Achira News Logo
Achira News
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 03:15 PM
डब्ल्यू. पी. एल. 2026 एलिमिनेटरमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या महिलांनी गुजरात जायंट्सच्या महिलांचा पराभव केला

डब्ल्यू. पी. एल. 2026 एलिमिनेटरमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या महिलांनी गुजरात जायंट्सच्या महिलांचा पराभव केला

WPL 2026 Gujarat Giants Women vs Delhi Capitals Women, Eliminator Nandani Sharma Record : वडोदराच्या मैदानातदिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात जाएंट्स यांच्यात WPL च्या यंदाच्या हंगामातील एलिमिनेटरचा अर्थात सेमीफायनलचा सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकूनदिल्ली कॅपिटल्सचीकर्णधार जेमिमा रॉड्रिग्स हिने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. तिचा निर्णय दिल्लीच्या ताफ्यातील गोलंदाजांनी सार्थ ठरवला. त्यात यंदाच्या हंगामातील हॅटट्रिक क्वीन नंदिनी शर्मा हिने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीतील कमाल दाखवून देत नवा इतिहास रचल्याचे पाहायला मिळाले. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! तोच संघ, पुन्हा हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर पोहचलेली नंदिनी, हा डाव हुकला, पण... I.C.Y.M.IThat's how Nandni Sharma started her spell tonight 😎Backed brilliantly by the#DCfielders 👏Updates ▶️https://t.co/seGdvpFWwh#TATAWPL|#ClaimTheCrown|#GGvDC|#Eliminator|@DelhiCapitalspic.twitter.com/SG4dVX2rPw साखळी फेरीत गुजरात जाएंट्सच्या संघाविरुद्ध हॅटट्रिकचा डाव साधणारी नंदिनी पुन्हा एकदा गुजरात विरुद्ध हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर पोहचली होती. सेफी डिवाइनच्या रुपात गुजरातच्या संघाने दुसऱ्याच षटकात पहिली विकेट गमावली. त्यानंतर अनुष्का शर्मा मैदानात उतरली. यंदाच्या हंगामात या युवा बॅटरनं सर्वांना प्रभावित केले होते. पण सेमीफायनल लढतीत ती फिकी ठरली. पॉवर प्लेमधील सहाव्या षटकात जेमीनं चेंडू नंदिनीकडे सोपवला. ती आली अन् सहाव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर तिने अनुष्का शर्माची विकेट घेतली. पुढच्या चेंडूवर तिने गुजरातची कर्णधार अ‍ॅश्ले गार्डनर हिलाही आपल्या जाळ्यात अडकवले अन् एका हंगामात दुसऱ्यांदा ती हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर पोहचली. हा डाव साध्य झाला नसला तरी बॅक टू बॅक दोन विकेट्स घेत नंदिनी शर्मानं WPL मध्ये नवा इतिहास रचला आहे. WPL 2026 : कोण आहे नवी ‘हॅटट्रिक क्वीन’? रातोरात स्टार झालेल्या छोरीचा गल्ली ते दिल्लीपर्यंतचा प्रवास असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय नंदिनी शर्मा हिने बॅक टू बॅक दोन विकेट्स घेत यंदाच्या हंगामात १६ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. या कामगिरीसह ती WPL च्या एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारी भारतीय गोलंदाज ठरली आहे. याआधी हा विक्रम सायका इशाक हिच्या नावे होता. २०२३ च्या पहिल्या वहिल्या हंगामात तिने १५ विकेट्स घेतल्या होत्या. आता हा विक्रम दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून खेळणाऱ्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूच्या नावे झाला आहे.
39 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Feb 3, 2026, 02:42 PM
आर्थिक नुकसान आणि अनिश्चिततेमुळे 2026 च्या आयसीसी टी-20 विश्वचषकात भारताविरुद्ध खेळण्यास पाकिस्तानचा नकार

आर्थिक नुकसान आणि अनिश्चिततेमुळे 2026 च्या आयसीसी टी-20 विश्वचषकात भारताविरुद्ध खेळण्यास पाकिस्तानचा नकार

India vs Pakistan, Icc T20 World Cup 2026: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेला येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. तर सर्वात महत्वाचा सामना म्हणजे १५ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. पण पाकिस्तानने स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिल्याने ब्रॉडकास्टर्सचं मोठं नुकसान होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयामुळे अधिकृत ब्रॉडकास्टर जियोस्टार कडून पाकिस्तानवर क्रिकेट बोर्डावर कायदेशीर कारवाई होण्याची टांगती तलवार आहे. आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन भारत आणि श्रीलंकेत केले जाणार आहेत. पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. पाकिस्तानने इतर संघाविरुद्ध खेळण्यास होकार दिला आहे. तर भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यावर बहिष्कार का टाकला, याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीला अद्यापही कारण सांगितलेलं नाही.भारत – पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं मोठं नुकसान होणार आहे. तर जियो हॉटस्टारकडून कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते. सामना न झाल्यास ब्रॉडकास्टर्सचं मोठं नुकसान होणार आहे. या नुकसानाची भरपाई पाकिस्तानकडून वसूल केली जाऊ शकते. याशिवाय, पाकिस्तानला मिळणारा वार्षिक महसूल हिस्सा, जो अंदाजे ३५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे २९० कोटी रुपये) आहे, तो आयसीसी रोखून धरू शकते. या पैशांचा वापर हा ब्रॉडकास्टर्सचं होणारं नुकसान भरून काढण्यासाठी केला जाऊ शकतो. अशी शक्यता पीसीबीच्या सूत्रांनी वर्तवली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सीमांतर्गत वाद आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवली जात नाही. दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमनेसामने येत असतात. पण द्विपक्षीय मालिका वगळता इतर स्पर्धांसाठीही भारताने पाकिस्तानात जाण्यास, तर पाकिस्तानने भारतात येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दोन्ही संघांचे सामने हे न्यूट्रल वेन्यूवर खेळवले जातात. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड होणाऱ्या नुकसानाची भरपाई करण्यास होकार देणार, की हा तोटा टाळण्यासाठी भारताविरुद्ध खेळण्यास होकार देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
48 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 3, 2026, 02:14 PM
टी-20 सामन्यावर बहिष्कार टाकल्याप्रकरणी पाकिस्तानवर कायदेशीर कारवाई करण्याची आयसीसीची धमकी

टी-20 सामन्यावर बहिष्कार टाकल्याप्रकरणी पाकिस्तानवर कायदेशीर कारवाई करण्याची आयसीसीची धमकी

मुंबई:मंगळवारी पीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारी रोजी भारताविरुद्धच्या सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकल्यानंतर आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला अधिकृत T20 World Cup 2026 प्रसारकांकडून कायदेशीर कारवाईची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तानने आपल्या सरकारच्या सूचनांचे पालन करून 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे सामना न खेळण्याचा निर्णय घेतला, परंतु अद्याप ICC त्याची कारणे अधिकृतपणे कळवली नाहीत.पाकिस्तानचं मोठं नुकसानपीटीआयच्या वृत्तानुसार,आयसीसी पाकिस्तानचा संपूर्ण वार्षिक महसूल हिस्सा,अंदाजे 35 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे जवळजवळ 300 कोटी रोखू शकतात आणि त्या निधीतून प्रसारकांना भरपाई देऊ शकते अशी शक्यता आहे. पीसीबीच्या एका सूत्राने सांगितले की, जरी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना या मुद्द्यावर माहिती देण्यापूर्वी बोर्डाच्या कायदेशीर तज्ञांशी चर्चा केली.T20 World Cup ला अवघे काही दिवस शिल्लक, भारतीय संघाला सतावतेय 'ती' एक भीती, गंभीर-सूर्यासमोर मोठं आव्हानपीसीबीच्या सूत्राने सांगितले की, "जर पाकिस्तानने माघार घेतली नाही आणि भारताविरुद्ध खेळला नाही, तर त्यांना केवळ आर्थिक दंड आणि कदाचित प्रसारकांकडून खटला भरावा लागेल." पीसीबीच्या दुसऱ्या सूत्राने पीटीआयला सांगितले की, "भारताविरुद्ध खेळू नये असे सरकारचे निर्देश असूनही पीसीबीला अडचणी येऊ शकतात, कारण ते त्यांचे सर्व सामने भारतात न खेळता त्यांच्या इच्छेनुसार तटस्थ ठिकाणी (श्रीलंका) खेळत आहेत."सूत्र पुढे म्हणाले, "दुसरे म्हणजे, भारत सरकारने त्यांच्या संघाला पाकिस्तानमध्ये खेळण्याची परवानगी दिली नसली तरी, मे महिन्यातील संघर्षानंतरही आशिया कप किंवा आयसीसी स्पर्धांमध्ये तटस्थ ठिकाणी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यापासून रोखले नाही." पीसीबीने अद्याप आयसीसीला त्यांच्या निर्णयाची लेखी माहिती दिलेली नाही. "जेव्हा आयसीसीने सर्व आयसीसी स्पर्धांसाठी प्रसारकासोबत चार वर्षांचा करार केला, तेव्हा करारात पाकिस्तान आणि भारताशी संबंधित सामने समाविष्ट होते, ज्याच्या आधारे प्रसारकाने आयसीसीला पैसे दिले," सूत्राने सांगितले. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की पीसीबीने या प्रकरणात समर्थनासाठी इतर सदस्य मंडळांशी संपर्क साधला, परंतु त्यांना कोणताही पाठिंबा मिळाला नाही." भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 15 फेब्रुवारी रोजी रंगणार आहे.
25 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 01:05 PM
महाराष्ट्रात यात्रा कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात कुस्ती स्पर्धा आयोजित

महाराष्ट्रात यात्रा कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात कुस्ती स्पर्धा आयोजित

यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या तालमीतील पैलवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन हजार रुपये पर्यंतच्या कुस्त्या मैदानी पद्धतीने घेण्यात आल्या. तर प्रथम,द्वितीय,तृतीय व चतुर्थ क्रमांक यासाठी साखळी पद्धतीने कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये 72 पैलवानांनी नाव नोंदणी केली होती. एकूण सहा फेरीत खेळून चार नंबर काढण्यात आले.
14 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 3, 2026, 12:20 PM
T20 विश्वचषकः बांगलादेश स्पर्धेतून बाहेर, पाकिस्तानचा भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार

T20 विश्वचषकः बांगलादेश स्पर्धेतून बाहेर, पाकिस्तानचा भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार

मुंबई:टी-20 विश्वचषक सुरु होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. भारत आणि श्रीलंकामध्ये हा विश्वचषक रंगणार आहे. भारताविरुद्धच्या टी-20 विश्वचषक सामन्यावर बहिष्कार टाकत आहेत. यापूर्वी बांगलादेशने श्रीलंकेत आपले सामने हटवण्याची मागणी केली होती पण ही मागणी ICC फेटाळली. बांगलादेश यंदाचा विश्वचषक खेळणार नसून त्यांच्या जागी स्कॉटलंड या स्पर्धेत खेळणार आहे. या सगळ्या दरम्यान आता Pakistan Cricket Board दुटप्पीपणा जगासमोर आला आहे.एकीकडे ते भारताविरुद्धच्या T20 World Cup 2026 सामन्यावर बहिष्कार टाकत आहेत. दुसरीकडे, तेमहिला रायझिंग स्टार आशिया कप टी-20 चे सामनेखेळणार आहेत. भारत आणि पाकिस्तान 15 फेब्रुवारी रोजी बँकॉकमध्ये एकमेकांसमोर येणार आहेत. 13 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या महिला रायझिंग स्टार आशिया कपची तयारी नियोजित प्रमाणे सुरू आहे. पाकिस्तान महिला संघाला भारताविरुद्ध न खेळण्याचे कोणतेही निर्देश मिळालेले नाहीत. ज्या दिवशी पाकिस्तानने विश्वचषकात भारताविरुद्ध न खेळण्याचा निर्णय जाहीर केला त्याच दिवशी भारत आणि पाकिस्तान अंडर-19 विश्वचषकात सुपर सिक्स सामन्यात भिडले.ICC T20 World Cup : आता पाकिस्तानचं काही खरं नाही! ICC मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, भारताविरुद्ध सामना न खेळल्यास...पाकिस्तान संघ श्रीलंकेत पोहोचलाटी-20 विश्वचषक 2026 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यावेळी, विश्वचषक भारत आणि श्रीलंकेत होत आहे. पाकिस्तान आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळेल. अशा परिस्थितीत, पाकिस्तान संघ विश्वचषक खेळण्यासाठी आधीच श्रीलंकेत पोहोचला आहे. पाकिस्तान 4 फेब्रुवारी रोजी आयर्लंडविरुद्ध आपला सराव सामना खेळेल. पाकिस्तान 8 फेब्रुवारी रोजी नेदरलँड्सविरुद्ध खेळून टी-20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल. जर पाकिस्तान भारताविरुद्ध न खेळण्याच्या आपल्या भूमिकेवर कायम राहिला तर आयसीसी त्यांच्यावर गंभीर कारवाई करू शकते.पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला भारताविरुद्ध सामना न खेळण्याबद्दल अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. आतापर्यंत फक्त पाकिस्तान सरकारनेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आदेश दिला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 फेब्रुवारी रोजी सामना रंगणार आहे. संध्याकाळी सात वाजता हा सामना आर प्रेमादास स्टेडियम कोलंबोमध्ये खेळवला जाईल.
17 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 11:56 AM
पाकिस्तानचा क्रिकेट सामन्यांवर बहिष्कार कायम राहिल्यास विलगीकरण आणि प्रतिमा मलीन होण्याचा इशारा कपिल देव यांचा

पाकिस्तानचा क्रिकेट सामन्यांवर बहिष्कार कायम राहिल्यास विलगीकरण आणि प्रतिमा मलीन होण्याचा इशारा कपिल देव यांचा

कपिल देव म्हणाले, 'जर हा निर्णय खेळाडूंनी घेतला आहे तर ते समोर येऊन हा निर्णय सांगू शकतात. मात्र जर हा निर्णय क्रिकेट बोर्डाच्या सांगण्यावरून घेतला गेला आहे. जर क्रिकेट बोर्ड तुम्ही खेळू नका असं सांगत असेल तर या देशाची प्रतिमा मलीन झाली आहे.' कपिल देव पुढे म्हणाले की, जर सतत पाकिस्तान मागे हटतोय किंवा बहिष्कार करतोय असं झालं तर पाकिस्तान क्रिकेट एकाकी पडले. पाकिस्तानची अवस्था आधीच चांगली दिसत नाहीये. तुम्ही संपूर्ण एका पिढीला संपवून टाकत आहात.
73 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 11:15 AM
कपिल देव यांनी टी-20 विश्वचषक 2026 मध्ये पाकिस्तानच्या बहिष्कार निर्णयाचा निषेध केला

कपिल देव यांनी टी-20 विश्वचषक 2026 मध्ये पाकिस्तानच्या बहिष्कार निर्णयाचा निषेध केला

आगामी टी२० विश्वचषक २०२६ मधील भारत-पाकिस्तानसामन्यावर बहिष्कार टाकण्याच्यापाकिस्तानसरकारच्या निर्णयावर भारताचे महान क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार कपिल देव यांनी अत्यंत तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. "पाकिस्तानचा हा निर्णय भारतापेक्षा पाकिस्तानच्या स्वतःच्या क्रिकेट भविष्यासाठी अधिक घातक ठरेल," असे भाकीत कपिल पाजींनी वर्तवले आहे. पाकिस्तान सरकारने स्पष्ट केले आहे की, त्यांचा संघ विश्वचषकात सहभागी होईल, मात्र १५ फेब्रुवारीला कोलंबोमध्ये होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. बांगलादेशनेही सुरक्षा कारणास्तव भारत दौरा नाकारला होता, मात्रआयसीसीनेत्यांची मागणी फेटाळून लावल्यानंतर पाकिस्तानने आता थेट सामन्यावरच बहिष्कार टाकण्याचे पाऊल उचलले आहे. कपिल देव यांचा पीसीबीला इशाराएका माध्यम संवादादरम्यान कपिल देव यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आरसा दाखवला. ते म्हणाले, "हा केवळ राजकारणाचा किंवा प्रतिमेचा प्रश्न नाही, तर थेट तरुण क्रिकेटपटूंच्या करिअरचा प्रश्न आहे. जर हा निर्णय खेळाडूंनी घेतला असेल, तर त्यांनी समोर येऊन तसे सांगावे. पण जर बोर्ड सांगत असेल की तुम्ही खेळू नका, तर यामुळे तुमच्या देशाची प्रतिष्ठा खालावते." कपिल देव यांनी पुढे इशारा दिला की, "वारंवार मागे हटणे आणि बहिष्कार टाकणे यामुळे पाकिस्तान क्रिकेट जगापासून वेगळे पडेल. तुम्ही केवळ एका सामन्यावर बहिष्कार टाकत नाही आहात, तर तुम्ही तुमच्या क्रिकेटपटूंची एक संपूर्ण पिढी उद्ध्वस्त करत आहात. पाकिस्तानसाठी ही परिस्थिती अजिबात चांगली नाही." नुकसान कुणाचे?भारत-पाकिस्तान ही क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते. पाकिस्तानने सामना न खेळल्यास भारताला थेट विजय मिळेल, मात्र पाकिस्तानला जागतिक स्तरावर आर्थिक आणि क्रीडाविषयक निर्बंधांचा सामना करावा लागू शकतो. कपिल देव यांच्या मते, पाकिस्तान क्रिकेट सध्या अशा वळणावर आहे जिथे एक चुकीचा निर्णय त्यांना क्रिकेटच्या नकाशावरून पुसून टाकू शकतो.
74 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 3, 2026, 10:58 AM
वॉशिंग्टन सुंदरच्या तंदुरुस्तीची चिंता कायम राहिल्याने भारताच्या टी-20 विश्वचषकातील आशा संतुलनात अडकल्या आहेत.

वॉशिंग्टन सुंदरच्या तंदुरुस्तीची चिंता कायम राहिल्याने भारताच्या टी-20 विश्वचषकातील आशा संतुलनात अडकल्या आहेत.

मुंबई:भारतीय क्रिकेट संघ 2026 चा टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज आसल्याचे संघाच्या कामगिरीवरुनच कळत आहे. आता पहिला सामना 7 फेब्रुवारीला रंगणार आहे. भारताचा पहिला सामना हा अमेरिकेविरुद्ध असणा आहे. आता यापूर्वी भारतीय संघ काही सराव सामने खेळत आहे. पण आता T20 World Cup 2026 पूर्वी भारतासाठी एक बाब चिंतेचा विषय ठरत आहे.Washington Sundar अजूनही फिट झाला नसून त्याला खेळण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. 4 फेब्रुवारी रोजी त्याची आणखी एक चाचणी होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा खेळाडूबीसीसीआय सेंटरमध्ये रिहॅब प्रक्रियेतूनजात आहे, परंतु अद्याप त्याला गोलंदाजी करण्याची परवानगी मिळालेली नाही. त्याचे आणखी एक गोलंदाजी सत्र असेल, त्यानंतर तो विश्वचषक खेळणार की नाही याबाबत माहिती समोर येईल.अहवाल असे दर्शवितात की वॉशिंग्टन सुंदर अद्याप तंदुरुस्त नाही, जरी त्याने रिहॅब प्रक्रियेत चांगली प्रगती केली आहे आणि चार फलंदाजी सत्रे पूर्ण केली आहेत. त्याने 2 फेब्रुवारी रोजी गोलंदाजी केली, चार षटके गोलंदाजी केली. 4 फेब्रुवारी रोजी त्याचे आणखी एक गोलंदाजी सत्र असेल. त्यानंतर, भविष्यातील रणनीती ठरवली जाईल. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली होती, त्यानंतर तो एकदिवसीय मालिकेतील उर्वरित दोन सामने आणि टी-20 मालिकेतील सर्व पाच सामने खेळू शकला नाही.जर वॉशिंग्टन सुंदर बाहेर पडला तर टीम इंडियाकडे एक बदली खेळाडू तयार आहे. आयुष बदोनी आणि रियान पराग इंडिया अ संघाकडून खेळत आहेत, हे दोघेही सुंदरच्या जागी संघात सामील होऊ शकतात. बदोनीने अमेरिकेविरुद्धही शानदार कामगिरी केली. बदोनीने अमेरिकेविरुद्ध धमाकेदार 60 धावा केल्या आणि एक विकेटही घेतली. रियान पराग देखील आता तंदुरुस्त आहे.टी-20 विश्वचषकापूर्वी सराव सामने खेळण्यासाठी भारतीय संघ नवी मुंबईत दाखल झाला आहे. भारत 4 फेब्रुवारी रोजी डीवाय पाटील स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात टीम इंडिया आपला सर्वात मजबूत प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरवू शकते.
28 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 10:48 AM
क्रिकेट वादाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने पी. सी. बी. ला निर्णयाचा पुनर्विचार करण्यास सांगितले

क्रिकेट वादाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने पी. सी. बी. ला निर्णयाचा पुनर्विचार करण्यास सांगितले

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची अधिकृत विनंती केली आहे. पाकिस्तानचा हा निर्णय 'खेळ भावने'च्या विरोधात असल्याचे आयसीसीचे मत आहे. अद्याप आयसीसीने कोणत्याही अधिकृत बंदीची किंवा शिक्षेची घोषणा केलेली नाही, परंतु पाकिस्तान क्रिकेटला याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असे संकेत दिले आहेत.
80 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 09:27 AM
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीवरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीवरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Supreme Court on MCA Body Polls:महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांवरील स्थगिती उठवण्यास सुप्रीम कोर्टाने मंगळवारी स्पष्ट नकार दिला. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती कायम ठेवत, सुप्रीम कोर्टाने एमसीएच्या कारभारावर अत्यंत कडक ताशेरे ओढले. उच्च न्यायालयाने तुम्हाला मोठा गैरव्यवहार करण्यापासून रोखले आहे, अशा शब्दांत न्यायालयाने एमसीएला आणि एमसीएचे विद्यमान अध्यक्षरोहित पवारयांना फटकारले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम. पांचोली यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. एमसीएने या निवडणुकीवरील स्थगिती हटवण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळून लावली. "मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय योग्यच आहे. त्यांनी तुम्हाला मोठा फ्रॉड करण्यापासून रोखले आहे. आम्हाला अजून बोलायला लावू नका," अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने फटकारले. हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित असून तिथेच आपली बाजू मांडावी, असेहीसर्वोच्च न्यायालयानेस्पष्ट केले. यादीमध्ये ज्यांना बॅट कशी पकडायची माहिती नाही त्यांची नावे - सुप्रीम कोर्ट एमसीएकडून असलेल्या ज्येष्ठ वकील मेनका गुरुस्वामी यांनी धर्मादाय आयुक्तांनी दिलेला निर्णय चुकीचा होता, असं म्हटलं. त्यावर बोलताना सरन्यायाधीशांनी, "या देशाने निवृत्त झालेले अनेक दिग्गज क्रिकेटपटू घडवले आहेत. जर तुमच्या या (मतदार) यादीत त्यापैकी काही खेळाडू असते, तर आम्ही कदाचित हे चालू दिले असते. पण तुमच्या यादीत असे लोक आहेत ज्यांना बॅट कशी पकडायची हे सुद्धा माहित नाही. आम्हाला यापेक्षा जास्त बोलायला लावू नका. दिग्गज खेळाडूंकडे पहा. किमान इतका तरी सन्मान त्यांना दिला पाहिजे की त्यांनी असोसिएशनचा कारभार पाहावा. जर क्रिकेटपटूंसाठी नसेल, तर मग ही असोसिएशन नेमकी आहे तरी कोणासाठी?" असा सवाल केला. नेमकं प्रकरण काय? मुंबई उच्च न्यायालयाने ६ जानेवारी रोजी एमसीएच्या निवडणुकीला स्थगिती दिली होती. एमसीएचे विद्यमान अध्यक्षरोहित पवारयांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी, अवघ्या दोन महिन्यांत सुमारे ४०० नवीन सदस्यांना बेकायदेशीरपणे समाविष्ट करण्यात आल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला होता. माजी भारतीय क्रिकेटपटूकेदार जाधव, लातूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि इतर सदस्यांनी या निवडणुकांविरोधात याचिका दाखल केली होती.केदार जाधवयांच्या याचिकेत अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले होते. #SupremeCourthears appeal against Bombay HC order which stayed the election of the Maharashtra Cricket Association (MCA) scheduled for January 6 after finding prima facie illegality and lack of transparency in the induction of nearly 400 new members just weeks before the polls…pic.twitter.com/Vr2cL4ukVQ नवीन सदस्य म्हणून रोहित पवार यांच्या पत्नी कुंती पवार, सासरे सतीश मगर, खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे आणि बारामती ॲग्रोचे सुभाष गुळवे यांच्यासह ३० हून अधिक राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे अचानक घुसवण्यात आली. या सदस्यांची नोंदणी करताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले गेले नाही आणि इतक्या मोठ्या संख्येने सदस्य वाढवून मतदारांची यादी बदलण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यामुळे आता एमसीएला मुंबई उच्च न्यायालयातच आपली बाजू सिद्ध करावी लागणार आहे. उच्च न्यायालयाने आधीच सांगितले आहे की, ४०० नवीन सदस्य अचानक वाढवणे ही बाब पारदर्शकता आणि निष्पक्षतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते. यामुळे एमसीएच्या आगामी निवडणुका आता कायदेशीर कचाट्यात अडकल्या आहेत.
70 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 09:04 AM
ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय चषक स्पर्धेत टॉम रॉजर्सच्या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या एका हाताच्या झेलने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला

ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय चषक स्पर्धेत टॉम रॉजर्सच्या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या एका हाताच्या झेलने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला

Cricket Catch Video: ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत वन-डे कप (Marsh Cup) मध्ये विक्टोरिया आणि क्वीन्सलँड यांच्यातील सामन्यात टॉम रॉजर्स (Tom Rogers) याने मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) याचा एक अविश्वसनीय झेल टिपला. क्रिकेटच्या मैदानात अनेकदा असे काही क्षण पाहायला मिळतात जे पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असाच एक चित्तथरारक झेल ऑस्ट्रेलियाच्या 'वन-डे कप' मध्ये पाहायला मिळाला. विक्टोरियाच्या टॉम रॉजर्सने क्वीन्सलँडचा कर्णधार मार्नस लाबुशेनचा एक हाताने हवेत झेप घेत घेतलेला झेल सध्यासोशल मीडियावरधुमाकूळ घालत आहे. रॉजर्सचा अप्रतिम झेल क्वीन्सलँडच्या डावातील सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर लाबुशेनने एक जोरदार शॉट खेळला. चेंडू अत्यंत वेगाने सीमारेषेकडे जात होता, मात्र तिथे तैनात असलेल्या टॉम रॉजर्सने आपल्या डाव्या बाजूला हवेत मोठी झेप घेतली आणि चक्क एका हाताने चेंडू टिपला. हा चेंडू इतका वेगवान होता की लाबुशेनसह मैदानावरील सर्व खेळाडू झेल पाहून अवाक झाले. या अप्रतिम झेलमुळे मार्नस लाबुशेन अवघ्या ४ धावांवर (९ चेंडू) माघारी परतला. या झेलचा व्हिडिओ cricket.com.au ने शेअर केला असून, चाहत्यांनी टॉम रॉजर्सच्या या चपळाईचे भरभरून कौतुक केले आहे. Tom Rogers with an absolute SCREAMER to dismiss Marnus 🤯Stream the#OneDayCuphere:https://t.co/RspGgYIOxcpic.twitter.com/wlPd6Cyiwm लाबुशेनच्या विकेटमुळे क्वीन्सलँडची स्थिती १७ धावांवर ३ बाद अशी बिकट झाली होती. या झेलसह टॉम रॉजर्सने आपल्या लिस्ट-ए (List-A) क्रिकेट कारकिर्दीतील १० झेल पूर्ण केले. त्याने २०२३ मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. दरम्यान, क्वीन्सलँडचा संघ ४९ षटकांत २१५ धावांवर गारद झाला. त्यांच्याकडून जिमी पीअर्सनने सर्वाधिक ६५ धावा केल्या. विक्टोरियाकडून फिरकीपटू टॉड मर्फीने १० षटकांत २९ धावा देऊन ३ बळी घेतले. त्यामुळे विक्टोरियासमोर विजयासाठी २१६ धावांचे माफक लक्ष्य उभे राहिले.
33 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 08:52 AM
रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईचा कर्नाटकवर दणदणीत विजय

रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईचा कर्नाटकवर दणदणीत विजय

42 वेळा रणजी विजेतेपद भूषवणाऱ्या मुंबईचा सामना 8 वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या कर्नाटकविरुद्ध होणार आहे. कर्नाटकच्या संघात देवदत्त पडिक्कल (कर्णधार), मयंक अग्रवाल, के. एल. राहुल, प्रसिद्ध कृष्णा यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश असल्याने ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.
44 shares
😊
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 08:45 AM
अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे [ठिकाण] मधील क्रीडा स्पर्धांमध्ये व्यत्यय येतो, त्यामुळे प्रेक्षक उघड होतात

अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे [ठिकाण] मधील क्रीडा स्पर्धांमध्ये व्यत्यय येतो, त्यामुळे प्रेक्षक उघड होतात

निदान प्रेक्षकांना उन्हापासून बचाव करण्यासाठी स्टेडियम वर पत्रे लावण्यात यावेत जेणेकरून कुणालाही उन्हाच्या झळांना सामोरे जावे लागणार नाही. प्रेक्षकांना क्रिकेट सामने पाहताना मनसोक्तपणे आनंद घेता येईल यासाठी संबंधित खात्याने याबाबत ठोस उपाययोजना करावी अशी समस्त क्रीडाप्रेमीं मधून मागणी केली जात आहे.या ठिकाणी कायमस्वरूपी विजेची सोय नाही तर शौचालयांची व्यवस्था असावी ही क्रीडा प्रेमींची अनेक वर्षापासूनची मागणी आहे येथे तात्पुरत्या स्वरूपात शौचालय उभी केली गेली आहेत, परंतु त्या ठिकाणी पाण्याची सोय नसल्याने घाणीचे साम्राज्य आहे प्रेक्षकांना बसण्याची आसन व्यवस्था कोलमडले असून अनेक वर्षाच्या जुन्या खुर्च्या बसल्यानंतर मोडून पडत आहे. या ठिकाणीमुख्य शेडला पत्रेच नाही, लोखंडी बार हे गंजले असून इतर ठिकाणच्या पॅव्हेलियन शेडचे पत्रे ही कलरच्या प्रतीक्षेत आहे याकडे नगरपालिकेने सबसे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळते.
94 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 08:29 AM
टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ श्रीलंकेत दाखल

टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ श्रीलंकेत दाखल

दरम्यान, टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियाचे सर्व साखळी सामने श्रीलंकेत होणार आहेत.
52 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 08:11 AM
2026 च्या पुरुष टी-20 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्यावर पाकिस्तानचा बहिष्कार, आर्थिक भीती निर्माण

2026 च्या पुरुष टी-20 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्यावर पाकिस्तानचा बहिष्कार, आर्थिक भीती निर्माण

आगामीआयसीसीटी२० पुरुष विश्वचषक २०२६ सुरू होण्यापूर्वीच क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.पाकिस्तानसरकारने आपल्या क्रिकेट संघाला विश्वचषकात सहभागी होण्याची परवानगी दिली असली, तरी १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये होणाऱ्या भारताविरुद्धच्या महामुकाबल्यावर बहिष्कार टाकण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे.पाकिस्तानच्याया आडमुठ्या भूमिकेमुळेआयसीसीसंतापली असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आतापर्यंतचा सर्वात मोठा दंड सोसावा लागण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा केवळ खेळ नसून तो जागतिक क्रिकेटसाठी कमाईचा सर्वात मोठा स्रोत आहे. हा सामना रद्द झाल्यास ब्रॉडकास्टर्स, जाहिरातदार आणि तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या सुमारे २५० दशलक्ष डॉलर्स (सुमारे २,३०० कोटी रुपये) महसुलावर पाणी फेरले जाईल. आयसीसी आणि पीसीबीचे माजी कम्युनिकेशन्स प्रमुख समी-उल-हसन बर्नी यांनी या सामन्याच्या आर्थिक महत्त्वाबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, "जोपर्यंत नुकसानीचा प्रश्न आहे, भारत-पाकिस्तान सामन्याची किंमत सुमारे $२५० दशलक्ष किंवा ₹२,२८८ कोटींपेक्षा जास्त असते. यामध्ये केवळ प्रसारकच नाही तर सर्व आर्थिक पैलूंचा समावेश आहे. पाकिस्तानचे वार्षिक उत्पन्न सुमारे $३५.५ दशलक्ष किंवा ₹३२५ कोटी आहे, त्यामुळे हा फरक खूप मोठा आहे." दंडाची टांगती तलवार: आयसीसीच्या 'सदस्य सहभाग करारा'नुसार (MPA), जर एखादा देश राजकीय कारणास्तव सामना खेळण्यास नकार देत असेल, तर त्या नुकसानीची सर्व भरपाई संबंधित क्रिकेट बोर्डाकडून (PCB) वसूल केली जाऊ शकते. पीसीबीचे वार्षिक उत्पन्नच एवढे आहे की हा दंड भरण्यासाठी पीसीबीला पुढची आठ-दहा वर्षे लागतील. परंतू, हा दंड भरण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय सामने खेळत रहायला हवा. भारताला मिळणार 'वॉकओव्हर'आयसीसीच्या नियमांनुसार, जर पाकिस्तानचा संघ १५ फेब्रुवारीला मैदानात उतरला नाही, तर टीम इंडियाला थेट 'वॉकओव्हर' दिला जाईल. यामुळे भारताला २ गुण मिळतील, तर पाकिस्तानचा 'नेट रन रेट' (NRR) मोठ्या प्रमाणात घसरून त्यांना स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण होईल. आयसीसीचा इशारा: "हा खेळाच्या अखंडतेवर हल्ला"आयसीसीने या प्रकरणावर अधिकृत पत्रक जारी करत म्हटले आहे की, "निवडक सहभाग हा जागतिक स्पर्धेच्या मूलभूत तत्त्वांविरुद्ध आहे. यामुळे स्पर्धेच्या पवित्रतेला धक्का पोहोचतो." आयसीसीने पीसीबीला या निर्णयाचे दीर्घकालीन परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट इशारा दिला आहे. यामध्ये पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबन किंवा भविष्यातील आयसीसी महसुलात कपात यांसारख्या कारवाईचा समावेश असू शकतो.
71 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 3, 2026, 08:08 AM
भारताच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या पी. सी. बी. च्या निर्णयाची पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी केली खिल्ली उडवली

भारताच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या पी. सी. बी. च्या निर्णयाची पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी केली खिल्ली उडवली

T20 World Cup 2026 Pakistani Former Cricketer Danish Kaneria Slams PCB For Boycott Match Against India : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होण्याआधी पाकिस्तानच्या एका निर्णयामुळे वातावरण तापले आहे. बांगलादेशला बाहेर काढल्याच्या मुद्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं टीम इंडियाविरुद्धच्या हायहोल्टेज सान्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशचे सामने श्रीलंकेत स्थलांतरित करा, अन्यथा आम्हीही त्यांच्यासोबत स्पर्धेतून माघार घेऊ, अशी धमकी याआधी पाकिस्तानने दिली होती. पण एका बाजूला बांगलादेश हट्टीपणामुळे स्पर्धेबाहेर गेला. दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाने टी-२० वर्ल्ड कपसाठी आपला संघ जाहीर केला. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! सरकारच्या साथीनं PCB ची नवी नौटंकी? संघ जाहीर केला असला तरी या स्पर्धेत खेळण्यासंदर्भातील अंतिम निर्णय सरकार घेईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. स्पर्धेत सहभागी होण्याचा संभ्रम दूर करताना पाकिस्तानने नवा डाव खेळला. पाकिस्तान सरकारने आपल्या क्रिकेट संघाने स्पर्धेत सहभागी व्हावे, पण १५ फेब्रुवारीला भारताविरुद्ध खेळू नये, असा फतवा काढला. खरं तर ही चाल PCB आणि पाकिस्तान सरकार यांनी मिळून सुरु केलेली एक नौटंकीच आहे. ICC नं यावर पाकिस्तानला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी ताकीदही दिली आहे. पण ICC नं याप्रकरणात अद्याप ठाम भूमिका घेतलेली नाही. यामागचं कारण पाकिस्तान सरकारने मोठा गाजावाजा करत भारताविरुद्धच्या सामन्यात बहिष्कार टाकण्याची घोषणा केली असली तरी यासंदर्भात PCB नं अधिकृतरित्या ICC ला तसे कळवलेले नाही. IND vs PAK : ‘वेट अँड वॉच’… BCCI चा पाकिस्तानला इशारा; ICC च्या निवेदनावर मत मांडले, पण… पाकिस्तानला भारताची धास्ती? खरंच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सरकारच्या निर्णयावर ठाम राहणार, की आयत्यावेळी यू टर्न घेणार? या परिस्थितीत ICC कडून पाक संघावर काय कारवाई होणार? अशा अनेक गोष्टी चर्चेचा विषय ठरत आहे. या सर्व घडामोंडीवर पाकिस्तानचा माजी फिरकीपटूनं PCB ला घरचा आहेर दिला आहे. पाकिस्तानचा संघ टीम इंडियाविरुद्ध खेळायला घाबरत आहे. त्यामुळेच हा निर्णय घेतला असावा, असा आरोप पाकच्या दिग्गजाने केला आहे. कोण आहे तो क्रिकेटर आणि त्याने नेमकं काय म्हटलं आहे? जाणून घेऊयात सविस्तर वृत्तसंस्था IANS शी बोलताना दानिश कनेरिया म्हणाला आहे की, "भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्यासाठी पाकिस्तानकडे कोणताही ठोस आधार नाही. जो बांगलादेश आधीच स्पर्धेतून बाहेर आहे, त्याच्या समर्थनासाठी पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जगाला असा संदेश जाईल की, पाकिस्तानची टीम भारताचा सामना करण्यास घाबरते आणि म्हणूनच त्यांनी खेळण्यास नकार दिला." सेमीफायनलचा मार्ग खडतर कनेरिया पुढे म्हणाला की, "या निर्णयामुळे पाकिस्तानसाठी सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग अधिक कठीण होईल. मला वाटतं पाकिस्तानचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. पाकिस्तानला वाटत असेल की, भारत-पाकिस्तान सामना हा कमाईचं साधन आहे, तर आता ही प्रतिद्वंद्विता संपुष्टात आली आहे. पाकिस्तान सध्या भारत खेळतो तसा दर्जेदार क्रिकेट खेळत नाही. टी २० वर्ल्ड कप असो किंवा ५० षटकांचा विश्वचषक-भारताने नेहमीच पाकिस्तानवर मात केली आहे." ही गोष्टही त्याने बोलून दाखवली.
24 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 06:52 AM
भारत-पाकिस्तान सामन्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाला आर्थिक डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे.

भारत-पाकिस्तान सामन्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाला आर्थिक डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे.

पाकिस्तानसाठी हा नियम खरी डोकेदुखी ठरू शकतो. भारत - पाकिस्तान सामन्याकडे पैशाचा पाऊस पाडणारा सामना म्हणून पाहिलं जातं. जर हा सामना झाला नाही तर जिओस्टार सारख्या ब्रॉडकास्टर्सचे जवळपास २५ ते ३० मिलियन डॉलर्सचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हे पैसे ब्रॉडकास्टर आयसीसीकडून वसूल करून घेऊ शकते. आयसीसी हा आर्थिक भूरदंड थेट पाकिस्तान क्रिकेट असोसिएशनकडून वसूल करून घेऊ शकते. आयसीसी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या वार्षिक उत्पन्नाच्या हिस्स्यातून ही रक्कम कापून घेऊ शकते. ही रक्कम त्यांच्या वार्षिक उत्पन्न हिस्सेदारीच्या ७० ते ८० टक्के इतकी आहे. त्यामुळं पाकिस्तान क्रिकेट बोर्डची अवस्था भिकाऱ्यापेक्षाही वाईट होण्याची शक्यता आहे.
8 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 06:29 AM
उद्यारीची वार्षिक महिला बॅडमिंटन स्पर्धाः रोख बक्षिसांसह विनामूल्य प्रवेश कार्यक्रम

उद्यारीची वार्षिक महिला बॅडमिंटन स्पर्धाः रोख बक्षिसांसह विनामूल्य प्रवेश कार्यक्रम

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी टायटल स्पॉन्सर माणिकचंद ऑक्सिरीच, फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी, ॲकेडेमीक पार्टनर सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट, सहप्रायोजक अदानी, तर असोसिएट पार्टनर व्हॅलेन्टिना इंडस्ट्रीज, के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूटस ट्रिनिटी, अमनोरा पार्क टाऊन, सपोर्टिंग पार्टनर पुणे महापालिका यांचे सहकार्य मिळाले. दैनिक ‌‘पुढारी‌’तर्फे दरवर्षी आयोजित होणाऱ्या महिला बॅडमिंटन स्पर्धेचे हे 4 थे वर्ष आहे. मुलींच्या आणि महिलांच्या मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादामुळे ही स्पर्धा यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. स्पर्धेचं वैशिष्ट्‌‍य म्हणजे स्पर्धेसाठी मुक्त प्रवेश असतो. कोणत्याही प्रकारची प्रवेश फी घेतली जात नाही. शिवाय रोख रकमेची पारितोषिके आणि प्रत्येक खेळाडूला सहभागाचे प्रमाणपत्रसुद्धा देण्यात येते. पुणे डिस्ट्रिक्ट मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशनच्या कोर्टवर ही स्पर्धा घेण्यात येते. त्यामुळे खेळाडूंना सर्व सोयींनी युक्त असणाऱ्या उत्तम प्रतीच्या कोर्टवर उत्तम खेळ करण्यासाठी चांगली संधी उपलब्ध होते. तसेच पीडीएमबीएच्या सर्व प्रमाणित पंचांकडून त्याच्या खेळाला योग्य न्याय दिला जातो. रामदास घोरपडे (स्पर्धा रेफरी)
54 shares
😊
Pudhari logo
Pudhari
Feb 3, 2026, 03:48 AM
पिम्परी-चिंचवाडच्या स्पोर्ट्स क्लब प्रकल्पातील स्टॉल्स, स्थानिक खेळाडूंना दर्जेदार सुविधांशिवाय सोडून

पिम्परी-चिंचवाडच्या स्पोर्ट्स क्लब प्रकल्पातील स्टॉल्स, स्थानिक खेळाडूंना दर्जेदार सुविधांशिवाय सोडून

अण्णासाहेब मगर स्टेडियमवरील स्पोट्‌‍र्स क्लब प्रकल्प हा पिंपरी-चिंचवडच्या क्रीडा इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरू शकला असता; पण महापालिका आणि शासनाने या प्रकल्पाला गती दिल्याशिवाय शहराला आधुनिक, बहुउद्देशीय आणि दर्जेदार स्पोट्‌‍र्स क्लबचे स्वप्न केवळ कागदावरच राहणार आहे. शहरातील अनेक खेळाडू पुण्यात प्रशिक्षणासाठी धाव घेतात. शहरात दर्जेदार स्पोट्‌‍र्स क्लब असता तर दर्जेदार प्रशिक्षण, स्पर्धा व सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्या असत्या. चिराग माने, रावेत, खेळाडू
56 shares
😊
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 3, 2026, 03:15 AM
टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारताशी पाकिस्तानचा क्रिकेट संघर्ष वाढला

टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारताशी पाकिस्तानचा क्रिकेट संघर्ष वाढला

मुंबई :टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताविरुद्धचा सामना न खेळण्याचा निर्णय घेऊन पाकिस्तान सरकारने भारताविरुद्ध नव्याने संघर्ष सुरू केला. मात्र, त्याच वेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) यांच्यातील संघर्ष वाढणार आहे. आयसीसीची वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी बैठक होईल आणि त्यातच पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्बंध अमलात आणण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपस्पर्धेतील आपल्या लढती श्रीलंकेत खेळवण्याची बांगलादेशची मागणी आयसीसीने फेटाळल्यापासून पाक बोर्ड आक्रमक झाले होते. आयसीसीने कठोर कारवाईचा इशारा दिल्यामुळे पाकने स्पर्धा बहिष्कार टाळला. मात्र, त्याच वेळी भारताविरुद्धच्या सामन्यात न खेळण्याचे अस्त्र उगारले. पाकने स्पर्धेतील सर्वांत महत्त्वाच्या सामन्यास लक्ष्य केल्यामुळे आता आयसीसी जास्त आक्रमक होणार हे स्पष्ट आहे.‘पाकविरुद्धच्या कारवाईबाबतचा निर्णयआयसीसीच्या बैठकीतहोईल. ही बैठक दोन दिवसांत होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप आयसीसीने त्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. एखाद्या देश अथवा संघाविरुद्ध निर्बंध अमलात आणण्याची बैठक शक्यतो आयसीसीच्या मुख्यालयात होते. तातडीने बैठक झाली तरी त्याची किमान ४८ तास सूचना देण्यात येते’ असा दावा काही सूत्रांनी केला आहे.आयसीसी आक्रमक असले, तरी त्याच वेळी भारताविरुद्धची लढत खेळण्यासाठी पाकिस्तानचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यांनीच बांगलादेशचा सहभाग निश्चित करण्यासाठी याचप्रकारे प्रयत्न केले होते. ते विफल ठरले होते, याची आठवण करून दिली, असे सूत्रांनी सांगितले.भारत-पाक सामना श्रीलंकेत होणार होता, पण तरीही पाकिस्तानने बहिष्कार का टाकला, जाणून घ्या एकमेव कारण...हा निर्णय अयोग्य : आयसीसीपाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या सरकारचाभारताविरुद्ध न खेळण्याचा निर्णयअद्याप कळवलेला नाही, असे आयसीसीच्या पत्रकात म्हटले आहे. त्याच वेळी स्पर्धेतील एखाद्या सामन्यात न खेळण्याचाबाबतचा निर्णय योग्य नव्हे. हा सर्वच क्रिकेट चाहत्यांवर अन्याय आहे. त्यात पाकिस्तानचेही चाहते आहेत, असे आयसीसीने म्हटले आहे. आयसीसीच्या स्पर्धा क्रिकेटच्या प्रगतीसाठी, सर्वांना समान संधी देत होतात. एखाद्या निर्णयाबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. मात्र, पाकने घेतलेला निर्णय खेळासाठी; तसेच त्यांच्या चाहत्यांसाठीही योग्य नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या निर्णयाचा फेरविचार करेल. त्या वेळी ते आपल्या क्रिकेटवर होणाऱ्या दूरगामी परिणामही लक्षात घेतील, याकडे आयसीसीने लक्ष वेधले आहे.पाकिस्तानची अक्कल आता ठिकाणावर येणार, भारताच्या मॅचवर बहिष्कारानंतर आयसीसी उचलणार कोणतं मोठं पाऊल, पाहा..भारताविरुद्धची लढत न खेळण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. त्यामुळे त्यावरून पाक बोर्डाविरुद्ध कारवाई करणे आयसीसीच्या संकेतास धरून नसेल, असा दावा आयसीसी आणि पाक बोर्डाचे माजी अध्यक्ष एहसान मणी यांनी केला. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या वेळी पाकमध्ये खेळणे असुरक्षित असल्याचे आमच्या सरकारचे मत आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सांगितले होते. आम्हाला सरकारने परवानगी दिलेली नाही, असेही सांगितले जात होते, याकडे मणी यांनी लक्ष वेधले.
40 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 3, 2026, 02:29 AM
भारताच्या उपमुख्यमंत्र्यांनी प्रमुख विभागांचा कार्यभार स्वीकारला

भारताच्या उपमुख्यमंत्र्यांनी प्रमुख विभागांचा कार्यभार स्वीकारला

म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई:उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे मंत्रालयातील अजित पवार यांच्या वापरातील दालनेच कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी याबाबतचा शासन निर्णय प्रसृत केला. अजित पवार यांच्या कार्यालयासाठी पाचव्या, सहाव्या आणि सातव्या मजल्यावरील दालने देण्यात आली असून तीच दालने सुनेत्रा पवार यांच्यासाठी कायम ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, सुनेत्रा पवार आपल्या पदाची सूत्रे या आठवड्याअखेरीस स्वीकारण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.अजित पवारयांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक आणि औकाफ ही खाती सोपवण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील सहाव्या मजल्यावरील उत्तर बाजूची कार्यालयीन जागा, सातव्या मजल्यावरील पूर्व बाजूची दालने तसेच दालन क्रमांक ७१७मधील निधी कक्षातून आत प्रवेश केल्यानंतरचा कक्ष, दालन क्रमांक ७२२ व ७२३, तसेच पाचव्या मजल्यावरील उत्तर बाजूचे दालन क्रमांक ५०३ हे कार्यालयीन दालन म्हणून वापरण्यास देण्यात आले आहे.Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचा कराड दौरा ठरला नि:शब्द, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिलाच दौरा; प्रीतिसंगमावर केलं अभिवादन‘देवगिरी’ही देणार?मलबार हिलयेथील ‘देवगिरी’ हे शासकीय निवासस्थानही सुनेत्रा पवार यांच्याकडे कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते असताना अजित पवार यांचे वास्तव्य ‘देवगिरी’ येथे राहिले.चव्हाणांना अभिवादनउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी कराड येथील प्रितीसंगमावर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करूनअभिवादन केले. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, खासदार नितीन पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.सुनेत्रा पवार विदीप जाधवांच्या घरी, कुटुंबियांचं सांत्वन; पत्नीला धीर देताना काय म्हणाल्या?उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीपदाची शपथ घेतल्यानंतरप्रथमच कराड येथे येऊन स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले. स्व. अजित पवार यांचे आणि यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे नातेही अत्यंत जिव्हाळ्याचे होते. त्यांची आठवण या वेळी उपस्थितांना झाली.
96 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 2, 2026, 03:18 PM
पाकिस्तानचे क्रिकेट संकटः खेळपट्टीच्या पलीकडे परिणाम

पाकिस्तानचे क्रिकेट संकटः खेळपट्टीच्या पलीकडे परिणाम

जर पाकिस्तान आपल्या निर्णयावर ठाम राहिला, तर त्याचे परिणाम केवळ मैदानापुरते मर्यादित राहणार नाहीत. आर्थिक हानी :भारत-पाक सामना रद्द झाल्यास ब्रॉडकास्टर्सना सुमारे २०० ते २५० कोटी रुपयांचा फटका बसू शकतो. गुणतालिकेत नुकसान :पाकिस्तानला त्या सामन्याचे गुण गमवावे लागतीलच, शिवाय त्यांच्या 'नेट रन रेट'वरही विपरीत परिणाम होईल. PSL संकटात :आयसीसीकडून लागणाऱ्या आर्थिक निर्बंधांमुळे 'पाकिस्तान सुपर लीग'चे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. तसेच, भविष्यात इतर देश पाकिस्तानचा दौरा करण्यास कचरतील.
13 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 01:28 PM
टी-20 विश्वचषक सराव सामन्यात नारायण जगदीशनचे अमेरिकेविरुद्ध शतक

टी-20 विश्वचषक सराव सामन्यात नारायण जगदीशनचे अमेरिकेविरुद्ध शतक

Narayan Jagadeeshan Century Against USA in A T20 World Cup Warm Up Match : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सूर्याच्या संघाला भिडण्याआधी अमेरिकेचा संघ भारतीय 'अ' संघाविरुद्ध सराव सामन्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेलनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय भारतीय 'अ' संघातील विकेट किपर बॅटर आणि सलामीवीर नारायण जगदीशन याने फोल ठरवला. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! प्रियांश आर्य यानेही २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा पहिल्यांदा फलंदाजी करताना प्रियांश आर्य आणि एन जगदीशन जोडीनं भारतीय 'अ' संघाच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी दमदार सुरुवात केली. पण प्रियांश आर्य याने १३ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने २१५.३८ च्या स्ट्राइक रेटनं २८ धावांची खेळी केली. भारताविरुद्ध न खेळण्याच्या निर्णयाचा पाकिस्तानला पश्चात्ताप होईल, पण...- शाहिद आफ्रिदी एन जगदीशनचीतिलक वर्माच्यासाथीनं शतकी भागीदारी अमेरिकेविरुद्धच्या सराव सामन्यात भारतीय 'अ' संघाकडूनतिलक वर्मानंहीक्रिकेटच्या मैदानात कमबॅक केले. जगदीशनच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी त्याने ५५ चेंडूत ११३ धावांची भागीदारी रचली. तिलक वर्मा कमबॅकच्या सामन्यात अर्धशतक अगदी सहज झळकावेल, असे वाटत होते. पण २४ चेंडूत ३८ धावा करून तो बाद झाला. दुसऱ्या बाजूला जगदीशन याने आपला शो कायम ठेवला. जगदीशनची शतकी खेळी, आयुष बडोनीचं अर्धशतक जगदीशन याने ४९ चेंडूत शतक साजरे करताना २०० च्या स्ट्राइक रेटनं अमेरिकन गोलंदाजांची धुलाई केली. ५५ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने १०४ धावा करून तो बाद झाला. त्यानंतर आयुष बडोनी याने आपल्या भात्यातील फटकेबाजीचा नजराणा पेश करत २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटनं अर्धशतक झळकावले. भारत 'अ' संघाने निर्धारित २० षटकात ३ विकेट्सच्या मोबदल्यात २३८ धावा करत अमेरिकेसमोर २३९ धावांचे टार्गेट सेट केल्याचे पाहायला मिळाले. भारती 'अ' संघातील फलंदाजांनी अमेरेकेच्या गोलंदाजांची ज्या प्रकारे धुलाई केली ते पाहून वर्ल्ड कप मोहिमेच्या पहिल्याच सामन्यात सूर्या दादाची टीम इंडिया ३०० पारचा आकडा गाठू शकेल, असे चित्र या सामन्यानंतर निर्माण झाले आहे.
14 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Feb 2, 2026, 12:58 PM
श्रीसंतने त्याच्या अशांत भूतकाळाबद्दल आणि वैयक्तिक संघर्षांबद्दल केला खुलासा

श्रीसंतने त्याच्या अशांत भूतकाळाबद्दल आणि वैयक्तिक संघर्षांबद्दल केला खुलासा

Sreesanth on Wife Bhuvneshwari Kumari: माजी क्रिकेटपटू आणि अभिनेता एस. श्रीसंत याच्यावर २०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणात आरोप झाले होते. श्रीसंतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत यावर वक्तव्य केले आहे. तसेच, त्या कठीण काळात तिला कोणी खंबीरपणे साथ दिली, हेदेखील त्याने सांगितले आहे. जेव्हा हे आरोप त्याच्यावर झाले तेव्हा त्याचे लग्न झाले होते. आताची पत्नी आणि त्यावेळची गर्लफ्रेंड भुवनेश्वरी कुमारीने तसेच तिच्या कुटुंबाने त्या कठीण परिस्थितीत साथ दिली. तसेच भुवनेश्वरी आणि श्रीसंतने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यादरम्यानच त्याला स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटक झाल्याचे श्रीसंतने सांगितले. श्रीसंतने एका मुलाखतीत त्याला जेव्हा अटक झाली होती, तेव्हाची आठवण सांगितली. श्रीसंत व त्याची पत्नी भुवनेश्वरी यांनी नुकतीच ‘हु इज द बॉस (Who’s The Boss)या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. तो म्हणाला, “मी भुवनेश्वरीच्या वडिलांना सांगितले होते की, कदाचित मला देशासाठी खेळता येणार नाही. त्यावेळी मला दहशतवादी वगैरे म्हणून लेबल लावलं जात होतं; पण तरीही भुवनेश्वरीच्या कुटुंब ठामपणे माझ्या पाठीशी उभं राहिलं. म्हणूनच शेखावत कुटुंबीयांप्रति माझ्या मनात खूप आदर आहे.” याच मुलाखतीत श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरी म्हणाली, “आम्ही लग्न करणार आहोत, याबद्दल वडिलांना सांगितलं नव्हतं. त्याआधीच श्रीसंतला अटक झाली. त्यावेळी मी हैदराबादला गेले होते. माझ्या मित्रांनी सकाळी ७, वाजता टीव्ही लावायला सांगितले. त्यावेळी श्रीसंतला अटक झाल्याचे मला समजले. ते पाहिल्यानंतर मी माझ्या वडिलांना काय सांगणार असा प्रश्न मला पडला होता. त्यावेळी मला जमीन दुभंगावी आणि तिनं मला पोटात घ्यावं, मी नाहीसं व्हावं, असंच मला वाटत होतं.” पुढे ती म्हणाली, “मी हैदराबादला गेले हे माझ्या वडिलांना आवडलं नव्हतं. त्यांनी मला घरी परत बोलावलं. मी त्यांना म्हणाले की, तुम्ही माझं म्हणणं ऐकाल आणि टीव्हीवर जे काही दाखवलं जात आहे, त्यावरून हे लग्न मोडणार नाही हे वचन जोपर्यंत तुम्ही मला देणार नाही, तोपर्यंत मी घरी येणार नाही. कारण- जरी देवानं मला येऊन सांगितलं की, श्रीसंतने हे सर्व केलं आहे तरी मी त्यावर विश्वास ठेवणार नाही.” श्रीसंत पुढे म्हणाला, “त्या वेळी नेमकं काय घडत होतं, हेच मला समजत नव्हतं. मला अटक करण्यात आली होती. तेव्हा मला जाणवलं की, खरा बॉस एकच आहे आणि तो म्हणजे देव आहे. मी आयुष्यातील सगळ्यात कठीण अवस्थेत होतो. माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. आता सगळं संपलं आहे, असं मी स्वत:ला सांगितलं होतं. कारण- मला दहशतवादी म्हटलं जात होतेतं. आता तुझं आयुष्य संपलं आहे, असं आजूबाजूचे लोक सतत सांगत होते. मी माझ्या भावाला सांगितलं होतं की, पुढच्या तीन ते चार दिवसांत कदाचित माझा खून होईल किंवा मी स्वतःच आत्महत्या करेन किंवा काहीही होऊ शकतं.” श्रीसंतने असेही सांगितले की, तो त्याच्या होणाऱ्या सासऱ्यांना पहिल्यांदा कोर्टात भेटला होता. तो म्हणाला, “माझ्या भावानं मला फक्त एकच गोष्ट सांगितली होती की, भुवनेश्वरी गेली सात वर्षं तुझी वाट पाहत आहे. ती मला म्हणाली होती की, ती तुझ्याबरोबर आहे. तिनं त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आत्मविश्वास दिला.” तो पुढे म्हणाला, “मी माझ्या सासऱ्यांना पहिल्यांदा कोर्टातच भेटलो. मी रडवेला झालो होतो; पण त्यांनी मला धीर दिला. त्यांनी काळजी करू नकोस, स्ट्राँग राहा, असे सांगितले. मी २७ दिवस तिहारच्या तुरुंगात होतो. मी जोपर्यंत तुरुंगात होतो, तोपर्यंत भुवनेश्वरी जमिनीवर झोपत होती.” दरम्यान, श्रीसंत आणि भुवनेश्वरी यांनी २०१३ मध्ये लग्न केले. श्रीसंतने अभिनय क्षेत्रातही काम केले आहे. तो ‘बिग बॉस’च्या १२ व्या पर्वातही स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता.
15 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 12:36 PM
भारताविरुद्धच्या टी-20 विश्वचषक सामन्यावर पाकिस्तानचा बहिष्कारः बी. सी. सी. आय. उपाध्यक्ष राजीव शुक्ला

भारताविरुद्धच्या टी-20 विश्वचषक सामन्यावर पाकिस्तानचा बहिष्कारः बी. सी. सी. आय. उपाध्यक्ष राजीव शुक्ला

Rajeev Shukla Pakistan Boycotting T20 World Cup Match Against India : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पाकिस्तानने टी २० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध न खेळण्याच्या मुद्यावर भाष्य केले आहे.आयसीसीच्याभूमिकेशीबीसीसीआयसहमत आहे. या प्रकरणीआयसीसीशीचर्चा केल्यानंतरचबीसीसीआयअधिकृत भूमिका मांडेल, असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. सध्याच्या घडीला 'वेट अँण्ड वॉच' भूमिकेत असल्याचे सांगत त्यांनी पाकिस्तानला इशाराच दिला आहे. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर असताना पाकिस्तानचा आडमुठेपणा पाकिस्तानने रविवारी रात्री मोठा निर्णय जाहीर केला. टी २० वर्ल्ड कप २०२६ मध्ये सहभागी होणार, पण १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध सामना खेळणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यावर आयसीसीने निवेदनाच्या माध्यमातून पाकिस्तानला ताकीद दिली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. राजीव शुक्ला नेमकं काय म्हणाले? राजीव शुक्ला म्हणाले की, आयसीसीने आपल्या निवेदनात खेळभावनेचा उल्लेख केला आहे. बीसीसीआय त्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे. आयसीसीशी चर्चा केल्याशिवाय बीसीसीआय कोणतंही अधिकृत वक्तव्य करणार नाही." या प्रकरणात जोपर्यंत ICC अंतिम निर्णय घेत नाही तोपर्यंत बीसीसीआय आपली चाल खेळणार नाही, हेच त्यांच्या वक्तव्यातून दिसून येते. बांगलादेश प्रकरणाचा उल्लेख याच पार्श्वभूमीवर आयसीसीने याआधी बांगलादेशला टी २० वर्ल्ड कप २०२६ मधून बाहेर केल्याचंही समोर आलं आहे. भारताविरुद्धचा सामना इतर ठिकाणी खेळवावा, या हट्टावर बांगलादेश ठाम होता, मात्र आयसीसीने ती मागणी फेटाळली होती. पाकिस्तानने बांगलादेशच्या समर्थनार्थ आयसीसीकडे आपला विरोध नोंदवला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने हा बहिष्काराचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. आयसीसीनं आपल्या निवेदनात नेमकं काय म्हटलंय? पाकिस्तान सरकारने रविवारी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर भारताविरुद्ध सामना न खेळण्याची घोषणा केल्यानंतर आयसीसीने उशिरा रात्री निवेदन जारी केलं. आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, "पाकिस्तान सरकारने टी २० वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धचा सामन्यावर बहिष्कार टाकण्यासंदर्भातील निवेदानाटी आम्ही दखल घेतली आहे. मात्र, अद्याप पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (PCB) अधिकृत पत्रव्यवहार प्राप्त झालेला नाही. निवडक सामन्यांपासून दूर राहण्याची भूमिका ही जागतिक स्पर्धांच्या मूळ तत्त्वांच्या विरोधात आहे. सर्व संघांना पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सामने खेळावे लागतात." आयसीसीने पुढे स्पष्ट केलं की, एखाद्या विशिष्ट संघाविरुद्ध किंवा सामन्यापासून दूर राहणं खेळभावनेला धक्का देणारं आहे. हे कोणत्याही परिस्थितीत सहन करण्याजोगे नाही.
85 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 2, 2026, 11:42 AM
समुद्रकिनारे क्रीडा पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचे महाराष्ट्राचे उद्दिष्ट

समुद्रकिनारे क्रीडा पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचे महाराष्ट्राचे उद्दिष्ट

उद्घाटनप्रसंगी पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी सांगितले की, “खेळामुळे व्यक्तिमत्त्व घडते, आत्मविश्वास वाढतो आणि खेळाडूंनी खेळाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. दमनच्या धर्तीवर शिरगाव व चिंचणी येथील समुद्रकिनारे विकसित करून या भागाला क्रीडापर्यटनाचे केंद्र बनवले जाईल.” त्यांच्या या घोषणेला उपस्थितांकडून जोरदार दाद मिळाली. राष्ट्रीय टग ऑफ वॉर फेडरेशनचे अध्यक्ष हरीशंकर गुप्ता यांनी दोरीखेच हा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त खेळ असल्याचे स्पष्ट करताना सांगितले की, “या खेळातून नोकरीच्या संधी, स्कॉलरशिप आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे दरवाजे खुले होतात. महाराष्ट्रात ही स्पर्धा होत असल्याचा आम्हाला अभिमान आहे.”
3 shares
😊
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 11:25 AM
टी-20 विश्वचषक सराव सामन्यात भारत'अ'चा अमेरिकेवर दणदणीत विजय

टी-20 विश्वचषक सराव सामन्यात भारत'अ'चा अमेरिकेवर दणदणीत विजय

India A vs United States of America T20 World Cup Warm up Matches : आयसीसी टी २० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या यंदाच्या हंगामाला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. त्याआधी या स्पर्धेतील सराव सामन्याला सुरुवात झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ यंदाच्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात अमेरिकेविरुद्धच्या लढतीनं करणार आहे. त्याआधी दुखापतीतून सावरुनतिलक वर्माअमेरिकेच्या संघाविरुद्ध मैदानात उतरला आहे. भारत 'अ' संघाकडूनतिलक वर्माअमेरिकेविरुद्धच्या सराव सामन्यात खेळत आहे. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! तिलक वर्माच्या कामगिरीकडेही असतील सर्वांच्या नजरा भारत 'अ' विरुद्ध अमेरिका यांच्यातील सराव सामना मुंबईतील डी. वाय. पाटील क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात अमेरिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय 'अ' संघाचे नेतृत्व आयुष बडोनीकडे आहे. दुसरीकडे अमेरिकेचा संपूर्ण वर्ल्ड कपसाठी निवडलेला संघ या सामन्यात खेळत आहे. त्यामुळे या लढतीत अमेरिकेचा संघ कशी कामगिरी करतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याशिवाय तिलक वर्मा या सामन्यात कितव्या क्रमांकावर फलंदाजीला येणार? त्यावरही सर्वांच्या नजरा असतील. रणजी ट्रॉफी स्पर्धेत अचानक तब्येत बिघडल्यावर तिलक वर्मावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेला मुकल्यावर तो वर्ल्ड कप स्पर्धेआधी मैदानात उतरणार आहे. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी तो भारतीय संघातील एक प्रमुख फलंदाज असून सराव सामन्यात त्याला भारतीय 'अ' संघाकडून कितव्या स्थानावर तो फलंदाजी करणार ते पाहण्याजोगे असेल. IND vs PAK: पाकिस्तानच्या निर्णयामुळे ICCचा संताप, 'या' पाच प्रकारे कारवाई होण्याची शक्यता​​​​​​​भारत ‘अ’ संघ: एन. जगदीशन (यष्टीरक्षक), प्रियांश आर्य, तिलक वर्मा, नमन धीर, आयुष बडोनी (कर्णधार), रियान पराग, उर्विल पटेल, आशुतोष शर्मा, रवि बिश्नोई, खलील अहमद, मयंक यादव, अशोक शर्मा, विप्रज निगम, गुरजापनीत सिंह, मानव सुथार. अमेरिका संघ: अँड्रीज गौस, सैतेजा मुक्कमल्ला, मोनांक पटेल (यष्टीरक्षक/कर्णधार), शेहान जयसूर्या, शुभम रंजने, संजय कृष्णमूर्ती, शयान जहांगीर, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, अली खान, सौरभ नेत्रावळकर, मिलिंद कुमार, मोहम्मद मोहसिन, नोस्टुश केनजिगे, जसदीप सिंग.
30 shares
😐
Loksatta logo
Loksatta
Feb 2, 2026, 10:48 AM
भारत अ विरुद्ध अमेरिका टी-20 विश्वचषक सराव सामनाः वेळापत्रक, संघ आणि प्रमुख खेळाडू

भारत अ विरुद्ध अमेरिका टी-20 विश्वचषक सराव सामनाः वेळापत्रक, संघ आणि प्रमुख खेळाडू

India A vs USA T20 World Cup 2026 warm-up match Today:७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ पूर्वी, सहभागी संघ सोमवारपासून सराव सामने खेळणार आहेत. भारतातील हवामान आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी हे सामने खेळाडूंना मदत करतील. भारतीय संघाचा टी-२० विश्वचषकातील पहिला सामना अमेरिका संघाविरूद्ध मुंबईत होणार आहे. तत्पूर्वी आज भारताचा अ संघ अमेरिकेविरूद्ध सराव सामना खेळणार आहे. हा सामना किती वाजता सुरू होणार, जाणून घेऊया. अमेरिकेचा संघ दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार आहे. संघाचा पहिलाच सामना गतविजेत्या भारतीय संघाविरूद्ध होणार आहे. हा वर्ल्डकपमधील पहिला सामना वानखेडे स्टेडियममुंबईयेथ ७ फेब्रुवारीला होईल. तत्पूर्वी संघ नवी मुंबईत सराव सामना खेळणार आहे. भारत अ संघात तिलक वर्मादेखील हा सराव सामना खेळाना दिसेल. तिलक वर्मा युएईविरुद्ध खेळताना दिसणार आहे आणि दुखापतीनंतर पुनरागमन करत असताना तो त्याचा फॉर्म परत मिळवण्याचा प्रयत्न करेल. युएईविरुद्धच्या सामन्यासाठी इंडिया अ संघाचा कर्णधार आयुष बदोनी आहे. या संघात रियान पराग, रवी बिश्नोई, नमन धीर, खलील अहमद आणि मयंक यादव सारखे खेळाडू असतील. सामना लाईव्ह कसा पाहायचा ते जाणून घेऊया. भारत अ विरुद्ध अमेरिका टी-२० विश्वचषक २०२६ चा सराव सामना आज म्हणजेच सोमवार, २ फेब्रुवारी २०२६ रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५:०० वाजता सुरू होईल. तर नाणेफेक ४.३० वाजता होणार आहे. भारत अ विरुद्ध अमेरिका टी२० विश्वचषक २०२६ चा सराव सामना जिओहॉटस्टार अॅपवर लाईव्ह स्ट्रीम केला जाईल आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार आहे. अमेरिकाविरूद्ध सराव सामन्यासाठी भारत अ संघ आयुष बदोनी (कर्णधार), नमन धीर, आशुतोष शर्मा, प्रियांश आर्य, एन जगदीसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, रियान पराग, मानव सुतार, अशोक शर्मा, उर्विल पटेल (यष्टीरक्षक), गुरजपनीत सिंग, विपराज निगम, रवी बिश्नोई, खलील अहमद, मयंक यादव अमेरिकेचा टी-२० विश्वचषक २०२६ साठीचा संघ मोनांक पटेल (कर्णधार), जेसी सिंग, अँड्रिज गौस, शेहान जयसूर्या, मिलिंद कुमार, शायन जहांगीर, सईतीजा मुक्कमाला, संजय कृष्णमूर्ती, हरमीत सिंग, नॉथुश केंजिगे, शेडली व्हॅन शाल्क्विक, सौरभ नेत्रावळकर, अली खान, मोहम्मद मोहसीन, शुभम रांजणे
77 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 2, 2026, 10:45 AM
इंग्लंडच्या क्रिकेट संघाने धोक्यांमुळे 2003 च्या विश्वचषकातील सामना रद्द केला

इंग्लंडच्या क्रिकेट संघाने धोक्यांमुळे 2003 च्या विश्वचषकातील सामना रद्द केला

२००३ च्या विश्वचषकात इंग्लंडचा सामना झिम्बाब्वेतील हरारे येथे होणार होता. त्यावेळी ब्रिटनमधील टोनी ब्लेअर सरकार आणि झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांच्यातील राजकीय संबंध विकोपाला गेले होते. त्यातच खेळाडूंना धमक्या मिळाल्याने नासिर हुसेनच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने तो सामना न खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे झिम्बाब्वेला विजयी घोषित करण्यात आले आणि इंग्लंडला विश्वचषकातून बाहेर पडावे लागले.
98 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 2, 2026, 10:14 AM
कमिन्सच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात बदल

कमिन्सच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात बदल

पॅट कमिन्सच्या पाठीच्या दुखापतीमुळे बेन ड्वार्शुइस याला १५ सदस्यीय मुख्य संघात स्थान मिळाले आहे. तसेच, मॅथ्यू शॉर्टला संघातून वगळण्यात आले असून त्याच्या जागी मॅट रेनशॉ याचा समावेश करण्यात आला आहे. वारंवार होणाऱ्या या दुखापतींमुळे ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे.
44 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 09:15 AM
टी-20 विश्वचषक 2026 मध्ये पाकिस्तानचा भारतावर बहिष्कारः पी. सी. बी. आणि आय. सी. सी. चा पराभव

टी-20 विश्वचषक 2026 मध्ये पाकिस्तानचा भारतावर बहिष्कारः पी. सी. बी. आणि आय. सी. सी. चा पराभव

टी-२० विश्वचषक २०२६ मध्येपाकिस्ताननेभारतासोबत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बीसीसीआयचे नाही तर पीसीबी आणि आयसीसीचे मोठे नुकसान होणार आहे.पाकिस्तानभारतीय संघाविरोधात खेळणार नसल्याने भारताला आपसुकच २ गुण मिळणार असले तरीही भारतीय संघाला गाफिल राहून चालणार नाहीय. कारण पाकिस्तान केव्हाही दगा देऊ शकतो. जरी पाकिस्तान संघ आला नाही तरीही भारतीय संघाला मैदानावर उतरावेच लागणार आहे. पाकिस्तान १५ फेब्रुवारीच्या सामन्यावर बहिष्कार टाकला, तर भारतीय संघाला कोणतीही मेहनत न करता पूर्ण २ गुण दिले जातील. पण त्यासाठी भारताला श्रीलंकेला जावे लागणार आहे. तसेच खेळाच्या जर्सीमध्ये मैदानावर उतरावे लागणार आहे. नाहीतर भारतालाही गुण मिळणार नाहीत. मैदानात काय घडणार?आयसीसीच्या नियमांनुसार, सामना रद्द झाला तरी त्याचे गुण देण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. पाकिस्तानने बहिष्कार टाकला तरी भारतीय संघाला कोलंबोमधील मैदानावर टॉसच्या वेळी उपस्थित राहावे लागेल. भारतीय कर्णधार मैदानात असेल, पण जर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा टॉससाठी आला नाही, तर मॅच रेफरी अधिकृतपणे प्रतीक्षा करतील. पाकिस्तानचा संघ मैदानात न उतरल्यास, मॅच रेफरी 'वॉकओव्हर' अंतर्गत भारताला विजयी घोषित करतील आणि २ गुण भारताच्या खात्यात जमा होतील. पाकिस्तानवर दुहेरी टांगती तलवारकेवळ भारताला गुण मिळतील असे नाही, तर पाकिस्तानला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. आयसीसीकडे अधिकृत स्पर्धा कराराचा भंग केल्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर प्रचंड आर्थिक दंड लावण्याचे अधिकार आहेत. ब्रॉडकास्टरच्या नुकसानीची भरपाई म्हणून पाकिस्तानच्या आयसीसी रेव्हेन्यूमधून कपात केली जाऊ शकते. भारताचा श्रीलंका दौरा निश्चितपाकिस्तानच्या भूमिकेचा भारतीय संघाच्या प्रवासावर कोणताही परिणाम होणार नाही. भारतीय संघ ठरल्याप्रमाणे श्रीलंकेत जाईल आणि आपल्या सराव सत्रांमध्ये सहभागी होईल. "आम्ही आयसीसीच्या वेळापत्रकाचे पालन करू. समोरचा संघ मैदानात येतो की नाही, हा आमचा विषय नाही," अशी भूमिका बीसीसीआयच्या गोटातून समोर येत आहे.
52 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 08:22 AM
2026 च्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानवर बहिष्कार टाकण्याच्या भारताच्या निर्णयावर गावसकर यांची टीका

2026 च्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानवर बहिष्कार टाकण्याच्या भारताच्या निर्णयावर गावसकर यांची टीका

Sunil Gaaskar on Pakistan Boycott Decision, T20 World Cup 2026: भारत आणिपाकिस्तानयांच्यात टी२० विश्वचषक २०२६ मध्ये १५ फेब्रुवारीला सामना होणार होता.पाकिस्तानकडेआशिया चषकाचे यजमानपद होते, तेव्हा भारताचे सर्व सामने पाकिस्तानबाहेर दुबईत खेळवण्यात आले होते. तसेच भारताकडे यजमानपद असलेल्या टी२० विश्वचषकातील पाकिस्तानचे सर्व सामने भारताबाहेर श्रीलंकेत आयोजित करण्यात आले आहेत. त्यानुसार, हा सामना कोलंबो येथे होणार आहे. पण पाकिस्तानने सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून लिटल मास्टरसुनील गावसकरयांनी पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे. सुनील गावसकरकाय म्हणाले? टी२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताविरुद्धच्या सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकल्याबद्दल दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी त्यांना चांगलेच सुनावले. गावस्कर म्हणाले की, पाकिस्तान त्यांच्या निवृत्त खेळाडूंप्रमाणेच अनेक या मुद्द्यांवरही यू-टर्न घेऊ शकतो. पाकिस्तानी खेळाडू निवृत्तीबाबत यू-टर्न घेण्यात पटाईत आहेत. शाहिद आफ्रिदी, इमाद वसीम आणि मोहम्मद अमीर सारखे हे याचे उत्तम उदाहरण आहेत. सुनील गावस्कर यांनी आज तकशी बोलताना सांगितले, "पाकिस्तानी खेळाडूंनी अनेकदा निवृत्ती जाहीर केली आहे आणि नंतर त्या निर्णयावरून यू टर्न घेतला आहे. आताचा प्रकारही तसाच असेल. मला वाटते की पुढील चार-पाच दिवसांत जेव्हा जगभरातून आणि त्यांच्या माजी खेळाडूंकडून प्रतिक्रिया येतील, तेव्हा पाकिस्तान आपली भूमिका बदलू शकेल." सर्वांना त्यांचा इतिहास माहित आहे! "पाकिस्तानी खेळाडूंनी निवृत्ती मागे घेतल्याचा इतिहास सर्वांना माहिती आहे. चाहत्यांनी काही कमेंट केली की खेळाडू लगेच निवृत्ती रद्द करतात आणि परत मैदानात येतात. असेच काहीतरी १५ फेब्रुवारीपूर्वीही घडू शकते. जर पाकिस्तानकडे भारताविरुद्धच्या सामन्यातून माघार घेण्याचे ठोस कारण नसेल किंवा कराराचे उल्लंघन होत असेल, तरआयसीसीत्यांच्यावर कारवाई करेल यात दुमत नाही", असेही गावसकर म्हणाले. दरम्यान,आयसीसीनेपाकिस्तानच्या घोषणेवर गंभीर चिंता व्यक्त केली आणि असे म्हटले की असा निर्णय खेळाच्या आणि लाखो पाकिस्तानी चाहत्यांसह क्रिकेटचाहत्यांच्या हिताचा नाही. आयसीसीने पीसीबीला या निर्णयाचे दीर्घकालीन आणि व्यापक परिणाम विचारात घेण्यास सांगितले आहेत. कारण याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर परिणाम होऊ शकतो.
2 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 2, 2026, 07:50 AM
बांगलादेशच्या टी-20 विश्वचषकातून माघार घेण्याच्या निर्णयाला पाकिस्तानचा पाठिंबा, भारताविरुद्ध गट टप्प्यातील सामना टाळला

बांगलादेशच्या टी-20 विश्वचषकातून माघार घेण्याच्या निर्णयाला पाकिस्तानचा पाठिंबा, भारताविरुद्ध गट टप्प्यातील सामना टाळला

मुंबई :पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आगामी टी-२० विश्वचषकातून बांगलादेशच्या बाहेर पडण्याला पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे, १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे भारतासोबत होणारा गट फेरीचा सामना पाकिस्तान खेळणार नाही. हा निर्णय पीसीबीने आयसीसी आणि बीसीसीआयसोबत तटस्थ भूमीवर सामने खेळण्याच्या करारावर असताना घेतला आहे. मात्र, पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय संघाला स्पर्धेत भाग घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.पाकिस्तानचापहिला सामना नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे. पाकिस्तान सरकारच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, "पाकिस्तान सरकारने पाकिस्तान क्रिकेट संघाला टी-२० विश्वचषकात भाग घेण्यास मान्यता दिली आहे. मात्र पाकिस्तान संघ १५ फेब्रुवारी रोजी भारतासोबत नियोजित असलेला सामना खेळणार नाही." या निर्णयामागे अनेक कारणे आहेत. ३ जानेवारी रोजी, बिघडलेल्या भारत-बांगलादेश संबंधांमुळे बीसीसीआयने कोलकाता नाइट रायडर्सला (केकेआर) आयपीएल मिनी-लिलावात घेतलेल्या मुस्तफिजुर रहमानला सोडण्यास सांगितले.आयसीसीने पाकची जगासमोर लाज काढली, म्हणाले पाकिस्तानच्या निर्णयाचा आदर करत असलो तरीही..६ जानेवारी रोजी, बांगलादेशने देशात आयपीएलच्या प्रसारणावर बंदी घालण्याचे आदेश दिले. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) असेही म्हटले की, जर एका खेळाडूला 'सुरक्षा धोका' मानले गेले, तर संपूर्ण संघाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो.१२ जानेवारी रोजी, बीसीसीआयने आयसीसीला बांगलादेशचे टी-२० विश्वचषकातील सामने भारतातून श्रीलंकेत स्थलांतरित करण्याची विनंती केली. बीसीसीआयने २०२३ च्या आशिया चषकाप्रमाणेच 'हायब्रिड मॉडेल' सुचवले.भारत-पाक सामना श्रीलंकेत होणार होता, पण तरीही पाकिस्तानने बहिष्कार का टाकला, जाणून घ्या एकमेव कारण...२१ जानेवारी रोजी, आयसीसी बोर्डाने बांगलादेशचे सामने स्थलांतरित करण्याच्या विरोधात मतदान केले. १४-२ च्या निर्णयात केवळ पाकिस्तानने बांगलादेशला पाठिंबा दिला. आयसीसीने स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकनात भारतात खेळाडूंना कोणताही 'विश्वसनीय धोका' आढळला नाही असे म्हटले.२२ जानेवारी रोजी, बांगलादेश आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि टी-२० विश्वचषकासाठी भारतात खेळण्यास नकार दिला. २४ जानेवारी रोजी, बांगलादेशने टी-२० विश्वचषकातून माघार घेतल्याने, आयसीसीने त्यांना ग्रुप सी मध्ये स्कॉटलंडने बदलले.पाकिस्तानची अक्कल आता ठिकाणावर येणार, भारताच्या मॅचवर बहिष्कारानंतर आयसीसी उचलणार कोणतं मोठं पाऊल, पाहा..२४ जानेवारी रोजी, बांगलादेशला टी-२० विश्वचषकातून वगळल्यानंतर, पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नावी म्हणाले की त्यांच्या सहभागावर अंतिम निर्णय पाकिस्तान सरकारच्या संवादानंतर घेतला जाईल. ते म्हणाले, "आमची भूमिका [विश्वचषक सहभागावर] पाकिस्तान सरकार जे निर्देश देईल ते असेल."२६ जानेवारी रोजी, नावी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेऊन चर्चा केली. नावी यांनी ट्विट केले, "पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासोबत एक फलदायी बैठक झाली. आयसीसीच्या विषयावर त्यांना माहिती दिली, आणि त्यांनी सर्व पर्याय विचारात घेऊन तोडगा काढण्याचे निर्देश दिले. सहभागावर अंतिम निर्णय एकतर शुक्रवारी किंवा पुढील सोमवारी घेतला जाईल, यावर एकमत झाले."IND vs PAK: भारताने पाकिस्तानची अक्कल ठिकाणावर आणली, वर्ल्ड कपच्या सामन्यामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, नेमकं घडलं तरी काय, पाहा..१ फेब्रुवारी रोजी, मोहसिन नावी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी लाहोरमध्ये पुन्हा भेट घेतली. सरकारने राष्ट्रीय संघाला टी-२० विश्वचषकात भाग घेण्यास परवानगी दिली, परंतु १५ फेब्रुवारी रोजी भारतासोबत खेळण्यास मनाई केली. या सर्व घडामोडींमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या भूमिकेत बदल केला आणि बांगलादेशच्या निर्णयाला पाठिंबा देत भारतासोबतचा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमावली आणि करारांच्या विरोधात जाणारा असला तरी, पाकिस्तान सरकारने यावर अंतिम निर्णय घेतला.
76 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 06:20 AM
पाकिस्तानच्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या निर्णयामुळे 2 अब्ज डॉलर्सच्या महसुलाचे नुकसान झाल्याने वाद निर्माण झाला आहे.

पाकिस्तानच्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या निर्णयामुळे 2 अब्ज डॉलर्सच्या महसुलाचे नुकसान झाल्याने वाद निर्माण झाला आहे.

IND vs PAK ICC Loss, T20 World Cup 2026: कोणत्याहीआयसीसीस्पर्धेत भारतीय संघाच्या सामन्यांमधून सर्वाधिक उत्पन्न मिळते. विशेषतः जेव्हा सामना भारत आणिपाकिस्तानयांच्यात असतो, तेव्हा हे उत्पन्न कित्येक पटीने वाढते. पण जर सामना झाला नाही तर नुकसानही तितकेच मोठे असू शकते. येत्या टी२० विश्वचषकात भारताशी सामना खेळणार नाही, असेपाकिस्तानक्रिकेट बोर्डाने सांगितले आहे. स्पर्धेला सहा दिवस शिल्लक असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या या अजब निर्णयामुळे ICC ला तब्बल २ अब्ज रुपयांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण होतो की, या नुकसानीची भरपाई कुणाकडून केली जाणार... नेमका घोळ काय? पाकिस्तानने जाहीर केले की ते विश्वचषकात भारताविरुद्ध आपला संघ मैदानात उतरवणार नाहीत. पीसीबीने या निर्णयामागे पाकिस्तान सरकारच्या आदेशांचा उल्लेख केला. पाकिस्तानच्या निर्णयानंतर,आयसीसीनेएका निवेदनात गंभीर परिणामांचा इशारा दिला. असे मानले जाते की जर पीसीबीने आपला निर्णय बदलला नाही तर आयसीसी मोठा दंड आकारू शकते. काण जर हा सामना झाला नाही, तर आयसीसीला स्वतःला २ अब्ज रुपयांपर्यंतचे नुकसान सहन करावे लागू शकते. T20 World Cup 2026: BCCIचा 'मास्टरप्लॅन'! भारताने गुपचूप केला पाकिस्तानचा 'गेम' भारत-पाक सामन्याच्या कमाईचे गणित गेल्या अनेक वर्षांपासून, भारत-पाकिस्तान सामना हा आयसीसीच्या प्रत्येक स्पर्धेत सर्वात लक्षवेधी ठरला आहे. कारण केवळ ICC स्पर्धांच्या सामन्यातच हे दोन्ही संघ एकमेकांशी भिडतात. परिणामी, या सामन्याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. परिणामी, भारत-पाकिस्तान सामन्यांनी आयसीसीला सातत्याने सर्वाधिक महसूल मिळवून दिला आहे. विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यांच्या वेळापत्रकामुळे आयसीसीला प्रसारकांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क मिळते. पण जर हा सामना झाला नाही, तर स्पर्धेतील सर्वात मोठा प्रसारक असलेल्याजिओ-हॉटस्टारला कोणताही महसूल मिळणार नाही आणि शेवटी याचा परिणाम आयसीसीवर होईल. कारण त्यांना या सामन्याचे शुल्क मिळणार नाही. IND vs PAK: पाकिस्तानच्या निर्णयामुळे ICCचा संताप, 'या' पाच प्रकारे कारवाई होण्याची शक्यता ICC पाकिस्तान बोर्डाला दणका देण्याच्या तयारीत क्रिकबझच्या अहवालानुसार, कोणत्याही आयसीसी स्पर्धेत भारताचे सामने सुमारे १०० कोटी रुपये कमावतात. भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये हे जवळजवळ दुप्पट होते. कारण भारत-पाकिस्तान टी२० सामन्यासाठी प्रत्येक १० सेकंदांच्या जाहिरातीचा दर साधारणपणे २५ लाख ते ४० लाख रुपयांच्या दरम्यान असतो. अशा परिस्थितीत, हे नुकसान सुमारे २०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. जर आयसीसीला असा तोटा झाला तर त्याचा महसूल वाटप मॉडेलवर परिणाम होईल, ज्यामुळे बीसीसीआय आणि पीसीबीसह सर्व क्रिकेट बोर्डांच्या उत्पन्नावर परिणाम होईल. आधीच श्रीमंत असलेल्या बीसीसीआयसाठी हे मोठे नुकसान नसले तरी पीसीबी आणि इतर बोर्डांसाठी ते मोठे नुकसान असू शकते. शिवाय, आयसीसी बोर्डाच्या जवळच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, सामना रद्द झाल्यास आयसीसी पीसीबीला शिक्षा म्हणून झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यास भाग पाडू शकते.
77 shares
😢
Lokmat logo
Lokmat
Feb 2, 2026, 02:17 AM
1919 क्रीडा क्रिकेट स्टेडियम 2025 पर्यंत आय. पी. एल. सामन्यांचे आयोजन करण्याचे उद्दिष्ट

1919 क्रीडा क्रिकेट स्टेडियम 2025 पर्यंत आय. पी. एल. सामन्यांचे आयोजन करण्याचे उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को:वेर्णा येथील १९१९ स्पोर्टस क्रिकेट स्टेडियमवर पुढील तीन वर्षांत इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) टी२० सामने आयोजित करण्याचे स्वप्न आहे. आयपीएल सामने घेण्यासाठी प्रेक्षक क्षमता २५-३० हजार असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी योग्य पावले उचलली जातील, असे स्टेडियमचे मालक आणि चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव यांनी सांगितले. सध्या स्टेडियमवर 'वर्ल्ड लेजंड प्रो टी-२० लीग' चालू असून त्यात भारताबरोबरच आंतरराष्ट्रीय दिग्गज खेळाडू सहभागी आहेत. कमलाप्रसाद यादव म्हणाले की, या स्पर्धेमुळे गोव्यात आर्थिक उलाढाल वाढली असून स्थानिकांसह पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळाली आहे. भविष्यात अशा अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा येथे आयोजित करण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला. स्टेडियमवर 'वूमन प्रीमिअर लीग टी२०' चे सामने आयोजित करण्यासाठीही पावले उचलण्यात येणार आहेत. काही महिन्यांपूर्वी मुलांसाठी मोफत क्रिकेट प्रशिक्षणाचे आयोजित केले असून त्यात ८० मुलांनी क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले. पुढच्या ६ महिन्यांत या स्टेडियमवर मुलांसाठी मोफत क्रिकेट प्रशिक्षण आणि युवा क्रिकेट अकादमी स्थापन करण्याचेही कार्यक्रम आखण्यात आले आहेत, ज्यामुळे गोव्यातील क्रिकेटपटूंचा दर्जा वाढेल, असेही कमलाप्रसाद यादव म्हणाले. भविष्यात गोव्याचा 'आयपीएल टी-२०' आणि 'वूमन प्रीमिअर लीग टी-२०' क्रिकेट संघ व्हावा यासाठी गोव्यातील नामवंत उद्योजकांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे कमलाप्रसाद यादव म्हणाले. भविष्यात गोव्याचा 'आयपीएल टी-२०' आणि 'वूमन प्रीमिअर लीग टी-२०' संघ असावा, असे माझे स्वप्न असून त्यासाठी मी पुढाकार घेऊन संघ तयार करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील काही महिन्यांत या मैदानावर अनेक स्पर्धा होणार असल्याची माहिती दिली. आम्हालागोवासरकार आणिगोवाक्रिकेट अकादमीकडून उत्कृष्ट पाठिंबा मिळत असल्याचे यादव यांनी सांगितले.
84 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 2, 2026, 12:48 AM
भारत सरकारने लघुउद्योग आणि रोजगार निर्मितीसाठी निधीचे वाटप केले

भारत सरकारने लघुउद्योग आणि रोजगार निर्मितीसाठी निधीचे वाटप केले

लघू उद्योगांना प्रोत्साहित केल्यास आपोआप रोजगारही निर्माण होत असतो. यासाठी लघू उद्योगांना भांडवल सहभागासाठी दहा हजार कोटींची तरतूद केली असून त्यांना वित्तपुरवठा केला जाणार आहे. जागतिक क्रीडा साहित्य पुरवठा केंद्र हे लघू उद्योगांच्या मार्फतच विकसित होणार आहे. कापड उद्योग हा महत्त्वाचा रोजगारक्षम उद्योग असून नैसर्गिक, कृत्रिम व औद्योगिक कापड यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. मेगा टेक्स्टाईल पार्क हा याचाच एक भाग आहे. दुर्मीळ खनिज संपत्ती ही व्यापारी युद्धाची बाब असून भारतात केरळ, ओडिशा राज्यांत अशी दुर्मीळ साधन संपत्ती विकसित करण्यास महत्त्व दिले जाणार आहे.
61 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 1, 2026, 03:26 PM
पाकिस्तान क्रिकेट संघ भारताविरुद्ध न खेळता 2026 च्या टी-20 विश्वचषकात सहभागी होणार

पाकिस्तान क्रिकेट संघ भारताविरुद्ध न खेळता 2026 च्या टी-20 विश्वचषकात सहभागी होणार

T20 World Cup Ind vs Pak:आगामी टी-20 वर्ल्ड कप 2026 बाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.पाकिस्तानसरकारने वर्ल्ड कममध्ये सहभागी होण्यासाठी क्रिकेट संघाला मान्यता दिली आहे. मात्र, या मंजुरीसोबत एक महत्त्वाची अट घातली आहे.पाकिस्तानसरकारच्या अधिकृत एक्स हँडलवरून ट्विटद्वारे ही घोषणा करण्यात आली. सरकारी आदेशानुसार, पाकिस्तान क्रिकेट संघ 15 फेब्रुवारी 2026 रोजी भारताविरुद्ध सामना खेळणार नाही. म्हणजेच काय, तर पाकिस्तान स्पर्धेत सहभागी होईल, परंतु बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना खेळला जाणार नाही. पाकिस्तान सरकारच्या या निर्णयामुळे टी-20 विश्वचषकातील सर्वात मोठ्या आणि सर्वात हाय-व्होल्टेज सामन्याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्ड(आयसीसी)ला आर्थिक नुकसान पोहोचवण्याच्या रणनीतीचा एक भाग असल्याचे मानले जाते. अलिकडेच, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे अध्यक्ष मोहसिन नक्वीनेआयसीसीवरबीसीसीआयच्याप्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप केला होता. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि मोहसिन नक्वी यांच्यातील महत्त्वपूर्ण बैठकीनंतर काही मिनिटांतच ही घोषणा करण्यात आली. नक्वी यांनी यापूर्वी पंतप्रधानांची भेट घेतली होती आणि सांगितले होते की, टी-20 विश्वचषकात पाकिस्तानच्या सहभागाबाबत अंतिम निर्णय 2 फेब्रुवारीपर्यंत घेतला जाईल. आता अखेर पाकिस्तानने स्पर्धेत सहभागी होण्यास तयारी दर्शवली आहे, मात्र भारताविरोधात असल्याच्या सामन्यावर बहिष्कार टाकला आहे. आता आयसीसी काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल. टी-20 वर्ल्ड कप सामने आणि वेळापत्रक पाकिस्तान गट ‘A’ मध्ये असून त्यांच्यासोबत भारत, नामिबिया, नेदरलँड्स, अमेरिका हे संघ आहेत. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत (भारतासोबत सह-यजमान) होणार आहेत. पाकिस्तानचे सामने 7 फेब्रुवारी: नेदरलँड्सविरुद्ध (स्पर्धेचा उद्घाटन सामना) 10 फेब्रुवारी: अमेरिकेविरुद्ध 15 फेब्रुवारी: भारताविरुद्ध (बहिष्कार) 18 फेब्रुवारी: नामिबियाविरुद्ध भारताविरुद्धचा सामना न खेळल्यास पाकिस्तानला थेट दोन गुण गमवावे लागतील.
57 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 1, 2026, 03:14 PM
सरकारच्या निर्णयानंतर पाकिस्तानने भारताविरुद्धचा क्रिकेट सामना रद्द केला

सरकारच्या निर्णयानंतर पाकिस्तानने भारताविरुद्धचा क्रिकेट सामना रद्द केला

यापूर्वी मोहसीन नकवी यांनी या संदर्भातील अंतिम निर्णय ३० जानेवारी किंवा २ फेब्रुवारी रोजी घेतला जाईल, असे संकेत दिले होते. मात्र, अपेक्षेपेक्षा एक दिवस आधीच सरकारने आपला पवित्रा जाहीर करून क्रीडा विश्वात खळबळ उडवून दिली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना तांत्रिकदृष्ट्या सोडून दिला आहे.
43 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 1, 2026, 03:03 PM
भारताने आयोजित केलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानकडून संघाची घोषणा

भारताने आयोजित केलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानकडून संघाची घोषणा

कराची : भारत यजमान असलेला टी २० वर्ल्ड कप खेळायचा की नाही, याबातचा निर्णय पाकिस्तानचे सरकार घेणार होती. पाकिस्तान वर्ल्ड कपवर बहिष्कार घालणार कीखेळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण अखेर पाकिस्तानच्या सरकारने हा मोठा निर्णय आता जाहीर केला आहे.बांगलादेशला मदत करण्यासाठी पाकिस्तान पुढे सरसावली होती. पाकिस्तानने बांगलादेशला हमी दिली होती की, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. त्यामुळे बांगलादेशने भारतामधील वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकला होता. पण बांगलादेशला त्यानंतर कळून चुकले की, आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे. कारण पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने कोणताच निर्णय घेतला नव्हता, उलट त्यांनी वर्ल्ड कपसाठी आपला संघ जाहीर केला होता. मोहसिन नक्वी यांनी त्यानंतर एक मोठी चाल खेळली आणि त्यांनी हे प्रकरण पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडे नेले. पाकिस्तानचे पंतप्रधान याबाबत अंतिम निर्णय घेतील, असे मोहसिन नक्वी यांनी सांगितले होते. पाकिस्तानच्या सरकारने अखेर आता भारत यजमानपद भूषवणारा वर्ल्ड कप खेळायचा की नाही, याबाबतचा निर्णय घेतला आहे.पाकिस्तानच्या सरकारला मोहसिन नक्वी यांनी तीन पर्याय सुचवले होते. त्यामधील पहिला हा संपूर्ण वर्ल्ड कपवर बहिष्का घालण्याचा होता, तर दुसरा फक्त भारताच्या सामन्यावर बहिष्कार घालण्याचा होता, तर तिसरा भारताविरुद्धच्या सामन्यात काळी पट्टी बांधून निषेध करण्याचा होता. यावेळी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दुसरा पर्याय निवडला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानच्या सरकारने टी २० वर्ल्ड कपवर संपूर्ण बहिष्कार घातलेला नाही, तर त्यांनी फक्त भारताविरुद्धच्या सामन्यावरच बहिष्कार घातला आहे. त्यामुळे आता पाकिस्तान वर्ल्ड कपमध्ये आपेल सामने खेळेल, पण अपवाद हा फक्त भारताच्या सामन्याचा असेल. त्यामुळे आता पाकिस्तानच्या सरकारने हा निर्णय घेत आयसीसीला कोंडींत पकडण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.IND vs PAKपाकिस्तानने संपूर्ण वर्ल्ड कपवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला नाही, तर त्यांनी फक्त एकच सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता यावर आयसीसी नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.
32 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 1, 2026, 02:30 PM
रोमांचक सामन्यात भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, आयसीसी क्रिकेट विश्वचषक उपांत्य फेरीत प्रवेश

रोमांचक सामन्यात भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, आयसीसी क्रिकेट विश्वचषक उपांत्य फेरीत प्रवेश

बुलोवायो : भारताने पाकिस्तानची जगासमोर चांगलीच जिरवली. कारण भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दमदार कामगिरी करत आता थेट सेमी फायनलमध्ये एंट्री केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने २५२ धावा केल्या होत्या. पाकिस्तानला हे आव्हान ३३.३ षटकांत पूर्ण करायचे होते, तरच ते सेमी फायनसलाठी पात्र ठरले असते. पाकिस्तानने ३३.३ षटकांत २५३ धावा करताआल्या नाहीत आणि भारताने दिमाखात वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये एंट्री केली आहे.भारताला वैभव सूर्यवंशीने या सामन्यात झोकात सुरुवात करून दिली होती. पण वैभवला या सामन्यात मोठी खेळी साकारता आली नाही, वैभवने या सामन्यात २२ चेंडूंचा सामना केला. या २२ चेंडूंत त्याने ५ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३० धावा केल्या. वैभव बाद झाला तरी वेदांत त्रिवेदीने यावेळी भारतीय संघाचा डाव चांगलाच सावरला. वेदांतने सुरुवातीला संयतपणे फलंदाजी केली आणि पाकिस्तानला विकेट्स मिळवण्यापासून दूर केले. त्यानंतर मात्र वेदांतने दमदार फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. वेदांतने या सामन्यात २ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६८ धावांची दिमाखदार खेळी साकारली. वेदांतच्या या खेळीचा भारताला चांगलाच आधार मिळाला. अखेरच्या षटकांत कनिक चौहानने २९ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३५ धावा केल्या, त्यामुळेच भारताला या सामन्यात अडीचशे धावांची वेस ओलांडता आली. भारताने या सामन्यात २५२ धावा करत दमदार आव्हान उभे केले होते.पाकिस्तानचा संघ भारताच्या २५३ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आला. त्यांना सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी हे आव्हान ३३.३ षटकांत पूर्ण करायचे होते. भारताने चौथ्या षटकात पाकिस्तानला पहिला धक्का दिला आणि त्यांची १ बाद २३ अशी अवस्था केली. त्यानंतर भारताने सेट झालेल्या पाकिस्तानच्या हमझा झहूरला ४२ धावांवर बाद केले. पण पाकिस्तानच्या उस्मान खानने यावेळी अर्धशतक झळकावले होते. पण भारताच्या गोलंदाजांनी यावेळी अचूक आणि भेदक मारा केला. त्यामुळे पाकिस्तानला ३३.३ षटकांत २५३ धावा करता आल्या नाहीत आणि त्यामुळे आता सामन्याचा निकाल काहीही लागला तरीही भारत सेमी फायनलमध्ये पोहोचणार आहे.IND vs PAKभारताने टिच्चून गोलंदाजी केली आणि पाकिस्तानला निर्धारीत षटकांत आपले आव्हान पूर्ण करू दिले नाही, त्यामुळे भारताचा संघ आता सेमी फायनलमध्ये दाखल झाला आहे.
85 shares
😊
Sakal logo
Sakal
Feb 1, 2026, 12:36 PM
कार्लोस अल्काराझने ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले, कारकिर्दीतील ग्रँड स्लॅम पूर्ण केले

कार्लोस अल्काराझने ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले, कारकिर्दीतील ग्रँड स्लॅम पूर्ण केले

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेला रविवारी (१ फेब्रुवारी) नवा विजेता मिळाला आहे. रविवारी ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद स्पेनच्या २२ वर्षीय कार्लोस अल्काराजने दिग्गज नोवाक जोकोविचला पराभूत करत मिळवले आहे.हे त्याचे एकूण सातवे ग्रँडस्लॅम विजेतेपद असले, तरी पहिलेच ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद (Australian Open) आहे. त्यामुळे त्याने पहिल्यांदाच करियर ग्रँडस्लॅमही (Career Grand Slam) पूर्ण केले आहे.ज्यावेळी चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा कारकि‍र्दीत जिंकल्या जातात त्याला करियर ग्रँडस्लॅम म्हटलं जातं. अल्काराजने (Carlos Alcaraz) फ्रेंच ओपन (२०२४, २०२५), विम्बल्डन (२०२३, २०२४) आणि अमेरिकन ओपन (२०२२, २०२५) या ग्रँडस्लॅम स्पर्धा प्रत्येकी दोनदा जिंकल्या आहेत.पण ऑस्ट्रेलियन ओपनही आता त्याने जिंकल्याने तो ओपन एरामधील करियर ग्रँडस्लॅम पूर्ण करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.तसेच पुरुष एकेरीत करियर ग्रँडस्लॅम पूर्ण करणारा सहावाच खेळाडू ठरला. यापूर्वी रॉड लेव्हर, आंद्रे अगासी, रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच यांनीच असा कारनामा केला आहे.अव्वल मानांकित अल्काराजने ३८ वर्षीय जोकोविचला (Novak Djokovic) रविवारी अंतिम सामन्यात २-६, ६-२, ६-३, ७-५ अशा चार सेटमध्ये पराभूत केले. त्यामुळे जोकोविचची २५ व्या ग्रँडस्लॅमची प्रतिक्षा अद्यापही कायम राहिली. हा अंतिम सामना तीन तास दोन मिनिटे चालला. या सामन्यासाठी स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालही उपस्थित होता.या अंतिम सामन्यात जोकोविचने सुरुवात चांगली केली होती. त्याने पहिल्याच सेटमध्ये अल्काराजवर वर्चस्व ठेवत विजय मिळवला होता. मात्र अल्काराजने हार न मानता दणक्यात पुनरागमन केले. त्याने दुसऱ्या सेटमध्ये दोनदा जोकोविचची सर्विस ब्रेक केली. त्यामुळे त्याने दुसरा सेट ६-२ ने सहज जिंकला आणि बरोबरी साधली.तिसर्‍या सेटमध्येही अल्काराज चांगल्या लयीत दिसला. तो बिलकूलच थकल्यासारखा दिसत नव्हता. जोकोविच शॉट्लवर त्याच्याकडे प्रत्युत्तर होते. चौथ्या गेममधील पहिल्या पाँइंटने सर्वांनाच चकीत केले. त्याने नेटजवळील जोकोविचच्या शॉट अफलातून परतवला. अल्काराजने हा सेटही जिंकत आघाडी घेतली.मात्र चौथ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये अटीतटीचा खेळ पाहायला मिळाला. ५-६ अशा फरकानंतर मात्र अल्काराजने अखेरचा गेम जिंकून चौथा सेटही जिंकला आणि विजेतेपदावरही नाव कोरले.
85 shares
😐
Pudhari logo
Pudhari
Feb 1, 2026, 12:14 PM
अलकाराझने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ऐतिहासिक विजयासह जॉकोव्हिकला चकित केले

अलकाराझने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ऐतिहासिक विजयासह जॉकोव्हिकला चकित केले

निर्णायक चौथ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी प्रत्येक गुणासाठी प्रचंड घाम गाळला. १० वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणाऱ्या जोकोविचने हार न मानता झुंज दिली, परंतु अल्कराजच्या चपळाईसमोर त्याचे प्रयत्न तोकडे पडले. अल्कराजने हा सेट ७-५ ने जिंकत ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.
38 shares
😊
Pudhari logo
Pudhari
Feb 1, 2026, 10:43 AM
निर्णायक सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला निवडीचा प्रश्न भेडसावत आहे.

निर्णायक सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला निवडीचा प्रश्न भेडसावत आहे.

अंतिम निवडीबाबत विचारले असता, भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सावध प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ‘‘तिलक वर्माच्या प्रकृतीबाबत सध्या नेमकी माहिती नाही, परंतु त्याने फलंदाजीचा सराव सुरू केला आहे. जर तो परतला, तर आमच्यासमोर निवडीचा एक 'चांगला पेच' निर्माण होईल. आमच्या १५ सदस्यीय संघातील प्रत्येक खेळाडू अंतिम ११ मध्ये खेळण्यास सक्षम आहे. ७ तारखेलाच इशान खेळणार की नाही, हे स्पष्ट होईल.’’
1 shares
😐
Lokmat logo
Lokmat
Feb 1, 2026, 06:59 AM
भारताच्या ए. व्ही. जी. सी. क्षेत्राचा वेगवान विकास; सरकारने शिक्षण आणि रोजगाराच्या उपक्रमांची घोषणा केली

भारताच्या ए. व्ही. जी. सी. क्षेत्राचा वेगवान विकास; सरकारने शिक्षण आणि रोजगाराच्या उपक्रमांची घोषणा केली

नवी दिल्ली - भारतातील अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (AVGC) क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. यात २०३० पर्यंत २० लाख व्यावसायिकांची आवश्यकता असेल. त्यामुळे १५,००० माध्यमिक शाळा आणि ५०० महाविद्यालयांमध्ये AVGC कंटेंट क्रिएटर लॅब्स स्थापन करण्यात येईल. त्याशिवाय मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी बनवण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्रीनिर्मला सीतारामनयांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली आहे. Union Budget 2026: कॅन्सर, डायबेटिसची औषधे स्वस्त होणार; बायोफार्मा सेक्टरसाठी १० हजार कोटींची घोषणा अर्थमंत्रीनिर्मला सीतारामनम्हणाल्या की, उच्चशिक्षणक्षेत्रात गुंतवणुकीचा भाग म्हणून नवीन संस्था, विद्यापीठ टाउनशिप, मुलींसाठी वसतीगृहे आणि टेलिस्कोप पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सरकारने पाऊले उचलत आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतीगृहे बांधली जातील. क्रीडा क्षेत्रातून रोजगार आणि कौशल्य विकासातून नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. खेलो इंडियाच्या माध्यमातून सुरू केलेल्या क्रीडा स्पर्धेला पुढील दशकात परिवर्तन घडवण्यासाठी खेलो इंडिया मिशन सुरू करण्याची घोषणा करण्यात येत आहे असं त्यांनी सांगितले. नारळ उत्पादन वाढवण्यासाठी योजना नारळ उत्पादनातील स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने नारळ संवर्धन योजना जाहीर केली आहे. ज्यामुळे उत्पादन वाढेल आणि उत्पादकता वाढेल, ज्यामध्ये प्रमुख नारळ उत्पादक राज्यांमध्ये उत्पादक नसलेल्या झाडांच्या जागी नवीन जाती किंवा रोपे लावली जातील. भारताला कच्चे काजू आणि नारळ उत्पादन प्रक्रिया करण्यात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी, निर्यात स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी २०३० पर्यंत भारतीय काजू आणि कोकोचे जागतिक स्तरावरील प्रीमियम ब्रँडमध्ये रूपांतर करण्याची योजना सरकारने आखली आहे. ऑरेंज अर्थव्‍यवस्‍था📈🔸भारत के एवीजीसी क्षेत्र को बढ़ावा🔸भारत में एवीजीसी क्षेत्र में 2030 तक 20 लाख पेशेवरों की आवश्‍यकता होने का अनुमान🔸15,000 माध्‍यमिक विद्यालयों और 500 कॉलेजों में एवीजीसी कंटेंट क्रिएटर लैब्‍स की स्‍थापना के लिए इंडियन इन्‍स्‍टीट्यूट ऑफ क्रिएटिव…pic.twitter.com/jE0On6SUGN दरम्यान, ३ नवीन अखिल भारतीय आयुर्वेद संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात ठेवण्यात आला आहे. भारताला वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांच्या मदतीने देशात पाच प्रादेशिक वैद्यकीय पर्यटन केंद्रे स्थापन करण्याची योजना सुरू केली जाईल. सेवा क्षेत्राला विकसित भारताचे प्रमुख इंजिन बनवण्यासाठी "शिक्षणते रोजगार आणि उद्योग" या विषयावर एक उच्चस्तरीय स्थायी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे, ज्याचे उद्दिष्ट २०४७ पर्यंत सेवांमध्ये भारताचा १० टक्के जागतिक वाटा सुनिश्चित करणे आहे. ही समिती विकास, रोजगार आणि निर्यात क्षमतेला प्राधान्य देईल आणि एआयसह उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा रोजगार आणि कौशल्यांवर होणाऱ्या परिणामाचे मूल्यांकन करेल आणि शिफारसी करेल.
37 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 1, 2026, 05:32 AM
न्यूझीलंडविरुद्धची टी20 मालिका भारताने 4-1 ने जिंकली

न्यूझीलंडविरुद्धची टी20 मालिका भारताने 4-1 ने जिंकली

तिरुवनंतनमपुरम:भारतविरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच टी-20 सामन्यांची मालिका रंगली. या मालिकेत भारताने बाजी मारली. भारताने मालिका 4-1 ने जिंकली. संपूर्ण मालिकेत भारताने दमदार कामगिरी केली. मालिकेतील चौथा सामना फक्त भारताने गमावला. ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या पाचव्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडला भारताविरुद्ध 46 धावांनी पराभव पत्करावा लागला. मालिका गमावल्यानंतर किवी कर्णधार Mitchell Santner काय म्हणाला ते पाहा....मिचेल सँटनरम्हणाला की, "मालिका गमावली असली तरी त्यांच्या संघाने काही सकारात्मक गोष्टी शिकल्या. मला वाटते की जेव्हा तुम्ही संपूर्ण मालिकेकडे पाहता तेव्हा आम्हाला खूप सकारात्मक गोष्टी शिकायला मिळाल्या. भारत हा एक खूप चांगला संघ आहे. मी सुरुवातीलाच हे सांगितले होते आणि त्यांच्या परिस्थितीत त्यांना हरवणे खूप कठीण आहे. कदाचित आम्ही गोलंदाजांसाठी गोष्टी थोड्या कठीण केल्या असतील, परंतु एकंदरीत, हा एक मनोरंजक सामना होता."IND vs NZ 5th T20: मालिका जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने भारतीय खेळाडूंचे कौतुक केले नाही, चांगले खेळले तरीही...किवी कर्णधाराचा असा विश्वास आहे की, "भारताविरुद्धची ही मालिका न्यूझीलंडला विश्वचषकाची तयारी करण्यास मदत करेल. मला वाटते की जेव्हा तुम्हाला संपूर्ण मालिकेत आव्हान दिले जाते तेव्हा ती नेहमीच चांगली गोष्ट असते. तुम्ही तुमच्या गोलंदाजांवर आणि फलंदाजांवर दबाव आणता आणि त्यातून तुम्ही शिकता. त्या दृष्टिकोनातून, ही आमच्यासाठी खूप चांगली मालिका आहे. अर्थात, निकाल आमच्या मनासारखे गेले नाहीत, परंतु प्रत्येक सामन्यातून काहीतरी शिकण्यासारखे आहे."कालच्या पाचव्या सामन्यात इशान किशनने शानदार शतक ठोकले. इशानने दमदार कमबॅक केला आणि मालिका गाजवली. अभिषेक शर्माने ही मालिका गाजवली. बराच काळ आऊट ऑफ फॉर्म असलेल्या सूर्यालाही आपला सूर गवसला आहे. सूर्याने या मालिकेत तीन वेळा अर्धशतक ठोकले. या मालिकेनंतर सूर्याला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कारही मिळाला. आता पुढील महिन्यात टी-20 विश्वचषकाची स्पर्धा रंगेल. या पहिला सामना 7 फेब्रुवारी रोजी रंगणार आहे. भारताचा पहिला सामना अमेरिकेविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर मुंबईत रंगणार आहे.
96 shares
😊
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 1, 2026, 04:49 AM
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताचे वर्चस्व, 2026 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादव चमकला

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताचे वर्चस्व, 2026 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादव चमकला

तिरुवनंतनमपुरम:भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-1 अशी जिंकून 2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी आपली तयारी पूर्णपणे मजबूत केली आहे. भारताचा टी-20 मध्ये दरारा कायम असल्याचे पुन्हा पाहायला मिळाले. या मालिकेत टीम इंडियाचे फलंदाजीचे वर्चस्व दिसून आले, सलामीवीर फलंदाज Abhishek Sharma आणि दीर्घ अनुपस्थितीनंतर भारतीय संघात परतलेला यष्टीरक्षक-फलंदाज Ishan Kishan त्याच्या कामगिरीने प्रभावित केले. या दोघांनी मालिका गाजवूनही त्यांना प्लेअर ऑफ द सिरीजतचा पुरस्कार मिळाला नाही तर कोणाला मिळाला ते पाहा...टीम इंडियाचा टी-20 कर्णधार Suryakumar Yadavफॉर्म 2025 मध्ये विशेषतः खराब होता, ज्यामुळे टीका झाली. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत, त्याची कामगिरी सर्वात लक्षवेधी होती, ज्याने आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी सर्वांची मने जिंकली. या मालिकेत भारतीय संघासाठी सर्वात मोठी संधी म्हणजे कर्णधार सूर्यकुमार यादव चा फॉर्म, ज्याने तीन अर्धशतके झळकावली आणि प्लेअर ऑफ दि सिरीजचा पुरस्कार जिंकला. सूर्याने मालिकेतील पाचही सामन्यांमध्ये फलंदाजी केली आणि 80.67 च्या प्रभावी सरासरीने 242 धावा केल्या, ज्यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश होता. या काळात सूर्यकुमार यादवचा स्ट्राईक रेट 196.75 होता. त्याने मालिकेत 25 चौकार आणि 14 षटकारही मारले. 2026 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये परतल्याने, टीम इंडियाची फलंदाजी क्रमवारी पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक दिसते.2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा त्यात इशान किशनचे नाव समाविष्ट होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर, इशानने टीम इंडियामध्ये पुनरागमन केले आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याने निवडकर्त्यांचा निर्णय पूर्णपणे बरोबर असल्याचे सिद्ध केले. या मालिकेत इशानच्या बॅटमधून 53.75 च्या सरासरीने एकूण 215 धावा निघाल्या, ज्यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतकी खेळी समाविष्ट होती.आता भारतीय संघ टी-20 विश्वचषक खेळणार आहे. या विश्वचषकाला सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होईल. पहिला सामना भारत अमेरिकेविरुद्ध खेळेल. भारताचा पहिला सामना हा विश्वचषकाच्या पहिल्याच दिवशी असणार आहे.
38 shares
😊
Maharashtra Times logo
Maharashtra Times
Feb 1, 2026, 03:35 AM
न्यूझीलंडविरुद्धची टी20 मालिका भारताने जिंकली, सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये परतल्याने आनंदित

न्यूझीलंडविरुद्धची टी20 मालिका भारताने जिंकली, सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये परतल्याने आनंदित

तिरुवनंमपुरम:टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धचा पाचवा टी-20 सामना 46 धावांनी जिंकून मालिका 4-1 अशी जिंकली. भारतीय कर्णधार Suryakumar Yadav मालिकेत सर्वाधिक 242 धावा केल्या. या मालिकेत भारताने चौथा एकमेव सामना गमावला. आता भारत पुढील महिन्यात T20 World Cup 2026 खेळणार आहे. 7 फेब्रुवारीपासून विश्वचषक खेळवला जाणार आहे.सूर्यकुमार यादवसामना नंतर काय म्हणाला ते पाहा...फॉर्ममध्ये परतल्याबद्दल आनंद व्यक्त करतानासूर्य म्हणाला की,मला माहित आहे की मी आऊट ऑफ फॉर्म नव्हतो, फक्त धावा काढत नव्हतो. खूप छान वाटतंय. वर्ष झालं आहे आणि अशा क्षणांची वाट पाहणे खूप लांब आहे. मी नेहमीच या वेळेचे स्वप्न पाहिले आहे. तुम्ही (मुरली कार्तिक) अहमदाबादमध्ये म्हणाला होता की जेव्हा स्काय तिथे असतो तेव्हा घाबरण्याची गरज नाही. मी गेल्या वर्षभरापासून जे करत होतो ते करत राहिलो आणि माझ्या दिनचर्येला चिकटून राहिलो. मला माहित होते की मी फॉर्ममध्ये नाही, मी फक्त धावा काढत नव्हतो. ही मालिका माझ्यासाठी खूप चांगली आहे आणि अशा भावनेसह विश्वचषकात जाणे खूप खास आहे."सूर्यकुमार यादव म्हणाला, "मागील मालिकेनंतर माझ्याकडे दोन ते तीन आठवडे होते. या काळात मी माझ्या जवळच्या मित्रांसोबत वेळ घालवला आणि त्यांनी मला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या ज्या मला स्वीकारायच्या होत्या. हे एका खेळाडूचे आयुष्य आहे. मी फक्त क्रिकेटमध्येच नाही तर इतर खेळांमध्येही अनेक खेळाडूंना अशाच टप्प्यातून जाताना पाहिले आहे. मला खात्री होती की जर मी छोट्या छोट्या गोष्टी योग्यरित्या करत राहिलो तर माझा वेळ नक्कीच येईल. गोष्टी कशा प्रगती करत आहेत याबद्दल मी खूप आनंदी आहे."कर्णधार सूर्य म्हणाला, "जिंकू किंवा हरु, प्रत्येक सामन्यातून काहीतरी शिकण्यासारखे आहे. जेव्हा आपण मुंबईत परतू आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सराव सामना खेळू, तेव्हा आपण बसून शेवटच्या पाच सामन्यांचे आणि संपूर्ण वर्षाचे विश्लेषण करू. त्यानंतर, आपण आपली मोहीम सुरू करू. हे स्वरूप गोलंदाजांसाठी खूप कठीण आहे. मला ते पूर्णपणे समजते. जेव्हा आपण मोठी धावसंख्या करतो तेव्हा विरोधी पक्ष जोरदारपणे प्रतिकार करेल. कर्णधार आणि गोलंदाज म्हणून तुम्ही नेहमीच दबावाखाली असता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगली योजना असणे. हे सर्व शिकण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. आपण बसू, त्यावर चर्चा करू आणि पुढे जाऊ."
22 shares
😊
Lokmat logo
Lokmat
Feb 1, 2026, 02:58 AM
T20I मधील वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराची सर्वात वाईट कामगिरीः भारताने मालिका 4-1 ने जिंकली

T20I मधील वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराची सर्वात वाईट कामगिरीः भारताने मालिका 4-1 ने जिंकली

Jasprit Bumrah Worst Bowling figures in T20, IND vs NZ 5th T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील शेवटचा सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. तिथे भारताने ४६ धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिका ४-१ अशी जिंकली. पण या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची कामगिरी खूपच खराब होती. त्याने अनेक 'नकोसे' विक्रम आपल्या नावे केले. या सामन्यात जसप्रीत बुमराहला एकही बळी मिळवता आली नाही, तसेच त्याने सर्वात महागडी गोलंदाजीही केली. कारकिर्दीतील सर्वात वाईट 'स्पेल' सामन्यात बुमराहने चार षटके टाकली. ५८ धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. त्याच्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा त्याचा आतापर्यंतचा सर्वात महागडा आकडा आहे. त्याची याआधीची सर्वात वाईट कामगिरी म्हणजे २०२२ मध्ये हैदराबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विकेट न घेता ५० धावा देणे. तसेच, एकेकाळी एकही षटकार न खाणाऱ्या बुमराहने या मालिकेत सर्वाधिक सहा षटकार खाल्ले. हादेखील नवा 'नकोसा' विक्रम ठरला. यापूर्वी, त्याने २०२५च्या आशिया कपमध्ये पाच षटकार खाल्ले होते. कारकिर्दीतील सर्वात महागडे षटकही टाकले सामन्यात बुमराहने त्याच्या कारकिर्दीतील सर्वात महागडे षटकही टाकले. त्याने डावाच्या १४ व्या षटकात २२ धावा दिल्या. हे षटक न्यूझीलंडचे फलंदाज डॅरिल मिशेल आणि बेव्हॉन जेकब्स यांनी चांगले खेळले. त्यांनी ४, ६, ६, १, ४, १ अशा ६ चेंडूवर धावा लुटल्या. बुमराहने एकाच टी२० आंतरराष्ट्रीय षटकात दिलेल्या या सर्वाधिक धावा ठरल्या. त्याचे याआधीचे सर्वात महागडे षटक २०१७ मध्ये इंग्लंडविरुद्ध २० धावांचे होते. त्याच मालिकेत त्याने दुसऱ्या षटकात १९ धावा दिल्या होत्या. २०२६ च्या टी२० विश्वचषकापूर्वी भारताचा स्टार गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहची अशी कामगिरी टीम इंडियासाठी मोठी चिंता निर्माण करणारी आहे.
38 shares
😢
Pudhari logo
Pudhari
Feb 1, 2026, 01:14 AM
वार्षिक उत्सव समारोपः मनोरंजन क्षेत्रात भाविकांची गर्दी

वार्षिक उत्सव समारोपः मनोरंजन क्षेत्रात भाविकांची गर्दी

जानेवारी महिन्यात पंधरा दिवस चाललेल्या या भक्ती आणि आनंदाच्या सोहळ्याची आता अधिकृत सांगता झाली असून, होम मैदानावर सजलेले मनोरंजनाचे विश्व आता गुंडाळले जात आहे. यावर्षी यात्रेला सलग सुट्ट्यांचे पाठबळ मिळाल्याने सोलापूर जिल्ह्यासह शेजारील कर्नाटक व तेलंगणा राज्यातूनही भाविकांचा ओघ वाढला होता. बच्चेकंपनीसाठी आकर्षणाचे केंद्र असलेले गगनचुंबी आकाश पाळणे, कोलंबस आणि ड्रॅगन ट्रेन यांसारख्या खेळांनी मैदानावर चैतन्य निर्माण केले होते.
32 shares
😊
Loksatta logo
Loksatta
Jan 31, 2026, 07:01 PM
इशान किशनच्या शतकी खेळीमुळे भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

इशान किशनच्या शतकी खेळीमुळे भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

Ishan Kishan on POTM Award and His Comeback:इशान किशनने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचव्या टी-२० सामन्यात शतक झळकावलं. त्याच्या या शतकी खेळीने भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. इशान किशनने या सामन्यात त्याच्या कारकिर्दीतील पहिलं टी-२० आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं. संघात बऱ्याच काळानंतर पुनरागमन केल्यानंतर ही शतकी खेळी केल्यानंतरही तो समाधानी नसल्याचं त्याने सांगितलं. इशानने अवघ्या ४३ चेंडूत १०३ धावांची आक्रमक खेळी करताना त्याने ६ चौकार आणि १० षटकार लगावले. केवळ ४२ चेंडूत त्याने शतक पूर्ण केलं आणि भारताला २० षटकांत ५ बाद २७१ धावांचा भक्कम स्कोअर उभारण्यात मोलाचा वाटा उचलला. यादरम्यान त्याने कर्णधार सूर्यकुमार यादवसह १३७ धावांची भागीदारीही रचली. इशानला त्याच्या या उत्कृष्ट खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला. भारताने हा सामना ४६ धावांनी जिंकल्यानंतर, किशनला त्याच्या शानदार कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. भारतीय संघात झालेलं हे प्रभावी पुनरागमन, शतक आणि अवॉर्ड्स या सध्याच्या यशापेक्षा २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकणं हेच त्याचं अंतिम ध्येय आहे. इशान किशन सामनावीराचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर म्हणाला, “तसं समाधान वाटतंय, पण तरीही मला असं वाटतं की मी अजून माझ्या अपेक्षित स्तरावर पोहोचलो नाही. मी चांगली कामगिरी केली आहे, पुरस्कारही मिळाले आहेत, पण माझं मुख्य लक्ष विश्वचषकावर आहे. तिथेच अतिरिक्त मेहनत घ्यावी लागणार आहे. सध्या मिळालेला फॉर्म पुढेही कायम ठेवणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे,” असं किशनने सामन्यानंतरच्या सादरीकरणात सांगितलं. शतकाच्या उंबरठ्यावर असताना गती कमी का केली नाही, असा प्रश्न किशनला विचारण्यात आला. त्यावर त्याने स्पष्ट केलं की वैयक्तिक विक्रमांचा पाठलाग न करता, योग्य चेंडू मिळताच मोठे फटके मारणं हीच संघाची भूमिका आहे. “आजकाल आमच्या संघातील प्रत्येक खेळाडूची हीच रणनिती आहे. तुम्ही विक्रमाच्या अगदी जवळ असलात तरी त्याला फारसं महत्त्व नसतं. त्या षटकांत जर तुम्ही सिंगल्स काढत बसलात, तर नंतर असं वाटतं की आपण आणखी मोठी खेळी साकारू शकलो असतो आणि त्यामुळे फरक खूप मोठा पडतो. चेंडू मोठा फटका खेळण्याजोगा असेल, तर तो मैदानाबाहेर पाठवायलाच हवा,” असं किशन म्हणाला. ईशान किशनसाठी या मालिकेची सुरूवात फारशी चांगली नव्हती. दोन वर्षांहून अधिक काळानंतर भारतीय संघात पुनरागमन करताना पहिल्या टी-२० सामन्यात तो केवळ ८ धावा करत बाद झाला. मात्र, त्यानंतर त्याने जबरदस्त पुनरागमन करत दुसऱ्या सामन्यात मॅचविनिंग ३२ चेंडूत ७६ धावांची झंझावाती खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर भारताने २०९ धावांचं लक्ष्य अवघ्या १५.२ षटकांत गाठलं.
29 shares
😊