Achira News Logo
Achira News
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 08:29 AM
रोहित शर्माच्या पुनरागमनामुळे मुंबईचा लखनौवर दणदणीत विजय

रोहित शर्माच्या पुनरागमनामुळे मुंबईचा लखनौवर दणदणीत विजय

मुंबई :आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या सामन्याच्या वेळी रोहित शर्मा जायबंदी झाला, तेव्हापासून तो प्रत्येक सामन्यापूर्वी सराव करीत होता. मात्र, त्याला 'इम्पॅक्ट प्लेअर' म्हणूनही निवडले जात नव्हते. मात्र, आता सोमवारी झालेल्या लखनौविरुद्धच्या सामन्याच्या वेळी सूर्यकुमार यादवने आपला रोहित परतलाय असे सांगताच वानखेडे स्टेडियमवर टाळ्यांचा कडकडाट झाला. मात्र या सामन्यामध्ये नियमित कर्णधार हार्दिक पांडयासुद्धा प्रकृती ठीक नसल्यामुळे तो खेळू शकला नाही, असे सूर्याने नाणेफेकीच्या वेळी सांगितले. या लढतीचे नेतृत्व सूर्याने केले. या सामन्यामध्ये सामनावीर म्हणून रायन रिकल्टन याला गौरवण्यात आले. सामना संपल्यावर रायन रिकल्टन याने हार्दिकच्या दुखापतीबाबत अपडेट दिली आहे.रायन रिकल्टन काय म्हणाला?मला माहित नाही की पुनम का परत कधी येईल. मला दुपारी समजले की त्याच्या पाठीचे स्नायू दुखावले गेले आहेत, त्यामुळे मला दुखापत नेमकी किती गंभीर आहे माहिती नाही. एक तर मी पूर्णपणे दुखापत म्हणू शकत नाही कारण ती किती गंभीर आहे त्याला काय होत आहे याबद्दल मला काहीच कल्पना नाही. पण मला एक खात्री आहे की आम्ही या आठवड्यात रायपूरला जात आहोत त्यावेळी तो संघासोबत असेल, असंरायन रिकल्टनयाने सांगितलं.MI vs LSG: 'रोहित-रिकल्टन तर आहेच पण आणखी एक मॅचविनर ज्याने मॅच जिंकवली' विजयानंतर सूर्याकडून आर्वजून उल्लेखवानखेडे स्टेडियमवरील या सामन्याच्या नाणेफेकीच्यावेळी 'मुंबई'चा बदली कर्णधार सूर्यकुमार यादवने आपला रोहित शर्मा खेळणार आहे, असे जाहीर केल्यावर चाहत्यांना टाळ्यांचा कडकडाट केला होता. रोहितने जणू आकर्षक खेळी करून आपल्याला साथ देणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले. स्फोटक सुरुवातीनंतर 'लखनऊ'ला २२८ धावांत रोखण्यात 'मुंबई'ला यश आले होते. रोहित आणि रायन रिकल्टन या 'मुंबई'च्या सलामीवीरांनी चौकार षटकारांचा धडाका लावला. दोघांनी पॉवरप्लेमध्ये ७० धावांचा चोप दिला, त्यांनी ६५ चेंडूंत १४३ धावांची भागीदारी करून 'मुंबई' च्या विजयाचा पाया रचला. रोहित शतकापासून दूर राहिला, पण तो परतला, त्यावेळी 'मुंबई'चा विजय स्पष्ट झाला होता.MI vs LSG : लखनौला लोळवल्यावर मुंबई इंडियन्ससाठी प्ले ऑफचं कसं असणार समीकरण? जाणून घ्यात्याआधी निकोलस पूरन आणि मिचेल मार्श मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची पिसे काढत होते. लखनऊ सुपर जायंट्सने अवघ्या ८ षटकांत १२३ धावांचा चोप दिला होता. मात्र त्यानंतर 'मुंबई'ने लागोपाठ विकेट घेताना धावगतीसही खीळ घातली. मात्र दोन धावांवर 'जीवदान' लाभलेल्या हिंमत सिंगने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करीत 'लखनऊ'ला दोनशेच्या पार नेले. 'लखनऊ'ने या मोसमातील पहिले द्विशतक अखेर त्यांच्या नवव्या सामन्यात गाठले.
52 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 5, 2026, 07:42 AM
अशोक डिंडा आमदारपदाची निवडणूक जिंकलेः पत्नीच्या पाठिंब्यामुळे त्यांच्या यशाची गुरुकिल्ली

अशोक डिंडा आमदारपदाची निवडणूक जिंकलेः पत्नीच्या पाठिंब्यामुळे त्यांच्या यशाची गुरुकिल्ली

कोलकाता -भाजपाच्यातिकिटावर सलग दुसऱ्यांदा पश्चिम बंगालमधून आमदार बनलेल्या माजी क्रिकेटर अशोक दिंडा यांच्या यशामागे लेडी लक हादेखील मोठा फॅक्टर आहे. २००९ ते २०१३ या काळात भारतीय टीमसाठी २२ आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या अशोक दिंडा यांची पत्नीही स्पोर्टस लव्हर आहे. आता ती राजकारणात पतीच्या पाठीशी ठामपणे काम करते. अशोक दिंडा यांच्या यशामागे त्यांची पत्नी श्रेयसी रुद्र यांचाही हात आहे. मात्र या दोघांच्या प्रेमाची कहाणीही हटके आहे. अशोक दिंडाच्या पत्नीचे नाव श्रेयसी रुद्र आहे. २०१३ साली अशोक दिंडा यांच्यासोबत लग्नानंतर भलेही श्रेयसी होम मेकर बनल्या असल्या तरी त्या आधी सॉफ्टवेअर इंजिनिअर होत्या. श्रेयसी यांना क्रिकेटचा नाद होता. बऱ्याचदा आयपीएल सामन्यात अशोक दिंडा क्रिकेट खेळताना श्रेयसी कायम स्टेडियममध्ये पोहचून चिअर करायच्या. श्रेयसीच नव्हे तर तिची आजीही क्रिकेटची चाहती आहे. अशोक दिंडा यांनी त्यांच्या एका मुलाखतीत पत्नीच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. या दोघांचे लव्ह मॅरेज झाले होते. एका पार्टीत दोघे भेटले होते, तिथून दोघांमध्ये बोलणं सुरू झाले. एकमेकांना ते भेटू लागले. दोघांना एकमेकांचा सहवास आवडू लागला. परंतु नंबर घेण्याची दोघांची हिंमत होत नव्हती. एका मित्राकडून अशोक दिंडा यांनी श्रेयसीचा नंबर घेतला. त्यानंतर मोबाईलवर संवाद होऊ लागला. या दोघांची प्रेम कहाणी ४ वर्ष चालली. त्यानंतर २२ जुलै २०१३ साली या जोडप्यांनी लग्न केले. हे दोघे रिलेशनशिपमध्ये असताना अडीच वर्षांनी श्रेयसीला अशोक दिंडा यांनी त्यांच्या आईला भेटवले. अशोक दिंडा यांनी संकोचाने आईला आपल्या भावनांबद्दल सांगितले, कारण आई या लग्नाला होकार देणार नाही असं त्यांना वाटत होते आणि तसेच काहीसे घडलेही, पण शेवटी प्रेमाचा विजय झाला आणि त्यांची आई तयार झाली. ५ टीमसोबत खेळलेत IPL दरम्यान, अशोक दिंडा कोलकाता नाईट रायडर्स, पुणे वॉरियर्स, राइजिंग पुणे सुपरजायंट्ससोबत रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू या टीमसोबत आयपीएल खेळले आहेत. २५ मार्च १९८४ रोजी जन्मलेल्या अशोक दिंडा यांनी ७८ आयपीएल सामन्यांमध्ये ६९ बळी घेतले आहेत. भारतीय संघासाठी त्यांनी १३ एकदिवसीय सामन्यांमध्ये १२ बळी आणि नऊ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १७ बळी घेतले आहेत. ज्याप्रमाणे ममता बॅनर्जी यांनी माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी यांची त्यांच्या सरकारमध्ये क्रीडा मंत्री म्हणून नियुक्ती केली, त्याचप्रमाणेभाजपासरकारमध्ये अशोक दिंडा यांच्याकडेही क्रीडा मंत्रालयाचा कार्यभार सोपवला जाऊ शकतो अशी चर्चा आहे.
73 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 06:09 AM
मुंबई इंडियन्सचा लखनऊ सुपर जायंट्सवर दणदणीत विजय, रोहित शर्मा चमकला

मुंबई इंडियन्सचा लखनऊ सुपर जायंट्सवर दणदणीत विजय, रोहित शर्मा चमकला

मुंबई :मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला अखेर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवण्याचा निर्णय घेतला. रोहितने प्रभावशाली कामगिरी करताना ८४ धावांची आक्रमक खेळी केली. त्याच्या या कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सने आयपीएल टी-२० क्रिकेटमध्ये सोमवारी लखनऊ सुपर जायंट्सचा ८ चेंडू आणि ६ विकेट राखून सहज पराभव केला. या विजयामुळे 'मुंबई'च्या प्लेऑफच्या धूसर आशा कायम राहिल्या. या पराभवामुळे 'लखनऊ'च्या प्ले ऑफच्या आशा संपुष्टात आल्या. यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याने या सामन्यामध्ये 3 नो बॉल टाकले असून आयपीएलमध्ये सर्वाधिक नो बॉल टाकण्याचा नकोसा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. याचाच धागा पकडत सुनील गावसकर यांनी यावर आपली प्रतिकिया दिली आहे.सुनील गावसकर काय म्हणाले?मला पुन्हा नका बोलू, नका बोलू की बुमराहने नो बॉल टाकला आहे. कारण हे मान्यच करू शकत नाही. कारण तुम्ही एक प्रोफेशनल क्रिकेटर आहात, त्याच्यामुळे हे कधीच स्वीकारलं जाणार नाही. एकवेळ वाईड बॉल चालेल मी समजू शकतो पण नो बॉल अजिबातच नाही, असंसुनील गावसकरयांनी म्हटलं आहे. बुमराहने ज्यावेळी नॉ बॉल टाकला होता. त्यावेळी त्याला विकेट मिळाली होती. यादरम्यानच कॉमेन्ट्री करताना गावसकरांनी संताप व्यक्त केला. बुमराहने ४ ओव्हरमध्ये ४५ धावा खर्च केल्या मात्र त्याला एकही विकेट घेता आली नाही.MI vs LSG : रोहित आणि रिकल्टन खेळलेच पण मुंबईने खरी मॅच कुठे फिरवली? कॅप्टन ऋषभ पंतने सांगितला टर्निंग पॉइंटसामन्याचा धावता आढावावानखेडे स्टेडियमवरील वाढत्या उकाड्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय 'मुंबई'ला काहीसा भोवला. जोस इंग्लिस त्याच्या या मोसमातील पहिल्या सामन्यात अपयशी ठरला. मात्र, मिचेल मार्श आणि निकोलस पूरनचे धावांचे तुफान 'मुंबई'त धडकले. मात्र, हे दोघे परतल्यावर धावगती आक्रसली. पहिल्या सहा षटकांत ८ चौकार आणि सात षटकार फटकावणाऱ्या 'लखनी' ला त्यानंतरच्या नऊ षटकांत केवळ एक चौकार आणि सहा षटकारच मारता आले. अखेरच्या पाच षटकांत तर केवळ ५३ धावाच होऊ शकल्या.MI vs LSG: 'रोहित-रिकल्टन तर आहेच पण आणखी एक मॅचविनर ज्याने मॅच जिंकवली' विजयानंतर सूर्याकडून आर्वजून उल्लेखपॉवरप्लेमध्ये 'लखनी'ने १ बाद १० धावा केल्या होत्या. पूरनने षटकारांची माळ लावल्यामुळे कर्णधार सूर्यकुमार यादवला काय करावे हेच कळत नव्हते. अखेर बॉशने पूरन आणि मार्शला एकाच षटकात बाद केले. या जोडीने ३५ चेंडूंत ९४ धावांची भागीदारी रचली. याच षटकात रिषभ पंत बाद होताना वाचला. मात्र, त्यानंतर पंत आणि 'लखनौ'च्या मधल्या फळीतील फलंदाजांना काहीच करता येत नव्हते. त्यामुळे 'लखनौ'चा डाव ८.१ षटकांत १ बाद १२३वरून १२.१ षटकांत ५ बाद १६० असा घसरला होता. हिंमतसिंग दोन धावांवर असताना झेलबाद झाला होता. मात्र, जसप्रीत बुमराहचा तो नो-बॉल ठरला. याच हिंमतने मार्करमसह ४९ चेंडूंत ६८ धावा जोडल्या आणि 'लखनौ'ने आश्वासक धावसंख्या उभारली. 'मुंबई'च्या गोलंदाजांनी डावाच्या उत्तरार्धात चांगला मारा केला. त्यामुळे 'लखनौ'ने मोठी धावसंख्येची संधी गमावली.
87 shares
😢
Pudhari logo
Pudhari
May 5, 2026, 04:48 AM
सलग नो बॉल खेळल्याबद्दल गावसकरने बुमराला फटकारलेः'कधीही स्वीकारले जाऊ शकत नाही'

सलग नो बॉल खेळल्याबद्दल गावसकरने बुमराला फटकारलेः'कधीही स्वीकारले जाऊ शकत नाही'

याबाबत बोलताना गावसकर म्हणाले, 'जसप्रीत बुमराहने नो बॉ टाकला हे मला सांगू नका. ते कदापी मान्य नाही. कधीच मान्य होणा रनाही. तू एक व्यावसायिक क्रिकेटपटू आहेस. त्यामुळं हे स्वाकारार्ह्य नाहीच. वाईड बॉल... मी समजू शकतो. मात्र नो बॉल अजिबात नाही.' गावसकरांनी समालोचन करत असताना दिग्गज बुमराहचे असे कान टोचले. जसप्रीत बुमराहने १४ व्या षटकात सलग दोन नो बॉल टाकले. त्यानंतर कॅमेरा मुंबईचे प्रमुख प्रशिक्षक महेला जयवर्धनेवर पॅन झाला. तिथं लसित मलिंगा देखील होता. ते बुमराहच्या नो बॉलनंतर नि:शब्द होते.
48 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 04:23 AM
2016 च्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सचा तिसरा विजय

2016 च्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सचा तिसरा विजय

मुंबई :आयपीएल 2016 मधील 47 वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. या सामन्यामध्ये मुंबईचे शिलेदारांनी 6 विकेटने दमदार विजय मिळवला. या सामन्यामध्ये रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन या दोघांच्या तुफानी अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने सहज विजय मिळवला. मुंबईने हा विजय मिळवत आपला तिसरा विजय साकारला आहे. मुंबईने आतापर्यंत 10 सामने खेळले असून त्यामधील तीन सामन्यात त्यांना विजय मिळवता आला असून सात सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईला विजय मिळूनही पॉइंट टेबल मध्ये काही खास झेप घेता आली नाही. मुंबई जिंकूनही नवव्या स्थानावर कायम आहे. लखनौ हरवल्यानंतर मुंबईच्या चाहत्यांना प्ले ऑफची आशा कायम आहे, मात्र संपूर्ण समीकरण जाणून घ्या.मुंबई इंडियन्ससंघाचे फक्त चार सामने बाकी आहेत. या चारही सामन्यांमध्ये मुंबईला विजय मिळवावाच लागणार आहे. मुंबईने जर या चार सामन्यांमध्ये विजय मिळवला तर त्यांचे 14 गुण होतील. येत्या दहा तारखेलाआरसीबी14 मेला पंजाब किंग्स, 20 मे ला कोलकाता नाईट रायडर्स आणि 24 मेला राजस्थान रॉयल्स संघासोबत सामना होणार आहे.MI vs LSG : रोहित आणि रिकल्टन खेळलेच पण मुंबईने खरी मॅच कुठे फिरवली? कॅप्टन ऋषभ पंतने सांगितला टर्निंग पॉइंटमुंबईला या सामन्यांमध्ये फक्त विजयच मिळवायचा नाही तर त्यासोबत नेट रन रेटवरही लक्ष द्यावे लागणार आहे. मुंबईने हे सर्व करूनही अंतिम विचार मध्ये त्यांची जागा पक्की नाही. त्याचं कारण म्हणजे पॉइंट टेबल मध्ये टॉप पाच मध्ये असलेल्या संघांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. त्यामुळे जर दरवळ संपूर्ण समीकरण मुंबईचा अवलंबून असणार आहे. पुढील सामन्यांमध्ये सर्व काही स्पष्ट होईल.MI vs LSG: 'रोहित-रिकल्टन तर आहेच पण आणखी एक मॅचविनर ज्याने मॅच जिंकवली' विजयानंतर सूर्याकडून आर्वजून उल्लेखसामन्याचा धावता आढावामुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघामध्ये रविवारी वानखेडेवर सामना पार पडला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनौने २० ओव्हरमध्ये २२८-५ धावा केल्या होत्या. निकोलस पूरने याने २१ चेंडूत ६३ धावांचे धमाकेदार खेळी केली केली होती. मात्र मुंबईकडून १८.४ ओव्हरमध्येच हे आव्हान पूर्ण झाले. रोहित शर्माने सर्वाधिक ८४ धावा तर रायन रिकल्टन याने ८३ धावा करत विजयाचा पाया रचला.
100 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 5, 2026, 03:19 AM
आयपीएलच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा लखनौ सुपर जायंट्सवर सहा गडी राखून विजय

आयपीएलच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा लखनौ सुपर जायंट्सवर सहा गडी राखून विजय

मुंबई :रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनच्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स संघावर सहा विकेट आणि आठ चेंडू राखून मात केली. 'लखनौ'ने ५ बाद २२८ धावा केल्या होत्या. 'मुंबई'ने विजयी लक्ष्य १८.४ षटकांत चार विकेटच्या मोबदल्यात पार केले. घरच्या मैदानावरील मागील सलग चार लढतीतील पराभवानंतर 'मुंबई' ने विजय मिळवला. हा सामना नेमका कुठे फिरला हे कॅप्टन ऋषभ पंत याने सांगितले आहे.नक्कीच काही धावा कमी पडल्या. कारण आम्ही जशी सुरूवात केली होती ते पाहून मला वाटतं अजून धावा व्हायला पाहिजे होत्या. सगळेजण मोकळेपणाने खेळले, पण शेवटी त्यांनी चांगली बॉलिंग केली.मुंबई इंडियन्सलाअशा परिस्थितीची सवय आहे. आम्ही १० ते १५ धावांनी कमी पडलो. कारण या पिचवर २३० धावा होणार होत्या. आम्हाला आणखी मेहनत करण्याची गरज आहे, असंऋषभ पंतम्हणाला.MI vs LSG: 'रोहित-रिकल्टन तर आहेच पण आणखी एक मॅचविनर ज्याने मॅच जिंकवली' विजयानंतर सूर्याकडून आर्वजून उल्लेखलखनौने पहिल्या सहा ओव्हरमध्ये ९०-१ धावा, ७ ते १६ ओव्हरमध्ये १०२-४ धावा केल्या होत्या पण शेवटच्या १७ ते २० ओव्हरमध्ये म्हणजेच २४ चेंडूत ११ धावाच करत आल्या. इथेच सामना फिरला, चांगल्या सुरूवातीनंतर लखनौ २५० धावांचा टप्पा पार करेल असं वाटलं होतं पण तसं काही झालं नाही.MI vs LSG: मुंबईचा राजा आला अन् पलटण जिंकली; रो'हिट' खेळीच्या जीवावर वानखेडेत दमदार विजयलक्ष्याचा पाठलाग करताना रायन रिकल्टन आणि रोहित शर्मा यांनी पॉवरप्लेमधील पहिल्या सहा षटकांत बिनबाद ७१ अशी आश्वासक सुरुवात केली. या जोडीने १०.५ षटकांत १४३ धावांची सलामी दिली. याच मैदानावर यंदाच्या मोसमात 'वानखेडे' वर रोहित-रिकल्टनने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध १४८ धावांची सलामी दिली होती. या जोडीने तिसऱ्यांदा शंभरहून अधिक धावांची भागीदारी रचली. रिकल्टनने २२ चेंडूंत, तर रोहितने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले मात्र दोघांनाही शतक पूर्ण करता आले नाही. तिलक वर्माही पाठोपाठ परतला. सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा अपयशी ठरला. नमन धीर आणि विल जॅक्सने १९व्या षटकात विजय मिळवला.
39 shares
😊
M
Maharashtra Times
May 4, 2026, 06:55 PM
मुंबईचा लखनऊ सुपर जायंट्सवर दणदणीत विजय

मुंबईचा लखनऊ सुपर जायंट्सवर दणदणीत विजय

मुंबई:मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायट्ंसमध्ये सामना रंगला. वानखेडेमधील या सामन्यात आज मुंबईला विजय मिळाला आहे. मुंबईने नाणेफेक जिंकली आणि कर्णधार सूर्यकुमार यादव ने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लखनौने 228 धावा केल्या आणि मुंबईने 229 धावा केल्या सामना 6 विकेट्स राखून जिंकला. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव काय म्हणाला पाहा.पॉवरप्लेमध्ये 90 धावा दिल्यानंतर स्ट्रॅटेजिक ब्रेक दरम्यान झालेल्या संभाषणाचा खुलासासूर्यकुमार यादवनेकेला. त्याने कबूल केले की "या मोसमात ते अनेकदा अशाच परिस्थितीत सापडले होते, पण काही विकेट्स घेऊन ते खेळावर नियंत्रण मिळवू शकतात हे त्यांना माहीत होते. त्याने गोलंदाजांचे कौतुक केले आणि म्हटले की त्यांनी मोठे धैर्य दाखवून एलएसजीला त्या धावसंख्येवर रोखून एक उल्लेखनीय पुनरागमन केले. त्याने पुढे सांगितले की गोलंदाजांकडे त्यांच्या योजना होत्या आणि फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची गरज होती; त्यांनी दाखवलेले धैर्य कौतुकास्पद होते."MI vs LSG: बुमराहकडून अशी अपेक्षा नव्हती; मुंबईला ज्याची भीती होती पुन्हा तेचं घडलं; वानखेडेवर सर्वात मोठे अपयशफलंदाजीला जाण्यापूर्वी झालेल्या चर्चेबद्दल बोलताना, "सूर्यकुमारने एका मागील सामन्याची आठवण सांगितली, ज्यात मुंबईने 240 धावा केल्या होत्या, पण तरीही सनरायझर्सने लक्ष्याचा पाठलाग केला होता. तो म्हणाला की त्याला माहीत होते की लक्ष्य गाठण्यासारखे आहे आणि त्याचा विचार स्पष्ट होता. त्याने संघाच्या भक्कम सुरुवातीची नोंद घेतली, रिकल्टनच्या शानदार खेळीचे कौतुक केले आणि रोहित शर्मासाठी काही खास शब्द वापरले, जो पूर्ण तयारीने मैदानात उतरला आणि आपल्या अनोख्या शैलीत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. सलामीच्या भागीदारीबद्दल तो म्हणाला की, मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरुवात नेहमीच महत्त्वाची असते; त्याने नेमकी गरज असलेली कामगिरी केल्याबद्दल रोहित आणि रिकल्टन यांना श्रेय दिले, तसेच नमन धीर आणि संघातील इतर खेळाडूंच्या योगदानाचीही प्रशंसा केली."आता मुंबईला पुढील सगळे सामना जिंकावे लागणार आहेत तसेच प्लेऑफसाठी उतर संघावर अवलंबून राहावे लागणार आहे.
95 shares
😊
Lokmat logo
Lokmat
May 4, 2026, 04:44 PM
बुमराच्या नो-बॉल आणि वाईड बॉल्सने मुंबई इंडियन्सचा लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा आयपीएल सामना खराब केला

बुमराच्या नो-बॉल आणि वाईड बॉल्सने मुंबई इंडियन्सचा लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा आयपीएल सामना खराब केला

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात जसप्रीत बुमराहचा फॉर्ममुंबई इंडियन्ससाठीचिंतेचा विषय राहिला आहे. लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या वानखेडेच्या मैदानातील सामन्यात बुमराहची पाटी पुन्हा कोरीच राहिली. या सामन्यात हिम्मत सिंगच्या रुपात त्याने एक विकेट खात्यात जमा केली. पण तोच चेंडू नो बॉल ठरला अन् त्याच्या विकेटचा आनंद सायनरसोबत क्षणात नाहीसा झाला. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! नो बॉलमुळे बुमराह विकेटलेस राहिला, गावसकरांनीही झापलं 🔴 SUNIL GAVASKAR CRITICISE BUMRAH’S NO BALL 🤯🎙️ - “this is not acceptable, you are a professional cricketer, wide, I can understand but bowling no-ball, it’s clearly not acceptable” [Sky Sports]pic.twitter.com/qCWsgM556B लखनौच्या डावातील १४ व्या षटकात तिसरा चेंडू नो बॉल टाकल्यावर त्याने एक वाइड चेंडू टाकल्यावर पुन्हा नो बॉल टाकला. यावर सामन्यादरम्यान समोलचन करणाऱ्या लिटल मास्टरसुनील गावसकरांनीहीदिग्गज गोलंदाजाला झापल्याचे पाहायला मिळाले. एकवेळ वाइड बॉल समजू शकतो, पण त्याच्याकडून ओव्हर स्टेप नो बॉल अपेक्षित नाही, अशा शब्दांत गावसकरांनी नाराजी व्यक्त केली. त्यांची ही कमेंट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण... नेमकं काय म्हणाले गावसकर? जसप्रीत बुमराहनं एकाच षटकात दोन नो बॉल टाकल्यावर गावसकरांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, "हे अजिबात स्वीकारार्ह नाही. तू एक प्रोफेशनल क्रिकेटर आहेस. वाइड समजू शकतो, पण नो-बॉल टाकणं हे अजिबात पटण्याजोगे नाही." जसप्रीत बुमराहनं या सामन्यातील ३ बॉलसह यंदाच्या हंगामात ७ नो बॉल टाकले आहेत. क्रिकेट जगतातील सर्वोत्तम गोलंदाजाची ही कामगिरी खटकणारी अशीच आहे. बुमराहसाठी खराब हंगाम, पुन्हा विकेटची पाटी राहिली कोरी यंदाचा हंगामातमुंबई इंडियन्ससहजसप्रीत बुमराहसाठी भयावह स्वप्नासारखाच राहिला आहे. पहिल्या पाच सामन्यात त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. पहिल्या ९ सामन्यात त्याने ३३ षटकात २८४ धावा खर्च करत फक्त ३ विकेट्स घेतल्या. लखनौ विरुद्धच्या सामन्यात ४ षटकात ४५ धावा देत तो पुन्हा विकेटलेस राहिला.
68 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 4, 2026, 02:10 PM
मुंबई इंडियन्सच्या लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या पुढील सामन्यातून हार्दिक पांड्या बाहेर

मुंबई इंडियन्सच्या लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या पुढील सामन्यातून हार्दिक पांड्या बाहेर

मुंबई:आयपीएल 2026 मध्ये सलग पराभवांनी त्रस्त असलेल्या मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. पाच वेळचे चॅम्पियन आणि प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी धडपडणाऱ्या मुंबईला त्यांच्या पुढील सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याशिवाय खेळावे लागणार आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या 'करा किंवा मरा' सामन्यातून हार्दिक पांड्या बाहेर झाला आहे. त्याच्या जागी सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करेल. मात्र, संघाला मोठा दिलासा मिळाला आहे.आपल्या घरच्या मैदानावर, वानखेडे स्टेडियमवर, सलग चार पराभवांनंतरमुंबई इंडियन्सचा सामना लखनौविरुद्धच्या सामन्यातस्टार फलंदाज सूर्यकुमार यादवशी झाला. नाणेफेकीपूर्वी संघाच्या सरावादरम्यान हार्दिक पांड्या दिसला नाही. सूर्याने स्पष्ट केले की हार्दिकची प्रकृती ठीक नसल्यामुळे तो या सामन्यात खेळू शकणार नाही. या हंगामात हार्दिक पांड्या खेळत नसण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, फिटनेसच्या समस्यांमुळे हार्दिक दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. तेव्हाही सूर्याने संघाची जबाबदारी सांभाळली होती. मात्र, मुंबई तो सामना हरली होती. यावेळी सूर्या संघाचे नशीब बदलू शकतो की नाही, हे पाहणे मनोरंजक ठरेल.मुंबईसाठी एक मोठा दिलासा म्हणून, रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त होऊन संघात परतला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना रोहितला दुखापत झाली होती. त्याच्या उजव्या हॅमस्ट्रिंगमध्ये समस्या निर्माण झाली, ज्यामुळे त्याला दुखापतग्रस्त होऊन मैदान सोडावे लागले आणि तो पुन्हा फलंदाजी करू शकला नाही. तेव्हापासून रोहित दुखापतीमुळे मैदानाबाहेर होता. आता, सलग पाच सामन्यांनंतर तो परतला आहे. मात्र, तो केवळ बदली खेळाडू म्हणून फलंदाजी करेल.हार्दिक व्यतिरिक्त, ट्रेंट बोल्टदेखील या सामन्यातून बाहेर आहे. हार्दिकच्या जागी रोहितचे संघात पुनरागमन झाले आहे, तर बोल्टच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू कॉर्बिन बॉशचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईकडून पराभवाची मालिका झाल्यामुळे ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ संघानेही आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. जोश इंग्लिस या सामन्यात एलएसजीकडून पदार्पण करत आहे, तर अक्षत रघुवंशी आयपीएलमध्ये पदार्पण करत आहे. आयुष बडोनी आणि मुकुल चौधरी या सामन्यातून बाहेर आहेत.
60 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 4, 2026, 02:00 PM
IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्यात रोहित शर्माच्या पुनरागमनामुळे सूर्यकुमार यादवला संधी

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्यात रोहित शर्माच्या पुनरागमनामुळे सूर्यकुमार यादवला संधी

IPL 2026 MI vs LSG : आयपीएल २०२६ स्पर्धेत संघर्षाचा सामना करणारामुंबई इंडियन्सचासंघ वानखेडेच्या घरच्या मैदानातील लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या सामन्यात मोठ्या बदलासह मैदानात उतरला आहे. नियमित कर्णधारहार्दिक पांड्याप्लेइंग इलेव्हनमधून आउट झाला असून त्याच्या जागीसूर्यकुमार यादवनाणेफेकीसाठी मैदानात आल्याचे पाहायला मिळाले. त्याने नाणेफेक जिंकल्यावर पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुखापतीतून सावरून रोहित शर्मा या सामन्यातून कमबॅक करत असल्याचे सांगतानाहार्दिक पांड्यासंघात का नाही? तेहीसूर्यकुमार यादवनंनाणेफेकीच्या वेळी स्पष्ट केले. 🚨 Toss Update 🚨@mipaltanwon the toss and elected to field against@LucknowIPL.Surya Kumar Yadav is captaining#MIas Hardik Panyda is unwell.Updates ▶️https://t.co/elXSOvaeig#TATAIPL|#KhelBindaas|#MIvLSGpic.twitter.com/eQjzr2GXrm मुंबई इंडियन्सवरका आली कॅप्टन बदलण्याची वेळ? आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सूर्यकुमार यादव दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. यंदाच्या हंगामातील MI च्या खराब कामगिरीमुळे हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत होत असताना हा बदल अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थितीत करणारा आहे. पण नाणेफेकीनंतर सूर्यानं MI च्या ताफ्यातील नेतृत्वाबदलामागचं खरं कारण स्पष्ट केले. हार्दिक पांड्याची तब्येत ठिक नाही, त्यामुळे तो या सामन्यासाठी उपलब्ध नाही, असे सूर्याने सांगितले. मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन : रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक/फलंदाज.), नमन धीर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, विल जॅक्स, राज बावा, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, एएम गझनफर, रघु शर्मा लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हनमिचेल मार्श, एडन मार्कराम, रिषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), जोश इंग्लिस, निकोलस पूरन, अक्षत रघुवंशी, हिम्मत सिंग, मोहम्मद शमी, मोहसीन खान, आवेश खान, प्रिन्स यादव
11 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 4, 2026, 12:58 PM
'ग्लोरी'नेटफ्लिक्स मालिका प्रचंड यशस्वी ठरली, अलीकडील इतर चित्रपटांना मागे टाकले

'ग्लोरी'नेटफ्लिक्स मालिका प्रचंड यशस्वी ठरली, अलीकडील इतर चित्रपटांना मागे टाकले

ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच प्रदर्शित झालेली एक नवी वेब सीरिज सध्या प्रचंड चर्चेत आहे. नेटफ्लिक्सवर आलेली ही सीरिज अवघ्या काही दिवसांतच नंबर-१ ट्रेंडिंग ठरली असून इतर नव्या सीरिजनाही मागे टाकलं आहे. ही ७ एपिसोड्सची सीरिज असून प्रत्येक भाग प्रेक्षकांना खिळवून ठेवतो आहे. या सीरिजला IMD वर ७.१ रेटिंग मिळालं आहे. क्राइम, मिस्ट्री आणि थ्रिलने भरलेली ही स्पोर्ट्स ड्रामा सीरिज आहे. विशेष म्हणजे, या सीरिजने दोन आठवड्यांपासून टॉपवर असलेल्या If Wishes Could Kill या साऊथ कोरियन थ्रिलरला मागे टाकलं आहे. या सीरिजचं नाव आहे Glory. हरियाणाच्या पार्श्वभूमीवर आधारित ही कथा दोन भावांभोवती फिरते. या कथेत देव (दिव्येंदु शर्मा) आणि रवि (पुलकित सम्राट) हे दोन विभक्त भाऊ बहिणी गुडिया (जन्नत जुबैर) वर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचं आणि तिच्या बॉक्सर प्रियकर निहाल सिंगच्या हत्येचं गूढ उलगडण्यासाठी घरी परततात. या तपासादरम्यान त्यांना अनेक धोक्यांना सामोरं जावं लागतं. ही कथा सूड, नात्यांमधील गुंतागुंत आणि ऑलिम्पिकमध्ये जाण्याच्या स्वप्नाभोवती फिरते. शेवटचा क्लायमॅक्स इतका थरारक आहे की प्रेक्षक थक्क होतात. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या सीरिजमध्ये दिव्येंदु शर्मा, पुलकित सम्राट, सुविंदर विक्की, आशुतोष राणा, सायानी गुप्ता, जन्नत जुबैर आणि कुणाल ठाकुर यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सध्या ही सीरिज नेटफ्लिक्स वर स्ट्रीम होत असून, अवघ्या काही दिवसांतच तिने ट्रेंडिंग लिस्टमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.
87 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 4, 2026, 12:43 PM
तेंडुलकर कुटुंबाचा वादः आयपीएल सामन्यात अर्जुनने घेतला सचिनचा वारसा स्वीकारला

तेंडुलकर कुटुंबाचा वादः आयपीएल सामन्यात अर्जुनने घेतला सचिनचा वारसा स्वीकारला

Sachin Tendulkar vs Arjun Tendulkar : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरमुंबई इंडियन्सआणि लखनौ सुपर जाएंट्स यांच्यात आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ४७ वा सामना रंगणार आहे. गुणतालिकेत तळाशी असलेल्या या दोन्ही संघांच्या लढतीत एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार आहे. IPL इतिहासात पहिल्यांदाच बाप-लेकांच्या संघात आमनेसामने टक्कर होणार आहे. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! सचिन तेंडुलकरविरुद्धअर्जुन तेंडुलकरअशी लढत मुंबई इंडियन्सआणि लखनौ सुपर जाएंट्स यांच्यातील लढतीला मास्टर ब्लास्टरसचिन तेंडुलकरविरुद्धअर्जुन तेंडुलकरअसे स्वरुप आले आहे. २०२५ च्या हंगामापर्यंत सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर ही बाप लेकाची जोडी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात होती. पण यंदाच्या हंगामाआधी ट्रेडच्या माध्यमातून अर्जुन तेंडुलकर लखनौच्या ताफ्यात सामील झाला. त्यामुळेच आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच बाप लेकांचे संघ एकमेकांविरुद्ध खेळतानाचा खास क्षण अनुभवायला मिळणार आहे. 'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार? अर्जुन तेंडुलकरला नव्या संघाकडून पदार्पणाची संधी मिळणार? आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्ससोबत आहे. सुरुवातीच्या काळात MI संघाचे नेतृत्व केल्यावर सध्याच्या घडीला सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचा मेंटॉर आहे. दुसरीकडे अर्जुन तेंडुलकर लखनौच्या संघाकडून पदार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. त्याच्या पदार्पणाच्या संधीसह हा सामना आणखी खास ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल. अर्जुन तेंडुलकरनं २०२३ मध्ये MI च्या संघाकडून पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने फक्त ५ सामने खेळले असून यात त्याने ३ विकेट्स घेतल्या आहेत. MI सह LSG तळाला! आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पाच वेळच्या मुंबई इंडियन्ससह लखनौ सुपर जाएंट्सची अवस्था बिकट आहे. ९ सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ फक्त २ विजयासह ४ गुणांची कमाई करून नवव्या स्थानावर आहे. दुसऱ्या बाजूला ८ सामन्यानंतर लखनौचा संघ २ विजयासह सर्वात तळाला आहे. लखनौचा संघ उर्वरित पाच सामने जिंकून अजूनही स्वबळावर प्लेऑफ्स गाठू शकतो. दुसरीकडे MI ला सर्व सामने जिंकले तरी अन्य संघांच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे.
1 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 4, 2026, 06:26 AM
राजस्थान रॉयल्सकडून लक्ष्मी मित्तलच्या कुटुंबाची आयपीएल फ्रँचायझी खरेदी

राजस्थान रॉयल्सकडून लक्ष्मी मित्तलच्या कुटुंबाची आयपीएल फ्रँचायझी खरेदी

Rajasthan Royals Acquisition:आयपीएलच्या विश्वात एक मोठा बदल घडून आला आहे. भारतीय वंशाचे अब्जाधीश उद्योगपती लक्ष्मी मित्तल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी राजस्थान रॉयल्स फ्रॅन्चायसीत मालकी हिस्सा खरेदी केला आहे. 2008 च्या पहिल्या-वहिल्या आयपीएल विजेत्या फ्रँचायझीत हिस्सेदारी विकत घेतल्यास वृत्त समोर आले आणि क्रिकेट आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये खळबळ उडवून दिली.राजस्थान रॉयल्सचे नवीन मालकनेमके किती श्रीमंत आहेत? जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.कोण आहेत लक्ष्मी मित्तलआपल्या स्टील (पोलाद) व्यवसायासाठी प्रख्यात भारतीय अब्जाधीश लक्ष्मी मित्तल आता क्रिकेटच्या मैदानावरही आपली छाप सोडण्यास सज्ज आहेत. लक्ष्मी निवास मित्तल आणि त्यांचे पुत्र आदित्य मित्तल यांनी आदर पूनावाला यांच्यासोबत मिळून $1.65 अब्ज (सुमारे 15,600 कोटी रुपये) ची बोली लावून राजस्थान रॉयल्समधील सर्वात मोठा हिस्सा काबीज केला, पण लक्ष्मी मित्तल यांच्यासाठी ही काही नवीन गोष्ट नाही. राजस्थानच्या रस्त्यांवरून पुढे येऊन जगातील सर्वात मोठी पोलाद कंपनी, आर्सेलर मित्तल, उभी करणारे लक्ष्मी मित्तल आता अब्जाधीश आहेत. जगातील सर्वात उंच इमारत, बुर्ज खलिफामध्ये मित्तल ग्रुपच्या पोलादाचा वापर करण्यात आला आहे.‘स्टील किंग’ म्हणून जगात ओळखजगभर ‘स्टील किंग’ म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मी मित्तल जगातील सर्वात मोठ्या पोलाद कंपन्यांपैकी - आर्सेलर मित्तल - या जागतिक पोलाद कंपनीचे अध्यक्ष आहेत. भारतात जन्मलेल्या मित्तल यांनी आपला व्यवसाय युरोप, अमेरिका आणि आशियामध्ये विस्तारला आणि आता ते जगातील सर्वात प्रभावशाली उद्योगपतींपैकी एक आहेत.लक्ष्मी निवास मित्तल किती श्रीमंतएकेकाळी ब्रिटनचे गर्भश्रीमंत असलेले लक्ष्मी मित्तल यांची एकूण संपत्ती 31 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 2.7 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. लक्ष्मी मित्तल एकेकाळी जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते आणि आजही भारतातील 10 सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी आहेत. लंडनमधील त्यांचे निवासस्थान, केन्सिंग्टन पॅलेस गार्डन्स, जगातील सर्वात महागड्या खाजगी घरांपैकी मानले जाते.लक्ष्मी निवास मित्तलांचं राजस्थान कनेक्शन काय?लक्ष्मी मित्तल यांनी राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीची निवड केवळ व्यावसायिक नसून भावनिक निर्णयही आहे. लक्ष्मी मित्तल यांचा जन्म राजस्थानमधील सादुलपूर (चुरू जिल्हा) येथे झाला होता आणि ‘आपल्याला जागतिक स्तरावर राजस्थानचा वारसा पुढे न्यायचा आहे,’ असे रॉयल्सच्या नव्या मालकांचे म्हणणे आहे. नवीन मालकी बदलानंतर राजस्थान रॉयल्स मैदानावर कसा प्रभाव पाडेल याकडे चाहत्यांचे लक्ष लागून असेल.वयाच्या 26 व्या वर्षी परदेशात स्थलांतर1976 मध्ये भारतात पोलाद उत्पादनावर अनेक निर्बंध लादले असताना 26 वर्षीय मित्तल इंडोनेशियाला स्थलांतरित झाले. इथे त्यांनी आपला पहिला कारखाना, पीटी इस्पात इंडो, स्थापन केला, जो त्यांच्या जागतिक साम्राज्याची पहिली वीट ठरला. तोट्यात चाललेल्या पोलाद कंपन्या विकत घेऊन त्यांनी नफ्यात आणल्या, जे मित्तल यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य राहिले आणि या धोरणामुळे लक्ष्मी मित्तल जगातील सर्वात प्रभावशाली उद्योगपतींपैकी बनले. 2006 मध्ये मित्तल स्टील आणि आर्सेलर यांच्या विलीनीकरणातून आर्सेलरमित्तलची स्थापना झाली, जी आज जागतिक पोलाद बाजारातील प्रमुख कंपनी आहे.ऐषाराम आणि शाही जीवनशैली2004 मध्ये मित्तल यांच्या मुलगी - वनिशा मित्तल - चा पॅरिसमध्ये शाही अंदाजात लग्नसोहळा पार पडला. या लग्नात अंदाजे 2004 मध्ये अंदाजे $60 दशलक्ष (सुमारे 240 कोटी रुपये त्यावेळच्या विनिमय दरानुसार) खर्च केला होता आणि यासह त्यावेळी जगातील सर्वात महागडे लग्न होते आणि आजही जगातील सर्वात भव्य लग्नांपैकी मानले जाते.आणि यासह त्यावेळी जगातील सर्वात महागडे लग्न होते आणि आजही जगातील सर्वात भव्य लग्नांपैकी मानले जाते.त्याचवेळी, लंडन येथील केन्सिंग्टन पॅलेस गार्डन्समधील त्यांचे निवासस्थान जगातील सर्वात महागड्या निवासस्थानांपैकी असून त्यांच्या घरात त्याच खाणीतील संगमरवर वापरण्यात आला आहे, जिथून ताजमहाल बांधण्यात आला होता असे म्हटले जाते.क्रीडा अन् समाजसेवेतील योगदानऑलिम्पिकमधील भारताच्या खराब कामगिरीमुळे चिंतित होऊन मित्तल यांनी 'मित्तल चॅम्पियन्स ट्रस्ट'ची स्थापना केली. त्यांनी भारतीय खेळाडूंना आर्थिक सहाय्य देण्यास सुरुवात केली, जेणेकरून देशाला क्रीडा क्षेत्रात सुधारणा करता येईल. तसेच मित्तल यांनी धर्मादाय कार्यासाठीही महत्त्वपूर्ण योगदान दिले असून त्यांनी लंडनच्या ग्रेट ऑर्मंड स्ट्रीट हॉस्पिटलला 15 दशलक्ष पाऊंडची देणगी दिली, जी त्यावेळी हॉस्पिटलला मिळालेली सर्वात मोठी खाजगी देणगी मानली जात होती.
50 shares
😊
P
Pudhari
May 4, 2026, 01:21 AM
संकटकाळानंतर भारतीय किनाऱ्यालगत पर्यटकांची सुटका

संकटकाळानंतर भारतीय किनाऱ्यालगत पर्यटकांची सुटका

यावेळी जीव रक्षक परदेश तांडेल यांनी तातडीने समर्थ वॉटर स्पोर्टस्‌चे मालक व नगरसेवक उमेश भोसले यांना कळवले. त्यांच्या सूचनेनुसार कर्मचारी मुजाहिद मिरकर व सफायद बागकर यांनी जेटस्कीच्या सहाय्याने समुद्रात धाव घेत दोन्ही पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी नगरपंचायतीकडून तात्पुरती जबाबदारी दिलेले कर्मचारी आशिष सांगळे यांनीही बचावकार्याला मदत केली.
33 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 3, 2026, 07:34 PM
आयपीएल 2026: रामकृष्ण घोष दुखापतीमुळे संघाबाहेर, सीएसकेला मोठा धक्का

आयपीएल 2026: रामकृष्ण घोष दुखापतीमुळे संघाबाहेर, सीएसकेला मोठा धक्का

IPL 2026 Big Blow For CSK Ramakrishna Ghosh Ruled Out Of IPL 2026 :आयपीएल २०२६स्पर्धेत दुखापतीच्या धक्क्यातून सावरत ट्रॅकवर आलेल्याचेन्नई सुपर किंग्सलाआणखी एक मोठा धक्का बसला आहे. स्पर्धा अंतिम टप्प्याकडे सरकत असताना चेन्नईच्या ताफ्यात MI विरुद्ध पदार्पणात चमकेलेल्या युवा गोलंदाजावर उर्वरित स्पर्धेतून माघार घेण्याची वेळ आली आहे. CSK च्या संघाचा उदयोन्मुख ऑलराउंडर रामकृष्ण घोष दुखापतीमुळे उर्वरित हंगामाला मुकणार आहे.चेन्नई सुपर किंग्सच्यासंघाने अधिकृत निवेदन जारी करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! नेमकं काय झालं? OFFICIAL ANNOUNCEMENT:Ramakrishna Ghosh sustained a fracture to his right foot during the CSK v MI match at Chepauk.He will take no further part in IPL 2026.Get well soon, Rambo.pic.twitter.com/CQve4zLixG चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकृत निवेदनानुसार, रामकृष्ण घोषच्या उजव्या पायला फ्रॅक्चर झाले आहे. ही दुखापत त्याला २ मे रोजीमुंबई इंडियन्सविरुद्धचेपॉक येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात झाली होती. या गंभीर दुखापतीमुळे तो आता उर्वरित स्पर्धेत खेळू शकणार नाही. नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील MI विरुद्ध पदार्पणात धमक दाखवली, पण... नाशिकमध्ये जन्मलेला २८ वर्षीय क्रिकेटर देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतो.मुंबई इंडियन्सविरुद्धच्यापदार्पणाच्या सामन्यात सर्वोत्तम क्षेत्ररक्षणासह सूर्यकुमार यादवची महत्त्वपूर्ण विकेट मिळवत त्याने दमदार पदार्पण केले. पण हाच सामना त्याच्यासाठी या हंगामातील शेवटचा सामना ठरला. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत चमकदार कामगिरी रामकृष्ण घोष देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या शानदार कामगिरीसाठी ओळखला जातो. मागील वर्षी विजय हजारे ट्रॉफीमध्ये हिमाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने ७ विकेट्स घेत इतिहास रचला होता. त्या सामन्यात त्याने ९.४ षटकांत ४२ धावा खर्च करत त्याने ७ विकेट्सचा डाव साधला होता. याशिवाय मुंबईविरुद्ध २७ चेंडूत ६४ धावांची स्फोटक खेळी करत त्याने फलंदाजीतील धमकही दाखवली होती. CSK साठी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येक सामना जिंकणं गरजेचे आहे. या परिस्थितीत उपयुक्त खेळाडू संघाबाहेर झाल्यामुळे येलो आर्मीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. CSK च्या ताफ्यात दुखापतीचं 'ग्रहण' यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला एकापाठोपाठ एक धक्के बसल्याचे पाहायला मिळाले. आधी नॅथन एलिस संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला. त्यानंतर वेगवान गोलंदाज खलील अहमदही दुखापतीमुळे बाहेर पडला. फलंदाजीत आयुष म्हात्रेच्या रुपात संघाला मोठा धक्का बसला होता. त्यात आता रामकृष्ण घोषच्या नावाची भर पडली आहे.
14 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 3, 2026, 04:14 PM
बॉक्सरची मुलगी निशांत सिंधूने गुजरात टायटन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले.

बॉक्सरची मुलगी निशांत सिंधूने गुजरात टायटन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले.

Who Is Nishant Sindhu Makes His IPL Debut For Gujarat Titans :आयपीएल २०२६स्पर्धेतील यंदाच्या हंगामात शुभमन गिलच्यागुजरात टायटन्सच्यासंघाने प्रिती झिंटाच्या सह मालकीच्यापंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात शाहरुख खानच्या जागी बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी दिली. IPL पदार्पणाआधी वर्ल्ड चॅम्पियनच्या टॅगसह मिरवणारा निशांत सिंधू याने CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून दिवस काढले आहेत. एवढेच नव्हे तर तो या संघाकडून IPL चॅम्पियनही ठरला आहे. इथं जाणून घेऊयात बॉक्सरच्या लेकाचा क्रिकेटर होण्याच्या प्रवासाची खास स्टोरी 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! २०११ चा वर्ल्ड कपमधून प्रेरणा! बॉक्सरच्या लेकानं क्रिकेटर व्हायचं ठरवलं हरियाणातील रोहतक येथील निशांत सिंधू याचे वडील राज्यस्तरावरील बॉक्सर राहिले आहेत. सिंधू हा डावखुऱ्या हाताचा फलंदाज आणि फिरकी गोलंदाजीसाठी ओळखला जातो. २०११ मध्ये भारतीय पुरुष संघाने वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली. ही गोष्ट बॉक्सरच्या लेकासाठी प्रेरणादायी ठरली. क्रिकेटर होण्याचं स्वप्न उराशी बाळगत तो त्यासाठी मेहनत घेऊ लागला. मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज देशांतर्गत स्पर्धा गाजवल्यावर अंडर १९ वर्ल्ड कपसाठी निवड २०१८-१९ च्या देशांतर्गत हंगामात निशांतने विजय मर्चंट चषक स्पर्धेत आपल्या खास कामगिरीनं लक्षवेधून घेतले होते. या स्पर्धेत त्याने हरियाणाकडून ५७२ धावासंह २३ विकेट्स घेतल्या. याच कामगिरीच्या जोरावर त्याने २०२२ च्या अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात एन्ट्री झाली. या स्पर्धेत त्याने १४० धावा आणि ६ विकेट्स घेत भारतीय संघाला वर्ल्ड चॅम्पियन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. CSK नं ६० लाखांची बोली लावली, पण... अंडर १९ वर्ल्ड चॅम्पियनचा टॅग लावल्यावर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने २०२३ च्या हंगामाआधी मूळ किंमत २० लाख रुपये असलेल्या निशांत सिंधूसाठी ६० लाख रुपये मोजत आपल्या संघात घेतले. २०२३ मध्ये CSK च्या संघाने IPL चे पाचवे जेतेपद पटकावले. त्यावेळी निशांत या संघाचा भाग होता. पण त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. २०२५ आधी चेन्नईच्या संघाने त्याला रिलीज केले.गुजरात टायटन्सच्यासंघाने ३० लाखांसह त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.
65 shares
😐
Sakal logo
Sakal
May 3, 2026, 04:00 PM
आयपीएल 2026 च्या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जवर वर्चस्व गाजवले.

आयपीएल 2026 च्या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जवर वर्चस्व गाजवले.

IPL 2026, GT vs PBKS Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात सामना सुरू आहे.या सामन्यात पहिला डाव गुजरातच्या वेगवान गोलंदाजांनी गाजवला. दमदार फॉर्ममध्ये असलेल्या पंजाब किंग्सला त्यांनी दीडशे धावांसाठीही संघर्ष करायला लावला. तरी पंजाबसाठी सुर्यांश शेडगे आणि मार्कस स्टॉयनिस यांनी दिलेल्या लढाईमुळे गुजरातसमोर १६४ धावांचे लक्ष्य ठेवता आले.या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी तरी योग्य ठरवला. पंजाबकडून प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग सलामीला फलंदाजीसाठी उतरले. पण मोहम्मद सिराजने टाकलेले पहिलेच षटक नाट्यपूर्ण ठरले. पहिल्याच चेंडूवर प्रियांश आर्यचा झेल सुटला. पण दुसऱ्याच चेंडूवर त्याचा अफलातून झेल निशांत सिंधूने घेतला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर कूपर कोनोली शून्यावर बाद झाला.पण यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरनने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, ६ व्या षटकात प्रभसिमरनलाही कागिसो रबाडाने १५ धावांवर माघारी धाडले. पुढच्याच षटकात नेहल वढेराला जेसन होल्डरने बाद केले, तर ९ व्या षटकात श्रेयस अय्यरलाही १९ धावांवर होल्डरने त्रिफळाचीत केले. त्यामुळे ४७ धावांवर ५ विकेट्स अशी पंजाबची अवस्था झाली होती.परंतु, नंतर सुर्यांश शेडगेला मार्कस स्टॉयनिसची साथ मिळाली. या दोघांनी आक्रमक खेळण्यासोबत संघाला १२० धावांचा टप्पा १६ व्या षटकापर्यंत पार करून दिला. यादरमन्यात सुर्यांशने पहिले आयपीएल अर्धशतकही केले. पण त्याचा मोठा अडथळा १६ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कागिसो रबाडाने दूर केला. त्याचा झेल जॉस बटलरने घेतला. सुर्यांशने २९ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांसह ५७ धावा करताना स्टॉयनिससोबत ७९ धावांची भागीदारीही केली.
23 shares
😐
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 3, 2026, 03:23 PM
15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने फलंदाजीच्या फॉर्मसह आयपीएल 2026 मध्ये जल्लोष केला

15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने फलंदाजीच्या फॉर्मसह आयपीएल 2026 मध्ये जल्लोष केला

मुंबई:राजस्थान रॉयल्सचा 15 वर्षीय खेळाडू Vaibhav Sooryavanshi आयपीएल 2026 मध्ये आपल्या बॅटने धुमाकूळ घालत आहे. या मोसमात 10 सामन्यांमध्ये 404 धावा करून, या डावखुऱ्या सलामीवीराने केवळ चाहत्यांनाच रोमांचित केले नाही, तर पॅट कमिन्ससारख्या दिग्गजांचीही मने जिंकली आहेत. कमिन्सने तर त्याला आपला नवीन आवडता खेळाडू म्हणून घोषित केले आहे. वैभवचा प्रभावी फॉर्म पाहता, या वर्षाच्या अखेरीस आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी त्याला भारतीय संघात स्थान द्यावे की नाही, यावर चर्चा सुरु आहे.वैभवची वाढती लोकप्रियता इतकी होती की, नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान दिग्गज क्रिकेटपटूकपिल देवयांनाही या तरुण खेळाडूविषयी त्यांचे मत विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. कपिल देव यांनी स्पष्ट केले की, "ते एखाद्या खेळाडूच्या भविष्याबद्दल मत व्यक्त करण्याइतपत खेळाचे बारकाईने निरीक्षण करत नाहीत."पत्रकारांशी बोलताना कपिल देव म्हणाले, "मला याबद्दल काहीच माहिती नाही कारण मी त्याला (वैभवला) खेळताना पाहिले नाही. मी तुमच्यासारखाच आहे, टीव्हीवर जे पाहतो ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. घरी बसून टीव्हीवर क्रिकेट पाहून त्यावर मत देणे योग्य नाही. ज्यांनी प्रत्येक खेळाडूला बारकाईने पाहिले आहे, ते यावर अधिक चांगल्या प्रकारे बोलू शकतील. सुनील गावस्कर, रवी शास्त्री किंवा हर्षा भोगले यांच्यासारखे लोक या विषयावर माझ्यापेक्षा अधिक अचूक माहिती देऊ शकतील."वैभव सूर्यवंशीने जसप्रीत बुमराह आणि जोश हेझलवूडसारख्या भेदक गोलंदाजांना फटके मारुन आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्याने या हंगामात आधीच एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याने अवघ्या 36 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले, जे आयपीएलच्या इतिहासातील कोणत्याही भारतीय खेळाडूने केलेले दुसरे सर्वात जलद शतक आहे. यापूर्वी, त्याने 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध 80 चेंडूंमध्ये 175 धावांची ऐतिहासिक खेळी करून आपले सामर्थ्य दाखवून दिले होते.
62 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 3, 2026, 02:49 PM
लखनौ सुपर जायंट्सच्या प्लेऑफमध्ये ऋषभ पंतच्या फलंदाजीच्या अपयशाच्या आशा धुळीस मिळाल्या

लखनौ सुपर जायंट्सच्या प्लेऑफमध्ये ऋषभ पंतच्या फलंदाजीच्या अपयशाच्या आशा धुळीस मिळाल्या

मुंबई:आयपीएल 2025 हंगामापूर्वी जेव्हा Rishabh Pant लखनौ सुपर जायंट्स संघात सामील झाला, तेव्हा तो मैदानावर आपली छाप पाडेल अशी मोठी अपेक्षा होती. त्याच्या प्रतिभेची सर्वांनाच जाणीव आहे, त्यामुळे या यष्टीरक्षक-फलंदाजाला मेगा लिलावात 27 कोटी रुपये मिळाले आणि तो स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नव्हते. एलएसजी आणि पंत यांच्यातील या भागीदारीतून आतापर्यंत कोणतेही महत्त्वपूर्ण यश मिळालेले नाही आणि आता या फ्रँचायझीवर आयपीएल 2026 हंगामातही प्लेऑफमध्ये स्थान न मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे.परिस्थिती आणखी बिकट करणारी गोष्ट म्हणजे,पंतची फलंदाजीची कामगिरीविशेषतः खराब राहिली आहे. गेल्या वर्षी, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्धच्या शतकामुळेच त्याला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला होता, आणि या वर्षीही धावा करणे कठीण झाले आहे. या फलंदाजाने आठ सामन्यांमध्ये 27 च्या सरासरीने आणि 149 च्या स्ट्राइक रेटने केवळ 189 धावा केल्या आहेत.पंतची एकमेव सामना जिंकून देणारी खेळी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होती, जेव्हा त्याने हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर नाबाद 68 धावा करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. या कठीण काळात, पंतला एलएसजीचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांचा पाठिंबा मिळाला. अरुण म्हणाले की, कर्णधारावर त्याच्या जास्त किंमतीचा कोणताही दबाव नाही आणि ही केवळ एका डावाची बाब आहे, ज्यानंतर तो नक्कीच चांगली कामगिरी करेल.मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत अरुण म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत ऋषभ पंतवर त्याच्या किंमतीमुळे कोणताही दबाव होता असे त्यांना वाटत नाही. त्याने दुसऱ्या सामन्यात संघाला विजय मिळवून दिला होता. ही केवळ एका डावाची बाब होती. आपल्या आठ सामन्यांपैकी केवळ दोन सामने जिंकलेला लखनौ सुपर जायंट्स संघ सध्या आयपीएल २०२६ च्या गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा जिवंत ठेवण्यासाठी, संघाला आपले उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील.
84 shares
😢
Loksatta logo
Loksatta
May 3, 2026, 02:15 PM
कपिल देव यांनी वैभव सूर्यवंशीच्या आयपीएल 2026 च्या कामगिरीवर भाष्य करण्यापासून परावृत्त केले

कपिल देव यांनी वैभव सूर्यवंशीच्या आयपीएल 2026 च्या कामगिरीवर भाष्य करण्यापासून परावृत्त केले

Kapil Dev Statement on Vaibhav Sooryavanshi:सध्या आयपीएल २०२६ मध्ये वैभव सूर्यवंशी हे नाव चर्चेचा विषय आहे. वैभव सूर्यवंशी अनेक विक्रमी खेळी करत सर्वांचं आपल्या फलंदाजीने लक्ष वेधून घेतलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीचा दबदबा राखणाऱ्या गोलंदाजांविरूद्ध वैभव सूर्यवंशीने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला आहे. पण वैभव सूर्यवंशीबाबत विचारताच भारताचे पहिले वर्ल्डकप विजेते कर्णधार कपिल देव यांनी वक्तव्य करण्यास नकार दिला आणि त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचं लक्ष वेधलं. राजस्थान रॉयल्सचा हा सलामीवीर फलंदाजआयपीएल२०२६ मध्ये जबरदस्त कामगिरी करत असून, १० सामन्यांत ४०४ धावा केल्या आहेत. २३७.६४ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना त्याने ३७ षटकार आणि ३५ चौकार ठोकले आहेत. डावखुऱ्या या फलंदाजाने अनेक अव्वल गोलंदाजांवर मोठे फटके मारत आंतरराष्ट्रीय स्तरासाठी आपण तयार असल्याचे संकेत दिले आहेत. तरीही या सर्व चर्चांदरम्यान कपिल देव यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. “मला माहित नाही आणि मी काही सांगू शकत नाही, कारण मी त्याला नीट खेळताना पाहिलेलं नाही. मी तुमच्यासारखाच आहे, टीव्हीवर जे दाखवलं जातं तेच पाहतो आणि त्यातून समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मी घरी बसून टीव्हीवर क्रिकेट पाहतो, त्यामुळे त्यावर अंतिम मत देणं योग्य नाही. जे लोक प्रत्येक खेळाडूला जवळून पाहतात आणि विश्लेषण करतात, तेच अधिक चांगलं सांगू शकतात, जसं सुनील गावस्कर, रवी शास्त्री किंवा हर्षा भोगले नीट सांगतली,”असं कपिल देव यांनी सांगितलं. वैभव सूर्यवंशीने सर्वप्रथम अंडर-१९ क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण केली. २०२५ मध्ये त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केलं आणि त्या हंगामातच तो घराघरात पोहोचला. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने आपला जबरदस्त फॉर्म कायम ठेवला आणि तो जेव्हा जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला, तेव्हा तो चर्चेत राहिला. वैभव सूर्यवंशीने यंदाच्या आयपीएलमध्ये सलग ३ वेळा १५ चेंडूत अर्धशतक करण्याचा करिष्मा केला. याशिवाय पुन्हा यंदाच्या आयपीएलमध्येही त्याने शतक झळकावलं. वैभवची प्रत्येक सामन्यातील कामगिरी पाहता त्याला लवकरात लवकर भारताच्या वरिष्ठ संघात संधी देण्याची मागणी केली जात आहे. VIDEO | Delhi: Former India captain Kapil Dev refrained from offering an assessment of young batter Vaibhav Sooryavanshi and the growing trend of 250-plus totals in T20 cricket, saying he is not best placed to comment on the modern game.Vaibhav Sooryavanshi has dazed the…pic.twitter.com/9DF5Muf8B6 अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध त्याने १७५ धावांची तुफानी खेळी केली, ज्यामुळे भारताने ४११ धावांचा मोठा डोंगर उभा केला. त्यानंतर भारताने इंग्लंडवर तब्बल १०० धावांनी विजय मिळवला. हा फॉर्म त्याने आयपीएलमध्येही कायम ठेवला असून, तो सध्या ऑरेंज कॅपसाठी प्रमुख दावेदारांपैकी एक आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो बिहारकडून खेळतो.
2 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 3, 2026, 02:12 PM
आयपीएल 2026 मध्ये नाईट रायडर्सने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या, एस. आर. एच. वर सात गडी राखून के. के. आर. चा विजय

आयपीएल 2026 मध्ये नाईट रायडर्सने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या, एस. आर. एच. वर सात गडी राखून के. के. आर. चा विजय

IPL 2026, KKR Seven Wicket Win Over SRH :कोलकाता नाईट रायडर्सच्यासंघाने घरच्या मैदानात खेळणाऱ्यासनरायझर्स हैदराबादचा७ विकेट्सनी धुव्वा उडवत सलग तिसऱ्या विजयासह प्लेऑफ्सच्या आशा कायम ठेवल्या आहेत. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेनसह जलदगती गोलंदाज कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीसमोर पहिल्यांदा फलंदाजी करताना तगडी फलंदाजी असलेलासनरायझर्स हैदराबादचासंघ १६५ धावांत गारद झाला. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईकरअजिंक्य रहाणेआणि अंगकृष रघुवंशीच्या हिट शोनंतर रिंकूच्या फिनिशिंग टचसहकोलकाता नाईट रायडर्सनेविजय निश्चित केला. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! ट्रॅविस हेडसह ईशान किशनची शानदार खेळी सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर अभिषेक शर्मा आणि ट्रॅविस हेड जोडीनं संघाला दमदार सुरुवात करून दिली. पण संघाच्या धावफलकावर ४४ धावा असताना चौथ्या षटकात कार्तिक त्यागीनं अभिषेक शर्माच्या खेळीला १५ धावांवरच ब्रेक लावला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या ईशान किशन याने ट्रॅविस हेडसोबत दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला मजबूत स्थितीत नेले. ट्रॅविस हेड २८ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६१ धावांची खेळी करून वरुण चक्रवर्तीच्या जाळ्यात फसला. सुनील नरेन याने ईशान किशनला ४२ धावांवर तंबूतचा रस्ता दाखवला. त्यानंतर SRH च्या एकाही बॅटरला मैदानात तग धरता आला नाही. परिणामी सनरायझर्स हैदराबादचा संघ १९ षटकात १६५ धावांवर आटोपला. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाकडून वरुण चक्रवर्तीनं सर्वाधिक ३ तर सुनील नरेन आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. याशिवाय अनुकूल रॉय, वैभव अरोरा आणि कॅमरून ग्रीन यानी प्रत्येकी १-१ विकेट घेतली. मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज मुंबईकर रहाणेसह रघुवंशीचा जलवा अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना कर्णधारअजिंक्य रहाणेआणि फिन ॲलन यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. सलामी जोडीनं पहिल्या ४ षटकात ४९ धावांची भागीदारी रचली. फिन ॲलन १३ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २९ धावा केल्या. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या अंगकृष रघुवंशी याने कर्णधाराच्या साथीनं ६६ चेंडूत ८४ धावांची भागीदारी रचत डाव सेट केला. रघुवंशीनं ४७ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५९ धावांची खेळी केली. रिंकू सिंह २२ (११) आणि कॅमरून ग्रीन यांनी ३ (२) संघाला ७ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
86 shares
😊
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 3, 2026, 02:01 PM
आयपीएल 2026 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय

आयपीएल 2026 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय

हैदराबाद:आयपीएल 2026 च्या 45 व्या सामन्यात, कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत पराभव केला. हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला, परंतु हैदराबादला घरच्या मैदानावर पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे सनरायझर्स हैदराबादची सलग पाच सामन्यांची विजयी मालिका संपुष्टात आली. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सने विजयांची हॅटट्रिक नोंदवली. मागील सहा सामन्यांमध्ये विजयाविना असलेला केकेआर जोरदार पुनरागमन करत आहे.या सामन्यात, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु संपूर्ण डावात त्यांच्या विकेट्स पडत गेल्या. संघ 19 षटकांत 165 धावांवर सर्वबाद झाला. अभिषेक शर्मा केवळ 15 धावांवर बाद झाला. त्यानंतर ट्रॅव्हिस हेडने आक्रमक खेळी करत 28 चेंडूंमध्ये 61 धावा केल्या. इशान किशनसोबत मिळून त्याने संघाची धावसंख्या केवळ 8.5 षटकांत 105 पर्यंत पोहोचवली. पण त्यानंतर डाव पूर्णपणे कोलमडला.संघाने आपल्या शेवटच्या नऊ विकेट्स केवळ 60 धावांत गमावल्या, ज्यामुळे हैदराबादला केवळ 165 धावांवर समाधान मानावे लागले. कोलकाता नाईट रायडर्सकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. सुनील नरेन आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद केले. वैभव अरोरा, कॅमेरॉन ग्रीन आणि अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरने दमदार सुरुवात केली. फिन ॲलनने 13 चेंडूंमध्ये 29 धावा केल्या, पण तो पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि अंगक्रिश रघुवंशी यांनी सावध खेळ करत संघाला विजयाच्या जवळ पोहोचवले. रहाणेने 36 चेंडूंमध्ये 43 धावा केल्या, तर अंगक्रिश रघुवंशीने 47 चेंडूंमध्ये 59 धावा केल्या. रिंकू सिंगनेही 11 चेंडूंमध्ये नाबाद 22 धावा केल्या, ज्यामुळे केकेआरने 18.2 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले.कोलकाता नाईट रायडर्सचा या हंगामातील हा तिसरा विजय आहे. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादला 10 सामन्यांमधील चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. असे असूनही, ते गुणतालिकेत पहिल्या तीन स्थानांवर कायम आहेत, तर केकेआर आठव्या स्थानावर आहे.या विजयाने कोलकत्ताला दिलासा मिळाला आहे. पण आता डबल हेडरमध्ये पुढचा सामना हा गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्समध्ये असणार आहे. या सामन्यात पंजाब जिंकली तर कोलकत्ताच टेन्शन वाढणार आहे. पंजाब जिंकली तर त्यांचे गुण 15 होणार आहे,त्यामुळे जवळ जवळ ते क्वालिफाय होतील. पण जर आज निकाल फिरला आणि गुजरात जिंकली तर कोलकत्ताला दिलासा मिळेल. कारण गुजरात जिंकल्याने फारसा फरक पडणार नाही कारण चार क्रमांकाच्या खालच्या सगळ्याच संघाना प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी असणार.
55 shares
😢
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 3, 2026, 01:23 PM
आयपीएल 2026: खराब क्षेत्ररक्षण संघ, अपवादात्मक कॅचेस चमकतात

आयपीएल 2026: खराब क्षेत्ररक्षण संघ, अपवादात्मक कॅचेस चमकतात

हैदराबाद:आयपीएल 2026 हंगामात काही संघ आणि खेळाडूंची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. मात्र, क्षेत्ररक्षण हे एक असे क्षेत्र आहे जिथे विजयी आणि पराभूत संघांमध्ये कोणताही स्पष्ट फरक दिसून आलेला नाही. या हंगामात क्षेत्ररक्षणाचा दर्जा अत्यंत सुमार राहिला आहे, ज्यात अनेक सोपे वाटणारे झेल सोडले गेले आहेत. काही खेळाडू अविश्वसनीय झेल घेऊन सर्वांना आश्चर्यचकित करत आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचा रोव्हमन पॉवेल हा असाच एक क्षेत्ररक्षक आहे, ज्याने एक अप्रतिम एकहाती झेल घेतला.रोव्हमन पॉवेलनेसनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली. ही घटना सनरायझर्सच्या डावाच्या 11 व्या षटकात घडली, जेव्हा यजमान संघ प्रथम फलंदाजी करत होता. ट्रॅव्हिस हेडच्या स्फोटक खेळीनंतर फलंदाजीला आलेला सनरायझर्सचा फलंदाज हेनरिक क्लासेन क्रीजवर होता आणि आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्याची तयारी करत होता.यानंतर सनरायझर्सच्या डावाचे 11 वे षटक आले, जे कॅमेरॉन ग्रीनने टाकले. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर क्लासेनने लाँग-ऑनच्या दिशेने एक उंच फटका मारला. तो षटकार जाईल असे वाटत होते, पण रिंकू सिंग चेंडू पकडण्यासाठी धावत आला. तो झेल सोपा नव्हता, पण खूप अवघडही नव्हता. रिंकूला तो पकडता आला नाही आणि चेंडूवर 6 धावा गेल्या. क्लासेनचा फॉर्म पाहता, झेल सोडणे महागात पडू शकले असते.पुढच्याच चेंडूवर चौकार मारला. पण सलग तिसऱ्या चेंडूवर उंच फटका मारण्याची चूक घातक ठरली. यावेळी, त्याने ग्रीनच्या गोलंदाजीवर फ्लिक शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण डीप मिडविकेटवर असलेल्या रोव्हमन पॉवेलने धावत येऊन एकहाती सनसनाटी झेल घेतला. पॉवेल 15 मीटर मैदानात पळाला तरी तो पोहोचू शकला नव्हता म्हणून शेवटी त्याला वाटलं की त्याने हवेत झेप एका हाताने भन्नाट कॅच घेतली. झेल घेतल्यानंतर तो जमिनीवर पडला, त्याचा चष्मा फुटला आणि त्याला खांद्याला किरकोळ दुखापत झाली. त्याच्या या झेलने केवळ सर्वांनाच आश्चर्यचकित केले नाही, तर केकेआरला एक मोठी विकेट मिळवून दिली आणि रिंकूची चूक सुधारली. क्लासेन 11 धावांवर बाद झाला, जी आयपीएल 2026 मधील त्याची सर्वात कमी धावसंख्या आहे.
76 shares
😢
Sakal logo
Sakal
May 3, 2026, 12:02 PM
एसआरएच विरुद्ध के. के. आर.: हैदराबादची फलंदाजी कोसळली, कोलकाता नाईट रायडर्सच्या फिरकीपटूंचे वर्चस्व

एसआरएच विरुद्ध के. के. आर.: हैदराबादची फलंदाजी कोसळली, कोलकाता नाईट रायडर्सच्या फिरकीपटूंचे वर्चस्व

SRH vs KKR IPL 2026 Marathi News: सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२६ स्पर्धेतही त्यांच्या आक्रमक फलंदाजीने सर्वांना थक्क केलं होतं. मात्र रविवारी (३ मे) घरच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात मात्र त्यांची फलंदाजी ढेपाळल्याचे दिसले.कोलकाताच्या फिरकी गोलंजाजांच्या जाळ्यात हैदराबादचे फलंदाज अडकल्याचे दिसले. त्यामुळे हैदराबादने कोलकातासमोर १६६ धावांचेच लक्ष्य ठेवले. या सामन्यादरम्यान सुनील नरेनने (Sunil Narine) मोठा विक्रमही केला.या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी डावाची सुरुवात आक्रमक केली, पण अभिषेकला चौथ्याच षटकात कार्तिक त्यागीने १५ धावांवर बाद केले. पण तरी हेडला ईशान किशनची साथ मिळाली.हेड चांगल्या लयीत खेळत होता. त्याने अर्धशतकही पूर्ण केले. मात्र हेड आणि ईशान यांची जोडी ९ व्या षटकात वरुण चक्रवर्तीने तोडली. त्यांच्यात ६१ धावांची भागीदारी झाली होती. वरुणने हेडला कॅमेरॉन ग्रीनच्या हातून झेलबाद केले. हेडने २८ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह ६१ धावा केल्या.या विकेटनंतर मात्र हैदराबादला कोलकाताच्या फिरकीने जखडून ठेवले. क्लासेनला आधी कॅमेरॉन ग्रीनने ११ धावांवर बाद केले. त्याचा एका हाताने अफलातून झेल रोवमन पॉवेलने घेतला. त्यानंतर वरुण चक्रवर्तीने स्मरण रवीचंद्रन (४) आणि अनिकेत वर्माला (६) स्वस्तात बाद केले.ONE-HANDED STUNNER! 🤯Rovman Powell loses his shades but keeps his hold on the ball 👏👏Is this your 𝘤𝘢𝘵𝘤𝘩 𝘰𝘧 𝘵𝘩𝘦 𝘴𝘦𝘢𝘴𝘰𝘯? 🤔Updates ▶️https://t.co/muersQO7at#TATAIPL|#KhelBindaas|#SRHvKKR|@Ravipowell26pic.twitter.com/xnOdjScT3e१६ व्या षटकात सुनील नरेनने सलील अरोराला २ धावांवर बाद केल्यानंतर ईशान किशनचा अडथळाही दूर केला. ईशान २९ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४२ धावांवर बाद झाला.A special delivery to reach a special milestone 🤌🎥 Sunil Narine picks his 200th#TATAIPLwicket with an unplayable delivery 🫡Updates ▶️https://t.co/muersQO7at#KhelBindaas|#SRHvKKR|@KKRiderspic.twitter.com/HTud7IBAq4नंतर पॅट कमिनस (१०), शिवांग कुमार (१) आणि हर्षल पटेल (६) हे देखील स्वस्तात बाद झाले. त्यामुळे हैदराबादचा संघ १९ षटकातच १६५ धावांवर सर्वबाद झाला.कोलताताकडून गोलंदाजी करताना वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच सुनील नरेन आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. वैभव अरोरा, कॅमेरॉन ग्रीन आणि अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
9 shares
😐
Pudhari logo
Pudhari
May 3, 2026, 11:44 AM
नवीन खेळाडूंच्या प्रवेशामुळे भारतीय क्रिकेटच्या भविष्यातील शक्यता वाढल्या

नवीन खेळाडूंच्या प्रवेशामुळे भारतीय क्रिकेटच्या भविष्यातील शक्यता वाढल्या

भारतीय संघात नवीन खेळाडूंच्या एन्ट्रीवर भाष्य करताना सैकिया म्हणाले, "ही खूप चांगली बाब आहे की, भारतीय क्रिकेट संघात आधीच उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि आता वैभव सूर्यवंशी सारखे नवीन खेळाडूही आपला प्रभाव पाडत आहेत. आयपीएल लिलावातही फ्रँचायझींनी अनेक युवा खेळाडूंना संधी दिली असून ते शानदार कामगिरी करत आहेत. हे भारतीय क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत सकारात्मक आहे."
43 shares
😊
Sakal logo
Sakal
May 3, 2026, 11:38 AM
आयपीएल 2026 मध्ये प्रियांश आर्यच्या'बिग सिक्स'ने ज्येष्ठ नागरिकांना दुखावले

आयपीएल 2026 मध्ये प्रियांश आर्यच्या'बिग सिक्स'ने ज्येष्ठ नागरिकांना दुखावले

IPL 2026 Punjab Kings Marathi news: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत अनेक खेळाडू मोठमोठे शॉट्स खेळताना दिसत आहेत, यामध्ये पंजाब किंग्सचा युवा फलंदाज प्रियांश आर्यचाही समावेश आहे.प्रियांश यंदाच्या हंगामात दमदार फॉर्ममध्ये अनेक आक्रमक खेळताना दिसतोय. मात्र काही दिवासांपूर्वीच त्याच्या मोठ्या षटकाराने एका जेष्ठ नागरीकाला दुखापत झाली होती. यानंतर मात्र प्रियांश आणि पंजाब किंग्सची संघमालकिन प्रीती झिंटाने झेट त्यांच्याशी संपर्क साधला आहे.झाले असे की लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध मुल्लनपूरला झालेल्या सामन्यात प्रियांश आर्य आक्रमक खेळत होता. त्यावेळी त्याने मारलेला षटकाराचा चेंडू स्टँडमध्ये गेला आणि तिथे बसलेल्या ज्येष्ठ नागरिक कृष्णन चंद यांच्या चेहऱ्यावर लागला. त्यामुळ रक्तही यायला लागलं. त्यामुळे त्यांच्या आजुबाजूच्या लोकांनी त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये नेले. त्यांना भुवयांजवळ टाकेही घालावे लागले.दरम्यान, त्यांना झालेल्या दुखापतीबाबत समजताच प्रियांश आर्य आणि प्रीती झिंटा यांनी चंद यांच्या कुटुंबाशी संपर्क साधला आणि त्यांच्या दुखापतीबाबत चौकशी केली. प्रियांश आणि प्रीती हे दोघेही चंद यांच्याशी झुम व्हिडिओ कॉल द्वारे चर्चा केली.प्रियांश चंद यांना म्हणाला, 'मी व्हिडिओ पाहिला आणि मला काळजी वाटली की ही मोठी दुखापत तर नाही ना?' त्यानंतर प्रीती झिंटानेही काळजी व्यक्त केली आणि दोघांनीही त्यांना लवरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्रियांशने चंद यांना पंजाब किंग्सचा पुढचा सामना धरमशाला येथे पाहायला येण्याची विनंतीही केली.
42 shares
😢
Pudhari logo
Pudhari
May 3, 2026, 11:05 AM
राजस्थान रॉयल्सने विकत घेतल्याने अदार पूनावालाचा आयपीएलमध्ये प्रवेश

राजस्थान रॉयल्सने विकत घेतल्याने अदार पूनावालाचा आयपीएलमध्ये प्रवेश

यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) खरेदी करण्यासाठी उत्सुक असलेल्या अदर पूनावाला यांनी आता राजस्थान रॉयल्सच्या माध्यमातून आयपीएलमध्ये प्रवेश केला आहे. आदित्य मित्तल यांच्यासोबत या गुंतवणुकीत सहभागी होताना आपल्याला आनंद होत असल्याचे पूनावाला यांनी सांगितले. राजस्थान रॉयल्स ही एक मजबूत वारसा असलेली फ्रँचायझी असून तिच्या प्रगतीसाठी आपण उत्सुक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
16 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 3, 2026, 10:42 AM
सूर्यकुमार यादवने किरॉन पोलार्डला मागे टाकत मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू बनला आहे.

सूर्यकुमार यादवने किरॉन पोलार्डला मागे टाकत मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू बनला आहे.

Suryakumar Yadav Kieron Pollard IPL 2026 CSK vs MI:मुंबई इंडियन्ससाठीसातत्याने धावांचा पाऊस पाडणारासूर्यकुमार यादवयंदाच्या हंगामात फारसा चमकू शकला नाही. आतापर्यंत झालेल्या ९ सामन्यांत सूर्यकुमारच्या बॅटमधून एकही दमदार खेळी आलेली नाही. पण असे असूनहीसूर्यकुमार यादवच्याशिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आयपीएल २०२६ मधील चेन्नईविरूद्धच्या २१ धावांच्या खेळीच्या जोरावर सूर्याने एक मोठी झेप घेतली आहे. Stood tall under pressure 👏pic.twitter.com/ZogeoHdGI7 सूर्यकुमार यादवनेकिरॉन पोलार्डलाटाकलं मागे मुंबई इंडियन्सचा'फिनिशर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्याकिरॉन पोलार्डनेमुंबई इंडियन्स संघासाठी ३,९१५ धावा केल्या होत्या. सूर्यकुमारने आता हा टप्पा ओलांडला आहे. तो मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. या यादीत मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा अजूनही अव्वलस्थानी आहे. रोहितच्या नावावर मुंबईसाठी ५००० हून अधिक धावांची नोंद आहे. सूर्या आता रोहितच्या विक्रमाचा पाठलाग करत आहे. Team spirit 🆙🧿💙💪🏽pic.twitter.com/3qRygoERQV कमी डावांमध्ये केला मोठा पराक्रम सूर्याने अत्यंत कमी डावांमध्ये धावा काढल्या आहेत. त्याची सरासरी आणि स्ट्राईक रेट पाहता, तो मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील सर्वात प्रभावी फलंदाज असल्याचे सिद्ध होते. सूर्यकुमार यादवने ज्या वेगाने या धावा केल्या आहेत, ते पाहता आगामी काळात तो रोहित शर्माच्या विक्रमालाही आव्हान देऊ शकतो. पण या चालू हंगामातही सूर्याला आपल्या फलंदाजीने फारसा प्रभाव पाडता आलेला नाही.
34 shares
😊
Lokmat logo
Lokmat
May 3, 2026, 08:13 AM
आयपीएलः 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर काईल जेमीसनचा संतापजनक आरोप

आयपीएलः 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर काईल जेमीसनचा संतापजनक आरोप

इंडियन प्रीमियर लीगच्या ४३व्या सामन्यात मैदानावर मोठे नाट्य पाहायला मिळाले. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसन यांच्यात वेगळाच सामना रंगला. या सामन्यानंतर जेमिसन म्हणाला की, "मला नाही वाटत की, मी माझ्या आयुष्यात कधी एखाद्या १५ वर्षांच्या मुलाला इतका घाबरलो असेन. पण हो, आम्ही सामन्यापूर्वी योजना आखली होती आणि त्याचा फायदा झाला." राजस्थान रॉयल्सच्या डावातील दुसऱ्या षटकात हा प्रकार घडला. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने जेमिसनच्या पहिल्याच चेंडूवर लाँग ऑफच्या दिशेने शानदार चौकार मारला. मात्र, पुढच्याच चेंडूवर जेमिसनने अचूक यॉर्कर टाकत वैभवला क्लीन बोल्ड केले. विकेट घेतल्यानंतर जेमिसनने आपल्या भावनांवर ताबा गमावला. तो थेट वैभवच्या जवळ गेला, जोरात टाळ्या वाजवल्या आणि त्याच्याकडे रागाने पाहत आक्रमक जल्लोष केला. १५ वर्षांच्या खेळाडूसोबत केलेले हे वर्तन क्रीडाप्रेमींना रुचलेले नाही. जेमिसनचे हे वर्तन आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन करणारे ठरले आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, जेमिसनने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.५ चा भंग केल्याचे निष्पन्न झाले आहे. जेमिसनला एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. जेमिसनने आपली चूक कबूल केली असून, त्याला भविष्यात मैदानावरील शिस्त पाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जेमिसनच्या या वागणुकीवर क्रिकेट चाहत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. एका १५ वर्षांच्या मुलाला बाद केल्यानंतर अशा प्रकारची आक्रमकता दाखवणे 'जेन्टलमन गेम'च्या भावनेला धरून नसल्याचे मत चाहत्यांनी मांडले आहे. दुसरीकडे, इतक्या स्लेजिंगनंतरही वैभव सूर्यवंशीने दाखवलेल्या संयमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
75 shares
😢
Pudhari logo
Pudhari
May 3, 2026, 05:19 AM
मुंबई इंडियन्सः लीगमधील सर्वात मजबूत संघ

मुंबई इंडियन्सः लीगमधील सर्वात मजबूत संघ

कागदावर मुंबई इंडियन्स हा सर्वात ताकदवान संघ मानला जातो. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांसारखे दिग्गज कर्णधार या संघात आहेत. असे असूनही रणनीतीच्या बाबतीत हा संघ पूर्णपणे विखुरलेला दिसला. संकटाच्या वेळी या संघाकडे कोणताही 'प्लॅन-बी' तयार नसल्याचे या मोसमात वारंवार दिसून आले आहे.
71 shares
😊
Pudhari logo
Pudhari
May 3, 2026, 12:36 AM
फसवणूक घोटाळ्यात 23,000 हून अधिक विद्यार्थ्यांना'इंडिया अवॉर्ड्स कन्सेशन मार्क्स'

फसवणूक घोटाळ्यात 23,000 हून अधिक विद्यार्थ्यांना'इंडिया अवॉर्ड्स कन्सेशन मार्क्स'

20 हजार 796 विद्यार्थ्यांना सवलत गुण खेळाडू, एनसीसी, स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलत गुण देण्यात येतात. त्यानुसार यावर्षी राज्यातील सुमारे 20 हजार 796, तर कोल्हापूर विभागातील 2 हजार 405 विद्यार्थ्यांना प्रावीण्याचे गुण देण्यात आले आहेत. कॉपी केल्याचे सिद्ध झाल्यामुळे 2 विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात आली.
68 shares
😢
L
Lokmat
May 2, 2026, 07:09 PM
आयपीएल 2026: कार्तिक शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर सीएसकेने मुंबईचा धुव्वा उडवला

आयपीएल 2026: कार्तिक शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर सीएसकेने मुंबईचा धुव्वा उडवला

IPL 2026 CSK vs MI Kartik Sharma Maiden IPL Fifty Gun Celebration :चेन्नई सुपर किंग्सच्यासंघाने आयपीएलच्या मिनी लिलावात ज्या अनकॅप्ड भारतीय खेळाडूवर इतिहासातील सर्वात मोठी बोली लावली, त्याच्या बॅटमधूनमुंबई इंडियन्सविरुद्धच्यासामन्यात IPL मधील पहिले अर्धशतक आले. कार्तिक शर्माने चौकार मारत संघाचा विजयही निश्चित केला. त्यानंतर त्याने बॅटला बंदूक करत 'गन सेलिब्रेशन'सह मॅच विनिंग अर्धशतकी खेळीचा आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावर त्याच्या सेलिब्रेशनची तुफान चर्चा रंगताना दिसत आहे. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! यंदाच्या हंगामात तो प्राइज टॅगमुळे चर्चेत राहिला आयपीएलच्या मिनी लिलावातचेन्नई सुपर किंग्सच्यासंघाने कार्तिक शर्मासाठी १४.२० कोटी एवढी मोठी रक्कम मोजली होती. त्याच्यासह प्रशांत वीरलाही एवढ्याच रक्कमेसह चेन्नई सुपर किंग्सने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. हे दोघेही आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे अनकॅप्ड खेळाडू आहेत. विशेष म्हणजेमुंबई इंडियन्सविरुद्धच्याचेपॉकच्या मैदानातील सामन्यात पहिल्यांदाच दोघांनाही संधी मिळाली. IPL च्या यंदाच्या हंगामाला सुरुवात झाल्यावर प्राइज टॅगमुळे ही जोडी चर्चेत राहिली. कार्तिक शर्माला फलंदाजीतील धमक दाखवता आली नव्हती. पाच सामन्यात तो धावांसाठी संघर्ष करताना दिसला. पण सहाव्या सामन्यात नाबाद अर्धशतकासह त्याने आयुष म्हात्रेची उणीव भरून काढण्यासाठी अन्य कोणाकडे पाहण्याची गरज नाही, अशी हमी देणारी खेळी केली. नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील आता मॅच विनिंग अर्धशतकासह 'गन सेलिब्रेशन'सह वेधलं लक्ष Kartik finishing off in style! 💛🥳#WhistlePodu#CSKvMIpic.twitter.com/9fAVhPzLyG कार्तिक शर्मानं राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. या सामन्यात त्याने १५ चेंडूत १८ धावा केल्या होत्या. पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वुरुद्धच्या सामन्यात तो अनुक्रमे १ आणि ६ धावांवर बाद झाला. याआधीच्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातही तो खेळला. पण वानखेडेच्या मैदानातही तो १८ धावांवर अडखळला. गुजरात टायटन्स विरुद्ध ९ चेंडूत १५ धावांवर आटोपल्यावर तो प्राइज टॅगमुळे दबावात असल्याची चर्चा रंगली होती. आता या चर्चेला ब्रेक लागला असून त्याने मॅच विनिंग अर्धशतकी खेळीनंतर केलेले 'गन सेलिब्रेशन' चर्चेत आला आहे.
100 shares
😊
M
Maharashtra Times
May 2, 2026, 06:49 PM
सीएसकेचा मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय

सीएसकेचा मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय

चेपॉक:आयपीएल 2026 मध्ये पुनरागमनासाठी प्रयत्नशील असलेल्या चेन्नई सुपर किंग्सने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. ऋतुराज गायकवाडचा संघ, ज्याने हंगामाची सुरुवात खराब केली होती, तो हळूहळू आपला फॉर्म परत मिळवत आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आपली आशा जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या चेन्नईने मुंबई इंडियन्सविरुद्ध हंगामातील आपला दुसरा सामना जिंकला. हंगामातील आपल्या चौथ्या विजयासह, सीएसकेने गुणतालिकेत एका स्थानाची झेप घेतली आहे.चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, दोन्ही वेळच्या विजेत्या संघांनी वानखेडेवर खेळल्या गेलेल्या सामन्याप्रमाणेच कामगिरी केली. यावेळी, सीएसकेने फलंदाजीपासून गोलंदाजीपर्यंतमुंबईवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. मागील सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 207 धावा केल्या आणि मुंबईला केवळ 104 धावांवर गुंडाळले. मुंबईने पहिला सामना तब्बल 103 धावांनी गमावला होता. दुसऱ्या सामन्यात चेन्नईने मुंबईला 159 धावांवर रोखल्यानंतर, सीएसकेने केवळ दोन गडी गमावून सहजपणे लक्ष्य गाठले.CSK vs MI : डेब्यूसाठी 8 सामने केली प्रतीक्षा, आधी सुपरमॅन कॅच, मग घेतली सूर्याची विकेट, नाशिकचा खेळाडू मुंबईवर पडला भारीया सामन्यासह, चेन्नई आणि मुंबईने आयपीएल 2026 मध्ये प्रत्येकी नऊ सामने खेळले आहेत. दोन्ही संघांची स्थिती बरीच वेगळी आहे. चेन्नईचा नऊ सामन्यांमधील हा चौथा विजय असून, संघाने आता दिल्ली कॅपिटल्सच्या (8) बरोबरीने आठ गुण मिळवले आहेत. केवळ नेट रन रेटमधील फरकामुळे सीएसकेने (0.005) दिल्लीला (-0.895) मागे टाकत सातव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे.मुंबईला प्लेऑफची संधी आहे की नाही?मुंबई इंडियन्सचा नऊ सामन्यांमधील हा सातवा पराभव असून, त्यांना फक्त दोनच सामने जिंकता आले आहे. केवळ चार गुणांसह ते नवव्या स्थानावर कायम आहेत. या पराभवामुळे मुंबईच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळजवळ संपुष्टात आल्या आहेत. जर संघाला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर त्यांना 14 गुणांपर्यंत पोहोचण्यासाठी उर्वरित पाचही सामने जिंकावे लागतील. यानंतरही त्यांची पुढील फेरीतील प्रगती इतर संघांच्या निकालांवर अवलंबून असेल, जे सध्या तरी मुंबईच्या बाजूने नाही असे दिसत आहे. मुंबईने सतत पराभव होत असल्यामुळे संघात अनेक बदलही केले. काही खेळाडूंनी पदार्पणाची संधीही दिली पण काहीच फायदा झाला नाही.
69 shares
😊
L
Loksatta
May 2, 2026, 06:36 PM
हार्दिक पांड्याचे प्रामाणिक मूल्यांकनः मुंबई इंडियन्सचा संघर्ष सुरूच

हार्दिक पांड्याचे प्रामाणिक मूल्यांकनः मुंबई इंडियन्सचा संघर्ष सुरूच

Hardik Pandya Statement on MI Defeat:चेन्नई सुपर किंग्सने पुन्हा एकदा यंदाच्या स्पर्धेत पराभवाचं पाणी पाजलं. आयपीएल २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्सने कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सविरुद्धचे दोन्ही सामने जिंकले. मुंबईच्या घरच्या मैदानावर, वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर, चेन्नईने यावेळी आपल्या घरच्या मैदानावर सहज विजय नोंदवला. मुंबई इंडियन्सच्या या सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्या काय म्हणाला, जाणून घेऊया. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.मुंबईइंडियन्सने सुरूवातदेखील चांगली केली आणि एकेकाळी संघ २ बाद ९० धावांवर खेळत होता. पण १० षटकांनंतर संघाच्या धावांचा वेग ओसरला आणि चेन्नईने सामन्यावर पकड मजबूत केली. यामुळे मुंबईचा संघ २० षटकांत फक्त १५९ धावा करण्यात यशस्वी ठरला. यानंतर चेन्नई सुपर किंग्सने प्रत्युत्तरात फक्त १८.१ षटकांत सहज सामना जिंकत मुंबई इंडियन्सवर ८ विकेट्सने सोपा विजय मिळवला. मुंबई इंडियन्सला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सर्व सामने जिंकण्याची गरज असताना हा पराभव संघासाठी मोठा डोकेदुखी ठरणार आहे. रवी शास्त्री यांनी सामन्यानंतर प्रश्न विचारताना हार्दिकला म्हटलं, आज तुमचा दिवस नव्हता, यावर हार्दिक म्हणाला, “मला वाटतं हे फक्त आजच्या दिवसाचं नाही, तर हा संपूर्ण हंगामच आमच्यासाठी नाहीये. त्यांनी आमच्यापेक्षा चांगली गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी केली.” या खेळपट्टीवर १८०-१९० हा पार स्कोअर होता का?, यावर प्रश्नावर उत्तर देताना हार्दिक म्हणाला, “हो, एका टप्प्यावर आम्ही १८०-१९० धावांपर्यंत जाण्याचा विचार करत होतो. तो चांगला स्कोअर ठरला असता. पण १० षटकांनंतर आम्ही गती मिळवू शकलो नाही आणि शेवटही चांगला करता आला नाही.” १८०-१९० धावांपर्यंत पोहोचता का आलं नाही, यामागचं कारण सांगताना कर्णधार म्हणाला, “सुरुवातीपासूनच फटके मारणं सोपं नव्हतं. त्यांच्या फलंदाजांनाही सेट झाल्यानंतर लगेच गोलंदाजांविरूद्ध मोठे फटका खेळता आले नाहीत. त्यामुळे मोजून-मापून खेळणं गरजेचं होतं आणि योग्य विकेट्स हातात ठेवणं महत्त्वाचं होतं. पण आमचे फलंदाज नीट खेळू शकले नाही आणि त्यांच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. एकूणच, ते गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये आमच्यापेक्षा सरस ठरले.” अधिक आक्रमक गोलंदाजी व्हायला हवी होती का, या प्रश्नावर हार्दिक म्हणाला, “आम्ही किती आक्रमक होऊ शकलो असतो, हे सांगणं कठीण आहे. त्यांना बाद करण्यासाठी कदाचित ‘फायरबॉल’ टाकावे लागले असते! पण आमच्याकडे जे पर्याय होते, त्यानुसार आम्ही गोलंदाजी केली. त्यांनी मात्र खूप स्मार्ट क्रिकेट खेळलं आणि तोच फरक ठरला.”
19 shares
😊
L
Lokmat
May 2, 2026, 04:42 PM
रामकृष्ण घोषः सी. एस. के. चे नवीन शस्त्र ज्याने त्याच्या आयपीएल पदार्पणात सूर्यकुमार यादवला बरखास्त केले

रामकृष्ण घोषः सी. एस. के. चे नवीन शस्त्र ज्याने त्याच्या आयपीएल पदार्पणात सूर्यकुमार यादवला बरखास्त केले

Who is Ramakrishna Ghosh CSK's New Weapon Who Dismissed Suryakumar Yadav On His IPL Debut :आयपीएल २०२६च्या चेपॉकच्या मैदानातील सामन्यातचेन्नई सुपर किंग्सचाकर्णधार ऋतुराज गायकवाड याने गत हंगामापासून संघात असलेल्या नाशिकच्या रामकृष्ण घोष याला अखेर पदार्पणाची संधी दिली. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! पदार्पणाच्या सामन्यात गोलंदाजीला येण्याआधी रामकृष्ण घोष यानेमुंबई इंडियन्सलासलामीवीर विल जॅक्सच्या रुपात मोठा धक्का देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अंशुल कंबोजच्या गोलंदाजीवर सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचा नजराणा पेश करत सुपरमॅन होऊन त्याने स्फोटक बॅटर विल जॅक्सचा अवघ्या १ धावेवर तंबूचा रस्ता दाखवला. एवढेच नाही तर पदार्पणाच्या सामन्यात त्याने सूर्यकुमार यादवच्या रुपात आपली पहिली विकेटही घेतली. Welcome to#TATAIPL💛Ramakrishna Ghosh with a spectacular catch on debut 🤯@ChennaiIPLstrike early ☝️Updates ▶️https://t.co/VVAjldiiC0#KhelBindaas|#CSKvMIpic.twitter.com/iT1BJsq5ty कोण आहे रामकृष्ण घोष? चेपॉकच्या मैदानात IPL च्या पहिल्या सामन्यात हवा करणारा २८ वर्षी रामकृष्ण घोष उजव्या हाताचा मध्यम जलदगती गोलंदाज आहे. फलंदाजीतही तो उपयुक्त कामगिरी करू शकतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या घोष याचा जन्म नाशिकचा. जवळपास दोन हंगामांपासून तोचेन्नई सुपर किंग्सच्याताफ्यात आहे.मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याला अखेर पदार्पणाची संधी मिळाली. या सामन्यात त्याने फिल्डिंगसह सूर्यकुमार यादवची विकेट घेत दमदार पदार्पण करत मैफील लुटली. अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये कशी राहिलीये त्याची कामगिरी? रामकृष्ण घोष याने २०२२ मध्ये टी-२० आणि २०२३ मध्ये लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले असून गेल्या काही वर्षांत त्याने सातत्यपूर्ण कामगिरीसह आपल्यातील धमक दाखवली आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ११ सामन्यांत २१ विकेट्स घेतल्या आहेत. टी-२० मध्ये त्याची कामगिरी तुलनेने कमी प्रभावी राहिली आहे. ९ सामन्यांत त्याच्या खात्यात फक्त २ विकेट्स जमा आहेत. गोलंदाजीशिवाय फलंदाजीत त्याने आपली क्षमता दाखवताना लिस्ट A मध्ये ११ सामन्यांत २४६ धावा केल्या आहे. २०२५-२६ च्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील हंगामात पंजाबविरुद्ध ७३ धावांची दमदार खेळीसह लक्षवेधले होते. पंजाबविरुद्धच्या सामन्यातच त्याने ९.२ षटकांत ४२ धावा देत ७ बळी घेतले होते. लिस्ट ए क्रिकेटमधील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
81 shares
😐
Lokmat logo
Lokmat
May 2, 2026, 03:38 PM
रघु शर्माने आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले

रघु शर्माने आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले

आयपीएल २०२६स्पर्धेतील ४४ व्या सामन्यातमुंबई इंडियन्सकडूनलेगस्पिनर रघू शर्माला अखेर पदार्पणाची संधी मिळाली आहे. चेपॉकवरीलचेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्यासामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेकीवेळी मोठ्या बदलासह या खास डेब्यूची घोषणा केली. खास गोष्ट ही की, गोलंदाजीतील कमी भरून काढण्यासाठीमुंबई इंडियन्सच्यासंघाने युवा खेळाडूला नव्हे तर ३३ वर्षीय अनुभवी लेगस्पिनर रघू शर्मावर डाव खेळल्याचे पाहायला मिळाले. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! कोण आहे रघू शर्मा? देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाब आणि पुदुचेरी प्रतिनिधित्व करणारा रघू शर्मा अनेक वर्षांपासून मोठ्या संधीच्या प्रतीक्षेत होता. गत हंगामात दुखापतग्रस्त विघ्नेश पुथूरच्या जागी मुंबई इंडियन्सने त्याला ३० लाख रुपयांत बदली खेळाडूच्या रुपात आपल्या संघात स्थान दिले. पण २०२५ च्या हंगामात त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नव्हती. KL राहुलनं साधला मोठा डाव! किंग कोहलीला मागे टाकत एबी डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग ट्रेनर मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणारा फिरकीपटू प्रमाणित स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग ट्रेनर आणि प्रमाणित स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आहे. एवढेच नाही तर क्रिकेटरच्या रुपात अल्प संधी मिळत असताना क्रिकेटशी कनेक्ट राहण्यासाठी तो स्पोर्ट्स अँड एक्सरसाइज सायन्समध्ये मास्टर्सही करत आहे. पुदुचेरी क्रिकेट असोसिशनमध्ये तो ट्रेनर-कम-प्लेअरच्या भूमिकेतही काम केले आहे.संघर्षमयी प्रवासानंतर IPL मध्ये छाप सोडण्याची मोठी संधी ३३ व्या वर्षी IPL पदार्पण करणं ही गोष्टच त्याच्या संघर्षाची खरी कहाणी आहे. रघू शर्माने आतापर्यंत १२ प्रथम श्रेणी सामन्यांत ५७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच १२ लिस्ट ए सामन्यांत १८ विकेट्स आणि IPLपूर्वीच्या चार टी-२० सामन्यांत चार विकेट्स त्याच्या खात्यात जमा आहेत. टी-२० मधील अल्प अनुभावासह तो मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीतील कमी भरून ट्रम्प कार्ड ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल. हा नवा प्रयोग तरी MI साठी फायद्याचा ठरणार का? चेन्नई विरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने लेगस्पिनर रघू शर्माशिवाय कृष भगत याचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला. या वेगवान गोलंदाजाला अश्वनी कुमारच्या जागी संधी देण्यात आली आहे. गोलंदाजीत आमच्याकडे अधिक पर्याय नाहीत, ही गोष्ट हार्दिक पांड्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर बोलून दाखवली होती. हा नवा प्रयोग तरी MI ला वाचवणार का? ते पाहण्याजोगे असेल.
90 shares
😊
L
Lokmat
May 2, 2026, 02:13 PM
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा

टी-20 विश्वचषकासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा

इंग्लंड अँण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीभारतीय महिला क्रिकेट संघाचीघोषणा करण्यात आली आहे. वनडे वर्ल्ड कप जिंकल्यावर छोट्या फॉरमॅटमध्ये पहिला वहिला विश्वचषक जिंकण्यासाठी निवडलेल्या १५ रणरागणींमधील नंदिनी शर्मा हिने सर्वांचे लक्षवेधले आहे. कारण पहिल्यांदाच तिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी मिळाली आहे. एका बाजूला अमनजोत कौर आणि टीम इंडियातील ब्युटी हरलीन देओल यांना टी-२० संघात स्थान मिळाले नसताना ही नंदिनी शर्मा कोण? अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगू लागली आहे. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!गल्ली क्रिकेट ते टी-२० वर्ल्ड कप व्हाया WPL; कोण आहे नंदिनी शर्मा नंदिनी शर्मा ही उजव्या हाताची मध्यम जलदगती गोलंदाज आहे. महिला प्रीमियर लीगच्या गत हंगामात दिल्ली कॅपिटल्स महिला संघाकडून खेळताना तिने हॅटट्रिकसह मैफील लुटली होती. एवढेच नाही तर तिने पर्पल कॅपही जिंकली होती. या स्वप्नवत कामगिरीनंतर आता टी-२० वर्ल्ड कपसाठी तिने भारतीय महिला संघात स्थान मिळवले आहे. WPL 2026 : कोण आहे नवी ‘हॅटट्रिक क्वीन’? रातोरात स्टार झालेल्या छोरीचा गल्ली ते दिल्लीपर्यंतचा प्रवास वय कमी असल्यामुळे अकादमीत प्रवेश नाकारला, पण... नंदिनी मुळची चंडीगडची आहे. २० सप्टंबर २००१ रोजी जन्मलेल्या नंदिनीचा क्रिकेटचा प्रवास हा गल्ली क्रिकेटमधून सुरु झाला. भावाला पाहून ती क्रिकेटच्या प्रेमात पडली. वयाच्या ८ व्या वर्षी ती व्यावसायिक क्रिकेटचे धडे घेण्यासाठी अकादमीत प्रवेश घेण्यासाठी गेली. पण वय कमी असल्यामुळे तिला प्राथमिकता मिळाली नाही. पण तिने हार न मानता जिद्दीनं क्रिकेटच्या मैदानात आपली प्रतिभा दाखवून दिली. बॅक-ऑफ-द-हँड स्लोअर बॉल ही तिच्या गोलंदाजीतील खासियत आहे. आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेतही भारतीय संघात दिसली मध्यमगती गोलंदाज म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नंदिनी शर्माने महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून १० सामने खेळताना १७ विकेट्स घेतल्या आहेत. तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच तिला हरमनप्रित कौरच्या संघात मोठी संधी मिळाली आहे. यंदा फेब्रुवारीमध्ये बँकॉक येथे झालेल्या महिला आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत ती भारतीय संघाचा भाग होती.
75 shares
😐
Pudhari logo
Pudhari
May 2, 2026, 01:08 PM
टी-20 विश्वचषक संघांची दोन गटांमध्ये विभागणीः भारत'मृत्यूच्या गटात'उतरला

टी-20 विश्वचषक संघांची दोन गटांमध्ये विभागणीः भारत'मृत्यूच्या गटात'उतरला

टी-२० विश्वचषकासाठी १२ संघांची दोन गटांत (प्रत्येकी सहा संघ) विभागणी करण्यात आली आहे. भारतीय संघाचा समावेश गट-१ मध्ये करण्यात आला आहे. गट-१ ला 'ग्रुप ऑफ डेथ' मानले जात आहे, कारण यात दिग्गज संघांसोबतच भारत-पाकिस्तानमधील पारंपरिक कट्टर लढतही पाहायला मिळणार आहे. गट १: ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेदरलँड्स. गट २: वेस्ट इंडिज, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, आयर्लंड, स्कॉटलंड.
13 shares
😐
L
Lokmat
May 2, 2026, 11:49 AM
2026 च्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा

2026 च्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा

India Women's T20 World Cup 2026 Squad Announced : इंग्लंडमध्ये होणाऱ्या महिला टी २० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी शनिवारी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली. मुंबईतील बीसीसीआयच्या कार्यालयात महिला निवड समितीच्या अध्यक्षा अमिता शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पार पडलेल्या बैठकीनंतर बीसीसीआयचे सचिव देवजित साकिया यांनी हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! स्टार ऑलराउंडर संघाबाहेर, या नव्या चेहऱ्याला मिळाली पहिली संधी १२ जून ते ५ जुलै या कालावधीत इंग्लंडमध्ये महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाच्या गटात ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स या संघांचा समावेश आहे. वनडेतील वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यावर भारतीय महिला संघ इंग्लंडमध्ये इतिहास रचणार का? ते पाहण्याजोगे असेल. भारतीय महिला संघाला फिल्डिंगच्या जोरावर वनडेत वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलणारी अमनजोत कौर टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा भाग नाही. दुखापतीमुळे तिला संघात स्थान मिळाले नाही. याशिवाय WPL मधील दिल्लीच्या संघाकडून हॅटट्रिकचा डाव साधणाऱ्या नंदिनी शर्माला वर्ल्ड कप खेळण्याची पहिली संधी मिळाली आहे. तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण? महिला टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, श्रेयंका पाटील. भारती फुलमाली , दीप्ती शर्मा, रिचा घोष, श्री चरणी, यश्तिका भाटिया, नंदीनी शर्मा, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, राधा यादव, रेणुका ठाकूर
52 shares
😐
Pudhari logo
Pudhari
May 2, 2026, 11:43 AM
सूर्यकुमार यादवला चेपॉकच्या अनुकूल खेळपट्टीवर पुन्हा फॉर्म मिळवण्याची संधी

सूर्यकुमार यादवला चेपॉकच्या अनुकूल खेळपट्टीवर पुन्हा फॉर्म मिळवण्याची संधी

"मला वाटते रोहितदेखील खेळणार नाही. मात्र, सूर्यकुमार यादवसाठी फॉर्मात परतण्याची ही सुवर्णसंधी आहे, कारण फलंदाजीसाठी यापेक्षा चांगली खेळपट्टी त्याला मिळणार नाही." चेपॉकची खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक असल्याने सूर्यकुमारला आपला आत्मविश्वास पुन्हा मिळवता येईल, असा विश्वास अश्विनने व्यक्त केला.
89 shares
😊
L
Lokmat
May 2, 2026, 11:38 AM
तरुण इशांक सिंगने पाक सामुद्रधुनी ओलांडून जागतिक विक्रम केला

तरुण इशांक सिंगने पाक सामुद्रधुनी ओलांडून जागतिक विक्रम केला

Ishank Singh:जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर रांचीच्या अवघ्या ७ वर्षांच्या इशांक सिंहने जागतिक विक्रम केला आहे.श्रीलंकाआणि भारत यांच्यातील अरुंद पण अत्यंत आव्हानात्मक मानली जाणारी पाल्क सामुद्रधुनी पोहून पार करत इशांकने नवा इतिहास रचला आहे. ३० एप्रिल रोजी पार पडलेल्या या मोहिमेत त्याने २९ किलोमीटरचे अंतर अवघ्या ९ तास ५० मिनिटांत पूर्ण केले. इशांकने श्रीलंकेतील तलैमन्नार येथून आपल्या मोहिमेला सुरुवात केली आणि तामिळनाडूतील धनुषकोडी येथे पोहोचून आपला प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. समुद्रातील उंच लाटा आणि पाण्याचा वेगवान प्रवाह यामुळे हे अंतर पार करणे मोठे आव्हान होते, मात्र इशांकने हे यश मिळवले. इशांक सध्या जवाहर विद्या मंदिर या शाळेत तिसरीत शिकत असून, ही तीच शाळा आहे जिथे क्रिकेटपटू एम.एस. धोनीने शिक्षण घेतले होते. कठोर मेहनत आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन इशांकच्या या यशामागे त्याची आई मनीषा सिन्हा आणि प्रशिक्षक अमन कुमार जयस्वाल व बजरंग कुमार यांचे मोठे योगदान आहे. इशांकने वयाच्या तिसऱ्या वर्षापासून पोहण्यास सुरुवात केली होती. गेल्या सहा महिन्यांपासून त्याने धुरवा धरणाच्या पाण्यात दररोज सात ते आठ तास सराव केला होता. इशांकमध्ये बालपणापासूनच विलक्षण स्टॅमिना असल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले. या ऐतिहासिक कामगिरीसाठी इशांकला यंगेस्ट अँड फास्टेस्ट पाक स्ट्रेट स्वीमर आणि २०२६ ओडब्ल्यूएसएटी वर्ल्ड रेकॉर्ड या दोन महत्त्वाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यापूर्वीचा विक्रम तामिळनाडूच्या जय जसवंतच्या नावावर होता, जो आता इशांकने मोडीत काढला आहे. आता पुढचे ध्येय पाल्क सामुद्रधुनीचे दुहेरी अंतर रांचीमध्ये परतल्यानंतर इशांकचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्याने आपला आनंद व्यक्त करताना सांगितले की, "मला अजून सुधारणा करायची आहे. पाल्क सामुद्रधुनीचे टू-वे अंतर पोहून पार करणे हे माझे पुढचे स्वप्न आहे". सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी इशांकचे अभिनंदन करताना त्याची कामगिरी शिस्त आणि समर्पणाचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे म्हटले आहे. तसेच शाळेचे मुख्याध्यापक बी.एन. झा आणि इतर मान्यवरांनीही इशांकने शाळेचे आणि देशाचे नाव उज्वल केल्याचे सांगत त्याचे कौतुक केले आहे.
7 shares
😊
Pudhari logo
Pudhari
May 2, 2026, 09:10 AM
क्रिकेट वादः पाकिस्तान संघाला भारतीय संघाकडून सामन्यानंतर हस्तांदोलन करण्यास नकार

क्रिकेट वादः पाकिस्तान संघाला भारतीय संघाकडून सामन्यानंतर हस्तांदोलन करण्यास नकार

हा सामना भारतीय संघाने अपेक्षेप्रमाणे सहज जिंकला. सामन्यापूर्वी हस्तांदोलन होणार नाही हे आगाला समजले होते, मात्र सामन्यानंतर दोन्ही संघांमध्ये हस्तांदोलन होईल असे त्याला वाटले होते. त्याने खुलासा केला की, तो संपूर्ण पाकिस्तानी संघाला घेऊन भारतीय ड्रेसिंग रूमकडे गेला होता, पण तिथला दरवाजा बंद होता. "सामना संपला, आम्ही हरलो होतो. आम्ही हस्तांदोलनासाठी त्यांच्या पॅव्हेलियनकडे जात होतो, पण तरीही त्यांनी हस्तांदोलन केले नाही."
29 shares
😢
L
Lokmat
May 2, 2026, 07:32 AM
वैभव सूर्यवंशीला बडतर्फ केल्यानंतर आक्रमकपणे जल्लोष केल्याबद्दल काईल जेमीसनला दंड आणि इशारा

वैभव सूर्यवंशीला बडतर्फ केल्यानंतर आक्रमकपणे जल्लोष केल्याबद्दल काईल जेमीसनला दंड आणि इशारा

आयपीएलमध्ये काल रात्री झालेल्या लढतीतदिल्ली कॅपिटल्सनेजबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्याराजस्थान रॉयल्सवरआरामात विजय मिळवला. दरम्यान, या लढतीतवैभव सूर्यवंशीआणि यशस्वी जयस्वाल हे राजस्थानचे विस्फोटक सलामीवीर झटपट बाद झाले होते. त्यापैकीवैभव सूर्यवंशीलाबाद केल्यानंतर दिल्लीचा गोलंदाज कायल जेमिसन यांने जोरदार आणि आक्रमक अविर्भावात सेलिब्रेशन केलं होतं. मात्र या कृतीमुळे आता जेमिसन अडचणीत सापडला असून, बीसीसीआयने त्याता सक्त ताकिद देत त्याच्यावर कारवाई केली आहे. या लढतीत राजस्थानच्या डावाला सुरुवात झाल्यावर काइल जेमिसनने विस्फोटक अंदाजात खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशील केवळ १४ धावांवर त्रिफळाचीत केलं होतं. त्यानंतर जेमिसनने वैभवसमोर जात आक्रमकपणे सेलीब्रेशन केलं होतं. जेमिसनची ही कृती वैभवला भडकवणारी होती. दरम्यान, जेमिनसने केलेल्या या कृतीची बीसीसीआयने गंभीर दखल घेतली आहे. तसेच जेमिसनने केलेल्या या कृत्यामुळे आयपीएलमधील कोड ऑफ कंडक्टच्या कलम २.५ चं उल्लंघन झालं असल्याचा ठपका ठेवत सामनाधिकाऱ्यांनी त्याला एक डिमेरिट पॉईंट दिला आहे. तसेच त्याला असे कृत्य न करण्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली आहे. An in-swinging yorker 😲🔥🎥 Kyle Jamieson gets Vaibhav Sooryavanshi early 👊Wait for the celebration 👀Updates ▶️https://t.co/6OOjzHtZiD#TATAIPL|#KhelBindaas|#RRvDC|@DelhiCapitalspic.twitter.com/6vxJ5ahlb3 काय आहे नियमआयपीएलच्या कोड ऑफ कंडक्टमधील कलम २.५ हे मैदानावर वादविवाद होऊ शकतात अशी भाषा आणि कृती करण्यावर मर्यादा आणते. दरम्यान, जेमिसनच्या या कृतीमुळे या नियमाचा भंग झाल्याचे सांगत सामनाधिकारी राजीव सेठी यांनी त्याला शिक्षा सुनावली आहे. जेमिसननेही आपली चूक मान्य केली असून, दिलेल्या शिक्षेचा स्वीकार केला आहे. सामन्याचा निकाल काय लागला?दरम्यान,राजस्थान रॉयल्सआणिदिल्ली कॅपिटल्सयांच्या जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये झालेल्या लढतीत राजस्थानने रियान पराग आणि फरेराच्या आक्रमक खेळाच्या जोरावर २० षटकांमध्ये २२५ धावा फटकावल्या होत्या. मात्र लोकेश राहुल आणि पथुम निसंका यांनी दिलेल्या शतकी सलामीच्या जोरावर दिल्लीने हे लक्ष्य सहज गाठले.
69 shares
😢
P
Pudhari
May 2, 2026, 06:28 AM
क्रिकेट सामन्यातील तरुण खेळाडूंवरील आक्रमकतेवर चर्चेला उधाण

क्रिकेट सामन्यातील तरुण खेळाडूंवरील आक्रमकतेवर चर्चेला उधाण

दरम्यान, संपूर्ण सामन्यात हा क्षण चर्चेचा मुद्दा ठरला. चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञांनी याच्यावर भाष्य केलं. अनेकांना ही क्रिकेटमधील इन्टेन्सिटी वाटली तर अनेकांनी अशा प्रकारे एका १५ वर्षाच्या क्रिकेटपटूविरूद्ध आक्रमकता दाखवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
74 shares
😢
L
Lokmat
May 2, 2026, 05:08 AM
कबड्डी स्पर्धेत भारतीय नौदलाचा पराभव होऊनही मुंबई बंदर बाद फेरीत

कबड्डी स्पर्धेत भारतीय नौदलाचा पराभव होऊनही मुंबई बंदर बाद फेरीत

मुंबई - बलाढ्य भारतीय नौदल संघाकडून पराभव झाल्यानंतरही मुंबई बंदर संघाने अखिल भारतीय पुरुष व्यावसायिककबड्डीस्पर्धेची बाद फेरी गाठली. भारतीय नौदलाने मुंबई बंदरचा ५३-४५ असा पराभव केला. दुसरीकडे, भारत पेट्रोलियम संघानेही कूच केली. बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीने ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे ही स्पर्धा सुरू आहे. भारतीय नौदलाने धडकेबाज खेळ करताना मुंबई बंदरचे आव्हान ५३-४५ असे परतावले. नौदलाने पहिल्या डावात दोन, तर दुसऱ्या डावात एक लोण चढवून सामन्यात दबदबा राखला. नौदलाकडून हिमांशूने छाप पाडली. मुंबई बंदरकडून लोकेशने अपयशी झुंज दिली. पेट्रोलियम संघाने अवघ्या एका गुणाने मारली बाजीभारत पेट्रोलियमने थरारक झालेल्या सामन्यात अवघ्या एका गुणाने बाजी मारत दक्षिण मध्य रेल्वे संघाचा ५३-५२ असा पराभव केला. पहिल्या सत्रात दोन लोण देत भारत पेट्रोलियमने मध्यांतराला ३२-२१ अशी आघाडी मिळवली होती. यानंतर, अतिबचावात्मक पवित्रा घेतल्याचा फटका पेट्रोलियम संघाला बसला आणि रेल्वेने जबरदस्त पुनरागमन करीत सामना चुरशीचा केला. दुसऱ्या सत्रात पेट्रोलियम संघाने मिळविलेले ६ बोनस गुण निर्णायक ठरले. अनिल जस्ता याने तब्बल २५ गुण मिळवत पेट्रोलियमला विजयी केले. त्याला योगेश दहिया याने ६ पकडी करीत मोलाची साथ दिली.
64 shares
😊
Maharashtra Times logo
Maharashtra Times
May 2, 2026, 04:59 AM
मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकाने खराब कामगिरीसाठी विसंगतीला जबाबदार धरले

मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकाने खराब कामगिरीसाठी विसंगतीला जबाबदार धरले

म. टा. क्रीडा प्रतिनिधी, मुंबई :मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएल टी-२० मध्येही आत्तापर्यंत अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. यामागील काही कारणांवर या संघाचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी लक्ष वेधले. ‘पॉवरप्ले, मधल्या तसेच अखेरच्या षटकांमध्ये आम्ही सातत्यपूर्ण क्रिकेट खेळू शकलो नाही, यामुळे सामने गमावले’, अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे आपल्या खेळाडूंची कानउघाडणी केली.आज, शनिवारी रंगणाऱ्याचेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्याआधीचिदंबरम स्टेडियमवरील पत्रकार परिषदेत त्यांनी ही टिप्पणी केली. ‘आम्ही काही टप्प्यांत चांगले क्रिकेट खेळलो. सातत्याचा अभाव दिसत आहे. काही संघ खूप सातत्यपूर्ण खेळत झोकून देत कामगिरी करत आहेत. आम्ही त्या तुलनेत मागे आहोत. कुणा एकावर अपयशाचे खापर फोडणे मला पटत नाही’, याकडे जयवर्धने यांनी लक्ष वेधले.आता प्रत्येक लढत बाद फेरीसारखी‘मुंबई’ला अजूनही बाद फेरीची संधी आहे, असे जयवर्धने विश्वासाने सांगतात. मात्र त्यासाठी पुढील प्रत्येक लढतीत बाद फेरीची अखेरची संधी आहे, असे समजूनच उतरावे लागेल. ‘याआधीही आम्ही सहा सामने सलग जिंकून बाद फेरीत धडक मारली आहे. इतर संघ कसे खेळत आहेत यावरही बरेच काही अवलंबून आहे’, असेही जयवर्धने म्हणाले.RR vs DC: अखेर दिल्लीचं कमबॅक झालंच; एका गोष्टीमुळे राजस्थानविरुद्ध मॅच जिंकता आली; गुणतालिकेत मोठे बदल२० खेळाडू आजमावले!यंदाच्या मोसमात ‘मुंबई’नेवीस खेळाडूंना संधीदिली आहे. हे असामान्य नाही का, या प्रश्नावर जयवर्धने म्हणतात : ‘हो, बरोबरच आहे. एरवीही आम्ही जास्तीत जास्त १६ किंवा १७ खेळाडूंना संधी देतो’.रोहितबाबत अनिश्चितता कायम‘सामन्यासाठी आवश्यक असणारा फिटनेस पुन्हा मिळवण्यासाठी रोहित खूप परिश्रम घेत आहे. आमचे वैद्यकीय पथकही त्याची नियमित तपासणी करत आहे. शुक्रवारीही रोहितने सराव केला. शनिवारी सामन्याआधी रोहितला कसे वाटते आहे, डॉक्टरांचे काय म्हणणे आहे, ते ऐकूनच रोहितच्या समावेशाचा निर्णय होईल’, असे पठडीतील उत्तर जयवर्धने यांनी पुन्हा दिले.Muttiah Muralitharan : स्पिन गोलंदाजीची कला लोप पावतेय, चेंडू वळवण्यास शिकवलेच जात नाही'; मुथय्या मुरलीधरन याचे मोठे विधानजयवर्धने म्हणतात...- खेळाडू सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात, पण आवश्यक ती अंमलबजावणी होत नाही- सबब देत नाही; पण दुखापती आणिखेळाडूंच्या उपलब्धतेमुळेआम्हाला सतत बदल करावे लागले- यामुळे भूमिका निश्चित होत नाहीत, पण कामगिरीतील सातत्याचा अभाव नक्कीच मान्य आहेसूर्याच्या अपयशाबद्दल...- सरावात आणि सामन्यांतही तो चांगली फटकेबाजी करतो, पण काही वेळा दुर्दैवाने बाद होतो- कधी सीमारेषेवर झेल जातो. तर काही वेळा चांगल्या चेंडूवर सूर्या बाद झाला आहे- मी फलंदाज होतो, त्यामुळे सूर्याची परिस्थिती समजू शकतो- सूर्याने आमच्यासाठी तीन-चार वर्षे सर्वोत्तम कामगिरी केली आहे- कधी कधी थोड्या कठीण काळातून जावे लागते. सूर्या प्रतिकूलतेतही हसत मैदानात उतरतो हे विशेष
34 shares
😢
Lokmat logo
Lokmat
May 2, 2026, 04:55 AM
मुंबई विरुद्ध सीएसकेः शनिवारी होणाऱ्या सामन्यासाठी आयपीएल प्लेऑफ पात्रता परिस्थिती निश्चित

मुंबई विरुद्ध सीएसकेः शनिवारी होणाऱ्या सामन्यासाठी आयपीएल प्लेऑफ पात्रता परिस्थिती निश्चित

MI And CSK IPL Playoffs Qualification Scenarios : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी संघ असलेल्याचेन्नई सुपर किंग्सआणिमुंबई इंडियन्सयांच्यात शनिवारी यंदाच्या हंगामातील ४४ वा सामना खेळवण्यात येणार आहे. चेपॉकच्या मैदानातील या लढतीआदी दोन्ही संघ मुंबईच्या वानखेडच्या मैदानात भिडल्याचे पाहायला मिळाले. यातचेन्नई सुपर किंग्सनेबाजी मारली होती. आता या पराभवाचा हिशोब चुकता करण्यासोबतचमुंबई इंडियन्ससमोरप्लेऑफ्सच्या शर्यतीत स्वबळावर टिकून राहण्याचं मोठं आव्हान आहे. इथं एक नजर टाकुयात कसं आहे MI आणि CSK यांच्यासाठी प्लेऑफ्सचं समीकरण? 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! मुंबई इंडियन्सपेक्षा चेन्नई भारी, कारण.... यंदाच्या हंगामात आतापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी ८-८ सामने खेळले आहेत.आयपीएल २०२६स्पर्धेत १३ वर्षांनी विजयी सलामी देणाऱ्या मुंबई इंडियन्सने ८ सामन्यानंतर फक्त २ विजयासह ४ गुणांची कमाई केली आहे. दुसरीकडे एवढ्याच सामन्यानंतर ६ गुणांसह चेन्नई सुपर किंग्स एक पाऊल पुढे असल्याचे दिसते. PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरलMI साठी प्रत्येक सामना महत्त्वाचा, पहिलं टार्गेट CSK मुंबई इंडियन्सच्या संघाला ८ सामन्यातील ६ पराभवानंतरही प्लेऑफ्समध्ये स्वबळावर टिकून राहण्याची अखेरची संधी आहे. आतापर्यंत त्यांनी २ विजयासह ४ गुण कमावले असून -०.७८४ नेट रनरेटसह MI चा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. चेपॉकवरील लढाई ही फक्त बदला घेण्यापुरती मर्यादीत नसेल तर प्रतिष्ठा जपण्यासाठीही त्यांना हा सामना जिंकावाच लागेल. त्यामुळे "पुढचं पुढं बघू आधी CSK चा बदला घेत चेपॉकवरील लढाई जिंकू," याच इराद्याने MI चा संघ मैदानात उतरेल. मुंबई इंडियन्ससाठी प्रत्येक सामन्यात तगडे चॅलेंज CSK साठी कसे आहे प्लेऑफ्सचं समीकरण? चेन्नई सुपर किंग्सचा संघ ८ सामन्यात ३ विजय आणि ५ पराभवासह ६ गुणांची कमाई करत -०.१२१ नेट रनरेटसह सातव्या स्थानावर आहे. उर्वरित सर्व सामने जिंकून हा संघ १८ गुणांपर्यंत पोहचू शकतो. एखादा सामना गमावला तरी १६ गुणांपर्यंत पोहचून त्यांना प्लेऑफ्सचा डाव साधता येईल. पण दोन किंवा अधिक सामन्यातील पराभवासह त्यांच्यावर स्पर्धेबाहेर होण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे तेही मुंबई इंडियन्सच विरुद्ध जोर लावताना दिसतील. चेन्नई सुपर किंग्स उर्वरित लढती कुणाविरुद्ध खेळणार?
99 shares
😊
Loksatta logo
Loksatta
May 1, 2026, 11:57 PM
सेबॅस्टियन सवेने लंडन मॅरेथॉन दोन तासांच्या आत पूर्ण करून नवा विक्रम केला

सेबॅस्टियन सवेने लंडन मॅरेथॉन दोन तासांच्या आत पूर्ण करून नवा विक्रम केला

चीनमध्ये कुठल्याशा स्पर्धेत एका रोबोने मानवी स्पर्धकांना हरवून दाखवले असले तरी मानवी क्षमतांवरील प्रेम, आशा कमी होणार नाही याचाच जणू भरवसा ही माणसे देत आहेत. तसे पाहता मॅरेथॉन ही वेगापेक्षाही चिकाटी आणि शारीरिक सहनशक्तीची सत्त्वपरीक्षा पाहणारी शर्यत. तरीदेखील गेल्या काही दिवसांमध्ये या शर्यतीविषयी बातम्या वेगाच्या संदर्भानेच माध्यमांमध्ये झळकल्या. कारण स्पर्धात्मक परिप्रेक्ष्यात प्रथमच एखाद्या मानवाने मॅरेथॉनसाठी आवश्यक ४२.१९५ किलोमीटर अंतर दोन तासांच्या आत पूर्ण केले. त्या मानवोत्तमाचे नाव सेबॅस्टियन सावे. तो केनियाचा. जगप्रसिद्ध लंडन मॅरेथॉनमध्ये गेल्या रविवारी सावेने १.५९.३० तास (एक तास ५९ मिनिट ३० सेकंद) अशी वेळ नोंदवली. ॲथलेटिक्समध्ये १०० मीटर्सची शर्यत दहा सेकंदांच्या आत पूर्ण करणे मानवाला बर्‍याच आधी साधले. पण मॅरेथॉन दोन तासांच्या आत पूर्ण करणे या आव्हानाचे आकर्षण दीर्घकाळ होते. दोन तासांच्या आत एखाद्याने मॅरेथॉन पूर्ण करण्याची ही पहिली वेळ नव्हती. केनियाच्याच एलियुद किपचोगेने २०१९ मध्ये व्हिएन्नात १.५९.४० तासात पूर्ण केली होती. ती शर्यतदेखील दोन तासांच्या आत पूर्ण झाली, तरी तिचे स्वरूप प्रदर्शनात्मक होते. निकषांमध्ये सूट होती. काही सवलती घेण्यात आल्या आणि मुख्य म्हणजे, संबंधित वेळ अधिकृत नसेल हे आधीपासूनच ठरलेले होते. तरीदेखील त्यावेळी ‘दोन तासांच्या आत मॅरेथॉन’ या आव्हानाचे क्षितिज खुणावू लागले होते. या किपचोगेने वर्षभर आधी बर्लिन मॅरेथॉनमध्ये २.०१.३९ तास अशी वेळ नोंदवून त्या वेळचा जागतिक विक्रम मोडला होता. याच किपचोगेने नंतर २०२२ मध्ये बर्लिन मॅरेथॉनमध्येच २.०१.०९ अशी वेळ नोंदवून स्वत:चाच जागतिक विक्रम मोडला नि नवा प्रस्थापित केला. तेव्हा ही वेळ त्याच्या बहुतेक सर्व समकालीनांच्या आवाक्याबाहेरची असल्याचे बोलले जाऊ लागले. पण किपचोगेचा तो विक्रम अल्पायुषी ठरला. कारण पुढच्या वर्षी शिकागो मॅरेथॉनमध्ये केनियाच्याच केल्विन किप्तमने २.००.३५ तासांची वेळ नोंदवून खळबळ उडवून दिली. दुर्दैवाने या किप्तमचा पुढील वर्षी अपघाती मृत्यू झाला. अन्यथा किपचोगे-किप्तम यांच्यातील द्वंद्व फेडरर-नडाल यांच्या द्वंद्वाइतकेच लक्षणीय ठरू शकले असते. या घडामोडींचा परामर्श घेता दोन तासांच्या आत मॅरेथॉन पूर्ण करण्याची कामगिरी दृष्टिपथात आली होती. सेबॅस्टियन सावेने ती प्रतीक्षा संपुष्टात आणली. त्या लंडन मॅरेथॉनचे वैशिष्ट्य म्हणजे, योमिफ केजेल्चा या इथियोपियाच्या धावपटूनेही ती १.५९.४१ तासात शर्यत पूर्ण केली. या मॅरेथॉनमध्ये अशा रीतीने दोन तासांच्या आत शर्यत पूर्ण करणारे दोन धावपटू निघाले. तर युगांडाच्या जेकब किप्लिमोने २.००.२८ तास अशा वेळ नोंदवली. म्हणजे तब्बल तीन धावपटूंनी एकाच शर्यतीत जागतिक विक्रम (किप्तम – २.००.३५ तास) मोडला. या सर्वच घडामोडी अभूतपूर्व होत्या. धावणे हा प्रकार मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यात सर्वाधिक आदिम. जीव वाचवण्यासाठी, भक्ष्य मिळवण्यासाठी कपि वानराचा मानवप्राणी होत असताना, दोन पायांवर उभे राहणे, चालणे आणि धावणे हे अत्यंत महत्त्वाचे टप्पे ठरले. किंबहुना, कित्येक चतुष्पाद प्राण्यांच्या तुलनेत कितीतरी अधिक कमकुवत असूनही द्विपाद मानवाने खंडप्राय वाटचाल केली आणि पृथ्वी पादाक्रांत केली. पुढे नौकानयन आणि हवाई उड्डाणांच्या जोरावर सागरी, महासागरी अडथळेही पार केले. तरीदेखील स्वत:च्या पावलांवर उभे राहणे, चालणे आणि धावणे या क्रियांबरोबरची आपली नाळ कधीच तुटली नाही. मॅरेथॉन ही निव्वळ धावण्याची स्पर्धा नाही. तिच्यात अंतर्भूत असलेले ४२ किलोमीटरचे अंतर धावत पूर्ण करणारे पृथ्वीतलावर अत्यल्पसंख्याक ठरतात. म्हणून त्या आव्हानाविषयी आकर्षणही सर्वव्यापी. मॅरेथॉनपटूंविषयी आदर सर्वंकष. पावलापासून हृदयापर्यंत असंख्य अवयव आणि इंद्रियांची परमकसोटी पाहणारी ही शर्यत पूर्ण करणे यातच कित्येकांना आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते. काहींना या शर्यतीशी प्रतीकात्मक साधर्म्य साधणार्‍या शर्यतींमध्ये (उदा. अर्ध मॅरेथॉन) सहभाग नोंदवून हौस फिटवून घ्यावीशी वाटते. या मॅरेथॉनचे सेलेब्रिटी मॅरेथॉन, वॉकेथॉन वगैरे विद्रुपीकरणही हल्ली आजूबाजूला पाहावयास मिळते. तरी मॅरेथॉन ती मॅरेथॉन. ते विश्वच वेगळे. मानवाच्या उत्क्रांतीची सुरुवात आफ्रिका खंडातून झाली असे मानले जाते. विद्यमान मानवही प्रथम तेथेच विकसित झाला असावा. त्या मातीतच बहुधा काही तरी गुण असावा. त्यामुळेच अलीकडच्या काळातील झाडून सगळे विजेते केनिया, इथियोपिया, युगांडा, टांझानिया, इरिट्रिया या आफ्रिकी देशांतलेच. त्यातही चर्चा होते ती केनियातील रिफ्ट व्हॅली या प्रदेशाची. जवळपास ६०-७० टक्के मॅरेथॉन विजेते – पुरुष आणि महिला – या प्रदेशात वाढलेले आहेत. हे गणित किंवा गुपित नेमके काय याविषयी परदेशी विद्यापीठांमध्ये खोर्‍याने संशोधने होत असतात. कित्येक आघाडीचे मॅरेथॉनपटू रिफ्ट व्हॅलीमध्ये जाऊन सराव करतात. समुद्रसपाटीपासून आठेक हजार फुटांवर वसलेला तो डोंगरदर्‍यांचा प्रदेश मॅरेथॉनपटू निपजण्यासाठी आदर्श ठरतो, म्हणे. तिथल्या लोकांना याचे काही सोयरसुतक नसते. शाळा कुठे तरी दूरवर, तिथे वेळेत पोहोचायचे तर धावतच जावे लागणार. शेतांमध्ये, रोजगारासाठी पायपीट करावी लागते. कदाचित आल्हाददायक, कोरड्या हवेमुळे चालण्याऐवजी धावण्याकडे कल वाढला असेल. संध्याकाळी अंधार लवकर होतो म्हणून माघारीच्या रस्त्यावरही धाव. कधी धान्यकेंद्रांवर जिन्नस लवकर संपते म्हणून ते मिळवण्यासाठी धाव. कधी कुट्ट काळोख पडला तर श्वापदांचे भय म्हणून धाव. कधी काहीच निराळा उद्योग नाही म्हणून धाव. अनेक रिफ्टवासीयांचा दिवस धावण्यात सुरू होतो नि धावण्यातच संपतो. त्यामुळेच तिथे वाढलेल्या बहुतेक सर्व मॅरेथॉन विजेत्यांना, ते जिंकल्यानंतर पत्रपरिषदांमध्ये ‘जिंकण्यासाठी करता काय, खाता काय’ या प्रश्नावर नेमके उत्तरच देता येत नाही! ही साधासुधी माणसं धावतात नि जिंकतात… बॉस्टन, लंडन, न्यूयॉर्क, शिकागो, बर्लिन, टोक्यो, सिडनी या सात प्रमुख मॅरेथॉनमध्ये, ऑलिम्पिकमध्ये, जागतिक स्पर्धांमध्ये, मुंबईसारख्या अलीकडच्या मॅरेथॉन स्पर्धांमध्येही… म्हणून त्या विजयांची झळाळी निराळी, खुमारी वैश्विक. मॅरेथॉन या संकल्पनेचा जन्म झाला ग्रीको-रोमनांच्या गोर्‍या संस्कृतीत. एका सुपरिचित आख्यायिकेनुसार, फिडिपिडेस या ग्रीक निरोप्या-सैनिकाने पर्शियाच्या पराभवाची वार्ता ग्रीकांना त्वरित समजावी म्हणून धावायला सुरुवात केली. युद्धभूमी होती मॅरेथॉन या किनारी प्रदेशात. फिडिपिडेसला पोहोचायचे होते अथेन्स शहरात. इसवीसन पूर्व ४९० मध्ये झालेली ती लढाई इतिहासात नोंदवली गेली आहे. फिडिपिडेसच्या आख्यायिकेबाबत मात्र अनेक प्रवाद आहे. मॅरेथॉन ते अथेन्स हे अंतर जवळपास ४० किलोमीटरचे होते. फिडिपिडेस धावतच अथेन्सला पोहोचला खरा. पण आनंदवार्ता सांगून अतिश्रमाने तेथेच कोसळला आणि प्राणपारखा झाला. आनंदवार्तेची शोकान्तिका झाली. पण ती कहाणी शेकडो वर्षे प्रेरक ठरत आली. अथेन्सला १८९६ मध्ये पहिल्यांदा आधुनिक ऑलिम्पिक भरवले गेले, त्यावेळी मॅरेथॉन ते अथेन्स असाच मार्ग निवडण्यात आला नि ‘मॅरेथॉन’ या क्रीडा प्रकाराचा जन्म झाला. त्या स्पर्धेत स्पायरीडॉन लुइस या ग्रीक विजेत्याने नोंदवलेली वेळ होती २.५८.५०. तासांची. पुढे १०८ वर्षांनी २००४ मध्ये अथेन्सलाच दुसर्‍यांदा ऑलिम्पिक भरवले गेले, त्यावेळी स्टेफानो बाल्डिनी या इटालियान विजेत्याने २.१०.५५ तासात मॅरेथॉन पूर्ण करून सुवर्णपदक जिंकले. म्हणजे १०० वर्षांत ५० मिनिटे नि गेल्या वीसेक वर्षांत १० मिनिटे असा हा घटत्या वेळेचा आलेख. तो मानवाच्या शारीर आणि तांत्रिक प्रगतीचाही निदर्शक. कृत्रिम प्रज्ञेच्या काळात विशिष्ट मानवी क्षमतांची आणि कौशल्यांची गरज किती असे प्रश्न उपस्थित होत आहेत, तिकडे चीनमध्ये कुठल्याशा स्पर्धेत एका रोबोने मानवी स्पर्धकांना हरवून दाखवले. तरीदेखील मानवी क्षमतांवरील प्रेम, आशा कमी होणार नाही याचाच जणू भरवसा ही वेगे वेगे धावणारी माणसे देत आहेत. तो निश्चितच आश्वासक.
98 shares
😐