्यात जवळपास ४०० ते ५०० मशीन विक्री केले आणि त्या मशीनचा झालेला इम्पॅक्ट पाहून बिल गेट्स यांना भेटण्याची संधी मिळाली आणि योगेशच्या कामाबद्दल त्यांनी कौतुकही केलं. वर्षाकाठी ३ कोटींची उलाढाल शेतकरी महिलांना चालवायला सोपे असल्यामुळे या यंत्राला मोठी मागणी असून मागील ६ वर्षांत योगेशने जवळपास ८ हजार यंत्रांची विक्री केली आहे. वेगवेगळ्या २२ राज्यांमध्ये योगेशने तयार केलेले मशीन पोहोचले असून ५ ते ६ देशांमध्ये निर्यातही केली आहे. सध्या या यंत्रातून तो जवळपास ३ कोटींची वार्षिक उलाढाल करत आहे. मराठवाड्यातील तरूणांसाठी योगेशचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे.
4 shares
😊
Lokmat logo
Lokmat
Dec 3, 2025, 02:52 PM
हिंजवडी आय. टी. पार्क आणि पिंपरी-चिंचवाडमध्ये अपघाताचे प्रमाण वाढलेः चिंता वाढली

हिंजवडी आय. टी. पार्क आणि पिंपरी-चिंचवाडमध्ये अपघाताचे प्रमाण वाढलेः चिंता वाढली

पिंपरी : डंपर, हायवा, सिमेंट मिक्सर ट्रकसारख्या जड-अवजड वाहनांच्या बेफाम वेगामुळे शहरात सातत्याने भीषण अपघात होत आहेत. याला आळा घालण्यासाठी अवजड वाहनांच्या वेगमर्यादेला लगाम घालण्यात आला आहे. यातपिंपरी-चिंचवडपोलिस आयुक्तालय हद्दीतील महामार्ग वगळून सेवारस्ते व सर्व अंतर्गत रस्त्यांवर अवजड वाहनांसाठी प्रतितास ३० किलोमीटर वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडवाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबत मंगळवारी (दि. २ डिसेंबर) आदेश दिले आहेत. बुधवारपासून (दि. ३ डिसेंबर) हा आदेश लागू करण्यात आला आहे. हिंजवडी आयटी पार्क, एमआयडीसी आणि पिंपरी-चिंचवड शहरातील अपघातांची संख्या वाढत आहे. यात अनेकांचा मृत्यू होत आहे. गेल्या तीन वर्षांतील अपघातातील मृतांच्या आकडेवारीने चिंता व्यक्त केली जात आहे. वारंवार होणारे अपघात, वाढता जीवितहानीचा धोका आणि त्यातून निर्माण होणारा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन वाहतूक विभागाकडून वेगमर्यादा निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या हद्दीतील महामार्ग वगळता महामार्गांचे सेवारस्ते आणि शहरातील सर्व अंतर्गत रस्त्यांवर डंपर, हायवा, सिमेट मिक्सर ट्रक आणि इतर सर्व जड-अवजड वाहनांना फक्त ३० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहतूक करण्याची सक्ती करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने, पोलिस वाहने आणि इतर अधिकृत अत्यावश्यक सेवा यांना यातून सवलत देण्यात आली आहे.
32 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Nov 30, 2025, 03:19 PM
विमानतळ सुरक्षा चाचणी शर्यतीत सी. आय. एस. एफ. चमकले

विमानतळ सुरक्षा चाचणी शर्यतीत सी. आय. एस. एफ. चमकले

CISF आणि विविध विभागांची टीम सज्ज विमानतळावरील सुरक्षेची धुरा हाती असलेल्या CISF दलाने सुरक्षा तपासणीत आपली उत्कृष्ट कार्यक्षमता पुन्हा अधोरेखित केली. प्रवासी तपासणी, सामान स्कॅनिंग आणि नियंत्रण कक्षातील प्रतिसाद प्रणालींची देखील तपासणी करण्यात आली. दरम्यान विमानतळ विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या L&T सह NMIAL च्या सर्व विभागांनी समन्वयातून ही चाचणी गतीमान आणि यशस्वी केली. विमानतळावरील सर्व सेवा विभाग, कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी या उपक्रमात सहभागी होत विमानतळाच्या प्रत्यक्ष ऑपरेशन्सची तयारी सिद्ध केली.
93 shares
😊
Lokmat logo
Lokmat
Nov 24, 2025, 02:55 PM
रब्बी हंगामासाठी आय. सी. ए. आर. चे प्रमुख वाटाण्याचे प्रकारः कमी दिवसाचे, कमी पाण्याचे पर्याय वापरून तुमचे उत्पन्न वाढवा

रब्बी हंगामासाठी आय. सी. ए. आर. चे प्रमुख वाटाण्याचे प्रकारः कमी दिवसाचे, कमी पाण्याचे पर्याय वापरून तुमचे उत्पन्न वाढवा

Vatana Veriety :रब्बी हंगामातीलपेरण्याची लगबग सुरु आहे. हरभऱ्यासोबत वाटाणा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. वाटाण्याला देखील वर्षभर मागणी असते. यंदाच्या हंगामात वाटाण्याच्या या तीन जाती चांगलं उत्पादन देतील. कमी दिवसाच्या, कमी पाण्यात असलेल्या या जाती फायदेशीर ठरतील. जर तुम्ही वाटाणे लागवड करण्याचा विचार करत असाल, तर आयसीएआरने विकसित केलेल्या वाटाण्याच्या या तीन शीर्ष जाती - व्ही.एल. माधुरी, व्ही.एल. सब्जी मटर-१५ आणि पुसा थ्री - हे उत्तम पर्याय आहेत. व्ही.एल. माधुरीव्ही.एल. माधुरी ही वाटाण्याच्या नवीन जातीची आहे जी सालाशिवाय खाण्यायोग्य असल्याचा अनोखा फायदा देते.रब्बी हंगामातपेरणीसाठी ही उत्तम आहे आणि बाजारात चांगली किंमत मिळू शकते. वैशिष्ट्ये नोव्हेंबरमध्ये पेरणी केल्यास, ही जात १२२ ते १२६ दिवसांत परिपक्व होते.शेतकरी प्रति हेक्टर १३ टनांपर्यंत पीक घेऊ शकतात.ही जात मर रोगास प्रतिरोधक आहे.केळीची फुले कर्करोगाच्या उपचारांसाठी, नवीन संशोधनासाठी, तपशीलवार माहितीसाठी वरदान आहेत. व्ही.एल. भाजीपाला वाटाणे-१५व्ही.एल. भाजीपाला वाटाणे-१५ ही थंड हवामानासाठी योग्य असलेली एक उत्कृष्ट जात आहे. वायव्य हिमालयीन प्रदेशात चांगले उत्पादन देते. ही कमी कालावधीची जात १२८ ते १३२ दिवसांत परिपक्व होते. वैशिष्ट्ये रब्बी हंगामात पेरणीसाठी ही एक उत्तम निवड आहे.शेतकरी प्रति हेक्टर १०० ते १२० क्विंटल पर्यंत पीक घेऊ शकतात.ही जात पावडर बुरशी, मरगळ, पांढरी कुजणे आणि पानांचा करपा यासारख्या रोगांना प्रतिरोधक आहे.रोपाची उंची ६० ते ७० सेंटीमीटर आहे आणि शेंगा हिरव्या आणि वक्र आहेत. पुसा थ्री वाटाणेपुसा थ्री ही लवकर येणारी जात आहे जी लवकर आणि जास्त उत्पादन देऊन शेतकऱ्यांना चांगला नफा देऊ शकते.प्रत्येक शेंगामध्ये ६-७ दाणे असतात, ज्यामुळे ती बाजारात खूप मागणी असलेली बनते. वैशिष्ट्ये लवकर येणारी जात असल्याने, शेतकरी प्रति एकर २० ते २१ क्विंटल पर्यंत उत्पादन देण्याची अपेक्षा करू शकतात.ही जात फक्त ५० ते ५५ दिवसांत फळ देण्यास सुरुवात करते.उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात लागवडीसाठी ही अत्यंत योग्य मानली जाते.
61 shares
😊
Lokmat logo
Lokmat
Nov 20, 2025, 03:48 PM
डाळिंबाच्या फळबागांमध्ये नैसर्गिक शेती करून नाशिकच्या शेतकऱ्याचे यश

डाळिंबाच्या फळबागांमध्ये नैसर्गिक शेती करून नाशिकच्या शेतकऱ्याचे यश

शेतकऱ्यांचे सोने करणारे फळपीक म्हणजेडाळिंब. मात्रअलीकडे नैसर्गिक संकटात डाळींबाचे उत्पादन घेणे म्हणजे मोठे कष्टाचे झाले आहे. ज्यामुळे मंगळणे येथील अशोक पांडुरंग सांगळे यांनीडाळिंबशेतीलाफाटा देत, मोसंबी फळबागेत नैसर्गिकशेतीचाअनोखा यशस्वी प्रयोग केला आहे. नाशिक जिल्ह्यातील मंगळणे (ता. नांदगाव) येथील अशोक पांडुरंग सांगळे यांनी आपल्या साडेसात एकर क्षेत्रावर न्यू शेलार आणि काटोल गोल्ड जातीच्या मोसंबीची प्रत्येकी ७५० झाडे लावली आहे. ज्यातून रसायन युक्त खते आणि द्रव्य रूप खतांचा वापर न करताही ते आज चांगले अपेक्षित उत्पन्न घेत आहे. सांगळे यांनी बागेत कृषी विभाग नांदगाव आणि आत्मा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत गोवर्धन नैसर्गिक गटाच्या सहकार्याने विविध जैविक निविष्ठांचा वापर केला आहे. तसेच शेतीचे व्यवस्थापन करत असताना, त्यांनी जैविक शेतीचा पद्धतशीर वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे. त्याबरोबरच सांगळे मोसंबी बागेत तण नियंत्रणासाठी आधुनिक ग्रास कटरचा वापर करतात. ज्यामुळे मोसंबी उत्पादनाला अपेक्षेपेक्षा अधिक यश प्राप्त झाले आहे. जैविक खतांचा वापर, कुजलेले शेणखत, गांडूळ खत, विविध बुरशी अर्क आणि जिवाणूंचा वापर यामुळे त्यांचा प्रयोग यशस्वी झाला आहे. जैविक व्यवस्थापनामुळे त्यांच्या बागेत ५०० ग्रामहून जास्त वजन असलेलीफळेयेत आहेत आणि या सर्व प्रक्रियेत त्यांना न केवळ उत्तम उत्पादन मिळाले आहे तर जमिनीचे आरोग्यही उत्तम राखले गेले आहे. डाळिंबाच्या तुलनेत मोसंबीचे उत्पादन कमी असले तरी, या शेतीत समाधान मिळवणे अधिक महत्त्वाचे आहे. कमी कष्ट, जैविक शेती आणि इतर अनेक निसर्गपूरक पद्धतींसह त्याचं व्यवस्थापन करत असताना मन तृप्त होणं, हेच त्यांचं मुख्य लक्ष्य आहे.- अशोक सांगळे. हेही वाचा : पारंपरिक भातशेती, भाजीपाला आणि ७५ शेळ्यांच्या कळपातून शेखरने निर्माण केले रोजगाराचे नवे मॉडेल
63 shares
😊
Sakal logo
Sakal
Nov 13, 2025, 04:12 PM
शेगावमध्ये रोख रक्कम जप्तः निवडणूक विभागाची भ्रष्टाचारविरोधी मोहीम

शेगावमध्ये रोख रक्कम जप्तः निवडणूक विभागाची भ्रष्टाचारविरोधी मोहीम

शेगाव :वरवट बकाल कडून शेगाव कडे येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाचे कीया गाडीमध्ये दहा लाखाची रोकड निवडणूक विभागाच्या एसएसटी पथकाने केलेल्या तपासणी दरम्यान पकडून जप्त केली सदर कार्यवाही ता.१३ रोजी सायंकाळी ५ वाजता दरम्यान स्थानिक गौरव हॉटेल जवळ करण्यात आली आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने विविध रस्त्यावर निवडणूक विभागाचे पथक मार्फत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे.
27 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Oct 31, 2025, 02:31 PM
राष्ट्रसंत तुकाडोजी महाराजनागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण प्रतिजैविक लेप अनुप्रयोग वैद्यकीय उपकरण विकसित केले

राष्ट्रसंत तुकाडोजी महाराजनागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण प्रतिजैविक लेप अनुप्रयोग वैद्यकीय उपकरण विकसित केले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:दैनंदिन जीवनात संसर्ग होत विविध पदार्थ नष्ट होतात. या पदार्थांना संसर्गापासून रोखत निर्जंतुकीकरणासह पदार्थांना सुरक्षित ठेवणारे नाविन्यपूर्ण उपकरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजनागपूरविद्यापीठातील विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. 'अँटीमायक्रोबियल कोटिंग ऍप्लिकेशन वैद्यकीय उपकरण' विकसित करण्यासह आंतरराष्ट्रीय पेटंट मिळवित विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुरु डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली आहे. रसायनशास्त्र विभागातील दिवंगत डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी २०२० मध्ये त्यांच्या विद्यार्थिनी प्राची प्रदीप खोब्रागडे यांना या उपकरणाची कल्पना दिली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेले हे संशोधन आज जागतिक पातळीवर पोहोचले आहे. यूकेमध्ये या उपकरणाची डिझाइन नोंदणी झाल्याने विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळले आहे. या प्रकल्पात प्राची खोब्रागडे यांच्यासोबत मॉलिक्युलर बायोलॉजी आणि जेनेटिक इंजिनिअरिंग विभागातील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ यजुर्वेद नरहरी सेलोकर आणि रसायनशास्त्र विभागाचे डॉ. राजेंद्र डोंगरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. डॉ. डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यजुर्वेद सेलोकर यांच्या सहयोगाने या टीमने हे संशोधन पूर्णत्वास नेले. दैनंदिन जीवनात संसर्गाला कारणीभूत ठरू शकणाऱ्या अनेक वस्तूंना स्वच्छ ठेवण्याची ही एक पर्यावरणपूरक आणि शाश्वत पद्धत ठरणार आहे. हे यश प्राची प्रदीप खोब्रागडे, डॉ. राजेंद्र सुखदेवराव डोंगरे आणि यजुर्वेद नरहरी सेलोकर यांच्या नावे नोंदवले गेले आहे. हे पेटंट म्हणजे डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांच्या बौद्धिक वारशाला दिलेली गुरुदक्षिणाच आहे. कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. उमेश पलीकुंडवार, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नंदकिशोर करडे आणि मॉलिक्युलर बायोलॉजी आणि जेनेटिक इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. दयानंद गोगले यांनी संशोधकांच्या या कामगिरीचे कौतूक केले आहे. कोविडनंतरच्या काळात महत्त्वाचे संशोधन कोविड-१९ च्या साथीनंतर लोक आरोग्याबाबत अधिक जागरूक झाले आहेत. आपण हात धुण्यासाठी सॅनिटायझर वापरतो, पण अनेक उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर वस्तू ज्या धुता येत नाहीत, त्या स्वच्छ ठेवणे एक आव्हान होते. यावर उपाय म्हणून विकसित केलेले हे उपकरण अशा वस्तूंवर अँटीमायक्रोबियल थर चढवते, ज्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो.
75 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Oct 24, 2025, 03:08 PM
शास्त्रज्ञांनी पूर्णपणे सोन्याने बनलेल्या ग्रहाचा शोध लावलाः जागतिक दागिने उद्योगासाठी एक गेम-चेंजर?

शास्त्रज्ञांनी पूर्णपणे सोन्याने बनलेल्या ग्रहाचा शोध लावलाः जागतिक दागिने उद्योगासाठी एक गेम-चेंजर?

सोन्याची किंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आजच्या तारखेला १० ग्रॅम सोनं घ्यायचं म्हटलं तर लाखांच्या वर पैसे मोजावे लागतात. थोडक्यात सांगायचं झालं तर सोनं खरेदी करणं आता सामान्य माणसासाठी जणू स्वप्नच बनलं आहे. असो, पण वैज्ञानिकांना एक असा ग्रह सापडला आहे जो संपूर्ण सोन्याचा बनलेला आहे. होय, जर या ग्रहावरील सगळं सोनं पृथ्वीवर आणलं, तर सोन्याचे दागिने तुम्हाला रस्त्यावर विकले जाताना दिसतील. चला तर मग पाहूया हा ग्रह नेमका कोणता आहे आणि या ग्रहावरचं सोनं पृथ्वीवर आणता येईल का?(फोटो सौजन्य - Stevebidmead/pixabay.com)कुठला ग्रह सापडला?या ग्रहाचं नाव 16 Psyche असं आहे. त्याचा शोध इटलीतील खगोलशास्त्रज्ञ अनिबेले डी गॅसपेरिस यांनी लावला. हा ग्रह पृथ्वीपासून सुमारे ५० लाख किलोमीटर अंतरावर आहे. लक्षवेधी बाब म्हणजे हा संपूर्ण ग्रह सोनं, प्लॅटिनम, लोह आणि निकेल यांसारख्या मौल्यवान धातूंनी बनलेला आहे. म्हणजे पृथ्वीवर जसे दगड-मातीचे डोंगर आहेत, तसं या ग्रहावर सोनं आणि प्लॅटिनमचे अक्षरशः डोंगर आहेत. त्यामुळे हा ग्रह सोनेरी रंगाने चमकताना दिसतो.या ग्रहाचा व्यास सुमारे २२६ किलोमीटर आहे. यावरून या ग्रहावर किती सोनं असेल याची फक्त कल्पनाच करता येईल. आज सोन्याचा दर लाखाच्या वर आहे. पण विचार करा जर या संपूर्ण ग्रहावरचं सोनं पृथ्वीवर आणलं, तर त्याची किंमत किती असेल? काही धातू तज्ज्ञांच्या मते या सोन्याची एकूण किंमत १० क्विंटिलियन डॉलर म्हणजे १० लाख कोटी कोटी रुपये इतकी असेल. आणि त्यात अजून प्लॅटिनमचं मूल्य धरलेलंच नाही.(फोटो सौजन्य - pixabay.com)सगळं सोनं पृथ्वीवर आणलं तर?खगोलशास्त्रज्ञ या ग्रहाचा अभ्यास करत आहेत. साधारण ४.५ अब्ज वर्षांपूर्वी या लघुग्रहाची निर्मिती झाली असावी असा त्यांचा अंदाज आहे. हा ग्रह मंगळ आणि गुरूच्या मध्ये असलेल्या एस्टेरॉईड बेल्टमध्ये फिरतो. त्याचं पृष्ठभाग क्षेत्रफळ सुमारे १,६५,८०० चौ.कि.मी. आहे. असे मानले जाते की 16 Psyche हा एखाद्या प्राचीन ग्रहाचा कोर असावा. दोन ग्रह आपटून फुटल्यामुळे त्यातील एका ग्रहाचा बाह्य भाग नाहीसा झाला आणि फक्त धातूंनी बनलेला कोर उरला.आता प्रश्न असा जर या ग्रहावरील सोनं पृथ्वीवर आणलं तर काय होईल? सोन्याचं मूल्यच संपेल. आज सोनं हे दुर्मीळ मूलद्रव्य आहे, कारण पृथ्वीवर ते अत्यंत कमी प्रमाणात सापडतं. त्याचबरोबर सोन्याची मागणीही खूप आहे. आणि एक साधा आर्थिक नियम आहे ज्याची मागणी जास्त आणि उपलब्धता कमी, त्याची किंमत जास्त.पण जर 16 Psyche वरून सोनं पृथ्वीवर आणलं, तर सोनं सर्वत्र उपलब्ध होईल. त्यामुळे त्याची किंमत हळूहळू कमी होईल आणि एक दिवस असा येईल की सोन्याचे दागिने रस्त्यावर विकले जातील, पण घेणारा कोणीच नसेल. असो, पण या प्रकरणी तुमचं मत काय आहे? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.(फोटो सौजन्य - qimono/pixabay.com)
37 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Oct 16, 2025, 03:27 PM
प्रयोगशाळांच्या समूहातील अत्याधुनिक संरक्षण उत्पादनांची समितीची तपासणी

प्रयोगशाळांच्या समूहातील अत्याधुनिक संरक्षण उत्पादनांची समितीची तपासणी

भेटी दरम्यान, समितीने क्लस्टरच्या विविध प्रयोगशाळांनी विकसित केलेल्या अत्याधुनिक उत्पादनांची पाहणी केली. प्रदर्शित केलेल्या उल्लेखनीय उत्पादनांमध्ये अॅडव्हान्स्ड टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीम, पिनाका रॉकेट सिस्टीम, लाईट टँक 'झोरावार', व्हील्ड आर्मर्ड प्लॅटफॉर्म आणि आकाश-न्यू जनरेशन मिसाईल यांचा समावेश आहे.
25 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Oct 10, 2025, 02:30 PM
एका साध्या फोन कोडद्वारे तुमच्या वाय-फाय जोडणीचा वेग वाढवा

एका साध्या फोन कोडद्वारे तुमच्या वाय-फाय जोडणीचा वेग वाढवा

तुमच्या Wi-Fi चा स्पीड स्लो झाला असेल तर चिंता करू नका. आज आम्ही तुमच्या Wi-Fi चा स्पीड कसा वाढवायचा याची एक ट्रिक सांगणार आहोत. तुमच्या फोनमध्ये काहीही त्रुटी असल्या तरी देखील ही ट्रिक काम करेल, चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.लाख प्रयत्न करूनही घराच्या Wi-Fi कनेक्शनचा वेग वेगवान होत नाही. तुम्हीWi-Fi राउटर आणि आपल्याइंटरनेट कनेक्शनसह सर्व गोष्टी करून पहा, परंतु असे असूनही, फोनवरील स्पीड समान नाही. जर तुमच्या बाबतीत असे असेल तर तुमची समस्या अगदी सहजपणे सोडवली जाऊ शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या Wi-Fi राउटर किंवा इंटरनेट कनेक्शनमध्ये कोणतेही बदल करण्याची गरज नाही. तुमच्या फोनमध्ये एक साधा कोड डायल करून, तुम्ही तुमच्या Wi-Fi चा स्पीड खूप वेगवान करू शकता. चला तर मग तुमच्या फोनमध्ये उपलब्ध Wi-Fi चा स्पीड कसा वाढवायचा ते तुम्हाला समजावून सांगत आहोत. जाणून घेऊया.‘हा’ कोड डायल कराफोनमध्ये Wi-Fi स्लो होण्याची समस्या दूर करण्यासाठी काही स्मार्टफोन कंपन्या एक खास प्रकारचा कोड देतात. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनचेWi-Fi व्हर्जन रीसेट करूशकता. हा कोड सर्व स्मार्टफोनसह कार्य करत नाही हे स्पष्ट करा आणि आम्ही तुम्हाला त्या फोनसाठी काही वेगळ्या सेटिंग्जबद्दल सांगत आहोत. जर तुम्ही सॅमसंग स्मार्टफोन वापरत असाल तर तुमच्या *#2663# डायल करावे लागेल. यानंतर, आपल्याकडे आपले Wi-Fi व्हर्जन रीफ्रेश करण्याचा पर्याय असेल. रिफ्रेश टॅप करून तुम्ही तुमच्या फोनमध्ये Wi-Fi व्हर्जन रिफ्रेश करू शकाल. यानंतर, आपल्याला आपल्या फोनवर चांगली Wi-Fi स्पीड मिळेल.कोड काम करत नसेल तर काय करावे?स्पेशल कोड सॅमसंगसारख्या काही मोजक्याच कंपन्यांच्या स्मार्टफोनवर काम करतो. जर हा कोड तुमच्या फोनवर काम करत नसेल तर तुम्ही फोनमधील इतर काही सेटिंग्जच्या मदतीने तुमची Wi-Fi सेटिंग्ज रीसेट करू शकता. यासाठी तुम्हाला फोनच्या सेटिंग्जमध्ये रिसेट सर्च करावे लागेल. यानंतर, आपण Reset Settings वर टॅप करून किंवा Reset network and Bluetooth Settings वर टॅप करून स्लो Wi-Fi च्या समस्येवर मात करू शकता.तुम्हाला फक्त सेटिंग्ज रीसेट करावे लागतील हे स्पष्ट करा. हे तुमचे डिव्हाइस किंवा डिव्हाइसमध्ये असलेला डेटा रीसेट करणार नाही. यानंतर, तुम्ही तुमच्या फोनवर एक चांगले Wi-Fi नेटवर्क मिळवू शकता.आयफोनचे काय करावे?वर नमूद केलेला कोड आयफोन युजर्सना कोणताही उपयोग होणार नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या फोनवर Wi-Fi च्या स्लो स्पीडची समस्या येत असेल तर तुम्ही त्याचे निराकरण करण्यासाठी दोन गोष्टी करू शकता. सर्व प्रथम, फक्त एकदा आपला आयफोन पुन्हा सुरू करा. खरं तर, आपण स्मार्टफोन कधीही रीस्टार्ट करत नाही. अशा परिस्थितीत कधीकधी फोनच्या सॉफ्टवेअरमध्ये गडबड होते. फोन रीस्टार्ट झाल्यावर अशा किरकोळ अडचणी दूर केल्या जातात.ही ट्रिकही आपल्या समस्येचे निराकरण करत नसेल तर आयफोन General > Transfer or reset iPhone > Reset Network Settings करून नेटवर्क सेटिंग्ज रीसेट करू शकतात. यानंतर, तुम्ही तुमच्या Wi-Fi शी पुन्हा कनेक्ट करावे लागेल आणि तुमच्या फोनवर स्लो इंटरनेटची समस्या दूर होण्याची 99 टक्के शक्यता आहे.
97 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Oct 5, 2025, 03:17 PM
रिअल-टाइम रूम इमेजिंग आणि पाळत ठेवणेः सुरक्षा आणि गोपनीयता यांचा समतोल साधणे

रिअल-टाइम रूम इमेजिंग आणि पाळत ठेवणेः सुरक्षा आणि गोपनीयता यांचा समतोल साधणे

या प्रक्रियेमुळे आता खोलीची फोटो-रिअलिस्टिक प्रतिमा तयार करणे शक्य झाले आहे. लेटेंटसीएसआयच्या मदतीने केवळ खोलीचे अचूक चित्र मिळत नाही, तर ही प्रणाली खोलीत उपस्थित असलेल्या व्यक्तींची स्थिती आणि त्यांच्या हालचालींचा मागोवा (ट्रॅक) देखील घेऊ शकते. म्हणजेच, जर एखादी व्यक्ती खोलीत फिरत असेल, तर तिचे रिअल-टाइम स्थान देखील यात दाखवता येते. या तंत्रज्ञानामुळे सुरक्षा आणि पाळत ठेवण्याचे (Surveillance) नवीन मार्ग खुले होऊ शकतात, पण त्याचबरोबर गोपनीयतेवर गंभीर प्रश्न उभे राहत आहेत. जर हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरले गेले, तर वाय-फाय सिग्नल्सचा वापर पाळत ठेवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.
99 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Sep 15, 2025, 03:10 PM
कृत्रिम बुद्धिमत्तेचा स्वीकारः जग बदलणारे तंत्रज्ञान

कृत्रिम बुद्धिमत्तेचा स्वीकारः जग बदलणारे तंत्रज्ञान

नागपूर:कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) आल्यामुळे तरुणांमध्ये नोकऱ्या हिरावून जाण्याची भीती आहे. मात्र एआय, मशिन लर्निंग किंवा डाटा सायन्स हे जग बदलणारे तंत्रज्ञान आहे आणि औद्योगिक क्रांतीप्रमाणे माहिती तंत्रज्ञान क्रांतीनेही नोकरीच्या संधी हिरावण्यापेक्षा अधिक संधी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे त्याची भीती बाळगण्यापेक्षा अभियंते, शास्त्रज्ञांनी ते आत्मसात करण्याची आवश्यकता आहे, ज्यामुळे जगभरातील संधीची दालने खुली हाेतील, असे आवाहन भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. अभय करंदीकर यांनी केले. विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (व्हीएनआयटी) २३ वा दीक्षांत समारंभ साेमवारी उत्साहात पार पडला. याप्रसंगी व्हीएनआयटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मदभूषी मदन गोपाल, व्हीएनआयटीचे संचालक प्रा. प्रेमलाल पटेल, अधिष्ठाता प्रा. विलास कळमकर उपस्थित होते. यावेळी पदवीमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या शेनय सिद्धेशविनय यांना सर विश्वेश्वरय्या पदकाने सन्मानित करण्यात आले. डॉ. अभय करंदीकर पुढे म्हणाले, कृत्रिम बुद्धीमत्ता मानवी सर्जनशीलतेचा पर्याय नाही; ती एक सक्षम करणारी गोष्ट आहे. ती तुम्हाला मोठ्या डेटाचे विश्लेषण करण्यास, आधुनिक गोष्टी तयार करण्यास आणि सर्व क्षेत्रांमध्ये उत्पादकता वाढवण्यास मदत करू शकते. परंतु ते तुमच्या सुज्ञपणावर अवलंबून आहे. या नवीन युगात तांत्रिक कौशल्येच नव्हे, तर अनुकूलता, नीतिमत्ता आणि सर्जनशीलता महत्त्वाची आहे. यंत्रे नमुना तयार करू शकतात. परंतु निर्णय घेण्याची क्षमता मनुष्यातच असल्याचे डॉ. करंदीकर म्हणाले. मदभूषी मदन गोपाल म्हणाले, यश पदांवर किंवा पदव्यांवरून मोजले जाणार नाही तर तुम्ही इतरांच्या जीवनात किती प्रभाव पाडता यावर अवलंबून असेल. सचोटी, सर्जनशीलता आणि करुणेने भारताची सेवा करा, असे आवाहन त्यांनी केले. विज्ञान आणि तंत्रज्ञानात महिलांच्या नेतृत्वात वाढ विज्ञान आणि तंत्रज्ञानात महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. महिलांच्या नेतृत्वाखालील होणारी प्रगती ही भारताचे भविष्य घडवणारी वास्तविकता आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत आहे, ज्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. सरकारने महिला वैज्ञानिक योजना आणि परिवर्तनशील संस्थांसाठी विविध उपक्रमांद्वारे महिलांना संशोधन आणि मार्गदर्शनाची संधी मिळाल्याचे डाॅ. करंदीकर म्हणाले. १२२७ पदव्या प्रदान व्हीएनआयटीच्या २३ व्या दीक्षांत समारंभात एकूण १२२७ पदव्या प्रदान करण्यात आल्या. यामध्ये ७० डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, विविध अभियांत्रिकी शाखांमध्ये २७१ मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी, १ मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी (संशोधनाद्वारे), विविध विज्ञान शाखांमध्ये ६३ मास्टर ऑफ सायन्स, विविध अभियांत्रिकी शाखांमध्ये ७६३ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी आणि ५९ बॅचलर ऑफ आर्किटेक्चर पदव्या समाविष्ट आहेत.
15 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Sep 12, 2025, 02:40 PM
टाटा टेक्नॉलॉजी आणि महाराष्ट्र सरकारने रामटेकमध्ये कौशल्य विकास केंद्रासाठी सहकार्य केले

टाटा टेक्नॉलॉजी आणि महाराष्ट्र सरकारने रामटेकमध्ये कौशल्य विकास केंद्रासाठी सहकार्य केले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:टाटाटेक्नॉलॉजी लिमीटेड यांच्यामार्फत रामटेक येथे कौशल्यवर्धन केंद्र (सीआयआयटी) सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीसयांच्या विशेष उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.टाटाटेक्नॉलॉजी लिमीटेडतर्फे जागतिक प्रमुख सुशीलकुमार व महाराष्ट्र शासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी या सामंजस्य करार झाला. रामगिरी येथे टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्यामार्फत खाजगी सहभागातून कौशल्यवर्धन केंद्राची रामटेक येथे उभारणी करण्यासंदर्भात करार झाला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थ व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, टाटा टेक्नॉलॉजीचे शासकीय प्रकल्प जागतिक प्रमुख सुशीलकुमार, प्रकल्प समन्वयक प्रितम गंजेवार, शासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आदी यावेळी उपस्थित होते. रामटेक येथे टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्यामार्फत खाजगी सहभागातून सेंटर फॉर इन्व्हेंनशन, इनोवेशन, इन्क्युबेशन, आणि ट्रेनिंग सेंटर (सीआयआयटी) ची उभारणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक नवउपक्रमावर आधारित प्रशिक्षण देण्यासोबतच औद्योगिक उत्पादनास चालना देण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. दरवर्षी ३ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या करारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षणाची सुविधा निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीसयांनी सांगितले. नवउपक्रम व संशोधन प्रशिक्षण सुविधा असलेल्या रामटेक येथील प्रकल्प टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणार आहे. या कौशल्यवर्धन केंद्रात इनोवेशन, डिझाईन ॲण्ड इन्क्युबेशन यासह नऊ प्रकाराच्या प्रशिक्षणाच्या सुविधा राहणार आहेत. टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्यामार्फत यापूर्वी गडचिरोली, चंद्रपूर तसेच कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, आसाम, गोवा, उत्तरप्रदेश व तेलंगना येथे कौशल्यवर्धन केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. कौशल्यवर्धन केंद्र इमारत बांधकाम व प्रशिक्षण सुविधासह ११५ कोटी रूपयांचा प्रकल्प असून टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडतर्फे ९८ कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे कुशल मनुष्यबळाची वाढती गरज पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येणार असून उत्पादन क्षेत्रातील आवश्यक असलेले अभियंते, ऑपरेटर, तंत्रज्ञ आणि मनुष्यबळ निर्माण होईल. याप्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना, उद्योग व्यवसायीकांना नवकल्पना आणि कौशल्यविकास याद्वारे उद्योगात कुशल संसाधणे आणि उद्योजकात निर्माण होणार असल्याचे टाटा टेक्नॉलॉजीचे जागतिक प्रमुख सुशिलकुमार यांनी यावेळी सांगितले.
63 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Aug 20, 2025, 02:55 PM
भारताची अग्नि क्षेपणास्त्र मालिकाः आण्विक प्रतिबंधासाठीचा एक महत्त्वाचा घटक

भारताची अग्नि क्षेपणास्त्र मालिकाः आण्विक प्रतिबंधासाठीचा एक महत्त्वाचा घटक

अग्नि क्षेपणास्त्र मालिका ही भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (DRDO) विकसित केलेली एक महत्त्वाची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (Ballistic Missile) मालिका आहे. ही मालिका भारताच्या अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्र सामर्थ्याचा कणा मानली जाते आणि भारताच्या त्रिस्तरीय अण्वस्त्र निवारण धोरणात (nuclear triad) जमिनीवरून प्रक्षेपित होणाऱ्या क्षेपणास्त्रांमध्ये महत्वाची भूमिका बजावते.
33 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Aug 10, 2025, 02:30 PM
पॉवर ऑफ फ्लाइट मोड उघडणेः विमान प्रवासाच्या पलीकडे

पॉवर ऑफ फ्लाइट मोड उघडणेः विमान प्रवासाच्या पलीकडे

फ्लाईट मोड सर्वांच्याच फोनमध्ये असतो. पण, याचा आपल्याला फक्त विमानात उपयोग करायचा असतो, हेच माहिती आहे. पण, तसे नाही. याफ्लाईट मोडचेअनेक फायदे आहे. आज आम्ही तुम्हाला फ्लाईट मोडच्या वेगवेगळ्या फायद्यांविषयी माहिती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.स्मार्टफोनमध्ये मिळणारा फ्लाइट मोड फक्त विमानात प्रवास करतानाच वापरला जातो, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला तसं वाटणं चुकीचं आहे. या मोडचा वापर इतरही अनेक प्रकारे केला जाऊ शकतो, आज आम्ही तुम्हालाफ्लाइट मोडकोणत्या प्रकारे वापरता येईल हे सांगणार आहोत.फोनमध्ये नोटिफिकेशन पॅनेलमध्ये एअरप्लेन मोडकाही स्मार्टफोनमध्ये तुम्हाला फ्लाइट मोड दिसेल, तर काही मोबाइल फोनमध्ये नोटिफिकेशन पॅनेलमध्ये एअरप्लेन मोड नावाचं हे फीचर दिसेल. नोटिफिकेशन पॅनेलमध्ये हे फिचर न मिळाल्यास फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही हे फीचर शोधू शकता.फ्लाइट मोड: तुम्हीही वापरू शकता ‘या’ 4 पद्धतीएअरप्लेन मोड किंवा फ्लाइट मोड ऑन करताच हे फीचर फोनमधील मोबाइल नेटवर्क बंद करते.बॅटरी वाचवण्यात मास्टर: हे फीचर ऑन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमचा स्मार्टफोन पूर्वीच्या तुलनेत बॅटरीचा वापर कमी करत आहे.फोन चार्ज करताना जर तुम्ही तुमचा फोन फ्लाइट मोडवर ठेवला तर तुमच्या लक्षात येईल की तुमचा फोन कमी वेळात लवकर आणि वेगाने फुल चार्ज होईल.मुलांसाठी सेफ मोड: जर मूल तुमचा फोन गेम खेळण्यासाठी घेत असेल तर फोन देण्यापूर्वी हा मोड ऑन करा, असे केल्याने तुमचे मूल इंटरनेटच्या माध्यमातून कोणत्याही साईट किंवा अ‍ॅप अ‍ॅक्सेस करू शकणार नाही.नेटवर्क रिफ्रेश: आम्ही वर सांगितल्याप्रमाणे, जेव्हा आपण फ्लाइट मोड चालू करता तेव्हा मोबाइल नेटवर्क बंद होते. जर फोनमधील नेटवर्क सिग्नल कमकुवत असेल किंवा फोनमध्ये इंटरनेट नीट काम करत नसेल तर फ्लाइट मोड ऑन करा. ते ऑन केल्यानंतर काही सेकंदानंतर पुन्हा फ्लाइट मोड बंद करा, असे केल्याने नेटवर्क रिफ्रेश होते.
57 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Aug 7, 2025, 02:35 PM
मुलांमध्ये हाडांच्या कर्करोगाच्या उपचारांचा पुनर्विचारः विच्छेदन ते अचूक शस्त्रक्रियेपर्यंत

मुलांमध्ये हाडांच्या कर्करोगाच्या उपचारांचा पुनर्विचारः विच्छेदन ते अचूक शस्त्रक्रियेपर्यंत

-डॉ. राज नगरकर(मॅनेजिंग डायरेक्टर, प्रमुख सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि रोबोटिक सर्जन, HCG मानवता कॅन्सर सेंटर, नाशिक) मुलांमध्ये हाडांचा कॅन्सर दुर्मिळ असतो, परंतु जेव्हा हा आजार होतो, तेव्हा तो अत्यंत आक्रमक आणि झपाट्याने पसरतो. हा प्रकार बहुतेक वेळा वाढत्या वयातील मुलांमध्ये विशेषतः गुडघ्याजवळ किंवा खांद्याजवळ दिसून येतो, जिथे हाडांची वाढ वेगाने होते. हा आजार केवळ मुलासाठीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबासाठी मानसिक व शारीरिकदृष्ट्या खूप थकवणारा असतो. उपचार, शस्त्रक्रिया आणि पुनर्वसन यासारख्या कठीण निर्णयांचा सामना करावा लागतो. पूर्वीची परिस्थिती पूर्वी, जर मुलाच्या हातात किंवा पायात हाडांचा कॅन्सर झाला, तर वैद्यकीय उपचार हे खूप कठोर स्वरूपाचे असायचे. कॅन्सरग्रस्त हाडाचा संपूर्ण भाग काढून टाकावा लागे. जर ट्युमर मोठा असेल किंवा शरीरातील अत्यावश्यक रचनेच्या जवळ असेल, तर पाय किंवा हात कापणे (amputation) हाच एकमेव पर्याय होता. प्राधान्य हे फक्त जीवन वाचवणे असायचे जर त्यामुळे हालचाली गमवाव्या लागल्या तरी. आता आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे बदल आज, प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान आणि अधिक चांगल्या नियोजनामुळे, अशा प्रकारचे शस्त्रक्रियेचे मार्ग तयार झाले आहेत जे कॅन्सर काढून टाकतात पण लिंब (हात/पाय) जपतात. यामधील एक पद्धत म्हणजे Extracorporeal Irradiation (ECI) हाड वाचवणारी शस्त्रक्रिया जी काही निवडक मुलांमध्ये यशस्वी ठरत आहे. ही प्रक्रिया कशी असते? ECI (एक्स्ट्रा कॉर्पोरियल इरॅडिएशन) प्रक्रियेमध्ये ट्युमर असलेला हाडाचा भाग शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढला जातो. नंतर हा भाग शरीराबाहेर अत्यंत तीव्र रेडिएशनद्वारे उपचारित केला जातो. ज्यामुळे त्या भागातील सर्व कॅन्सर पेशी नष्ट होतात. ही प्रक्रिया ऐकायला सरळ वाटते, पण प्रत्येक टप्प्यावर अचूकतेची गरज असते. उद्देश असा की एकही कॅन्सर पेशी उरू नये, पण हाडाच्या संरचनेला इजा होऊ नये. एकदा हे हाड पूर्ण निर्जंतुक (sterilized) केल्यावर ते पुन्हा शरीरात मूळ जागी बसवले जाते आणि सर्जिकल हार्डवेअरद्वारे सुरक्षितरीत्या फिक्स केले जाते. कारण मुलाचं स्वतःचं हाड वापरलं जातं, त्यामुळे कृत्रिम प्रत्यारोपणासारख्या अडचणी येत नाहीत. त्यामुळे डोनरची गरज राहत नाही, आणि शरीर त्या भागाला नाकारण्याचा धोका कमी होतो. कोणासाठी योग्य? ही उपचारपद्धती प्रत्येक मुलासाठी योग्य असेलच असे नाही. ही सर्वात चांगली तेव्हाच कार्यक्षम असते जेव्हा ट्युमर पसरलेला नसतो आणि मूल केमोथेरपीला चांगला प्रतिसाद देत असतो. कॅन्सरची जागाही महत्त्वाची असते ती अशा ठिकाणी असावी जिथे स्वच्छपणे हाड काढून टाकता येईल आणि आजूबाजूच्या नसा किंवा महत्त्वाच्या रचना सुरक्षित राहतील. अनुभवी सर्जन्सच्या हाती, ही पद्धत खूप प्रभावी ठरली आहे. अनेक मुलांनी शस्त्रक्रियेनंतर काही महिन्यांत चांगले पुनरुत्थान (functional recovery) दाखवले आहे आणि दीर्घकालीन तपासणीतही चांगले परिणाम दिसून आले आहेत. विशेषतः कॅन्सर लवकर आढळल्यास आणि वेळीच उपचार झाल्यास. हे महत्त्वाचे का आहे? एका मुलासाठी लिंब गमावणे हे फक्त शारीरिकच नव्हे तर भावनिक दृष्टिकोनातूनही आयुष्य बदलवणारे असते.त्याच्या हालचाली, खेळणे, आत्मविश्वास, आणि इतर लोक त्याच्याकडे कसे पाहतात या सर्व गोष्टी बदलतात. ECI पद्धतीमुळे, मूल आपला हात/पाय जपू शकते, आणि त्यामुळे अनेक मानसिक आणि सामाजिक अडचणी टाळता येतात. शारीरिक पुनर्वसन अजूनही आवश्यक असते, पण मानसिकदृष्ट्या ही प्रक्रिया हलकी वाटते कारण मूल ‘आपलंच’ काहीतरी टिकवून ठेवू शकतं. बहुतेक वेळा, मुले प्रौढांपेक्षा लवकर सावरतात. पुनर्वसन सुरू झाल्यानंतर त्यांचे दैनंदिन जीवन फारसे बदल न करता पूर्ववत होते. पुढे काय? ECI सारख्या लिंब जपणाऱ्या उपचारपद्धतींमध्ये वाढता रस ही बालकर्करोगउपचारांच्या क्षेत्रात होत असलेल्या सकारात्मक बदलांची खूण आहे जिथे केवळ जिवंत राहणं नव्हे, तर चांगलं आयुष्य जगणं हेही उद्दिष्ट ठरत आहे. आजडॉक्टरकेवळ हे पाहत नाहीत की मूल कॅन्सरवर मात करू शकेल का, तर ते कॅन्सरनंतर कसं जीवन जगेल हेही तेवढंच महत्त्वाचं ठरत आहे. अनेक रुग्णालयं आता ही पद्धत शिकण्यासाठी त्यांच्या सर्जिकल टीमला प्रशिक्षित करत आहेत. जसजशी ही कौशल्ये वाढत आहेत, तसतशी अधिकाधिक कुटुंबांना निदानाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच ECI हा पर्याय दिला जातोय. ही पद्धत सर्वांसाठी योग्य नाही, पण ज्या निवडक मुलांसाठी ती लागू होते. त्यांच्यासाठी ही केवळ वैद्यकीय प्रगती नाही, तर एक शांत पण सामर्थ्यवान आशेची किरण आहे.
1 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Jul 31, 2025, 03:45 PM
कोकणी मुलगी सुरभी अभ्यंकरने वैद्यकीय विज्ञानात पथदर्शी कामगिरी केली

कोकणी मुलगी सुरभी अभ्यंकरने वैद्यकीय विज्ञानात पथदर्शी कामगिरी केली

रत्नागिरी , प्रसाद रानडे: एका जिद्दी आणि हुशार असलेल्या कोकणकन्येने भारतात डिग्री घेतल्यानंतर अमेरिकेत जाऊन पुढील शिक्षण घेतलं. ती एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने मेडिकल सायन्समध्ये केलेलं संशोधन ही नवी औषध उपचार पद्धती शोधण्यासाठी दिशादर्शक ठरलं आहे. सुरभी अभ्यंकर या कोकणकन्यने वैद्यकीय विज्ञान क्षेत्रात केलेलं संशोधन महत्त्वाचं ठरलं आहे. मधुमेह, अल्झायमर आणि मेंदूतील विकार यावर गुंतागुंतीच्या आजाराबाबत दृष्टीपटलाद्वारे या गंभीर आजारांचं निदान यावर यशस्वी संशोधन केलं आहे. या संशोधनाला आता आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असून याबाबतचा डॉ. सुरभीचा संशोधन रिसर्च पेपरही पब्लिश झाला आहे. कोकणातील रत्नागिरी तालुक्यातील कर्ला गावची सुकन्या डॉ. सुरभि दीपक अभ्यंकर हिने अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमधून जैव रसायनशास्त्र व आण्विक जीवशास्त्र (Biochemistry & Molecular Biology) या विषयात संशोधन केल्याने तिला नुकतीच पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे.मधुमेहाने वडील गमावले, यातूनच जिद्दीने संशोधन केलंमुंबई विद्यापीठातून मायक्रोबायोलॉजीमध्ये पदवी (B.Sc.) आणि बायोफिजिक्समध्ये पदव्युत्तर पदवी (M.Sc.) प्राप्त केली. याच काळात तिला संशोधनाची आवड निर्माण झाली आणि तिने पीएचडीसाठी अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये अर्ज केला. तिच्या उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरीमुळे तिला अमेरिकेतील पाच विद्यापीठांमधून शिष्यवृत्तीसह प्रवेशासाठी तिची निवड झाली होती. तिने अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटीची निवड केली.डॉ. सुरभी अभ्यंकरने आपल्या वडिलांचा मधुमेह आजार पाहिला होता. त्याचे दुष्परिणामही पाहिले होते. इतकंच नाही तर याच आजाराने वडिलांचा झालेला मृत्यू पहिला होता. त्यामुळे तिने याच आजारावर संशोधन करण्याची जिद्द बाळगली होती. तिच्या या वैद्यकीय विज्ञान क्षेत्रातील संशोधनाला तिची आई दीप्ती अभ्यंकर यांनीही तिला मोठ पाठबळ दिला. त्यामुळेच तिने संशोधनातून मिळवलेलं यश वडिलांना समर्पित केलं आहे. भविष्यात नवीन औषधनिर्मितीला दिशा देण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. त्यामुळे या कोकणकन्येने केलेलं संशोधन हे वैद्यकीय विज्ञान क्षेत्रात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. एक नवीन औषध उपचार पद्धती, थेरपी या संशोधनामुळे विकसित होईल असा विश्वास सुरभीने व्यक्त केला.Mumbai News : ५० डॉक्टरांची टीम, १० तास शस्त्रक्रिया; 'केईएम' रुग्णालयाने यशस्वी हृदयप्रत्यारोपण करत रचला इतिहासदृष्टिपटलामध्ये होणाऱ्या बदलावरुन आजाराचं निदान, संशोधन हे दृष्टिपटल आणि अल्झायमर यांच्यातील जैविक संबंधांवर आधारित आहे. दृष्टिपटल हा मेंदूचाच एक भाग आहे. त्यामुळे जर मेंदूमध्ये काही विकृती होऊ लागल्या असतील, तर त्याचे सुरुवातीचे संकेत डोळ्यांतून मिळू शकतात. अल्झायमर हा स्मृती, विचारशक्ती आणि वर्तनावर परिणाम करणारा मेंदूचा आजार आहे, जो वय वाढल्यावर सामान्यतः दिसून येतो. लवकर निदान झालं, तर औषधोपचार अधिक प्रभावी ठरू शकतात त्यामुळे हे संशोधन मोठं ठरलं आहे.माउस मॉडेल्स, सेल कल्चर आणि नवीन औषधांसाठी दिशा ठरवताना तिच्या संशोधनासाठी अल्झायमरच्या जोखमीशी संबंधित APOE4 जनुक असलेल्या उंदरांचा (mouse model) वापर केला आणि पेशींवर आधारित प्रयोगाद्वारे विविध जैविक बदलांचा अभ्यास केला. या अभ्यासामध्ये तिने दृष्टिपटलामध्ये होणाऱ्या सुरुवातीच्या बदलांचा मागोवा घेतला आणि हे बदल मधुमेह किंवा चयापचन बिघाड असलेल्या स्थितीत अधिक तीव्र असल्याचं निरीक्षण नोंदवलं. विशेष बाब म्हणजे, डॉ. सुरभीने एका औषधाची चाचणी केली असून, हे औषध अल्झायमरमध्ये होणाऱ्या दृष्टिपटलाच्या नुकसानावर प्रभावी ठरू शकतं. भविष्यात त्यांच्या संशोधनचा उपयोग अल्झायमरच्या उपचारातही होऊ शकतो आणि ही संशोधन दिशा देऊ शकते.MRI आणि PET स्कॅनला पर्याय?वृद्ध व्यक्तींमध्ये अल्झायमर निदानासाठी MRI किंवा PET स्कॅन करणं कठीण जाऊ शकतं. मात्र, डोळ्यांचं स्कॅनिंग सोपं, स्वस्त आणि वेदनारहित असतं. दृष्टिपटल स्कॅनद्वारे मेंदूतील अल्झायमरशी संबंधित बदल जर आधीच ओळखता आले, तर हे निदानाचे आणि पुढील उपचाराचे क्रांतिकारी पाऊल ठरू शकते. यासाठी हे संशोधन महत्वाचं ठरतं, असं डॉ. सुरभीने सांगितलं.केंद्र सरकारची 'नेत्रज्योती' अंतर्गत मोहीम, तीन वर्षात २५ लाख जणांना दृष्टिदिलासामधुमेह, लठ्ठपणा आणि मेंदूचं आरोग्य - जैविक साखळीडॉ. सुरभीच्या संशोधनाचा दुसरा भाग मधुमेह आणि लठ्ठपणाशी संबंधित आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे मधुमेह आणि लठ्ठपणा हे आज वाढत्या प्रमाणात दिसून येणारा विकार आहे. हे दोन्ही मेंदूतील सूज आणि अल्झायमरचे धोके वाढवतात. तिचे दोन सह-लेखन शोधनिबंध GLP-1 हॉर्मोनच्या कार्यावर आधारित आहेत, जे केवळ मधुमेहासाठी उपयुक्त नसून मेंदूला संरक्षण देण्याचं कामही करतात. यामुळे GLP-1 चं हे संशोधन मधुमेह-अल्झायमरला जोडणाऱ्या दुव्यांना उलगडत आहे.दुर्धर आजारावर सोपी निदान पद्धतीवैद्यकीय प्रगतीमुळे आज लोकांचं आयुर्मान वाढलं असलं, तरी त्याचबरोबर वृद्धांमध्ये अल्झायमर सारख्या मेंदूविकारांचं प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. त्याचवेळी चुकीचा आहार आणि जीवनशैलीमुळे मधुमेह आणि लठ्ठपणाही वाढत आहे. Retina च्या माध्यमातून आम्ही याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहोत, असंही डॉ. अभ्यंकर यांनी सांगितलं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा डोळ्याचं स्कॅन करुन होणारं निदान हे संशोधन महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे भारतातील सामान्य रुग्णांसाठीही अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. दृष्टिपटलाच्या माध्यमातून अल्झायमर, मधुमेह आणि लठ्ठपणासारख्या विकारांचं सुलभ निदान शक्य करुन देणारी ही क्रांती भारतीय आणि जागतिक आरोग्य व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकतं.पुढील औषध थेरपीवर संशोधन सुरूमी सध्या अशा एका औषधथेरपीवर काम करत आहे, जी अल्झायमरशी संबंधित दृष्टिपटलातील नुकसान कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते. विशेषतः हा अभ्यास अल्झायमरची जोखीम वाढवणाऱ्या APOE4 जनुक असलेल्या पेशींवर करण्यात आला आहे. अशा स्वरूपाचं संशोधन प्रथमच केलं गेलं आहे. आत्तापर्यंत मी केलेले सर्व प्रयोग हे पेशींवर आधारित असून, यामधून मला मिळालेले निष्कर्ष आशादायक आहेत आणि हे औषध आता उंदरांवर आणि त्यानंतर मानवांवरील क्लिनिकल चाचण्यांसाठी याचं संशोधन केलं जाणार आहे.नागपूरच्या रुग्णालयात झाले लिंग प्रत्यारोपण, साडे नऊ तासांची यशस्वी शस्त्रक्रियाआजवरच्या संशोधनात सकारात्मक परिणामआत्तापर्यंत झालेल्या माझ्या प्रयोगांमध्ये या औषधाचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत, जे भविष्यात अल्झायमरच्या निदान आणि उपचारपद्धतींमध्ये नवा मार्ग दाखवू शकतात. यासंदर्भात सखोल संशोधन बाकी आहे, पण एक दिवस माझ्या नावाशी जोडलेली एखादी नवीन थेरपी किंवा उपचारपद्धती विकसित करण्यास मला नक्कीच यश येईल, असा विश्वास डॉ. सुरभी अभ्यंकरने 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना व्यक्त केला आहे.डॉ. सुरभी अभ्यंकरने मिळवलेल्या या मोठ्या यशाबद्दल तिचं अवघ्या कोकणातूनच नव्हे, तर राज्यभरातून अभिनंदन करण्यात येत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी तिचा अभिनंदन करत तिच्या पुढील संशोधन कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तिने केलेलं महत्त्वाचं संशोधन आणि यावर मिळालेली पीएचडी यामुळे वैद्यकीय शिक्षण, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान आदी विविध क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
15 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Jul 4, 2025, 03:15 PM
पुणे महिला तंत्रज्ञ बलात्कार प्रकरणः पोलिसांनी संशयिताची ओळख पटवली, प्राथमिक अहवालाचे खंडन केले

पुणे महिला तंत्रज्ञ बलात्कार प्रकरणः पोलिसांनी संशयिताची ओळख पटवली, प्राथमिक अहवालाचे खंडन केले

Pune woman techie rape case: पुण्यातील कोंढाव येथील उच्चभ्रु सोसायटीतील सदनिकेत शिरून संगणक अभियंता तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात वेगळीच माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी संशयित व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून मिळालेली माहिती पोलिसांनी सांगितली. सदर व्यक्तीने सदनिकेत बळजबरीने प्रवेश केला नव्हता किंवा त्याने पीडितेच्या चेहऱ्यावर कोणताही स्प्रे मारला नसल्याचे समोर आले आहे. तसेच तक्रारदार तरुणीने सेल्फीबाबत जी माहिती दिली, तोही संमतीने काढला असल्याचे पोलिसांनी सांगितले. द इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे.पुणेपोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, “आम्ही सदनिकेत गेलेल्या व्यक्तीची ओळख पटवली. चौकशीत असे आढळून आले की, तक्रारदार तरुणीच्या घरात आलेला पुरूष डिलिव्हरी एजंट नव्हता. सदर तरूणीला तो एक वर्षापासून ओळखत होता. तसेच तक्रारदार तरुणीच्या घरात त्याने बळजबरीने प्रवेश केला नव्हता. तसेच त्याने स्प्रे मारल्याचाही पुरावा आढळलेला नाही. तसेच त्यांनी घेतलेला सेल्फीही संमतीने काढला होता. सदर व्यक्ती घरातून गेल्यानंतर तक्रारदार महिलेने तो एडिट केला होता.” दरम्यान तक्रारदार तरुणीने जो बलात्काराचा आरोप केला होता, त्याची चौकशी सुरू आहे, असेही अमितेश कुमार यावेळी म्हणाले. तत्पूर्वी पुणे शहर पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले होते की, आम्ही संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करत आहोत. संशयिताबद्दलची माहिती लवकरच दिली जाईल. आम्ही संशयिताबद्दलची माहिती पडताळून पाहत आहोत. तक्रारदार तरूणीबरोबर त्याचे पूर्वी काही संबंध होते का? हेही तपासले जात आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ती घरात एकटी असताना सदर गुन्हा घडला होता. स्वतःला डिलिव्हरी एजंट सांगणाऱ्या एका व्यक्तीने सदनिकेत बळजबरीने प्रवेश केला. त्यानंतर ती बेशूद्ध असताना तिच्याबरोबर सेल्फी घेऊन त्यावर धमकी देणारा मेसेज लिहून ठेवला होता. पीडितेने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, डिलिव्हरी एजंटने बँकेसंबंधी काही कुरिअर आल्याचे सांगितले. पावतीवर स्वाक्षरी हवी असून तो पेन विसरला असल्याचे डिलिव्हरी एजंटने सांगितले. पीडिता घरात पेन आणण्यासाठी गेल्यानंतर संशयिताने फ्लॅटमध्ये प्रवेश केला आणि आतून दरवाजा बंद केला. त्यानंतर पीडितेवर संशियताने बलात्कार केला, असे पीडितेने म्हटले.
37 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Jul 1, 2025, 03:15 PM
पाशाणचा प्रवासः अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ शास्त्रज्ञ ते सहाय्यक शास्त्रज्ञ

पाशाणचा प्रवासः अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ शास्त्रज्ञ ते सहाय्यक शास्त्रज्ञ

त्यांनी रसायनशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण पुण्यात पूर्ण केले. पाषाण येथील एआरडीई येथे कनिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम करीत असताना माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांनी त्यांची निवड थुंबा विषुवृत्तीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्रावर साहाय्यक शास्त्रज्ञ म्हणून केली. तेथे त्यांना डॉ. वसंत गोवारीकर यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली.
15 shares
😐
Sakal logo
Sakal
Jun 22, 2025, 03:24 PM
प्रेरणा पुरस्कारः युवा नवोन्मेषासाठी एक राष्ट्रीय मंच

प्रेरणा पुरस्कारः युवा नवोन्मेषासाठी एक राष्ट्रीय मंच

-अविनाश साबापुरेयवतमाळ :आजूबाजूला समस्या दिसतात, त्या सोडविण्याचे उपायही सूचतात... पण करणार काय? आमचे कोण ऐकणार? असा गुंता तरुणांच्या मनात नेहमीच असतो. पण आता ही कोंडी फुटणार आहे. कोट्यवधी तरुणांच्या मनातील ‘आयडिया’ एकाच मंचावर गोळा करुन त्यातील दर्जेदार कल्पनांवर अंमलबजावणी होणार आहे. अन् या सोहळ्याचे नाव आहे ‘इन्स्पायर अवार्ड’!केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून महाराष्ट्रात नागपूरच्या राज्य विज्ञान शिक्षण संस्थेमार्फत त्यावर काम केले जात आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या ‘कोर्‍या’ मनात असंख्य नवकल्पना जन्म घेतात. त्या गोळा करून त्यातील उत्तम संकल्पनांना सन्मानित केले जाते. यंदा पहिल्यांदाच या स्पर्धेत अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनाही सामील करुन घेतले जाणार आहे. त्यामुळे इयत्ता सहावीच्या बालकांपासून तर बारावीच्या नवतरुणांपर्यंत सर्वांना आपली सर्जनशीलता राष्ट्रीय पातळीवर मांडण्याची संधी मिळणार आहे. रस्त्यावरची विस्कळीत वाहतूक, वेळी अवेळी जाणारी वीज, वारंवार बिघडणारा मोबाईल, खेड्यापाड्यातील नागरिकांना दूर पडणारी बाजारपेठ या आणि अशा कोणत्याही समस्यांवर तरुणांच्या मनात ‘सोल्यूशन’ असू शकते. तेच ‘सोल्यूशन’ सांगणारी संकल्पना त्यांना या स्पर्धेत मांडायची आहे.त्यासाठी 15 जूनपासून www.inspireawards-dst.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही माध्यमाच्या कोणत्याही व्यवस्थापनाच्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ही नोंदणी खुली आहे. त्यामुळे तरुणांना आपला ‘कल्पनाविलास’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सत्यात उतरविण्याची संधी आली आहे.महाराष्ट्रातील शाळांमध्ये इन्स्पायर मानक योजनेची माहिती देऊन विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचे निर्देश राज्य विज्ञान शिक्षण संस्थेच्या संचालक डॉ. हर्षलता बोरुडे यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या मनातील संकल्पना गोळा करण्यासाठी प्रत्येक शाळेत एक ‘आयडिया बॉक्स’ लावावा. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना लिहून त्यात टाकाव्या. त्यातून उत्तम संकल्पना शाळेने एकत्र कराव्या. विद्यार्थ्यांच्या कच्च्या कल्पना विकसित करण्यासाठी शाळेने मार्गदर्शन करावे. त्यानंतर त्यांची नोंदणी शासनाच्या पोर्टलवर करावी, असे निर्देश आहेत.
69 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Jun 21, 2025, 02:35 PM
कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारे बकरी वजन अॅप शेती उद्योगात क्रांती घडवून आणते

कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारे बकरी वजन अॅप शेती उद्योगात क्रांती घडवून आणते

AI For Goat Farming :आता शेळी खरेदी करण्यापूर्वी किंवा विकण्यापूर्वी त्याचे योग्य वजन आणि किंमत समजणे खूप सोपे होणार आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) अंतर्गत काम करणाऱ्या केंद्रीय शेळी संशोधन संस्थेने (CIRG) एक AI आधारित ॲप विकसित केले आहे, जे शेळीचे चित्र पाहूनच त्याचे वजन सांगेल. हे तंत्रज्ञान पशुपालकांसाठी गेम चेंजर ठरणार आहे. हे एआय ॲप कसे काम करेलहे स्मार्टफोन ॲप अगदी सोप्या पद्धतीने काम करेल. वापरकर्त्याला वेगवेगळ्या कोनातून शेळीचे फक्त तीन फोटो काढावे लागतील. त्यानंतर हे अॅप त्या चित्रांचे विश्लेषण करेल आणि शेळीचे अचूक वजन सांगेल. सीआयआरजीचे संचालक डॉ. मनीष कुमार चटली यांच्या मते, हे ॲप पुढील ३-४ महिन्यांत सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल. ते वापरण्यास खूप सोपे असेल. शेतकऱ्यांना काय फायदा होईल? वजनाबद्दल योग्य माहिती मिळाल्यास शेळीची योग्य किंमत निश्चित होण्यास मदत होईल.किंमतीत पारदर्शकता येईल, ज्यामुळे व्यापारात होणारी फसवणूक थांबेल.कमी किमतीत शेळ्या विकण्यास भाग पाडणाऱ्या लहान शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.हे ॲप पशुपालन वैज्ञानिक आणि संघटित करण्यास मदत करेल. देशातीलशेळीपालनाचीस्थितीभारतातशेळीपालनहा एक मोठा व्यवसाय आहे. २०१९ च्या पशुधन गणनेनुसार, देशात सुमारे १५-१६ कोटी शेळ्या आहेत. त्यापैकी सुमारे १२ कोटी शेळ्या मांस उत्पादनासाठी पाळल्या जातात. शेळ्या खरेदी करताना, व्यापारी अनेकदा संख्येच्या आधारावर व्यवहार करतात, तर खरी किंमत वजन आणि गुणवत्तेच्या आधारावर निश्चित केली जाते. त्यामुळे हे ॲप फायदेशीर ठरणार आहे. या शेळीला अधिक फायदा होईलभारतात शेळीपालनात ब्लॅक बंगाल जातीचा वाटा सुमारे १८% आहे. ही जात प्रामुख्याने पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडमध्ये आढळते. ब्लॅक बंगाल जातीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे वजन झपाट्याने वाढते आणि तिचे मांस देखील उच्च दर्जाचे असते. या अॅपच्या मदतीने आता शेतकऱ्यांना या जातीची प्रत्यक्ष किंमत देखील मिळू शकेल.
24 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Jun 11, 2025, 03:04 PM
कार्यक्षम आणि अचूक शेतीसाठी नाशिक जिल्ह्याने ड्रोन शेतीचा स्वीकार केला

कार्यक्षम आणि अचूक शेतीसाठी नाशिक जिल्ह्याने ड्रोन शेतीचा स्वीकार केला

- तेजस पुराणिकनाशिक :जिल्ह्यातीलकृषी क्षेत्रात(Agriculture Department) आता आधुनिक तंत्रज्ञानाची लाट आली असून,'ड्रोन शेती'ही (Drone Farming) त्यातील एक क्रांतिकारी संकल्पना ठरत आहे. पारंपरिक औषध फवारणी व खते छिपणीसाठी ज्या ठिकाणी अधिक श्रम आणि वेळ लागतो, तिये आता ड्रोनचा वापर करून अचूक आणि जलदशेतीकरणे शक्य झाले आहे. शेतीतआधुनिक तंत्रज्ञानाची भर घालणारी 'ड्रोन शेती' ही संकल्पना आतानाशिक जिल्ह्यात(Nashik District) वेगाने रुजत आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक कार्यक्षम आणि अचूक असा हा पर्याय असून, अनेक तरुण व प्रगतशील शेतकऱ्यांनी या नवकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. डोन शेती म्हणजे डोनच्या साह्याने पिकांवर खते व कीडनाशके फवारणे, पीक सर्वेक्षण करणे, जमिनीचे मोजमाप करणे, अशी कामे केली जातात. या पद्धतीत अचूक आणि सम प्रमाणातील फतारणीमुळे उत्पादनाचा दर्जा टिकतो आणि खर्चात मोठी बचत होते. विषारी औषधांपासून सुरक्षितताड्रोन शेतीचे स्वरूप अत्यंत सोपे असून, यामध्ये जीपीएस यंत्रणेसह उडणाऱ्या ड्रोनद्वारे पिकांवर हवे तेवढे औषध मोजक्यापणे फवारता येते. यामुळे औषधांचा अपव्यय होत नाही, वेळ व मजुरीची बचत होते, शिवाय शेतकऱ्यांना विषारी औषधांपासून सुरक्षितताही मिळते. या तालुक्यात होतो उपयोगपिंपळगाव बसवंतसह निफाड तालुक्यातील शेतकरी ड्रोन शेतीचा अवलंब करत आहेत. टोमॅटो आणि मका पिकांमध्ये ड्रोनच्या मदतीने औषधे व जैविक खते फवारली जातात. ड्रोन शेतीच्या साहाय्याने शेतकऱ्यांना मदत होत आहे. उत्पादनात वाढ होत असल्याने तंत्रज्ञाचा वापर वाढला आहे. ड्रोन वापरण्याचे फायदे ड्रोनच्या साह्याने आम्ही १० एकर टोमॅटो व २५ एकर मका पिकावर औषध फवारणी करतो. शासनाकडून मिळणाऱ्या ५० टक्के सबसिडीमुळे ड्रोन खरेदी सुलभ झाली आहे. भाडेतत्त्वावर पाचशे रुपये प्रतिएकर दराने याचा चांगला उपयोग करता येतो. एक एकरसाठी केवळ ४० लिटर पाण्याची गरज असते. मजुरी व अन्य खर्चात बचत होत असल्याने भविष्यात शेतकऱ्यांचा कल ड्रोन शेतीकडे वाढेल, अशी खात्री आहे.- समाधान साठे, शेतकरी, पालखेड मिरची, पिंपळगाव बसवंत
54 shares
😊
Lokmat logo
Lokmat
Jun 5, 2025, 03:15 PM
डिजिटल शेतीचा स्वीकारः आधुनिक युगातील शेतीचे भविष्य

डिजिटल शेतीचा स्वीकारः आधुनिक युगातील शेतीचे भविष्य

आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या आधुनिक युगात प्रत्येक क्षेत्र प्रगत होत असतानाशेतीक्षेत्र मात्र अनेक ठिकाणी अजूनही जुन्या रूढी आणि परंपरांवर टिकून आहे. पारंपरिक पद्धती, पिढ्यानपिढ्या चालत आलेली कामकाजाची साखळी आणि यातून निर्माण होणारी ‘कष्टाची भाकरी’ हे चित्र अजूनही बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जीवनात किंबहुना मनामनात कायम आहे. परंतु बदल ही काळाची गरज आहे आणि हा बदल आता केवळ गरज नसून एक अपरिहार्य वास्तव बनला आहे. वाढतं शहरीकरण आणि त्यातून निर्माण झालेल्या जमिनींच्या विभागण्या, हवामान बदलाची तीव्रता आणिबाजारातवाढलेली स्पर्धा या सर्व गोष्टींना तोंड देण्यासाठी पारंपरिकशेतीलाआता प्रगततेची जोड देणं अत्यावश्यक झालं आहे. आज डिजिटल शेतीचा जमाना आहे. पीक व्यवस्थापन, खत नियोजन, हवामानाचा अंदाज, कीड नियंत्रण यांसारख्या बाबींसाठी आता विविध अ‍ॅप्सद्वारे अचूक डेटा क्षणात उपलब्ध होतो. त्यातून पीक निवड करत कधी, कुठे, किती आणि कोणते पीक लावावं याचा निर्णय घेणे सोपे झाले आहे. तसेच या माहितीचा योग्य वापर करून आपलं उत्पन्न दुप्पटच नव्हे तर त्याहून अधिक करता येणं शक्य आहे. पण त्यासाठी शेतकऱ्यांनी आपली पारंपरिक मानसिकता बदलणे गरजेचे आहे. एकीकडे वास्तव हे आहे की जमिनी कमी होत आहेत पण दुसरीकडे अन्नधान्याची मागणी प्रचंड वाढत आहे. आजची ही परिस्थिती संकटासारखी वाटली तरी तीच एक मोठी संधी ठरू शकते. कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेणं, मागणीनुसार पीक निवड करणं,बाजारभावाचाअभ्यास करणं आणि साठवणूक व प्रक्रिया उद्योगात उतरून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणं ही सगळी दिशादर्शक तत्त्वं आजच्या शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतात. आजही अनेक शेतकरी शेतीतून फारसा नफा न मिळाल्यामुळे आपल्या मुलांना नोकरीसाठी शहरांकडे पाठवतात. पण खरा प्रश्न असा आहे की शेती नफा देत नाही की आपण तिच्यात पुरेसा अभ्यास आणि व्यावसायिक दृष्टिकोन आणलेला नाही? जर शेतीमध्ये अभ्यास, नियोजन आणि तंत्रज्ञान यांचा समावेश केला तर शेती नोकरीपेक्षा अधिक उत्पन्न देणारी व्यवसाय संधी नक्कीच ठरू शकते यात दुमत नाही. मात्र यात कष्टाला आधुनिक चटणी भाकरीची म्हणजेच विज्ञानाधिष्ठित दिशा आणि पारंपरिकतेला नवतेची साथ दिली गेली तर शेतीचं चित्र निश्चितपणे बदलू शकतं. कारण शेतकऱ्यांनी आता फक्त शेतमाल पिकवून थांबू नये तर त्याची किंमत स्वतः ठरवून विक्री व्यवस्थापनातही सक्रिय सहभाग घ्यावा घेणे गरजेचे आहे. हेही वाचा : शेतकऱ्यांना लुटतोय शेतकऱ्यांचाच लेक? व्यवस्थेच्या पुढे हतबल शेतीमातीतील व्यथा
28 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 27, 2025, 04:02 PM
विकास कृषी संकल्प अभियानः आधुनिक कृषी तंत्रज्ञानासाठी राष्ट्रव्यापी मोहीम

विकास कृषी संकल्प अभियानः आधुनिक कृषी तंत्रज्ञानासाठी राष्ट्रव्यापी मोहीम

देशभरात सुरू होणाऱ्या विकसित कृषि संकल्प अभियाना अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, सग्रोळी जिल्हानांदेडयांनीही संपूर्ण तयारी पूर्ण केली असून, या अभियानामार्फत कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती पोहोचवण्याचा निर्धार केला आहे. या अभियानाचा शुभारंभ २९ मे २०२५ रोजी ओडिशातील पुरी येथे केंद्रीय कृषी मंत्री श्री.शिवराज सिंह चौहानयांच्या उपस्थितीत होणार आहे. हा अभियान १५ दिवस चालणार असून, या कालावधीत देशातील ७०० हून अधिक जिल्ह्यांमधील सुमारे १.५ कोटी शेतकऱ्यांपर्यंत थेट संवाद साधण्यात येणार आहे. कृषि विज्ञान केंद्र सग्रोळीची भूमिका सग्रोळी येथील प्रमुख शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखालीनांदेडजिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी विशेष कार्ययोजना आखण्यात आली आहे. या योजनेत पुढील बाबींचा समावेश आहे. • खरीप हंगामातील लागवड, तण व्यवस्थापन, रोग-कीड नियंत्रण व जलसंधारण यावर प्रात्यक्षिकांचे आयोजन. • मृदा चाचणी अहवालावर आधारित खत व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन. • पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN), प्रधानमंत्री फसल विमा योजना, अटल भूमी सुधार योजना यांसारख्या शासकीय योजनांची माहिती. • स्मार्ट व विज्ञानाधिष्ठितशेतीपद्धतीचे प्रशिक्षण. • मुलाखती, चर्चासत्रे व संवाद कार्यक्रमांद्वारे शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणे. • शेतकऱ्यांच्या अनुभवांच्या आधारे भविष्यातील संशोधनाची दिशा निश्चित करणे. ‘या’ ८ तालुक्यांत राबणार अभियान नांदेड जिल्ह्यातील कृषि विज्ञान केंद्र, सग्रोळी हे या अभियानाचा भाग म्हणून ८ तालुक्यांत काम करणार आहे. यात बिलोली, देगलूर, नायगाव, उमरी, धर्माबाद, मुखेड, लोहा आणि कंधार या तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांतील ९० गावांमध्ये विशेष उपक्रम राबविले जाणार आहेत. प्रत्येक गावात तज्ज्ञ शास्त्रज्ञांची उपस्थिती राहणार असून, शेतकऱ्यांना त्यांच्या शंका व अडचणींवर थेट मार्गदर्शन दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन कृषि विज्ञान केंद्र सग्रोळी तर्फे सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या अभियानात जास्तीत जास्त सहभाग घ्यावा नवे ज्ञान मिळवावे आणि आपल्या उत्पादनक्षमतेत वाढ साधावी. हेही वाचा : एक एकरात किती रोपे? जाणून घ्या 'या' सूत्राच्या मदतीने शेतातील एकरी रोपांची संख्या
89 shares
😐
Pudhari logo
Pudhari
May 19, 2025, 02:30 PM
स्नोफॉक्स डिस्कव्हरी लिमिटेडचे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भविष्यातील हायड्रोजन साठा उघडण्याचे उद्दिष्ट

स्नोफॉक्स डिस्कव्हरी लिमिटेडचे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भविष्यातील हायड्रोजन साठा उघडण्याचे उद्दिष्ट

या शोधाचे व्यावसायिक रूपांतर करण्यासाठी Snowfox Discovery Ltd. ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. सॅटेलाइट इमेजिंग आणि भूगर्भीय सर्वेक्षणाद्वारे ही कंपनी भविष्यातील हायड्रोजन साठ्यांचे स्थान निश्चित करणार आहे.
24 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Apr 29, 2025, 02:36 PM
भारताचा विकासः अत्याधुनिक तंत्रज्ञानासह प्रगतीला गती देणे

भारताचा विकासः अत्याधुनिक तंत्रज्ञानासह प्रगतीला गती देणे

पुढील २५ वर्षात विकसित भारताचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. कल्पनेपासून ते वास्तवापर्यंतचा प्रवास शक्य तितक्या कमी वेळात पूर्ण करायचा आहे, असे ते म्हणाले.कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग, अडवान्स्‍ड अनॅलिटिक्स,अंतराळ तंत्रज्ञान, आरोग्य तंत्रज्ञान आणि कृत्रिम जीवशास्त्र यांना सातत्याने प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, उच्च दर्जाचे डेटासेट आणि संशोधन सुविधा निर्माण करण्यासाठी भारत-एआय मिशनची सुरुवात केल्याचा त्यांनी उल्लेख केला.
80 shares
😊
Loksatta logo
Loksatta
Apr 24, 2025, 02:43 PM
ए. आय. द्वारे चालणारा'लव्ह यू'हा चित्रपट फक्त दोन लोकांनी बनवला आहेः एक प्रीस्ट आणि एक ग्राफिक डिझायनर

ए. आय. द्वारे चालणारा'लव्ह यू'हा चित्रपट फक्त दोन लोकांनी बनवला आहेः एक प्रीस्ट आणि एक ग्राफिक डिझायनर

चित्रपट म्हटलं की कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, संगीतकार, क्रू मेंबर्स, लोकेशन अशा अनेक गोष्टी गरजेच्या असतात. पण फक्त दोन जणांनी यापैकी कोणत्याच गोष्टींशिवाय फक्त १० लाख रुपये खर्च करून एक चित्रपट तयार केला आहे, असं म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसेल का? कदाचित नाही. पण हे खरंय. हा चित्रपट आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा वापर करून तयार करण्यात आला आहे. बंगळुरूजवळच्या सिद्धेहल्ली गावातील पूजारी नरसिम्हा मूर्ती यांच्यासाठी हा चित्रपट एक स्वप्न होतं. स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी नूतन नावाच्या एआय एक्सपर्टची मदत घेतली. नूतन आधी ग्राफिक डिझायनर होते. ९५ मिनिटांच्या या कन्नड चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून U/A सर्टिफिकेट दिलं आहे. ‘लव्ह यू’ हा चित्रपट फक्त दोन जणांच्या टीमने केला आहे. नरसिम्हा मूर्ती व नूतन अशी त्यांची नावं आहे. त्यांनी एआयच्या मदतीने कलाकार तयार केले, साउंडट्रॅक बनवले व व्हिज्युअल क्रिएट केले. यानंतर त्यांनी ३० वेगवेगळे टूल्स वापरले. या चित्रपटासाठी १० लाख रुपयांचा खर्च आला. त्यापैकी जास्तीत जास्त पैसे एआय सॉफ्टवेअर लायसेन्सिंगवर खर्च केले आहेत. ‘टाइम्‍स ऑफ इंडिया’शी बोलताना नरसिम्हा मूर्ती यांनी सांगितलं की त्यांना जगातील पहिला एआय फीचर चित्रपट बनवायचा होता आणि तो सिनेमागृहांमध्ये रिलीज करायचा होता. एक रेकॉर्ड बनवण्यासाठी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करायचा आहे, अशी त्यांची इच्छा आहे. ९५ मिनिटांच्या या कन्नड चित्रपटात १२ गाणी आहेत आणि एआयने तयार केलेले संवाद आहेत. पण यासाठी मूर्ती यांनीही मेहनत घेतली आहे. ‘लव्ह यू’ हा जगातला पहिला एआय जनरेटेड चित्रपट नाही. २०२४ मध्ये ‘व्हेयर द रोबोट्स ग्रो’ नावाचा चित्रपट आला होता, जो पहिला एआय जनरेटेड चित्रपट आहे. नरसिम्‍हा यांनी सेन्सॉर बोर्डाची प्रतिक्रिया सांगितली. “रिजनल सेन्सॉर ऑफिसर्सनी सीनमधील पात्रांच्या सिंकिंग समस्येकडे लक्ष वेधले होते. कारण या पात्रांवर भावनिक सीन बनवणं तसेच लिप-सिंकिंग करणंही आव्हानात्मक होतं. पण सेन्सॉर बोर्डाने आमची महत्वाकांक्षा व इनोव्हेशनचं कौतुक केलं,” असं नरसिम्हा म्हणाले. नूतन म्हणाले, “आम्ही वापरलेले एआय टूल्स ६ महिने जुने आहेत. आता जर हा चित्रपट बनवायचा असेल तर तो हजार पट जास्त चांगला बनू शकेल.”
1 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Apr 18, 2025, 02:55 PM
कृषी क्षेत्रातील कमी कामगिरीः नवोन्मेष आणि धोरणात्मक नियोजनासाठी आवाहन

कृषी क्षेत्रातील कमी कामगिरीः नवोन्मेष आणि धोरणात्मक नियोजनासाठी आवाहन

Agriculture News :सध्या कृषिक्षेत्रात अस्तित्वास असलेल्या तंत्रज्ञानाचा स्तर आणि उपलब्ध असलेल्या नैसर्गिक संसाधनांचा पूर्ण वापर करूनही, आपल्याकडीलकृषिउत्पादन(Agri Product) त्याच्या मूळ क्षमतेपेक्षा निम्म्याहून कमी होत असल्याचे दिसून येत आहे. याबद्दल दोषारोप करताना मात्र अनेक प्रकारची कारणे सांगितली जातात. त्यामध्ये मुख्यतः आपल्या कृषिविस्तार पद्धतीला व यंत्रणेला दोष दिला जातो. मात्र या विषयीची चर्चा होत असताना, एकात्मिककृषी मूल्यवर्धन साखळीचा(Agricultural Value Chain) अभाव आहे, हे आधी मान्य करून त्या दिशेने अधिक विचार करण्याची व त्यानुसार नियोजनाची प्रक्रिया सुरू करायला हवी. खरेतर अत्यंत उपेक्षित व दुःखी असलेल्या शेतक-याला या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी, एकात्मिक कृषी मूल्यवर्धन साखळीतील सर्व महत्त्वाच्या घटकांची वा प्रक्रियांची अंतर्गत व बाहयस्त्रोतांमध्ये योग्य तो समन्वय प्रस्थापित करणे आणि परस्परांमधील सहकार्य वाढविण्याचा प्रयत्न करणे, ही काळाची गरज बनली आहे. स्वयंप्रेरित शेतकऱ्यांचे कार्य व कर्तृत्व कृषिउत्पादन व विपणन व्यवस्थेची साखळी उभारण्याची कोणतीही विश्वासार्ह यंत्रणा व कार्यपद्धती उपलब्ध नसताना देखील मोठ्या संख्येने शेतक-यांच्या आणि त्यांनी सुरू केलेल्या उत्पादक गटांच्या यशोगाथा कशा निर्माण झाल्या हा प्रश्न शिल्लक राहतोच. असे असून देखील बहुसंख्यशेतकरीगटांना यश प्राप्त करणे का जमू शकले नाही, याचाही विचार व्हायला हवा. महाराष्ट्र राज्यापुरता विचार केला तर असे निदर्शनास येईल की राज्यात सुमारे १.२५ लाखशेतकरीगटांची व ४ लाखाहून अधिक महिला बचत गटांची निर्मिती करण्यात आलेली आहे, परंतु यातून निर्माण झालेल्या यशोगाथा क्षणिक होत्या. अर्थात त्यालाही काही अपवाद आहेत. कष्टाळू शेतकऱ्यांनी अत्यंत निर्धाराने आणि मेहनतीने अनेक वर्षे कृतीशील प्रयोग केले. त्याचबरोबर, उत्पादन प्रक्रिया आणि महत्त्वाच्या विपणन प्रक्रियेशी संबंधित घटकांचा योग्य तो ताळमेळ घालण्याच्या कलेत नैपुण्य मिळविले. हीशेतीनिष्ठमंडळी त्यांच्या मातीचा कस वाढवितात, संरक्षित सिंचनामार्फत जमिनीच्या गरजेनुसार आर्द्रता टिकवितात, त्यांच्या पिकपद्धतीमध्ये विविधता आणतात. या सर्व क्षेत्रात नेमके कोणते धोके आहेत हे सुद्धा लोकांपर्यंत पोहोचविण्याकडे लक्ष देत असतात. त्याबरोबरच, ही मेहनती मंडळी कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय आणि फलोत्पादन सारख्याशेतीपूरकउद्योगांचीही त्याला जोड देतात, हे मुद्दामहून नमूद करावेसे वाटते. प्रचलित कृषि उत्पन्न बाजार समिती संचलित मंडई अथवा बाजार व्यवस्थेवर अवलंबून न राहता, हे शेतकरी स्वयंप्रेरणेने विविध प्रकारच्या बाजारपेठांचा हुशारीने शोध घेत राहतात आणि पर्यायी अशी आदर्शवत कृषि मूल्यसाखळी निर्माण करण्यासाठी पडेल ते कष्टही उपसतात. शेतमालाचे उत्पादन वाढविण्यासाठी पिकातील रोगाचे निदान केंद्रसरकार तसेच राज्यशासनाने कृषीमूल्य साखळीतील प्रत्येक घटकाकरीता वेगवेगळ्या प्रकारच्या योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाअंतर्गत कडधान्ये आणि डाळींचे उत्पादन, राष्ट्रीय तेलबिया अभियान, एकात्मिक फलोत्पादन विकास योजना, कृषिविस्तार व तंत्रज्ञान अभियान, पंतप्रधान पीकविमा योजना, पंतप्रधान कृषीसिंचन योजना; राष्ट्रीय बांबू अभियान; परंपरागत कृषिविकास योजना, आदी अनेक योजनांचा समावेश आहे. केंद्र व राज्यशासनामार्फत कृषि उत्पादन वाढविणा-या योजना सुरू करण्याची जणू लाटच आल्याची शंका यावी, अशीच परिस्थिती निर्माण झालेली असल्याचे दिसून येते. त्याचा श्रीगणेशा केंद्रीय पातळीवर, प्रधान मंत्री किसान सन्मान निधी (PMKISAN) आणि एका राज्यात कृषक असिस्टंट फॉर लायव्हीहूड एन्ड इन्कम ऑगमेंटेशन (KALIA) या योजनांपासून झाला आहे. या योजनेतर्गत बी-बियाणे, खते, कीटकनाशकांची फवारणी, वीज, पाणी आणि पतपुरवठासुद्धा सवलतीने उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. शासकीय योजनांच्या एकत्रिकरणासाठी व्यासपीठ खरेतर, कृषिक्षेत्राच्या समग्र विकासातील वेगवेगळ्या घटकांसाठी प्रचलित शासकीय योजनांचे एकत्रिकरण करण्याची नितांत गरज आहे. परंतु दुर्दैवाने ही बाब अद्यापही शासकीय यंत्रणेबाहेरील तसेच शासकीय सेवेत असणा-या लोकांच्या लक्षात आलेली दिसत नाही. राष्ट्रीय कृषी विकास योजने (RKVY) अंतर्गत, विविध योजना एकत्रित आणण्यासाठीचे व्यासपीठ देखील अस्तित्वात आहे. त्याद्वारे संपूर्ण कृषिमूल्य साखळीतील घटक समाविष्ट होतील असे प्रकल्प तयार करणे शक्य आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप फॉर इंटिग्रेटेड ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट (PPP-IAD) या योजनेच्या माध्यमातून अशाप्रकारची शक्यता प्रत्यक्षात उतरविता येऊ शकते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश वगळता इतर राज्यात या योजनेचा अजिबातच उपयोग केला गेलेला नाही आणि अशा राज्यांमधून उपलब्ध निधींपैकी अगदी अल्पसा निधी या उद्देशाकरिता वापरण्यात आला असल्याचे आढळून येते. महाराष्ट्र राज्यात अशा प्रकारचे अनेक प्रयोग करण्यात आले आहेत व त्यांना काही प्रमाणात यशही मिळाल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसून येते. सन २०१२-१७ याः कालावधीत खाजगी क्षेत्राला सोबत घेऊन विविध पिकांच्या मूल्य साखळ्या विकसित करण्यात आल्या. परंतु त्यांना शाश्वत रूप देण्यास पुढील नियोजन आवश्यक होते ते पुढे न केल्याने त्या मूल्यसाखळ्या बाल्यावस्थेतच राहून लुप्त झाल्या. यावर मोठ्याप्रमाणात संशोधन होणे आवश्यक असून त्यातील कमतरता काढून नव्याने अशा प्रकारचे पुन्हा प्रयत्न होणे अत्यंत आवश्यक आहे. कृषीविकास घटकातील समन्वय मार्गदर्शक तत्वे शाश्वत कृषिविकासाच्या मूल्यसाखळीला चालना देण्याकरिता शासकीय विभाग आणखी एका मोहिमेचा उपयोग करून घेऊ शकतात आणि ती म्हणजे 'नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ऍग्रिकल्चर' (NMSA). त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे, नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज (NAPCC). त्याअंतर्गत असलेले 'शाश्वत कृषी अभियान' हे ढोबळमानाने दहा शीर्षकांखाली विविध घटकांचे एकीकरण करण्याची शिफारस करते. त्यानुसार सुधारित बी-बियाणे, पशुसंवर्धन आणि मत्स्योद्योग, पाण्याचा कार्यक्षम वापर, किडनियंत्रण व्यवस्थापन, सुधारित लागवड व पीक पद्धती, पोषकद्रव्यांचे व्यवस्थापन, कृषी विमा, पतपुरवठा साहाय्य, बाजारपेठा, माहितीची उपलब्धता आणि उपजीविकेच्या साधनांमध्ये विविधता, आदी उपक्रम अंतर्भूत करण्यात आले आहेत. नव्याने कृषिमूल्यसाखळी प्रस्थापित करण्यासाठी आणखीन दुसरे काय पाहिजे असते? कृषीसंबंधित मंत्रालयांची विभाजित कार्यप्रणाली वरील परिच्छेदामधून स्पष्टपणे दिसून येते की, शासकीय यंत्रणा ही अनेक विभागांमध्ये विभागली गेली आहे. त्यामध्ये अखंडित मूल्यवर्धन साखळीचा अविभाज्य भाग म्हणून विविध घटकांना सामावून घेण्याची कोणतीच व्यवस्था उभारण्याचा विचार झालेला दिसत नाही. कृषिक्षेत्रातील संशोधन व्यवस्थेबाबतीतही असेच म्हणता येईल. राष्ट्रीय कृषी विकास योजना किंवा राष्ट्रीय शाश्वत कृषिविकास मिशन यासारख्या विविध घटकांचे एकत्रिकरण करणाऱ्या संरचना जरी अस्तित्वात असल्या, तरी त्यांचा उपयोग क्वचितच केला जात असल्याचे निदर्शनास येते. याचे मुख्यकारण म्हणजे एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या अनेक शिरोबिंदू / शिरोविभागांचे (व्हर्टिकल्स) त्यामध्ये वर्चस्व असल्याचे आढळून येते. त्याचबरोबर, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवलेले असतानाही, आश्चर्याची बाब म्हणजे भौगोलिक सलगतेचा विचार करण्याची तसेच शेतकरी उत्पादक गटांना या उद्दिष्टपूर्तीसाठी का होईना, परंतु एकत्र येण्याची कोणतीही सक्ती केलेली दिसून येत नाही. ज्या प्रकारे कृषिविकासाशी संबंधित असलेली विभागली गेलेली मंत्रालये, त्यातील खाती आणि विभाग हे आपापल्या मर्यादित वर्तुळातच ठोकळेबाज पद्धतीने काम करत राहतात, ती परिस्थिती नक्कीच निराशाजनक म्हणावी लागेल. कृषीसंकट : शेतक-यांचा क्रयशक्तीवर परिणाम एकीकडे, शासनव्यवस्था एकत्रित येऊन कृषिमूल्यवर्धन साखळी भक्कम करण्याकरीता आवश्यक तो हस्तक्षेप करून, दुस-या बाजूने प्रतिकूल परिणाम करणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष देण्यात आणि त्यांची सोडवणूक करण्यात खूपच कमी पडल्याचे चित्र दिसून येते. अर्थात, याबाबत खाजगीक्षेत्राचा विचार केला तरी काय दिसते? खाजगी क्षेत्र देखील स्वतःचे व्यावसायिक हित डोळ्यासमोर ठेवून हे कार्य करण्यास सिद्ध आहेत का, याचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागते. खाजगी क्षेत्र ज्या शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करीत असल्याचा दावा करतात, त्या शेतकऱ्यांची खरेदी करण्याची क्षमता ही कृषिक्षेत्रातील वाढत्या संकटामुळे नक्कीच कमी झाली आहे. शेतक-यांची क्रयशक्ती कमी झाल्याचा प्रतिकूल परिणाम खाजगी क्षेत्रातील सामाजिक उद्योगांच्या थेट कामकाज व व्यवसायावरही होताना दिसून येतो, शेतीसाठी लागणाऱ्या कृषिनिविष्ठा (इनपुटस) आणि त्याअनुषंगाने आवश्यक असलेल्या सेवांचा पुरवठा करण्याबाबतचे स्थानिक वा विभागीय पातळीवरील नेतृत्व करावे, अशी ईर्षा खाजगीक्षेत्राला वाटते का? याचाही आपण शोध घेतला पाहिजे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास आम्ही मदत करीत आहोत, असा दावा जरी खाजगी क्षेत्रातील मंडळी करीत असली, तरीही प्रत्यक्षात ना शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट होत आहे, ना कृषिक्षेत्रावरील संकट दूर होण्याची चिन्हे दिसत आहेत, असे नाइलाजाने म्हणावे लागते. यावर सूक्ष्म पद्धतीने संशोधन होण्याची आवश्यकता असून त्याद्वारे उपाययोजना करणे नक्कीच शक्य होऊ शकेल. खाजगीक्षेत्राला भेडसावणा-या समस्या खाजगीक्षेत्रातील उद्योगांचा आणखी एक गट असा आहे, की जो शेतकऱ्यांनी पिकविलेला माल, व्यापारी, किरकोळ विक्रेते, निर्यात किंवा त्यावर प्रक्रिया करण्याच्या हेतूने, होलसेल भावाने खरेदी करतात. त्यांच्यापैकी अनेकजण हा शेतमाल मध्यस्थांकडून खरेदी करतात. उत्पादित शेतमाल हा दर्जेदार आहे की नाही हे पाहण्यास, तसेच आपल्याला हवा तितका माल थेट शेतकऱ्यांकडून नियमितपणे खरेदी करण्यास हे व्यापारी फारसे कष्ट घेताना दिसत नाहीत. मात्र या व्यवसायिकांच्या अडचणींचा विचार केल्यास, त्यांना अत्यावश्यक वस्तू कायदा, कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा (APMC), त्याचप्रमाणे जमिनी भाडेपट्ट्‌याने घेणे, कंत्राटी शेती, गोदामांची सोय, पॅकेजिंग, वगैरे बाबतचे प्रचलित कायदे व नियमांच्या अनुषंगाने खरोखरच खूप समस्या भेडसावत असतात, हे पण तितकेच खरे. त्यातूनही काही व्यापारी मात्र थेट शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी करण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील असतात. अर्थात त्यांची संख्या खूपच कमी आहे. एकंदरीतच बहुसंख्य व्यापा-यांचा, थेट शेतकऱ्यांकडून माल खरेदी करण्याबाबतचा दृष्टिकोन हा नकारात्मक असल्याचे दिसून येते. काही उद्योजक हे जागतिक स्तरावर व्यवसाय करणारे आहेत. ही मंडळी स्वतःला जरी शाश्वत अन्नप्रणालीचे पुरस्कर्ते म्हणवून घेत असली, तरी विपणन विषयक सुधारणांच्या अभावामुळे, त्यांनी अगदी छोट्या क्षेत्रावरही एकात्मिक मूल्यवर्धन साखळी निर्माण करण्यापासून स्वतःला आवर्जून दूर ठेवल्याचे आढळून येते. भारत सरकारला खाजगीक्षेत्रातील उद्योजकांच्या समस्यांची पूर्णतः जाणीव असली, तरी त्यासंबंधी या मंडळींना जी काळजी वाटते ती सरकारला फारशी वाटत नसावी. अनेक राज्यांनी २००३ मध्ये विपणन विषयक एक नमुना कायदा आणल्यानंतरच्या काळात जरी या क्षेत्रात नवनव्या सुधारणांची लाट आली असली, तरी देखील खाजगी उद्योजकांना या प्रकारच्या सुधारणांनी फारसे प्रभावित केल्याचे मात्र दिसून येत नाही. अशा प्रकारे केल्याजाणा-या सुधारणांच्या बाबतीत खाजगी क्षेत्राच्या सरकारकडून ज्या काही अपेक्षा आहेत, त्यांची पूर्तता झाल्याचे दिसून येत नाही. कृषी हा राज्याच्या अखत्यारीतील विषय असल्यामुळे, केंद्र सरकारने या अनुषंगाने जे तीन नमुना कायद्यांचे मसुदे तयार केले, ते देशातील सर्व राज्यांना पाठवण्यात आले. त्यामध्ये एक कायदा हा विपणन-व्यवस्थेविषयी, दुसरा कंत्राटी शेतीबद्दलचा, तर तिसरा जमिनीच्या भाडेपट्ट्याबाबतचा आहे. काही राज्यांनी हे कायदे स्वीकारले असले तरी, या स्वरूपाच्या कायद्यांमुळे खाजगी उद्योगक्षेत्र हे शेतकऱ्यांशी थेटपणे जोडले जाईल की नाही, या कायद्यांचा दोघांवर नेमके कोणकोणते परिणाम होतील, याबद्दलचे मूल्यांकन इतक्या अल्पावधीत होण्याची शक्यताही वाटत नाही. -डॉ सुधीरकुमार गोयल (माजी अपर मुख्य सचिव (कृषी), महाराष्ट्र राज्य) - मंगेश तिटकारे (व्यवस्थापकीय संचालक)महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. साखर संकुल, पुणे - प्रशांत चासकर(शेतमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ञ. प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. साखर संकुल पुणे)मो.नं. ९९७०३६४१३०
43 shares
😢
Loksatta logo
Loksatta
Apr 9, 2025, 03:29 PM
IPL 2025: राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सला नमवले

IPL 2025: राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सला नमवले

IPL 2025 Live Score Gujarat Titans vs Rajasthan Royals:आयपीएल २०२५ रायव्हलरी विकमध्ये आजचा सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना गुजरातच्या घरच्या मैदानावर अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडिमयवर खेळवला जात आहे. शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखालील गुजरातचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये चांगल्याच फॉर्मात आहे. तर राजस्थान रॉयल्सच्या संघालाही सूर गवसला आहे. त्यामुळे आजचा सामना फारच अटीतटीचा होणार आहे. IPL 2025 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Cricket Score Updates: आयपीएल २०२५ गुजरात टायटन्स वि. राजस्थान रॉयल्स सामन्याचे लाईव्ह अपडेट्स गुजरात टायटन्स संघाने १५ षटकांत २ बाद १४५ धावा केल्या आहेत. सुदर्शन आणि शाहरूख खान यांनी चांगली भागीदारी रचत संघाच्या चांगल्या धावसंख्येचा पाया रचला आहे. तीक्ष्णाच्या १०व्या षटकातील अखेरचा चेंडू बटलरच्या मागच्या पायाला जाऊन लागला, एलबीडब्ल्यूसाठी खेळाडूंनी अपील केलं. पण मैदानावरील पंचांनी बाद दिलं नाही. संजूने लगेचच चर्चा करून रिव्ह्यू घेतला आणि बॉल ट्रॅकिंगमध्ये चेंडू थेट विकेटवर आदळलेला दिसला. यासह बटलर पायचीत होत बाद झाला आणि बटलर-साई सुदर्शनची ८० धावांची भागीदारी तुटली. शानदार फॉर्मात असलेल्या साई सुदर्शनने अजून एक शानदार अर्धशतक झळकावलं आहे. साई सुदर्शनने राजस्थान रॉयल्सविरूद्ध सामन्यात ३२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले आहे. साई सुदर्शन आणि जोस बटलरने मिळून पॉवरप्लेमध्ये १बाद ५६ धावा केल्या आहेत. तर जोफ्रा आर्चरने शुबमन गिलची एक विकेट घेतली. साई सुदर्शन ३९ धावा तर बटलर ११ धावा करत खेळत आहे. जोफ्रा आर्चरने सामन्यातील तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर शुबमन गिलला क्लीन बोल्ड करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला आहे. गिल 2 धावा करत माघारी परतला. गुजरात वि. राजस्थान सामन्याला सुरूवात झाली असूनशुबमन गिलआणि साई सुदर्शनची जोडी फलंदाजीला उतरली आहे. तर जोफ्रा आर्चरच्या हातात नवा चेंडू आहे. साई सुदर्शन,शुबमन गिल(कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक),शाहरुख खान,राहुल तेवतिया, शेरफन रूदरफोर्ड, रशीद खान, आर साई किशोर,मोहम्मद सिराज,प्रसीध कृष्णा,अरशद खान यशस्वी जैस्वाल,संजू सॅमसन(कर्णधार आणि यष्टिरक्षक), नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल,शिमरॉन हेटमायर,फजलहक फारूकी,जोफ्रा आर्चर,महेश थेक्षाना, संदीप शर्मा, तुषार देशपांडे गुजरात टायटन्स वि.राजस्थान रॉयल्ससामन्याची नाणेफेक राजस्थान संघाने जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघात वानिंदू हसरंगा त्याच्या वैयक्तिक कारणामुळे संघाबाहेर झाला आहे. त्याच्या जागी फजलहक फारूकीला संधी देण्यात आली आहे. गुजरातने आतापर्यंत खेळलेल्या ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत आणि ६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर राजस्थाननेही ४ पैकी २ सामने जिंकले आहेत आणि ४ गुणांसह ७ व्या स्थानावर आहे. आयपीएलच्या या हंगामात संजू सॅमसनचा कर्णधार म्हणून हा दुसरा सामना असेल. मागील सामन्यात त्याने कर्णधार म्हणून विजय नोंदवला होता, तर शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखाली गुजरातने विजयाची हॅटट्रिक साधली आहे. या सामन्यात दोन्ही संघ विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. शुबमन गिल (कर्णधार), रशीद खान, साई सुदर्शन,राहुल तेवतिया,शाहरुख खान, जोस बटलर,मोहम्मद सिराज,कागिसो रबाडा, प्रसिध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, शेरफेन रदरफोर्ड, जेराल्ड कोएत्झी, आर साई किशोर, महिपाल लोमरोर, गुरनूर सिंग ब्रार, मोहम्मद खान, अरविंद खान,इशांत शर्मा,कुमार कुशाग्र, मानव सुथार, अनुज रावत, मानव सिंधू, जयंत यादव, ग्लेन फिलिप्स, करीम जनात, कुलवंत खेजुरालिया. संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल,शिमरॉन हेटमायर,संदीप शर्मा,जोफ्रा आर्चर,महेश तीक्ष्णा, वानिंदू हसरंगा, आकाश मधवाल,कुमार कार्तिकेय,नितीश राणा, युधवीर सिंग, फजलहक फारुकी, वैभव सुर्यवंशी, क्वेना मफाका, कुमार कार्तिकेय, कुणाल राठोड, अशोक शर्मा, तुषार देशपांडे, शुभम दुबे.
76 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Apr 8, 2025, 03:06 PM
आयपीएल 2025: एल. एस. जी. विरुद्ध के. के. आर. सामन्याचे अपडेट्स मुल्लानपूरमधून

आयपीएल 2025: एल. एस. जी. विरुद्ध के. के. आर. सामन्याचे अपडेट्स मुल्लानपूरमधून

IPL 2025 LSG VS KKR Live Match Updates:आयपीएल २०२५ मध्ये रायव्हलरी विक सुरू असून आजचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पंजाब किंग्स वि. चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवला जात आहे. हा सामना पंजाबच्या घरच्या मैदानावर म्हणजेच मुल्लानपूर येथे होते आहे. सलग तीन सामन्यांमध्ये पराभवानंतर विजयाच्या शोधात असलेला चेन्नई संघ आज कशी कामगिरी करणार यावर सर्वांच्या नजरा आहेत. तर घऱच्या मैदानावर यंदाच्या मोसमात पहिला पराभव पत्करलेला संघ पंजाब कसं पुनरागमन करणार यावरही नजरा असतील. IPL 2025 Punjab Kings vs Chennai Super Kings Live Cricket Score Updates: पंजाब किंग्स वि. चेन्नई सुपर किंग्स सामन्याचे लाईव्ह अपडेट्स ४२ चेंडूत १०३ धावांची थराराक खेळी साकारल्यानंतर प्रियांश आर्य बाद झाला. नूर अहमदच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याचा प्रियांशचा प्रयत्न विजय शंकरच्या हातात जाऊन विसावला. शतकवीर प्रियांश आर्यने मथिशा पथिराणाच्या षटकात २३ धावा कुटल्या. २४वर्षीय प्रियांश आर्यने चेन्नईविरुद्ध ३९ चेंडूत शतकाला गवसणी घातली. मथिशा पथिराणाच्या षटकात ३ षटकार आणि चौकार लगावत प्रियांशने आयपीएलमधलं पहिलंवहिलं शतक गाठलं. प्रियांश आर्यच्या धुवांधार अर्धशतकानंतरही पंजाबची अवस्था बिकट झाली आहे. १० षटकं पूर्ण होण्याआधीच त्यांचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. अनुभवी रवीचंद्रन अश्विनने एकाच षटकातनेहल वढेराआणिग्लेन मॅक्सवेलयांना तंबूत धाडण्याची किमया केली. फटकेबाजीसाठी प्रसिद्ध प्रियांश आर्यने १९ चेंडूतच अर्धशतकाला गवसणी घातली. पंजाबकडून सलामीला उतरलेल्या प्रियांश आर्याने खलील अहमदच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत दणक्यात सुरूवात केली आहे. प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक),श्रेयस अय्यर(कर्णधार), मार्कस स्टॉइनिस,नेहल वढेरा,ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, मार्को जॉन्सन,अर्शदीप सिंग,लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल. ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, विजय शंकर, शिवम दुबे,रवींद्र जडेजा,एमएस धोनी (यष्टीरक्षक),रविचंद्रन अश्विन,नूर अहमद, मुकेश चौधरी/अंशुल कंबोज, खलील अहमद, मतिषा पाथिराना. पंजाब किंग्स वि.चेन्नई सुपर किंग्ससामन्याची नाणेफेक श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखाली पंजाब संघाने जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबच्या संघाने प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल केलेला नाही. तर गेल्या सामन्यातील प्लेईंग इलेव्हनसह चेन्नईचा संघ उतरणार आहे. आयपीएलमध्येचेन्नई सुपर किंग्सआणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आतापर्यंत ३० सामने खेळले गेले आहेत. यापैकी चेन्नईने १६ तर पंजाबने १३ सामने जिंकले आहेत. शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग,अर्शदीप सिंग,श्रेयस अय्यर(कर्णधार), युझवेंद्र चहल, मार्कस स्टॉयनिस,ग्लेन मॅक्सवेल,नेहाल वढेरा , हरप्रीत ब्रार, विष्णू विनोद, विजयकुमार विशाक, यश ठाकूर, मार्को यान्सन, जोश इंग्लिस, लॉकी फर्ग्युसन, अजमतुल्ला उमरझाई, हरनूर पन्नू , कुलदीप सेन, प्रियांश आर्य, ऍरॉन हार्डी, मुशीर खान, सूर्यांश शेडगे, झेवियर बार्टलेट, प्याला अविनाश, प्रवीण दुबे. ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी,रवींद्र जडेजा,शिवम दुबे, मथिशा पाथीराना, नूर अहमद,रविचंद्रन अश्विन,डेव्हॉन कॉनवे, सय्यद खलील अहमद, रचिन रवींद्र, अंशुल कंबोज, राहुल त्रिपाठी, सॅम करन, गुर्जपनीत सिंग, नॅथन एलिस, दीपक हुड्डा, जेमी ओव्हरटन, विजय शंकर, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, श्रेयस गोपाल, रामकृष्ण घोष, कमलेश नागरकोटी, मुकेश चौधरी, शेख रशीद
49 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Apr 7, 2025, 03:32 PM
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूः बुमराच्या पुनरागमनामुळे मुंबईच्या संधी वाढल्या

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूः बुमराच्या पुनरागमनामुळे मुंबईच्या संधी वाढल्या

IPL 2025, RCB VS MI Live Match Updates:चारपैकी तीन सामने गमावलेल्या मुंबई इंडियन्ससाठी आठवड्याची सुरुवात एका सकारात्मक गोष्टीने होणार आहे. दुखापत आणि नंतर रिहॅब यामुळे प्रदीर्घ काळ मैदानापासून दूर असलेला जसप्रीत बुमराह पुनरागमनसाठी सज्ज झाला आहे. नॅशनल क्रिकेट अकादमीने त्याला खेळण्यासाठी परवानगी दिली आहे. बुमराहने सहकाऱ्यांबरोबर सरावही केला. बुमराहच्या बरोबरीने मुंबईचा राजा रोहित शर्माही बंगळुरूविरुद्ध खेळण्यास तय्यार आहे. वानखेडेवर चाहत्यांच्या प्रचंड पाठिंब्यात सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मुंबईचा संघ आतूर आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूसाठी हे खडतर आव्हान असणार आहे. भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड या अनुभवी शिलेदारांकडून बंगळुरूला मोठया अपेक्षा आहेत. विराट कोहलीकडे चाहत्यांचं लक्ष आहे. Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Live Cricket Score Updates: मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्याचे लाईव्ह अपडेट्स रजत पाटीदारने सूत्रधाराची भूमिका बजावत खणखणीत फटकेबाजी केली. अनुभवी ट्रेंट बोल्टच्या षटकात जितेश शर्मा आणि रजत पाटीदार यांनी १८ धावा लुटल्या. मुंबई इंडियन्स संघाने युवा फिरकीपटू विघ्नेश पुथ्थूरच्या जागी अनुभवी रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून समाविष्ट केलं आहे. विघ्नेशने एका षटकात १० धावा देत देवदत्त पड्डीकलला बाद केलं होतं. एका षटकापुरताच विघ्नेशची भूमिका मर्यादित राहिली. उर्वरित डावात फिरकीपटूंचा प्रयोग होण्याची शक्यता नसल्याने रोहित शर्माला समाविष्ट करण्यात आलं. ऑफस्टंपच्या बाहेर पाचव्या स्टंपावरून चेंडू तटवण्याचा लायम लिव्हिंगस्टोनचा प्रयत्न पूर्णपणे फसला. जसप्रीत बुमराहने झेल टिपला. सुरेख लयीत खेळणाऱ्या विराट कोहलीला अक्रॉस जाऊन विचित्र फटका खेळणं महागात पडलं. हार्दिक पंड्याचा ऑफस्टंपबाहेरचा चेंडू लेगसाईडला खेळण्याचा प्रयत्न हवेत उडाला. नमन धीरने सहज झेल घेतला. कोहलीने ४२ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. पहिल्या षटकात दुसऱ्याच चेंडूवर विकेट मिळाल्यानंतरही मुंबईने विस्कळीत गोलंदाजीचं प्रदर्शन घडवलं आहे. दुसरीकडेविराट कोहलीउत्तम फॉर्मात असून शतकाच्या दिशेने वाटचाल करतो आहे. सुरेख लय गवसलेल्या विराट कोहलीने मुंबईविरुद्ध वानखेडे मैदानावर अर्धशतक पूर्ण केलं. दुसऱ्या बाजूने चांगली साथ देणारा देवदत्त पड्डीकल मात्र विघ्नेशच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने २२ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. फिल सॉल्ट बाद झाल्यानंतर देवदत्त पड्डीकलने सूत्रधाराची भूमिका घेत मनमुराद फटकेबाजी केली. यामुळेच बंगळुरूने पॉवरप्लेच्या ६ षटकात ७३ धावांची लूट केली. विराट कोहलीने भारतीय संघातील सहकारी जसप्रीत बुमराहचं स्वागत षटकाराने केलं. तीन महिन्यांनंतर पुनरागमन करणाऱ्या बुमराहला कोहलीने मिडविकेट क्षेत्रात षटकार मारला. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यावर पुढच्याच चेंडूवर डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने फिल सॉल्टला त्रिफळाचीत केलं. ५ जानेवारीनंतर बुमराह पहिल्यांदाच कोणताही व्यावसायिक सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बुमराहने प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या मनात धडकी भरवली होती. बुमराहने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ४२ विकेट्स पटकावत मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता. मात्र त्यानंतर पाठीचं दुखणं बळावल्याने त्याला प्रदीर्घ काळ खेळता आलेलं नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही तो खेळू शकला नाही. बंगळुरूस्थित नॅशनल क्रिकेट अकादमीत रिहॅब प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता तो खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या लढतीत टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.रोहित शर्माआणिजसप्रीत बुमराहदोघेहीमुंबईसंघात परतले आहेत. https://twitter.com/mipaltan/status/1909231945575260260 आयपीएलमध्येमुंबई इंडियन्सआणिरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू३३ वेळा आमनेसामने आले आहेत. यादरम्यान मुंबईने १९ सामने जिंकले, तर बेंगळुरू संघाला १४ वेळा जिंकण्यात यश आले. तर वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई आणि आरसीबी यांच्यात १२ सामने खेळले गेले. ज्यामध्ये मुंबईने ९ वेळा तर आरसीबीने ३ वेळा विजय मिळवला. म्हणजेच या मैदानावर मुंबई इंडियन्सचा आरसीबीविरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे. लखनौविरुद्धच्या लढतीत हाणामारीच्या षटकांमध्ये मोठे फटके खेळता न आल्याने तिलक वर्माला रिटायर आऊट करण्याचा निर्णय मुंबईचे प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी घेतला. या निर्णयावर प्रचंड टीका झाली. तिलकच्या जागी मिचेल सँटनर आला. पण त्याला स्ट्राईकच मिळाला नाही. मुंबईने तो सामना गमावला.रोहित शर्मासंघात परतल्यानंतर विल जॅक्स तिसऱ्या क्रमांकावर परतू शकतो. नमन धीरने लखनौविरुद्ध दमदार खेळी साकारली होती. अशा परिस्थितीत तिलकला संघात स्थान पटकावण्यासाठी संघर्ष करायला लागू शकतो. टीम डेव्हिड, रोमारिओ शेफर्ड, नुवान तुषारा गेल्या हंगामातमुंबईइंडियन्सकडून खेळले होते. विल जॅक्स आणि रीस टोपले गेल्या हंगामातरॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसंघाकडून खेळले होते. आता तेमुंबई इंडियन्ससंघाचा भाग आहेत. भारतीय संघ आणिमुंबईइंडियन्सचं प्रमुख अस्त्र असलेलाजसप्रीत बुमराहपुनरागमनसाठी सज्ज झाला आहे. गेल्या हंगामात बुमराहने २० विकेट्स पटकावल्या होत्या. २०२४ हंगामात सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराह तिसऱ्या स्थानी होता.
2 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Apr 7, 2025, 03:28 PM
चीन वगळता इतर सर्व देशांसाठी 90 दिवसांसाठी शुल्क स्थगिती देण्यास ट्रम्प यांचा नकारः व्हाईट हाऊस

चीन वगळता इतर सर्व देशांसाठी 90 दिवसांसाठी शुल्क स्थगिती देण्यास ट्रम्प यांचा नकारः व्हाईट हाऊस

Donald Trump 90-days tariff pause News True or Fake : अमेरिकेच्या नव्या आयात शुल्क धोरणामुळे जगभरातील अनेक देशांचे शेअर बाजार गडगडले आहेत. भारतही या धक्क्यापासून सुटलेला नाही. अशातच काही प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की डोनाल्ड ट्रम्प चीनवगळता इतर सर्व देशांना आयात शुल्कापासून दिलासा देऊ शकतात. ट्रम्प यांच्या आर्थिक सल्लागाराचा हवाल्याने काही प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे की डोनाल्ड ट्रम्प चीनवगळता इतर देशांवरील आयात शुल्क ९० दिवसांसाठी स्थगित करण्याबाबत विचार करत आहेत. दरम्यान, हे वृत्त व्हाइट हाऊसने (अमेरिकेच्या अध्यक्षांचं कार्यालय व निवासस्थान) फेटाळलं आहे. हे खोटं वृत्त असल्याचं व्हाइट हाऊसने स्पष्ट केलं आहे. व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेव्हिट यांनी अमेरिकन वृत्तवाहिनी सीएनबीसीशी बातचीत केली. यावेळी त्या म्हणाल्या, “अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आयात शुल्कासंबंधीचं धोरण ९० दिवसांसाठी थांबवणार असल्याचं वृत्त खोटं आहे. ट्रम्प यांचा असा कोणताही विचार नाही.” डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः समाजमाध्यमांवर फॉक्स बिझनेस या वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदिका मारिया बार्टीरोमो यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मारिया म्हणाल्या आहेत की “व्याजदर खाली येत आहेत, तेलाच्या किंमती कमी होत आहेत, नियमनमुक्ती होत आहे, अध्यक्ष ट्रम्प झुकणार नाहीत.” Wrong. Fake News. https://t.co/XOLyli5AOS अमेरिकेतील Goldman Sachs या गुंतवणूक बँक व आर्थिक सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या संशोधन प्रमुखांनी दावा केला होता की ट्रम्प यांनी आयात शुल्कासंबंधीच्या निर्णयापासून माघार घेतली तरी जगभर आर्थिक मंदी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जागतिक व्यापाराचं संतुलन व देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी आयात शुल्क आवश्यक आहे. यवर ट्रम्प यांनी भर दिला आहे. अमेरिकेला सर्वात वाईट वागणूक देणारा चीन हा सर्वात मोठा गुन्हेगार आहे. त्यांना उत्तर द्यायला हवं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘जशास तशा’ (परस्पर) आयात शुल्काची घोषणा केल्यानंतर चीननेही अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. चीनने शुक्रवारी अमेरिकी वस्तूंवर आणखी ३४ टक्के आयातशुल्क लादले. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात मक्तेदारी असलेल्या काही दुर्मिळ संयुगांच्या अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवरही जिनपिंग प्रशासनाने निर्बंध आहेत. त्यानंतर आज (सोमवार, ७ एप्रिल) भारतासह जगभरातील अनेक देशांचे शेअर बाजार गडगडले.
40 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Apr 7, 2025, 03:28 PM
कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला

कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला

सावंतवाडी :कुडाळ पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत असलेल्या सुरज अनंत पवार (वय ३१ वर्षे, रा. मळगाव-कुंभार्लीवाडी, ता. सावंतवाडी, सध्या रा. कुडाळ) याचा मृतदेह ते राहत असलेल्या फ्लॅट मध्ये सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अस्वस्थेत आढळून आला. तपासाअंती सूरज यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सुरज अनंत पवार हे कुडाळ पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत होते. अलीकडेच काही महिन्यांपूर्वी आवळेगाव दूरक्षेत्र येथून ते कुडाळ पोलीस ठाण्यात हजर झाले होते. ते कुडाळ मधील कॉम्प्लेक्स मध्ये एकटेच राहत होते. आज दुपारी त्याच्या मित्राच्या मोबाईल वर त्यांनी ‘तुला कुडाळला यावेच लागेल, मी जीवन संपवीत आहे’ अशा आशयाचा मेसेज टाकला. त्या मित्राने याची कल्पना त्याचा मळगाव येथील भावाला दिली. ते तातडीने कुडाळला आले. तो राहत असलेल्या फ्लॅटवर गेले असता बाहेरुन कुलूप लावलेले होते. परंतु किल्ली बाहेर ठेवलेली होती. त्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता सुरज पवार पंख्याला दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले. सुरज यांच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.
94 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Apr 7, 2025, 03:22 PM
मुंबईत उष्णतेची लाट

मुंबईत उष्णतेची लाट

मुंबई :गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढला असून दुपारनंतर बाहेर फिरताना नागरिकांना घामाच्या धारा लागत आहेत. वाढता उकाडा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. तापलेल्या वातावरणामुळे सोमवारीही मुंबईकरांच्या अंगाची काहिली होत आहे. सकाळपासूनच उन्हाच्या तीव्र झळा जाणवत होत्या. रेल्वेतील प्रवासही असह्य करणारा होता. दरम्यान, असे वातावरण मंगळवारी आणि बुधवारीही कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.शहर आणि उपनगरांत सोमवारी दुपारी उन्हाचा दाह सोसावा लागत होता. कडकडीत ऊन, घामाच्या धारा आणि प्रचंड उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. मागील काही दिवसांपासून उन्हाच्या झळांनी नागरिकांची लाही होत आहे. सोमवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. सकाळी १० नंतरच उन्हाची तीव्रता वाढली आणि झळा जाणवू लागल्या. रस्त्यावर फिरताना उन्हाचे चटके बसत होते. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी ३३.६ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३६.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. रविवारच्या तुलनेत सोमवारी सांताक्रूझ येथील तापमानात २.४ अंशानी वाढ झाली. येथील तापमान सोमवारी सरासरीपेक्षा अधिक नोंदले गेले. ठाणे येथे सोमवारी ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. रविवारच्या तुलनेत सोमवारी ठाणे येथील कमाल तापमानात काहीशी वाढ झाली.हीच स्थिती मंगळवार आणि बुधवारीही कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. त्यानंतर शुक्रवारपासून तापमानात काहीशी घट होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मुंबईकर घामाच्या धारांनी हैराण होत आहेत. घामामुळे शरीरातील पाणी निघून जाते. त्यामुळे गळून गेल्यासारखे वाटणे, थकवा येणे अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात आढळतात. अंगाची लाहीलाही करणारे ऊन आणि घामाच्या धारांनी मुंबईकर त्रस्त झाले आहेत. राज्यात सोमवारी सर्वाधिक तापमानाची नोंदअकोलायेथे झाली आहे. येथे कमाल तापमान ४४.२ अंश सेल्सिअस इतके होते. याखालोखाल जळगाव ४२.५ अंश सेल्सिअस, लोहगाव ४२.२ अंश सेल्सिअस, मालेगाव ४१.६ अंश सेल्सिअस, परभणी ४२.१ अंश सेल्सिअस, तरअमरावतीयेथे ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अवकाळी पावसाचे वातावरण ओसरताच राज्यातील तापमानात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. अनेक भागात सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. कोकणातही उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे पुढील काही दिवस कोकणात असह्य उकाडा सहन करावा लागले. याचबरोबर तेथील तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तर, विदर्भातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये अकोला, नागपूर तसेच यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागात मंगळवारी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. उष्णतेचा त्रास झाल्यास काय करावे – संबंधित व्यक्तीला थंड ठिकाणी किंवा सावलीमध्ये तातडीने हलवावे. – शक्य असेल तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घालावा. – पुरेसे पाणी, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रवपदार्थ द्या. पावसाचा अंदाज कुठे हवामान विभागाने मंगळवारीकोल्हापूर,सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर सोलापूर आणि परभणी जिल्ह्यात बुधवारी हलक्या पावसाचा अंदाज आहे.
64 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Apr 7, 2025, 02:40 PM
व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी परस्पर शुल्क लादल्याने जागतिक बाजारात तेजी

व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी परस्पर शुल्क लादल्याने जागतिक बाजारात तेजी

Stock Market Crash Donald trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांनी अमेरिकन नागरिकांसह जगभरातील अनेक देशांना धक्के देणारे निर्णय घेतले आहेत. नुकताच त्यांनी जगभरातील देशांवर परस्पर आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांच्या शेअर बाजारात पडझड झाली. ट्रम्प सरकारने भारतावरही २७ टक्के परस्पर आयात शुल्क लावलं आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजार गडगडला आहे. परिणामी अमेरिकेच्या निवडणुकीआधी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर स्तुतीसुमने उधळणाऱ्या, त्यांचे समर्थन करणाऱ्या भारतीयांचे आता डोळे उघडले असतील असे मत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मांडले आहे. ते म्हणाले, “भारतीय शेअर बाजाराची अवस्था पाहून ट्रम्प समर्थक भारतीयांचं ‘अगली बार ट्रम्प सरकार’ म्हणण्याचं धाडस होणार नाही. गिरीश कुबेर म्हणाले, “आज भारतीय भांडवली बाजार जवळपास सव्वातीन हजार अंकांनी घसरला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जी भिती व्यक्त केली जात होती ती खरी ठरली आहे. काही लोकांना वाटत होतं की अमेरिकेचं आव्हान आपल्यासाठी तितकं गंभीर नाही, जे असत्य ठरलं आहे.” दरम्यान, ‘अगली बार ट्रम्प सरकार’ हा जो काही उन्माद चालू होता तो आता थांबेल”, असं म्हणत कुबेर म्हणाले की “डोनाल्ड ट्रम्प मोदी यांचे मित्र आहेत ते आपल्याला काही करणार नाहीत. अमेरिकेत ट्रम्प यांचं सरकार आल्यावर आपल्यासाठी भारतात व अमेरिकेत छान वातावरण तयार होईल असं काहींना वाटत होतं. ही विचारधारा किती चुकीची होती हे देखील हे देखील आता अनेकांच्या लक्षात येईल.” लोकसत्ताचे संपादक म्हणाले, “अमेरिकेने २ एप्रिलपासून नवं व्यापारी धोरण स्वीकारलं. त्यानंतर ३ एप्रिलपासून अमेरिकेचा भांडवली बाजार कोसळू लागला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत अमेरिकेत ६ ट्रिलियन डॉलर (सहा लाख कोटी डॉलर) इतक्या प्रमाणावर बाजारपेठीय मूल्य धुपलं आहे. भारतीय बाजारपेठेच्या आकारापेक्षा दिडपट नुकसान अमेरिकेने केवळ दोन ते तीन दिवसांत सहन केलं आहे. कारण भांडवली बाजार धुपला आहे. यामुळे आशियाई बाजारपेठा देखील गडगडल्या आहेत. जपान, सिंगापूरची स्थिती देखील वाईट आहे. या स्थितीत भारतावर परिणाम होणार नाही असं मानणारा जो वर्ग होता तो अज्ञानात सुखी होता असं म्हणावं लागेल. तसेच अमेरिकेतही असे अज्ञानी लोक होते. लोकांमधील हे अज्ञान दूर झाल्यावर आता अमेरिकेत निदर्शने होऊ लागली आहेत.
1 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Apr 6, 2025, 03:36 PM
SRH VS GT: सनरायझर्स हैदराबादचा गुजरात टायटन्सवर दणदणीत विजय

SRH VS GT: सनरायझर्स हैदराबादचा गुजरात टायटन्सवर दणदणीत विजय

IPL 2025, SRH vs GT Live Match Updates:दमदार सुरुवातीनंतर सनरायझर्स हैदराबाद संघाची लय हरवली आहे. जोरदार आक्रमण हाच पवित्रा घेऊन खेळणाऱ्या हैदराबादच्या फलंदाजांचे कच्चे दुवे प्रतिस्पर्धी संघांना लक्षात आले आहेत. त्यामुळे हैदराबादच्या फलंदाजांना नव्याने तयारी करून मैदानात उतरावे लागणार आहे. त्याचवेळी हैदराबादला गोलंदाजीची आघाडीही बळकट करावी लागणार आहे. घरच्या मैदानावर त्यांच्यासमोर सातत्यपूर्ण खेळणाऱ्या गुजरात टायटन्सचं आव्हान आहे. शुबमन गिल, साई सुदर्शन, जोस बटलर या त्रिकुटावर गुजरातची भिस्त आहे. मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा उत्तम फॉर्मात आहेत. IPL 2025, Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans LIVE Match Updates सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याचे लाईव्ह अपडेट्स साई किशोरने आपल्या फिरकीच्या जाळ्यात हेनरिच क्लासन आणि नितीश रेड्डी यांना अडकवलं आहे. क्लासनने २७ तर नितीशने ३१ धावांची खेळी केली. ही जोडी हैदराबादला मोठी धावसंख्या गाठून देणार असं चित्र होतं. मात्र साईकिशोरने सामन्याचं पारडं गुजरातच्या दिशेने फिरवलं. चाचपडत खेळणाऱ्या इशान किशनला प्रसिध कृष्णाने माघारी धाडलं. इशानने १७ धावा केल्या. हैदराबादने २ विकेट्सच्या मोबदल्यात अर्धशतक पार केलं आहे. इशान किशान आणि नितीश रेड्डी यांच्यादरम्यान धावताना गोंधळ पाहताना मिळाला. मोहम्मद सिराजने धोकादायक ठरू शकेल अशा अभिषेक शर्माला तंबूचा रस्ता दाखवला. अभिषेकने १६ चेंडूत १८ धावा केल्या. तुफान फटकेबाजीसाठी प्रसिद्ध ट्रॅव्हिस हेडला मोहम्मद सिराजने तंबूत परतावले. त्याने ८ धावा केल्या. दुखापतीमुळे वेगवान गोलंदाजहर्षल पटेलगुजरातविरुद्ध खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी अनुभवी डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकता संधी देण्यात आली आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने टॉस जिंकला असून त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आयपीएलचा हा हंगाम सुरू झाल्यापासून वॉशिंग्टन सुंदरला संधी का मिळत नाही यावर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली होती. आज अखेर या प्रश्नाला पूर्णविराम मिळतो आहे. सामन्यापूर्वी वॉशिंग्टन सुंदरला कॅप देण्यात आली. त्यामुळे तो अंतिम अकरात असणार हे स्पष्ट झालं आहे. हैदराबादच्या मैदानावर फलंदाज धावांची टांकसाळ उघडतात. तोच इतिहास कायम राहिला तर रविवारी संध्याकाळी चाहत्यांना चौकार-षटकारांची लयलूट अनुभवता येईल. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा वैयक्तिक कारणांसाठी मायदेशी परतला आहे. तो रविवारच्या लढतीत खेळणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत गुजरातने तीनच विदेशी खेळाडूंना संघात खेळवलं होतं. जोरदार फॉर्मात असणाऱ्या ग्लेन फिलीप्सला संधी मिळते का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. रबाडाऐवजी गुजरातने भारताचा अनुभवी इशांत शर्मावर विश्वास ठेवला आणि त्याने तो सार्थ ठरवला. रबाडाऐवजी गेराल्ड कुत्सिया या उमद्या वेगवान गोलंदाजांलाही संधी मिळू शकते. शुबमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरातला विजयात सातत्य राखण्याचा मंत्र गवसला आहे.शुबमन गिल,साई सुदर्शन आणि जोस बटलर उत्तम फॉर्मात आहेत. दुसरीकडेमोहम्मद सिराज,प्रसिध कृष्णा,इशांत शर्मायांच्यासह साई किशोर विकेट्स पटकावणं आणि धावा रोखणं या दोन्ही आघाड्या समर्थपणे सांभाळत आहेत. सलामीच्या लढतीत २८२ धावांचा डोंगर उभारून दणदणीत विजय मिळवणाऱ्या हैदराबादची नंतर मात्र चांगलीच घसरगुंडी उडाली आहे. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान, किशन,नितीश कुमाररेड्डी आणि हेनरिच क्लासन या पंचकाला कसं रोखायचं हे प्रतिस्पर्धी गोलंदाजांना कळलं आहे. रविवारी घरच्या मैदानावर पुन्हा फॉर्ममध्ये परतण्याची संधी या पाचही जणांकडे आहे.
18 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Apr 5, 2025, 03:03 PM
पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, आयपीएल 2025 डबल हेडर

पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, आयपीएल 2025 डबल हेडर

IPL 2025, PBKS vs RR Live Match Updates:आयपीएल २०२५ मधील आजचा डबल हेडरमधील दुसरा सामना पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यातून राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन पुन्हा संघाचं नेतृत्त्व करताना दिसणार आहे. तर विजयाच्या रथावर स्वार असलेला पंजाब किंग्सचा संघ आपला सलग तिसरा विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. Punjab Kings vs Rajasthan Royals Live Cricket Score Updates: पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स सामन्याचे लाईव्ह अपडेट्स लॉकी फर्ग्युसनच्या वेगवान चेंडूवर यशस्वी जैस्वाल त्रिफळाचीत झाला. यशस्वीने ४५ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. यामध्ये ३ चौकार, ५ षटकारांचा समावेश होता. पंजाबला १० षटकं संघर्ष केल्यानंतर विकेट मिळाली आहे. लॉकी फर्ग्युसनने संजू सॅमसनला बाद केलं. संजूने २६ चेंडूत ३८ धावांची खेळी केली. यशस्वी जैस्वाल आणिसंजू सॅमसनयांनी मुल्लापूर इथे सुरू असलेल्या पंजाबविरुद्धच्या लढतीत मनमुराद फटकेबाजी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. यशस्वी जैस्वाल आणि कर्णधारसंजू सॅमसनयांनी पॉवरप्लेच्या ६ षटकांमध्ये ५१ धावा वसूल केल्या. पंजाब किंग्स वि.राजस्थान रॉयल्ससामन्याला सुरूवात झाली आहे. राजस्थानकडूनसंजू सॅमसनआणि यशस्वी जैस्वालची जोडी उतरली आहे. तर अर्शदीप सिंगने गोलंदाजीला सुरूवात केली आहे. प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक),श्रेयस अय्यर(कर्णधार), मार्कस स्टॉइनिस,नेहल वढेरा,ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, मार्को जॅनसेन,अर्शदीप सिंग,लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल यशस्वी जैस्वाल,संजू सॅमसन(कर्णधार), नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक),शिमरॉन हेटमायर,वानिंदू हसरंगा,जोफ्रा आर्चर,महेश थेक्षाना, युधवीर सिंग चरक, संदीप शर्मा पंजाब किंग्सने राजस्थानविरूद्ध सामन्याची नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. पंजाबच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल करण्यात आलेला नाही. तर राजस्थाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला आहे. संजू सॅमसन (कर्णधार), रियान पराग, शुभम दुबे, वैभव सूर्यवंशी, कुणाल राठोड,शिमरॉन हेटमायर,यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, नितीश राणा, युधवीर सिंग,जोफ्रा आर्चर,महेश थेक्षाना, वानिंदू हसरंगा, आकाश मधवाल,कुमार कार्तिकेयसिंह, तुषार देशपांडे, फजलहक फारूकी, क्वेना माफाका, अशोक शर्मा, संदीप शर्मा. श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रियांश आर्य, प्याला अविनाश, हरनूर सिंग, जोश इंग्लिस, प्रभसिमरन सिंग, विष्णू विनोद,नेहल वढेरा,अजमतुल्ला उमरझाई, ॲरॉन हार्डी, मार्को यान्सन,ग्लेन मॅक्सवेल,मुशीर खान, शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस, सूर्यांश शेडगे, अर्शदीप सिंह, झेव्हियर बार्टलेट, युझवेंद्र चहल, प्रवीण दुबे, लॉकी फर्ग्युसन, हरप्रीत ब्रार, कुलदीप सेन, विजयकुमार वैशाख, यश ठाकूर
31 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Apr 4, 2025, 03:07 PM
मुंबई गुन्हे शाखेने व्हिसा घोटाळ्यातील टोळीचा पर्दाफाश केला, माजी नगरसेवकाच्या भावासह सहा जणांना अटक

मुंबई गुन्हे शाखेने व्हिसा घोटाळ्यातील टोळीचा पर्दाफाश केला, माजी नगरसेवकाच्या भावासह सहा जणांना अटक

गेल्या महिन्यात मुंबई गुन्हे शाखेने एका माजी नगरसेवकाच्या भावासह सहा जणांना एका घोटाळ्यासंबंधित अटक केली. या टोळीने बेकायदा पद्धतीने कॅनडा आणि अमेरिकेत किमान ८० लोकांना पाठवले. ज्यांचे दोन्ही देशांचे व्हिसा अर्ज अनेक वेळा नाकारले गेले, अशांना या टोळीने लक्ष केले. गेल्या सहा महिन्यांपासून या टोळीचे बेकायदा पद्धतीने काम सुरू होते. अर्ज नाकारल्यामुळे विदेशात जाऊ न शकणाऱ्या निराश व्यक्तींचा फायदा या टोळीने घेतला आणि विदेशात जाण्यासाठी त्यांच्याकडून तब्बल ३० ते ७५ लाख रुपये आकारले. विदेशात बेकायदा पद्धतीने जाणारे बहुतेक लोक गुजरातचे होते. नेमका हा घोटाळा काय? या टोळीद्वारे वापरला जाणारा ‘मुंडी कट’ पासपोर्ट काय? आणि हा घोटाळा कसा उघडकीस आला? जाणून घेऊयात.टोळीमध्ये कोणाचा समावेश?मुंबई गुन्हे शाखेतील पोलिसांनी असा आरोप केला आहे की, या टोळीचा प्रमुख अजित पुरी आहे. तो या व्यवसायात शहरातील सर्वात मोठा खेळाडू असल्याचे मानले जाते. टोळीतील पुरी नावाच्या आरोपीचा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे. त्याच्यावर २००० ते २०१० पर्यंत १४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि त्याला अनेक वेळा अटकही करण्यात आली आहे. परंतु, तो सध्या जामिनावर बाहेर होता. या टोळीत बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या डीटीपी ऑपरेटरसह बृहन्मुंबई महानगरपालिकेतील (बीएमसी) माजी नगरसेवकाच्या भावाचादेखील समावेश आहे, त्यांनादेखील अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पुरी हा गुजरातमध्ये एजंटचे एक नेटवर्क चालवतो. हे लोक व्हिसा नाकारल्या गेलेल्या लोकांशी संपर्क साधतात आणि त्यांना या टोळीपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात.‘मुंडी कट’ पासपोर्ट काय आहे? विदेशात जाण्यास इच्छुक असणाऱ्या व्यक्तीने मागणी करण्यात आलेले पैसे भरल्यानंतर ही टोळी संबंधित देशाचा व्हिसा असलेल्या नागरिकाचा पासपोर्ट खरेदी करायची. अमेरिका किंवा कॅनडाचा व्हिसा असलेली व्यक्ती त्यांचा पासपोर्ट सुमारे पाच लाख रुपयांना विकायची. त्यानंतर इतर सदस्य पासपोर्टवरील फोटो इच्छुक नागरिकाच्या फोटोने बदलायचे, असे ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले. डीटीपी ऑपरेटर सुधीर सावंतला या प्रकरणात अटक करण्यात आली. तोच अशा पद्धतीचे बेकायदा ‘मुंडी कट’ पासपोर्ट तयार करायचा. ही टोळी पासपोर्टधारकाचे वयदेखील इच्छुकाच्या वयाशी जुळवायची. पासपोर्टला अंतिम स्वरूप देण्यासाठी आणखी एक आरोपी संजय चव्हाणचीदेखील मदत घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. एअरलाइन काउंटरना प्रवाशाची ओळख स्वतंत्रपणे पडताळण्यासाठी पासपोर्ट पडताळणी तपशील उपलब्ध नसतात. तसेच इमिग्रेशन अधिकाऱ्यांजवळ व्हिसा किंवा बोर्डिंग पास तपशील उपलब्ध नसतात, याचाच फायदा घेत टोळीने एक प्रणाली स्थापित केली. संबंधित व्यक्तीला दोन फोल्डर बाळगण्याचे निर्देश दिले जायचे. एकामध्ये मूळ व्हिसा असलेला ‘मुंडी-कट’ पासपोर्ट आणि दुसऱ्यामध्ये त्या व्यक्तीचा मूळ पासपोर्ट, ज्याचा बनावट व्हिसा आणि बोर्डिंग पास त्यांच्या बॅगेत लपवलेला असायचा. प्रवाशाला मार्गदर्शन करणारा नगरसेवकाचा भाऊ रोशन दुधवडकर होता, जो विमानाने प्रवास करण्याच्या बहाण्याने विमानतळावर उपस्थित असायचा. रोशन दुधवडकर हा संबंधित इच्छुक व्यक्तीला एक नवीन सिम कार्ड, फोन आणि ब्लूटूथ डिव्हाइस द्यायचा. ब्लूटूथ डिव्हाइस आणि स्वतः एक नवीन सिम वापरून, तो व्यक्तींना प्रक्रिया सांगायचा. इच्छुक व्यक्ती सीआयएसएफ सुरक्षा आणि चेक-इन काउंटरला त्यांचा ‘मुंडी-कट’ पासपोर्ट दाखवायचे. तसेच त्यांचे सामान तपासण्यासाठी, त्यांचा बोर्डिंग पास मिळविण्यासाठी आणि सुरक्षा तपासणीसाठी दुधवडकर हा त्यांना प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना द्यायचा. चेक-इनदरम्यान एअरलाइन काउंटर पासपोर्टबद्दल अलर्ट देणार नाही हे त्यांना ठावूक होते, कारण त्यांना पासपोर्टच्या आतील माहितीमध्ये प्रवेश दिला जात नाही. पुढील प्रक्रियेत प्रवासी ‘मुंडी-कट’ पासपोर्ट त्यांच्या मूळ पासपोर्टशी बदलायचे. त्यानंतर प्रवासी एका फोल्डेबल रबर सीलचा वापर करून ‘मुंडी-कट’ पासपोर्ट आणि बोर्डिंग पासवर बनावट इमिग्रेशन स्टॅम्प लावायचे. त्यानंतर ते त्यावर १० रुपयांच्या नाणी च्युइंगम लावून चिकटवायचे आणि शौचालयात फ्लश करायचे. अखेरच्या प्रक्रियेत प्रवासी हे एअरलाइन कर्मचाऱ्यांना व्हिसा आणि इमिग्रेशन स्टॅम्पसह ‘मुंडी-कट’ पासपोर्ट दाखवायचे आणि विमानात चढायचे. पोलिसांच्या माहितीनुसार, विमानतळाच्या आत आगमन झाल्यानंतरची तपासणी फार कठोर नसते; ज्यामुळे प्रवाशी पकडला जाण्याची शक्यताही फार कमी असते. मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले की, दुधवडकर दर महिन्याला थायलंडला विमानाने जात असल्याचे आणि कोणीतरी अमेरिका किंवा कॅनडाला जात असल्याचे अधिकाऱ्यांना आढळले आणि यासंबंधित तपास केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला.मुंबईपोलिसांच्या विशेष शाखेने फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात गुन्हे शाखेला या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले. दुधवडकरला अटक झाली आणि या टोळीचा पर्दाफाश झाला. एका अधिकाऱ्याने हेदेखील स्पष्ट केले की, अशा टोळ्यांची बेकायदा कृत्ये ओळखता यावी म्हणून पोलिस आणि विमानतळ अधिकारी आवश्यक पावले उचलत आहेत.
50 shares
😐