Achira News Logo
Achira News
L
Lokmat
May 5, 2026, 11:31 AM
ऊस उत्पादनाला चालना देण्यासाठी जालना जिल्ह्याने'सुपर 50 ए. आय. शेतकरी'प्रकल्प स्वीकारला

ऊस उत्पादनाला चालना देण्यासाठी जालना जिल्ह्याने'सुपर 50 ए. आय. शेतकरी'प्रकल्प स्वीकारला

जालना:शेतीतआधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्यासाठीजालनाजिल्ह्याने मोठे पाऊल उचलले आहे. (AI Farming) जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र कृषी विभागाच्या पुढाकारातून 'सुपर ५० एआय फार्मर्स' हा अभिनव पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला असून, आता ऊसशेतीचेव्यवस्थापन उपग्रह (Satellite) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांच्या मदतीने होणार आहे.(AI Farming) जिल्ह्याच्या ४५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित 'रायझिंग जालना' सोहळ्यात या प्रकल्पाचा सामंजस्य करार करण्यात आला. (AI Farming) यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, आमदार अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, कृषी विभागाचे अधिकारी, फाईडेबिलिटी सायन्सेसची तांत्रिक टीम आणि जिल्ह्यातील प्रगतिशीलशेतकरीउपस्थित होते. सुरुवातीला हा प्रकल्प ५० शेतकऱ्यांपुरता मर्यादित असला तरी, याच्या यशानंतर संपूर्ण जिल्ह्यात आणि पर्यायाने राज्यात हा 'जालना पॅटर्न' राबवला जाण्याची शक्यता आहे. पारंपरिक शेतीला विज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे आणि नफा वाढवणे हे या उपक्रमाचे अंतिम उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे या प्रक्रियेत शेतकऱ्याला शेतात कोणतेही महागडे सेन्सर लावण्याची गरज पडणार नाही, सर्व माहिती सॅटेलाइटच्या माध्यमातून गोळा केली जाणार आहे. एकूणच या प्रकल्पाचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. काय मिळणार ॲपवर ? पीक आरोग्य स्कोअर ऊस पिकाची सद्यः स्थिती आणि आरोग्य किती टक्के चांगले आहे, याची माहिती. पाणी व खत व्यवस्थापन शेताच्या कोणत्या भागात खताची आणि पाण्याची गरज आहे, याचे अचूक मार्गदर्शन. तण व रोग ओळख शेतातील तण आणि संभाव्य रोगांची आगाऊ सूचना. कापणी नियोजन ऊसतोडणीसाठी योग्य वेळ कोणती, याचे शास्त्रोक्त विश्लेषण. ८ तालुके आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाही या प्रकल्पाशी भविष्यात जोडून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात 'स्मार्ट फार्मर' जालना जिल्ह्याच्या या उपक्रमामुळे आता ऊसउत्पादकशेतकरीकेवळ कष्टकरी न राहता 'स्मार्ट फार्मर' म्हणून ओळखला जाणार आहे. तंत्रज्ञानाच्या या क्रांतीमुळे कृषी क्षेत्रात एक नवी पहाट उजाडेल, असा विश्वास यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी व्यक्त केला. प्रकल्पाचे वेगळेपण आणि फायदा विनाखर्चिक तंत्रज्ञान शेतात कोणत्याही महागड्या उपकरणांची किंवा सेन्सर्सची आवश्यकता नाही. अचूकता सॅटेलाइट डेटाचा वापर केल्यामुळे मानवी त्रुटीची शक्यता कमी. वेळेची बचत घरबसल्या मोबाइलवर शेतातील प्रत्येक कोपऱ्याची माहिती मिळणार. उत्पादनात वाढ योग्यवेळी योग्य खत आणि पाणी मिळाल्याने उसाच्या टनेजमध्ये वाढ अपेक्षित. हे ही वाचा सविस्तर :Sugarcane Revolution : धाराशिवमध्ये उसाचा विक्रमी गोडवा; दुष्काळी जिल्हा ठरला नंबर वन अधिक वाचा :Coconut Farming Success Story : वसमतच्या मातीत 'बंगळुरू पॅटर्न'! नारळ-आंबा शेतीतून मनोज इंगोले यांची यशोगाथा
95 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 08:54 AM
हिंगोली शेतकऱ्याच्या नाविन्यपूर्ण नारळ आणि आंब्याच्या प्रयोगाचे फळदायी परिणाम

हिंगोली शेतकऱ्याच्या नाविन्यपूर्ण नारळ आणि आंब्याच्या प्रयोगाचे फळदायी परिणाम

- इस्माईल जहागीरदारवसमत (जि.हिंगोली) :हिंगोलीजिल्ह्यातील कुरुंदा (ता. वसमत) येथील प्रगतिशीलशेतकरीमनोज साहेबराव इंगोले यांनी कर्नाटकच्या धर्तीवर आपल्या ६ एकर शेतात नारळ आणि आंबा शेतीचा प्रयोग साकारला आहे. केवळ साडेतीन वर्षांत नारळाच्या झाडांना फुलोरा येऊ लागल्याने परिसरात या प्रयोगाची मोठी चर्चा होत आहे. मनोज इंगोले यांनी कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथील नारळ शेतीला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील तंत्रज्ञान समजून घेतले. त्यानंतर त्यांनी थेट बंगळुरूवरून नारळाची १ हजार उच्च दर्जाची रोपे आणली. आपल्या ६ एकर शेतात १५ ते २० फूट अंतरावर रोपांची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केली. झाडांची योग्य निगा, दर आठ दिवसांनी पाणी आणि बंगळुरूच्या धर्तीवर खत व्यवस्थापन केल्यामुळे ही झाडे आज डौलाने उभी आहेत. नारळात आंब्याचे आंतरपीककेवळ नारळावर अवलंबून न राहता इंगोले यांनी आंतरपीक म्हणून त्याच बागेत केशर आणि दशहरी जातीच्या आंब्याची ८६५ रोपे लावली आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या दोन वर्षांतच आंब्याला फळधारणा सुरू झाली, तर आता साडेतीन वर्षांनंतर नारळालाही फुलोरा (कणसे) येऊ लागल्याने शेतकऱ्याच्या कष्टाला फळ मिळाले आहे.. शासकीय अनुदानाची प्रतीक्षा आणि नाराजीएकीकडे निसर्गाशी झुंज देतशेतकरीनवनवीन प्रयोग करत असताना, दुसरीकडे शासन आणि कृषी विभागाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. कृषी विभागाने अशा फळबागांसाठी तांत्रिक मार्गदर्शन केल्यास अधिक फायदा होईल. लागवडीसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. संबंधित विभागाने कागदपत्रांची पूर्तता करून सहकार्य करावे, अशी मागणी केली जात आहे. अनुदानासाठी चकरा मारायला लावू नयेमी बंगळुरूवरून रोपे आणून जिद्दीने ही बाग फुलवली आहे. साडेतीन वर्षांत नारळाला फुलोरा आल्याने समाधानी आहे. भविष्यात यातून चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा आहे. मात्र, शासनाने आम्हा शेतकऱ्यांना अनुदानासाठी चकरा मारायला लावू नये. वेळेवर मदत आणि मार्गदर्शन मिळाल्यास वसमतचा शेतकरी नक्कीच प्रगती करील.-मनोज साहेबराव इंगोले, प्रगतिशील शेतकरी, कुरुंदा
82 shares
😐
Pudhari logo
Pudhari
May 4, 2026, 11:00 PM
विशाल ताऱ्यांच्या अभ्यासातून आकाशगंगेची रहस्ये उघड

विशाल ताऱ्यांच्या अभ्यासातून आकाशगंगेची रहस्ये उघड

अतिशय महत्त्वाच्या आणि तितक्याच आव्हानात्मक अशा या संशोधनामध्ये 100,000 हून अधिक विशाल तार्‍यांचं विश्लेषण करण्यात आलं. ज्यामध्ये उपलब्ध माहितीतून आकाशगंगेतील तार्‍यांची स्थिती आणि विकासासह त्यांच्या वयाबाबतसुद्धा माहिती मिळाली. आकाशगंगेच्या केंद्रानजीक असणारे तारे अतिशय जुने असून, एका निश्चित बिंदूपर्यंत ते हळूहळू कमी होत चालले आहेत. आकाशगंगेच्या अगदी किनार्‍यापाशी किंवा त्याहीपलिकडे काही असे तारे आहेत, ज्यांची निर्मिती आकाशगंगेत झाली; मात्र काही कारणास्तव ते सीमेबाहेर ढकलले गेले.
43 shares
😐
Pudhari logo
Pudhari
May 4, 2026, 06:02 AM
रायगड जिल्ह्यातील युवकांना तांत्रिक अभ्यासक्रमाच्या विस्तारासह नोकरीच्या संधींचा लाभ मिळणार

रायगड जिल्ह्यातील युवकांना तांत्रिक अभ्यासक्रमाच्या विस्तारासह नोकरीच्या संधींचा लाभ मिळणार

रायगड जिल्ह्यातील तरुणांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी विविध संस्था चालकांनी विविध कोर्से शिकवण्यासाठी तांत्रिक शाखा कश्या निर्माण होतील याकडे लक्ष देणे आवश्यक असून यासाठी संस्था चालकांना सर्वोतोपरी सहकार्य करू असे अभिवचन यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी दिले.
89 shares
😊
P
Pudhari
May 3, 2026, 11:07 PM
व्हेल-स्नेही तंत्रज्ञानाचे दीर्घकालीन संबंध आणि अंतर्दृष्टीचे उद्दिष्ट

व्हेल-स्नेही तंत्रज्ञानाचे दीर्घकालीन संबंध आणि अंतर्दृष्टीचे उद्दिष्ट

प्रोजेक्ट सीईटीआयचे संस्थापक डेव्हिड ग्रुबर यांनी सांगितले की, या तंत्रज्ञानामुळे आपण केवळ व्हेल माशांची थोडीशी झलक पाहण्याऐवजी त्यांच्याशी 'दीर्घकालीन नाते' जोडू शकू. व्हेलची वासरे आपल्या आईकडून आवाजाचे पॅटर्न कसे शिकतात, याचा अभ्यास यामुळे शक्य होईल. जहाजांचा आवाज किंवा मासेमारीमुळे व्हेल माशांच्या संवादात काय बदल होतात, हे शोधणे सोपे जाईल. व्हेल माशांच्या संवेदनशील भागात जहाजांचा वेग कमी करणे किंवा मार्ग बदलणे यांसारखे महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यास यामुळे मदत होईल.
46 shares
😊
L
Lokmat
May 3, 2026, 09:20 AM
लासलगावमध्ये उष्णतेची लाटः भावांच्या अभिनव उपायामुळे गायी तापण्यापासून वाचल्या

लासलगावमध्ये उष्णतेची लाटः भावांच्या अभिनव उपायामुळे गायी तापण्यापासून वाचल्या

लासलगाव :जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट पसरली आहे. थंडीचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातही यंदा सूर्याचा प्रखर कोप पाहायला मिळत असून,तापमानाचापारा ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. या वाढत्या उकाड्याचा फटका केवळ मानवांनाच नाही, तर मुक्या जनावरांनाही बसत आहे. अशा परिस्थितीत, लासलगाव येथील प्रमोद पाटील आणि महेंद्र पाटील याशेतकरीबंधूंनी आपल्या गोठ्यातील गायींना उन्हापासून वाचवण्यासाठी फॉगर यंत्रणेचा यशस्वी आणि किफायतशीर प्रयोग राबवला आहे. गेल्या काही दिवसांपासूनतापमानसातत्याने ४० अंशांच्या वर असल्याने पाटील यांच्या गोठ्यातील गाई अस्वस्थ झाल्या होत्या. उष्णतेमुळे जनावरांच्या खाण्यावर परिणाम होऊन त्यांची तब्येत खालावली होती, ज्याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर झाला होता. जनावरांचा हा त्रास ओळखून पाटील - बंधूंनी गोठ्यातील तापमान नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला. गोठ्यात नैसर्गिक थंडावा निर्माण करण्यासाठी त्यांनी सुमारे ७ हजार रुपये खर्च करून १६ फॉगर (सूक्ष्म फवारणी यंत्रे) बसवले. या यंत्रणेद्वारे गोठ्यात पाण्याचे अतिसूक्ष्म तुषार उडवले जातात, ज्यामुळे वातावरणातील उष्णता शोषली जाऊन गोठ्यात गारवा निर्माण होतो. प्रयोगाचे सकारात्मक परिणामफॉगरमुळे गोठ्यातील तापमान बाहेरच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.आरोग्यात सुधारणा :गाईंचा उन्हाचा ताण कमी झाला असून त्या आता अधिक उत्साही दिसत आहेत.दूध वाढले :जनावरांच्या आहारात सुधारणा झाल्यामुळे दूध उत्पादनात पुन्हा वाढ झाली आहे. इतर पशुपालकांसाठी दिशादर्शक प्रयोगबदलत्या हवामानातशेतीआणि दुग्धव्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. लासलगावच्या याशेतकरीबंधूंनी अत्यंत कमी खर्चात केलेला हा प्रयोग सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत असून, इतर पशुपालकही या फॉगर पॅटर्नची माहिती घेण्यासाठी गर्दी करत आहेत. कडक उन्हामुळे गाई चारा खात नव्हत्या आणि दूधही कमी झाले होते. पण, फॉगर बसवल्यापासून गोठ्यात गारवा राहतो, गाई शांत राहतात आणि उत्पादनातही वाढ झाली आहे.- प्रमोद पाटील, प्रयोगशील शेतकरी, लासलगाव Dairy Farming : दुधात घट झाली, उन्हाळ्यात संकरीत गाईंची 'अशी' घ्या काळजी; हा खास प्लॅन वापरा!
89 shares
😢
P
Pudhari
May 3, 2026, 04:00 AM
वैयक्तिक विद्यार्थ्यांच्या अपयशामुळे पालघर जिल्ह्यातील काही महाविद्यालयांचा निकाल शून्य

वैयक्तिक विद्यार्थ्यांच्या अपयशामुळे पालघर जिल्ह्यातील काही महाविद्यालयांचा निकाल शून्य

पालघर जिल्ह्यातही एका महाविद्यालयाचा पूर्ण निकाल शून्य लागला असून चार महाविद्यालयांतील काही शाखांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. जव्हार तालुक्यातील भगवान बिरसा मुंडा आयटीआयमध्ये टेक्निकल सायन्स शाखेतील एकमेव विद्यार्थी नापास झाल्याने निकाल शून्य राहिला. शारदा कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेतही एकच विद्यार्थी परीक्षेला बसला होता आणि तो अनुत्तीर्ण ठरल्याने निकाल शून्य लागला, तर इतर शाखांचा निकाल समाधानकारक राहिला आहे.
62 shares
😢
M
Maharashtra Times
May 3, 2026, 01:30 AM
जोखीम आणि बक्षिसेः इमॅन्युएल जॉनच्या कारकीर्दीची कथा यू-टर्न

जोखीम आणि बक्षिसेः इमॅन्युएल जॉनच्या कारकीर्दीची कथा यू-टर्न

मुंबई:तंत्रज्ञान क्षेत्रातील यशोगाथा अनेकदा सोप्या वाटतात, पण प्रत्यक्षात त्यामागे अनेक कठीण निर्णय आणि संघर्ष दडलेले असतात. इमॅन्युएल जॉनची कहाणी हे त्याचेच एक उदाहरण आहे. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्याने एक असा निर्णय घेतला, ज्यामुळे त्याचा मार्ग पूर्णपणे बदलला. जेव्हा त्याला पहिली नोकरीची ऑफर मिळाली, तेव्हा पगार ₹25,000 होता. फ्रेशर्ससाठी ही सहसा एक उत्तम संधी असते, पण इमॅन्युएल समाधानी नव्हता. त्याला वाटले की शिकण्याची आणि प्रगतीची संधी मर्यादित आहे. म्हणून, त्याने ती ऑफर नाकारली. हा निर्णय सोपा नव्हता, कारण कारकिर्दीच्या सुरुवातीलाच स्थिर उत्पन्नाचा त्याग करणे जोखमीचे असते. पण त्याने अल्पकालीन आरामापेक्षा दीर्घकालीन प्रगतीला प्राधान्य दिले.पहिली नोकरी नाकारल्यानंतरहीइमॅन्युएलनेहार मानली नाही. त्याने एका इंटर्नशिपमध्ये प्रवेश घेतला, जिथे त्याला फक्त ₹10,000 मिळत होते. पगार कमी होता, पण शिकण्याच्या संधी प्रचंड होत्या. या काळात त्याने खूप तास काम केले, नवीन कौशल्ये आत्मसात केली आणि स्वतःमध्ये सतत सुधारणा केली. हा टप्पा त्याच्या कारकिर्दीचा पाया ठरला. त्याने सर्व काही सुरुवातीपासून शिकण्याचा निर्णय घेतला, ज्याचा त्याला नंतर खूप फायदा झाला.प्रत्येक संघर्षाच्या कथेत कठीण दिवस येतातच, आणि इमॅन्युएलच्या आयुष्यातही असे अनेक क्षण आले. असे प्रसंग आले जेव्हा घरखर्च भागवणेही अवघड झाले होते. त्याला आपल्या गरजांवर कठोरपणे मर्यादा घालाव्या लागल्या आणि कधीकधी तो फक्त मॅगीवरच जगत असे. हे दिवस सोपे नव्हते, पण याच परिस्थितीने त्याला अधिक कणखर बनवले. त्याने हार मानली नाही आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले. हाच संयम आणि कठोर परिश्रम पुढे त्याच्या यशाचे कारण बनले.कालांतराने, त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले. जसजशी त्याची कौशल्ये सुधारत गेली, तसतसे त्याला चांगल्या संधी मिळू लागल्या. त्याच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा तेव्हा आला, जेव्हा त्याला दरमहा 3.5 लाख रुपये पगाराची नोकरी मिळाली. ही त्याच्यासाठी एक मोठी उपलब्धी होती. त्याने घेतलेले धोके आणि घेतलेली मेहनत योग्य दिशेने जात होती, याचा हा पुरावा होता. पण त्याने याला अंतिम ध्येय मानले नाही.अनेक लोक अशा चांगल्या पगारावर समाधान मानतात, पण इमॅन्युएलने एक धाडसी निर्णय घेतला. त्याने नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा धोका पत्करला. हीच टेकास टेक्नॉलॉजीजची सुरुवात होती. स्वतःचा स्टार्टअप सुरू करणे सोपे नव्हते, कारण त्यात अनिश्चितता आणि धोका दोन्ही होते. पण त्याचबरोबर, यामुळे तुम्हाला तुमची दूरदृष्टी प्रत्यक्षात आणण्याचे स्वातंत्र्यही मिळाले.टेकास टेक्नॉलॉजीजच्या माध्यमातून, इमॅन्युएलने नेहमीच वास्तविक जीवनातील समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ट्रेंड्सच्या मागे लागण्याऐवजी, तो लोकांसाठी उपयुक्त आणि शाश्वत असे तांत्रिक उपाय तयार करण्याचा प्रयत्न करतो. कंपनी वाढवणे, बाजारात स्वतःचे स्थान निर्माण करणे आणि वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञान उद्योगात टिकून राहण्यासाठी सतत कठोर परिश्रम आवश्यक असतात. पण त्याच्या सुरुवातीच्या संघर्षाने त्याला प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी पुरेसे सामर्थ्यवान बनवले आहे.
73 shares
😢
P
Pudhari
May 3, 2026, 12:08 AM
व्यावसायिक आणि आय. टी. आय. परीक्षांमध्ये उत्तीर्णांची टक्केवारी जास्त

व्यावसायिक आणि आय. टी. आय. परीक्षांमध्ये उत्तीर्णांची टक्केवारी जास्त

व्यावसायिक शाखेसाठी 760 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 751 विद्यार्थी परीक्षेस होते. त्यापैकी 705 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 93.87 टक्के निकाल लागला. आयटीआय शाखेसाठी 250 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 250 विद्यार्थी परीक्षेस होते. त्यापैकी 220 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 88 टक्के निकाल लागला.
61 shares
😐
L
Lokmat
May 2, 2026, 08:43 AM
गोरेगावच्या शेतकरी जोडप्याचा बियाणे उत्पादनावरील अभिनव दृष्टीकोन फायदेशीर

गोरेगावच्या शेतकरी जोडप्याचा बियाणे उत्पादनावरील अभिनव दृष्टीकोन फायदेशीर

दिलीप कावरखे शेतीपरवडत नाही अशी सर्वसाधारण तक्रार असताना गोरेगाव येथील युवाशेतकरीदाम्पत्याने आपल्या कष्ट, नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर वेगळी वाट निवडली आहे.(Farmer Success Story) नामदेव शेषराव कावरखे आणि त्यांची पत्नी अर्पिता कावरखे यांनी केवळ १० गुंठे क्षेत्रातटोमॅटोबियाणे (सीड्स) उत्पादनाचा प्रयोग राबवत अवघ्या चार-साडेचार महिन्यांत सुमारे ३.५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दाखवले आहे. त्यांच्या या यशस्वी प्रयोगाची सध्या परिसरात जोरदार चर्चा आहे.(Farmer Success Story) पारंपरिकशेतीलादिला आधुनिक पर्याय गोरेगाव परिसरात सोयाबीन, हरभरा, तूर, गहू यांसारखी पारंपरिक पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. मात्र कावरखे दाम्पत्याने बाजारपेठेतील मागणी ओळखूनटोमॅटोबियाणे उत्पादनाचा (Seed Production) पर्याय निवडला. कमी क्षेत्रात अधिक नफा मिळवण्याचा हा प्रयत्न त्यांनी यशस्वी करून दाखवला. महिलांना दिले 'पोलन'चे प्रशिक्षण टोमॅटो बियाणे उत्पादनात परागीकरण (Pollination) ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असते. अर्पिता कावरखे यांनी गावातील महिलांना एकत्र करून त्यांना या प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षित महिलांकडून काटेकोरपणे काम करून घेतल्यामुळे प्लॉटमध्ये फुलांची संख्या वाढली आणि फळधारणाही उत्कृष्ट झाली. यामुळे केवळ उत्पादनच वाढले नाही, तर ग्रामीण महिलांना रोजगाराची संधीही मिळाली. खर्च कमी, उत्पन्न जास्त या प्रयोगासाठी सुमारे १ लाख रुपयांचा खर्च आला. अपेक्षित उत्पादन : २० ते २४ किलो बियाणे बाजारभाव : १६,००० प्रति किलो एकूण उत्पन्न : ३.५ लाखांपर्यंत खर्च वजा जाता, अवघ्या चार ते साडेचार महिन्यांत २.५ लाखांपर्यंत निव्वळ नफा मिळण्याचा अंदाज आहे. 'माहेरची प्रेरणा, सासरची साथ' या प्रयोगामागे अर्पिता कावरखे यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्या माहेर (वेणी, ता. लोणार, जि. बुलढाणा) येथे बियाणे उत्पादनाचे तंत्र त्यांनी पाहिले होते. हा प्रयोग आपण सासरी का करू नये? हा विचार त्यांनी मांडला आणि पती नामदेव यांनी त्याला पूर्ण साथ दिली. नोव्हेंबर महिन्यात त्यांनी १० गुंठे क्षेत्रात शेडनेट उभारून टोमॅटो सीड्स लागवड सुरू केली. योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केले तर यश मिळते रोपवाढ, खत व्यवस्थापन, कीडनियंत्रण, फवारणी अशा सर्व बाबींमध्ये नामदेव यांनी काटेकोर नियोजन केले. योग्य वेळेत योग्य उपाययोजना केल्यामुळे उत्पादन दर्जेदार मिळाले. केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता बाजारपेठेची गरज ओळखून नवे प्रयोग केल्यास शेती नक्कीच फायदेशीर ठरते. मेहनतीसोबत योग्य नियोजन असेल, तर कमी जमिनीतही लाखोंचे उत्पन्न मिळवता येते, असे नामदेव व अर्पिता कावरखे सांगतात. कावरखे दाम्पत्याची ही यशोगाथा इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कमी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, योग्य नियोजन आणि बाजारपेठेची समज यांचा वापर केल्यास शेतीतूनही मोठा नफा मिळवता येतो, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. शेतीत नवनवीन प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य बाजारपेठेचा अभ्यास यांची जोड दिल्यास 'शेती तोट्यातच असते' हा समज चुकीचा ठरू शकतो. याचे जिवंत उदाहरण म्हणजे कावरखे दाम्पत्य. हे ही वाचा सविस्तर :Bio-Prom Project Success : महिलांची ताकद! शेतीतून उभारला १.२७ कोटींचा प्रकल्प वाचा सविस्तर अधिक वाचा :Jalna Jeevika success : 'जालना जीविका'ची धडाकेबाज एंट्री; गावातील महिला झाल्या बिझनेसवुमन!
32 shares
😐
L
Lokmat
May 2, 2026, 12:37 AM
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे जलद आणि सुरक्षित प्रवासासाठी जागतिक उच्च तंत्रज्ञानाच्या कौशल्याचा फायदा होतो

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे जलद आणि सुरक्षित प्रवासासाठी जागतिक उच्च तंत्रज्ञानाच्या कौशल्याचा फायदा होतो

मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी उभारण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात तांत्रिकदृष्ट्या जगभरातील उच्च तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या प्रकल्पातील पुलांचे बांधकाम आणि बोगद्यांमधील सुरक्षा यंत्रणांमध्ये जगातील सात महत्त्वाच्या देशांतील नामांकित कंपन्या आणि संस्थांची मदत घेतली आहे. आंतरराष्ट्रीय संस्था काम पाहत होती. पुलाची वाऱ्याच्या वेगाशी संबंधित चाचणी डेन्मार्कमधील कोपेनहेगन येथील ‘फोर्स टेक्नॉलॉजी’मध्ये केली. पुलाच्या केबल्सची चाचणी ऑस्ट्रियातील व्हिएन्ना विद्यापीठात करण्यात आली, तर रस्त्यावरील सुरक्षा कठड्यांचे तंत्रज्ञान ‘डेल्टा ब्लॉक’ या ऑस्ट्रियन संस्थेकडून घेतले आहे. पुलाचे तांत्रिक संरेखन ‘मे. विकॉन लि.’ या तैवानच्या कंपनीने केले आहे. बोगद्यातील अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणेची चाचणी स्पेनमधील ‘अपुल्स लॅब’मध्ये यशस्वीरीत्या पूर्ण झाली. प्रकल्पासाठी लागणाऱ्या विशेष केबल्सचे उत्पादन ‘मे. किसवायर’ या मलेशियन कंपनीने केले आहे. प्रकल्पाचे प्रमुख फायदेमुंबई-पुणे प्रवासातील अंतर ६ कि.मी.ने कमी होणार असून, प्रवाशांच्या वेळेत सुमारे ३० मिनिटांची बचत होईल. वेगवान प्रवासामुळे वाहनांच्या इंधनाचा वापर कमी होईल, यातून दररोज अंदाजे १ कोटी रुपयांची बचत होईल. घाटातील तीव्र वळणे आणि दरडी कोसळण्याचा धोका टाळता येणार असल्याने हा मार्ग ‘शून्य अपघात’ मार्ग म्हणून ओळखला जाईल. बोरघाटातील जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि द्रुतगती मार्ग एकत्र येत असल्याने होणारी वाहतूककोंडी संपुष्टात येईल. इंधन बचतीमुळे प्रदूषणात लक्षणीय घट होण्यास मदत होईल.
57 shares
😐
L
Lokmat
May 1, 2026, 09:09 PM
भारत पुढील पिढीच्या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची तयारी करत आहे

भारत पुढील पिढीच्या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची तयारी करत आहे

जगातील सर्वच देश आपली संरक्षण शक्ती वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असततात. यातभारतहीमागे नाही.भारताच्यासीमा अधिक बळकट करण्यासाठी, आता DRDO 'अग्नी-६' या पुढच्या पिढीतील सर्वात घातक क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी सज्ज झाले आहे. हे एक आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असेल. आता केवळ भारत सरकारच्या हिरव्या झेड्याचीच प्रतीक्षा आहे. महत्वाचे म्हणजे, यामुळे भारताची जागतिक सामरिक शक्ती अधिक वाढेल. अमेरिकेसह युरोपही टप्प्यात? -तज्ज्ञांच्या मते, 'अग्नी-६' ची रेंज ८००० ते १२००० किलोमीटर अथवा याहूनही अधिक असू शकते. ही या क्षेपणास्त्राची सर्वात मोठी ताकद आहे. या प्रचंड रेन्जमुळे भारत आपल्या भूमीवरूनच आशिया, चीन, रशिया आणि युरोपसह उत्तर अमेरिकेतील अलास्का आणि कॅनडासारख्या दूरवरच्या प्रदेशांनाही लक्ष्य करू शकेल. महत्वाचे म्हणजे, तांत्रिकदृष्ट्या हे क्षेपणास्त्र अग्नी-५ पेक्षाही अधिक प्रगत आणि घातक असू शकते. MIRV तंत्रज्ञानामुळे अभेद्य -'एमआयआरव्ही' (MIRV) हे एक अत्यंत विशेष तंत्रज्ञान आहे. या एकाच मिसाईलमधून एकाच वेळी अनेक अण्वस्त्रे अथवा शस्त्रे वेगवेगळ्या लक्ष्यांवर अचूकपणे डागली जाऊ शकतात. यामुळे शत्रूची कोणतीही आधुनिक 'मिसाईल डिफेन्स सिस्टम' याला रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरेल. जमिनीबरोबरच समुद्रातूनही पलटवार -अग्नी-६ ला मोबाईल लाँचरसह अणू पाणबुड्यांतूनही डागले जाऊ शकेल. यामुळे भारताची 'न्यूक्लियर ट्रायड' क्षमता अधिक मजबूत होईल. जर शत्रूने भारताच्या जमिनीवरील तळांवर हल्ले केले, तरी भारत खोल समुद्रातून घातक पलटवार करू शकेल. याशिवाय, DRDO हायपरसोनिक तंत्रज्ञानावरही काम करत आहे. विशेष म्हणजे, अग्नी-६ मुळे भारताचे 'नो फर्स्ट युज' धोरणगी अधिक प्रभावी होईल.
87 shares
😊